Wednesday, October 19, 2011

...तर या क्रुत्रीम अर्थव्यवस्था कोसळुन पडतील....



जी अर्थव्यवस्था आर्थिक निर्मितीसाधनांचे पुनरुज्जीवनाचे चक्र अबाधित ठेवत जनतेच्या मुल्यवर्धीत आर्थिक विकासात भर घालत अनिश्चिततेच्या दु:श्चक्रातुन मुक्तता देवु शकेल तिला आपण शाश्वत अर्थव्यवस्था म्हणु शकतो. प्रुथ्वी एकच आहे आणि नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. या संसाधनांचा वापर ज्या गतीने वाढत चालला आहे त्या गतीने येत्या काही दशकांतच अनेक संसाधने पुर्णतया संपुष्टात आलेली असतील. अन्य ग्रहांचे शोध सुरु असले तरी तेथे मानवी जीवनास अनुकुल हवामान असेल याची खात्री नाही...आज जे ग्रह अन्य दीर्घिकांमद्धे सापडत आहेत ते एवढे दुर आहेत कि माणसाने तंत्रद्न्यानाच्या जोरावर अगदी प्रकाशवर्षाच्या वेगाने प्रवास करण्याची क्षमता गाठली तरी काही हजार ते लाख प्रकाशवर्ष एवढे ते दुर असतील. सुर्यमालिकेतील अन्य ग्रहांवरुन खनिजादि आयात करायचे ठरवले तरी त्याचा खर्च आज आहे त्याच्या किमान लक्षपट असेल. त्यामुळे तंत्रद्न्यान विकसीत झाले तरी त्याचा लाभ सर्व मानवजातीला होणार नाही. मानवी मुल्यव्यवस्था व अर्थव्यवस्थाच त्यामुळे कोलमडुन पडेल.
मी येथे सायंस फिक्शन लिहित नसल्याने काल्पनिक भयावह चित्र निर्माण करण्याचा मानस नाही. पण या वास्तवाच्या दिशेने आपण अत्यंत वेगाने निघालो आहोत. सध्याची आपली उत्पादकता, भांडवलाचे स्त्रोत आणि उत्पादनांची खरी मुल्यवर्धकता याचा विचार केला तर आपण वास्तवदर्शी अर्थव्यवस्थेत जगत नसुन काल्पनिक मुल्यांवर आधारीत अर्थव्यवस्थेत जगतो आहोत हे सहज कोणाच्याही लक्षात येईल. जगभरचे भांडवलबाजार आज ज्या गतीने कोसळत आहेत त्या गतीने खरोखर अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत काय हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. जेंव्हा भांडवलबाजार वरची दिशा गाठु लागतात तेंव्हा गुंतवणुकदार आशांच्या लाटेवर आरुढ होत नवीन गुंतवणुकी सुरु करत असतो तेंव्हा खरोखर अर्थव्यवस्था वर गेलेली असते काय हाही प्रश्न असतोच आणि यावरही चिंतन करण्याची गरजही उपस्थित करतो.

भांडवलबाजार हा अर्थव्यवस्थेचा खरा निदर्शक नाही पण तोच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो हेही तेवढेच खरे आहे. भांडवलबाजात अल्पावधीत ज्या वेगात कोसळलेला असतो तेवढ्या वेगात वास्तव अर्थव्यवस्था नक्कीच कोसळलेल्या नसतात. तसेच हाच बाजार झपकन वरच्या पातळ्या गाठतो तेंव्हा अर्थव्यवस्थेने तेवढी प्रगती नक्कीच केलेली नसते. शिवाय भांडवलबाजारात गुंतवणुकदार जेंव्हा गुंतवणुक करतो, तेंव्हा तो पैसा तो ज्या कंपनीत म्हणुन गुंतवतो तो त्या कंपनीकडे जात नाही...(फक्त आय.पी.ओ. वा अतिरिक्त भागभांडवल विक्रीचाच अपवाद असतो) तर एका भांडवलदाराकडुन दुस-या त्रयस्थ भांडवलदाराकडे जात असतो. मग हा भांडवलदार लघुत्तम असेल वा महत्तम. म्हणजे एरवी जी भागभांडवल बाजारांतील उलाढाल असते ती जुगा-यांची उलाढाल असते. त्या भांडवलाचा उपयोग ख-या उत्पादक कंपन्यांना होत नाही हे माहित असने आवश्यक आहे. लिस्टेड शेयर्स हे एक जुगारी विनिमयाचे साधन असते त्यामुळे त्यातील वाढ वा घट ही कधीच वास्तवदर्शी असु शकत नाही.
म्हणजेच त्यातील चढ-उतार ना त्या कंपन्यांच्या ख-या आर्थिक मुल्याचे-मुल्यवर्धिकतेचे दर्शन घडवतात ना त्यांना या चढ-उतारीचा फायदा असतो. मग हा पैसा जातो कोठे? आधीच म्हटल्याप्रमाणे एका भांडवलदाराकडुन दुस-याकडे तर तिस-याकडुन चवथ्याकडे असा हा अनुत्पादक प्रवास सुरु असतो. त्यातुन वास्तव उत्पादनाला कसलाही हातभार लागत नाही. त्यातुन वास्तव संपत्तीचे निर्माण होत नाही. ज्या कंपनीच्या भागभांडवलात पैसे गुंतवले आहेत त्या कंपनीची खरी आर्थिक प्रगति होवुन तिला होणा-या फायद्यातुन लाभांश मिळावा हा हेतु सहसा एकाही गुंतवणुकदाराचा नसतो. म्हनजे तो एक स्टेक लावत असतो...कधी जिंकण्याचा तर कधी हरण्याचा...म्हणुन ब्रांड-लोयल्टी शेअरबाजारात आढळत नाही. भाव पडायला लागला कि विकुन टाका...वर व्हायला लागला कि विकत घ्या...ही मानसिकता जागतीक भांडवलादारांची आहे. अगदी अवढव्य ब्रोकींग कंपन्या, ब्यांका, अन्य वित्तसंस्था या नियमाला अपवाद नाहीत. यात अशा अनेक जायंट्सची दिवाळीही निघालेली आहेत असे आपण पहातो...वाचतो...
याचे कारण हे आहे कि हा पैसा मुळात या अवाढव्य वित्तसंस्था ब्रोकींग कंपन्यांचाही असतो का?
खरे तर हे भांडवलदारांचे दलाल असतात...स्वत: भांडवलदार नसतात. ब्यंकांचेच उदाहरण घेवुयात. ब्यंका जी कर्जे देतात वा भागभांडवल बाजारात गुंतवतात तो त्यांचा नसुन अगणित छोट्या गुंतवणुकदारांनी त्यांच्याकडे गुंतवलेला पैसा असतो. भले तो मुदत/बचतठेवींच्या रुपात असेल वा म्युचुअल फंडांतील गुंतवणुकींचा. पण तो असतो ख-या गुंतवणुकदारांचा. अगणित छोट्या भांडवलदाराणी मोठे भांडवलदार कसे निर्माण केले जातात त्याचे हे एक स्वरुप आहे, पण त्यावर नंतर चर्चा करुयात.
येथे प्रश्न असा आहे कि ब्यंका असोत वा ब्रोकींग कंपन्या असोत...हे खरे भांडवलदार नसुन भांडवलाचे व्यवस्थापक असतात. शेयरमार्केटमद्धे यांना दलाल म्हनतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्श्ढ रितीने हे लोक आपल्याला हव्या त्या कंपन्यांत पैसे वळवायला प्रेरीत करत असतात. ब्यंका आपल्याला हव्या त्या क्षेत्राचे नियोजन करुने ठेवरुपातील धन वेगवेगळ्या क्षेत्रांकडे कर्ज वा गुंतवणुकीच्या स्वरुपात वळवत असतात. अशा रितीने भांडवल आधी एकत्र येत मग विशिष्ट क्षेत्रांत विभाजीत होत असते. कारखाने, अन्य सर्व प्रकारचे व्यवसाय ते व्यक्तिगत कर्जे ते भागभांडवलबाजार यात ब्यंका आपला निवेश करत जातात तर त्याउलट फक्त भागभांडवलबाजारावर अवलंबुन असणा-या गुंतवणुकदार संस्था मात्र अधिकाधिक लाभाच्या आमिषांना समाजाला बळी पाडत भागभांडवलबाजारात गुंतवणुक करायला प्रेरीत करत असतात तसा अर्थपुरवठा समाजातुनच उभा करत असतात.
आता यातील फरक समजावुन घेतला पाहिजे. ख-या वास्तव उद्योगांतील गुंतवणुक ही मुल्यवर्धन करत असते तर भागभाम्डवलातील (आय.पी.ओ ते विस्तारीत भागभांडवल...अग्रक्रमाचे समभाग ते कर्जरोखे वगळता) कसल्याही वास्तव संपत्तीचे निर्माण करत नाही वा करण्यास हातभार लावत नाही. एका अर्थाने तीही सोण्यात केलेल्या गुंतवणुकीसारखी आहे. म्हनजे डेड इन्वेस्टमेंट आहे. त्यात शाश्वत मुल्यवर्धिकता नाही.
येथे मुल्यवर्धिकता म्हनजे सोन्याचा भाव वाढला म्हनजे वर्धन झाले असा नसुन ते अर्थव्यवस्थेच्या एकुणातील विकासाला हातभार लावण्यास पुर्णतया अक्षम असते हा त्याचा अर्थ आहे.
याला आपण शाश्वत आर्थिक विकास म्हणु शकत नाही. असे आर्थिक विकासाचे क्रुत्रीम मापदंड हे नेहमीच अस्थिर असु शकतात आणि तेच वास्तव आज आपण एकुणातील जागतीक अर्थव्यवस्थेच्या अनिश्चित चढ-उतारावरुन कल्पु शकतो.

ख-या अर्थव्यवस्थेचे लक्षण

खरी अर्थव्यवस्था तीच असते जिच्यातुन श्रीमंतांकडुन गरीबांकडे अर्थस्त्रोत वाहतील. त्यात सातत्य राहील. गरीबांनी श्रम, बुद्धी, कल्पकता, कौशल्ये, लघुत्तम (शेतीज, प्राणीज...ई) उत्पादने विकुन त्या बदल्यात सुस्थिर अर्थार्जन करावे आणि त्या अर्थाचा वापर आपले जीवन शाश्वत रित्या सुस्थिर करण्यासाठी वापरावे. येथे सुस्थिरतेसाठी वापर याचा अर्थ एवढाच आहे कि ज्याशिवाय जगणे असह्य आहे, जी खरीखुरी गरज आहे जिच्या आपुर्तीशिवाय जीवनयापन अशक्य आहे अशा सर्वच गरजांच्या पुर्तीसाठी...क्रुत्रीमरित्या जाणीवपुर्वक निर्माण केलेल्या गरजांसाठी नाही.
अशीच अर्थव्यवस्था श्रेष्ठ असते जिच्यात गरजाधारीत उत्पादन होते...अतिरिक्त उत्पादने (म्हणजे मागणीपेक्षा अधिक) करत लोकांच्या गरजा भावनीक आवाहने करत वाढवत त्यांना आपल्या उत्पादनाच्या सापळ्यात अडकवण्यासाठी नाही.
यामुळे साधनसामग्रीचा अकारण विनाश टळत असतो. आणि हेच शाश्वत अर्थव्यवस्थेला अभिप्रेत असते.
परंतु सध्याच्या जागतीक अर्थव्यवस्थांचा प्रवास वेगळाच आहे. म्हणजे गरीबांकडुन श्रीमंतांकडे अर्थस्त्रोत वहात असतात. आपण वर पाहिलेच आहे कि अगणित छोट्या भांडवलदारांच्या (म्हणजे त्यांचा बचतीचा...वा अतिरिक्त उत्पन्नाचा) प्रवाह मोठ्या भांडवलदारांकडे सुरु असतो. ते त्याच्याच भांडवलाचे व्यवस्थापक बनतात आणि अशा क्षेत्रांकडे तो प्रवाह वळवतात जे आवश्यकतेपेक्षा वास्तव मागणीपेक्षा अधिक उत्पादनाच्या मागे लागतात आणि प्रतिष्ठेच्या नव्या संकल्पना जाहिराती-माध्यमांच्या माध्यमातुन त्यांच्याच डोक्यावर आदळत पुन्हा त्यांनाच ग्राहक बनवत त्यांना पुन्हा अर्थ-क्षीण करत जात असतात.
हे वरील विधान बारकाईने समजावुन घ्यायला हवे.
ख-या अर्थाने आर्थिक स्त्रोत वरुन खाली येतच नसुन तो खालुनच वर जातो आणि समाजाला वेठीस धरुन अर्थ-दुश्चक्रात पाडतो. एका रात्रीत उच्चतम आर्थिक दर्जा असणा-या ब्यंका दिवाळे काढतात. अवाढव्य जागतीक दर्जाचे कारखाने बंद पडतात. ग्रीससारख्याच काय अमेरिकेवरही दिवाळखोरीची वेळ येते...रशियावर ती आलीच होती...खरे तर ती कोनावरही कधीही येवु शकते. मी येथे उदाहरणांत जात नाही कारण सुद्न्य वाचकांना ती माहितच आहेत.
असे होते कारण जनसामान्यांच्या नैसर्गिक आणि वास्तव भांडवलाचे यांचे व्यवस्थापन पुरेपुर फसलेले असते. राष्ट्रीय साधनस्त्रोतांची किती लुट होवू द्यायची याबद्दल ते डोळे झाकुन असतात. कर्नाटकमद्धे जे घडले ते खान-कांड...त्यात आज किती नुकसान झाले याची किंमत जेंव्हा सारेच स्त्रोत संपु लागतील तेंव्हा कळेल, पण तेंव्हा हे लोक जीवंतही नसतील.
म्हनजे स्वत:चा विशेष स्टेक नसनारे भांडवलदार जेवढे ख-या भांडवलदारांचे अहित करतात तेवढेच या भांडवलव्यवस्थापकांनाच अनुकुल असणारे लोकप्रतिनिधीही करत असतात.
अर्थव्यवस्था वरुन खाली यायला हवी...तळागाळापर्यंत पोहोचत ते खालील साधनस्त्रोत विकसीत व्हायला हवेत.वास्तवदर्शी अर्थव्यवस्थेचे हेच लक्षण आहे. ख-या भांडवलदारांना सक्षम करता आले नाही तर या क्रुत्रीम अर्थव्यवस्था कोसळुन पडतील यात शंका नाही. त्याबद्दल आपण पुढील लेखात अधिक चर्चा करुयात.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Sunday, October 16, 2011

सावरकरांचे हिंदुत्व (2)



हिंदु धर्मासमोरील समस्या (९)


सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक व्याख्या करत नसुन हिंदु राष्ट्रीयत्वाबद्दल आहे असा समज त्यांच्या विधानावरुन होतो. असा समज होणे स्वाभाविक आहे. एवढेच नव्हे तर जेंव्हा सावरकर म्हनतात "हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)" तेंव्हा ते अखिल विश्व हेच एक राष्ट्र असा सिद्धांत स्वीकारत एक महा-मानवतावादी असल्याचा देखावा निर्माण करत एक उदात्त भुमिका घेतांना दिसतात तेंव्हा त्यांच्याबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. "वसुधैव कुटुंबकम" वा "हे विश्वची माझे घर..." ही तत्वद्न्यांची विराट द्रुष्टी सावरकरही बालगतात हे पाहुन संतोषही होतो.

पण सावरकरच म्हनतात जर "मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन." - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
सावरकरांचे हेही विधान व्यापक आणि विश्ववादी असल्याचा आभास निर्माण होतो आणि खरे तर ते माझ्याही "One world One nation" या भुमिकेशी सुसंगतच आहे. पण सावरकरच म्हनतात "काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !" - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२) तर याचा अर्थ असा होतो कि सर्वच "त्व" वादी "हिदुत्ववादी" व्हायला हवेत कारण तोच ग्राह्यतम धर्म आहे. आता हिंदु हा धर्म जर सावरकरांच्याच मते नाही, हिंदु म्हणुन ओळखल्या जाणा-या भुप्रदेशातील आणि या प्रदेशाला आपली पुण्यभुमी मानणारे ते हिंदु अशी त्यांचीच व्याख्या आहे तर (विश्वातील) ग्राह्यतम धर्म् हिंदु हाच होय असेही सावरकर ठासुन सांगतात.

हेच सावरकर पुढे म्हनतात कि "बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )

मी पुर्वीच्या लेखांत म्हटले आहेच कि हे हिंदुत्ववादी म्हनजे खरे वैदिकतावादी आणि वैदिक संस्क्रुतीचे गौरवगान करत शब्दछल करत सामान्य हिंदुंची ग्झोर फसवणुक करत असतात. वरील सावरकरांच्याच विधानात "सनातन धर्म", "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त धर्म" अथवा वैदिक धर्म अशा संद्न्या येतात. श्रुती-स्म्रुती म्हणजे सावरकरांना काय अभिप्रेत आहे हे वेगळे सांगण्यत तसा अर्थ नाही, पण श्रुती म्हणजे वेद तर स्म्रुती म्हनजे मनुस्म्रुत्यादि वर्णव्यवस्थेची महत्ता आणि अपरिहार्यता सिद्ध करणारी धार्मिक महत्ता आहे. "सनातन" धर्माचाच अर्थ मुळी वैदिक धर्म असल्याने सध्या बहुजनवाद्यांत "सनतनी" हा शब्द केवढा बदनाम झाला आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण सावरकर जेंव्हा शीख, जैन, बुद्ध यांनाही हिंदु म्हनतात वा त्यांना हिंदुत्वाच्या परिघात ओढतात तेंव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हा सर्वसमावेशकतावाद वरकरणी कोणालाही आकर्षित करु शकतो. पण वास्तव ते नाही आणि कवि असल्याने अवास्तवता मांडणे हा सावरकरांचा एक मुलधर्म आहे. मुलत: हे तिनही धर्म वैदिक धर्माच्या पुरेपुर विरोधात असुन त्यांचे तत्वद्न्यानही अवैदिक आहे. सनातन धर्मात ते लबाडी अशी करतात कि त्यातच शैवादि मुर्तीपुजक अवैदिक परंपरागत धर्माचाही समावेश करुन टाकतात.

कोणी म्हनेल...काय हरकत आहे? हा एकतावाद अधिक महत्वाचा नव्हे काय? हीच हिंदु धर्माची खरी ओळख नव्हे काय? मला मुर्खांच्या नंदनवनात रहायला आवडत नाही. धर्मच अमान्य करुन कोणी असा मानवतावाद मांडला तर तो स्वीकारणे वेगळे आणि धर्म तर हवा पण मी म्हणेल त्या तत्वांचा स्वीकार करणारा असला दुतोंडीपणा कोणीही स्वीकारु शकत नाही. किंबहुना अशा व्याख्या याच हिंदु धर्माच्या (हिंदुत्वाच्या नव्हे) मार्गातील खरे अदथळे बनुन बसल्या आहेत. र.स्व. संघाच्या अशाच धर्मासंबंधीच्या कोलांटौड्या पुढे आपल्याला पहायच्याच आहेत, पण सावरकरांच्या विचारांची चिकित्सा येथे प्रथम आवश्यक आहे.
हिंदु धर्म म्हनजे नेमके काय आणि त्याच्या प्रगतीत पुर्ण अडथळे का येत आहेत याचे कारण येथे शोधायचे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: प्रादेशिक व्याख्येवरच कसे भर देते हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे आणि या प्रकरणात सावरकरांचे हिंदुत्व हे मुलत: खरे वैदिक कसे आहे हे आपण पहात आहोत. त्यांनी व त्यांच्या सांप्रदायिकांनी ही भुमिका मान्य केलेलीच आहे आणि ज्यांना ती अमान्य आहे अशांवर शरसंधान करायला ते सर्वस्वी कसे सज्ज असतात हे आपण पाहिले आहे. म्हनजेच या वैदिक सावरकरवादी सांप्रदायिकांनी स्वत:ला हिंदु म्हनणे सोडुन द्यायला हवे कारण ते हिंदु नाहीत तर वैदिक आहेत. त्यांनी आपला धर्म खुशाल जपावा, त्याबाबत कोणाला वावगे वातायचे काही कारण नाही पण धर्माचाच एक गोंधळ उडवुन देत मेंढराचे कातडे पांघरुन लांडग्यांनी अदआणी, नि:ष्पाप मेंढरांच्या कलपात घुसुन त्यांना हाकलायचे व सावकाश गिळण्याचे पातक थांबवावे एवढेच. प्रादेशिकतेचे नांव घेत वैदिकत्वाचा अंमल बसवण्याचा हा प्रयत्न भारतीय "हिंदु" म्हणवणा-यांनीही का नाकारला याचे विवेचन या उत्तरात आहे.

म्हणजेच हिंदु म्हनजे नेमके काय हा अजुनही कळीचा प्रश्न रहातो. आणि त्या प्रश्नाची सोदवणुक हा या लेखमाकिकेचा उद्देश आहे. सावरकरवादी हिंदुत्व हे कडवे, वैदिकतावादी, श्रुती-स्म्रुती-पुरानवादी कसे आहे हे आपण पाहिले. सावरकरांचा अस्प्रुश्यतेला विरोध कसा होता, त्यांनी अस्प्रुश्यांसांठी स्वतंत्र पतितपावन मंदिर कसे उभारले, स्वातंत्र्योत्तर काळात अस्प्रुश्यताविरोधातील कायदा आल्यावर कसे स्वागत केले हे आम्हाला सावरकरवादी हिरिरेने सांगत असतात...आणि आम्हाला सावरकर द्वेष्टे ठरवत त्यांची व हिंदुत्वाची चिकित्सा करणे कसे महत्पाप आहे हे दरडावत सांगत असतात. त्यांना मला हेच सांगायचे आहे कि तुमच्या व्याखेनुसार मी महत्पापी असेल, परंतु मी ख-या हिंदुंसाठी एक चेतनादायी कार्य करत आहे. त्यांची जाग्रुती हे माझे स्वप्न आहे...तुमच्या द्वेषाला मी काडीएवढीही किंमत देत नाही.

थोडक्यात हिंदु हा धर्म कसा याची कसलीही (प्रादेशिक वगळता) सावरकर व्याख्या करत नाहीत पण वैदिकतावाद आणि मनुवाद हाच हिंदुत्वाचा कसा पाया आहे हे ते ठसवतात. हरकत नाही. पण हिंदु धर्म त्याच्याही पार आहे. तो सर्वांच्या आचरणात आहे पण त्यावरची पुटे मात्र खरवडुन काढावी लागणार आहेत. पुढील लेखात आपण रा.स्व.वादी अर्थात गोळवलकरगुरुजीवादी हिंदुत्वावर चर्चा करत वेदांकडे पुन्हा वळुयात.

Saturday, October 15, 2011

सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व




(हिंदु धर्मासमोरील समस्या)

"हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)"

वरील विधानात सावरकर हिंदु आणि हिंदुत्व यात फरक करतात हे उघड आहे. हिंदु शब्द अरबांनी दिलेला नाही असेही सावरकरांचे मत आहे. पण त्याच वेळीस सिंधु वा हिंदु या स्वाभिमानी नांवाने हे राष्ट्र ओळखले जात होते असेही सावरकर म्हनतात. पण त्यांचेच अनुयायी अ.ज. करंदीकर यांच्या सप्रमाण म्हनण्यानुसार या देशाचे पौरात्य जगातील नांव हे मेल्लुहा (ताम्र उत्पादकांचा देश) आणि काही वेळा सेंकार असे होते. असे असेल तर सावरकरांचे विधान हे व्रुथाभिमानी होते कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही.
सावरकरांचे वरील विधान धर्मेतिहासाचा विपर्यास कसे करते हे आपण पाहुयात. "हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो." असे सावरकर म्हणतात. आता धर्मात धार्मिक अंगांचा समावेश नसतो तर सांस्क्रुतिक, भाषिक आणि राजकिय, भाषिक सामाजिक........." सावरकर शब्दछलात पटाइत होते हे सर्वद्न्यातच आहे जेंव्हा आपण धर्माबद्दल बोलतो तेंव्हा धार्मिक तत्वद्न्यान, कर्मकांड आणि त्यानुसार अपेक्षीत समाजव्यवस्था या बद्दल बोलायची वेळ येते तेंव्हा सावरकर संस्क्रुती...(कोनती आणि कोणाची?) भाषिक...( कोणती भाषा आणि कोणाची...कोल...मुंड, प्राक्रुत..माहाराष्ट्री कि शौरसेनी...नि मग द्रविड भाषांचे काय?) सामाजिक? सावरकरांना कोनती सामाजिकता अभिप्रेत होती आणि आहे? आणि सावरकर जेंव्हा राजकीय शब्द वापरतात तेंव्हा अश्चर्य वाटते कारण हिंदु या तथाकथित नामक धर्माचे यच्चयावत या देशाच्या इतिहासात कोनती नेमकी राजकीय तत्वद्न्यानात्मक अंगाची स्थिती होती बरे?
सावरकर माहाराष्ट्रीभाषी प्रेमी होते आणि मराठी भाषेला त्यांनी अत्यंत उत्तम व्यावहारिक शब्द दिले. त्यांचे हे ऋण मान्य करुन त्यंनी भारताला कोणते भाषिक अधिष्ठाण दिले? त्यांची काव्यात्मक प्रतिभा महाकविला साजेशी आहे हे मान्य करुनही मी विचारतो त्यांनी कोणते राष्ट्रीय काव्य लिहिले?
सावरकरांना अभिप्रेत असनारा हिन्दु धर्म हा प्रय: प्रादेशिक होता. त्या अर्थाने या देशातील ख्रिस्ती, मुस्लिम, शिख आणि आदिवासी आपसुक हिंदु ठरत होते,....गोळवलगुरुजीनीही तीच व्याक्या पुढे कायम केली. पण तेथेच हे सारे हिंदुत्ववादी फसले.
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥

- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)

असली धर्माची व्याख्या कोणी केली नसेल. ती चुकीचीही आहे सावरकरांची ही पाश्चात्यवादी
ती कशी हे थोडक्यात सांगुन हा लेख संपवतो आणि पुढील लेखाचा उपोद्घात करतो.

प्रत्येक भारतीय माणुस आपल्या देशाला पित्रुभु: नव्हे तर मात्रुभुमी मानत असतो. सावरकरांची ही पाश्चात्यवादी व्याख्या असुन ती हिंदु धर्माबाबत कसलेही ठाम विधान करु शकत नाही हे उघड आहे.
सावरकरांवर बहुदा पाश्चात्य संस्कार असल्याने ते या देशाला मात्रुभुमी नव्हे तर पित्रुभुमी कसे मानु लागले यावर संशोधन व्हायला हवे...तेच अंदमानपुर्व कालातेल गीतात तेच या भुमीला मात्रुभुमी म्हनतात आणि अंदमानोत्तर काळात याच भुमीला पित्रूभू: म्हनतात हे सावरकरांचेच नव्य धर्मांतर नव्हे काय?
आणि जसे रविंद्रनाथ टागोरांना अरुणाचल प्रदेश, आसाम, लेह-लद्दाख इइइइइ दिसले नाहित तसे या राष्ट्रवाद्यालाही दिसले नाहित...ज्यांना धर्मच समजत नाही त्यांना राष्ट्र काय कळणार?
पुढील लेखात अजुन काही...

गांधी नावाचा माणुस लोकशाहीवादी नव्हताच!



राजकारण हा काही माझ्या लेखनाचा आवडता प्रांत नाही. मी राजकीय पार्श्वभुमीवरील थरारकथा अनेक लिहिल्या आहेत पण त्यातील राजकारण हे बव्हंशी कथानुकुल असे आहे, वास्तवाशी त्याचा फारच थोडा संबंध आहे. बरे मी कोणत्याही पक्षाशी संबंधीत नाही. जेही पक्ष सध्या आहेत आणि एकामागुन एक निघत आहेत आणि पुढेही निघतील असे स्पष्ट चित्र आहे, तर प्रश्न असा येतो कि ज्या देशात अक्षरश: शेकडो पक्ष आहेत तो देश राजकीय वैचारिकतेच्या कोनत्या तरी शिखरावर जावून पोहोचला असला पाहिजे, कारण एवढ्या विभिन्न समाजोपयोगी राजकीय विचारधारा या देशात आहेत. एवढे पक्ष आहेत आणि सारेच या देशाचे कल्याण करणा-या तत्वद्न्यानाने सज्ज आहेत.
मी आजतागायत एकदाच मतदान केले आहे. मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि तो बजावला गेलाच पाहिजे असे सांगितलए जाते...ते मलाही मान्यच आहे...पण निवडनुकीस उभे असलेल्यांपैकी जे काही पक्षीय ते अपक्ष ५-५० (कधी शे दोनशे) असतात...ते सारेच एकतर बदमाश वा केवळ हौस म्हणुन उभे असतात हे दिसत असेल तर मी मतदान का आणि कोणातरी एका बदमाशाला वा नाकर्त्याला का करावे? मी माझा वेळ वाया का घालवावा?
खरेच मी फक्त आजतागायत एकदाच मतदान केले आहे आणि ज्याला केले त्याला करुन खुप पस्तावलो आहे. आता म्हणतात "उमेदवाराला परत बोलवायचा कायदा आणुयात..." मी म्हनतो यासारखा अधिक मोठा विनोद दुसरा कोनताच नाही...कारण मागे बोलावणार कोण? जे मतदार आधी मते द्य्यायला आणि चुकीचा उमेदवार निवडुन आणण्यात चुकले तेच मतदार पुन्हा बोलावतांनाही चुकणार नाहीत याची काय खात्री? आणि त्याच्या जागी ज्याला आननार तोही महाभद्र असेल ही मतदारांची कशी खात्री असू शकते?
तेंव्हा जनलोकपालापासुन ते उमेदवाराला परत बोलावण्याच्या कायदेशीर तरतुदी करण्याच्या ज्याही मागण्या होत आहेत त्या मुळात कोणत्या भ्रष्ट प्रेरणांतुन होत आहेत हे तपासले पाहिजे. उदाहरणार्थ महान (स्वयंघोषित महात्मा) अण्णा हजारे जेंव्हा आपले सामाजिक चळवळीचे काम सोडुन विशिष्ट पक्षाविरोधात प्रचार करतात हे कोनत्या सामाजिक चळवळीत बसते? हा नैतिक भ्रष्टाचार नव्हे काय? ज्यांची वैचारिक व नैतिक भुमिका ठाम (स्थिर) नाही, त्याला गांभिर्य नाही...असे लोक सध्याचे जेही राजकारण आहे त्यावर एक नैतिक आणि वैचारिक दबावगट म्हणुन तरी काम करु शकतील अशी आशा बाळगणे हा समाजाच्याच वैचारिक अध:पतनाचा उत्क्रुष्ठ नमुना आहे.
मी मतदान एकदाच केले. केले तिही चुकच होती याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी मतदान करावे यासाठी कोणी मला दारुच्या बातल्या वा गांधीबाबा घेवुन आला नाही. (वाया जाईल अशी भिती उमेदवारांना वाटली असेल...) कोणी मला मोतरबाईक वा एखादी एजंसी वा पद देण्याचे वचन दिले नाही हेही कारण असेल. पण मी मतदान फक्त एकदाच केले आणि पस्तावलो हेही खरे.
म्हनजे मला लोकशाही मान्य नाही असाच अर्थ निघतो का? खरे तर होय...असाच अर्थ निघतो...
भ्रष्ट लोकांनी भ्रष्ट लोकांना मतदान करत निवडुन आणलेली राजकीय साठमारीयुक्त झुंडीची तत्त्वप्रणाली राबवणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी व्याख्या ज्यांनाही मान्य आहे त्यांनी या देशात आहे तिला खुशाल लोकशाही म्हनावे. मी तिला मुळात लोकशाही मानतच नाही त्यामुळे मी मतदानच करत नाही.
समजा मतदानच सर्वांनीच केले नाही तर?
हे या देशात अशक्यप्राय आहे. मतदान होनारच कि. पैसे काय फुकट वातलेत काय? आणि ज्यांना पैसे दिलेत त्यांच्या बोटावरील (मत कोणालाही दिलेले असेल) पण खुणा लपतात काय?
तेंव्हा मतदान होनारच. हा नाही तर तो बदमाश निवडुन येणारच.
०% मतदान होनार नाही...
आणि "यातील एकही उमेदवार पसंत नाही" (अशीही व्यवस्था केली तर...) अशी किती मते पडतील?
तेंव्हा निवडनुका होनारच...कोणीनाकोणी उमेदवार निवडुन येनारच...
येवुद्यात...
काय हरकत आहे? उगा पैसे वाया घालवतो कि काय तो? हरलेल्याचे वाया गेल्याचे दुक्ख नाही...कोठे प्रामाणिक उत्पन्नातुन त्याने खर्चलेत ते? हराम का हराम मे गया असे म्हणत तो हरलेला पुन्हा नवीन काड्यांत लागणारच कि!

पक्षीय तत्वद्न्यान, व्यापक सामाजिक, आर्थिक, धार्मिक व मुल्यधिष्ठित राजकीय तत्वद्न्यान असनारा मला या देशात एक पक्ष सांगा. मला तरी दिसत नाही. एके काळी अमुक पक्ष चारित्र्यसंपन्न लोकांचा होता हा इतिहास आता उगाळण्यात अर्थ कोठे आहे बरे? अविवाहित असतात पण ब्रह्मचारी नसतात. भ्रष्ट नसतात पण आपले सारे भाईबंद दारिद्र्याच्या अंधारावर मात करुन गडगंज होतात. बाकी लोक मुर्खच असतात. दारिद्रायाचा अंध:कार हतवण्याचा त्यांच्याकडे कार्यक्रमही नसतो, मार्गही नसतो आणि तरीही आपण दरिद्री नाही असे सरकारी आयोगच सांगतात...जर रोज ३० रुपयात तुम्ही जगु शकता तर लेको तुम्ही दरिद्रीच नाही...आणि हा सिद्धांत सांगायला असले आयोग अब्जावधी रुपयांची उधळण करत दर २० मिनिटांना २५ रुपयाचा चहा पीत घोषित करु शकतात...मग तुम्हीही दरिद्री नाही आणि मग कशाला त्या निवडुन आलेल्यांच्या, मंत्री-मुख्यमंत्री बनुन आलेल्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या दारिद्र्यनिर्मुलनावर खडे फोडता बरे?
मी फोडत नाही. मी मतदानही करत नाही.

मला लोकशाही मान्य नाही हे आपल्या आता लक्षात आले असेलच.
का असावी?
जर या देशातील सर्वच केंद्रिय ते ग्रामपंचायतींच्या सरकारांना लोकशाही मान्यच नाही...
लोकशाही आहे याचे अस्तित्व मला जानवतच नाही...
तर मग माझी काय चुक बरे?
हो...तुम्हाला मर्यादित परिप्रेक्षातील लोकशाही अनुभवायला मिळते. म्हणजे तुम्ही हवे ते लिहु शकता, बोलु शकता...(तेही कितपत?), हव्या त्या होटेल्मद्धे, मालमद्धे परवडतात ते सारेच घेवु शकतात, सिग्नल पाळलाच पाहिजे याचे बंधन नाही...अडवले कोणी तर एक गांधीबाबा पुरेसा आहे, त्यापार बाब गेली तर कोणीनाकोणी पोलिसांना फोन करुन झाडनारा आहे...सोदवणारा आहे...नस्देलच तर नशीब...शेवटी या देशाचा नशिबावर एवढा हवाला आहे कि हवाला कांड काही विशेष बाब नाही.
हवालात खायची निमुट...अजुन काय?

तर आपण लोकशाहीबद्दल बोलत होतो. आहे ना लोकशाही. मी उगाचच कधी कधी पेसिमिस्टिक होतो. असली लोकशाही जगात सापडनार नाही. खरेच कि... भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.
या देशात कोन्ग्रेसची लोकशाही आहे, भाजपाची लोकशाही आहे, कम्युनिस्तांची अनेकवादी लोकशाही आहे, कोंग्रेसच्या पिल्लावळीची लोकशाही आहे, समाजवाद्यांची लोकशाही आहे, ठोकशाही ते दबल-ठोकशाहीवाल्यांची आणि त्यांच्याही पिल्लावळीची लोकशाही आहे...त्यांच्याच्तच असुन तरीही स्वतंत्रवादी दादा-भाउ-काका-सरसेनापती...ह्रुदयसम्राट-युवराज- महायुवराज-माई-ताई-आक्का-सायबाची लेक-इंदिरामायची उहु......अशा स्वतंत्र व्यक्तित्वांची रेलचेल आणि त्यांचे त्यांचे स्वतंत्र दरबार आणि हुकुम झाद्डण्याची क्षमता असणे हे लोकशाहीचे केवढे विलक्षण जागतीक पातळीवरचे सर्वश्रेष्ठ दर्शन आहे बरे?
एकाच लोकशाहीवादी म्हनणा-या देशात एवढ्या अंतर्गत लोकशाह्या असने हा लोकशाहीवादाचा विलक्षण विजय आहे.
दुर्दैव एवढेच या अभिनव लोकशाहीवादाचे तत्वद्न्यान कोणी मांडत नाही.
पण बहुदा तत्वद्न्यानच नसणे हेच तत्वद्न्यान आहे असा अलौकिक सिद्धांत त्यांनी मनोमन मान्यच केला असेल कदाचित...
यालाच तर सर्र्वतत्वद्न्यानवादी भारतीय संस्क्रुती म्हणतात.
मी मतदान करत नाही...म्हनजे मी लोकशाहीवादी नाही असे म्हनता येते ते यामुळेच.
उभ्या असलेल्या सर्वच बदमाशांशी मला घेणे नाही. ते कधी मी घरातुन बाहेर पडल्यावरील रस्ता धड असावा अशी व्यवस्था असेल...कोणीही असो...विश्वासच नाही...मला काम करायचेय पण मला वेळेवर वीज असेल...प्यायला शुद्ध पानी असेल, पायी चालत असता मागुन उलटा येत आपले वाहनचालक कौशल्य दाखवत धडकुन सरळ मला कोसळवुन माझ्याच खर्चाने दवाखाना दाखवणारच नाही याची खात्री नसेल...पोलिस त्याला नव्हे तर मलाच दरडावणार असतील...मलाच पैसे मागणार असतील...मी ज्यांना समाजातील असे अनिष्ट संपावे म्हणुन ज्याही कोना आण्णाला महानेता महात्माही मानायला तयार असेल आणि हे स्वयंघोषित महात्मे एक नंबरचे लुच्चे लबाड आणि प्रसिद्धीच्या मागे लागत आमच्याच परिवर्तनाच्या भावनांचा दुरुपयोग करत असतील तर मी लोकशाहीवादी का व्हावे?
मी मतदान करत नाही.
एकदाच केले होते...गंभीर चुक केली होती.
उगा वेळ वाया घालवला.
भ्रष्ट लोक भ्र्ष्टांनाच निवडुन द्यायला जेथे सज्ज आहेत तेथे माझ्या मताला अर्थच नाही.
आणि मी निराशावादीही नाही.
हे सरकार...ही व्यवस्था यांची पर्वा न करता...त्यांचे सारे अन्याय सोसत जगायची मी माझी व्यक्तिगत व्यवस्था बनवली आहे.
आणि तेथे मतदानाची गरज नाही.

मी मतदान करत नाही...

तरुण होतो तेंव्हा (म्हनजे अजुन मी पुरेसा म्हाताराही झालेलो नाहीय...) पण वाटायचे क्रांती व्हावी...खरे प्रामाणिक जनांदोलन व्हावे...प्रत्येकाला एक आत्मविश्वास मिळावा...जगने सुसह्य व्हावे...पण...
मी १९७४-७५ साली वरुडे आणि चिंचोली (तालुका शिरुर जिल्हा पुणे) येथील गांवतळ्यांवर ७ रुपये रोज आणि एक सुकडीचे पाकीट या रोजंदारीने माझ्या आता दिवंगत पण जीवलग मित्र प्रशांत पोखरकरसह राबलो. अण्णांना विचारा ही गावतळी...जी दुष्काळातील रोजगारहमी योजनेतील तळी होती...ती तुमच्याच संघटनांनी कशी बळकावली आणि पुनश्च अनुदाने लाट्ली बरे? माहितीचा अधिकार तुम्हीच मिलवुन दिला. तो कसा वापरला जातो आहे हे त्यांना माहित आहेच. मी म्हणतो या गांवतळ्यांची माहिती जरा तुम्ही स्वत:च माहितीच्या अधिकारात मिळवा आणि प्रसिद्ध करा. चिंचोली मोराच्या त्या ब्राह्मनमळ्यात आता जे पर्यटनस्थळ निघाले आहे त्याचीही माहिती मिळवा आणि प्रसिद्ध करा.
मी हे का सांगतो आहे? अणा माझे शत्रु नाहीत. खरे तर सोनिया, अटलजी, आता देशाला भ्रष्टाचार कसा वाईट असतो हे शिकवायला निघालेले अडवानीजी, हजारो मुसलमान मारुन भारताचे, पंतप्रधान कधी होवु शकणार नसले तरी वापरुन घेतलेले-मोदीजी, दलितांची अवाढव्य शत्रु मायावती ते एकामागुन एक नग असलेले(ल्या) दक्षिणेतील अभिनयाची पारणे फेदनारी एकामागुनची एक व्यक्तिमत्वे...या देशाच्या राजकारणाचा महाप्राण आहेत. कधी हा तर कधी तो. त्यावरचा मुकुटमणी तर महाराष्ट्रदेशी आहे. पण या महामानवाला (त्याच्या उद्दाम पुतन्याला वा नासमझ कन्येला) तर या यच्चयावत विश्वात विष्णु, अब्राहम, ख्रिस्त....असे जेही कोणी मित्थिकल झाले त्यांच्या तोंडात हासडता येईल असे महाकर्तुत्व या त्रयीने घडवले आहे...अजुन उदंड आयुष्य आणि कदाचित अमरतेचे लेने असल्याने या महत्तेत दिवसेंदिवस भरच पदत राहील आणि भविष्यात महाकाव्ये लिहिली जातील याचा मला विश्वास आहे.
भारतभुमी पुण्यभुमी आहे हे सावरकर का म्हणतात हे मला उशिरा कळाले असले तरी कळाले हे तर नशीबच आहे.
मी मतदान करत नाही.
जे महान असतात ते निवडुन येणारच असतात...मग मी का बरे मतदान करावे?
अशा महान लोकांनी हा देश व्यापला आहे. ही पुण्यभुमी आहे.
हा देश लोकशाहीवादी आहे.
येथे गांधींचा खुन झाला याचे जे वाईट वाटायचे ते आता वाटतच नाही...
गांधी नावाचा माणुस लोकशाहीवादी नव्हताच! हुकुमशहावादी होता तो...उग आपले कर हे उपोषण...कर ते उपोषन...काय गरज होती असली हुमुमशाही दाखवायची?
आम्ही लोकशाहीवादी....
एक गोळी घातली...आणि संपवली कि रे म्हाता-या तुझी हुकुमशाही...
मी लोकशाहीवादी नाही...
मी मतदान करत नाही..
एकदाच केले...
चुकी झाली...

सांगायचे काय तर पक्ष खुप आहेत...इतके कि दिशा पुरुन उरतील आणि तरीही ते अस्तित्वात नाहीत कारण कोणत्याही अर्थाने वेगळेपण नाही. राजकीय म्हणुन जेही काही मुलभुत तत्वद्न्यान हवे ते दिसतच नाही आणि म्हणुनच सारे भरकटलेले आहेत. भारतीय राजकीय पक्ष हे खरे तर जातीयवादीच आहेत आणि तसे राहणे एवढीच त्यांच्या अस्तित्वची गरज आहे. धर्मनिरपेक्षतेही धार्मिकता आहे आणि धर्मसापेक्ष पक्षांतही तेवढीच जातीयता आहे. उपपक्ष प्रादेशिक असले तरी प्रादेशिकतेतीलही जातीयवाद त्यांनी उचललेला आहे. भारतातील जाती या काही प्रदेशांत संख्येने अधिक आहेत तर कोठे विरळ आहेत. जेथे आपली जात प्रबळ वाटते४ तेथे स्वार्थी जात्यंध आपल्याच जातीचे नुकसान करायला सज्ज आहेत. कोणीप्रादेशिक अस्मिता काढतो आणि देशाला वेठीला धरतो. खरे तर प्रदेशिक वा अन्य आधारावर (जात/धर्म/भाषा/संस्क्रुती/विकास) सार्वभौम देशात वेगळे राज्य मागतात त्यांना देशद्रोही ठरवुन फासावर लटकावले पाहिजे.
पण हेच लोक आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधी आहेत.
मी मतदान करत नाही.
मी पुण्यात...मी फारफारतर पुण्याच्या कोणत्या खास्ददाराला/आमदाराला/नगरसेवकाला) मत द्यायचे व द्यायचेच नाहे एवढेच ठरवु शकतो...
त्या तेलंगनवाद्यांना असो वा विदर्भवाल्यांना असो कि काश्मिरवाद्यांना असो....
मला तेथे मतच नाही...
त्यामुळे मी मतदान करत नाही.
मी खड्ड्यांत खुष आहे आणि य लोकशाहीवर तर बेहद्द खुश आहे..
फक्त एवढेच...मी मतदान करत नाही...
एकदाच केले होते...
पण तो पस्तावा जात नाही.


Thursday, October 13, 2011

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर



(मी महाराजा यशवंतराव होळकरांचे चरित्र लिहिले असुन ते ल्वकरच प्रसिद्ध होत आहे. या महान सेनानी व पहिल्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल गैरसमजच अधिक पसरवुन त्यांना विस्म्रुतीत ढकलण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुर्ण चरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होईलच...त्यातील खालील एक प्रकरण साप्ताहिक लोकप्रभाने प्रसिद्ध केले आहे.)

अखेरचा सार्वभौम राजा

-संजय सोनवणी

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर यांची दोनशेवी पुण्यतिथी येत्या २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदोरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी?

पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती की पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनरीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी िशद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर िशदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.
त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोटय़ा रसभरीत कहाण्या बनवल्या गेल्या. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला.. पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकून बसला. त्याचेही खापर जदुनाथ सरकार यशवंतरावांवरच फोडतात. एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना ‘प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेत’ अशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांची बदनामी करणारेच होते यात शंका नाही.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. िशदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे िशदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे.

यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.

यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..
यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.
‘िहदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’
(िहदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. िहदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत.) असे कवी चन सांदुने यशवंतरावांच्या मृत्यूनंतर लिहिले, यावरून उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्र्ययोद्धय़ाचा केवढा सन्मान आहे, याची मराठी वाचकांना कल्पना यावी.
खरे तर इंग्रजी सन्य हे त्यांच्या सन्यापेक्षा खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. उज्जन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. याउलट अन्य सरदारांच्या सन्यातील पेंढाऱ्यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सन्यातील पेंढाऱ्यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आणणारी वर्णने माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रवृत्तींचा पुरेपूर उपयोग करून घेतला, यातच त्यांच्या सन्य व्यवस्थापनक्षमतेची चुणूक दिसते.

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही ‘निमकहराम की हवेली’ असे म्हटले नसते. सन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.
शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.
एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.
माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.
यशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.
यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९९ मध्ये करून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.

यशवंतरावांना िहदी, पíशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.
आता प्रश्न असा उपस्थित राहतो की बाजीराव पेशव्यांनी दौलतराव िशदेंच्या एवढे कह्य़ात जाऊन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे, हे तर उघड आहे.
इतिहासावरून तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा-
१. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी िशदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका की पेशवे िशदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासूनच प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेऊन ते सामील होत असले, तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिकृत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथून त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धुळीला मिळवला.
२. दुसरे असे की यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने ‘औरस’ कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक ‘बंडखोर’ अशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व िशद्यांत सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. िशद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण ‘अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.
३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.
जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-
" The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
" No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindiaks army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "
खरे यशवंतराव या पुस्तकामुळे कळायला मदत झाली असेल.. आता तरी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पवाडे मुक्तकंठाने गाल आणि भारतभूमीच्या या सुपुत्राची नित्य आठवण ठेवाल अशी आशा आहे.

Wednesday, October 5, 2011

दसरा हा स्रुष्टीजन्माचा अद्भुत सोहोळा!

दसरा हा स्रुष्टीजन्माचा अद्भुत सोहोळा आहे. क्रुषीवल संस्क्रुतीने प्राचीन काळी या उत्सवाची सुरुवात केली. जगन्माता नऊ महिने स्रुष्टीगर्भ धारण करुन दहाव्या महिन्यात स्रुष्टीचे स्रुजन करते ही मुलभुत कल्पना या सणामागे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे नऊ महिन्यांचे प्रतीक बनता. घट्स्थापना ही स्रुष्टीगर्भाची शिव या चैतन्यातुन झालेली विश्वनिर्मितीची सुरुवात असते. घट हे जगन्मातेच्या ओटीपोटाचे प्रतीकरुप आहे. एका अर्थाने दसरा म्हणजे आपण स्रुष्टीचा जन्मसोहोळा साजरा करत असतो.

या उत्सवाची सुरुवात क्रुषीवल संस्क्रुतीने करणे स्वाभाविक आहे. वर्षाकाल सरत असता, सुगीचा हंगाम ओसरत असता, नव्य चैतन्याची चाहुल मानवी मनाला लागणे स्वाभाविक आहे. आदिशक्ती ही आपल्या पुर्वजांनी भुमीच्या रुपात पाहिली. तीच मानवी जीवनाची गंगोत्री, आधार आणि अंतिम विश्रामस्थळ. मानवी जीवनाचे स्रुष्टीनियमांवर आरोपन प्राचीन काळी मानवाने केले. त्याला एक उदात्त अर्थ दिला आणि आपल्या जीवनप्रवाहाला स्रुष्टीशी नाळ जुळवुन घेणारी व्यापक दिशा दिली.

त्या अर्थाने दसरा हा एक महन्मंगल उत्सव आहे. या सणाला रावणवधाचे मित्थक जोडुन त्याचा मुलार्थ मात्र घालवुन टाकला गेला आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. रावणवधाचा दस-याशी काडीइतकाही संबंध नाही. दस-याला रावणवध झाला असता तर आधीच्या नवरात्रींचे प्रयोजनच रहात नाही हे सांस्क्रुतीक भेसळ करणा-यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.

पावसाळा संपला कि लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच सैनिक असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला कि मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या स्रुष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.

स्रुष्टीचा जन्म खरोखर कसा झाला याचा शोध विद्न्यान घेत राहीलच. पण क्रुतद्न्य क्रुषिवलांनी स्रुष्टीजन्माचे एक मित्थक रचले आणि हजारो वर्ष श्रद्धेने ते जपले हे महत्वाचे आहे.

माझ्या सर्व वाचकांना दस-याच्या मन:पुर्वक शुभेच्छा!



रा.स्व. संघाचा हिंदु धर्माशी संबंधच काय?

(हिंदू धर्मासमोरील समस्या - 7)


वैदिक धर्माभिमानी जरी आज स्वत:ला हिंदु समजुन घेत असले तरी तसे वास्तव नाही. मुलत: यद्न्यप्रधान वैदिक धर्म आणि मुर्तीपुजकांचा शैवप्रधान धर्म हे पुर्णतया स्वतंत्र धर्म होते व आहेत. हिंदु नावाखाली हे दोन्ही धर्म सध्या एकत्र नांदत असल्याने एक विचित्र धार्मिक गोधळाची परिस्थिती निर्माण केली गेली आहे. त्यामुळे या धर्माच्या समस्यांची उकल होण्याऐवजी त्या वाढतच चालल्या आहेत हे लक्षात येईल. उदा. बराचसा ब्राह्मणवर्ग हा घरात व स्वजातीयांसाठी वैदिक असतो तर बाहेर समाजात शैव वा वैश्णव (मुर्तीपुजक) असतो. कोणी कोनता धर्म पाळावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी ब्राह्मणेतर समाज हा अवैदिक परंपरांचाच हिंदु धर्म पाळतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. द्विराष्ट्रवादाप्रमाणेच खरे तर हा द्विधर्मवाद वैदिक धर्मियांत जपला जात आहे व त्यातुन मुर्तीपुजक अवैदिक हिंदुंचे शोषण व दिग्भ्रमण केले जात आहे आणि ही चिंतेची बाब आहे.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे कि वैदिक धर्मात एकच स्रुष्टीनिर्माता परमेश्वर, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म. मुर्तीपुजा, संन्यास ई. बाबींना स्थान नाही. येथे वैदिक धर्म चांगला कि वाइट यावर भाष्य अभिप्रेत नाही. कोणी कोणत्या धर्माचे पालन करायचे तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु हिंदुत्ववादाच्या नावाखाली नेमका वैदिक धर्माचा व संस्क्रुतीचाच प्रचार प्रसार केला जातो हे मला येथे लक्षात आणुन द्यायचे आहे. आणि त्यामुळेच हिंदु धर्माच्या एकुण विकासातच अडथळे निर्माण झालेले आहेत.

हिंदु धर्माचे रक्षण व विस्तार आणि प्रखर हिंदुराष्ट्रवाद हे दोन मुख्य मुद्दे घेवुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मद्धे झाली. प्रखर हिंदुत्व हा या संघाचा मुलाधार आहे हे उघड आहे. परंतु रा.स्व. संघाचे हिंदुत्व हे पुर्णतया वैदिकप्रधान हिंदुत्व आहे हे गोळवलकर गुरुजींचे विचारधन नुसते चाळले तरी कोणाही सुद्न्य वाचकाच्या लक्षात येईल. रा.स्व. संघाला वेदमान्य वैदिक महता असणारे हिंदुत्व हवे आहे. रा.स्व. नेहमीच ज्या संस्क्रुतीबाबत बोलत असतो, गौरवगान गात असतो ती संस्क्रुती म्हणजे वैदिक संस्क्रुती होय. सरस्वती नदीच्या काठी वेदरचना झाली म्हणुन सरस्वती देवीचे पुजन हा त्यांच्या विगताच्या आत्मगौरवाचा भाग बनतो, म्हणुन भाजपाच्या सत्ता जेथे येतात तेथे शाळांतुन सरस्वतीपुजन आवश्यक बनुन जाते. वेदांमद्धे सर्व आधुनिक द्न्यान-विद्न्यान ठासुन भरले आहे असे दावे त्यांचे असंख्य साहित्त्यिक/विचारवंत करत असतात. सिंधु संस्क्रुती ही पुर्णतया अवैदिक असुन तिचे अपहरण करण्याचे कार्यही सद्ध्या मोठ्या प्रमानावर चालु आहे. सिंधु संस्क्रुतीचे निर्माते याद्न्यिक वैदिकच होते असे धादांत खोटे त्यांचे विद्वान सांगत असतात. हेच विद्वान एके काळी आर्य सिद्धांत डोक्यावर घेत सिंधु संस्क्रुती आक्रमक आर्यांनी नष्ट केली असे सांगत असत. नष्ट करणारे निर्माते कसे झाले...या बदलामागे वैदिक श्रेष्ठतावाद आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

अवैदिक देवतांचे अपहरण हा तर फार मोठा आणि गंभीर विषय आहे. तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी शिव या देवतेबद्दल म्हणतात, शिव ही देवता पुर्ण अवैदिक होती. परंतु पुढे वैदिकांनी त्याची ऋग्वेदातील रुद्र या देवतेशी साधर्म्य प्रस्थापित करुन त्या देवतेचा स्वीकार केला. थोडक्यात शिवाचे वैदिकीकरण करण्यात आले. तसेच ते पार्वतीचे आदितीशी तर विट्ठलाचे विष्णुशी तादात्म्य साधत अपहरण करण्यात आले. खरे तर मुर्तीपुजा ही वैदिक धर्माला मुळात मान्य नाही, पण कालांतराने त्यांचे यद्न्यच बंद पडल्याने त्यांना मुर्तीपुजक शैवप्रधान धर्मात यावे लागले. असे करतांना त्यांनी आपली वैदिक धर्मीय पाळेमुळे मात्र पुर्णतया तोडली नाहीत. वेदमाहात्म्य, वेदमान्यता, वैदिक श्रेष्ठत्व, वेदांचे अपौरुषेयत्व ते सतत सांगतच राहिले. पण वेद इतर समाजाचे कधीच नव्हते, त्यांना ते वाचायला-ऐकायलाही बंदी होती यावरुन अन्य समाज हा कधीच वैदिक नव्हता हे सिद्ध करते. यद्न्य म्हणजे अग्नीच्या माध्यमातुन हवी-द्रव्ये-समीधा अर्पण करत अवकाशस्थ देवतांना आवाहन करणे आणि ईष्ट कामना सिद्धीची प्रार्थना करणे एवढाच होता. त्यात काही वावगे आहे असे मी कोठेही सुचवलेले नाही. प्रत्येक धर्माचे एक कर्मकांड असते तसे ते वैदिक धर्माचे होते. पण वेद समाजधारणेसाठी मार्गदर्श्क तत्वे कोठेही सांगत नाही हे वास्तव आहे एवढेच मला स्पष्ट करायचे आहे.

गुढता, सांकेतिकता हा जवळपास सर्वच धर्मांत आढळते हे खरेच आहे. वैदिक धर्मही त्याला अपवाद नाही. दीर्घतमस ऋषिचे सुक्त त्या द्रुष्टीने अभ्यासनीय आहे. परंतू सर्व धर्मांत या सांकेतिकता पुरोहित वर्ग आणतो वा मित्थके तयार करतो ते धर्मविषयक गुढादर वाढवण्यासाठी. जनसमुहाला धर्मनिष्ठ बनवण्यासाठी. तुलनेने ऋग्वैदिक धर्म अत्यंत सोपा होता. प्राचीन काळी तेवढे अवडंबर नव्हते पण पुढे ब्राह्ज्मण कालात (इसपु ८०० च्या आसपास) यद्न्य हे अवडंबरच झाले. वर्षानुवर्ष चालू ठेवावे लागत असल्याने ते खर्चिक बनले. सामान्यांच्या आटोक्याबाहेर गेले. हैहय राजे तर यद्न्य करून कंगाल झाले हा इतिहास आहेच. वैदिक धर्माचे पतन तेथेच सुरू झाले. शेवटचा यद्न्य श्रुंग राजांनी दुसर्या शतकात केल्याची नोंद आहे.

खरे तर ऋग्वैदिक मंत्ररचना कोठेही समाजाला मार्गदर्शक म्हणुन नाही. ऋग्वेद म्ह्णजे जवळपास ६०० देवतांना यद्न्यप्रसंगी आवाहन करणा-या मंत्रांचा (ऋचांचा) संग्रह आहे. इतिहासदर्शक काही सुक्ते आहेत ती फक्त दाशराद्न्य युद्धाशी निगडीत आहेत. थोडक्यात तो निखळ यद्न्यधर्मियांचा एक प्रकारचा प्रार्थनासंग्रह आहे. यद्न्यासाठी या मंत्रांची गरज होती म्हणुन ते बनवलेही गेले. समाजबांधणी करण्यासाठी ते लिहिले असे म्हनण्याऐवजी ती धार्मिक निकड होती असे म्हनणे संयुक्तिक राहील. दुसरे असे कि दुध ते तुप हा क्रम येथे येत नाही. तत्वद्न्यांसाठीच तो फक्त लागू करता येतो...धर्मद्न्यांसाठी नाही, कारण धर्म ही मानवी समाजाला विशिष्ट धार्मिक आचार-विचार व्युहात बंदिस्त करण्यासाठी असतो, तो बव्हंशी बंधनात्मक असतो. उदा. ऋग्वेदात व्रत करणारे व्रात्य, व्यापार करणारे पणी, संन्यास घेणा-या श्रमनांवर तसेच शिवावर यथेछ्छ टीका केलेली आहे. गणपतीला तर मुंजवत पर्वतावर हाकलुन लावण्यासाठीच्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत कारण वैदिक धर्मियांसाठी गणपती (विनायक) हा विघ्नकर्ता होता, विघ्नहर्ता नव्हे. म्हणजेच प्रत्येक धर्म व धर्मद्न्य हा अन्य धर्मियांबद्दल कसा असहिष्णु असतो याचे हे उदाहरण नव्हे काय? अयद्न्य लोकांची, मुर्तीपुजकांची (शिस्नपुजकांची) भरपुर नालस्ती ऋग्वेदात आहे.

थोडक्यात रा.स्व. संघाचा हिंदुत्ववाद हा मुलत: वैदिकवाद आहे हे येथे स्पष्टपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद यांचा मुर्तीपुजक शैवप्रधान हिंदुंशी काहीएक संबंध नाही. हे वेद सरवस्वी यद्न्यांद्वारे आपल्या जवळपास सहाशे देवतांना आहुत्या देत संतुष्ट करत इहलोकी सुखाची कामना करणा-या धर्मियांशी संबंधीत आहेत. वैदिक संस्क्रुती ही सर्वत: स्वतंत्र असुन त्या संस्क्रुतीची पाळेमुळे वेगळी सहज दाखवता येतात. आजही या ६०० तर सोडाच, वैदिकांच्या इंद्र, वरुण, अदिती, मित्र, नासत्य, प्रजापती इ. देवतांची अन्य कोणीही पुजा करत नाही वा त्या देवता महत्वाच्या वाततही नाहीत, त्यांची मंदिरेही कोठे नाहीत.

त्यामुळे रा. स्व. संघाचा हिंदुत्ववाद स्वीकारता येणे शक्य नाही. तो कोणी स्वीकारुही नये. रा. स्व. संघाचा हिंदुत्ववाद हा हिंदु नावाखाली घेतलेला वैदिक बुरखा आहे. इस्लाम-ख्रिस्तीद्वेषाच्या नावाखाली हिंदुंना भयभीत करुन अवैदिक हिंदुंना आपल्या कळपात ओढण्याची ती चाल आहे. रा. स्व. संघाला खरे तर गोहत्याबंदीची मागणी करण्याचा कसलाही नैतीक अधिकार नाही कारण यद्न्यात गोवंशबळी व आहार ऋग्वेदात ठायीठायी आहे. बुद्ध धर्माच्या उदयानंतर गोहत्या वा अन्य पशुहत्या वैदिकांना सोडाव्या लागल्या असल्या तरी आज मुस्लिम लोक गोहत्या करतात त्यांना विरोध म्हणुन धर्म व संस्क्रुतीचे नाव सांगत गोहत्याबंदीची मागणी ते करत असतात. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा वैदिक द्रुष्टीकोण आजही बदललेला नाही. उदा. रा.स्व. संघात स्त्रीयांना प्रवेश नाही. सती प्रथेचे उदात्तीकरण केले जाते. उद्या हे स्त्रीयांना द्न्यानबंदी पुन्हा घालतील अशी रास्त शंका वाटणे स्वाभाविक आहे. अवैदिक प्रथेतच स्त्रीयांना समता आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

स्ध्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद चालु आहे असे जे समजतात वा तशा चलवळी करतात त्यांचे आकलन अत्यंत च्घुकीचे आहे. खरा संघर्ष वैदिक विरुद्ध अवैदिक असाच आहे आणि पुरातन काळापासुन हाच संस्क्रुती संघर्ष होता. आता हिंदुत्वाचे नाव घेत जो वैदिक वर्चस्वतावाद वाढवला जात आहे त्याचा प्रतिकार करणे अत्यावश्यक बनुन गेले आहे.

हा लेख संपवत असता मला मागील लेखांवर रा.स्व.संघाबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यावर थोडे विवेचन करतो. रा.स्व. संघ आपल्या काही उपसंघटनांमार्फत आदिवासी-वनवासींसाठी खुप काम करतो तर तो वाईट कसा हा तो प्रश्न. खरे तर एक गोष्ट सारे विसरतात ती ही की भारतातील आदिवासींचा हिंदु (वैदिक/अवैदिक मुर्तीपुजाप्रधान) काहीएक संबंध ब्नाही. ते मुळात हिंदुच नाहीत. त्यामुळे ज्या कारणासाठी ख्रिस्ती मिशनरी त्यांचे धर्मांतर करत आहेत त्याच कारणासाठी संघ त्यांचे वैदिकीकरण करत आहे. त्याचा हिंदु धर्माशी वा त्याच्या वाढीशी संबंध नाही. आदिवासींसाठी काम करण्यामागे काही मानवतावादी द्रुष्टीकोन असता तर त्याचे अवश्य स्वागत करता आले असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

थोडक्यात संघ, सनातन प्रभात, अभिनव भारत इ. हिंदुत्ववादी संघटना ज्या हिंदुत्वाचा घोषा लावत अवैदिक हिंदुंना फसवत दिशाभुल करत आपल्या वैदिक कंपुत ओढण्याचा प्रयत्न करत असतात त्याबाबत सावध होणे आवश्यक आहे. एका अर्थाने असे केल्याने धर्मांतर्गतचे (दोन्ही धर्मांना एकत्रीत हिंदु म्हटले जात असल्याने...पण ते खरे वास्तव नाही...) धर्मांतर होते आणि त्याला रोखने अवैदिक हिंदुंच्या द्रुष्टीने अत्यावश्यक आहे.



भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...