Saturday, November 26, 2011

कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे."

खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे.
ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.
श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.


Sunday, November 20, 2011

निर्माणकर्त्यांना डावलुन कसली लोकशाही?

आजची राजकीय विषम वाटनीची अवस्था पाहिली तर कोणालाही निराशा येणे स्वाभाविक आहे. लोकशाही प्रक्रियेत दोष आहेत हे तर उघडच आहे. पण त्याहीपेक्षा मोठे दोष हुकुमशाही वा राजेशाहीत आहेत व होते हा जगाचा इतिहास आहे. आपण एखाद्याला निवडुन देतो...त्याने काम केले नाही तर जास्तीत जास्त आपण त्याला पुढच्या वेळीस पाडु शकतो आणि नव्या मुर्खाला निवडुन देवू शकतो. समजा निर्वाचित उमेदवाराला परत बोलवण्याची संधी नागरिकांना मिळाली तर कदाचित तोच माणुस परत आहे तेथे पुन्हा बसू शकतो. राजकीय पुनर्वसन ही सर्वच राजकीय पक्षांनी असल्या नादान लोकांसाठी केलेली एक सोय आहे. त्यामुळे इकडुन हकालपट्टी झाली तरी त्यांच्या बापाचे काही एक जात नाही. राज्यातुन हाकलले कि केंद्रात, केंद्रातुन हाकललले कि राज्यपाल, नाहीतर कोणत्या ना कोणत्या महामंडळांवर त्यांचे "पुनर्वसन" केले जाते. नव्यांना संधी न देता आहे त्याच मुखंडांना सार्वभौम सरंजामदार केले जाते. ही लोकशाहीची भारतीय विटंबना नव्हे काय?

हे का होते? हा खरा प्रश्न आहे. हे नेते स्वत:ला "जनमान्य" म्हनवून प्रोजेक्ट करण्यात यशस्वी होतात म्हणुनच ना? आणि कोण करते त्यांना प्रोजेक्ट? लोक? नव्हे...तर त्या-त्या पक्षाचे त्यांचेच विकत घेतलेले, आणि संधी मिळताच टोप्याही फिरवु शकनारे लोक आणि मिडिया. एक नेता मेला तर त्याच्या बायकोला वा मुलाला तिकिट मिळते....तिची/त्याची राजकीय लायकी असतेच असे काही आहे का? पण लोक भावनीक होवून तिला/त्यालाच निवडुन देणार. मुले-बाळे-नातू-पणतु...हे चालुच आहे. ही एक लोकशाहीच्या बुरख्याआडची राजेशाही/हुकुमशाही/सरंजामशाहीच नव्हे काय? याबदल आम्हा जनतेचे नेमके काय मत आहे? काय भुमिका आहे? आम्हाला नेमके काय हवे आहे? आपण सर्वांनीच यावर बोलायला हवे असे मला वाटते.

भारतीय लोकशाही ही सरंजामशाहीचा आधुनिक अवतार आहे. ती त्यामुळेच टिकली आहे. भारतातील लोकशाही टिकली यामागे खरे हेच कारण आहे, कारण लोकशाहीचा बुरखा वापरत सरंजामशाही जीवंत राहिली आहे. त्यामुळे या सरंजामशहांना आपापल्या मतदारसंघ नामक खाजगी इस्टेटीला एन-केन-प्रकारेन सांभाळणे महत्वाचे वाटते...आणि हे सांभाळने म्हणजे अन्य काही नसुन पराकोटीच्या लुटीतील काही तुकडे निवडनुकांवेळी सामान्यांच्या तोंडावर फेकुन आपली महत्ता टिकवणे होय.

थोडक्यात भारतीय लोकशाही म्हनजे अन्य काहीही नसुन सरंजामशाहीवादी लोकशाही आहे. ती टिकली याबाबत कौतुक करण्यात फारसा अर्थ नाही.

या सरंजामशहांना जात हाच मोठा निकष असल्याने, आणि हेच लोक जातीभेदांबाबत उत्साहाने बोलत असल्याने व लोक माना डोलवत असल्याने, जात संपलेली नाही. आरक्षणामुळे जातीयता वाढलेली नसुन ती या जातीयवादी सरंजामशहांमुळे कट्टर होत चालली आहे. कोणात मुजोरपणाची हद्द झाली आहे तर कोणाला जीव मुठीत धरुन एखाद्या भिका-याचे जेवन जगावे लागत आहे. आणि य्स्स पद्धतीने देशाचे सत्ता वा मत्ता वाढनार नाही...महासत्ता होणे ही तर दुरची बाब राहीली.

या लोकशाही म्हणवना-या देशाची एकंदरीत जातींच्या प्रमानातील जनसंख्या पाहीली तर त्या प्रमाणात त्यांना जातीनिहाय प्रतिनिधित्वही नाही. असते तर निळ्याला भगवा कशाला भिडला असता? ओबीसी, बीसी, भटके-विमुक्त ई. समाजघटक (मी त्यांना खरे निर्मानकर्ता घटक म्हणतो....अणि त्यांनाच राष्ट्रीय निर्मितीपासुन दुर ठेवावे?) हे सर्वच घटक राजकीय जागरुकतेपासून अजुनही दुरच आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे ओबीसी म्हणुन समाज मोठा वातला तरी त्यांतील शेकडो जातींचा विचार केला तर जातपातळीवर ते अत्यल्पसंख्य ठरतात आणि त्यांना एकत्र येवु न देण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. खरे तर हे सारेच घटक व्यवसायाधिष्ठित जातीने वेगळे असले तरी ते एकाच मुळ निर्मितीक्षम समाजातील आहेत, ते एकाकार आहेत याचे भान त्यांना दिलेच जात नाही.

त्यामुळे विभेदात्मक होत ते खोट्या आश्वासनांवर वा अफवांवर भावनीक होत ते आपापली मते कोणाच्या तरी पारड्यात टाकतात. सत्ताधारी घटक जाती ज्या प्रमानात माध्यमांचा वापर करतात तेवढा सोडा, मुळात त्यांना कसलेही स्थानच नाही...ते मिळवण्यासाठी एकाकारतेची भुमिका या सर्वच जातीघटकांनी घ्यायला हवी ती त्यांना जमतही नाही...कारण त्यांना आपल्या सर्वच समाजाच्या एकत्वाची जाणीव करुन दिली जातच नाही.

तसे करणे हे राजकारणी पुढारी/विचारवंत व मिडियाच्या तत्वांत बसत नाही.

उलट ते माध्यमे जो प्रचार प्रसार करतात त्या मतांना बळी पडतात. आज जसे सामाजिक जनजागरण महत्वाचे आहे तेवढेच राजकीय जनजागरणही महत्वाचे आहे. या निर्माणकर्त्यांना स्वता:चे बळ ओळखावे लागणार आहे. खरे तर या निर्माणकर्त्या घटकांचाच एक सर्वकश राजकीय पक्ष असला पाहिजे. मुळात एकाकार आणि ख-या अर्थाने राष्ट्रनिर्मानात सर्वोपरी सहभाग असणा-या या घटकावरच सरंजामदारी नेत्रुत्वे लादली जातात व अपवादाने काही गाजरे फेकली जातात हे काही समर्थनीय असू शकत नाही. यावर मला निर्माणकर्त्या बांधवांचे विचार ऐकायला आवडतील. आज बहुजनीय नेते अनेक पक्षांत विखुरलेले आहेत. त्यांचे अवमान कसे वारंवार केले जाताहेत हेही आपण पहातोच आहोत आणि याची खंत आपल्याला नाही. कारण हा निर्मानकर्ता समाजच छोट्या-छोट्या जातींत कसा विखुरला गेला आहे आणि कोणालाही समग्र सामाजिक व राजकीय भान नाही हे सत्यही आपण पहातो...अनुभवतो आहोत. या जाती मुलत: एकाच समाजघटकाचे व्यवसाय-सेवानिष्ठ वितरण असले तरी त्यांची मुळे एकच आहेत हे आता तरी लक्षात घ्यावे लागणार आहे. आता शासित नव्हे तर शासक बना हाच मुलमंत्र जपणे योग्य राहील असे मला देशाच्या व्यापक आणि विराट भवितव्यासाठी आवश्यक वाटते.

आज गोपीनाथ मुंढे, छगन भुजबळ यांच्यासारखे बलाढ्य नेते जातीय्वाद्यांच्या वा सरंजामदारांच्या गोटात नाईलाजाने आहेत. महादेव जानकरांसारखे नेते स्वतंत्र पक्ष काढुन त्यागबुद्धीने राजकारण व समाजकारण करतात...त्याबद्दल खुद्द त्यांचेच आताचे अनुयायी वा समाजीय जेवढ्या बळाने त्यांच्या पाठीशी उभे रहावे तेवढे उभे रहात नाहीत, कारण शिस्तबद्ध पद्धतीने त्यांची जातीय वाटनी करुन टाकण्यात हे सरंजामशहा यशस्वी झालेले आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे भुजबळ माळ्यांचे, मुंढे वंजा-यांचे, आठवले ते प्रकाश आंबेडकर नवबौद्धांचे आणि जानकर धनगरांचे अशी अत्यंत अन्याय्य वाटनी या निर्मानकर्त्यांनी स्वीकारलेली आहे. ती समुळ चुकीची आहे. जोही कोणी निर्मानकर्त्या समाजघटकातील नेता आहे त्याला सर्वांनीच मोठे करायला हवे, तरच ख-या अर्थाने ज्या न्याय्य सत्ता आपल्या पुर्वजांनी स्वबळावर निर्माण केल्या तशाच न्याय्य सत्ता पुन्हा उभ्या करता येतील. द्न्यान, विद्न्यान आणि अर्थव्यवस्थेला नवे वळण मिळेल.

ओबीसी, एस.सी, बी सी, एस.टी, एन.टी म्हणु नका...हे सारे निर्माणकर्ते आहेत. इतिहास पहा...त्यांची महत्ता पहा आणि त्यांच्या समाजाच्या एकंदरीत प्रगतीसाठी झालेल्या विभक्तिकरनातले एकाकारत्व पहा...

हे आता सर्वांना शिकावे लागणार आहे, अन्यथा आर्थिक, राजकीय, सामाजिक अन्यायाचे बळी सतत व्हावे लागेल. हे सरंजामदार निघ्रुण आहेत...अलीकडेच एका कुलकर्णीची हत्या झाली...एक च्यनेल सोडला तर त्याचे कसलेही पडसाद मिडियात नाहीत. अशा अजुन कितीतरी होत असतील वा खोट्या गुन्ह्यांमद्धे त्यांना जेलमद्धे सडवले जात असेल...कोणाला माहित? आणि माहित करुन घेण्याची गरज कोणाला वाटते?

निर्माणकर्त्यांनो, तुम्हीच देशाला संस्क्रुती दिली, धर्म दिला, विचारांची अद्भुत वादळे निर्माण केली....सरंजामशहा हे नेहमीच प्रथम विचारांची हत्या करत तुम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही या जातीय विघटनाला बळी पडला आहात...

आता तरी बदला अथवा खरी लोकशाही या देशात येवु शकणार नाही.
तुम्हाला न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नाही.


Friday, November 18, 2011

ऋण काढुण सण...अन मग दिवाळे...!

ऋण काढुन सण साजरा करु नये ही पुरातन म्हण काही काळापुर्वीपर्यंत आपल्या समाजात रुजलेली होती. शेतीसाठी हंगामापुरती तगाई वा कर्ज घेण्यापलीकडे दैनंदिन सुखासीन बाबींच्या खरेदीसाठी कर्ज काढण्याची प्रव्रुत्ती जवळपास नव्हती. जे आहे त्यात समाधान मानण्याची नुसती प्रव्रुत्तीच नव्हे तर मानसीक व्रुत्ती होती. "ठेविले अनंते..तैसेची रहावे..." ही अध्यात्मिक आत्यंतिकता मला अमान्य असली तरी "चित्ती असु द्यावे समाधान" शी मात्र सामाजिक सहमती होती. उपलब्ध साधन-संसाधनांच्या परिप्रेक्षातच आपल्या जीवनाची नाळ जुळवली जात होती.

परंतु गेल्या दोन दशकांत, विशेषता: जागतिकीकरणाच्या लाटेत, मात्र या मुलभुत प्रेरणांना मोठा हादरा बसला आहे. उद्योग-व्यवसायासाठी ठीक पण पुर्वी स्कुटर, मोटरसायकल ते ग्रुहकर्जांची पद्धत आपल्याकडे नव्हती आणि त्यांची कोणाला गरजही वाटत नव्हती. जवळ शिल्लक असेल तरच या गोष्टींची खरेदी होत असे. त्यामुळे किंमतीही मर्यादेत होत्या. प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक क्षमतेच्याच बळावर आपापली स्वप्ने पुर्ण करायच्या प्रयत्नांत असे. स्वप्ने पुर्ण करण्यासाठी जे धन हवे ते वाढवायचा आणि बचत करत आवाक्यातीलच खरेदी करायचा फंडा होता.

पण अमेरिकी कर्जाधारीत व्यवस्थेची लागण झाली आणि चित्र पालटायला लागले. भारतीय ब्यंकांनी याही गोष्टींसाठी कर्जे देणे सुरु केले. पाठोपाठ लीजींग कंपन्या आल्या. मग क्रेडिट कार्डे आली. जेवण-पेट्रोल ते सोनेखरेदीसाठी त्यांचा क्रमश: बेसुमार वापर सुरु झाला. खरेद्या वाढत गेल्या तसतशा वस्तु-जागादिंच्या किंमतीही वाढत गेल्या. प्रसारमाध्यमांचा या कल्पक (?) कंपन्यांनी अवाढव्य वापर करत जीवनशैलीच्या सर्व संकल्पनाच बदलुन टाकल्या. आजवर ज्या गरजा नव्हत्याच, ज्यांवाचुन काहीएक अडलेले नव्हते त्या गरजांची गरज वाटु लागली. टी.व्ही. हवा...घ्या कर्ज...कार हवी...घ्या कर्ज...

कारण या नव्या व्यवस्थेने सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पनाच बदलवुन टाकल्या. गांवात ८० च्या दशकापर्यंतची लग्ने लापशी-आमटी वा फार झाले तर पोळ्या-गुळवणीपर्यंत ऐपतीनुसार साध्या मंडपात वा उघड्यावरही लग्नसमारंभ करीत ते लाखोंचा खर्च करु लागले. हुंड्याचे दर वाढतच गेले. हे सर्व शक्य झाले ते बव्हंशी या कर्जांच्या सहज उपलब्धतेमुळे. ज्या कारणासाठी सरळ कर्ज मिळत नाही त्यासाठी खोटी कारणे (उदा. शेतीकर्ज, फर्निचर कर्ज...) देत कर्जे उचलली जावु लागली. फेडता येण्याची क्षमताच नसल्याने परतफेड शक्यच नव्हती...म्हणजे ज्या कारणासाठी कर्जे उचलली त्यासाठी प्रामाणिक वापरच होत नसल्याने क्षमता कशी निर्माण होणार?

त्यातुन शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्यातुनच तरुण व्यावसायिक वा नोकरदारांवर मानसिक नैराश्याचे सावट गडद होवू लागले. सामाजिक मन:स्वास्थ्य...जो कोणत्याही समाजाचा पाया हवा तोच उध्वस्त होवू लागला.

कर्जांचा गोंगाट सुरु झाला...आणि तो आता भयभीत होत चिंता करावी एवढा वाढला आहे.

अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजे नेमका काय असतो बरे?

अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजे कर्ज काढण्याची वेळ शक्यतो कोणाही समाजघटकावर येवु नये असा विकास. हा विकास खरे तर द्रुष्य नसुन मानसिक व्हायला हवा. उपयुक्त कर्जे आणि अनुपयुक्त कर्जे यातील फरक लक्षात यायला हवा. ज्यातुन संसाधनांचा विकास होण्याची शक्यता आहे अशी आणि अशीच कर्जे श्रेयस्कर असुन जी कोणतीही कर्जे केवळ क्रुत्रीम सामाजिक प्रतिष्ठादर्शक वस्तुंच्या खरेदीचा हव्यासापायी केली जातात ती निंध्य होत.

कारण यातुन एक आर्थिक दुश्चक्र निर्माण होते. ते जगड्व्याळ बनत जाते. म्हनजे नैसर्गिक स्त्रोतांचा विनाशकारक उपसा सुरु होतो. दुसरा धोका म्हनजे तुमचेच धन तुम्ही बुडविण्याच्या मार्गाला लागता. व्यक्तिगत पातळीवरील आत्मविश्वास येथे कामाला येत नाही, कारण एकाकी घटक या चक्राला थांबवु शकत नाही...वा "माझी प्रगती माझ्यावरील कर्जाच्या व त्यावर देत असलेल्या व्याजाच्या प्रमाणात होतच राहणार आहे..." ही संकल्पना अनिश्चिततेच्या तत्वावर टिकत नाही...कोणाचीही टिकलेली नाही. तिसरा धोका म्हणजे क्रमश: होत जाणारे मानसीक अध:पतन...

हे मानसीक अध:पतन दोन प्रकारचे असते. पहिले अध:पतन म्हणजे भविष्याबद्दलचा निर्माण झालेला अंध आत्मविश्वास...आणि तो उज्ज्वल असनारच या संभाव्य शक्यतेपोटी कर्जाधारीत निर्माण केलेली जीवनपद्धती. या शक्यता असंख्यदा इतिहासात कोसळुन पडलेल्या आहेत. साम्राज्ये कोसळली आहेत...अनेक व्यवसायच समुळ नष्ट झालेले आहेत...जुन्या व्यवसायाधारीत जाती नष्ट होवुन नव्या जाती आस्तित्वात आलेल्या आहेत...नष्ट होतात ते विसरले जातात...आणि आज आस्तित्वात आहेत ते जगण्याच्या संघर्षात लागतात. ही परिवर्तने पचवण्याची क्षमता नसणारे काळाच्या अवाढव्य पटावरुन चक्क अद्रुश्य होतात. कारण भविष्य वर्तमानकालीन मानवी चुकांनीच निर्माण होते याबाबतचे गंभीर अद्न्यान!

दुसरे अध:पतन म्हणजे टिकुन राहण्यासाठीची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे सामर्थ्यच नष्ट होणे. हतबल होणे. छोट्या-मोठ्या घडामोडीमुळे वैफल्यग्रस्त होत मग आध्यात्मिक असो कि राजकीय, अर्थक्षेत्रीय कथित तद्न्यांच्या भविष्यवाण्या असोत...त्यांच्या मागे लागत पुन्हा होते ते समाधान गमवत नव्या समाधानांच्या मागे लागणे.

ही अध:पतनेच आहेत. यातुन खरी शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण कशी होणार? अर्थव्यवस्था म्हणजे मानवी जीवनाला वास्तव आकार-आधार देणारी संस्था आहे...तिचाच पाया ढिसुळ केला तर ते अंतिम मानवी सुखाचे प्रेय आणि श्रेयही कसे प्राप्त होणार?

कर्जाधारीत कोणतीही अर्थव्यवस्था टिकु शकत नाही. ती टिकण्याची सुतराम शक्यता नाही.

खिशात जेवढा हात जाईल तेच विकत घ्या आणि जे खरोखर जीवनोपयुक्त आहे तेच विका...ज्यातुन नवोत्पत्ती होवु शकते ते कर्ज स्वीकारार्ह आहे...पण जे केवळ कथित स्पर्धात्मक सुख देते त्या साधनांसाठी चुकुनही कर्ज काढु नका.



Thursday, November 17, 2011

प्रज्ञा असल्याखेरीज

प्रज्ञा असल्याखेरीज ज्ञ्यानाची पायरी गाठता येणे अवघड असते. प्रज्ञा म्हणजे, मला वाटते ते, जीवन्/निसर्ग्/विश्व यातील गुढे उलगडण्याची अनावर जिज्ञासा. बादरायणांनी "अथातो धर्मजिज्ञासा" अशीच ब्रह्मसुत्रांची सुरुवात केलेली आहे. म्हणजे धर्माबाबतची गुढे उलगडण्याची जिज्ञासा असेल तरच पुढील वाचावे असा त्या सुत्राचा मतितार्थ आहे. येथे धर्म हा शब्द रुढार्थाने धर्म नसुन स्रुष्टीचा/विश्वाचा धर्म या अर्थाने येतो. जिज्ञासेचा विस्तार प्रज्ञेचाच आधारे होवु शकतो असे मला वाटते...आणि प्रज्ञा ही जिज्ञासेशिवाय अस्तित्वात असु शकते काय? समजा नसली तरी जिज्ञासा हीच मानवी ज्ञानाला पुढे नेणारी बाब आहे हे तर नक्कीच. आहे त्या उपलब्ध ज्ञानाला मानवी सुखांसाठी प्रायोजित उपकरणांमद्धे बदलवणे वेगळे आणि आहे त्या ज्ञानाला आव्हाने देत बौद्धिक झेप घेणे वेगळे. दोहोंमागील प्रेरणा वेगळ्या आहेत. एक प्रेरणा तात्काळ अर्थक्रांती घडवु शकण्याची संभावना बाळगते तर जिज्ञासु प्रेरणा आहे त्या मुळ ज्ञानधारांनाच क्रांतिक रुप देणे/आहे त्या ज्ञानाचे खंडन करत अत्यंत अकल्पनीय ज्ञानधारांना जन्म देणे आणि मानवी मन सतत " या निशां सर्वभुतानां तस्यात जागर्ति संयमी" या उक्तीनुसार मानवी मन जागे कसे राहील याची काळजी वाहते. मानवी सम्,आज इतिहासकाळात अनेकदा अंधारयुगात गेला आहे. आज आपण माहितीच्या अवाढव्य ढगांमुळे निर्मित माहितीच्या अंधारात तर आलेलो नाहीत ना?

माहिती वाईट असते काय? नक्कीच नाही. पण ती जेवढी सोपी आणि उथळ होत जाते तेवढेच माहितीचे मुल्य कमी होत जाते, आणि त्या माहितीचे मुल्यांकन कसे करावे हे प्रज्ञेखेरीज होवु शकत नाही. ज्या काळात माहिती मिळवणे अवघड होते, त्या कालात तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी असोत कि Dr. आंबेडकर, आदी शंकराचार्य असोत कि तुकाराम, रा. गो. भांडारकर असोत कि धर्मानंद कोसंबी, यांनी प्रज्ञा व ज्ञानाची जी झेप गाठली होती ती आज कोठे गेली? कारण माहिती कोणती, कोठली आणि कशी विश्लेषनात्मक पद्धतीने वापरत सिद्धांत साधावेत याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

रिचर्ड बर्टनचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. या संकेतस्थळावरील सर्व ज्ञानाभिमुखांना तो माहितच आहे. जीवावरची संकटे पेलत या माणसाने इस्लाम्/अरबी जग जगापुढे आणले. याला मी "अथातो ज्ञानजिज्ञासा" असे म्हणतो. परंतु इतिहासलेखनही उथळ, एकतर जातीयवादी/धर्मवादी वा वंशवादी द्रुष्टीने आजच्या काळात होत असेल तर आपण ज्ञानात कोणती गुणात्मक प्रगती केली हा प्रश्न उभा राहतो.

विज्ञानाबद्दल बोलायचे तर मी मुलभुत विज्ञानाबद्दलच बोलत होतो. आज कोणी विद्यार्थी मुलभुत भौतिकी/रसायन ते अभियांत्रिकीकडे फिरकत नाही ही जागतीक अवस्था आहे. पुण्यात माझे पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र शाखेत असनारे तरुण संशोधक आणि विज्ञानकथा लेखकही असलेले प्रा. डा. संजय ढोले ही खंत नेहमीच व्यक्त करतात.

मला असे वाट्ते कि जी नवी चंगळवादी, आहे ते उपभोगा आणि जे नाही ते कोणी तरी करेल या आशांवर जगणारी मानवी संस्क्रुती, जी आज बलाढ्य झालेली आहे, ती प्रज्ञा व ज्ञानाची हानी करत आहे.

ज्या पद्धतीने सोनोग्राफीचा उपयोग करत गर्भातील कन्यांची हत्या केली जात आहे तशीच भविष्य घडवु शकणा-या ज्ञान आणि प्रज्ञेची हत्त्या केली जात आहे.

हा मानवी मनांच्या सर्वांगीण हत्त्येचा मानवी कट नसेल काय?

Tuesday, November 15, 2011

आधुनिक युगातील आदिमानव



माहितीची साधने आज थक्क करतील अशा वेगाने वाढत आहेत आणि वाढत राहतील. नवनवी तंत्रद्न्याने जसजशी येत जातील तसतशी या वेगात भयचकीत करणारी भरच पडेल. कोणत्याही प्रकारची माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रंथ विकत घेणे अथवा ग्रंथालयांत जाण्याचीही एवढी आवश्यकता उरलेली नाही. सर्वांनाच मुक्तपणे वापरण्याचे हे साधन हाती आले असल्याने कोणीही माहिती उपलब्ध करुन देवु शकतो वा घेवु शकतो. एका अर्थाने हा माहितीचा विस्फोट झालेला आहे.

पण द्न्यानात्मक वाढ किती झाली आहे?

माहिती म्हणजे द्न्यान असा समज माहिती तंत्रद्न्यानामुळे झाला आहे खरा. पण माहिती म्हनजे द्न्यान नव्हे हेही तेवढेच खरे. द्न्यान म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे सर्वांगीण विश्लेषन करत त्या माहितीला शिस्तबद्ध द्न्यानाच्या रुपाने पुढे नेणे. आपण गेल्या वीस वर्षांचाच विचार केला तर महत्वाची बाब लक्षात येईल ती म्हणजे या काळात एवढी साधने उपलब्ध झाली असली तरी एकही मौलिक शोध लागलेला नाही. विश्वाबद्दलच्या माहितीत एवढी प्रचंड भर पडुनही आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या पुढे जाता आलेले नाही. बिग ब्यंग थियरी अपुर्ण आहे याची जाण असुनही तिला पर्याय होवु शकेल व विश्वनिर्मितीबाबतचे अनुत्तरीत प्रश्न सोडवु शकेल असा सिद्धांत मांडला गेलेला नाही. उलट शास्त्रद्न्य स्वस्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हास्यास्पद दावे करु लागले आहेत. विश्वशास्त्राबद्दल मुलात अल्पद्न्यानी असणारी माध्यमे ते दावे हिरिरीने प्रसिद्ध करत असतात.

सध्याच्या नैसर्गिक इंधनाला (सौर/कार्बनी/अणु) नवा पर्याय गेल्या शंभर वर्षांत शोधता आला नाही. ही नैसर्गिक इंधने (सौर वगळता) येत्या शंभरेक वर्षात संपनार आहेत याची जाण मानवजातीला नाही असे नाही, पण तिची मुक्त उधळन थांबायचे सोडा, वाढतच चालली आहे.

तीच बाब अर्थव्यवस्थेची. १९ व्या शतकात अनेक पर्यायी अर्थव्यवस्थांवर चर्चा झाली. साम्यवादाची देनगी त्याच शतकातील. साम्यवाद, समाजवाद, भांड्वलशाहीवाद, कल्याणकारी अर्थव्यवस्था ते मुक्त अर्थव्यवस्था असे अनेक वाद चर्चेत आले, राबवलेही गेले, त्यातील दोषही कालौघात समोर आले...पण त्यानंतर आजतागायत ख-या अर्थाने अर्थव्यवस्था शास्त्रात, अनेक नोबेल पारितोषिके बहाल केली गेली असली तरी, नवीन अर्थ-तत्वद्न्यान पुढे आनता आलेले नाही. आहे त्याच स्थित्यांत बदल तेवढे सुचवले गेले.

साहित्य/नाट्य/चित्रपट क्षेत्राबद्दलही असेच म्हनता येईल. क्रांतीकारी नवे पायंडे पाडनारे वा कल्पनाशक्तीची मुक्त भरारी घेत मानवी जीवनाला आवाक्यात घेत सर्वांना भिडेल असे साहित्य तर अपवादानेच निर्माण झाले आहे. प्रयोगशीलता वा अभिनव साहित्यप्रकार निर्मितीची आविष्कारक्षमताच गमावुन बसलेत कि काय असे वाटण्याची ही स्थिती आहे. या दशकात तर स्लमडोग मिलेनियर सारख्या भुक्कड चित्रपटाला ओस्कर मिळावे अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. लोक कथा-कादंब-या व अशा चित्रपटांकडुन दुर पळत आहेत आणि ही जागतीक अवस्था आहे...ती शोचनीय तर आहेच पण मानवी कल्पनाशक्तीचे, नवनिर्माणाचे सामर्थ्य संपत तर चाललेले नाही ना, याबाबत चिंता वाटेल अशी ही परिस्थिती आहे.

गतशतकाच्या जवळपास मध्यापासुन कोणतेही नवे राजकीय तत्वद्न्यान उदयाला आलेले नाही. किंबहुना पुर्वीच्याच राजकीय तत्वद्न्यानांची सरमिसळ करत मध्ययुगीन सरंजामशाहीचा मात्र नवोदय झालेला दिसतो. दुस-या महायुद्धापर्यंत स्वत:ला "नवे जग" मानणारी अमेरिकाही या सरंजामशाहीत प्रवेशत जागतीक पोलीस म्हणुन वावरत दहशतवादी/चंगळवादी बनु लागली तरी त्याचाही निषेध कोणा विचारवंताने प्रबळ तत्वद्न्यानाची मांडणी करत केलेला दिसत नाही....वा तत्वद्न्यानाची फेरमांडनी केलेली दिसत नाही.

ज्या संगणकांनी माहिती तंत्रद्न्यानात क्रांती केली ते संगणक अजुनही बायनरी पद्धतीने...(म्हणजे मोर्स कोडचाच आधुनिक अवतार...बाकी काही नाही.) चालतात. याचाच अर्थ असा कि क्वांटम तंत्रद्न्यान संगणकांसाठी वापरता येउ शकण्याची शक्यता पडताळली गेलेली नाही वा क्वांटम तंत्रद्न्यान अद्यापही जेथे निर्माण झाले होते तेथेच थबकलेले आहे. या तंत्रद्न्यानातील असंख्य उर्जा पातळ्या वापरण्याची संधी आपल्याला अजुन साधायची आहे.

असे जवळपास सर्वच क्षेत्रांत होत असुन मुलभुत द्न्यान-विद्न्यानातील प्रगती अडखळलेली आहे असे आपल्याला दिसते.

आज आपण एका अर्थाने आधुनिक युगातील आदिमानव बनलो आहोत...बनत चाललो आहोत. सर्जनशीलतेचा क्रमश: -हास होत चालला असुन मानवी समाजप्रवाहाला मागे नेत चाललो आहोत.

कारण माहिती वाढली आहे पण द्न्यानात लक्षणीय भर घालेल असे कार्य थांबले आहे कारण सर्जकताच कोठेतरी थांबली आहे.

आणि हा मानवी समाजाला फार मोठा धोका आहे.

असे होण्यामागील काही महत्वाची कारणे, जी मला वाटतात ती अशी...

१. माहितीच्या भडिमारामुळे (मी याला खरे तर माहितीचा गजबजाट/गोंगाट म्हणतो.) मनुष्याची संवेदनक्षमताच कमी झालेली आहे. तो एकार्थाने बधीर झालेला आहे. त्यामुळे सर्जकतेसाठी आवश्यक असणारे गजबजाटविरहीत मुक्त अवकाश तो गमावुन बसलेला आहे.
२. मानवी नातेसंबंध हा मानवी सर्जकतेला बळ देणारा...प्रेरणा देणारा महत्वाचा घटक असतो. गतशतकापासुन मानवी नातेसंबंधांतील भावनीकता वेगाने घटत गेली आहे. याचे प्रमुख कारण म्हनजे जीवनप्रेरणाच बदलल्या आहेत. पण यातुन व्यक्तिवाद वाढत गेला असला तरी व्यक्ती त्यामुळेच सर्जकताही गमावुन बसली आहे....वा तिचे सामर्थ्य कमी झालेले आहे. मनुष्य हा मुळातच भावनीक प्राणी आहे, पण त्याच्या भावनिकता व्यक्तिकेंद्रीत झालेल्या आहेत.
३. ज्या क्षेत्रात नैसर्गिक गती नाही त्या क्षेत्रात केवळ अर्थलाभासाठी वा प्रतिष्ठेसाठी जाण्याची तर महाभयंकर लाट जागतीक शिक्षणपद्धतीमुळे आलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र नैसर्गिक घटक असतो व त्याला काहीतरी विशिष्ट शक्ती निसर्गदत्त मिळालेल्या असतात याचे भान हरपलेले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रव्रुत्ती/क्षमता याविरुद्ध आकलन व शिक्षणाचे मार्ग बंद करत व्यक्तित्वाला खुजे करण्यासाठीचे मार्ग मात्र अमर्याद उपलब्ध आहेत. याला मी नैसर्गिक निवडीविरुद्धचा अखिल मानवी जातीचाच कट मानतो. यामुळे मुलभुत सर्जकतेच्या प्रेरणा नष्ट होतात याचे भान आपल्या जागतीक समाजाला नाही.
४. हा जो स्पर्धांचा मानसिक बोजा वाढत चालला आहे त्यात अर्थव्यवस्थांपेक्षा या माहिती तंत्रद्न्यान ते माध्यमांचा अधिक हातभार आहे. हा स्पर्धांचा बोजा ज्यांना पेलत नाही ते आत्महत्त्या करतात. आत्महत्त्येंची प्रमाणे ज्या भयावह, शेतकरी ते विद्यार्थी...नोकरदार...उद्योजक...यांत भयंकर गतीने वाढत चालली आहेत ती आकडेवारी भयभीत करणारी आहे. "पंगु लंघयते गिरीं" म्हनणे सोपे आहे पण सक्षमालाही अक्षम ठरवणारी अकारणची स्पर्धा प्रत्येक समाजघटकांतच नव्हे तर अगदी पती-पत्नीतही लागलेली आहे.

या सर्वांत मानवी सर्जनशीलतेचा पहिला बळी जातो, याचे भान आतातरी मानवी समाजाला यावे. यामुळे मानवी जगताचे पुढील भविष्य व्रुद्धींगत होण्याऐवजी ते घटत जात "बिग क्रंच" सिद्धांतानुसार मागे जात राहील...आणि आधुनिक काळ, पण टोळीमानव, असे आपलेच स्वरुप बनत जाईल...आणि त्याची चिन्हे आताच दिसु लागली आहेत. जाती/धर्म/वंश यांच्या टोळ्या जशा आहेत तशाच राजकीय/कामगार-श्रमिक वर्ग ते विद्यार्थीही आपापल्या हितसंबंधांसाठी टोळ्या बनवुन बसलेले आहेत आणि हा टोळीवाद कोठेतरी आदिम भावनांचे फुत्कार सोदत अनेकदा सामाजिक स्वास्थ्याचा बळी घेत जात आहे असेही आपल्याला दिसते. म्हणजे आपण पुढे गेलेलो नसुन मागेच चाललो आहोत आणि ते संपुर्ण मानवी जातीच्या हिताचे नाही.

हीच जागे होण्याची वेळ आहे...

अन्यथा अखिल मानवी समाजाच्या पुरातन सर्जनशील मनाचे विसर्जन होईल याची खात्री बाळगा.

Monday, November 14, 2011

स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर

प्रकाशन सोहळा
(आयु. मधुकर रामटेके यांच्या ब्लोगवरुन साभार)
महाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं राज्य आहे अशी कितीही आरोळी फोडली तरी त्याला सदैव जातियवादाची किनार होती व आहे. या जातियवाच्या ढिगा-यात कित्येक बहुजन नायक पूरले गेलेत. वर्चस्ववाद्यांचा प्रभाव असणा- सवर्ण आणि बहुजन दोन्ही वर्गातील लेखक, इतिहासकारानी नेहमीच अशा पूरलेल्या इतिहासाला फाटा दिला. बहुजनांच्या इतिहासाशी नजरा नजर होऊनही जाणीव पुर्वक कानाडोळा केला. उत्तुंग व्यक्तीमत्व, जगदविख्यात अन अत्यंत प्रभावी बहूजन व्यक्तीच्या इतिहासाशी फटकून वागण्यात आले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला कि आमचे खरे नायक आम्हाला कधी कळलेच नाही. अशाच एका महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून मोठ्या विर्याने उकरुन काढण्याचं अपूर्व कार्य केलं आयु. संजय सोनवणी यानी. हा धनगर सामाजात जन्मलेला व भारतभू साठी उभं आयूष्य पेटवून देणारा आध्य क्रांतिकरक, स्वातंत्र्य लढाची पायाभरणी करणारा वीर पुरूष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.

महाराजा यशवंतराव होळकर यांचं सोनवणी लिखित चरित्रग्रंथ ’भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकाचा काल दि. १३ नोव्हे २०११ रोजी पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच बरोबर धनगर-अस्मिता नावाच्या धनगर समाजाच्या पाक्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून धनगर बांधवानी मोठी गर्दी केली. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला सामोर आणल्या बद्दल संजय साहेबांवर धनगर समाजानी अक्षरश: स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रिय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर स्वत: जातीने उपस्थीत होते. त्याच बरोबर बहुजन समाजाचे थोर विचारवंत हरी नरके सरही उपस्थीत होते.

धनगर समाजातर्फे संजय साहेबांचा सत्कार करण्यात आला. सहसा सत्कार करताना शाल देण्यात येते पण धनगर बांधवानी पारंपारीक पद्धतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. संजय साहेबाना घोंगळं देण्यात आलं. व सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर पगडी चढविण्यात आली. ही होळकरी पगडी होती. सत्कार पुण्यात झाला अन पगडी दिली यावरुन लोकांत गैरसमज होऊ नये यास्तव आयोजकानी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचं माईकवरुन सांगितलं. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात होळकरी पगडीनी सत्काराचा मान पटकवीला. या वेळी संजय साहेबांचे माहितीपर भाषण झाले.



श्री. जानकर साहेबानी आपल्या भाषणात सोनवणी व नरके सरांचे आभार मानले. ते पुढे म्हणतात, “संसदेत दिवसेंदिवस आपल्या ओबीसी नेत्यांची भाषणं अत्यंत प्रभावी होत चालली आहेत. त्यांची भाषणं म्हणजे संग्रही ठेवावे अशी टिपणं असतात. त्याच बरोबर सरकारला कोंडीत धरणारी व सामाजीक नि राजिकय आघाड्यावर कामाचे वेध घेणारी विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मर्मभेदक आणि दिमाखदार भाषणं असतात. ओबीसी नेत्याच्या सडेतोड आणि अचूक युक्तीवादाच्या मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचं मोठं योगदान असतं. आम्हाला आमचा पक्ष देशाच्या चारही सिमाना नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला निकडीची गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यानी खबरदार व्हावे.” अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलिकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशार दिला की थोबाडं बंद नाही ठेवली तर थोबाडीत बसेल.
नरके सरानी घेतला ब्रिगेडचा समाचार
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना नरके सरानी केलेली ज्ञानाची चतूरस्त्र उधळण समाजाच्या नाना पैलूवर प्रकाश टाकणारी होती. चिकित्स, मार्गदर्शक, मनोवेधक नि आवाश्यक तिथे प्रक्षोभप्रवर्तक तोफा डागत नरके सर पुढे सरकतात. सामाजिक असमतोलतेचा अत्यंत तिटकारा बाळगणारे नरके नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणतात की, “केवळ ब्राह्मणाना शिव्या घालणे ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोकं समतेच्या चळवळीत नवीन विषता तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसं लाथा बुक्क्याच्या बाता करतात. पण खबरदार या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही.” पुढे नरके सर मोठ्या त्वेषाने बोलतात की, “आज काल इतिहास संशोधकांच पीक आलं आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. ही लबाड लोकं विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचं चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार. अभ्यासाच्या नावानी शंख असलेले खेडेकर तर माझं संशोधन स्वत:च्या नावावर छापण्या पर्यंतचा चोरटेपणा केला.” हा नरके सरानी घेतलेला खेडेकरांचा समाचार सभागृहात हशा पिकवून गेला. खेडेकारांचे दोन अनुयायी माझ्या सोबतच बसलेले होते. त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. एकेकाचा टप्प्या टप्प्याने समाचार घेत नरके सर पुढे जातात. ते म्हणतात, “इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहेत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य वरील गुणसंपन्न माणूसच करू शकतो.” भावी इतिहासकाराना दिलेला हा मोलाचा सल्ला, चोरट्या इतिहासकारांची केलेली कान उघडणी आणि मस्तावलेल्याना दिलेला निर्वाणीचा ईशारा अशा प्रकारे घेतलेल्या चतूरस्त्र समाचारानी नरके सरांचे भाषण संपन्न झाले.
तिसरी आघाडी
महाराष्ट्रातील बहुजन चळवळीचे स्वत:कडे एकाधिकार मालकी हक्क असल्याच्या अविर्भावात हिंडणा-यांची एक मानसिकता आहे. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्या प्रत्येक बहुजनास ते ब्राह्मणाचे हस्तक ठरवित असतात. ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी चळवळ चालू आहे नि जे जे आमच्या विरुद्ध आहेत ते सर्व ब्राह्मणांचे हस्तक आहेत अशी आरोळी फोडत असतात. बामसेफ व मराठा सेवा संघानी बहुजन विचारवंतावर चिखल फेक करताना ते ब्राह्मणाना जाऊन मिसळले अशी आवई उठवली होती. बहुजन विचारवंत हे कधिच ब्राह्मणांकडे बुद्धि गहान टाकत नाहीत याचा खणखणीत पुरावा देणारा कालचा सोहळा यांच्या थोबाडीत मारुन गेला. ओबीसींचं आरक्षण हिसकावुन नेण्याच्या तय्यारीत असलेल्या वर्चस्ववाद्याना तडाखेबंद प्रतिउत्तर देण्याची गरज होती. त्यासाठी संघटनात्मक कार्य उभारुन सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. कालच्या कार्यक्रमातून याची सुरुवात झाली आहे. बहुजन चळवळीची ही नवी आघाडी ख-या अर्थाने समता रुजविण्यात झोकून देईल. द्वेषमूलक कार्याला ईथे थारा नसणार आहे. नरके सरानी आपल्या भाषणातून वर्चस्ववाद्याना निर्वाणीचा ईशारा तर दिलाच पण त्याच बरोबर क्षमाशील हृदयाने असे आवाहनही केले की मोठ्या भावाप्रमाणे बंधूत्वाने वागालात तर विधायक नि भरीव कामात आमची साथच असेल. आम्ही नेहमी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे होतो अन असणार हे याद राखा. तोडा फोडा व झोडा करणा-यानी आता थांबावे अन्यथा त्याना तडाखेबाज प्रतिउत्तर देण्यात येईल.
त्या नंतर सोनवणी लिखीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले. हातो हात पहिली आवृत्ती विकल्या गेली, फक्त पन्नास साठच पुस्तक उरलीत. हा सुध्दा विक्रीचा विक्रमी सोहळा होता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.



Wednesday, November 9, 2011

नवी भग्वद्गीता

(भगवान श्रीक्रुष्ण जर दिल्या शब्दाला जागुन दुर्योधनाच्या पक्षाला मिळाले असते तर त्यांचे तत्वद्न्यान काय असु शकले असते हे मी "शुन्य महाभारत" या कादंबरीत विस्ताराने दाखवले आहे. अशा स्थितीत गीता कशी असली असती...ती येथे...)


कृष्णसखा पार्थ, अर्जुन, दीनवदनाने श्रीकृष्णासमोर उभा होता. अमावास्येच्या आदल्या दिवसाची रात्र असल्याने आकाशात तारकांनी गच्च दाटी केली होती आणि हवा संथ गतीने वाहात यच्चयावत सृष्टीस परमात्मस्पर्शाने आशीर्वाद देत होती.

अर्जुन म्हणाला

हे कृष्णा, माझे मन मोहाने ग्रस्त झाले आहे. उद्या सकाळी युद्ध सुरू होणार आहे आणि हे युद्ध माझ्याच आप्तांशी असल्याने मी हे युद्ध का करावे, माझ्याच भ्रात्यांच्या वधास कारणीभूत होऊन पातकांचा असह्य भार का घ्यावा हा प्रश्न मला व्यथित करतो आहे. आता तूही आमच्या बाजूस नाहीस त्यामुळे धर्मानेही आमची साथ सोडली आहे की काय असे मला तीव्रतेने वाटते आहे.

हे मधुसूदना, युद्ध हे भीषण कर्म आहे आणि त्यामुळे असंख्य जीवांचा संहार होणार आहे. केवळ राज्यलाभासाठी जर माझ्याच आप्तेष्टांची हत्या झाली तर माझी कीर्ती कलंकित होईल, हे तर निश्चित. त्यामुळे शस्त्रसंन्यास घेऊन पुन्हा अरण्याची वाट चालावी असे मला वाटते आहे. युधिष्ठिराचेही असेच मत आहे. धृतराष्ट्रपुत्रांस खुशाल राज्यलक्ष्मीचा भोग घेऊ देत. आमचे त्याबद्दल आता काहीही म्हणणे नाही. तू हे माझे मत दुर्योधनापर्यंत पोहोचव आणि या युद्धास टाळ. तसे केल्याने आमचीही कीर्ती अक्षय राहील आणि आम्ही धर्माने वागलो असेच इतिहास सांगेल. क्षणिक लाभापेक्षा अजेय कीर्ती ही फार लाभाची ठरेल असे मला निश्चयाने वाटते.

श्रीकृष्ण म्हणाला

हे पार्था, धर्म सूक्ष्म आहे आणि मानवी व्यवहार हे एवढे गुंतागुंतीचे आहेत की, प्रसंगी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरविण्यात ज्ञानवंतही कमी पडत असतात.

उद्या सुरू होणारे युद्ध हे तुम्हा आप्तेष्टांत आहे, असे जे काही तू समजतो आहेस ते केवळ मायेमुळे. हे पार्था, मानवी जीवनच मुळात मायेने व्यापलेले आहे. मायेमुळेच कोणी मित्र वाटतो तर कोणी शत्रू. कोणी प्रिय वाटतो तर कोणी अप्रिय.

दुर्योधन-भीष्मादी व्यती तुला आप्त वाटतात कारण ही माया.आरे, मायेमुळे मानवात वास करणारा आत्मा झाकलेला असतो. ती माया मनुष्यास सत्य काय ते कदापि कळू देत नाही. मायेचे आवरण दूर कर. मायेचे आवरण योगाने दूर केलेस, तर तुझ्या लक्षात येईल की, तुझा येथे कोणीही आप्त नाही. तसाच तुझा कोणी शत्रूही नाही. त्यामुळे हे पार्था, तू का मोहग्रस्त होतो आहेस?

शोक हा अनित्य आहे, म्हणूनच शोक त्याज्य आहे. आनंद शाश्वत आहे म्हणून आनंद प्रेय आहे. आणि हेही लक्षात घे पार्था, की जन्म आणि मृत्यू या घटनाही अनित्य आहेत. म्हणून जन्माबद्दल आनंद व्यक्त करणे आणि मृत्यूबद्दल शोक करणे, त्याज्य आहे. हा शाश्वत धर्म मी तुला सांगत आहे.

आप्तांशी युद्ध करावे की नाही हा मोह तुझ्या मनात निर्माण झाला आहे; पण "आप्त' हे आप्त नाहीत हे तुला मायेचे आवरण दूर केल्याखेरी किळणार नाही. तेव्हा या भूतलावर तुझे युधिष्ठिर, द्रौपदीसह कोणी आप्त नाहीत हे शाश्वत सत्य तू ध्यानी घे.

कारण हे धनंजया, प्रिय वाटणे हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव बनतो तेव्हा त्याला काही अप्रियही वाटणार हे निश्चित आहे आणि प्रिय आणि अप्रियतेमधील सीमारेषा मानवी भावनांनी घातलेल्या असतात. भावनांचा त्याग केलास तर कोणी प्रिय वाटणार नाही की कोणी अप्रिय. आणि साधू हा भावनाहीन असला पाहिजे.

आणि ज्याला भावना नाहीत त्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसते. त्याचे मन निर्विकार आणि अलिप्त असते. अशा व्यतीस कोणतेही कर्म षिद्ध नसते की निषिद्ध.

तेव्हा हे शत्रुतापना, तुला हा जो शोक होत आहे, त्याचे मला काही एक कारण दिसत नाही. कारण हे पार्था, तू या युद्धाच्या दिशेने स्वत:हून चालत आला आहेस आणि हे तुझे वर्तन अंती युद्धातच परिणत होणे हे अधिक इष्ट असे मला वाटते.

हे धनंजया, जर कौरव तुझे आप्त आहेत तर तेवढेच पांडवही तुझे आप्त आहेत. एवढेच नव्हे तर पांडवांवर श्रद्धा ठेवून या संगरात तुझ्या बाजूने जे कोणी उतरले आहेत तेही तुझे आप्तच आहेत. आता हे युद्ध करावयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ टळून चुकली आहे.

मनुष्य आपल्याच कर्मांनी आपले भवितव्य नित्य घडवीत असतो. परन्तु जे काही घडते ती आपली नियती असते या विरोधाभासाने मानवी मन व्याप्त असल्याने, हे पार्था, मनुष्य आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवीत नाही.

उद्या घडणारे युद्ध हे एकाकी घडते आहे असे नसून त्याची बीजे सर्वांनीच इतिहासात पेरून ठेवली आहेत आणि त्यास खतपाणी घातलेले आहे. तेव्हा आता एकाएकी त्या कर्माचे फल म्हणून हे, जे युद्ध ते, तुला अव्हेरता येणार नाही.

कारण ते आता तुझ्या एकटयाच्या हातीही नाही. फार तर तू एकटा संन्यस्त होऊ शकशील. परंतु मग तुला जे वाटते की तुझी कीर्ती अक्शक्य होईल ते काही खरे नाही. बाबारे, एक भित्रा मनुष्य अशीच तुझी त्रैलोयात कीर्ती होईल. सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मानवी धर्म यात भेद आहे तो यामुळेच. कारण अमुक एक कर्म करावे की नाही याचे सर्वदा मनुष्यास स्वातंत्र्य असते असे नाही. मनुष्य जन्मास येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो. आणि ज्या परिस्थितीत त्याची वृद्धी होते, त्या परिस्थितीचे पारतंत्र्य आपसूक त्याच्या गळ्यात पडत असते.

मी तुला सांगितलेच आहे हे सव्यसाची, की या जगात काही प्रिय नसतानाही मनुष्यास काही गोष्टी प्रिय वाटतात. कारण त्याची परिस्थिती. तसेच या जगात काही एक अप्रिय नसताही त्या गोष्टी अप्रिय वाटतात कारण मनुष्याची परिस्थिती. मनुष्य खर्‍या अर्थाने परिस्थितीचे अपत्य असतो.

परिस्थिती मनुष्यास घडविते, यश देते किंवा अपयश देते.

परंतु हे प्रिय कुंतिपुत्रा, परिस्थितीच मुळात अनित्य असल्याने मनुष्याचे यश आणि अपयशही तेवढेच अनित्य असणार हे उघड आहे.

तेव्हा उद्या जी परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीचा तू दास आहेस आणि हे माया-मोहाने भरलेले संभाषण विसरून तुला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करावा लागणार आहे. परंतु उद्याची परिस्थिती ही अनित्य आहे कारण परवाची परिस्थिती कशी असेल ते उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा अनित्य स्थितीत विजय लाभतो की पराजय, मृत्यू लाभतो की जीवन हे सुद्धा ठरवणे तेवढेच अनित्य आहे.

म्हणून हे कौंतेया, असा शोकमग्न होऊ नकोस.'



अर्जुन म्हणाला

हे नारायणा, मी मनुष्य आहे आणि मी विकारांनी ग्रस्त आहे हे तर सत्य आहे परंतु तू आताच म्हणालास की सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मनुष्याचा धर्म यात भेद आहे. मला हे सांग की असे का? धर्म हा एकच असला पाहिजे आणि तो सर्वांना सारखाच लागू पडला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा हे उदारहृदया, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे.



कृष्ण म्हणाला

हे पार्था, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात खचितच मला आनंद वाटेल. कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो.

धर्म ही मूलत: मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा स्पर्श मानवी धर्मास होणे सहशिय आहे.

पण मनुष्य हाही सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो.

मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य बराह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असे समजून मानवी धर्माचे विभानि करीत धर्माचा संकोच करीत असतो.

शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वत: मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शिवाय धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूपलू शकते. आणि जे बलहीन आहेत त्यांच्यावर धर्म लादला जातो तर जे शक्तिशाली आहेत तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात हा इतिहास आहे.

याचाच अर्थ असा की, मानवी धर्म अनिश्चित असून तो अक्शक्य नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल?

म्हणजेच, मानवी धर्म शाश्वत नाही आणि जे शाश्वत नाही त्याप्रमाणेच आचरण करण्याचा आगरह कोणी का धरावाबरे?

आता हे पार्था, मी तुला चिरंतन धर्माची गुह्ये सांगतो. हा धर्म सृष्टीच्या उत्पत्तीकाली ब्रह्मदेवाने केला आणि त्याच धर्माने सारे चराचर चालत असून ज्या योगे आकाशीच्या तारका भूमंडळावर कोसळत नाहीत किंवा तेजोमय सूर्य पृथ्वीच्या निकट येऊन पृथ्वीस दग्ध करीत नाही किंवा ज्या योगे अरण्यातील समस्त हिंस्र प्राणिजगत एकत्र येऊन मानवांवर सामूहिक हल्ले करीत नाहीत, तो धर्म मी तुला सांगतो.

पार्था, लक्षपूर्वक ऐक.

सर्व सृष्टी ही अवकाशात उत्पन्न होते आणि अवकाशातच लय पावते. अवकाश हेच सृष्टीचे निर्मितीकारण आहे आणि अवकाश हेच सृष्टीचे संहाराचे कारण आहे. याच परम अवकाशास आपण ब्रह्मदेव म्हणतो आणि सर्व चराचरात ब्रह्माचे आस्तित्व आहे, असे म्हणतो. आणि हे तत्त्व फार गूढ आहे, जे तत्त्व यापूर्वी कोणी एजेकलेले नाही, ते तत्त्व मी तुला सांगत आहे.

अवकाशरूपी ब्रह्म हेच सृष्टीचे राजकारण आहे आणि यातूनच दिव्य अद्भुत गोष्टींची निर्मिती झाली आहे, हे निश्चयाने सत्य आहे.

या निर्मितीसाठीच सर्व राजतत्त्वांबरोबरच धर्माचीही निर्मिती झाली. हा धर्म हाच विश्वाचा नियमनकर्ता प्राण आहे. त्याच योगे सर्व सृष्टीचे व्यवहार नित्य होत असतात. ज्याप्रमाणे राज सूर्य ज्या समयी उगवतो त्याच समयी तो नित्य उगवत असतो. ऋतुचकर आपल्याला कळूही न देता अब्जावधी वर्षे अव्याहत चालू राहते. जो प्राणी आज जन्माला आला तो युवा होऊन वृद्ध होताना आणि एक दिवस मृत्युमुखात जाऊन स्थिर होताना आपल्याला दिसतो.

हे धनंजया, सृष्टीच्या या नियमात कधीही बाधा येत नाही, हे शाश्वत सत्य आहे. दक्षिणायनाचे उत्तरायणात परिवर्तन होणे, हे आपण निश्चयाने सांगू शकतो. त्याचयोगे आपण आपलेही जीवन या अव्याहत ऋतुचकराशी जुळवून घेत असतो.

हे पार्था, ऋतुचकर शाश्वत आहे. नभोमंडपी नक्षत्रांनी आपले स्थान कधीलायचे हे सुद्धा शाश्वत आहे, परंतु मनुष्य कधी आणि कसे वागेल याचे भाकीत कोणीही ज्ञानी मनुष्य करू शकत नाही, हे तेवढेच सत्य नाही काय?

पार्था, धर्माचे ऊनि एक गुह्य तुला मी सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. सृष्टी जड, अर्धचेतन आणि चैतन्य या तीन तत्त्वांत वाटली गेली आहे. जड सृष्टी ही अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे, याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. अर्धचेतन सृष्टी म्हणजे सकल चराचरात वास करणारी जीवसृष्टी. यात डोळ्यांनीही दिसणार नाहीत अशा अंतूंपासूनि ते समुद्रतलात विहार करणारे, हजार माणसांचे वनि जेवढे भरेल, एवढे अवाढव्य जीव वास करत असतात आणि मी असे ऐकतो की त्यातील अनेक जीव मनुष्याच्या निर्मितीपेक्षाही प्राचीन आहेत आणि त्यांचे सामर्थ्य एवढे आहे की, ते कोणत्याही धैर्यशाली पुरुषासही भयभीत करू शकतील.

परंतु हे पार्था, ही जीवसृष्टी एवढी पुरातन आणि समर्थ असताही, या सृष्टीने कधी या भूमीच्या एका कणावरही अधिकार सांगितल्याचा इतिहास नाही. ही सृष्टी जन्मास येते, नियत कर्मे करत असते आणि एक दिवस मृत्यूही पावत असते. जन्म आणि मरणाबाबत या सृष्टीने कधी हर्ष किंवा खेद व्यत करत असताना मी पाहिलेले नाही किंवा क्षणिक हर्ष-खेदासच जीवनाचा आधार मानत भविष्यामध्ये कसे वर्तन करावयाचे याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, असे माझ्या पाहण्यात नाही.

कारण हे पार्था, चिरंतन धर्माचे पालन करण्यात मानवेतर जीवसृष्टीच श्रेष्ठ आहे आणि चैतन्याचेच म्हणशील तर, चैतन्य कोणत्याही दुर्तत्त्वाहून अबाधित आहे. अग्नी हे चैतन्य आहे आणि अग्नी हा शुद्ध असतो हे सारे ज्ञानीनि जाणतात. प्रकाशही चैतन्य आहे आणि तो निर्विकार आणि सनातन असून सार्‍या जीवसृष्टीचे कारण असूनही कधी अहंग्रस्त झाल्याचे ऐकिवात नाही. नियमानेया धरेवर र्पन्यि वर्षत असतो आणि त्यायोगे ही पृथ्वी सुफलाम होत असतानाही र्पन्याने किधी अहंभाव बाळगून "मी अमुक जीकाणी वर्षेन, अमुक जीकाणी नाही' असे ठरवल्याचे एजेकवातनाही.

हे धनंजया, चैतन्य हेच मूळ ब्रह्मस्वरूप आहे. या चैतन्याने अर्धचेतन आणि जड सृष्टीची निर्मिती केली आहे. असे असूनही सर्व जीवमात्र, जड आणि अदृष्ट सृष्टीस चैतन्य सारख्या प्रमाणात आप-पर भाव न ठेवताही आपला भाग देत असते.

आणि हे पार्था, हाच शाश्वत-सनातन आणि चिरंतन धर्म आहे. परंतु मानवी धर्माचे काही वेगळेच आहे.

मानवी धर्म स्थिर नाही. मानव स्थिर नाही. सृष्टीविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य कष्ट घेतो हे खरे, परंतु हे ज्ञान तो स्वत:च्या स्वार्थासाठी आणि अभ्युदयासाठी वापरीत असतो आणि एवढे करूनही त्याचा स्वार्थही शाश्वत नाही.

मानवाचा स्वार्थ शाश्वत नाही, म्हणून त्याचा परमार्थही शाश्वत नाही.

म्हणूनच मानवाचे जग हे अनित्य आहे आणि त्याचा धर्मही अनित्य आहे. तेव्हा मनुष्य आपल्या स्वनिर्मित धर्माने वागणार हे जर सत्य आहे, तर त्याला शाश्वत धर्माचा तरी काय उपाय?

शाश्वत धर्माने पाहू जाता हे पार्था, तुझे कोणी आप्त नाहीत. कोणी इष्ट नाहीत. तू तुझाच आहेस आणि तू जर तुझाच असशील तर मायेचे आवरण नष्ट करून तथागत दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहावयास हवे. मग भूमीसाठी युद्ध का करायचे हा प्रश्न तुला पडणे स्वाभाविक आहे. कारण पार्था, भूमी ही मनुष्याच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, कारण ती फक्त मानवासाठी निर्माण झालेलीनाही.

दुसरे असे की, हे शत्रुतापना, इतर वाईट आहेत हे समजून त्या वाइटाचे निराकरण करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, असे जे समजतात. तेही अज्ञानी होत.

तुझा संघर्ष कौरवांशी आहे. ते तुझे आप्त आहेत असेच तू म्हणतो आहेस आणि आप्तांशी संघर्ष नको अशी उपरतीही तुला झाली आहे.

परंतु त्यामुळे तुला जो संदेह झाला आहे, त्याचे काही निराकरण होत नाही. कारण तू संन्यास घेण्याच्या गप्पा मारीत असताना दुर्योधनाचा दावा बरोबर आहे, असेही काही केल्या म्हणत नाहीस.

आणि जर तुझ्या मते दुर्योधनाचा दावा बरोबर नाही, असे असेल तर तो दावा खोटा करण्यासाठी तरी तुला युद्ध करावे लागेल, नाही तर दुर्योधनाचा दावा खरा आहे, असे मान्य करून तरी तुला युद्ध टाळावे लागेल.

आता, युद्ध करायचे की नाही, याचा निर्णय तुला घ्यावाच लागेल. या युद्धात जय मिळेल की पराजय, आप्तांची हत्या होईलकी तुझी, याचा विचार करण्यात काही एक अर्थ नाही, असे मला निश्चयाने वाटते. तेव्हा शोक सोड आणि युद्धास दृढनिश्चयाने तयार हो, असेच माझे तुला सांगणे आहे.


अर्जुन म्हणाला

हे नारायणा, तू मला शाश्वत धर्म आणि मानवी धर्मातील फरक सांगितलास. हे खरे की, मानवी धर्म हा शाश्वत नाही. परंतु मीही मनुष्यच आहे आणि मनुष्य असल्याने मला मनुष्यांचा धर्म लागू पडतो, हे तर सत्य आहे.

मी मनुष्य असल्याने मला विकार आहेत. ते असल्यानेच कौरव हेही माझे आप्तच आहेत, भीष्म माझे पितामह आहेत आणि द्रोणाचार्य माझे गुरू आहेत, हे मी कसे विसरू?

हे परमात्मना, स्मृती मनुष्यास असतात आणि त्या अन्य जीवसृष्टीपेक्षा तीव्रतर असतात हे तर तुला ज्ञात आहे. आणि स्मृतीया मनुष्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांचे संगरह करतात आणि मनुष्याचे कोणाही व्यतीशी असणारे वर्तन हे त्याच्या त्या-त्या व्यतिसंदर्भात साचलेल्या स्मृतींशी संबंधित असेल हेही तर सत्यआहे.

परंतु हे कृष्णा, अन्य सजीव वा अजीव सृष्टीस स्मृती आहेत की नाहीत हा प्रश्नच आहे. परंतु ज्याअर्थी अन्य पशू सूड घेण्यास तत्पर झाल्याचे पाहण्यात नाही, त्याअर्थी पशूंस स्मृती नसाव्यात किंवा असल्या तरी अत्यल्प असाव्यात, असे मला वाटते.

परंतु हे करुणाकरा, मनुष्याच्या स्मृती तीव्रतर असून अगदी बालपणीही घडलेल्या घटना त्याच्या लक्षात राहातात आणि त्या स्मृतींवर आधापरत त्याचे भविष्यातील वर्तन होत असते. मनुष्यास स्मृतीच नसत्या तर आम्हीही येथे युद्धासाठी का मिलो असतो?

आणि त्यामुळेच मनुष्यधर्म हा वेगळा असणार आहे, हे निश्चितच आहे. प्रत्येक घटनाच्या स्मृती मानवावर संस्कार करीत जाणार असल्याने मानवी व्यवहार अनित्य राहणार आहे हे तेवढेच खरे. परंतु हे श्रीकृष्णा, मनुष्यास उपरती होऊन त्याने कधी ज्ञानवंतांनी सांगितलेल्या मार्गाकडे पाहून मोक्षासाठी प्रयत्न करू नये असे थोडेच आहे?

युद्ध हे नि:संशय भीषण कर्म होय आणि हे कर्म करण्यापेक्षा ते न केलेले बरे असे मला वाटते, तेव्हा तू मला योग्य ते दिग्दर्शनकर.


श्रीकृष्ण म्हणाला

हे पार्था, मी तुला कर्मविषयक सिद्धांत विस्ताराने विषद करतो. तो तू लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुझा मोह दूर होईल.

मनुष्यच काय परंतु ही चराचर सृष्टी प्रतिक्षणी कर्म करीत असते. कर्म केल्यावाचून सजीव काय, अजीव सृष्टीही पळभर राहात नाही. मनुष्यास नकळतही मनुष्य अनेक कर्मे करीत असतो किंवा काही कर्मे करावीत की न करावीत याचे स्वातंत्र्यही मनुष्यास नसते. परंतु ही निसर्गाची शाश्वत कर्मे आहेत आणि या कर्माची कोणतीहीहा मनुष्यास होत नाही.

परंतु संकल्प करून त्यानुसार जी कर्मे मनुष्य करीत असतो, त्या कर्मांची इष्टानिष्टता कशी आहे, यापेक्षा त्या कर्माचा संकल्प इष्ट आहे की अनिष्ट यावर कर्माचे इष्टानिष्टत्व ठरत असते.

कर्माची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आहे. प्राणिमात्र अन्नपासून होतात. अन्न र्पन्यापासूनि उद्भवते तर र्पन्यि यज्ञापासून होते आणि सारी सृष्टी म्हणजेच यज्ञ होय असेही तू समजावून घे. कर्म अनंत आहे आणि अक्षय आहे. कर्माखेरी जिगाचे रहाटगाडगे पळभरही चालणार नाही, हे तू समजून अस.

परंतु संकल्पाने केलेले कर्म हे शुभ आहे की अशुभ, ते सर्वांच्या हितार्थ आहे की त्यातून सर्वांचेच अहित होणार आहे, असे कोणतेही संकल्पधारी कर्म सर्वथा त्याज्य होय.

कारण हे शत्रुतापना, असे पाहा की, माझे म्हणून या त्रिभुवनात काही एक कर्तव्य उरलेले नाही. नियत कर्मे करीत असूनही मी नैष्कर्म्य वरत धारण केले आहे, कारण माझ्या मनात या कोणत्याही कर्माचा संकल्प नाही. संकल्प नसता केलेल्या कोणत्याही कर्माचे पातक मनुष्यास जाकटत नाही, असे "कर्म' असूनही कर्म नसते हे समजून अस.

कारण मी संकल्पित कर्म करू लागलो तर मीच उत्पन्न केलेले लोक नष्ट करणारा होईन आणि मग सृष्टीचा घात होईल.

संकल्पाने जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा तो संकल्प करणारा कर्माचा कर्ता होतो. त्यामुळे कर्त्यास कर्माचा शुभाशुभ दोष लागतो. एवढे नव्हे तर ज्यांच्यावर कर्त्याच्या कर्मांचा परिणाम होतो, त्यांचीही फळे कर्मकर्त्यास जाकटत असतात.

प्रत्येक कर्मास कर्मफळ अटळपणे जाकटलेले असते आणि त्याचा भोग प्रत्येक मनुष्यास घ्यावा लागतो.

आणि असे पाहा की, ज्ञानी मनुष्यही आपल्या प्रकृतिस्वभावाने वागत असतो. त्यामुळे इंद्रियनिगरह करून कर्म केले असता कर्मफल जाकटत नाही, असे जे मानतात ते मूढ होत.

आणि हे कौंतेया, मनुष्य सृष्ट किंवा दृष्ट असे जे काही कर्म करतो ते कामामुळे. काम हा मनुष्याचा मोठाच शत्रू होय. परंतु त्याने मनुष्याच्या आत्म्यास आच्छादिले आहे. त्यामुळे मनुष्यास सत्य आणि शाश्वत ज्ञानाचे कधीही दर्शन होत नाही.

त्यामुळे युद्ध हे भीषण कर्म होय, हे जे तू म्हणतो आहेस ते यथार्थच आहे. कारण या कर्मामागे संकल्प आहे आणि एकाच्या संकल्पसिद्धीसाठी अन्य जीवांस अपाय व्हावा असे कर्म शाश्वत धर्माने त्याज्य असायला हवे.

परंतु हे पार्था, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझा जो नियत धर्म आहे, त्याचे काय याचाही तू विचार केला पाहिजेस. कारण असे पाहा की, स्वधर्माने वागत असता मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर होय, असे पूर्वज्ञानवंतांनी म्हणून ठेवले आहे. स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार केल्यानेही तुझा नाश होईल, असे मला वाटते.


अर्जुन म्हणाला

हे ज्ञानवंता, तू असा कोड्यातल बोऊन मला संभरमित का करतो आहेस? एकीकडे युद्ध हे त्याज्य आहे, असे तू म्हणतो आहेस आणि तूच मला माझ्या धर्माने वाग असेही सांगतो आहेस, असे का याचा उलगडा तू कर.


श्रीकृष्ण म्हणाला

जे काही आपोआप प्राप्त होते, त्याचा संतुष्ट मनाने स्वीकार करणारा मनुष्य हा त्रैलोयातही श्रेष्ठ असतो, परंतु जे प्राप्त होत नाही ते प्राप्त करण्याचा संकल्प करून जो कोणी कर्म करीत असतो तो नि:संशय अधम कोटीत जातो.

युधिष्ठिरास राज्यश्री प्राप्त व्हावी या संकल्पाने तू युद्धायमान झाला आहेस आणि म्हणूनच हे युद्ध त्याज्य आहे, असे मला म्हणावेसे वाटते.

परंतु ज्या संकल्पाने तू युद्धरत झाला आहेस, त्याच संकल्पाने प्रतिपक्षही युद्धास सज्जा असल्याने शाश्वत धर्म काय आहे आणि आपण आप्तांशी युद्ध का करावे हा तुझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न निरर्थक आहे.

आणि तुझा संकल्प प्राचीन असल्याने आणि काळाचे रहाटगाडगे उलटे फिरविता येत नसल्याने तुला तुझ्याच संकल्पापासून हटता येणे शक्य नाही आणि म्हणूनच आता संकल्प कसाही असो, त्या संकल्पार्थ एवढी सिद्धता केल्यानंतर तुला हा कर्मयज्ञ करणे करमप्राप्त आहे.

कारण हे शत्रुंया, जिन्माने तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियास योग्य असेच संस्कार तुझ्यावर झाले आहेत. युद्ध करणे हा क्षत्रियाचा विहित धर्म आहे आणि त्या धर्माने युद्ध हे कर्म तुला प्रेय असणे स्वाभाविक आहे. तू युद्ध कर असे जे मी म्हणालो ते तुझ्या धर्मावर आणि संकल्पावर दृष्टी ठेवून.

तू या युद्धातून दूर झालास तरीही हे युद्ध होणारच नाही, असेही आता नाही. कारण हे युद्ध फक्त तुझ्या व्यतिगत संकल्पनासाठी होते आहे, असे म्हणणे अर्धसत्य आहे. द्रुपद, धृष्टद्युम्न, भीम, द्रौपदीसह अनेकांचे या युद्धासाठी संकल्प सिद्ध आहेत, कारण त्यांचे व्यतिगत संकल्पही हे युद्ध होण्यासाठी बाबिदार आहेत. तेव्हा हे युद्ध केवळ तुझ्यासाठी होत आहे, असे अहंभावी विधान तू करू नयेस हे उत्तम.

त्यामुळे या यज्ञाचा संकल्प झालाच आहे. यज्ञासाठी समिधाही आयत्या तयार आहेत आणि होताही मंत्रध्वनी करीत आहे, असे असता हा यज्ञ होणे हेच श्रेयस्कर.

बरे, हे युद्ध केल्याने तुला स्वर्गप्राप्ती होणार की नाही किंवा युद्ध न केल्याने स्वर्गप्राप्ती होईल की नाही याचे तरी ज्ञान तुला कोठे आहे? तुला समजलेला भूतकाळ तेवढा तुला ज्ञात आहे, वर्तमान अत्यंत अस्थिर असून प्रचंड गतीने तो भूतकाळाच्या महापात्रात विलीन होत आहे आणि भविष्य गडद अंधाराने व्याप्त आहे.

आणि हे पाहा, संकल्प कसाही असो, तो नेटाने सिद्धीस नेणारा मनुष्य हा संभरमित मनुष्यापेक्षा कधीही श्रेष्ठ होय.

तेव्हा हे पार्था, हा संभरम सोड आणि नेटाने संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नकर.


अर्जुन म्हणाला

तू जे म्हणालास ते ठीकच आहे, परंतु हे श्रीकृष्णा, माझ्या मनाचे समाधान काही केल्या अद्याप होत नाही. युद्ध म्हटले की हत्या अटळ आहे आणि ज्याची हत्या होते तो मृत्यूनंतर कोठे जातो, कसा वागतो, कसा राहतो हे जाणण्याची इच्छा मला झाली आहे. कारण तू सारे जाणतोस.


श्रीकृष्ण म्हणाला

पार्था, हासुद्धा तुझा नियत मोह आहे. हे शुभंकरा, जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकास अटळ आहे. जो जन्माला आला, त्याला मृत्यू येणारच हे तुला माहीतच आहे आणि असे पाहा की, प्रत्येक जीव सतत मृत्यूस सोबत वागवीत चालत असतो, असे सारे म्हणतात.

जो जन्मताना दिसतो, तो जन्मताच मेलेला असतो. फक्त कालरूपी मायेमुळे मनुष्यास जीवन आणि मृत्यू यामध्ये अंतर दिसते आणि केवळ या मधल्या काळातील यश आणि अपयशासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. ज्यांना ही काळाची माया कळली आहे, त्यांच्या दृष्टीने मुळात कोणतीही घटना घडत नाही. कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात असते आणि स्वत: काळ हा मायारूपी आहे.

म्हणूनच जे म्हणतात की, सृष्टीची उत्पत्ती झाली, ते मूढ होत किंवा या सृष्टीचा लय होणार आहे असे जे मानतात तेही अज्ञ होत. अवकाश जसे निर्गुण आणि निराकार असते, जे या सृष्टीला जन्म देते असे वरकरणी दिसते तशीच सृष्टी ही खरे तर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु ती असल्याचा भास होतो तो काळामुळे आणि हे लक्षात घे की, खरे तर काळ मागे गेल्यासारखा फक्त भासत असतो. परंतु जर काळनामक तत्त्व आहे, तर ते येते कोठून आणि जाते कोठे, कशात लय पावते हे कोण सांगणार? आणि जर काळच मुळात भरामक आहे, तर ज्या काळामुळे सृष्टीचा किंवा मनुष्याचा जन्म झाल्यासारखे वाटते तो जन्मही खरा नव्हे किंवा मृत्यूही खरा नव्हे. त्यामुळे खर्‍या अर्थाने पाहाशील तर जन्मातच मृत्यू आहे आणि मृत्यूतच जन्म आहे. जीवन हे एका स्थिर, अविचल कालजेयी बिंदूप्रमाणे आहे.

ज्याला भरमांतील भरामक जीवन जगायचे आहे, त्याला त्याच जगण्याच्या नियमांनी वागणे इष्ट होय, हे मी तुला सांगतो. परंतु ज्याला हा भरम नष्ट करण्याची विजजगीषा आहे, जो कमबद्रियांचे व्यापार आवरू शकतो, त्याला जन्म नसतो की मृत्यू. त्याला सुख नसते की दु:ख, त्याला भावना नसतात की विचार. तोच कालातीत होतो आणि अवकाशात विलीन होतो.

हे पार्था, तुला जे वाटते आहे की, तुझ्याकडून हत्या होणार आहेत, त्या कोणाच्या? येथे मारण्यासाठीच कोणी नाही तर मरणारा कोण असेल? आणि ज्यांना मारशील असे तुला वाटते ते पूर्वीच मेलेले आहेत. आणि त्यात तुझाही समावेश आहे.

जे आज घडते आहे, ते पूर्वीही अनंत वेळी घडले आहे आणि पुढेही घडत राहणार आहे. प्रत्येक वेळी हेच संभरम, हेच शोक, याच आकांक्षा आणि त्याच त्या सुखाची कल्पना असते. पार्था हे कधी विस्मरू नकोस.

त्यामुळे या लोकानंतर अन्य कोणता लोक मिळेल आणि तेथे सुखे मिळतील की यातना, याचा विचार पार्था, फक्त अज्ञ लोक करीत असतात.

हे पार्था, येथे तुला मी समोर दिसतो आहे आणि कृष्ण नामक ही व्यती आहे, असे तू म्हणतोस. त्याचप्रमाणे येथे भीष्माचे, कर्णाचे, दुर्योधनाचे आणि अन्यांचे वास्तव्य आहे. या सर्वांपेक्षा तू स्वत:स वेगळा समजतोस. परंतु हे धनंजया, खरे पाहता सारे एकाकार आहेत. एकाच अस्रि भरमांची रूपे आहेत. मी आणि तू एकच आहोत. खरे तर कोणी शत्रू नाही की कोणी मित्र. मग एकास पुण्य मिळेल आणि दुसर्‍यास पाप असे कोणतेही कर्म अस्तित्वात नाही. एकास मोक्ष मिळेल, तर दुसर्‍यास नरक असेही काही नाही.

परंतु मनुष्य आपल्या प्रत्येक कर्मास समर्थन देण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आश्रय धरीत असतो आणि हेच त्याच्या अध:पतनाचे खरे कारण आहे. कारण जर मनुष्य हाच एक भरम आहे, तर त्या भरमाला आधार देणारे तत्त्वज्ञानही एक भरमच नाही काय?

परंतु मनुष्य नुसत्या भरमात नसतो, तर संभरमातही असतो. तो भरममय असल्याने तो स्वत:विषयीही भरम निर्माण करीत कर्तव्य आणि अकर्तव्याच्या द्वंद्वात सापडलेला असतो. अमुक एक कर्तव्य केल्याने मला सुख मिळेल की ते कर्तव्य न करण्याने सुख मिळेल असे द्वंद्व त्याला सामोरे येत असते आणि कोणीही महापुरुष असला आणि त्याने कोणतेही कर्तव्य इष्ट समजून जाणतेपणे पार पाडिले तरीही त्याला दोष देणारे ऊनिच भरमित लोक या पृथ्वीतलावर नसतीलच असे नाही.

तेव्हा जे ज्ञानी आहेत त्यांनी कर्म केले काय आणि न केले काय, अज्ञ लोकांनीही कर्म केले काय आणि न केले काय,कोणाचेही शाश्वत कल्याण किंवा शाश्वत अकल्याण होऊ शकत नाही.

तेव्हा कर्मसंबंधाने अभिमान बाळगणे सर्वथा गैर होय.

तेव्हा हे युद्धरूपी कर्म त्वां केल्याने जे मृत्यू पावणार आहेत, त्यांचे काय होईल किंवा तुझे काय होईल ह्या विचारांमध्ये काहीएक अर्थ नाही. कारण जो स्वत:च मृत आहे, अशास कोण कायमारणार?


अर्जुन म्हणाला

हे गोपाळा, तू तर मला हे अतिभयंकर तत्त्वज्ञान सांगितलेस. तू म्हणतोस त्याप्रमाणे जर सत्य असेल, तर जे मला दिसते, अनुभवास येते आणि ज्या ज्ञानाने अनुभवांचे विश्लेषणही करता येते ते सारेच असत्य होऊन जाईल. मग जर काही सारेच भरम आहेत, तर हे सारे का आणि कशासाठीहोते?

मी जन्माला आलो, हा मी तुझ्यासमोर असल्याने सत्य अनुभव आहे, तद्वतच आम्हा पांडवांना राज्याधिकारापासून वंजात करण्यासाठी धार्तराष्ट्रांनी ज्या ज्या लृप्त्या लढवल्यात याचाही अनुभव असल्याने तेही सत्य आहे. आता यद्वत तू माझ्यासमोर आहेस, आकाशात अनंत तारकामंडळ तेजाने प्रेपरत आहे, तद्वत हे सारे अनुभव घेणारा मी सुद्धा तुझ्यासमोर असल्याने हे सारे सत्य असलेचपाहिजे.

आणि जे सनातन सत्य, तूही एक मानव सांगतो आहेस, तर तुझ्या सत्यातही काहीतरी खोट असली पाहिजे.

शिवाय तू म्हणतोस तसेच खरे मानले तर मग या सृष्टीचा नियंता म्हणजे तूच तो अत्यंत करूर आणि जीवघेणे खेळ करणारा आहेस, असेच मला म्हणावे लागेल.

तेव्हा हे मधुसूदना, खरे सत्य तेवढेच मला सांग. असे खेळ माझ्याशी करून मला अधिकच दिशाहीन करू नकोस.



श्रीकृष्ण म्हणाला

हे कौंतेया, सत्य मानवास नेहमीच भयभीत करते. म्हणूनच जे सत्य प्रिय वाटते तेच तो स्वीकारतो आणि आनंदात लीन होतो. सूर्य जोवर लोभस दिसतो तोवर त्याकिडे दुरून पाहण्यास महात्म्यांनाही आनंद होतो. परंतु जेव्हा सूर्याचे लोभस तेज हे भरम असून खरा सूर्य पाहताच येत नाही हे लक्षात येते तेव्हा मात्र मनुष्याचा भरमनिरास होतो आणि सूर्याचेही भय वाटू लागते.

प्रत्येक मनुष्यमात्रास वाटते की, या सृष्टीचा रचनाकर्ता दयाळू आहे आणि त्याची मनोभावे अर्चना केली की आपल्याला सुख मिळेल. परमात्मा दयाळू नाही, हे सत्य मनुष्याच्या कधीही लक्षात येत नाही. यापेक्षा मनुष्याचे अधिक दुर्दैव ते काय असणार?

हे परंतपा, लक्षपूर्वक ऐक, मी दयाळू नाही की निर्दय नाही. मी कोणावर कृपा करीत नाही, की अवकृपा करीत नाही. जो मला भतो त्याला मी निकटतम मानेन आणि जो भणारि नाही त्याला अन्य लोक मिळेल असेही काही नाही. कारण जर भरममय का होईना सारे लोक माझ्यातच वास करीत असतात तर कोणाहीबद्दल आपरि भाव मी कसा ठेवीन?

हे पार्था, मला तूही प्रिय नाहीस, की दुर्योधनही प्रिय नाही. मला हे विश्व प्रियही नाही की अप्रियही नाही. या विश्वात काहीही त्याज्यही नाही की प्रेयही नाही. खरे तर मी याही बाजूस नाही की त्याही बाजूस नाही.

मग मला तू भलेसि की नाही हे महत्त्वाचे नाही. कारण मला भजावे की अन्य कोणास हा तुझा प्रश्न आहे आणि कधी कधी भरमही भरमाला शांती देऊ शकतो, तद्वत कोणाचीही पूजा ही कोणासही शांती देऊ शकेल; पण म्हणून माझी कृपा झाली किंवा अवकृपा झाली, असे जे समजतात, ते मूढ-अज्ञ नि होत.

तू म्हणतोस की तू जन्माला आलास आणि माझ्यासमोर आहेस म्हणून तुझे आस्तित्व सत्य आहे. धृतराष्ट्रांनी तुम्हा पांडवांना यातना दिल्या हा तुझा अनुभव तुझ्या दृष्टीने सत्य आहे.

आणि जर तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझा अनुभव सत्य असेल तर दुर्योधनाचाही जन्म झाला आहे, हे सुद्धा सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हा पांडवांचा राज्यावर अधिकार नाही, असे त्याला जे वाटते तेही सत्य आहे आणि जर तुझेही सत्य आणि त्याचेही सत्य तर मग "सत्य' विषयक अनेक प्रवाद निर्माण होऊ शकतील.

आणि दुर्योधन तेवढा दुष्ट आणि तुम्हीच धर्मशील असे ठरवायला तरी नेमका कोणता आधार आहे बरे?

हे कौंतेया, या भरमाचा पडदा तरी मी दूर करू इच्छितो. असे पाहा की, एका स्त्रीशी पाच बंधू मिळून विवाह करणारे आणि त्या स्त्रीची अनुज्ञाही न घेणारे तुम्ही, या धरतीवरील या भरामक काळातील कोणता नियम पाळलात बरे? ज्या द्रुपदाचा पूर्वी पराभव करून तो आपल्या गुरूचा शत्रू आहे, हे विदित असताही नंतर त्याच्याशी सख्य साधणारे तुम्ही पांडव कोणत्या नियमाने चालले आहात बरे?

ज्या कुंतीस, कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे हे, सत्यज्ञान असताही अद्यापही तुम्हा पांडवांस सांगत नाही, त्यामागील गूढार्थ काय बरे?

मी अशी अनेक उदाहरणे, हे पार्था तुला सांगू शकतो आणि असे असूनही आपण धर्मशील आहोत अशी वल्गना तू कशी करू शकतोस? जे अधर्माने वागत असतात त्यांनी, इतरांनी मात्र धर्माने वागले पाहिजे किंवा तुम्ही स्वत: ज्या तत्त्वास धर्म मानता त्याच धर्माने इतर सर्वांनी वागायला हवे, असे समजण्यात किंवा आगरह धरण्यात कोणता अर्थ आहे बरे?


एखाद्या धीवराने जाळे फेकले आहे, हे ज्ञात असता त्या जाळ्यात जे मासे अडकतात तेषी की धीवरषी? धर्म फार सूक्ष्म आहे. हे पार्था, तुम्ही म्हणता की जुगार हा अन्यायी होता आणि त्यात तुमचे राज्य हिरावले गेले. जुगार अन्यायी होता तर तुम्ही स्वतंत्र राजे असल्याने, जसे आज युद्धोत्सुक आहात, तसेच तेव्हाच युद्ध करण्याचा मार्ग तुमच्याकडे खुला होता. परंतु तुम्ही तेव्हा युद्ध टाळलेत आणि द्यूत न्याय्य होते हे अप्रत्यक्षपणे मान्य केलेत. मग दुर्योधनास त्याचा दोष कसा लागतो? शिवाय आपली या सृष्टीच्या कणावरही, अगदी स्वत:च्या देहावरही, सत्ता नाही हे मान्य असतानाही स्वत:स आणि पत्नीस डावावर कसे लाविलेत? जे कर्म तुम्ही स्वत:च्या इच्छेने केलेत, स्वत:स व पत्नीस डावावर लावण्याचा अधिकार नाही हे माहीत असताही स्वत:स व पत्नीस डावावर लाविलेत त्याबद्दल अन्य कोणाकडेही कोणता दोष येतो बरे?

आणि एवढे असताही आज तुम्ही पांडव युद्धास तयार झाला आहात. आपण तेवढे धर्मशील आहोत असे म्हणत आहात. उद्या युद्ध सुरू होणार आहे, हेही तुला ज्ञात आहे आणि तरीही युद्धसंन्यासाबाबत तू बोलतो आहेस. म्हणजे तुझा संकल्पही दृढ नाही, हेच यातून प्रतीत होत नाही काय?

तेव्हा तुझा संकल्प सत्य नाही. हे पांडवा, म्हणूनच तूही सत्य नाहीस आणि तू जेवढा सत्य नाहीस हे सत्य आहे तद्वतच आज आणि उद्या हे अंतरही सत्य नाही. युद्धही सत्य नाही आणि ज्यांच्याशी तू युद्ध करेन म्हणतोस किंवा ज्यांच्याशी युद्ध करणार आहेस, असे म्हणतोस तेही सत्य नाही. कारण ज्यास शाश्वत धर्म म्हणतात, असा धर्म मानवी जगतात कधीही अस्तित्वात नव्हता. मुंग्यांना वारुळ मेरुपर्वत वाटतो आणि छोटा तलाव महासागर वाटतो. त्याचप्रमाणे मनुष्याचे आहे. परंतु हे विश्व अतिविराट असूनही शून्य आहे, याचे ज्ञान त्यास कधी होत नाही.

हे अर्जुना, तू संभरमित आहेस, कारण तुझा संकल्प संभरमित आहे. तुझे अस्तित्व हे सुद्धा संभरमित आहे. तू म्हणतोस की नभोमंडपीच्या तारका हे सत्य आहे. परंतु तेही सत्य नाही. हे कौंतेया, काल हा केवढा भरामक आहे, हे तुला माहीत नाही. तू ज्या तारकांना शा या क्षणी पाहात आहेस, तशाच त्या या क्षणी नाहीत आणि याक्षणी त्या कशा आहेत, हे ज्ञात होण्याचे मानवाकडे कोणतेही साधन नाही, हे तुला माहीत नाही.

हे परंतपा, जेव्हा तू आकाशाकडे पाहतोस तेव्हा तो आकाशाचा वर्तमान नसतो, तर तू अतिदूरच्या भूतकालाकडे पाहात असतोस. कदाजात या क्षणी अनेक तारका पतन पावलेल्या असतील तर त्यांची जागा नव्या तारकांनी घेतलेली असेल.

आणि भवितव्याकडे पाहण्याचे तर मनुष्याकडे कोणतेही साधन नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भरामक आहेत. कारण खरे तर कोणी द्रष्टा नाही आणि कोणतेही दृश्य नाही. परन्तु कालनामक राशीमुळे द्रष्टा आणि दृश्य हा विभेद निर्माण होतो.

तेव्हा मी तुझ्यासमोर उभा आहे हे सुद्धा खरे नाही, कारण "मी' म्हणजे नेमके काय याचे ज्ञानही तुला नाही. मी तुला कधी द्वारकाधीश वाटतो, तर कधी परमात्मा. मी कधी सखा वाटतो, तर कधी शत्रू. "मी' म्हणजे काय याचे तुझे ज्ञान जर अपूर्ण असेल तर मी "मी' आहे हे तुझे ज्ञानही भरामक होय.

आणि तू तुझ्या जीवनात जे अनुभव घेतलेस आणि तो जो तू माझ्यासमोर उभा आहेस असे जे काही तू म्हणालास, तेही सत्य नाही. कारण तुझे अनुभव जे तुला तुझे वाटतात आणि त्या अनुभवांचा अन्वयार्थ जो तू काढला आहेस, तोही सत्य नाही. तुझा अनुभव तू तुझ्या परिप्रेक्ष्यातून पाहतो आहेस म्हणून तू शाश्वत अर्थाने माझ्यासमोर उभा आहेस असेही नाही.

नदीमध्ये त्याच पाण्यात हात घालता येत नाही. तो हातही तोच नसतो. आणि त्याहीपुढे जाऊन खरे तर पाणीही नसते आणि हातही नसतो.

हे पार्था, मनुष्यास कधीही ज्ञान होत नाही. ज्ञानाचा समज होत असतो. आणि समज सिसेलितात तसतसे मानवाचे ज्ञानहीलत असते आणि जे परिवर्तनीय आहे आणि परिवर्तनीय म्हणून काळासह आहे ते ज्ञान हे सत्य ज्ञान असू शकत नाही.

कारण पार्था, असे ज्ञानीनि म्हणतात की चराचर सृष्टी भूताकडून भविष्याकडे जात असते आणि काळ मात्र भविष्यातून येवून भूतकाळात विलीन होत असतो. त्यामुळे मनुष्य जगत असतो असे म्हणणेही तर्कदुष्ट आहे. खरे तर तो भविष्यातून वर्तमानात येणार्‍या काळात जगत असतो आणि काळ मात्र भूतकाळात विलीन होत असतो. आणि मनुष्य मात्र भूतकाळातून वर्तमानात आणि नंतर भविष्यकाळात प्रवेश करीत असतो.

असा परस्पराजविरोध प्रवाह, आणि असा प्रवाह की जो मनुष्यास जिवंत असल्याचे समाधान देतो तो काळ, एवढा भरामक आहे.

आणि याच काळाची गंमत अशी की, वर्तमान क्षणिक असतो. भूतकाळ सीमित असतो आणि भविष्यकाळ प्रदीर्घ असतो.

आणि तरीही मनुष्यास वाटते की तो धर्मशील आहे आणि त्याला मोक्षाचा अधिकार आहे.

परंतु काळ हाच भरामक असल्याने कोणासही इतिहास नाही आणि कोणासही भविष्यकाळ नाही. मग वर्तमानाची तर गोष्टच सोड. मग मोक्ष कोठे आहे?

आणि अनुभवास येते ते सारे सत्यच असे विधानही काही केल्या करता येत नाही. सूर्यराज उगवतो असे सत्य आपल्याला अनुभवयाला मिळते. परंतु सूर्य उगवत नसून पृथ्वीच स्वत:भोवती फिरत असल्याने सूर्य स्थिर असूनही चर वाटतो असे असूच शकणार नाही काय?

तेव्हा तुला माझा अनुभव येतो आहे हे विधानही जर सत्य नसेल तर तुला कौरवांच्या संदर्भात काय अनुभव आला तोही असत्य असू शकेल. किंवा कौरवांना तुमच्या संदर्भात जो अनुभव आला तोही असत्य असू शकेल.

तेव्हा जरन्ही बाजू सत्य नाहीत तर सत्याचा जय होईल हे विधानही असत्य आहे.

परंतु तुला तुझे भरम आहेत आणि कौरवांना त्यांचे भरम आहेत. या युद्धात पराजित झाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतीलच असेही नाही किंवा जय मिळाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतील असेही नाही. आणि जो नंतर याचा इतिहास सांगितला जाईल तोही सत्य असेलच असेही नाही.

तेव्हा एवढ्या असत्य इतिहासात आणि भरामक वर्तमानात आपण जगत असताना आणि आपणच उद्या एक नवा असत्य इतिहास घडवीत असताना धर्म आणि सत्याच्या वल्गना करण्यात अर्थ तरी काय बरे?

आपण नेहमीच भरामक इतिहासात जगत असतो आणि भरामक इतिहासाला जन्म देत असतो.

पण असे असूनही जी सत्यसृष्टी या कालापासून किंवा आपल्या तथाकथित अनुभवांपासून अलिप्त असल्याने, आणि जी स्वत:तच शून्य असल्याने ज्याला आपण इतिहास म्हणतो तो इतिहास नसून आपल्या साजेयस्कर स्मृतींचा एक हिस्सा असतो. आणि या स्मृतीही खर्‍या नसतात कारण जो स्मृतींचा अर्थ देतात तो कधी खरा नसतो. आणि इतिहास कधीही वर्तमानातलता येत नाही. आणि इतिहासाचा अन्वयार्थ मग स्वाभाविकपणेच असत्य असतो. कारण जे नसतेच ते प्रदीर्घ वाटत असताही अल्प असते. हे सारेच जसे नाही तसे वाटत असल्याने तो एक भरमच होय.

तेव्हा हे पार्था, तू जविंत आहेस असे तुला वाटते परंतु तू जविंत नाहीस, तसेच हे यच्चयावत विश्वही जविंत नाही. असे असताही तुला तू जविंत मानतोस आणि मलाही तू तुझ्या परिप्रेक्ष्यात का होईना अनुभवतो आहेस ते काळामुळे आणि हा काळ भूतकाळाकडून भविष्याकडे जात नसून भविष्याकडून भूतकाळाकडे जात असतो. आणि हा विरोधाभास असल्याने तुझेही अनुभव विरोधाभासी आहेत हे निश्चित समजून अस.

आणि या भरमात का होईना, पण एक जीवन आहे. ते जीवन आकलनात येत नसताही ते आकलनात आले आहे असे वाटते, तोही एक भरम होय. आणि जो आकलन करीत असतो, तो आकलनकर्ता यथार्थ आकलन करून आपले वर्तन करेल असे काही निश्चयाने सांगता येत नाही.

तेव्हा आकलन आणि आकलनकर्ता यांतही विरोधाभास आहे असे दिसते तर मग आकलनही खरे नाही आणि आकलनकर्ताही खरा नाही.

कारण घटना जर एकच असेल तर तिचे आकलन भिन्न कसे हा प्रश्न निर्माण होईल आणि आकलन भिन्न असेल तर घटना ही पुन्हा निरपवाद आणि अगम्य होऊन जाईल.

तेव्हा हे पार्था, मायेस दूर कर आणि माझ्याप्रमाणेच समजावून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुझे आकलन आणि माझे आकलन यात फरक पडणार आहेच आणि जर असेच असेल तर ज्ञानाच्या आणि परमार्थाच्या बाता मारण्यात अर्थ तरी काय बरे?

उद्या युद्ध सुरू होणार आहे. तू युद्ध करणार की नाही हा खरा प्रश्न नाही; पण संन्यास घेऊनही तुझ्या मनातील युद्ध संपणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

आणि युद्ध मनात असो की प्रत्यक्षात, तेही कर्मच आहे. आणि कर्म म्हटले की त्याला फळ हे अटळपणे जाकटलेले असते. मग ते भरामक का होईना आणि भरमातच जगणार्‍या मानवास कर्मफलत्वे सुख मिळणे किंवा दु:ख होणे हेही अटळच आहे.

तेव्हा तुला मानसिक युद्ध करायचे की प्रत्यक्ष याचा निर्णय, हे पार्था घे. असा हताश आणि निराश होऊ नकोस.

कारण सत्य फार दूर आहे.

पण तुला जे सत्य वाटते, त्यासाठी का होईना शोक सोड.

एवढे बोलून श्रीकृष्ण स्वस्थ उभे राहिले. पदचरणांशी बसलेला अर्जुन अश्रू ढाळीत होता. आपला हा सखा आज एवढा परका का झाला हेच त्याला कळत नव्हते.

त्याने श्रीकृष्णाचा चरणस्पर्श केला आणि म्हणाला,

हे श्रीकृष्णा, दयाघना, तू आज केवळ बाजूललीस म्हणून माझ्या आत्म्याच्या एवढ्या चिंध्या केल्या आहेस. या जगात काहीही, अगदी तू सुद्धा स्थिर नाहीस याचा आता मला साक्षात्कार झाला आहे. असो, मी योग्य वाटेल तसे करेन.

आणि एवढे बोलून, पाठ वळवून, कौंतेय अर्जुन निघून गेला. परमात्मस्वरूप श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि आपल्या शिबिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

Friday, November 4, 2011

शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?

ऐतिहासिक महामानवांना दैवी अवतार वा देवाचाच दर्जा देण्याचा भारतीय वैदिक उध्योग पुरातन आहे. राम-क्रुष्ण या मानवी व्यक्तिमत्वांना अवताराचा दर्जा देवुन बराच काळ उलटला आहे. बुद्ध तर विष्णुचा दहावा अवतार म्हणुन पुराणकारांनी प्रसिद्धच करुन ठेवला. महावीराला मात्र थोडे दुरच सारले...कारण त्याने निर्माण केलेल्या धर्माचा यांना फटका विशेष बसला नसावा. गत सहस्त्रकात शिवाजी महाराज झाले. त्यांना आधी शिवाचा अवतार व नंतर आधुनिक शंकराचार्यांनी विष्णुचा अवतार ठरवण्याचे धोरण राबवले. राजाराम महाराजांनीच पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर समुद्रतटकिनारील किल्ल्यात बनवले असे सांगण्यात येते...पण त्या मंदिरातील शिवमुर्ती श्मश्रु रहित आहे आणि आम्ही दाढीखेरीज शिवाजी महाराजांची कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे जशी आम्ही दाढीखेरीज शिवाजीमहाराजांची कल्पना करु शकत नाही तसेच जटाविरहीत पण स्म्श्रुधारी शिवाचीही कल्पना करु शकत नाही. त्यामुळे राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर हे शिवाचे होते कि शिवाजीमहाराजांचे हा प्रश्न उपस्थित होतो.

दै. सकाळ या दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. शिर्षक आहे "फ्रेंच अभ्यासक उभारतोय शिवस्रुष्टी". या बातमीत म्हटलेय कि फ्रांसिस गोतिये नामक फ़्रेंच अभ्यासक शिवैतिहासाने एवढअ प्रभावित झालाय कि त्याने लोहगांव येथे पाच एकरांत शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले असुन पुढील टप्प्यात त्यांच्या पराक्रमांची माहिते देणारे संग्रहालय उभारायला सुरुवात केली आहे. या पाच एकरांच्या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे, दुर्मिळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे.

खरे तर कोणालाही तसा आनंद वाटायला हरकत नाही कि एक परकीय माणुस शिवस्रुष्टी उभारत आहे. त्याला वैदिकत्वाची जोड मिळत असल्याने तर तो आनंद काही समाजघटकांत अद्वितीय असेल यात शंका नाही.

पण माझे प्रश्न आहेत. या शिवमंदिरात शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणा-या आईभवानीचे पहिले ब्रोंझ शिल्प उभारले आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला तो दैवी शक्तीने याचे हे शिल्प म्हनजे प्रतीक आहे आणि जो फ्रांसिस गोतिये ज्या संस्क्रुतीतुन आला आहे त्या सआंस्क्रुतीत हे बसत नाही हे उघड आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला असेल तो त्यांच्या स्वकर्तुत्वाने नव्हे तर दैवी शक्तीने असे सुचवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि त्याचे कवतुक करावे अशी दुर्भावना सुचावी हे आमचे दुर्दैव आहे.

गोतिये यांना एवढेच शिवप्रेम आहे तर हीच स्रुष्टी त्त्यांनी त्यांच्या मायभुमीत निर्माण करायला हवी होती. कधीकाळी योग आला तर आम्हीही फ्रांसला भेट देवुन त्यांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचे आम्ही प्रवासवर्णनात कौतुक केले असते.... पण येथे, याच पुण्यात ज्या पुण्यात दादोजीवरुन नुकताच वाद झाला त्याच पुण्यात आता शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे काय कारण? शिवाजीमहाराजांचे अवमुल्यन करणारे शिल्प वा स्रुष्टी सहन केली जावु शकत नाही.

पण येथील मुठभर वर्गाला पाश्चात्य लोकांबद्दल अधिकच प्रेम असते. येथे जीवनभर शिवप्रेमाबाबत जागे असतात ते निंद्य ठरवले जातात. जे शिवाजी महाराजांच्या आरत्या ओवाळण्यात मागे पडत नाही असे दाखवतात त्यांचे शिवप्रेम हे नेहमीच बेगडी असते. यांना शिवाजी महाराज समजलेलेच नाहीत...त्याच्याच काळात समजले नाहीत तर आता कोठुन?

कोण आहे हा गोतिये? काय अभ्यास आहे याचा शिवाजीचा? दंतकथांना आधार मानत भवानी तलवार देते हे शिल्प उभारायचा त्याचा हेतु काय आहे? कोण आहे त्याच्या मागे? कोणी दिली या महामानवाला लोहगांवला जागा? काय संबंध आहे शिवाजी महाराजांचा वेदांशी? फक्त राज्याभिषेकापुरता...आणि तत्कालीन सामाजिक गरज म्हणुन...एरवी...त्यांनी कोणती वैदिक आद्न्या पार पाडली? आणि हा गोतिये म्हणे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारत त्या शिवस्रुष्टीत वेदांचे माहात्म्य सांगनार आहे...

माझे स्पष्ट मत असे आहे कि शिवाजी अपर्हुत करण्याचा हा नवा डाव आहे. लेनमार्फत जे उरले ते या गोतियेमार्फत पुर्ण करायचा निंद्य हेतु आहे. यांनी शिवाजी वैदिक बनवण्याचा डाव घातला, तसा सतत प्रयत्न केला आणि आता एका पाश्चात्याचे (जो मुळात कोण आहे, त्याची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची लायकी सोडता त्याचा हेतु काय आहे...हे न कळता. याने कोनत्या विद्यापीठात वेदांचे आणि शिवकालीन इतिहासाचे अध्ययन केले?) पण एक पाश्चत्य शिवमंदिर उभारतो या फुका अभिमानापोटी कवतुकाचे फटाके उडवणारे सावध होणार नाहीत याची मला जाणीव आहे. लेनने जे केले त्याची ही पुढची पायरी आहे. जमले तर बदनाम करा...नाहीच जमले तर देवत्व देवुन मोकळे व्हा आणि विसर्जित करुन टाका...गणपतीला नाही का दहाव्या दिवशी पाण्यात टाकुन देत?

हा गोतिये कोण आहे हे प्रथम पहायला हवे त्याखेरीज त्याच्या ख-या प्रेरणा लक्षात येणार नाहीत.
हा फ्रांसिस गोतिये नसुन फ्रन्कोइस गोतिये आहे. हा माणुस मुळचा फ्रेंच. भारतात तो गेली तो आता नुसता भारतीय नाही तर स्वत:ला हिंदु समजतो. त्याचे वडील एक चित्रपट दिग्दर्शक होते. हिंदु धर्माच्या ओढीपोटी तो भारतात आला. पोंडिचेरी येथील आश्रमात रहत असतांना ध्यानधारणेचे धडे गिरवत तो पत्रकारिताही करु लागला. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली असुन "अराईज ओ इंडिया" हे त्याचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याची विस्त्रुत माहिती (व त्याचे लेखही)http://www.francoisgautier.com या वेबसाइटवर आहे. त्यातील त्याचे लेख वाचले कि त्याची विचारधारा कळते. तो कट्टर हिंदुत्ववादी असुन दलित व इस्लामविरोधात आहे. महात्मा गांधींबद्दल संघाला असेल नसेल तेवढा द्वेष याच्या मनात भरलेला आहे हे स्पष्ट होते. याची स्वत:ची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची योग्यता नाही, म्हणजे त्याच्या मागे कोणत्या फ्यसिस्ट शक्ती उभ्या आहेत हे शोधणे क्रमप्राप्त ठरते.

बहुजनीय महात्म्यांना असे नाही जमत तर तसे संपवा असा नवा उद्योग गेली अनेक शतके सुरु आहे. लेनमार्फत शिवाजी महाराजांचे पित्रुत्व हिरावण्याचा घाट घातला गेला होता...आता त्यांचे कर्तुत्व हिरावण्याचा घाट घालण्यात आला आहे ही अत्यंत नेषेधार्ह घटना आहे. शिवाजी महाराज पुज्य आहेत त्याचा असा अर्थ नाही कि त्यांना देवत्व देत कर्मकांडांच्या बंदिस्ततेत अडकवावे. हा अधिकार यांना कोणी दिला? या मागे कोण आहेत? ते मानव होते...त्यांच्यात महत्ता होती आणि त्यांचे अनुकरण होवु शकते. एकदा देवत्व दिले कि शिवाजी महाराजांच्या एकाही पराक्रमाला खरा अर्थ रहात नाही, कारण ती दैवी घटना बनते. मानवी प्रयत्नांचे खरे महात्म्य संपते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे या गोतियेक्रुत मंदिराचा, शिवाजीमहाराजांना देवत्व देण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणुन पाडला पाहिजे...नाहीतर मंदिर होईल, तेथे पुजारी...बडवे रुजु होतील, पुजा...नवस सायास सुरु होतील...अकराव्या अवतारात त्यांची गणना करुन टाकत नवे पुराण लिहिले जाईल...

माणसाची मानवी आदर्शे घेत परिस्थितीशी झुंझण्याची प्रेरणाच नष्ट होईल!

शिवाजीप्रेमींना तरी हे नक्कीच समजावे...आणि हा गोतिये... त्याचा आणि त्याच्या सर्वच हितचिंतकांचा निषेध करावा ही अपेक्षा...!

------संजय सोनवणी

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...