Monday, October 29, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (४)



दुष्काळ आणि इस्लामी सत्ता...


  अर्थव्यवस्था हा कोणत्याही समाजाचा/राष्ट्राचा मुलभूत कणा असते. एक वेळ धर्माशिवाय मनुष्य जगू शकतो...अर्थाशिवाय नाही. अर्थाची निर्मिती होते ती बहुविध उत्पादनातून व त्याच्या व्यापारातून. उत्पादने व व्यापाराला अनेक सेवांचीही गरज असते. उदा रक्षण सेवा, वाहतुक सेवा. वाहतुक ही जलमार्गे असू शकते अथवा खूष्कीच्या. मागणी आणि पुरवठा नेहमीच अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळत असतात. तेजी-मंदीची चक्रे कोणत्याही अर्थव्यवस्थेत अपरिहार्य अशेच असतात. असे असले तरी मागणी वाढवणे, वाढत्या मागणीसाठी पुरवठा वाढवणे ही बाजु उत्पादक सांभाळत असतात. राजव्यवस्थेचे कार्य असते ते म्हणजे कराच्या मोबदल्यात उत्पादक/सेवा घटकांना पुरेसे संरक्षण देणे, व्यापार उदीम वाढेल अशी धोरणे राबवणे व उत्तेजन देणे. सरासरी दहाव्या शतकापर्यंत पश्चिमोत्तर टापु वगळला तर भारतीय राजवटीही तुलनेने स्थिर अशाच होत्या. राजवट बदलली तरी अर्थव्यवस्थेला धक्का लावायचा विचार सत्ताधारी करत नसत. कौटीलीय अर्थशास्त्रात राजाची अर्थव्यवस्थेबद्दलची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. राजसत्ताही अनेक उद्योगांच्या मालक असत. उदा. खाणव्यवसायावर बव्हंशी राजसत्तांचीच मालकी असे.



या काळात व्यापाराच्या व्याप्तीमुळे शहरोशहरी व्यापारी व उत्पादकांच्या श्रेण्या असत. या श्रेण्या साधारणपणे आजच्या व्यवसायकेंद्रीत संघटना व पतपेढ्या असतात त्या स्वरुपाच्या होत्या. या श्रेण्यांना राजदरबारी महत्व असे. कोनताही व्यवसायावर परिणाम करणारा निर्णय घेतांना या श्रेण्यांचे मत विचारात घेतले जात असे. मूक्त स्पर्धा, वाढता नफा यामुळे उत्पादनेही वाढती होती. त्यामुळे उत्पादनपद्धतीही सर्वस्वी वेगळी होती. बौद्ध जातकांमद्धे बुरुड, कुंभार, लोहार, विणकर ई. उत्पादक घटकांनी गांवेच्या गांवे वसवली असल्याचे निर्देश मिळतात. याचाच अर्थ असा कि उत्पादनांचे केंद्रीकरण झाले असून व्यापा-यांमार्फत उत्पादित माल अन्यत्र वितरीत केला जात असे. स्वयंपुर्ण ग्रामरचना तेंव्हा अस्तित्वात आलेली नव्हती. अर्थातच जन्माधारीत जातीव्यवस्थाही अस्तित्वात आलेली नव्हती, कारण वाढते उत्पादन करण्यासाठी आवश्यक भासणारी कुशल मनुष्यबळाची गरज.



अर्थव्यवस्था प्रवाही असते, वर्धिष्णु असते तेंव्हाचे सामाजिक नियमही लवचीक असतात याचा अनुभव जग पुरातन काळापासून घेत आलेले आहे. याचा अर्थ वर्गव्यवस्था नसते असे नाही पण वर्गबदल हा सहज व स्वाभाविक होत जातो. या काळात धर्मसंस्था ही समाजाच्या पारलौकीक गरजांची पुर्ती करत असली तरी ती व्यवस्था केंद्रीभुत नसते. त्यामुळेच कि काय राजे-सम्राटही सहिष्णु असत. म्हणजे ते ब्राह्मणांना दान-दक्षीणा देत तसेच बौद्ध विहारांनाही आर्थिक मदत करत. समाजही या तत्वाला अपवाद नव्हता. उदा. अनेक बौद्ध लेण्यांना देणग्या देणा-यांत विविध व्यवसायी...कुंभार, लोहार ते व्यापारीही दिसतात ते याचमुळे. ब्राह्मणही स्मृतींनी त्याज्ज्य ठरवलेल्या व्यवसायांत पडतांना दिसतात. सातवाहन काळात अनेक ब्राह्मण सैनिकी, कृषीकर्म ते व्यापार-उदीमात पडलेले दिसतात. धर्मसत्तेपेक्षा इहसत्ता महत्वाची असल्याने जेथे अर्थार्जन अधिक होईल त्या व्यवसायात पडने हा मानवी स्वभाव आहे. आणि भारतात तसे झालेलेही आहे.



म्हणजेच कोणी कोणता उद्योग-व्यवसाय करावा यावरही बंधन नव्हते असे आपल्याला दिसते. परंतू अकराव्या शतकापासून एकुणातील अर्थव्यवस्था संकटात सापडु लागलेली दिसते. सन १०३३, १०4३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमानावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...ते पुरते ठप्प झाले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते. थोडक्यात द्वितीय महायुद्धानंतर जशी एक महामंदी आली होती त्यापेक्षाही भिषण अशी महामंदी भारतात या दुष्काळांनी आणली.



दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुइंसपाट करणा-या या दुष्काळाने निर्मानकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल!



इस्लामी आपत्ती!



इस्लामी स्वा-या भारतावर सातव्या शतकापासुनच सुरु झाल्या होत्या. मोहम्मद बिन कासीमने सन ७२२ मद्धे राजा दाहीरचा पराभव केला व सिंध-मुलतानवर कब्जा केला. दहाव्या शतकानंतर गझनीच्या मोहमदापासुन भारतावरील हल्ले वाढु लागले. उत्तर भारताला याचा अर्थातच मोठा झटका बसला. तेराव्या शतकाच्या आरंभीच (१२०६) इस्लामी सत्ता गुलाम घराण्याच्या निमित्ताने दिल्लीत स्थिरस्थावर झाली. पुढे इस्लामी सत्तेचा विस्तार दख्खनेतही होवू लागला. देवगिरीची यादव सत्ता ते विजयनगरचे साम्राज्य इस्लामी घशात गेले. थोदक्यात हिंदू सत्ता सर्वकशरित्या बुडवल्या गेल्या व इस्लामी शरिया राजवटी सुरु झाल्या.



हा सत्तापालट अर्थातच रक्तरंजीत होता. भारतीय समाजजीवनावर व एकुणातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभाविक होते. अरबी व्यापा-यांनी सातव्या शतकापासुनच समुद्री व्यापार आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली होती. इस्लामी सत्ता जसजशा जगभर पसरु लागल्या तसतशा त्या त्या देशातील इस्लामी सत्तांनी व्यापाराच्या आर्थिक दिशा बदलायला सुरुवात केली. एका अर्थाने मोनोपलीकडे ही वाटचाल सुरु होती. नवव्या-दहाव्या शतकापर्यंतचे भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थान डळमळीत व्हायला लागले होते. अरबांनी भारतीय बंदरांच्या क्षेत्रात स्थायिक व्हायला सुरुवात केली होती. एकट्या चेऊलला दहा हजारापेक्षा अधिक मुस्लिमांनी तळ ठोकलेला होता. भड्पोच, मलबारची स्थितीही वेगळी नव्हती. अन्य देशांत, जेथे भारतीय वस्तुंची बाजारपेठ होती तेथेही इस्लामी सत्ता स्थापन झाल्याने इस्लामी व्यापा-यांना सर्वत्र एकच व्यापार व कायदेपद्धत अंगिकारता आली होती. अरबी समुद्री चाचे भारतीय जहाजांवर हल्ले चढवत बेसुमार लुटालुटही करू लागले होते. कायदा आणि धर्म हे एकच बनल्याने इस्लामी व्यापा-यांना एक सुलभता मिळाली. शेर शहा सुरीने इस्लामी व्यापा-यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर रद्द केले. देशांतर्गत महामार्गही बांधायला सुरुवात केली. हिंदू व्यापा-यांना करात सवलती नव्हत्या. एका अर्थाने संपुर्ण व्यापार मुस्लिमांच्या हाती गेला.



हिंदू सिंधुबंदी प्रकरणाने मागे पडले हा जो आरोप होतो त्यात विशेष तथ्य नाही कारण विदेशांशीचा संबंध ज्या व्यापारासाठी येत होता तोच मुलात हिंदुंच्या हाती राहिला नाही. सत्ता सर्वस्वी त्यांच्या हाती गेल्याने देशी उत्पादकांना मिळणारा भावही कमी होत गेला. एका अर्थाने उत्पादक निर्माणकर्ते हे शोषित बनत गेले. ती परंपरा इंग्रजांचे राज्य आल्यानंतरही कायम राहिली...नव्हे अधिक भिषण बनली.



कोणतीही व्यवस्था आपोआप निर्माण होत नसते. दुष्काळ आणि इस्लामी सत्तेच्या कचाट्यात सापडलेल्या भारतीय निर्मानकर्त्यांच्या हाती मग नेमके काय उरले होते? त्याचा जाती जन्माधारीत होण्याशी नेमका काय संबंध होता हे आपल्याला तपासून पहायला हवे.



१. मागणीतील घटीमुळे उत्पादन मर्यादित होत जाणे स्वाभाविक असते. उत्पादन मर्यादित झाले कि आहे त्या व्यवसायात अधिकची स्पर्धा नको म्हणुन त्यांत प्रवेश बंद किंवा अत्यंत अवघड केला जात असतो.

२. राष्ट्रीय व विदेशी गरजाधारीत अतिरिक्त उत्पादन करण्यापेक्षा स्थानिक गरजा पूर्ण करता येईल एवढेच उत्पादन करण्यावर भर असतो.

३. यामुळे उत्पादन संस्थांचे विकेंद्रीकरण होत ते पार ग्रामनिहाय बनत जाते. एक ग्राम हे एका व्यावसायिकाचे एकार्थाने कायमचे आश्रयस्थान बनून जाते. गांवात स्पर्धक नको असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असल्याने त्याला अनुसरुन काही सामाजिक संकेत बनू लागतात व राज्यव्यवस्थेचे प्रतिनिधी त्याचे नियमन करु लागतात. थोडक्यात नवी पुनर्रचित व्यवस्था ही जीवनसंघर्षातील एक अपरिहार्य गरज बनुन जाते.

४. नवीन शोधांची गरजच संपल्याने आहे त्याच आर्थिक परिप्रेक्षात आहे तीच स्थिती टिकवण्याची गरज भासते व त्यातुनच समाज मानसशास्त्र आकार घेवू लागते. नवीन लोकांना आपल्या व्यवसायात प्रवेश देणे बंद केले जाते. ज्याने त्याने आपापला पारंपारिक व्यवसाय करण्याचा अपरिहार्य संकेत निर्माण होतो.

५. हे नियमन करण्यासाठी प्रत्येक व्यवसायाच्या पंचायती बनवल्या जातात. नीति-नियमांची फेराअखणी होते व त्यांची एक बंदिस्त चौकट बनत जाते.

६. आता व्यवसाय ही अपरिवर्तनीय "जात" बनत जाते कारण व्यवसायबदल जवळपास असंभाव्य झालेला असतो. पंचायतीने जातीबाह्य केले तर ती भयंकर शिक्षा ठरते कारण अन्य व्यवसायांत प्रवेश अशक्य असतो. त्यामुळे सामाजिक मानसिकता ही जातीला धरुन राहण्याची बनत जाते. किंबहूना जात हीच सुरक्षेचे एक कवच बनून जाते.

७. स्थानिक वा केंद्रवर्ती राजसत्तांना या व्यवस्थेला मान्यता देण्याखेरीज पर्याय नसतो. किंबहुना परकीय सत्तांना असे पर्याय देणे गैरसोयीचे व तोट्याचे वाटत असल्याने स्वधर्मियांचे हित मुख्य बनत वैधर्मीय अधिक कसे पिचत जातील हेच त्यांचे प्रामुख्याने ध्येय बनते. कररचनाही तशाच कठोर बनत जातात.

८. वर्गीय व्यवस्था व त्यातील लवचिकता पूर्णपणे संपुष्टात येवून ती जन्माधारीत जातीव्यवस्थेत बदलत कठोर होवू लागते व त्याची परिणती ती अन्याय्य होण्यात होते.



जगात कोठेही जातीव्यवस्था आढळत नाही याचे कारण भारतियांवर जी गंडांतरे कोसळली तशी अन्य देशांत कोसलली नाही. भारतात इस्लामने जवळ्पाचशे वर्ष राज्य केले असले तरी संपुर्ण भारत इस्लाममद्धे त्यांना बदलवता आला नाही. समजा अन्य देश जसे इस्लामी आक्रमनासमोर कोलमडुन संपुर्ण इस्लामी बनले तसा भारतही बनला असता तर जन्माधारीत जातीव्यवस्थेची निर्मिती झाली असती काय? सततचे दुष्काळ व शोषक सत्ता यांच्या दडपनाखाली मुळची भारतीय व्यवस्था कोलमडली नसती तर मुळात या व्यवस्थेची गरज भासली असती काय?



या प्रश्नांची उत्तरे नाही असेच आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला लागते कि कोनतीही व्यवस्था बनते ती तेंव्हाच जेंव्हा ती समाजाचीच अपरिहार्य गरज असते. कोणी सांगितली म्हणुन ती सर्वांनी ऐकली असे कधीही होत नसते.



असे असले तरी आपल्या धर्माची या बाबत नेमकी काय भुमिका होती? राजसत्तांची काय भुमिका होती? जातेव्यवस्था बनली पण जातीश्रेष्ठतावाद कोठुन निर्माण झाला यावरही आपल्याला चिंतन करायचे आहे...ते पुढील भागात.



(क्रमश:)



Saturday, October 27, 2012

वाचनसंस्कृतीचे मारेकरी कोण? (2)

प्रकाशकही आता अपवादानेच नव्याचा शोध घेणारे उरले आहेत. बव्हंशी भर आधीच प्रसिद्ध असलेल्यांचे अथवा अनुवादित साहित्य प्रसिद्ध करायचे यावरच असतो. यात अजून एक भयंकर प्रकार वाढीला लागलेला आहे. अनेक प्रकाशक कोणत्याही लेखकाची पुस्तके छापतात व ती चक्क ८५ ते ९०% या कमिशनने काही मोजक्या वितरकांना रोखीत विकून मोकळे होतात. शंभर रुपये दर्शनी किंमतीचे पुस्तक दहा ते पंधरा रुपयांत मिळते. हच वितरक पुढे हीच पुस्तके साठ-सत्तर टक्के कमिशनवर ग्रंथालयांना देतात.

थांबा...तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? शंभर रुपयाचे पुस्तक दहा ते पंधरा रुपयांत? कसे शक्य आहे? मित्रहो, हा साहित्य संस्कृतीतील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्याची माहिती तुम्हाला असने आवश्यक आहे.

हे प्रकाशक ज्यांची पुस्तके काढतात त्यांची नांवे आपण कधी ऐकलेलीही नसतात. अनेकदा कोपिराइट गेलेली पुस्तके प्रकाशित केली जातात. सध्या साने गुरुजी छापायची लाट अनेक प्रकाशकांत आलेली आहे.

अत्यंत कमी दर्जाचा कागद, भिकार छपाई व तसेच मुखपृष्ठ हे झाले उत्पादन. पानाला एक रुपया ते सव्वा रुपया या दराने किंमत छापायची. एकुण खर्च आठ-दहा रुपयांत बसवायचा. मग जमते ना दहा-पंधरा रुपयात ठोक विक्री करणे? एक आवृत्ती अशी एका दिवसात संपते. एका पुस्तकाची आवृत्ती हजाराची धरली तर किमान दोन ते चार हजार रुपये सरासरी एका पुस्तकामागे मिळतात. मग अशी पंचवीस पुस्तके एकाच वेळी काढली कि पन्नासेक हजार रुपये नफाच कि! पुढचा सेट काढायला प्रकाशक मोकळा. आजमितीला असे जवळपास साठ सत्तर तरी प्रकाशक मराठीत आहेत.

मग या पुस्तकांचे पुढे काय होते? लाख मोलाचा प्रश्न!

अर्थात खाजगी ग्राहक अशा पुस्तकांना अपवादानेच...आणि त्याची अपेक्षाही नाही. या पुस्तकांचा मुख्य ग्राहक म्हणजे सरकारी वाचनालये. या वाचनालयांना अ,ब,क,ड श्रेणीनुसार शासन भरघोस अनुदन देत असते. कोणती पुस्तके घ्यावीत यावर बंधन नाही. सरकारी यादी दरवर्षी प्रसिद्ध होते, त्यातील काही तरी पुस्तके घ्यावीत एवढीच माफक अपेक्षा सरकारची असते. अशी यादीतील आठ-दहा पुस्तके घेतली कि या ग्रंथपालांचा मोर्चा या स्वस्त पुस्तकांकडे वळतो.

आपला समज होईल कि ग्रंथपालांना या पुस्तकाच्या खरेदीवर भरघोस सुट मिळत असेल व कमी पैशांत अधिक पुस्तके घेत असतील...

नाही. व्यवहार अत्यंत साधा असतो. समजा विक्रेता ग्रंथपालांना सत्तर ते ऐंशी टक्के सूट देतो आहे. बिलावर मात्र ती फक्त दहा टक्के दाखवली जाते. म्हणजे दहा हजार रुपयांची दर्शनी किंमतीची पुस्तके त्याला मिळतात दोन ते तीन हजार रुपयांत. उरलेले सात ते आठ हजार रुपये चक्क ग्रंथपालाच्या खिशात जातात. अर्थात त्यातही पुढे वाटेकरी असतातच...पण...

आता एकदा पुस्तकांची नोंद रजिस्टरला केली, कागदोपत्री मेंबर दाखवले कि या ग्रंथपालांचे काम संपले. खेडोपाडी आज महाराष्ट्रात पंचवीस हजारांच्या आसपास वाचनालये आहेत. या भ्रष्टाचाराचा आकडा काही कोटींत जातो. याबाबत जाहीरपणे कोणीही बोलत नाही. कारण कोणत्या ना कोनत्या प्रकारे या रचनेला दुखावणे म्हनजे पायावर धोंडा पाडुन घेणे. (उदा. आता माझी पुस्तके घेणे वाचनालये चक्क बंद करतील...मग काय?)

याला काहीशे वाचनालये काही प्रमनात अपवाद आहेत...ती सन्माननीय आहेतच...पण या प्रचंड ओघात त्यांचा प्रामाणिकपणा कोठल्या कोठे वाहून गेला आहे.

आता मला सांगा...खेडोपाड्यातील वाचनालयांत साहित्य म्हणुन असा कचरा येणार असेल तर कोणता भला वाचक या वाचनालयांच्या वाट्याला जाणार आहे? कसा वाचक वाढणार आहे? साहित्याची भूक कशी भागणार आहे लोकांची? चांगली पुस्तके खपत नसतील तर त्याला हे असे ग्रंथपालही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांना साहित्याशी नव्हे तर वरकमाईत रस आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी मोठे प्रकाशकही या खेळीला बळी पडु लागले आहेत कारण शेवटी पुस्तकांचा सेल उतरला कि त्यांनाही झक मारुन कमिशन वाढवून द्यावे लागते आहे. म्हनजे चाळीस तक्क्यांची पुर्वीची मर्यादा आज सहज पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत न्यावी लागत आहे...नाहीतर स्टोक किती काळ सांभाळायचा हा प्रश्न असतोच. म्हणजेच याचा परिनाम म्हणुन खपतील अशा साहित्त्यिकांचीच पुस्तके काढणे, मानधन कमी देणे अथवा नाहीच देणे, नव्या लेखकांकडुन उत्पादनखर्च घेणे हे प्रकार वाढलेत त्याला ही ग्रंथपालीय संस्कृती जबाबदार आहे.

थोडक्यात वाचनसंस्कृतीबाबत वाचकांना मुळीच दोष देता येत नाही. स्वत: लेखक...प्रकाशक...विक्रेते व ग्रंथपाल या दु:ष्चक्राला जबाबदार आहेत. हा एक अभेद्य चक्रव्यूह बनला आहे. तो भेदल्याखेरीज माय मराठीचे यत्किंचितही भले होण्याची व वाचनसंस्कृती  वाढण्याची शक्यता नाही.

Thursday, October 25, 2012

वज्रसूचीचा कर्ता शैव हिंदू कि बौद्ध?


वर्णव्यवस्थेवर प्रखर आघात करणारे आद्य लेखन "वज्रसूची" हे मानले जाते व त्याचे कर्तुत्व अश्वघोष या विद्वान बौद्ध पंडित/महाकवीला दिले जाते. अश्वघोष हा इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास झाला अशी मान्यता आहे. संत तुकारामांनी आपली शिष्या बहिणाबाईकडुन वज्रसूचीचा पद्यमय अनुवादही करुन घेतला होता. पुढे महात्मा फुलेंचे निकटवर्ती तुकाराम तात्या पडवळ यांनी "जातिभेदविवेकसार" या जातीभेदावर हल्ला चढवणा-या पुस्तकात वज्रसुचीचा समावेश केलेला आहे. बहिणाबाईंचे वज्रसूचीतील अभंगही त्यांनी या पुस्तकात सामाविष्ट केल्यची माहिती डा. सदानंद मोरे देतात.

वज्रसूचीत नेमके काय आहे हे आपण पुढे पाहु. या सूचीचा कर्ता नेमका कोण, हिंदु कि बौद्ध असे काही प्रश्न निर्माण होतात त्याबद्दल येथे प्रथम चर्चा करायची आहे.

अश्वघोष हा वज्रसूचीचा कर्ता आहे ही माहिती फक्त "सूत्रालंकार" या असंग नामक पेशावर येथील बौद्ध विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात ७७ क्रमांकाच्या सुत्रात मिळते. परंतू तिबेटी, तंजावरी येथील साधनांत कोठेही अश्वघोषाच्या नांवावर ही कृती असल्याचे नमूद नाही. इ-त्सिंगनेही अश्वघोषाच्या लेखनात या कृतीचा समावेश केलेला नाही. सर्वात प्रथम ही कृती बौद्ध साहित्यात अवतरते ती त्रिपिटक-सूचीत. ही सूची सन ९७३ ते ९८१ च्या दरम्यान चीनी भाषेत अनुवादित झाली. पण या ग्रंथानुसार वज्रसूचीचा लेखक अश्वघोष नसून धर्मकिर्ती आहे असे दिसते.

दुसरीकडे  १०८ उपनिषदांच्या सूचीत (मुक्तिका उपनिषद) "वज्रसूचिका उपनिषद" या नांवाने वज्रसूची अवतरते. हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे असेही नमूद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असला तरी त्याचे कर्तुत्व आदि शंकराचार्यांचे असल्याचे व हे शैव उपनिषद असल्याचे काही उल्लेख मिळतात. .

मग आता प्रश्न हा पडतो कि या कृतीचा निर्माता कोण? हिंदू कि बौद्ध?

वज्रसूचीची थोडक्यात वैशिष्ट्ये:

१. वज्रसूचीची शैली ही टिपिकल उपनिषदी आहे.
२. वज्रसूचीत बौद्ध तत्वज्ञानाचा कोठेही मागमूस नाही.
३. वज्रसूचीने आपले मत सिद्ध करण्यासाठी वेद, मनूस्मृती, पुराणे व महाभारताचा आधार घेतला आहे.
४.  शिव व पार्वतीचा स्पष्ट उल्लेखही अश्वघोषाच्या नांवावर असलेल्या आवृत्तीत मिळतो व तिचा अनुवाद बी. एच. होब्सन यांनी केला असून तो रोयल एशियाटिक सोसायटीने १८३५ साली प्रसिद्ध केला आहे.
५. उपनिषदांतर्गत वज्रसुचिका उपनिषद म्हणुन जी आवृत्ती प्रसिद्ध आहे तिचा गाभा व अश्वघोषाच्या नांवावर आढळना-या आव्रुत्तीचा ढांचा समसमान आहे. कही ठिकाणी उदाहरणे विस्त्रुत आहेत तर कोठे कमी. परंतु अर्थबदल होत नाही.
६. आत्मा, मोक्ष, जीव, ब्रह्म, इ. या बौद्ध तत्वज्ञानात नसलेल्या संज्ञा अश्वघोषाच्या म्हणुन प्रसिद्ध वज्रसूचीत येतात.
७. श्रेष्ठ ब्राह्मण कोण हे सांगणे हा वज्रसूचीचा अंतिम उद्देश आहे. हा बौद्ध उद्देश असू शकत नाही.

वज्रसूचीचे वैशिष्ट्य असे कि हा एकमात्र ग्रंथ आहे जो वर्णव्यवस्थेचा फोलपणा सांगत सर्व मानव एकच आहेत असे प्रतिपादित करतो. (मी हिंदू व्हर्शन आणि बौद्ध व्हर्शन लेखाच्या शेवटी वाचकांना तुलनेसाठी पुरवले आहे.) हिंदु व बौद्ध धर्मियांतील तत्कालीन संघर्ष पाहता  वर्नव्यवस्थेचीच चिरफाड करनारे बौद्ध लेखन उपनिषद म्हणुन हिंदुंनी स्वीकारणे शक्य दिसत नाही. होब्सनच्या मते वज्रसूचीवर (अश्वघोषाची म्हणवली जाणारी) शैव तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. जेवढीही ऋषि-मुनींची उदाहरणे दिली आहेत त्यात एकही बौद्ध परंप्रेतील नाही हेही उल्लेखनीय आहे.

बौद्ध तत्वज्ञ चातुर्वर्ण्याचा पाया उखडायचा प्रयत्न करण्यासाठी एकदाही चातुर्वर्ण्य विरोधक बौद्ध तत्वज्ञानाचा वापर करत नाही हेही एक आश्चर्य आहे. उलट खरे ब्राह्मणत्व कशात आहे याचाच उद्घोष वज्रसूचीत पहायला मिळतो.  एवढेच नव्हे तर अश्वघोषाची म्हणुन जी वज्रसूची आहे त्यात शेवटचा परिच्छेद हा युधिष्ठिराला उद्देशुन आहे...पहा...  Oh, YUDHISTHIRA! If a Sudra be superior to the allurements of the five senses, to give him charity is a virtue that will be rewarded in heaven. Heed not his caste; but only mark his qualities. Whoever in this life ever does well, and is ever ready to benefit others, spending his days and nights in good acts, such an one is a Brahman; and whoever, relinquishing worldly ways, employs himself solely in the acquisition of Moksha, such an one also is a Brahman; and whoever refrains from destruction of life, and from worldly affections, and evil acts, and is free from passion and backbiting, such an one also is a Brahman; and whoso possesses Kshema, and Daya, and Dama, and Dán, and Satya, and Souchana, and Smritti, and Ghrina, and Vidya, and Vijnan, &c. is a Brahman. Oh, YUDHISTHIRA! if a person perform the Brahmacharya for one night, the merit of it is greater than that of a thousand sacrifices (yajna). And whoso has read all the Vedas, and performed p. 169 all the Tirthas, and observed all the commands and prohibitions of the Sastra, such an one is a Brahman! and whoso has never injured a sentient thing by act, word or thought, such a person shall instantly be absorbed (at his death) in BRAHMA. Such were the words of BAISHAM PAYANA. Oh, my friend, my design in the above discourse is, that all ignorant Brahmans and others should acquire wisdom by studying it, and take to the right way. Let them, if they approve it, heed it; and if they approve it not, let them neglect its admonitions. (अनुवाद- होब्सन)

या विषयावर संशोधन करायला पुष्कळ वाव आहे. माझ्या मते वज्रसूची हे वर्णव्यवस्था विरोधक शैव उपनिषद असून पुढे बौद्ध अनुयायांनी ते वज्रघोषाच्या अथवा धर्मकिर्तीच्या नांवावर घेत आपल्या धर्मप्रचारासाठी वापरले असावे. असा प्रकार फक्त वज्रसूचीच्याच बाबतीत झालेला दिसून येतो...वज्रसूचीतील वर्णव्यवस्थेविरुद्धची मते पुर्वी विखुरलेल्या स्वरुपात सर्वत्रच विखुरलेली होती जी कोणीतरी अनाम (शंकराचार्यही असू शकतील.) वज्रसुचिका उपनिषदाच्या रुपाने संग्रहित केली असावीत. वज्रसूचीचा बौद्ध धर्माशी संबंध दिसत नाही हे मात्र स्पष्ट आहे.

मी खाली प्रथम वज्रसूचिका उपनिषदाचा विशाल आगरवाल यांने केलेला संक्षिप्त अनुवाद देत आहे. तदनंतर रोयल एशियाटिक सोसायटीने प्रसिद्ध केलेला अश्वघोषाची म्हणुन जी वज्रसूची आहे तिचाही बी. एच. होब्सनकृत अनूवाद देत आहे. जिज्ञासुंनी अवश्य वाचावे, विचार करावा, तुलना करावी व तदनुसार व्यापक चर्चा करावी.

वज्रसूचिका उपनिषद:

 Translation and Notes

Introduction

"I expound the 'Vajrasuchi' which is a doctrine that dispels ignorance,
Brings disrepute to those who are devoid of (spiritual) knowledge
And is an ornament to those who see with the eye of (spiritual) knowledge". || 1 ||

Exegetical notes: The opening lines indicate that the esoteric doctrine of this text is potent and precious and should be granted only to the select few who are spiritually inclined. If this doctrine is debased by bestowal to an unworthy, the recipient comes to harm and is not able to derive any benefit from it.


The Central Question

"Brahmin (priests), Kshatriya (soldiers and kings), Vaishya (merchants and agriculturists) and Shudras (artisans and farmers)- these are the four castes.
Amongst these castes, Brahmins indeed are the supreme (pradhana)- this accords with the statements of the Vedas and is stated by the Smritis also.
In this regard, the following enquiry is made:
Who indeed has the designation 'Brahmin'? Is he the individual soul (jiva)? Is he the body? Is it the class based on birth or one’s lineage (that is responsible for Brahminhood)? Is it the (spiritual) knowledge (that is responsible for Brahminhood)? Is it the ritualistic karma or fruits thereof (that is responsible for Brahminhood)? Is he the performer of meritorious acts (dharmika)?" || 2 ||

Exegetical notes: The text is clear.

Is Jiva the Brahmin?

"Of these options, if the first i.e. 'the designation Brahmin applies to the Jiva' is considered, then no (i.e., this cannot be true) because the nature (rupa) of the Jiva remains the same in the bodies it assumed in previous lives and also in the future bodies.
Impelled by the fruit of its actions, the Jiva attains numerous bodies (in different births) and in all these bodies, the nature of the Jiva remains the same.
Therefore, the designation 'Brahmin' cannot apply to the Jiva." || 3 ||

Exegetical notes: The passage does not consider the possibility that the nature of the Jiva itself changes from one life to another because it is a fundamental dogma of the Vedic philosophies that the Jiva or the individual soul is immutable and changeless. In fact, it is the non-Vedic philosophies that often hold the opposite teaching about the Jiva.


Is Body the Brahmin?

"Then, if it is said that the body has the designation 'Brahmin', then no (i.e., this cannot be true),
Because the bodies of all human beings down to the chandalas (=outcastes) have the same nature since they are composed of the same 5 elements;
Because features like death, birth, vice and virtue are seen in all bodies;
Because of the absence of the rule that Brahmins are white, Kshatriyas are red, Vaishyas are yellow and Shudras are black.
Because upon cremating the corpses of their fathers/elders and others , one would get tainted with the sin of Brahminicide.
Because of these reasons, the body cannot bear the designation 'Brahmin'."  || 4 ||

Exegetical notes: Murder of a Brahmin is considered one of the greatest sins in Hindu scriptures. The author therefore argues that if it is the body that is the Brahmin, then cremation of that 'Brahmin' body upon the death of the person will be akin to the sin of killing a Brahmin.


Familial Lineage and Caste:

"Then, if is said that the class by birth (or familial lineage or genus) bears the designation 'Brahmin', then no (i.e., this cannot be true), because there are several non-human species from whom numerous great Sages emerged.
We hear from the sacred texts that
- Sage Rsyasrnga was born of a deer,
- Sage Kausika of the Kusa grass,
- Sage Jambuka from a jackal,
- Sage Valmiki from white termite hill,
- Sage Vyasa from a fisher woman,
- Sage Gautama from the back of a hare,
- Sage Vasishtha from Urvashi- the celestial nymph
- Sage Agastya from a pitcher.
Amongst these, there have been many Sages who have been amongst the foremost of men that  have demonstrated spiritual realization.
Therefore, it is not one's class by birth that can be taken as (the determinant of the designation) ‘Brahmin'." || 5 ||

Exegetical notes: The passage takes recourse to several unscientific, popular fables about the origin of Sages but its logic is not untenable. Many of Hinduism's greatest sages have had humble origins. See Appendix B.


Spiritual Knowledge and Brahminhood

"Then, if it be said that spiritual knowledge is (the cause of) Brahminhood, no (i.e., this cannot be true), because amongst Kshatriyas and others, there are many who have realized the Supreme Reality and have attained Wisdom. Therefore knowledge does not determine Brahminhood.” || 6 ||

Exegetical notes: An example of Kshatriyas who were spiritually realized sages are King Janaka of Videha. An example of a Vaishya who was a realized Sage is the Rigvedic seer Bhalandana. Likewise, Matanga, the son of a Vaishya father and a Shudra mother became a realized Sage. See Appendix B for more details.


Religious Rituals (Karma) and Brahminhood

"Then, if it is said that performance of karma or the fruits thereof (makes one) a Brahmin, no (i.e., this cannot be true), Because association with karma that has been commenced, karma done in the past and karma that will be done, is seen common to all creatures.
(Moreover) good men perform karmas, impelled by (the effects) their past karma.
Therefore, karma does not (make) one a Brahmin.” || 7 ||

Exegetical notes: The text means that the performance of karma or rituals in this life does not form the basis of Brahminhood. Why? Because man, or his soul, is associated or tainted not only with the karma performed in this very life, but also with the unseen karmas performed in previous lives. Moreover, who knows what and how many karmas one will perform in future lives. Since man’s net karma is the sum of all the past, present (and future), is it justified to assign him a caste merely on the basis of his present karma? No! Moreover, we see that all men are not inclined equally to the performance of karma. It is stated in the scriptures that inclination to perform good karma in this life itself is a fruit of good karma performed in previous lives. On the other hand, a man who performed good karmas might yet willingly shun them in this life, contrary to his nature. Therefore, when we assign a caste to someone on the basis of his current life’s karma, we are belittling the importance of his past and future karma wrongly. I have not translated ‘karma’ in this passage as ‘virtuous deeds’ and have adopted the rather restricted meaning of the word because the next passage encompasses the broader meanings of karma. Therefore, assuming the broader meaning of karma here itself would result in the fault of useless repetition by the text.


Meritorious Acts and Brahminhood

“Then, if it is said that (performance of) meritorious deeds (makes one) a Brahmin, no (i.e., this cannot be true), because there have been many Kshatriyas and others (Vaishyas and Shudras) who have (done meritorious deeds like having) gifted gold (to Brahmins, to religious institutions etc.).
Therefore, the performer of meritorious deeds is not (automatically) the Brahmin.” || 8 ||

Exegetical Notes: The passage clarifies that performance of acts of piety alone does not make one a Brahmin.

Who is a Brahmin?
“Who indeed then bears the designation Brahmin?
He (indeed) who, after having all his desires fulfilled as a result of perceiving (realizing) directly, as an amalaka fruit in one’s hand-- The Atman that is One without a second (or is beyond compare), (That is) bereft of (distinctions of) clan and (is not composed of) the constituents of Prakriti (guNa-hInaM), and actionless, (That is) free of all defects like the six infirmities (viz. old age, death, sorrow, delusion, hunger and thirst) and the six states of existence/transformations (viz. birth, existence, growth/development, transformation, waning and perishing), (That is) of the nature of Immutable Reality, of Consciousness, Blissful and Infinite/Eternal, (That is) an Independent Entity (not deriving its existence and properties from anything else), (That is) devoid of determinations, but (itself) the support  of infinite determinations, (That is) present in all living and non-living beings as the immanent Soul, (Who) pervades the interior and envelopes the exterior of everything as ether, (That is) possesses the attribute of perfect and complete (akhanda) Bliss, (That is) incomparable, (That is) known only through one’s own (spiritual) experience (and not through reading of books or teaching by others) and is inferred only indirectly (because of It cannot be perceived by the senses);
Becomes free of the defects of desire, attachment and the like, becomes endowed with the (positive) qualities like tranquility etc., becomes free of (negative) behaviors like jealousy, greed, expectations, delusion etc., and leads a life in which the mind  is not tainted  pretensions, ego and the like.

He alone, who possesses the aforementioned characteristics, is a Brahmin- such is (indeed) the import of Sruti, Smriti, Itihasa and the Puranas.
There is no other way of attaining Brahminhood.

Meditate upon Brahman, the Atman, (That is) of the nature of Immutable Reality, of Consciousness, Blissful and One without a second (or is beyond compare! Meditate upon Brahman!

Such is this Upanishad (secret/exalted) doctrine!” || 9 ||


होब्सनकृत वज्रसूचीचा संपुर्ण अनुवाद:

 I, ASHU GOSHA, first invoking MANJA GHOSHA, the Guru of the world, with all my soul and all my strength, proceed to compose the book called Vajra Suchi, in accordance with the Shastras (Hindu or Brahmanical Sastras).

   Allow then that your Vedas and Smrittis, and works involving both Dharma and Artha, are good and valid, and that discourses at variance with them are invalid, still what you say, that the Brahman is the highest of the four castes, cannot be proved from those books.

   Tell me, first of all, what is Brahmanhood? Is it life, or parentage, or body, or wisdom, or the way (áchár), or acts, i.e. morality (Karam), or the Vedas?

   If you say it is life (jiva), such an assertion cannot be reconciled with p. 162 the Vedas; for, it is written in the Vedas, that "the sun and the moon, INDRA, and other deities, were at first quadrupeds; and some other deities were first animals and afterwards became gods; even the vilest of the vile (Swapak) have become gods." From these words it is clear that Brahmanhood is not life (jiva), a position which is further proved from these words of the Mahabharata: "Seven hunters and ten deer, of the hill of Kalinjal, a goose of the lake Mansaravara, and a chakwa of Saradwipa, all these were born as Brahmans, in the Kurukshetra (near Dehli), and became very learned in the Vedas." It is also said by MANU, in his Dharma Sastra, "Whatever Brahman learned in the four Vedas, with their ang and upang, shall take charity from a Sudra, shall for twelve births be an ass, and for sixty births a hog, and seventy births a dog." From these words it is clear that Brahmanhood is not life; for, if it were, how could such things be?

   If, again, you say that Brahmanhood depends on parentage or birth (jàti); that is, that to be a Brahman one must be born of Brahman parents,--this notion is at variance with the known passage of the Smritti, that ACHALA MUNI was born of an elephant, and CESA PINGALA of an owl, and AGASTYA MUNI from the Agasti flower, and COUSIKA MUNI from the Cusa grass, and CAPILA from a monkey, and GAUTAMI RISHI from a creeper that entwined a Saul tree, and DRONA ACHARYA from an earthen pot, and TAITTIRI RISHI from a partridge, and PARSWA RAMA from dust, and SRINGA RISHI from a deer, and VYASA MUNI from a fisherwoman, and KOSHIKA MUNI from a female Sudra, and VISWA MITRA from a Chandalni, and VASISHTHA MUNI from a strumpet. Not one of them had a Brahman mother, and yet all were notoriously called Brahmans; whence I infer, that the title is a distinction of popular origin, and cannot be traced to parentage from written authorities.

   Should you again say, that whoever is born of a Brahman father or mother is a Brahman, then the child of a slave even may become a Brahman; a consequence to which I have no objection, but which will not consort with your notions, I fancy.

   Do you say, that he who is sprang of Brahman parents is a Brahman? Still I object that, since you must mean pure and true Brahmans, in such case the breed of Brahmans must be at an end; since the fathers of the present race of Brahmans are not, any of them, free from the suspicion of having wives, who notoriously commit adultery with Sudras. Now, if the p. 163 real father be a Sudra, the son cannot be a Brahman, notwithstanding the Brahmanhood of his mother. From all which I infer, that Brahmanhood is not truly derivable from birth; and I draw fresh proofs of this from the Manava Dharma, which affirms that the Brahman who eats flesh loses instantly his rank; and also, that by selling wax, or salt, or milk, he becomes a Sudra in three days; and further, that even such a Brahman as can fly like a bird, directly ceases to be a Brahman by meddling with the flesh-pots.

   From all this is it not clear that Brahmanhood is not the same with birth: since, if that were the case, it could not be lost by any acts however degrading. Knew you ever of a flying horse that by alighting on earth was turned into a pig?--'Tis impossible.

   Say you that body (Sarìr) is the Brahman? this too is false; for, if body be the Brahman, then fire, when the Brahman's corpse is consumed by it, will be the murderer of a Brahman; and such also will be every one of the Brahman's relatives who consigned his body to the flames. Nor less will this other absurdity follow, that every one born of a Brahman, though his mother were a Kshatriya or Vaisya, would be a Brahman--being bone of the bone, and flesh of the flesh of his father: a monstrosity, you will allow, that was never heard of. Again, are not performing sacrifice, and causing others to perform it, reading and causing to read, receiving and giving charity, and other holy acts, sprung from the body of the Brahman?

   Is then the virtue of all these destroyed by the destruction of the body of a Brahman? Surely not, according to your own principles; and, if not, then Brahmanhood cannot consist in body.

   Say you that wisdom* constitutes the Brahman? This too is incorrect. Why? Because, if it were true, many Sudras must have become Brahmans from the great wisdom they acquired. I myself know many Sudras who are masters of the four Vedas, and of philology, and of the Mimansa, and Sanc' hya, and Vaisheshika and Jyotishika philosophies; yet not one of them is or ever was called a Brahman. It is clearly proved then, that Brahmanhood consists not in wisdom or learning. Then do you affirm that the Achár is Brahmanhood? This too is false; for if it were true, many Sudras would become Brahmans; since many Nats and Bháts, and Kaivertas, p. 164 and Bhánds, and others, are everywhere to be seen performing the severest and most laborious acts of piety. Yet not one of these, who are all so pre-eminent in their Achár, is ever called a Brahman: from which it is clear that Achár does not constitute the Brahman.

   Say you that Karam makes the Brahman? I answer, no; for the argument used above applies here with even greater force, altogether annihilating the notion that acts constitute the Brahman. Do you declare that by reading the Vedas a man becomes a Brahman? This is palpably false; for it is notorious that the Rakshasa RAVAN was deeply versed in all the four Vedas; and that, indeed, all the Rakshasas studied the Vedas in RAVAN'S time: yet you do not say that one of them thereby became a Brahman. It is therefore proved that no one becomes a Brahman by reading the Vedas.

   What then is this creature called a Brahman? If neither reading the Vedas, nor Sanskar, nor parentage, nor race (Kula), nor acts (Karam), confers Brahmanhood, what does or can? To my mind Brahmanhood is merely an immaculate quality, like the snowy whiteness of the Kundh flower. That which removes sin is Brahmanhood. It consists of Uráta, and Tapas, and Neyama, and Ripavas, and Dan, and Dáma, and Sháma, and Sanyama. It is written in the Vedas that the gods hold that man to be a Brahman who is free from intemperance and egotism; and from Sanga, and Parigraha, and Praga, and Dwesha. Moreover, it is written in all the Sastras that the signs of a Brahman are these, truth, penance, the command of the organs of sense, and mercy; as those of a Chándala are the vices opposed to those virtues. Another mark of the Brahman is a scrupulous abstinence from sexual commerce, whether he be born a god, or a man, or a beast. Yet further, SUKRA ACHARYA has said, that the gods take no heed of caste, but deem him to be the Brahman who is a good man although he belong to the vilest. From all which I infer, that birth, and life, and body, and wisdom, and observance of religious rites (achár), and acts (karam), are all of no avail towards becoming a Brahman.

   Then again, that opinion of your sect, that pravrajaya is prohibited to the Sudra; and that for him service and obedience paid to Brahmans are instead of pravrajaya,--because, forsooth, in speaking of the four castes, the Sudra is mentioned last, and is therefore the vilest,--is absurd; for, if it were correct, INDRA would be made out to be the lowest and meanest of beings, INDRA being mentioned in the Parni Sutra after the dog, thus-- p. 165 "Shua, Yua Maghwa." In truth, the order in which they are mentioned or written, cannot affect the relative rank and dignity of the beings spoken of.

   What! is PARVATI greater than MAHESA? or are the teeth superior in dignity to the lips, because we find the latter postponed to the former, for the mere sake of euphony, in some grammar sentence? Are the teeth older than the lips; or does your creed teach you to postpone SIVA to his spouse? No; nor any more is it true that the Sudra is vile, and the Brahman high and mighty, because we are used to repeat the Chatur Varána in a particular order. And if this proposition be untenable, your deduction from it, viz. that the vile Sudra must be content to regard his service and obedience to Brahmans as his only pravrajaya, falls likewise to the ground.

   Know further, that is is written in the Dharma Sastra of MENU, that the Brahman who has drank the milk of a Sudarni, or has been even breathed upon by a Sudarni, or has been born of such a female, is not restored to his rank by prayáschitta. In the same work it is further asserted, that if any Brahman eat and drink from the hands of a Sudarni, he becomes in life a Sudra, and after death a dog. MANU further says, that a Brahman who associates with female Sudras, or keeps a Sudra concubine, shall be rejected by gods and ancestors, and after death shall go to hell. From all these assertions of the Manáva Dharma, it is clear that Brahmanhood is nothing indefeasibly attached to any race or breed, but is merely a quality of good men. Further, it is written in the Sastra of MANU, that many Sudras became Brahmans by force of their piety; for example, KATHINU MUNI, who was born of the sacrificial flame produced by the friction of wood, became a Brahman by dint of Tapas; and VASISHTHA MUNI, born of the courtezan URVASI; and VYASA MUNI, born of a female of the fisherman's caste; and RISHIYA SRINGA MUNI, born of a doe; and VISHVA MITRA, born a Chandalni; and NARED MUNI, born of a female spirit-seller; all these became Brahmans by virtue of their Tapas. Is it not clear then that Brahmanhood depends not on birth? It is also notorious that he who has conquered himself is a Yati; that he who performs penance is a Tapasya; and that he who observes the Brahma charya is a Brahman. It is clear then that he whose life is pure, and his temper cheerful, is the true Brahman; and that lineage (Kula) has nothing to do with the matter. There are these slokas in the Manava Dharma, "Goodness of disposition p. 166 and purity are the best of all things; lineage is not alone deserving of respect. If the race be royal and virtue be wanting to it, it is contemptible and useless." KATHINA MUNI and VYASA MUNI, and other sages, though born of Sudras, are famous among men as Brahmans; and many persons born in the lowest ranks have attained heaven by the practice of uniform good conduct (sila). To say therefore that the Brahman is of one particular race is idle and false.

   Your doctrine, that the Brahman was produced from the mouth, the Kshatriya from the arms, the Vaisya from the thighs, and the Sudra from the feet, cannot be supported. Brahmans are not of one particular race. Many persons have lived who belonged to the Kaivarta Kul, and the Rajaka Kul, and the Chándal Kul, and yet, while they existed in this world, performed the Chura Karan, and Mung-bandan, and Dant-kashtha, and other acts appropriated to Brahmans, and after their deaths became, and still are, famous under the Brahmans.

   All that I have said about Brahmans you must know is equally applicable to Kshatriyas; and that the doctrine of the four castes is altogether false. All men are of one caste.

   Wonderful! You affirm that all men proceeded from one, i.e. Brahma; how then can there be a fourfold insuperable diversity among them? If I have four sons by one wife, the four sons, having one father and mother, must be all essentiaily alike. Know too that distinctions of race among beings are broadly marked by differences of conformation and organization: thus, the foot of the elephant is very different from that of the horse; that of the tiger unlike that of the deer; and so of the rest: and by that single diagnosis we learn that those animals belong to very different races. But I never heard that the foot of a Kshatriya was different from that of a Brahman, or that of a Sudra. All men are formed alike, and are clearly of one race. Further, the generative organs, the colour, the figure, the ordure, the urine, the odour, and utterance, of the ox, the buffalo, the horse, the elephant, the ass, the monkey, the goat, the sheep, &c. furnish clear diagnostics whereby to separate these various races of animals: but in all those respects the Brahman resembles the Kshatriya, and is therefore of the same race or species with him. I have instanced among quadrupeds the diversities which separate diverse genera. I now proceed to give some more instances from among birds. Thus, the goose, the dove, the parrot, the peacock, &c. are known to be different by their diversities of figure, p. 167 and colour, and plumage, and beak: but the Brahman, Kshatriya, Vaisya and Sudra are alike without and within. How then can we say they are essentially distinct? Again, among trees the Báta, and Bakula, and Palás, and Ashoka, and Tamal, and Nagkeswar, and Shirik, and Champa, and others, are clearly contradistinguished by their stems, and leaves, and flowers, and fruits, and barks, and timber, and seeds, and juices, and odours; but Brahmans, and Kshatriyas, and the rest, are alike in flesh, and skin, and blood, and bones, and figure, and excrements, and mode of birth. It is surely then clear that they are of one species or race.

   Again, tell me, is a Brahman's sense of pleasure and pain different from that of a Kshatriya? Does not the one sustain life in the same way, and find death from the same causes as the other? Do they differ in intellectual faculties, in their actions, or the objects of those actions; in the manner of their birth, or in their subjection to fear and hope? Not a whit. It is therefore clear that they are essentially the same. In the Udambára and Panosa trees the fruit is produced from the branches, the stem, the joints, and the roots. Is one fruit therefore different from another, so that we may call that produced from the top of the stem the Brahman fruit, and that from the roots the Sudra fruit? Surely not. Nor can men be of four distinct races, because they sprang from four different parts of one body. You say that the Brahman was produced from the mouth; whence was the Brahmani produced? From the mouth likewise? Grant it--and then you must marry the brother to the sister! a pretty business indeed! If such incest is to have place in this world of ours, all distinctions of right and wrong must be obliterated.

   This consequence, flowing inevitably from your doctrine that the Brahman proceeded from the mouth, proves the falsity of that doctrine. The distinctions between Brahmans, Kshatriyas, Vaisyas and Sudras, are founded merely on the observance of divers rites, and the practice of different professions; as is clearly proved by the conversation of BAISHAM PAYANA RISHI with YUDHISTHIRA RAJA, which was as follows: One day the son of PANDU, named YUDHISTHIRA, who was the wise man of his age, joining his hands reverentially, asked BAISHAM PAYANA, Whom do you call a Brahman; and what are the signs of Brahmanhood? BAISHAM answered, The first sign of a Brahman is, that he possesses long-suffering and the rest of the virtues, and never is guilty of violence and wrong doing; that he p. 168 never eats flesh; and never hurts a sentient thing. The second sign is, that he never takes that which belongs to another without the owner's consent, even though he find it in the road. The third sign, that he masters all worldly affections and desires, and is absolutely indifferent to earthly considerations. The fourth, that whether he is born a man, or a god, or a beast, he never yields to sexual desires. The fifth, that he possesses the following five pure qualities, truth, mercy, command of the senses, universal benevolence, and penance.* Whoever possesses these five signs of Brahmanhood I acknowledge to be a Brahman; and, if he possess them not, he is a Sudra. Brahmanhood depends not on race (Kuli), or birth (Jat), nor on the performance of certain ceremonies. If a Bhandál is virtuous, and possesses the signs above noted, he is a Brahman. Oh! YUDHISTHIRA, formerly in this world of ours there was but one caste. The division into four castes originated with diversity of rites and of avocations. All men were born of woman in like manner. All are subject to the same physical necessities, and have the same organs and senses. But he whose conduct is uniformly good is a Brahman; and if it be otherwise he is a Sudra; aye, lower than a Sudra. The Sudra who, on the other hand, possesses these virtues is a Brahman.

   Oh, YUDHISTHIRA! If a Sudra be superior to the allurements of the five senses, to give him charity is a virtue that will be rewarded in heaven. Heed not his caste; but only mark his qualities. Whoever in this life ever does well, and is ever ready to benefit others, spending his days and nights in good acts, such an one is a Brahman; and whoever, relinquishing worldly ways, employs himself solely in the acquisition of Moksha, such an one also is a Brahman; and whoever refrains from destruction of life, and from worldly affections, and evil acts, and is free from passion and backbiting, such an one also is a Brahman; and whoso possesses Kshema, and Daya, and Dama, and Dán, and Satya, and Souchana, and Smritti, and Ghrina, and Vidya, and Vijnan, &c. is a Brahman. Oh, YUDHISTHIRA! if a person perform the Brahmacharya for one night, the merit of it is greater than that of a thousand sacrifices (yajna). And whoso has read all the Vedas, and performed p. 169 all the Tirthas, and observed all the commands and prohibitions of the Sastra, such an one is a Brahman! and whoso has never injured a sentient thing by act, word or thought, such a person shall instantly be absorbed (at his death) in BRAHMA. Such were the words of BAISHAM PAYANA. Oh, my friend, my design in the above discourse is, that all ignorant Brahmans and others should acquire wisdom by studying it, and take to the right way. Let them, if they approve it, heed it; and if they approve it not, let them neglect its admonitions.



Monday, October 22, 2012

हिंदुत्ववाद्यांना हिंदू का मानत नाही?


सध्या काही मंडळीला "मोदी" तापाने पछाडले आहे असे दिसते. लोकशाहीत कोणी कोनाला पछाडावे यावर बंधन असू शकत नाही. लोकशाही मार्गाने मोदी पंतप्रधान झाले तरी कोणाची हरकत असू शकत नाही. परंतू असे करण्यासाठी वा होण्यासाठी मोदी समर्थक हिंदुत्ववादी किती खालच्या स्तरावर जावू शकतात याची प्रचिती येते आहे. खालील मजकुर शैलजा शेवडे यांनी आर्कुटवर प्रसिद्ध केला होता. हा मजकुर जसाच्या तसा माझे मित्र डा. मधुसुदन चेरेकर यांनी फ़ेसबुकवर प्रसिद्ध केला व "मोदी लाओ..देश बचाओ" अशी उद्घोषणाही केली. हा मजकुर पहा:

"शैलजा शेवडे - Oct 17
धक्कादायक.....!

आताच शेजारी रहाणा-या सेकंड इयर बी.कॊम. ला असणा-या मुलीचं फाऊंडेशन या विषयावरचा पाठ्यपुस्तकातला एक धडा पाहिला. ह्युमन राईटस विषयावरचा. त्यात बहुसंख्यांक लोकांनी अल्पसंख्यांकावर केलेल्या अत्याचाराचे वर्णन आहे. त्यांनी लिहिलं आहे, की आसाममध्ये अल्पसंख्याक ख्रिश्चनांवर हिंदू अनन्वित अत्याचार करतात.. गुजताथमध्ये मुस्लिमांवर हिंदु अत्याचार करतात. अल्पसंख्याक स्त्रियांवर हिंदु बलात्कार करतात. गुजराथमध्ये हिंदुंनी मुसलमान स्त्रियांची अब्रु लुटली. मुसलमानांच्या मशिदी फोडल्या.

कुणाला कल्पना आहे, आपल्या मुलांना हे असले शिकवले जाते. आणि आपली मुलं घोकंपट्टी करून तसच्या तसं पेपरात लिहितात. तसचं समजतात.

पाठ्यपुस्तकात दिलेल्या असल्या विधानांबद्दल आपण काय करू शकतो? कुणाला जाब विचारावा?"

वरीलप्रमाणे जर खरेच अभ्यासक्रमात असते तर ते निषेधार्ह व निंदनीय ठरले असते व विधीवत मार्गाने निषेध करत शासनाला असा भाग वगळायला भाग पाडले गेले असते. खातरजमा करुन घेण्यासाठी मी प्रत्यक्ष या अभ्यासक्रमाच्या नोट्स व मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम बारकाईने पाहिला. तो पाहता वरील मजकूर धादांत खोटा, दिशाभुल करनारा व अकारण तेढ वाढवनारा आहे हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात "मानवाधिकार" भागात तृतीय सेमीस्टरला खालील भाग शिकवले जातात....

अनुसुचित जाती/जमाती, स्त्रीया, मुले व अल्पसंखंक अशा दुर्बल घटकांबाबत होवू शकणारी मानवाधिकार उल्लंघने व तत्संबंधीचे कायदे. यात गुजरात आसामबाबत शेवडे बाई म्हणतात तशी कसलीही उदाहरणे दिलेली नाहीत. हिंदूवर असले आरोप नाहीत. परंतु केवळ हिंदुंच्या भावना भडकावून हिंदुंची मते हिंदुत्ववाद्यांकडे खेचण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. हे असले हिंदुत्ववादी हिंदू धर्मावरील कलंक आहेत. आम्ही अशा खोटारड्या हिंदुत्ववाद्यांना हिंदू का मानत नाही हे आता तरी स्पष्ट होईल!

चेरेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी तरी शहानिशा केल्याखेरीज अशा गोष्टी प्रसारित करु नये ही त्यांना विनंती आहे.

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (३)

जातिसंस्था जन्माधारित अशी बनत गेली...



जातीसंस्था धर्मसंस्थेने बनवलेल्या नाहीत. धर्माचा जन्माधारीत जातीव्यवस्थेला पाठिंबा नाही. डा. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या CASTES IN INDIA: Their Mechanism, Genesis and Development या कोलंबिया विद्यापीठात १९१६ साली सादर केलेल्या प्रबंधातही मनु अथवा ब्राह्मण हे जातीव्यवस्थेचे निर्माते नव्हेत हे ठामपणे सिद्ध केले आहे. आपण जातींत पुरातन काळापासुन भर पडत कशी गेली, दहव्या शतकापर्यंत तरी जातीबदलही कसा घडत होता याबाबतही थोडक्यात चर्चा केलेली आहे. ब्राह्मणांची आधी बंदिस्त जात बनली म्हणुन अनुकरणातुन अन्य समाजानेही बंदिस्त जातीव्यवस्था स्वीकारली हेही मत मान्य करता येत नाही. ब्राह्मणांनी आपली जात बंदिस्त का केली याचे उत्तर त्यातुन मिळत नाही.

आपण आता जन्माधारित जातीव्यवस्था कशी अस्तित्वात आली यावर स्वतंत्रपणे विचार करणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय जातीसंस्थेच्या अपरिवर्तनीय रुपाची निर्मिती कशी झाली याचा उलगडा आपल्याला होणार नाही.

येथे आपल्याला खालील अंगांनी यासंदर्भात विचार करायचा आहे.

१. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?

२. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?

३. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?

४. जातिव्यवस्था समाज-मानसशास्त्र प्रणित?

५. जातिव्यवस्था राज्यशास्त्र प्रणित?

६. जातिव्यवस्था संरक्षणात्मक व्य़ुहरचनाप्रणित?

या मुद्द्यांवर व तदनुषंगिक निर्माण होना-या मुद्द्यांवर आता आपण चर्चा करुयात.

१. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?: मानवी जीवनात आदिम काळी विवाहसंस्थेचे अस्तित्व नव्हते. एका अर्थाने मनुष्य पशुधर्म पाळत होता. म्हणजे नाती-गोती अद्याप निर्माणच झालेली नव्हती. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या महत्वपुर्ण प्रबंधात वि.का. राजवाडेंनी आदि यज्ञधर्मही सामुदायिक शरीरसंबंधांना सोय पुरवण्यासाठी कसा निर्माण झाला याबाबत साधार विवेचन केले आहे. मानवी जीवन प्रजावृद्धीसाठी मुक्त लैंगिक संबंधांना महत्व देत होते. श्वेतकेतुने ही पशुधर्मीय चाल बंद पाडली व आद्य विवाहसंस्थेचा पुरस्कार केला असे आपल्याला महाभारतातील वनपर्वात समजते. "कुटुंबसमुहांची, नात्यांची एकुण गोळाबेरीज म्हणजे जात..." हे डा. इरावती कर्वेंचे विधान आपण मागे पाहिले आहेच. कुटुंबसमूह हा विवाहसंस्थेखेरीज अस्तित्वात येवू शकत नाही हे उघड आहे. प्रारंभिक विवाहसंस्थाही सैल होती. म्हनजे पती-पत्नी नात्यातील आज अभिप्रेत असनारे पावित्र्य व मांगल्य त्यात अभिप्रेत नव्हते. किंवा तशी कल्पनाही मानवाला अद्याप सुचले नव्हती. पतीच्या संमतीने पत्नी परपुरुषाकडे अथवा अतिथीकडे जावू शकत होती. बाह्य संबंधापासुन प्राप्त झालेली संतती पतीचीच समजली जात असल्याने समाजजीवनातही कोणती अडचण उपस्थित होत नव्हती.

म्हणजे याचाच एक अर्थ असा आहे कि आज आपण समजतो कि आपण कोणी शुद्ध रक्ताचे, वर्णाचे अथवा जातीचे आहोत, त्याला इतिहासाचा आधार नाही....कारण मुलात लैंगिक संबंध हे मुक्त व नंतर अर्धमुक्त झालेले दिसतात. वैवाहिक बंधने आली ती इसपु १५०० च्या आसपास. ही बंधने येण्याचे कारण म्हणजे मानसाने केलेली तत्वज्ञानात्मक प्रगती. आश्वलायन गूह्यसूत्र म्हनते "आपण विवाहबद्ध होवून प्रजा उत्पन्न करु. एकमेकांचे प्रेय प्राप्त करुन एकमेकांना आवडते होवूयात. एकमेकांविषयी शुद्ध मन ठेवून शंभर वर्ष जगुयात." (आश्व. गु.सू. १.७.३.२२) याचा अर्थ असा कि प्रजावृद्धी हे विवाहाचे मूख्य ध्येय कायम राहिले तरी प्रेम आणि कर्तव्याची भावना विवाहविधीमद्धे आनली गेली. या काळात विवाह वर्णनिहाय अथवा जातीनिहाय होत असल्याचे पुरावे नाहीत. याचे कारण म्हणजे दोन्ही विभिन्न धर्मधारांत वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था सैल अशीच होती.

पुढे धर्मशास्त्रांनी सपिंड व सगोत्र विवाहाचा निषेध सुरु केला. खरे तर ही परिवारबाह्य पण जाती/वर्णांतर्गतची विवाहपद्धती. परंतु प्रत्यक्षात भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर सगोत्र/सपिंड विवाह काही बंधने पाळत कायम राहिले. बहुतेक जातींत आते-मामे भावंडांच्या विवाहाची प्रथा प्रचलित आहे. सगोत्र विवाहही कायदेमान्य आहेत.

जातीसंस्थेचे मुख्य स्वरुप म्हनजे जातीअंतर्गत होणारे विवाह. जातीअंतर्गत विवाह झाल्याने जातीचा संख्यात्मक विस्तार होणे स्वाभाविकही आहे आणि अभिप्रेतही. परंतू  आधी जाती आल्या कि जातीअंतर्गत विवाह आले हा महत्वाचा प्रश्न आहे व त्यावर आपल्याला विचार करायचा आहे.

कोणतातरी व्यवसाय असने हे जातीचे प्रमुख लक्षण आहे, परंतु व्यवसाय बदलला अथवा नवीन व्यवसाय बनवला कि जातही बदलणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत समव्यवसायी लोकांचे भावनिक अथवा स्पर्धात्मक संम्मिलिनीकरण होणे स्वाभाविक आहे. लहानपणापासुन एखाद्या विशिष्ट व्यवसाय वातावरणात वाढलेल्या मुलींना पैतृक व्यवसायाचे किमान प्राथमिक शिक्षण अथवा ज्ञान मिळणे हीसुद्धा स्वाभाविक बाब आहे. अशा स्थितीत लोहाराचे काम करणा-याची मुलगी समजा कुंभारकाम करना-याच्या घरी दिली तर कुंभारासाठी ती मुलगी वंशवृद्धीच्या कामाखेरीज अनुपयुक्त अशीच आहे. आपण आजही ग्रामीणभागातील श्रमविभागणीचे तत्व पाहिले तर मला काय म्हनायचे ते लक्षात येईल. स्त्री ही फक्त वंशवृद्धीसाठी नव्हे तर एक "मोफत श्रम पुरवणारी" व्यक्ति एवढे स्त्रीचे अवमुल्यन होत गेले होते. याला अर्थात आर्थिक कारणे आहेतच ज्यावर आपण नंतर विचार करणारच आहोत. लोहाराची स्त्री, लहानपणापासुन माहिती असल्याने, कोळसा जमा करणे, पेटवणे ते भाता चालवणे व फुटकळ लोहारकामही स्वत:च करणे इ. तरबेज असल्याने नवीन प्रशिक्षणाचीही आवश्यकता रहात नाही. हेच तेली-कोष्टीं-ब्राह्मणांबद्दल म्हणता येईल.

त्यामुळे समव्यावसायिकांत विवाह करणे हे फायद्याचे होते. सोयीचे होते. एक फुकटचा कामगार मिळत होता. वंशवृद्धीची सोयही लागत होती. मग अशा कुटुंबात मुलगी देणे व अशाच समव्यवसायी कुटुंबातील मुलगी करुन घेणे या देवानघेवाणीतून ती पुढे प्रथा बनत गेली असल्याचे आपल्याला दिसते. या प्रथेतून जन्माधारित जातीव्यवस्था निर्माण होण्यास, सर्वस्वी नसला तरी, हातभार लागला असेही आपल्याला म्हणता येते.

ब्राह्मणांनी आधी आपली जात बंदिस्त केल्याने अन्य समुहांनीही आपापल्या जाती बंदिस्त केल्या अथवा इतरांनी त्यांच्यात प्रवेशण्याचा दरवाजा बंद केल्याने जातेसंस्था बळकट बनली हे बाबासाहेबांचे उपरोल्लिखित प्रबंधातील मत विनम्रपूर्वक अमान्य करावे लागते. "व्यावहारिक सोय" हे समानव्यवसायींतर्गत विवाहाचे प्रमुख कारण आहे व ती पुढे जसजशी अधिक व्यवसायांची निर्मितीच थांबली तसतशी घट्ट होत गेली असे आपण ठामपणे म्हणु शकतो. भारतात दहाव्या शतकानंतर नवीन व्यवसायांची निर्मिती झाली नाही. म्हणजे कोनताही नवीन जीवनोपयोगी शोध लागला नाही. त्यामुळे नवीन जात निर्माण होण्याच्या शक्यता नव्हत्या. दहाव्या शतकानंतर महाराष्ट्रात दोनच जाती उदयाला आल्या व त्या म्हणजे मराठा व अक्करमाशे कुणबी/मराठा. त्यांच्या उदयाची कारणे सरंजामदारी व स्त्री-शोषण व्यवस्थेत आहेत. पण यावर आपण नंतर विवेचन करु.

२. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?: हिंदू धर्मातील प्रत्येक जात ही जवळपास एका स्वतंत्र धर्मासारखीच असते हे आपण जातीच्या बंदिस्त व्युहावरुन समजू शकतो. हिंदुधर्म म्हनजे विविध जातींचे एक फेडरेशन आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक जातीचेच नव्हे तर पोटजातीचेही कुलाचार हे स्वतंत्र आहेत. कुलाचार ही पुरातन जमातींची उपज आहे. कुल म्हणजे जमात असेही म्हनता येते. पुरातन काळी मुलगी वराला नव्हे तर कुलाला दिली जात असे व कुलपती (जमातप्रमुख) हा वधुवर आपला पहिला हक्क गाजवत असे. "कुलवधु" हा शब्द या प्रथेचा निदर्शक आहे. प्रत्येक कुलाचे आचार भिन्न असतात. म्हणजे व्यापक परिप्रेक्षात मुख्य दैवते (कुलदैवते) अन्य जातींप्रमाणे समान असली तरीही स्वकुळाचे विशिष्ट अंश एका कुलाला दुस-या कुलापासुन विभक्त करतात.

पण जातिव्यवस्था जन्माधिष्ठित होण्याचा कुलाचाराशी संबंध दिसत नाही. परंतु प्राचेन काळी विभिन्न कुलांत विवाह होत होते, व कुल उच्च कि कनिष्ठ हे ठरवण्याच्या पद्धती सर्वस्वी धार्मिक आधारावर होत्या, व्यवसायांशी त्याचा संबंध नव्हता एवढे यावरुन आपण म्हणु शकतो. याचाच दुसरा अर्थ असा कि जमातींपासुन जाती बनल्या हे डा. इरावती कर्वे यांचे मत टिकत नाही हेही स्पष्ट होते. उलट जमातींतर्गत विवाह होत असल्याने एकही जमात शुद्ध स्वरुपाची राहिली असेही म्हणता येत नाही.

३. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?: कोणताही समाज असो अथवा राज्यसंस्था असो, अर्थव्यवस्था हा समाजाचा मुलभुत कणा असतो. अर्थव्यवस्थेमुळेच समाजात वर्गव्यवस्था अस्तित्वात येते. अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, वर्गहीण समाज निर्मण करणे हे मानवाचे स्वप्न अद्याप तरी साकार झालेले नाही व कदाचित होणारही नाही.

अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उत्पादनावर आधारीत असते. उत्पादन सहाय्यक सेवांचाही अर्थव्यवस्थेला हातभार लागत असतो. शेती, खनीजे, वस्तु, वास्तु इ. उत्पादने तसेच रक्षण, व्यापार ई. सेवामिळुन अर्थव्यवस्थेची एक चौकट निर्माण होते. आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्राचीन ते मध्ययुगीन स्वरुपावर एक ओझरती नजर टाकली कि आपल्या लक्षात येते कि सनपुर्व ५००० पासुन ते दहाव्या शतकापर्यंत अर्थव्यवस्थेचा चढता आलेख आहे. सिंधु संस्कृतीत मीठ, धान्य, अलंकार, लाकडी इ. वस्तुंचे प्रमाण मुबलक होत होते व निर्यातही होत होती. परंतु असे असले तरी व्यवसायांची संख्या मर्यादित असून शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पुढे जसजसे नवे शोध लागले तसे वस्त्र, लोह-ताम्रजन्य वस्तुंचेही उत्पादन वाढु लागले. प्रारंभकाळी असे उत्पादक लोक अत्यल्प असनार हे उघड आहे. परंतु जसजशी मागणी वाढत जाते तसतशी त्या व्यवसायात अधिक व्यक्तींची आवश्यकता भासू लागते. आवड असनारे प्रशिक्षण घेवून त्या त्या व्यवसायांत पडु लागतात. गरजांची व्याप्ती मोठी असल्याने त्या व्यवसायांत प्रवेश करणारे स्वागतार्हच ठरत असतात, कारण त्यामुळे उत्पादन वाढ होत गरजांची आपुर्ती सुलभ होत असते. नवीन शोध लागला कि पुन्हा तसेच आवर्तन सुरु होते. अशा रितीने व्यवसायसंस्था विविधांगी वाढु लागतात. एकाच व्यवसायात वेगवेगळी कौशल्ये निर्माण झाली कि त्यांचेही स्वतंत्र समुह बनत जातात. हे एकाच वेळीस थोड्याफार अंतराने देशभर घडत जाते. फक्त मीठाची वाहतुक करणारे "लमाण" बनतात तर फक्त अन्नधान्याची वाहतुक करण्यात व व्यापार करण्यात कौशल्य मिळवतात ते "वंजारी, बंजारा" बनतात. परंतु निषिद्ध प्रवेशाची पाटी लागलेली नसते. ही प्रक्रिया जोवर मागणी आणि पुरवठा यात कोठेतरी समन्वय येत नाही तोवर सुरुच राहते.

परंतु नवे शोध थांबले आहेत, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ विभागले जाण्याची शक्यता संपलेली आहे व नवीन अधिकच्या मनुष्यबळाची  आवश्यकता नाही तेंव्हा मुळातच त्या व्यवसायात कोणी पडण्याची शक्यता संपुष्टात येते. थोडक्यात त्या-त्या व्यवसायाला एक स्थितीस्थापकत्व येते.

पण अजुन विपरीत अवस्था आली. समजा एकुणातील मागणी झपाट्याने कमी होत गेली तर? असे कोणत्याही अर्थव्यवस्थेत कधीही घडु शकते हे आपण आधुनिक काळातही पाहतो. मध्य युगात भारतात अशा दोन महत्वाच्या घटना घडल्या. इस्लामी आक्रमणे व त्यामुळे निर्माण झालेली अराजकसदृष स्थिती व त्यामुळे थंडावलेला आंतर्देशीय व्यापार. ठप्प झालेला विदेशव्यापार. आणि अत्यंत महत्वाची बाब म्हनजे अकराव्या शतकाच्या पहिल्या भागात १०२२ पासुन पडलेले सततचे तीन भिषण राष्ट्रव्यापी दुष्काळ.

आता याचा जातीसंस्था जन्माधरित होण्याशी काय संबंध असा प्रश्न वाचकांना पडु शकेल. त्यावर आपण पुढील भागात विवेचन करुयात.

(क्रमश:)
To see previous articles in this series pls visit following links....


http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/blog-post.html
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/2.html


Saturday, October 20, 2012

इतिहासाचे विनम्र पाईक...गुलामच!


खरे तर आपले दैनंदिन जीवन गतकाळाकडे पहातच चाललेले असते. निरभ्र रात्री आपण अनंत अवकाशात पहात असतो तेंव्हा आपण गतकालातच पहात असतो. डोळ्यांनी दिसनारे, नयनरम्य वाटणारे तारे, तारकागुच्छ हे हजारो-लाखो प्रकाशवर्ष इतके दूर आहेत...म्हणजे ते हजार-लाखो वर्षांपुर्वी होते तसे आपल्याला आज दिसत आहेत. या क्षणीचा त्यांचा वर्तमान आपल्याला माहित नाही. माहित होण्याचे साधन नाही. आज कदाचित ते नष्टही झाले असतील...पण ते नष्ट झालेत हे समजायला आपल्याला ते जेवढे प्रकाशवर्षे दूर आहेत तेवढी वर्ष लागतील...म्हणजे थोडक्यात आपल्या हयातीत त्यांचा खरा वर्तमान समजण्याची आपल्याकडे सोयच नाही. म्हणजे आपण अवकाशात पहात असतो तेंव्हा गतकालाकडे वर्तमान म्हणुन पहात असतो. एकार्थाने एका भ्रमाकडे पहात असतो. या क्षणीचे सत्य आपल्याला माहित नसते. माहित होण्याची शक्यता नसते.

आपल्या दैनंदिन जीवनात तरी वेगळे काय घडत असते? आपण गतकाळाच्या असमंजस छायांच्या गडद धुक्यात नित्य वेढलेलो असतो. हा गतकाळ स्वत:चा असेल, समाजाचा असेल, नजीकचा असेल वा अतिदूरचा असेल...पण असतो गतकाळच. आपण वर्तमान समाजाकडे वा स्वत:कडे पाहतो तेंव्हाही आपण स्वत:च्या वा समाजाच्या गतकाळाकडेच पहात असतो. वर्तमानातील समाज पाहण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नाही. वर्तमानात दिसणा-या जीवंत छायांभोवतीचा इतिहासच आपल्याला दिसत असतो. कारण कोनतेही "व्यक्तिमत्व" (मग ते व्य्कतीचे असेल अथवा व्यक्तिसमुहाचे) आपल्या मनात साकार असते ते गतकाळातील एकुणातील अनुभव/छाया/पडछाया/समज/गैरसमज ई. चे एक प्रकट मानसिक रुप असते. त्यावर आधारीत आपण वर्तमानाचे आडाखे बांधत असतो. निर्णय घेत असतो. कृती करायची अथवा न करायची कृती करत असतो.

पण जसे अवकाशात पाहतांना खस्थ वस्तुंचा वर्तमान आपल्याला माहित नसतो, तसेच जीवनात प्रत्यक्ष पाहतांना आपल्याला मानवी इतिहासाचा खरा वर्तमान माहित नसतो. जो इतिहास आपल्याला माहित असतो असे वाटते तो तसाच घडलेला असतो असे नाही. काही गोष्टी तर घडलेल्याही नसतात पण तरीही इतिहासात त्यांना आपण अनन्यसाधारण महत्व देवून बसलो असतो. कधी घडलेल्या घटना केवळ आपल्या लाडक्या चरित्रनायकाला वा स्वत:च्या एखाद्या पुर्वजाला अडचणीत आणतील या कल्पित भयापोटी त्या घटना असत्य म्हणुन पुसटल्याही जात असतात. कधी कधी तर पुरत्या नष्टही करुन टाकल्या गेलेल्या असतात. किंवा अशाही अनेक घटना असतील ज्यांनी कदाचित इतिहासाला कलाटण्या दिल्याही असतील...पण त्यावेळीस त्यांचे महत्व न समजल्याने त्या तशाच इतिहासाच्या कृष्णविवरात अडकुन पडल्या असतील.

पण आपल्याला तरीही इतिहासात पहावेच लागते. आपला वर्तमान म्हणजे गतकाळाची क्षणाक्षणाला बदलत जाणारी पडछाया. इतिहासाचे आकलन भ्रमात्मक/अज्ञानात्मक असल्याने वर्तमानही अर्थातच विकृत बनलेला असतो व त्याधारित आपण भविष्याकडे जात गतकाळ सम्रुद्ध (?) करत जात असतो. अजून भ्रमात्मक इतिहास बनवत जात असतो.

फार क्वचित माणसं असतात जे इतिहासाच्या या अनिर्बंध सत्तेला आव्हान देत असतात. ऐतिहासिक सत्य म्हणुन सांगितल्या जाणा-या असत्यांना नाकारायची हिम्मत दाखवत असतात. सत्य कदाचित त्यांच्याच हाती लागते. तेच अणुगर्भाची पोकळी शोधू शकतात. तेच विश्व वस्तुमानातुन अवकाशभर एका स्फोटातुन पसरले हेही सत्य नाही सांगत अवकाशाचेच वस्तुमानात रुपांतर झाले हे सांगु शकतात. उद्या त्यांचेही ऐतिहासिक "असत्य" अजून कोणीतरी नव्या सत्यात बदलवू शकतो. इतिहास नाकारणा-यांनीच जग घडवले आहे. पुढेही घडत राहणार आहे ते अशाच लोकांमुळे.

इतिहासाचे विनम्र पाईक नेहमी गुलामच राहिले आहेत. त्यांना कधीही स्वच्छ वर्तमान नसतो कारण ते गतकाळाच्या चष्म्यातुनच वर्तमान जोखत असतात. इतिहास गिळत जगत जात असतात. इतिहासाला आव्हान देणारेच इतिहास घडवत असतात...प्रकाशवेगाने वाटचाल करुन अवकाश-सृष्टीचा वर्तमान पाहण्याचे स्वप्न भविष्यासाठी निर्माण करत असतात.


Tuesday, October 16, 2012

"ना डावं...ना उजवं..." एका सामाजिक संतुलनाकडे जाण्यासाठी...



"ना डावं...ना उजवं...काश्मिर, रा. स्व. संघ आणि इतर लेख" हा डा. दत्तप्रसाद दाभोळ्कर यांचा एक चिंतनाने ओतप्रोत भरलेला आणि गहन विचारव्युहांत अडकवणारा लेखसंग्रह अत्यंत सावकाशीने वाचुन काढला. सावकाशीने वाचन अशासाठी झाले कि या संग्रहातील प्रत्येक लेखच नव्हे तर प्रत्येक लेखाचा प्रत्येक परिच्छेदही एकेका विषयाचे वेगवेगळे पैलू एवढ्या समर्थपणे सामोरे येत जातात कि पुन्हा आधीचे परिच्छेद वाचणे आणि चालू परिच्छेदातील विवेचनाचा अन्वयार्थ लावत पुढच्या अजूनच विलक्षण विचारव्युहात प्रवेशण्यातील एक बौद्धिक थरार अनुभवने ही एक आगळीच मेजवानी होती. मी समिक्षक नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत वाचायलाच हवे असे कोणतेही नवे वैचारिक पुस्तक मला आढळले नाही. काही पुस्तकांनी फसगत केली असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हनजे आपली मराठी वैचारिकता कोठे तरी कोणत्या-ना-कोणत्या विशिष्ट, मग ती जातीय असेल कि पक्षीय, कोणत्यातरी वादाला धरुन असेल कि धर्माला, चौकटीत अडकली आहे व त्यामुळेच वैचारिकतेचा मूक्त आविष्कार जणु काही गायबच झाला आहे...अपहृत झाला आहे. हा लेखसंग्रह वेगळा, आवश्यक आणि वाचकाला मूक्त चिंतन करण्यास मोकळीक देणारा ठरतो म्हणुन त्याचे महत्व आहे. "ना डावं ना उजवं" या शिर्षकातच लेखकाने आपण आपल्या मांडणीत संतुलन साधल्याचे सूचित केले आहे...पण हे संतुलन साधतांना त्यांनी दावी बाजुही विचारात घेतलीय तशीच उजवीही. एकांगी मते लादण्याचा प्रयत्न कोठेही केलेला नाही. आणि तरीही त्यांची जीवनाकडे पाहण्याची व्यापक आणि सखोल-गंभीर दृष्टी मनाचा ताबा घेत असते. या लेखसंग्रहातील लेख वरकरणी वेगवेगळ्या विषयांवरचे असले तरी त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे माणुस शोधण्याचा. त्याच्या वैश्विकतेचा पसारा शोधण्याचा!

या लेखसंग्रहात रा.स्व. संघ, सरस्वती नदीचा शोध, १८५७ चे बंड, शेतकरी संघटना, गोर्बाचेव्हकालीन रशिया, सती आणि काश्मिर प्रश्न असे विविधांगी विषय हाताळले गेले आहेत. यात कोणता लेख डावा आणि कोणता उजवा हे ठरवता येणे अवघड आहे कारण मुळातच प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक लेख आपल्याला आजवर अज्ञात असलेले पैलू उलगडुन दाखवत जातो. प्रत्येक लेखावर लिहायला गेलो तर प्रत्येक लेखावर एक लेख होईल!

सरस्वती नदीच्या शोधाची गाथा सांगतांना दाभोळकर सध्या महाराष्ट्रात एक मूलनिवासी विरुद्ध उपरे आर्य असा जो बामसेफी व अन्य कथित पुरोगामी निर्मित एक सामाजिक संघर्ष आहे त्याचे दोन्ही दृष्टीकोनातून विवेचन करतात. मायकेल बामशादचे जेनोम सम्शोधन व तत्पुर्वीचे लो. टिळक, त्याहीआधीचे विल्यम जोन्स, रिश्ले ई.चे ऋग्वेद, मानववंशशास्त्र व भाषाशास्त्राच्या अंगाने झालेले संशोधन हे पायाभूत मानतच मुलनिवासी संकल्पनेची रचना करण्यात आली आहे. पण त्याचवेळीस दाभोळकर सिंधु संस्कृतीचा -हास हा परकीय आर्यादिंचा आक्रमणामुळे नव्हे तर पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाला असे स्पष्ट करत म्हनतात कि सर्व सभ्यता या आपल्याच लोकही आपलेच. सर्वच देशाचे समान नागरिक...आणि अन्यायकारी, समाज विघटित करनारी व्यवस्थाही आपलीच!

हा लेख २००४ मधील. बामशादनंतर पुढेही अजून बामशादपेक्षाही व्यापक दोन डीएनए प्रकल्प झाले. बामशादची निरिक्षणे ब-यापैकी फेटाळली गेली. आर्य वंश व कथित आक्रमण सिद्धांतही ऋग्वेदाच्याच पायावर डा. नी. र. व-हाडपांडेंच्या "कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वा-या" या अभ्यासपुर्ण ग्रंथामुळे फेटाळला गेला. तरीही आजही खूप मोठा वर्ग मुलनिवासी संज्ञेवर विश्वास ठेवतो हे वास्तव आहे. एकसंघ समाज बनावा या ध्येयाने झपाटलेल्या लोकांसमोर एक आव्हान आहे व ते म्हणजे जातीसंस्था मोडायची कशी हा. दाभोळकर म्हणतात जोवर मुळात जातीसंस्था निर्माण झालीच कशी याचे गूढ उलगडत नाही तोवर ती मोडायची कशी हेही उलगडनार नाही.

१८५७च्या बंडाबाबत दाभोळकरांचा अभ्यास व निरिक्षणे वेगळी आहेत. खरे तर त्यांनी यावर पुस्तक लिहावे अशी राजहंस प्रकाशनाची इच्छा होती. त्यांनी ते लिहिले नाही हा ५७च्या अभ्यासकांवर मोठाच अन्याय आहे कारण त्यांची निरिक्षणे व संदर्भ अत्यंत स्वतंत्र असून त्याचे विश्लेशनही वेगळे आहे. शेषराव मोरेंचा ग्रंथ ज्यांनी वाचलाय त्यांनी या पुस्तकातील १८५७ वरील दोन लेख वाचले तरी मला काय म्हनायचे ते लक्षात येईल!

"लाल ता-याकडुन धुक्याकडे" हा लेख मला खुपच आवडला. हे प्रवासवर्णन नाही. हा लेख म्हणजे संक्रमनाच्या काळातील एका देशाच्या नागरिकांच्या मानसिकतेचा, जीवनविषयक बदलु पाहना-या दृष्टीकोनांचा अवगाहन घेणारा लेख आहे. हे सारे वाचत असतांना मानवतेचा एक विशाल पट समोर येतो. लेखकाची अपार सहृदयता सतत जाणवत राहते. आपल्या भारतीय मानसिकतेशी नकळत तुलना होत राहते. तशी लेखकानेही केली आहेच! परंतु एका बलाढ्य कम्युनिस्ट रशियाचे पतन आणि नव्या व्यवस्थेकडे चाचपदत का होईना होनारी वाटचालही अस्वस्थ करते.

खिन्न...उदासवाना करणारा, आपल्याच आत्म्याचे पापुद्रे सोलत रक्तबंबाळ करनारा लेख म्हनजे "सती: एक मूक्त भ्रमंती". या लेखाचे निमित्त आहे राजस्थानातील देवराळ्याला सती गेलेली रुपकंवर. लेखकाने तेथे दिलेली भेट, तेथील भारावून गेलेले चैतन्यमय वातावरण...लेखकालाही त्या चैतन्यातील एक बिंदू झाल्याचा येणारा साक्षात्कारी अनुभव...! हे वाचतांना विचित्र...नव्हे लेखक त्याचे मित्र समजतात तसा माथेफिरुच असला पाहिजे असे वाटु लागते. पण लेखकाच्या त्याक्षणीच्या भारावून गेलेल्या भावनाही कसलाही आदपददा न ठेवता समोर येतात...पण राग येतो हेही खरे. लेखक परत फिरतो...आणि भारावलेली मन:स्थितीही उतरते...स्वत:ची शिसारीही वाटु लागते. सतीप्रथेबाबत भाष्य, संशोधने माम्डत मग ते स्वत:ला सतीस्थानाला भेट देवून आल्याने जे दैवत माहात्म्य येते त्याची जी कथा सांगितली आहे ती आपल्या भारतीय मानसिकतेबद्द्ल घृणा वाटावी अशीच आहे. काही जीवंत जाळुन सती जातात...काही स्त्रीया क्षणाक्षनाने परंपरेच्या आगीत अव्याहत सती जात असतात...हा एक अत्यंत खिन्न करनारा अनुभव देनारा लेख आहे.

कश्मीरबाबतचा लेख एक अशीही विचारधारा अस्तित्वात आहे व ती समजावून घेतली पाहिजे म्हणुन हा मला आवडुनही न आवडलेला एकमेव लेख. अर्थात आता काश्मिरमधील परिस्थितीही बदललेली आहे, व हा लेख १९९१ मधील. त्यामुळे दाभोळकरांचे काश्मीर समस्येबाबतचे मत बदलले असेल अशी आशा आहे.

एकंदरीत गेल्या दहा-बारा वर्षांत या उंचीचे पुस्तक आलेले नाही. यामधील लेखकाची सर्वच मते पटतात असेही नाही. पण ती का पटत नाहीत याचेही मग तेवढेच तार्किक उत्तर शोधायला भाग पाडणारे हे पुस्तक आहे एवढे मी नक्की म्हणेन. भारतीय संस्कृती, एकुणातील मानसिकता, संस्कृती संघर्ष आणि त्यामागील नेमक्या प्रेरणा शोधणे हे आजच्या पिढीसमोरील मोठे आव्हान आहे. एकमेकांकडे बोटे दाखवून आपल्याला खरी उत्तरे कधीही मिलनार नाहीत. जर सर्वांनी मिळुन संस्कृतीची पार सिंधु काळापासून उभारणी केली असेल तर त्या संस्कृतीतील अनिष्टांची जबाबदारीही आपणा सर्वांचीच आहे हे लक्षात ही अनिष्टे कशी दूर करायची हे आपल्यासमोरचे आजचे तातडीचे आव्हान आहे. त्याशिवाय भविष्यातील सम्स्कृतीची निकोप घडण अशक्यप्राय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागनार आहे. हा लेखसंग्रह वाचुन शेवटी जे मला वाटले ते मी ग्रथित केले आहे. सर्वांनी यावर विचार करावा एवढेच मी म्हणेल व हे पुस्तक, तुम्ही कोनत्याही विचारसरणीचे असा अवश्य वाचावे अशी शिफारस करेन!

ना डावं ना उजवं
ले. डा. दत्तप्रसाद दाभोळकर
अक्षर प्रकाशन, पुणे
संपर्क: ९३२२३९१७२०
मूल्य: रु. १७५/-    


Sunday, October 14, 2012

शाश्वत शेती...शाश्वत जीवन...शाश्वत दांपत्य!



सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेमुळे शहरी समाजाचीच जीवनशैली बदलली आहे असे नव्हे तर शेतक-यांच्याही जीवनशैलीत फार मोठा फरक पडला आहे. हा फरक झाल्याने शेतक-यांच्या अर्थकारणात मात्र फरक झाल्याचे दिसून येत नाही. उलट ही जीवनपद्धती शेतक-यांच्या आत्महत्त्या घडवण्यासच अधिक हातभार लावत आहे. ही बदललेली जीवनशैली म्हणजे मुळातच शेती करण्याची बदललेली पद्धती. हायब्रीड...जनुकीय बदल केलेली बियाणी, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा मारा, चुकीची पीकपद्धती व त्यामुळे शेतजमीनींची होणारी अपरिमित हानी...यातुन निर्माण होणा-या समस्या...जीवनसंघर्षात पडत जाणारी ताण-तणावात्मक भर...हे आता सर्वत्र दिसनारे चित्र आहे. पण या समस्यांची सुरुवात आजची नाही हे आपल्याला सहसा माहित नसते. याची पाळेमुळे कृषिक्रांती घडवण्याच्या, तत्कालीन निकडीच्या गरजेच्या पण चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या गेलेल्या पद्धतीतच रोवली गेली होती. आज त्याची भयावहता सर्वांना जाणवू लागली आहे हे खरे पण १९८१ सालीच विदर्भातील करुणाताई व वसंतराव फुटाणे या दांपत्याने या समस्येची भविष्यातील भयावहता ओळखुन स्वत:च्या प्रत्यक्ष प्रयोग, आचरण व सातत्याने प्रबोधन करत "शाश्वत शेती...शाश्वत जीवनपद्धती" या तत्वांवर काम सुरू केले ते आजतागायत ३३ वर्ष अव्याहत सुरु आहे. त्यांचे कार्य आता राष्ट्रव्यापी होत असून हजारो शेतकरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शाश्वत शेती व शाश्वत जीवनपद्धतीचा अंगिकार करू लागले आहेत. या कार्याचा परीघ विस्तारत आहे. तेही कोणतीही संस्था, ट्रस्ट वा संघटना स्थापन न करता. एक रुपयाचे अनुदान अथवा देनगी न घेता. वसंतरावांचा एकाच तत्वावर विश्वास आहे व तो म्हणजे अनुयायी नकोत...सहप्रवासी पाहिजेत. या तत्वामुळे समविचारी, सहद्धेयाने प्रेरीत एक अवाढव्य टीम उभी राहते आहे. एका सायलेंट मुव्हमेंटचा विस्तार होतो आहे.



काय प्रेरणा आहे यामागची? का स्वत:चे आणि अगदी मुलांचेही जीवन या ध्येयाला वाहिले गेले? कसलीही अपेक्षा न ठेवती, प्रसिद्धीची गरजही न भासता कसे य दांपत्त्याला हे साध्य करता आले? हा इतिहास मोठा रोचक आहे.

विनोबाजी व जेपी प्रेरणा

करुणाताईंचे वडील रणजितभाई देसाई हे गुजराथी तर आई बिंदी बिहारी. वडिल आधी गोशाळांचे व्यवस्थापन करायचे. काही काळाने त्यांनी बैलगाडीतुन फिरत विनोबांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार सुरू केला. त्या विक्रीतुन येणारे उत्पन्न तुटपुंजे असे. आई कापुस पिंजणे ते सुतकताई व कपडे शिवण्यापर्यंतचे काम स्वत:च करायची. गांधीवादाचा प्रभाव तेंव्हा अगदीच अतुट असाच होता. १४ सप्टेंबर १९५८ रोजी करुणाताईंचा जन्म झाला. विनोबाजींच्या "सत्य:प्रेम:करुणा" या त्रिसुत्रीतुन व करुणा हे भगवान गौतम बुद्धाचे अव्यवच्छेदक असल्यामुळे व वडिल बौद्ध साहित्याचे अभ्यासकही असल्यामुळे त्यांनी आपल्या कन्येचे नांव करुणा असे ठेवले.

१९६३ साली विनोबाजींनी पवनारला स्त्रीयांसाठी आश्रम काढला. करुणाताईंच्या आईनेही त्या आश्रमात संन्यस्त जीवन जगायचा निर्णय घेतला. करुणाही आईबरोबरच त्या आश्रमात रहायला गेली. करुणाताईंचे सारे शिक्षण झाले ते अत्यंत अनौपचारिक पद्धतीने. विद्वान स्त्रीया देश-विदेशातुन आश्रमात यायच्या. करुणाताईनाही शिकवायच्या. बाळकोबा, विनोबाजींची भाषणे, चर्चा यातुन विचारवैभवही वाढत गेले. अशोक बंगांमुळेही त्यांना खूप शिकायला मिळाले. शेती ते इतर प्रत्यक्ष कामेही करत श्रममाहात्म्यही ठसत गेले. बांगलादेशी शरणार्थींसाठीही काम करायला मिळाले. १९७३-७४ सालच्या दरम्यान विनोबाजींनी करुणाताईंना अचानक एक प्रकल्प दिला. त्यांनी सांगितले कि तू पपयांची लागवड कर. जोवर त्या झाडांना पपया येत नाहीत तोवर मी पपई खाणार नाही. या प्रकल्पासाठी त्यांनी करुणाताईंना ७ गुंठे जमीन दिली.

शाश्वत शेतीचा प्रयोग विनोबाजींच्या प्रेरणेने सुरु झाला तो असा. करुनातांंनी स्वत: मशागत केली, सेंद्रिय खते व त्यांचे प्रमाणही स्वत: निवडले, बियाणी आणुन लागवड केली. पाणी द्यायचे कामही स्वतच. प्रत्येक नोंदी, अगदी खतांवरचा खर्चही ठेवला. आणि जेंव्हा फळे आली तो दिवस आश्रमवासियांच्या दृष्टीने उत्सवाचाच दिवस होता. अशोक बंग स्वत: थोर कृषितज्ञ. त्यांनी सांगितले, ही फळे जागतीक दर्जाची आहेत. विनोबाजींनी आपला पपई-उपवास तोडला. करुणाताईंच्या दृष्टीने हा अतीव आनंदाचा व परिपुर्तीचा क्षण होता. शाश्वत जीवन आणि शाश्वत शेतीचा हा शोध त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देणारा होता.

दरम्यान करुणाताईंचा सामाजिक चळवळीतही सहभाग सुरु झाला. किंबहुना त्यांना त्यांचा जीवनसाथी या चळवळीमुळेच भेटला. जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीच्या काळात "तरुण शांती सेना" स्थापन केली होती. या संघटनेतर्फे वेगवेगळ्या प्रांतात शिबीरे घेतली जात. तरुणांचा सहभाग वाढवला जाई. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा असतांना तुम्ही जयप्रकाशजींच्या आणिबाणीविरुद्ध आंदोलनात कसा भाग घेतला हे करुणाताईंना विचारले तर त्या सांगतात, हे धादांत खोटे आहे. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा कधीच नव्हता. समाजकारण करणा-यांचा प्रभाव राजकारण्यांपेक्षा मोठा असला तरच अनुशासनपर्व येवू शकते असे त्यांचे म्हनणे होते, परंतु तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठेंनी या चांगल्या तात्विक विधानाचा विपर्यास करून आणिबाणीलाच अनुशासन पर्व ठरवून टाकले.

वसंतराव फुटाणे तसे शेतकरी कुटुंबातील. पण तेही जेपींच्या या तरुण शांती सेनेत हिरिरीने काम करत होते. दोघांची ओळख याच निमित्ताने झाली.  चर्चा, वाद-विवाद यातुन मैत्री झाली. दोघांचा विवाहाचा असा विचार नव्हता...पण मित्रांनीच तुम्ही एकमेकांना अनुरुप आहात असा सल्ला दिल्याने त्या दृष्टीने प्रथमच चर्चाही केली. पण विनोबाजींची परवानगी महत्वाची होती. विनोबाजी ब्रह्मचर्याचे समर्थक...पण करुणाताईंनी आपली भुमिका स्पष्ट केली आणि विनोबाजींनी परवानगीही दिली. वैवाहिक जीवनाकडे कल असेल तर सक्तीच्या ब्रह्मचर्याच्या तेही विरोधातच होते. १९८१ साली दोघे पवनारच्या आश्रमातच अत्यंत आश्रमवासी पद्धतीने विवाहबद्ध झाले. या लग्नाला चार-दोन मित्र सोडले तर कोणाचेही नातेवाईक नव्हते. वसंतरावांचा वडिलांचा या विवाहाला कडाडुन विरोध होताच. परंतु इच्छाशक्ती जिंकली. या विवाहाबरोबरच करुणाताईंचे जवळपास १८ वर्षांचे आश्रमवासी जीवन संपुष्टात आले.

शाश्वत जीवन:शाश्वत शेतीच्या शोधात

वसंतरावांचे गांव अमवरावती जिल्ह्यातील रवाळा, पोस्ट सावनूर, ता. वरुड. हे आदिवासी गांव. ६०% लोकसंख्या आदिवासींची, २०% दलित समाज व उर्वरीत अन्य अशी विभागणी. वरूड तालुका तेंव्हाही संत्र्यांसाठी प्रसिद्ध होताच. रवाळा हे मध्यप्रदेशाच्या सीमेला लागुन असलेले गांव. सातपुडा पर्वतराजीचे संगत. मेळघाटाचे अरण्य तेंव्हा रवाळ्यापर्यंत विस्तारलेले होते. वाघांचे दर्शनही दुर्मीळ नव्हते. संत्र्यांसाठी देशभरातुन वरुड तालुक्यात ट्रक्सची वर्दळ असायची. आणि लोकसंख्या हजार-बाराशेच्या घरात. परंपरांचे जोखड वावरत जगणारे सर्वच. वसंतरावांच्या घरच्यांना हा विवाह पचने कठीणच होते. एक तर हा आंतरजातीय विवाह. अजुन वसंतरावांच्या एका बहिणीचे व दोन्ही भावांचे विवाह व्हायचे होते. अशा स्थितीत त्यांचे विवाह कसे होणार ही समस्या भेडसावणारी. वसंतरावांच्या एका भावाचा विवाह ठरला तर करुणाताईंनी तेथे येवून "या कोण?" असा प्रश्न होणा-या सोय-यांनी विचारला तर पंचाईत होवू नये म्हणुन साक्षगंधाच्या दिवशी करुणाताईंना चक्क कोंडुन ठेवण्यात आले. पण सुदैवाने वसंतरावांचे बंधुही तेवढेच बंडखोर. त्यांनी हा सारा बेत हाणून पाडला...सारे काही सुरळीत झाले.

शेती करायची तर शाश्वत पद्धतीनेच असा निर्णय विवाहापुर्वीच या दांपत्याने घेतला होता. पण घरचे मानत नव्हते. प्रयोग करायचे तर स्वतंत्र जमीनीची गरज होती. "रसायने अन्नाला विषाक्त करतात...जर असे विषारी अन्न खावू शकत नाही तर इतरांनाही कसे खावू द्यायचे?" हा दोहोंसमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. मग घरच्यांशी बोलणी करुन वसंतरावांनी बारा एकर जमीन मिळवली व स्वतंत्र झाले.  शेतावरच रहायला आले. चळवळीतील अनेक मित्रही तेथे मुक्काम ठोकु लागले. शाश्वत शेतीचे विविधांगी प्रयोग सुरु झाले. कसलेही रसायनी खत अथवा कीटनाशके न वापरता विविध वाणांची पीके कशी घेता येतील व उत्पादकताही बाधणार नाही   असे प्रयोग स्वत: केल्याखेरीज इतरांना पटवून देणे तर अशक्यप्राय होते. लोक हायब्रीड बियाणे व त्यातुन वरकरणी उदंड दिसणा-या पीकांना सरावले होते. आपल्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या पीक-चक्रांना विसरले होते. सेंद्रीय खतांचे तर नांवही उरलेले नव्हते. बदल घडायला तर हवा होता पण ते तेवढे सोपे राहिलेले नव्हते. स्वत: यशस्वी प्रयोग करणे आवश्यक होते. सुरुवातीला काही प्रयोग सफल तर काही अक्षरशा विफलही झाले. मग यशाची मात्रा दिसु लागली. परिसरातच नव्हे तर देश्भरात प्रचार-प्रसारही सुरु राहिला. पण लोक अद्याप समजावून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

शाश्वत शेतीच नव्हे तर शाश्वत जीवनपद्धती हे ध्येय उभयतांनी बाळगलेले होते. स्वत:च्या गरजा किमान ठेवणे, स्वत:साठी आवश्यक असणा-या सर्वच शेतमालाचे उत्पादन स्वत:च करणे, (अगदी तेलही स्वत:च्या शेतात पिकलेल्या तेलबियांपासून तेलघाण्यावर बनवुन आणणे)) अत्यंत अत्यल्प वस्तुंची बाहेरुन खरेदी करणे ही जीवनशैली म्हणजेच शाश्वत जीवनशैली हे उभयतांचे मुलभूत तत्वज्ञान. ते सर्वच शंभर टक्के पाळु शकत नाही ही जाणीव असली तरी स्वत: फुटाणे कुटुंबीय सुरुवातीपासुनच याच जीवनशैलीचा अंगीकार करुन जगत आहेत व त्या पद्धतीचे फायदे लोकांच्याही लक्षात येवू लागले आहेत. आज शंभराहुन अधिक शेतकरी कुटुंबे या शैलीप्रमाणे वा किमान जवळपास जात जीवन जगत आहेत व त्याची व्याप्तीही विस्तारत चालली आहे.

शाश्वत शेती म्हणजे काय?

शाश्वत शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मात्र तिला एका चळवळीचेच रुप प्राप्त झाले. सभा, पत्रके, अहवाल, प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके या माध्यमातुन देशभर प्रचार सुरु झाला. शाश्वत शेतीची मुलतत्वे म्हणजे १. हायब्रीड अथवा जनुकीय बियाण्यांचा वापर न करता पारंपारिक बियाण्यांचाच वापर करणे. २. फक्त सेंद्रीय खते वापरणे. ३. रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करणे. ४. स्थानिक पर्यावरणाला व मृदेला सुसंगत अशीच पीके घेणे. ५. पीकवितरण योग्य प्रमाणात करणे. ६. निसर्गचक्रात ढवळाढवळ न करता निसर्गापासुन शिकणे. ई.



वरील शेतीपद्धतीमुळे भूजलउपसा मर्यादेत रहातो. करुणाताई म्हणतात उदा. विदर्भातील संत्र्यांच्या बागा म्हणजे स्थानिक पाणी उपसणे व देशभर फळांच्या रुपात पाठवणे. त्यांत पैसा आहे, पण अतिरिक्त सातत्यपुर्ण उत्पादनामुळे विदर्भाची भूजल पातळी संकटात आली आहे. त्यापेक्षा कही प्रमानात का होईना स्थानिक आंब्यांच्या प्रजाती वाढवण्यावर आम्ही जोर दिला. सुरुवातीला सर्वांनाच हे धाडसी पाऊल वाटले. परंतु हळु हळु चळवळ एवढी यशस्वी झाली कि सर्वाधिक चविष्ट आंबे पिकवणारे म्हणुन टाइम्स ओफ इंडियाने आमच्या शेतक-यांची दखल घेतली. उलट उत्त्पन्न वाढायला मदतच झाली व भुजलाचा झाडांकडुनच होनारा अमर्याद उपसा कमी झाला.

हायब्रीड बियाण्यांमुळे रासायनिक खते व कीटनाशके अपरिहार्य होतात, कारण या प्रजाती मुळात नाजूक प्रकृत्तीच्या. पण यामुळे ते विषारीपण अन्नात तर उतरतेच पण कसही कमी झालेला असतो. शेतजमीन हळुहळु निकस होत जाते, खारावू लागते व नापीकतेकडे वाटचाल सुरु होते...म्हणुन मग अधिक खते...हे एक दु:श्चक्र आहे. आज जो फायदा मिळतांना दिसतो तो शाश्वत नाही...तात्कालिक आहे व याची अनिष्ट फळे भविष्यात येणार हे निश्चित आहे. याहुन निर्माण झालेला मोठा धोका म्हणजे खेड्यांत पुर्वी मधुमेह/हृदयविकारदि आजारांची नामोनिशानी नव्हती. आज त्याची लागण ग्रामीण भागात झपाट्याने होवू लागली आहे. गेली सतत ३१ वर्ष प्रचार-प्रसारत्मक चळवळीतुन साध्य झालेली बाब म्हणजे अक्षरश: हजारो शेतकरी आज शाश्वत शेतीचे महत्व समजावून घेवू लागले आहेत, आपापल्या विभागांतील नैसर्गिक परिस्थितीनुसार प्रयोग करत पुढे वाटचाल करु लागले आहेत. अर्थात हे अत्यल्प प्रमाण आहे याचीही जाणीव या दांपत्याला व त्यांच्या देशभरातील सहका-यांना आहे.

सरकारी मदत घ्यायची नाही!

या दांपत्याने शाश्वत शेतीला चळवळीचे स्वरुप देतांना एक निर्धार केला होता व तो म्हणजे कसलीही शासकीय मदत घ्यायची नाही. कोणाकडुनही देणगीही घ्यायची नाही. कसल्याही पुरस्काराला थारा द्यायचा नाही. वृत्तपत्रीय प्रसिद्धीच्या मोहातही कधीही पडायचे नाही. प्रत्यक्ष कामातुनच लोकांपर्यंत पोहोचायचे. हा निर्धार या जोडप्याने कटाक्षाने आजवर पाळला ही अत्यंत अभिनंदनास्पद बाब आहे. अन्यथा अगणित एन.जी.ओ. काम करोत अथवा नकोत, अनुदाने अथवा देणग्यांकडे डोळे लावून बसलेले असतात हे वास्तव आपण पहातो.


एवढेच नव्हे तर या चळवळीला संस्थात्मक स्वरुप जाणीवपुर्वक या दांपत्याने दिले नाही. एका अर्थाने हे एक सैल व अनाम पण समान उद्दिष्टांचे असे संघटन आहे. वसंतराव व करुणाताई जेपींच्या आंदोलनात असल्यापासुनचे त्यांचे देशभरचे अनेक मित्र व त्यात स्वयंस्फुर्तीने सामील होनारे हे सारेच समान पातळीवर वावरत ही चळवळ व्यापक करत आले आहेत. वसंतरावांचे वरुडमधील एक सहकारी मोहन रत्नपारखी सांगतात कि "अनुयायी नकोत...सहप्रवासी हवेत..."हेच या दांपत्याचे मूलभुत तत्वज्ञान आहे आणि त्यामुळेच सामुदायिक...सम-स्वतंत्र-विचारी नेतृत्व हा पाया राहिलेला आहे जो आजच्या काळात दुर्मिळातिदुर्मिळ असाच म्हणावा लागेल. आणि ते खरेच आहे.

दारुबंदी

शाश्वत शेतीच्या कामाबरोबरच सर्वात महत्वाचे काम म्हणजे दारुबंदी. करुणाताई अत्यंत प्रांजळपणे सांगतात कि मी या चळवळीचे नेतृत्व केले नाही. खरे तर आदिवासींचेच गांव असल्याने दारु हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे हे मी मनोमन मान्य करुनच टाकले होते. ग्रामसुधारणांचे, प्रौढ शिक्षणाचे उपक्रम मात्र १९८१ पासुनच सुरु होते. पण एकदा गांवात लग्न करुन आलेल्या काही तरुण सुना माझ्याकडे आल्या आणि दारुबंदीबाबत बोलु लागल्या. विरोध व्यक्त करु लागल्या. आपली दु:खे सांगु लागल्या. मला त्या सर्व प्रश्नांची जाणीव होतीच पण आता आदिवासी तरुणींनाही त्याविरोधात आवाज उठवावा वाटु लागला आहे याचा मला मनोमन आनंद झाला. मी त्यांना सांगितले...मी नेत्रुत्व करणार नाही. आपण सारे मिळुन एकत्र हा प्रश्न सोडवुयात. त्या तरुणी तयार झाल्या. आणि सुरु झाली एक मोहीम.



पोलिसांनी या आंदोलकांविरुद्ध खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गाठली. करुणाताईंसोबत आत्मविश्वास वाढलेल्या या तरुणी पार मामलेदार, जिल्हाधिकारी यांच्याशीच्या चर्चांत/वादांत हिरिरीने भाग घेवू लागल्या. आज परिस्थिती अशी आहे कि गांवातील स्त्रीया ताठ मानेने जगतात. दारुबंदीसोबत स्त्रीमुक्तीची ही अभिनव चळवळ बनली तिही सर्वांनीच नेतृत्व केलेली चळवळ. ती नंतर अन्यत्रही पसरली.

वर्तमान

शाश्वत शेतीचे काम जोमाने फोफावत आहे. जनुकीय बियाणे बनवुन देशाला परावलंबी बनवु पाहणा-या मोन्सेटोसारख्या बलाढ्य कंपनीशीही संघर्ष सुरु आहे. एकट्या वरुड तालुक्यात शंभरेक शेतकरी शाश्वत शेतीच्या मार्गाने सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. या व्यापक कामात आता दुसरी पिढीही उतरली आहे. शालेय शिक्षणाला आई-वडिलांप्रमानेच महत्व न देता प्रत्यक्ष जीवन शिक्षणातुन मिळवलेले ज्ञान ही पिढी प्रचारत आहे वाटत आहे. विनय आणि चिन्मय ही या दांपत्याची मुले. हे दोघेही बायोग्यस तंत्रज्ञान, सुलभ सेंद्रीय खते कशी बनवायची यावरची प्रात्यक्षिके देशभरातुन त्यांच्याकडे भेट द्यायला येणा-या शेतक-यांना देत असतात. स्वत:ही अनेकविध प्रयोग करत आपल्या मातापित्यांना साथ देत असतात. कलकत्ता ते पोंडॆचरी अशा देशभर विखुरलेले सहकारी जोमाने शेतक-यांचे जीवन सम्रुद्ध करण्यासाठी राबत आहेत. त्यासाठी कार्यशाळा घेत आहेत...प्रात्यक्षिके देत आहेत...प्रबोधन करत आहेत.



सध्या वसंतराव स्थानिक वाणांची पण उत्तम उतारा देवू शकतील अशा बियाण्यांची महाब्यंक बनवण्याच्या अवाढव्य प्रयत्नांना लागलेही आहेत. हे कार्य देशव्यापी स्वरुपावर सुरु असून या बीज-ब्यंकेमुळे शेतक-यांना बीजौत्पादक कंपन्यांवर भविष्यात कधीही अवलंबुन रहावे लागणार नाही, स्वत:चे बियाणे स्वत:लाच निर्माण करता येईल असा या उभयतांना विश्वास आहे. सध्या देशी वाणांची व विविध प्रकारची बियाणी उपलब्ध करणे सोपे उरलेले नाही. अनेक भागांतुन अनेक प्रकारची परंपरागत बियाणी पुरेपुर नष्ट झालेली आहेत. हायब्रीड अथवा जनुकिय बियाणी नवीन बियाण्यांचे पुनरुत्पादन करु शकत नाहीत. ते काम फक्त पारंपारिक/नैसर्गिक बियाणी करु शकतात. कारण ती शाश्वत व अविनाशी आहेत.

आता ही बियाणी मिळतात ती आदिवासी शेतक-यांकडुन अथवा दुर्गम भागांतील शेतक-यांकडुन अथवा अल्प प्रमाणात का होईना गांवरान वाण करतात त्यांच्याकडुन. ती सर्व बियाणी एकत्र करत कोठे कोणते बियाणे अनुकुल असेल व अधिक उत्पादकताही देवु शकेल यावर प्रयोग करुन अवाढव्य बीज-ब्यंक निर्माण केली जानार आहे.

या क्रांतीचा भवितव्यातील धोका लक्षात घेतलेल्या विदेशी बियाणी बनवणा-या कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्याचे पडसाद वर्धा जिल्यातील शाश्वत शेती करणा-या काही शेतक-यांना मिळालेल्या धमक्यांत उमटत आहेत.

विदेशी बीजकंपन्या शेतक-यांना पुर्णपणे परावलंबी करत आहेत. दरवर्षी भाव वाढवत शेतक-यांची लूट करत आहेत. एके दिवशी भारतीय शेतीचे संपुर्ण नियंत्रणच त्यांच्या हाती जाण्याचा धोका आताच निर्माण झालेला आहे. या शाश्वत शेतीपद्धतीने आणि बीजब्यंकेमुळे शेतकरी खरा स्वावलंबी "बळीराजा" बनु शकणार आहे.

भारतीय शेतक-याची मानसिकता बदलता येणे सोपे नसते याची उभयतांना ३१ वर्षांच्या अनुभवांतुन कल्पना आली आहे. पण पहाड फोडुन कोट्यावधी शेतक-यांपैकी काही हजार शेतकरी तरी आता प्रत्यक्ष शाश्वत शेतीत उतरत शाश्वत जीवनाचा मार्ग अंगिकारु लागले आहेत ही एक अभिनंदनास्पद उपलब्धी आहे. प्रसिद्धीच्या झोतात न येण्याचे फायदे हेच कि मुख्य उद्देशापासुन, ध्येयापासुन लक्ष विचलित होत नाही. म. गांधीजींचे परम शिष्य विनोबाजींच्या तालमीत तयार झालेल्या करुणाताईंना अन्य कोणत्या आदर्शाची वा व्यक्तिगत आकांक्षेची मोहिनी पडणे शक्य नव्हते. तसे कधीही झाले नाही. आजही करुणाताई व वसंतरावांचे पवनार आश्रमाशी असलेले नाते सुटलेले नाही. आजही ते तेथे कार्यरत असतात. वर्धा जिल्ह्यातही त्यांचे कार्य फोफावलेले आहे. आज विद्रभातच नव्हे तर देशभरात त्यांचे कार्य शेतक-यांत नावाजले जात आहे. वैदर्भियांमद्धे अर्थातच या दांपत्याबद्दल मोठा आदर आहे. करुणाताईंना तर सर्वत्र "विदर्भकन्या" म्हणुनच ओळखले जाते. हाच खरा सन्मान...!

हे एक विलक्षण, एकरुप-एकध्येय असलेले, स्वप्न साकार करण्यासाठी खांद्याला खांदा लावुन बरोबरीने आयुष्य पणाला लावणारे शाश्वत दांपत्य आहे. अशी दांपत्ये या यच्चयावत विश्वात असतील तरी किती? कोणालाही आदर्शभुत ठरावे असे त्यांचे दांपत्यजीवनही आहे.

शाश्वत शेती आणि शाश्वत जीवन ही आजच्या शेतक-यासमोरील स्वप्ने असायला हवीत. शहरी लोकांनाही शाश्वत जीवनशैलीचे मोल समजणे तेवढेच आवश्यक आहे. गरजा किमान करत नेत, मानवी संबंधांना दृढमुल करणारी जीवनशैली म्हणजे शाश्वत जीवनशैली. ही जीवनशैली प्रत्यक्ष जगणे किती सुंदर व अनोखी गोष्ट असते हे फुटाणे दांपत्याच्या जीवनावरुन लक्षात येते. आज आपण मात्र अशाश्वताच्या हव्यासापायी काय करत चाललो आहोत, कोठे चाललो आहोत यावर सर्वांनीच आत्ममग्न होत चिंतन करायला हवे...

बदलायला हवे.

-संपर्क:
सौ. करुणाताई व वसंतराव फुटाणे,
रवाळा, पोस्ट सावनूर,
ता. वरुड, जि. अमरावती
फो.-०७२२९-२३८१७१
    ०७२२९-२०२१४७

Thursday, October 11, 2012

आपणच असे सैतान आहोत!


खरे पहायला गेले तर प्रश्न हा भ्रष्टाचाराचा नसून स्वता:शी आपण किती प्रामाणिक आहोत याचा आहे. स्वत:शी प्रामाणिक नसलेला कोणताही माणुस पैसा खाओ अथवा न खाओ...भ्रष्टच असतो. पैशांचा भ्रष्टाचार विघातक असतो हे खरेच आहे...पण स्वत:शी भ्रष्टाचार करणे हे जगाला तर सोडाच स्वत:लाच अधिक विघातक असते. नव्हे विनाशक असते. नीतिभ्रष्टता नेहमीच स्वविनाशाला जन्म देते.

आपला समाज दुर्दैवाने नैतिक भ्रष्टतेच्या दु:श्चक्रात अडकला आहे. आपण भ्रष्ट म्हणून नाईलाजाने आपले नेते भ्रष्ट आहेत. आणि आपणच निर्माण केलेल्या भ्रष्टांच्या दलदलीत आपण रुतलो म्हणुन आक्रोश करायचा जसा आपल्याला अधिकार नाही तसाच श्री. विजय बळीराम पांढरे या मर्दाचा गौरव करण्याचाही नैतीक अधिकार नाही. कृष्णा खो-यापासून सुरु झालेल्या भानगडी आम्हा नागरिकांना माहित नव्हत्या काय? आम्ही काय केले? आज विजय पांढरेंना संरक्षण द्या म्हणतो...कोणाला? सरकारला? ज्या सरकारनेच हे सारे भ्रष्टाचार राजरोसपणे आपल्या डोळ्यांसमोर केले त्या सरकारला? मग आम्ही काय करत होतो? आम्ही काय करत आहोत? हे ताजे आहे म्हणुन उदाहरण दिले.

खैरनारांना मिडियाने प्रसिद्धीची चटक लावुन हद्दपार करुन टाकले. आता जे खैरनार दिसतात ते अस्तित्वाच्या शोधातील खैरनार. मी त्यांच प्रवास जवळुन पाहिला आहे. त्यांचे आत्मचरित्र "एकाकी झुंज" मीच प्रकाशित केले आहे. त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनामुळे मला दोन वर्ष पोलिस संरक्षणात रहावे लागले आहे. पण खैरनार अज्ञातवासात गेले त्याची पर्वा महाराष्ट्राने केली नाही. उद्या पांढरेही अज्ञातवासात्त...महाराष्ट्र साफ विसरुन गेला तर मला आजिबात आश्चर्य वाटनार नाही...

कारण मुळात आपणच भ्रष्ट आहोत. आपली नैतिकताच संशयास्पद आहे. आपल्याला पांढरेंना वा खैरनारांना वा अन्य महनीय लोकांना एक सामाजिक अपवाद म्हणुनच पहावे लागनार आहे...सैतानांच्या झुंडींत अपवादाने जन्माला येणारी अशी सूर्यफुले...त्यांचे कवतुक सैतान करतात ते केवळ स्वार्थापोटीच!

आपणच असे सैतान आहोत हे आपल्याला कबुल करायला हवे!

Tuesday, October 9, 2012

ज्यांना गुलामच व्हायचे आहे त्यांचे काय करनार?


भारतीय समाजाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे पराभूत मानसिकता. भारतीय माणसाकडुन अपेक्षा तर खूप ठेवायच्या पण प्रत्यक्षात कोणी काही करत असेल तर त्याला नाके मुरडायची. भारतियाचे कोणतेही सिद्धांतन अथवा संशोधन उडवुनच लावायचे. अर्थात पाश्चात्यांनी त्यावर आपली मोहर उठवली तरच मग त्याला डोक्यावर घ्यायचे. लो. टिळकांचे गीतारहस्य हा मराठीतील आजवरचा जगाला आदर्शभुत होईल असा नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे याला आपलीच मान्यता नसते. गुलामगिरी हा म. फुलेंचा वैश्विक जाणीवा/वेदना प्रकट करनारा ग्रंथ विश्ववंद्य होण्याच्या योग्यतेचा आहे यावर आपलाच विश्वास नसतो. पहिली बाब म्हनजे आपल्या जानीवाच जातीय आहेत...आणि त्यातही पराभुत! आपणही वैश्विक ज्ञानात भर घालु शकतो याचे भान आपण हरपुन बसलोत. मग भारतीय वंशांचे विदेशी लोक काही करतात त्याबद्दल मात्र येथे भान हरपुन नाचत बसतो. ही आपली आत्मवंचना आहे याचे भान कधी येणार? साहित्य-संस्क्रुती, संशोधने, तत्वज्ञान अशा सृजनशील बाबींकडे तरी मोकळ्या दृष्टीकोनातुन पहावे कि नाही? पण जातीय दृष्टीकोनातुनच मूल्यमापन करायची, शक्यतो हेटाळायची आपली सवय या देशाचा एक दिवस विनाशच घडवणार याबाबत माझ्य मनात शंका नाही.

गुलाम केले म्हणुन लोक गुलाम होतात हा एक दुर्दैवी भाग झाला. पण ज्यांना गुलामच व्हायचे आहे त्यांचे काय करनार?  प्रस्थापित सिद्धांतांना आव्हाने दिल्याखेरीज नवनिर्मिती कालत्रयी होवू शकत नाही. व्यक्तिपुजक नेहमी गुलामच राहतात. पुढे जायचा प्रवास हा अडथळ्यांचाच असतो. पण एक वाट तरी बनते...नवीन ताज्या दमाचे सिद्धांतक महामार्ग बनवतात. शास्त्र-विचार-तत्वज्ञानाचा भवितव्याचा प्रवास हा असाच होत असतो. पढतमूर्ख गुलाम मात्र त्यांतील सर्वात मोठे अडथळे असतात. स्वत:च्याच कोशात अहंसिद्ध भावनांच्या जंजाळात सापडलेले मानवी प्रगतीला सर्वात मोठे अभिशाप असतात!

मला वाईट याचे वाटते कि माझ्या इंग्रजी पुस्तकांवर पाश्चात्यांनी चांगले म्हटले तेंव्हा कोठे येथील काही लोकांना त्या पुस्तकांना किमान बरे म्हनावेसे वाटले. येथील समाजाची विवेकबुद्धी आधी कोठे गेली होती?  माझ्या विश्वनिर्मितीच्या सिद्धांतावर कार्ल सागान सारख्या महान शास्त्रज्ञानेही टिप्पन्नी केली होती. पण येथे जयंत नारळीकरांना मात्र वाचुन पहायलाही वेळ नसतो...ते तसे लिहुन कळवतातही...येथे नोबेल विनर का होत नाहीत याचे उत्तर या दळभद्री मानसिकतेत आहे.

बदलता आले तर बघा. सिद्धांतांकडे निखळ सिद्धांत म्हणुन बघा आणि त्याचे निरपेक्ष मूल्यमापन करा. त्यातुनच् ज्ञान पुढे जावू शकते. आईन्स्टाईन यांना स्वत:चे अनेक सिद्धांत बाद ठरवावे लागले होते म्हणुन त्यांची योग्यता कोणीही कमी करु शकत नाही. शोधलेच नाही तर सापडेल कसे...किमान एवढा तरे विचार करायला हवा!

माझे आवाहन आहे...मूक्त मनाने आपल्या कल्पनांना मूक्त द्वार द्या...सिद्धांत बनवा...त्याला बळ देनारे होता होईल तेवढे पुरावे गोळा करा...मिळाले नाहीत पुरावे तर सिद्धांत बाद करा...पुढे जा....तुम्ही सोडुन दिलेल्या सिद्धांताचे पुरावे कोणालाही नंतर तरी मिळनार नाहीत असेही नाही.  सिद्धांत अगदीच वाया जातो असे नाही. एखादी सिद्धता होतच नाही हे समजणेही ज्ञानाचेच लक्षण आहे. काही बिघडत नाही. ज्ञानाचा आनंद यच्चयावत विश्वातील सर्वोच्च आनंद आहे!

Saturday, October 6, 2012

तणावरहित पैसा





पैसा आणि तणाव याचे निकटचे नाते असल्याचे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमीच पाहतो. म्हणजे पैसा अपुरा असला तरी तणाव आणि अतिरिक्त झाला तरी त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचा तणाव. शिवाय मुळात पैसा किती असला म्हणजे तो पुरेसा असतो याबाबत सर्वच संभ्रमित असतात. त्याची काही ठोस अशी मानसिक व्याख्या नाही. कितीही पैसा आला तरी तो कमीच वातणे हा एक मानवी स्वभाव झाला. हा स्वभाव काही आजचा नाही. वेदांतही म्हटले आहे कि एकपट धन असलेला दुप्पट धनाची तर दुप्पट धन असलेला चौपट धनाची अपेक्षा बाळगतो. सर्वच धर्मग्रंथांत अतिलोभ असू नये, अधिकची हाव धरु नये, वाममार्गाने धन मिळवू नये अशी आज्ञात्मक विधाने असतातच...पण गंमत म्हणजे स्वत: धर्मसंस्थाही अंतत: धन जमा करण्याच्याच मागे लागलेल्या दिसतात. हिंदू मंदिरांतील अचाट संपत्ती असो कि व्ह्यटिकनकडे जगभरातुन वाहता संपत्तीचा प्रचंड ओघ असो. हा ओघ थांबावा असे धर्मसंस्थांनाही वाटत नाही. मग सामान्य माणसाचे काय?

पैसा आणि सुख यांत नेमका काय संबंध आहे? मी माझ्या गतायुष्याकडे जेंव्हा वळुन पहातो तेंव्हा एक लक्षात येते. मी मोलमजुरी करुन माझे व घराचे पोट भरायचो तेंव्हाची स्थिती आणि माझी स्वत:ची नेटवर्थ २७५ कोटी रुपये झाली या वेळची स्थिती...या दोन्ही स्थितींत मी नेमका कोठे सुखी होतो? मी व्यवसायात फटक्यामागुन फटके खाल्ल्याने माझी नेटवर्थ उणे तीन कोटी झाली तेंव्हा मी कोणत्या मन:स्थितीत होतो?

आणि आज सावरत असतांना मला पैशांबद्दल नेमके काय वाटते?

खरे सांगायचे तर काहीच वाटत नाही.

एक उदाहरण देतो. मी पुण्यात शिकायला १९८३ साली आलो तेंव्हा माझ्या खिशात फक्त ५ रुपये होते. पुण्यात येताच लगोलग पत्रकाराची नोकरी पत्करली महिना दिडशे रुपयांची. पुण्यात त्यावेळी खानावळीचा मासिक दर असे अडिचशे ते तिनशे रुपये. मी एक वेळ खायची सवय लावुन घेतली...ती पार अलीकडे पर्यंत टिकली. मी १९८५ पासुन विविध व्यवसायांत पडलो. १९९५ पासुन कोट्याधिशांच्या यादीत मी गेलो. वयाच्या तिशीत दोन लिस्टेड कंपन्यांचा संस्थापक-मालक बनलो. दाही दिशांनी पैसा अक्षरश: स्वत:हुन वाहत येत होता. मी एकामागुन एक नवी कंपनी स्थापन करत चाललो होतो. काश्मिरमद्धे, लेहमध्ये, पार अरुणाचल प्रदेशात...नक्षलवादी गडचिरोलीत तर कारखाना होताच!

हेतू काय? साधा हेतु होता. उद्योजकाचे कर्तव्य नुसते नफा मिलवायचे नसते. रोजगार काय...तो आपसुक निर्माण होतोच! पण जेथे कोणी जात नाही...कोणीच जात नसल्याने त्या भागांचा आर्थिक विकासच होत नाही, विकास झाला नाही तर दरिद्र समाज विध्वंसकतेकडे झुकु लागतो. काश्मिरमधील असो कि पुर्वोत्तर राज्यांतील दहशतवाद...तेथे उद्योगधंद्यांची पराकोटीची वानवा दहशतवादाचे सर्वात महत्वाचे कारण आहे हे माझ्या लक्षात १९९३ सालीच आले होते. फारुक अब्दुला असोत कि शिवांग थुप्स्तन...सर्वांशी मी याबाबतच चर्चा करत आलो होतो. अब्दुल्लांना ते पटलेही होते. त्यांनी मुंबईत येवून महत्वाच्या औद्योगिक घराण्यांच्या प्रतिनिधींची एकदिवसीय बैठकही घेतली होती. प्रत्यक्षात प्रयत्न करनारा मी एकटाच निघालो. अणि अब्दुल्लांनीच महाराष्ट्रातील एका मान्यवर महान नेत्याला मे भेटुन आशिर्वाद मागितले नाहीत म्हणुन पत्ताही कट केला. काश्मीर टाईम्सने माझी विस्ट्रुत मुलाखतही याबाबत प्रसिद्ध केली होती. असो. आजही माझी भावना आहे कि अधिकाधिक उद्योग या सीमावर्ती प्रदेशांतच निघावेत...फुटीरतावाद थांबवायचा असेल तर आर्थिक सुरक्षा हे आणि नेमके हेच योग्य उत्तर आहे.

असो. माझ्याकडे पैशांचा ओघ चांगला होता, देशविदेशांत आमची उत्पादने विकली जात होती. नवनवीन कल्पना घेत मी नवनव्या कंपन्या काढत होतो. पण का कोणासठाऊक, येणा-या पैशातील काही पैसा स्वत:च्या सुरक्षिततेसाठी गुंतवावा, जमीनी घ्याव्या, शेयर्स घ्यावेत...असे मला कधी वाटलेच नाही. तो माझा महामुर्खपणा होता असं माझे मित्र मला आताही म्हणतात. पण मला खंत वाटत नाही. माझी खरी नेटवर्थ पाच रुपयेच आहे याची जाण कधी सुटली नाही. आजही ती सुटलेली नाही.

तणावरहित पैसा असू शकतो काय? होय. माझ्या मते तणावरहित पैसा सहज असू शकतो. सहजपणे मिळवता येवू शकतो. समजा हाव असली तरी पैसा तणावरहित असू शकतो.

हे अशक्य वाटेल वरकरणी, पण ते तसे नाहीय.

प्रथम आपण पैशांचा अभाव म्हनजे नेमके काय हे पाहुयात. किती पैसा पुरेसा आहे याचे गणित नाही याचे कारण अनुकरनातुन, नक्कलेतुन, आपण आपल्या जीवनशैलीच्या कल्पना घडवत असतो. म्हणजे हजार रुपयाचे साधे मोबाईल इंस्ट्रुमेंट काल करण्यासाठी व घेण्यासाठी पुरेसे असले तरी कृत्रीम जाहिरातींच्या दबावाखाली हाय-फाय इंस्ट्रुमेंट घेण्याची अकारण इच्छा होते...पण प्रत्यक्षात आपली जीवनशैली सुधारायला त्यचा काहीएक उपयोग नाही हे लक्षात घेतले जात नाही. भारतातील मानसिकतेची एक गम्मत आहे. सर्वप्रथम भारतात मोबाईल आले तेंव्हा त्या कंपन्यांची अपेक्षा होती कि डाक्टर-वकील हे आपले सर्वप्रथम ग्राहक बनतील....झाले उलटेच...ज्यांचे खरे तर मोबाईलशिवाय काही अडु शकत नव्हते असेच मोबाईलमागे धावले. आजची हायस्ट व्हर्जन्स घेणारे उद्योजक नाहीत...तर हे मध्यमवर्गीय आहेत. या हायर व्हर्जन्सनी त्यांची कार्यक्षमता मुळीच वाढलेली नाही...उलट घटलेली आहे. कारण त्या अभिनव सुविधांचा वापर टाईमपाससाठीच अधिक होतो आहे. खरे तर हे एकुणातील राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

हे एक उदाहरण झाले. पैशांचा अभाव तेंव्हाच जाणवतो जेंव्हा गरज नसलेल्या गरजांचा हव्यास असतो. उपयुक्ततेपेक्षा स्टेटस सिंबोल म्हणुन एखादी वस्तू घेतली जाते तेंव्हा पैशांचा अभाव जाणवने सहज स्वाभाविक आहे. एका थिकाणावरुन दुस-या ठिकानी व्यवस्थित नेणे हे जर दुचाकी असो कि चारचाकी, वाहनाकडुनची अपेक्षा असेल तर अकारण अमुकच कंपनी---तमुकच मोडेल यांचा हव्यासही तसाच निरर्थक असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली ती आमदनी चवन्नी खर्चा रुपैया...भारतीय अर्थव्यवस्था आज नाही तर उद्या याच मार्गावर जाणार याचे दुश्चिन्हे आताच दिसत आहेत.

हस्तीमलजी फिरोदिया १९९७ साली माझ्या एका कारखान्याचे भूमीपुजन करायला जेजुरी एम-आय.डी.सी.त आले होते. वाटेत मी त्यांना प्रश्न विचारला होता..." भारतीय उद्योग एवढे वर्षे झाली तरी येथीलच बाजारपेठेत अजून का रेंगाळत आहेत? विदेशात जावे तेथे आपली उत्पादने एस्ट्यब्लिश करावीत असे का होत नाही?" हस्तीमलजी यावर म्हनाले होते, ज्यांना हाव आहे त्यांनी ते करावे. तसेही जागतिकीकरण आलेलेच आहे. पण गांधीजींच्या तत्वज्ञानाचा आमच्या परिवारावर पगडा आहे. कोठे थांबायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. उद्योगाचा विस्तार किती मोठा असावा याचे भान नसले तर एक दिवस असे उद्योग स्वत:च्याच ओझ्याखाली चिरडुन जातात."

तेंव्हा मी फारच महत्वाकांक्षी होतो. पार अमेरिकेत सायटेक आयेन्सी ही कंपनीही स्थापन केली होती...अगदी भारतीय रेस्टारंटसची चेन सुरु करण्याच्याही बेतात होतो...त्यामुळे मला हस्तीमलजी जुनाट मताचे पुराणपंथी वाटले होते हेही खरे आहे. पण आज मागे वळुन पहाता लक्षात येते कि हस्तीमलजींनी एक वैश्विक सत्य सांगितले होते, जे आज सर्वांनाच लागु आहे.

म्हणजे खरे तर पैसा हा तनावाचे कारण असतो हे जेवढे खरे आहे त्यापेक्षा खरे हे आहे कि पैशांची नेमकी गरज आपल्याला कधीही मोजता येत नाही यामुळेच पैसा हा तनावाचे कारण बनतो हे अधिक खरे आहे. पैसा हे कर्तुत्वाचे दृष्य मूल्य आहे असे आयन -यंड त्यांच्या कादंब-यांतुन मांडत आल्या आहेत. खरे तर माझ्या पिढीचे असंख्य उद्योजक ते वित्तसल्लागार तिच्या तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. टोकाचा भांडवलवाद हे तिच्या तत्वज्ञानाचे मुलभूत वैशिष्ट्य. रशियासारख्या तत्कालीन साम्यवादी विचारव्युहातुन बाहेर पडतांना कदाचित ही अतिरेकी विचारसरणी जन्माला आलेली असावी. आपल्या मानसिकतेने गांधीवादी (किंवा समाजवादी म्हणा) विचारांतुन बाहेर पडण्यासाठी ही विचारसरणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वीकारली हेही एक वास्तव आहे. पण त्यातील "कर्तुत्व" हा भाग सोयिस्कररित्या विसरला गेला. पैसा हवा हे खरे, पण त्याची मर्यादा कर्तुत्वसापेक्ष राहिली नाही. कर्तुत्वाने तसे सोमेगोमेही अब्जाधीश होवू लागले. इतके कि कर्तुत्ववानांनाही न्यूनगंड चढावा. लोकांचे बळी गेले तरी चालतील, पण पैसा हवा या हव्यासाने आपण अनेक गंभीर सामाजिक सुरक्षितताच संकटात आणुन ठेवल्या आहेत.

कसा असतो तणावरहित पैसा? काय मापदंड आहेत तणावरहित पैशाचे?

भविष्यातील असुरक्षितता हे गरजेपेक्षा अधिक पैसा मिळवण्याचे व संचय करण्याचे एक कारण मानले जाते. त्यात तथ्यही आहे. पण किती? याचा कहीक मापदंड नसतो हेही तेवढेच खरे आहे. मुळात सुनिश्चित असे भवितव्य कशाचेच...अगदी पैशांचेही नसते. कालच्या रुपयाची किंमत पुढच्या दिवशी काय असेल याचे निश्चित भकित करता येत नाही. डा. दत्तप्रसाद दाभोळकरांनी "ना डावं ना उजवं" या पुस्तकतील रशियावरील "लाल ता-याकडुन धुक्याकडॆ" या वाचायलाच हवा अशा रशियावरील लेखात यावर अप्रतिम भाष्य केलेलं आहे. एके काळचा बलाढ्य रशिया रुबल घसरल्यावर कोणत्या दयनीय स्थितीत येतो? अलीकडेच ग्रीसचे काय झाले? दोनच वर्षांपुर्वी अमेरिकेची अवस्था काय होती? गुंतवणुकींचे मोल एकाएकी शुण्य कसे होवून जाते? जर पैशाचेच भवितव्य स्थिर नसेल तर मग भावी आयुष्यातील असुरक्षिततेला पैसा कितपत कामाला येवू शकतो? भावी पिढ्यांसाठी कमवायचे असा "दूरदृष्टीचा" विचार करतात त्यांची तर मला कीवच वाटते. एक तर त्यांचा आपल्या भावी पिढ्यांवर मुळात विश्वासच नसतो अथवा पुढील पिढ्या ऐदी बनाव्यात असाच त्यांचा सुविचार असतो.

म्हणजे गुंतवणुक-बचत महत्वाची नाही असे नाही. परंतु ती करण्यासाठी कमवायचे किती? कसे? यावर विचार करणे तेवढेच आवश्यक आहे. पैसे अधिकाधिक कमवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वातील काय काय आणि किती गमवायचे याचाही विचार करावा लागतो. आपण जो पैसा कमावतो आहोत तो आपल्या योग्यतेच्या प्रमानात आहे कि अधिकचा याचाही निरपेक्षपणे विचार करावा लागतो. पैसा खर्च करतांनाही आपण ज्यामुळे अडत नाही अशा निरर्थक पण स्टेटस देणा-या गोष्टींवर तर खर्च करत नाही ना हेही पहावे लागते.

पैसा कमी असो कि अधिक, तो त्रासदायक, तणावदायक तेंव्हाच ठरतो जेंव्हा पैसा कमवण्यामागील उद्देश निकोप नसतो. मनुष्य हा मुळात निसर्गत: कोणत्याही परिस्थितीशी जुळवुन घेवू शकेल एवढा लवचिक बनवला गेला आहे. परिस्थिती हवी तशी बनवुन घेण्याचेही निसर्गदत्त सामर्थ्य त्याला लाभलेले आहे. दुस-यापेक्षा मोठा व्हायची स्पर्धात्मकता त्याला अनेकदा अडचणीत आणते. स्वत:च्या ताटात काय वाढलेले आहे यापेक्षा दुस-याच्याच ताटात डोकावुन बघत असूयाग्रस्त होण्याचा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. जग स्पर्धात्मक आहे असा आपला भ्रम आहे. ते खरे नाही. जग स्पर्धात्मक असेल तर ते आपण कृत्रीमरित्या तसे बनवले आहे. प्रत्येक व्यक्ति ही स्वतंत्र नैसर्गिक वैशिष्ट्यांनी परिपुर्ण असते. स्पर्धा असलीच तर फक्त स्वत:शी असते. अन्यथा बाह्य स्पर्धा कृत्रीम व एवतेव त्याज्ज्य आहेत. स्पर्धा माणसाला अनैसर्गिक बनवते. आणि म्हणुणच ती तणावाचे मुळ कारण असते. कोण मागे आहे कोण पुढे या सा-या सापेक्ष बाबी आहेत हे आपण लक्षात घेत नाही...म्हणुणच आपण तणावरहित पैसा मिळवुही शकत नाही.

पैसा तनावरहित असु शकतो...नव्हे त्याचे तनावरहित असने हेच त्याचे असण्याचे खरे लक्षण आहे. अर्थाचा पुरुष नव्हे तर पुरुषाचा अर्थ दास असतो. पैशाला दास बनवत सुखी जीवन जगायचे कि पैशाचा दास बनुन तणावसहितचे जीवन जगायचे...निवड आपल्या हातात आहे!

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...