Monday, September 23, 2013

साहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय?


"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे?" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली आहे. साहित्यिक (साहित्यासंदर्भात...व्यक्तिगत नव्हे) वाद-विवाद, साहित्यसंकल्पनांबद्दल घनघोर चर्चा, सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडत चिंतनात्मक मंथन साहित्य संमेलनामुळे घडावे अशी अपेक्षा ठेवावी अशी आजकाल परिस्थिती उरलेली नाही. उलट साहित्यबाह्य कारणांनीच साहित्य संमेलने गाजत आली आहेत. साहित्य जाणीवा त्या वादांत वाहून गेलेल्या दिसत आहेत. तरीही यंदाचे संमेलन सर्वच उमेदवारांच्या समजुतदारपणामुळे आतापर्यंत तरी कसल्याही वादाच्या भोव-यात सापडलेले नाही हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

असे असले तरी साहित्य संमेलनाकडूनच्या अपेक्षा उरतातच. या निवडणुकीच्या निमित्ताने मी जेवढ्या मतदारांशी आणि वाचकांशी संपर्क साधू शकलो त्यावरून साहित्य संमेलनांबाबत केवळ वाचकच नव्हे तर अनेक मतदारच उदासीन असल्याचे चित्र दिसून आले आणि याचे कारण ज्यासाठी म्हणून संमेलन हवे तेच संमेलनात नेमके होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. यातील सर्वात चिंतीत करणारी बाब म्हणजे तरुणांना तर साहित्य संमेलनाचे कसलेही आकर्षन उरलेले दिसत नाही. एक तर त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसे अवकाश सम्मेलन उपलब्ध करून देवू शकलेले नाही. ते नसेल तर नसो पण किमान युवा साहित्यिकांच्या प्रेरणांना, नवनवीन साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचे व त्यावर व्यापक चर्चा घडवण्यातही संमेलन आजवर पुढाकार घेवू शकलेले नाही. साहित्य संमेलनातून काहीतरी दिशादर्शक प्रेरणा मिळाव्यात अशा लेखकांच्या अपेक्षा असतील तर त्यांना वावगे कसे म्हणता येईल?

आणि तरुण लेखकच जर साहित्य संमेलनापासून काही मिळू शकण्याच्या स्थितीत नसतील तर ते तिकडे का फिरकतील?

आज आपण पाहतो कि सर्वशिक्षण अभियानामुळे शिक्षितांचे प्रमाण जवळपास सर्वच समाजघटकांत वाढू लागले आहे. या समाजांतील सर्जनशील प्रतिभा लिहू लागल्या आहेत, अभिव्यक्त होवू लागल्या आहेत. एका अर्थाने हे नवजागृतीचे वारे आहे. स्वागतार्ह आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वच समाजघटकांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असलेले आपल्याला ठळकपणे दिसते. त्यातून निर्माण होत असलेल्या आजवर अपरिचित असलेल्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. त्यांवर उत्तर शोधणे हे सर्वच प्रतिभाशालींचे काम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नवप्रतिभांना जातीय अथवा वर्गीय चौकटीत न अडकावणे यासाठी संपुर्ण साहित्यविश्वानेच सजग रहायला हवे. परंतू आपण पाहतो कि दुर्दैवाने या दिशेने आजवर प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे एकुणातील साहित्य विश्व (वैचारिक/तात्विक मतभेदांसहित) किमान साहित्यएकतेच्या मूल्यावर एकसूत्रात येणे शक्य झालेले नाही. उलट आज बहुतेक जाती/समाजांची स्वतंत्र साहित्य संमेलने भरत आहेत. शहर/प्रांतनिहाय साहित्य संमेलनांना प्रोत्साहन दिले पाहिजे हे खरे पण जातीय साहित्य संमेलने ही पुरोगामी महाराष्ट्राचे कोणते चित्र स्पष्ट करते?

मराठीत एके काळी उच्चभ्रू साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य इ. अशी एक विभागणी नकळत का होईना पण झाली होती. एका अर्थाने साहित्य क्षेत्रातही वर्णव्यवस्थेने प्रवेश केल्याचे ते एक दर्शन होते. पण ही विभागणी पुढे धुसर होण्याऐवजी अधिक कठोर कप्पेबंद होत गेल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. साहित्य हे निखळ साहित्य असून त्यात असे भेदाभेद करून मग त्याचे मूल्यमापण करू नये याबाबत अनेक साहित्यिक/समिक्षक आग्रही असतात. असे असले तरी प्रत्यक्षात ही विभागणी एकुणातच मराठी साहित्याला हानीकारक आहे याबाबत दुमत नसावे. त्या आधारावरच साहित्यिकाचा दर्जा ठरवणे हे तर अधिक हानीकारक आहे. पण यावर जी चर्चा साहित्य संमेलनांतील एखाद्यातरी चर्चासत्रांतून गंभीरपणे केली जायला हवी होती तशी झालेली नाही, हे दुर्दैव नव्हे काय?

बरे, हे येथेच थांबत नाही. साहित्यिकांची जात व प्रांतही साहित्य संमेलनात अनेकदा कळीचा मुद्दा बनत आले आहेत. हे मुद्दे जिंकतातच असे नसले तरी ते रेटले जातात हा सर्वांचाच अनुभव आहे. साहित्याला जात/धर्म/प्रांत नसेल तर साहित्यिकाला हे मुद्दे का लागू व्हावेत? परंतू ते अनेकदा फायद्याचेच जात असल्याने ते वापरले जातातच हेही एक दुर्दैवी वास्तव आहे. यातून साहित्याचे आणि अनेक साहित्यिकांचे एकुणात किती नुकसान होते याचा लेखाजोखा साहित्यिकांनीच मांडायला हवा. पण त्यासाठी जरा निरपेक्ष बनावे लागेल. ते आजच्या परिस्थितीत शक्य आहे कि नाही? मला वाटते शक्य आहे. हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ विदर्भातील लेखकांना पुणे सहजी जवळ करत नाही अशी वैदर्भियांची, मराठवाडियांची तसेच खानदेशी लेखकांचीही तक्रार असते. जे डोक्यावर घेतले गेले ते त्यांच्या अथक प्रयत्न आणि साहित्यनिष्ठेमुळे. पण अनेकजण प्रतिसादांच्या अभावी मधेच गळून पडतात ती संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वाची एकुणातच हानी होतेय याकडे साहित्य संमेलनांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी असंख्य युवा-साहित्यिकांची आहे.

परप्रांतातील मराठी भाषक आणि लेखकांची समस्या तर याहून गंभीर आहे. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत  कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करने काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२)

यातील खंत आजही दूर झालेली नाही. किंबहूना परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परप्रांतांत मराठी भाषकांसाठी (गोवा अपवाद) एकाही मराठी साहित्य मंडळाचे सम्मृद्ध ग्रंथालय नाही. इमारतींची तर बाबच दुर्मिळ. बडोद्याला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून येणारे फिरते पेटी ग्रंथालय सोडले तर काही सुविधा नाही. तीच बाब छत्तीसगढची. येथे भाड्याच्या खोलीत मराठी साहित्य परिषदेचा कारभार चालतो. गुलबर्ग्याच्या ग्रंथालयात ५०-६० ग्रंथ आहेत. खरे तर महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय दरवर्षी ३-४०० ग्रंथांच्या जवळपास तेवढ्याच प्रती विकत घेऊन महाराष्ट्रातील ग्रंथालयांना वातते. त्यात परप्रांतीय ग्रंथालयांचाही समावेश करने अशक्य आहे काय? मराठी साहित्य संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांना अनुदान देतांना परप्रांतीय मराठी लेखकांना प्राधान्यक्रमाने प्रथम पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देता येणे अशक्य आहे काय? ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती देणेही अशक्य नाही. पण त्यासाठी मराठी भाषेच्या वृद्धीची तळमळ व कळकळ लागते. ती आजवर तरी दिसलेली नाही.

हे असे चित्र असेल तर मग परप्रांतांतील मराठी भाषकांच्या गळचेपीबद्दल काय बोलावे? गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोवेकर मराठी बांधव संघर्ष करीत आहेत. पण त्याबाबत मराठी भाषक व महाराष्ट्र सरकार तर उदासीन आहेच, पण खुद्द अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही उदासीन असावे हे मात्र अनाकलनीय व मराठीच्या एकुणातील विकासासाठी हानीकारक आहे. बेळगांव-निपाणीबाबत एवढी वर्ष नियमीत ठराव केले जातात....काय झाले त्यांचे?

थोडक्यात मराठीचे व मराठी साहित्यविश्वाशी निगडित असंख्य प्रश्न आहेत. ते चर्चेत आणने संबंधितांना खरे तर अडचणीचे ठरणारे नसून ते सतत चर्चेत ठेवले तर मराठीच्या एकुणातील संवर्धनासाठी उपयोगाचेच होईल. पण तसेही होतांना आपल्याला दिसत नाही. आजच्या प्रत्यक्ष समस्यांबाबत साहित्य संमेलनांची अशी उदासीनता असेल तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत मराठी साहित्य संमेलन काय भूमिका घेणार आहे? मराठीचा जागर देश-विदेशात व्हावा ही सर्व साहित्यप्रेमी मराठी भाषकांची वाजवी अपेक्षा आहे. पण जेथून चिंतनाचे आणि परिवर्तनाचे धुमरे फुटावेत ते साहित्य संमेलनच त्याबाबत उदासीन असेल तर साहित्य संमेलन म्हणजे तीन दिवसांची जत्रा आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गणपती ही जनधारणा नुसती ठळक होत जाणार नाही तर एक दिवस ती सर्वस्वी बाद ठरतील.

तसे होऊ नये. ते मराठी भाषेच्या, साहित्याच्या आणि समाज-स्पंदनांना जाणवून घेत अभिव्यक्त होत राहणा-या प्रतिभावंतांच्या हिताचे नाही. साहित्य संमेलन हे मुठभरांचे असते या भ्रमातून सर्वच मराठी रसिकांनी बाहेर यायला हवे आणि त्यात कालानुरुप बदल घडवण्यात हातभार लावला पाहिजे. हे खरेच "अखिल भारतीय" आणि "सर्व मराठी साहित्य-रसिकांचे चिंतन-शिबीर" व्हावे यासाठी हातभार लावला पाहिजे.

-संजय सोनवणी


210 comments:

  1. साहित्य साम्मेलानाकडून नेमके हवे आहे - हे शीर्षक वाचले

    आणि

    एका पुस्तकाची आठवण झाली -

    आजच्या काळात जी साहित्य संमेलनाची धामधूम चालली आहे आणि जी मत प्रदर्शने होत आहेत त्यावरून एक आठवण होत आहे -

    जयवंत दळवी यांचे " अलाणे फलाणे " हे पुस्तक वाचताना अगदी संपूर्ण चित्र उभे राहते - त्या पुस्तकाचे नावच ( एक मनोरंजक खाजगी पत्रव्यवहार ) असे आहे

    दोन मित्र एकमेकाला साहित्यविषयक विचारपूस करताना दाखवलेले आहे - एक भाऊराव अलाणे आणि दुसरा बापूराव फलाणे - त्यांची विचारांची देवाणघेवाण आणि त्यांनी सर्व लेखकांबद्दल केलेले मत प्रदर्शन वाचून आजसुद्धा ते तितकेच लागू पडते हे पाहून फार मौज वाटते

    हे पुस्तक साधारणपणे १९८४ ते १९९१ या काळातील ललित मासिकात आलेल्या लेखावर आधारलेले आहे


    त्यातील विजय तेंडूलकर , विंदा करंदीकर गंगाधर गाडगीळ रवींद्र पिंगे -

    विद्याधर पुंडलिक ,वसंत कानिटकर , शंकर पाटील ,विजया राजाध्यक्ष ,

    जी ए , पु ल ,अशा लेखकांची आणि

    महानोर ,पाडगावकर , बापट अशा कवींची चांगलीच खिल्ली उडवली आहे - फारच अप्रतीम

    एकदा हातात घेतले की खाली ठेववत नाही असे पुस्तक आहे -असो !

    त्यावेळचा आणि आत्ताचा चालणारा विघ्न संतोषीपणा ,शंकरराव खरात निवडून आल्यावरचे प्रतिसाद वगैरे आजही महत्वाचे वाटतात आणि करमणूक करतात -

    जयवंत दळवी यांची लेखणी कसे खुमासदार वर्णन करून बहार आणते ते मुळातच वाचण्यासारखे आहे हे मात्र नक्की - लेखक जयवंत दळवी - म्याजिस्टीक प्रकाशन - प्रथम आवृत्ती १९९४

    किंमत ९० रुपये पृष्ठसंख्या २२८.

    ReplyDelete
  2. चैतन्य सर आपण कोण ते मला माहित नाही

    आपण खरच परदेशात आहात का तेपण मला माहित नाही

    पण

    आपले विचार वाचून मन अस्वस्थ झाले आणि म्हणू न आपण निराश होऊ नये इतकेच सांगणे आहे !

    खरेच बस्स झाली ही चिखलफेक ,

    आपापले दोष आपण मान्य करूया !कारण आता कंटाळा आला या बुद्धिभेदाचा -

    असे अनेक मराठा बांधव आहेत ज्यांना इथली भडकावू मते पटत नाहीत

    नीट विचार केला तर जे कुणी असे भडक लिहित आहेत ते काही दुष्ट ,अभद्र विचाराने लिहित आहेत



    विचार असा सुरु केला तर -

    गावगाडा कोण चालवत होते ?गावाच्या गरजा आणि रक्षण कोण बघत होते ?पाटील हेच एकप्रकारे छोटे वतन चालवत - त्यात ब्राह्मण कुठे बसतात -

    मंदिरात पोथी पाठ आणि देवपूजा पाटलाच्या आणि अजून काही सन्मान्य घरात बोलावल्यास करणे हा त्यांचा पोटापाण्याचा उद्योग - त्यात कुलकर्णी वगैरे पदे मुसलमानी आमदानीत मिळाली त्यांना - पण अंतिम वचक पाटलाचाच असे -



    पाटलाच्या किंवा जमीनदाराच्या वाड्यात बुलावा येणे हा समाजात मानाचा मुद्दा होता

    आजकाल सारखे कुणालाही मामलेदार कचेरीत बिड्या फुकत आणि तम्बाकु मळत उभे राहत येते तसे त्या वेळेस नव्हते - पाटलाचा किंवा जमिन दाराचा दराराच असा असायचा की कुणाची नजर वर करून बघायची शामत नसे -

    याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आजही जुने लोक चविष्टपणे आणि गर्वाने सांगतात -



    या वर्गवारीला आणि भेदाभेदाला ब्राह्मण जबाबदार कुठे होता ?

    अशीच अनिर्बंध सत्ता या आपल्या लोकांची शतकानुशतके बिनबोभाट चालू होती

    नंतर यांच्या पेक्षा शूर,कर्तबगार मुसलमान आपली आधुनिक शस्त्रे आणि सावध नेतृत्व घेऊन आले आणि आपल्याला पहिला शह बसला - मग ते यादव असतील ,क्षत्रीय असतील -पण ते कायमचे मांडलिक झाले मुसलमानांचे -धर्मात ढवळा ढवळ सुरु झाली - देवळे फोडली गेली - आपले राजे हरले - ते कोण होते आणि का हरले ?अंभी असो,रामदेवराय यादव असो किंवा कृष्णदेवराय असो - बेसावध राहाणे आणि धर्म आणि देव यावर भरवसा ठेवणे - यामुळे आपण आधुनिकतेची कास कधी धरूच शकलो नाही - समाजाला जिवंत नेतृत्व देण्यात आपण कमी पडलो ! कुणाचे होते ते नेतृत्व - ब्राह्मणाचे का महार मांगांचे -?का मराठ्यांचे ?नक्कीच आपल्याच मराठ्यांचे !

    महाराष्ट्र बंगाल मगध पंजाब - सगळीकडे हाच प्रकार दिसतो जगात काय चालले आहे त्याचे भान आपल्या राज्यकर्त्याना नव्हते - ती दूरदृष्टी आणि आवाका नव्हता !-कोण होते ते ?

    मुसलमानांनी ज्यांची डोकी उडवली ते कोण होते ? आणि ते इतके गलथान का राहिले ?



    आज मराठा आणि ब्राह्मण यात रोटी बेटी व्यवहार होत आहेत ,कोलेजात अनेक ठिकाणी उत्तम ग्रुप असे आहेत जिथे मराठा आणि ब्राह्मण एकजीव वाटतात मग हे असे भडकावू उद्योग कोण करते - हिंदू मुस्लिम तेढीपेक्षा हे महा भयंकर आहे - यातून साधणार काय ?आपण ब्राह्मणांचे नामोनिशाण मिटवू शकतो का - अजिबात नाही - ते आपला नायनाट करतील का - शक्यच नाही - मग आपण 'एकमेका सहाय्य करू-अवघे धरू सुपंथ' असे का नाही वागत ?

    आज मराठा समाजातील अनेक होतकरू मुलांची खात्री झाली आहे - की यामागे सत्तेतील काहीजणांचा आणि सातारकरी लोकांचा हात आहे - हे असे होणे योग्य नाही

    अपा वि मं आणि ब्रिगेड च्या ब्लोग वरचे भडक लेख म्हणजे स्वतः मराठ्यानी आपली दिशाभूल करून घेणे आहे - त्यानी ब्राह्मणाचे काहीही वाईट होत नाही



    चैतन्य ने मांडलेला मुद्दा बरोबर आहे - आपापली कला आणि त्यातील पुढची प्रगती ही त्या त्या जातीनीच करणे योग्य नाही का ?लोहार आणि सुतार यांच्या प्राविण्यात आणि कोष्टी -चांभार यांच्या दर्जा आणि क्षमतेत भरीव सुधारणा घडवून आणण्याचे काम कुणाचे -त्या त्या जाती प्रमुखाचेच ना ?तो मागासपणा घालवायचा असेल तर कुणी प्रयत्न करायचे ?आणि ब्राह्मणाना महत्व कुणी दिले ? राजे कोण होते ?गावगाडा चालवत कोण होते ?नीट शांत मनाने विचार केला तर जातीपातीच्या भिंती अजून बळकट करताना मराठे जमीनदार हेपण तितकेच दोषी ठरतात आणि हे नाकारणे म्हणजे आपलीच फसवणूक करणे आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. @ओंकार निंबाळकर,

      किती घाबरला आहेस, जणू काही तुझ्या जातीवर गदाच आली आहे?

      घाबरू नकोस, हा संघर्ष फक्त ब्राह्मण्यग्रस्त लोकांबरोबर नसून सर्वच जाती धर्मातील
      ब्राह्मणाळंलेल्या लोकां विरोधात आहे.

      ब्राह्मण्यविरहीत ब्राह्मण बना! उगीच बहुजनांना आणि त्यांच्या महानायकांना खलनायक ठरवण्याचा आगलावी प्रयत्न करू नका!

      Delete
  3. ओंकार अरे मला सर म्हणून नको रे बाबा. मी तसा काहीच केलेले नाहीये सर म्हणण्या सारखे. माझे अनुभव आणि मुख्य आम्हंजे बाहेर राहून आल्या नंतर आलेले अनुभव ह्यामुळे खूप विचार बदलले. बऱ्याच ठिकाणी आंबेडकरांचे लोक नाव घेतात पण ते हे विसरतात की स्वतः आंबेडकरांनी कोणाचा असा दुस्वास आणि द्वेष केला नाही. मुळात त्यांची बुद्धिमत्ताच इतकी प्रखर होती की त्यांना डावलणे शक्यच नव्हते. माझे स्वताचे अनेक जातींचे मित्र आहेत. सगळे स्वतःच्या जीवावर वर आलेले आहेत. कोणी कदम आहे, कोणी जगताप आहे कोणी सुतार आहे. कोणी किणी आहे तर अगदी नायजेरिया मधले लोक पण आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात हे असले कधी वाद झाल्याचे आठवत नाही. बहुदा नेट वर आपली ओळख कधीच समोर येत नाही आणि इथे कितीही कसेही बोलले तरी काय फरक पडतो असे असल्याने बऱ्याच लोकांचे भान सुटते असे मला वाटते. नाहीतर समोरासमोर लोक बरेच नरम असतात.

    इथे सोनवणी सरांचे सगळे विचार पटले नाहीत तरी ते कोणाला असे बोललेले दिसत नाहीत. भूमिका बदलत राहतात इतके कळले पाहिजेल. प्रोब्लेम असा आहे की एकदा एका पंथाच्या मागे लागलो की मग भूमिका बदलणे कठीण जाते. मग सारासार विचार बाजूला राहतो आणि आपण फक्त द्वेषाच्या मागे राहतो. माझ्या इंग्लंड वास्तव्यात मला छोट्या छोट्या गोष्टींनीच जास्त शिकवले. प्रत्येक गावात मग ते कितीही लहान असो एक लायब्ररी आहे. प्रत्येक ठिकाणी सरकारी लोक व्यवस्थित माहिती देतात. १६ व्या वर्षी आई बाप मुलांना बाहेर काढतात आणि स्वतःच्या जीवावर जगायला लावतात. आपल्याकडे ६५ वर्षात ही गोष्ट आपल्याला जमली नाही. प्रचंड हाताबाहेर जाणारी लोकसंख्या त्यामुळे होणारे हाल ह्यावर कोणालाही विचार करावासा वाटत नाही.

    आज पुण्याची काय वाट लागली आहे. ती कोणी लावली? सगळे कोणाच्या हातात आहे? पण त्यांना इंग्लंड मधले लेक डीस्ट्रीकट दिसले आणि लवासा उभे राहिले अरे पण तिथे उत्तम बी. आर. टी आहे की जी रस्त्याच्या कडेने जाते आणि मुर्खासारखी रस्त्याच्या मधून जावून लोकांचे प्राण घेत नाही. पण हे दिसत नाहीत. सगळे लोक नियम पाळतात आणि चुकले तर कोणीही असो त्याला शिक्षा होते. ते आपल्या एकाही राज्यकर्त्याला दिसले नाही. पण हे राबवणे म्हणजे त्यांची जहागीरदारी जाणे आहे आणि ते करायला कधीच तयर होत नाहीत. मग काय करायचे तर लोकांना भाडकावायाचे.

    ह्यांना असे वाटले नाही की चांगली कोलेगेस काढावीत. आज सगळ्या पूर्वीच्याच ठिकाणी सगळे जायला मारतात कारण त्यांना थोडी तरी मान्यता आहे बाकीच्या ठिकाणी सगळा अंधाराच आहे. त्यात पुन्हा राखीव जागा. आपण काय करतो आहोत ते राज्यकर्त्यांना भान नाही आणि जे मागणी करता आहेत त्यांना पण भान नाही. मुळात जास्त नोकऱ्या कश्या तयार होतील ह्यावर विचारच नाही फक्त आहे त्याच गोष्टी अजून मोडून सगळ्यांना द्यायच्या म्हणजे कोणालाच धड काही मिळणार नाही. म्हणून तर बरेच ब्राह्मण लोक बाहेर जातात. पण असे किती दिवस चालणार माहिती नाही. एक दिवस हे सगळे बुमरँग होईल पण पुन्हा अक्कल येईल का तर तसे काही दिसत नाही. म्हणून तर हल्ली मी प्रतिक्रिया देणे सोडून दिले. इथे वाद करून आपला वेळ वाया जातोय. त्यापेक्षा काहीतरी प्रोदाक्तीव्ह करावे आणि आपले दयान वाढवावे. इथे मागे कुठल्या तरी ठिकाणी मी एक लिंक दिली होती "small is beautiful" जरूर वाच असली पुस्तके. दुर्दैवाने मराठी मध्ये असले काही येत नाही. तेवढा अवाकाच नाहीये. असो.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वत:च्या देशाला लाथ मारून गोऱ्यांच्या देशांत जाऊन त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे इतरांचे मांडलिकत्व काढण्यात इतका रस का बरे घेत असावेत? की त्याकाळच्या मांडलिक लोकांना जनता आज देखील महान समजते आणि आपल्याला गल्लीतील कुत्रे देखील विचारत नाही हा न्यूनगंड आहे काय?
      ह्या मांडलिक राजांच्या हाताखाली त्या काळचे स्वाभिमानी ब्राह्मण देखील काम करतच होते ना? त्या काळच्या शंकराचार्यांनी ह्या मांडलिक राजाचे तळवे चाटलेच होते ना? जर इंग्रजांपुढे झुकणारा राजा मांडलिक म्हणायचा तर मग त्या राजाचे तळवे चाटणारे आणि थुंकी झेलणाऱ्या ब्राह्मणांना काय बरे म्हणावे?
      ब्राह्मणांना इतरांच्या शिक्षणाची इतकी कळवळ असती तर महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आंबेडकर या सर्वांना आपापली आयुष्ये बहुजनांना शिक्षित करण्यासाठी वेचावी लागली नसती. ब्राह्मण शिक्षण क्षेत्रात होते तेव्हा बहुजनांना असा काय लाभ होत होता?
      मूळ प्रश्न हा आहे की जी जात इतर जातींना हिशोबतच धरत नाही त्या जातीला इतर जाती आज काय करत आहेत याच्या चौकश्या करण्याची गरजच काय? स्वत:चे धोतर फाटले म्हणून दुसऱ्यांच्या कपड्यांची शिलाई उसवत बसणे हे करण्यात ब्राह्मण सोडून इतर कोणालाही रस नाही.

      Delete
    2. भारत सरकारच्या पैशाने भारतात शिकायचे आणि चाकरी करायला परदेशात जायचे, परदेशात जायला सरकार तुम्हाला शिक्षण देते काय? यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये? परदेशात जाऊन चाकरी करणे म्हणजे मोठा पराक्रम करीत आहोत असे जर यांना वाटत असेल तर त्यांचा तो मोठा भ्रम आहे.

      Delete
    3. To Anonymous,

      I am staying in Pune now. I do not hide behind Anonymous name. I not only pay taxes in India but I also pay for education of two children whose mother work at my home. So before jumping to conclusions and wild allegations check the facts, know the person and read more things other than your view. Only then you will understand bigger picture otherwise you will keep on firing allegations but will not be of any use.

      Delete
    4. Its not me. Someone else has put those comments. They were not meant for you. I have already mentioned that I don't hate any one caste. Just like you I too have friends from many different castes. some of them are brahmins and they were my best friends. I have asked these same questions to them. They were unable to answer them.
      When we were in school together they used to have lunch in my home. Sometimes I went to their homes. But now they refuse to eat anything that is cooked in my home. They don't even allow me to enter their homes. Simply because their home is brahmin home after their Upnayana ceremony.
      You would never know how it feels when your best friends think of you as Shudra just because their religion tells them to do so. Its not about one brahmin or one caste. Its about the system that gives complete power to one caste over all the others. What have you done to destroy this system?
      My sister is married to a dalit man. Its not relevant point but just to let you know that we are not troubled by that fact.
      My friends are well educated. But still they are forcing me to dig out the history because the reason for their behavior can only be found in history. These happenings are not thousands of years old. Its happening in present times. I perfectly understand that all the brahmins are not like this. But its not about brahmins. Its about brahminism. Dr. Ambedkar said the same thing.

      Delete
    5. Anonymous, Such things are very unfortunate and I can understand how you would have felt. Problem I see is cast is not in equation till 10th standard. It is only after 10th when you go to 11th or after 12th cast suddenly becomes prominent for any masters degree. As I said before main issue is number of seats. The new colleges, which are predominantly non brahmins and controlled by politicians are unable to raise the education level. That is the most sad part of it. Look at the examples given almost all non-brahmins like Ambedkar, Shahu, karmavir Bhawurao Patil have done excellent work but what happened next? Why is that those institute failed? The problem is whole Indian society, including brahmins do not want to do critical analysis. The issue is as I brahmin I would think because of reservation I lost the opportunity but as I reservation candidate I am angry with brahmins because my forefathers were kept out for last thousands of years. In this equation Maratha's are no where and suddenly they are squeezed. Now they cannot fight to lower cast because they are superior, they themselves do not want to sit with lower cast and they feel they cannot catch up with brahmins. So only soft target remains is brahmins. but in this whole picture basic thing which is to create more good colleges and bring good teachers is completely lost. there is not a single institute which we can be proud of. You need good teachers and you cannot simply bring teaching qualities just by reservations. It has to be in you. Leave brahmins aside I have been privy to many maratha teachers. They were as good as many brahmin teachers. The whole structure has to change but we cannot change because we don't want to see the bigger picture. Look at the debates it is personal animosity and nothing else. Anyway this is endless topic. Unless our political class understands this nothing will happen. It would only be at individual level, which I am trying but it will not help. I am not sure what else to do. We have no good leaders to look up to nor do political class lead by example. What'a left is to fight amongst ourselves. Look at Pakistan, do read articles by Najam Sethi, Watch his program on youtube. You would see that Pakistan is as divided society as we are and we unfortunately are going in that direction. There is no sect left in pakistan which is not affected by violence and we are following same things. Now its brahmins next it would be someone else. Next it would be within maratha's. This is how things happen. history repeats itselfs but always have different route.

      Delete
  4. गुजरात महिमा: एका नापास विद्यार्थ्याची गोष्ट...........

    मोदींच्या काळात गुजरातने प्रचंड प्रगती केली असा आभास तयार करण्यात आला आहे. पण आपण गुजरात विषयक कांही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही. गुजराती लोक सैन्यात भरती होत नाहीत. देशासाठी रक्त सांडायला हे लोक कधीच तयार होत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये गुजरातचे शहीद सैनिक दिसत नाहीत. आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार?

    स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात भारताच्या प्रत्येक प्रदेशात अनेक क्रांतिकारक झाले, त्यांनी छातीवर गोळ्या खाल्ल्या, फासावर चढले, पण गुजरातमध्ये असे झाले नाही.

    मुंबई मध्ये सुमारे तीस टक्के लोक गुजराती आहेत. मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेंव्हा जे लढले, त्यात गुजराती कुठे होते? मुंबई पोलिसांत अगदी पंजाबी, तमिळ लोक दिसतात, पण गुजराती पोलिस, पोलिस अधिकारी कधी दिसला आहे का? म्हणजे इतरांनी आमचे संरक्षण करावे, मरावे, आम्ही आपला पैसा कमावत रहाणार अशा विचारांचे हे लोक आहेत. दमडी जाये पर चमडी न जाये.

    मोदी हे कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत. पण आपण मनोरंजनासाठी असे मानले की मोदी पंतप्रधान झाले, तर हे नक्की आहे की ते युद्ध उकरून काढतील. या युद्धात देशभरचे अनेक सैनिक मरतील, अपंग होतील, पण यात मोदींच्या गुजरातचे काय जाणार आहे? या युद्धात एकही गुजराती मरणार नाही.

    महाराष्ट्र, पंजाब आणि इतर अनेक प्रदेशातील लोकांसाठी सैन्याच्या अनेक रेजीमेंट्स आहेत. मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, बॉम्बे स्यापर्स, पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, राजपुताना रायफल्स, आसाम रायफल्स, जम्मू-काश्मीर रायफल्स वगैरे वगैरे. गुजरातचे काय? 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

    जी गोष्ट संरक्षण क्षेत्रात गुजरातच्या योगदानाची तीच गोष्ट खेळातील. भारताला ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदके मिळवून देण्याच्या वल्गना मोदी करतात, पण आज पर्यंत ऑलिम्पिक राहो, पण आशियाई खेळात देखील एकाही गुजराती खेळाडूने सुवर्ण तर जावो, कास्य पदकही मिळवले नाही. ज्या लोकांसाठी पैसा हाच खेळ आहे, त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही. मुळात गुजराती खेळाडू असतातच कोठे?

    कला, क्रीडा, साहित्य, साहस, विज्ञान अशा सगळ्याच विषयात गुजरात नापास आहे.

    येथे सांगायचा उद्देश हाच आहे की मोदी लोकांना मूर्ख बनवत आहेत, आणि अनेक लोक समजून-सवरून मूर्ख बनत आहेत. गुजरातची अवस्था त्या विद्यार्थ्यांसारखी आहे की जे विद्यार्थी एखाद्या विषयात ब-यापैकी मार्क मिळवतात, पण बाकी सगळ्या विषयांमध्ये नापास होतात. मग तो नापास विद्यार्थी एका विषयाच्या जोरावर आपण कसे हुशार आहोत हे सांगत सुटतो. त्याचे ऐकून कमी समज असणारे लोक सगळ्या विषयांमध्ये चांगल्या मार्काने पास होणा-या विद्यार्थ्यांपेक्षा या नापास विद्यार्थ्याने अभ्यासात चांगलीच प्रगती केली आहे असे समजू लागतात.

    ReplyDelete
  5. इथे आता मोदी कुठून आले? बर त्या गुजरात मध्ये सगळे पोलीस बाहेरचे आहेत काय? किती लोक सैन्यात देशाची सेवा म्हणून जातात आणि किती फक्त बाकी कुठे नोकैर मिळाली नाही आणि एकदा सैन्यात गेले की कायम पेन्शन मिळते आणि सगळीकडे स्वस्तात गोष्टी मिळतात म्हणून जातात? तुम्ही स्वतः गेला आहात का सैन्यात? स्वतः काय केले? मग बाकीच्यांना कशाला बोलताय. तुमच्या खानदानात किती लोक गेले सैन्यात?

    मग गुजरात मध्ये सगळेच धंदे वाले असल्याला पाहिजेल होते. तिथे गरिबी नसायालाच नको होती. तुम्हाला कोणी अडवले धंदा करण्यावाचून? त्यात असणारी जोखीम घेतं का तुम्ही? नोकरी कोणाकडे करतं शेटजी कडे का सरकारी कार्यालयात जावून काम न करण्याचे पैसे खाताय?

    काय तरी आपले कल्पना करायच्या आणि भादाकावायाचे लोकांना

    ReplyDelete
    Replies
    1. याला गुजरात्यांचा आणि मोदिचा का एवढा पुळका आला आहे समजत नाही!

      बायको गुजराती नाही ना? की भाजपाचा प्रचारक आहेस ते तरी सांग?

      Delete
  6. आप्पा - संजय सर , जवळ जवळ ६५० - ८५० शब्द खर्च करून इतके छान लिहिलंय

    बाप्पा - पण कुणीतरी एकदम मोदी चाच मुद्दा काढलाय

    आप्पा - आपल्या संजयने किती मेहनत घेतली आहे , आज महिनाभर त्याची धावपळ चालली आहे -पण हे असे मधेच कोण काय लिहित आणि हिरमोड होतो - गड्यांनो , कृपया असे करू नका

    बाप्पा - आपले मतभेद बाजूला ठेवा , एका चांगल्या उद्देशाने संजय उभा आहे - त्याला पाठबळ द्या - उमेद द्या -इतकीच त्याची इच्छा असणार - ते आपण करुया

    आप्पा - आपल्याला इतकच कळत की त्याचे मन निर्मल आहे आणि वागणे बोलणे सुसंस्कृत आहे

    बाप्पा - त्यांच्यावर अनेक वैचारिक हल्ले झाले , पण त्याने कधी जीभ विटाळली नाही की कुणाला शिवीगाळ - टिंगल टवाळी केली नाही -

    आप्पा - आता हळू हळू चांगल्या मनाने लोक आपापल्या भूमिका या ब्लोगवर मांडू लागले आहेत याचे श्रेय खरेतर संजयच्या संयमी वृत्तीला जाते बाप्पा - अजूनही तोल सोडून बेनामी लिखाण करणारेपण आहेत , पण हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत जाइल -

    बाप्पा - प्रबोधनाचा दिवा घेऊन जाणाऱ्या संजयच्या पायापाशी असा अज्ञानाचा अंधार थोडासा पडणारच !पण संजय त्यामुळे गोंधळून जाणार नाही

    आप्पा - चैतन्य ,निंबाळकर आणि घाटगे , सांगलीकर , सागर भंडारी असे अनेकजण चांगले लिहित आहेत , पुढे येत आहेत !

    बाप्पा - माझ्या साठीशांतीलापण तू माझे असेच कौतुक केले होतेस !फक्त नावे बदलली होतीस आणि दर वेळेस एकेक नाव गळत गेल्यावर वैकुंठावर तू त्यांचे असेच कौतुक केले होतेस !- हे बरे नाही !

    आप्पा - म्हणजे - कमाल आहे ! मी संजयची चेष्टा करतो असे म्हणायचं का तुला !माझे शब्दभांडार अगदी तोकडे आहे रे - व्ह . फा . झालेला मी किती उद्या मारणार ?

    बाप्पा - पण मी तुला टोचून बोलत नाहीये ! तुला डिक्शनरी घेऊन जिद्दीने ओ हेनरी आणि

    बर्त्रोंड रसेल , इमन्युएल कांट ,डिकन्स , ऑस्कर वाईल्ड असे एकेक नेटाने वाचताना पाहिलंय मी - आमच्या फ़र्ग्युसनच्या सरानीच तुला ती डिक्शनरी

    कौतुकाने दिली ते आठवतंय मला !

    आप्पा - संजय पण असाच नेटका आणि अभ्यासू आहे रे !

    बाप्पा - आपण त्याला शुभेच्छा देऊया -! संजयजी , आपली लेखणी कधीही खाली ठेवू नका हीच अपेक्षा आणि प्रेमाची मागणी !

    ReplyDelete
  7. पल्लवी सरोदे यांनी इतके सुंदर लिहिले आहे आणि आपण कुणीतरी निनावी त्यांना लाज वाटत नाही असे का विचारता - त्यांचे अभिनंदन केले पाहिजे


    आज समजा आपले सर्वांचे महान , आधुनिक कोल्हापूरचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज जर असते तर त्यांनी खालील प्रसंगात काय केले असते ?


    महालक्ष्मी च्या देवळात प्रसादाचे लाडू वळण्यास बायकाना बंदी आहे

    त्याचे कारण बायकांचा विटाळ आणि देवीचे पावित्र्य असे दिले जाते


    अशा परिस्थितीत हा पुरुषी माज आणि पुजाऱ्यांचा उद्धटपणा राजार्षिनी खपवून घेतला असता का ?स्त्रीयांना गाभाऱ्यात पूजा प्रवेशासाठी राजर्षिनी काय केले असते ?


    मी विनाविलंब उत्तराची आणि ब्रिगेड आणि अ प वि मं सारख्या आणि अंध श्रद्धा निर्मुलन समिती आणि इथले तमाम शाहूप्रेमी मंडळीना हा प्रश्न विचारात आहे !

    उत्तर न मिळाल्यास सर्वाना मात्र मी विचारू शकते - आपल्याला या कोल्हापूरच्या इभ्रतीच्या प्रश्नावर मुग गिळून बसायला लाज कशी वाटत नाही ?

    ReplyDelete
    Replies
    1. महालक्ष्मी, कोल्हापूरची!

      कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने कोल्हापूरला ठार मारले व त्याच्याच इच्छेप्रमाणे करवीर शहराचे नाव ‘कोल्हापूर’ ठेवले,” अशी आख्यायिका आहे.

      सांस्कृतिक नोंदी

      महालक्ष्मी, कोल्हापूरची

      महालक्ष्मी आणि कोल्हापूर यांचं अतूट नातं आहे. कोल्हापूरकरांच्या मनातली महालक्ष्मीची भक्ती, प्रेम ना कधी कमी झाले ना कधी त्यांचे या मंदिराचे आकर्षण. तेथील अंबाबाईचे सुरेख, ऐतिहासिक मंदिर वाढत्या गर्दीच्या लोंढ्यांनी न भ्रष्ट होवो-न त्याचे सौंदर्य घटो याची चिंता मात्र कोल्हापूरकरांच्या मनाला सतावत आहे, एवढी मंदिरातील गर्दी वाढत चालली आहे!

      महालक्ष्मीचा नवरात्रोत्सव तिची खुलवणारी नयनरम्य रूपे दाखवत सुरू होतो. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, महाद्वार, दिङ्‌मूढ करणार्‍या सात दीपमाळा, त्यांवरचे नक्षीकाम, शिल्पकलेने साकारलेले भव्य मंदिर व या प्रांगणातील अडीचशे मंदिरे पर्यटकांची, भक्ताची मने मोहित करतात. भक्ती ही जातीची, धर्माची व भौगोलिक बंधने तोडून मानवा-मानवात विराजमान आहे याचे प्रत्यंतर येथे येते हे खरे, तरीही महालक्ष्मी मंदिर आणि कलानगरी कोल्हापूर यांचे भौगोलिक आणि म्हणून भावनिक सान्निध्य अभेद्य आहे. कोल्हापूरच्या लहानमोठ्या भिन्न भिन्न मार्गांतून जातजातच ही कलानगरी भाविकांना अंबाबाईचे दर्शन घडवते. कोल्हापूर शहराच्या राजारामपुरी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, गंगावेश, रंकाळावेश, लक्ष्मीपुरी, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, वाशीनाका, खरी कॉर्नर, खासबाग, पापाची तिकटी, भवानी मंडप, महाद्वार रोड, भाऊसिंगंजी रोड, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, कावळा नाका, गुजरी बोळ, बक्षी बोळ इत्यादी भाग, रस्ते आणि बोळांतून फिरत फिरत पर्यटक मंदिरापर्यंत पोचतो.

      Delete
    2. महालक्ष्मी, कोल्हापूरची!

      नवरात्रोत्सव काळात मंदिराच्या प्रांगणातील सात दीपमाळा रोज रात्री प्रकाशाच्या तेजाने झळाळून उठतात. मंदिराच्या गरूड मंडपात अत्तराचे सुगंधी वातावरण दरवळून टाकतात, लखलखत्या दिव्यांचे झगमगाट डोळे दिपवतात, रेशमी वस्त्रातील सौंदर्यवतींची गडबड, हास्यविनोदाची कारंजी, कार्यक्रमाची उत्सुकता रोजच्या प्रत्येक ‘माळे’गणिक वाढत जात असते. पुरूषांचे दिमाखदार पोषाखातील रुबाबदार वागणे एकीकडे तर स्त्रियांची कुजबूज त्यांची डोलणारी केशभूषा, कर्णभूषणे, भरजरी पदरांचे सरकणे अन् सावरणे दुसरीकडे अशा उत्साही वातावरणात सुरू होणारा गायनाचा कार्यक्रम....

      स्टेजवर आणखी झगमगाट, गायक, वादक-वाद्ये, मागे पडद्यावर चमचमणारी चंदेरी अक्षरे.... मग पसरत जाते शांतता. ही शांतता सुरेलपणे भंग करत वातावरणात उमटतात मंद स्वर, वाढत्या लयीबरोबर वाढत जातात उत्कट भाव, विशिष्ट रागदारीचे बहरलेले क्षण. त्यात मन आनंदाने ओसंडून वाहत स्थळकाळाचे भान हरपून झडतात नवरात्रोत्सवातील भक्तिरस गायनाच्या मैफली. गाण्याच्या मैफिली हे कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

      हेमाडपंती बांधकामातील महालक्ष्मीच्या मंदिराला पाच शिखरे आहेत. देवीची मूर्ती रत्‍नशिलेतली. मूर्तीचा आकार साळुंकीसारखा. मूर्ती दगडी चबुतर्‍यावर उभी आहे. मूर्तीच्या दगडात हिरकरगड मिश्रित धातू आहे. मूर्ती चतुर्भूज असून हातात वेटक, ढाल, म्हाळूंग अन् पानपात्र आहे. मस्तकावर मुकुट व त्यावर शेषशायीने छाया धरली आहे. संशोधकांच्या मते, या पाषाणाची प्राचीनता सहा हजार वर्षांपूर्वीची असावी.

      देवीच्या साडेतीन पीठांपैकी कोल्हापूरची अंबाबाई हे एक आद्यपीठ आहे. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर भव्य व भक्कम आहे. मंदिरात जाण्यासाठी चारी दिशांना दारे आहेत; पण पश्चिमेला असेलेल दार मुख्य आहे. त्याला ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या गाभार्‍यात देवीची मूर्ती आहे. देवीचे तोंड पश्चिमेला आहे. तिला चार हात आहेत. गदा, ढाल व पानपात्र हा आयुधे तिने हातांत घेतली आहेत.

      या देवीची कथा अशी.... इंद्र व महिषासूर यांचे युद्ध सुरू झाले. ते शंभर वर्षे चालू होते. शेवटी इंद्राचा पराभव झाला. महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. शंकराला हे समजले तेव्हा तो संतापला. त्याच्या डोळ्यांतून अग्नी बाहेर पडू लागला. त्यातून देवी प्रगट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली. तिला शस्त्रे दिली. मग देवीने भय़ंकर गर्जना केली. त्यामुळे पर्वत डळमळले. देवीचे व महिषासुराचे युद्ध झाले देवीने महिषासुराला व इतर राक्षसांना ठार मारले. तीच ही महालक्ष्मी.

      ब्रह्मदेवाचा मानस पुत्र कोल्हापूर. त्याच्या मुलाचे नाव ‘करवीर.’ करवीरने लोकांचा छळ सुरू केला. मंदिरे तोडून टाकली. शेवटी शंकराने करवीरला ठार मारले. याचे स्मरण म्हणून त्या गावाला नाव ठेवले ‘करवीर’ आपल्या मुलाच्या मृत्यूला कारण महालक्ष्मीच आहे, असे कोल्हापूरला वाटते.

      त्याने देवीची प्रार्थना केली, “तू शंभर वर्षे हे स्थान सोडून जा...’ देवी निघून गेली. मग कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने कोल्हापूरला ठार मारले व त्याच्याच इच्छेप्रमाणे करवीर शहराचे नाव ‘कोल्हापूर’ ठेवले,” अशी आख्यायिका आहे.

      आठव्या शतकात भूकंपामुळे मंदिर खचले होते. नवव्या शतकात राजा गडवादीक्षाने मंदिराचा विस्तार केला. दररोजच्या पाद्यपूजा, महापूजा या कृत्यामुळे मूर्तीची झीज होऊ लागली. त्यामुळे १९५४ साली वज्रलेप करून मूर्तीची पुन्हा स्थापना करण्यात आली.

      मंदिराच्या आतील बाजूला विचित्र पद्धतीने उभ्या असलेल्या मंदिराच्या लहान लहान कपर्‍या १९६० साली काढून त्या एका रांगेत सिमेंट काँक्रिटच्या ओतीव कामात बांधण्यात आल्या. त्यामुळे आवाराला भव्यता आली. महालक्ष्मी प्रांगणात व अवतीभवती सुमारे अडीचशे मंदिरे आहेत. कोल्हापूर शहरात एकूण तीन हजार मंदिरे आहेत.

      - अशोक मेहता

      Delete
    3. विटाळ वगैरे ब्राह्मणी डोक्यातील खुळचट कल्पना आहेत!

      अंबामातेला (महालक्ष्मीला) मासिक पाळी येत नव्हती काय?

      महालक्ष्मीच्या देवळात प्रसादाचे लाडू वळण्यास बायकाना बंदी आहे. विटाळाच्या नावाने निव्वळ अडाणीपणा, नाहीतर काय?

      असल्या मंदिरात तुम्हाला जायलाच कोण सांगते?

      त्या पेक्षा सावित्रीबाई जोतीराव फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर देवून योग्य ती कृती करा.

      Delete
    4. खरेच, त्या पेक्षा सावित्रीबाई जोतीराव फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून योग्य ती कृती करा.

      Delete
    5. अमृता विश्वरूप, आगाव, चावट, खोडसाळ !!!!!!!!!!!!

      Delete
    6. @Anonymous September 27, 2013 at 11:24 AM

      VERY GOOD SIMILE TO AMRUTA.

      Delete
    7. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

      १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
      २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
      ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
      ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
      ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
      ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

      भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

      Delete
  8. खरेतर "देव मानणे हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे" हे सांगायला अंधश्रद्धा निर्मुलन करायला निघालेले सुद्धा घाबरतात. मी त्यांना दोष देतो, असे नव्हे तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत एवढेच. देवा- धर्माच्या नादाने आपल्या असंख्य पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आपण वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणार आहोत की नाही? आपण अंधश्रद्धा मुक्त होणार आहोत की नाही? डॉ. श्रीराम लागू अगदी सत्यच बोलतात की "देवाला रिटायर करा".

    -आनंद जोग.

    ReplyDelete
  9. आपल्याला मंदिरात जायला जर मज्जाव असेल तर असे म्हणणे संयुक्तिक ठरेल "तुम्ही हि गेलात खड्यात आणि तुमचे देवही" नको आहेत ते तुमचे देव ज्यांना स्त्रियांचा विटाळ होतो! पूर्णपणे बहिष्कार टाका!

    कल्पना घोडके, पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. Boycott is a need of times!

      Delete
    2. असल्या मंदिरांवर बहिष्कार हि काळाची गरज आहे!

      Delete
  10. Pratek veli sriyavar honarya atyacharala sarva sriyanchya sanghatana milun avaz ka uthvat nahit?
    Ekhadya mahapurushachi kinva eka jagruk sanghatnechi madatach ka lagte?
    Kinva devlat honara apman evda jivhari lagat asel trr jatach kashala devlat?
    Laj hi sarva sriyana vatli pahije karan tumhi ajparyant kadhi sanghatit houn swatachya anyayaviruddha avaz uthavala nahi.
    Sarva goshti ya mahapurushanvar sodun dyayla tumhala kahich kasa vatat nahi?
    Jar sriya purushanchya barobarine ya vidnyanyugat vavartat tarr tyani asa devbholepana takava magach te ek paul nakki purushala mage taktil ani te paulch krantiche asel.
    Karan kontyahi deshachi pragati hi tethil asnarya sriyanchya pragativarch avalambun aste-Dr. B. R. Ambedkar.

    ReplyDelete
  11. संजय सोनवणी ,

    अमृता विश्वरूप यांनी विचारलेला प्रश्न सर्व स्त्रियांचा प्रातिनिधिक प्रश्न आहे आणि आपल्या ब्लोगवर हा मुद्दा त्यांनी अत्यंत समयोचित असा नवरात्रीपुर्वीच्या काळात विचारला आहे -

    याची चर्चा आणि उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे आम्हाला वाटते म्हणून थोडीशी चर्चा आणि आमचे मत मांडतो - प्रत्येकाला आपापले वेगळे मत असू शकते ,परंतु महाराजांच्या उल्लेखाने विचारलेल्या प्रश्नाला जबाबदारीने आणि सभ्यपणे जातीयवाद न घुसडता उत्तर देणे आपल्यावर आपोआप बंधनकारक आहे !



    राजर्षिनी सर्व आयुष्य समाज सुधारणा करण्यात घालवले - टिळक काय किंवा राजर्षी काय कमी अधिक फरकाने त्यांच्या सामाजिक जाणीवा आपण जाणून घेऊ शकलो तर आज त्याचा आपल्याला सशक्त आधुनिक मराठी समाज निर्माण करताना नक्कीच उपयोग होईल !पुर्वासुरीनी घेतलेल्या भूमिका आणि आधुनिक समाजाच्या आजच्या पावित्र्याच्या धारणा यामध्ये आवश्यक लवचिकपणा ठेवून विचार आणि आचारांची आणि प्रथांची पुनश्च आखणी करण्याची हीच योग्य वेळ आहे !

    ही आखणी जर करण्यास आपण वेळ लावला किंवा कर्मठपणाच्या दबावाला जर आपण बळी पडलो तर आधुनिक मराठी तरुण पिढी आपल्याला दोष दिल्याशिवाय रहाणार नाही - चर्चेस आणि इतर देवालये यांचा अभ्यास केला तर आपल्याला बरीच सर्व सामावेशाक सुधारणा करायला पुष्कळ वाव आहे - कुणाचीही मने न दुखावता !आणि विनाकारण वाद न वाढवता !हीच बाब पंढरपूर अष्ट विनायक आणि अन्य मराठी अस्मितेची असलेली श्रद्धास्थाने याना लागू पडते !



    अंबाबाई महालक्ष्मी किंवा तुळजापूरची भवानी , वणीची देवी अशी शक्तिपीठे ही मराठी लोकांची हळवी स्थाने आहेत ,कुटुंबात स्त्री ही अत्यंत महत्वाची असते - जवळजवळ सर्व संस्कार आणि कुटुंब एकत्र ठेवायचे काम तीच करत असते स्त्रियांच्यात मुळातच कमीपणा घेण्याची वृत्ती असते , कुटुंबात जरी दोन चाकांची उपमा असली तरी पुरुष हाच आजवर जास्त महत्वाचा मानला गेला आहे ,पण अशा शक्तिपीठाच्या ठिकाणी सर्वत्र स्त्रियाच महत्वाच्या धरल्या जातात - अगदी परंपरेने सुद्धा !- त्या आपापल्या सोवळ्या ओवळ्याच्या आणि विटाळाच्या कल्पना जपत असतात - त्यामागे आपल्या संसारावर देवीचा कोप होऊ नये , इडापिडा आपल्याला बाधू नये आणि सर्वांचे कुशल मंगल व्हावे अशी स्त्री सुलभ भावना असते - त्यामागे कोणतेही राजकारण तर नक्कीच नसते !



    आजकाल आपल्या परंपरा आणि त्यातील अंध विश्वास यातील सूक्ष्म फरक ओळखणे अवघड होत जात आहे - कधी कधीतर त्याचे स्थानीय पक्षीय राजकारण असे स्वरूप होत जाते ! ते आपण टाळूया ! पूर्वीच्या प्रथा याही कुणीतरी माणसानीच निर्माण केल्या होत्या तेंव्हाचे सामाजिक मापदंड वापरून - आज आपण नवीन आखणी केली तर ते स्वागतार्हच ठरेल - पण ते संघर्ष टाळून करता आले तर त्याचा धार्मिक आणि सामाजिक, सांस्कृतिक गोडवा अजून वाढेल ! धर्म हि टाकाऊ गोष्ट निश्चितच नाही - तिचा आधुनिक समाज बांधणीसाठी उपयोग करायला फार उच्च कौशल्य दाखवावे लागेल ! धार्मिक पोटभरू लोकाना ते जमेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. आपण निवडणुकीसाठी उभे आहात , हे नक्की पटले.

      Delete
    2. डॉ. पंजाबराव देशमुख म्हणाले होते "भारतातील सर्व देवळातील संपत्ती जप्त करा आणि ती संपत्ती गोर-गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा"

      आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही?

      संजय पाटील.

      Delete
    3. देशमुख, पंजाबराव शामराव : (२७ डिसेंबर १८९८–१० एप्रिल १९६५).

      महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे कृषिमंत्री. पंजाबरावांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम; पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. त्यांचे वडील शामराव आणि आई राधाबाई. पंजाबरावांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले. अमरावतीला हिंदू हायस्कूलमध्ये मॅट्रिक होऊन (१९१८) ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले; परंतु पदवी घेण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (१९२०). इंग्लंडमध्ये त्यांनी एम्.ए.(एडिंबरो), डी.फिल्. (ऑक्सफर्ड) आणि बार अट लॉ या पदव्या मिळविल्या. ‘ वैदिक वाङ्‌मयातील धर्माचा उद्‌गम आणि विकास’ प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले (१९२६) व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली.

      पंजाबराव देशमुखपंजाबरावांनी १९२७ मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य ह्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे विदर्भात, विशेषतः मराठा समाजात खळबळ उडाली. विमलाबाई लग्नानंतर बी.ए.; एल्एल्.बी. झाल्या. त्यांचा अनेक स्त्रीसंघटनांशी निकटचा संबंध होता. पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत. पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले (१९२८). या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्याच वर्षी सत्याग्रह केला. १९३० मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले. तथापि १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय (१९२६) व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली (१९३२). त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली.

      त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘ भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ स्थापन केला. हे शैक्षणिक प्रसाराचे कार्य करीत असतानाच त्यांनी जुन्यापुराण्या शेती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. ते काँग्रेसचे सभासद होते व नेताजी सुभाषचंद्र बोसांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. राजकारणापासून अलिप्त होऊन देवास संस्थानात त्यांनी काही काळ ‘राजकीय मंत्री’ म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाले. १९५२,१९५७ व १९६२ या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जातिसंघ, कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज (१९५५), आफ्रो- आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इ. संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. कृषक समाजाच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ त्यांनी स्थापन केला. भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले (१९६०). त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या.

      या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे.

      संदर्भ : १. नागपुरे, ना. पां.; कदम, के.ब.; मोहोड,पु. ब. संपा.डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख ... विविध गुणदर्शन, अमरावती, १९६५.
      २. सावरकर, सुदाम; सूर्यकर, रा.ब. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख–जीवन व कार्य, अमरावती, १९६४.

      Delete
  12. नास्तिकांचाच ‘आयक्यू’ जास्त!

    भारतातील प्रवचनकार, धार्मिक गुरू विविध कारणांमुळे प्रकाशझोतात येत आहेत. नास्तिक मंडळीच 'बाबां'च्या भोवती षडयंत्राचा फास आवळत असल्याची टीका त्यांच्या भक्तगणांकडून होत आहे. त्याच वेळी विदेशातदेखील अस्तिकता आणि नास्तिकता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'नास्तिक लोकांचा आयक्यू (इन्टेलिजन्स कोशन्ट) हा आस्तिक लोकांच्या आयक्यूपेक्षा जास्त असल्याचा दावा, अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने केलेल्या एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. त्यावरून वेगळेच वादळ उठले आहे. ते हळूहळू आपल्या देशाकडे सरकत आहे.

    अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रा. मीरॉन झुकरमन आणि त्यांच्या चमूने अनेक वर्षे अभ्यास केला. त्यांना आढळलेली तत्थे त्यांनी 'द रिलेशन बिटवीन इन्टेलिजन्स अॅण्ड रीलीजीऑसिटीः ए मेटा अॅनालिसीस' नावाने प्रसिद्ध केले आहेत. त्याच अभ्यासाने नास्तिकांच्या तर्कबुध्दिला अधिक गुण दिले आहेत.

    असा केला अभ्यास

    अतिशय संवेदनशील असलेल्या या संशोधनासाठी, १९२८ पासूनच्या ६३ विविध प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील केवळ १० प्रकरणांमध्ये आस्तिकता आणि आयक्यू याच्यात सकारात्मक संबंध दिसून आला. एखाद्या गोष्टीमागील कारणे शोधण्याची इच्छा, प्रश्न सोडविण्याची इच्छा, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता, आलेल्या अनुभवातून चटकन शिकण्याची इच्छा म्हणजेच आयक्यू होय. नास्तिक व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाहीत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देणे आणि प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे शोधण्याची धडपड करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. त्यामुळे तुलनेने त्यांचा आयक्यू जास्त असतो, असा निष्कर्ष त्यांना या संशोधनातून काढता आला. हे संशोधन अमेरिकेत विविध ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातून एक नवा वाद निर्माण झाला आहे.'नास्तिक व्यक्तींचा आयक्यू अधिक असतो, याचा अर्थ आस्तिक व्यक्ती मूर्ख असतात, असा अर्थ माझ्या संशोधनातून काढण्यात येऊ नये. धर्म आणि आस्तिकतेतून व्यक्तीला आत्मविश्वास तसेच अन्य काही बाबी मिळतात. मात्र जास्त आयक्यू असलेल्या व्यक्तीकडे त्याच्या वैचारिक क्षमतेमुळे या बाबी आधीच असतात. त्यामुळे त्याला कदाचित त्याची गरज नसू शकते.' असे झुकरमन यांनी नमूद केले आहे.

    ReplyDelete
  13. ‘प्रेमावर उभी असणारी संस्कृतीच टिकेल’

    प्राण्याचे रूपांतर माणसात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती. सर्व संस्कृतींचा पाया प्रेम असते. त्यामुळे प्रेमावर उभी असलेली संस्कृतीच यापुढे टिकेल, असे विचार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
    पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली संस्कृती कोणती?’ या विषयावरील परिसंवादात कसबे बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, लेखिका अश्विनी धोंगडे यांनी सहभाग घेतला.
    कसबे म्हणाले की, भटका माणूस स्थिर झाला तेथून संस्कृतीला सुरुवात झाली. नृत्य, गायन, संगीत आदी संस्कृतीची अंग आहेत. ती माणसाला प्राण्याचा माणूस करते. संस्कृतीचा प्राथमिक काळात धर्माशी संबंध नव्हता. पुरुषप्रधान संस्कृती आल्यानंतर संस्कृतीची सर्व अंग बदलली. त्यानंतर धर्माने संस्कृतीवर आक्रमण केले. सर्व संस्कृतीचा पाया प्रेम असते. जगण्याच्या संघर्षांतून हे प्रेम निर्माण होते. प्रेमावर उभी असणारी संस्कृतीच यापुढे टिकणार आहे व तीच आपली संस्कृती असेल. प्रेमाच्या जागृतीसाठीही सध्या प्रबोधनाची गरज आहे. ते होणार नाही तोवर जातीव्यवस्था जाणार नाही.
    जोशी म्हणाले, शिक्षणाच्या बाजारीकरणातून मूळ संस्कृतीचा पाया बिघडला. परिवर्तन व्हावे व ते वर्तनात दिसावे, या पद्धतीचे शिक्षण असावे. संस्कृती परवेदनेतून निर्माण होते. संस्कृती ही अष्टांग असते. तिची सर्व अंगे व्यवस्थित राहिली, तर संस्कृतीचे जतन होईल.
    धोंगडे म्हणाल्या की, संस्कृतीने काही जाती-जमातींना बाजूला टाकले, तसे स्त्रियांनाही बाजूला टाकले. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा विचार केलेला नाही. समाजात तिची प्रतिमा दुबळी केली गेली. स्त्री हे धर्माचे वाहक म्हणून वापरले जाते, हे अत्यंत धोकादायक आहे. स्त्रियाही आज स्वयंकेंद्रित होत असून, समाजापासून तुटत आहेत.

    ReplyDelete
  14. Subject: वामांगी - अरुण कोलटकर







    देवळात गेलो होतो मधे
    तिथं विठ्ठल काही दिसेना
    रख्माय शेजारी
    नुस्ती वीट

    मी म्हणालो -हायलं
    रख्माय तर रख्माय
    कुणाच्या तरी पायावर
    डोकं ठेवायचं

    पायावर ठेवलेलं
    डोकं काढून घेतलं
    आपल्यालाच पुढं मागं
    लागेल म्हणून

    आणि जाता जाता सहज
    रख्मायला म्हणालो
    विठू कुठं गेला
    दिसत नाही

    रख्माय म्हणाली
    कुठं गेला म्हणजे
    उभा नाही का माझ्या
    उजव्या अंगाला

    मी परत पाह्यलं
    खात्री करुन घ्यायला
    आणि म्हणालो तिथं
    कोणीही नाही

    म्हणते नाकासमोर
    बघण्यात जन्म गेला
    बाजूचं मला जरा
    कमीच दिसतं

    दगडासारखी झाली
    मान अगदी धरली बघ
    इकडची तिकडं
    जरा होत नाही

    कधी येतो कधी जातो
    कुठं जातो काय करतो
    मला काही काही
    माहिती नाही

    खांद्याला खांदा भिडवून
    नेहमी बाजूला असेल विठू
    म्हणून मी पण बावळट
    उभी राहिले

    आषाढी कार्तिकीला
    इतके लोक येतात नेहमी
    मला कधीच कसं कुणी
    सांगितलं नाही

    आज एकदमच मला
    भेटायला धावून आलं
    अठ्ठावीस युगांचं
    एकटेपण

    ReplyDelete
  15. सर्वाना संस्कृती म्हणजे काय असा प्रश्न पडतो ,

    पण अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ,

    त्यापैकी काही आठवल्या आमच्या बाप्पाना ,

    त्या पाठवत आहे !

    आप्पा


    एकदा पहिल्या पन्नासातच
    पन्नास हजार विद्यार्थी आले
    मग तपासाणारे म्हणाले
    आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
    असे मार्क देउ या!

    नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
    कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
    शहरात राहू लागले
    आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
    पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
    खेड्यात गहू पिकतो
    शहरात व्हावचरे पिकतात
    कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
    एके दिवशी मोट्ठा पाऊस आला
    सगळे कागद ओले झाले
    पण कागदांना मोड आले नाहीत

    शेवटी गणोबाने परवा
    रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
    १) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
    अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
    २) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?

    - वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर

    ……………………


    निवृत्त चाकरांचे बघ काय हाल झाले,
    काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले

    - अशोक नायगावकर

    ………………

    शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी … वांग्याचे भरीत …गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
    केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
    मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चुकून
    लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार…दिव्या दिव्या दिपत्कार…
    आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
    दस-याला वाटायची आपट्याची पाने… पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे…सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…
    कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य
    पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
    कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा……

    - पु.ल.

    ReplyDelete
  16. आई शप्पथ ,

    काय मज्जा आहे ,

    सगळे शाहू फुले समर्थक x x x ला पाय लाऊन पळाले !

    शुकशुकाट !

    शाहू महाराज आणि फुले आंबेडकर यांच्या जपमाळा ओढणाऱ्याची दातखीळ बसली !

    दांडी गुल !

    बोला हो - तुम्हालाच विचारत्ये ! हो - इकदे तिकडे काय नजर चुकवत बघताय -?

    महिला मुक्ती आणि अंध श्रद्धा निर्मुलन वाले

    तसेच शाहू महाराज आणि फुलेंचा पुळका असलेले !!!

    अमृता विश्वरुप् ला उत्तर द्या - !कोल्हापूरची प्रत्येक स्त्री आपल्या उत्तराची वाट बघत्ये !

    संजय सोनवणी तर पळपुटे बाजीराव - ते कसले उत्तर देणार ?

    पण निनावी उत्तर देत हिणकस लोहीणारा कोण जो होता त्याचीपण पुंगी बंद केली एका बाईने !

    कुठे गेला तो ?

    हा हा हा !

    ReplyDelete
    Replies
    1. @AnonymousSeptember 26, 2013 at 11:26 AM

      SHAMELESS, INDISCIPLINED, AN IMPOSTOR PERSON !

      Delete
    2. उगा आपल इंग्रजीत लिहून शानपना करू नगस !

      इचार्लाय त्याच त्वांड उचकटून निट गुमान उत्तर दे की रे xxx !

      आपल्या समोर शायनिंग नग करूस त्या इंग्रजीच - काय ?

      आमि अडाणी का तू आमाला शेम्लेस म्हणणारा अडाणी - व्ह्यय रे ? आमाला हरामखोर कशापायी रे म्हणणार ? तूच लेका हरामखोर आहेस !

      तुज्या शाहू ने काय दिवे लावले असते या विचारलेल्या प्रश्नाला ते सपष्ट सांग कि रे xxx !!! अकलेच्या कांद्या - हिम्मत असेल तर सरळ बोल - ते इंग्रजीत नग उगा !

      शाहू न्हाराजाने आमच्या अमृताला काय उत्तर दिले असते - सगळ्या कोल्हापूरच्या भैनिनी पराश्न केलाय तर बोल कि निट गधड्या !

      Delete
    3. वरील प्रतिक्रिया पहा, हिच ती ब्राह्मणांची संस्कृती! शिवराळ भाषा! फालतू प्रश्न उपस्थित करून, उगाच हुशार असल्याचा आव आणतात. घाबरत मेले. मुद्दे संपलेकी गुद्द्यावर येणारे खरे हरामखोर! यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे! खरोखर निर्लज्य!

      Delete
  17. पल्लवी !- तुमचे मनापासून कौतुक केलेच पाहिजे !

    या ब्लोगवर भुंकणारी कुत्री ही पाळीव आहेत आणि ती संजय सोनावाणी यानी पाळलेली आहेत हे उघड आहे !,कारण मुद्दा नुसता छुss म्हटल्यावर ब्राह्मणांच्या नावाने भुंकण्याचा असतो तेंव्हा हीच तोंडे दिवसरात्र ,भुंकत सुटतात , पण - - -

    पण जरा मेंदू चालवण्याचा प्रश्न आला की हीच टोळकी चिडीचूप सोनावणीच्या हुकुमाची वाट बघत जुनी हाडे चघळत बसलेली असतात ,

    त्यांचे आत्ताचे चूप बसणे हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे !

    राजकारणी आणि मतलबी लोक जसे अडचणीत आले की मख्खपणे नुसतेच ऐकल्या न ऐकल्या सारखे करतात तसाच हा उद्योग आहे - काय ?

    शाहू अंबाबाई आणि स्त्री मुक्ती - अंधश्रद्धा हे गणित गमतीदारच आहे - यांची तोंडे बंद करणारे आहे - इतके मात्र यातून समजते -

    पल्लवी - आणि अमृता - तुमाव्ह्या बरोबर असंख्य जागरूक महिला आहेत !

    नवरात्रात या सोनवनॆचि दातखीळ उघडते का ते बघू -

    मौनं सर्वार्थ साधनम हा त्याचा ताजा मंत्र आहे - कोदागेपानाला लबाड दुतोंडी लोक मौन म्हणतात असाही अर्थ होतो !

    अमृता तू हा मुद्दा चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी विचारलास ! संधिसाधू लोकांचे हे टोळके तुला काय उतार देणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous September 27, 2013 at 3:49 AM

      OBJECTIONABLE, UNACCEPTABLE AND EXCEPTIONABLE PERSONALITY.

      Delete
  18. पंजाबराव ? कोण हा पंजाबराव ?

    असल्या गल्लीबोळातल्या लोकांची बडबड कोण ऐकतो ?

    उद्या तुम्ही लोक पतंग कादामाला सुद्धा नाही नाही त्या पदव्या द्याल - तो एक शिक्षणाचा धंदा करणारा हलकट आहे - सिम्बोय्सीस चे मुजुमदार आणि हे नवीन टोळके यात जमीन अस्मानाचा फरक आहे !

    त्यामुळे असल्या फाटक्या लोकांच्या तोंडाची वाक्ये चिकटवून विषयाचे अवमुल्यन करू नका !

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे : चरित्र & कार्य -

      बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमलयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.

      "चिखलात पाय आणि पायात काटा,अशाच वात् ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाट्याला असतात" या वास्तवाचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला.शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडील शामरावबापू असे होते.इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले.४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ र्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले.पुढे भाऊसाहेबांचे आजोळ सोनेगावच्या जवळच असलेल्या चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.

      माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.

      पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंड ला गेले.तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास'(१९२०)मध्ये OXFORD विद्यापीठाच्या डॉक्टरेट (पी.एच.डी.)हि पदवी संपादन केली.पुढे ते ba^rIsTrhI झाले.प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांडपांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते तर ते होते कृतीनिष्ट.

      बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Baristar होते.



      भाऊसाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य-

      महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार दोन भाऊ-त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनि १९३१ मध्ये अमरावती येथे केली.यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले.बहुजनांच्या शिक्षणातील अडचण हि प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे हि मनुवादी विचारधारा नेस्तनाभूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले.शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला.देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे.ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.

      शिक्षण,शेती,सहकार,अश्पृश्योद्धार,जातीभेद निर्मुलन,धर्म इ.विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले.ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान,अंधश्रद्धा,दैववाद,अवैज्ञानिकता,देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते.तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता.खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या श्रुन्कलांनी जखडलेला होता आणि १०% सेटजी,भटजी,लाद्जी हा वर्ग सरकारी वर्ग नोकऱ्या,उच्चपदे,सोयी सवलतीचा लाभ घेत होता.

      Delete
    2. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे : चरित्र & कार्य -

      जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान,दारिद्र्य,पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले.१९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेचा अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवरनासारख्या सुधारनाच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत.चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." हे भाऊसाहेबांचे उर्वरित कार्य शिवश्री.पुरुषोत्तम खेडेकर,डॉ.आ.ह.साळुंके,इतिहासाचार्य मा.म.देशमुखान्सारख्या कोट्यावधी बहुजन बांधवांनी १२ जानेवारी २००५ रोजी मातृतीर्थ सिंधखेडराजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून केले आहे.आता चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन फुटल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता अशी लोकशाही या देशात अस्तित्वात येईल.

      डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला.पण भाऊसाहेब डगमगले नाहीत,पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु.विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले.त्यांनी १९३० मध्ये अस्पृश्य पित्तर केला.तसेच हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ मध्ये आणले.भाऊसाहेबांनी डॉ.बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता.भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता.ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."

      खरोखरच आजही डॉ.भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक,संस्थाचालक,

      शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.

      अश्या या महामानवाच्या नावाने व त्यांच्याच कार्यप्रणालीवर चालणारी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ही विद्यार्थी,शिक्षक व समाजहितासाठी कार्य करत असते.ज्यांना ज्यांना यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेता येईल अशा सर्वांनी सहभाग घेवून समाजऋण फेडावे.

      Delete
  19. लोक हो !

    अडाणी लोक परवडले पण असले वर्णद्वेषी पळपुटे काय कामाचे ?

    एक साधा एका महिलेला पडलेला प्रश्न आहे , पण त्याचे उतार ना ना सोनवणी -

    सगळे बोरुबहाद्दर लपून बसले की काय ?

    एकदम कविता करायला लागले तेंव्हाच ओळखले - आम्ही पूर्वीच सांगितले तसेच झाले - हा कसला अध्यक्ष , हा प्रश्नापासून पाठ करून पळून जातो - हा कसला वैचारिक संघर्ष करणार ?

    आणि तो नरके तरी काय दिवे लावणार ?

    ReplyDelete
  20. बघ रे नरके ,

    काय चाललय तुझ?

    हल्लीच्या मुली बोल्ड झाल्या आहेत ,जोक पण मारू लागल्या आहेत

    तुम्ही उगीच या वाटेला आलात संजयला मदत करायला -

    बिचारे !

    तेव्हड मग सांग की कोल्हापुरच्या त्या प्रश्नाच -


    अमृता विश्वरूप काय विचारत्ये अजून डोक्यात शिरलं नाही वाटत ?

    कसले प्रोफेसर तुम्ही ?

    एक साधे मत सांगता येत नाही ! उगाच त्या ब्राह्मणांच्या गोतावळ्यात घुसलात - ते निदान चलाख आणि तल्लख तरी असतात - हजरजबाबी असतात - तुमच्या सारखे Xxx ला पाय लाऊन पळत नाहीत !

    जा तिथे आंदोलन तरी करत बस , दर शुक्रवारला - समाज जागृती - महिला जागृती - !

    चाल , उठ उठ !- ते इलेक्षनच मरुदे !

    हा कसला निवडून येतोय ? उगीच आपल करीयर खराब करून घेतो आहेस मात्र तू !

    ReplyDelete
  21. संत तुकाराम महाराजांची आरती - डाँ. पंजाबराव देशमुख


    ठेवून मस्तक तुकोबा-चरणी
    करण्या अभंग सरसावलो !
    महाकवि श्रेष्ठ ह्या सम हाच ,
    तयांसम जगी अन्य नाही . ।। 1 ।।
    ...
    त्यांची सह्रदयता , त्यांची शुध्द वाणी
    ठाव अंतरीचा घेत राही .
    हां हो लोककवि ज्ञान पाजी जनां ,
    अहंकारा तेथे जागा नाही . ।। 2 ।।

    दावा अन्य कोणी पतितोध्दारक ,
    कुभांडा मारक बाण ज्याचे ,
    गर्विष्ठांना गर्व , मुर्खाँची मूर्खता ,
    सत्तेची अंधता हरियेली ।। 3 ।।

    श्रध्देची श्रेष्ठता , धर्माचे पाविञ्य ,
    सत्याचेहि मर्म पटविले .
    बरे झाले देवा , कुणबीच झालो ,
    नाहीतर असतो गर्वे मेलो ।। 4 ।।

    दावा कोण अन्य कवि हे वदला ,
    एवढी नम्रता कोणाअंगी ?
    ढोंगियांचे ढोंग , असत्य प्रचार ,
    दिखाऊ संता हानी निष्ठुर प्रहार ।। 5 ।।

    म्हणोनी आदर्श तुका माझा
    कारणे दाविली , तो कां माझा
    अभंग या वृत्ती सोय मराठीची ,
    भंग नच कधी माञा-प्रासां . ।। 6 ।।

    - डाँ.पंजाबराव देशमुख
    (भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री,विदर्भातील शिक्षण चळवळीचे जनक)

    ReplyDelete
  22. लोकनेता डो. पंजाबराव देशमुख यांचे विचारधन
    लोकनेता डो. पंजाबराव देशमुख यांचे विचार - भारतातील मंदिरांची संपत्ती जप्त करावी आणि ती बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करावी. या विचारावरील उलटसुलट प्रतिक्रियेवरील माझी प्रतिक्रिया !
    शिक्षणाच्या दृष्टीने ख्रिश्चनांपेक्षा हिंदू आणि मुस्लीम या धर्मातील तळागाळातील लोक मागे आहेत. त्यामुळे त्या त्या धर्माच्या प्रार्थनास्थळांनी आपापल्या धर्मातील लोकांच्या शिक्षणासाठी आपली संपत्ती खर्च करावी. मोजदाद करता येणार नाही एवढी संपत्ती जमा ठेवून मंदिरांना जग खरेदी करायचे आहे काय ?

    ReplyDelete
  23. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    सर्वसामान्य ईश्वराचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी निरीश्वरवादी म्हणून ओळखली जाते. ईश्वराच्या अस्तित्वावर वा ईश्वराच्या संकल्पनेवर ती खरी संकल्पना म्हणून श्रद्धा ठेवणारे ते ईश्वरवादी व ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा वा ईश्वराची संकल्पना नाकारणारे ते निरीश्वरवादी होत. म्हणूनच ‘निरीश्वरवाद’ ह्या संज्ञेचा अर्थ जो ⇨ईश्वरवाद (थिइझम) नाकारण्यात येतो, त्या ईश्वरवादावर बराचसा अवलंबून आहे. सर्व शक्तिमान म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती व नाश यांचा कर्ता, सर्वज्ञ व जीवात्म्याला मोक्ष देणारा ईश्वर, असे एकेश्वरवादी व विश्वात्मक देववादी मानतात. विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-नाशात्मक प्रक्रियेचे कर्तृत्व अनेक देवदेवतांमध्ये विभागलेले आहे, असेही अनेकदेववादी धर्म मानतात. सर्वसामान्यतः तीन पारंपारिक अर्थांनी ‘निरीश्वरवाद’ ही संकल्पना वापरली जाते. हे तीन अर्थ असे : (१) धर्मातील ईश्वर नावाची कुठलीही सत्ता वा शक्ती व तसेच तिच्याविषयीची श्रद्धा नाकारणे. (२) एखाद्या संस्कृतीत मान्यता पावलेली एखाद्या देवतेविषयीची श्रद्धा नाकारणारी प्रवृत्ती. (३) कधीकधी फक्त व्यावहारिक पातळीवरच ईश्वर नाकारणे किंवा ईश्वर संकल्पनेकडे दुर्लक्ष करणे, उपेक्षा करणे. एकाद्या चर्चेतील युक्तिवादांत ह्या संज्ञेच्या ह्या तीन अर्थांचा नेहमीचा गोंधळ होतो. संज्ञेतील संदिग्धतेचे बोलके उदाहरण म्हणजे सतराव्या शतकातील तत्त्ववेत्ता बारुक स्पिनोझा (१६३२-७७) यास 'ईश्वरामुळे भारावून गेलेला माणूस' तसेच 'एक निरीश्वरवादी' अशा दोन्हीही प्रकारे संबोधिले जाई. येथे 'निरीश्वरवाद' ह्या संज्ञेतील काहीसा आवश्यक असा अंश म्हणजे त्यातील काहीतरी महत्त्वाचे नाकारण्याचा, अमान्य करण्याचा जो दुसरा अर्थ आहे तो होय. केवळ  संशयवाद (स्केप्टिसिझम) वा  अज्ञेयवाद (ॲग्नॉस्टिसिझम) या स्वरूपाचा अर्थ निरीश्वरवादात नाही.

    ReplyDelete
  24. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    प्राचीन तात्त्विक विचारधारेत निरीश्वरवादाची स्पष्ट व पद्धतशीर मांडणी झाल्याचे दिसत नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या ईश्वरवादाचीच पद्धतशीर मांडणी प्राचीन काळात झालेली नसल्यामुळे त्याच्या विरोधी अशा निरीश्वरवादाचीही काटेकोर मांडणी होऊ शकली नाही. असे असले, तरी निरीश्वरवादी किंवा तत्‌सदृश काही विचार प्राचीन धर्मांमध्ये व्यक्त झालेले आहेत. उदा., कन्फ्यूशस वा ताओ मतांना निरीश्वरवादी धार्मिक मते म्हटल्याचे काही उल्लेख आढळतात. अर्थातच प्राचीन चीनमधील लोकप्रिय धर्मात अनेकदेवतावादावर विश्वास होता. गौतम बुद्धाने प्रवर्तित केलेला मूळ बौद्ध धर्मही निरीश्वरवादीच होता. ईश्वरवादी वैदिक धर्मावरील, विशेषतः पारलौकिक कल्याणार्थ करावयाच्या कर्मकांडावरील प्रतिक्रिया म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. एका अर्थी ईश्वरवादाच्या विरोधी अशी ही निरीश्वरवाद प्रतिपादन करणारी प्रतिक्रिया म्हणता येईल.

    ग्रीसमध्ये सॉक्रेटीसवर निरीश्वरवादी म्हणून आरोप ठेवला गेला. डीमॉक्रिटस हा परमाणुवादी ग्रीक विचारवंत तसेच एपिक्यूरस मताचे विचारवंत हे अंतराळात मध्यभागी देवांचे अस्तित्व मानत असले, तरी त्यांनी विश्वाची जडवादी उपपत्तीच प्रतिपादन केली. ह्या उपपत्तीत देवतांना स्थान नव्हते व त्यांचा प्रभावही मान्य नव्हता.

    बायबलमध्ये केवळ निरीश्वरवादाचा उल्लेखही आढळत नाही. नंतरच्या काळात मात्र रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचे लोक निरीश्वरवादी समजले गेले. कारण त्यांनी साम्राज्यात प्रचलित असलेल्या धर्मातील विविध देवतांचे अस्तित्व नाकारले होते. बायबलमधील भविष्यकथनाची (प्रॉफिसी) जी परंपरा आहे, तीच ख्रिस्ती धर्मातही सुरू राहिली आणि तिच्यातूनच निरीश्वरवादी विचारसरणीचा प्रथम आविष्कार झाल्याचे सर्वसामान्यपणे समजले जाते. मूर्तिपूजेला विरोध म्हणून ही भविष्यवाणी अवतरली आणि तिने निसर्ग व राज्य यांचे निर्देवताकरण केले. निसर्ग व राज्य हे उपासनेचे दोन सर्वसामान्य विषय होते. उपासनाविषयांतील उर्वरित पर्याय हे अतिशायी (ट्रॅन्सेन्डन्ट) देवावर केंद्रित झालेला नवा एकेश्वरवाद किंवा निरीश्वरवाद हे होते.

    ReplyDelete
  25. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    आधुनिक पाश्चात्त्य जगात सर्वंकष व पद्धतशीर असा निरीश्वरवाद सनातन ख्रिस्ती धर्मावरील प्रतिक्रिया म्हणूनच उदयास आला. या संदर्भात निरीश्वरवादाचे जे दोन प्रकार संभवतात त्यांत फरक करणे आवश्यक आहे. हे दोन्हीही प्रकार पुष्कळ वेळा परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया करताना अथवा एकमेकांत मिसळलेले दिसतात. त्यामुळे त्यांत भेद करणे कठीण होते. त्यांच्या प्रेरणांमध्ये व विकासातही तफावत आढळते. हे दोन प्रकार म्हणजे (१) बुद्धिवादी निरीश्वरवाद व (२) स्वभाववादी वा भावनावादी (रोमँटिक) निरीश्वरवाद हे होत.

    बुद्धिवादी निरीश्वरवाद : या प्रकारच्या निरीश्वरवादाचा उदय वैज्ञानिक शोधांच्या व बुद्धीच्या आधारेच ह्या विश्वातील सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देता येते, ह्यावरील विश्वासातून झाला. ह्या निरीश्वरवादाने धार्मिक अंधश्रद्धा टाकावू ठरविल्या. ⇨ प्रबोधनकालात आणि प्रबोधनोत्तर काळात ही चळवळ उगम पावून अठराव्या शतकातील ⇨ज्ञानोदय ( एन्लाइटन्‌मेंट) चळवळीत ती खूपच विकसित झाली. या प्रकारातील अनेक कडवे निरीश्वरवादी विचारवंत फ्रेंच आणि ब्रिटिश ⇨ निर्मातृदेववादी परंपरेतील होते. व्हॉल्तेअर, ऑलबाक, जॉन टोलँड इ. विचारवंतांनी या निरीश्वरवादाचा पुरस्कार केला.

    भावनावादी निरीश्वरवाद : एकोणिसाव्या शतकात ह्या प्रकाराचा उगम झाला. मानवी सामर्थ्य व नीतिमत्तेचा शत्रू ईश्वर असून त्याला विरोध म्हणून हा निरीश्वरवाद पुढे आला. डॉस्टोव्हस्कीचे एक पात्र इव्हान करमझोव याने ईश्वराला नैतिक भूमिकेतून विरोध केला आणि नंतर शून्यवादी प्रश्नही विचारले. ईश्वर नसेल तर सर्वच गोष्टी, मन मानेल त्या प्रकारे, करण्याची मुभा असेल काय ? असे तो विचारतो.

    मध्यंतरीच्या काळात ⇨ लूटव्हिख फॉइरवाख (१८०४-७२) याने ह्या बुद्धिवादी व भावनावादी निरीश्वरवादाचा समन्वय साधला. त्याचा भावनावादी निरीश्वरवाद, त्याने धर्मविद्येचे परिवर्तन मानवशास्त्रात करण्याच्या व त्याद्वारे मानवाचे भावनिक उच्चतम अस्तित्व प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, त्यात दिसून येतो. त्याचा बुद्धिवादी निरीश्वरवाद त्याच्या निसर्गवादपर जडवादातून व्यक्त होतो. त्याने आपल्या निसर्गवादपर जडवादातून ईश्वर हे मानवी मनाचेच प्रक्षेपण आहे, असे प्रतिपादन केले. हाच प्रक्षेपणकल्पनेचा धागा पुढे ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) याने आपल्या मनोविश्लेषणात खूपच विकसित केला.

    ReplyDelete
  26. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    फॉइरबाख याच्याच परंपरेतील प्रमुख विचारवंत ⇨ कार्ल मार्क्स (१८१८-८३) होय. त्याच्या निरीश्वरवादास अनेक बाजू आहेत. एका दृष्टीने तो भावनावादी - मानवतावादी होता आणि मानवाची बाजू घेण्यासाठी ईश्वरकल्पनेस त्याचा विरोध होता. दुसऱ्या दृष्टीने तो बुद्धिवादी होता आणि वैज्ञानिक जडवादाच्या भूमिकेतून तो ईश्वरकल्पना खोडून काढू पहात होता. ह्या दोन्हीही दृष्टिकोनांच्या योगे त्याचा धर्मालाच विरोध होता. 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे त्याचे विधान प्रसिद्धच आहे. बूर्झ्वांबाबतचा वैचारिक पूर्वग्रह म्हणून तो धर्माकडे पहात होता.

    बुद्धिवादाचा स्पर्श न झालेला भावनावादी निरीश्वरवादाचा दृष्टिकोन ⇨फ्रिड्रिख नीत्शे (१८४४-१९००) याच्या विचारांत पुन्हा अवतीर्ण झालेला दिसतो. नीत्शेच्या गूढ लेखनात तो त्याच्या 'मॅडमॅन' कडून असे वदवितो, की 'ईश्वर मरण पावला, ईश्वर मृतच झाला आहे व आपणच त्याला मारले आहे'. नीत्शेच्या मते ईश्वराचा वध हे फार भयानक कृत्य आहे आणि त्याचे परिमार्जन माणसांनी स्वतःच ईश्वर बनल्यावाचून होणार नाही. नीत्शेने मानवाचे स्थान उन्नत ठेऊन ईश्वरविषयक सर्व प्रकारची श्रद्धा ही अनैतिक आहे, असे प्रतिपादन केले. नीत्शेच्या ह्या विचारातील सूत्र बुद्धिवादी पठडीतील विसाव्या शतकातील काही अस्तित्ववादी प्रकारांत उचलून धरलेले दिसते. उदा., ⇨ झां पॉल सार्त्र (१९०५ - ) प्रणीत अस्तित्ववाद. सार्त्रच्या मते ईश्वराची संकल्पना ही आत्मविसंगत आहे आणि त्यामुळे ती स्वीकारता येत नाही. ईश्वर नसल्यामुळे मनुष्यच स्वतःच्या मूल्यांचा निर्माता आहे आणि म्हणूनच त्याने चांगले काय आहे, याचा निर्णय स्वतःच्या निर्णयबुद्धीस अनुसरून घेतला पाहिजे. ⇨ आल्बेअर काम्यू (१९१३ - ६०) याच्या मते ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात मानवी बुद्धी अथवा विवेक नाकारणे अनुस्यूत आहे. अस्तित्ववादी विचारसरणी ही मूलतः ईश्वरवादी वा निरीश्वरवादी नाही. ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी अशा दोन्हीही प्रकारांतील विचारवंत अस्तित्ववादाचे प्रमुख अध्वर्यू होत. ⇨ आग्यॅस्त काँत (१७९८-१८५७) आणि नंतरच्या प्रत्यक्षार्थवादी विचारवंतांनी ईश्वरविषयक संकल्पना झुगारून देण्याचा प्रयत्न केला. तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी ईश्वरसंकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या निकषणक्षम नसल्यामुळे अनावश्यक आणि निरर्थक असल्याचे मत मांडून ती निकालात काढली. जे. एस्. मिलनेही ईश्वर हा कारणरहित आद्यकारण आहे, ह्या सिद्धांताविरुद्ध मत व्यक्त केले. ईश्वर ही अनिवार्य गोष्ट आहे, याचा नेमका अर्थ काय ? हे समजत नाही, असे बर्ट्रंड रसेलने म्हटले आहे. रसेलने निरीश्वरवादाऐवजी अज्ञेयवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेतील ड्यूईप्रभृती फलप्रामाण्यवादी तत्त्वज्ञांच्या मते मानवी व्यक्तिमत्त्वातील मूल्यांना व स्वयंपूर्णतेला परमोच्च स्थान असलेल्या मानवतावादानुसार ईश्वराचे अस्तित्व अप्रस्तुत ठरते. जे. एन्. फिंडलेने व इतर काही विचारवंतांनी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, हे साधार दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

    ReplyDelete
  27. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    धर्मश्रद्धा व निरीश्वरवाद : धर्मश्रद्धा व निरीश्वरवाद ही दोन परस्परविरोधी टोके मानण्याचे कारण नाही. डॉस्टोव्हस्कीच्या लिखाणात ह्या दोन्हींचेही मिश्रण आढळते. विसाव्या शतकातील अनेक धर्मविद्यावेत्त्यांनी निरीश्वरवादी विचारांचे मोठ्या उत्स्फूर्तपणे आपल्या लिखाणातून स्वागत केले आहे. मार्टिन बूबर (१८७८-१९६५), निकोलाई ब्यरद्यायेव्ह (१८७४-१९४८), ⇨ झाक मारीतँ (१८८२ - ), पाउल टिलीख (१८८६-१९६५), डीट्रिख बॉनहॉफर इ. विचारवंतांचा ह्या स्वागत करणाऱ्यांत समावेश आहे. मारीतँ याने तर गुळमुळीत निरीश्वरवाद्यांना विरोध करताना कडव्या निरीश्वरवाद्यांना ख्रिस्ती संतांच्या मालिकेत नेऊन बसविले. अशा कडव्या निरीश्वरवाद्यांमध्ये मानाचा मोठेपणा व औदार्य असते, असे तो जगातील दुष्टतेस वा अशिवास (ईव्हिल) विरोध करताना म्हणतो.

    श्रद्धावंतांकडून मान्यता पावलेल्या निरीश्वरवादी विचारसरणीचा एक प्रकार म्हणजे १९६० च्या सुमाराच्या 'ईश्वराचा-मृत्यू' (डेथ ऑफ गॉड थिऑलॉजीज) प्रकारातील धर्माविद्या होत. त्यांच्या प्रतिपादनातील नाट्यमय भाषा बाजूला ठेवली, तरी त्यांतील अनेक धर्मविद्या ह्या कृतक (स्यूडो) निरीश्वरवादी असल्याचे सिद्ध झाले आहे. ईश्वर नाकारणे आणि ख्रिस्ताचे अस्तित्व ठामपणे मान्य करणे, यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न हा मुळातच टिकण्यासारखा नाही. अशा धर्मविद्या सर्वसामान्यतः पुन्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ईश्वरसंकल्पनेकडे वळलेल्या दिसतात. ह्या धर्मविद्यांनी एका बाबतीत तरी मूळ बायबलमधील पारंपरिकता पुनरुज्जीवित केल्याचे दिसते. ही पारंपरिकता म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या कुठल्याही विचारसरणीत ईश्वराच्या अनुपस्थितीच्या अनुभवाचा विचार करावाच लागेल आणि ईश्वराचे कुठल्याही प्रकारचे संकल्पनीकरण हे त्याच्या प्रतिमाकरणाकडे जी माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते, त्यापासून मुक्त असावयासच हवे.

    कडवा निरीश्वरवाद आता फारसा आढळत नाही; तथापि अज्ञेयवाद मात्र अधिक प्रमाणात आढळतो; कारण अज्ञेयवादास फारशा सिद्धतेची आवश्यकता असत नाही. मार्क्सवादी पूर्व यूरोपातही पारंपरिक निरीश्वरवादाची प्रवृत्ती अज्ञेयवादाच्या दिशेने चिकित्सा करताना दिसते. अज्ञेयवादात नेहमीच व्यावहारिक जीवनाशी बांधीलकी आवश्यक असल्यामुळे त्यात नेहमीच आपली बांधीलकी आणि धार्मिक श्रद्धा यांच्यातील संबंधांबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते.

    ReplyDelete
  28. निरीश्वरवाद : (एथिइझम).

    भारतीय विचार : सगुण वा निर्गुण अशा दोन्हीही स्वरूपातील ईश्वराची संकल्पना नाकारणारी सैद्धांतिक मते निरीश्वरवादी म्हणता येतील. सगुण ब्रह्म व निर्गुण ब्रह्म अशा स्वरूपाची सत्ता नाकारणारी सैद्धांतिक भूमिका म्हणजेही निरीश्वरवादच होय.

    प्राचीन भारतातील चार्वाक वा ⇨ लोकायत दर्शन हे संपूर्णपणे निरीश्वरवादी दर्शन म्हणून सांगता येईल. हे दर्शन उघडच जडवादी दर्शन असून नियतीच्या अंकित असणाऱ्या जडवस्तूच जगाचे नियामक तत्त्व असल्याचे त्यात प्रतिपादन केले आहे. म्हणूनच स्रष्टा वा निर्माता आणि शास्ता ईश्वर त्यात नाकारला आहे. जैन दर्शनातही ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. सृष्टी ही कोणी निर्माण केलेली नाही व तिचा कोणी नाशही करीत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार आपोआप फळ मिळत असते, असे हे दर्शन मानते. जैनांना सृष्टिकर्ता ईश्वर मान्य नसला, तरी पाप-पुण्य, स्वर्ग-नरक व बंध-मोक्ष ते मानतात आणि मोक्षप्राप्त्यर्थ इंद्रियनिग्रह, महाव्रताचरण, ध्यानधारणा इत्यादींचे पालन ते आवश्यक मानतात. कर्मांचा नाश करून केवलज्ञानप्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती करून घेतलेला प्रत्येक जीव 'परमात्मा'च आहे व तो आदर्श व पूज्यही आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. तीर्थंकरादी सिद्ध जीवांचा ते अशा जीवांत अंतर्भाव करतात. सृष्टिकर्त्या ईश्वराविषयी त्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत. [⟶जैन दर्शन; जैन धर्म].

    प्राचीन बौद्ध दर्शनातही ईश्वराचे अस्तित्व हे मोक्षप्राप्त्यर्थ अप्रस्तुत असल्याचे म्हटले आहे. हीनयान पंथात ईश्वररहित धर्मच प्रतिपादन केला आहे; परंतु महायान पंथात प्रत्यक्ष बुद्धालाच परमेश्वर मानले. [⟶ बौद्ध दर्शन; बौद्ध धर्म].

    कपिलाचे मूळ ⇨ सांख्यदर्शन ही निरीश्वरवादीच आहे. नित्यस्वरूपी आत्म्यावर (पुरुषावर) त्यांची श्रद्धा असली, तरी हे आत्मे वा पुरुष सृष्टिकर्ता ईश्वर नव्हेत. सृष्टीचा कोणी निर्माता वा संहारकर्ता आहे, असे ⇨ पूर्वमीमांसा दर्शन मानत नाही. आधुनिक काळात मानवेंद्रनाथ रॉयप्रणीत ⇨ नवमानवतावादी विचारसणीत निरीश्वरवादी विचार प्रतिपादन केले आहेत.

    मूल्यमापन : तत्त्वज्ञानातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नाशी निगडित आहेत. तत्त्वमीमांसेच्या (मेटॅफिजिक्स) शक्यताशक्यतेच्या मूलभूत प्रश्नाशीही ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न निगडित आहे. तत्त्वमीमांसेतील कार्यकारणभावाचे तत्त्व व त्याच्या यथार्थतेची सिद्धता या प्रश्नांशीही हा ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न संबद्ध आहे. तत्त्वमीमांसेची शक्यता जर प्रस्थापित करता आली नाही आणि तिच्यातील कार्यकारणभावाचे समर्थन करता आले नाही, तर ईश्वराचे अस्तित्व वैज्ञानिक गृहीतकाच्या आधारे सिद्ध करणे, एवढा एकच पर्याय उरतो आणि अशा वैज्ञानिक गृहीतकाचा पडताळा तर पाहता येत नाही.

    नीतिकल्पना व धर्म यांच्याशी असलेला निरीश्वरवादाचा संबंधही महत्त्वपूर्ण आहे. निरीश्वरवाद्यांना मूल्ये वा नैतिक व्यवस्था वा सदाचार यांबद्दल आस्था असू शकत नाही, असा जो पूर्वापार समज आहे तो टिकण्यासारखा नाही. ईश्वर हा मूल्यांचा मूलाधार आहे, असे ज्यांना वाटत नाही त्यांनाही मूल्यांची कदर व सदाचरणाची चाड असू शकते. ईश्वरविरहित सद्धर्मही असू शकेल. उदा., जैन, बौद्ध अशा धर्मांमध्ये ईश्वराचे स्थान मानवाने घेतल्याचे दिसते. त्यांत मानवाच्या कल्याणाची कळकळ व मानवकेंद्रित नीतिमूल्येही प्रकर्षाने आढळतात. तेव्हा धर्म व नीती यांना निरीश्वरवादाचा विरोध असतोच, असे म्हणणे नेहमीच बरोबर असत नाही, ही वस्तुस्थिती आहे. धर्म, नीती, ईश्वरी अस्तित्व यांची आवश्यकता माणसास भासते ती मानवतेच्या व माणसाच्या कल्याणासाठीच, हेही विसरून चालणार नाही. जगात आढळणारी अपूर्णता तसेच दुष्टता वा अशिव यांचा उलगडा ईश्वरी अस्तित्व मान्य करून करणे खरोखरीच कठीण आहे. परिपूर्ण, सर्वशक्तिमान, परमदयाघन ईश्वराने निर्माण केलेल्या जगात वास्तविक अपूर्णता तसेच दुष्टता वा अशिवाचा अंशही असावयास नको; पण तो तर प्रकर्षाने आहे म्हणूनच ईश्वराचे अस्तित्व विसंगत ठरते.

    मानवाला आपल्या जीवनात नेहमीच गूढानुभव आणि त्यांचा उगम तसेच आपले निर्णय, आपली ध्येये यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच निरीश्वरवाद, अज्ञेयवाद व ईश्वरावरील श्रद्धा ह्या तिन्हीही संकल्पनांबद्दल त्याला निवड करून त्यांपैकी एकीचा स्वीकार करण्याची आवश्यकताही नेहमीच भासत राहणार आहे.

    ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक युक्तिवाद धार्मिक तत्त्ववेत्त्यांनी मांडले आहेत; परंतु ते युक्तिवाद निर्विवादपणे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत [⟶ ईश्वरवाद]. हे युक्तिवाद ईश्वरावर श्रद्धा असलेल्यांनाच त्यांची श्रद्धा दृढ करण्यास उपयुक्त ठरतात.

    ReplyDelete
    Replies
    1. VERY GOOD THOUGHTS. REALITY ! I LIKE IT.

      Delete
    2. निरीश्वरवाद : (एथिइझम).

      विचार करण्या योग्य लेख.

      Delete
  29. समाजाने निरीश्‍वरवाद स्वीकारला नाही याची खंत वाटते !

    गोपाळ गणेश आगरकर यांनी त्या काळी घेतलेली भूमिका क्रांतिकारक होती. त्याप्रमाणे मी निरीश्‍वरवादाची भूमिका घेतली आहे. अशी भूमिका घेणारा मी एकटाच आहे, असे नाही. मात्र, समाजाने आजपर्यंत निरीश्‍वरवाद स्वीकारलेला नाही याची खंत वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी येथे केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देण्यात येणारा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. लागू यांना प्रदान करण्यात आला.

    ReplyDelete
  30. समग्र निरीश्वरवाद – शरद बेडेकर

    धार्मिक अहंकार व अध्यात्माची झिंग बळावल्याच्या काळात त्यातून उद्भवणा-या दुष्परिणामांवर
    निरीश्वरवादाचा उतारा कसा लागू पडेल हे सांगणारे मौलिक पुस्तक.

    लोकवाड्मयगृह प्रकाशन, मुंबई.
    पाने – १५२
    किंमत – २५०



    ReplyDelete
    Replies
    1. देव आणि देवत्वाची संकल्पना व्यक्तिसापेक्ष बदलत असते; मात्र बहुसंख्य लोकांची धारणा ईश्‍वरवादाकडेच असते. देव आहे किंवा नाही यापेक्षा घडणाऱ्या घटनांचा सारासार विचार करून योग्य निर्णय घेणे हे नेहमीच इष्ट ठरते. ईश्‍वरवादाबद्दल जसे मतप्रवाह आहेत, तसेच निरीश्‍वरवादाबद्दलही आहेत. त्याच मतप्रवाहातील एक पुस्तक म्हणजे "समग्र निरीश्‍वरवाद.' या पुस्तकात देवत्वाच्या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या सगळ्या प्रश्‍नांचा युक्तिवाद करण्यात आला आहे. शरद बेडेकर यांच्या "ईश्‍वरचिकित्सा आणि निरीश्‍वरवाद' व "निरीश्‍वरवाद पुन्हा एकदा' या पुस्तकांचे हे पुस्तक म्हणजे एकत्रीकरण आहे.

      Delete
    2. THIS BOOK WILL BE MY REFERENCE BOOK!

      Delete
  31. निरीश्वरवाद आणि ईश्वर

    (लेखक: विनायक पलुस्कर)

    अनेक अतर्क्य घटना, उपाय नसलेली असुरक्षितता, अकल्पितपणे उध्वस्त करणारी दुःखे, सारे सुरळीत चालू असताना नियतीनामक शक्तीचे बसणारे असह्य फटके व विज्ञानाच्या आवाक्यात अद्याप न आलेला, कधीही येऊ शकणारा मृत्यू ह्या गूढ रसायनाने भरून गेलेली ती पोकळी "तू एक असहाय्य बाहुले आहेस" असे सतत मानवाला बजावत असते. ही पोकळी भरून काढण्याकरिता माणसाने ईश्वराची निर्मिती केली आहे. या सर्व अज्ञात, अगम्य व गूढ भयाचा भार त्याने त्याच्यावर टाकला.



    आजच्या विज्ञानयुगाची सुरुवात इसवीसनाच्या प्रथम सहस्त्रकातच झाली. पण मागील तीन शतकात विज्ञान अतिशय प्रगत झाले, नवे शोध लागत गेले, विजेचा शोध लागल्यावर अगम्य अंधारातील भुते-खेते अंतर्धान पावली. देवी, प्लेग, कॉलरा, पोलिओ इत्यादी भयंकर रोगामागाची करणे समजल्यानंतर त्यामागच्या अंधश्रद्धा संपुष्टात आल्या. ग्रहणे, धुमकेतू यांचे विज्ञान समजल्यावर त्यांची भीती संपू लागली. छपाई तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अक्षरज्ञान प्राप्त झाले.

    आजची पिढी टीव्ही, कॉम्पुटर, मोबाईल, प्रवास यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगत झाली. असे वाटले की आता अंधश्रद्धा, देवदेवता मागे पडतील. पण असे दिसते की आधुनिक विज्ञानाने शहाणी झालेली ही नवमतवादी पिढीसुद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटलेली नाही. नवी पिढी प्रचंड संख्येने देव देव करते. सर्व देवळे, तीर्थेक्षेत्रे गर्दीने खचाखच भरलेली असतात. या नव्या पिढीतले आधुनिक तरुण अनेक ठिकाणी देवासाठी केशवपन करतात. अंत्यविधी, काकस्पर्शासारखे विधी, श्राद्धे अत्यंत भाविकपणे करतात. सर्व रूढी व परंपरा अत्यंत निष्ठेने पार पाडतात. सण, व्रत, धार्मिक विधी व त्यातील सर्व अवडंबर अगदी पूर्वीच्या काळाची आठवण व्हावी अशा पद्धतीने साजरे करतात. हे नेमके काय आहे? ही मानसिकता कशामुळे आहे?

    यासाठी थोडा मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. मानवी मेंदू ही अजूनही अगम्य अशी चीज आहे. ९०% मेंदूचे कार्य अज्ञात आहे. पण मानवी व्यवहारांच्या अभ्यासावरून असे दिसते की मानव हा सतत भूतकाळाची समीक्षा करत असतो. त्यात माहितीच्या व ज्ञानाच्या थप्प्या मेंदूच्या कप्प्यात शिस्तबद्ध पद्धतीने रचत असतो. वर्तमानकाळातील प्रत्येक घटना त्या संचित ज्ञानाच्या निकषावर तपासात असतो व त्यातले बदल स्वीकारत भविष्यकाळाची जोडणी करत असतो. भूतकाळातील घटनांची नोंदवून ठेवलेली भीती, त्यामागची कारणमीमांसा कळल्यावर झटकून टाकतो. कप्पे वारंवार स्वच्छ करतो, नव्या नोंदी त्यात भरतो. पण त्याचवेळी त्याच्या मेंदूच्या मोठ्या भागात एक मनाला सतत भेडसावणारी अगम्य पोकळी त्याला छळत असते. अनेक अतर्क्य घटना, उपाय नसलेली असुरक्षितता, अकल्पितपणे उध्वस्त करणारी दुःखे, सारे सुरळीत चालू असताना नियतीनामक शक्तीचे बसणारे असह्य फटके व विज्ञानाच्या आवाक्यात अद्याप न आलेला, कधीही येऊ शकणारा मृत्यू ह्या गूढ रसायनाने भरून गेलेली ती पोकळी "तू एक असहाय्य बाहुले आहेस" असे सतत मानवाला बजावत असते.

    ReplyDelete
  32. निरीश्वरवाद आणि ईश्वर

    ही पोकळी भरून काढण्याकरिता माणसाने ईश्वराची निर्मिती केली आहे. या सर्व अज्ञात, अगम्य व गूढ भयाचा भार त्याने त्याच्यावर टाकला. सर्व धर्मांनी मनुष्याचा हाच कमकुवतपणा जोखला व त्याला "ईश्वर आहे, तो तुला संकटातून तारेल, तुझ्या सर्व कर्मांचा भार त्याच्यावर सोपव व निर्धास्त राहा" असा संदेश देऊन आपापला धर्म वाढवला. जेव्हा जेव्हा मानवजातीवर संकट आले व सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेंव्हा मानवाने ईश्वराचे ओझे मनावरून उतरून ठेवून स्वकर्तुत्वाने पुन्हा पुन्हा भरारी घेतली असा इतिहास आहे. जेव्हा मानवी अस्तित्वावरच घाला येतो तेंव्हा ईश्वर ही संकल्पना कुचकामी आहे हे लक्षात येते. जीवनसंघर्ष तीव्र होतो तेंव्हा टिकून राहण्याचा प्रयत्न करताना त्याला ईश्वराचा विचार करण्यास वेळ नसतो, परंतु ह्या संघर्षात टिकून राहण्याची मानसिक शक्ती मिळवण्यासाठी एक आधार म्हणून तो ईश्वराला निर्माण करतो.

    सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्ध व महावीरांच्या तत्वज्ञानामुळे कर्मकांडे व मूर्तीपूजा यांचे स्तोम कमी झाले. ईश्वर या संकल्पनेवरच लोकांचा विश्वास उडाला व देहवाद महत्वाचा ठरल्याने लोकायत तत्वज्ञान लोकप्रिय झाले. ईश्वराला कायमचे हद्दपार करण्यासाठी तेंव्हा निरीश्वरवाद्यांना संधी मिळाली होती. पण लोकायत किंवा बौद्ध तसेच महावीरांचे निरीश्वर तत्वज्ञान मानवी मनाची पोकळी समजून घेण्यास पुरेसे समर्थ ठरले नाही. त्याचवेळी जर सजग विज्ञानाचा अभ्यास व तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया निरीश्वरवाद्यांनी राबवली असती व मानवाची आंतरिक शक्ती वाढवण्याचा सर्वसामान्य उपाय शोधून मनाची ही पोकळी भरून काढली असती तर पुढच्या काळात ईश्वराची गरजच उरली नसती. पण तसे झाले नाही! लोकायतांचा देहवाद अल्पकाळातच शिळा झाला. बौद्ध तत्वज्ञानाचा उदास सूर सतत दुखः विसरून पुन्हा जीवनाचा आनंद उपभोगण्याची मुलभुत कामना ठेवणाऱ्या मानवाला फार काळ भावला नाही. जैनधर्माचे निष्कर्म तत्वज्ञान सतत कर्म करणाऱ्या माणसाला सर्वकाळ पटणारे नव्हते.

    ReplyDelete
  33. निरीश्वरवाद आणि ईश्वर

    याचवेळी हिंदू धर्माने मात्र पुराणाद्वारे देहवाद, भोगवाद हेही स्वीकारले आणि प्रत्येकाला आचारस्वातंत्र्य, दैवतपुजा स्वातंत्र्य बहाल केले. त्याचवेळी पाप-पुण्याची भीतीही घातली. त्यावर प्रायच्श्रीत्ये सांगितली. दान-धर्म, व्रत-वैकल्ये इत्यादी पुण्य देणारी साधनेही त्याच्या गळ्यात उतरवली. त्यातूनच निसर्गातला ईश्वर मुर्तीतल्या परमेश्वरात विलीन झाला. हे कमी आहे म्हणून की काय देवांचे अवतार, गुरु परंपरा आणि अध्यात्मिक दैवतश्रेणी सुरु झाली. या गुरुंमध्ये काही परमेश्वराचा अंश असतो तर काहींना स्वतःच परमेश्वराचे पूर्णावतार असल्याचा गंड तयार होतो. या महात्म्यांचे शिष्य त्यांना आपल्या भक्तिभावाने परमेश्वराच्या कोटीला नेऊन ठेवतात. हा गुरु बनण्याचा किंवा बनवण्याचा मार्ग म्हणजे आधुनिक काळातील अंधश्रद्धेचे उगमस्थान! आजचे विज्ञानयुग या मानसिकतेवर तोडगा काढू शकेल काय? विज्ञानापाशी ही क्षमता नक्कीच आहे पण विज्ञान स्वतःच्याच नियमांनी बंधित आहे. न्युटनचे नियम, आइनस्टाईनचे सिद्धांत, आणि त्यानंतरचे गॉड पार्टीकलसारखे शोध यातूनही अंतिम ज्ञानाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचल्याचे जाणवत नाही. प्रत्येक सिद्धांत गणिताने व भौतिक नियमांनी सिद्ध झाला तरच तो सिद्धांत विज्ञान स्वीकारते. विज्ञान काहीच नाकारत नाही, अगदी ईश्वरसुद्धा! पण तो सिद्ध झाला पाहिजे ही सुद्धा विज्ञानाचीच अट आहे. आज ना उद्या या सर्व विश्वाचे आणि विश्वनिर्मितीचे रहस्य शोधून काढता येईल या आशेने विज्ञान वाटचाल करीत आहे. एकूण काय? ईश्वराचा परमेश्वर झाला. हा महान परमेश्वर दिवसेंदिवस अतिमहान होत जाण्याची चिन्हे आहेत. मी हे लिहितोय खरा पण माझ्याही मनाच्या पोकळीला ईश्वर व्यापून राहिला आहे हे निश्चित. आज माझ्याही समोर ईश्वराला मानण्याखेरीज अन्य पर्याय नाही. ईश्वराचे अस्तित्व ठामपणे नाकारणाऱ्या निरीश्वरवाद्यांना मी महामानवच समजतो.

    ReplyDelete
  34. उगा आपल इंग्रजीत लिहून शानपना करू नगस !

    इचार्लाय त्याच त्वांड उचकटून निट गुमान उत्तर दे की रे xxx !

    आपल्या समोर शायनिंग नग करूस त्या इंग्रजीच - काय ?

    आमि अडाणी का तू आमाला शेम्लेस म्हणणारा अडाणी - व्ह्यय रे ? आमाला हरामखोर कशापायी रे म्हणणार ? तूच लेका हरामखोर आहेस !

    तुज्या शाहू ने काय दिवे लावले असते या विचारलेल्या प्रश्नाला ते सपष्ट सांग कि रे xxx !!! अकलेच्या कांद्या - हिम्मत असेल तर सरळ बोल - ते इंग्रजीत नग उगा !

    शाहू न्हाराजाने आमच्या अमृताला काय उत्तर दिले असते - सगळ्या कोल्हापूरच्या भैनिनी पराश्न केलाय तर बोल कि निट गधड्या !

    ReplyDelete
    Replies
    1. वरील प्रतिक्रिया पहा, हिच ती ब्राह्मणांची संस्कृती! शिवराळ भाषा! फालतू प्रश्न उपस्थित करून, उगाच हुशार असल्याचा आव आणतात. घाबरत मेले. मुद्दे संपलेकी गुद्द्यावर येणारे खरे हरामखोर! यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे! खरोखर निर्लज्य!

      Delete
    2. अरेरे, संस्कारांचा ठेका मिरविणा-या ब्राह्मणांची किती अवनती झाली आहे! ब्लॉगवर ब्राह्मणांकडून दिल्या जाणा-या अश्लिल शिव्यांचा भडिमार पाहिल्यानंतर कोणाच्या तोंडातून हे उद्गार सहजपणे बाहेर पडतील. संपूर्ण ब्राह्मण समाजाला निराशेने घेरले आहे तसेच आता ब्राह्मणांमध्ये पूर्वीसारखी विद्वत्ता राहिलेली नाही, याचा पुरावा या शिव्यांमधून मिळतो.

      Delete
    3. ब्राह्मणांच्या साधनशुचितेचे पितळच उघडे पाडल्यामुळे जातीयवादी ब्राह्मण दात खाऊन आहेत. त्यामुळे ते अश्लिल शिव्या देत आहेत. येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, उघडपणे शिव्या देण्याचे धाडसही या नेंभळटांमध्ये नाही. असले गलिच्छ प्रकार करणारे कोणत्या मानसिकतेत जगत असतील, हे वेगळे सांगायला नकोच. ‘ब्राह्मण हे स्वप्नरंजन करतात. त्यांची लैंगिगताही याच प्रकारची आहे' असे खेडेकर साहेबांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकात लिहिले आहे. ते किती यथार्थ आहे, हे या शिव्यांवरून लक्षात येते.

      Delete
  35. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !

    ही घटना आहे १९७५ सालच्या आणिबाणी च्या काळातली. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात किंवा आणीबाणी च्या निर्णया विरोधात लेखन , भाषण करण्यास पत्रके छापण्यास बंदी होती. जो असे करेल त्याला उचलून विनाचोकशी तुरुंगात टाकले जात असे. या अटकसत्रात जयप्रकाश नारायण , मोरारजी , अटलबिहारी वाजपेयी ,जॉर्ज फर्नाडीस . एस एम जोशी, अनंत भालेराव , या सारख्या अनेक नेत्यांना अटक झाली होती . असे असताना आमच्या गावातील ऐक ब्राम्हण प्रवचनकार ( दुर्गादास कुलकर्णी ) जे की भागवत कथासांगत असत त्यांनी एकदा प्रवचन करताना इंदिरा गांधींची तुलना कैकयीशी , संजय गांधीची तुलना भस्मासुराशी तर त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. "या कलियुगात इंदिरा या नावाने कैकयी ने पुन्हा जल्म घेतला असूनतिने राम लक्क्षमनाला पुन्हा वनवासात पाठवले आहे. भस्मासुर संजय होऊन कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करीत सुटला आहे. आणि रावण चव्हाण बनून सगळ्या देवांना तुरुंगात डाम्बत आहे, असे वाक्य त्यांनी भागवत पुराण प्रवचन सांगताना केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. घराची झडती झाली त्यातही आणीबाणी विरोधातील काही पत्रके , मराठवाडा दैनिकाचे काही अंक सापडले . परिणामी पोलिसांनी दुर्गादास बुवांच्या घरातील सामान आणि घर सुद्धा सील केले.

    दुर्गादास बुवांची ३५-३६ वर्ष वयाची पत्नी ( सिंधू काकी ) , ८-९ वर्ष वयाची मुलगी आणि ३-४ वर्ष वयाचा मुलगा यांना कुठे जावे हें कळेना . गावातील इतर ब्राम्हण कुटुंब आपल्यावरही काही बलामात येयील म्हणून त्यांना ओळख दाखविनात ; पाहुणे तसेच गावातील इतर समाजाचे लोकही अटक व जप्तीच्या भीतीने त्यांना साधी चहापाण्याची देखील मदत करायला तयार होईनात ; पोलिसांनी अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलेले ; नवरा अटकेत ; मुले भूकेने व्याकूळ होऊन " आई बाबा ना पोलीस कुठे घेवून गेले ? आपले घर पोलिसांनी कसे काय घेतले ? आम्हाला खूप भूक लागलीय ग ...........कुणी आपल्याशी बोलत का नाही ग ? असे प्रश्न विचारीत होते . काळजाला घरे पाडणाऱ्या त्या बालकांच्या प्रश्नाची त्या माउली कडे उत्तरं नव्हती; तिला आश्रय द्यायला एकही दरवाजा उघडत नव्हता; अशा बिकट प्रसंगात एका हृदयात मात्र करुणेचा पाझर फुटला .... हा करुणेचा निर्झर वाहत त्या कुटुंबा पर्यंत आला . आणि त्यांना कवेत घेवून त्यांचे अश्रू पुसता झाला ; कोण होता हा दयार्णव नरपुंगव ? दुसरा तिसरा कुणी नाही ; गिरजाजी एकनाथ तहकिक ! माझे आजोबा ! !
    माझ्या आजोबांनी दुर्गादास बुवांच्या पत्नी आणि मुलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय दिला. पोलिसांच्या कारवाईची तमा न बाळगता ऐक नव्हे दोन नव्हे १८ महिने ; आणिबाणी उठून आणि दुर्गादास बुवा सुटून येई पर्यंत त्यांच्या पत्नी सिंधुकाकी आणि त्यांच्या दोन मुलांना आश्रय दिला. त्यांचे जेवणखाण कपडे लत्ते इत्यादीची सोय केली. पण आणिबाणी उठल्यावर सुटून आल्या नंतर मात्र दुर्गादास बुवांनी आजोबांचे थोडे सुध्धा उपकार मानले नाहीत. उपकार मानाने तर सोडाच, काही दिवसांनी झालेल्या ( पाच - सहा महिन्यांनी ) झेड पी निवडणुकीत या दुर्गादास बुवाने कॉंग्रेस च्या तिकिटावर उभ्या असलेल्या माझ्या आजोबाच्या विरोधात प्रचार करून माझ्या आजोबाना पाडले आणि त्यांच्या विरोधात जनसंघाच्या एका मारवाड्याला निवडून आणले. वरतून पुन्हा " कोन्ग्रेस कडून भीष्म पितामह जरी समोर आले तरी त्यांना शरपंजरी निजवणे हाच धर्म आहे " ही प्रवचन बाजी ! काय म्हणावे या कृतघ्न पणाला ?

    ReplyDelete
  36. अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्या नावाखाली त्यांना विरोध करणारेही ब्राह्मणच!


    अरे ब्राह्मणवाद्या, सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
    वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
    स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
    असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
    टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा
    मराठा समाजाच्या नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
    पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
    ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
    ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
    शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
    लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
    ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
    ( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
    त्यात रस नाहीच. फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )
    शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
    लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
    वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
    म्हणू शकतोस काय ?

    थोडक्यात एक अनिता तुझ्या पूर्वजांच्या हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
    घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
    ( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी, विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
    कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
    असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे.
    मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा ) खाली किती
    अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
    बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
    कोन ? तर ( विद्या बालन, उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
    ब्राम्हनच ! तेंव्हा .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?

    तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा ! नाही का ?

    ReplyDelete
  37. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!

    भगवान बुद्ध म्हणाले -
    न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।
    अर्थ - जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.

    वैदिक धर्म हा हिंसा आणि अमानुषतेवर आधारित होता. वैदिक धर्मात कनिष्ठ जातीचे लोक तसेच स्त्रिया यांना माणूसपणाचेही हक्क नव्हते. त्यामुळे व्यथित झालेल्या भगवान बुद्धांनी आपला नवा मार्ग प्रतिपादन केला. वैदिक धर्माने ब्राह्मणांना दिलेले सर्व विशेषाधिकार भगवान बुद्धांनी नाकारले. त्यामुळे त्याकाळातील समस्त ब्राह्मणवर्ग भगवान बुद्धाच्या विरुद्ध उभा राहिला होता. त्याचे पुरावे बौद्ध वाङ्मयात जागोजागी सापडतात. त्यातील काही मोजक्या कहाण्या ‘भगवान बुद्ध आणि ब्राह्मण' या मालिकेतून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
    अस्पृश्य कोणाला म्हणावे?
    भगवान बुद्ध श्रावस्तीजवळील जेतवनात राहत होते. एकेदिवशी ते भिक्षाटनासाठी श्रावस्तीनगरीत आले. श्रावस्तीत यज्ञाची तयारी सुरू होती. नुकताच यज्ञाग्नी पेटविण्यात आला होता. भगवान बुद्ध भिक्षापात्र घेऊन येत आहेत, हे पाहताच एक याज्ञिक ब्राह्मण संतप्त झाला. तो दुरूनच ओरडला-
    ‘‘मुंडक (मुंडण केलेल्या गृहस्था) तिथेच थांब. दरिद्री श्रमणा तिथेच थांब. अरे, वृषल तिथेच थांब"
    वृषल म्हणजे अस्पृश्य.
    ब्राह्मणाचे ओरडणे ऐकून भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले- ‘‘हे ब्राह्मण ! अस्पृश्य कोणाला म्हणायचे? काय केल्याने माणूस अस्पृश्य होतो? या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत आहेत का?"
    भगवान बुद्धांचे वचन ऐकून दांभिक ब्राह्मण सटपटला. तो म्हणाला - ‘‘नाही यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही."
    भगवान बुद्ध म्हणाले तर मग ऐक -
    १. जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे, चुगलखोर आहे, अपिवत्र दृष्टीचा आहे. त्याला वृषल समजावे.
    २. जो प्राण्यांना त्रास देतो. ज्याच्या मनात प्राण्यांबद्दल दयाभाव नाही, तो वृषल समाजावा.
    ३. जो दुसरयाची वस्तू कोणताही मोबदला न देता घेतो, तो वृषल समाजावा.
    ४. जो कर्ज घेतो, परंतु ते फेडित नाही, तो वृषल समजावा.
    ५. जो कोणत्याही वस्तूच्या इच्छेपोटी वाटमारी करतो, लुटतो, कोणाला ठार करतो, त्याला वृषल समजावे.
    ६. जो खोटी साक्ष देतो, तो वृषल समाजावा.
    ७. जो आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या पत्नीसोबत व्याभिचार करतो (व्याभिचार जबरदस्तीचा असो की सहमतीने) त्याला वृषल समजावे.
    ८. आपल्याकडे पैसा असतानाही आपल्या मातापित्यांना जो सांभाळित नाही, तो वृषल समजावा.
    ९. जो अकल्याणकारी, खोट्या धर्माचे शिक्षण देतो आणि धर्माला रहस्य बनवू ठेवतो त्याला वृषल समजावे. (येथे रहस्य या शब्दातून भगवान बुद्धांना ‘हातचे राखून ठेवून धर्मशिक्षण देणे, विशिष्ट लोकांना धर्मशिक्षण देऊन विशिष्टांना शिक्षणापासून वंचित ठेवणे' , असा अर्थ अभिप्रेत आहे.)
    १०. जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
    मथितार्थ
    भगवान बुद्धांनी केलेल्या शेवटच्या दोन व्याख्या महत्वाच्या आहेत. ब्राह्मणी धर्माने अर्थात वैदिक धर्माने वर्णाश्रमाची मांडणी करून कनिष्ठ जातींना धर्मशिक्षण नाकारले. ही व्यवस्था निर्माण करणारे ब्राह्मण होते. त्यामुळे या व्याख्येनुसार, ब्राह्मण सर्वप्रथम अस्पृश्य ठरतात! १० व्या व्याख्येचे मूळ पाली शब्द असे आहेत : न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो । (वृषलचे पालीत बसल होते. त्याला प्रत्यय लागून बसलो असे रूप झाले आहे. जच्चा म्हणजे माता.)

    ReplyDelete
  38. भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्यांचा प्रेरणादायी उत्सव!

    “भाद्रपदाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्व आहे. शूद्धपक्षात भालदेव व वद्यपक्षात पित्तरपाटा म्हणजे श्राद्धपक्ष साजरा केला जातो. भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी- दसर्या च्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणातात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. भाद्रपदाच्या कृष्णपक्षात श्राद्धपक्ष म्हणून कडक सुतक पाळले जाते. प्रा. श्रावण देवरे यांनी या सणांची माहीती देणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यातील काही भाग आपल्या वाचकांसाठी देत आहोत.”
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------

    बळीचं राज्य नवखंडांचं! अफगाणीस्थानच्या बलुचीस्थानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे पूर्ण अशिया खंडच समझा! म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले भारत खंडाला बलीस्थान म्हणतात. पृथ्वीतलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहीला छत्रपतीसुद्धा! कारण पाच हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वता नव्हता. भारतात मात्र सहा हजार वर्षांपूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती.

    आताच्या आशिया खंडाच्या आकाराएवढे बळीचं राज्य! मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन-प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही सरस व कार्यक्षम शासन-प्रशासनव्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसारखे राज्य आहेत, त्याप्रमाणे हे खंड होते. राज्याचा प्रमूख मुख्यमंत्री तसा खंडाचा प्रमुख खंडोबा! आजचे आपले माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय! राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलीस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला जोतिबा म्हणायचे! म्हणजे आजचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. प्रकाश महाजन हे बलीस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या धुळे जिल्ह्याचे जोतीबा होत. आज प्रशासकीय सोयीसाठी तीन चार जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ, आपला नाशिक महसूल विभाग घ्या. पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलीस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्याच्या प्रमुखाला महासुभेदार म्हणत. या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख श्री. रविंद्र जाधव हे आपल्या बलीस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. या प्रमाणे बलीस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज जोतीबा, खंडोबा, मल्हार या दैवतांची पुजा करतात. पाच हजार वर्षांपूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बळीस्थान इतके प्रगत होते. याचा आपल्याला अभिमान असला पाहीजे.

    ReplyDelete
  39. भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्यांचा प्रेरणादायी उत्सव!

    अशा या महान बळीराज्याची आपण स्मृती जागवतो. भाद्रपदाच्या शुद्ध पक्षात शेणाचा बळी राजा म्हणजे भालदेवची स्थापना करतो. ही स्थापना आपापल्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे 5 दिवसांची, सात दिवसांची असते. कृष्ण पक्षात मात्र पंधरा दिवस सुतक पाळले जाते. सर्व व्यवहार ठप्प होतात. बाजार वगैरे बंद ठेवतो. घरातील वस्तू बाहेर देत नाहीत किंवा विकली जात नाहीत. एवढे कडक सुतक भारतातला बहुजन समाज का पाळतो? या पंधरा दिवसांचा त्याच्याशी काय संबंध? वीर नाचविणे म्हणजे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत. खरे म्हणजे ही उत्तरे शोधण्याची सुरूवात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनीच केलेली आहे. त्यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथात हा सर्व इतिहास त्यांनी सविस्तर मांडलेला आहे. आपण त्याचा येथे सारांशाने विचार करून भालदेव व पित्तरपाटाची माहीती करून घेणार आहोत.

    बळीचं राज्य सुख समृध्दीने भरलेले होते व प्रजा गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा या सुवर्णमय बलीस्थानावर परकीय रानटी टोळ्यांची वाकडी नजर पडली. हे परकीय रानटी म्हणजे आर्य लोक होत. या आर्य आक्रमकांच्याविरोधात शंखासूर, हिरण्याक्ष व नरकासूरापासून ते बळीपूत्र बाणासूरापर्यंत असा संपूर्ण बळीवंशच लढत होता. छोट्या-मोठ्या चकमकी व रणांगणावरील युध्दे होत होती. अनेक पिढ्यांमध्ये चाललेल्या या युध्दाचा इतिहास आर्यांनी दशावतरांच्या नावाने लिहून ठेवला आहे. परंतू खरा इतिहास विकृत करून भाकड कथांसारखा लिहीलेला आहे. त्याला धार्मिक मुलामा देऊन कुसंस्कारीत केले गेले आहे. यालाच पुराणकथा म्हणतात. गेल्या अडीच-तीन हजार वर्षांपासून हि पुराणे अनेक धार्मिक विधीच्या वेळेस वाचली जातात व त्यांची पारायणेही केली जातात. त्यामुळे हा खोटा इतिहास खरा म्हणून आपल्या मेंदूत बिंबवला गेला. या भाकड कथांमधून आर्य-ब्राम्हणांना असे सिद्ध करायचे असते की, ‘‘तुमचे बहुजन समाजाचे पूर्वज आमच्याशी लढलेच नाहीत, ते मुर्खच होते. आमच्या हुशार वामनाने तीन पावले जमीन मागीतली आणि तुमच्या भोळ्या-मुर्ख बळीराजाने सर्व राज्यच देऊन टाकले आणी आम्ही त्याला पाताळात गाडून टाकले.’’ असा विचार बहुजनांच्या मेंदूत बिंबवला जात आहे, त्याचे रूपांतर धार्मिक विधीत व कर्मकांडात होते व नंतर हा चुकीचा विचार पर्मनंट तत्वज्ञान म्हणून संस्कार स्वरूपात मानगुटीवर बसतो व सहजपणे शेकडो वर्षे समाजात प्रभाव गाजवत राहतो. याला पराभूत मानसिकता म्हणतात. बहुजन समाजाचे शिक्षण बंद पाडल्यामुळे ते आपल्या पूर्वजांचा इतिहास मुळ स्वरूपात लिहून ठेवू शकले नाहीत. याला सांस्कृतिक युध्द म्हणतात. या सांस्कृतिक युद्धात आपण नेहमीच पराभूत होत आलो आहोत. परंतू तरीही आमच्या काही अडाणी असलेल्या हुशार व दूरदृष्टीच्या पूर्वजांनी रूढी- परंपरेच्या व सण-उत्सवाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास जतन करून ठेवला आहे. भालदेव स्थापनेचा उत्सव हा त्यापैकी एक होय. या सणामुळेच आपल्या बळीराजाचा खरा इतिहास जीवंत राहीला.

    ReplyDelete
  40. भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्यांचा प्रेरणादायी उत्सव!

    ज्यांना आपण दशावतार म्हणतो ते मत्स्यावतार, कच्छावतार, वराह अवतार ते वामनअवतार वगैरे आहेत. ते ब्रम्हाचे अवतार आहेत असे पुराणांमध्ये सांगीतले जाते. परंतू हे अवतार म्हणजे त्या त्या काळात झालेल्या युध्दांचे आर्य-सेनापती होते. या सर्व युध्दांमध्ये कधी आपला विजय होत असे तर कधी पराजय होत असे. शंकासूर, नरकासूर, हिरण्याक्ष, बळी, बाणासूर हे सर्व राजे आपले बलीस्थानाचे शूर राजे होते. ते आर्यांच्या आक्रमणांविरोधात प्राणाची बाजी लावून लढलेत. अनेक पिढ्या चाललेल्या या युद्धांमध्ये सर्वात मोठे युद्ध म्हणजे बळी-वामनाचे युद्ध होय. हे जगातले पहिले महायुद्ध होय. यालाच खरे म्हणजे महाभारतीय युद्ध म्हटले पाहीजे. म्हणून भारतावर (बलीस्थानवर) प्रेम करणारा प्रत्येक माणूस या युध्दाची आठवण म्हणून व या युध्दात शहीद (हुतात्मे) झालेल्या आपल्या पुर्वजांचे स्मरण म्हणून पित्तरपाटाचा सण साजरा करतो. भारतभर वेगवेगळ्या नावाने हा उत्सव साजरा होतो. केरळमध्ये ओणम, तामिळनाडूमधे पोंगल, उत्तरप्रदेश-मध्यप्रदेशमध्ये पित्तर आदी नावाने बळीराजाचाच उत्सव देशभर साजरा होत असतो. प्राचीन काळातील भारतातला हा पहिला महापुरूष होय की ज्याचा स्मृती उत्सव भारतात सर्वत्र मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो.

    ReplyDelete
  41. भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्यांचा प्रेरणादायी उत्सव!

    कृषीसंस्कृतीच्या दुसर्‍या टप्प्यावरच्या क्रांतीचा नायक पुरूष होता व औत ओढणारा बैल हा सहनायक होता. म्हणून बैल पोळा या सणाला कृषी संस्कृतीत अनन्य महत्व प्राप्त झालं. बलीस्थानात हजारो वर्षांपासून तो साजरा केला जातो. असेच एके साली हा बैल पोळा बळीच्या राज्यातील जनतेने उत्साहाने साजरा केला. पाऊसाचा जोर कमी झाल्यावर वामनाचे हल्ले पुन्हा सुरू झाले होते. नेहमीप्रमाणे बळी राजाने पुन्हा सैन्याची जमवाजमव करून एका निकराच्या युद्धाची पूर्व तयारी सुरू केली. बैल पोळा संपताच भाद्रपद शूद्धप्रतिपदेपासून बळीच्या प्रजेने घरोघरी शेणाचा भालदेव स्थापन करून युद्धाची ललकारी ठोकली. आधुनिक काळात युद्धाचे रणशिंग फुंकण्याआधी देशात मिरवणूका वगैरे काढून वातावरण निर्मिती केली जाते. सरकारला व सैन्याला देशाच्या जनतेचा पूर्ण नैतिक पाठींबा आहे, असे त्यातून गृहीत धरले जाते. वामनाच्याविरोधातील महायुद्धात आपल्या लाडक्या बळीराजाला व त्याच्या सैन्याला पाठींबा देण्यासाठी बलीस्थानातील जनतेने शेणाचा भालदेव (बळीदेव) बसवला व उत्सव साजरा केला. आर्यवामनाचा कायमचा निकाल लावला पाहिजे, असा निर्धार करून भाद्रपदच्या शूद्धपक्षात तयारी पूर्ण केली. तिकडे वामनही तयारच होता. भाद्रपदच्या वद्यप्रतिपदेपासून युद्धाला तोंड फुटले. सर्व व्यवहार ठप्प झालेत. बाजार, खरेदी-विक्री, देवाण-घेवाण बंद झालीत. या युद्धात आपले काही शूर सरदार हुतात्मे झालेत. ते आपले पिता म्हणजे पितर होते. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाद्रपदच्या कृष्णपक्षात पित्तरपाटा साजरा होऊ लागला. त्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्राद्धपक्ष साजरा होऊ लागला. या पित्तरपाट्यात कडक सुतक पाळले जाऊ लागले. हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा होतो. ओणम, पोंगल, पित्तर वगैरे त्याची नावे आहेत.

    भारतातील बहुजन समाज बळीचं राज्य यावं, म्हणून प्रयत्न करतो, मात्र दुसर्‍या बाजूने आर्यलोकही वेगवेगळी कारस्थाने करून आधुनिक बळीराज्यांना पाताळात गाडत राहतात. सत्तेवर असलेले आर्य लोक हुशार, धुर्त व मुत्सद्दी असल्याने त्यांनी बहुजनातील काही लोकांना आपलेसे केले आहे. त्यांना नावापुरते राजेपद देऊन खरी सत्ता आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक युगात बळीला पाताळात घालण्याचे काम ते बिनधास्तपणे करतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग व आता नचिअप्पन कमिटीचा अहवाल हे दडपून टाकणे म्हणजे बळीराजाला पुन्हा पुन्हा पाताळात गाडत राहणे, असा त्याचा अर्थ होतो.

    आता तर त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) हे नवे धोरण देशात आणले आहे. या धोरणामुळे शेतकरी इतका नागवला गेला की तो आत्महत्त्याच करायला लागला. आता पर्यंत गेल्या 15 वर्षात 20 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेली आहे. शेतकरी म्हणजे बळीराजाच! पाच हजार वर्षांपूर्वीचा आपला बळीराजा आर्यांच्या अन्यायाविरोधात लढता लढता मेला, मात्र आजचा बळीराजा लढण्याआधीच आत्महत्त्या करून पराभव स्वीकारतो. याचे खरे कारण हे आहे की, आपण बळीराजाची लढायची प्रेरणा विसरलो आहोत. त्याचा इतिहास आपण विसरू लागलो आहोत. भालदेव पित्तरपाटासारखे त्याचे सण साजरे करतो, मात्र त्याच्यामागचा गौरवशाली युद्धाचा इतिहासच आपल्याला माहीत नाही. आर्य-ब्राह्मणांनी बळीला पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास पुराणांमध्ये लिहून ठेवला आहे, त्यालाच आपण खरा इतिहास मानू लागलो. पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या बळीराज्याने वामनाच्या सांगण्यावरून पाताळात गाडून घेतले म्हणजे त्याने आत्महत्त्याच केली, असे समजून आजचा शेतकरी-बळीराजाही आत्महत्त्या करून स्वतःची सुटका करून घेतो आहे. एकतर तो गुपचूप अन्याय सहन करत राहतो, आणी अन्याय सहन करण्याची सीमा संपली की आत्महत्त्या करतो. असे पराभूत व लाचार जीवन आपल्या वाट्याला आले आहे. मागीतल्याने मिळत नाही व लढल्याशिवाय सन्मान पावत नाही. ही लढण्याची प्रेरणा आपल्याला बळीराजाच देईल, म्हणून आपण आपले सर्व सण-उत्सव पारखून ते मुळ स्वरूपात साजरे केले पाहीजेत. सण चुकीच्या पद्धतीने साजरे केलेत तर, मरण्याची प्रेरणा मिळते व हेच सण खरा इतिहास जाणून साजरे केलेत तर, त्यातून जगण्याची प्रेरणा मिळते.


    लेखक —प्रा. श्रावण देवरे,

    ReplyDelete
  42. आंबेडकरी चळवळ आता ओबीसींच्या खांद्यावर!

    मधु कांबळे

    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

    बुद्ध सामाजिक समतेचा आग्रह धरतो. म्हणून आम्हाला बुद्धाच्या वाटेने जायचे आहे, असे आता ओबीसी बोलू लागले आहेत. रिपब्लिकन नेतृत्वाच्या सत्तालोलुप राजकारणामुळे अस्वस्थ झालेल्या आंबेडकरी समाजातील सुशिक्षित वर्गही ओबीसींच्या धर्मातराच्या चळवळीच्या मागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. सांस्कृतिक परिवर्तनाची ही चळवळ भविष्यात महाराष्ट्रात राजकीय आव्हान म्हणून उभी राहू शकेल..
    देशात २०१० ला दशवार्षिक जनगणनेला सुरुवात झाली. त्या वेळी देशभरातून एक मागणी पुढे आली. ती मागणी होती, जातिनिहाय जनगणना करण्याची. ही मागणी होती खास करून इतर मागासवर्गाची- म्हणजे ओबीसी समूहाची. संसदेत त्यावर वादळी चर्चा झाली. संसदेबाहेर छोटी-मोठी आंदोलने झाली. महाराष्ट्रातही या मागणीसाठी रास्ता रोको- रेल रोको झाले, मोर्चे निघाले. वातावरणाचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने जाहीर केले की, जातिनिहाय जनगणना केली जाईल. ओबीसी समूहाने, संघटनांनी, त्यांच्या नेत्यांनी त्याचे स्वागत केले, आंदोलने शांत झाली. मात्र प्रत्यक्ष जातिनिहाय जनगणना झालीच नाही. केंद्राने ओबीसींची फसवणूक केली. का हवी होती ओबीसींना जातिनिहाय जनगणना? ओबीसी हा या देशातील अनुसूचित जाती-जमातीनंतरचा मागासललेला वर्ग आहे. समाजव्यवस्थेतही त्याचे खालचे स्थान आहे. मंडल आयोगाने या वर्गाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. गेल्या वीस वर्षांत त्याचा त्यांना थोडा-बहोत लाभ झाला व होत आहे. परंतु देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींसाठी केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण नाही किंवा अर्थसंकल्पात तरतूद नाही. मग या समाजाचा विकास होणार कसा? हे सारे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना जातिनिहाय जनगणना हवी होती, ती झाली नाही. मात्र आंदोलनाच्या गर्जना करणारे राज्यातील प्रस्थापित ओबीसी नेतेही शांत झाले. परंतु ही अवहेलना ओबीसींमधील काही जागृत घटकांना स्वस्थ बसू देत नव्हती. या लोकशाही शासन व्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत आमचे स्थान कोणते, हा प्रश्न ओबीसींनी उपस्थित केला आहे.

    ReplyDelete
  43. आंबेडकरी चळवळ आता ओबीसींच्या खांद्यावर!

    विसाव्या शतकाच्या प्रारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. हिंदू समाजव्यवस्थेत अस्पृश्यांचे स्थान कोणते? महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सार्वजनिक पाणवठय़ावर आम्हाला पाणी भरता येत नाही, तर आम्ही कोण, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. काळाराम मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाने मंदिर प्रवेश अस्पृश्यांना बंद असेल तर मग आम्ही कोण आणि स्वतंत्र देशात आमचे राजकीय स्थान काय असेल, असा गोलमेज परिषदेत त्यांनी सवाल केला होता. १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी भारताला जबरदस्तीने ओढले, त्याला विरोध करणारा ठराव त्या वेळच्या मुंबई विधानसभेत मांडण्यात आला होता. त्या वेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक वैचारिक जुगलबंदी झाली होती. आंबेडकर म्हणाले होते की, जेव्हा मी आणि माझा देश असा प्रश्न येईल, त्या वेळी मी माझ्या देशाच्या हिताला प्रथम प्राधान्य देईन. मात्र जेव्हा देश आणि माझा अस्पृश्य समाज असा प्रश्न उपस्थित होईल, त्या वेळी मी माझ्या समाजाच्या हिताचा आधी विचार करीन. त्यावर खेर यांनी त्यांच्या या विधानाबद्दल चिंता व्यक्त करतानाच, एखाद्या वस्तूचा एक भाग म्हणजे संपूर्ण वस्तू नसते, किंवा एखादा भाग हा संपूर्ण वस्तूपेक्षा मोठा नसतो, अनेक भागांनी मिळून एक संपूर्ण वस्तू तयार झालेली असते, अशी टिप्पणी केली. देशापेक्षा अस्पृश्यतेचा प्रश्न मोठा नाही हे त्यांना सांगायचे होते. मात्र त्यावर आंबेडकरांनी उत्तर दिले, की मी तुमच्या संपूर्णतेच्या विश्वाचा भाग नाही, तर त्याबाहेरच्या कुणा एका अलग जगाचा मी भाग आहे. अशा प्रत्येक टप्प्यावर ते आम्ही कोण, असा समाजव्यवस्थेला प्रश्न विचारत होते आणि त्याच वेळी ते त्या वेळच्या अस्पृश्यांना आणि शूद्रातिशूद्रांना तुम्ही कोण, तुमची ओळख काय, असा सवाल करून त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. या कोणत्याच प्रश्नांची त्यांना समाजव्यवस्थेने नीट उत्तरे दिली नाहीत. मग त्यांच्यासमोर एकच आखरी मार्ग होता, धर्मातर.
    पुन्हा आंबेडकरांनी आधार घेतला तो अस्पृश्यांच्या वेगळेपणाचा. अस्पृश्य किंवा शूद्रातिशूद्र (ओबीसींसह) हे मूळचे बौद्धच होते, असा त्यांनी संशोधनपर निष्कर्ष काढला. त्यासाठी त्यांनी पुन्हा ब्रिटिशकालीन शिरगणतीचा आधार घेतला. भारतात १८७० पासून शिरगणतीला सुरुवात झाली. त्या वेळी हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन अशी धर्मनिहाय जनगणना केली जात होती. मात्र १९१० ची जनगणना हिंदू आणि बिगरहिंदू अशी करायला सुरुवात केली. त्याला शंभर नंबरी हिंदू असलेले आणि शंभर नंबरी हिंदू नसलेले असे नाव देण्यात आले होते. शंभर नंबरी हिंदू नसलेले कोण, त्याचे निकष दिले होते, ते असे- १) जे कुणाही ब्राह्मणाकडून अथवा अन्य मान्यवर हिंदूकडून गुरुमंत्र घेत नाहीत. २) चांगले ब्राह्मण ज्यांचे मुळीच पौरोहित्य करीत नाहीत. ३) ज्यांच्यामध्ये ब्राह्मण पुरोहित मुळीच नाहीत. ४) हिंदूू देवळात ज्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ५) ज्यांच्या स्पर्शामुळे किंवा काही ठरावीक अंतराच्या जवळ आल्यास विटाळ होतो, इत्यादी. ( संदर्भ- अस्पृश्य मूळचे कोण होते?) समाजव्यवस्थेतील बहिष्कृत अशा वर्गाची ही लक्षणे होती. त्यात दलित, आदिवासी आणि ओबीसीही येतात. म्हणून त्यांनी
    १४ ऑक्टोबर १९५४ रोजी या देशात एक सांस्कृतिक क्रांती केली. त्या वेळच्या अस्पृश्यांना त्यांनी बौद्ध म्हणून एक नवी ओळख दिली.

    ReplyDelete
  44. आंबेडकरी चळवळ आता ओबीसींच्या खांद्यावर!

    आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर तब्बल ५६ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातून बीडमधून अशीच एक ओबीसींच्या धर्मातराची घोषणा झाली. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी ओबीसींनाही आता धर्मातराशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मांडली. त्याची सुरुवातीला फारशी कुणी दखल घेतली नाही. मंडल आयोगामुळे शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणामुळे आर्थिक प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करू लागलेल्या आणि राजकीय भान आलेल्या ओबीसींना खरे म्हणजे सत्तेच्या राजकारणाचेच अधिक आकर्षण वाटत गेले. मग मध्येच अशी धर्मातराची घोषणा का केली आणि अशी घोषणा करणारे हनुमंत उपरे कोण, हा प्रश्न प्रस्थापित ओबीसी नेत्यांना पडला. उपरे कोण महत्त्वाचे नाहीत, तर ते उभी करू पाहणारी चळवळ आणि त्यामागचा विचार काय आहे, याची दखल घेण्याची प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला आवश्यकता वाटली नाही. दुसरा एक प्रश्न असा पुढे आला की, आजच्या जागतिकीकरणाच्या, आर्थिक उदारीकरणाच्या आणि कॉर्पोरेट जगात धर्म किंवा धर्मातर हा काही मुद्दा आहे का? आणि धर्मातराने ओबीसींचे प्रश्न सुटणार आहेत का? हा आणखी एक प्रश्न. त्यावर प्रतिप्रश्न असा की, जागतिकीकरणाने जातिव्यवस्था नष्ट झाली का, उचनीचतेची मानसिकता बदलली का, शोषण संपले का? जागतिकीकरणाची जन्मभूमी असलेल्या अमेरिकेत २६ फेब्रुवारी २०१२ रोजी एका वस्तीत संशयास्पद स्थितीत फिरत आहे म्हणून ट्रॅव्हन मार्टिन या १७ वर्षांच्या निग्रो मुलाचा एका गोऱ्या इसमाने गोळ्या घालून खून का केला? हे प्रकरण जगभर गाजले. परंतु प्रश्न असा आहे की, जागतिकीकरणाने अमेरिकेतला तरी वंशवाद संपविला का?
    १९६०-७० च्या दशकात अमेरिकेत ब्लॅक मुस्लीम नावाची अशीच एक सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ सुरू झाली. माल्कम एक्स हा त्या चळवळीचा प्रणेता होता. एकाच ख्रिश्चन धर्मात राहूनही गोऱ्या लोकांचा कृष्णवर्णीय निग्रो समाजाला जाच सहन करावा लागत होता. वंशभेदाची शिकार निग्रो ठरले होते. त्याविरुद्ध माल्कमने उठाव केला. आम्ही ख्रिश्चन असून आमची अशी अवहेलना का, असा त्यांनी प्रश्न केला होता. त्या वेळी त्यांनाही त्याचे नीट उत्तर मिळाले नव्हते. प्रसूतीच्या वेळेपर्यंतच मूल आईच्या पोटात राहू शकते. प्रसूतीची वेळ झाली की मूल आईपासून वेगळे होते. तसे झाले नाही तर मुलाच्या व आईच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. प्रसूतीची वेळ झाली की आईपासून अलग होण्यासाठी मूलही त्याच्या स्वत:च्या जगासाठी आक्रोश करीत असते. त्या वेळी सांस्कृतिक परिवर्तनासाठी माल्कम एक्सने शोधलेले हे उत्तर होते. पुढे िहसाचाराने माल्कमचा आणि त्याच्या चळवळीचा बळी घेतला हा भाग वेगळा.

    ReplyDelete
  45. आंबेडकरी चळवळ आता ओबीसींच्या खांद्यावर!

    हिंदू धर्म-संस्कृतीपासून आम्ही वेगळे आहोत, समाजव्यवस्थेतील आमचे स्थान अलग आहे, अशी मांडणी करीत ओबीसी आता सांस्कृतिक परिवर्तनासाठी पुढे सरसावला आहे. नागपूरला १४ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिली धर्मातर जनजागृती परिषद झाली. त्यानंतर दुसरी मुंबईत, तिसरी पुण्यात, चौथी औरंगाबादला आणि आता नुकतीच २२ सप्टेंबरला नाशिकमध्ये परिषद पार पडली. ओबीसींमधील माळी, कोळी, आगरी, कोष्टी, गुरव, भावसार, परीट, सुतार, कुंभार, शिंपी, धनगर, गवळी, तेली, कुणबी इत्यादी लहानमोठय़ा समाज-समूहांच्या संघटना धर्मातर जनजागृती चळवळीत सहभागी होऊ लागल्या आहेत. ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर, असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. या चळवळीला हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे. ओबीसींमधील विविध जातिसमूहांचे प्रतिनिधी सांस्कृतिक परिवर्तनाची भाषा करू लागले आहेत. किंबहुना आम्ही पूर्वी बौद्धच होतो, त्यामुळे आम्ही धर्मातर करीत नाही तर स्वगृही परतत आहोत, अशी मांडणी करू लागले आहेत. महाराष्ट्रातील ५२ टक्के ओबीसी वर्ग हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांचा कायमच आधारभूत मतदार राहिला आहे. खरेतर आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक परिवर्तन हे मुख्य अंग आहे. सांस्कृतिक परिवर्तनाशिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे, त्याशिवाय समता, स्वातंत्र्य, न्यायावर आधारित सामाजिक व राजकीय व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही, हा त्याचा मूळ गाभा आहे. परंतु आंबेडकरांनतर त्यांच्या अनुयायांनी किंवा रिपब्लिकन नेतृत्वाने या सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ राजकीय चळवळीवर, तेही सत्तेचा एखादा तुकडा मिळविण्याच्या राजकारणावर सारे लक्ष केंद्रित केले. एका बाजूला रामदास आठवले यांच्यासारखे रिपब्लिकन नेते सत्तेसाठी हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांशी राजकीय सोयरिक करीत आहेत, तर आंबेडकरांच्या नावाने दुसरा एक समूह नक्षलवादासारख्या अतिरेकी चळवळीची भलामण करीत आहे. अशा वेळी ओबीसी समूह आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीकडे वळत आहेत. ओबीसींमधील सुशिक्षित आणि तरुण वर्ग धर्मातराच्या चळवळीकडे आकर्षित होत आहे, तर रिपब्लिकन नेतृत्वाच्या सत्तालोलुप राजकारणामुळे अस्वस्थ झालेल्या आंबेडकरी समाजातील सुशिक्षित व काही प्रमाणात आर्थिकदृष्टय़ा सबळ झालेला वर्गही ओबीसींच्या धर्मातराच्या चळवळीच्या मागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. उपरे आणि त्यांचे सहकारी बौद्ध धम्माचाच स्वीकार का करायचा, याचीही सैद्धांतिक मांडणी करीत आहेत. बुद्धाने ईश्वर मानला नाही, त्यामुळे कर्मकांडाचा प्रश्न येत नाही. विज्ञानवाद, बुद्धिवाद, विवेकवाद हा बुद्धाचा विचार आहे. अंहिसा हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे आणि कोणताही प्रश्न विचारविनिमयाने आणि संवादाने सोडवावा, हिंसेचा आधार घेऊ नये, हा त्यामागचा विचार आहे. म्हणजे लोकशाही प्रणालीचाच तो एक भाग आहे. बुद्ध सामाजिक समतेचा आग्रह धरतो. म्हणून आम्हाला बुद्धाच्या वाटेने जायचे आहे, असे आता ओबीसी बोलू लागले आहेत. आज त्याचे स्वरूप अतिशय लहान आहे, परंतु धर्म बदलण्याची भाषा करणे किंवा तशी मानसिकता तयार करणे सोपे नाही. आता ओबीसींनी सांस्कृतिक परिवर्तनाची आंबेडकरी चळवळ आपल्या खांद्यावर घेतली आहे. सत्तेसाठी आंबेडकरी विचाराच्या विरोधी राजकारण करणारे रामदास आठवले किंवा हिंदुत्ववादी राजकारणाची पाठराखण करणारे गोपीनाथ मुंडे आणि ओबीसींना हिंदू धर्मात नव्हे तर राजकारणात जाच आहे, अशी सोयीची भूमिका घेणारे छगन भुजबळ या साऱ्याच नेत्यांसमोर ओबीसींची ही सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ भविष्यात राजकीय आव्हान म्हणून उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  46. लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, कुणबी समाजात जन्मलेली महागायिका, त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबरला ८५व्या वर्षांत पदार्पण केले.
    लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतत्न' प्राप्त होणाऱ्या गायक-गायिकांमध्ये लताबाईंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. त्यानंतर इ.स. १९४५ मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी उस्ताद अमानत अली खॉ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामे (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले.

    ReplyDelete
  47. Periyar E. V. Ramwsamee said :

    There is no god at all.
    He, who invented God is a fool.
    He, who propagates God is a scoundrel.
    He, who worships God is Barbarian.

    * जाणवे तोडा, मानव जोडा.
    * ब्राह्मणांना १५ वर्षे शिक्षण बंद करा.
    * देवालये, मद्यालये, आणि वेश्यालये यांच्यात काहीही फरक उरला नाही.
    * ब्राह्मणशाही ही बहुजन समाजाच्या नाशाचे मुख्य कारण होय.
    * ब्राह्मणशाही सुधारता येत नाही, ती नष्टच केली पाहिजे.
    * ही ब्राह्मणी काँग्रेस मी तामिळनाडूतून नष्ट करीन.

    बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मनुवाद्यांशी लढा देणारे खरे देशभक्त.

    ReplyDelete
  48. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नाव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहबागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदी धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    ReplyDelete
  49. समजा - ( चैतन्य सर )

    आपण सर्वानी धर्म बदलला अगदी सगळ्या ब्राह्मणानी पोथ्या पुराणे जाळली ,देव फेकून दिले ,बौद्ध लोकांनी ख्रिश्चन ,ख्रिश्चनांनी जैन ,जैनांनी ज्यू,आणि ज्यू लोकांनी मुसलमान आणि हिंदुनी मुसलमान धर्म स्वीकारला तर काय होईल ?आपली विवंचना संपणार आहे का ?


    प्रश्न आर्थिक असतील तर त्याला आर्थिकच उत्तर शोधले पाहिजे - नाही का ?

    कल्पना करा -

    आता चित्र काय झाले ? सर्व ब्राह्मण संपले - ते मुसलमान ,ख्रिश्चन झाले , सर्व हिंदू संपले , ते बौद्ध किंवा अजून काहीतरी झाले - हिंदूंची सर्व मंदिरे पाडली आणि तिथे झोपडपट्ट्या झाल्या , गरीबाना जेवायला -झोपायला आसरा मिळाला -

    आज जिथे अंबाबाई आहे काशी विश्वेश्वर आहे , भवानी माता आहे - सगळे फेकून दिले - आणि मस्त बौद्ध किंवा ख्रिश्चन स्थळे निर्माण झाली किंवा मस्त सरकारी इमारती किंवा झोपडपट्टी निर्मुलनासाठी गरीबांची घरे झाली तर ?-चांगलेच होईल - हाच आपण २०१४ चा निवडणूक मुद्दा करुया !

    चालेल ?

    अहो - लक्षात घ्या , बोलणे सोपे - असे रंकाळ्यावर उभे राहून बोलू लागलात तर ?

    लोक वेडे समजून दगड मारतील !

    आपण एक गैर समजूत करून घेतली आहे की , सगळे ब्राह्मण पोथ्या पुराणे वाचतात - पण आपले चैतन्य सर किती सुंदर संयमाने लिहितात - त्याना किंवा त्यांच्या समविचारी लोकाना आपण समजून का घेत नाही ?

    नुसते निनावी भडक लिहिण्यात काय पुरुषार्थ आहे

    आज पुण्या मुंबईत वेळ कुठे आहे - साधे सण धड साजरे होत नाहीत - जो धार्मिक आंधळेपणा आहे तो उच्च मराठा समाजाकडे आणि खेडेगावात दिसतो -ब्राह्मणानी सगळे रीती रिवाज कधीच सोडले आहे हे मी खात्रीशीर सांगू शकतो -

    त्यांनी कायम विद्येचीच कास धरली !

    आपण यडेपणाने धर्म पाळत बसलो - दक्षिणा देत बसलो - मग देव कुणी फेकायचे आहेत

    देव्हाऱ्यातून ? आपण - आपल्या देव्हाऱ्या मधून -आधी ते डोक्यातून फेकून देणे महत्वाचे !

    आज ब्राह्मण टेल्को मध्ये इंजिनियर म्हणून काम करतो - म्हणजे तो एक प्रकारे लोहारच होतो !- बाटात काम करतो - प्रोडक्शन चे म्हणजे चांभारच होतो !

    आपणपण ब्राह्मण का होत नाही -

    ब्राह्मणांची जिरवण्यासाठी आपल्याला हवी तशी पोथ्या पुराणे नव्याने का लिहित नाही ?

    आपण आपल्या मुलांच्या मुंजी का लावत नाही ?तो एक साधा प्रतिकात्मक विधी आहे - शिक्षणाची दीक्षा घेण्याचा - ती दीक्षा समजून घ्या - त्यावर फक्त ब्राह्मणांचा हक्क नाही - आगरी , शिंपी - सोनार ,कोल्हाटी ,मराठा ,माळी -कोष्टी सगळ्यांनी मुंज करा आपापल्या मुलांची - नवे मंत्र लिहा !नवे तंत्र सांगा - मराठी वापरा - संस्कृत फेकून द्या ! - जमेल हे ?

    त्या ब्राह्मणांच्या मागे लागून काय उपयोग !दोशीतर आपणच आहोत !-त्यानी लग्नविधी सांगायचे ? का ?

    खरेतर भांडण भटगिरी बद्दल आहे का ?- खरे ब्राह्मण उच्च शिक्षण घेऊन उच्चपदावर काम करत आहेत !त्या कंपन्यांना जर बंधने घातली - आरक्षणाची - तर त्या देश सोडून निघून जातील !ग्लाक्सो ,टेल्को ,इन्फोसिस ,गोदरेज ,आणि बाहेरून आलेल्या असंख्य कंपन्या - यावर आपण बळजबरी करू शकत नाही - आरक्षण पण नाही - इतर देशात आपल्या आरक्षणाच्या कल्पनेला - सॉरी - सिद्धांताला हसतात - त्या म्हणतात आम्ही आमचे उत्पादन उत्तम ठेवण्या साठी आलो आहोत - आम्हाला त्रास झाला तर आम्ही निघून जाऊ - आमचे भांडवल काढून घेऊ - आपल्याकडे उत्तर आहे का ?- चीन सारखा समाजवादी देशही आज भांडवल देशात कसे येईल त्यासाठी विचार करतो आहे आणि आपण प्रोटेकशनिझम मुले आपल्या समाजाचे आणि राष्ट्राचे नुकसान करत आहोत !

    ReplyDelete
  50. घाटगे सर, काय आहे कि बदल घडवणे सध्याच्या राजकारण्यांना सोयीचे नाहीये. नाहीतर ते गेल्या ६५ वर्षात झालेच असते. असे बदल घडवले तर लोक त्यांना उचलून फेकून देतील. त्यामुळे मग सोपा मार्ग काय तर कोणालातरी पकडायचे आणि झोडपायचे. जसे शिवसेना वाले आणि सध्या महाराष्ट्र नवनिर्मानवाले जसे बिहारी आणि यु.पी वाल्यांना झोडपतात तसे ब्राह्मणांना झोडपायचा उद्योग काही लोक करतात. कुठलेही चळवळ द्वेषावर चलात नाही हे अजूनही ह्या लोकांना समजले नाही. बामसेफ च्या वेळी असेच सगळे झाले पण आज काय अवस्था आहे? सगळे दलित पान्थरचे नेते कोणाच्या ना कोणाच्या वळचणीला जावून बसले आहेत. दलित साहित्य पूर्वी मी फार आवडीने वाचायचो. एक नवा वर्ग आणि त्यांचे आयुष्य कळले. पण नंतर तोच तोच तोच पणा. त्याला साहित्यिक मूल्य किती आहे हा प्रश्न करणे म्हणजे कठीण झाले आहे. लगेच तुम्ही लोक असेच असे होते. असाच प्रकार सगळ्या प्रकारच्या आणि जवळपास सगळ्या संस्थांमध्ये झाला आहे. प्रामाणिकपणा अजिबात राहिलेले नाहीये. राहिला आहे तो फक्त द्वेष आणि हक्क. पुर्व्हीचे जुने शिक्षक जे सुरवातीला राखीव जागांमधून आले त्यांच्याकडे एक प्रकारचा न्यूनगंड होता आणि तेंव्हा बाकीच्या सवर्णांनी त्यांना सामावून घेतले नाही. पण त्या शिक्षांकडे पुढे निदान चांगले काही करायची इच्छा होती. त्यातले काही शिक्षक नक्कीच उत्तम होते. पण पुढे जस जसे हा टक्का वाढत गेला तस तसे सगळ्या ठिकाणी संस्था बर्याच प्रमाणात खालावत गेल्या. हाच प्रकार सगळ्याच्या सगळ्या सरकारी ठिकाणी झाला आहे. सगळ्या नवीन लोकांना आपले हक्क आणि पैसे दिसतात पण समाज सुधारावा असे वाटत नाही. सर्व सेक्युलर पक्षांनी जात आणि पात ह्यांची प्रचंड प्रमाणात विभागणी केली पण कोणालाही त्यात गैर वाटत नाहीये. हे सगळे प्रचंड अधोगती कडे चालले आहे असेहि कोणाला वाटत नाही. राखीव जागा पाहिजेतच आणि त्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजेल पण तीच होत नाहीये. त्याच जोडीला नवीन उत्तम दर्जाची कॉलेजेस आणि शाळा काढल्या पाहिजेत पण जिथे मुल पायाभूत सुविधाच कोणी करत नाही तिथे शाळा आणि कॉलेजेस फार दूरची अवस्था आहे. आज खेडोपाडी डीएड च्या इतक्या संस्था आहेत त्यातून आपण काय शिक्षक तयार करतो आहोत ह्याची कोणाला फिकीर आहे का? आपली आवड आहे? आपली अभ्यास आणि कष्ट करायची तयारी आहे का? सरकार देणार म्हणजे काय करणार? tax कोणाकडून कापला जाणार? कोण पैसे भरणार ह्याचे? ह्याचा काही विचार केला आहे का कोणी? वर कोणीतरी गुज्जू लोकांना फक्त पैश्साठी काम करणारे म्हटले आहे. पण हा विचार केला आहे कि महाराष्ट्रातले बरेच उद्योग ह्याच लोकांचे आहे. सगळ्यात जास्त tax त्यांच्याकडूनच मिळतो? किती लोकांची घरदारे त्यांच्या जीवावर चालली आहेत? आज आगरी समाज अंबानीच्या मागे उगाच उभा नाहीये. धीरूभाई अंबानी ह्यांनी त्यांच्यासाठी काय केले हे किती लोकांना माहित आहे? तृटी काढणे फार सोपे असते. नुसते धर्मांतर करून असे झाले असते तर आज पुन्हा हि अशी वेळ आली नसती. माझ्या स्वतःच्या घरात माझ्या वडिलांनी कधीच कुठले देव देव आणि जेवणावळी केली नाही. माझ्या आजूबाजूला जितके ब्राह्मण बघतो त्यातले ९०% लोक एकही धार्मिक किंवा वैदिक पोथ्या पुराने करताना दिसत नाहीत. आजोबावागैरे लोक फार तर करत असतील पण त्यांना कोणी विचारात नाही. त्यामुळे मोठी गम्मत वाटते आहे कि कशाच्या आधारावर वर इतके सगळे लिहिले आहे? मी तर गेल्या १५ वर्षात एकही देवळात गेलो नाही. गणपती फक्त पोरांना गम्मत वाटते म्हणून. पण तोही एकाच मूर्ती गेले ५ वर्ष वापरात आहे. अजूनतरी कोणी वक्रदृष्टी केली नाहीये. बदल हे असे स्वताच करायचे असतात. असो. तसाही मी हिंदू आहे का अजून कोणी आहे चांगला माणूस असेन तर काय फरक पडतो?
    घाटगे सर तुम्हाला पूर्ण पाठींबा. हे मुंजी फिन्जी प्रकरण तर डोक्यातच जाते. त्याचा सध्याच्या काळात तर काहीच उपयोग नाही. माझ्या माहितीतल्या कित्येक ब्राह्मण कुटुंबात तर कोणी करत पण नाही. पण कोणालाही करायची असेल तर जरूर करावी. पण टी कश्साठी करतात आणि त्याचा अर्थ काय हे माझ्या माहितीतल्या ९९% लोकांना माहिती नाहीये. राहिले आहे ते फक्त एक रिचुअल. असो.

    ReplyDelete
  51. धर्मांतराचा विषय निघाला की लगेच चर्चा आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांकडे का वळवली जाते? धर्मांतराला विरोध करणारे लोक शंकराचार्य हे पदच रद्द करावे म्हणून आग्रह का धरत नाहीत; शंकराचार्यांनी तरी जनतेचे काय भले केले आहे? वैदिक पाठशाळेत सर्व जातींच्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून का झगडत नाहीत?

    धर्मांतर हे शेवटचे पाऊल आहे. नाईलाज झाल्याशिवाय कोणी ते पाऊल उचलत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर माणसांना माणसांच्या पातळीवर वागवण्याचा आग्रह धरला. पण कोणीही त्यांच्या आक्रोशाकडे गंभीरपणे बघितले नाही. म्हणूनच शेवटी नाईलाज म्हणून त्यांना धर्मांतराचा पर्याय स्वीकारावा लागला.

    जे दलितांचे झाले तेच आज ओबीसींचे होत आहे. ह्या धर्मात त्यांना पायपुसण्यासारखे वापरले जाते हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. लवकरच इतर जाती समूह देखील त्याच मार्गाने जाणार आहेत. वर्षानुवर्षे धर्माच्या कुंपणावर उभे राहून इतरांनी आपली सेवा करावी आणि समान अधिकार देखील मागू नयेत हे ज्यांचे तत्वज्ञान आहे त्यांना या कुचंबणेची तीव्रता कशी कळणार? कुचंबणा एका मर्यादेपर्यंत सहन करता येते. त्यानंतर बंड करणे हा एकमेव पर्याय उरतो.
    आम्ही आमच्याच धर्माचे ग्रंथ वाचायचे नाहीत, आमच्याच धर्माची भाषा देखील उच्चारायची नाही, आमच्याच देवांना आमचा विटाळ झाला तरी का म्हणून विचारायचे नाही. आमच्याच धर्माने आम्हाला जनावरांपेक्षाही खालचा दर्जा दिला तरी तक्रार करायची नाही.
    आम्ही आमच्याच धर्माच्या कुंपणात आलो तर धर्म बुडतो आणि या त्रासाला कंटाळून आम्ही धर्माचे कुंपण ओलांडून दुसऱ्या धर्माच्या कुंपणात गेलो तरीही धर्म बुडतो? म्हणजे पाण्यात गटांगळ्या खाऊन ज्यांच्या नाका-तोंडात पाणी गेले आहे त्यांना तुम्ही स्वत:च्या जहाजात घ्यायला तयार नाही. आणि ते दुसऱ्या जहाजात जाण्याचा प्रयत्न करू लागले तर तुम्हाला तेही मंजूर नाही? मग अशा लोकांनी काय तुमच्या कृपेची वाट पाहत बुडून मरावे हीच तुमची इच्छा आहे काय?
    तुमच्या हातातून सत्ता निसटत चालली असतांना तुम्ही इतरांशी कसे वागता ह्याला महत्व नाही. तुमच्या हातात सर्वंकष सत्ता असतांना तुम्ही इतरांशी कसे वागलात हे महत्वाचे असते.
    भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मांतराचा अधिकार दिलेला आहे. धर्मांतर कधी करायचे, कोणत्या धर्मात करायचे आणि कोणत्या कारणासाठी करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात दुसऱ्यांनी लुडबुड करण्याचे प्रयोजन नाही

    ReplyDelete
  52. विपश्यनाचार्य सत्य नारायण गोएंका यांचे निधन

    ध्यानधारणेतून मानवी जीवनाला उन्नतीच्या मार्गाकडे नेण्यासाठी विपश्यनेच्या माध्यमातून भारतात पुन्हा आणणारे सत्य नारायण गोएंका यांचे रविवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी माता एलाईचीदेवी आणि सहा मुलं असा परिवार आहे.

    गोएंका यांच्या जाण्याने त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार असून मंगळवारी जोगेश्वरी येथे अंतिम संस्कार करण्यात येतील, अशी माहिती सोमवारी सकाळी त्यांच्या निकवर्तियांनी दिली.

    मुळचे भारतीय वंशाचे सत्य नारायण गोएंका यांचा जन्म ३० जानेवारी १९२४मध्ये बर्मा येथे झाला. पुढे वयाचे ३५ वर्ष ते तेथेच राहिले. ते बर्मातील मोठे उद्योगपती होते. मात्र 'उ. बा. खिन' या गुरुंकडून विपश्यनेचे धडे मिळाल्यानंतर त्यांनी आपले पुढले आयुष्य विपश्यनेच्या प्रसारासाठी वाहिले. ते भारतात स्थायिक झाले. बुद्धाने हा अष्टांगमार्ग पंचेचाळीस वर्ष भारतभ्रमण करून सर्वांपर्यंत पोहोचवला. त्या प्रक्रियेची दीक्षा ब्रम्हदेशापर्यंत पोहोचली. भारतातून नाहिशी झालेली 'विपश्यना' सत्यनारायण गोएंकाजींनी पुन्हा एकदा भारतात आणली. १९६९मध्ये त्यांनी भारतात विपश्यनेचे वर्ग सुरू केले. विपशनेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अध्यात्मिक अनुभवातून मानवाच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले आणि आता अनेक देशांतील 'विपश्यना' केंद्रांतून ही पद्धती कोणालाही दिली जाते. विपश्यनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ८०० शिक्षक घडवले आहेत. गोएंकाच्या या कार्यामुळे दरवर्षी सुमारे एक लाख लोकांना त्याचा अभ्यास करता येतो. गोएंका यांच्या कार्यसाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

    ReplyDelete
  53. मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना !

    भगवान बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही विपश्यना विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. विपश्यना भगवान बुध्दाच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत ध्यानावरच विशेष भर दिला आहे.

    विपश्यना ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे.

    या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तीचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक वेदना दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडवून येतात.

    ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात शुध्द स्वरूपात जतन करण्यात आली. सत्यनारायन गोयंकाजी यांनी ही विधी ब्रम्हदेशातून आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील इतर काही ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत.

    तसेच विपश्यना शिबीर त्रेलोक्य बौध्द महासंघ, सद् धम्म प्रचार समिती व इतरही काही धार्मिक संस्था आयोजित करीत असतात.

    विपश्यनात दोन प्रकारचा अभ्यास आहे. पहिला अभ्यास आनापानसतीचा व दुसरा स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या संवेदनाचे निरीक्षण करणे.

    ReplyDelete
  54. मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना !

    आनापानसती विपश्यनाचा पाया आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला ‘आनापानसती’ शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे व सती म्हणजे येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.

    विपश्यनाला पाली भाषेत विपस्सना म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. वस्तू जशा आहेत तसे पाहाणे व त्यांच्या अस्तित्वाचे सत्यदर्शन म्हणजे विपश्यना.

    ReplyDelete
  55. मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना !

    या विधीत आपल्या स्वत::च्या शरीरात उत्पन्न होणार्‍या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पध्दतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. विपश्यना करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. विपश्यनामुळे मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते.

    कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून विपश्यनेच्या माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास विपश्यना शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.

    मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे आनापानसतीचा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.

    श्वास म्हणजे जीवन आहे. श्वास बंद पडला की जीवन संपले. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करतांना या गोष्टीची सतत आठवण होत असते. त्यामुळे आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व स्मृती या तीनही गोष्टीचा लाभ होतो.

    सत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येते. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे अस्तित्व आणि त्याचे नियम समजून घेता येते. या अभ्यासाने दु:ख, प्रक्षुब्द व ताणतणाव निर्माण करणारे कारणे शोधून त्याला नष्ट करता येते. त्यामुळे आपले मन शुध्द, शांत व आनंदी होत जाते.

    ReplyDelete
  56. मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना !

    भगवान बुध्दांनी आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यांना आढळले की, आपले शरीर अत्यंत लहान लहान परमानुचे बनले आहे. ते सतत उत्पन्न होवून नष्ट होत असते. म्हणजेच जीवनाच्या अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेची जाणीव झाल्याने मनुष्य कुशल कर्मे करण्याकडे वळतो. स्वतःतील दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार दूर करतो. उर्वरित आयुष्य दु:खात घालविण्यापेक्षा सुख आणि आनंदात घालवितो. असे अनेक फायदे या ध्यान साधनेने मनुष्याला प्राप्त होते.

    शरीरातील प्रत्येक कण परिवर्तनीय व बदलत असल्याने ‘मी’ ‘माझा’ असे म्हणावे असे काहीच स्थिर राहात नाही. हे सत्य साधकाच्या लक्षात येते. त्यामुळे अनात्मतेचा बोध होतो. आणखी एक सत्य साधकाला स्पष्ट होते ते असे की, ‘मी’ व ‘माझे’ची आसक्ती हीच तर दु:ख निर्मिती करते. ह्या सार्‍या गोष्टी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या अनुभवावरून संवेदनाच्या निरीक्षणामुळे समजू लागतात.

    या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्‍या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही. कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दुख:मुक्त होऊ शकतो, ही गोष्ट साधकाच्या लक्षात येते.

    तसेच प्रत्येक संस्कार उत्पन्न होते, लय पावते. ते परत उत्पन्न होते, लय पावते. ही क्रिया सतत सुरु राहते. आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थपणे निरीक्षण केल्यास, संस्काराची पुनर्निर्मिती थांबते. आताच्या आणि पूर्वसंचित संस्काराचे उच्चाटन झाले की, आपण दुख:मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, हेही साधकाच्या लक्षात येते.

    संवेदनापासून तृष्णेऐवजी प्रज्ञाच विकसित होते. प्रज्ञेमुळे दुखा:ची साखळी तुटते. राग व द्वेषाच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुख: निर्माण होण्याचे कारणच उरत नाही. मनाच्या दोलायमान स्थितीत घेतलेले निर्णय ही एक प्रतिक्रियाच असते. ती सकारात्मक कृती राहत नसून ती एक नकारात्मक कृती बनते. ज्यावेळी मन शांत व समतोल असते. तेव्हा घेतलेले निर्णय हे कधीही दुख:दायक नसते तर ते आनंददायकच असते. जेव्हा प्रतिकिया थांबतात, तेव्हा तणाव दूर होतात. त्यावेळी आपण जीवनातील खरा आनंद उपभोगू शकतो, याची साधकाला प्रचीती येते.

    ReplyDelete
  57. मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना !

    लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.

    विपश्यनेचा व्यक्तिगत दृष्टीने नियमित अभ्यास केल्याने मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार नष्ट होतात. त्यामुळे दु:ख आणि विकारातून मुक्त होवून मानवाचे कल्याण होते. तसेच सामाजिक दृष्टीने विशुद्धी, पावित्र, सदाचार, नैतिकतेचा पाया मजबूत होवून समाजविकास घडून येतो.

    आज जगासमोर उपासमार, गरिबी, जातीयवाद, हिंसाचार, दहशतवाद, हुकूमशाही, युध्दजन्य परिस्थिती असे जे भयावह स्थिती दिसत आहेत, त्याला शांत करण्यासाठी भगवान बुध्दाचे समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे तत्वज्ञान व त्यांची विपश्यना विधी हेच उत्तर आहे. म्हणून विपश्यना साधना ही मानवी कल्याणाचा मार्ग आहे.

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
    Replies
    1. विपश्यनेचा महर्षी
      बौद्धधर्मातील साधनेचे आजच्या युगात सुसंगत आणि कालोचित रूप दाखवणारा महर्षी सत्यनारायण गोएंका यांच्या निधनाने अंतर्धान पावला आहे. कोणत्याही धर्माचे अनेक स्तर असतात. त्यात ' जीव-जगत-परमात्मा ' यांचे परस्परांशी असणारे नाते मनाच्या पातळीवर आकळणे आणि या तिन्हींचा मेळ घालणे , हे मोलाचे. या नात्याचा खरा शोध सुरू होतो , तेव्हा कर्मकांडे , उपचार आणि बडिवार यांचे महत्त्व शून्य होते. गोएंका यांनी गेली अनेक दशके विपश्यना या बौद्धधर्मातील ज्या साधनेचा प्रचार केला , ती साधना म्हणजे मानसिक उन्नयनाची वाट आहे. या वाटेवर अंधश्रद्धा लागत नाहीत , तसेच कोणत्याही भेदाभेदाला स्थान उरत नाही. या अर्थाने धर्माचे नितळ , निरामय रूप या साधनेत साकारते. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्माचे एक नवे जागरण केले. तसेच , सत्यनारायण गोएंका यांनी याच धर्माचे विपश्यनेच्या प्रसाराने दुसरे जागरण घडवले. गोएंका यांना ही विद्या क्षोभाच्या क्षणी ब्रह्मदेशात मिळाली. ती त्यांनी जन्मभर जपली. जोपासली. मुक्तहस्ते वाटली. तिचा विस्तार जगभर झाला. विपश्यना केंद्रे जगभर विखुरली आहेत. गोएंका १९८२ पर्यंत स्वतःच या विपश्यनेचे तंत्र साधकांना समजावून देत. त्यानंतर , त्यांनी इतर साधकांचीही मदत घेण्यास सुरुवात केली. विपश्यना हा आत्मज्ञानाचा एकमेव मार्ग नाही. अनेक मार्गांमधला एक आहे , अशी विनम्र व अनाग्रही भूमिका गोएंका घेत. श्रीतुकोबांनी ' तुका म्हणे होय मनाशी संवाद , आपुलाचि वाद आपणासि ' असे म्हटले होते. याच आत्मसंवाद तत्त्वाचा प्राचीन आविष्कार म्हणजे विपश्यना. तिला अर्वाचीन युगात महत्त्वाचे स्थान सत्यनारायण गोएंका यांच्या प्रयत्नांनी लाभले. त्यांनी या साधनेचे तंत्र समजावे , यासाठी अभ्यासक्रम आखला. त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या जगात कित्येक लाखांच्या घरात असेल. मुंबईजवळ गोराई इथला पॅगोडा हा जगातला सर्वांत मोठा पॅगोडा आहे. तो म्हणजे गोएंका यांच्या कामाचे केवळ एक दृश्य स्वरूप आहे. या कामामागे जगातील अनेक देश ज्या हिरीरीने उभे राहिले , ती गोएंका यांच्या अविचल निष्ठेला दिलेली दाद होती. 'धर्मसंस्थापनेचे नर , मागे झाले पुढे होणार ' असा विश्वास संतांनी व्यक्त केला. गोएंका हे असे धर्मसंस्थापनेचे महर्षी होते. मात्र , त्यांचा धर्म निखळ , नितळ आहे. आत्मसंवाद करणारा आहे. त्यांची ही साधना दीर्घकाळ प्रकाश देत राहील.

      Delete
    2. शांततेचा साधक

      दु:खे आनंदात परिवíतत होतील, गुलामगिरीच्या भावनेखाली जखडलेली मने स्वातंत्र्याच्या भावनांनी बहरतील आणि मनामनांतील हिंस्रपणा नष्ट होऊन ही मने दयाभावाने भारून जातील तेव्हा जगात शांतता नांदेल. केवळ प्रेम आणि सद्भावनेतूनच जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते.. ज्याच्या हृदयात राग, द्वेष आणि परस्परांविषयीचा वैरभाव जागा आहे, तो हिंदू असो, मुस्लीम असो वा ख्रिस्ती असो.. त्याचे जिणे केविलवाणेच असणार’.. सत्यनारायण गोयंका नावाच्या ‘शांततेच्या साधका’ने सन २००० मध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती परिषदेत हे विचार व्यक्त केले आणि जगभरातील विविध धर्मप्रतिनिधींनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात हे विचार स्वीकारल्याची पावती दिली. निर्मळ हृदय हाच कोणत्याही धर्मविचाराचा गाभा आहे. म्हणून धर्माच्या नावाने होणारे संघर्ष थांबविले पाहिजेत, असा विचार घेऊन सत्यनारायण गोयंका यांनी विपश्यनेच्या माध्यमातून जगाला शांतीचा मार्ग दाखविला. स्वधर्माचा सन्मान आणि परधर्माचा अपमान करणाऱ्या धर्मापेक्षा परधर्माचा आदर करणारा धर्मच महान ठरतो. म्हणून आपल्या धर्माला महानतेचा मान मिळवून देण्यासाठी तरी परधर्माचा आदर करा, ही त्यांची शिकवण धर्माधतेमुळे अराजकाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या जगासाठी मोलाची ठरली, म्हणून सत्यनारायणजी गोयंका भारताचे नव्हे, तर आधुनिक जगाचे शांतिदूत ठरले. विपश्यना हा मानसिक शांततेच्या मशागतीचा मार्ग दाखविला, आणि या मार्गाने चालणाऱ्या लाखो जीवांच्या जीवनाला एक नवा अर्थदेखील प्राप्त करून दिला. जेव्हा आसपास अंधार असतो, तेव्हा प्रकाशाची खरी गरज भासू लागते. जगात हिंसक संघर्ष, युद्धे आणि रक्तपाताचा कहर सुरू असताना शांतता आणि सौहार्दाची गरज आहे आणि तेच समाजासमोरील मोठे आव्हान आहे, हे ओळखून सत्यनारायणजींनी आपले औद्योगिक विश्व विसरून या कार्यात स्वत:ला झोकून दिले. भारताच्या भूमीत तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचा शतकांचा वारसा रुजलेला आहे. अनेक धर्म, पंथ या भूमीत सामंजस्याने राहत आहेत, कारण या भूमीला भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारांची नतिक बठक आहे. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ ही सर्वच धर्माची समान शिकवण आहे, आणि शांततेतूनच सुखाची अनुभूती मिळते, त्यामुळे मन:शांती हा व्यक्तिगत आणि सामाजिक सुखाचा एकमेव मार्ग आहे, असे अभूतपूर्व तत्त्वज्ञान मांडत मनामनांना शांतीचा संदेश देणारा साधक म्हणून सत्यनारायणजींना जग ओळखू लागले. मनोविकासाच्या, मन शुद्ध करण्याच्या साधनेचा मार्ग म्हणजे विपश्यना. वर्षांगणिक लाखो लोकांना या धर्मातीत साधनेची शिकवण देत समाजपरिवर्तन चळवळीचा आगळा आदर्श सत्यनारायणजींनी उभा केला. मन शुद्ध झाले की शरीर शुद्ध राहते, आणि त्यामुळे अवघे जीवनच शुद्ध होते, हा त्यांच्या शिकवणीचा सिद्धांत आचरणाऱ्या विपश्यना साधक परिवाराने शुद्ध जीवनशैलीचे आदर्श जगाच्या कानाकोपऱ्यात निर्माण केले आहेत. सत्यनारायणजी स्वत: विपश्यनेचे कठोर साधक होते. ते उत्तम वक्ते होते, कवी होते आणि लेखकही होते. विपश्यना साधनेतून धर्माचरण, सत्याचरणाचे त्यांचे विचार श्रोत्यांना आणि वाचकांना भारावून टाकणारे आहेत. दैनंदिन जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणारी विपश्यना साधना भारतातील तुरुंगामध्ये कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडविणारा एक चमत्कार ठरली. हजारो दूषित मनांच्या शुद्धीकरणाच्या या प्रयोगातून मानसिक ताणतणावाखाली वावरणाऱ्या दुनियेला तणावमुक्तीचा मार्ग सापडला आहे. सत्यनारायणजींचे समाजावरील हे उपकार कालातीत राहतील.

      Delete
  58. अहो तेच तर सांगतोय ,की ब्राह्मणानी त्यांचे ब्राह्मणत्व कधीच फेकून दिले आहे ,

    तुम्हीच बघा ! - तेच आता लोहार चांभार अशाप्रमाणे कामे - फक्त उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर इंजिनियर या नव्या नावाने काम करत आहेत - त्यांनी सगळेच नियम स्वतःच स्वतःच्या प्रगतीसाठी कधीच तोडून ते भारतात उच्च पदावर आणि परदेशातही चांगल्या पदावर काम करतात आणि आपण तेच तेच जुने उगाळत बसतो आहोत !



    प्रश्न आर्थिक आहेत , त्याला उत्तर धर्म बदलणे हे असू शकत नाही - खरच आहे का तसे ?



    आतापर्यंत सर्वांचे जीवन खेडेगावातून जहागीरदार आणि पाटील-देशमुख यांच्या कृपेवर होते - नंतर आता साखर सम्राट आले - बागाइतदार आले -कालवे धरणे आली -उसासारखे झटपट श्रीमंत करणारे पिक आले - त्याला मजूर हवेत त्याना कसे मानसिक बंदी बनवून ठेवायचे ?- तर ब्राह्मण द्वेष ! हा रामबाण उपाय !

    हा काही कायम स्वरूपी उपाय नाही - विचार करा - किती द्वेष कराल ? शेवटी दमून भागून कुठेतरी पोचाल - हातपाय थकलेले असतील - विचार कराल की आयुष्याची नुसती वणवण झाली -

    कुणी पेटवले हे रान ?

    प्रस्थापीतानी - ! इनामदारांनी - जमीनदारांनी - तुमचे शेताचे तुकडे गहाण पडले - कुठे गेले ते ? प्रत्येक लग्न कार्याला गहाण टाकत टाकत आपण न सोडवता आलेल्या जमिनी याच साखर सम्राट लोकांच्या घश्यात गेल्या !- इथे ब्राह्मण उरलाय कुठे तुमचे शोषण करायला - त्याचेतर आधीच उच्चाटन झाले आहे !असो ! अजून शहाणे व्हा !ब्राह्मण तुमचे शत्रू आहेत हा एक तुमचा सोयीस्कर भ्रम करून देण्यात आलेला आहे !



    मी संग्रामसिंह घाटगे असून असे बोलतो आहे याचा कदाचित रागही येत असेल आपल्याला - पण परत एकदा सांगतो - प्रश्न आजचा आहे त्याची उत्तरे इतिहासात शोधणे ह्यात काहीच हुशारी नाही - त्याची उत्तरे वर्तमानात आहेत !



    चैतन्य सरांनी सांगितले तसे - -समजा पुढे १०० वर्ष गणपती नाही बसवले तर कुणीही तुमच्या दाराशी दोष द्यायला येणार नाही - खरेतर हिंदू धर्माचा उत्सवीपणा फक्त टिकून आहे - आणि उदात्त वैचारिक तत्वे वगैरे कधीच मोडीत निघाली आहेत - १००० वर्षापूर्वीच !

    धर्म ही टाकाऊ गोष्ट झाली आहे - विशेषतः औद्योगिक क्रांतीने नवे प्रश्न आणि नवी दैवते निर्माण केली - नव्या श्रद्धा आणि नवे नीतीनियम जन्माला घातले - पण त्यातील ताजेपणा आणि नावीन्य आपल्याला समजलेच नाही - त्याने आपण भारावून गेलोच नाही - या नव्या मनुने माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली - कुठे कुठे ती झगडून मिळाली - पण धर्म - छे - ती एक भूतकाळातील टाकाऊ गोष्ट झाली आहे !- तुम्हाला धर्म बदलायचा असेल तर जरूर बदला - त्याचे सुखदुःख ब्राह्मणाना कसे असणार ?ते स्वतः कधीच धार्मिकतेच्या पलीकडे गेलेले आहेत !- कर्मकांड आणि व्रतवैकल्ये म्हणजे धर्म नव्हे हे त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोचले आहे - आणि तिथेच नवीन विचार रुजणे हे सगळ्यात महत्वाचे असते -


    तिथूनच घर ही संस्था - कुटुंबधर्म सुरु होतो - तिथे जितका आधुनिक विचार रुजेल तितका तो समाज पुढे जाइल - म'फुले यांनी हाच विचार मांडला आजही सर्व समाज या जोखडातून दूर होत नाही हे आश्चर्याच आहे !म.फ़ुले कर्मवीर आणि शाहू महाराज , इकडे दुसऱ्या अंगाने न्या .रानडे ,आगरकर ,असे आपापल्या परिघात माणसे नव विचार मांडत होती - पण आपला समाज बदल पचवू शकला नाही - अत्यंत आळशी आणि कोणताही नवा विचार करायला न धजावणारा असा आपला समाज आहे -खरी आधुनिकता अजून किती तरी मैलोमैल क्षितीजापलीकडे आहे - त्यात द्वेष नसेल हिंसा नसेल - असा समाज - जो आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगती साधेल ! पण -

    इथे आधुनिक शिक्षणसंथा एक धंदा म्हणून चालवतात - हेतूच जर शुद्ध नसेल तर त्या वृक्षाला फळे रसाळ गोमटी कशी येणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. ह्या बामनांना सफाई कामगारांचे (भंगी लोकांचे) काम करायला देणे अगदी योग्य ठरेल!

      Delete
  59. घाटगे सर अगदी मनातले बोललात. माझ्या संपर्कात मध्ये काही कोकणी ख्रिश्चन इंग्लंड मध्ये आले. आत्ताच काही महिन्यांपूर्वी एक बातमी अलि बघा. एक ऑस्ट्रेलियन जोकीने आपण केटच्या, इंग्लंडच्या राणीची नातसून, तब्येतीची चौकशी एक भारतीय नर्स कडे केली. नंतर तो खोटा फोन होता आणि नंतर त्या नर्सने आत्महत्या केली. बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला. त्यात एक गोष्ट समोर आली ती म्हणजे गोरे लोक आपल्या एकदाच्या ख्रिस्तीलोकांना आपले मनात नाही. हाच प्रकार अरेबिक लोक बाकीच्या मुसलमानांनाबाबत करतात. थोडक्यात काय की नुसते धर्मांतर करून काहीच होत नाही. मुळातच कष्ट आणि व्यापक दृष्टीकोण असेल तरच प्रगती होते.

    तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. सगळ्या ठिकाणी बघा सत्ता कोणाच्या हातात आहे? ह्या लोकांनी गेल्या ६५ वर्षात फक्त जातीयवाद वाढवून स्वताची पोळी भाजून घेतली. लोक आहे तिथेच राहिले. मग आता काय उत्तर देणार मग पुन्हा ब्राह्मण द्वेष उकरून काढणे. पुन्हा इतिहासत करणे शोधणे. शिवाय आत्ता निवडणुका आल्या आहेत त्यामुळे हां प्रकार अजून वाढणार आहे. पण ह्यातून उत्तर मिळणार नाहीये हे लोकांना कळत नाही पण नेत्यांना पाहिजेल ते बरोबर होणार आहे.

    ReplyDelete
  60. काय गंमत आहे! धर्म ही इतकीच टाकाऊ गोष्ट झाली असेल तर मग धर्मांतर करणाऱ्यांना ते खुशाल करू द्या की! तुम्हाला जर काहीच फरक पडत नसेल तर धर्म बदलून आर्थिक परिस्थिती सुधरत नाही वगैरे गोष्टी कशाला मांडायला हव्यात?

    लोहार चांभार हे जरी कितीही उच्च शिक्षण घेऊन कितीही मोठ्या पदांवर गेले तरी जोपर्यंत ते धर्म बदलत नाहीत तोपर्यंत ते लोहार चांभारच राहणार. धर्मांतरानेही जाती व्यवस्था एका झटक्यात संपणार नाही हे खरेच आहे. पण धर्माचे नियंत्रण ब्राह्मणांच्या हाती राहणार नाही हे देखील खरे आहे. धर्माच्या नावावर कोणी कोणाला उच्च नीच म्हणून हिणवू शकणार नाही. हा प्रचंड मोठा सामाजिक बदल आहे. आज पूर्वीच्या महारांना कोणी महार म्हणत नाहीत. नवबौद्ध म्हणतात. काळाच्या ओघात त्यांची "महार" ही ओळख मागे पडून बौद्ध हीच ओळख उरेल. बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला नसता तर आज उच्च शिक्षण घेतलेले महार हे महार म्हणूनच ओळखले गेले असते.

    गोरे लोक आम्हाला आपले मानत नाहीत याचे कोणालाच दु:ख नाही. ते तर अपेक्षितच आहे. आपलेच लोक आम्हाला आपले मानायला तयार नाहीत हे खरे दु:ख आहे. प्रचंड संख्येने होणाऱ्या धर्मांतराचे तेच खरे कारण आहे. येशु कोणी गोरा नव्हता तर आशियायी होता. हे तरी माहित असले पाहिजे. माझ्याच भागात लोक प्रचंड संख्येने ख्रिश्चन धर्मात जात आहेत. केवळ पैसा हे याचे कारण नाही. स्वत:च्याच धर्मात होणारी घुसमट हे प्रमुख कारण आहे. केवळ पैशासाठीच धर्मांतर होत असते तर फक्त गरीबांनीच धर्म बदलला असता. वस्तुस्थिती तशी नाही.

    धर्मांतराचे समर्थन करणे हा ब्राह्मणद्वेष कसा काय होतो बुवा? धर्मांतराचा अधिकार तर घटनेने दिलेला आहे. म्हणजे या देशाची घटना तुम्हाला मान्य नाही की काय? मग सरळ सरळ तसे म्हणा तरी. मुळात धर्म ही तुमच्या दृष्टीने अगदीच बिनमहत्वाची गोष्ट असेल तर सरळ धर्मांतराकडे दुर्लक्ष करा की! पाटलांच्या नावावर खापर फोडून धर्मांतराला विरोध करणे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी!

    ReplyDelete
    Replies
    1. बरे झाले विषय वाढवला ते अनानिमस !

      चैतन्य सर आपणही सहभाग घेत आहात -

      जातीपातीचा महिमा बाजूला ठेवल्याबद्दल अनानिमस आणि आपले अभिनंदन !

      आपणच सभ्यपणाची लक्ष्मण रेषा पाळली तर सर्व दर्जा उंचावतो आणि चर्चेला एक निरोगी चौकट लाभते ! -

      आज ते महार म्हणून ओळखले जात नसतील पण बौद्ध म्हणून ओळखले जातात हे तितकेसे खरे नाही - ते " नवबौद्ध " म्हणून ओळखले जातात - नवबौद्ध ही आता एक नवी दलित जात झाली नाही का ? बौद्ध हे जगभर आहेत - भुतान जपान चीन मलेशिया -परंतु त्यांचे रितीरिवाज आणि आपले नव बौद्धांचे रितीरिवाज एक आहेत का ?नव बौद्धांचे आज जागतिक बौद्ध परंपरेत मानाचे स्थान आहे का ? कोसंबी यांच्या सारखी बौद्धिक तयारी असलेले किती निर्माण झाले - त्याहीपेक्षा ते का नाही निर्माण झाले हे शोधले पाहिजे


      श्री चैतन्य सरांनी अत्यंत समर्पक उदाहरण दिले आहे - अरेबिक मुसलमान इंडियन मुसलमानाना हिंदी मुसलमान म्हणतात , तसेच ख्रिश्चनांचे !

      मी धर्म बदलू नका असे अजिबात सांगत नाहीये -तसे सांगण्याचा मला अजिबात हक्क नाहीये !प्रत्येकाला आपापले मत अजून सोपे करून सांगण्याचाच या ब्कोग चा हेतू आहे - अए मला वाटते , नवीन नवीन लोकांनी या सभ्य चर्चातून प्रबोधन करावे इतकाच हेतू -

      नाही पटले तर आपापले मार्ग आहेतच मोकळे - नाही का ?



      अहो ,खरी गोष्ट अशी आहे की कुणालाही करीयर करणाऱ्या माणसाला तथाकथीत धर्मात इंटरेस्ट उरलेला नाही - माणसाला उत्सव गिरी आवडते - अगदी आदिम काळा पासून ,आणि म्हणूनच हे सगळे टिकून आहे - धार्मिक उत्सव हा धमाल करण्याचा एक भाग - त्यात धार्मिकता अजिबात उरलेली नाही - छातीवर हात ठेवून कोण सांगेल की त्याला गणपतीची देवीची किंवा मारुतीची आरती स्पष्ट उच्चारासकट येते ?आपण टाळ्या वाजवतो - तितकेच आपले - त्यात चुकीचे काहीच नाही -


      कशाचातरी निषेध म्हणून धर्म बदलणे हे खरेतर धर्मांतरच नाही - ती एक प्रतिक्रिया आहे - चिंतनशील क्रिया नाही , जसे लोभापोटी अज्ञानापोटी ,मोहाने ,केलेला धर्म बदल हे धर्मांतर नाही तसेच निषेधात्मक प्रतिक्रिया म्हणून केलेले धर्मांतर हे धर्मांतरच नाही - ती स्वतःची फसवणूक असते !

      इतके हाल होऊनही तुकारामाने ज्ञानेश्वराने चोखोबाने ,गोरा कुंभाराने धर्मांतर का नाही केले ?ज्ञानेश्वराना धर्म किंवा जाती बहिष्कृतच केले होते - संन्याशाची पोरे ही जिवंत राहण्याच्या पात्रतेची नाहीत असा धर्मपीठाचा निवाडा होता ,पण या सर्व संतानी इथेच याच धर्मात राहून जगाला नवी जीवनपद्धती ,विचारप्रवृत्ती शिकवली - भक्तिमार्गाची वाट दाखवली ! ती एक सामुहिक वैचारिक चळवळच होती -ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे त्याचे पाया आणि कळस होते हे वर्णन यथार्थ आहे !- पण तसे भाग्य डॉ आंबेडकर यांच्या वाट्याला आले नाही !त्यांनी पाया रचला पण त्यावर कळस किंवा काहीच झाले नाही - आधीच पडझड सुरु झाली - कोत्या मनाच्या नेत्यांना हि चळवळ झेपली नाही - वैचारिक घुसळण तर दूरची गोष्ट !

      डॉ आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक क्रांती खरीच झाली का ?

      वयाच्या ६५ व्या वर्षी १९५६ साली त्यांनी देह ठेवताना त्याना काय चित्र दिसत होते आणि आज काय चित्र आहे ?आज नामदेव ढसाळ आजारी आहेत , कुणीसुद्धा तिकडे फिरकत नाही - नुसती भडक भाषणे आणि कविता यामुळे माणूस लोकप्रिय होतो पण तो विचारवंत असेंलच असे नाही - असेच अनेक जण नुसते थोतांड ठरले - बुजगावणे ठरले !( अनेक दलित लेखक दारूपायी वाया गेले हि शोकांतिका आहे )या सरकारी पारितोषकानी आणि शिष्य वृत्त्यानी अशा चळवळीची शिकार केली !त्याचा आत्माच मारला गेला !डॉ . आंबेडकर याना अपेक्षित अशी समाज ढवळून काढणारी वैचारिक क्रांती झालीच नाही - दलित पक्ष सत्तेचे राजकारण करायला गेले आणि फसले !सत्तेतील पक्षांचे ते मिंधे झाले -


      आज अशाच फसलेल्या लोकाना ब्राह्मण द्वेषाचा नवा मंत्र दिला जात आहे तो कशासाठी - सामाजिक नवनिर्माण होईल म्हणून का फक्त एक झिंग आणणारा विचार म्हणून ?

      मुळात ब्राह्मणद्वेष हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नव्हे - ते एक

      मूळ प्रश्नावरून लोकांची नजर दुसरीकडे खेचण्यासाठी वापरलेले हत्यार आहे -

      Delete
    2. च्यायला! परत परत गाडी ब्राह्मण द्वेषावरच का येते? लोक प्रचंड संख्येने धर्मांतर करत आहेत ते काही ब्राह्मण द्वेष म्हणून नव्हे! आंबेडकरांवर देखील हाच ब्राह्मणद्वेषाचा आरोप लावायचा काय? ह्या देशात धर्मांतरे हजारो वर्षांपासून होत आहेत. त्या वेळी ब्राह्मणद्वेष नावाचा प्रकारच अस्तित्वात नव्हता. मग त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडणार?

      खरे धर्मांतर कुठले आणि खोटे धर्मांतर कुठले ह्याचा निर्णय इतर कसे करणार? एकदा धर्म ही टाकाऊ गोष्ट आहे हे मान्य केल्यावर धर्मांतराचा एवढा बाऊ कशाला? होऊन जाऊ द्या की! धर्मांतराला विरोध नसेल तर उगाचच संतांची उदाहरणे कशाला पाहिजेत? चोखामेळा ह्यांनी धर्मांतर केले नाही म्हणून आंबेडकर यांनीही करू नये?
      आम्ही काय करावे हे इतरांनी सांगू नये पण इतरांनी काय करावे हे मात्र आम्हीच सांगणार! ह्या वृत्तीमुळेच सगळा घोळ झाला आहे.

      आज जरी महारांना नवबौद्ध म्हटले जात असले तरी काळाच्या ओघात ते बौद्ध म्हणूनच ओळखले जातील. आणि इतर देशांची उदाहरणे देण्याआधी स्वत:च्या देशात काय चालले आहे ते बघितले तर बरे होईल.
      अरब मुसलमानांनी हजारो वर्षांत कधीही हिंदी मुसलमानांना मक्केला जाण्यापासून किंवा कुराण वाचण्यापासून किंवा अरेबिक शिकण्यापासून रोखल्याचे उदाहरण आहे काय? आज माझे ब्राह्मण मित्र नोकरी करून कंटाळा येतो म्हणून पौरोहित्य करण्याची भाषा करतात. मला मात्र आज देखील तो अधिकार नाही. ते माझ्या घरी येउन मांसाहार करू शकतात पण मी त्यांच्या घरात मांसाहार करायला गेलो की "ब्राह्मणाचे घर आहे!" हे ऐकवले जाते. त्यांची मुंज झाल्यापासून तर साधे पाणी पिण्यासाठी देखील घरी बोलावत नाहीत! ह्याला काय समानता म्हणायचे काय?

      आपणच काय ते बुद्धिमान आणि बाकी सारे मूर्ख, आम्हालाच धर्म कळतो आणि इतरांना काहीच कळत नाही अशा थाटात प्रवचन देणे हे कधी थांबणार? बाबासाहेबांनी आयुष्यभर हाच आक्रोश केला. तो अर्थातच बहिऱ्या कानांवर पडला. त्याचा थेट परिणाम धर्मांतर होण्यात झाला. मी देखील इथे त्याच वेदना पोटतिडीकीने मांडल्या. पण आजही ते कान बहिरेच आहेत. याचा परिणाम कशात होईल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी.

      Delete
    3. 1) I am so sorry about your experience

      but I would like to share my thoughts with you

      I am a Brahmin and I eat meat as well as beaf

      and I love to eat pork

      there is nothing wrong in it

      In Yadnya period Brahmins were eating the same things

      So nothing wrong today also !

      2) Noone is nomore interested in what religion one follows

      3) It is strange that you came across bad Brahmins , because a new generation of Brahmins is very

      sharp and particular about veg - non veg type of thinking-They love Mexican Italian Chinese

      4) I request you sir to go around the world - you will find , life is totally different out there !no religions no reservations no interest in such outdated

      things - Life is full of energy and creativity and hardwork -

      5) athere are racist people , fundamentalists and all sort of nuisance out there -

      But people just forget it and go ahead with the loved ones and forget the hatred !

      Love and ahinsa is the Mantra of the era

      So just leave behind the castism!Love thy neighbour !!

      Delete
    4. It is strange that you came across bad Brahmins...

      ते ब्राह्मण दुष्ट आहेत, वाईट आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही. त्यांचा धर्म त्यांना तसे वागायला सांगतो म्हणूनच ते तसे वागत आहेत. उद्या त्यांनी जर हे सर्व नाकारले तर त्याचा अर्थ धर्माचे उल्लंघन केले असा होईल. प्रॉब्लेम ब्राह्मणांमध्ये नसून धर्मात आहे.

      एखादे तत्वज्ञान जेव्हा धर्माचा मुलामा लावून डोक्यात भिनवले जाते तेव्हा त्याचा परिणाम अत्यंत तीव्र असतो. ज्या विवेकानंदांनी आहाराचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही असे ठणकावून सांगितले त्या विवेकानंदांना देखील ह्या देशात शूद्र ठरवले गेले. भगिनी निवेदिता यांनी हे लिहून ठेवले आहे.

      जे अधिकार इतर धर्मांतील जनतेला हजारो वर्षे विनासायास मिळत आहेत तेच मूलभूत धार्मिक अधिकार मिळवण्यासाठी ह्या धर्मातील बहुसंख्य जनतेला शेकडो वर्षे लढा द्यावा लागतो हे वास्तव आहे.
      "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | इतरांनी वहावा भार माथा |", हे लिहिणारा तुकाराम इतर धर्मांत का निर्माण झाला नाही याचा शोध घेतला तरी पुरेसे आहे.

      Delete
    5. घाटगे सर तुम्ही अतिशय योग्य मुद्दा मांडला आहे. मलाही असेच म्हणायचे होते. पण ते नीट मांडता आले नाही. मुळातच धर्मांतरे झाली ती कोणाचा तरी रोष किंवा कोणावरी राग धरून झाली म्हणून पुन्हा काही वर्षांनी परत वेगळे धर्मांतर असेच होत आहे. सध्याच्या कळत तर खरोखर धर्माला किती अर्थ राहिला आहे. मुळातच हिंदू धर्माला एक अशी काहीच अट नाहीये. सगळा मला स्वतःचा आहे पण मुळातच माणूस हा कळपाने राहतो. मुदलात सगळ्या धर्मात प्रचंड प्रमाणात विरोधाभास आहे. बुद्ध माणूसच होता. त्याची शिकवण सोडून त्याला देव बनवले आता पुन्हा त्याच्याच नियमाप्रमाणे चालणे आले. हाच प्रकार सगळीकडे आहे. पण त्याने मूळ प्रश्नच सुटत नाहीये. गेल्या ६५ वर्षात माझ्या ओळखीच्या अनेक ब्राह्मण लोकांची शेती गेली. सुरवातीला अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीत जागून माधुकरी मागून जगली आणि पुढे शिक्षनामुळे वर गेली. आता हाच प्रकार बाकीचे का करत नाहीत? मला हेच कळत नाहीये. २-३ पिढ्या खर्ची गेल्या नंतरच आत्ताची सुबत्ता दिसते आहे. बाकी आता पूर्वीसारखी परिस्थिती पण राहिली नाहीये की फक्त ब्राह्मण लोकांकडेच ज्ञान देण्याची अनुमती आहे. परंतू चांगल्या संस्था काढून सगळ्यांना चांगले शिक्षण देणे, लोकसंख्या प्रमाणात ठेवणे, दिलेले काम आणि धंदा केला तर प्रामाणिकपणे करणे ह्यावर का नाही कोणी भर देत? नुसते धर्मांतर करून आणि राखीव जागा वाढवून हे कसे काय मिटेल? प्रश्न आहेत तिथेच राहणार आहेत.
      जे लोक राखीव जागांमधून पुढे आले ते त्यांच्याच लोकांशी चक्क ब्राह्मण लोक जसे हिडीस फिडीस करतात तसेच करताना दिसल्यावर कसे काय व्हायचे? वर घाटगे सरांनी म्हटल्या प्रमाणे उत्सव हां अत्यंत मुर्खा प्रकार होवून बसला आहे. माझे तर असे स्पष्ट मत आहे की ह्याचा काहीही उपयोग नाही. उत्सव हे विरंगुळा म्हणूनच आहेत. पण सध्याचे स्वरूप भयंकर आहे. पुन्हा एकाही राजकारण्याला असे ठामपणे म्हणावेसे वाटत नाही की हे सगळे बंद करा. मग ते गणपती असो वा आंबेडकर जयंती वा ३१ डिसेंबर. आपण काय करतो आहोत ह्याचे कोणालाही भान नाही. फक्त एक दिवसाचा स्वाभिमान किंवा आपण कोणीतरी आहोत असे लोकांना सांगणे. पण त्यातुने काय फायदा होतो ते काहीच कळत नाही. ही सगळी सो कौलड उर्जा बाकीच्या वेळी कुठे जाते? मुळात पायाभूत सुविधा नीट करायच्या नाहीत की जेणे करून लोकांना स्वतःच उद्योग व्यापार करायची सवय लागेल किंवा त्यांना तसे प्रोत्चाहन द्यायचे नाही. मग लोकांचा असंतोष विझवायला काय करायचे तर जाती पतीचे आणि विद्वेषाचे राजकारण करायचे. उद्या सगळे बौद्ध झाले तरी मूळच्या प्रश्नांना कशी काय उत्तरे मिळतील? हां तुम्हाला खरोखर बुद्ध धर्म आवडला तर जरूर करा. माझ्या मुलाला मी इंग्लंडमध्ये असताना चर्च मध्ये पियानो शिकवायला पाठवायचो. माझ्या हिंदू असण्यात आणि त्याच्या पियानो शिकण्यात आणि माझ्या त्या पियानो संगीत आईकाण्यात कसलाही प्रश्न आला नाही. असो.

      Delete
    6. Anonymous,

      Please study UK history in detail. England king revolted against roman Catholics, their highest priest. There are many differences which we do not know. I had a Greek colleague who did not like a Kerali priest in Church. Nor did she go to black churches. There are many different churches within whites. What all this tell us? That every single religion is man's creation. Every single religion has some or different cast system. Even among whites they do not like poor people. But yes the real difference is anyone on his/her ability can become rich. This is primary difference however it wasn't there till some centuries ago. We have very little knowledge of European history. What we read is just what we are told or in most cases we try to find suitable history that suites our narrative. Why did french revolution happened? It was a nexus between king and priest. How is this different between Brahman and Maratha kings (read kashtriya)? Even OBC were not outcast like SC/ST. They had a living for themselves. Now since SC/ST have got real opportunity and brahmin because they focused on education got some opportunities. Whereas vast majority of OBC's and Maratha's did not ponder on new changes. This is real crux of the problem. To further add all Maratha leaders have become a new Jahagirdars. They have their own constituency and a complete business of education and sahari sanstha. Now where are others in picture? Can you research on this? So simple way out is to blame brahmnis. Ghatage sir is exactly pointing to this reality but none is ready to acknowledge this. If they do their long held views become NULL and VOID. this is really hard for anyone to accept. This is election time all such things will happen but none is ready to demand real solutions for their problems.

      Delete
    7. चैतन्य सर, बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेव्हा त्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही होते. तरीही त्यांना धर्मांतर करण्याची गरज का भासली? आता देखील प्रचंड संख्येने धर्मांतरे चालू आहेत. त्यात केवळ गरीब लोक नाहीत. ही धर्मांतरे देशभरात चालू आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर तर कुठेही मराठा जहागीरदार नाहीत. मग त्या धर्मांतराचे कारण काय असावे हे शोधून तरी बघा.

      आगाखान प्यालेसचे सर आगाखान यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी व्यक्तिश: चाळीस हजार सवर्ण हिंदूंना इस्लामची दीक्षा दिली. "त्या हिंदूंच्या आयुष्यात कसलीच निष्ठा नव्हती. इस्लामने ती निष्ठा त्यांना मिळवून दिली.", हे त्यांचे उद्गार आहेत. आज देखील केवळ आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले लोकच धर्मांतर करत नाहीत तर सुसंपन्न परिस्थितीतील लोक देखील तोच मार्ग अवलंबत आहेत.
      सर्व सामान्य जनतेला धर्माच्या रूपाने मानसिक भावनिक आधार हवा असतो. तो आधार देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याचा एकदा तरी विचार करा?

      धर्मांतराचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडले म्हणून धर्मांतरे थांबणार नाहीत. ती वाढतच जाणार आहेत. जो धर्म माणसांना माणसासारखे वागवायला नकार देतो त्या धर्मावर ही पाळी येणारच. धर्मापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे आहेत हे किती वेळा सांगणार? त्यांच्यासाठी कोणते प्रश्न महत्वाचे आहेत हे त्यांना ठरवू द्या ना. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल तेच इतरांनी मान्य करावे हा हेका कशाला धरायचा? मुळात धर्मांतरासाठी तुमची किंवा इतर कोणाचीही परवानगी घेणे हे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या मुलाला चर्चमध्ये पाठवतांना कोणाची परवानगी घेतली होती काय? तुमच्या आयुष्यातील निर्णय तुम्ही स्वत: घेता तसे इतरांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वत: घेऊ द्या.

      Delete
  61. प्रश्न धर्मांतर रोखण्याचा नसून उगाचच एकाच विशिष्ट समाजाचा पराकोटीचा तिरस्कार आणि सगळे दोष एकाच्या पारड्यात टाकण्याचा आहे. बाकी तुम्हाला धर्मांतर करून सुख मिळणार असेल तर जरूर करा की पण उगाचच त्याचा दोष एकाच समाजाला देऊ नका.

    ReplyDelete
  62. ह्या "सनातन" धर्माचे नियंत्रण हजारो वर्षांपासून एकाच समाजाच्या हातात आहे. हा काय धर्मांतर करणाऱ्यांचा दोष म्हणायचा काय? धर्मांतर करणाऱ्यांनी ते कोणत्या कारणाने करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या मुद्दयावर चर्चा होऊच शकत नाही. म्हणून उगाच फाटे फोडून आरक्षण, सत्ताधारी समाज., असे करत करत हळूहळू बोट परत हिंदुत्वाच्या धक्क्याला लागतेच! बोट तरी काय करणार बिचारी? तिच्या खलाश्यांना दुसरी वाटच माहित नाही!

    ReplyDelete
  63. खालची लिंक जरूर वाचा

    http://www.economist.com/blogs/economist-explains/2013/09/economist-explains-17?fsrc=nlw%7Cnewe%7C9-30-2013%7C6709762%7C36964939%7C

    ReplyDelete
  64. मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे!

    ब्राह्मणी धर्मातील जातीय विखारामुळे व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात धर्मांतर केले. हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझ्या मते हिंदूनावाचा धर्मच अस्तित्वात नाही. हिंदू ही एक राजकीय व्याख्या आहे. दिल्ली मस्लिम राज्यकत्र्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्व एतद्देशीयांसाठी हिंदू ही संज्ञा वापरली गेली. वस्तुत: सर्व एतद्दीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतीरिवाज यात खूप फरक होते, आजही आहेत. या विषयी एक लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. तो याच ब्लॉगवर उपलब्ध आहे. मी हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म (या पुढे या लेखात हिंदू धर्माचा उल्लेख ब्राह्मणी धर्म असाच येईल.) म्हणते. आणि तेच अधिक योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म सोडला.

    डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर : २० व्या शतकातील सर्वांत मोठी घटना
    असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही २० व्या शतकातली या देशातील सर्वांत मोठी घटना होती. त्याचे सामाजिक आणि धार्मिक परीमाण तर झालेच, परंतु राजकीय परीणामही झाले. उत्तर प्रदेशातील आज अस्तित्वात असलेले मायावती यांचे सरकार हे बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या क्रांतीचे फलित होय. बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भूमीत क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याची परीपक्व राजकीय फळे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मायावती यांच्या नेतृत्वाचा वाटा या फळात नक्कीच आहे. तथापि, बाबासाहेबांच्या धर्मांतराचे सर्वंकश परीणाम अजून फलित व्हावयाचे आहेत. बाबासाहेबांचे धर्मांतर होऊन ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याचे सर्वंकश परीणाम का दिसून येत नाहीत, याची कारणे अनेक आहेत. ब्राह्मणी धर्म हा एक घुय्या (रंग बदलणारा सरडा इंग्रजीत घुय्याला शॅमिलिऑन म्हणतात.) आहे. तो वातावरणाचा परीवेश पाहून रंग बदलतो. हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे. वैदिक धर्माच्या चिकित्सेत मी ब्राह्मणी धर्माच्या रंगबदलूपणाचा हिशेब मांडला आहे. तो वाचकांनी जरूर पाहावा. ब्राह्मणी धर्म आपल्या छद्मावरणासह टिकवून ठेवण्यात सर्वांत मोठा वाटा ब्राह्मणी धर्माच्या छायेखाली वावरणा जातीसमूहांचा आहे. वस्तूत: हे जातीसमूह ब्राह्मणी जातीसमूहापासून अगदी भिन्न आहेत. त्यांच्या चालीरीती, देवदेवस्की, रोटी-बेटी व्यवहार सगळे काही भिन्न आहे. उदा. जाट, खत्री हे जातीसमूह स्वत:ला हिंदू मानण्यास फार पूर्वीपासून कां कू करीत आले आहेत. महान धर्मसंस्थापक गुरुनानकांच्या नेतृत्वाखाली जाट-खत्री समाज एकवटला. उत्तरेतील इतर काही जातीसमूहांची साथ घेऊन गुरुनानकांनी नवीन धर्माचा प्रकाश जगाला दिला.

    ReplyDelete
  65. मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे!

    वारकरी चळवळ
    गुरुनानकांनी उत्तरेत धर्मचळवळ सुरू केली, त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल नामक लोकदैवताला मानणारया लोकांची मोठी लोकचळवळ सुरू होती. त्या काळातील सर्व बिगर ब्राह्मणी धार्मिक चळवळींपेक्षा ही चळवळ जास्त शिस्तबद्ध आणि संघटित होती. परंतु या चळवळीतून शीखांसारखा नवा धर्म अस्तित्वात येऊ शकला नाही. याची कारणेही अनेक आहेत. या लोकचळवळीला आद्य शंकराचार्यासारख्या धूर्त ब्राह्मणाने वेदांशी जोडले. पांडुरंगाष्टकम लिहून चळवळीचे सांस्कृतिकरण केले. त्यातून या चळवळीचे लोकपण संपले. त्याबरोबरच नवा धर्म अस्तित्वात येण्याची शक्यताही संपली.

    महानुभाव चळवळ
    महात्मा चक्रधर स्वामी प्रणित महानुभव धर्माने वेदांचे प्रामाण्य उघडपणे नाकारले. आपली स्वतंत्र अवतार व्यवस्था निर्माण केली. पूजापद्धती, संस्कार पद्धती, दीक्षापद्धती आदी सर्व ब्राह्मणी धर्मापासून वेगळे केले. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना संन्यास घेण्याची मुभा नव्हती. चक्रधरांनी ती दिली. श्रीचक्रधरांचा प्रभाव एवढा होता की, देवगिरीच्या यादवराजाची महाराणीही श्रीचक्रधरांची शिष्या बनली. श्रीचक्रधरांचे नवे धर्ममत अशाप्रकारे महाराष्ट्राच्या जवाड्यात, राणीवशात पोहोचले. तरीही नवा धर्म अस्तित्वात आलाच नाही. ब्राह्मणी धर्माचा एक पंथ अशी महानुभवांची ओळख निर्माण झाली.

    बिगर ब्राह्मणी चळवलींच्या खांद्यावर ब्राह्मणी धर्माचा झेंडा
    वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी समतेच्या पायाभवर उभ्या आहेत. श्रीचक्रधरांनी तर गावकुसाबाहेरील वस्तीत भिक्षा मागण्याचे आदेश आपल्या भिक्षूंना दिले, तर नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखा मेळा यांना छातीशी कवटाळले. या दोन्ही चवळवळी उत्तरेत पंजाबपर्यंत पोहोचल्या. नामदेवांच्या वचनांना शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात आदराने जागा मिळाली. महानुभाव पंथाचे मठ आजही पंजाबात आहेत. एवढा प्रभाव असतानाही या चळवळी +ब्राह्मणी जोखड झुगारण्याच्या+ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्या. वारकरी चळवळीचे तर मातेरे झाले. ज्यांना वेद वाचण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा जाती वारकरी चळवळीच्या रूपाने आपल्या खांद्यावर वेदप्रणित ब्राह्मणी धर्माचा भार वाहताना पुढे दिसू लागल्या.

    ReplyDelete
  66. मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे!

    चळवळी अपयशी का ठरल्या?
    या दोन्ही चळवळी संपूर्ण क्रांती आणण्यात अपयशी का ठरल्या, याची काही ठळक कारणे आहेत. या चळवळीच्या आधी किमान ३०० ते ४०० वर्षे महाराष्ट्रात मजबूत राज्यव्यवस्था होत्या. यादवकाळात या दोन्ही चळवळी ऐनबहरात आल्या. काही तरी नवे घडेल, असे वाटत असतानाच परचक्राचा फेरा आला. अल्लाऊद्दीन खिलजीच्या रूपाने नवे संकट महाराष्ट्रावर आले. त्यामुळे या चळवळींच्या विकासाला पायबंद बसला. नवा विचार मांडण्याचे दिवस संपले. आपले जे काही अर्धे-कच्चे आहे, ते टिकविण्यातच महाराष्ट्राची सर्व शक्ती खर्ची पडली. शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत ब्राह्मणी धर्म सावरला होता. वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी ब्राह्मणी धर्माने नेस्तनाबूत केल्या होत्या. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध फळी निर्माण करून जन्माला आलेल्या या चळवळींच्या खांद्यावरच ब्राह्मणी धर्माची पताका आली होती. महाराजांना दीर्घायुष्य लाभते तर कदाचित खरया महाराष्ट्र धर्माचा उदय होऊही शकला असता. कारण आपला राज्याभिषेक महाराजांनी ब्राह्मणी वैदिक पद्धतीने करवून घेतल्यानंतर निश्चलपुरी या गोसावी समाजातील एका संन्याशाच्या हातून पुन्हा एकदा करवून घेतला होता. यावरून महाराजांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येतो. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना घातपात झाला, असे मत नवीन संशोधक मांडित आहेत. महाराजांकडून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला धक्का बसू शकतो, असा संशय तत्कालीन ब्राह्मणांना आला होता का? त्यातून त्यांनी महाराजांना घातपात केला का? यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे.

    ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्याची संधी पुन्हा आली आहे!
    असो. अशा प्रकारे वारकरी आणि महानुभाव या दोन धर्मचळवळींच्या रूपाने नवधर्मस्थापनेची संधी महाराष्ट्राने अकारव्या-बाराव्या शतकात गमावली. या पैकी कोणतीही एक चळवळ यशस्वी झाली असती, तरी महाराष्ट्र धर्माच्या खांद्यावरील ब्राह्मणी जोखड उतरले गेले असते. पण तसे व्हायचे नव्हते. जे तेव्हा होऊ शकले नाही, ते आता एक हजार वर्षांनी २१ व्या शतकात तरी होईल का? महाराष्ट्रावरील ब्राह्मणी धर्माचे जोखड उतरेल का?... मला असे वाटते की, अकराव्या-बाराव्या शतकात हुकलेली संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय स्थिरता आहे. महाराष्ट्राच्या मातीत परीवर्तनाचे वारेही वाहत आहे. आता योग्य वेळ आली आहे. विषमतेचा विखार प्रसवणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था पूर्णत: उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.

    ReplyDelete
  67. मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे!

    धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही
    विषमतेचा विखार निर्माण करणारी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे. धर्मांतर. होय धर्मांतरच. या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. माझे असे मत आहे की, महाराष्ट्राने या अधिकाराचा वापर करून धर्मांतर करायला हवे. विशेषत: संपूर्ण मराठा समाजाने धर्मांतर करायला हवे. मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे. मराठा समाजाने घाऊक पातळीवर धर्मांतर केल्यास महाराष्ट्रात मोठे धर्मचक्रप्रवर्तन होईल. इतर जातींनाही प्रेरणा मिळेल आणि एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिलेले समानतेचे स्वप्न साकार होईल.


    - साभार, अ. पा. वि. मं.

    ReplyDelete
  68. महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ

    आज गांधी जयंती. निदान आजच्या या शुभदिनी तरी भारतासह सार्‍या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींचे विचार समजवून घेण्याचा प्रयत्न करू या.
    सर्व धर्म समभाव, हिंदुत्व व समाजवाद या तीनही विचारधारांचा योग्य समन्वय करून त्यांनी भारताला सुयोग्य अशा राष्ट्रीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला तसेच जगातील इतर देशांसाठीही अशा प्रकारच्या शांततामय सहजीवनाचे उद्दीष्ट असणार्‍या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास उद्युक्त केले. त्यांची मानवता, निसर्ग, आपला स्वतःचा धर्म यावरील श्रद्धा, जीवनातील साधेपणा व अहिंसेवरील गाढा विश्वास यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व स्थलकालातीत आदर्श बनले आहे.

    सारे जग आज हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले आहे, मोठ्या साम्राज्यवादी संस्थांच्या शोषण व पिळवणूक यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे आणि मानवी लालसेपायी पृथ्वीवरील निसर्गास धोका निर्माण झाला आहे. यापरिस्थितीत महात्मा गांधींच्या विचारांची सार्‍या जगाला आज खरी गरज आहे.

    अहिंसक सामाजिक चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांच्या जीवनाची महान उपलब्धी होती. या यशामुळे अहिंसक मार्गाच्या क्षमतेला नवी ताकद मिळाली व कोणत्याही सामाजिक, आर्थिक, राजकीय वा पर्यावरणीय व्यवस्थेतील बदलासाठी ते एक प्रभावी, सर्वमान्य व विधायक साधन बनले.

    विविध धर्म, भाषा याबरोबरच सामाजिक व आर्थिक विषमतेने ग्रासलेल्या व लहान मोठ्या समूहांत वा संस्थानांत विभागलेल्या भारतावर राज्य करताना प्रशासकीय सोयीसाठी स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटीश शासकांनी व्यवस्थापन व कायद्याची चौकट तयार केली होती. आपल्या पूर्वजांनी शांततामय सहजीवनाचे तत्व आपल्या भारतीय संस्कृतीस दिले होते. अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात निर्माण केली. सरदार पटेलांनी सारा भारत देश एकत्र जोडून भारतीय संघराज्य बनविण्याचे महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभाव, लोकशाही व समाजवाद या तीन मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटना तयार केली.

    दुर्दैवाने गेल्या साठ वर्षांत भारतातील जनता या आपल्या स्वीकृत मार्गापासून दूर गेली आहे. आज पण आपण काय पाहतो? धर्म, लोकशाही व समाजवाद या तीनही संकल्पनांचा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी वा राजकीय लाभासाठी उपयोग केला जात आहे असे दिसते.

    लोकशाहीचे यश हे स्वयंशिस्तीवर अवलंबून असते हे आपण विसरलो आहोत. सर्व राजकीय पक्ष लोकशाहीबद्दल आपली आस्था व्यक्त करतात मात्र प्रत्यक्षात लोकशाहीच्या खालील मूलभूत आवश्यक बाबींचा विचार करीत नाहीत.

    ReplyDelete
  69. महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ

    १. जबाबदारी - व्यक्तीस्वातंत्र्याची हमी नागरिकांना घटनेने दिली असली तरी कोणाही व्यक्ती,धर्म वा सामाजिक गटाविरुद्ध मानहानीकारक वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. प्रत्येकाने दुसर्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे. जरी दुसर्‍याची मते मान्य नसतील वा सामाजिक तणाव निर्माण करणारी असतील तरी फक्त अहिंसक व विधायक मार्गानेच त्यास विरोध करण्याचा अधिकार आपल्याला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

    २. कायदा - कोणाही व्यक्तीला वा संस्थेला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कृती करावयास हवी. म्हणजे कोणाच्याही दैनंदिन कामातील अडथळा, तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

    ३. प्रामाणिकपणा - तुम्ही तुमच्या तत्वांशी व अंगीकृत कार्याशी प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणा हा शब्द आता एतिहासिक बनला आहे. जुने, सेवानिवृत्त वृद्ध प्रामाणिकपणाच्या व निष्ठेच्या गोष्टी सांगतात. आता लोक एका रात्रीत आपला पक्ष बदलतात आणि आयुष्यभर ज्या पक्षाची तत्वे स्वीकारली त्यांच्या पूर्ण्पणे विरोधी मते असणार्‍या पक्षाशी आपली निष्ठा जाहीर करतात. दुर्दैवाने त्यांचे पाठीराखे आपल्या नेत्याच्या निर्णयाबरोबर एका मिनिटात आपली निष्ठा बदलतात.
    ४. पूर्वगृहापासून फारकत - कोणतीही घटना ही कोणताही पूर्वगृह न ठेवता त्रयस्थ दृष्टिने व केवल राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून तपासणे आवशयक आहे. मात्र असे दिसते की कोणी वा कोणत्या पक्षाच्या संदर्भात ही घटना आहे याचाच फक्त विचार केला जातो व त्यावरून मत बनविले जाते. यामुळे कोणतीही घटना विपर्यस्त स्वरुपात लोकांपुढे मांडली जाते व समाजात परस्परविरोधी गट तयार होतात.

    शोषित व्यक्ती संप, रास्ता रोको, जाळपोळ, तोडफोड याद्वारे आपला संताप व्यक्त करतात. राजकीय नेते व समाजसेवक याबाबतीत शासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत न करता अशा विध्वंसक कृत्यांना फूस देतात, त्याचे समर्थन करतात वा दुसर्‍या पक्षाला दोषी धरतात. शोषित वा अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी गांधींच्या अहिंसक मार्गांचा वापर केला जात नाही.

    काहीवेळा गांधींच्या अहिंसक मार्गांचा ( सविनय कायदेभंग वा प्राणांतिक उपोषण ) मार्गांचा उपयोग व्यक्तिगत वा गटाच्या स्वार्थासाठी सरकारवर दडपण आणण्यासाठी केला जातो. तेही चूक आहे. आपल्या हट्टाग्रहासाठी अशा साधनांचा वापर केला तर लोकशाहीची आपन प्रतारणा करीत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.

    मला असे वाटते की सर्वत्र पसरलेला व प्रतिष्ठा पावलेला भ्रष्टाचार हा लोकशाही व समाजवादातील मोठा अडसर आहे. पुषकळदा मला हे नवल वाटते की एवढा भ्रष्टाचार असूनही भारतात लोकशाही अजून कशी टिकून आहे. महात्मा गांधींनी अनुसरलेल्या तत्वांचा प्रभाव सर्वसामान्य लोकांवर अढळ आहे व त्याचाच हा परिणाम आहे. मात्र त्यांच्या सहनशीलतेला योग्य प्रतिसाद न मिळाला तर आत्महत्येसारख्या दुदैवी घटना वा चोर्‍या, गुन्हेगारी व हिंसक उद्रेक होऊन लोकशाहीचाच अंत होण्याची व ती जागा लष्करी, साम्राज्यवादी वा दमनकारी समाजवादी यांनी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    भारतीय समाजवाद व लोकशाही यांच्या रक्षणासाठी आज महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपण्याचा व ते विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निश्चय करूया.

    ReplyDelete
  70. अनानिमास,

    चैतन्य सर

    आणि

    आणि अ पा वि मं

    आपले कौतुक करून करून लोक दामले

    आपण बरेच दिवस जाहीर करत आहात की मराठा लोकांनी धर्मांतर करावे

    हे आमच्या सारख्या ९६ कुळी लोकांनी ऐकून अनेक वर्षे झाली -

    आपले म्हणणे जर तसे असेल तर आपण मराठा लोकांनी कोणता धर्म स्वीकारावा ते सांगितले तर अजूनच योग्य होईल नाहीका ?

    हे सगळ लिहिता आहात , पण काका पुतण्या तुमच्या बरोबर आहेत का ?- त्याना ऐनवेळी पलटी मारायची सवय आहे जन्मतःच !बघा बुवा !


    कारण ब्राह्मण समाजाने जर इतके त्रस्त करून ठेवले असेल तर एकतर त्यांना संपवणे - म्हणजेच त्यांच्या विचाराना पराभूत करणे हेच जास्त योग्य होईल -आपल्या संजय सराना विचारा ! अगदी सोप्पे करून देतील गणित ! दर्दी आहेत आणि आता अध्यक्ष पण होणार आहेत म्हणे ! अबब ! ! पद आले की खुर्ची आलीच !


    एकदा विचाराना पराभूत केले की संपले !ब्राह्मणानापण त्याचा - त्या नव विचारांचा फायदा मिळाला तर काय हरकत आहे ? पण तो विचार म्हणजे नेमके काय ?


    आपण शिवधर्म असा उल्लेख करता त्याचा पण या ब्लोगवर खुलासा झाल्यास बरे होईल -

    शिवधर्म याबाबत - कोण याचा संस्थापक ? त्यांचे विचार काय ?तेपण सांगावे !

    आज अनेक वर्षे ब्राह्मण सत्तेपासून दूर आहेत आणि आपलेच राज्य आहे त्यामुळे तो मुद्दा नाही की ब्राह्मणांची सत्ता आहे वगैरे - आपलेच राज्य असून आपण हि इतकी छोटीशी गोष्ट - का करू शकत नाही ?बरे त्या इतक्या छोट्याशा विषयाला किती महत्व द्यायचे ?इतर इतके छान विषय आहेत

    आजारी साखर कारखाने आहेत ,पाट बंधारे योजना आहेत ,रोजगार हमी योजना आहे ,नवीन उड्डाण पूल आहेत रिंग रेल्वे आहे -धरणे आहेत कालवे आहेत - किती काम पडले आहे त्या साऱ्याला कोण आड येते आहे ?- ब्राह्मण तर सत्तेत किती तरी वर्षे नाहीत !आता आपणच असा विचार करुया - आता सामान्य प्रजा असे धर्मांतर आणि ब्राह्मणी वर्चस्व यावर विश्वास ठेवणार नाही !


    महागाई प्रचंड झाली आहे - - त्याला जबाबदार कोण / - ब्राह्मण ?नव्या पिढीला सगळे माहीत होत आहे - जातीचे राजकारण किती चालणार ?ब्राह्मणद्वेष किती पुरणार ?तो पण एक प्रकारचा ब्राह्मणांचा विजयाच मान्य केल्यासारखे आहे - त्यांच्या द्वेषा भोवतीच सत्तेचे फासे पडत असतील आणि कुर्चीचे राजकारण होत असेल तर तो त्यांचा नक्कीच विजय आहे !- आपल्याला शरमेची बाब आहे ती - लक्षात येतंय ना थोडे थोडे - ?


    लालूचे काय झाले ? हा एक नवीन विचार केला पाहिजे !

    आपणच हि नवी राजेशाही इतके दिवस राबवली असे नाही का वाटणार या प्रजेला ?सत्ता आपलीच आहे ते ब्राह्मण चिमुटभर आहेत - लोकाना काय समजत नाही का ?

    मावळे चिमुटभर होते आणि त्यांनी बादशहाला जेरीस आणले होते - इथे तेच चाललाय असे लोक म्हणतील !आहे उत्तर आपल्याकडे ?ब्राह्मणद्वेष म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्या सारखे आहे - आणि हा शिवधर्म वगैरे काही कुणाच्याही गळी उतरणार नाही !- त्यामुळे हे सर्व आपण परत विचार करावा अशा गोष्टी आहेत -

    आपल्याला ब्राह्मण द्वेषाची कावीळ झाली आहे असे कोणी म्हटले तर ?

    आपल्याला राज्य करायचे आहे की नाही - एकदा का खुर्ची सुटली की झोप उडेल -

    विचारा वाटल्यास काका पुतण्याला !

    कोलांट्या उड्या मारण्याचे वय आहे तरी का आता त्यांचे ?

    ReplyDelete
    Replies
    1. घाटगे सर, बाबासाहेबांचे धर्मांतर अतिशय योग्यच होते. ते त्या काळात अतिशय प्रभावी ठरले. दुर्दैवाने पुढील पिढीने काय केले हां प्रश्न कोणी विचारात नाही. कोणी त्या विरुद्ध ब्र काढला तर लेगच तो जातीयवादी ठरतो. महात्मा गांधीच्या एका गोष्टीची कोणीही जास्त तारीफ करत नाही की इंग्रज सोडून गेला पण त्याच्यावर राग धरला नाही. इंग्लंड आणि भारत पुन्हा एकमेकांच्या मदतीला कधी ना कधी आले. इंग्रंच्या त्यांच्या चांगल्या गोष्टी म्हणजे इंग्रजी ज्ञान, विचार आणि त्यांची चिकित्सक वृत्ती त्यांनी टाकून दिल्या नाहीत. बाबासाहेब हे त्याच इंग्रजाच्या तालमीत शिकलेले म्हणून त्यांनी कोणाचा द्वेष केल्याचे दिसत नाही. उलट हिंदू कुटुंब कायदा आणून लोकांचा फायदाच केला. माझ्या मते त्याचा कळत त्यांचे जवळपास ठरले होते की हिंदू धर्म सोडवा. हां फरक आहे ह्या दोन महात्म्यात आणि त्यांच्या सांगण्यावरून लोक धर्मांतर करण्यात. गम्मत म्हणजे त्यावेळी काही ब्राह्मण पण बाबासाहेबां बरोबर होते. हे लोक सोयीस्कर रित्या विसरतात. माझ्या स्वताच्या नात्यात माझ्या भावाने एका दलित मुलीशी लग्न केले आहे आणि माझ्या बहिणीने मराठा समजाबरोबर लग्न केले आहे. पण गम्मत म्हणजे आह्मी जितके पटकन सामावून घेतले तितके बाकीच्या लोकांना जड गेले. बहिणीच्या दिराने एका दलित मुलीबरोबर प्रेम आहे असे सांगितले तेंव्हा त्यांच्याकडे हाहाकार मजला. आपण मराठा असे कसे करणार. थोडक्यात स्वतःवर वेळ आली की वेगळा नियम आणि बाकीच्या वेळी सत्ता हातातून जाऊ नये म्हणून ब्राह्मांना शिव्या. कोणाला धर्मांतर करायचे असेल तर कोणीच थामाब्वू शकणार नाही फक्त उगाचच चुकीच्या आणि कपोलकल्पित माहितीवर आणि इतिहासात डोकावून होत असेल तर सावध करावे असे वाटले म्हणून इतके लिहिले. कारण अजून ४० वर्षांनी पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
      बाकी काका पुतण्यावर काय बोलावे. ह्यांना वाटेल आणि कामाच्या वेळी देशपांडे आणि कुलकर्णी ह्यांना मांडीला मंद लावून बसणार आणि बाकीच्या वेळी कोणाच्या खांद्यावरून निशाना साधणार. इतके वर्ष राज्य आहे पण काय अवस्था आहे. ह्याची फिकीर नाही आणि आत्ताच बरे ह्या सगळ्या गोष्टीला उत् आला? हा प्रश्न कोणालाच पडत नाही. तेंव्हा मित्रहो धर्मांतर जरूर करा पण ते करताना फक्त प्रतिक्रिया आहे का खरोखर दुसऱ्या धर्माची तत्वे पटली आहेत म्हणून करतो आहोत हे पहा. दुसरा मुद्दा धर्मांतर केल्याने एकदम परिस्थिती फरक पडेल असे वाटत नाही. त्यासाठी भरपूर कष्ट आणि शिक्षण हवेच. माझ्याच शेजारी एक वकील राहतात. महान आहेत. घरी ३-४ गाड्या आहेत पण दिवसभर नवरा बायको भांडत असतात. अर्वाच्य शिव्या आणि सगळ्या सोसायटीला वेठीस धरतात. बर काही सांगायला गेलो की म्हणतात आह्मी खालच्या वर्गाचे म्हणून तुम्ही आह्माला बोलता. मी वकील आहे दारू पियून बायकोला मारीन नाहीतर शिव्या देईन तुझ्या घरात येत नाहीये ना? तुझ्या म्हातारीला सहन होत नसेल तर टाकून दे मी आहे तसाच राहणार. थोडक्यात काय नुसते शिकले आणि सवलती मिळून पैसे मिळाले तरी ज्या सध्या सध्या गोष्टी आहेत त्यात बदल आपोआप घडत नसतो तो स्वतःच स्वतःला करावा लागतो हे कळले तरच फायदा नाहीतर पुन्हा ३०-४० वर्षांनतर चीड चीड आणि कोणाचा तरी द्वेष. हे चक्र चालूच राहणार

      Delete
  71. प्रिय मित्रा ,

    तुला हि गोष्ट मान्य असण्याचा प्रश्नच आहे कुठे /

    तुला वाईट वाटत असेल ती गोष्ट वेगळी त्याला आम्ही काहीच करू शकत नाही ,पण शाहू महाराज हे तनखा खाणारे इंग्रजांचे मांडलिक राजे होते हा इतिहास आहे -

    त्याला थाप म्हणणे म्हणजे स्वतःलाच फसवणे आहे !

    मित्रा आय फील व्हेरी सॉरी - पण ते मांडलिक होते आणि शिवाजीचे खरे वंशज नव्हते -

    दत्तक होते रे माझ्या लेकरा -

    !आता असं कर - एकदा कोल्हापुरच्या राजवाड्यात जा आणि तेथे शिवाजीची वंशावळ लावली आहे ती वाच ,

    तसेच तिथला प्रदर्शनाचा जो देखभाल करणारा आहे ना - त्याला विचार - की काय हो ?

    शाहू महाराज हे मांडलिक होते का नव्हते ?

    तो खरे तेच सांगेल

    आता माहितीचा अधिकार देणारा कायदा झाला आहे - सरकारलाच विचार रे माझ्या सोन्या - खरे उत्तर देण्याचा कायदाच आहे

    त्याना विचार की कोल्हापुरच्या राजना कसले बिल्ले मिळाले हो ?

    राणीचा आणि पंचम जॉर्ज राजाचा राज्याभिषेक झाला तेंव्हा ?


    ही काळ्या दगडावरची रेघ आहे - संभाजी ब्रिगेडच्या लोकाना किंवा अनिता पाटील विचार मंच याना विचारा - किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मागवा सरकारकडून - तपासा !

    •Knight Grand Commander of the Order of the Star of India (GCSI), 1895
    •King Edward VII Coronation Medal, 1902
    •Knight Grand Cross of the Royal Victorian Order (GCVO), 1903
    •Hon. LLD (Cantabrigian), 1903
    •Delhi Durbar Gold Medal, 1903
    •King George V Coronation Medal, 1911
    •Knight Grand Commander of the Order of the Indian Empire (GCIE), 1911
    •Delhi Durbar Gold Medal, 1911
    •हि सर्व पदके या राजर्षी शाहू महाराजांना इंग्रज सरकारकडून मिळाली त्यामुळे हे सिद्ध होते कि ते इंग्रज सरकारचे मांडलिक होते त्याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास विचारावे - किंवा संजय सर तर सांगतीलच -

    कोटे समाज करून सत्य लपवता येत नाही आणि ते तसे करणे लाजिरवाणे आहे !

    ReplyDelete
  72. @AnonymousOctober 2, 2013 at 6:41 AM

    मांडलिक हा शब्द राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात लिहिलेल्या एकाही पुस्तकात सापडला नाही. नुकताच "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" नाहीतर काय?

    काही संदर्भ मिळाल्यास जरूर कळवा!

    ReplyDelete
    Replies
    1. मी संग्रामसिंह घाटगे

      मी माझ्या मनाचे खेळ मांडत नाही किंवा माझा कोणताही असा नवा सिद्धांत नाही

      जे आहे ते पुरावे सरकारी आहेत !



      माझ्याच आडनावाने शाहू महाराज जन्माला आले

      त्यांना जे किताब इंग्रजांकडून मिळाले त्याचे विश्लेषण करावे

      ब्रिटीश राणीने असे किताब अनेक मंडलिक राजाना आणि योग्य इंग्रजी अधिकाऱ्यांना दिले -

      महाराज वयात येईपर्यंत एका इंग्रजी अधिकार्याच्या देखरेखीत होते !


      Several years after the Indian Mutiny and the consolidation of Great Britain's power as the governing authority in India, it was decided by the British Crown to create a new order of knighthood to honour Indian Princes and Chiefs, as well as British officers and administrators who served in India. On 25 June 1861, the following proclamation was issued by the Queen:


      The Queen, being desirous of affording to the Princes, Chiefs and People of the Indian Empire, a public and signal testimony of Her regard, by the Institution of an Order of knighthood, whereby Her resolution to take upon Herself the Government of the Territories in India may be commemorated, and by which Her Majesty may be enabled to reward conspicuous merit and loyalty, has been graciously pleased, by Letters Patent under the Great Seal of the United Kingdom of Great Britain and Ireland, to institute, erect, constitute, and create, an Order of Knighthood, to be known by, and have for ever hereafter, the name, style, and designation, of "The Most Exalted Order of the Star of India"[1]

      शाहू १८९४ साली २० वर्षाचे होई पर्यंत सर स्टुर्ट फ्रेझर यांच्या - एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होता कोल्हापूर जिल्हा गाझेटीयर बरीच ऐतिहासिक माहिती सांगते

      ती आपण अवश्य वाचावी

      शाहू राजांच्या आधीपासूनच हे राज्य खालसा राज्य होते - त्यात नवीन काय सांगायचे ?

      १८५७ च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिकांना कोल्हापूरच्या गादीकडून कसा दगा फटका झाला आणि जनरल जाकोब ने कशी दडपशाही केली आणि चिमाजी रावांचे काय झाले ते सगळे वाचावयास मिळते - राजवाड्याबाहेर कशी स्वातंत्र्य सैनिकांची कत्तल झाली आणि राजवाड्याच्या सैनिकांनी कसे वर्तन केले ते वाचताना फारच क्लेश होतात !



      On the 1st of October 1812, a treaty was concluded by which the Raja ceded to the British the harbour of Malvan and its dependencies, engaged to abstain from sea raids and wrecking, renounced his claim to the districts of Chikodi and Manoli, and further agreed not to attack any foreign State without the consent of the British Government, to whom all disputes were to be referred In return for these concessions the British renounced all their claims against the Raja, who received the British guarantee for all the territories remaining in his possession "against the aggression of all foreign powers and States." Kolhapur, in short, became a protected State under the British Government.



      योगायोगाचा भाग म्हणजे १ ऑक्टोबर १८१२ ते ३ ऑक्टोबर २०१३ - साधारणपणे २०० वर्षापूर्वीची घटना या घाटगेला एका निनावी माणसापुढे सिद्ध करावी लागत आहे !

      प्रोटेक्टेड स्टेट - संरक्षित संस्थान याप्रकाराला मीतरी स्वतंत्र अनभिषिक्त सम्राट म्हणणार नाही - शाहू हे इंग्रजांचे अंकित राजे होते आणि त्यांच्या आधीच्या राजानी १८५७ च्या स्वातंत्र्य सैनिकांना तोंडघाशी पाडले असेच आपले सरकारी ग्याझेटीयर सांगते !


      Delete
  73. त्यांचे चरित्रकार कोण ?

    त्यांचे चमचेच असणार - ते कशाला त्याना मांडलिक म्हणतील ?


    सर्व ५४० संस्थाने ही इंग्रजांची मांडलीकच होती


    राजर्षी शाहू काय किंवा अजून कुणी काय - हे पराभूत राज्याचे वंशज ! ते मांडलिक नाहीत का ?

    उगाच शब्दांचा चिखल करत बसायचे !

    त्याना परराष्ट्र खाते , संरक्षण खाते , असे निर्णय घेण्याची सवलत होती का ?

    त्याना वाटले की आपल्याकडे फ्रेंच सरकारने प्रशिक्षित केलेले सैन्य असावे तर त्याना तसे निर्णय घेण्याचा अधिकार आणि "सार्वभौमत्व " होते काय ?

    कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याचे अधिकारच नव्हते या राजाना - ते ठराविक तनखा खात आणि तो वाढवून मागत किंवा ठराविक उत्पन्नाचे एरिया - प्रदेश उत्पानासाठी त्याना तोडून दिलेलेल असत !- त्यांच्या मनात आले की एखादा जपान जर्मनी

    जर तो मूर्धाभिषिक्त सार्व्बाहुम राजा असेल तर तो बरोबर काही करार करायचे स्वातंत्र्य त्याना होते का ?- अजिबात नाही - मांडलिक राजाची काय व्याख्या असते तेतरी सांगा !

    हे बोल बोलाचा भात आणि बोलाचीच कधी असे नाहीत !

    यांनी घरदार मोडून खाल्ले नाही इतकेच - बाकी राजांनी तेपण केले - जुगार आणि बाई बातालीपायी - - यांनी ते केले नाही - तरी यांच्या पण सुरस आणि चमत्कारिक कथा कोल्हापुरला ऐकायला मिळतात अगदी ९६ कुळी लोकांकडून ! त्याला काय म्हणायचे ?

    इंग्रजांचे बिल्ले छातीवर लावून हिंडलाच नसता !

    ReplyDelete
    Replies
    1. @ AMRUTA VISHVARUP,

      स्पष्टच सांगा ना! पुरावे देवू शकणार नाही, मात्र आमचेच म्हणणे खरे मानले पाहिजे. झकास शक्कल! फक्त इथून ऐकले, तिथून ऐकले होय ना! ऐकीव माहितीवर आधारित, खरे कि नाही?

      पुरावे फक्त ब्राह्मनांचेच चालतील, बाकीच्या ऐऱ्या-गैऱ्यांचे नाही.

      साष्टांग दंडवत, होय अगदी कोपरापासून!

      Delete
  74. देवालयाहून शौचालय गरजेचं- मोदी

    देवालयापेक्षाही शौचालय बांधणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आपल्याकडच्या गावांमध्ये देवालयांवर लाखो रुपये खर्च केले जातात, पण महिलांना शौचासाठी उघड्यावर जावं लागतं, हे दुर्दैवी आहे, असे विवेकी; पण धाडसी विचार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असलं, तरी हे विधान भाजपच्या हिंदुत्ववादी विचारधारेला तडा देणारं असल्यानं पक्षनेत्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

    केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनीही काही दिवसांपूर्वी अशाच आशयाचं विधान केलं होतं. देशात मंदिरांपेक्षा शौचालयांची अधिक गरज आहे, असं ते म्हणाले होते. त्यावरून भाजपनं त्यांच्यांवर सडकून टीका केली होती.

    ReplyDelete
  75. राजर्षी शाहू महाराज


    राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक !
    राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

    राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्याश पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्याक, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्याण शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

    त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्याे मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

    ReplyDelete
  76. CONTD..........

    बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.

    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्यांलच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्यांठना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

    राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.

    राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

    अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.

    ReplyDelete
  77. मी संग्रामसिंह घाटगे

    मी माझ्या मनाचे खेळ मांडत नाही किंवा माझा कोणताही असा नवा सिद्धांत नाही

    जे आहे ते पुरावे सरकारी आहेत !


    माझ्याच आडनावाने शाहू महाराज जन्माला आले

    त्यांना जे किताब इंग्रजांकडून मिळाले त्याचे विश्लेषण करावे

    ब्रिटीश राणीने असे किताब अनेक मंडलिक राजाना आणि योग्य इंग्रजी अधिकाऱ्यांना दिले -

    महाराज वयात येईपर्यंत एका इंग्रजी अधिकार्याच्या देखरेखीत होते !


    Several years after the Indian Mutiny and the consolidation of Great Britain's power as the governing authority in India, it was decided by the British Crown to create a new order of knighthood to honour Indian Princes and Chiefs, as well as British officers and administrators who served in India. On 25 June 1861, the following proclamation was issued by the Queen:


    The Queen, being desirous of affording to the Princes, Chiefs and People of the Indian Empire, a public and signal testimony of Her regard, by the Institution of an Order of knighthood, whereby Her resolution to take upon Herself the Government of the Territories in India may be commemorated, and by which Her Majesty may be enabled to reward conspicuous merit and loyalty, has been graciously pleased, by Letters Patent under the Great Seal of the United Kingdom of Great Britain and Ireland, to institute, erect, constitute, and create, an Order of Knighthood, to be known by, and have for ever hereafter, the name, style, and designation, of "The Most Exalted Order of the Star of India"[1]

    शाहू १८९४ साली २० वर्षाचे होई पर्यंत सर स्टुर्ट फ्रेझर यांच्या - एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होता कोल्हापूर जिल्हा गाझेटीयर बरीच ऐतिहासिक माहिती सांगते

    ती आपण अवश्य वाचावी

    शाहू राजांच्या आधीपासूनच हे राज्य खालसा राज्य होते - त्यात नवीन काय सांगायचे ?

    १८५७ च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिकांना कोल्हापूरच्या गादीकडून कसा दगा फटका झाला आणि जनरल जाकोब ने कशी दडपशाही केली आणि चिमाजी रावांचे काय झाले ते सगळे वाचावयास मिळते - राजवाड्याबाहेर कशी स्वातंत्र्य सैनिकांची कत्तल झाली आणि राजवाड्याच्या सैनिकांनी कसे वर्तन केले ते वाचताना फारच क्लेश होतात !


    On the 1st of October 1812, a treaty was concluded by which the Raja ceded to the British the harbour of Malvan and its dependencies, engaged to abstain from sea raids and wrecking, renounced his claim to the districts of Chikodi and Manoli, and further agreed not to attack any foreign State without the consent of the British Government, to whom all disputes were to be referred In return for these concessions the British renounced all their claims against the Raja, who received the British guarantee for all the territories remaining in his possession "against the aggression of all foreign powers and States." Kolhapur, in short, became a protected State under the British Government.


    योगायोगाचा भाग म्हणजे १ ऑक्टोबर १८१२ ते ३ ऑक्टोबर २०१३ - साधारणपणे २०० वर्षापूर्वीची घटना या घाटगेला एका निनावी माणसापुढे सिद्ध करावी लागत आहे !

    प्रोटेक्टेड स्टेट - संरक्षित संस्थान याप्रकाराला मीतरी स्वतंत्र अनभिषिक्त सम्राट म्हणणार नाही - शाहू हे इंग्रजांचे अंकित राजे होते आणि त्यांच्या आधीच्या राजानी १८५७ च्या स्वातंत्र्य सैनिकांना तोंडघाशी पाडले असेच आपले सरकारी ग्याझेटीयर सांगते !


    ReplyDelete
    Replies
    1. घाटगेच्या नावाने लिखाण करणाऱ्यांना एवढेही समजत नाही, मराठा माणूस लिहित आहे, असा कितीही आव आणला तरी लिखाणावरून स्पष्ट कळून चुकते कि हि ब्राह्मण लोकांचीच खेळी आहे. उद्या मुस्लीम नावानेही हेच लोक लिहितील आणि ते सुद्धा इस्लाम विरोधात, काय यांचा भरवसा?

      Delete
    2. @SANGRAMSINHA GHATGE

      सोंग घेतले पण ते प्राणावर बेतले

      एका लांडग्याने मेंढ्याचे कातडे पांघरून मेंढ्यांच्या कळपात प्रवेश मिळविला आणि इतर मेंढ्यांबरोबर तो मेंढवाड्यात जाऊन बसला. रात्र पडताच "आता आपण एकदोन मेंढ्यांना मारून खाऊ व तृप्त पोटी परत रानात जाऊ,' असा तो विचार करू लागला. तेवढ्यात त्या मेंढ्यांच्या मालकाच्या घरी पाहुणे आले. साहजिकच पाहुण्यांना चमचमीत मेजवानी देता यावी म्हणून तो धनगर मालक मेंढवाडयात गेला आणि मेंढयाचे कातडे पांघरलेल्या लांडग्यालाच मस्त मेंढा समजून त्याने त्याच्या मानेवरून सुरा फिरविला.
      तात्पर्य : साळसूदपणाचा आव आणून जे दुसऱ्यांचा जीव घेऊ पहातात, ते स्वत:च प्राणास मुकतात.

      Delete
  78. आदरणीय मान्यवर ,

    घाटगे सर ,



    आपण अगदी योग्यच लिहिले आहे

    शाहू महाराजांवर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या इतकेच प्रेम करतो ,

    त्यांचा सन्मान करतो !

    पण

    आपण ज्या डोळसपणे १८५७ चे स्वातंत्र्य समर आणि त्यातील सैनिकांना कोल्हापूर संस्थानात मिळालेली वागणूक या बद्दल लिहिले आहे त्यासाठी आपले अभिनंदन

    सावंतवाडीकर,निपाणीकर आणि पेशवे यातील वादात कोल्हापुर करांचे राजकारण सवत्या सुभ्याचे होते हे जगजाहीर आहे ! कोणताही अभ्यासू वाचक हे नाकारणार नाही



    इंग्रजांच्या मालवण येथील वखारीना त्रास होत असताना त्यानी शेवटी कोल्हापुरातच आपला अड्डा आणला ,आणि एक अंकित दर्जाचे राज्य असे कोल्हापूरचे स्वरूप ठेवले - पेशवे आणि सातारची गादी यांचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहे १८५७ चे नानासाहेब पेशवे हे पण दत्तक पुत्रच होते , पण ते अखेर पर्यंत लढले -इंग्रजांनी दुहीचे राजकारण केले म्हणून कोल्हापूरची गादी अंकित संस्थान म्हणून टिकली - हे सत्य आपण मांडले !

    आपले प्रामाणिकपणे अभिनंदन !

    आणि आपल्या अभ्यासू वृत्तीला सलाम !

    आज बहुतेक लोक आणि वाचक जातीय राजकारण म्हणून याकडे बघतात आणि सत्य नाकारतात याचे वाईट वाटते - पेशवे - ब्राह्मणद्वेष -असा तो सांधा असतो !

    आपल्याला जसा शाहू छत्रपती यांचा आदर आहे अगदी तसाच ब्राह्मणाना पण आहेच , आपणच आपल्यातील ऐतिहासिक थोर व्यक्तीमत्वाना आपल्यातल्या न्यून गंडापायी छोटे करत आहो याचे भान आपण ठेवले पाहिजे

    ReplyDelete
  79. राजर्षींचे संस्थान मंडलिक होते, हे मान्य केल्याने त्यांचे महात्म्य कमी कसे काय होते ? कोणत्याही महापुरुषाला स्थळ- काळाच्या मर्यादा या असतातच. त्या मर्यादेतच ते आपले श्रेष्ठत्व सिद्ध करीत असतात. राजर्षींनी ते सिद्ध केलेच आहे. त्यांच्या कार्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर झालेले आहेत, हे अमान्य करणे म्हणजे आपली कृतघ्नताच म्हणावी लागेल.

    त्यांना जातीच्या बंधनात टाकणे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीचे आकलनच झाले नाही, असे म्हणावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. सारंग सर अगदी मनातले बोललात -

      आपले अभिनंदन !


      हा सगळा वाद म्हणजे आपापल्या इगोचा वाटतोय - संग्रामसिंग घाटगे सर यांनी मारली हा शब्द सिरियस घेतलेला दिसतो आहे !त्यांचे वय आपल्याला माहित नाही आणि अनानिमास्चे वय पण माहित नाही - त्यामुळे आपला खरेपणा सिद्ध करायला त्यांनी - घाटगे सरांनी - पार कोल्हापूर ग्याझेटीयर मधून सरकारी उल्लेखच मांडले -

      त्यांनापण राजर्षी शाहू यांच्या बद्दल अतोनात आदर असणारच - घाटगेच ते शेवटी !

      मग तरीही या ब्लोगवर इतका काथ्याकुट का चाललाय ?

      आपण अगदी बरोबर बोललात -

      राजर्षींचे संस्थान मंडलिक होते, हे मान्य केल्याने त्यांचे महात्म्य कमी कसे काय होते ? कोणत्याही महापुरुषाला स्थळ- काळाच्या मर्यादा या असतातच. त्या मर्यादेतच ते आपले श्रेष्ठत्व सिद्ध करीत असतात


      म्हणूनच अगदी खरोखर क्षणभर असे जे सिद्ध झाले आहे आता कि राजर्षी शाहू आणि त्यांच्या आधीचे सार्वजन १८१२ पासूनच मांडलिक राजे होते ते काही चुकीचे नाही - आणि त्यामुळे राजर्षींच्या रयतेच्या प्रेमाचा कुठेही कुणालाही संशयही नाही कारण मांडलिक असले तरीही

      आपल्या कर्तृत्वाने त्यानी सर्वांची , सर्व रयतेची मने जिंकून घेतली होती

      सातारकर गादीची काळजी घेणारे पेशवे यांनी शेवटी राज्य बुडवले असेही जे मानले जाते त्यावार्पण चर्चा झाली पाहिजे -

      कोल्हापूर आणि सातारा यातील वाद , आणि सावंतवाडी , निपाणी इथून होणारा त्रास , यामुळे इंग्रज कंपनीला चांगलाच शिरकाव करायला मिळाला -

      पेशव्यांनी किंवा शिवाजी नंतर कुणीच पूर्ण मुलुख आपपल्या ताब्यात गेट राज्य वाढवले नाही हे सत्य आहे - त्यामुळे चौथाई आणि सर्देश्मुखी आणि सैन्याचा खर्च असे व्यस्त प्रमाण , नवीन उदयाला आलेले संस्थानिक शिंदे होळकर , यांचे आणि कोल्हापूरचे संबंध आणि सातारची गादी - असे राजकारण फिरत होते -

      अगदी शेवटी नाना फडणवीस असे पर्यंत इंग्रजांनी संयम ठेवून धोरण राबवले !

      आणि मग निमित्त साधून कोल्हापूरकर गाडीबरोबर करार केला - त्यांना संकुचित नियंत्रित सत्ता दिली - यालाच संग्रामसिंह मांडलिक म्हणत असतील तर ते चुकीचे नाही

      Delete
  80. आम्हाला शाहू महाराजांचा अभिमान नसणार तर कोणाला असणार ?

    सारंग साहेब , आपण पण कमाल करता !

    प्रश्न असा झाला की" कुणीतरी " राजर्षी हे मांडलिक आहे हे विधान म्हणजे चक्क थाप आहे" असे विधान केले आणि बोलाचा भात" वगैरे म्हटले - त्यामुळे इतका सगळा प्रपंच करावा लागला !

    सरकारी ग्याझेटीयर हाच पुरेसा पुरावा आहे शौ महाराजांच्या थोरवी साठी कुणाच्याही प्रशस्ती पत्रकाची किंवा आपल्या सारख्या ( तुम्हा आम्हा सारख्या )लोकांच्या शिफारशींची गरज नाही

    पण

    इतिहास काय आहे नेमका ते जाणून घेणे हे रेकोर्ड प्रमाणे सांगणे फार आवश्यक असते -

    कोल्हापूर जिल्हा ग्याझेट फारच माहितीपूर्ण आणि बोलके आहे

    राजर्षींच्या स्मृतीना विनम्र अभिवादन !

    सातारा गादी आणि कोल्हापूर गादी यामध्ये इंग्रजांनी जो मुद्दामच स्टेटस चा भेद केला त्याचीही वेगळी कारणे आहेत -

    यावर बरेच काही अभ्यासपूर्ण पुराव्यासह लिहिता येईल !

    पण

    बरेच वेळा मूळ अर्थाचा अनर्थ करण्यातच अनेकाना आत्मशांती लाभते त्याला काय करणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. शाहू महाराजांचा अभिमान सर्वांनाच आहे. पण म्हणून त्यांचे संपूर्ण जीवितकार्य दुर्लक्षित करून त्यांच्या मांडलिकत्वाचा विषय कोणी कुत्र्याने हाड चघळावे तसा चघळत नाहीत. ती हौस तुम्हालाच का आहे हे सांगण्याची गरज नाही. स्वत:चे वांझोटेपण लपवण्यासाठी दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसणाऱ्याला काय म्हणतात हे देखील सर्वांनाच माहित आहे. उघडे होणे आणि नागडे होणे यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना कुठे थांबायचे हे देखील कळत नाही.

      अरे हो, चैतन्य महाराज! इथे विनाकारण शाहूमहाराजांचा अपमान केला जातो आहे ते तुमच्या फुटलेल्या डोळ्यांना दिसत नाही वाटते! शंभर वर्षांपूर्वी ब्राह्मणांनी काय केले हे इतरांनी सांगू नये असे तुम्हाला वाटत असेल तर मग शंभर वर्षांपूर्वी इतरांनी काय केले हे तरी कशाला सांगायचे?
      "शंभर वर्षांपूर्वी काय घडले हा इतिहास उगाळून काय मिळणार आहे ?" हाच प्रश्न तुम्ही तुमच्या लाडक्या घाटगे सरांना का विचारत नाही?

      Delete
    2. Anonymous, माझा ह्या विषयाचा अभ्यास अजिबात नाहीये. पण आता तुम्ही लोकांनी इतके लिहिले आहे आणि मग जर का कोणी पुरावे पुढे केले तर हे असे कसे काय बुवा? ब्राह्मण लोकांनी पूर्वी मुर्खपणा केला आणि लोकांना ज्ञान दिले नाहीये ह्यात वादच होऊ शकत नाही. कोणी त्याचा प्रतिवाद करत असेल तर तो मुर्ख आहे. पण इथे तुम्ही लोकांनी फक्त एकाच समाजाला बोलून आता धर्मांतर करायचे ते पुन्हा मागे काय झाले त्यावरच. जसे ब्राह्मण दुतोंडी आहेत तसेच बाकीचे पण आहेत हेच वर दिसते. आता मग का बरे वाईट वाटते आहे? म्हणजे तुम्ही इतिहास तुम्हाला पाहिजेल तसा उगलायाचा पण बाकीच्यांनी काही बोलायचे. इथे शाहू महाराजांनी अतिशय चांगले काम केले आहे त्यावर प्रतिवाद होवूच शकत नाही. पण पुन्हा मला प्रश्न पडतो की मग ब्राह्मण आणि बाकीच्या लोकांनी चांगले काम केले ते कसे काय बुवा नाकारायचे?

      Delete
    3. आम्हाला पाहिजे तसा इतिहास? "प्रॉब्लेम ब्राह्मणांमध्ये नसून धर्मात आहे." हे वरील प्रतिक्रियेतील वाक्य वाचायला आपण बहुधा विसरला आहात. इतक्या स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली असतांना उगाचच ब्राह्मण द्वेषाचा आरोप करायचा आणि त्याचे समर्थन म्हणून शाहूंची बदनामी करायची हेच धोरण राबवायचे असेल तर ब्राह्मण खरोखरच बदलले आहेत यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?
      शाहू महाराज हे एकटेच इंग्रज सरकारच्या आधिपत्याखाली होते काय? त्या काळचे इतर ब्राह्मण संस्थानिक इंग्रजांच्याच कृपेवर जगत नव्हते काय? मग त्यांची नावे का बरे घेतली जात नाहीत? प्रॉब्लेम शाहुंविषयी आहे की मांडलिक असण्याविषयी?
      शाहुंमुळे ब्राह्मणांचे वर्चस्व उखडले गेले हाच राग मनात ठेवून त्यांचे एकट्याचेच मांडलिकत्व काढले जात नाही काय? ब्राह्मणांचे पितळ उघडे पडले की बाह्या सरसावून उत्तर द्यायचे आणि शाहूंचा विषय निघाला की सोयीस्कर मौन धरायचे ही तुमची भूमिका देखील दुटप्पी नाही काय? दुसऱ्यांना इतिहास विसरायला सांगतांना तुम्ही स्वत: देखील इतिहास विसरायची तयारी ठेवली पाहिजे.

      Delete
  81. जाऊ द्या हो चैतन्य सर !

    लहान आहे हे बाळ असे समजू


    हे असे उफाळून चरकट भरकट वितंडवाद घालत आरडा ओरडा करणार

    हे माहीतच झालेले होते आपल्या सर्वाना !


    हे बाळ रडीचा डाव खेळणार आहे -लिंबू टिंबू !

    उगी उगी !कोण बोलल आमच्या छकुल्याला ?

    त्याला अशीच सवय आहे - हात रे जा बघू पळ - तुझ्या गल्लीत जा - आमच्या गल्लीत आम्हीच राजे - आम्ही राजे - आम्ही राजे !

    ( हसल कि बाळ खुदकन - )

    रडू नको बेटा - हे सगळ जग दुष्ट आहे रे माझ्या सोनुल्या !

    सगळ्यांशी कट्टी करून टाकूया आपण - सगळे तुला त्रास देतात ना ?

    उगी उगी -

    आपण शिवाजी म्हणतो शिवाजी म्हणतो खेळायचं का ?

    तू शिवाजी हो - आणि आम्ही मावळे !शिवाजी म्हणतो हात वर करा - आम्ही मावळे हात वर करणार !असं करता करता शिवाजीच नाव न घेता एकदम म्हणायचं खाली बसा - अरेच्या - बसला - कि मग आउट - किती सोप्पा खेळ आहे -

    सगळे मावळे आउट आणि जिंकणार कोण ? शिवाजी ! कित्ती सोप्पा आणि मस्त खेळ आहे !

    कोल्हापुरातला खेळ आहे हा !

    चल आपण रायगडावर जाऊ या !

    आज नको ? कारे ?

    आज सर्व पितरी अमावास्या आहे ?

    मग ?

    तिथे कोण येते ? वाघ्या? काय करतो तो ?

    दुष्ट लोकाना चावतो ?

    जाऊ दे पण अशी अंधश्रद्धा चांगली नाही !


    नकोरे बाबा , आपण इथूनच खेळूया !

    म्हणा शिवाजी महाराज कि जय

    शाहू महाराज कि जय !

    चल तर मग बस इथेच फुटपाथवर - हेच तुझं सिंहासन !

    तुला नवच सांगता येत नाही - मग नाव नसेल तर हे भट बामन कुठल्या नावान तुला राज्याभिषेक करणार ? अगदी गोसावी आणले या बामनाञ्च्या औवजि तरी ते आईबापाच नाव विचारणारच

    रडू नको असा ! काय माहित्ये आई आणि बापाच नाव ? मग सांग ना ! अरे मुगुट घालायचा म्हणजे ते सांगावाच लागत !

    बघ ना - संजय सर अशी निनावी इलेक्शन लढवू शकतील का ?तसच या मुगुटाच आहे !

    खेळ असला म्हणून काय झाले ! -

    उगी उगी !



    ReplyDelete
    Replies
    1. ओंकार,

      चावट! किती हा आगाउपणा? उगी उगी हं! रडू नकोस. लाडान म्हटले!

      Delete
    2. ओंकार निमकर कोठे भरकटत जाणार कोणास ठाऊक?

      Delete
  82. मस्तच !

    एकदम छान

    ओंकार - तू सिम्पली ग्रेट आहेस

    अगदी पटलं ! नावात काय आहे म्हणतात ते पटलं - पासपोर्टवर ,इलेक्शनच्या कार्डावर ,रेशनच्या कार्डावर नाव हे पाहीजेलच !

    आपल्याला तो शिवाजी म्हणतो तो खेळ आवडला - तो कुठे खेळतात ?

    कोल्हापुरच्या राजवाड्यात - कधी पासून ? इ.स. १८१२ पासून ?

    म्हणजे इंग्रजानीच चालू केला कि काय हा खेळ ?

    आत्ता आल लक्षात हा लब्बाड आपल नाव का नाही सांगत आहे ते -

    ReplyDelete
  83. आधुनिक त्रिमूर्ती

    भारतीय राजकारणात छत्रपती शिवाजी , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आधुनिक त्रिमूर्ती आहे. त्यांच्यातल्या या सूत्राची ओळख करुन देणारा हा लेख...

    .........................................................................................................

    - ज्ञानेश महाराव

    माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली त्याच्या कार्य-स्मरणाची असते. भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वांत छत्रपती शिवराय , महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. या तिघांच्या नेतृत्वात , कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं ? हे तिघेही लोकनेते होते. तथापि , त्यांच्या नेतृत्वाला निश्चित विचारतत्त्वांची बैठक होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागतात आणि तत्त्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत , असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. परंतु हे तीन लोकनेते याइतिहासास अपवाद ठरले , म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक झाले.

    छत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याचीच नव्हे , तर स्वराज्याची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्याचा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूतीर्ंच्या स्वराज्य , स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांत आहे. या तीन तत्त्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली भारतीय लोकशाही हेच या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे ; परंतु हेच कार्य विसरून याराष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. आज या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यात फार मोठं वैचारिक अंतर आहे. ते त्यांच्या कार्याचा घोर अपमान करणारे आहे. ' डॉ. आंबेडकरांचा विजय असो ' म्हणताना 'जय शिवाजी! जय गांधीजी ' असाही गजर व्हायलाच हवा. तसंच ' शिवाजीमहाराज की जय ' चा नारालगावताना महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचाही जयजयकार करण्यास विसरू नये.

    ReplyDelete
  84. CONT............

    या तिघांचं जीवनकार्य हे राष्ट्रउभारणीचं शास्त्र आहे. तथापि , त्याचा संस्कार करवून घेण्याऐवजी त्यांची नावं शस्त्रासारखी एकमेकांविरोधात वापरली जात आहेत. महात्माजी काँग्रेसवाल्यांचे , डॉ. आंबेडकर दलितांचे आणि शिवराय दोघांनाही विरोध करणाऱ्यांचे ; अशी या विभागणी झालीय. ती राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यामुळे समाजात अहंकार बळावतोय , मूर्खपणा वाढतोय.

    महात्माजी आणि आंबेडकर या दोघांनीही शिवरायांच्या समताधिष्ठित राज्यपद्धतीला आदर्श मानलं आहे. खेडेस्वयंपूर्ण व्हावे , ग्रामविकास व्हावा या गांधीविचारांची बीजे शिवशाहीत आहेत. शिवरायांच्या भूमीत कार्यर्कत्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजी साबरमतीचा आश्रम बंद करून र्वध्याला आले. काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारताच 'शिवाजीमहाराज की जय! तिलकमहाराज की जय! ' म्हणत भारतभर फिरले. महात्माजींना आंबेडकरांच्या कार्याबद्दलही आस्था होती. दोघांत वैचारिक मतभेद होते. कारण दोघांचे मार्ग भिन्न होते. परंतु उद्दिष्ट एकच- मानवतेचं रक्षण व मानवतावादाला बढावा देणे हेच असल्यामुळे उभयतांना परस्परांबद्दल आस्था होती. १४ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर म्हणाले , ' आज मी समाधानी आहे. गांधींना दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. '

    डॉ. आंबेडकरांच्या नियोजित ग्रंथलेखनात महात्मा फुले यांच्या चरित्राप्रमाणे महात्मा गांधींच्याही चरित्राचा समावेश होता. ते जाहीरपणे म्हणाले होते , ' माझ्यापेक्षा गांधींना अधिक कोण ओळखतं ? म्हणून मीच त्यांचंचरित्र लिहिणार आहे. ' गांधीजींच्या जिवाचीही चिंता आंबेडकरांना होती. त्यांनी गांधींना अनेकदा सावधही केलं होतं. ते गांधींना म्हणालेही होते , ' एक वैश्य , बनिया ब्राह्माणांसकट सर्वांचे नेतृत्व करतो , ही गोष्ट चातुर्वणीर् ब्राह्माणांना माहीत नाही , असं समजू नका ; पण एक गोष्ट तेवढीच खरी की , जोवर तुम्ही ब्राह्माणांचे हितसंबंध जोपासता तोवर तुमच्या महात्मापणाला धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही ब्राह्माणांच्या हिताला बाधा आणाल ,तेव्हा तुमची काय गत होईल , ते मी सांगण्याची गरज नाही. ' हे शब्द नथुरामने खरे केले. गांधींबद्दल आंबेडकरांच्या मनात असलेली ही आस्था त्यांच्या अनुयायांनीही आपल्याला रुजवायला पाहिजे होती. सत्तास्वार्थासाठी दलित नेत्यांकरवी दलित समाजाला वापरणारी काँग्रेस वाईट , म्हणून काँग्रेस ज्यांना आपल्या मोठेपणासाठी वापरते ते गांधीजीही वाईट , हा अविचार आंबेडकरांना मानणाऱ्यांनी झटकला पाहिजे.

    डॉ. आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दुरावा असण्याचं कारणच नव्हतं. कारण सामाजिक समानतेच्या बाबतीत शिवाजी महाराज काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी महार-मांग या शूर जातींतील वीरांना गडकरी ,सैन्याधिकारी पदी नेमून त्यांचा सन्मान केला होता. शिवशाही स्थापताना त्यांनी जातीचा अधिकार मोडून काढला. गुणांना , कर्तबगारीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच वाई परगण्यात नागेवाडीची पाटीलकी नागनाक महाराला मिळाली. अष्टप्रधान मंडळात वेगवेगळ्या जातींच्या मंडळींची सारख्याच उंचीची बैठक पाहून देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाराज कडाडले , ' शिवशाहीत सर्वच बैठका एकाच उंचीच्या असतील , एकच फक्त त्यापेक्षा उंच असेल. ते जनताजनार्दनाने दिलेलं राजसिंहासन. ' रयतेचा राजा असा शिवरायांचा लौकिक होता. जनतेच्या सुख-दु:खांची त्यांना जाण होती , तसंच आपल्या जबाबदारीचंही भान होतं. लोकनेते म्हणवून घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

    शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बरेच किल्ले जिंकले , नवे किल्ले बांधले. पण तिथे त्यांनी आपल्यानावाचा शिलालेख नाही बसवला. त्यांचा पुतळाही त्यांच्या निधनानंतर अडीचशे वर्षांनी आकारास आला. याउलट स. का. पाटलांसारख्यांनी आपल्या हयातीतच ब्राँझचा टोलेजंग पुतळा तयार करवून मुंबईत ठाकूरद्वारच्या उद्यानात बसवला. स. का. पाटील जाऊन पंचवीसेक वर्षंच झालीत , पण त्यांचं नाव विस्मरणात गेलेय. मात्र शिवरायांंचा पराक्रम प्रथम कळतो आणि त्यांचा भव्य पुतळा पाहूनही त्यांचा पराक्रम श्रेष्ठच राहतो.

    महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या पराक्रमाची थोरवीही अशीच आहे. ही माणसं दगडाच्या इतिहासासाठी नव्हती. ही दगडातून इतिहास निर्माण करणारी माणसं होती. ती वाटून घेण्यासाठी नाहीत. संपन्न भविष्याची वाटदाखवण्यासाठी आहेत. त्या तिघांपुढे एकाच वेळी नतमस्तक होणं , हीच खरी त्यांना आदरांजली आहे , त्यांच्या विचारतत्त्वाची आचारक्रांती आहे.

    ReplyDelete
  85. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षि श्री शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे. इतर अनेक राज्यांत बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण, राजकीय सत्ता, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यांपासून वंचित राहिला. महाराष्ट्रात हे झाले नाही. त्याबाबतची जागृती महात्मा फुले यांनी केली. त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे म्हणजे कर्मवीर शिंदे, राजर्षि शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील. यांपैकी शाहू महाराज हे छत्रपती होते आणि आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला. यामुळे सामान्य लोकांतही जागृती झाली व म्हणून महाराष्ट्रात सरंजामशाहीचे दोष फारसे दिसत नाहीत. सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यामुळेच मराठी समाज हा त्यांतल्या त्यांत देशातला आधुनिक समाज बनला आहे.

    राजर्षि शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या राजवटीतील संस्थानिक होते आणि याच्या मर्यादा त्यांच्या काही धोरणांना पडणे स्वाभाविक होते. पण देश-काल-परिस्थितीच्या मर्यादा सर्वांनाच पडतात. त्यांपलीकडे जाऊन ज्यांचे कार्य दूरगामी परिणाम घडवून आणते, त्यांचे नाव इतिहासात अजरामर होते. शाहू महाराजांचे नाव या कारणास्तव अजरामर झाले. तसे पाहिले, तर संस्थानिक अनेक होते, पण शाहू महाराज हे केवळ संस्थानधिपती म्हणून मोठे ठरत नाहीत. त्यांच्या राजसत्तेला सामान्य जनतेच्या कळवळ्याचे लेणे चढले होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग, इत्यादी क्षेत्रांत जे नवे चैतन्य निर्माण केले, ते स्वतःचा बडेजाव वाढविण्यासाठी नव्हे, तर या अनेकविध क्षेत्रांतील गुणिजनांना प्रोत्साहन देऊन, आपल्या राज्यात विद्या, कला, व्यापार, क्रीडा यांची भरभराट व्हावी आणि त्यायोगे आपल्या प्रजाजनांचे भले व्हावे, ही प्रेरणा त्यामागे होती, त्यामुळे गुणिजनांना, अनाथ व एकाकी लोकांना फार मोठा आधार होता.

    राजर्षि शाहू महाराजांनी घडविलेल्या सामाजिक परिवर्तनाचे रहस्य आणि वैशिष्ट्य हे, की त्यांनी जे विविध उपक्रम केले, ते चिरस्थायी ठरतील, अशी त्यांची बांधणी केली. कित्येक वेळा मोठी माणसे काही उपक्रम सुरू करतात आणि त्यांच्यानंतर त्यांचे कार्य नष्ट होते. आपल्याकडे कोणत्याही कार्याला संस्थारूप देण्यात आपण अयशस्वी ठरतो. यामुळे ज्या व्यक्तीने एखादे कार्य उभारले, ती बाजूला झाली की, या कार्याचा मागमूस राहत नाही. ज्या समाजाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असते, तोच समाज पराक्रम गाजवू शकतो. शाहू महाराजांनी हे ओळखले होते. याबाबतीत त्यांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक होती.

    -Y B CHAVAN

    ReplyDelete
  86. राजर्षि शाहू यांच्यावरील हल्ले :

    राजर्षि शाहू जे शोषित जनतेसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपले सर्व जीवन जगले यांच्यावर सुध्हा याच प्रवृत्तिच्या सनातान्यानी अनेक प्राणघातक हल्ले चढवले होते !

    वेदोक्ताच्या संघर्षत फेरिस यांनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून कोल्हापुर मधील अणि पुण्यातील वैदिक धर्मीय ब्रह्मनानी १६ एप्रिल १९०८ रोजी, फेरिस रेल्वेने प्रवास करीत असताना सनातनी ब्राह्मण दहशतवादी दामू जोशी याने पिस्तूल रोखून गोळ्या झडल्या. या घटने नंतर तीनच महिन्यांनी खुद्द शाहू महाराजाणा रस्त्यात बोंम्ब ने उडवून देण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ! अंगावर काटा येतो मित्रानो आशा गोष्टी वाचून ! महापुरुषाना समाजसुधर्नेसाठी आणि गरीबा साठी कम करत असताना काटेरी मार्ग पत्करावे लागतात !

    पुढेही महाराजांच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्यांचा जिव घेण्यासाठी सनातनी वैदिक दहशात्वाद्यानी त्यांचा पीच्हा पुरावालेला दिसून येतो ! जिव घेणे हे सनातनी वैदिकांचे अगदी सोपे कामच होते हेच यावरून दिसते !

    शंकर माने.

    ReplyDelete
  87. कोणत्याही महापुरुषाबद्दल आजच्या काळात कटू वाटणारी एखादी वस्तुस्थिती मान्य करण्याचा प्रश्न नाही. परंतु अशा बाबीची पुन्हा पुन्हा चर्चा का करावी? एखाद्याला वस्तुस्थिती पटवून देण्याचा प्रश्न असेल तर ठीक आहे. परंतु या उगाळणीचा एवढाच उद्देश आहे काय? हा प्रश्न प्रत्येक उगाळनाऱ्याने स्वत:ला जरूर विचारावा. सर्वांच्या बाबतीत हे खरे नाही, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. एखाद्याला नाहीच पटले तर काय करणार? नाही तर नाही; पण उगाळणे पुरे.
    कोणत्याही कृती-उक्ती-घटना यांची योग्यायोग्यता ही देश-काळ-स्थिती वर अवलंबून असते. तथापि, ‘सर्वात तळातील व्यक्तीचे हित’ या उद्दिष्टाला देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असू नयेत.
    या एका कसोटीवरही महापुरुषाचे जीवन, कोणतेही तत्त्वज्ञान, कृती, घटना, यांची तपासणी करायला हरकत नाही.

    ReplyDelete
  88. बाप्पा - या आप्पा , तुमचीच कमी होती

    आप्पा - काय हो इतक काय अगदी आमची आठवण येण्यासारख ?

    बाप्पा - अहो १३९ उत्तरे प्रत्युत्तरे झाली पर्यंत सेन्चरी झाली म्हणाना !

    आप्पा - कुणाची ?संजय सरांची - मतदान झालं ? आले का आपले पठ्ठे ?

    बाप्पा - अगदी अस बोलताय जणू की गडी खासबागचाच आहे !

    आप्पा - कोणाबद्दल चाललय ?

    बाप्पा - संग्रामसिंह घाटगे - ऐकलय कधी हे नाव ?अनिता पाटलीणीचा मित्र वाटतो ना ?, पण नाही हे काहीतरी वैचारिक दिसतंय - ती पाटलीण कसली - नुसता धिंगाणा - अकलेचे तारे तोडत काहीही बरळत राहायचं ! - पण हे मात्र सॉलिड लिहितात ! अभ्यास पण आहे -

    परत ९६ कुळी म्हणून उगाच आपलं आवाज टाकत हिंडायच -मराठा लॉबी वाला आहे असं पण नाही -

    आप्पा -गम्मत बघा हं आता

    विषय मांडला आपल्या संजयन साहित्य संमेलनाचा - बिचारा घाईवर आलाय - आणि यांनी - एकदम रान पेटवलं - शाहू महाराज हे मांडलिक होते म्हणून - झालं - एकदम हलकल्लोळ !

    बाप्पा - हा ब्राह्मणच असला पाहिजे घाटगे ! कारण असल्या वळूना कसे पाळावयाचे ते या लोकांनाच माहित !आपण आपले सुन्कट खाणारे - आपल्याला तर बांगडा किंवा कोलंबी नाही मिळाली की जीव घाबरा होतो !आप्पा - याला ट्रीक कळली म्हणजे - अहो ते घाटगे आहेत शेवटी ! पण तो अनानिमास - त्याच काय ?

    आप्पा - अहो इतका पेटलाय सांगतो - त्यातच तो एक बिचारा चैतन्य म्हणून फ़ारेन वरून आलाय कोणतरी अस्सल ब्राह्मण दिसतो आहे - तसा माणूस चांगला आहे बर का !पण इथे असलं थोडच चालतंय ?

    बाप्पा - म्हणजे पार दमछाक होत असणार -

    आप्पा - अगदी इतका मेटाकुटीला येवून सांगत असतो सर्वाना - पण कोण ऐकतय याच ?

    बाप्पा - इथे म्हणजे कसं ? दे दणादण ! आणि तो एक निंबाळकर आहे - ओंकार - मस्त फिरकी घेतली आहे - हसून हसून पुरेवाट लागत्ये - विनोदातून लोकशिक्षण - खास निम्बाळकरांचा थाट आहे !- कसलीही घाई नाही आणि कुणाचीही पर्वा नाही -ठासून सगळ्याना पार सळो की पळो करून सोडतो - तरुण दिसतंय पोरग !

    आप्पा - आपण बरेच दिवसात फिरकलोच नाही संजय सरांच्या इकडे !सगळ मुद्देसूद असतंय ना ? भाषा ?का मध्ये मध्ये कोण एक अनानिमास होता अस्सल मराठी अवतार दाखवत लिहायचा ! वाचताना आपली नजर वीटाळल्या सारखं वाटायचं !

    बाप्पा - पण सगळ्याना एकदा सांगावस वाटतंय -आता कुठेतरी वाहावत जाऊ नका - विषयाला धरून लिहा - या घाटगे सरांच एक चांगलं आहे - भाषा अगदी पुणेरी - ब्राह्मणी - पण विचारही तितकेच पक्के - पुणेरी पगडी सारखे वारा वाहेल तसे फिरणारे नाहीत !गाडी अस्सल आहे !

    आप्पा - -बरोबर अगदी खर आहे - !अशीच मानस हवीत - म्हणजे जरा या ब्लोग ला जिवंतपणा येईल !

    ReplyDelete
  89. घाटगेच्या नावाने लिखाण करणाऱ्यांना एवढेही समजत नाही, मराठा माणूस लिहित आहे, असा कितीही आव आणला तरी लिखाणावरून स्पष्ट कळून चुकते कि हि ब्राह्मण लोकांचीच खेळी आहे. उद्या मुस्लीम नावानेही हेच लोक लिहितील आणि ते सुद्धा इस्लाम विरोधात, काय यांचा भरवसा?

    ReplyDelete
  90. मोदी आणि टॉयलेट्स

    मोदीनी आमच्या टॉयलेटची कॉपी मारली म्हणून सर्वत्र बोंबा मारणे सुरु आहे. काही महिन्यापुर्वी आमच्या जयरामनानी विनोदाने श्रीरामची खिल्ली उडवत अयोध्येच्या मंदीरावरुन टोमणा मारला होता की मंदीरांपेक्षा टॉयलेटं बनवा... नालायक मोदीला टोमण्याचा अर्थ कळला नाही व त्यानी चक्क टॉयलेटला अत्यंत महत्वाची चीज समजून पळवून नेले. आमच्याकडे बरेच टॉयलेट्स असल्यामुळे तशी अडचण झाली नाही. पण मोदी मात्र लै हुश्शार... त्यानी टॉयलेटचा वापर नियोजित विधीसाठी केलाच नाही. टॉयलेट्सच्या टोमण्याला उत्तर देताना तीच चिज राजकीय भांडवल म्हणून वापरली. या भांडवाच्या बडावर अनेक भांडवलदाराना मात देण्याचा एकुण डाव तयार केलेला दिसतो. हे गुज्जू लोकं कशाचही भांडवलात रुपांतर करु शकतात याचा हा ताजा नमूना आहे. अन कॉंग्रेस मध्ये बसलेले अनेक अब्जाधीश भांडवलदारांचे मात्र या नव्या भांडवलामुळे भंबेरे उडाले. टॉयलेट नावाचं नवीन भांडवल बाजारात आलं हे त्या अब्जाधिशाना कळायच्या आत मोदीनी राजकारणाच्या बाजारात गुंतवलं देखील. आता भांडवल गुंतवलं म्हटल्यावर त्यावरील लांभाश मिळणे आलेच. हृदयाकडचा मार्ग पोटातून जातो म्हणतात तसं आता पंतप्रधानपदाचा मार्ग टॉयलेटातून जाणार असे दिसते. ज्या टॉयलेट्सना आजवर राजकारणात काडीचेही महत्व नव्हते त्याचं मोल मोदी स्पर्शामुळे रातोरात कैकपट्टीने वाढून गेलं. गुज्जूभाईचा हात लागल्या लागल्या टॉयलेट्स मध्ये कमालीचे मुल्यवर्धन होऊन ते आता चक्क पुढच्या निवडणूकीत भारताचा पंतप्रधान ठरविण्याचं साधन बनलं. २०१४ च्या निवडणूकीत भाजप व कॉंग्रेसवाले टॉयलेट टॉयलेट खेळणार असे दिसते... असो.

    ReplyDelete
  91. आधी शौचालये, मग देवालये' या नरेन्द्र मोदींच्या विधानावर शिवसेना चांगलीच भडकली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले मोदी हे सुद्धा कॉंग्रेसची भूमिका मांडत असल्याने केंद्राने त्यांना 'शौचालय' उपक्रमाचे 'ब्रॅण्ड अॅम्बेसेडर' केले पाहिजे असा जबरदस्त टोला भाजप आणि मोदींना लगावला आहे. भाजपचे मोदींवर नियंत्रण राहिले नसून मोदी पुढे आणि भाजप मागे असे चित्र दिसत असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

    शौचालयांपेक्षा आपल्या देशात मंदिरांची संख्या जास्त असल्याचे कॉंग्रेस नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार यांनी जयराम रमेश यांच्यावर सडकून टीका केली होती. आज मोदींनी तसेच वक्तव्य केल्यानंतर मात्र भाजप त्यांचा बचाव करताना दिसत आहे. त्यामुळे मोदी काय भूमिका घेतात हे आता भाजपलाही माहीत नाही. मोदी पुढे व भाजप मागे असे चित्र दिसत आहे. यावर आम्ही काय बोलणार? शौचालय उभारणीच्या कामास सर्वांनी लागावे, मंदिराचे नंतर बघू, असा उपहासात्मक असा टोला या संपादकीयमधून लगावला आहे.

    'आधी शौचालये, मग देवालये' असं सांगून नरेंद्र मोदी हे कॉंग्रेस सरकारचाच विचार पुढे नेत आहे. त्यामुळे खरं तर केंद्राने त्यांना 'शौचालय' उपक्रमाचे 'ब्रॅण्ड अॅम्बेसेडर' केले पाहिजे अशी मागणी शिवसेनेने या माध्यमातून केली आहे. या सडेतोड टीकेमुळे भाजप-शिवसेनेमध्ये मोदींच्या नेतृत्वाबद्दल असलेला जुना वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

    ReplyDelete
  92. आम्ही काय मग खेडवळ भाषेत लिहिलच पाहिजे का ?

    आम्हीपण स्वच्छ मराठी बोलू आणि लिहू शकतो !

    तो काही ठराविक जातीचा आणि नावांचा मक्ता नाही -

    असले विचार कसे सुचतात ? आज ब्राह्मण कॉन्व्हेंट मध्ये जाणारी मुलेसुद्धा इतके छान मराठी लिहू अथवा बोलू शकत नाहीत हे मी खात्रीशीर सांगू शकतो

    हा ब्लोग म्हणजे काय रहस्य कथा आहे का ?उगीचच दुसऱ्याचे नाव वापरून आपले विचार का मांडत बसायचे ?असली फ्यानटसी कोणाला सुचू शकते ?

    चांगले विचार मांडणे हेसुद्धा चोरून करावे लागते ?

    ReplyDelete
  93. असले हगरे पादरे जोक लहानपणी तिसरी दुसरीतील मुले मारतात !

    तुमचे लिखाण वाचून मजा वाटली

    ReplyDelete
    Replies
    1. किती बावळट?, ओंकार!

      Delete
  94. अयोध्येच्या बस स्थानकावरील सुलभ शौचालयात एकीकडे "पुरुषांकारीता" यासाठी श्रीरामाचे चित्र आणि "महिलां करता " यासाठी सीतेचे चित्र वापरायचा फतवा निघाला तर ?

    राजकारणात काहीही होऊ शकते !

    आपला धर्म आणि आपले देव आपण अशा चांगल्या कारणासाठी वापरला तर काय चुकले ?

    कायम चूर्ण करीम चूर्ण म्हणून आणले बाजारात तर ?

    श्रीकृष्ण गोपींची वस्त्रे पळवायचा , म्हणून स्विमिंग पुलावर सुचना लावली की महिलांसाठी - सुचना -खालील फोटोतील माणसा पासून सावध रहा - याचे नाव श्रीकृष्ण असून हा महिलांची वस्त्रे पळवतो ! हिंदू धर्म आहेच सोडायचा - जरा चेष्टा तरी करून घेऊया !

    अ पा वि मं कधी वेळ काढतोय - धर्म बदलाचं ते राहूनच जातंय !
    AVINASH

    ReplyDelete
    Replies
    1. नुकते धर्म सोडू, धर्म सोडू म्हणून अकांड तांडव करू नका, हिम्मत असेल तर धर्मांतर करून दाखवा!

      Delete
  95. मी संग्रामसिंह घाटगे

    मी माझ्या मनाचे खेळ मांडत नाही किंवा माझा कोणताही असा नवा सिद्धांत नाही

    जे आहे ते पुरावे सरकारी आहेत !



    माझ्याच आडनावाने शाहू महाराज जन्माला आले

    त्यांना जे किताब इंग्रजांकडून मिळाले त्याचे विश्लेषण करावे

    ब्रिटीश राणीने असे किताब अनेक मंडलिक राजाना आणि योग्य इंग्रजी अधिकाऱ्यांना दिले -

    महाराज वयात येईपर्यंत एका इंग्रजी अधिकार्याच्या देखरेखीत होते !


    Several years after the Indian Mutiny and the consolidation of Great Britain's power as the governing authority in India, it was decided by the British Crown to create a new order of knighthood to honour Indian Princes and Chiefs, as well as British officers and administrators who served in India. On 25 June 1861, the following proclamation was issued by the Queen:


    The Queen, being desirous of affording to the Princes, Chiefs and People of the Indian Empire, a public and signal testimony of Her regard, by the Institution of an Order of knighthood, whereby Her resolution to take upon Herself the Government of the Territories in India may be commemorated, and by which Her Majesty may be enabled to reward conspicuous merit and loyalty, has been graciously pleased, by Letters Patent under the Great Seal of the United Kingdom of Great Britain and Ireland, to institute, erect, constitute, and create, an Order of Knighthood, to be known by, and have for ever hereafter, the name, style, and designation, of "The Most Exalted Order of the Star of India"[1]

    शाहू १८९४ साली २० वर्षाचे होई पर्यंत सर स्टुर्ट फ्रेझर यांच्या - एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होता कोल्हापूर जिल्हा गाझेटीयर बरीच ऐतिहासिक माहिती सांगते

    ती आपण अवश्य वाचावी

    शाहू राजांच्या आधीपासूनच हे राज्य खालसा राज्य होते - त्यात नवीन काय सांगायचे ?

    १८५७ च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिकांना कोल्हापूरच्या गादीकडून कसा दगा फटका झाला आणि जनरल जाकोब ने कशी दडपशाही केली आणि चिमाजी रावांचे काय झाले ते सगळे वाचावयास मिळते - राजवाड्याबाहेर कशी स्वातंत्र्य सैनिकांची कत्तल झाली आणि राजवाड्याच्या सैनिकांनी कसे वर्तन केले ते वाचताना फारच क्लेश होतात !



    On the 1st of October 1812, a treaty was concluded by which the Raja ceded to the British the harbour of Malvan and its dependencies, engaged to abstain from sea raids and wrecking, renounced his claim to the districts of Chikodi and Manoli, and further agreed not to attack any foreign State without the consent of the British Government, to whom all disputes were to be referred In return for these concessions the British renounced all their claims against the Raja, who received the British guarantee for all the territories remaining in his possession "against the aggression of all foreign powers and States." Kolhapur, in short, became a protected State under the British Government.



    योगायोगाचा भाग म्हणजे १ ऑक्टोबर १८१२ ते ३ ऑक्टोबर २०१३ - साधारणपणे २०० वर्षापूर्वीची घटना या घाटगेला एका निनावी माणसापुढे सिद्ध करावी लागत आहे !

    प्रोटेक्टेड स्टेट - संरक्षित संस्थान याप्रकाराला मीतरी स्वतंत्र अनभिषिक्त सम्राट म्हणणार नाही - शाहू हे इंग्रजांचे अंकित राजे होते आणि त्यांच्या आधीच्या राजानी १८५७ च्या स्वातंत्र्य सैनिकांना तोंडघाशी पाडले असेच आपले सरकारी ग्याझेटीयर सांगते !


    ReplyDelete
    Replies
    1. बामणा, घाटगे नाव वापरून महाराजांची थट्टा करतोस की काय? याचे फळ तुला भोगावे लागणार हे एकदम पक्के!

      Delete
    2. @समीर घाटगे,

      बिघडलास की काय? नाही नाही तू असे लिहिणार नाहीस हे ठाऊक आहे मला. ब्राह्मणी विचार तुझ्या नावावर खपविले जात आहेत, हे मात्र नक्की!

      Delete
    3. आर. एस. एस. चा खोटा, भडकाऊ, समाज विघातक इतिहास!

      Delete
    4. घाटगे सर जाऊ द्यात. काय आहे की सगळ्या जातींचा एक इतिहास आहे. म्हणजे तो तोंडी आहे आणि लेखी नाहीये. सगळ्या भारत वर्षात सगळ्या समाजात हीच अवस्था आहे. तोंडी इतिहास हां प्रचंड सुख देतो किंवा जखम चिघळत ठेवतो. तो एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे अलगद सोपवला जातो. मग तो खरा असो वा खोटा असो. खोटा असेल असे विचार करायची सवयच नाही. महाभारत काय आणि रामायण आणि बाकीच्या गोष्टी काय सगळीकडे प्रश्न विचारायची सोयच नाही. मग तुम्ही पुराव्याने काहीतरी वेगळे साबित केले की लोकांना ते पटतच नाही. कारण असे कधी कोणी पटवून घेतलेले आणि चुकीचे दुरुस्त केलेले माहितींच नाही. मग लोक तुम्हाला असे बोल लावणारच. सोनवणी सरांचे लेख मी आधीपासून वाचले. एक गोष्ट दिसते की ते चुकीला चूक म्हणता आहेत मग त्यांना पण सगळ्या झुंडीने त्रास द्यायला सुरवात केली. हाच प्रकार ब्राह्मण त्याच्या ज्ञातीत करतात. इथे असे झाले आहे की आमच्या विरुद्ध कोणीच बोलायचे नाही आह्मी सांगू तेच खरे. प्रश्न विचारायचे नाहीत. कारण उत्तरे मिळाली तर ती फार त्रासदायक असतील आणि ते कोणालाच मान्य होणार नाही. मग काय करायचे तर अजून अजून आपल्या जातीला चिकटून राहायचे. बामन थोडी हुशार. काळाप्रमाणे पाठ फिरवून ते बदल रिचवता आहेत पण बाकीचे आत्ता कुठे लिहू लागले आहेत. चुका समजावून घेवून त्यावर विचार करून सुधारायला प्रचंड वेळ लागणार आहे. अजूनही १९७० सालातील दलित साहित्यातला द्वेष तसाच आहे. उलट आता तो सगळ्या जातीत पोहोचला आहे. पण नुसता द्वेष करून काहीच मिळत नाही हे कळत असेल पण वळत नाहीये मग सोप्पा मार्ग काय तर सरळ हातात दगड घेणे ठेचणे. पण ते करता येत नाहीये मग इंटरनेट वर भडकावू लिहिणे कारण आपल्या मागे नक्की किती लोक आहेत हे गुलदस्त्यातच आहे. आणि ज्यांच्या जीवावर म्हणजे काका पुतण्याच्या जीवावर चालले आहे ते कधी टांग मारतील ह्याचा नेम नाही. त्यामुळे सोडून द्या. तुका म्हणे ठेविले अनंते तैसेची राहावे

      Delete
  96. @SANGRAMSINHA GHATGE

    सोंग घेतले पण ते प्राणावर बेतले

    एका लांडग्याने मेंढ्याचे कातडे पांघरून मेंढ्यांच्या कळपात प्रवेश मिळविला आणि इतर मेंढ्यांबरोबर तो मेंढवाड्यात जाऊन बसला. रात्र पडताच "आता आपण एकदोन मेंढ्यांना मारून खाऊ व तृप्त पोटी परत रानात जाऊ,' असा तो विचार करू लागला. तेवढ्यात त्या मेंढ्यांच्या मालकाच्या घरी पाहुणे आले. साहजिकच पाहुण्यांना चमचमीत मेजवानी देता यावी म्हणून तो धनगर मालक मेंढवाडयात गेला आणि मेंढयाचे कातडे पांघरलेल्या लांडग्यालाच मस्त मेंढा समजून त्याने त्याच्या मानेवरून सुरा फिरविला.
    तात्पर्य : साळसूदपणाचा आव आणून जे दुसऱ्यांचा जीव घेऊ पहातात, ते स्वत:च प्राणास मुकतात.

    ReplyDelete
  97. नुसत्या धमक्या

    आणि त्या कशा साठी ?,

    तर सरकारी ग्याझेट काय सांगते ते लिहिले म्हणून !

    काय सावळा गोंधळ आहे !

    आत्ता शाहू राजर्षी असते तर ते पण हेच म्हणाले असते की पोरानो दंगा करू नका -


    "आपल्याच लोकांना परक ठरवून कशापायी डोक फिरल्या सारख वागताय -

    सगळ जग आपल्याला दुधखुळ म्हणेल अशाने ! जे काय लिहील आहे ते खरे आहे - इतक कशापायी ताप् करून राहिलाय ??

    ते घाटगे काका - त्यांनापण काय वेडबिद्र उगीचच पिसाळल्या सारख ?

    इतका राग असेल तर सीमेवर जाउन मर्दानगी दाखवा की रे माझ्या बहाद्दरानो

    दुसरे उद्योग नाहीत का ,

    एखाद्या देवाच्या नावाने सोडलेल्या वळू सारखे हुंदाडताय -आमची थोडी तरी इज्जत ठेवा -"

    काय म्हणाल तुम्ही ?

    चार अक्षर वाचा - तुम्हालाच उपयोग होईल -काका पुतण्यान बोलावलं तर !

    आता आमच्या पुण्याईवर किती पिढ्या जगणार - - ?

    शेत विकून झाली , जमिनी फुकून झाल्या - पुण्या मुंबईला जाण्यात अर्थ नाही - तिथे भगव्याचा धंदा जोरात आहे !- पोरानो , सुधारा - नाहीतर वडापावची गाडी चालवायची वेळ येईल - ती बामनाची पोर आणि पोरी बघा -कुठ पोचल्या ते - किती दिवस हेटाई करणार त्यांची -

    त्यानिकाय पोट भरतय का ?किती दगा फटका करून राहिलंय हा पंधरा बगळा !

    ब्राह्मण द्वेषान पोट भारत असेल तर खुश्शाल चालू द्या -पण तास नसत राजे - सुधारा !"

    राजार्शीच सांगतील असे - मग काय कराल पोट्ट्यानो ?

    आपलाच नाण खोट असं म्हणायची वेळ आणू नका !

    विजय घोरपडे

    ReplyDelete
  98. अनानिमास ६ ऑक्टोबर २०१३- ९. ५७ ए एम

    अगदीच बावळट दिसतेय

    बामणा, घाटगे नाव वापरून महाराजांची थट्टा करतोस की काय? याचे फळ तुला भोगावे लागणार हे एकदम पक्के!

    कोण आहे तरी कोण ही बया ?


    अगदीच वेडी ग बाई तू - तू काय वाकड करणार ग ?आम्ही ९६ कुळी खानदानी ! ऐक आता !

    एकतर त्या घाटगे सराला "ब्राह्मण" म्हणवून आपला यडपट पणा जगजाहीर करते आहेस


    तुझा कोणी नाही का ग दादला ? रस्त्यावरचीच का ग तू ?


    आम्ही बघ कसे खानदानी ! ९६ कुळी - उद्या आमच्यापण घरच्यांना बामन म्हणवून शिव्या घालशील !तुला न आगा ना पिछा !

    आमच ९६ कुळी खानदानी रक्त आहे !

    आमच्या पण घराण्यात भवानी मातेनी दिलेली तलवार आहे !

    आम्हालापण गोऱ्या राज्यात तनखा होता - आम्हाला दिमतीला चांदीची बग्गी होती - आर्डारली होता दारात -चार मानस मुदपाकखान्यात राबायची - ह्यांच्या अंगाला रोज मालीशवाला येउन मालिश करायचा

    गुडगुडी आणि हुक्का कायम असायचा !

    आता सध्या जरा वाईट दिवस आले आहेत -हल्ली लढाया पण होत नाहीत पूर्वीसारख्या !

    नुसती लांबून गोळ्या घालतात - आमच्या धाली आणि तलवारी आम्ही दसरा आला की काढतो - पूर्वी आम्ही वेशीपर्यंत जायचो मिरवत , पण हल्ली लोक हसतात !म्हणून छोटी पुठ्ठ्याची दहाल तलवार खिशातून घेऊन जातो आणि ग्राम पंचायतीच्या आफिस पासून टच करून येतो मारुतीच्या देवळाला !- करावाच लागतंय - ९६ कुळीना आंम्ही !

    महिन्याला ५० किलो साखर येते कारखान्यातून आणि ५० खांबे रम मिळते अस्सल !



    आमच्या बाप जाद्यांनी नुसत्याच मिशा वाढवल्या !

    घोड्यावर बसून अटकेपार जायच्या ऐवजी रेस कोर्स वरच्या घोड्याना कुरवाळत बसले - चौफुल्यावर बंगला बांधून तिथेच रहात होते - तरी आम्ही ९६ कुळी !


    आहेत तिलापण दोन पोर !- एकाच नाव उदयसिंह आणि दुसऱ्याच प्रतापसिंह -

    तिचापण मान राखतो आम्ही ! बाईल नाचवण आमच्याच धन्याला फक्त शोभून दिसतंय की !

    त्यापायी तिकडची वाडी विकावी लागली नदी पलिकडची - पण आम्ही पडलो ९६ कुळी !

    आता दिवस पालटणार असं म्हणतात कधीकधी आमचे मालक !

    पहिल्या सारखं होणार म्हणतात - त्यांनी केलाय काहीतरी - बकर कापली चार परवा - त्या महागाईच्या नावानी आणि बोकड सोडला त्या बामनांचा नायनाट होऊ दे म्हणून ! फार त्रास देतात -सगळीकडे हेच पहिले !म्हणे हेच हुशार - काय करायचं त्या हुशारीला चाटून - आहे का बग्गी त्यांना म्हणाव तुमच्याकडे ? - आता थोडीशी चाक ढिली झाली आहेत आणि चांदीपण कुणीतरी - म्हणजे आमच्या धाकट्या दिरानीच काढून घेतली आणि विकली - काहीतरी बाळंट आल होत ते मिटवायला - त्या बाइला आडमीट केली होती पोटुशी झाली त्या वेळेस ,

    आमच्या मालकांनी शब्द दिला कारण आम्ही ९६ कुळी !

    हे सगळ या ब्राह्मणाना समजत नाही - त्याना फक्त पुस्तक वाचून सर्तीफिकिट मिळवत बसता येत - ह्या कटकटी त्याना नाहीत - फक्त आम्हालाच ! कारण आम्ही ९६ कुळी !

    ReplyDelete
    Replies
    1. @pallavi sarode

      "कोण आहे तरी कोण ही बया ?"

      अग, हि बया नसून तुझा अस्सल दादला आहे, बरं का!

      Delete
  99. श्री. घाटगे, सरोदेबाई, चैतन्यबुवा यांनी छान चर्चा चालविली आहे. चर्चा व्हायलाच हव्यात. प्रश्न पडायलाच हवेत. लोकांना प्रश्न पडूच नयेत, अशी व्यवस्था माझ्याच जातभार्इंनी प्राचीन काळापासून करून ठेवली आहे. पण, आता लोक हुशार झाले आहेत. त्यांना प्रश्न पडायला लागले आहेत. चांगली गोष्ट आहे.

    मला बहुजन समाजातील लोकांचे खरोखरच हसू येते. बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या वर्तमानपत्रांचे सर्व संपादक आणि सर्व कर्मचारी वर्ग बामन होता. टिळकांनी राजकारण केले, तेव्हा त्यांच्या दुस-या फळीतील सर्वच नेते बामनच होते. टिळकांनी आयुष्यभर आमच्याच जातीच्या लोकांच्या हिताचे राजकारण केले. तरीही त्यांना तुम्ही लोक भटमान्य न म्हणता, लोकमान्य म्हणता.

    आता बोला. यावर काही खुलासा आहे का तुमच्याकडे? असल्यास येथे कळवावा.

    ReplyDelete
    Replies
    1. एक नंबर. हाच प्रश्न मला हल्ली पडला आहे. आह्मी तर देशस्थ येता जाता आमचे मित्र आह्माला बेशिस्त म्हणून जातात. आपण फारसे मनावर घेत नाही. पण हल्ली राहून राहून प्रश्न पडतो की नक्की काय झालेय सगळीकडे. प्रत्येक जातीत कोण ना कोण महापुरुष आहे आणि तोच कसा मोठा ह्याची चढाओढ. खरे तर आंबेडकर प्रचंड बुद्धिमान होते हे आपले बामन मान्य करत नाही. म्हणा त्यासाठी लंडन स्कूल ऑफ ईकोनोमिक्सला एकदा अर्ज करून बघितला पाहिजेल त्याशिवाय कळत नाही त्यांची उंची काय होती ती. इथे नुसतीच टिमकी जगवायची अमका लै भारी आणि तमका फार हुशार. हीच पद्धत सगळीकडे अंगिकारली गेली आहे. आता ज्यांना मुळातच काही करता येत नाहीत ते डिग्र्या विकत घेवून पी.एच.डी झाले आणि वर प्राचार्य काय आणि शिक्षक काय बनले. कोणालाही असे वाटत नाही की दर्जा टिकवावा कारण ज्यांचे अनुकरण केले ते ब्राह्मण लोकही तसेच. बोलायचे कोणी? तिथे लगेच आमची ५००० हजार वर्षांची परंपरा अडवी येते. साधे सोपे सरळ ज्याला अक्कल आहे त्याला पुढे जायला मार्ग मिळाला पाहिजेल पण ते होणार नाही कारण सध्याच्या राजकारण्यांना ते परवडणार नाही. कारण लोक त्यांना फेकून देतील. टिळक तर आता फक्त एकाच समाजाचे राहिले आहेत. हीच अवस्था जवळपास सगळ्या महापुरुषांची होते आहे. पण फिकीर कोणाला आहे. तेवढे पुढे पाहायची इच्छाच नाहीये आणि दुर्दैवाने आपल्या नेते मंडळींकडे तेवढी दृष्टी पण नाही. इंग्लंड काय आणि अमेरिका काय त्यांच्या शाळात आणि कोलेजात फी प्रचंड असते पण शिक्षक आणि विद्यार्थी त्याच तळमळीने शिकतात. इथे आपण ब्राह्मण लोकांनी आधी कोणाला शिकवले नाही आणि आता बाकीचे वचपा काढता आहेत. पण वचपा काढताना आपले पण नुकसान होते आहे ह्याची त्यांना पर्वा कुठे आहे. प्रश्न तोच आहे की सध्याचे काय करायचे त्याचे उत्तर कोणाकडेच नाहीये.

      Delete
  100. चैतन्य साहेब

    आपणास वाचनाची आवड असल्यास आपण " शिवरात्र " हे नरहर कुरुंदकर यांचे

    वैचारिक लेख असलेले पुस्तक अवश्य वाचा हि विनंती

    देशमुख आणि कंपनी - किमत २०० रु , त्यातील पहिल्या भागातले सर्व लेख वाचण्यासारखे आहेत

    गोळवलकर गुरुजी यांच्यावर २ लेख आहेत आणि ३ रा गांधीहत्या आबी मी या पुस्तकाचे परीक्षण करणारा लेख आहे

    ReplyDelete
  101. श्री चैतन्य सर ,

    कै कुरुंदकर हे आमची प्रेरणा आहेत

    आम्ही हे लेख वाचले आहेत

    याच पुस्तकातील भाग ३ हा मुसलमान समस्या हाताळणारा असून फारच सुंदर आहे

    असे लेख लिहिणारे फारच कमी होत आहेत

    स्वतः की कुरुंदकर सर हे उत्तम टीकाकार होते ,लेखक होते आणि त्यांचा अंतही भाषण देतानाच झाला ,त्यांच्यावर राष्ट्र सेवा दल आणि समाजवाद याची छाप होती पण ते अभ्यासू असल्यामुळे

    ते स्वतः चिंतन करून स्वतंत्र लिहित आणि बोलत असत

    त्याची आठवण केल्या बद्दल आप्पा बाप्पा यांना धन्यवाद !

    ReplyDelete
  102. आचार्य कुरुंदकर म्हणजे स्वतंत्र आणि परखड चिंतन. between the line म्हणजे काय, हे कुरुंदकरांचे ग्रंथ वाचून कळते.
    महनीय कुरुंदकरांना या निमित्ताने विनम्र अभिवादन.

    ReplyDelete
  103. धन्यवाद अप्पा-बाप्पा आणि ओंकार. कुरुन्द्कारांचे काही लेख वाचले आहेत आणि एस्नीपवर त्यांचे भाषण पण होते पण सध्या त्या साईट वर येत नाही. असो पण वरील पुस्तक जरूर वाचीन. त्यानिमित्ताने चांगले काहीतरी गवसले. धन्यवाद पुनश्च.

    ReplyDelete
  104. ।। आसारामायण ।।

    -रवींद्र तहकिक , मुख्य संपादक अपाविमं

    ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या ।
    करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।।
    लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू ।
    सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
    कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची ।
    गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।।
    रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
    प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। .
    अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे ।
    तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
    पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी ।
    पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
    अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी ।
    कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
    कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
    कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
    नाचताना मोर । दिसे मन विभोर ।
    मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
    तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे ।
    गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।।
    गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले ।
    हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
    तेलही गेले ।तूपही गेले ।
    धुपाटणे हाती आले । भोसडीच्या ।।१२।।
    खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
    बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
    साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
    घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
    वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा ।
    पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
    सांगती महिला मुली । तुझी कसाब करणी ।
    रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
    कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात ।
    कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।।
    भर सभेत नाचतो । पोरी कवेत आवळतो ।
    रासलीला सांगतो । अवचीन्द्या ।।१८।।
    नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
    आता नाकाने कांदे । सोलू नको ।।१९।।
    पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा ।
    बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।

    ('अपाविमं'वरून साभार )

    ReplyDelete
  105. सुंदरच !

    अशीच एखादी रचना आपण भगवान श्रीकृष्णावर हरकत आहे ?

    तोसुद्धा बायकांचे कपडे पळवत असे आणि चावातपणे त्यांच्या असे !

    गोपीपण चालू होत्या का ?का फक्त श्रीकृष्णच चालू होता ?


    तुम्ही हिंदू धर्म सोडणार होतात त्याचे पुढे काय झाले हो रवींद्र काका ?

    तुम्ही सुंता करून घ्या !

    किंवा चमन गोटा आणि बुद्धं शरणं करत हिंडा - मस्तच !

    या आसारामाला मात्र भर चौकात उलटे टांगून त्याला प्रत्येकाने एक चप्पल पाहिजे !

    इतका घाणेरडा माणूस ( ? ) जिवंतच कशाला ठेवायचा - न्याय देण्यात दिरंगाई कस्झाला - आणि त्याचे वकीलपत्र जेथ मालानी सारखे बिनडोक भ ज प वाले घेणार असतील तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे -

    आम्हीच सुरवात करतो !

    ReplyDelete
  106. प्रो तहकिक साहेब -

    अनेक नमस्कार -

    आसाराम हा अत्यंत नीच माणूस आहे त्याला दुसऱ्या कुणीही काहीही न्याय देण्यापूर्वी आपण सर्व बांधवानी एक राष्ट्रपतीकडे अर्ज करुया -

    त्याला काहीच न करता नुसते तुरुंगात ठेवा - कोणतीही शिक्षा नको - कोंडून ठेवले तरी तो मादक पदार्थ न मिळाल्याने गडबडा लोळून मरेल !अशा लोकाना असेच मारले पाहिजे म्हणजे त्यांचा खरा चेहरा आपोआप जगासमोर येईल !


    एका पिंजऱ्यात त्याला भर चौकात उभा करा - काहीही खायला देऊ नका - हजारो लोकांच्या श्रद्धा पायदळी तुडवणाऱ्या म्हाताऱ्याला आणि त्याच्या मुलाला आणि निवडक भक्ताना असेच मारले पाहिजे !

    जितका आसाराम दोषी

    तितकेच हे भक्तही दोषी -

    हे एक प्रचंड वर्तुळ आहे - त्यात अनेक घाणेरडे उद्योग चालत असणार ! आसाराम हा मुळचा पाकिस्तानात जन्माला आलेला सिंधी ! त्याला ठेचून मारा - आणि त्याच्या भक्तानापण ठेचून मारा - हा काहीतरी देवाच्या आणि भक्तीच्या नावावर वेगळाच धंदा चालवत होता - हे भक्त असे बिनडोक कसे ?


    आपले संत असे कधी वागले होते का ?

    तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माउली ,संत नामदेव ,एकनाथ ?


    ,दामाजीने तर आपली कोठारे गरीबाना मोकळी केली दुष्काळात आणि यांनी लाखो लिटर पाणी दुष्काळात धुळवडीला उडवले - हा कसला संत ?

    याला जोड्याने मारा - इतर वेळी तोंडाला डांबर फासणारे राजकीय पक्ष आता गप्प का ?

    भा ज प गप्प का ?- हा पक्ष तर एक ढोंगी पक्ष आहे !

    कोन्ग्रेस गप्प का ?- हा संधिसाधू पक्ष आहे

    समाजवादी गप्प का ?हा जमीनदारांचा पक्ष झाला आहे !

    तहकिक साहेब आपण गप्प का ?

    आपण पण काका पुतान्याचेच दुकान चालवता का ?

    आपणपण त्यांच्या सारखे ढोंगी, संधिसाधू आणि जमीनदारांचे चमचे आहात का ?

    आपण धर्म बदलणार होतात त्याचे काय झाले ?

    हा हिंदू धर्म अशाच अनेक आसारामानी खराब केला आहे !

    आपण हिंदू धर्म स्वच्छ तरी करा नाहीतर सोडून तरी जा !

    आम्ही सर्वांच्या वतीने या नीच व्यक्तीचा निषेध करतो - समाजानेच त्याला शिक्षा करावी

    न्यायदेवता अजून २० - ३०- वर्षे नुसतीच चर्चा करतील !- अशा गुन्ह्यांना न्याय देण्याला वेळेचे बंधान घाला अशी आपण मागणी करुया

    छत्रपतींनी काय केले असते हो प्रो तहकिक - जरा सांगाल का ?

    ReplyDelete
  107. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे द्या

    ता. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अज्ञात मारेकर्यांनी निर्घृण खून केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनभावना लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार आणि सर्व षड्यंत्र समाजासमोर आणण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना काहीच सुगावा लागलेला नाही.
    आरोपी हे परराज्यातील आहेत आणि हा खून सुपारी देवून झालेला आहे एवढाच निष्कर्ष पोलीस काढू शकले आहेत. काही लोकांना वाटतं कि पोलिसांना वेळ द्यायला पाहिजे. परंतु किती ? दीड महिन्यात पोलिसांना आरोपी कोण आहेत हे माहित होत नसेल तर पोलीस यंत्रणेचे ते अपयश आहे हे मान्य करायला हवे. आर. आर. आबांनीही पोलिसांबद्दल फाजील विश्वास बाळगू नये. जर पोलीस अपयशी ठरत असतील तर या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा अशी पुरोगामी कार्यकर्त्यांची मागणी आहे. केवळ पुणे पोलिसांची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ तपास यंत्रणांकडे दिला जात नाही कि काय अशी शंका येण्यास वाव आहे. फक्त आश्वासने देवून प्रश्न सुटणार नाही हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणात गांभीर्याने विचार करावा. कॉंग्रेस-राष्ट्रवादी दाभोलकरांच्या हत्येचे राजकीय भांडवल करत असल्याचीही शंका वाटते. २०१४ च्या निवडणुकीसाठी या प्रकरणाचा फायदा उठवण्याचा या पक्षांचा विचार आहे का अशीही शंका सामान्य माणसाच्या मनात येत आहे.

    ReplyDelete
  108. अम्बाबाई चा उदो उदो !

    किती कोलांट्या उद्या झाल्या - अंगावर शेकायाला लागलं की

    दाभोळकर आणि इतर विषयाचा आसरा घ्यायचा - आणि मधून मधून ब्राह्मणाना छळायच

    असले पोरकट उद्योग करत कुणी आपले विचार सिद्ध करत नाही मूळ विषय लोकाना जाणून घ्यायचा आहे - तिथे अनानिमास लंगडा पडला - पूर्ण धुव्वा !

    शाहू महाराज हे मांडलीकच होते इंग्रजांचे !


    अनोनिमसचा धुव्वा झाला !

    शेवटी टीव टीव बंद झाली - किती वेळा प्रचारकी बोलत बसणार ?

    आडातच नाही तर पोहऱ्यात काय येणार ?

    सागर बेंडके

    गुड्डू निम्हण

    भिवा

    ReplyDelete
  109. अभिनंदन !

    आज महालक्ष्मी अम्बाबाई च्या कृपेने अनानिमास नावाच्या कुलुंगडी आगांतुकाचा चा धुव्वा झाला विनाकारण ब्राह्मणा लोकाना छळणाऱ्या आणि ९६ कुळी लोकांची बाजू उचलून धरल्याचा आव आणत सर्व मराठी समाजात फूट पाडणाऱ्या अनानिमास ची फजिती झाली आणि

    संग्रामसिंह घाटगे यांचे खास अभिनंदन !

    त्यांनी अत्यंत संयम राखत विषय हाताळला - त्यांना धन्यवाद !

    या ब्लोग्चा आब राखला ! ग्रेट ! !

    ReplyDelete
  110. मूळ विषय भरकटत गेला आणि शाहू महाराज मांडलिक होते का नाही यावर येउन अडकला -


    तरीही सत्याचा अभ्यास करून सर्वांसमोर अभ्यासपूर्ण विवेचन ठेवत संग्राम सिंह घाटगे यांनी अजिबात न घाबरता आणि

    प्रखर विखारी टीकेला सामोरे जात जे विचार संयमाने मांडले त्याचे कौतुक केले पाहिजे आज अशाच अभ्यासपूर्ण मांडणीची गरज आहे -


    अनानिमास चा भ्याडपणा आणि अतिरेकी मांडणीचा पराभव झाला असेच काहीसे चित्र दिसत आहे -

    सारांश - संथपणे पुरावे मांडून आपले सिद्ध करता येते -

    नुसत्या पोकळ गाव् गप्पांना या ब्लोगवर महत्व नाही !

    ReplyDelete
  111. @ AMRUTA VISHVARUP,

    मांडलिक हा शब्द राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात लिहिलेल्या एकाही पुस्तकात सापडला नाही. नुकताच "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" नाहीतर काय?

    स्पष्टच सांगा ना! पुरावे देवू शकणार नाही, मात्र आमचेच म्हणणे खरे मानले पाहिजे. झकास शक्कल! फक्त इथून ऐकले, तिथून ऐकले होय ना! ऐकीव माहितीवर आधारित, खरे कि नाही?

    पुरावे फक्त ब्राह्मनांचेच चालतील, बाकीच्या ऐऱ्या-गैऱ्यांचे नाही.

    मांडलिक असतील तुझे बाबा, आई, आजोबा, आजी , तुझे सारे खानदान................

    "प्रोटेक्टेड स्टेट" म्हटल्याने कोणी मांडलिक ठरत नाही!

    उगीच जिंकल्यासारखा आव आणि नकोस.

    पुरावे सापडत नाहीत म्हणून काहीतरी बकवास पुरावे दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तेही पुरावे बुळगे आहेत, हे सांगणे न लगे!

    ReplyDelete
    Replies
    1. अरे बाप्पा ! मांडलिक प्रश्न हा चांगलाच चर्चेचा ठरलाय रे बाबा ,

      पण अजून एका मुद्द्याचे का बोलत नाहीस रे ?

      अरे आप्पा -१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापुरच्या राजांनी स्वातंत्र्य सैनिकांवर हल्ला करून त्यांची कत्तल केली हा उल्लेख आपण डोळेझाक करून वेगळा ठेवतोय - त्याचे काय ?



      -बाप्पा -आणि तो स्वतः घाटगे सांगतो आहे की

      राजर्षी शाहूंचे राज्य हे प्रोटेक्टेड स्टेट होते - तिथे ब्राह्मणी विचारांचा प्रश्नच कुठे आला ?

      एखाद्या ९६ कुळी माणसाने भगवद्गीता तोंडपाठ केली तर त्याला तुम्ही ब्राह्मणाची औलाद म्हणणार का ?का त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणार ?



      आप्पा -१८५७ च्या समरात कोल्हापूर हे मांडलिक राजा प्रमाणेच वागले आणि आपल्या देशाच्या सैनिकाना त्यांनी ठार मारले - - हि कोणती देशभक्ती -

      माझी आपणास एक विनंती -

      बाप्पा -आपण इतरांच्या आया बहिणींबद्दल बोलण्यापेक्षा कोल्हापूर ग्याझेटीयर का वाचत नाही -मी सांगतो -रा रा घाटगे साहेबांनी सांगितलेले सर्व त्यात

      "सरकारी मजकूर "म्हणून आहे ! -

      बाप्पा -आप्पा आणि एक लक्षात घ्या - आम्ही काही राजर्षी शाहूंचे वैरी नाही -

      आम्हाला प्रचंड आदर आहे त्यांच्या बद्दल - पण आपण ज्या अर्थी दुसऱ्या लोकांच्या आजी आजोबा पर्यंत पोचत आहात त्या अर्थी आपले भान सुटले आहे - आपल्याला सगळीकडे ब्राह्मण द्वेषामुळे कावीळ झाल्या सारखे ९६ कुळी पण ब्राह्मण वाटू लागले आहेत -

      आप्पा -एखाद्याविषयी आदर असावा - पण आपण इतिहासाचा अर्थ समजावून घेणे पण आवश्यक आहे !

      बाप्पा -संरक्षित राज्य असे मराठीत भाषांतर आहे ना ?- त्याचा अर्थ असा की काही ठराविक अटींवर या राजाचे आणि राज्याचे इतर राज्यांपासून इंग्रजांनी संरक्षण करायचे !

      आणि त्या मोबदल्यात इंग्रजाना मांडलिक राजाने काही सुविधा द्यायच्या - असा करार सर्वच संस्थानांनी केलेला होता तसाच तो कोल्हापूरच्या संस्थानाने केला ! - म्हणजे काय ?- ते इंग्रजांचे मांडलिक झाले -

      आप्पा -पाचवा जॉर्ज आणि किंग एडवर्ड यांच्या वेळेस दरबारात सर्व राजाना इंग्रजाना सलाम करावा लागत होता -

      बाप्पा -मुंबई बंदरावर किंग एडवर्ड -गेट वे ऑफ इंडिया ला उतरला - त्यावेळचे फोटो आणि टाईम्स मध्ये माहिती आपण वाचावी - आजच्या कोणत्याही माणसाला शरम वाटेल अशी ती माहिती आहे !

      आप्पा - या अनानिमास्ला पुरावा म्हनाजेव काय हवे आहे ?

      बाप्पा - सगळे जग इंग्रजांचे झाले होते - त्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता - अशा वेळी भारतात सार्वभौम राजा कसा असेल ?

      गमतीचा भाग - अफगाणिस्थान मात्र त्यांनी कधीच जिंकले नाही - पूर्णपणे - त्यात पण तडजोड करून त्याना शांत केले !

      पण आपले सर्व राजे आणि महाराजे पद भूषवणारे हे म्हणजे खरे सम्राट नसून नात सम्राट होते

      आप्पा -आजकाल लहान मुले जसे खोटे शिक्के लाऊन हिंडतात तसेच हे मांडलिक राजे इंग्रजांनी वाटलेले बिल्ले कौतुकाने मिरवत असत -

      म. गांधींचा साधेपणा कुठे आणि यांची बेगडी राज्ये कुठेत -

      एक उघडाबंब म्हातारा - त्याने या सत्तेला हलवून सोडले - आणि ते परस्पर ज्या वेळेस गेले त्यावेळेस - " आपले कसे होणार " म्हणून हे बिल्लेवाले रडत बसले !

      त्यांचे तनखे इंदिरा गांधीनी बंद करे पर्यंत हे निर्लज्ज राजे असा फुकटचा तनखा खात होते !

      कोल्हापुरच्या र्राजानी का स्वातंत्र्य मिळाल्यावर आपला तनखा सरकारी तीजोरीत जमा करावा असे सांगितले नाही ?वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांनी यांच्या मुसक्या बांधल्या !-

      भारत सरकारशी लढण्याचे सामर्थ्य नाही म्हणून , मिळेल त्या तनख्यावर हे भारत सरकारचे अंकित झाले !

      जोधपुर जयपूर कोल्हापूर ,अवध,हैद्राबाद असे शेकडो राजे किताब असलेले मंडलिक तिथे सलाम करायला जमले होते - !

      आपण मुळातच कमी वाचता आणि जास्त बोलता -लिहिता असे वाटते !

      आपण आपला अभ्यास वाढवा - म्हणजे आपला राग शांत होईल

      आपण माझ्या आई वडिलाना नावे ठेवलीत किंवा इतरांच्या आई वडिलाना नावे ठेवलीत तर तो आपला मूर्खपणा आहे हे कुणीही सुशिक्षित ठरवू शकेल - त्यामुळे माझा अपमान होत नाही तर तो तुमच्या घराच्या संस्कारांचा अपमान ठरतो !आपण सभ्यपणा सोडणार नाही अशी आशा आहे !खरेतर श्री संजय सोनावणे अशा गोष्टीना प्रतिबंध करतील असे वाटत होते - चर्चा जास्तीत जास्त निरोगी वातावरणात झाली पाहिजे -

      आपणास काही मानसिक आजार नाही ना ?

      Delete
    2. "एखाद्या ९६ कुळी माणसाने भगवद्गीता तोंडपाठ केली तर त्याला तुम्ही ब्राह्मणाची औलाद म्हणणार का ?का त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणार ?"

      भगवतगीता हि काही ब्राह्मणांची मिरासदारी नाही, ती एका क्षत्रियाने (श्रीकृष्णाने) सांगितली होती हे सुद्धा आप्पा-बाप्पाला माहित नाही आणि हेच इतरांच्या वाचनाची तसेच अभ्यासाच्या गोष्टी करतात, विनोद अजून कशाला म्हणतात बरे?


      छ. राजर्षी शाहूंवर कितीही चीकलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी काहीही उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा! हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे! तुमची थुंकी शेवटी तुमच्याच तोंडावर पडणार आहे, हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे!

      मांडलिकत्व संदर्भातील घाणेरडे विचार फक्त सडक्या ब्राह्मणी डोक्यातूनच येऊ शकतात. हेच खरे!


      यांचे डोके कामातून गेलेले असताना इतरांच्या "मानसिक आजाराच्या " गोष्टी करणे? म्हणजे स्वतःचीच मानसिक दिवाळखोरीच प्रदर्शित करणे नव्हे काय?

      तुम्ही महाराजांना खुशाल मांडलिक-मांडलिक म्हणत बसा, होय अगदी मरे पर्यंत, त्याचा काहीही उपयोग होणार नाही!

      नमस्कार, अगदी कोपरापासून.

      धन्यवाद.

      Delete
  112. 'इंग्रजांनी डावपेच टाकून जगभर सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. भारतासारखा मोठा देश

    चालवायला तैनाती कारकुनांच्या फौजाच तयार केल्या. देशातील संस्थानिक हुकुमात राहावेत,

    यासाठी प्रयत्न केले; मात्र शाहू महाराजांनी ब्रिटिशांशी चांगले संबंध ठेवून, त्याचा उपयोग

    सामाजिक सुधारणांसाठी केला. इंग्रजांची देशावर सार्वभौम सत्ता असताना, महाराजांनी केलेले

    कार्य अतुलनीय आहे.


    -आनंद जोग.

    ReplyDelete
    Replies
    1. 'काळाच्या मर्यादा लक्षात न घेता इतिहासाचे केलेले मूल्यमापन चुकीचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज तत्कालीन परिस्थितीने व इतिहासाने घातलेली मर्यादा होती. त्याही परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य मैलाचा दगड ठरले आहे.''

      Delete
  113. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कौशल्याने सामाजिक परिवर्तनाचा वारसा महाराष्ट्राला दिला.

    ब्रिटिश सत्तेविरोधी गनिमी काव्याचा वापर करीत समाज परिवर्तनासाठी कृतिशीलता दाखवली;

    मात्र त्या थोर राजाचे कोल्हापूर आता त्यांचे राहिलेले नाही.


    -आनंद जोग.

    ReplyDelete
  114. संजय सोनावणे याला प्रकट निवेदन

    अरे संजय तू काय करतो आहेस रे ?

    आपल्या इथे अत्यंत निंदनीय लिखाण लिहिले जात आहे

    आपले लक्ष आहे का नाही ??

    कुणीतरी आपले लक्ष नाही याचा फायदा घेऊन

    अनेक जण राजर्षी शाहू यांच्या बद्दल मते मांडत आहेत

    त्यांना मंडलिक म्हणाल्यावर इतक्या नाकाला मिरच्या झोम्बायाचे काय कारण ??

    ते किंवा त्यांचे वडील इंग्रजांचे अंकित होते का ?

    असे मुद्दे चर्चेत आले आहेत

    परंतु सत्य काय आहे हे मांडण्याचा चांगला प्रयत्न कुणी केला - घाटगे किंवा विश्वरूप किंवा ओंकार - तर त्यांना धुडकावून अत्यंत न शोभणारी भाषा वापरली जाते - याचा आपण निषेध कराल असे वाटले होते -

    पण

    आपण गप्प बसल्यामुळे अशा शक्तींना जोर चढतो असे वाटते

    कदाचित आपली अडचण असेल -

    ते तर त्याहूनही लाजिरवाणे आहे - कारण घाटगे यांनी अत्यंत अभ्यास करून मत मांडले आहे -

    आपण काय करणार ? गप्प बसणार का ?

    सध्या आपले हात दगडाखाली आहेत ! साहाजिक आहे - आपण तेरी भी चूप मेरीभी चूप असेच वागणार !

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous October 13, 2013 at 3:48 AM

      दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!

      एकदा एका भटजीला शेजारच्या गावात सावकाराच्या घरी मेजवानीचे आमंत्रण होते. त्या गावाला जात असताना वाटेत काही झाडे होती. त्यात एक जांभळाचे झाड होते. झाडावरून टपोरी जांभळे वाऱ्याने खाली पडली होती. भटजीने ती पाहिली. भूक लागली असूनही ती खाल्ली नाहीत. त्या जांभळाकडे तुच्छतेने पहात म्हणाला.... "ही जांभळे खाल्ली तर माझी भूकमोड होईल व पंचपक्वान्नाचे जेवण जाणार नाही. पंचपक्वान्नापुढे या जांभळांची काय किंमत!'असे म्हणून भटजी पुढे गेला. तितक्यात जोराचा पाऊस सुरू झाला. वाटेत नदी होती. नदीला पूर आला होता. भटजीला नदी ओलांडता आली नाही. बिचारा मेजवानीला मुकला. तेथूनच परत फिरला. वाटेत जांभळाचे झाड दिसले. जाताना टवटवीत ताजी असलेली जांभळे आता चिखलात माखली होती. ज्या जांभळांना नावे ठेवली, तीच आता भटजीला खायला मिळाली नाहीत. मेजवानीही नाही आणि जांभळेही नाहीत अशी भटजीची गत झाली.

      तात्पर्य : दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणतात हेच खरे!

      Delete
  115. "एखाद्या ९६ कुळी माणसाने भगवद्गीता तोंडपाठ केली तर त्याला तुम्ही ब्राह्मणाची औलाद म्हणणार का ?का त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणार ?"

    भगवतगीता हि काही ब्राह्मणांची मिरासदारी नाही, ती एका क्षत्रियाने (श्रीकृष्णाने) सांगितली होती हे सुद्धा आप्पा-बाप्पाला माहित नाही आणि हेच इतरांच्या वाचनाची तसेच अभ्यासाच्या गोष्टी करतात, विनोद अजून कशाला म्हणतात बरे?


    छ. राजर्षी शाहूंवर कितीही चीकलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी काहीही उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा! हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे! तुमची थुंकी शेवटी तुमच्याच तोंडावर पडणार आहे, हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे!

    मांडलिकत्व संदर्भातील घाणेरडे विचार फक्त सडक्या ब्राह्मणी डोक्यातूनच येऊ शकतात. हेच खरे!


    यांचे डोके कामातून गेलेले असताना इतरांच्या "मानसिक आजाराच्या " गोष्टी करणे? म्हणजे स्वतःचीच मानसिक दिवाळखोरीच प्रदर्शित करणे नव्हे काय?

    तुम्ही महाराजांना खुशाल मांडलिक-मांडलिक म्हणत बसा, होय अगदी मरे पर्यंत, त्याचा काहीही उपयोग होणार नाही!

    नमस्कार, अगदी कोपरापासून.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  116. सर्व अनानिमास लोकाना ,

    ब्राह्मणाना शिव्या देणे हे आपले जीवन कर्तव्य दिसते आहे

    आपणास देव कधीना कधी चांगला मार्ग दाखवो !

    आनंदी जोग

    नर्मदा जोग

    अपर्णा जोग

    ReplyDelete
  117. ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

    शिवश्री प्रदीप इंगोले

    महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

    असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनांना माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाचं विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असतं. गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली, ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत. राज ठाकरेने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिलच्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे, ती इंदू मिलची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का? असा सवाल करून आपला आणि “कोहिनूर”वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.

    जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनांनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणाऱ्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉम्बेतील दंगली आणि देशातील बॉम्बस्फोट हे परप्रांतीयांमुळेच झाले असा जावई शोध लावला. उदया ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच परप्रांतीयांचा हात आहे एवढी परप्रांतीय द्वेषाची लागण यांना झाली आहे.

    ReplyDelete
  118. सर्व अनानिमास लोकाना ,

    आनंदी जोग आणि इतरांचे अभिनंदन !

    आपणास दसऱ्याच्या - विजया दशमीच्या शुभ कामना !


    चांदोबा मासिकातल्या सारख्या गोष्टी सांगत जाऊ नका -

    तुमच्या सारखेच आमचेपण मत आहे - शाहू महाराज थोर आहेतच - फक्त ते मांडलिक होते किंवा

    अजून सोपे म्हणजे - इंग्रजांचे अंकित होते - म्हणूनच त्यांनी किंवा समस्त राज घराण्याने इंग्रजांनी दिलेली बिरुदे मिरवली -

    राजा शिव छत्रपतींनी असे नाही केले -

    औरंगजेबाने दिलेली बिरुदे त्यांनी मिरवली नाहीत

    बरोबर का चूक ?

    आणि कृपा करून कुणाच्याही आई आजीला बदनाम करून आपला पुरुषी उद्धात्पाना साजरा करू नका !

    आज दसर्याला अजून काही चांगले करता आले असते आपल्याला !

    स्त्रीयांना मान देणे हे शिवाजींनी आपल्याला शिकवले -

    अशीच असती आई अमुची सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपति !

    आता बोंब मारा कि हे गाणे पण शिवाजीचा अपमान करणारे आहे - शिवाजीला कुरूप ठरवणारे आहे !

    धन्य आहे तुमच्या विकृतीची !

    देव आपल्याला लवकर माणसात घेऊन येऊ दे !

    सुशीला माने

    चित्र सरवटे

    नेत्रा साठे कलावती पिल्ले/ मनोरमाखाडे /भावना केदार

    ReplyDelete
    Replies
    1. अहो, शिवाजी राजे किंवा माता जिजाबाई हे कुरूप होते, असे नव्हे तर परस्त्रीचा आदर करताना कल्याणाच्या सुभेदाराच्या (मुस्लीम) सौदर्यवती सुनेला उद्देशून छ. शिवाजी असे बोलले होते. त्यांनी तिला अत्यंत सन्मानाने वागविले; तिची क्षमा मागितली आणि सुरक्षितपणे परत पाठवून दिले. आबाजी सोनदेव या नवनिर्वाचित सुभेदार भटावर महाराज नाराज होऊन पुढे असे न करण्याबद्दल ताकीद दिली. शिवाजीला भ्रष्टाचारी व व्यभिचारी बनवून स्वार्थ साधण्याचा आबाजी सोनादेवाचा डाव फसला.

      Delete
  119. CONTD............

    ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

    काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे. हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामे द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा. असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुतल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबांचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना, हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचे समर्थन करतो, मग म.फ.हुसेन ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते? कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.

    असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाही, ह्यांच्यात सृजनशीलता नाही, ह्यांना आमचीच खास शैली लागते. अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबईच्या रस्त्यावर नागडा करून मारला असता. पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको. तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिमारायांना दुखावण्याचं महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो..

    जय जिजाऊ.. जय शिवराय..

    ReplyDelete
  120. आत्ताच नवीन माहिती कळली. थोडक्यात फक्त भारतातच चातुर्वार्नियता नव्हती असे दिसते. खालचा भाग 'A BOOK OF FIVE RINGS' ह्या पुस्तकातला आहे. जिज्ञासू लोकांनी हे उत्तम पुस्तक जरूर वाचावे.

    The Tokugawa period marks a great change in the social history of Japan. The
    Bureaucracy of the Tokugawas was all-pervading. Not only were education, law,
    government and class controlled, but even the costume and behavior of each class. The
    traditional class consciousness of Japan hardened into a rigid class structure. There were
    basically four classes of person: samurai, farmers, artisans and merchants. The samurai
    were the highest―in esteem if not in wealth―and included the lords, senior government
    officials, warriors, and minor officials and foot soldiers. Next in the hierarchy came the
    farmers, not because they were well thought of but because they provided the essential
    rice crops. Their lot was a rather unhappy one, as they were forced to give most of their
    crops to the lords and were not allowed to leave their farms. Then came the artisans and
    craftsmen, and last of all the merchants, who, though looked down upon, eventually rose
    to prominence because of the vast wealth they accumulated. Few people were outside
    this rigid hierarchy.

    ReplyDelete
  121. अहो तेच तर आम्ही कंठशोष करून सांगतोय की

    हे गाणे ब्राह्मणाने रचलेले आहे अशी कल्पना करा - तर

    हे अनानिमास लगेच म्हणतील की ,

    असे काव्य रचण्याचा ब्राह्मणांचा उद्देश शिवाजीची थोरवी सांगणे नसून शिवाजी कुरूप होता अशी हेटाई करणे हा ब्राह्मणांचा डाव आहे !

    अशी हि ब्राह्मण द्वेषाची कावीळ आहे त्याना झालेली !

    त्याना घाटगे हा पण "९६ कुळी ब्राह्मण" वाटतो म्हणजे बघा ! हद्द झाली की नाही ?

    चैतन्य किंवा आप्पा बाप्पा यानातर त्यांनी टारगेटच केले आहे !

    म्हणजे ते जो आरडा ओरडा करतात की

    "या घाटग्याला आम्ही म्हणू तेच खरे असे करण्याची सवय आहे"

    - त्याच्या अगदी उलट - यालाच आपलेच खरे करण्याची - आपले घोडे पुढे दामटण्याची सवय दिसते आहे !

    घाटगे सरांच्या आसपासही जाण्याची यांची लायकी नाही हे परत परत सिद्ध करण्यातच यांची शक्ती खर्च होते आहे आणि परत वर दाम्बाजीपण आहेच - शाहू महाराजाना असे बोलणार्या लोकाना आम्ही सोडणार नाही वगैरे !


    पण याना काळे कुत्रे सुद्धा घाबरत नाही - आम्हा स्त्रियानासुद्धा यांच्या वागण्याची आणि बोलण्याची शरम वाटते !थोर लोकांच्या वरची श्रद्धा सुद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो ! -

    दुसऱ्यांना धमक्या देणे म्हणजे आपले खरे झाले असे नाही - असे पोकळ धमक्या देणारे

    लाइतच्या खांबांवर पाय वाकडे करणार्या कुत्र्यासारखे असतात - या लोचाताना काय आणि कशाला घाबरायचे ?



    सुशीला माने

    चित्र सरवटे

    नेत्रा साठे कलावती पिल्ले/ मनोरमाखाडे /भावना केदार

    ReplyDelete
    Replies
    1. बस करा आता बायकांच्या नावाने लिहिणे!

      Delete
  122. संजय सर ,

    आपण पण कमाल करताय !

    आम्हा स्त्रियांनाच आता यात उडी मारावी लागत आहे !

    शाहू महाराजाना कुणीही काहीही बोलेल ,पण त्या मागचा ऐतिहासिक विचार बघा ना ! पुरावे बघा !

    घाटगे सरांनी अगदी हवे तितके आणि हवे तसे पुरावे दिले आहेत !

    तरीही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच !

    आम्हा सर्वांची आता खात्री झाली आहे की

    कुण्या एके काळी कोल्हापूर संस्थान हे स्वातंत्र्य समरातील लोकांच्या विरुद्ध वागले आणि त्यानंतर ते तडजोड करत इंग्रजांच्या अंकित असलेले राज्य झाले - एक बुजगावणे !

    याबद्दल आम्हा सर्वांची अगदी पूर्ण खात्री झाली आहे - शाहू आणि त्यांच्या आधीचे राजे हे इंग्रजांच्या अंकित होते - आणि स्वराज्य मिळाल्यावर त्यांना मिळणारा तनखा त्यांनी भारत सरकारच्या आधीन केला नाही - इंदिरा गांधीनी तो बंद केला !

    आणि आपण संजय सर गप्प कसे ?

    सौ .अरुणा सांगवीकर

    सौ .विजया बोधे / कविता काळे /

    श्रेया लवांदे/सुमित्रा अरगडे/स्वाती भोमे /

    ReplyDelete
    Replies
    1. भ्रमिष्ट खोट्या बायका !

      Delete
  123. अरे महाराष्ट्र भूषणा ! अनानिमस !!

    चल तुला एक गम्मत सांगतो !

    इंग्रजांनी शाहू महाराजाना अंकित राजाचा दर्जा दिला - त्यामुळे त्याना आणि अनेक इतर संस्थानाना जयपूर,जोधपुर,अवध,हैद्राबाद अशा अनेक तथाकथित राजे लोकाना त्यांचा ब्रिटीश महाराजा आला साता समुद्राकडून - कि त्याला मुजरा करायला झक मारत गेट वे ऑफ इंडिया ला जावे लागत असे -

    कधीकधी दिल्ली दरबार भरला कि तिथे जावे लागत असे - त्यात चूक करून चालत नसे - तो या अंकित राजांचा बहुमान होता म्हणे -

    आपली भारतीय मान आणि मुगुट -खाली करून एडवर्ड आणि पंचम जॉर्ज चा मान ठेवावा लागे - आपली नजर खाली - मान खाली - म्हणजे मला सांग - हा कुठला राजा -?ज्याला दुसऱ्या राजापुढे झुकावे लागते ?असे हे भारतातील राजे होते - इंग्रजांनी जिंकलेले - !

    मला एकच गोष्ट सांग -

    असे कधी झाले आहे का इतिहासात -की कोल्हापुरला किंवा जोधपूरला ,हैद्राबादला , इंग्लंडचा सम्राट खाली मान घालून मुजरा करत उभा राहिला ?- नाही ! का - कारण तो सार्वभौम होता - आणि आपले राजे अंकित - त्याचेच मांडलिक !

    आता अजून काय करायचे ?

    सातारा ग्याझेटीयर वाच , कोल्हापूर ग्याझेटीयर वाच - तुला इंग्रजी येते का ?- नसेल तर आत्ताच्या राजाला जाउन भेट आणि तो शुद्धीत असेल त्या वेळेस त्याला विचार - हि सर्व माहिती ! बघ काय म्हणतो ते !

    आत्ता पर्यंत भारतातले सगळे राजे स्वतःला सार्वभौमच समजत आले आहेत - अनेकांनी अश्वमेध यज्ञ केला आहे -त्या काळात ते चालून गेले - पण इंग्रज आले नि सगळा गोंधळ संपला - एक राजा आणि बाकी प्रजा - इंग्रज गेले - म गांधी म्हणाले खादी वापरा - अरे अनानिमस तू खादी वापरतो का ?

    म.गांधी म्हणाले की १९४७ नंतर कोन्ग्रेस ची देशाला राजकीय पक्ष म्हणून गरज नाही - कॉंग्रेसने सामाजिक संस्था म्हणून काम करावे - सत्ता टाळावी - पण आज काय झाले आहे ?

    आजच्या पतंगराव कदम आणि नवले कराड यांच्या धंद्याला म गांधीनी आशीर्वाद दिला असता का ? - सर्व समाज आज कीड लागून कुरतडला गेला आहे - स्वतः शाहू महाराज असते तरी त्यांनी तुमच्या सारख्यांचे कान पिळले असते असला मूर्खपणा चालवल्याबद्दल !


    अजून शहाणे व्हा !वेळ गेलेली नाही - एखाद्या भाडोत्री माणसा सारखे तेच तेच प्रचारी बोलू नका - आम्हाला पण आता तुमची कीव येत आहे - अरेरे ! बिचारा अनानिमस !

    घाटगे सराना अभिवादन !


    अमृता पाटील /सुवर्णा मोरे /मोक्षा वांद्रेकर/सौ . निघोजकर /रेखा जोशी

    ReplyDelete
    Replies
    1. ENJOY FALSE WOMEN!!!!!!!!!!!!!

      Delete
    2. संग्रामसिंह घाटगे म्हणजे "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ"

      Delete
    3. संग्रामसिंह घाटगेचे भंकस पुरावे सर्वथा अमान्य!

      तथाकथित खोट्या बायकांनो, तुम्ही ते पुरावे खुशाल चघळत बसा!

      छ. शाहू महाराजांना बदनाम करणाऱ्या लोकांना कोल्हापुरात बोलावून त्यांची गाढवावरून धिंड काढावी लागेल!

      Delete
  124. कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा पुत्र शिवाजी १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास (संभाजीस) कोल्हापूरच्या गादीवर बसविले (१७१४). हा संभाजी मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी लढाई झाली (१७३०) व तीत संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला (एप्रिल १७३१) व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरून काही वर्षेतरी गृहकलह थांबला. छ. संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली. पेशव्यांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरचे राज्य इंग्राजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर (१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षि ⇨शाहू महाराज (कार. १८८४-१९२२). त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यांमुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि संगीतकला जोपासली गेली, तीही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात सातारचे प्रतापसिंह आणि कोल्हापूरचे शाहू यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करावा लागतो.

    ReplyDelete
  125. ब्राह्मण्यविरहीत ब्राह्मण बना! उगीच बहुजनांना आणि त्यांच्या महानायकांना खलनायक ठरवण्याचा आगलावी प्रयत्न करू नका!

    ReplyDelete
  126. 'काळाच्या मर्यादा लक्षात न घेता इतिहासाचे केलेले मूल्यमापन चुकीचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज तत्कालीन परिस्थितीने व इतिहासाने घातलेली मर्यादा होती. त्याही परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य मैलाचा दगड ठरले आहे.''

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...