Wednesday, July 23, 2014

कवट्या महांकाळ....


"सहदेव भाडळी" हे तांत्रिक पुस्तक आमच्या लहाणपणी फारच लोकप्रिय होते. त्यासोबत अशी अनेक तंत्र-मंत्रांची पुस्तके सर्क्युलेट व्हायची. मी मिळेल ती पुस्तके वाचत असे त्यात हीसुद्धा. त्यात काही प्रयोगशील असेल तर प्रयोगही करत बसायचो. म्हणजे कार्व्हरचे पुस्तक वाचले तर शेगदाण्यांपासून दूध बनवायचाही प्रयोग केला...त्याचा चहा करायला लावून तोंड वाकडेही करून घेतले. असो. आता या पुस्तकांचा पगडा बसला आणि तांत्रिक साधना करून अद्भूत शक्तींना वश करायचे मनावर घेतले.

मी तेंव्हा सातवीत होतो. मला तेंव्हा मित्र असे नव्हतेच. मी एकटा माझ्याच स्वप्नरंजनांत भटकत असे. त्यामुळे सारा परिसर पायतळी अनेकदा तुडवलेला. कोठे काय हे सगळे पाठ. साधनेला साधनं लागतातच. पहिली हवी होती ती माणसाची कवटी. ती तर हवीच. वरुड्याच्या शिवेजवळ एक जुनाट मसनवटा होता. दुर्लक्षित, झुडपांनी व्यापलेला...केवळ विशिष्ट आकारांच्या उंचवट्यांमुळे तेथे कधी काळी माणसं गाडली आहेत हे लक्षात यायचं. आता एखादं थडगं उकरणं भाग होतं. लोकांनी पाहिलं तर दगडं फेकून मारलं असतं. गांवाकडे सहा-सातनंतर सुमसाम व्हायची. वीज नव्हतीच. त्यामुळे रात्र म्हणजे काय सुम्म रात्रच. मी दिवस मावळल्यानंतरची वेळ ठरवली. एके दिवशी दिवसाच जावून कोणतं थडगं उकरायला सोपं जाईल याचा अदमास घ्यायचा प्रयत्न केला. जुनाट असल्याने वरची माती जाम घट्ट झालेली, त्यावर गवत उगवलेले..काहींना तर झुडपांनीच अदृष्य करुन टाकलेलं. आता थडगं किती खोल असतं हे मला काय बोडक्याचं माहित? पण एक निवडलं...आणि त्याच संध्याकाळी कपचीदार दगडानं उकराउकरी चालू केली.

प्रार्थना एकच होती जी बाजू उकरतोय ती डोक्याकडचीच निघू दे. कारण दगडानं उकरणं एवढं सोपं जात नव्हतं. अंधार वाढू लागला तसा सारी झुडपंही मला भुतांगत दिसायला लागली. पण म्हटलं...तुम्हाला लेको वश करून नाचवणार आहे...भेदर्लो असलो तरी बरच उकरलं...पण अजुन काय गवसेना...

बरंच खोदावं लागणर हे पुन्हा सकाळी जाउन पाहिल्यावर लक्षात आले. थोडी उकराउकर करत अंदाज घ्यायचा प्रयत्नही केला. पुन्हा अंधार पडायला लागल्यावर तिकडं.

तीन दिवसानंतर बराच खाली गेलो. त्याच्या दुस-या दिवशी मग दिवसाच उद्योग केला. थोड्या प्रयत्नांतच मी खजिन्याजवळ पोचलो. चक्क मान वळवलेली, मणक्यापासून सुटी झालेली कवटी दात विचकत पहुडलेली. वर उचलली. मातीचे ओघळ तोंडातून डोळ्यांतुन बदाबदा पडले. भराभरा जमेल तशी माती पुन्हा लोटली. जवळच एक छॊटा ओढा होता. निरगुडीच्या दाटीत लपवली. जागा लांबून दहा वेळा तरी पाहिली असेल...कारण तिला हलवायचे म्हणजे रात्रीच ते काम करावे लागणार होते. जागा विसरून चालणार नव्हतं.

आनंदाच्या लाटांवर स्वार मी घरी आलो. (शाळेत मी क्वचित जायचो.) त्या दिवशीची कामे केली. सायंकाळी परत तिकडे. कोणी नाही हे पाहून कवटीचा ताबा घेतला. माळ ओलांडला आणि ओढ्याला माळाईच्या डोहाजवळ आलो. तीच माझ्या साधनेची जागा असनार होती. त्या डोहाकाठी एक शमीचं वाळकुटलेलं खुजं जुनाट झाड झाड होतं. त्याखालीच माळाईचा शेंदरी तांदळा. मी झाडावरच्या दुबेळक्यातल्या फातलेल्या जागेत कवटी घुसवली. खाली उतरलो. कोणाला दिसनार नाही ना याचा अदमास घेतला. परतलो ते मध्यरात्री परत येण्यासाठीच.

आम्ही तेंव्हा जिजाबाच्या वड्यात रहायचो. म्हणजे चार बाय दहाची खोली होती. स्वयंपाकासाठी आणि जरुरी सामान ठेवण्यापुरती ती कामाची. बाकी आम्ही ओसरीत नाहीतर खालच्या अंगणात झोपायचो. सारे लवकर झोपी जात त्यामुळे सटकणे हे काही अवजड काम नव्हतेच.

अनावर उत्सुकतेने मी साधनेचे तंत्र पुन्हापुन्हा आठवत होतो. मंत्र तर पाठ कधीच झालेले. आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त झाल्यावर काय काय करायचे याचे स्वप्नरंजन. सारे झोपलेत याची खात्री करत करत बराच वेळ गेला मग निघालो.

रात्र कितीही झाली तरी  चांदण्याचा धुसर प्रकाश असतोच. खेड्यातल्या माणसाला तो पुरतो. मी माळ ओलांडला. शमीवरची कवटी ताब्यात घेतली. छती धडधडत होती हे खरे. पण आलो डोहाच्या काठावर. ब-यापैकी पानी होते. (आजही असते. हा डोह मी "...आणि पानिपत" मद्ध्ये एक पात्रच बनवून टाकला आहे. या डोहाशी माझ्या अनेक रमणीय आणि तेवढ्याच दु:खद आठवणी निगडित आहेत.)

शर्ट व चड्डी काढली. नागडा झालो. कवटी घेऊन पाण्यात उतरलो. छातीपर्यंत पाण्यात आलो. कवटी दोन्ही हातात घेतली. हात उंचावले. "ऒम -हीं क्लीं स्त्रीं..." पासुन पुनश्चरणे सुरू झाली. हळु हळु भिती गेली. मंत्र मी मोठ्यानेच म्हणत होतो. तेथे ऐकायला येणार तरी कोण होते म्हणा...

भुतांशिवाय?

किती वेळ गेला हे माहित नाही. पुस्तकातील वाक्य आठवत होतो...साधकाने संयम ठेवला पाहिजे...निष्ठेने वाट पहावी लागते वगैरे. माझ्यात सम्यमच संयम दाटून भरला असल्याने मला घाई नव्हती. पण मी भुतांना वश करणार होतो हे नक्की...

अनेक दिवस असेच गेले. काही खाडेही झाले. भूत काही दिसलं नाही मग वश काय होणार?

अजून काही दिवस गेले आणि मी कवटी डोहात फेकून दिली.

नवे प्रयोग समोर दिसायला लागले होते ना....!

108 comments:

  1. आसाराम बापूंच्या आश्रमात गेला असतात तर भरपूर सोय झाली असती !
    त्याच्या बद्दल सारे कसे शांत शांत अशी का अवस्था झाली आहे - मोदींचा त्याना पाठींबा तर नाही ना अशी शंका येते !

    ReplyDelete
  2. आपल्या संत तुकारामांचे खुनी सापडणे अवघड होते का ?
    अजिबात नाही सर्व सामान्य लोकानाही त्या खुन्यांची नावे माहित होती
    आणि संत तुकाराम जर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते , तर त्यांच्या खुनाची बातमी दरबारात पोचलीच असणार !
    दप्तरी त्याची नोंद असणार ,महाराजांनी कदाचित दुखवटा पाळला असणार !
    जरी देहूच्या नतद्रष्ट ब्राह्मणांनी त्याना सांगितले असेल की तुकोबा सदेह वैकुंठाला गेले तरी त्यांनी मानले असेल ?
    नक्कीच नाही ,
    मग त्यांनी आपल्या हेर खात्याला खरा खुनी मुसक्या बांधून आपल्या समोर उभे करायला का सांगितले नाही ?त्यामुळेच असे वाटते की शिवाजी आणि तुकाराम यांचा काहीही संबंध नव्हता - तसेच रामदास आणि शिवाजी यांचा सुद्धा काहीही संबंध नव्हता
    मला हा शिवाजी तुकाराम यांच्यातल्या नात्याचा गुंता आणि शिवाजीने तुकोबांच्या खुनाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष याबद्दल कुणी सांगेल का ?एखादी ओवी , एखादे फर्मान , एखादा अभंग ?
    कारण आतातरी सगळे जरतारी भाषेतच आहे - त्या बोलण्याला काहीच पुरावा नाही
    पृथ्वीराज घोरपडे

    ReplyDelete
    Replies
    1. पृथ्वीराज घोरपडे,

      संत तुकारामांचा खून झाला तेंव्हा शिवरायांचे वय केवळ सोळा वर्षांचे होते. अजून स्वराज्य स्थापन झालेले नव्हते, मग कुठला दरबार आणि कुठले हेर आणि कुठल्या मुसक्या?

      सारंग दवे.

      Delete
    2. संजय सर ,
      खरे तर किती सोपे आहे समजावून घेणे इतिहास स्पष्ट सांगतो की आपले छत्रपती आणि संत तुकाराम यांचा कागदोपत्री कुठेही आचार विचारांची देवान घेवाण झाल्याचा उल्लेख नाही - कुठेही पत्रे खलिते , यातून उपदेश किंवा गुरुमंत्र झालेला दिसत नाही ,
      तरीही महाराजांचे गुरु म्हणून तुकाराम महाराजांना का लोकप्रिय करण्याची घाई झालेली दिसते ?
      एकही अभंग तशा स्वरूपाचा दिसत नाही !
      रामदास भाक्तांकादुनही अशीच चूक केली जाते
      स्वतः महाराजांचा पिंड असा सल्ले घेणारा होता का ?
      प्रभात कंपनीने जी अनेक मिथ्थके तयार केली आहेत त्यापैकी हे एक आहे
      तुकोबांच्या झोळीत स्वराज्य टाकणे , त्यांच्या घरी दागिने पाठवणे आणि सर्वत्र कीर्तनात शिवाजी दिसणे अशा चित्रणाने या कथा घराघरातून लोकप्रिय झाल्या आहेत त्याला ऐतिहासिक आधार काहीही नाही छत्रपतीना अशी कीर्तन काल्याची आवडही नव्हती आणि त्यांच्या समाज्कारनचा तो पायाही नव्हता !आजच्या काळातल्या राजकारणाच्या गरजा लक्षात घेत असा समाज पसरवणे हे खरेतर आजच्या लोकप्रिय इतिहासकारांना शोभत नाही !
      जितक्या तत्परतेने दादोजी हे शिवाजीचे राजकीय गुरु नव्हते असा खुलासा करत ते शिल्प हटवण्यात आले तसेच याबाबत शक्ती भक्ती शिल्पाबाबत खुलासा होईल का ?
      आज मुख्यमंत्री पंढरपूरची पूजा वाजत गाजत करतात , महाराज कधी अशा पुजन गेल्याचे ऐकिवात नाही - असे का ? तुळजा भवानी ची पूजा ते करत असत त्याला रूपकात्मक एक फार थोर किंमत आहे , तसा प्रकार विठ्ठल भक्ती बाबत महाराजांकडून घडलेला दिसत नाही !
      त्यामुळेच तुकाराम आणि त्यांची हत्या याबाबत महाराजांनी काहीच दाखल घेतलेली दिसत नाही हे स्पष्ट होते , कारण वैष्णव भक्ती त्यांच्या आमदानीत लोकप्रिय होती का ?- याचा मनमोकळा खुलासा संजय सोनवणी यांनी अभ्यास करून करावा आणि हे एक प्रकारचे तुकाराम शिवाजी गुरु शिष्याचे भूत याच ब्लोग वर झटकून टाकावे असे वाटते
      संजय सर हे आपण कराल का ?

      Delete
    3. फारच विचार करायला लावणारे प्रत्युत्तर आहे
      छान !संजय सोनवणी यांनी उत्तर दिले तर अजूनच चर्चेची खोली वाढेल आणि कक्षा रूंदावतील !

      Delete
  3. 1. From time immemorial, people have spoken about ghosts irrespective of cultures, what do you think about this?
    The subject of ghost is very popular amongst all age groups of men, women, boys and girls. It is interesting to note that this is the only subject (of course, besides cricket!) on which every Indian has something to say and narrate gory scenes as though the narrator was present all the time. In fact if you probe into depth, one will confess that he/she never experienced but only overheard the incident from somewhere, sometime!
    Surprisingly the experience shared is more or less same throughout the world; in all cultures, sects and religions. What we know is that there is a death of a person; either by accident, or heart attack or due to old age. After death the soul departs from the body. The soul of a pious person goes to heaven and that of sinner goes to hell. But some souls which are not so virtuous and not so sinful (and they have a few wishes to fulfill) remain suspended in between hell and heaven. These unsatisfied souls are named as ghosts. They stay in derelict houses, secluded forts, in isolated forests or on some peepal tree. Like any human being they too have feasts on full moon day or on new moon day but they eat only during night. They too have preference in their food habits; some want chicken, some prefer mutton, some choose lemon, some like butter, some desire vegetarian food depending upon from which culture/religion/caste the ghosts are originated.
    Every one of us believes that almost all ghosts runaway if they hear prayer or God’s name (Raamnaam). All of them are without face. They have eyes on their chest. They do not have shadows. They cannot see their image in the mirror. Their feet are turned 180 degrees opposite. All of us are hundred percent sure of these facts and we (except skeptics) do not have an iota of doubt about these facts.

    2. Do you think ghosts exist?
    Like any living species on the earth there is no species as ghosts. But ghosts are there in our minds. For convenience sake we can assume there are two types of ghosts conjured by our minds; one type is borne out of delusion and other one due to mental/psychological disorder. The delusion may be out of fraudulent intention or due to cultural pressure or suggestive behavior or may be due sensual fantasies. Either of these or combination of them creates an image of the ‘ghost’ in our minds.
    Frauds convince innocent public the existence of ghosts to fulfill their vested interests. Cultural pressure creates the ghost since we have been brought up into that atmosphere listening to hundreds of incidents of ghost presence in and around us right form our childhood. This makes us to blindly believe them without questioning their reality. Human beings are prone to suggestions. The whole advertisement industry is surviving because of this weakness of the human population. Our behavioral pattern changes based on suggestions. No wonder if some say convincingly that ghosts are there we immediately jump on it and believe in ghosts. We generally obtain knowledge through our sense organs. But sometimes we imagine things: even though there is a rope on the way we feel that there is a snake. This kind of sensual hallucination makes us to believe in nonexistent ghosts. The belief in ghosts may be due the some mental disorder like psychosis. Without any external influence one is convinced that there are ghosts due to malfunctioning of the brain.

    contd............

    ReplyDelete
    Replies
    1. 3. People talk about paranormal activities. Many swear that they have seen ghosts, do you believe in this?
      Imagine awakening in the dead of night to hear padding footsteps in your bedroom. You have a sense of a malevolent presence in the room, and you may hear breathing. Even more frightening, you find yourself paralysed, unable to move a muscle. The footsteps seem to approach you, then you feel someone or something touching your body. Light fingertip pressure moves over your chest, abdomen, and other parts of your body. You are still motionless, except for your breathing. Try as you might you cannot open your eyes or move your limbs. You may experience a strange sensation of levitation. Then all goes blank. You awaken a little later, able to move normally. The room is silent and dark. This strange phenomenon is due to a neurological condition called sleep paralysis. Sleep paralysis is a very real phenomenon and may help to explain various paranormal experiences like belief in existence of ghosts, UFOs, abduction by Martians etc.

      Delete
  4. 4. There are many things on earth we do not know about, could we say the same about ghosts?
    There may be a few unexplained natural phenomena in the world but definitely not the belief in ghosts. The scientists working in this filed conclude that there is something in the peoples’ mind that need to be studied about ‘are there ghosts or are there not’. There are in depth studies in psychology, human behavior, neurology, brain functioning etc and the latest scientific research points out that ghosts are in our mind and not out in the field.

    5. Is it true that if one dies in an accident, the soul of dead person wanders since it has unfulfilled and becomes a ghost?
    The concept of the soul appears to have originated in the Middle Palaeolithic era, possibly as an attempt by early humans to explain the nature of dreams and the difference between life and death. The idea, modified by the passage of time, has persisted down to the present because many people find this belief comforting as it can mitigate the fear of death.
    However, with the advent of modern science we have discovered that life is wholly explicable in terms of natural physical processes, and that there is no need to postulate an immaterial vital force in order to account for physiological phenomena. Furthermore, we now know that all forms of life, including human beings, have arisen as a result of evolutionary processes, and it seems unlikely that this natural process could produce a supernatural entity such as the soul.
    I think that it is a reasonable probability that we are entirely natural creatures without any supernatural component to our beings.
    The basis for the existence of ghosts, whether the person died of accident or otherwise, is a soul, which itself is imaginary hypothesis refutes the assumption that soul/ghost wanders to fulfill the wishes.

    contd...........

    ReplyDelete
  5. 6. People talk about seeing fairies and angels what do you think?
    People not only believe in ghosts but also believe in fairies and angels. When you start believing in heaven you have natural tendency to believe in angels and fairies too. Since there is no heaven, naturally there are neither fairies to share your joy nor angels to bless you.
    The fairies and angels were hot subjects of hot discussion in the 19th century world. In fact Dr Arthur Conan Doyle, the creator of Sherlock Holmes, believed in a photograph of fairies wandering in a garden taken till his friend Houdini, well known magician, exposed the fakeness of photograph. The photographs were taken by two girls with some photographic tricks in it.

    7. People talk about planchette and calling of a ghost, what do you think?
    I remember vividly when my grandmother died and how much I wished that were not the case. I find that idea of ghost is a wonderful thing so that you could still communicate with them. We see the ghosts as a link with the past. It is a strong urge.
    This urge in the loved ones has been cashed by the fraudulent ‘self styled mediums’ who promise to recall the souls of the dead and communicate with you. These mediums believe that they are actually given privilege of ‘after death communication’. The investigation by the skeptics reveals that a big hoax is being played by the involved swindlers to en-cash the grief and feelings of the gullible persons.
    *********************************************************************************************

    ReplyDelete
  6. sanjay sonawani, Apratim !! manla tumhala.

    ReplyDelete
  7. खरे तर कवट्या महांकाळ हा अत्यंत विनोदी विषय सरांनी मांडला आहे , त्यात संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांचा विषय घोरपडे आणि दवे यांना इतका का चर्चा करावासा वाटत आहे ?
    ही गोष्ट इतकी स्वच्छ आहे -
    संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नव्हता - कारण संपूर्ण शिव चरित्रात त्यांचा गुरु शिष्य नात्याने काहीही उल्लेख नाही !
    दोघांचेही कार्य अत्यंत वेगवेगळे होते
    महाराज आई भवानी ला मानत असत , त्यांची वृत्ती समाजमन समजून समाजकारण करण्याची होती का ? म्हणजे आजकालचे मुख्यमंत्री पंढरपूरला पूजा करतात आषाढीला तसे त्यांनी कुठे काही केले का ?४ पावले दिंडी चालले का ? त्यांच्या बोलण्यात लिखाणात कधी ज्ञानेश्वर नामदेव असा उल्लेख तरी आला का ?नाही ! म्हणजेच स्वराज्याच्या वाटचालीत वारकरी संप्रदायाचा उल्लेखही येत नाही हे विचार करायला लावणारे आहे
    आजकाल चालणारे पूजा अर्चा प्रकार त्या वेळेस रूढ झालेले नसावेत असे वाटते
    वारकरी संप्रदायाला खरी लोकप्रियता किंवा राजाश्रय कधी मिळाला ?हे पण अभ्यास करण्या सारखे आहे ! इंग्रजांच्या काळात पालखी आणि आरोग्य यासाठी काय व्यवस्था होती ?तुकाराम यांच्यामुळे शिवकालात भक्तिपंथ वैष्णव रुपात किती रुजला आणि फोफावला , कारण स्वतः महाराज शैव होते हे प्रसिद्धाच आहे !
    शिवकालीन सरकारी खर्चात आळंदी देहू आणि पंढरपूर असे काही दाखले मिळतात का ?
    पेशवेकालीन रुमालात काय सांगितले आहे ?
    इंग्रज आमदानीत एक निरुपद्रवी प्रकार म्हणून वारकरी पंथाला आपोआप सरकारी यंत्रणेकडून जोड मिळत गेली का ?
    यावर अभ्यास होणे अत्यंत आवश्यक दिसते ,
    संजय सर आपण यावर काही प्रकाश टाकाल का ?

    ReplyDelete
  8. श्री सारंग दवे काका -
    माझ्या माहिती प्रमाणे संत तुकाराम इ स १६५० ला आपल्याला सोडून गेले असे मानले जाते - जन्म मात्र १५७७,१६०८,१६१८,१६३९ असे विविध मान्यतेने अभ्यासले जातात
    अबोट जस्टीन यांच्या मृत्युपत्रानुसार महिपालच्या लिखाणाचे इंग्रजी भाषांतर आहे १९३३ सालचे त्यात असे दिसते कि संत तुकाराम यांच्या संत नामदेव स्वप्नात आल्यामुळे त्यानाही ते गुरु मानत होते
    नामदेवे केले स्वप्नामध्ये जागे स्वये पांडुरंगे येवोनिया असा उल्लेख स्वतः तुकोबाच करतात आणि सर्व साधारणपणे आपण तुकोबांचे गुरु
    बाबाजी चैतन्य सांगितले नाम
    मंत्र दिला नाम रामकृष्ण हरी
    असे मानतो - हे दोन्ही उल्लेख तुकोबानीच केले आहेत

    छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू नेते होते ,
    महाराजांनी धार्मिक सुधारणा या विषयावर काहीही काम केलेले दिसत नाही - त्यामुळे धार्मिक आणि राजकीय असा महाराजांचा प्रवास किती होता तेपण जरा जपूनच बोलले पाहिजे
    पुढे १६५० नंतर तब्बल महाराज १६८० - म्हणजे ३० वर्षे होते पण त्यांनी कधीही संत तुकाराम यांच्या विषयी हळहळ व्यक्त केलेली कागदोपत्री दिसत नाही - हे कसे काय ?

    १६५० तुकोबांच्या निर्वाणा समयी नमहाराज २०-२३ वर्षांचे होते त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली - १६४५ ला महाराजांनी तोरणा घेतला त्यावेळेस त्यांचे वय किती असणार - म्हणजे त्यांना समाज कारण आणि राजकारण यांची चांगली जाण होती असे आपण म्हणू शकतो - जर तुकाराम त्यांचे खरोखर गुरु होते असे हल्ली म्हणतात तर त्यांनी त्यांच्या खुनाचा छडा लावायला काहीच हरकत नव्हती इतकेच मला सुचवायचे आहे -
    सांगण्याचा मुद्दा असा आहे की -आजकाल रामदास शिवाजी असे नाते मानायचे नाही म्हणून शिवाजी तुकाराम असे नाते निर्माण करायचा जबरदस्त प्रयत्न दिसतो - संत तुकाराम या
    चित्रपटा शिवाय त्याला काहीही आधार दिसत नाही - कोणतेही ऐतिहासिक पत्र , लिखाण , फतवा असे काहीही बघण्यात नाही - जर काही असेल तर जरूर त्याचा तज्ञांनी उल्लेख समाजासमोर मांडावा !- आणि हेही तितकेच खरे आहे की रामदास आणि शिवाजी यांचा काहीही संबंध नसावा असे वाटते - आपण याचा अभ्यास करून आपले मत मंडाल हि अपेक्षा आहे , विचारांचे आदान प्रदान होणे हे कधीही निरोगीच असते

    ReplyDelete
  9. अरे सारंग , तुला खूप डोळे उघडे ठेवून बघायला शिकले पाहिजे
    आज काय चालले आहे - तू असतोस आपल्या कामात व्यग्र ,तुम्ही आय टी ची मुल म्हणजे एक घाव दोन तुकडे !पण हा समाज विचित्र आहे - एक लक्षात ठेव हे जातीचे द्वेषाचे भूत आपल्या समाजात खोलवर रुजले आहे - या लोकांना आता घाई झाली आहे - तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजीचे गुरु होते हे सिद्ध करायचे खूळ आत्ताचे नाही - पूर्वी पासून हा प्रकार चालू आहे . दादोजी चा पुतळा हलवला आणि यांना अजून जोर आला -
    हा ब्राह्मणद्वेष सातारकराना फार प्यारा आहे -

    साधी गोष्ट आहे - शिवाजीला या फंदात पडायला वेळ होता का ?
    आणि तो कुणाला गुरु मानायच्या मानसिकतेचा होता का ?
    मला माहित नाही की सौराष्ट्रात शिकायला होतास म्हणतोस , पण सुरत शिवाजीने का लुटली ?राज्यासाठी ! देश कल्याणासाठी !
    वारकरी लोक त्याचे समर्थन करतील का ?
    कमरेचे सोडून दुसऱ्याला द्यावे असे यांचे सिद्धांत !
    थोडक्यात म्हणजे - महाराजांचे तत्वज्ञान आणि वारकरी यांचा अजिबात मेळ बसत नाही -
    थोडेफार जुळले तर रामदास आणि शिवाजीचेच जुळते !त्यांची पत्रे पण आहेत - पण तो भाग वेगळा - त्यातूनच हे राजकारण चालू झाले आहे - मराठा राजा आणि त्याचा गुरु ब्राह्मण ? छे - अजिबात असे दिसता कामा नये !गागाभट्ट चालेल - लोकांसाठी त्याला जवळ करावाच लागतो - पण रामदास नको -दादोजी नंतर आता रामदास टार्गेट ! बोहल्यावरून पळालेला !
    मग गुरु कोण ? एव्हढा थोर राजा - आणि त्याला गुरु नाही ? आता अनेक स्कॉलर लोक पण असे रेडीमेड साहित्य उपलब्ध करून देतात शिक्षण विकाऊ झाल्यापासून असा सुळसुळाट असणारच !
    रामदास यांच्या बद्दल अत्यंत घाण लिखाण मी वाचले आहे आणि त्या लिखाणाला जन्माला घालणारे कोण ? तर हे ब्रिगेडी ब्राह्मण द्वेष्टे आहेत - त्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे -
    मुसलमानांना वाटते की आम्ही इथे राज्य केले आहे , मराठा समाज तर हे राज्य त्यांची जहागीरच मानतो , आणि ब्राह्मणांची पेशवाइचि मस्ती अजून आहेच हे सर्वत्र असतेच !
    त्याचा अतिरेक होणे हे वाईट !
    समीर घाटगे

    ReplyDelete
    Replies
    1. समीर घाटगे,

      तुझे डोके ठिकाणावर आहे काय? "तुम्ही आय टी ची मुल" हा काय धांदरट पणा कोण आय टी आणि कुठले आय टी? काही तरीच बावळतपणे लिहित असतो हा! "मला माहित नाही की सौराष्ट्रात शिकायला होतास म्हणतोस" ही चुकीची माहिती तू कुठून काढली हे तूच जाणो! चक्क खोटे लिहितो हा!

      तुकाराम महाराज आणि छ. शिवराय यांचा सबंध ओढून ताणून जोडण्याची गरज नाही, येवढा तो घनिष्ट आहे. सन १६३६ ते १६४५ पर्यंत शिवाजींचा निवास पुण्यास होता. त्यांनी प्रशासन आणि युद्ध कलेचे शिक्षण ह्याच काळात घेतले. पुण्या पासून केवळ १५ मैलांवर देहू येथे तुकारामांचा निवास होता. तुकारामांनी आत्मसाक्षात्कारानंतर जे लोकजागृतीचे कार्य केले तो काळही १६३० ते १६४९ हाच होय. तुकारामांनी किर्तनांनी जागृत केलेला बराच प्रदेश शिवाजींच्या स्वराज्यात मोडत होता. खुद्द छ. शिवाजी महाराज सुद्धा तुकारामांच्या कीर्तनाला येत असत. (ही गोष्ट म्हणजे काही खोटे दस्त ऐवज बनवून ओढून ताणून घुसादाविलेली कल्पित कथा नव्हे.) शिवाजींच्या कृतींवर तुकारामांच्या शिकवणीचा जेवढा प्रभाव पडलेला दिसून येतो तेवढा दुसऱ्या कोणत्याही संतांचा किंवा स्वामींचा दिसत नाही. तरी तुकारामांनी शिवाजींची भाटगिरी केली नाही.तुकारामांची शिकवण प्रवृत्तीपर नसती तर त्यांच्या कीर्तनाला शिवराय आले नसते, हेच खरे! तुकाराम महाराजांनी शिवाजींच्या मावळ्यांची मने, मेंदू आणि मनगटे मजबूत केली. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी.

      सारंग दवे

      Delete
    2. नमस्कार दोस्ता! रामदासासंदर्भातील न.र. फाटक लिखित दुर्मिळ लेख जर तुझ्याजवळ असेल तर नक्की पोस्ट कर!

      Delete
    3. कृपया, "रामदास आणि पेशवाई" हा छोटेखानी तसेच दुर्मिळ माहिती असलेला ग्रंथ वाचावा!

      मुक्ता पाटील, नागपूर

      Delete
  10. संत तुकाराम यांच्या कीर्तनाला शिवबा जात असे, असा उल्लेख इतिहासात बऱ्याच ठिकाणी आहे. एका ठिकाणी मुघल शिवबाला शोधण्यासाठी तुकारामांचे जिथे कीर्तन चालू होते तेथे गेले, मात्र सर्वच लोकांची वेशभूषा शिवाबासारखी असल्याने ते शिवबाला ओळखू शकले नाहीत, असाही उल्लेख आढळतो. हे मात्र एकदम खरे आहे की तुकारामांनी केलेल्या धार्मिक क्रांतीनंतरच शिवरायांना राजकीय क्रांती करता आली.

    ReplyDelete
    Replies
    1. वा वा - फारच छान ! म्हणजे तुमचे इतिहास वाचन सर्वाना उपयोगी पडणारे आहे
      कृपा करून संदर्भ देऊन सांगाल का ?
      कोणत्या ऐतिहासिक कागद पत्रात असा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी संत तुकोबांच्या कीर्तनाला जात असे -
      त्यामुळे सर्वच आजी माजी थोर इतिहासकार लोकांच्या ज्ञानात भर पडेल
      कारण राजवाडे , सरदेसाई किंवा शेजवलकर ,यांनी कोणीच असा उल्लेख नाही लावलेला
      कदाचित ते ब्राह्मण म्हणून त्यांनी हि माहिती उजेडात आणली नसेल किंवा इतर कोणीही तसे सांगितले नाही असे का बरे ?संत तुकाराम हे सदगृहस्थ होते तमाशातले कोणी नव्हते , त्यांच्याकडे गेल्यावर आहाराज औपचारिकतेने काही वस्त्र भेटी , देत असतील त्याचा कुठेच उल्लेख नाही !
      आपल्या संदर्भाची वाट पहात आहोत !
      संत तुकाराम देहू सोडून कुठे कुठे कीर्तन करत असत ?
      ते वारीला कोणत्या जथ्यातून जात असत ?त्याचेपण रेकोर्ड असेलच - ते पण सांगा -
      आजच्या संशोधकाना हि माहिती खूप उपयोगी पडेल , संजय सोनावणी तर आनंदाने नाचातीलच !

      तुमचं ते दुसर मत अगदीच विनोदी आहे ! तुकारामांनी धार्मिक क्रांती केली ?अहो त्यांना तर मरव लागल ना ?आणि कोणीच हुं की चु केलं नाही - शिवाजीकडे साधी तक्रार पण केली नाही -क्रांती कशी असते - कशी घडते - त्याचा विचार करा जरा !
      आणि शिवाजीचे म्हणाल तर त्याने स्वराज्याच्या नावाखाली आपले राज्य निर्माण केले - आपल्या नंतर अष्ट प्रधानाला राज्य सोपवले का ? नाही - म्हणजेच वंश परंपरा राज्य चालवले !दुसऱ्यांना तत्बंडी चे वाडे बांधू दिले नाहीत आणि स्वतः त्या उलट केले -

      Delete
    2. श्री. अनामिक,

      तुम्हाला हवे असलेले संत तुकाराम महाराज यांच्या संबंधीचे सर्व रेकॉर्ड आणि पुरावे अनिता पाटील विचार मंचच्या ब्लॉगवर दिले आहेत. ताजे लेख वाचा, पुरावे मिळाल्याचा आनंद साजरा करा.

      शिवाजी महाराजांसंबंधी तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अनिता पटील विचार मंचावरील "शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?" या लेखमालेत वाचायला मिळतील. लेखमाला तुम्ही नक्की एन्जॉय कराल, अशी खात्री वाटते.

      Delete
    3. अनिता पाटील विचार मंच हा ब्राह्मण द्वेषाची कावीळ झालेला विचारमंच आहे
      त्यांच्या मातांना काडीचीही किंमत नाही मी सर्व मते वाचली आहेत
      पु ल देशपांडे यांना त्यांनी किती नावे ठेवली आहेत
      हे एक विकृतीचे लक्षण आहे
      त्यांना समाज प्रबोधनात कवडीचीही किंमत नाही
      तुकाराम वंजारी

      Delete
    4. अरे यडपट माणसा ,
      अपावीमं वर कुठेही मला दिसले नाही की तुकाराम आणि शिवाजी हे
      गुरु शिष्य होते
      माझे म्हणणे असे आहे - शिवाजीने तुकाराम यांचा खुनी पकडून त्याला शासन का केले नाही
      आम्ही काय विचारतो आहोत त्याचे पुरावे द्या ! विषयांतर करू नका-
      शिवाजी हा तुकाराम मेला किंवा त्याचा खून झाला तेंव्हा त्यांच्या मयतीला आला होता का ?
      वारकरी पंथाला त्याने काही मदत केली का ?
      आपले माननीय मु. पृथ्वीराज चव्हाण जसे आषाढीला पूजा करतात तशी शिवाजीने कधी पांडुरंगाची पूजा केली का ?
      तो शिवभक्त असल्याने कधीच पंढरपूरला दर्शनाला गेला नाही
      महाराजांनी टाळ कुट्या संतांची कधीही पाठ राखण केली नाही हा खरा इतिहास आहे !
      शिव धर्माचा विजय असो !
      बाळासाहेब खेडकर

      Delete
    5. संतश्रेष्ठ तुकाराम आणि छ. शिवाजी यांच्या बद्दल एकेरी तसेच आरे-कारे पद्धतीने उल्लेख करणाऱ्या comment लेखकांचा जाहीर धिक्कार !!!!!!!!

      -अविनाश, ठाणे.

      Delete
    6. अहो अविनाश , तुम्हाला मात्र आम्ही अहोजाहो म्हणणार ,
      पण आमच्या शिवबाला आम्ही अरे तुरेच करणार -
      कारण आम्ही त्याच्या शाडूच्या मूर्ती दिवाळीत मातीच्या किल्ल्यावर बसवतो - , आम्ही शाळेत लाकडी पट्टी चड्डीच्या बक्कल मध्ये अडकवून शिवाजी शिवाजी खेळ खेळतो ,आणि शिवाजी म्हणतो हात वर शिवाजी म्हणतो खाली बसा असा बाळबोध खेळ खेळत असू !- शिवाजी आमच्या चराचरात भिनला आहे - जसा तुकोबांना पांडुरंग तसा आम्हाला शिवबा !त्याला काय किंवा आपल्या आईला काय आपण एकेरीतच हाक मारतो आईला आपण अहो जाहो केलेले चालेल का ?
      अविनाश बाबू तुम्हाला इतके टेन्शन का येते - शिवबाचा आमच्या सारख्या सामान्य माणसाकडून अपमान होईल असे कसे वाटते ?तुम्ही लोकांनी शिवाजीला संकुचित करून जखडून ठेवले आहे - राम कृष्ण असो नाहीतर शिवबा असो किंवा तुकोबा - माउली असो - हा प्र्मचा अमृतच आपान्हा असा आटवू नका !शिवाजी तुमची प्रायव्हेट मालमत्ता नाही तो सार्या विश्वाचा वंदनीय नेता आहे - त्यासाठी तुमच्या सरटीफिकेट ची अजिबात गरज नाही !
      आपण स्वतःला शिवाजीचा इमेज राखण्यासाठी व्रतस्थ केले आहे का ? अतिशय चांगली गोष्ट आहे
      पण जरा जपून , त्याचा असा सवंग वपर करून दुसऱ्याच्या मनावर अतिक्रमण करू नका असे मनापासून सांगावेसे वाटते -
      अशा थोर व्यक्तीना काहीही धोका नसतो !ते अमर असतात ,त्यांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणवून घेऊ शकतो ,ते आपले दैवत आहे -याउपर काय लिहिणार आपण सुद्न्य आहात
      आणि तुकोबा तर देवालाही एकेरीने हाक मारतात -

      Delete
    7. अरे अविनाश ,
      असे नको करूस , सारखा धिक्कार - सारखा धिक्कार -सारखा धिक्कार
      अगदीच दलित चळवळीतला वाटतोस
      ९६ कुळी आहेस ना - का महार मांग आहेस ?
      ते पण आम्हाला वांद्याच आहेत ,
      पण विषय जरा वेगळा आहे म्हणून म्हटले की असे करू नकोस !
      शिवाजी महाराज की जय !

      Delete
    8. @Anonymous August 2, 2014 at 6:01 AM,
      @Anonymous August 2, 2014 at 7:24 AM

      ह्या अनामिक लोकांचा सुद्धा अभद्र व असंस्कृत भाषा वापरामुळे जाहीर धिक्कार !!!!!

      -अविनाश, ठाणे.

      Delete
  11. संजय सोनवणी यांनी लिहिलेला विषय कोणता? तुम्ही लोक चर्चा कोणती करताय? काही ताळमेळ लागतो का? अहो, सोनवणी यांची काळ्या जादूची साधना आणि तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन यांचा काही तरी संबंध आहे का?

    सध्या तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन/हत्येचा विषय अचानक कसा काय चर्चेला आला हेही एक कोडेच आहे. अनिता पाटील विचार मंच वाल्यांनीही हाच विषय घेऊन चर्चा सुरू केल्याचे दिसते. तुकोबांचा खून झाला आणि ते वैकुंठालाही गेले, असा नवाच इतिहास अपाविमंवाल्यांनी शोधला आहे. तुकोबांच्या हत्येवर एक ग्रंथही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच काय या ग्रंथातील काही ओव्याही त्यांनी दिल्या आहेत. आता बोला!

    सोनवणी सर यावर काही प्रकाश टाकू शकतील का? तुकोबांच्या हत्येच्या मुद्याचे विवेचन करणारा तुमचा लेख मी वाचला आहे. अपाविमंने जे नवीन दावे केले आहेत, त्याबद्दल आपणास काही सांगता येईल काय, असे मला म्हणावयाचे आहे.

    श्रीधर वाघमारे, नाशिक.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
      रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
      शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
      तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
      (अभंग क्रमांक : १२३०)
      अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे.

      अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
      वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
      ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
      तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
      (अभंग क्रमांक : १३४४)
      अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये.

      ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
      जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
      सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
      तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
      (अभंग क्रमांक : १२२९)
      अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.
      .............................................................................................

      Delete
  12. म फुले यांचा ब्राह्मणाच्या लग्नात वयाच्या २१ व्या वर्षी अपमान झाला हेपण नवीनच !त्यामुळेच त्यांचा ब्राह्मणद्वेष समजून घेता येतो !

    ReplyDelete
  13. अरे सारंगा - इटुकला पिटुकला ,
    सांगत का नाहीस असा पुरावा कुठे आहे ते - अरे लब्बाडा ! तू प्रभातचा पिक्चर बघून
    सांगतो आहेस का रे ? अरेरे
    असं करू नये !
    शिवाजीच्या चरित्रावर तुकारामांचा पगडा दिसतो हा एक मोठ्ठा विनोदच आहे ! आम्ही अक्षरशः गडाबडा लोळत होतो या विनोदामुळे !
    असं बोलू नये - हात रे ! चावट कुठले - आमचा सारंग बाळ शहाणा आहे त्याची अशी चेष्टा करू नका
    माडी खाली माडी माडीखाली चिरा
    तेथे तोंड धुतो हिरा सारंग बाळ
    असं आमच गुणी लेकरू आहे !
    अरे तू आय टीत नाहीस ना , मग सांग ना काय करतोस ते ! लाजू नकोस ! आम्ही काही म्हणणार नाही -काय ? - शिशुविहारात आहेस - म्हणूनच - असं कोणीतरी डोक्यात भरवत
    आणि मग डोक भरकटत !आता नीट लक्षात ठेव - कध्धी कध्धी विसरायचे नाही -तू आईबाबांचे नाव विसरतोस का ? नाही ना ! - तुकाराम हा टाळकुट्या संत होता त्याचा शिवाजीला काडीचाही उपयोग झाला नाही - आणि शिवाजी त्याच्या मयतीला सुद्धा आला नाही ! अरेरे किती अवहेलना ही !
    शिवाजीच्या खीज गणतीतही नव्हत की असा कोणी कवी मनाचा ,राजकारणाचा गंध नसलेला , घरादाराची वाट लावलेला देहूत आहे !
    सांग बर का आम्हाला ! पुरावे देत बोललं ना की लोक पण तुझा आदर करतील - सांग ! आम्ही वाट बघतो आहोत !कोणत्या ऐतिहासिक पुस्तकात आहे असा उल्लेख ?


    ReplyDelete
  14. DEAR DR SARANG DAVE
    I AM HAPPY THAT YOU ARE A FAMOUS DOCTOR

    PL GIVE ME PROOF - IF SHIVAJI WAS ATTENDING THE KIRTANS
    WE ARE SURE YOU MUST BE HAVING THE PROOFS
    THERE ARE SO MANY BOOKS ON SHIVAJI , WRITTEN BY AUTHENTIC SHIV PERIOD
    YOU MUST HAVE READ A HISTORICAL BOOK , SO JUST GIVE US PAGE NOS

    ReplyDelete
  15. या सारंग दावेची स्थिती लहान मुला सारखी झाली आहे
    लहान अशक्त मुला खेळताना मधेच म्हणते की - थांब तुझं नाव माझ्या आईलाच सांगते - तसेच हा म्हणतोय -
    याची त्या अपावी मंच वर आंधळी श्रद्धा दिसते आहे , आणि हा तुम्हाला सगळी उत्तरे त्यांच्या ब्लोग वर मिळतील असे हट्टाने सांगत आहे -
    अरे सारंगा - आता तू मोठ्ठा झाला आहेस - आता आपला विचार आपण करायचा , आपली वात आपण शोधायची ,आपण आपले गाणे गायचे -तुला खरच वाटते का की तुकाराम हे शिवाजीचे गुरु होते ?
    अरे वेड्या - मग खुद्द संजय सरांनाच विचार ना - ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत

    अपावी मंचाचे गोडवे गाण्यापेक्षा त्यांना फेसबुक वर विचार किंवा ब्कोग वर विचार
    आम्हीकाही तुझं वाईट चिंतीत नाही , पण हा जो अपावीमं च्या गुलामीचा तुला मानसिक रोग झाला आहे त्यावर हा जालीम उपाय आहे
    संजय तुलावाऱ्यावर सोडणार नाहीत - तुझी काळजी नक्की घेतील
    मानसिक वादळात ते दीप स्तंभाचे काम करतील
    नम्रता कुदळे

    ReplyDelete
    Replies
    1. "अपावी मंच" ही काय भानगड आहे बुवा, कोणी समजावून सांगेल काय?
      कुदळे, खोरे, पाटी, पार...........

      Delete
  16. पुरावा हवा! पुरावा हवा!

    हा घ्या पुरावा.

    पुरावा क्र. १

    "मध्ययुगीन भारताचा इतिहास" लेखक प्रा. देशमुख, प्रकाशक: विश्वभारती प्रकाशन, नागपूर.
    आवृत्ती तिसरी : जाने. १९९८.
    प्रकरणाचे नाव "युगप्रवर्तक शिवाजी" पृ. १५-१६.

    पुरावा क्र. २

    "सिंहगड" ले. ग.ह.खरे, प्रकाशक: महाराष्ट्र शासन, मुंबई.
    पृ. ६-७ , श्री. सरदेसाई म्हणतात, "Harikirtan ....and sermons by .....celebrate saints like, Tukaram was then very common means of general education and training of the young and the old; and Shivaji lost no opportunity of profiting himself by such occasions" - New History of the Marathas, Vol.- 1, Page 97.

    सारंग दवे

    ReplyDelete
    Replies
    1. आम्हाला तर खूप आनंद झाला हे वाचून - याचे भाषांतर काय हे बघत बघता आम्हाला सापडले
      Dr. Jayashingrao Pawar has mentioned some records on visit of Chhatrapati Shivaji to saints. He mentions some records and names of Saints.

      Narayan Maharaj (Chinchawad, Pune)
      Shidheshwar Bhat Bramhe (Chakan)
      Gopal Bhat (Mahabaleshwar)
      Mahant Kevalbharati (Kenjal, Wai)
      Dev Bharati (Mudalgaon paaodha)
      Mouni Buva (Patgaon)
      Yakut Baba (Kelshi Ratnagiri)
      Shitaram Vajpaey (Karnataka)
      Purshotam Bhat Dharamadhikari (Kumbh Konam)
      Ratnagiri Gosavi
      Tan Pathak (Nagthane)
      Shridhar Bhat Bapat (Ganapati Pule)
      Keshav Bhat Pandit (Danadhasha)
      Paramanand Gosavi (Poladpur)
      Narayan aashram (Trebakeshwar)
      Shitalpuri or Achalpuri (Banaras)
      Gaga Bhat (Banaras)
      Sant Tukaram (Dehu)
      Samartha Ramdas Swami.

      Delete
    2. मौनी बाबाना तर शिवाजी पासून अगदी राजर्षी शाहू पर्यंत सनद मिळाली आहे -पण तुकाराम शिवाजी भेट झाली असा स्पष्ट उल्लेख अजूनही मिळाला नाही
      रामदास स्वामिना शिवाजी भेटला असे स्वतः डॉ जयसिंगराव पवारच म्हणतात
      त्यांनी अनेक गोसावी लोकाना सनद दिली
      तुकारामांनी त्याला तो भेटायला येणार हे समजताच अभंग पाठवले इतकाच उल्लेख डॉ पवार करतात - पण इतरांच्या बाबतीत मात्र अगदी सालासकट शिवाजीची भेट झाल्याचे सांगतात
      रामदास हे शिवाजीला कुठे भेटले , शिवाजीला त्यांनी मंत्र दिला आणि संभाजीला शिवाजीने रामदास यांच्याकडे ठेवले असे स्वतः डॉ जयसिंगराव पवारच सांगतात त्यावेळेस असा प्रश्न पडतो कि सुमारे १६ ब्राह्मण गोसावी आणि देव घराणे आणि फकीर याना शिवाजी भेटतो तसाच तो तुकोबाना भेटला असेल पण ते लगेच त्याचे जगद्गुरु झाले असे वाटत नाही - कारण राज्यकर्त्याची ती पॉलिसी असते - हे आजही आपण बघतो - निवडणुकात तर जरा जास्तच !असो - तुकाराम हे काही त्याचे गुरु वगैरे नव्हते हेच यावरून सिद्ध होते
      अविनाश आणि दावे यांचे अभ्यास करण्याचे कौतुक केलेच पाहिजे ! पण तो अपुरा पडतो - त्याला ते तरी काय करणार ?
      गाथेत १८७८ पासून साधारणपणे १८९७ असे २२ अभंग आहेत ते शिवाजीला उपदेशात्मक आहेत असे समजले जाते - ते प्रक्षिप्त असू शकतात
      रामदास हे शिवाजीला शिंगणवाडी येथे मारुती मंदिरात भेटले आणि महाराजांनी संभाजीला परळी येथे समर्थांकडे आध्यात्मिक अभ्यासासाठी ठेवले असे डॉ पवार उल्लेख करतात
      नारायण महाराज चिंचवड,
      सिद्धेश्वर भ ट ब्रह्मे - चाकण
      गोपाळ भट - महाबळेश्वर
      महंत केवलभारती -केंजळ वाई
      देव भारती - मुदाल्गाव -
      मौनी बाबा - पाटगाव
      याकुतबाबा - केळशी रत्नागिरी
      सीताराम वाजपेय कर्नाटक
      पुरुषोत्तम भट धर्माधिकारी - कुंभकोणम
      रत्नागिरी गोसावी
      तान पाठक नागोठणे
      श्रीधर भट बापट - गणपतीपुळे
      केशव भट पंडित- दन्दशा
      परमानंद गोसावी - पोलादपूर
      नारायण आश्रम - त्र्यंबकेश्वर
      शीतल पुरी किंवा अचलपुरी - काशी
      गागा भट्ट - काशी
      संत तुकाराम - देहू
      समर्थ रामदास -सज्जनगड
      अशी ही लांबलचक यादी आहे- बहुतांशी ब्राह्मण आहेत आणि गोसावी समाजाचे आहेत काही कन्नड आहेत आणि एक मुस्लिमही आहे
      यावरून असे काहीच ठरवता येत नाही की तुकाराम हे शिवाजीचे एकमेव गुरु होते
      सारंग देव आणि अविनाश यांनी जरा चिंतन मननाचा अभ्यास करावा अशी मनापासून इच्छा आहे
      जाता जाता - गणपतीपुळे हे शिव कालापासून प्रसिद्ध आहे हेपण नोंद घेण्यासारखे आहे
      लोभ आहेच
      नंदन कार्लेकर

      Delete
    3. List of Reference Books

      Sr No. Reference Books on Shivaji Author's Name
      1. Marathi Riyasat : Shahaji Raje Bhosale G.S.Sardesai.
      2. Marathi Riyasat : Shak Karta Shivaji G.S.Sardesai.
      3. Shri Shivchhatrapati T.S.Shejavalkar
      4.
      Shri Shivchhatrapati 7episod Charitra SuvicharPublication,Sadashiv Peth,Pune

      Dr.Bhimarao Kulkarni
      5. Chhatrapati Shivaji Maharaj V.C.Bendre
      6. Bharat Varsh Madhyayugin charitrakosh C.V.Chitrav
      7. Bhartiya sanskruti Kosh Pandit Mahadevshatri Joshi
      8. Punyasholka Chhatrapati Shivaji Maharaj ( 3rd part) Balshastri Hardas
      9. Shivcharitra- ek study Setu Madhavrao Pagadi
      10. Chhatrapati Shivaji Maharaj D.V.Kale
      11. The Artic Home in the Vedas Lokmanya Tilak
      12. Etihas Manjari
      13. Krunaji Anant sabhasadanchi Bakhar-Chhatrapati shri ShivParbhu Charitra V.S.Vakaskar
      14. Shri Mantri Dattaji Trimal Vakenivas virchit 91 kalami Shri Shiv Chhatrapati Bakhar V.S.Vakaskar
      15. Chhatrapati Shivaji Maharaj Letters Dr. Ravindranath Vaman Ramdas
      16. Kolhapur Arvachin History B.P.Modak
      17. Divyamrutdhara ( Baba Maharaj Aarvikar ) Moreshwar Joshi
      18. Sambhajiraje Dr.Sadashiv Shivde
      19. Samarth Pratap Ramdasi

      Delete
    4. कसला दिल्या आहेत ह्या लांबलचक याद्या? गुरुंच्या असोत की पुस्तकांच्या! यात नाविन्य अजिबात नाही. तसेच या याद्यांवरून तुम्ही काहीही सिद्ध करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. कृपया, वेळ खाऊ पणा नको! मुद्द्याचे लिहा! आणि हो ते कवट्या महांकाळ...चे पुढे काय झाले? पुढची गोष्ट कुणीतरी लिहाच! विषय आधीच भरकटलाय, अजून भरकटू देऊ नका म्हणजे झालं!

      Delete
    5. "Harikirtan or what may be called devotional songs and sermons by household preachers and celebrate saints like Tukaram, was then very common means of general education and training of the young and the old; and Shivaji lost no opportunity of profiting himself by such occasions" - New History of the Marathas, Vol.- 1, Page 97.

      Delete
  17. अरे बापरे - काय ऐकतो आहे मी शिवाजीचा गुरु होता संत तुकाराम याचा अजून पुरावा काय पाहिजे - हिप हिप हुर्यो
    दावे साहेबानी मस्तच काम केले आहे
    पण
    शिवाजीने त्या ब्राह्मणाना शासन का नाही केले
    हे काही आपल्याला समाजात नाही -
    सारंग शेठ -
    , तुम्ही आम्हाला समजावून सांगा बाबा ! तुम्हीच मस्त समजावून सांगाल - सांगा !
    हे बाकीचे टोळ भैरव तुम्हाला यडे करू बघताहेत !त्यांचे सोडा आपण आपली चर्चा करुया !
    तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगता बघा !

    ReplyDelete
  18. प्रिय अनामिक मित्रांनो,

    तुम्ही भरकटत चालला आहात, विषय शिवाजी राजांचे गुरु कोण? हा नसून शिवबा तुकारामांच्या कीर्तनाला जात होते की नव्हते? हा होता. आणि वरील पुराव्यांवरून हेच सिद्ध होते की ते तुकारामांच्या कीर्तनाला जात होते. याचा अर्थ ते शिवबाचे मुख्य गुरु होतेच, असा होत नाही! त्यांचे अनेक शिक्षक होते, हे सर्वज्ञात आहे. युद्ध कौशल्य शिकविणारे वेगळे, धार्मिक शिक्षण देणारे वेगळे, राजकारणाचे पाठ शिकविणारे वेगळे. तुकारामांनी पांडुरंगाला गुरु मानले असले, तरी कोणाही मानवाला गुरु मानलेले नव्हते. तुकारामांचे आणि शिवबाचे घनिष्ठ संबंध होते, हे कोणीही नाकारू शकत नाही."मासा पाणी खेळे, कोण असे गुरु त्याचा" हे म. फुलेंचे मत सर्वांना माहित आहेच. राहिला प्रश्न तुकारामांची हत्या आणि शिवबाने खुन्यांना जेरबंद का केले नाही असा. जेव्हा तुकारामांची हत्या करण्यात आली त्या वेळी शिवरायांचे वय केवळ सोळा वर्षांचे होते. अजून स्वराज्य स्थापन झालेले नव्हते, मग खुन्यांना शिक्षा करण्याचा शिवबाला अधिकारच नव्हता. तुकारामांची हत्या ही त्या काळच्या धर्मशास्त्राच्या कायद्या नुसार झाली होती अर्थात मनुस्मृती नुसार झाली होती. तुकारामांवर आरोप होता तो म्हणजे तुकारामांनी वेद, यज्ञादी कर्मकांड आणि ब्राह्मणी मुल्यांवर आपल्या अभंगांतून केलेला कठोर हल्ला. वैदिक पंडितांनी तुकारामांना न्यायालयात खेचले, हे त्यांच्या धर्मशास्त्रांशी सुसंगतच होते. ती धर्मशास्त्रे न्यायाशी, नीतीशी आणि माणुसकीशी सुसंगत नव्हती, ही गोष्ट वेगळी.

    सारंग दवे

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय उत्तम,
      असेच लिहित रहा.
      पुरावे देऊन तुम्ही अनामिक लोकांची बोलतीच बंद करून टाकली आहे. तुम्ही त्यांच्या श्रीमुखात लगावलेली ही जबरदस्त थप्पडच म्हणावी लागेल.

      अविनाश, ठाणे.

      Delete
  19. Shivaji welcoming Sant Tukaram arriving to perform Kirtana (c. 1548 A.D.)
    When Sant Tukaram died in 1650, Shivaji was about 23 years old. But Tukaram's devotional compositions or abhangas in praise of Vitthala and Vithoba were already very popular in Maharashtra. It is believed that Shivaji's first meeting with Tukaram took place at Pandharpur. The tradition goes that once Tukaram was performing Harikirtan in a religious congregation. Shivaji was also present on the occasion. Suddenly a thousand strong enemy troops surrounded the gathering with the intention to capture Shivaji. Tukaram prayed to God for help and, as if from nowhere, an equal number of men, all alike Shivaji, appeared on the scene, and in the ensueing confusion, Shivaji could give slip to the enemy.

    There is no reason to doubt about more meetings between Tukaram and Shivaji as the former was the most popular saint at that time in Maharashtra and Shivaji's spiritual yearning was acute from the very beginning. How could he have remained untouched by the Pandharpur movement of which Tukaram represented one of the important phases? The saints provided "spiritual background to the political aims of workers like Shivaji". There are some compositions believed to be of Sant Tukaram addressed to Shivaji in which the word Chhatrapati has been used.

    The next painting shows Shivaji welcoming Sant Tukaram. Shivaji is hardly of 20 years at this time – very young looking. Sant Tukaram is coming to perform kirtana. He has his Ektara with him. A number of people are sitting at some distance. In the chariot is an image of Vitthala along with His consort Vithoba. In the chariot are also a pair of kartala and some pothis in which his abhangas are written. Tukaram is standing near the chariot. Shivaji is bending respectfully before the saint.
    ..........................................................................................................

    ReplyDelete
  20. राष्ट्ररचनेचे कार्य

    एकदा शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले होते. इतक्यात मुसलमानांनी त्या मंदिराला वेढा घातला. अशा वेळी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तुकोबांनी विठोबाचा मनःपूर्वक धावा केला. त्यांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने शिवाजीचे रूप घेऊन सर्वांचे प्राण वाचविले. शिवाजी महाराजांकडून पुढील हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य व्हावयाचे होते, हे जाणूनच तुकोबांनी त्यांचे प्राण वाचविले.

    ReplyDelete
  21. तुकाराम आणि शिवराय

    आजही महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी केलेली क्रांतीमागे महाराष्ट्रात वारकरी संतपरंपरेने शेकडो वर्षं केलेली मशागत होती, हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. शिवाय तुकाराम महाराज तर शिवरायांचे समकालीन. ते एकमेकांना भेटले होते, त्याचा प्रसंग सर्वश्रुत आहे.

    तुकोबांच्या कार्याचा आणि जीवनाचा प्रभाव शिवरायांवर होता. शिवरायांचं संपूर्ण काम जिथे चाललं त्या मावळ खोऱ्यात आणि ग्रामीण समाजावर इतर कोणत्याही संतापेक्षा तुकारामांचा प्रभाव जास्त होता. तो आजही आहे.

    'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' म्हणणाऱ्या तुकारामांनी पाईकांचे अभंग लिहिले आहेत. पाईक म्हणजे सैनिक. या अभंगांमधे गनिमी काव्यापासून स्वामीनिष्ठेपर्यंत अनेक गोष्टींचं मार्गदर्शन सैनिकांना केलं आहे.

    (महाराष्ट्र टाईम्स, संपादकीय, २९ जाने. २००९.)

    ReplyDelete
  22. आजही शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू म्हणून संत रामदास यांचा उल्लेख केला जातो. जर आपण इतिहासाची पाने चाळली तर शिवाजी महाराज व संत रामदास यांची भेट शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या मध्यापर्यंत झालेली होती, तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे तर शिवाजी महाराजांच्या प्रांताच्या म्हणजे पुण्याच्या जवळच देहू येथील. त्यांची भेट साधारणतः शिवाजी महाराजांच्या १७-१८ व्या वर्षी झालेली होती व त्यानंतर ती वृद्धींगत होत गेली. त्यामुळेच शिवाजी महाराजांवर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रभाव हा तुकाराम महाराजांचाच होता, रामदास महाराजांचा नव्हता हे इथे नमूद करावेसे वाटते.

    जितेंद्र पाटील, भायंदर

    ReplyDelete
  23. सारंग दवे सर,
    तुमचे खूप खूप आभार !
    मी सुद्धा पुरावे शोधत होतो मात्र ते तुम्हाला लगेचच सापडले.
    तुम्ही दिलेले पुरावे मी स्वतः पडताळून पाहिले, ते एकदम १०० नंबरी अस्सल आहेत यात मुळीच वाद नाही!
    मी सुद्धा ते वाचले होते, नेमके कोठे वाचले होते ते आठवत नव्हते.
    शिवरायांनी खुन्यांना का जेरबंद केले नाही, याचे उत्तर तुम्ही सत्य तेच दिले आहे.
    पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार!
    या टवाळ लोकांकडे तुम्ही अजिबात लक्ष न देता असेच लिहित रहा, आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा आहे. सत्य हे बाहेर यायलाच हवे!

    धन्यवाद!

    आरती मोकाशी.

    ReplyDelete
  24. अविनाश ,
    आता मात्र आम्हाला हसू आवारात नाही रे बाबा !
    अरे तुमच्या जयसिंग पवारांचा पुरावा आम्ही दिला , म्हटलं काहीतरी डोक्यात प्रकाश पडेल !
    पण नाही !तो दावे म्हणतो की तुकाराम गेले त्यावेळेस शिवाजीचे वय १६ वर्षांचे होते !
    आता शिवबाचा जन्म १६३० धारा किंवा १६२७ तर वय काय असेल ?- तुमचे लेखन प्रचारकी असते ते असे - शिवाजीला तोरणा घेण्याचा पुरुषार्थ त्या वयात होता म्हणून त्याचे कौतुक आपण करतोच त्याचा आपल्या सर्वाना अभिमानच आहे , पण तुकोबांच्या खुनाकडे त्याचे दुर्लक्ष झाले हे मात्र मान्य करावेच लागेल - त्याकाळात जर धर्म संबंधात ब्राह्मणांचे प्राबल्य असेल तर त्यांची डोकी उडवायला हवी होती - इतका थोर संत आणि त्याचा खून होतो आणि शिवाजी हतबल आहे - तो धर्मात
    ढवळा ढवळ करत नाही ही काही स्पृहणीय बाब नाही !
    आपण सर्वांनी दादोजी कोंडदेव खंडन आणि मंडण हे श्यामसुंदर मुले यांचे पुस्तक अवश्य वाचावे - जयसिंगराव यांची तद्न्य समिती कशी नेमली त्यातील सदस्य निनाद बेडेकर , मेहेंदळे आणि इतरांनी कसा राजीनामा दिला ते वाचण्यासारखे आहे - कारण असे होते की ज्यांना नेमले होते ते इतिहास संशोधकाच नव्हते - त्याना मोडी फारसी किंवा पर्शियन येत नव्हते - त्या काळातला कारभार - अगदी खुद्द शिवाजिचाहि - अशा रुपात होत असे - पण उद्देश आधीच ठरला असल्यामुळे या सर्वांनी राजीनामे दिले - असे जर कामकाज चालत असेल तर कसे होणार ?

    प्रा न र फाटक म्हणत असत की शिवाजी आणि तुकाराम भेट झालीच नव्हती -ज्या देवळात भेट झाली असे सांगितले जाते ते त्या वेळेस अस्तित्वातही नव्हते -शिवाजीचा तुकारामांच्या मृत्यु नंतरचा खालील हुकुम अभ्यास करण्यासारखा आहे -"मयत तुकाराम गोसावी यांची जमीन मशागती वाचून रहात असल्यामुळे आम्ही ती जप्त करून मम्बाजीस वहिवाटण्यास देत आहोत "- तुकारामास जर शिवाजी खरोखरच गुरु मानत असतील तर या हुकुमाची उपपत्तीच लागत नाही !
    मुले यांच्या विधानाला उत्तर देताना जयसिंगराव पवार प्रा न र फाटक यांचा आधार घेतात , तर मग आम्ही पण घेण्यास काय हरकत आहे - ? दिल्ली येथे भरलेल्या अ.भा. म.सा.संमेलनात प्र न र फाटक यांनी उपर निर्दिष्ट उद्गार काढले होते
    आणि त्यावेळेस म म द वा पोतदार हेपण उपस्थित होते ( कित्रीम दिवाळी अंक २००६ डॉ नि र वऱ्हाडपांडे यांचा "मत्सराचे कारण आर्थिक " हा लेख पृष्ठ १२४ )

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous August 4, 2014 at 11:34 PM

      तू हसतच रहा ! होय, अगदी वेड लागे पर्यंत हसत रहा! वाटल्यास गडागड लोळ! बाकी काहीही करण्याची गरज नाही.

      अविनाश, ठाणे.

      Delete
    2. अय्या , नुसताच लोळायचं कारे अविनाश ?
      आज राखी पौर्णिमा आहे मी तर तुला राखी बांधणार होते - पण
      शिवाजीने कधी कोणाला राखी बांधली होती कारे ?
      आपल्या बहिणीना ?खरच की - त्याला वेळच नव्हता - ५-५ लागणे केलेली - त्याला तुकारामांचा खून झाला हे पण समजले नाही - आणि समजल्यावर त्याने त्यांची शेती जप्त करून ती माम्बजीला दान दिली - त्याला राखीचे महत्व नव्हतेच - जाउदे - आपणपण रक्षा बंधन करायलाच नको - सातारचे राजे करतात का राखी बंधन ? पहिल्या धारेची उतरल्यावर करतात का ? म्हणजे संध्याकाळी ?
      गजलक्ष्मी भोसले

      Delete
    3. पुन्हा पुन्हा तीच बोगस, आचरत, वात्रट एका बुद्धीभ्रष्ट बामनाची भाषा.

      Delete
  25. ब्राह्मण द्वेषाने विचार करणारे कसा विचार करतात त्याचे उदाहरण सांगतो -
    अर्थ काढणारा जर विकृत मनाचा असेल तर असेच होणार !
    बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर भुजबळ आणि राणे म्हणाले कि बाळासाहेब गेल्याने वडील गेल्याचे दुःख झाले - याचा अर्थ राणे उद्धव आणि भुजबळ हे सख्खे भाऊ आहेत ?
    तसाच प्रकार दादोजी बाबत झाला आहे आणि वारंवार ब्राह्मण द्वेशापायी शिवाजी आणि ब्राह्मण यांच्या संबंधांबाबत होत आहे !
    ब मो पुरंधारे लिहितात - त्याबद्दल धुमाळ प्रभूती सूचित करतात की - दादोजी आईसाहेब आणि शिवबाचे गोत्र एकाच होते हे लिहिण्यामागे बाबासाहेब पुरंधरे यांच्या मनात पाप होते !
    पण प्रत्यक्ष बाबासाहेबांचे शब्द वाचायचा त्रास कुणी घेताच नाही - ते असे आहेत
    "शिवबावर तर खुद्द शहाजी राजांचाही नसेल एव्हढा जीव पंतांचा होता --- पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण गोत्र शांडिल्य पण खरे म्हणजे त्यांचे व आईसाहेबांचे आणि शिवाजीचे गोत्र एकाच होते सह्याद्री . "
    ( राजा शिवछत्रपती - ब मो पुरंधारे - पृ १२६ आवृत्ती १५वी ऑगस्ट २००३ )

    ReplyDelete
    Replies
    1. शिवराय ब्राम्हण प्रतिपालक (?) होते तर त्यांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला?

      Delete
    2. महाराष्ट्रातील ब्राह्मण पंडित शिवाजीस क्षत्रिय का मानत नव्हते?

      Delete
    3. शिवराज्याभिषेकाला महाराष्ट्रातील एकही ब्राह्मण का तयार झाला नाही?

      Delete
    4. छत्रपति शिवाजीस राज्याभिषेक का करून घ्यावा लागला?

      Delete
    5. छत्रपति शिवाजीस राज्याभिषेक करून घ्यायला ६ जून १६७४ पर्यंत वाट का बघावी लागली?

      Delete
    6. छत्रपति शिवाजीस राज्याभिषेक करून घेतल्या नंतरच ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला?

      Delete
    7. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे तुकडे-तुकडे शिवाजीस का करावे लागले? (ब्राह्मण म्हणून कोणी मुलहिजा करू पाहतो!)

      Delete
    8. बाबासाहेब पुरंदरे हा लोकशाहीर आहे, इतिहासकार नव्हे! कादंबऱ्या म्हणजे इतिहास नव्हे, हे यांच्या डोक्यात शिरणार आहे की नाही?

      Delete
    9. बाबासाहेब पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक
      आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची
      उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.
      १. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
      २. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
      ३. दादोजी कोंडदेव पुरस्करा संदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव
      शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर
      करू शकले नाहीत?
      ४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत
      असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
      ५.लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील
      बदनामीचे कलंक पुसन्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा
      अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
      ६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या
      विषयावर परिसंवाद ठेवला होता। यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची
      संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
      ७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वत
      समविचारी सन्घटनान्च्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
      ८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे
      यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?
      अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे
      किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.
      बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा ,
      उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे
      सत्य धक्कादायक असेल.

      Delete
    10. बाबासाहेब पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक
      आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची
      उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.
      १. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
      २. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
      ३. दादोजी कोंडदेव पुरस्करा संदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव
      शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर
      करू शकले नाहीत?
      ४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत
      असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
      ५.लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील
      बदनामीचे कलंक पुसन्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा
      अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
      ६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या
      विषयावर परिसंवाद ठेवला होता। यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची
      संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
      ७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वत
      समविचारी सन्घटनान्च्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
      ८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे
      यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?
      अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे
      किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.
      बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा ,
      उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे
      सत्य धक्कादायक असेल.

      Delete
  26. सारंग भाऊ, माफ कर रे मला. खरेच हे संदर्भ माझ्या निदर्शनास आले नव्हते. उगीचच तुझ्यावर भडकलो होतो, तुझ्या नावाने खडे फोडत होतो. शिवाजीच्या काळ आणि तुकारामाच्या खुनाचे वर्ष याचा मी कधीच विचार केला नव्हता. धर्मशास्त्र आणि अमानुष कायदे हे सुद्धा याला कारणीभूत होते हे प्रथमच समजले.धन्यवाद, मित्रा!

    ReplyDelete
  27. सारंग साहेब,

    ""मध्ययुगीन भारताचा इतिहास" लेखक प्रा. देशमुख, प्रकाशक: विश्वभारती प्रकाशन, नागपूर.
    आवृत्ती तिसरी : जाने. १९९८.
    प्रकरणाचे नाव "युगप्रवर्तक शिवाजी" पृ. १५-१६."

    ह्या पृष्ठांवर नेमके काय लिहिले आहे हे समजू शकेल काय?

    विजय शिंदे, सातारा.

    ReplyDelete
    Replies
    1. विजय शिंदे, सातारा.

      तुम्हाला हवी असलेली माहिती खालीलप्रमाणे :

      "तुकाराम - काही इतिहासकार तुकाराम हा शिवाजीचा गुरु होता असे म्हणतात. तुकारामाची कीर्तने शिवाजी ऐकत असे. एकदा कीर्तनात शत्रू आले तर त्यांना सर्वत्र शिवाजीच दिसले असा एक चमत्कार सांगतात. पण चमत्कारांवर इतिहासाचा विश्वास नाही. कदाचित यावेळी अनेकांचा वेष शिवाजी सारखा असावा. शिवाजीने तुकारामास धनद्रव्य व पालखी पाठविली पण तुकारामाने स्वीकार केला नाही. शिवाजीने तुकारामाच्या उपदेशावरून राजसंन्यास घेण्याचे ठरविले पण तसे न करण्याबद्दल तुकारामानेच शिवाजीचे मन वळविले. वगैरेंद्वारा तुकाराम शिवाजी गुरु-शिष्य संबंध सिद्ध करण्यात येतो. श्री. सरदेसाई वगैरेंच्या म्हणण्यानुसार तुकारामाच्या अभंगांचा शिवाजीच्या मनावर परिणाम झाला होता."

      सारंग दवे

      Delete
    2. Thanks Sir! for prompt response!

      Delete
  28. शिवशाहीर अशी बिरुदावली मिरवणारा आणि शिवइतिहासाच्या नावाखाली ब्राम्हणी इतिहासाची बेमालूम "बतावणी" करणारा एक बेमुर्रवत सोंगाड्या या महाराष्ट्रात राहतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महान आणि जेष्ठ अभ्यासक म्हणून मिरवतो. इतिहास संशोधनाच्या नावाखाली वाटेल त्या थापा मारतो. आणि वरतून " मी म्हणेल तोच खरा शिवाजीचा इतिहास अशी उर्मट मिजाशी दाखवतो....तरीही महाराष्ट्रातील कुणाही शिवप्रेमींनी त्याचे मुस्काट फोडून त्याला ताळ्यावरआणण्याचे धाडस दाखवले नाही हें आपली मनगटे मोडल्याचे आणि मन -मेंदू बधीर झाल्याचेच लक्षण म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  29. बाबासाहेब पुरंदरे स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणवतात तर त्यांनी सत्य इतिहासाचे कठोर विश्लेषण करायला हवे . परंतु त्यांचे लिखाण अडचणीचे (ब्राम्हणा साठी ) ठरणारे संदर्भ गाळून मांडलेली वजाबाकी असते . प्रतापगड प्रसंगातील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला होता त्यात महाराज जखमी देखील झाले होते आणि शिवाजी महाराजांनी तिथे अफजल खान प्रमाणे कृष्णाजी भास्कर ची सुध्धा खांडोळी केली होती. ही घटना पुरंदरे प्रतापगड प्रसंगातून बेमालूम पणे वगळतात.त्याने फक्त भेट ठरवण्याची बोलणी दूत म्हणून केली एवढाच संदर्भ पुरंदरे देतात. पुन्हा लिखाणात त्याचे आडनाव लपवून फक्त "कृष्णाजी भास्कर " एवढाच उल्लेख करतात .

    ReplyDelete
  30. अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही
    खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो
    तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास)
    भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहिला गेला.
    अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार
    मारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील
    मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हा होता. त्याने राजांची अनेक गुपिते खानाला सांगितली.
    प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.
    राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांच्या कपाळावर तलवारीचा वार
    केला. (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री
    कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनी राजांच्या कपाळावर वार केला. राजांच्या संपूर्ण आयुष्यात
    कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या
    केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील
    राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते काम कृष्णा कुलकर्णीने केले. कुलकर्णीला खात्री होती की
    राजा आपणाला ठार मारणार नाही. कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. पण राजांनी
    कपाळावर वार करणा-या दहशतवादाचे मूळ कृष्णा कुलकर्णीचे तुकडे-तुकडे केले. म्हणजे राजांनी
    ग्रंथप्रामाण्य नाकारले. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णीने पहिला वार केला होता.
    याप्रसंगी सिद्धी इब्राहिम हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे
    जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? याचा विचार
    वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला
    प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांवर वार करणा-या कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी
    केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.

    ReplyDelete
  31. सरकार ,
    तुम्ही एक प्राथमिक चूक करत आहात - ती म्हणजे ,
    समजा हाच प्रसंग शहाजी राजेंच्या आयुष्यात घडला असता तर ?- म्हणजे तेपण मुसलमानांच्या चाकातीत होतेच ना ?
    कृष्णाजी कुलकर्णी ज्याचे मीठ खात होते त्याचा त्यांनी मान राखला - त्यांना शिवाजी हा - त्यांच्या लेखी एक असामान्य वगैरे कोणीही नव्हता -त्यामुळे ते वागले ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच होते -आणि शिवाजीने त्याना कापून काढले असेल तर तेही बरोबरच आहे - कृष्णाजी कुलाकार्निनी गद्दारी तरी केली नाही -नेताजी पालकर यांचे नाव बघा - त्यांना नेताजीच म्हणतात -त्याचे काय ?
    मला नाही वाटत शहाजी राज्यांनी ते जर असते तर मुसलमानी ताख्ताशिवाय कुणाची पाठराखण करून फितुरीचा धब्बा लवून घेतला असता !
    हे ज्याचे त्याचे प्राक्तन आहे !
    नेताजी पालकर हे तर प्रती शिवाजी होते - त्यांना शिवाजीने परत आपल्या धर्मात घेतले !
    आजच्या चष्म्यातून तो इतिहास बघणे म्हणजे नादानी आहे !
    आजचे शिवाजीचे वंशज सातारला चोवीस तास मद्याच्या धुंदीत काय दिवे लावत आहेत तेपण आम्ही वेगळे सांगायला नको ! आम्ही घोरपडे -
    शिवाजीने मोरे ,घोरपडे इत्यादी लोकाना नेस्तनाबूत केले ते का ?त्याला सलग आपली सत्ता हवी होती - २-४ छोटी छोटी हिंदू राज्ये त्याला नको होती - ते का ?त्याला हुकमी एकमुखी निष्ठा हवी होती -
    अफझलखानाशी कृष्णाजिनी निष्ठा ठेवणे ह्यात त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे काहीहीचूक नाही !
    पृथ्विराज घोरपडे

    ReplyDelete
  32. शिवाजीच्या आधी शहाजीने आपले राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला - त्याला अनेक पाण उतारे सहन करावे लागले .त्याचीच परिणती म्हणजे शिवाजीचे राज्य ! त्याला शिवाजीचे राज्य इतकेच म्हणता येईल -विजय नगरचे साम्राज्य आणि शिवाजीचे राज्य याची तुलनाच होऊ शकत नाही - शिवाजी संपूर्ण मराठा वर्गाला सुद्धा आपल्या बरोबर वळवून घेऊ शकला नाही - बाजीप्रभू मुरारबाजी यांनी देह ठेवले ,तानाजी मालुसरे यांनी जीव ओवाळून टाकला -
    शिवाजीशी उभे वैर जावळीच्या मोरे यांनी का धरले , ते तर शिवाजीला आपल्या बरोबराचेही मानत नाहीत - आजही - या घडीलासुद्धा !
    शिवाजी -घोरपडे यांचे वैर का होते - सासरी शिवाजीला मान का नव्हता ?
    शिवाजीचे एक ध्येय होते - स्वतःचे राज्य - त्यासाठी त्याने आत्ताच्या प्रतीशिवाजिंसारखे कितीतरी डोंबारी खेळ केले - शिवाजीला अष्ट प्रधान मंडळ मिरवून असे दाखवून द्यायचे होते की मी माझे राज्य जनतेसाठी निर्मिले आहे - पण -

    तसे काहीही नव्हते - राज कारणात दाखवायचे दात एक आणि खायचे एक असेच असते - शिवाजी त्याला अपवाद नव्हता -त्यामुळे ब्राह्मणांच्या नावाने ज्याना अप प्रचार करायचा असेल त्यांनी अवश्य करावा - कारण ब्राह्मण वर्ग हा राज्य जपण्यात अस्सल होता - शिवाजी बरोबर असलेल्या आग्र्याच्या प्रवासातील ब्राह्मणांनी जे हाल सोसले त्याची कुणीही स्तुती करत नाही - पण शिवाजीने त्याचे महत्व शेवट पर्यंत ठेवले असे तरी झाले का ?शिवाजीला संभाजीला समर्थ रामदास यांच्या कडे ठेवावेसे वाटले - ते का ?असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात -एकाच फुटपट्टी घेत एकदम सर्व जातीवर शिक्का मारणे चूक आहे -
    शहाजी सुद्धा असेच आपले खालेले मीठ लक्षात ठेवून अफझलखान भेटीत कुलकर्णी सारखे वागले असते हे नक्की - त्यानेही शिवाजीवर असाच वार केला असता - अशी त्याची स्वामीनिष्ठा होती

    आणि मराठा वर्गाचे हितसंबंध चव्हाट्यावर आणणारे हे ब्राह्मण असल्यामुळे ते मराठा वर्गाच्या ते डोळ्यात सलतात ! आज जे खेड्यातून शोषण होत आहे ते या जमीनदार वर्गाकडून होत आहे का ब्राह्मण वर्गाकडून ?
    - सहकार सम्राट म्हणून असोत , साखर सम्राट असोत , शिक्षण सम्राट असोत सर्वत्र पिळवणूक करणारे मराठा आहेत आणि तरी त्याना आरक्षण हवे आहे - हा तर फारच मोठ्ठा विनोद आहे -आज शाळातून शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे की इतर जातीचे लोकही आता ब्राह्मणाच्या हातचे शिक्षण आणि हे शिक्षण अशी तुलना उघडपणे करत आहे - त्यांच्या लक्षात सगळे हळूहळू येते आहे ! ब्राह्मण वर्गाबाबत असा जहरीला अप्रचार करणे मराठा लॉबीला अतिशय आवश्यक आहे ! नाहीतर त्यांना प्रचाराचा मुद्दाच नाही उरत !
    नरेंद्र मोदी सरकार आल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे !
    सर्वत्र मोदी लाट आली हे एक चांगले चिन्ह आहे - देशाला नवीन दिशा मिळून जाती द्वेषाचे राजकारण लयास जाईल हे नक्की !
    शिवाजी महाराज की जय
    दादोजी कोंडदेव अमर राहोत
    समीर घाटगे

    ReplyDelete
  33. मुळात हा मुद्दा इतका महत्वाचा आहेच कुठे ?
    खरेतर ज्याने त्याने आपली स्वामीनिष्ठा जपली ! इथे ब्राह्मण आणि इमान अशी चर्चा करायची असेल तर आग्र्याला शिवाजी बरोबर जे ब्राह्मण होते त्याना पकडल्यावर त्यांनी किती हाल सोसले ते आठवा !सरसकट एखाद्या जातीवर बदनामीचा शिक्का का मारायची घाई झाली आहे
    म्हणजेच आजच्या राजकारणाची ती गरज आहे असेच म्हणावे लागेल !तुम्ही ब्राह्मणाना घाबरता असाच अर्थ होतो -पण ब्राह्मण आपल्याला अजिबात घाबरत नाहीत !राज्य करताना तुम्हाला त्यांचाच आधार घ्यावा लागतो -आज मंत्रालयात आणि सचिवालयात काय दिसते - सगळे नियम धाब्यावर बसवून , सगळी आरक्षणे बाजूला सारून , मंत्र्यांना ब्राह्मणाच लागतात -आज दिल्लीत सुद्धा ब्राह्मण वर्गाचीच चालती आहे -
    आजच्या सारखे पांढऱ्या टोपीचे राजकारण केले नाही - अफझलखान भेटीच्या प्रसंगात कृष्णाजी कुलकर्णीच्या जागी खुद्द शहाजी राजे असते तरी त्यांनी आपली स्वामीनिष्ठा दाखवत अफझलखानाशी इमान राखले असते - हे १०० टक्के सत्य आहे .कारण स्वामीनिष्ठा हे त्याकाळचे ब्रीद होते ! आजही आहे !
    एकनाथ पन्हाळे

    ReplyDelete
    Replies
    1. पृथ्वीराज घोरपडे, नम्रता कुदळे, समीर घाटगे, एकनाथ पन्हाळे तसेच आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणाऱ्या बामना, तू तुझे खरे नाव सांगशील काय?

      अविनाश, ठाणे.

      Delete
  34. स्वामी निष्ठा वगैरे काहीही नाही, स्वामीच मारला गेल्यावर कशाची आलीय निष्ठा ! कृष्णा कुलकर्णी वकील होता की कसाई? शिवरायावर वार करायची मेल्याची हिम्मतच कशी झाली? बामणांनी शिवाजीचा काटा काढण्याचा बेत रचला होता, त्याचीच ही चुणूक होती! मेल्याला वाटत होते की शिवाजी बामनाची हत्या करणार नाही. "ब्राह्मण हत्या पाप" हे खूळ आपल्या पूर्वजांनी बहुजनानांच्या डोक्यात कोंबून ठेवले आहे आणि बहुजन शिवाजी हे पाप कदापि करणार नाही अशी कृष्ण कृत्य करणाऱ्या कृष्णा कुलकर्ण्याची गोड समजूत होती. मात्र झाले उलटेच, शिवाजीने त्याची खांडोळी केली. "ब्राह्मण हत्या पाप" या मनुस्मृतीतील कलमाला शिवाजीने पहिला सुरुंग लावला.

    राजेंद्र सावंत.

    ReplyDelete
    Replies
    1. अहो शहाणे राजेंद्रकुमार !
      फारच फिल्मी बोलता लिहिता बाबा तुम्ही !
      स्वामिनिष्ठ म्हणजे समजले नाही का तुम्हाला - ?
      ते ब्राह्मण आदिलशाहीचे चाकर होते जसे शहाजी राजे होते - त्यांनी निष्ठा कोणाशी दाखवायची ? खालेल्या मिठाशीच ना ? मरेपर्यंत !त्याचा इतका का मानसिक त्रास होतो आहे ? शहाजीपण तिथेच नोकरीला होता - मुजरे करत होता अगदी कमरेत झुकून !आणि शिवाजीचे जिजाबाइचे वडील निजामशाहीत कमरेत झुकून मुजरे करत होते आणि निजामाची दाढी कुरवाळत होते ! - ते आदर्शच नाही काय ? शिवाजीचे मत अफझलखानाला संपवायचे असे का झाले ? त्याच्या राज्यावर अस्मानी संकट म्हणून तो आला होता !- कृष्णाजी कुलकर्णी हा जिवावर उठला होता - त्याला संपवणे हे शिवाजीचे आत्म रक्षणासाठी आवश्यकच होते - कुणीच चुकले नाही - अफझाल्खानही नाही - कृष्णाजी कुलकर्णीही नाही आणि ब्राह्मणाला मारणारा शिवाजीही नाही !सर्वच आपालाल्या जागी योग्यच वागले - - हा इतिहास समजायला , कार्य कारण भाव जाणायला जी बुद्धी लागते ती मात्र मराठा समाजाला नाही - ते तो इतिहास आजच्या राजकारणा साठी वापरू बघत आहेत !
      धनगर समाजाला आरक्षण मिळावे असे वाटून ते रस्त्यावर का उतरत नाहीत ?
      शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी आरक्षणासाठी मराठ्यानी केलेल्या राजकारणाचे कौतुक केले असते का ते आपल्याच जातीच्या लोकांवर पिसाळले असते ?
      पतंगराव आणि कराड डी वाय पाटील आणि नवले यांचा सत्कार केला असता का ?
      साखर सहकार आणि शिक्षक सम्राट ही समाजाला लागलेली कीड आहे असे म्हणाले असते ?
      प्रत्येकाने आपले उत्तर शोधायचे आहे -
      वर्तमान काल आणि राजकारण - समाजकारण- समाजाची बांधिलकी याबाबत आजचे नेतृत्व आणि शिवाजी महाराज यांच्या वागण्यात काय फरक आहे ?ते तपासून बघा -
      इतिहासाला आपण नंतर बघुया - असे समजून आजच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ते बघा !
      ब्राह्मणांकडे नंतर बघता येईल पण आज हि जुनी मधी उकरत बसण्याचे व्यसन समाजाला लावण्याबाबत नेते मंडळी मूळ मुख्य प्रश्नावरून लोकांचे लक्ष्य दुसरीकडे गुंतवून ठेवू बघत आहेत - निवडणुकी पर्यंत हा द्वेष असाच भडकवत ठेवला जावून मतांचे र्धृविकरण राखण्याचा खेळ चालू राहील - सातारच्या गाडीचा हा जुना खेळ आहे - तसेच काका भाच्याच्या राजकारणाचा हा केंद्रबिंदू आहे !तुम्ही खरेच लोकाभिमुख असाल तर धनागाराना आरक्षण देण्याचे श्रेय घ्याना !ब्राह्मण द्वेष पेटवून आपली पोळी भाजली जाइल असे का समजता ?
      मिलिंद सावंत

      Delete
    2. अहो घोरपडे साहेब ! एकदम मस्त !
      फारच जाज्वल्य आहे तुमचे लिखाण ,
      एकदम मन हरकून गेले - आणि हो -
      सातारच्या वंशजांचे म्हणाल तर ते कसले आलेत शिवाजीचे वंशज ?
      हे काही खरे रक्त नाही - असेच भाडोत्री ! हे काय दिवे लावणार ? पेताड राजा तोसुद्धा नामधारी !
      त्याना म्हणावे असेल हिम्मत तर या रस्त्यावर आणि धनगर समाजाला न्याय मिळवून द्या !
      पिढ्यान पिढ्या त्यांनी हाल अपेष्टा सोसल्या आहेत घाट माथे आणि कुरणे हिंडण्यात त्यांचा जन्म जातो आहे त्यांचा वाली होण्याचे पुण्य घ्या - शिवाजीचा वंश कधीच संपला - आत आता निदान लोकांची दुवा तरी मिळावा - तुमच्या सातारच्या सिंहासनाच्या खुरांवर धनगराचे कुत्रे पाय वर करून आपली करामत दाखवेल हे लक्षात ठेवा !
      खंडेराय धनगर

      Delete
    3. मस्तच, बामना!

      स्वतः च लिहायचे फडतूस पणे आणि ती ही बहुजना मधील नावे वापरून, त्याला स्वतः च उत्तर द्यायचे दुसरे एक बहुजनातील नवा वापरून लिहून पाठ थोपटून घ्यायची ही तुझी जुनी खोड आहे. सुधार लेकाच्या सुधर! एवढा का घाबरला आहेस ते तरी सांग! पायाखालची वाळूच काय पृथ्वी देखील सरकली वाटते!
      तुझे पितळ कधीच उघडे पडले आहे रे! भटा! हे लक्षात ठेव की कोणत्याही बामनाने बहुजन पणाचा आव आणून लिहिलेले ओळखणे अजिबात अवघड नसते!

      अविनाश, ठाणे.

      Delete
  35. स्वामी निष्ठा वगैरे काहीही नाही, स्वामीच मारला गेल्यावर कशाची आलीय निष्ठा ! कृष्णा कुलकर्णी वकील होता की कसाई? शिवरायावर वार करायची मेल्याची हिम्मतच कशी झाली? बामणांनी शिवाजीचा काटा काढण्याचा बेत रचला होता, त्याचीच ही चुणूक होती! मेल्याला वाटत होते की शिवाजी बामनाची हत्या करणार नाही. "ब्राह्मण हत्या पाप" हे खूळ आपल्या पूर्वजांनी बहुजनानांच्या डोक्यात कोंबून ठेवले आहे आणि बहुजन शिवाजी हे पाप कदापि करणार नाही अशी कृष्ण कृत्य करणाऱ्या कृष्णा कुलकर्ण्याची गोड समजूत होती. मात्र झाले उलटेच, शिवाजीने त्याची खांडोळी केली. "ब्राह्मण हत्या पाप" या मनुस्मृतीतील कलमाला शिवाजीने पहिला सुरुंग लावला.

    राजेंद्र सावंत.

    ReplyDelete
  36. वा रे वा ! स्वामीनिष्ठा !

    या लोकांना निष्ठा काय असते हे तरी माहित आहे काय?

    एवढे स्वतःला निष्ठावान समजत असते तर बामणांनी मुस्लिम शासकांची आणि इंग्रजांची चाकरीच केली नसती. स्वतः चे भले आणि स्वतःच्या जातीचे/वर्णाचे भले, या खेरीज इतरांचे भले झालेले यांना अजिबात आवडत नाही. इतिहासातील यांची कटकारस्थाने / बिंगे जसजशी लोकांना समजू लागली आहेत तसतशी यांची डोकी बधिर होत चालली आहेत. आता फक्त सारवासारव करण्या व्यतिरिक्त हे काहीही करू शकत नाहीत.

    राम जाधव

    ReplyDelete
    Replies
    1. अहो राम जाधव , खुद्द शहाजी महाराज हेपण मुसलमान शासकाकडे चाकरी करत होतेच ना ?
      ते थोर शिवाजी महाराजांचे पिता होते असे आम्हास वाटते - ते बरोबर ना ? का काही वेगळे आहे आपले म्हणणे ?
      शिवाजीचे वडील शहाजी असे आम्ही मानतो ! - काय ते तुम्हीच सांगा -
      आणि हो ! त्या थोर पित्याला त्याच्या सासरीतरी कोणी मान देत होते काहो ? काय बरे त्यांच्या सासऱ्याचे नाव ? जिजबाइचे माहेर ? लाखोजी जाधव ?- तुमचेच आडनाव बंधू !- का सगेसोयरे ?
      (संजय सोनावाणी ना विचारून प्ल्यांचेट वर बोलावून विचारून घ्या ) -
      रागावू नका नागडे ! कसतरीच वाटत ! अस्रागावायाच नाही नागडे !
      सॉरी हं जाधव शेठ - तुम्ही दिवसा पोटापाण्याचे काय करता ? घोड्यांना खरारा का ?
      म्हणजे काय ? तुम्हीपण जाधव आणि ते पण जाधव !
      आणि हे लखोजी जाधव हेपण म्हणे निजामशाहीत शाही चाकरीला होते !
      म्हणजे कमालच झाली - ते तुमचे नातेवाइक होते का ?
      म्हणजे राजमाता जिजाबाई चा नवरा आदिलशाहीत आणि वडील निजामशाहीत ! क्या बात है !
      आणि मुलगा शिवाजी ? तो पण मुघलांचा रेकोर्ड प्रमाणे मनसबदार !
      आता त्याला ब्राह्मण काय करणार ? तेपण तसेच वागत गेले - याबद्दल आपले मत तरी न विसरता लिहा !या मराठा लोकाना मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते , पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही !
      पृथ्वीराज घोरपडे

      Delete
    2. पृथ्वीराज घोरपडे (बामना) तुला सुधरायचे आहेकी नाही? खोटारड्या थोडी शरम कर. कुठपर्यंत असा बालिशपणा करीत राहणार. तुझ्या पांचटपणे लिहिण्याला काडीचीही किंमत नाही, हे लक्षात ठेव.

      Delete
  37. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवरायाना संपविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहात होते . याला धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बरे वाईट होण्याची शक्यता होती . कारण अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कट्यारीने वार केला . परन्तु चिलखत असल्याने महाराज बचावले व चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला .
    तेवढ्यात राजांवर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला. हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परंतु यापुढे काय झाले ते जाणीवपूर्वक दुर्लक्षिले गेले आहे. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायांच्या अंगावर वार केला. राजानी तो वार चुकविन्याचा प्रयत्न केला परंतु कपाळावर वार झालाच.

    हा इतिहास का दाखवला
    जात नाही ?
    महाराजांच्या कपाळावर खोल जखम झाली. शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू-ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हायलाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे महापातक अनेक जण आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ? हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा, पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मांडणी केली जात असेल तर कृष्णा कुलकर्णीकडे केवळ ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ? तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?

    अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले. ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मानपूर्वक प्रताप गडावर उभारणारा राजा एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल. शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे. त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्मग्रंथाना हानी पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मांडणी जाणीवपूर्वक करायची, असे प्रकार सर्रास घडत असतात. अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत, असेही कुणी समजू नये. सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख होता. नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख होता. काझी हैदर हा मुसलमान त्यांचा वकील, न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे. मुसलमान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अंगरक्षकापैकी अर्धे मुसलमान होते आणि ही प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसे होती. आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केली नाही. असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मांडायचे आणि राजांच्या पदरी असणाऱ्या प्रामाणिक मुसलमान मावळ्याकडे दुर्लक्ष करायचे, हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुरते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “धार्मिक दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही टाळू शकतो. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना , “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .”

    शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे. शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या, इथल्या मातीवर अत्याचार करणार्या सैतानांच्या विरुद्ध होता. शिवराय सर्वधर्म समभावानेच आयुष्यभर जगले. त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही.

    ReplyDelete
  38. जेंव्हा कृष्णा कुलकर्णी शिवरायांवर वार करीत होता त्यावेळेस शिवरायांचा वकील गोपिनाथपंत बोकील (ब्राह्मण) हा काय गोट्या खेळत होता काय? याची स्वामीनिष्ठा कुठे भटकायला गेली होती, हा ही एक संशोधनाचा विषय आहे! भटूकले सारे इथून-तिथून सारखेच!

    अंजली शिंदे

    ReplyDelete
    Replies
    1. अय्या अंजली - तू पण आलीस वाटते भांडायला !
      अग मला एक सांग !
      शहाजीराजे आदिलशाहीत चाकरीत आदिलशाहीला मुजरा करत होते आणि जिजबाई चे वडील दौलताबादला मोठ्ठे सरदार - जहागीरदार ! ते निजामाला मुजरा करत होते आणि मला सांग अशा मारामारीत अफझलखान आला तर तो पण कुठून आदिलशाही तूनच ! म्हणजे आता काय ग करायचं ? बर शिवाजीचा पुंडावा हा अजून राजमान्य झाला नव्हता !
      अफझलखान मेला १६५९ ला म्हणजे शिवाजी होता २९ वर्षाचा !त्याला अफझलखान मारायचे माहित होते पण , तुकारामाचे खुनी शोधायचे समजत नव्हते ! वडील आणि आजोबा जहागीरदार !त्या वेळी वकील बोकील काय म्हणणार ? हे काय आज वैरी आहेत उद्या गळ्यात गळे घालून हिंडतील
      आजचे राजकारण काय आहे ? तेच मराठे -तेच रक्त - तेच प्रजेला लुटणे - फक्त आता नाव वेगळे - साखर सम्राट - शिक्षण सम्राट सहकार सम्राट - आज सहकार क्षेत्र ब्यांक इतकी बदनाम झाली आहे ती कोणामुळे ?सगळेच लुटारू - ब्राह्मणांनी थोडेच लुटली हि ब्यांक / आज शेतकरी आत्महत्या का करतो आहे ? ब्राह्मणांमुळे ?- अग अंजली - असं तावातावाने ओरडून असत्य कधीही सत्य ठरत नाही - तुमच्या मराठा लोकांची अब्रू आता वेशीवर टांगली जात आहे - तचा घासत शेतकरी लोकांचे
      तळतळाट कुठे आणि लाखांचा पोशिंदा म्हणवून राज्याभिषेक करवून घेणारा तो नृपसिंह कुठे !
      बाळासाहेब असे पर्यंत शिवाजी हे महाराष्ट्राचे दैवत होते आता ते मराठा जातीचे राखीव दैवत करणारे कोण आहेत ? खुद्द मराठाच !- शिवाजी महाराज आज हयात असते तर ? त्यांनी या मराठा नेत्यांची चामडी लोळवली असती - शिक्षण सम्राट नेत्याना मुसक्या बांधून टकमक टोकावरून ढकलले असते !
      अंजली - बघ पटत असेल तर सांग - आपल्याच लोकाना सांग - शिवाजीचे नाव घेण्याची तरी लायकी आहे का त्यांची ?
      नम्रता निंबाळकर

      Delete
    2. नम्रता कुदळे ची नम्रता निंबाळकर कधी झाली? आता आताच लग्न झाले काय तुझे? चावट माणसा स्त्रियांची नावे वापरून लिहितोस, बामना तू भेकड आहेस काय? अखेर तुला झाले आहे तरी काय? मिरजेला जा! तेथे मानसिक रोग्यांना मस्त उपचार मिळतो, चांगला तंदुरुस्त होऊन ये! तुला विश्रांतीची सुद्धा खूप खूप गरज आहे. बघ जमलेतर, नाहीतर आहेच "उलट्या घड्यावर पाणी."

      अंजली शिंदे

      Delete
  39. तुम्ही ब्रिगेड ला शिव्या देता, पण तुम्ही तरी कोठे खरे आहात काय हा मुर्खपणा हिंदुत्ववाद्यांचा ???? पण सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. अरे मुर्खांनो जर असेच विचार केला असता त्याने तर त्या हरामी बामनाने अंगावर कोठेही वार केला असता पण नाही वार हा डोक्यावरच का केला ...शेवटी बामन धुर्त त्याला माहीत होतं की राजे चिलखत परिधान करून आले असनार त्यामूळे डोक्यावर मारले तरच राजे मरतील, आणि त्याने वार बरोबर डोक्यावर केला.झालं शिवरायांच्या कपाळावर खोक पडली आणि बघता बघता लाखो लोकांचा पोशिंदा बहुजन प्रतिपालक रक्ताने न्हाऊन निघाला.
    पुर्ण आयुष्यभर शिवरायांनी मोठ - मोठ्या लढाया केल्या, अदिलशाही, निजामशाही, मोघल , सिद्धी यांच्याशी वेळोवेळी दोन हात केले पण शिवरायांना कधी खरचटलं सुद्धा नाही.पण एका क्षुद्र ब्राह्मणांने मात्र शिवरायांना जखमी केलं.यावरून समजते की शत्रु कोण होते स्वराज्याचे.
    कुष्णा कुलकर्णी ने शिवरायांना मारण्याची हरामखोरी का केली? कारण हिंदूंच्या धर्मग्रंथाप्रमाणे "ब्रह्महत्या पाप आहे" असा नियम भिकारड्या ब्राह्मणांनी बनवून ठेवला होता.कुलकर्ण्याला वाटले परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.आपनही परशुरामाचा आदर्श घेऊन क्षत्रियांचा कुलभुषण असलेल्या शिवाजीला ठार करू पण घडले उलटेच शिवरायांनी "ब्रह्महत्या पाप आहे" हे कलम मुळासकट उखडून टाकून कृष्णा कुलकर्णीला टरा टरा फ़ाडला.

    शिवरायांनी एक ब्राह्मण कापताना दाखविला तर भटांची लाही लाही होते.

    ReplyDelete
  40. पृथ्वीराज घोरपडे, नम्रता कुदळे, समीर घाटगे, एकनाथ पन्हाळे, नम्रता निंबाळकर, मिलिंद सावंत, खंडेराय धनगर तसेच आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिखाण करणाऱ्या बामना, तू तुझे खरे नाव सांगशील काय? खरे नाव ताबडतोब सांग नाहीतर विक्रम वेताळाच्या गोष्टी प्रमाणे म्हणावे लागेल "तुझ्या डोक्याच्या हजार ठिकऱ्या होतील."

    अविनाश, ठाणे.

    ReplyDelete
  41. बाब्या पुरंदरे बद्दल कोणीच लिहित नाही?

    ReplyDelete
  42. मुद्दामच परत एकदा अहो अनामिक - तुमच्याशी चर्चा करुया -
    मी आप्पा बाप्पा नाही की घाटगे वा घोरपडे नाही हे नक्की !

    मला एक सांगा - शहाजीराजे ,अफझलखान आणि कृष्णाजी कुलकर्णी हे सर्व कोणाचे नोकर होते ?कोणाला मान खाली करून झुकून मुजरा करत होते ?- आदिलशहाला - त्यांचा राजा कोण - तर - आदिलशहा - हो - शहाजीचापण - अशा वेळी त्यांनी त्यांचा शत्रू शिवाजीला का म्हणून जिवंत सोडायचे ?
    शिवाजीने कृष्णाजी कुलकर्णी ला मारला हे योग्यच आहे - त्यात कुणालाही दुःख वाटत नाही - आणि कृष्णाजी ने शिवाजीवर हात उचलला आणि वर्मी घाव घातला म्हणून आजच्या घडीला वेगळे अर्थ काढायची गरज नाही ! तो न्यायानेच वागला !आणि शिवाजीनेही त्याला शत्रूची वागणूक देत त्याचा संहार केला - झाले ते अगदी योग्यच झाले - पण म्हणून सर्व ब्राह्मण एकाच
    फुटपट्टीने मोजायचे राजकारण कशासाठी ?आज शिवाजी असता तर त्याने काय सांगितले असते ? आजही सर्व ब्राह्मणाना मारत मैदान साफ करा ?
    शिवाजीने ब्राह्मणाचे डोके उडवले तसे प्रत्येक मराठ्याने एकेका ब्राह्मणाचे शीर दसऱ्याला उडवायचे आणि सीमोल्लंघनाचा आनंद साजरा करायचा ?
    असे तर आपणास म्हणायचे नाही ना ?
    आजचे नियम त्या काळाला लावून काय उपयोग -सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही विसरत आहात -

    जसे शिवाजीने ठराविक प्रसंगात ब्राह्मणांचा मुलाहिजा ठेवला नाही तसेच त्याने आपल्या आईला - जिजामातेला सती जाण्यापासून परावृत्त केले आहे - केव्हडा हा थोर विचार आहे !- काळाच्या कितीतरी पुढे जावून त्याची हि कृती फारच क्रांतिकारी आहे - सर्व ब्राह्मण आणि तथाकथीत चालीरीतीना विरोध करत त्याने आपल्या आईचे केशवपनही केले नाही आणि तिला सतीही जाऊ दिले नाही ! असा हा थोर राजा - कृष्णाजी हा शत्रू पक्षाचा होता म्हणूनच त्याने महाराजांच्या जिव्हारी घाव घातला आणि महाराजांनी त्याला तत्काळ वरचा रस्ता दाखवला !
    तीच कथा सुरत लुटण्याची - शिवाजीने त्यात काहीही गैर मानले नाही - !
    आणि तसाच तिढा संभाजी हा मुघलाना जाउन मिळाला त्यावेळचा आहे !
    का नाही शिवाजीने संभाजीचे मस्तक उडवले ? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो !

    आता थोडे शिवाजीचे वडील शहाजी यांचे विषयी - त्यांनी नगरच्या निजामशाहीची सेवा केली आणि मुघलांनी त्यांचा पूर्ण पराभव केल्यावर मुघलांच्या आज्ञे प्रमाणे शहाजीला आदिलशाहीत टाकण्यात आले - तेथे त्यांनी केम्पे गौडा -३ वगैरे ,हिंदू राजांचा पराभव करत आदिलशाहीची सेवा केली आणि मोबदल्यात आपली जहागीर स्थापन केली - थोडक्यात म्हणजे मुस्लिम राजाची सेवा करताना एका हिंदू राजाला देशोधडीला लावत आपले राज्य आणि नाव कमावले ! त्यावेळेस साल काय होते ? १६३८ -
    त्यानंतर शिवाजीच्या खोड्यांमुळे आदिलशहाने शहाजीला कैद केले आणि अफझलखानाने शिवाजीचा भाऊ संभाजीला ठार मारले -
    तात्पर्य , शहाजी हा आदिलशाहीशी हरामी करतच आपले राज्य स्थिरावत होता - १७००० ची फौज घेवून तो अफ़झल - शिवाजी भेटीचा काय निकाल लागतो ते बघत , विजापूर जवळ उभा होता - बडी बेगम ला त्याने धमकी दिली होती की याद राख , जर शिवबाला काही इजा झाली तर मी या आदिलशाहीची राख रांगोळी करीन ! याला काय म्हणायचे ? स्वामीनिष्ठा ? याच आदिलशाहीने त्यास तंजावूर आणि बंगलोर चे राज्य दिले , उरलेले त्याने स्वधर्मीय राजाना पराभूत करून मिळवले ! बेईमानी कुठे संपते आणि इमान कुठे सुरु होते ते कसे आणि कोण ठरवणार ?
    मग तो ब्राह्मण असो किंवा मराठा किंवा मुसलमान !
    अफझलखान असताना शहाजी जिवंत होता शहाजी राजे १६६४ पर्यंत होते - बाजी प्रभू लढताना ते होते , शाहिस्तेखान आला तेंव्हा ते जिवंत होते - मिर्झा राजे दक्षिणेस निघाले त्यावेळेस मात्र ते नव्हते -

    ब मो पुरंधरे यांचे शिव्स्तुतीचे कार्य आपणास नाकारता येणार नाही !
    शिवाजीची कथा कशी सांगावी हे त्यांचे तंत्र अगदी सुंदरच आहे !
    आग्र्याचे शिवाजीचे पलायन आणि पेटाऱ्यातून पळून जाणे हे मात्र आपण अगदी श्रद्धेने मान्य करतो !शाहिस्तेखानाची कथा , आपण चवीने ऐकतो , कल्याणाच्या सुभेदाराची कथा आपण श्रद्धेने ऐकून धन्य होतो आणि अफझलखानाची कथा ऐकून आपण भारावून जातो !
    मी आप्पा नाही नि बाप्पा नाही - गोर्पडे नाही घाटगे नाही - मी एक शिवप्रेमी आहे !
    शिवाजी महाराज की जय ! त्यांना फक्त मराठा समाजाची मालकी लावून लहान करू नका !
    ही हात जोडून विनंती आहे !
    वेगळा विदर्भ , वेगळे बेळगाव याबाबत महाराज काय म्हणाले असते ?

    ReplyDelete
  43. खास अविनाश शारंग देव आणि अंजली साठी -
    आत्ता मला थोडे थोडे समजू लागले आहे
    अविनाश , सारंग देव ,आणि इतर लोकाना मानला पाहिजे - त्यांचे म्हणणे आहे की
    आप्पा बाप्पा , घाटगे , नम्रता , घोरपडे या एकच व्यक्ती आहेत - म्हणजे एकटा कुणीतरी अनामिक इतका मोठ्ठा वाद रंगवू शकतो ?आणि हे लोक त्याच्या बरोबर वाद घालत बसतात - म्हणजे काय त्याची प्रतिभा असेल ,आणि अशी नावे घेणारा बामन लगेच ओळखू येतो हे ठाण्याच्या अविनाशचे बोलणे म्हणजे काय ? अशुद्ध लिहिले म्हणजेच मराठा आणि शुद्ध लिहिले की ब्राह्मण ?आपलीच अब्रूची लक्तरे कशाला टांगता वेशीवर - म्हणा की आम्हीपण बामानापेक्षा शुद्ध लिहितो ,आणि अचूक बोलतो -पण नाही , वळणाचे पाणी वळणालाच जाणार !
    मग आमचे संजय सर तर अगदी कोब्राच म्हटले पाहिजेत इतके शुद्ध असते त्याचे बोलणे वागणे आणि लिहिणे आणि ह्या अविनाशचे म्हणणे -
    गावढळ लिहिणाराच मराठा असतो असेच नाही का ?
    एकतर नावे बदलून कुणी एकटाच गडी या सर्वाना लोळवत असेल हे पटतच नाही - आता हे लिहिणे किती निर्विवाद आहे - किती सुंदर लिहिले आहे - युक्तिवाद करावा तर तो असा भक्कम - वारेवा , छानच - ज्याने लिहिले आहे त्याचे कौतुक केलेच पाहिजे .

    खुद्द शहाजीच जर आदिलशाहीच्या सेवेत होता तर एखादा कृष्णाजी कुलकर्णी असला तर काय झाले ?शासकीय सेवेत त्याकाळात ब्राह्मणांचा भरणा सर्वत्र होताच
    आणि त्याने धन्याशी इमान राखून शिवाजीवर वार केला तर काय चुकले ?
    उलट शहाजीने जो बडी बेगमला दम दिला की जर शिवाजीला दगाफटका झाला तर आदिलशाहीची राख रांगोळी करून टाकीन - असे म्हणत शहाजी १७००० सैन्यासह विजापूरला ठाण मांडून बसला ही काय त्याच्या धन्याशी प्रतारणा झाली नाही का ? बेईमानी झाली नाही का ?आणि कृष्णाजी काही शिवबाचे मीठ खाउन जगत नव्हता - त्याने आपल्या धन्याशी इमान राखत शिवाजीच्या वर्मी घाव घातला हे त्याने थोरच काम केले - असे खरेतर आपण म्हटले पाहिजे
    आणि आपल्या धन्याशी बेमुर्वतखोर भाषा करणाऱ्या शहाजी चा निषेध केला पाहिजे
    अविनाश आणि शारंग देव यांनी याचे विचार पूर्वक उत्तर दिले तर बरे होईल -
    जाता जाता असे म्हणावेसे वाटते की अशा चर्चा पाहून संजय सोनावणीनी कपाळावर हात मारून घेतला असेल
    धनगराना आता सोलापूरला जाण्याचा सल्ला दिला गेला आहे - हे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणेच आहे - त्याचा निषेध केला पाहिजे -आज मराठा लॉबी साखर सम्राट सहकार सम्राट आणि शिक्षण सम्राट या रूपाने समाजाची अफाट पिळवणूक करत आहे त्या बद्दल अविनाश भाऊ आणि शारंग देव एक शब्दही बोलत नाहीत हीपण एक गम्मतच आहे हो की नाही अविनाश भाऊ

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

      १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
      २. मंदिर-राम मंदिर, बाबरी मशीद वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
      ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
      ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
      ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
      ६. शिव धर्म, बौद्ध धम्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

      भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मणविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.
      .......................................................................................................

      Delete
  44. अजिबातच डोक्याचे खोके झाले आहे या अविनाशचे
    आणि त्या सारंगाचे तर बोलायलाच नको
    तुकारामाचा खून झाल्यावर शिवाजीने का नाही त्यात लक्ष घातले ?१६५० पूर्वी शहाजीनेआणि जिजाबाईने ,तसेच शिवाजीने त्या स्वराज्यातील ल संतांचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य का नाही समजले हा खरोखरच वादाचा मुद्दा आहे
    शिवाजी लहान असेल तर शहाजी, जिजाबाई किंवा दादोजीनी या मृत्यूची दाखल घेणे आवश्यक होते
    हकनाक हाल झाले तुकाराम महाराजांचे - वाचले असते तर अजून अभंग लिहिले असते

    ReplyDelete
  45. अविनाश आणि सारंग दवे ,साहेब ,
    आत्ताचे शिवाजीचे वंशज म्हणवून मिरवणारे सातारकर राजे का नाही धनगरांच्या मदतीला धावून जात - का नाही ते आंदोलन उभारून धनगरांसाठी आपले रक्त आटवत ?कारण अगदी साधे आहे - ही अवलाद काही खरी नाही - हे काही शिवाजीचे अस्सल रक्त नाही ! हो की नाही अविनाश आणि सारंग दवे ?हे असेच कोणीतरी गाडीवर बसवलेले आहेत - त्यांचा छंदच आहे तुम्हाला भडकवण्याचा आणि ब्राह्मणाना शिव्या देण्याचा ! आजही सज्जनगडावरून जे कार्य चालते ते त्यांना बघवत नाही - आणि यांच्या घाण सवयी काही बंद होत नाही - यांच्या घरातील सर्व राजे असे पिवूनच मेले -

    हा सगळा डाव या काका पुतण्यानीच रचला आहे - मनात आणले तर पवार घराणे काहीही करू शकते पण नाही - याना धनगारांबद्दल काही वाटतच नाही - पुण्याची जास्तत जास्त लूट बिल्डर लोकांना धरून कशी करता येईल हेच त्यांचे जगण्याचे ध्येय आहे .
    धनगराना सुख लाभू द्यायचे नाही हे तर त्यांचे ध्येय आहे म्हणून आपलेच घोडे त्यांनी पुढे दामटले - त्या नारायण राणेला पुढे करून त्यांनी मस्त आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतले - पण त्यामुळे धनागारांवर अन्याय झाला - खरे नेतृत्व प्रजेसाठी लढते , पण हे हरामखोर धनगर जातीवरच उठले आहेत आणि , पुणे विद्यापीठाचा नाम विस्तार झाल्यावर आता धन्गाराना सोलापूरला जायला सांगत आहेत हा तर त्यांना
    उघड उघड टोचण्याचा प्रकार आहे -सर्व नेते मंडळी आज प्रजेची अनेक प्रकारे लूट करत आहेत हे सत्य लोकांसमोर आलेले आहे - मराठा समाज हाच जणू एक लुटारू बनला आहे - त्याना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी ब्राह्मण द्वेषाचे हत्यार उचलले की ब्रिगेडी लोक खुष !
    तो शिवाजी कुठे आणि हे प्रती शिवाजी कुठे !काय दैना झाली आहे या नेत्यांची !
    पुढच्या निवडणुकीत यांचे हाल कुत्रे खाणार नाही !
    विवेकानंद सेराव
    (आम्ही खोट्या नावाने लिहित नाही )

    ReplyDelete
    Replies
    1. विवेकानंद सेराव
      (आम्ही खोट्या नावाने लिहित नाही ) ????????????????????

      Delete
    2. चोराच्या मनात चांदणे, पकडला गेला कोब्रा !!! विवेकानंद सेराव !!!

      Delete
  46. काय म्हणता ? तुकाराम जगले असते तर अजून अभंग लिहिले असते ? मग त्याने काय फरक पडला असता ?
    साखर सम्राट , शिक्षण सम्राट आणि सहकार सम्राट हे द्रवले असते का ?त्यांनी लोकांचे भले केले असते का ?समजा तुकारामांचा खून झाला नसता तर ?
    तुकाराम महाराज साधारणपणे १५७७ ते १६५० असे ७३ वर्षे जगले असे इतिहास म्हणतो - त्यांचे अभंग लोकांच्या तोंडी पाठ झाले होते , त्यामुळे जरी त्यांना इंद्रायणीत गाथा बुडवावी लागली तरी त्याचे सुलभपणे पुन्हा लेखन झाले असले पाहिजे !- मूळ प्रश्न असा आहे की जर तुकाराम महाराज त्यांच्या जिवंतपणे एक अवतार रूप झाले असतील तरी ,त्यांची हत्या ही त्याकाळच्या नेतृत्वाने दखल घेण्यासारखी नव्हती का ? स्वराज्याचे तोरण बांधून झाले होते ,शिवाजीचा विजयरथ सर्वत्र धावत होता ,

    शिवाजी महाराजांनी त्यांच्या खुनाची दाखल घेणे का टाळले तेच समजत नाही , एकतर ते तेव्हडे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नसतील किंवा ते ब्राह्मणाना दुखवायचे टाळत असतील असे दोनच अर्थ निघू शकतात !
    पण
    खरोखरच शिवाजीच्या रूपातील तेजस्वी महामानवाला तुकोबाचे गुरुपद योग्य वाटते का ?शोभून दिसते का ?तुकाराम महाराज थोर होते , उत्स्फूर्त कवी होते , पण त्यांनी शिवबाच्या नव्या राज्यासाठी काही भरीव रचना केल्या का ?मावळ्या साठी काही मार्गदर्शक लिखाण केले का ?
    अजिबात नाही !
    मुळात विठोबा हा देव स्वातंत्र्य वगैरेशी संबंधित वाटतच नाही !
    आज वारकरी लोकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हा सर्व खेळ मांडला जात आहे !

    आजच्या राजकारणाची ती गरज आहे हे अविनाश आणि दवे मंडळीना कळतच नाही आणि मग या मराठा लॉबीचे फावते असे हे साधे सोपे सूत्र आहे आणि त्याचा उगम ब्राह्मण द्वेषातूनच होतो !
    शिवाजी आणि इंग्रजांनी ब्राह्मण लोकांच्या चातुर्याचा आपल्या स्वार्थासाठी आणि राज्य विस्तारासाठी उत्तम उपयोग करून घेतला , पण या आजच्या मराठा लोकाना ती पण अक्कल नाही - मंत्रालयात त्याचे पान ब्राह्मनांशिवाय हलत नाही पण समाजात मात्र त्यांना ब्राह्मण नको असतात !

    ReplyDelete
  47. बास करा रे बाबानो , डोके दुखायला लागले - काहीतरी पीजे तरी सांगा !
    या अविनाश आणि दवेनी फारच बोअर केले -
    तुकाराम मरून किंवा त्यांचा खून होऊन - जे काय असेल ते - शेकडो वर्षे झाली -
    शिवाजीने तेंव्हाच हा गुंता सोडवला असता तर ?
    त्यापेक्षा आमच्या धनगर बांधवांसाठी लढ रे अविनाश आणि सारंग , लोक तुझे कौतुक करतील
    तुम्हाला धनगर बांधव दुवा देतील त्यांचे किती हाल चालले आहेत आणि कोण करताय त्यांचे हाल , ब्राह्मण ? नाही - मग कोण करताय त्यांचे हाल - आता तरी डोळे उघडा !
    बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

    ReplyDelete
    Replies
    1. बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम.

      नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.

      Delete
    2. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम.

      नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.

      Delete
  48. ह्या रिकाम - टेकड्या कोब्राचे डोके अक्षरशः निकामी झाले आहे काय? अशी शंका येतेय. तेच ते फडतूस प्रश्न, रामदासी स्वयंसेवी संघटनेने (RSS) शिकविलेल्या खोट्या इतिहासाची उधळण हा नेहमी करीत असतो. निव्वळ फाफत-पसारा लिहित असतो, जास्त लिहिले म्हणजे लोक त्याला खरे मानतील अशी याची समजूत झालेली आहे, पण ते अजिबातच खरे नाही. मराठ्यांच्या शुद्ध लेखना बद्दल तू न बोललेलंच बरे! तुझी काय लायकी आहे, हे वरील लिखाणावरून लक्षात येतेच आहे. शुद्ध लेखनावरून नव्हे तर तुझ्या बहुजनद्वेषामुळेच तू जहरीला नाग (कोब्रा) असल्याचे ध्यानात येते. बामणी विचारांच्या गटारात चोवीस तास लोळत पडलेले तुझ्यासारखे हरामखोर लोक मराठ्यांना काय लोळवणार? प्रतिभा? कसली रे प्रतिभा! तू तर प्रतिभा या शब्दाला कलंक आहेस! तुझा खोटा इतिहास हा तुझ्याजवळच ठेव, त्याचा कोणालाही काडीचा उपयोग होणार नाही याची खात्री आहे.

    अविनाश, ठाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. avinash and sarang dev
      o my goodness
      we do not believe in history
      we create history

      Delete
    2. आम्ही ठरवलं आणि आईच्यान सांगतो बगा , थोड कामबी केलं
      पण काय सांगू बाबा तुला ,

      ही शेंडीवाली लोकं फार हलकट - त्यांनी इचारल्यावर आमच्या गोट्याच कपाळात -
      तुमीच काई तरि सांगा आमास्नी
      ते जानवेवाले काय म्हन्यात - आमाला एकदम मान्य म्हने तुमच बोलन - पर एक सांगा - हिंदू धर्माची आदिकृत का काय ते साईत्य काय ते स्टान्डरड म्हणत्यात ते पुस्तक कुटे मिळणार अन त्याची नाव तरी काय ?
      झाली का आमची बोलटी बंद - नाइतर काय हो
      ते म्हंत्यात तुमच्या पत्रात ४ नंबर आन५ आनि ६ नंबरला काइतरि खोट हाये तपासून बागा म्हंत्यात - काय तर म्हणे
      संडासला जाउन आल्यावर पाय न धुता पूजेला बसल तर काय झालं - त्यात काय वंगाळ हाय ?
      देव आनि परमेषर याजर अन्द्शरद्दा अस्त्यील तर मामलाच संपला म्हणत्यात -
      आणि म्हणत्यात कसे - बोम्बालायाला इत हाय तरी काय सांगायला - उगीच आपल लिहित बसलाय हा बिनबुडाचा अनामिक !
      त्यापेक्षा आपल्या अविनाशला किंवा त्या पापडी तळणाऱ्या डाव्यांच्या सारंगाला बोलवा म्हनत्यात ते काई तरी अर्थ सांगतील याचा !
      अवो त्यांच्यात म्हणजे जैन मुसलमान आणि बौद्धात पण बगा अठरा पगड जाती हायेती
      कसाई मुसलमान येगला , सय्यद वेगला , कासार पण येगला , तांबोळी पण त्यांची दुसरीच येगळी मशीद - बांग देनारेबी येगले - ते म्हणे हाजी लागत्यात , म्हणजे सगळ आपल्या सारखाच - बुद्ध बी तसलेच - महायान हीनयान वज्रयान आणि नवबौद्ध एक न्हाइत म्हणे - जैनात म्हणे असंख जाती हायेती श्वेतांबर आहे दिगंबर हाये - त्यांच्या बामणांची नी आचार्यांची लई नाटक असत्यात - त्यांची तोंड फडक बांधलेली ,आणि नागद्यांनी हिंडत्यात - ते कशाला कुणास ठाव ?
      गोव्यात पण किरिस्ताव लोकात पोटभेद पोत्यांनी हायेत - मग खर काय ?

      आपला पांडुरंग बारा कि म्हनात्यो मी - कुनीबी कस बी या - त्यो प्रेमान जवळ घेतो -आता तुमीच कंटाळा न करता सांगा मला कि खर काय ? मला अस वाऱ्यावर सोडून जाऊ नका !आमालाबी भावना आहेत कि हो !आमीबी देव शोदायाला निघालोतो - पण मग फा फापट पसारा तर सगळ्याच धर्मात हाये ! पार तितबि संजय सर छलायला येतात - ते म्हणत्यात की म्हणे आपला पांडुरंग हा खरा शिवाच हाये - म्हणजे तुकाराम जन्म्भार घसा कोरडा करून नाचला - ते उगाच की काय ?
      संजय म्हणतो की आपला पांडुरंग मुळात शिव आहे - हे नवीनच -
      आमि शिम्पल करून सांगू का - तुमी बाबानो मोठ्ठी मानस - हात जोडतो पण आमचा हा पांडुरंग आमाला सोडा - अहो आमचा श्वास हाये तो - असं त्याचं उण डूण काढू नका !तुमची लाथाळी चालू द्या आमच कायबी म्हनन नाय
      हेचि दान देगा देवा तुजा इसारण व्हावा

      Delete
    3. हा काय अगावपणा?

      Delete
  49. संजय सर ,
    कुणीतरी अनामिकाने एक चांगली बदल सुचवण्याची कृती सांगितली आहे ,
    सर्व जातीचे पुजारी नेमण्याबाबत चांगला विचार मांडला आहे संजय सर , आपण आणि अविनाश आणि सारंग यासारखे धडाडीचे लोक जर यात पुढाकार घेतील तर काहीतरी भरीव घडू शकेल त्यासाठी कुणीही काहीही नेमण्याची गरजच नाही - आपला देव - त्यासाठी आपण एकत्र येउन काम केले तर सरकारी ढवळा ढवळ कमी होईल
    पंढरपूरला जर नगरपालिका असेल तर त्यांच्या निवडणुकीतून आलेल्या मंडळी मधून हे लोक निवडायचे ठरवले तर जास्त सुटसुटीत होईल ,कारण त्या निवडणुकात हा एक मुद्दा बनून स्वच्छ कारभाराचे चित्र दिसण्याची शक्यता वाढेल
    स्त्रियांसाठी ठराविक आरक्षण ठेवले तर अधिक चांगले होईल ते मात्र केलेच पाहिजे - अगदी अत्यावश्यक बाब आहे कारण स्त्रियांच्या अडचणींची दाखल घेण्यासाठी ते आवश्यक आहे
    अयोध्या राम मंदिरा बाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे त्यावर बोलणे न केलेलेच ठीक राहील
    सुरवात म्हणून पंढरपूर हे एक मॉडेल या तत्वावर हा उपक्रम राबवता येईल दर नगरपालिका निवडणुकीत प्यानेल बदलेल ते सत्तान्तराशी संबंधित राहील असेकेल्याने बडवे आणि उत्पात यांची सद्दी संपेल आणि ते पंढरपूरच्या विकासाबद्दल विचार करू लागतील असे वाटते !
    सध्या बडवे आणि उत्पात यांचे वर्तन आपल्याला लाज वाटेल असे आहे - सर्व जगात असे भयानक आणि गलिच्छ चित्र नसेल -
    तीच गोष्ट जगन्नाथ पुरी येथे आहे ते पण बदलले पाहिजे
    दक्षिणेतील मंदिरे त्या मनाने स्वच्छ आहेत
    पुजारी आणि पुढारी असे जुळे नेतृत्व उभे राहून शहराचा विकासही मंदिराशी निगडीत राहील त्यासाठी निधीचा वापर आणि मंदिरांचे मिळणारे प्रचंड उत्पन्न याचा एकत्रित विचार झाला पाहिजे
    दत्ता आगाशे

    ReplyDelete
  50. सत्य जर स्पष्ट मांडले की अविनाश सरांचे चे डोके फिरू लागते
    अहो असे करू नये
    शहाजी हे शिवाजीचे वडील - त्यांनीपण निजामशाही आणि आदिलशाहीची चाकरी केली व त्यांनी आपले महत्व तिथे वाढवले आणि दक्षिणेतील हिंदू राजाचे राज्य लाटले असे संदर्भ आपल्याला नाकारता येत नाहीत हे अविनाश सराना माहित आहे त्यामुळे चिडण्या व्यतिरिक्त ते काहीच करू शकत नाहीत
    अविनाश हे मनाने खरोखर खूप चांगले आहेत पण संपूर्ण सत्य तेतरी कसे बदलू शकणार ?
    त्यांना घट्ट पुरावे काही खोडून काढता येत नाहीत त्यामुळे ते चिडतात हे अगदी नैसर्गिक आहे त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही उलट त्यांची दया येते
    अविनाश सर जसे आपण हिरीरीने ब्राह्मणांवर तुटून पडता तसे आपण मोकळ्या मनाने काही गोष्टी मान्य पण करा इतकेच आमचे म्हणणे आहे -

    आता हेच पहा ना - आत्ताची वेळ ही अति महत्वाची आहे - काँग्रेस आणि काका पुतणे यांचा जीव घुसमटला आहे - मोदींचा विजयरथ सुसाट सुटणार आहे त्यांनी निर्माण केलेले वादळ नेमके काय आहे ?आता बहुजानाना सुद्धा या जातीपातीचा उबग आला आहे - खरे मराठा समाजाचे राजकारण लोकाना कळू लागले आहे - आपल्यातीलच लोके आपलेच लचके तोडत आहेत हे सत्य त्याना समजले आहे - म्हणून तर सर्व भारतात मोदींना प्रचंड प्रतिसाद दिला गेला आहे - मतांची
    टक्केवारी नीट अभ्यासा अविनाश बुवा !

    सध्यातरी लोक एकच विचार करतात - ब्राह्मण वर्गाला आपण सत्तेतून काही दशका पूर्वी दूर केले . नोकरीतून काही दशकापूर्वी हाकलून लावले , तरीही ते कसा त्रास देऊ शकतात आपल्याला ते तर शक्यच नाही !, मग हा आपला विकास अडवणारा वर्ग कोणता आहे ? आणि उत्तर मिळते ते असे मराठा वर्गातील ठराविक सत्ताधारी वर्ग - हे ते उत्तर आहे
    मराठा वर्गाची सर्व पातळीवर घट्ट पकड आहे - त्यांच्या मुठभर सत्ताधारी मराठा वर्गाकडून त्यांचाच समाज भरडला आणि नागवला जात आहे -शिक्षण सम्राट आणि नाव श्रीमंत शेतकरी आणि सहकार सम्राट +साख्रर सम्राट असा हा वर्ग आपल्याच लोकाना शेतकरी बंधूना पिळून काढत आहे त्यात ब्राह्मणांचा किंचितही हात नाही -कसा असणार ? त्यांना तर सत्तेतून कधीच हद्दपार केलेले आहे आता त्यामुळे समाज द्रोहाचा दोष या मराठा वर्गाकडेच जातो आहे आणि ही भावना जोर धरत असल्यामुळे ब्राह्मण द्वेषाची धार अजून तीक्ष्ण करण्या व्यतिरिक्त मराठा नेतृत्वाकडे दुसरा कार्यक्रम नाही हेच त्यांच्या नेतृत्वाचे दुर्दैव आहे
    अविनाश तुम्ही कितीही ब्राह्मण समाजाला शिव्या दिल्यात तरी आता बहुजन समाजाला त्याचा कार्य कारण भाव कुठेच दिसत नाहीये ! त्यामुळे तुमचे यश निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर आपला मार्ग बदला ! देव तुम्हाला सद्बुद्धि देवो हीच प्रार्थना !

    ReplyDelete
    Replies
    1. Complete un-truth !

      Delete
    2. लगता है, बम्मन के "मगज का दही" हो गया?

      Delete
  51. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी मशीद वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.(कोर्टाकडून हे काम आता पूर्ण झाले आहे).
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिव धर्म, बौद्ध धम्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मणविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.
    .......................................................................................................

    ReplyDelete
  52. या ब्लॉगच्या सर्व वाचकांना, लेखकांना ६८ व्या स्वतंत्र दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा!
    भारतीय स्वातंत्रदिन चिरायु होवो!
    १५ ऑगस्ट २०१४.
    जय भारत!

    सारंग दवे

    ReplyDelete

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...