Tuesday, August 12, 2014

आम्ही माणूस आहोत...

आभाळ तुटून कोसळतय म्हणताय?
हरकत नाही
तुटू देत
आम्ही आमच्या अंगणात, शेतांत,
माळरानांत
त्या कोसळत्या
आभाळाचे कोसळलेले तुकडे वेचू
तेच आम्ही आमच्या अंगणांत
शेतांत
माळरानांत
पेरू...

त्यातून अनंत आभाळे
पुन्हा उगवू...
आमची कोसळलेली घरे
पुन्हा उभारू...

आम्ही माणूस आहोत...
विनाशातुनही सृजन करणारे!

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...