Friday, January 2, 2015

प्राचीन भारतीय विमानशास्त्र?

पक्षांप्रमाणे उडता यावे हे माणसाचे पुरातन स्वप्न. जगभरच्या पुराकथांमद्ध्ये मनुष्य देवाने दिलेल्या सामर्थ्याने यंत्र बनवुन, अन्यथा कृत्रीम पंख लावून उडतो अशा कल्पना आढळतात. याचा सर्वात जुना लेखी आणि चित्रांकित पुरावा सनपुर्व ३००० ते २४०० या काळात क्युनेफार्म लिपीत लिहिल्या गेलेल्या ब्यबिलोनियन "एपिक ओप्फ़ ऎटना" या काव्यात येतो. त्या प्रसंगाचे शिल्पांकनही केले गेले होते.

 

ग्रीक पुराकथांतील डीडेलस आणि त्याचा मुलगा इक्यरसची कथा प्रसिद्धच आहे. डीडालसने दोन विमाने बनवली...एक स्वत:साठी तर दुसरे आपला मुलगा इक्यरससाठी. एजियन समुद्रावरुन उड्डान भरत असतांना इक्यरस तारुण्याच्या उत्साहात वडिलांनी दिलेल्या सुचना पाळत नाही. तो अधिक उंच उडायला जातो आणि उष्णतेने पंखांना लावलेले मेण वितळल्याने समुद्रात कोसळून मरतो.
 

कोलंबियातही विमानसदृष्य पक्षांच्या प्रतिमा सापडलेल्या आहेत. (सन १००० ते १५००) चीनमद्ध्ये सम्राट चेंग तांगने (इसपू १७००) पहिले उडणारे विमान बनवले होते पण ते त्याने उडायचे शास्त्र कोणी चोरु नये म्हनून नष्ट करुन टाकले असे म्हणतात. चीनमद्ध्येच इसपूच्या तिस-या शतकात कवि च्यू युनने विमानातुन गोबीच्या वाळ्वंटाचे निरिक्षण केले असाही वृत्तांत येतो.

अशाच लोककथा नेपाळमद्ध्येही आहेत. पेरुमधील नाझ्का रेषांवरुन त्या संस्कृतीच्या लोकांना विमाने माहित होती अथवा परग्रहवासियांनी त्या रेषा बनवल्या असे मानणारे खूप आहेत.

भारतीय पुरानकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक सर्वांना माहितच आहे. समरांगन सुत्रधार या भोजाच्या (अकरावे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णण करतांना लाकडापासून ते पा-याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचालित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते "वैमानिक शास्त्र" हे पुस्तक मात्र १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात "ब्रुहद विमान शास्त्र" हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मद्ध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देवून विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारीत (कसे ते माहित नाही कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारीत १८९५ मद्ध्ये शिवकर बापु तळपदेंनी "मरुत्सखा" नामक विमान बनवुन दादर चौपाटीवर उड्डानाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. ते असो.

 
इंडियन इंस्टिट्युट ओप्फ़ सायन्सच्या (बेंगळुरु) डा. एच. एस. मुकुंदा व अन्य ३ शास्त्रज्ञांनी १९७४ साली या ग्रंथांचे अध्ययन करुन खालील निरिक्षणे "सायंटिफिक ओपिनियन"च्या.अंकात नोंदवली आहेत.

१. विमानोड्डानासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही.

२. विमानासाठी जी भौमितीक रचना  या पुस्तकांत गृहित धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेंशन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत...त्यात सातत्य नाही.

३. विमानाचे प्रचालन व नेव्हीगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही.

४. विमानात पाणी झिरपु नये म्हणुन दुधवस्त्र (क्षीरपट) वापरावे असे सांगितले आहे. विमान बांधणीसाठी "रजलोह" हा धातू वापरावा असेही सांगितले आहे.

५. दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही.

६. प्रत्यक्ष उड्डानासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करुन प्रात्यक्षिक घेता येणार नाही.

 ७. डायमेंशन्स देतांना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाने वापरली आहेत.त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही.


जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता.एका काल्पनिकेपलीकडे त्याकडे लक्ष देता येत नाही. या पुस्तकांना विज्ञान म्हणता येणार नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधुंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.

 

ऋग्वेदात विमानशास्त्र आहे हा दावा तर अत्यंत विनोदी या सदरात टाकता येण्यासारखा आहे. ऋग्वेदकालीन वैदिकांना भाजलेल्या वीटा माहित नव्हत्या, कापुस व त्यापासुनची वस्त्रे माहित नव्हती, लोह माहित नव्हते, (लोहयुगच तेंव्हा आलेले नव्हते.), मग बाकी मिस्र धातू माहित असणे तर दुरची बाब. असो.

हे निमित्त यामुळे झाले कि मुंबई येथील इंडियन सायंस कोंग्रेसमद्ध्ये चक्क "प्राचीन भारतीय उड्डानशास्त्र" या विषयावर लेक्चर ठेवायचा बेत आखला गेला. या विरोधात नासातील तसेच अन्य भारतीय शास्त्रज्ञांनी आवाज उठवला आहे. हायकोर्टात याचिकाही दाखल झाली आहे. वैज्ञानिक अधिवेशनांत शुद्ध विज्ञानावरील व नवीन संशोधनांवरील सैद्धांतिक चर्चा अभिप्रेत असते. त्याला हरताळ फासणारा हा अवैज्ञानिक आचरटपणा भाजपावालेच करु जाणे. जगभर हास्यास्पद होण्याचा हा शास्त्रीय मार्ग असला तरी अगा जे अस्तित्वातच नव्हते, ते मित्थ्याविज्ञान, काल्पनिका आहे तो विषय जगभरच्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत आणायचा प्रयत्न व्हावा हे निषेधार्हच आहे. विमानांच्या अशा रंजक काल्पनिका जगभर आढळतात, म्हणून कोणत्याही देशाने असला "चावटपणा" केल्याचे ऐकिवात नाही, ते तेवढे सुज्ञ आहेत...पण भारतियांच्या अक्कलेचे दिवाळे निघाल्याची अशी जागतिक उद्घोषणा करुन "भारतीय अक्कलेचे विमान कधीच उडू शकणार नाही." हे "वैज्ञानिक" पातळीवर सिद्ध करुन काय साधले जात आहे?

भारतियांना विज्ञाननिष्ठ/चिकित्साप्रधान बनवायचे कि मि्त्थकांच्या जाळ्यात अडकवत त्याला कालांधारयुक्त अज्ञानाच्या खाईत लोटायचे?

आवरा!

8 comments:

  1. Generally , scientific papers are submitted in advance . Committe decides whether it is to be accepted or not. At least , one has to submit an abstract. After approval , it is communicated to authors. If this is the procedure , then how BJP is involved ?
    Secondly , if it is a invited talk , organizing committe decides to whom to invite . Do you mean , Indian Science Congress is run by BJP?
    Always , Indian Science Congress is inaugurated by the PM of India . Narendra Modi is attending as a chief guest . It is standard practice. I do not understand why this noise . Let the paper be presented , discussed and debated. One can prove that it does not stand on any scientific basis or one may get some good ideas for further development.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सोनावणी यांनी आता पक्के केले आहे की रात्रंदिवस सेकूलर नावाचं जप करायचा आणि प्रत्येक गोष्टीला हिंदुत्ववादी हे लेबल चिकतवायचे आणि त्यावर गोंधळ घालायला रान मोकळे. त्यांना हे नक्कीच माहीत नसणार आणि असले तरी त्याबद्दल जराही बॉम्ब मारण्याची शक्यता नाही, की, 4 वर्षांपूर्वी प्रतिभा पाटील (हो त्याच) याच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अगदी असाच दावा केला होता. आहे ना गम्मत ? पण त्यावेळी ह्या सेकूलर लेखकाची मती आणि विनोदबुद्धी बंद पडली होती वाटत. आताच सगळं सुचायला लागलाय. लोक म्हणजे मूर्ख आहेत असा लेखकाचा समज आहे वाटत. अधिक माहिती साथी लेखकाने हा लेख जरा जातीयवादी सेकूलर विचार बाजूला ठिऊन नक्की वाचावा. http://swarajyamag.com/culture/ancient-aircraft-to-pythagoras/

      Delete
  2. Now usually in all the technical conferences that I have been to, the procedure is as follows: first you need to submit abstract, based on that they ask you to submit your paper with result.....then selection committee selects the paper...and then you have to go to conference and read the paper or present the paper and they it is published.....so now let Wiman Shastra papers , go through this procedure, if people agree to it, they will get chance to publish what they got. If procedure is followed everyone should get chance.I dont think it has anything to do with political party.

    ReplyDelete
  3. ऩ्यूज नेशन्स नावाच्या टीव्ही चॅऩेलवर शिवकर बापूजी तळपदे यांनी उङवलेल्या विमानाच्या दाव्यासंदर्भात एक व्हीडीओ दाखवला होता, त्यात प्रताप वेलकर नावाच्या पेशाने आर्किटेक्ट असलेल्या गृहस्थांनी असा दावा केला होता, की त्यांच्या वङीलांनी ते विमान उङतांना प्रत्यक्ष पाहिलं होतं. ते ऐकून उत्सुकतेने त्यांनी त्याबद्दल माहिती गोळा केली, त्यांच्या जवळ असलेला विमानाचा फोटोही त्या व्हीडीओत दाखवला होता. त्या फोटोच्या सत्यासत्यतेबद्दल पुढे काही दाखवलं नाही. जिद्न्यासूंना तो व्हीडीओ आणि त्यातला फोटो खाली दिलेल्या लिंकवर बघता येईल -
    http://www.newsnation.in/article/51467-rahasya-mysterious-pushpak.html

    ReplyDelete
  4. प्रियवर
    कवि अपनी कल्पना से मिथक गढ़ता रचता है. वैज्ञानिक अपनी प्रतिभा से उन्हें वास्तविक धरातल पर उतारता है. कई उपन्यासकारों ने अपनी कलम से उन कल्पनाएँ को जन्म दिया था जो बाद में किसी न किसी वैज्ञानिक अविष्कार की प्रेरणा बन गयी. रामायण का पुष्पक हो यह महाभारत के संजय की दूरदृष्टि, यदि आप इन्हें कवि कल्पना भी मान लो तो भी एक बात तो स्वीकार करना ही होगा कि वे बेमिसाल मानवीय प्रतिभा की ही देन थी.
    मनुष्य के पूरे अतीत को पर्दे में डालकर हम क्या हासिल कर लेंगे? आज यही गलती भारत के समस्त तथाकथित आधुनिक विचारक कर रहे है.. उनकी नजर में अतीत केवल ठुकराने की चीज है, लताड़ने की चीज है, सभी समस्याओं का अपराधी आरोपित करके केवल कटघरे में खड़े करने की चीज है.. इसी पागलपन में उन्होंने ज्ञान की ऐसी ऐसी शाखाएँ खोल दी, उनके कालेज, विश्वविद्यालय खोल दिये, उनकों ग्रांट देनेवाली ऐसी एक पद्धति खड़ी कर दी है कि महाविद्यालय से निकले युवा चार लाईन ढंग की बोल नहीं सकते, कोई नया विचार नहीं दे सकते, कोई उपन्यास नहीं लिख सकते, केवल कॉपी पेस्ट को बुद्धिमानी मानते है.
    जरा सोचिये, बुद्धिमानी और अक्ल को असली खतरा किनसे है? उनसे, जो ज्ञान को कैद करके बैठे है, या अतीत के उन मिथकों से, जो ज्ञान को मुक्त करते है और गांव के एक देहाती को भी सपना देखने की पात्रता देते है.
    एक बार भारत के महाविद्यालयों और विश्वविद्यालयों का चक्कर लगा कर आ जाइए, एक बार संसद में बैठ कर समाज का भला करने का धंदा देख कर आ जाइये, एक बार किसी कोर्ट में दिन भर बैठ कर न्यायदान का पाखंड देख लीजिए.. मेरे मित्र.. आप स्वयं समझ जाएँगे कि मानवता के भविष्य के इनसे बड़े दुश्मन समूचे अतीत ने कुल मिलाकर भी पैदा नहीं किये थे...
    फिर भी आप अतीत को लताड़ने का अपना शौक पूरा करना चाहते है तो करते रहिये.. आपको अपने ह्मले के लिए वहाँ कई कमजोर शिकार मिलते ही रहेंगे...किंतु इससे भविष्य को क्या हासिल होगा, इस पर सदा एक प्रश्नचिन्ह ही लगा रहेगा..
    एड. दिनेश शर्मा
    ९१३०३२७६६४


    ReplyDelete
  5. यांत्रिक पंख्यांच्या वगैरे साहायानें हवेंत उड्डाण करण्याचे प्रयत्न ऐतिहासिक दृष्ट्या प्रथम व फार प्राचीन काळापासून होत असल्याचें दिसतें. आपल्या रामयणग्रंथांत पुष्पकविमानांत बसून राम लंकेहून अयोध्येस गेल्याचें वर्णन आहे; त्याचप्रमाणें पाश्चात्त्य लोकांच्या पौराणिक कथांत व प्राचीन कालच्या चित्रांत पंखांच्या साहाय्यानें हवेंत उड्डाण केल्यांचीं वर्णनें आहेत. १६ व्या शतकापासून यांत्रिक साधनांनीं हवेंत उड्डाण करण्याचे प्रयत्न होत असल्याची निश्चित माहिती मिळते. स्कॉटलंडचा राजा चवथा जेम्स याच्या वेळीं एका इटालियन किमयागारानें (आल्केमिस्ट) स्टर्लिंग किल्ल्यापासून फ्रान्सपर्यंत पंखांच्या साहाय्यानें हवेंतून उडून जाण्याचा प्रयत्न केला, पण सुरवातीलाच जमीनीवर पडून त्याच्या मांडीचें हाड मोडलें. लिओनार्डो डाव्हिन्सी यानें दंडांनां व पायांनां कृत्रिम पंख जोडावे याचीं कित्येक चित्रें आपल्या नोटबुकांत काढलेलीं आहेत. रॉजर बेकननें 'नॅचरल हिस्टी' या ग्रंथांत हवेंतील उड्डाणांसंबंधीं मजकूर लिहिला आहे. जी. ए. बोरेली यानें कृत्रिम पंखांचें वर्णन १६७० त लिहून ठेवलेलें उपलब्ध असून तें यंत्रशास्त्र व गणितशास्त्र यांस धरून आहे. नंतरच्या डर्कहीम, मरे वगैरे लेखकांनीं त्याचाच अनुवाद केला आहे. १८६७ मध्यें पेटिग्रयू यानें सुचविलेली पंख्यांची रचना अधिक योग्य आहे. पुढें पेनॉड, हेनसन, स्टिंगफेलो, लँग्ले, डयूमॉट, पौल्हन, राइट, ब्लेरियट, ए..व्ही. रो वगैरे यंत्रशास्त्रज्ञांनीं पंख्यांच्या विमानांची रचना पूर्णत्वास नेली. गेल्या महायुध्दांत वैमानिक कलेची फार झपाट्यानें वाढ झाली. आरंभीं जर्मनीजवळ ४७० एरोप्लेन्स व २४ ए अरशिप्स होतीं; फ्रान्सचीं अनुक्रमें ५०० व १४; रशियाचीं ४०० व ७; ऑस्ट्रियाजवळ १२० व ४; आणि ग्रेटब्रिटनजवळ १३० व ५ होतीं. पण नंतर ग्रेटब्रिटननें विमानांची संख्या व वैमानिक कौशल्य यांत फार जलद भर घातली. महायुध्दानंतर टपाल, माल व माणसें यांची नेआण करण्याकडे विमानांचा जारीनें उपयोग सुरू झाला.

    ReplyDelete
  6. How come article with same details appear in todays mumbai mirror? Who copied whom? Also that article mentions an online petition and not a highcourt petition. Will our self proclaimed scholar clarify? Not expected as he has right to falsify information. Remember his own version of amarnath yatra in uttarakhand and guwahati blasts that occur after 26 Nov 2008 when actually they were on 30 October 2008. He has full right to speak lies everywhere.

    ReplyDelete
  7. Thanks for explaining facts! India needs more peoples like you.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...