Saturday, November 13, 2021

शिवण कलेने केलेली क्रांती!

 





शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी इसपू तिसऱ्या शतकात आलेल्या ग्रीक आणि पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात सत्ता स्थापन केलेल्या कुशाणांमुळे; परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी काही थोडकी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय ्त्रिरयाही काही प्रमाणात शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करू लागले.

वस्त्रांशिवाय माणसाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आदिम काळात, म्हणजे सरासरी एक लाख वर्षांपूर्वीच माणूस चामडं आणि झाडांच्या सालींचा, म्हणजे वल्कलांचा उपयोग वस्त्र म्हणून करू लागला. मनुष्याला अन्य प्राण्यांसारखी हवामानाला तोंड देता येतील अशी नैसर्गिक देणगी नसल्याने त्याला अंगरक्षणासाठी वस्त्रांची गरज भासणे स्वाभाविक आहे; पण मारलेल्या प्राण्यांची कातडी गुंडाळून त्याने ही आधी गरज पूर्ण केली असली तरी वेगवान हालचाली करायला त्याला अडचणी येऊ लागल्या. त्याच काळात चामड्याचा उपयोग करून तो कृत्रिम निवारेही बनवायला शिकला होता.पण त्यातही ओबड-धोबडपणा असे. प्रत्येक प्राण्याचा कातडीचा आकार वेगळा. त्यांना एकत्र ठेवत निवारा तयार करणे अवघड असायचे.

पण मानव हा कल्पक आणि जात्याच शोधक असल्याने त्याने त्यावरही मात केली. त्याने हाडे-गारगोट्या किंवा कठीण दगडापासून आद्य सुया तयार करायला सुरुवात केली. कातड्याला भोके पाडून कातड्याच्याच वाद्यांनी ते एकमेकांना घट्ट जोडल्यामुळे त्याचे काम सुलभ तर झालेच; पण त्यापासून हालचालींना सुलभ जातील, काही प्रमाणात आरामदायकही वाटतील अशी आद्य वस्त्रेही तो बनवायला शिकला. कल्पकतेने सुखसुविधा कशा निर्माण करता येतात याचे हे आद्य उदाहरण होते.

कठीण पाषाणांपासून मनुष्य हत्यारे बनवायला लाखो वर्षांपूर्वीच शिकला होता. आता अशा दर्जेदार पातळ सुया बनवेपर्यंत त्याने जी प्रगती केली ती नक्कीच विस्मयकारक आहे. अशा अनेक दगडी (गारगोटी) सुया फ्रान्समधील सोलुटर या प्रागैतिहासिककालीन (इसपू २२०००) स्थानावर सापडल्या आहेत. या सुयांच्या अग्रभागी आजच्या सुयांना असतात तशी दोरा ओवण्यासाठी भोकेही होती हेही विशेष. शिवणकाम करण्यासाठी दोरा म्हणून अर्थातच चामड्याच्या पातळ वाद्या वापरल्या जात. हे प्राथमिक दर्जाचे कातडी कपडे होते. त्यामुळे त्याच्या हालचालीही सोप्या झाल्या. थोडक्यात माणसाने शिवणकलेचा शोध चाळीस-पन्नास हजार वर्षांपूर्वीच लावला होता, असे अनुमान काढता येऊ शकते.

यातूनच पुढे विणकामाचा शोध लागला. लोकर हे अर्थातच जगातील पहिले विणले गेलेल्या वस्त्रासाठी वापरले गेलेले उत्पादन. नंतर माणसाने नैसर्गिक वनस्पती धाग्यांचे, म्हणजे ताग, प्यपिरस इत्यादींचे वीणकाम करत त्यांचा उपयोग वस्त्रांसाठी सुरू केला तोही याच समांतर काळात. जॉर्जिया आणि झेकोस्लाव्हाकिया येथे विणलेल्या वस्त्रांचे सुमारे २० ते २८ हजार वर्ष एवढे जुने पुरावे मिळाले आहेत. फ्रान्स आणि भीमबेटका (भारत) येथील प्राचीन गुहाचित्रात तत्कालीन माणसे कशा प्रकारचा पेहराव करत होती याचे दर्शन आपल्याला मिळते.

भारतातील शिवणकलेचा इतिहासही जागतिक इतिहासाच्या जवळपास समांतर जातो. भारतात अग्रभागी टोक असलेल्या सुया सापडल्या नसल्या. तरी धारदार आणि पातळ टोचण्या मात्र सापडल्या आहेत. अगदी महाराष्ट्रातील सावळदा, इनामगाव आदी ठिकाणीही त्या सापडल्या आहेत. सातवाहन काळात तर एवढ्या पातळ सुया बनवायची कला साध्य केली होती की त्या सुया पाण्यावरही तरंगत अशी वर्णने आपल्याला गाथा सप्तशतीत मिळतात; पण भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कापसापासून सुती वस्त्रे बनवण्याची साध्य केलेली कला. परदेशी प्रवाशांनी भारतात झाडांना लोकर येते, असे नमूद करुन ठेवले आहे. कारण त्यांना कापूस माहीत नव्हता. हिरोडोटसने भारतीय तलम कपड्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.

सिंधू संस्कृतीत पुरातन विणलेल्या वस्त्रांचे अवशेष सापडले आहेत. वैदिक मंडळी अफगाणिस्तानाच्या प्रतिकूल शीत हवामानात रहात असल्याने भारतात येईपर्यंत ते लोकरीचीच वस्त्रे वापरत असे ऋग्वेदावरून दिसते. भारतातून सिंधू काळापासूनच सूत कातणे, विणणे आणि शिवणे या कला विकसित होऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होत असे. या काळात शिवणकला माहित होती, असे ऋग्वेदातील २.३२.४ या ऋचेवरून दिसते. तो उपयोग फक्त ्त्रिरयांसाठी कंचुकीसदृश चोळी शिवण्यासाठी केला गेला असावा, असे संशोधकांचे अनुमान आहे; पण त्याबाबत ठोस असे काही सांगता येत नाही; पण जातक कथांतून इसपू ६०० मध्ये ्त्रिरया या शिवलेल्या कंचुक्या वापरत असत असे उल्लेख मिळतात. त्यांना बाह्या असत; पण गुंड्या नसत. कंचुकीच्या पुढील काळात वेगवेगळ्या फॅशन आल्या तरी त्या मर्यादित वर्गापुरत्याच होत्या असे दिसते. म्हणजे कंचुकी वापरण्याऐवजी उरोभाग कपड्यानेच (उतरीय) झाकला जात असे, असे आपल्याला महाभारतातील अनेक उल्लेखांवरून दिसते. कमरेलाही गुडघ्यापर्यंत येणारे वस्त्र गुंडाळले जात असल्याने त्यांना शिवण्याचा प्रश्नच येत नव्हता.

भारतातील समशीतोष्ण हवामानामुळे शिवलेली वस्त्रे वापरण्याची प्रथा जवळपास नव्हती. कमरेभोवती वा संपूर्ण शरीरभर विशिष्ट पद्धतीने गुंडाळलेली वस्त्रे हीच भारतीयांची जवळपास काही हजार वर्षे वेशभूषा राहिली. अजंतामधील भित्तीचित्रे, तसेच मध्ययुगीन ते प्राचीन शिल्पे यात तर ्त्रिरया उरोभाग उघडाच ठेवत असत असे आपल्याला दिसते. किंबहुना तीच तत्कालीन फॅशन होती, असेही आपल्याला दिसते. आजकालच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना हे माहित नसते हे आपल्याला माहितच आहे.

शिवलेल्या वस्त्रांशी भारतीयांचा परिचय झाला तो आधी इसपू तिसऱ्या शतकात आलेल्या ग्रीक आणि पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात सत्ता स्थापन केलेल्या कुशाणांमुळे; परंतु त्यांचे विशेष अनुकरण देशात झाले नाही. जी काही थोडकी वस्त्रे शिवली जात ती घरगुती पातळीवर. या काळात भारतीय ्त्रिरयाही काही प्रमाणात शिवलेल्या कंचुकी (चोळी) तर पुरुष कंचुक (पायघोळ चोगा) परिधान करू लागले. अर्थात ते फक्त उच्चभ्रू समाजापुरतेच मर्यादित राहिले. विदेशी लोकांमुळे भारतात नव्या वेशभूषांचीफॅशन आली एवढे मात्र खरे.

शिवणकला ही आधी ्त्रिरयांचीच मक्तेदारी होती, असेही इतिहासावरून दिसते. आपल्या कंचुक्या ्त्रिरया स्वत:च शिवत. पहिल्या शतकातील महाराष्ट्रात हालाच्या गाथा सप्तशतीवरून ्त्रिरया शिवलेल्या चोळया सर्रास वापरत, असे पुरावे मिळतात. पुरुषांचा वेष मात्र बराच काळ परंपरागत, न शिवलेला असाच राहिला. बौद्ध भिक्षू मात्र संघाटी नामक शिवलेला अंगरखा वापरु लागले होते. त्याचेच रूपांतर पुढे कंचुक या पायघोळ सदऱ्यात झाले जे अनेक पुरुष वापरू लागले. असे असले तरी सामान्य प्रजेच्या परंपरागत वेषभूषेत फारसा फरक पडला नाही; पण सातव्या-आठव्या शतकाच्या दरम्यान भारतीय हवामानाला साजेशा बंड्या, बाराबंद्या आणि कोपऱ्या या नवीन फॅशन पुढे आल्या. नवजात मुलांसाठी अंगडी-टोपडीही आली. या नव्या फॅशन्स लोकप्रिय होऊ लागल्या. हे कपडे शिवण्यासाठी विशेष कौशल्याची गरज भासू लागली. त्यामुळे या शिवणकलेत विविध जातींतील तरबेज प्रशिक्षित लोकांनी प्रवेश केला.

या शिवणकाम करणाऱ्या समाजघटकांनी आपापल्या प्रदेशातील पर्यावरणाला साजेशा आणि सुखकर होतील अशा पद्धतीची वस्त्रे शिवायला सुरुवात केल्याने केवळ वेशभूशेवरूनही कोण कोणत्या राज्यातील हे ओळखणे सोपे जायचे. राजे-सरदार-सैनिक यांच्यासाठीही विशिष्ट प्रकारची वस्त्रे शिवणे गरजेचे झाल्याने त्यातही वेगवेगळया पद्धती आल्या. मोगल काळाने भारतावर पर्शियन पद्धतीच्या वस्त्र-प्रावरणांचा मोठा प्रभाव पडला. ब्रिटीश काळाने तर मोठीच क्रांती घडवली. आजच्या वस्त्र-प्रावरण पद्धती बव्हंशी पाश्चात्य प्रभावाखालील आहेत. शिवणकाम करणाऱ्यांनी त्या त्या काळात लोकप्रिय होऊ लागलेल्या फॅशन अधिक प्रचारित केल्या. भारतीय वस्त्रप्रावरण पद्धते जी कालौघात असंख्य वेळा बदललेली आहे. अमुक प्रकारची वस्त्रभूशा म्हणजे आमची संस्कृती असे म्हणायला खरे तर काहीही जागा नाही. शिवणकलेने मानवी जीवन अधिक उत्साही, रम्य आणि प्रभावी केले हे मात्र नाकारता येत नाही.

Sunday, November 7, 2021

कधीतरी एक व्हावेच लागेल!

सर्व शोषित-पिडित समाजांत आत्मभान व आत्मविश्वास आलाच पाहिजे याबाबत दुमत नाही. पण आत्मभान विकृत वर्चस्ववादाकडेच जाऊ लागला तर पुन्हा नवा विसंवाद निर्माण होतो. सत्य, मग ते सापेक्ष का असेना, समजावुन घेत आत्मपरिक्षण करत संयोग्य प्रतिक्रियावदी होण्याऐवजी तुम्हालाच सरसकट द्वेष्ट्याचे लेबल लावले जाते आणि आजकाल हे सर्वच समाजांकडुन होते आहे ही अधिक चिंतेची बाब आहे. बरेचसे विचारवंत तोंड उघडत नाहीत कारण हे विचित्र हल्ले त्यांना नको असतात. मग विचारमंथन होणार कसे? जागरुक समाज निर्माण कसा होणार? हिंदुंच्या चुकीबद्दल लिहिले तर मुस्लिमांच्या चुका आठवत बसण्यापेक्षा आपल्या चुका कशा दुरुस्त करता येतील यावर अधिक लक्ष केंद्रीत केले तर? ते न करता आपण आपल्या मुर्खपनाचे खापर इतरांवर थोपत जात त्याच चुका आम्हीही करतो. वर्चस्ववाद हा भारतीय अवघ्या जनतेला लागलेला शाप आहे. त्यात तथाकथित ज्ञानी, अर्धवट आणि मुर्ख आले. इतिहासाचे विश्लेशन हे चुकीचेही असु शकते...पण ते चुक कसे आहे हे सबळ पुराव्यांनीशी दाखवण्यापेक्षा विश्लेशनकर्त्यांवर अर्वाच्य तुटुन पडणे हा तथाकथित नवविचारवंतांचा धर्म बनला आहे. आधुनिक साधने आम्हाला आधुनिक न बनवता पुरातन टोळीवादात घेऊन जात आहेत आणि त्याची चिंता सर्वांना वाटायला हवी. अस्मिता जागृत होणे गरजेचे आहे...पण अस्मितेचा अर्थ दुस-यांच्या अस्मिता धि:कारणे असा नव्हे तर सुयोग्य तत्वज्ञानातुन परस्पर भावनांचा आदर करत...प्रसंगी एकमेकांच्या चुका सबळ पायावर दाखवत एकमय समाज म्हणुन पुढे जाणे हा आहे. हिंदुंच्या सणांच्या दिवशीच त्या सणांवर हल्ले चढवण्याचे प्रकार गेल्या तीन-चार वर्षांपासुन फार वाढले आहेत. मुस्लिमांच्या सणांवरही तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे तसेच हल्ले होतात. ख्रिस्त्यांचे सण सर्वांचेच बनल्याने (अपवाद वगळता...कथित हिंदुधर्मरक्षकांचा) विशेष बोंब नव्हे तर उत्साहच उत्साह असतो. वैदिकांना समिक्षेचा राग येत असला तरी ते तुटपुंजे का होईना पण अर्वाच्यतेत सहसा न जाता आपली बाजु मांडतात. पण काही समाजघटकांना स्वास्मितांसाठी अन्य धर्मावर हल्ले चढवण्यात (व तो धर्मही नीट माहित नसता) काय आनंद होतो हे त्यांनाच माहित! यामुळे अकारण आपणच सामाजिक दरी निर्माण करत आहोत याचे भान नसणे हे अधिकचे दुर्दैव. पण असे प्रकार वाढत आहेत आणि ते चिंताजनक आहेत हे नक्की. याचा एक पडसाद म्हणजे लक्ष्मण गायकवाडांचा वड्डर समाजाविषयकचा लेख...(गेला सप्तरंग) लेखा अंती त्यांनी दिलेली टीप. म्हणजे अन्य जातीय/धर्मीय माणसाने विजातीय समाज/धर्म याबाबत लिहुच नये कि काय? मग डिकास्ट होण्याचे म्हणायचे ढोंग कशाला? डिकास्ट आपण बापजन्मी होऊ शकत नाही हेच सत्य नव्हे काय?
जर हा समाज जातीयतेतच जगला आणि मरणार असेल तर त्याचे पाप अन्य कोणावर थोपता कसे? धर्म बदलुन या देशात जात बदलत नाही. इस्लाम, शीख, जैन , ख्रिस्ती ई. याचे साक्षी आहेत. जात बदलत नाही कारण जात बदलण्याची इच्छा होत नाही. जात सोडा...पोटजातही बदलायची इच्छा नसते. जातीयता हा ब्राह्मणांनी दिलेला कलंक नव्हे तर भारतीय मानसिकतेने सुरक्षेच्या जाणिवेने निर्माण केलेला कलंक आहे. "ब्राह्मणांत एवढी शक्ती कधीच नव्हती."(बाबासाहेबही नेमके हेच म्हणतात...किंवा हे विधान मी बाबासाहेबांपासुन घेतले असे म्हणा!) दोन-तीन टक्के समाज हजारो वर्ष उर्वरीत समाजाला ठकवत राहतो हेच विधान मुळात अनैतिहासिक आहे किंवा उर्वरीत षंढ होते हे तरी मान्य केले पाहिजे. आमच्या नपुंसकतेला कारण ब्राह्मण नाही...आम्हीच आहोत.
काल एका बौद्ध विद्वानाने प्रश्न केला...बुद्ध पुरुषसत्ताकतेला मानत होता याचा पुरावा काय? अहो...बुद्ध स्त्रीयांना संघात प्रवेश द्यायच्या विरोधात होते. आनंदाच्या विनंतीमुळे त्यांनी प्रवेश दिला...कोणाला? पजापती आणि अन्य ५०० स्त्रीयांना...पण काय म्हणतात भगवान गौतम बुद्ध? ते म्हणतात "माझा धम्म जो हजार वर्ष टिकनार होता तो आता पाचशेच वर्ष टिकेल." आणि भिक्खुनींवर आठ जाचक अटी लादल्या गेल्या. (उदा. भिक्खुनी शंभर वर्षांची झाली तरी तिने भिक्खुला प्रणाम केलाच पाहिजे....ई) तो त्या काळाचा महिमा होता जेंव्हा स्त्रीया दुय्यमच होत्या. एकाही भिक्खुनीचा ग्रंथ नाही. स्त्री "बुद्ध" होऊ शकत नाही हा बौद्ध धर्माचाच निर्वाळा आहे. तेंव्हा मला पुरावे काय मागता? स्वत: शोधा कि!
असो. आपण एका अत्यंत विलक्षण काळात आलो आहोत. हा काळ कोणत्याही पद्धतीने आधुनिक नाही. येथे गतकाळही समजावुन घेणारे लोक नाहीत...त्या काळाच्या चौकटी समजावुन घेणारे नाहीत...आणि आजच्या चौकटी लांघणारे नवविचारवंत तर आजिबात नाहीत.
विखंडन आणि अविरत विखंडन हेच भवितव्य ज्यांचे... असा एक देश आम्ही बनलो आहोत....
पण आम्हाला कधीतरी एक व्हावेच लागेल!

राम जितका चांगला होता....

 "राम जितका चांगला होता तितकाच रावण चांगला होता

किंवा

रावण वाईट होता तितकाच राम वाईट होता
असं म्हणणं = तटस्थता !!!!
ही तटस्थतेची नवी समाजमान्य व्याख्या आहे का आजकाल?" -डा विश्वंभर चौधरी.
डा. विश्वंभर चौधरींनी कळीची विधाने करुन वरील प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यावर चर्चा होण्याची गरज आजच्या परिप्रेक्षात आहेच. तटस्थता म्हणजे नेमके काय? "राम जितका चांगला होता तितकाच रावण चांगला होता." असे साळसुद विधान करुन सुटका होऊ शकत नाही हे उघड आहे. शिवाय असे उत्तर कोणालाही रुचणार नाही. राम चांगला आणि रावण वाईट अशी समाजमनाची साधारण धारणा आहे. सामान्य माणसाला चिकित्सेची गरज पडत नाही. तो परंपरागत श्रद्धेलाच आपल्या धारणा बनवतो. पण चिकित्सेचे वावडे असणारा वर्ग आपली सुटका करुन घेण्यासाठी दोघेही चांगले किंवा दोघेही वाईट होते असे विधान करून जाऊ शकतो.
राम जितका चांगला होता तितकाच रावणही चांगला होता हे विधान चिकित्सा केली तर खरे आहेच असेही आपल्या लक्षात येईल. पण रामाचे चांगले असणे हे वेगळ्या परिप्रेक्षात आणि रावणाचे चांगले असणे वेगळ्या परिप्रेक्षात. दोघांच्या चांगलेपणात समानता असू शकत नाही. शिवाय दोघांच्या न्युनाधिक्यत्वही वेगवेगळे असेल. "रावण वाईट होता तितकाच राम वाईट होता" या विधानाचेही तसेच आहे. समजा राम चांगला आहे तर आगळीक प्रथम त्याच्याकडून झाली आहे. त्याने शुर्पनखेला काही कारण नसता नुसते अवमानितच नाही तर विद्रुप केले आहे. केवळ संगाची अथवा विवाहाची कामना करणा-या एका मुक्त स्त्रीशी असे वर्तन करणे दुष्टपणाचे, स्त्रीत्वाच्या अवमानाचे उदाहरण मानता येईल. रावणाने बंधू या नात्याने या घटनेचा सुड घेण्यासाठी सीतेलाच पळवले. हाही बदला घेण्याचा प्रशस्त मार्ग नाही. कारण त्याच्या बहिणीचा अपमान राम-लक्ष्मणाने केला होता. या दोहोंशी सुडासाठी अथवा त्यांना धडा शिकवण्यासाठी युद्ध करण्याचा प्रशस्त मार्ग त्याने निवडण्याऐवजी सीतेला, म्हणजे एका स्त्रीलाच पळवण्याचा मार्ग निवडला. रावणाने सीतेचा सांभाळ कसलीही बळजोरी न करता केला असला तरी त्या घटनेने सीतेचे संपुर्ण जीवनच होरपळून निघाले आहे. शुर्पनखा विद्रूप झाल्याने तिचेही जीवन तसेच होरपळले गेले असणार. म्हणजे स्त्रीवादाच्या अंगाने वा विवेक अथवा नीतिने पाहिले तर दोन्ही पुरुष सारखेच वाईट ठरतात. तरीही दोहोंच्या वाईटपणाला वेगवेगळ्या किनारी आहेत. त्यांच्या वर्तनाला वेगवेगळ्या संस्कृत्यांच्या पार्श्वभुम्या आहेत.
राम-रावण युद्धात राम जिंकला. समजा उलट झाले असते तर चांगल्या-वाईटाच्या सामाजिक व्याख्याही बदलल्या असत्या. शुर्पनखेच्या दु:खाभोवतीच मग महाकाव्य फिरत राहिले असते व रावण महानायक ठरला असता. जर-तर ला अर्थ नसला तरी रावणच चांगला होता असे मानणारा मोठा प्रवाह आहे आणि दस-याला रावणदहन करणाराही मोठा प्रवाह आहे. यालाही दोन्ही विचार असलेल्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभुम्या वेगळ्या आहेत हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे दोन्ही चांगले होते वा दोघेही सारखेच वाईट होते असे सरसकट विधान करता येत नाही. यामुळे मुख्य प्रश्नातून सुटका होत नाही.
त्यामुळे कोण चांगले व कोण वाईट हे ठरवतांना सर्व संदर्भचौकटींच्या परिप्रेक्षात विचार करावा लागतो. चिकित्सा करावी लागते व उत्तर शोधावे लागते. उत्तरे सर्वांची सारखी येतील असे नाही पण ती मग सरसकट नसतील. हेही खरे आणि तेही खरे असला बुळेवाद कसा चालेल? परंतू आपण वर्तमान जीवनात या बुळेवादाचे प्रतिबिंब पडलेले सहज पाहू शकतो, कारण मोठा वर्ग सामाजिक/राजकीय परिप्रेक्षात बोलतांना तेही वाईट होते तितकेच हेही वाईट होते असे विधान करत शहामृगी पवित्रा घेत वाळूत तोंड खुपसून बसतांना आपण पाहतो.
"ही तटस्थतेची नवी समाजमान्य व्याख्या आहे का आजकाल?" हा शेवटचा डा. चौधरींचा प्रश्न या संदर्भात पहावा लागतो. तटस्थ चिकित्सा आणि राम-रावणाच्या संदर्भातील विधाने यात फरक आहे. ही विधाने बुळेवादाची लक्षणे आहेत. आणि जर ही अशी तटस्थता ही जर समाजाची मान्य व्याख्या होऊ पहात असेल आणि संदर्भचौकटी व वेगवेगळी ब-या-वाईटाची परिमाने न पाहता नरो वा कुंजरो वा सारखी विधाने येत असतील तर अशी तटस्थता जास्त धोकेदायक नाही काय?
चांगले किंवा वाईट अशी काळ्या-पांढ-या रंगात सामाजिक/राजकीय घटनांची वाटणी करता येत नाही. सर्वस्वी वाईट अथवा सर्वस्वी चांगले असे काही असू शकत नाही. पण त्याची तटस्थ चिकित्सा करणे व मग मत बनवणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. ही चिकित्सा करतांना काळाच्या संदर्भचौकटीही पहाव्युआ लागतात. आजच्या नीतिच्या परिप्रेक्षात राम-रावणाची चिकित्सा करायची नसते तर त्यांचा काळ, त्यांच्या संस्कृत्या व अपरिहार्यपणे आलेल्या विचारधारा यांचाही विचार करावा लागतो. पण आपल्याला ही अशी सवय नाही. त्यामुळे सामाजिक/राजकीय संघर्ष अज्ञानाधारित होत मग दिशाहीन होतो. बहुतेक संघटना, मग त्या सामाजिक असोत, सांस्कृतिक असोत कि राजकीय अथवा धार्मिक, या दिशाहीन संघर्षात फसलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या परिप्रेक्षात काय चांगले व काय वाइट याची निवड करण्याची क्षमता गमावून बसल्या आहेत. सामान्यांना तर असे काही झाले आहे कि "महाज्वर" चढलेला असावा. कोणाची बाजू घ्यायची हा प्रश्न नसून त्या बाजुची आपण दुसरीही बाजू विचारात घेत चिकित्सा करुन निर्णय घेतला आहे काय हा आहे. आणि मला वाटते यात बहुसंख्य नापास होतील.
आणि त्याहीपुढे जाऊन बुळेवादी "हाही चांगला-तोही चांगला" किंवा त्याविरुद्ध बोलत स्वत:ची सोडवणूक करत बुळेवाद जपतात हेही घातक...किंबहुना जास्तच घातक आहे. तटस्थतेची ही व्याख्या समाजात बनली असेल तर आपण सावध व्हायला हवे!
Sanjay Kshirsagar, Vikas Lawande and 119 others
42 comments
6 shares
Share

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...