tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post1969943422842298584..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): तुमचा शोध असाच सुरु राहो...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45091025973783323002012-03-30T08:56:04.271-07:002012-03-30T08:56:04.271-07:00मित्रा ऒंकार, आपले म्हनणे ब्रिगेडी वा बामसेफी लोका...मित्रा ऒंकार, आपले म्हनणे ब्रिगेडी वा बामसेफी लोकांबद्दल यथायोग्य असेच आहे. पण ते म्हणजे बहुजनसमाज नाही. काही ब्राह्मणी सनातनी संस्था या जशा भारतीय समाजाला लागलेली कीड आहे तशीच तीही एक आहे हे मी वारंवार म्हटले आहे, लिहिले आहे आणि तसे गुन्हे दाखल करण्यात पुढाकारही घेतला आहे. सचीन परबांनीही त्यांचा यथार्थ समाचार घेतलेला आहे हे त्यांच्या ब्लोगवरील लेखांतुन तुम्हाला दिसेल. सावरकर-गोडसे या मंडळींचे नांव आपण घेत त्यांचे कोणते महत्कार्य सांगत आहात हे आपल्यालाच माहित. टिळकांच्या आर्य सिद्धांतामुळे यांचे फावले व मुलनिवासी सिद्धांत जन्माला आला हे आपणास माहित नसल्याचे दिसते. टिळकांनी जेवढे ब्राह्मण समाजाचे नुकसान केले तेवढे कोणीही केले नसेल हे मी येथे स्पष्टपणे नमुद करतो. सावरकरांचे तर बोलायलाच नको. ते एक महाकवी, उत्तम भाषातद्न्य होते...पण...<br /><br />कुरुंदकर, पु. ल. (पु.लं.बद्दल कोण बोलला हे सांगा फक्त...माझ्या माहितीप्रमाणे कोणीही नाही.) साने गुरुजी, जी.ए., एस. एम. जोशी, बाबा आमटे, बंग कुटुंब...अशा अगणित ब्राह्मणांचा समाज आदरच करत आला आहे. पण तुम्ही म्हणाल टिळकांचा, सावरकरांचा किंवा गोडसेचा आदर करा तर माफ करा...ते होणार नाही. त्या पायावर तुम्ही ब्राह्मनद्वेष्टा कोण आहे आणि कोण नाही हे ठरवणार असाल तर तुम्ही चुक करत आहात. <br /><br />ब्रिगेडी वा बामसेफी साहित्य म्हणजे बहुजनीय विचारधारा नाही हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. पण त्याच वेळी सावरकरी, गोडसेवादी सनातनी विचारधारा म्हणजे सर्वच ब्राह्मनांची विचारधारा नव्हे हेही तुम्हाला माहित असायला हवे. त्यामुळे विचारधारांत वैचारिक गोंधळ नको. सावरकरवाद्यांच्या विरोधात अनेक देशस्थ ब्राह्मणांनी कठोर लिहिलेले आहे ते वाचायला हरकत नाही. आर्क्टिक होम इन वेदाज लिहुन टिळकांनी खुद्द ब्राह्मणांनाच कोणत्या सापळ्यात अडकवले हे नीट समजावून घ्यावे. वर्चर्स्ववादी विचार मांडनारे कोणीही असोत...त्यांचा धि:क्कार होनारच यात शंका बाळगु नये ही विनंती.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-91392173606178459172012-03-30T06:55:44.630-07:002012-03-30T06:55:44.630-07:00प्रथम, आपण सर्वतः ब्राह्मण द्वेषाने लिहीत नाही याच...प्रथम, आपण सर्वतः ब्राह्मण द्वेषाने लिहीत नाही याची मला कल्पना आहे हे स्पष्ट करतो.<br /><br />"जेंव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मनाची चिकित्सा केले कि चिकित्सा करणारा ब्राह्मण विरोधी अस्तो हे ठरवता तेंव्हा मग तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे असा निश्कर्ष निघणे स्वाभाविक आहे."<br /><br />काय आहे, तुम्हाला कल्पना असेलच कि सध्या ब्लॉग तयार करणे आणि लिहिणे फुकट आहे त्यामुळे छपरी लोक (including बिनग्रेडी आणि त्यांचे समर्थक) काय वाट्टेल ते लिहितात आणि चिकटवतात.<br />ब्राह्मण-द्वेष करणा-या अनेक संस्था कार्यरत असून ते मनोभावे समाजात दुही पसरवत असतात.<br />त्यातून खूप ब्लॉग फक्त एखाद्या व्यक्तीचे ब्राह्मण आडनांव बघून त्याबद्दल वाट्टेल ते काहीही खरडत असतात, हे तुम्हा-आम्हाला नवे नाही. तुमच्याही वाचनात असे ब्लॉग आले असतीलच.<br />सावरकर, पू.लं., लोकमान्य टिळक हे हि त्यातून सुटलेले नाहीत. इतिहासात मानाचे स्थान ज्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने मिळवले अश्या व्यक्तींबाबत काहींही दळभद्री लिहीत सुटायचे असे कार्य खूप लोक करत आहेत. (या व्यक्तिमत्वांचा त्या-त्या क्षेत्रातला मोठेपणा आपल्याला मान्य असावा हे गृहीत धरत आहे)<br />एखादा ब्राह्मण चुकत असेलही, पण उगाच आडनाव सावरकर, गोडसे, देशपांडे, टिळक, केळकर, जोशी .... .... असे काही दिसले कि लागले बरळायला आणि पुस्तकं छापायला. जो ब्राह्मण तो चुकीचाच, असा विचार त्यामध्ये शोधावा लागत नाही, तो ठळकरित्या दिसत असतो. "त्या" आडनावाचा म्हणजे त्याने जे काही केले ते सगळे चुकीचेच कसे हे ठासून सागायचा प्रयत्न हे लोक करत असतात.<br />ठीक आहे, काही लोकांची लायकी नसते सावरकर, टिळक यांना समजून घेण्याची. त्यासाठी लागणारी बौद्धिक पातळीच त्यांच्याकडे नाही हा त्यांचा दोष नाही. काही कारणाने (ब्राह्मण-द्वेष हे कारण नाही असे गृहीत धरायला काय हरकत आहे २ मिनिटं) त्यांना नसेल काही पटत या लोकांचे थोडेसे कार्य, पण लगेच त्यांना देशद्रोही म्हणण्यात कोणते कारण? ब्राह्मण-द्वेष नाही असे म्हणायला जागा आहे का?<br /><br />As specific example, have you seen (no need to open book & read text, just look at book cover) any book published by Sambhaji Briged?<br />How can anyone say that those people dont bark, they just write against people (not only brahman) who did something wrong?<br />No, its total clear that they wrote ONLY & ONLY against ALL brahmans!!!!<br />संभाजी राजांचे नांव एवढे खराब औरंगजेबाने देखील केले नसेल. (त्यांना औरंगजेबाने मारले यामुळे तसे म्हटले आहे. सध्या संभाजी राजांना औरंगजेबाने मारले नसून, त्यांना सन्मानाने सोडून दिल्यावर ब्राह्मणांनी मारले असे कोणी तरी बडबडत असल्याचेही ऐकिवात आले आहे.)<br /><br />फार काही लिहीत नाही. तुम्हाला या सगळ्याची कल्पना नक्कीच असेल.<br />त्यामुळे तुम्ही "तुम्हाला नक्कीच काहीतरी लपवायचे आहे" असा स्वाभाविकरित्या जसा निष्कर्ष काढला, तसाच ब्राह्मण लोक कोणीही एका ब्राह्मणविरोधी लिहिले तर "ब्राह्मण-द्वेष" हाच निष्कर्ष स्वाभाविकरित्याच काढणार... त्यात काय चूक? आणि का निष्कर्ष काढू नये?ॐकार केळकरhttps://www.blogger.com/profile/00888994023123671117noreply@blogger.com