tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2110589471802567438..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-10468323594264523972011-05-21T23:08:09.017-07:002011-05-21T23:08:09.017-07:00Mi ekanda shiledar ahe ani mala je patate tech mi ...Mi ekanda shiledar ahe ani mala je patate tech mi lihito. Mi kadheehee konatyaahee sanghatanet navhato ani nahi. <br /><br />Itihasat sudharana karanyache kaam mi barech kele ahe, he aapalyala mahit nasave. Vitthalaabaabat, sindhu sanskrutibabat te asur sanskrutibabat mi bharapur lekhan kele ahe ani te prasjiidhahi aahe. <br /><br />Nava itihaas haa tarkashuddh puravyanvarach asalaa pahije...mag to maraatrhaa lihot ki any koni. Pan durdaivane tase hot naahee yaachi khant ahech.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14721360881422912182011-05-19T08:30:06.907-07:002011-05-19T08:30:06.907-07:00अन्य समाजांचा मुळात इतिहस असा कधी लिहिलाच गेलेला न...अन्य समाजांचा मुळात इतिहस असा कधी लिहिलाच गेलेला नाही त्यामुळे त्यात केवळ आत्मसंतुष्टीसाठी खोटे उदात्तीकरण केले जात असेल तर त्याला विशेष असा आक्षेप घेता येत नाही हे येथे लक्षात घ्यायला हवे. <br />=========<br />मग मराठ्यांनी करावे काय?<br />महात्मा फ़ुलेंनी सूरवात केली, राजर्षि शाहू आणी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आणी अनेक जनांनी खोट्या इतिहासा विरुद्ध लढा दिला, त्यात सर्वच जातिच्या लोकांनी सहभाग घेतला, अगदी काही पुरोगामी ब्राह्मणांनी देखिल सहभाग घेतला असणार.....<br />१०० वर्षे होऊन गेली, इतिहासात किती सुधारणा झाली ते सांगा..??<br />णात कमी झाले आहे ते ही सांगा.. की ह्या ५०-६० वर्षात दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी ह्यांच्या गुरूपदा बाबतचे विकृतीकरण किती प्रमाणात थांबले ते ही सांगा ?? थांबायचे तर नावच नाही पण ते विकृतिकरण वाढतच चालले आहे...<br />मग आत्ता ह्या बाबतच्या लढ्याची पद्धतीचे आत्मपरिक्षण नको का करायला ??? समजाऊनही जर पुढचा विकृती करण कमी करण्याचे नाव घेत नसेल तर....आत्ता पुढच्या वर अक्रमण नको का करायला?? कधी पर्यन्त आपण आपल्याच गडाचे संरक्षण करायचे?? कधी आपण बाहेर पडून जो आपल्या गडावर वारं वार आक्रमण करतोय त्यांचेच गड का नाही उ्ध्द्वस्त करायचे?? <br />तुमच्या बद्दल माहित नाही पण हरी नरके सरांनी जो सध्याचा STAND घेतलाय, तो तरी योग्य वाटत नाही...काहि काळापुर्वी जे ब्रिगेडच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते..तेच आत्ता ब्रिगेड वर तोंडसुख घेतांना दिसतात... मान्य कि ब्रिगेड चे काही त्यांना खटकले असेल..पन साळंखे सरांसारखे ते देखिल आपले अंग बाजुला काढून घेउ शकले असते..पन उलट त्यांनी ब्रिगेडवरच धावा बोलला आहे..त्यामुळे काही तरी राजकारण जरुर शिजलेले असनार..तुमच्या बाबतही तसेच असु नये अशी अपेक्षा बाळगतॊ...कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |https://www.blogger.com/profile/09423421420274162008noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23159827698292875352011-05-18T20:01:16.271-07:002011-05-18T20:01:16.271-07:00कुळवाडी भुषण, फक्त मराठेच नव्हेत तर खोटा इतिहास सा...कुळवाडी भुषण, फक्त मराठेच नव्हेत तर खोटा इतिहास सांगण्यात अनेक आघाड्या बनत आहेत. त्यामुळे तेवढ्यापुरते आपले म्हणने मी खरे आहे असेच मानतो. परंतू खोट्या इतिहासाच्या नादी मराठ्यांसारख्या समाजाने लागावे हे अधिक खटकण्यासारखे आहे कारण त्यांचा खरोखर राजकीय इतिहासही आहे आणि त्याचे अधिक वस्तुनिष्ठ संशोधन-विश्लेषन करता येवू शकते. अन्य समाजांचा मुळात इतिहस असा कधी लिहिलाच गेलेला नाही त्यामुळे त्यात केवळ आत्मसंतुष्टीसाठी खोटे उदात्तीकरण केले जात असेल तर त्याला विशेष असा आक्षेप घेता येत नाही हे येथे लक्षात घ्यायला हवे. मी राजकारणी नाही त्यामुळे मराठा-ओबीसी या वादात मी नाही आणि नसले पाहिजे. इतिहासाच्या मोडतोडीची कारणे शोधणे हे काम आहे आणि ते एका लेखावरून जज करता येणार नाही. तुमच्या प्रतिक्रियेमुळे उलट त्याला चांगली चालना मिळेल. धन्यवाद.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77094400393928794912011-05-18T08:03:33.730-07:002011-05-18T08:03:33.730-07:00ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी ...ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी राहिले होते ते हे मर्द मराठा जातीचे म्हणवणारे काही विद्वान (?) इतिहासकार करत आहेत.<br />==============<br />१] ह्याचा अर्थ ब्राह्मणी इतिहास करा कडून अधः पतन झाल्याचे तुम्हाला मान्य आहे...<br />२] ह्यात जे तुम्ही मराठा समाजातील इतिहासकारा वर टीकेची झोड उठवलेली दिसते...बहुजन समाजात मराठा जातीतले सोडून असे कोणीच करत नाहीयेत का??? त्यावर तुम्ही काही भाष्य केलेले आहे का???<br />जसे लिखाण मर्द मराठयां कडून आत्ता होत आहे असे तुमचे म्हणणे आहे.. तसेच लिखाण बहुजन समाजातील मराठा सोडून इतर जातीतील कोणीतरी केले तर त्याला तुम्ही विरोध करणार का???<br />३] स्पष्टच विचारतो.. इतिहासाच्या राजकारणातून जी ब्राह्मण विरोधी चळवळ उभी राहू बघते आहे.. त्याचे सगळे श्रेय अथवा फायदा मराठा समाजातील राजकीय नेत्यांना होईल असा पूर्वग्रह ठेऊन मराठा जातीतील इतिहासकारांना अथवा चळवळ कर्त्यांना निशाणा केले जात आहे का??? ह्यात विशेषता OBC च्या मतांसाठी हि टीकेची झोड उठवली जात नाही कशावरून... इतिहासातील ब्राह्मण विरोधी चळवळीचे श्रेय मराठयां कडे जाईल.. आणि मग.. त्यातून ब्राह्मणविरोधी(ब्राह्मण्यविरोधी म्हणा) अश्या फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची सूत्रे देखील मराठयां कडे जातील.. त्यातून OBC आणि भीमशक्ती हि मराठा नेत्यांच्या मागे जाईल....असे झाले तर.. OBC , आणि प्रस्थापित भीमशक्तीचे नेते..व इतिहास तज्ञ मागे पडतील अश्या ह्या अस्वस्थतेतून जर कोणी मराठा जातीतील लेखकांवर टीका करणार असतील तर ती टीका किती योग्य असणार ह्याची कल्पना आल्यावाचून राहत नाही...नेते पद त्या त्या जातीतील इतिहास तज्ञांना, सामाजिक विचारवंतांना, नेत्यांना पाहिजे असेल तर त्यांनी स्वतंत्र उपक्रम राबवा,...पण समांतर लढा देणाऱ्यांवरच टीका हे उत्तर मला तरी योग्य वाटत नाही...कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |https://www.blogger.com/profile/09423421420274162008noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-12848437037946020422011-05-18T07:47:31.240-07:002011-05-18T07:47:31.240-07:00१) रामायणातील उत्तर खंडातील.. भले प्रक्षिप्त असली ...१) रामायणातील उत्तर खंडातील.. भले प्रक्षिप्त असली तरीही... रामाने एका ब्राह्मणाच्या सांगण्या वरून शंबूक वध केला... ह्यात कोणत्या राज्यकर्त्याचा स्वार्थ दिसून येतो...??<br />२) शिवरायांच्या राज्याभिषेकाला...तत्कालीन ब्राह्मण वृन्दांचा विरोध होता.. ह्यातून कुठल्या प्रकारचा धर्मशक्ती वर राज्यशक्तीचा अंकुश दिसून येतो...?? उलट मी तर म्हणेल आधीच्या राज्यांना धर्म शक्तीपासून थोडे सांभाळून राहावे लागत असे.. कारण तत्कालीन समाजात लोकप्रियता मिळवण्यासाठी धर्माचे पालन हा देखील एक महत्वाचा मुद्दा असावा.. शिवरायांनी क्षत्रियत्व सिद्ध केले आत्ता मला सांगा काय गरज होती क्षत्रियत्व सिद्ध करायची.. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा विरोध होता म्हणून अथवा दुसऱ्या कारणा वरून म्हणा, काय गरज होती गागा भट्टाना बोलावून राज्याभिषेक करण्याची????इतर जातीतील कुणालाच राज्याभिषेकाचा विधी करण्याची पद्धत माहित न्हवती का??? आणि जर माहित नसेल तर राज्याभिषेकाची नवीन पद्धत का बरे रुजवण्यात आली नाही....कुठे तरी राजा जरी असला तरी त्याला लोकप्रियतेसाठी म्हणा.. अथवा त्याच्या वर लहान पणा पासून असलेल्या धर्माच्या पगड्या मूळे म्हणा..तो वावरत असलेल्या वातावरणा मूळे म्हणा, धर्म शक्ती.. अथवा धर्माच्या दलालांचे ऐकणे भाग पडत असावे असे म्हणता येणार नाही का??<br />३) आपण म्हणता त्या नुसार वादासाठी मान्य केले कि प्रक्षिप्त इतिहास अथवा.. खोटा इतिहास ह्यात त्या त्या काळातील राज्यकर्त्यांचे हित होते..असे जरी मान्य केले तरी महत्वाचा मुद्दा असा आहे.. कि राज्यकर्त्यांनी त्या त्या काळात जो इतिहास लिहिला गेला त्याचे किती प्रमाणात वाचन केले होते....स्वतः वाचन करायचे कि दुसऱ्या कडून वाचन करवून घ्यायचे...???<br />अजूनही अनेक प्रश्न उपस्थित राहतात....<br />मला असे म्हणायचे नाही कि जे काही झाले त्यात फक्त ब्राह्मणांची चूक होती.. पण ज्यांचा लिखाणा वर पगडा होता.. त्यांची जास्त चूक असणे.. हे अगदी साहजिक आणि सद्सद विवेक बुद्धीला पटेल असे आहे...<br />राज्यकर्त्यांची जशी आपण चूक म्हणता.. त्यांचा फायदा म्हणता.. तशीच मग बहुजनांची देखील चूक म्हणायची का?? कारण असा इतिहास लिहिला गेला.. मग त्यांनी त्या त्या इतिहासाला तेव्हा तेव्हा विरोध का बरे केला नाही???? तसे बघायला गेले तर चूक सगळ्यांचीच आहे असेही म्हणता येते..आत्ता विषय आहे.. चूक कोणाची होती त्या पेक्षा.. आत्ता चूक कोण करत आहे...<br />आणि आत्ताच्या काळातही जर काही लोकांकडून चुकीचा इतिहासच पुढे आणला जात असेल.. तर त्यास विरोध का करू नये...???कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |https://www.blogger.com/profile/09423421420274162008noreply@blogger.com