tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5334144521362414747..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): तुळसाबाई होळकरSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76704973334445801042015-09-12T06:36:04.670-07:002015-09-12T06:36:04.670-07:00आप्पा - दमलो रे बाप्पा - किती धावाधाव करायची ? इतक...आप्पा - दमलो रे बाप्पा - किती धावाधाव करायची ? इतकं केलं म्हणून हा पाउस पडला . <br />बाप्पा - अरे आपण , वैष्णव , हे संजय सोनावणी आपल्याला थोडच क्रेडीट देणार आहेत त्याचे ?<br />आप्पा -अरे पण आपण त्यांच्याच देवाला साकडे घातले ना ? पार कैलासाच्या पायथ्याशी गेलो !<br />बाप्पा - एक मात्र या पुराणांचा उपयोग होतो बर का ! भोला सांब किती भोळा आहे ते समजल बघ . आपल्याला पाहिल्यावर कस म्हणाला , तुम्ही कुठले ? पुण्याचे ? आपण जेंव्हा म्हटलं की आपण शैव आहोत , तुमचे निस्सीम भक्त आहोत तेंव्हा त्याला अजिबात डाऊट आला नाही , मला वाटलं होत की आता धरतो की काय ? <br />आप्पा - पण जेंव्हा म्हणाला ना की मी पुण्यालाच पाउस पाडायला निघालोय , तेंव्हा खर नाही वाटलं , अस वाटलं की कोणी पुण्याचा मंत्रीच बोलतो आहे ! <br />बाप्पा - छेरे , तो पुण्याचा मंत्री " हिरवी देठ हिरवी देठ " असे केसाला कलप लाऊन म्हणत बसलाय !त्याला माहित पण नाही की कैलासाचा शंकर साक्षात ओंकारेश्वरला येउन जाणार आहे ते !<br />आप्पा - पण काहीही म्हण हं - भोलेनाथ आला तोच मुळी मुसळधार पाऊस घेऊनच आला !<br />बाप्पा - आपण खोट बोललो त्याच पाप आपल्याला लागेल ते लागो , पण आपण हाक मारली - आणि आला बघ रे - <br />आप्पा - म्हणजे आपण वैदिक लोक म्हणतात तितके पापी नाहीयोत नाही का रे ? आता हे ठीक आहे , की लोकांसाठी आपल्याला खोटे बोलावे लागले . आपण शैव आहोत असे सांगावे लागले . <br />बाप्पा - खर सांगू का , अरे आपण वैदिक आहोत असे म्हटले असते ना साक्षात शिवाला , तरी तो आलाच असता पाऊस घेऊन - - हे राजकारणी पण एकमेकाची काम करतातच की नाही रे ?<br />आप्पा - चाल तर मग , निदान एक प्रदक्षणा तरी मारू ओंकारेश्वराला , <br />बाप्पा - पण ती भोलेनाथाची प्रदक्षणा फार उलटी सुलटी असते रे !<br />आप्पा - असू दे असू दे - पब्लिक साठी काहीही करायची आपल्याला सवय केली पाहिजे . आफ्टर आल यु नो व्हाट आय मीन - आज सत्यनारायणाचा शेवटचा दिवस आणि मेघराज बरसले !<br />बाप्पा - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ? सत्य नारायणाने जाता जाता पाउस पाडला ? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16826654847114427082015-09-10T08:34:58.398-07:002015-09-10T08:34:58.398-07:00संजय सरांचा हा लेख अनेक नवी माहिती देत आहे . आम्हा...संजय सरांचा हा लेख अनेक नवी माहिती देत आहे . आम्हाला थोरले मल्हारराव होळकर इतकीच थोरवी माहित होती . परंतु पु . तुळसाबाई यांच्याबद्दल आपण लिहिले त्याबद्दल आभार . आता असेच एक पूर्ण सत्र आपण नागपूरकर भोसले , बडोद्याचे गायकवाड आणि शिंदे यांचा बद्दल लिहावे हि विनंती , पूर्वी लिहिले असल्यास त्याबद्दल सांगावे . धन्यवाद . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18089977332059740602015-09-10T08:07:58.758-07:002015-09-10T08:07:58.758-07:00संजय सर ,
आपल्या ब्लोगवर असल्या विशायाना अत्यल्प प...संजय सर ,<br />आपल्या ब्लोगवर असल्या विशायाना अत्यल्प प्रतिसाद मिळत असतो . तसेच आपले होळकर प्रेम आपल्याला हे लिखाण करायला लावत असेल , पण लोकाना त्याबद्दल काहीच सोयर सुटक नाही . <br />अगदी कर्तव्य म्हणता येणार नाही , पण , आपल्या ब्लोगचे ध्येय काय ? आपणास या ब्लोगचा वापर करून काय मिळवायचे आहे असा जर विचार केला , तर , असे दिसते की आपण असंख्य विषयावर लिहित असता , त्यात लोकाना न आवडणारा विषय आहे हा !<br />आपण ५०० पूर्वीचा इतिहास लिहाल , चाणक्य चंद्रगुप्त लिहाल , आरक्षण लिहाल , दुष्काळ लिहाल , जिहाद,सेन्सस , सांस्कृतिक आणीबाणी , महाभारत , खंडोबा , साहित्य संमेलने, शैव वैदिक असे काही लिहाल तर लोक आवडीने वाचतात , पण अशा विषयात रस नसतो असे दिसते . मलाही नाही ! पण आपल्या निदर्शनास आणण्यासाठी लिहिले Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81144876792841721832015-09-09T11:30:35.971-07:002015-09-09T11:30:35.971-07:00आप्पा बाप्पा , आपण खूपच धाडसीपणाने आपला मुद्दा मां...आप्पा बाप्पा , आपण खूपच धाडसीपणाने आपला मुद्दा मांडला आहे .आपल्या देशी सैनिकांच्या मुद्द्यात तथ्य आहे ,कारण सैन्य हे शेवटी पोटावर चालते हा सुविचार मान्य केला तरी आपले मराठी मन इतके कोडगे कसे बनले , इंग्रजांच्या अधिपत्याखाली त्यांच्या बंदुका आपल्याच जनतेवर कधी रोखल्या गेल्या ?<br />पेशव्यांनी चौथाई सर देशमुखीच्या आणि शाहू महाराज यांच्या कडून पेशवेपदाला अधिक अधिकार मिळवण्याच्या नादात आपल्या कर्तृत्वाला मर्यादा घालून घेतल्या का ?भगवा झेंडा अटकेपार गेला पण तिथे कायमचा रोवला गेला नाही ! हल्ली शिवसेना खंडणी गोळा करते तशीच ही एकप्रकारे क्खान्दानीची चातक पेशवाईत रुजली आणि त्यांनी मराठेशाहीचा घात केला , <br />पानिपतात आपले पराभूत सैन्य पळू लागले तेंव्हा आपल्याच सैन्याला प्रजेकडून अत्यंत हिणकस वागणूक मिळाली , मराठी सैन्याला लुटारू म्हणत अनेक ठिकाणी तुडवले गेले , हे काही हिंदुपात्पाद्शाहीचे सैन्य म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिले नव्हते , म्हणजेच जिथे जिथे मराठी संस्थाने होती त्याठिकाणी लोक अतिशय सुखात नांदत होती का ? मुघल सत्तेविरुद्ध पेशव्यांनी कायम पद्धतीने बफर स्टेट म्हणून होळकर शिंदे इत्यादी सरदार वसवले त्याचा मूळ हेतू फसला . कारण नवीन शत्रू खैबर खिंडीच्या ऐवजी , अरबी समुद्रातून आला . त्याने आपल्या संस्थानांकडे तैनाती फौजा ठेवल्या ! त्यांच्या दिमतीला मुलुख तोडून मागितला आणि आपले संस्थानिक आपसातल्या लढाईला इंग्रजांचा दारुगोळा आणि थेट सहाय्य मागू लागले , ते लोण भाऊबंदकीने जर्जर झालेल्या आपल्या देशात सर्वत्र वेगाने पसरत गेले<br /> <br />पेशवाईकडे हे पाप नक्कीच जाते ! कोणते पाप ? - त्यांनी शिवाजीच्या काळात दिसणारी <br />"आपले स्वराज्य - माझे स्वराज्य " ही आपुलकी घालवली आणि एखाद्या बनिया सारखे राज्य चालवण्याचे दुकान मांडले . राज्यविस्तार हेच ध्येय मानून त्यासाठी स्वराज्य कर्जबाजारी बनवले <br />असो - तर दिसले तसे मांडले ! <br />आप्पा बाप्पा राग मानू नये , manasi pataskarhttps://www.blogger.com/profile/14096950103126066872noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51619211574005530472015-09-09T10:54:08.955-07:002015-09-09T10:54:08.955-07:00आप्पा - कदाचित संजय सराना किंवा इतर अनेकाना आवडणार...आप्पा - कदाचित संजय सराना किंवा इतर अनेकाना आवडणार नाही आम्ही लिहिलेले , पण या लेखाबद्दल एकच वाटते की पेशवाई बुडाल्यावर आपोआप फांद्या खाली येणार होत्या आणि तसेच झाले !त्यामुळे तुळसाबाई चे कौतुक करण्याचे विशेष कारण नाही !<br />बाप्पा - प्लासीची लढाई झाली आणि तेंव्हाच जणू प्राक्तन ठरले की इथे इंग्रज येणार म्हणजे येणार . अगदी १०० टक्के ! अगदी शिवाजी महाराज असते तरी ते टळले असते का ?- नाही !<br />त्यामुळे असे तुटक तुटक कर्तृत्व दाखवणारे वीरगाजी काही वर्षे इकडे तिकडे करत इंग्रजी साम्राज्याचा प्रवेश लांबवू शकले असते . त्यातलाच हा प्रकार आहे इतकेच !<br />आप्पा- सर्व क्षेत्रात सरस असलेल्या इंग्रजाना शिवाजी महाराज यांच्यासारख्यांकडूनही नंतरच्या काळात थांबवणे अशक्य होते , प्लासीच्या लढाईत १७५७ लाच इंग्रजांनी शिक्कामोर्तब केले आणि त्यांची पावले पडू लागली . हे ऐकायला दुःख दायक वाटते पण हेच सत्य आहे . <br />बाप्पा - उमाजी नाईक असो , आंग्रे असोत वासुदेव बळवंत फडके असोत किंवा तुळसाबाई होळकर असोत . युरोपियन लोकांचे इथले येणे अटळ होते .या आपल्या वीरांची इच्छाशक्ती हीसुद्धा कशाशी निगडीत होती तेही पाहिले पाहिजे . जसे की , १८५७ च्या युद्धाला स्वातंत्र्य समर म्हणायचे का ? कारण त्याचा गाभा काय होता ? मुठभर राज्याना खालसा केले म्हणून हा वणवा पेटला होता का ? होळकर राज्य काय पद्धतीने चालले होते ? त्यांच्या रिजंट पदाचा तात्पुरता मान ठेवत इंग्रजांनी ते राज्य खालसा केले नसते तर महाराणी तुळसाबाई इतक्या पेटून उठल्या असत्या का ?<br />आप्पा - खरच रे बाप्पा - असले उलटे प्रश्न आपण विचारू लागलो स्वतःला की वेगळीच उत्तरे गवसतात . मुळात एक नव्या धर्तीचे परचक्र इथे येत आहे हे नक्की आपल्या राजे लोकाना समजले होते की नाही ? ही काही वर्षांची शेवटची तडफड होती - असे प्रत्येक संस्थानात घडत होते - हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे . इंग्रजांचा मूळ रोख पुणे होता . त्यानंतर फक्त काही वर्षांचा प्रश्न होता . इतिहास समजून घेताना हा आंतर राष्ट्रीय संदर्भ लक्षात घेतला पाहिजे . <br />बाप्पा - शिस्तबद्ध प्रशासन आणि कवायती फौजा यामुळेही इंग्रजांना लढाया जिंकणे सोपे जात होते , आपलीच माणसे आपल्याविरुद्ध वापरून हे घडत होते हेही ध्यानात ठेवले पाहिजे , <br />आप्पा - फंद फितुरी हा भाग आहेच पण आपल्याच देशाविरुद्धच्या लढाईत आपण परकियांच्या सैन्यात स्वदेशाविरुद्ध उभे रहावे असे देशी सैनिकाला वाटणे हा आपल्या कोणत्या मनोवृत्तीचा पराभव होता ?<br />बाप्पा -शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी जे शक्य करून दाखवले ते या (महा)नायकाना का जमत नव्हते ?हा काळाचा महिमा म्हणावा का ? का चौथाई सरदेशमुखीचा सुस्तपणा ? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात .हे इंग्रजी सैन्यात नोकरी पत्करणारे देशी सैनिक कोणत्या जातीचे होते त्यावर संशोधन झाले आहे का ? तिथे इंग्रजांनी काही धूर्तपणा दाखवत जातीचे राजकारण त्या काळात केले होते का ? <br />आप्पा - आपले राज्य का बुडाले हा जसा अभ्यास आवश्यक आहे तसेच इंग्रज इथे आपली फौज आपल्याच लोकांमधून कशी उभे करू शकले हाही मुद्दा महत्वाचा आहे . आपल्याकडे जनसामान्यात स्वातंत्र्याचे वारे - शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते ते स्फुल्लिंग एकाएकी विझले कसे ? हे असे एका रात्रीत तर घडत नाही ना ?<br />आधी शिवाजी आणि संभाजी महाराज , त्यानंतर -पेशवे आणि त्यांचे पराक्रम , नंतरचे पानिपत , आणि इंग्रजांचे आगमन असे जर मराठेशाहीच्या इतिहासाचे भाग केले तर आपल्या सैन्याचे स्वदेशाचे प्रेम का व कसे आणि कधी आटत गेले ?<br />बाप्पा - श्रीमान योगी नंतर अशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगवण्याची फ्याशन झाली आहे आणि मूळ अभ्यासाचा विषय मागे राहून जातीप्रमाणे अश्या व्यक्तिरेखा रंगवण्याकडे लेखकांचा ओढा वाढला आहे , तो अजून थांबत नाही हे दुर्दैव !<br />आप्पा - त्या ऐवजी इंग्रजांच्या सैन्यातील देशी सैनिकांच्या मनोवृत्तीचा अभ्यास झाला तर आपल्या उपयोगी पडेल . १८५७ चा संग्राम हा स्वातंत्र्य संग्राम होता का हेही संघ विचार मांडणाऱ्या <br />देशभक्ताना सांगता येईल . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-52222975578810030472015-09-08T23:03:26.160-07:002015-09-08T23:03:26.160-07:00Great !!!Great !!!Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.com