tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5653571409352720714..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आधुनिक युगातील आदिमानवSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73379742794163927142011-12-12T08:53:24.487-08:002011-12-12T08:53:24.487-08:00६. राहता राहिला प्रश्न कला आणि साहित्याचा. मला हे ...६. राहता राहिला प्रश्न कला आणि साहित्याचा. मला हे मान्यच नाही, कि साहित्याचा दर्जा खालावला आहे. तुम्ही मागचे साहित्य काढून पहा. त्यातील लेखकांची मनोवृत्ती संकुचित, शिंपल्याएवढा छोटा worldview हे सारे फारच उघड आहे. आपले गाव, आपली जात, ह्याबाहेर कुणाला काही माहित असलेले दिसत नाही. अगदी फार थोडे अपवाद सोडता त्यातील फारसे काहीही टिकणारे नाही. चित्रपटांचे तसेच. आता slumdog millionnaire ह्या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळायला नको होते, हे मला मान्य आहे, पण हा निव्वळ anglo-american संस्कृतीचा कावा आहे, दुसरे काही नाही. आपल्याकडील चित्रपट पहा. (म्हणजे चांगले चित्रपट. भिकारही बरेच असणारच. ते आधीही होतेच.) आजच्या एवढी समज तेव्हा असल्याचे मला तरी दिसत नाही. लगान सारखा चित्रपट, तारे जमीन पर, A Wednesday, मुंबई मेरी जान, ट्राफिक सिग्नल ह्यातील नुसतं विषयांचं वैविध्य तरी पहा. तसेच स्त्री-पुरुष नात्यामधली maturity पूर्वीपेक्षा खूपच जास्त असल्याचे दिसेल. पूर्वी सत्यजित राय, गुरुदत्त आणि काही तुरळक चांगल्या बनलेल्या आर्ट फिल्म्स सोडून जगाला दाखवण्यासारखं होतंच काय आपल्याकडे? <br /> <br />मला वाटते, कि मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचा जो सिद्धांत आहे, तो फारच मार्मिक आहे. समाजाचा पाया जसा असतो, त्याला अनुरूप त्यावरील इमारत असते. (उदाहरणार्थ, राजे-राजवाड्यांचा काळ जेव्हा होता तेव्हाच कोठीवर गाणाऱ्या गायिका असत, कारण त्या ह्या वर्गाच्या आश्रयावर जगत असत. ह्यातून काही श्रेष्ट गायिका निर्माण झाल्या. मदनमोहनचे संगीत मुख्यतः ह्या संस्कृतीवर आधारित आहे. आज ती संस्था लयाला गेली, तेव्हा मदनमोहनसारखी गाणी आज बनू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. आज जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे ए. आर. रहमान सारखा श्रेष्ट संगीतकार निर्माण होतो, जो भारताबाहेरही नाव करतो.) <br /><br />असो. शेवटी एवढेच कि मला वाटते, कि मानव जातीचा विकास कधीच linear नसतो. त्यात चढ-उतार असतातच. पण जर साकल्याने सर्व गोष्टींचा आलेख मांडला तर तो निश्चित वर जाणारा आहे.Sandeep Khttps://www.blogger.com/profile/17565946224083022052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31775295465032034992011-12-12T08:51:20.755-08:002011-12-12T08:51:20.755-08:00श्री सोनवणी साहेब,
आपला लेख चांगला आहे. त्यातल्या...श्री सोनवणी साहेब, <br />आपला लेख चांगला आहे. त्यातल्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. तथापि काही मुद्दे मांडू इच्छितो -<br /><br />१. मूलभूत भौतिकशास्त्रात फारशी मौलिक भर पडलेली नाही, हे निश्चित खरे आहे काय? मी अर्थात भौतिकशास्त्राचा विद्यार्थी नाही, पण स्टीफन हौकिंग ह्याचे 'the grand design' हे पुस्तक वाचून आईनस्टाईनच्या किती पुढे शास्त्र गेले आहे त्याची कल्पना येते. जी विख्यात 'M theory' आहे ती अद्याप संपूर्णपणे सिद्ध झालेली नाही, पण ते एक महत्वाचे पाउल निश्चितपणे आहेच. पण तुमच्या म्हणण्याचा विचार करायचा तर एक गोष्ट अशी असावी, कि अशा प्रकारच्या मूलभूत संशोधनासाठी आर्थिक मदत करण्यापेक्षा तंत्रज्ञान हेच अधिक फायदा मिळवून देणारे असल्यामुळे हा परिणाम झाला असावा. <br /><br />२. तंत्रज्ञानातील प्रगती माझ्या मते तरी विस्मयकारक आहे. तुम्ही गेल्या १०० वर्षांचा पट डोळ्यासमोर ठेवला आहे. अंतराळातील प्रगती ह्याच काळात झाली हे विसरता येणार नाही. चंद्रावरील स्वारी झाल्यावर क्रमाने ह्या गोष्टी अधिक पुढे जायला हव्या होत्या, पण त्यासाठी लागणारा पैसा, जो फक्त अमेरिकेकडेच आहे, त्यांच्याही करदात्यांना नासाला अधिक पैसा द्यावासा वाटत नाही, कारण ह्या संशोधनातून काहीतरी अधिक चांगली निष्पत्ती होण्याच्या शक्यता दिसत नाहीत. आपल्या सूर्यमालिकेमध्ये अन्यत्र कुठेही जीवन नाही, हे एकदा सिद्ध झाल्यावर, ह्या पलीकडे जाणे, हे आजच्या प्रगतीच्या आवाक्यातले नाही. माणसाने प्रवास करणे तर जीवशास्त्रीय दृष्ट्याही अशक्य कोटीतील आहे. <br /><br />३. संगणकाच्या मूळ भाषेत कदाचित बदल झाला नसेल, पण इंटरनेट ही माझ्या मते प्रचंड मोठी क्रांती आहे. ह्यामुळेच माहितीचा महापूर निर्माण झाला आहे, आणि पुढील प्रश्न (जे तुम्ही मांडले आहेत) निर्माण झाले आहेत, हे खरे असले तरी विकास हा असाच नागमोडी वळणांनी होत असतो. आज प्रश्न निर्माण झाले आहेत, उद्या उत्तरेही मिळतील. आणि ह्या <br /><br />४. इंधनाला पर्याय दिसत नाही, हे खरे आहे, आणि हा खरा कळीचा प्रश्न आहे. ह्यावर आज उत्तर दिसत नाही. आज सारेच ह्या गोष्टी मुळे भयभीत झालेले आहेत. फक्त माणसाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि आशावादी राहणे हेच फक्त आज शक्य आहे.<br /><br />५. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या माणूस मागे गेला आहे असे मला अजिबात वाटत नाही. किंबहुना, आजएवढा माणूस आधी कधीही सुखी नव्हता. मी युरोपात राहत असल्यामुळे हे बोलतो आहे असे नव्हे, तर आपल्या देशाबद्दलही हेच खरे आहे. भूतकाळात राहण्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. आपल्या देशात अद्यापही ४०% लोक अत्यंत दारिद्र्यात राहतात हे जरी खरे असले तरी ४०% लोक (जी संख्या अक्ख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे) हे पाश्चात्य मोजमापानुसारही चांगली क्रयशक्ती असणाऱ्या वर्गात मोडतात ही एक वस्तुस्थिती आहे. ह्यापूर्वी कधी अशी परिस्थिती होती काय? सामाजिक दृष्ट्याही बघता, विशाल भूमिका असणारे लोक क्रमाने वाढत जाणे हे आजच दिसत आहे, ह्या पूर्वी फारसे दिसलेले नव्हते. अहो, मी इथे राहतो, आणि जेव्हा मला आपल्याकडील तथाकथित मागास जातीतील मुले-मुली इथे काम करताना, संशोधन करताना दिसतात, तेव्हा किती आनंद होतो हे मी सांगू शकत नाही. (परवाच इथे एक नारायणगावचा मुलगा भेटला. अधिक गप्पांमधून तो एका तथाकथित मागास जातीतील आहे हे माझ्या लक्षात आले. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी ह्या वर्गातले आहेत. आज हा मुलगा नेदरलंद्स मध्ये bio-genetics मध्ये PH.D. करतो आहे. मला त्याचा फार अभिमान वाटला. आणि अशी बरीच उदाहरणे मी सांगू शकतो.) आज जातींची बंधने सैल होत आहेत. स्पृश्यास्पृश्यता राहिली नाही. स्त्रियांची परिस्थिती कधी नव्हे एवढी सुधारली आहे. (तरी ती समाधानकारक आहे असे मला म्हणायचे नाही. पण भूतकाळ एवढा वाईट आहे, कि थोडी प्रगतीही जाणवावी.)<br /><br />(pudhe chalu -Sandeep Khttps://www.blogger.com/profile/17565946224083022052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-2300958372841669932011-11-17T09:00:15.951-08:002011-11-17T09:00:15.951-08:00माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी माहिती कसाला ल...माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी माहिती कसाला लावण्याची गरज असते. माहिती कसाला लावण्याची ही वृत्ती असणाऱ्या लोकांची संख्या पूर्वीदेखील आताइतकीच होती. आताच्या संशोधनाचा उपयोग करून घेण्याची गरज समाजाला वाटत नसल्याने त्याचा उपयोग केला जात नसावा. अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयात वाफेवर चालणारे इंजिन होते, पण त्यावेळच्या समाजाला त्याचा वापर करण्याची गरज वाटली नाही.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33999585184556321552011-11-16T07:29:19.647-08:002011-11-16T07:29:19.647-08:00Excellent, Good read!Excellent, Good read!VIkas Godagehttps://www.blogger.com/profile/06578664058351436336noreply@blogger.com