tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5734192445462269202..comments2024-02-27T03:45:20.517-08:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): वाचनसंस्कृतीचे मारेकरी कोण? (2)Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77014158795135232882012-10-27T23:58:50.314-07:002012-10-27T23:58:50.314-07:00खरेच जसे जसे प्रगती करत जावे तसतशी समस्यांची मालिक...खरेच जसे जसे प्रगती करत जावे तसतशी समस्यांची मालिकाच तयार होत असते,<br />हा प्रश्न आणि पायरसी चा प्रश्न एकच मानायचे का ?लोकप्रिय सिनेमाच्या सीडी जशा स्वस्तात मिळतात तसेच हे समजायचे का ?<br />पूर्वी पोर्न लिखाणाची एक लाट आली होती त्या पेक्षा हा प्रकार वेगळा आहे .<br /><br />यामध्ये लेखकाला डावलून त्याची रॉयल्टी डावलून हे घडत असेल तर त्यासाठी काही संस्थांची लेखक मदत का घेत नाही ?<br />यात काही साटेलोटे असेल आणि <br />कुणीच बळीचा बकरा बनत नसेल तर , वाचकांना मात्र निर्विवाद इतकी स्वस्त पुस्तके हा एक अलभ्य लाभ वाटेल.<br />पुस्तके फारच स्वस्त आहेत.<br />शुद्धलेखन पण व्यवस्थित आहे.<br />पुस्तके हाताळायला सुसह्य आहेत <br />पुस्तकांचे आयुष्य पेपर ब्याक असल्यामुळे -कमी असेल .<br /><br />मुख्य प्रश्न पायरसीचा आहे !<br /><br />एक मात्र खरे कि एक प्रचंड लाट आली आहे बाजारात ,<br />आणि आश्चर्याचा भाग म्हणजे त्यातील बरीचशी पुस्तके अभ्यासपूर्ण -गंभीर विषयावर आहेत.ग्रंथ स्वरूपातील हि पुस्तके <br />आज अतिशय कमी किमतीत लोकांसमोर येत आहेत हाच एक लोकांसाठी आकर्षणाचा मुद्दा !<br />ग्रंथपाल प्रामाणिक असेल तुमच्या सारखा तर तो ४०० रुपयाचे एक पुस्तक घेण्यापेक्षा ५० रुपया प्रमाणे त्याच्या ८ प्रती घेईल. <br />म्हणजे त्या पुस्तकातील विचार एका ऐवजी आठ जणांपर्यंत पोहोचू शकतात.तितक्याच पैशात.<br />पण भ्रष्टाचाराचा मुद्दा पण महत्वाचा आहे हे मात्र खरे !<br />बरेचसे लेखक वैकुंठवासी झालेले आहेत.त्यांचे हक्क कुणाकडे आहेत हा एक किचकट प्रकार आहे.<br />हे सगळे बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई होईलच !datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-3593093044415853332012-10-27T22:36:15.201-07:002012-10-27T22:36:15.201-07:00हि गोष्ट खरी आहे कि प्रकाशकांचे, वितरकांचे मुख्य ग...हि गोष्ट खरी आहे कि प्रकाशकांचे, वितरकांचे मुख्य ग्राहक सरकारी वाचनालये आहेत. आता प्रश्न आहे कि जे प्रकाशक दुय्यम दर्जाची पुस्तके बाजारात आणतात. हि पुस्तके जर प्रकाशक सम्बन्धित लेखकाचे हक्क व इतर गोष्टी यांचा आदर करून बाजारात आणत असेल तर मुद्दा पुस्तकांचा दर्जा राखण्याचा उपस्थित होतो. जर हे प्रकाशक, इतर प्रकाशकांची हक्काची पुस्तके परस्पर छापुन विकत असतील तर तो गुन्हा होईल. ग्रंथापालानी अशी पुस्तके घेण्यावर काहीच निर्बंध नाहीत??? अशी चोरलेली पुस्तके ग्रंथपाल कशी काय विकत घेवू शकतात?? याबाबत लेखकांची संघटना काहीच बोलत नाही हे एक आश्चर्य. याबाबत लेखकांनी सरकारला निवेदन देवून, एक नियमावली तयार केली पाहिजे. पुस्तकांच्या दर्जा बाबत मुद्दे देखील अंतर्भूत असले पाहिजे.<br /><br />पुस्तकांचा दर्जा काही प्रकाशाने उत्तमरीत्या राखतात. राजहंस प्रकाशन त्यात अग्रणी असेल, या प्रकाशनाची पुस्तके तुम्ही पुस्तक बांधणीवरून ओळखू शकता.<br />deomhttps://www.blogger.com/profile/06079971767531015609noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49006096366409066682012-10-27T07:18:25.764-07:002012-10-27T07:18:25.764-07:00यावर उपाय काय?नवलेखकांने काय करावे? कितीही चांगले ...यावर उपाय काय?नवलेखकांने काय करावे? कितीही चांगले लिखाण असले तरी छपाई खर्च दिल्याशिवाय ते छापले जाणार नसेल तर नवीन लेखक कसे उदयास येतील? ज्याला परवडते तो आपले लिखाण छापले जावे म्हणून नाईलाजाने या चक्रव्यूहाचा भाग बनतो. खर्च दिला तरी पुस्तक प्रकाशित करण्यात हेतुपुरस्सर दिरंगाई केली जाते.पण जो हा खर्च करू शकणार नाही त्याचे ‘लेखक’ म्हणून भवितव्य काय? या चक्रव्युहामुळे यापुढे मराठीत चांगले लेखक उदयास येणारच नाहीत का?Life Goes Onhttps://www.blogger.com/profile/03075634750312297945noreply@blogger.com