tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post681218096203919652..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger74125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33842570307178392102019-12-20T13:40:44.564-08:002019-12-20T13:40:44.564-08:00Faar chhaan sirFaar chhaan sirBackstar(Dayyu)https://www.blogger.com/profile/12016883463890710260noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-20798090391403948692019-10-14T11:05:26.025-07:002019-10-14T11:05:26.025-07:00पहिले शिवचरित्र लिहिले आहे ते केळुस्कर गुरुजी यांन...पहिले शिवचरित्र लिहिले आहे ते केळुस्कर गुरुजी यांनी ते सुद्धा शाहू महाराजांच्या विनंतीवरून या शाहू महाराजांनि संपूर्ण आर्थिक सह्ह्हाय हे चरित्र लिहिण्यासाठी दिले होते आणि चरित्र प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या 1000 प्रति विकत घेतल्या होत्या हे पुस्तक या शाहू राजाला अर्पण केले आहे त्याची नवीन आवृत्ती कोल्हापूरच्या सरस्वती पब्लिशिंग ने प्रसिद्ध केली असून त्यातील खालील मजकूर वाचा<br />पान न 59 "स 1637 त शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवास आपल्या जहागिरीची व्यवस्था सांगून शिवाजी महाराजास त्याच्या हवाली केले व त्यास असे सांगितले कि याला योग्य प्रकारचे शिक्षण द्यावे" पान न 62 "शिवाजी महाराजास व जिजाबाईस कोणत्याही गोष्टीस उणे पडू न देण्याविषयी तो मनापासून झटे.क्षत्रियाचा मुलगा क्षत्रियकर्म करण्यास चांगला योग्य व्हावा यासाठी त्याने महाराजास युद्धकला शिकविण्याची चांगली व्यवस्था केली .त्याचे शरीर बळकट व चपळ होण्यास लागणाऱ्या कसरती व व्यायाम त्याच्याकडून तो नियमाने करून घेत असे त्याने महाराजास उर्दू व फारशी भाषा शिकविल्या होत्या इतकेच नव्हे तर त्यास थोडेसे संस्कृत हि शिकविले होते "<br />" पान न 63 "दादाजी सर्वच गोष्टी शिवाजीमहाराजच्या विद्यमाने करीत नसत हे लक्षात घेऊन ते एका दिवशी त्याला म्हणाले कि "आह्मी लहान असलो म्हणून काय झाले ?प्रत्येक गोस्ट आह्माला कालवून करावी .आपण आह्माला वडिलांच्या जागी आहात"<br />या जेम्स लेन याने हे पुस्तक वाचले असावे किंवा कोणाकडून तरी समजून घेतले असावे म्हणूनच हा अभद्र विनोद याने आपल्या पुस्तकात केला असावा तेव्हा या केळूस्करच्या मागे ज्या शाहू महाराजांचा मेंदू आहे तेव्हा जेम्स लेनच्या अभद्र विनोदामागे हा शाहू महाराज आणि केळुस्कर आहेत<br /><br />J. Ganeshanhttps://www.blogger.com/profile/04444952992783340512noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-87640197404096488012018-10-14T00:34:02.022-07:002018-10-14T00:34:02.022-07:00हा सोनवणी विकाऊ आहे...हा सोनवणी विकाऊ आहे...Loknath Kalmeghhttps://www.blogger.com/profile/14813473240663617861noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28734031082902718612015-08-24T01:55:53.508-07:002015-08-24T01:55:53.508-07:00This comment has been removed by the author.Anonymoushttps://www.blogger.com/profile/17397203672125082044noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-35161019802199200302015-08-21T05:36:29.623-07:002015-08-21T05:36:29.623-07:00सावरकर शिवरायांचे द्वेष्टे? मी नुसते वाचत होतो. पण...सावरकर शिवरायांचे द्वेष्टे? मी नुसते वाचत होतो. पण आता लिहिल्यावाचून राहवत नाही. सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती वाचा. एखाद्याची अति स्तुती करणे म्हणजे आरती करणे म्हणतात. ही आरती मराठी भाषेचे अप्रतिम लेणे आहे असे मला वाटते. आता काय बोलावे आणखी? आम्ही राजा शिवछत्रपती वाचले, त्यातील घ्यायचा तोच संदेश घेतला. म्हणजे राजा शिवछत्रपती आवडणारे मूर्ख? मुसलमानांचा द्वेष वाटत असेल तर त्यांची नावे बदलणार का? तेव्हाचे आक्रमक आणि आताचे मुसलमान एक कसे? विजय देशमुख यांच्या 'शककर्ते शिवराय' ची सुरुवातच मुहंमद पैगंबरांपासून आहे. कवी भूषण औरंगजेबाला सोडून महाराजांकडे आला. त्या शिवाजी महाराजांना बाबासाहेब मुस्लीम विरोधी दाखवत आहेत? हात टेकले.hjunnarkarhttps://www.blogger.com/profile/16147347264804824967noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-86656775872363057132015-08-20T10:43:35.101-07:002015-08-20T10:43:35.101-07:00Manatlya shankanche nirasan kelyabaddal dhanyawaad...Manatlya shankanche nirasan kelyabaddal dhanyawaad!!!Vaibhav Shuklahttps://www.blogger.com/profile/12344123845280597727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-64616312807432491352015-08-18T11:48:39.290-07:002015-08-18T11:48:39.290-07:00ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पो...ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पोहचलेशिवाजी लक्ष्मणराव कांबळे, भोगावकरhttps://www.blogger.com/profile/11866639841613879521noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79577915710535246122015-08-18T11:36:35.916-07:002015-08-18T11:36:35.916-07:00ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पो...ही खरी मांडणी...शिवान्जीमुळे बाबासाहेब घरा घरात पोहचलेशिवाजी लक्ष्मणराव कांबळे, भोगावकरhttps://www.blogger.com/profile/11866639841613879521noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83773218799133682922015-08-18T03:35:27.585-07:002015-08-18T03:35:27.585-07:00Sundar...Sundar...SACHINhttps://www.blogger.com/profile/15427122140010156011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1973395193993403542015-06-05T22:36:58.077-07:002015-06-05T22:36:58.077-07:00जेव्हा शिवाजी महाराज ह्याचं सईबाई सोबत लग्न ठरल ते...जेव्हा शिवाजी महाराज ह्याचं सईबाई सोबत लग्न ठरल तेव्हा दादाजी कोंडदेव ह्यांनी शहाजी राजे ना पत्र पाठवून आमंत्रण पाठवले होते. पण आदिलशाह ने शहाजी राजे ह्यांस रणदुल्लाखन सोबत दक्षिणेत युद्धावर पाठीवले होते, म्हणून शहाजी राजे लग्नाला येऊ शकले नाही. नंतर शहाजी राजे ह्यांनी शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाबाई ह्यांना त्यांच्या कडे बोलावून घेतले बंगलोर ला, व तिथे परत शिवाजी महाराज ह्यांचे दुसरे लग्न मोहित्यांची लेक सोयराबाई साहेब ह्यांच्याशी करून दिले. Anti Sambhaji Brigadehttps://www.blogger.com/profile/02427467490992287867noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80396173470674968902015-06-02T02:23:16.257-07:002015-06-02T02:23:16.257-07:00 संजयजी,
अतिशय सुंदर आणि व्यवस्थित लेख लिहला... संजयजी, <br />अतिशय सुंदर आणि व्यवस्थित लेख लिहला आहे . अगदी वेळेत केलेल्या या लिखाणा मुळे <br />बरेच गैरसमज दूर होतील Shivbharathttps://www.blogger.com/profile/03497547434194092117noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50562776431644543652015-05-25T00:56:15.827-07:002015-05-25T00:56:15.827-07:00माननीय संजय सोनवणी ,
पुण्यात जितेंद्र आव्हाड याने ...माननीय संजय सोनवणी ,<br />पुण्यात जितेंद्र आव्हाड याने उगाच बळेच शिवशाहीर पुरंधरे यांच्या बाबत वक्तव्य केले <br />२४ मे २०१५ ला आव्हाड चा पोपट झाला ,<br />एका क्वार्टर वर जमा होणारी गर्दी जमवून असले चाळे जर तो करणार असेल तर त्यांचे राजकीय भवितव्य काय असणार ?<br />हा माणूस इतका मूर्ख कसा ?<br />संजय सोनावनी यांनी अशा वेळी त्यांच्या बोलण्यावर भाष्य केले पाहिजे <br />कारण हि घाण पुण्यात येऊ देता कामा नये - तशी सांस्कृतिक जबाबदारी संजय सोनवणी आणि प्रभूतींची आहे . Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51889657961416076142015-05-24T21:49:21.902-07:002015-05-24T21:49:21.902-07:00पुरंदरे यांचे वादग्रस्त इतिहासलेखन -
बाबासाहेब पु...पुरंदरे यांचे वादग्रस्त इतिहासलेखन -<br /><br />बाबासाहेब पुरंदरे यानी 'राजा शिवछत्रपती' ही भली मोठी कादंबरी लिहून महाराष्ट्रातील मराठी वाचकांवर प्रभाव निर्माण केला आहे. पुरंदरे यांची भाषा ओघवती आणि अलंकारिक असल्याने अनेक लोक आवडीने ही कादंबरी वाचतात. असे सांगितले जाते कि या कादंबरीच्या पाच लाख प्रती खपल्या आहेत. पुरंदरे यांची ही कादंबरी इतर कोणत्याही मराठी पुस्तकापेक्षा खूपच लोकप्रिय ठरली आहे. परंतु एवढ्याने पुरंदरे यांच्या कादंबरीची योग्यता मोजणे बरोबर नाही. इतिहासलेखन करताना ते किती निष्पक्ष पद्धतीने, पुर्वग्रह मनातून काढून लिहिणे गरजेचे असते. आपल्या मनातील कल्पना, धारणा इतिहासाच्या माथ्यावर मारणे हा खूप मोठा अपराध आहे. इतिहास हा विषयच अनेकजणाना रटाळ आणि कंटाळवाना वाटत असलेल्या तो थोडा अलंकारिक भाषेत लिहिला तर लोक आवडीने वाचतात. परंतु याचा अर्थ असा नाही कि इतिहासातील मूळच्या प्रसंग, पात्रामध्ये सोयीस्कर बदल करावा. इतिहासातील काही गोष्टी आपणाला अप्रिय असल्या, गैरसोयीच्या असल्या तरी त्या टाळता कामा नये. किंवा त्याचे स्वरुप बदलून सोयीस्कर इतिहास लिहिता कामा नये. हे सर्व संकेत इतिहास अभ्यासकाने पाळावे अशी अपेक्षा असते. परंतु पुरंदरे यांच्या शिवचरित्राकडे पाहिले तर असे दिसते कि पुरंदरे यानी सोयीस्कर इतिहास लिहिला आहे. ब्राह्मणी चष्म्यातून लिहिलेला इतिहास, शिवरायांच्या मुस्लिम सहकार्यांची उपेक्षा, काल्पनिक कथा-प्रसंग-पात्रे याना अग्रक्रम अशा पद्धतीच्या अनेक चुका पुरंदरे यांच्या इतिहासलेखनात आढळतात. त्यामुळे पुरंदरे यानी सदोष शिवचरित्र लिहिले याबद्दल शंका नाही.Anonymoushttps://www.blogger.com/profile/08030545466088043724noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-29045072830496730462015-05-24T07:18:12.938-07:002015-05-24T07:18:12.938-07:00अरे भारतीया
अष्टप्रधान मंडळातील हे काही इतके अराज...अरे भारतीया <br />अष्टप्रधान मंडळातील हे काही इतके अराजक होते असं जार तूझे म्हणणे असेल तर शिवराय तेव्हाच नसते का बोलते झाले, दुरदृष्टिच्या त्या महाराजांची माणसांची पारख निवड चुकली म्हणता????? shaunakhttps://www.blogger.com/profile/03167649649836284165noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-87470064125358520492015-05-20T05:08:42.080-07:002015-05-20T05:08:42.080-07:00खेडेकर साहेबांवर स्त्रियांच्या विनयभंगाचे आरोप आहे...खेडेकर साहेबांवर स्त्रियांच्या विनयभंगाचे आरोप आहे ते खरे आहेत का ?<br />कोकणात मराठा नाही तर फक्त भंडारी समाजाची सत्ता चालते. मराठ्यांना पण कोकणात आमच्या भंडारी समजामुळे यश मिळाले. <br />स्वराज्य हि काय कुण्ब्यांची जहागीरदारी नाही. आमचा पण वाटा आहे त्या मध्ये. Aniket Patil Pakka Bhandarihttps://www.blogger.com/profile/12284127007089478497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-10369532287325993912015-05-19T02:18:52.601-07:002015-05-19T02:18:52.601-07:00अप्रतिम विवेचन सोनवणी सर..
मी आपल्या "ब्राम...अप्रतिम विवेचन सोनवणी सर.. <br /><br />मी आपल्या "ब्राम्हण का झोडपले जातात!" या पुस्तका पासून आपल्याला वाचायला सुरवात केलेली आहे. तेंव्हाही आपली विचारधारा व हेतू पटत होते. आजही तेच अश्या लेखनातून पुन्हा पटत आहे. सत्य या गोष्टीशी प्रामाणिक रहाण्यासाठी जे धाडस लागतं,ते आपल्यापाशी भरपूर आहे. त्या धाडसाला आधी पहिला सलाम , आणि नंतर या अश्या सगळ्याच लेखनाला आणखि एक!Parag charal Divekarhttps://www.blogger.com/profile/14782916544353923233noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-26931790082769943322015-05-15T06:00:42.112-07:002015-05-15T06:00:42.112-07:00आप्पा - होणार होणार असे सांगणारे अनेक पण संजयाने ...आप्पा - होणार होणार असे सांगणारे अनेक पण संजयाने त्याने पुढे काय होईल ते आत्ताच सांगून ठेवले आहे , राजा शिव छत्रपति यांच्या बद्दल लेखन कमी होत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे ती अगदी १००% खरी आहे कारण कुणीही माणूस असला ससेमिरा मागे लाऊन घेण्यास तयारच होणार नाही - विकतचे श्राद्ध कुणी सांगितलय ?<br />बाप्पा - पण त्याच वेळेस पावासाल्याताल्या उगवणाऱ्या छत्र्या प्रमाणे शिवाजीवर पीएचडी करणारे असंख्य असतील कारण शेवटी अशी अवस्था येईल की महासंघ किंवा ब्रिगेड यांच्याकडून मंजुरी आली की मिळाली पीएचडी !<br />आप्पा - सचिन चौधरी किंवा असे अनेक जन फारच भ्रमात आहेत की शिवरायांवर ब्राह्मणांनी अनन्वित अत्याचार केला आहे आणि त्याना जणू मदतीची गरज आहे , आणि आपण पुढे सरसावून उभे राहून ब्राह्मणांच्या विळख्यातून छत्रपतीना सोडवले पाहिजे हि अफूची गोळी याना खायला लावणारे जे मराठा समाजाचे राजकारण करणारे आहेत त्यांची भूमिका तपासून जर पाहिली तर बरेचसे चित्र स्पष्ट होईल ,त्यातला महत्वाचा मुद्दा आरक्शानाचाच घ्या ! सर्व जगाला माहित आहे कि मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही तरीही ते तुणतुणे वाजवत ठेवून त्यावर जीवन जगायची यांची हौस दांडगी आहे <br />बाप्पा - एका ब्राह्मणाने छत्रपती या विषयावर खिळवून ठेवणारे लेखन आणि भाषण करून लाखो लोकाना मंत्रमुग्ध केले , मराठा समाजात असा एकही शिलेदार नाही हे कसे ?साधे शुद्ध मराठी जमत नाही अशी यांची स्थिती !<br />आप्पा - सचिन चौधरी शिवरायांबद्दल सर्व मराठी समाजाला अत्यंत प्रेम आणि अभिमान आहे . पण संजय सोनावणी यांनी खरोखर अभ्यास करून उत्तरे दिली आहेत या बद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे . तुम्हाला पवार घराण्याचे राजकारण समजत नाही हे दुर्दैव आहे !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79237940118853280562015-05-14T10:48:54.783-07:002015-05-14T10:48:54.783-07:00appropriate question by sachin chaudhri and excell...appropriate question by sachin chaudhri and excellent answer by sonawani sir!!ruturajpatilhttps://www.blogger.com/profile/12959034932246796085noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-88813941731364594312015-05-12T00:34:43.304-07:002015-05-12T00:34:43.304-07:00५) गोतियेने शिवमंदिर बांधायला काढले त्याला विरोध क...५) गोतियेने शिवमंदिर बांधायला काढले त्याला विरोध करणारा मी एकमेव होतो. खालील लिंकवरील तिन्ही लेख आवर्जुन वाचा.<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post.html<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post_26.html<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2013/06/blog-post_3.html<br /><br />यावेळेस माझ्या पाठीशी कोणी का आले नाही? मी कलमनामात जे आरोप केले ते खरे नाहीत हे तुम्ही कसे सिद्ध कराल? ही सरळ सरळ दुटप्पी भुमिका नव्हे काय? जर मंदिर हवे तर तशी भुमिकाही सेवा संघाने अथवा ब्रिगेडने घेतली असती तरी चालले असते, चर्चा झाली असती. पण तसे झालेले नाही हे वास्तव काय सांगते?<br /><br />खाली आपल्याच प्रश्नासारख्या एका मित्राने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर:<br /><br />"बच्छावजी, तुमच्यासारखा सुज्ञ बुद्धीवादीही शब्दच्छल करतो तेंव्हा नवल वाटते. ’ हे सर्व वा त्यापैकी काहीजन.." यातील अर्थ समजला नसावा. मी आधीच सांगितले कि मी पुस्तक आताआता पर्यंत वाचलेले नव्हते. पण एवढे आरोप होत आहेत तर आरोपकर्त्यांचे खरे असले पाहिजे हा विश्वास. पण त्याहीपेक्षा त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. अर्धी-मुर्धी विधने उचलुन सोयिस्कर मांडणी करायची हे ब्रिगेडींना नवीन नाही हे आजही सिद्ध होते. २०१० च्या लेखात मीही दादोजींना नोकर म्हटले होते. २०१२ च्या लेखात नोकरही नव्हते हे सिद्ध केले. २०१५ च्या लेखात दादोजीबद्दलचे माझे स्वतंत्र मत नोंदवले आहे. जेम्स लेनशी मी पत्रव्यवहारही केला होता हे मी नमुद केले आहे. मेहंदळेंना बहुदा दादोजीबाबत उत्तर देणारा महाराष्ट्रात मी एकमेव होतो. गोतियेने शिवमंदिर बांधायचा घाट घातला त्यालाही मी इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतुन विरोध करणारा एकमेवच होतो. याचा मला गर्व नाही. तुमच्याकडुन वा कोणाकडुनही कधी शाबासकीची काडीमात्रही अपेक्षा नाही व नव्हती. मी माझे कर्तव्य व तेही वेळीच बजावले. एवढे सारे असुन तुम्ही जे हेत्वारोप आणि सोफिस्टिकेटेडचे अर्थ काढत नथीतुन तीर मारायचा प्रयत्न करत आहात हे काही नवलाचे नाही. किंबहुना आंधळ्या झालेल्या लोकांना फक्त सोयीचे दिसते. खरे सांगायचे तर यामुळे शिवाजीमहाराजांवरचे लेखन या सर्व वृत्तीमुळे कमी होत जाईल याची खात्री बाळगा. कारण कोण कोणता शब्द अथवा वाक्य घेऊन महिलांच्या आड दडून वार करील याचा नेम राहिलेला नाही. पुरंदरेंवर टीका करतांना त्यांची विधनेही बदलायची हिंम्मत दाखवतात हे मला वाचल्यावर समजले. माझ्या नजरेतुन कोण उतरले असेल? सत्याचा लढा लढताय ना...तर किमान दुस-यांची विधाने तरी आहे तशी उद्घृत करा ना! पण ती पद्धत वापरायची नाही. कोण कशाला लिहिल? हेत्वारोप करुन घ्यायला? शिव्या-धमक्या खायला? माझीही या विषयाव्रील ही शेवटची प्रतिक्रिया. तेही जाधव सरांसारख्या मला आदरणीय असलेल्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली म्हणून. मी मराठा अथवा दलित असतो तर सारे गप्प बसले असते हेही विनोद अनाव्रत आणि मदन पाटील यांच्या पुस्तकावरेल आजवरील मौनातुन दिसते. चालु द्यात. शुभेच्छा. जाती सोडलेल्या माणसाला जातीत ढकलणारी ही दुष्ट माणसे....काय म्हणावे त्यांना? मला आता राग नाही. खिन्नता आहे फक्त. आभार."<br /><br />माझे विचार फक्त पुरावेच बदलु शकतात. मला बाकी कोणत्या जाती/धर्माशी घेणे-देणे नाही. मुळात शिवकाळ हा माझ्या अभ्यासाचाही विषय नाही, पण गरज पडली म्हणून करावा लागला तेवढाच. माझा विषय पुरातन संस्कृती हा आहे व त्यावर मी पुस्तके लिहिलेली आहेत. <br /><br />एक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हनून आपण शांतपणे विचार कराल यावर मी विश्वास ठेवतो. अविनाश दुधे यांनी प्रकाशित केलेला मराठा सेवा संघावरील दिवाळी विशेशांक आपण वाचला असेल अशी आशा आहे. त्यात माझाही मसेसंघावर लेख आहे. अवश्य वाचा.<br /><br />धन्यवाद,<br />आपला,<br />संजय सोनवणी<br /><br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-57428490439518453872015-05-12T00:34:24.808-07:002015-05-12T00:34:24.808-07:00३) २०१२. मेहंदळेंच्या मुलाखतीतील आक्षेपार्व विधाना...३) २०१२. मेहंदळेंच्या मुलाखतीतील आक्षेपार्व विधानांना विरोध करणारा लेख लिहिणारा मी एकमेव होतो. तोवर दादोजी शहाजीराजांचा चाकरही नव्हता हे स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. हे मी त्यात लिहिले. कौस्तुभ कस्तुरेचाही प्रतिवाद केला. नवीन पुरावे आले कि आधीचे मत बदलावे ही संशोधकीय शिस्त आहे. केवळ आरोपांची राळ उडवुन देणे आणि पुरावेही न बघणे यात शहाणपणा नाही.<br /><br />४) पुस्तक वाचल्यानंतर आणि आक्षेप पडताळल्यावर लेखकाच्या तोंडी स्वत:चे शब्द घुसवणे, वाक्ये हवी तशी तोडून हवा तो अर्थ काडणे, पुढचे मागचे संदर्भ न देता एखादेच विधान वेठीला धरणे एवढेच प्रकार झालेले आहेत हे दिसले. ते कोणावरही अन्याय करणारे आहे. ही काही चळवळ होऊ शकत नाही. हे जे मला वाटणे याला "विचार बदलले, किंवा पुरंदरे प्रेम वाढले" वगैरे ते अनेक हेत्वारोप माझ्यावर गेल्या काही दिवसांत झाले आहेत. आरोप सोपे असतात, पण आरोपांना विचारांची बैठक नको काय? कोणीही मला आरोपकर्त्यांनी जे पुरंदरेंचे शब्द बदलले यावर स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजे "आम्ही काय वाटेल ते आरोप करु, तुम्ही मधे पडायचे नाही अन्यथा तुम्ही भटाळले" असाच जर होरा असेल तर या देशात संशोधन/लेखन अशक्य होऊन जाईल. <br /><br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56939466642458335042015-05-12T00:26:07.354-07:002015-05-12T00:26:07.354-07:00प्रिय सचीनजी,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वा...प्रिय सचीनजी, <br /><br />मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वापरल्याबद्दल पुन्हा आभार. खरे म्हणजे आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ते अनेकांनी केलेत. त्यावर उत्तरेही दिली आहेत. तरीही तुमच्यासाठीही उत्तरे देतो: <br /><br />१) उपहास हा भाग आपल्याला समजत नाही अनेकदा. पुरंदरेबद्दल विकीवर जी माहिती दिलीय ती कोणी पुरंदरे भक्तानेच. आपण इतिहास संशोधक नाही तर केवळ शाहीर असा दावा पुरंदरेंनी अनेकदा केला आहे. आता ग. ह. खरेम्सारख्या इतिहासकाराच्या मार्गदर्शनाखाली भारत इतिहास संशोधन मंडळात काम केले असे जत्र येथे म्हटले जात असेल तर दावा खोटा कोणाचा ठरतो? मी उपहास केला आहे हे लक्षात सहज यायला हवे. "ही माहिती खरी असेल तर..." अशी माझी सुरुवात आहे. <br /><br />२) मला पुरंदरेंबद्दल आपुलकी असण्याचा संबंध नाही. त्यांन मी कधी प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. ना कधी फोनवरुनही बोलणे झाले. आयबीएन लोकमत व अन्य च्यनेल्सनी मलाही चर्चेला बोलावले होते. पण मी मुळ पुस्तक वाचलेलेच नसल्याने नकार दिला. आयबीएनवरील चर्चा झाल्यावर मला अनेक पत्रकारांनी फोन करुन माझ्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांनाही मी प्रतिक्रिया दिली नाही. पुस्तक मिळवले व वाचले व जे आक्षेप आहेत ते खरे आहेत कि नाही हे पडताळून पाहिले. आक्षेपांवरचे माझे मत तुम्ही वाचलेलेच असल्याने द्विरुक्ते करत नाही. <br /><br />३) दादोजी कोंडदेव, २०१०. हा लेख लिहिला त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. या लेखातील , "त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे".हे वाक्य वाचा. त्यावेळेस हे १३ अथवा यापैकी काही संशयित होते. पण नेमका कोण हे तेंव्हाही निश्चित झाले नाही अथवा २०१५ मद्धेही निश्चित झालेले नाही. माझे हेही विधान बरोबरच आहे. पण आजवर आम्ही नेमका दोषी शोधु शकलेलो नाही हा आमचाच दोष नव्हे काय? २०११ साली मी लेनशी पत्रव्यवहारही केला. त्याने "मी अनेकदा ही माहिती ऐकली." असे मोघम उत्तर देवुन त्याने कोणाचेही नांव घेतले नाही. मग आरोपी निश्चित होत नसतांना वारंवार तेच ते आरोप करणे सुज्ञपणात बसत नाही. <br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-36407904132105588042015-05-11T11:18:41.455-07:002015-05-11T11:18:41.455-07:00सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!
मी अमरावती वरून सचिन चौ...सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!<br />मी अमरावती वरून सचिन चौधरी.<br />सर्वप्रथम अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की मी मराठा सेवा संघ या संघटनेशी संलग्न आहे.<br />सध्या पुरंदरे प्रकरणा संबधी सुरू असलेल्या वादाबाबत आपण ६ मे रोजी "राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!" हा लेख लिहून पुरंदरे यांचेवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण एक वैचारिक लेखक असल्याने आपणास सर्व प्रकारचे लिखाण करण्याचा निश्चितच अधिकार आहे. या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत "असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल" असे गौरवास्पद उद्गार सुद्धा लिहीलेले आहे. पुरंदरे यांचेबाबत आपणास असलेल्या या आपुलकीबाबत माझ्यासकट कुणालाही आक्षेप असण्याचा अजिबात अधिकार नाही.<br /> परंतु आपल्या Sunday, October 10, 2010 च्या ब्लॉग मधील "दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव" या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण लिहिता की "आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे."<br /> आता मात्र तुमच्या या दोन भूमिकॉमधील तफावत मला खूप प्रयत्न करूनही समजवुन घेता आली नाही.<br /> आपल्या ६ मे च्या शेवटच्या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत एक सुंदर वाक्य लिहिलेले आहे, "पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे."<br />सर आपणास नम्रपणे विचारू इच्छितो की आपल्या १०-१०-२०१० च्या लेखा नंतर आज ६ मे च्या लेखाच्या कालावधी दरम्यान आपल्या विचारांत/निष्ठेत तर बदल नाही ना झाला? कारण बदलामुळेच भरभराट होते हा हल्ली आधुनिक डार्विनचा नवसिद्धांत आहे.<br />कृपया गैरसमज नसावा. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. सचिन चौधरी.<br />sachin chaudharihttps://www.blogger.com/profile/01682314187856028866noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-44425346626355004832015-05-11T01:40:24.487-07:002015-05-11T01:40:24.487-07:00aho jyachya sathi ha lekh lihilay tech mudde tumhi...aho jyachya sathi ha lekh lihilay tech mudde tumhi upasthit karun tumhi kashala swatahache hase karun gheyattanaji khothttps://www.blogger.com/profile/09768449361604385023noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-55957274896160199782015-05-10T03:16:31.558-07:002015-05-10T03:16:31.558-07:00आपले विचार उत्कृष्ट आहेत. आपण नक्कीच एकविसाव्या शत...आपले विचार उत्कृष्ट आहेत. आपण नक्कीच एकविसाव्या शतकातील आहात व बाविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहात. काही लोक (विशेषतः राजकीय) आपल्या स्वार्थासाठी समाजाला मागच्या दिशेने रेटत आहेत. नकारात्मक विचार अल्पजीवी असतो. एखादा विचार अथवा चळवळ दीर्घ काल टिकायची असल्यास तिला सकारात्मक विचाराचे भक्कम पाठबळ लागते. आजच्या घडीला कार्यरत असलेल्या कोणत्याही संघटनेचे उदाहरण घेता येईल.Nitin Dhavalikarhttps://www.blogger.com/profile/09962940180495436763noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-25817172516342617652015-05-09T05:08:40.666-07:002015-05-09T05:08:40.666-07:00राजा शिव छत्रपती हे दोन भागात आलेले चरित्रवजा , ...राजा शिव छत्रपती हे दोन भागात आलेले चरित्रवजा , लिखाण आमच्या समोर गेली <br />अनेक वर्षे आहे , सन्माननीय ब मो पुरंधरे यांच्या पूर्वी अनेकांनी चरित्रवजा लिखाण केले आहे पण ओघवती भाषा आणि सुरेख चित्रांची जोड ,प्रसंग प्रभावीपणे जिवंत करून दाखवण्याची त्यांच्या लेखणी आणि वक्तृत्वाची ताकद अफाट आहे <br />त्यातून त्याना काय साधायचे होते आणि ते साधले का ? हा प्रश्न आज पुढे येतो !<br />पुरंधरे यांनी जेंव्हा सुरवात केली त्यावेळेस , इतक्या वर्षांनी असा भडका होईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल , पण जसजसे ,<br />मराठा मराठेतर राजकारण फुलत गेले आणि त्याची खरी झळ मराठेतर शेतमजूर आणि ओबीसी याना बसू लागली . रोजगार हमी योजने सारख्या योजना राबवून खालच्या वर्गातील <br />ग्रामीण अर्थ व्यवस्था स्थिर स्थावर होतानाच सहकारी कारखाने आणि श्रीमंत शेतकरी याना शेत मजुरांचा प्रश्न सतावू लागला , तेंव्हा त्या शोषितांच्या परिस्थितीला ब्राह्मण द्वेषाची झालर लावून काही वर्षे तगून नेली गेली पण नंतर खरा लढा हा मराठा आणि मराठेतर असाच आहे हे उमगल्यावर , राजकारण , ब्राह्मण द्वेष आणि मराठा असे होत गेले तसतसे , <br />मराठा समाजाला शिवाजी या राष्ट्र्नायकावर आपला हक्क दाखवणे गरजेचे वाटू लागले !आणि जणू हे थोर व्यक्तिमत्व त्यांची खाजगी जहागीर झाली !<br />कारण आजवर ब्राह्मण , कायस्थ , सीकेपी यांनी सरसकट शिवाजीला आपला मानत त्याचे गोडवे गायले होते त्यातून सुरु झाले विद्वेषाचे राजकारण ! <br /> फुले माळी समाजाचे , आंबेडकर पद दलितांचे , शाहू मराठा समाजाचे असे वर्गीकरण होत गेले आणि त्या विचाराने सर्वांचेच अवमुल्यन होत गेले <br />तीच गोष्ट स्वामी समर्थ आणि गजानन महाराज आणि साई बाबा यांची झाली आहे <br />कोणतीही अनधिकृत पावभाजी वडापाव किंवा छोटी टपरी हि या साधुसंतांच्या नावाने चालवली जाते , त्यांचा प्रकट दिन किंवा निर्वाण दिन भर रस्त्यात साजरे केले जाते , त्याला सार्वजनिक रूप देत एक सामाजिक कार्य केल्याचा दावा मांडत अनधिकृत कामे अधिकृत म्हणून रेटली जातात <br />हे सगळे ओंगळ आहे - भयानक आहे आणि गलिच्छ आहे !<br />तसे पाहिले तर पूर्वी हा असा विखारी विचार नसायचा , पण आज प्रत्येकाचे व्यापारीकरण झाले आहे , <br />शिवाजी प्रमाणेच , दुसरे दैवत पंढरपूरचा पांडुरंग , ह भ प बाबामहाराज सातारकर आणि अनेक कीर्तनकार या ना त्या रुपात अभंग कीर्तने या रूपाने आपली प्रवचने लोकांसमोर ठेवत आहेत , त्यांचा उद्देश काय असेल ? त्यात निखळ शुद्ध भक्तिभाव थोडाच असणार आहे ?<br />प्रत्येक पूल रस्ते आणि बागा , तलाव यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे नाव देण्याची जी एक फ्याशन सुरु झाली त्यामुळे अनेकवेळा विनोद आणि फजितीची वेळही आलेली दिसते <br />सरसकट प्रत्येक विद्यापीठ आणि शाळा यांना थोर प्रभूतींचे नाव दिलेच पाहिजे का ?हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे ! <br />खरा विकास म्हणजे काय ? खरी सार्वजनिक स्वच्छता म्हणजे काय खरे प्रबोधन म्हणजे काय ? हे बाजूलाच ठेवत कुणाला तरी कशाबद्दल तरी अस्वस्थ करत राहणे , आणि आजच्या त्या वर्गाच्या अपयशाला दुसराच वर्ग जबाबदार आहे असे तिसऱ्या वर्गाने म्हणत सभा जिंकणे हे सूत्र समाज विघातानाचे काम मात्र अस्सलपणे करत आहे , आता समाज एक होण्याची शक्यता दिवसे दिवस कमी होते आहे , हे सर्वात आधी ओळखले ते ब्राह्मण वर्गाने !त्यांनी त्यांची व्युह्राचानाच बदलली - या देशात काहीही चांगले करण्याची किंवा होण्याची शक्यता दुरावत गेल्याने त्यांनी परदेशागमन व्यवहार्य मानले , त्यात काय चुकले आज हाच ब्राह्मण वर्ग मानाने परदेशात त्यांच्या योजना सफल होण्यासाठी जिवाचे रान करत असताना दिसतो - हे कसे ?<br />फालतू देवधर्म आणि अवडंबर यात गुंतून न राहता , हा समाज कितीतरी प्रगत झाला आहे !<br />आजचे आपले पदाधिकारी कोण आहेत ? रस्ते , पाणी , त्यांची अवस्था , मुंबई शहराची परिस्थिती आणि शिवसेनेने केलेली लूट , तसेच काँग्रेस चा भ्रष्टाचार , त्यांच्या पावलावर पाउल टाकत आज बीजेपी जात आहे - सर्व एका माळेचे मणी आहेत , राजकारणातून समाज कारण कधीही साधत नाही ,प्रबोधन तर नाहीच नाही <br />आपल्याकडे मुलाना खेळायला मैदाने नाहीत , एक मूळ एक कुटुंब , त्यामुळे नाती आटत चालली आहेत , मित्र नक्की नेमके चांगले भेटतील याची खात्री नाही , शाळेत शिक्षक आरक्षित त्यामुळे त्यांचे उच्चार दर्जाहीन , प्रत्येक वळणावर दर्जाशी तडजोड करत , हा भ्रष्ट समाज काय साधत आहे ?आणि अशा वेळी परत परत लोकांची जुने सांगाडे उकरून करमणूक होत असेल तर त्या समाजाला परमेश्वरही वाचवू शकणार नाही !<br />शिवजयंती ला मिरवणूक काढून आपली रग जिरवणे , नवरात्र आणि गणपती या दिवशी आचरट अंग विक्षेप करत नाचणे म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणे असा अर्थ होतो का ?<br />जितेंद्र आव्हाड हा तर अत्यंत हिणकस प्रवृत्तींचा इसम आहे . त्याच्या बद्दल काही बोलणे म्हणजे त्याची दाखल घेतल्या सारखे होईल , तितकी त्याची लायकीही नाही !<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.com