tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post721026377890147118..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): वेद आणि वेदाज्ञाSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16774775451277396732015-10-30T01:07:54.771-07:002015-10-30T01:07:54.771-07:00भगवद्गीतेतही तीन वेदांचाच उल्लेख आहे. गीतेने वेदां...भगवद्गीतेतही तीन वेदांचाच उल्लेख आहे. गीतेने वेदांना ईश्वरीय ज्ञानाच्या दृष्टीने डबक्याची उपमा दिलेली आहे. मुन्डकोपनिषदानेही तरून जाण्याच्या दृष्टीने यज्ञयागांना फुटक्या नावा असे म्हटले आहे. वेद हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे फक्त संवरण म्हणून उपयोगात आणले आहेत.आ. ह.साळुंखे यांनी या बाबत चांगलेच विश्लेषण केलेले आहे. वेदाच्या वजनाचा त्यांच्या दुर्बोधतेच्या सहाय्याने हितसंबंधियांनी चांगलाच उपयोग करून घेतलेला दिसतो."नास्तिको वेद्निन्दक:'' ही उक्ती प्रसिद्धच आहे. ईश्वराचे अस्तित्व एकवेळ नाही मानले तरी चालेल, पण आस्तिक ठरण्यासाठी वेद मानलेच पाहिजेत. म्हणूनच तर स्मृती वेदांच्याच भाग बनतात.आणि स्मृतीवचने वेदांच्या नावावर खपविले जाऊ शकतात.HARIHAR SARANGhttps://www.blogger.com/profile/09015523785999162431noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-60670410870561909542015-10-29T10:45:17.457-07:002015-10-29T10:45:17.457-07:00वैदिक धर्मात काय आहे , त्याचा आणि संजय सोनावणी यां...वैदिक धर्मात काय आहे , त्याचा आणि संजय सोनावणी यांचा काही संबंध आहे का ? कारण त्यांचा धर्म वैदिक आहे का ? ते स्वतःच म्हणतात की काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे होत होत ऋग्वेद आणि वैदिक धर्माची रचना झाली , अनेक गोष्टींची ग्जागा दुसऱ्या गोष्टीनी घेतली , धर्म वेगळा आणि चालीरीती वेगळ्या , <br />सरांनी या लेख मालिकेची सुरवात सुंदर केली , पण नंतर तेच तेच सुरु झाले . नाविन्य काही नाहीच . सर्व धर्मच असेच आहेत , संस्कृती आणि धर्म एक नाही हे मान्य आहे ना ? वैदिक विचार आणि लिखाण यातही फरक असणारच . संघ म्हणजे वैदिक्ता नाही किंवा वैदिकतेच्या रक्षणाची जबाबदारी संघाची नाही , परंतु याबाबत कुशलतेने सतत आर्य वैदिक आणि ब्राह्मणवर्ग असा घोळ घालत बहुजानाना एका विशिष्ठ विचारांचे बाळकडू पाजायची जबाबदारी संजय सारणी उचलली असावी , किंवा त्याना सर्व गोष्टींचा उबग आला असावा . इतिहासकार हा सर्व समावेशक असतो , तसे त्यांच्या कडे काहीच दिसत नाही , त्यापेक्षा संभाजी ब्रीगेद्वाले बरे ! Anonymoushttps://www.blogger.com/profile/08184712321174036908noreply@blogger.com