tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post743252785153100611..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): इतिहास-मागासSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger57125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45968874045714367332014-09-10T12:35:42.373-07:002014-09-10T12:35:42.373-07:00Hi nice articleHi nice articleAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68099286836625570232014-09-07T09:38:32.068-07:002014-09-07T09:38:32.068-07:00हे सार्वजनिक गणेश उत्सवाला आलेले महाभयानक रूप पाहू...हे सार्वजनिक गणेश उत्सवाला आलेले महाभयानक रूप पाहून बाळ गंगाधर टिळकाने तर ताबडतोब आत्महत्या केली असती!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-41457223904852066882014-09-07T09:06:25.793-07:002014-09-07T09:06:25.793-07:00चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-
कपट काही एक | ने...चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-<br /><br />कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१|| <br />तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||<br />दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३|| <br />नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||<br />नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||<br />नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||<br />नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||<br />नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||<br />नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||<br />नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||<br />नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||<br />आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||<br />नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७) <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39648389640888528482014-09-07T08:56:37.721-07:002014-09-07T08:56:37.721-07:00कोणाचेही आणि कसलेही चमत्कार हे अमान्य करण्याच्या ल...कोणाचेही आणि कसलेही चमत्कार हे अमान्य करण्याच्या लायकीचेच असतात. मग ते ज्ञानेश्वर असोत, की तुकाराम असोत, की रामदास असोत, की साईबाबा असोत, कोणीही विवेकनिष्ठ माणूस कदापि चमत्काराला मान्यता देणार नाही!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67090859559038662742014-09-07T01:28:31.293-07:002014-09-07T01:28:31.293-07:00संत तुकारामांचा चमत्कारांवर विश्वास नव्हता असे आप...संत तुकारामांचा चमत्कारांवर विश्वास नव्हता असे आपण म्हणता <br />संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली असे आपण मानता का ? त्यांनी रेड्याच्या मुखारून वेद म्हणवले हे खरे आहे का ? संत तुकाराम यांचे याबाबत मत काय होते ?<br />संत तुकाराम हे निष्ठुर विवेकवादी होते असे आपले मानणे आहे का ?त्यांच्या आयुष्यात सगळीकडे शिवाजी दिसू लागले हि सांगितली जाणारी कथा खरी आहे का ?<br />शिवाजीकडे त्यांचे जाणेयेणे होते का ?किंवा शिवाजी त्यांच्याकडे जातयेत होता का ?<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-46676817520268227672014-09-06T11:06:46.898-07:002014-09-06T11:06:46.898-07:00खरेतर सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने आज आपण जे बघ...खरेतर सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने आज आपण जे बघतो ते विचित्र आहे <br />संत तुकाराम जर चार्वाका प्रमाणे इतके स्पष्ट होते तर त्यांच्या इतर भावूक अभंगांचा गवगवा का झाला , वारकरी पांडुरंग भक्तीत का अडकले हे कुणी सांगेल का ?<br />वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे म्हणणाऱ्या संताना नेमके काय सांगायचे होते ?<br />आजचा वारकरी संप्रदाय हा एक सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय ताकद बनत आहे हे योग्य आहे का ?असे अनेक विचार मनात येतात <br />मुळात मुसलमानी आक्रमणाची वावटळ घोंघावत असताना निवृत्तीचे तत्वज्ञान कसे रुजते ?<br />पांडुरंग आणि त्याची निखळ भक्ती आणि मानसपूजा यात विचारांपेक्षा भावनांचेच<br /> प्राबल्य दिसते का ? परमेश्वराची आळवणी हे भक्तीचे तंत्र , किती भ्रष्ट कल्पना वाढीस लावत असेल त्याचा विचार कधी झाला आहे का ? सर्व भार जर पांडुरंगावर टाकून भजन कीर्तनात दंग होण्यात पुरुषार्थ असेल तर या सर्व " खेळ मंदियाला वाळवंटी काठी "या उक्तीचा अर्थ काय लावायचा ?<br />आपण समर्थनार्थ संत तुकाराम यांना असे म्हणायचे नव्हते , तसे सांगायचे नव्हते असे म्हणत असतो - पण माझ्यामते अभंग रचना हि तत्व चिंतनातून किती आणि भावनेपोटी किती झाली याचाही अभ्यास झाला पाहिजे - हे मी संत तुकाराम आणि इतर संतांविषयी असलेल्या आदरापोटीच म्हणत आहे - कारण <br />अनेक वेळेस त्यांच्या रचना अगदी प्रासंगिक वाटतात <br />आता हेच बघाना - "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा - " असे संत ठाम पणे म्हणतात याचा अर्थच ते वेद मानतात असा घ्यायचा का ? ते तर शक्य नाही , मग वेद प्रामाण्य या गोष्टीविषयी त्यांचे विचार क्रांतिकारक होते हेपण आपण बघतो , अशा वेळी वैचारिक गोंधळ वाढत जातो हे मात्र खरे !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61251631707158699992014-09-06T10:55:50.049-07:002014-09-06T10:55:50.049-07:00जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोच...जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥<br />तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥<br />मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥<br />ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥<br />दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥<br />तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥ ६॥ ३४७<br /><br />तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।। ११४.१<br /><br />देवाची पूजा हे भूताचे पाळण ।। ३८५४.१<br /><br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-5233545038928886322014-09-06T10:35:43.326-07:002014-09-06T10:35:43.326-07:00धन्यवाद, मित्रा.धन्यवाद, मित्रा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54504717673058028682014-09-06T10:32:44.374-07:002014-09-06T10:32:44.374-07:00"वर्शिपिंग फाल्स गोड्स " ले.अरुण शौरी
प..."वर्शिपिंग फाल्स गोड्स " ले.अरुण शौरी <br />पुस्तक कसे नसावे! याचे हे पुस्तक अत्यंत योग्य उदाहरण आहे. त्याच्यात फक्त ब्राह्मणी आक्रोश आहे. सूर्यावर थुंकणाराची जी अवस्था होते तशी अवस्था अरुण शौरीची झाली आहे, थुंकी थुंकणाऱ्याच्याच तोंडावर / चेहऱ्यावर पडते. शौरीला पुस्तक रूपाने अनेकांनी प्रत्युत्तर दिलेली आहेत, ते एकदा वाचा! शौरीची भूमिका ही तटस्थ न्यायाधीशाची नसून खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणाऱ्या वकिलाची आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45922819220679386752014-09-06T10:18:25.441-07:002014-09-06T10:18:25.441-07:00अनानिमास सर , ९.३४ ए एम -
आपण या विचारांबाबत अधिक...अनानिमास सर , ९.३४ ए एम -<br />आपण या विचारांबाबत अधिक दुजोरा देण्यासाठी आधी जसे तुकारामांचे अभंग संगतवार दिले आहेत तसे या विचारांशी जुळणारे अभंग आपण दिले तर आनंद वाटेल. आपण अतिशय महत्वाचा विचार गुंफला आहे ,आणि मला तरी अतिशय उत्सुकता लागून राहिली आहे कि चार्वाकाप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यानी पण कधी जर विचार केला असेल तर तो त्यांच्या अभंगातून तो नक्कीच प्रकटला असणारच ! <br />कृपया आपण त्याचा संदर्भ दिलात तर फार बरे होईल <br />आधुनिक तत्त्ववेत्ते बर्त्रोंड रसेल यांचे विचार आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विचारही जुळत असतील - आपण तसा काही दाखला दिला तर फारच महत्वाचे ठरेल <br />तसेच तुकाराम महाराज यांनी कधी कलाक्रीडा याबाबत आपली मते मांडलेली दिसत नाहीत , आपण याबाबत काही मार्गदर्शन कराल का ?<br />आपण अतिशय मोलाचे भाष्य केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन !<br /> Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-15090208420830179222014-09-06T10:15:28.613-07:002014-09-06T10:15:28.613-07:00आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।...आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।। ४२२६.१Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53159470488408764172014-09-06T09:34:04.202-07:002014-09-06T09:34:04.202-07:00तुकारामांच्या नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू.........
...तुकारामांच्या नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू.........<br /><br />तुकारामांनी आपल्या एका वचनात नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू गाठल्याचे आढळते.त्यांचे ईश्वराविषयक चिंतन किती विधायक होते, याचा निर्णायक पुरावा म्हणून या वचनाकडे पाहता येईल. देव आहे असे वाणीने वदवावे, पण मनामध्ये मात्र देव नाही असा अनुभव घ्यावा, या अर्थाने त्यांचे हे वचन भल्या भल्या भाष्यकारांना आव्हानही देईल आणि झुकांड्याही देईल, असे आहे. तुकाराम चार्वाकांसारखे आणि त्यांच्या इतके निरीश्वरवादी होते, असे या वचनाच्या आधारे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही त्यांच्या ईश्वर विषयक चिंतनात जात परंपरागत विचारांपेक्षा फार फार वेगळी आहे, एवढे मात्र नक्कीच म्हणणे भाग आहे.<br /><br />सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अशा ईश्वराचे अस्तित्व आवश्यक असले, तरी जो स्वतःच्या परिपक्व विवेकाच्या आधारे झुंजू शकतो, त्याला आपल्या या विवेकाखेरीज वेगळा असा कोणी ईश्वर प्रत्यक्षात अस्तिवात नसतो, हे स्वतःच्या मनात अनुभवता येते. पितळेच्या वा पाषाणाच्या मूर्तीत ईश्वर नाही, असे ते सांगतात, याचा अर्थही ते ईश्वराच्या स्वरूपाकडे फार वेगळ्या दृष्ठीने पाहतात, हाच आहे. देव नाही असा अनुभव मनात घ्यावा, या वचनाच्या उच्चाराद्वारे तुकारामांनी सत्याविषयीचे चिंतन तर अत्युच्च स्तरावर नेलेच, पण ते सत्य मांडताना उच्च कोटीचे धैर्यही प्रकट केले, असेच म्हटले पाहिजे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-75942661532704084112014-09-06T09:26:21.031-07:002014-09-06T09:26:21.031-07:00इतिहास मागास या चर्चेत अनेकांनी भाग घेत आपली मते म...इतिहास मागास या चर्चेत अनेकांनी भाग घेत आपली मते मांडली आहेत - त्यात संत तुकाराम यांच्या निमित्ताने ब्राह्मण वर्गावर हल्ला करायचा एक कार्यक्रम राबवला जात आहे असे दिसते , त्यासाठी निमित्त काहीही चालते अशी स्थिती आहे पुरोहित आणि ब्राह्मण अशी गफलत होत आहे हेपण समजून घेतले पाहिजे <br />शेवटच्या २ प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत <br />पुरोहित वर्गाला आजच्या काळात कोण आधार देत आहे ? हे अभ्यासले पाहिजे , कारण याच पुरोहित वर्गाने संत तुकारामांचा बळी घेतला , संत ज्ञानेश्वर आणि भावंडाना जगणे मुश्किल केले ,त्या पुरोहित वर्गाला सार्वजनिक गणपतीत फारच बरकतीचे दिवस येतात याचे रहस्य काय आहे ? शेवटून दुसऱ्या दिवशी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा हि आवश्यक आहे का ?श्रावणात रिक्षावाले पूजा करतात ती काय दर्शवते ? <br /><br />अथर्वशीर्ष म्हटल्याने काय होते ?त्याचे मराठीत भाषांतर पाहिले तर अगदीच हास्यास्पद आहे आणि अथर्वशीर्ष जर वेदाना प्रमाण मानत असेल तर त्याची सार्वजनिक वाचनाची हौस का लोकप्रिय होत आहे ? खरेतर त्याचा निषेध झाला पाहिजे , पण नवरात्र आणि गणपती या उत्सवांच्या ईवेन्ट म्यानेजमेंट मधून या कल्पना वेगाने फोफावत गेल्या आणि पुरोहित वर्गाचे फावत गेले <br /><br />याचे उत्तर मला असे सुचते ते असे - लोकाना सुटसुटीत संस्कृत वाचनाची पाठांतराची अजूनही हौस आहे , जसे मुसलमान समाजात आज अरेबिक भाषेतून अल्लाची प्रार्थना करण्याची ओढ आहे तसेच तथाकथित हिंदू धर्मात आज संस्कृत पठणाची लोकप्रियता वाढते आहे <br /><br />मी ब्राह्मण हा शब्द मुद्दाम टाळत आहे कारण त्यामुळे अधिकच गैरसमज वाढतात , या सणांचे ओझे झालेला ब्राह्मण वर्गच माझ्या पहाण्यात जास्त आहे त्यांना सुखाची व्याख्या ठरवताना धर्म बुडाला का तरला याची फिकीर नसते हे सत्य आहे - याच ब्राह्मणांनी इंग्रज येताक्षणी त्यांची भाषा आणि बोलणे आत्मसात केले होते हे इथे विसरता कामा नये - मग या व्यतिरिक्त असा कोणता वर्ग आहे जो या सार्वजनिक उत्सवात पुरोहित वर्गाचे महत्व वाढवत नेत असतो ? त्याचे उत्तर आहे - या उत्सवाचे मुख्य जे जास्त करून बहुजन असतात तेच या गोष्टीना जबाबदार ठरतात -<br />खरेतर हा सार्वजनिक उत्सवाच नाही !<br /> प्रत्यक्ष कार्य असे फार कमी झाले आहे आणि मिरवणे हा भाग जास्त होत गेला आहे , मोठमोठ्या कंपन्यांकडून या उत्सवाना लोकाश्रय म्हणण्यापेक्षा रेडीमेड पैशाचा पुरवठा होतो त्यामुळे सर्व सार्वजनिक जीवनातील उत्स्फूर्तता घटत जाउन सर्व गोष्टी पैशामुळे आयोजता येतात असे गणित तयार होत गेल्याने - संस्कृत पठण , होमहवन ,बाल वर्गाचे आणि स्त्रियांचे अथर्वशीर्ष पठण असे कार्यक्रम तयार झाले , नवस हि कल्पना खरेतर अंधश्रद्धा मानली पाहिजे पण त्याला अफाट जनाधार लाभत गेला , यातून परिणाम काय साधतो ?<br />पूर्वीच्या कोणाही नेत्याला वा सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या व्यक्तीला आजचा गणेशोत्सव मान्य होईल का ? म फुले , लो टिळक याना आज काय वाटले असते ?<br /> Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82693189385459940382014-09-06T00:32:45.316-07:002014-09-06T00:32:45.316-07:00हा विचार फारच विचार करायला लावणारा आहे
जसा प्रत्य...हा विचार फारच विचार करायला लावणारा आहे <br />जसा प्रत्येक मराठा हा आज काही रोज तलवार ढाल घेऊन बाहेर पडत नाही किंवा हिंसा हा काही आज जीवनाचा स्थायीभाव असू शकत नाही म्हणजेच मराठा वर्गाचे क्षत्रियत्व काळा प्रमाणे नवीन अर्थ घेत तगले आहे - काय आहे तो अर्थ ? <br />जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे आक्रमक होत त्या समजुतींचा बुरखा फाडून सत्य समाजासमोर आणले पाहिजे - हा तो क्षात्रधर्म आहे - आज हजारो बहुजन समाज सार्वजनिक दगडूशेठ गणपती आणि लालबाग चा गणपती इथे होमहवन करण्यात पुढे दिसतो , हजारोनी नारळाची तोरणे बांधली जातात सहस्त्रावर्तने करण्यात बहुजन समाज स्वतःला धन्य मानतो - तसे नसेल तर आज इतक्या पहाटे हजारोनी स्त्रिया श्रद्धेने मंडपात जमणे शक्य नाही - त्या सर्वच नक्कीच ब्राह्मण नसतात !<br /><br />मुख्य विचार हा मांडायचा आहे की हजारो वर्षे पुरोहित वर्गाकडून जी समाजाची पिळवणूक होत आहे ती थांबली पाहिजे - पण तसे न घडता , या पाठनाना सार्वजनिक स्वरूप देण्यात एक विशिष्ठ वर्ग यशस्वी होत आहे ,पुणे फेस्टिव्हल किंवा अनेक नावाने आज परत परत कालबाह्य म्हणून एकीकडे हिणवली गेलेली मूल्येच डोक्यावर उचलून धरली जात आहेत - नवस बोलले जात आहेत -याला कोण आधार देत आहेत ? ब्राह्मण ? नक्कीच नाही !<br />मग कोण ? <br />सार्वजनिक मंडळांचे सूत्रधार ! त्यांचे संस्कार वर्ग घेतले पाहिजेत - आपल्याला सार्वजनिक जीवनात पुरोहीतवर्ग जर मागच्या दाराने प्रवेश मिळवू बघत असेल तर ते थांबवले पाहिजे !<br />स्त्रियांचा यात फार मोठा हात असला पाहिजे !धार्मिक रुढींचे पालन किंवा उच्चाटण करण्यात खरेतर स्त्रियांचीच भूमिका निर्णायक असते , पण यातले काहीच घडत नाही - <br />सर्व साधारणपणे हिंदू धर्मात सर्व पूजा अर्चा ही कौटुंबिक पातळीवर असते , देव हि कल्पना आपल्याकडे कुटुंब पातळीवर रुजते फुलते आणि बहरते , म्हणूनच आपले सर्व सन हे कौटुंबिक आहेत - कालबाह्य झाली तरी आजही वट पौर्णिमा ,हरतालका या कौतुम्बिकच मानल्या जातात , फक्त गणपती हा एकाच देव सार्वजनिक झाला आहे , आणि काही प्रमाणात , नवरात्र !<br />त्यामुळे या सार्वजनिक समारंभात परत परत जर वेदाधीष्ठित विचार रुजणार असतील तर त्यांचे वेळीच उच्चाटन करणे हे जागृत सामाजिक जाण असलेल्या वर्गाचे मुख्य काम आहे - मग तो ब्राह्मण असो वा बहुजन !पण दुर्दैवाने यातले काहीच होताना दिसत नाही - संत तुकाराम यांची चर्चा करताना वसवसून ब्राह्मण वर्गावर टीका करणारा वर्ग दगडूशेठ गणपतीला तोरणे बाधण्यात सर्वात पुढे दिसतो आणि होमहवन करण्यात हातभार लावत असतो !<br />आज समाजप्रबोधन हा विषय फक्त सावित्रीबाई आणि म फुले , अण्णाभाऊ साठे अशी नावे घेत थांबतो - त्यांच्या पुतळ्याच्या पुढे तो विचार चार पावलेही जात नाही - आणि १० - २० रुपयांच्या हारावर त्याची लोकप्रियता संपते ! हा काळाचा महिमा म्हणावा का ब्राह्मणी विचारांचा विजय मानावा तेच समजत नाही - शेकड्यांनी संपणारी नारळाची पोती आणि कंठशोष करत म्हटले जाणारे मंत्रोच्चार सार्वजनिक रूप घेत आधुनिकतेची कास धरणाऱ्या मराठी माणसास जणू खिजवत असतात असे वाटते - हे कसे घडत गेले त्यांना कोण पाठींबा देते ? त्याचा वेळीच बिमोड का होत नाही ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16746850472039829492014-09-05T23:54:49.828-07:002014-09-05T23:54:49.828-07:00संत तुकाराम महाराज यांना वाचवायला स्वतः पांडुरंग ...संत तुकाराम महाराज यांना वाचवायला स्वतः पांडुरंग का आला नाही ?असा प्रश्न मला पडतो <br />ते नक्कीच पुण्यवान होते ,<br />त्याचे उत्तर शोधायला गेले की मन म्हणते -<br />देव असणेच शक्य नाही !<br />कारण ते असते तर त्यांनी संत तुकारामांचे संरक्षण केले असते - खरे ना ?<br />ब्राह्मण नीच होतेच , पण देवाने त्याना काहीच शासन केले नाही !ब्राह्मण प्रजेला लुबाडत होते पण <br />देवानी ब्राह्मणाना काहीच शासन केले नाही - मग देव कसा असेल ?<br />देव ही मानवनिर्मित कल्पना आहे हे नक्की !<br /><br />मुसलमान आले त्यांनी आपली मंदिरे पाडली , पण देव गाभाऱ्यातून आले नाहीत . <br />ब्राह्मण शेफारले ते कोणामुळे - त्यांना राजाश्रय होता - आणि मुसलमान राजवट आली तरी त्यांनी हिंदूंच्या धार्मिक उतरंडीत दखल घेतली नाही - म्हणजेच हिंदू क्षत्रिय सरदार जहागीरदार यांनी एकप्रकारे ब्राह्मणाना संरक्षण दिले - आजही ३ % ब्राह्मणात पूजा अर्चा करणारे किती ?त्यावर जगणारे किती ? हा विचार केला तर सर्व समाजाच्या अगदी नगण्य असा वर्ग आज धार्मिक कृत्ये करतो आणि त्यावर आपले पोट भरतो - अनेक पिढ्या हा ब्राह्मण विरोध चालू आहे तरीही बहुजन समाज अजूनही या पुरोहित वर्गाला मानतो - <br />आपण एक मोठ्ठी चूक करत आहोत - पुरोहित आणि ब्राह्मण असे वेगळे आहेत आणि ज्याना ज्याना वेद आणि श्रुती स्मृती याबद्दल राग आहे -त्यांचा राग हा पुरोहित वर्गावर आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच जातीय गैर समाज निर्माण होतात <br /><br />वेद काय आहे हे खुद्द ९० % ब्राह्मण लोकांनाच माहित नाही - कारण त्यांचा यावर विश्वासच नाही - त्यांनी आधुनिक जगाची आणि ज्ञानाची कास धरून त्यांनी आपला मार्ग निवडला आहे <br />आज गेले अनेक वर्षे होम करणे आणि पूजा करणे याचे स्तोम सार्वजनिक गणपतीत वाढत आहे - त्याचा निषेध केला पाहिजे कारण आपण जर अनेक वर्षे या पुरोहित वर्गाविरुद्ध जनजागृतीचा प्रचार करत असाल तर आज सार्वजनिक रित्या गणपती उत्सवात अथर्वशीर्ष , होम , अभिषेक , तोरण बांधणे हे प्रकार कोणत्या जातीकडून केले जातात याचा आपण सर्व्हे केला तर काय दिसते ?<br /><br />आपण इतके मोठ्ठे लेख लिहित आहात तर , आपण साधे पोस्टर तयार करून मूकपणे सार्वजनिक गणपतीत या वेदाधीष्ठित पठणाचा जाहीर निषेध का करत नाही ?आज गणपती विसर्जन हौदात करा असा प्रचार चालतो - त्याच्या शेजारी कर्मठपणे वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करा असाही प्रचार शांततेने चालतो - दोन्हीही पक्ष शांततेने आपला प्रचार करत असतात - तसेच आपणही पोस्टर वापरून सार्वजनिक गणपतीत आराशित आणि एकूण वातावरणात कर्मठ विचारांची चिरफाड करू शकाल - दगडूशेठ लालबाग अशा मनाच्या गणपतीसमोर जे होमहवन चालते त्याला प्रोत्साहन देणारे कोण आहेत ?हे स्तोम का वाढत आहे ?याला पोसणारे कोण आहेत ?हे असेच सार्वजनिक बैठक लाभून विस्तारत गेले तर या वेदावर रचल्या गेलेल्या सामाजुतीना पसरवणारे कोण ?आज हजारो गृहिणी अथर्व्श्र्शाचे पारायण करतात त्याचा आपण जाहीर निषेध का करत नाही ?<br />पुरोहित वर्ग हा नेहमीच लोचट असतो आणि धार्मिक बाबतीत अगदी पूर्ण आश्रिताञ्च्या सारखा वागणारा असतो - त्यामुळे त्यांचे महत्व वाढवायचे का कमी करायचे ते बहुजनांनी ठरवायचे आहे - आणि बहुजानानीच सार्वजनिक गणपती हे एक उत्तम व्यासपीठ मानून अशा गोष्टींचा जाहीर Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-47265854359286688162014-09-05T10:12:10.144-07:002014-09-05T10:12:10.144-07:00ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे...ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।१।।<br />लहान थोरासी करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ।।ध्रु।।<br />सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ।।२।।<br />केशव नारायणा करिता आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ।।३।।<br />नामे करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायी ।।४।।<br />तुका म्हणे हे चि निर्वाणीचे शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगी ।।५।।<br />(अभंग क्रमांक ४३५६) <br />अर्थ : परब्रह्म हे नामामुळेच प्राप्त होते, हे वर्म ब्राह्मणाला कळत नाही. म्हणून माझी सर्व लहान थोरांस विनंती आहे की, त्यांनी नारायणाला मनी धरावे. श्रीपतीची आठवण मनात ठेवा ही माझी सर्वांना विनंती आहे. साधे पाणी पिताना केशव नारायणाची आठवण काढली की संध्या आणि स्नानादी कर्म होऊन जाते. भोजन करताना नामस्मरण केले की सर्व प्रकारची ब्रह्मकर्मे आपोआप पूर्ण होतात. तुकोबा सांगतात की, नामस्मरण हेच निर्वाणीचे शस्त्र आहे, म्हणून नामस्मरण करा.<br /><br />वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।१।।<br />विठोबाचे नाम सुलभ सोपा रे । तरी एक सरे भवसिंधू ।।ध्रु।।<br />जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ।।२।।<br />तुका म्हणे विधी निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ।।३।।<br />(अभंग क्रमांक ३१५) <br />अर्थ - वेदांचे पठण करणा-यांनाही ते काय वाचित आहेत, हे कळत नाही. तसेच वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही इतरांना (स्त्री-शुद्रांना) नाही. वेद वाचण्यापेक्षा विठोबाचे नाम घेणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. विठूनामाच्या स्मरणानेच भवसिंधू तरून जाता येईल. वेदांतील मंत्र-तंत्र जाणत्या लोकांनाही असाध्य आहेत, मग अज्ञानी लोकांची काय कथा? तुकोबा म्हणतात की, विठोबाच्या सोप्या नाम मार्गाने व्यर्थ विधिनिषेध सांगणारा वेदाचा मार्ग लोपला आहे. वेदाच्या मार्गाचा पूर्ण उच्छेदच झाला आहे. <br /><br />वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ।।१।।<br />विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।ध्रु।।<br />सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतका चि निर्धार ।।२।।<br />अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।३।।<br />(अभंग क्रमांक ४०४९) <br />अर्थ - वेदाने अनेक प्रकारची बडबड केली आहे. पण त्यातून त्याने एकच गोष्टशोधली. ती म्हणजे विठोबाला शरण जाणे आणि त्याचे नाम गाणे. सर्व शास्त्रांचा शेवटी हाच विचार आणि निर्धार आहे. तुकोबा सांगतात की, अठरा पुराणांत विठोबाला शरण जाणे हा एकच सिद्धांत आणि हेतू आहे. <br /><br />शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।<br />त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। <br />बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।<br />शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।<br />तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। <br />(अभंग क्रमांक ३९१०) <br />अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील. <br />........................................................................................................................Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-29548872533111573462014-09-05T10:11:24.646-07:002014-09-05T10:11:24.646-07:00ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३
वेद प्रणित ...ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३<br />वेद प्रणित मार्गावर प्रहार<br />जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर ब्राह्मण चवताळून उठवण्यास आणखी एक प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी वेद आणि स्मृतींनी प्रतिपादिलेल्या भेदभावकारक मार्गावर केलेला प्रहार होय. आधीच्या लेखांत म्हटल्यांप्रमाणे प्रत्यक्ष वेदांमध्ये भेदभावाला स्थान नसले तरी नंतरच्या स्मृती ग्रंथांनी वेदवाङ्मयास ब्राह्मणांच्या पायाशी आणून बांधले. ब्राह्मणांना फुकट बसून खाण्याची सोय आणि स्त्री-शुद्रांना फक्त ढोर मेहनत करण्याचे कर्तव्य, अशी व्यवस्था स्मृतींनी निर्माण केली. कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत, असा सिद्धांत ब्राह्मणांनी रुढ केला. त्यामुळे ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कुठलाही धार्मिक अधिकार उरला नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणांची सेवा करायची. या विषारी व्यवस्थेविरुद्ध तुकोबांनी बंड पुकारले.<br /><br />वेदांचे करायचे काय?<br />वेदप्रणित धर्माचा भारतीय जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, वेदांना नाकारणारे पंथ पाखांड ठरतात. उदा. वेदप्रमाण्य नाकारल्यामुळे महानुभाव पंथाला मधली अनेक शतके जवळपास अज्ञातवासात काढावी लागली. अशा परिस्थितीत वेदांचे करायचे काय? असा प्रश्न तुकोबांसमोर होता. तुकोबांनी वेदप्रमाण्यावर कोणतेही भाष्य न करता, भेदभावावर प्रहार केला. तसेच वेद वेद काय करता, खुद्द वेदांनीच विठ्ठलाची महती गायली आहे, असे सांगून ब्राह्मण धर्मावर कडी केली. ही मात्रा उत्तम लागू पडली. लोकांच्या झुंडी तुकोबांचा उपदेश ऐकायला येऊ लागल्या. तुकोबा त्यांना सांगत :<br />वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला ।।<br />विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।<br />कर्मकांड सोडा. विठोबाला शरण जा आणि नामस्मरण करा. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, खुद्द वेदांनीच हे सांगितले आहे, असे तुकोबा या अर्भगात म्हणतात.<br />तुकोबांच्या या मुत्सद्दीपणावर ब्राह्मण हडबडले. काय करावे, हे त्यांना कळेना. अशातच काही ब्राह्मण मंडळींनी तुकोबांचा अनुग्रह घेतला. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी प्रचार सुरू केला की, "नुसते भजन म्हटल्याने कुठे देव गवसतो का, त्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते अनुष्ठाने आणि इतर कर्मकांडे करणे आवश्यक आहे", असा प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. त्यावर तुकोबांनी ब्राह्मणांना थेट आव्हान देत म्हटले की, <br />ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।<br />तुकोबा म्हणतात, ब्राह्मणांना काहीच कळत नाही. नामस्मरणाने नक्की इश्वर भेटतो. नारायणाचे नाम घेणे हेच आचमन आणि संध्या होय. नित्य भजन हेच ब्रह्मकर्म होय.<br /><br />कोणत्याही प्रकारे अर्थ समजून न घेता, वेदमंत्रांची घोकमपट्टी करणाèया ब्राह्मणांना तुकोबांनी वेडगळ म्हटले. तुकोबा म्हणतात : <br />वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।<br />याच अर्भगात तुकोबांनी उच्छेद जाला मारगाचा असे म्हणून तुकोबांनी वेदमार्गाला पूर्ण पराभूत केले आहे. <br /><br />ब्राह्मणांच्या पोषाखीपणावर प्रहार<br />कर्मकांडे नष्ट करायची असतील, तर ब्राह्मणांचे ब्राह्मणपणा ज्या बाबींवर अवलंबून आहे, त्यावर प्रहार करायला हवा, हे ओळखून तुकोबांनी शेंडी, जाणवे, सोवळे या बाह्य संकेतांवर जोरदार प्रहार केला. "शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।" या अभंगात तुकोबांनी केलेला प्रहार किती घातक होता, हे लक्षात येते. तुकोबा म्हणतात की, शेंडी आणि जाणवे यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील.शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तू खरा ब्राह्मण होशील. <br />येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वेदप्रणित मार्गाचा उच्छेद करीत असताना तुकोबाराय नामस्मरणाचा सोपा पर्यायी मार्गही त्यासोबत देत आहेत. <br /><br />लेखात आलेले अभंग<br />(या लेखात आलेल्या अभंग पंक्ती पुढील अभंगांतून घेतल्या आहेत. देहू संस्थानने छापलेल्या गाथ्यातून या अभंग संहिता घेतल्या आहेत. वाचकांच्या सोयीसाठी गाथ्यातील अभंग क्रमांक अभंगांच्या शेवटी दिले आहेत.) <br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-34791631050318441812014-09-05T10:09:04.068-07:002014-09-05T10:09:04.068-07:00या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत....या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे. <br /><br />शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।<br />त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। <br />बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।<br />शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।<br />तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। <br />(अभंग क्रमांक ३९१०) <br />अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील. <br /><br />जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।<br />गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।<br />तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।। <br />(अभंग क्रमांक ४३६९) <br />अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )<br /><br />तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।<br />मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।<br />तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।<br />तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।<br />(अभंग क्रमांक ११४) <br />अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते. <br /><br />सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।<br />येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।<br />चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।<br />तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।। <br />(अभंग क्रमांक ४२२७) <br />अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही. <br />...................................................................................................................Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-91421632898118246302014-09-05T10:08:12.625-07:002014-09-05T10:08:12.625-07:00ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २
तुकोबांनी ब्...ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २<br />तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला<br />हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले. <br />ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला. <br /><br />ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला. तुकोबा म्हणतात : <br />जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।<br />गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।<br />अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता. <br /><br />तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा. <br /><br />ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले. <br /><br />तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले. <br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56846807987599277132014-09-05T10:05:07.430-07:002014-09-05T10:05:07.430-07:00तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा ...तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथ्यातील अनुक्रमांक दिला आहे. <br /><br />ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।<br />रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।<br />शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।<br />तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।<br />(अभंग क्रमांक : १२३०)<br />अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे. <br /><br />अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।<br />वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।<br />ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।<br />तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।<br />(अभंग क्रमांक : १३४४) <br />अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये. <br /><br />ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।<br />जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।<br />सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।<br />तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।<br />(अभंग क्रमांक : १२२९) <br />अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.<br />..................................................................................................................Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19151274053830955662014-09-05T09:54:06.534-07:002014-09-05T09:54:06.534-07:00ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१
तुकोबांनी ब्...ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१<br /><br />तुकोबांनी ब्राह्मणांचा धर्मावरील विशेषाधिकारच नाकारला<br />महाराष्ट्रातील त्या काळातील ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? तुकोबांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? या प्रश्नांची उत्तरे तुकोबांच्या गाथ्यातच सापडतात. भारतात खोलवर रुजलला ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या पायावर उभा आहे. ब्राह्मण ही जात यात मोठी लाभधारक आहे. या ब्राह्मण धर्माच्या पायावरच तुकोबांनी घाव घातला. परंपरेने ब्राह्मणांना जातीनिष्ठ श्रेष्ठत्व दिले होते. ते तुकोबांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही, अशी घोषणा तुकोबांनी केली. इतकेच नव्हे, तर ब्राह्मण होण्याचा अधिकार कोणालाही आहे, अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. तुकोबा म्हणतात की, एखादा मनुष्य अंत्यजाच्या कुळात (सर्वांत हीन जातीत) जन्मला असेल, मात्र तो निस्सीम विठ्ठल भक्त असेल, तर त्याला ब्राह्मणच समजायला हवे. तुकोबांचा या संबंधीचा अभंग असा -<br />ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।। रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।। <br />याच्या विरुद्ध बाजूने विचार मांडताना तुकोबा म्हणतात की, भक्तीहीन असलेल्या ब्राह्मणास अंत्यज मानावे. हा विचार अंत्यंत क्रांतीकारक आहे. ही क्रांती घडविण्यासाठी तुकोबांची वाणी विजेसारखी कडाडते. तुकोबा लिहितात -<br />अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।। <br />त्याही पुढे जाऊन तुकोबा म्हणतात की, अशा भक्तीहीन ब्राह्मणाला जन्म देणारी स्त्री नक्कीच व्याभिचारी असली पाहिजे. <br />हा हल्ला इतका घणाघाती आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांना ती पचणे कठीण झाले असणार. <br />धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार<br />ब्राह्मणी परंपरेने धार्मिक न्याय-निवाडा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना दिला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे आणि ब्राह्मणत्व कोणाला नाकारायचे याचे अधिकार ब्राह्मणांच्या धर्मसभेला होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण्याचा हक्क पैठणच्या पंडितांनी नाकारला होता. धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना पतितसावित्रिक ठरवून मौंजीचा अधिकार नाकारला होता. धर्मपंडितांचा हा अधिकार जन्माधिष्ठित जातीवर आधारित आहे. ब्राह्मणाखेरीज इतर कोणत्याही जातीतील व्यक्तीला हा अधिकार नाही. मात्र कुणव्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामांनी ब्राह्मण जातीचा हा विशेषाधिकार धुडकावून लावला. इतकेच नव्हे, तर तो स्वत:च्या हाती घेऊन ब्राह्मण कोण याचा निवाडा करणारे अभंग रचले. ते अभंग महाराष्ट्रभर लोकप्रियही झाले. त्यामुळे ब्राह्मण चवताळून उठले. तुकोबांच्या हत्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. <br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77239130211092711162014-09-05T09:43:56.184-07:002014-09-05T09:43:56.184-07:00@Anonymous September 4, 2014 at 10:17 AM,
Anonymou...@Anonymous September 4, 2014 at 10:17 AM,<br />Anonymous September 4, 2014 at 10:20 AM,<br />Anonymous September 4, 2014 at 10:23 AM,<br />Anonymous September 4, 2014 at 10:27 AM,<br />Anonymous September 4, 2014 at 10:34 AM and<br />Anonymous September 4, 2014 at 10:41 AM<br /><br />ह्या बामणाचे मानसिक संतुलन अक्षरशः बिघडले आहे. चित्पावन अर्थात कोकणस्थ ब्राह्मण कधी काळी सुधरतील हे अजिबात पटणारे नाही. याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे, असे वाटते! हा इतरांच्या खोट्या नावाने टिप्पण्या लिहित सुटतो अगदी बावळट माणसा सारखे! फक्त याच्या टिप्पण्याची वेळ पाहिली तरी हे सुज्ञांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. सलग एकसारखे लिहित सुटतो पिसाळल्यासारखे, ताबाच नाही स्वतः वर. रिकाम टेकडा कुठला? लिहिताना वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम द्यायचा असतो हे ही याला समजत नाही व याच्या पूर्ण खानदाणालासुद्धा माहित नसेल?<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27246223904853148022014-09-04T10:41:30.389-07:002014-09-04T10:41:30.389-07:00हे चर्वती चर्वण करण्यात इतक्या लोकांना इंटरेस्ट आह...हे चर्वती चर्वण करण्यात इतक्या लोकांना इंटरेस्ट आहे हे पाहूनच आश्चर्य वाटू लागते <br />हेच परिश्रम " इतिहास मागास " या विषयावर खर्च केले असते तर ?इतका सुंदर लेख आणि त्यावरची पहिली लांबच लांब प्रतिक्रिया अगदी ग्रेटच आहे - अगदी अप्रतिम - वाचनीय आणि संग्राह्य आहे अभ्यासपूर्ण प्रतिसाद कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे - त्यानंतर कोब्रचा वाद अगदीच डोके फिरल्या सारखा घाणेरडा वाटतो <br />आपल्याकडे आधी संशयाचे भूत निर्माण करत टीका करायची हा पण एक निरुद्योगीपणा चालतो आणि त्यातही कोब्रा लोकाना टार्गेट करणे सोपे आहे <br />याचा जितका निषेध करावा तितका कमीच पडेल <br />अनुराधा फडके <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-66600244323657569782014-09-04T10:34:30.386-07:002014-09-04T10:34:30.386-07:00" खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हात..." खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"<br />याबद्दल इतक्या सुचना आल्या आहेत हे पाहून मूळ विषय बाजूलाच पडतो आहे ,<br />असा जर कुणी लिहित असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे , अनुल्लेखाने मारणे ही <br />उच्च अहिंसक हत्या आहे , सावरकरांना गांधीनी असेच मारले होते <br />तसेच या माणसा बद्दल करणे योग्य ठरेल ,मुळात असे वाटत नाही की कुणीतरी एकाच माणूस हे करत असेल - हा विचारच विकृत वाटतो आहे !<br />मूळ विषय इतका मार्मिक आहे ते सोडून असे करणे आणि फुकटची टीका करणे हे सुद्धा अक्कलशून्य पणाचे लक्षण आहे <br />गोपाळ पेठकर Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77487043114726497022014-09-04T10:27:51.589-07:002014-09-04T10:27:51.589-07:00" खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हात..." खोटारड्या, तू तोच को. ब्रां. आहेस. तू म्हातारा असल्याच्या बतावण्या नेहमी करीत असतोस. तुला मी पुरता ओळखून आहे. बंद कर तुझी ही फालतू कट कारस्थाने, जरा माणसा सारखा वाग. एका वेळेस तीन-तीन चार-चार कॉमेंट्स लिहून काय मिळवितोस ते तरी सांग!"<br />८५ वर्षाच्या आजोबाना नेत येत असेल का ? देवाचे नाव घेण्य ऐवजी ते असे का करतील यात काहीच विनोद नाही आनंद नाही किंवा हि चेष्टा पण नाही <br />कोणी रिकाम टेकडा असे करणार नाही - तो पत्ते खेळेल म्याच बघेल मालिका बघेल ,<br />पण असे नक्की करणार नाही <br />मग याचा दुसरा अर्थ असा निघतो की अशा कॉमेंट करणाराच वेडा आहे <br />प्राची खाडे Anonymousnoreply@blogger.com