tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8022785443879294735..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): "तत्वचर्चा"Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31149181140492901562013-02-02T07:14:29.973-08:002013-02-02T07:14:29.973-08:00संजय जी ,
आपली चर्चा आवडली आणि त्यावर कृत्तिका म्य...संजय जी ,<br />आपली चर्चा आवडली आणि त्यावर कृत्तिका म्याडम यांचे विचार नोंद घेण्याइतपत वाटले.<br />आपण वैयक्तिक आयुष्यात पुष्कळ वेळेला काही ठरवतो- काही योजना सुरु करतो !- उदा- १ जानेवारीपासून सकाळी लवकर उठून फिरायला जाणे ,<br />किंवा रोज डायरी लिहिणे - पण अशा गोष्टी संपूर्ण "स्व" ने - आत्मारामाने कंट्रोल केलेल्या असतात !<br />आणि त्या आत्मारामासाठीच असतात !<br />याच गोष्टींचा सामाजिक स्तरावर उपयोग ओळखून ज्या वेळेस कुणी त्याला " चळवळ " या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू पाहातो त्यावेळेस त्यास अनेक गोष्टींची खातरजमा करावी लागते -<br />आपण करत असलेल्या सूचनाना धार्मिक रंग नाहीना ?. उदा.सकाळी फिरण्या ऐवजी कुणी प्रामाणिकपणे सूर्य मानास्कार घाला असे सुचवले की लगेच भुवया वाकड्या होण्याची शक्यता असते !-<br />ओम सूर्याय नमः म्हणण्यात दुसरा रंग जाणवू लागतो आजकाल ! पूर्वी असे नसे होत ! कालाय तस्मै नमः !<br />म.गांधीनासुद्धा त्यांच्या भजनांच्या प्रेमामुळे टीकेचे शरसंधान सहन करावे लागले ! अशा वेळी प्रश्न पडतो की एखादा माणूस आणि त्याची महत्ता आणि तो मांडत असलेल्या विचारांचे <br />पोस्ट मार्टेम करण्याचा अधिकार कोणाला आहे ?आणि तो अधिकार त्याने कमावलेला आहे का तो त्यावर लादला गेला आहे का तो स्वघोषित आहे ?<br /><br />आजकालचा काळ हा जात आणि धर्म यांचा सतत कोणत्या न कोणत्या रुपात पुरस्कार करण्याचा आहे असे एक गढूळ मत सर्वांचेच झाले आहे !<br />त्याला सुरवात कुणी केली हा संशोधनाचा विषय आहे .आर .एस एस का कोन्ग्रेस ?<br />गांधीजींचे उपवास हे तंत्र ब्या .जीनाना अजिबात पसंत नव्हते .दुसरे अनेक कोन्ग्रेस नेतेसुद्धा अशा कल्पनांना छुपा विरोध करत असत !.<br />पण म.गांधीजींच्या उत्तुंग व्यक्तीमत्वापुढे आणि हट्टी पणामुळे तो विरोध क्षीण होत असे.<br />आज प्रत्येक जातीने आणि समाजाने तेच तंत्र अवलंबले आहे - त्यामुळे बुद्ध,हनुमान,शंकर,छ.शिवाजी महाराज,म.फुले,डॉ .आंबेडकर,परशुराम असे ब्रान्ड तयार झाले आहेत <br />आणि ते फक्त मुख्यत्वे तेव्हढ्याच जातीच्या विचार पुरस्काराचे काम करतात असा समज झाला आहे - तो फार घातक आहे.<br />त्यामुळे हे सर्व थोर लोकनेते त्यांच्या महत्तेपेक्षा खाली ओढले जातात.<br />हे आपण थोडेसे समजून घायला पाहिजे !<br />जरा कुणी एखादा शब्द जरी चर्चेच्या ओघात निसरडा वापरला तरी हे संभाजी ब्रिगेड किंवा कोकणस्थ ब्राह्मण किंवा बुद्धप्रेमी लगेच त्या लेखकाच्या जिवावर उठल्यासारखे अंगावर येतात !<br />सध्या आपल्या ब्लोग वर काही जणांनी एकदम जो विधीनिषेधशून्य आरडा ओरडा चालवला आहे तो अत्यंत आक्षेपार्ह आहे असे वाटते .त्यात स्त्रियाही तितक्याच अभिनिवेशाने सहभागी झाल्या आहेत हे जास्त धोकादायक आहे ! दुःखदायक आहे !<br />धन्यवाद !datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31560142813332820482013-02-01T09:52:49.523-08:002013-02-01T09:52:49.523-08:00संजय सर ,
आपण मांडलेले पुढील मत हे अतिशय महत्वाचे ...संजय सर ,<br />आपण मांडलेले पुढील मत हे अतिशय महत्वाचे आहे.<br />इतिहासातील थोर लोकांच्या थोरपणाबद्दल थोडेसे लिहावेसे वाटते - या संदर्भाने !<br />ते असे -<br /><br />सर आपले बहुमोल मत आपण द्यावे ही नम्र विनंती !<br />ते मला मार्गदर्शक ठरेल !<br /><br />आपण लिहिता - " छोट्या माणसांच्या सह अस्तित्वाखेरीज मोठी माणसे - - "<br />कोणताही लढा असो , नवनिर्मिती असो , शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती असो,म.गांधींची चळवळ असो- <br />कधी नवीन शिल्प असो, नाट्यलेखन असो ,त्यात छोट्या माणसानी सर्वस्व झोकून दिलेले असते,<br /><br />आपले जीवन ओवाळून टाकलेले असते.मोठ्ठ्यांचे स्वप्न ते आपले स्वप्न असे म्हणत <br />आपल्या खाजगी आशा आकांक्षा या त्या थोर लोकांच्या महत्वाकांक्षांशी एकरूप केलेल्या असतात ! त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक आयुष्यात <br />त्यामुळे जरी खडतर प्रसंग आले तरी त्यांना त्याची फिकीर नसते !<br /><br />एक त्रयस्थ म्हणून बघताना मला असे अनेक जण स्वात्र्यन्त्तोत्तर काळात पुस्तकरूपाने भेटले की ज्यांचा भ्रम निरास झाला होता - झाला आहे !.<br />त्यांच्या वयाचा एक मुख्य कर्तृत्वाचा भाग त्यांनी या थोर लोकांसाठी खर्च केलेला होता, आणि आता ?- भ्रमनिरास !<br />हा भ्रम निरास स्वार्थ साधता आला नाही म्हणून आहे का ? तर - नाही ! तसे नसून यांचे दुःख वेगळेच आहे.<br />या नेत्यांच्या स्वात्र्यन्त्तोत्तर काळातील पुढील वागण्याने हे छोटे छोटे लढवय्ये अंतःकरणात आतल्या आत पराभूत झाले.<br />याच नेत्यांच्या वागण्यातील फरक या छोट्या कार्य कर्त्यांना असे सुचवू लागला की खरे काय ? <br />नेता तोच ! पण - शब्द बदलू लागले ! वाक्य रचना अवघड होत गेली .शाब्दिक कसरत सुरु झाली ! वागण्या बोलण्यात ताळमेळ उरला नाही !]तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या , केवळ राजकारण नव्हे !<br />आर .के .स्टुडियो,शांताराम , या संस्था म्हणून लोक मानत असत !.<br />कोणतेही उत्सव घ्या - आपला गणपती उत्सव घ्या ! पूर्वी मेले होत असत ! आत्ताचे रूप आपणास कुठे घेऊन चालले आहे ?<br />राष्ट्र सेवा दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (तात्विक मतभेद बाजूला ठेवत )-स्काउट,होमगार्ड,-<br />आम्ही स्वतः स्वच्छ रस्ते अभियान मध्ये भाग घेतलेला मला या ठिकाणी आठवतो.<br />कष्टाची कमाई करून चीन युद्धात दिवाळीत मदत फंड निर्माण केलेला आठवतोय !<br />आता देखाव्याचे युग आले.<br />सांगायचा मुद्दा असा आहे की -<br />छ.शिवाजी महाराजांच्या बालपणातील सवंगडी आणि नंतरचे सहभागी ,आणि त्या नंतरचे राजकारण यात हा मुद्दा पण महत्वाचा ठरतो का ?<br />शेलारमामा, तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर ,असे अनेक जण ज्या निष्ठेने लढले त्याना बाकीचे राजकारण कुठे समजत होते ? पण त्यांच्या घरातील समस्या आणि घडणारे राजकारण याचा नंतर मेळ बसला नसेल तर ते दुःख त्यांनी कसे पचवले असेल ?<br />देशप्रेम,गद्दारी ,देशाभिमान आणि फंद फितुरीचे दुष्टचक्र - हा ताण त्यांनी कसा सहन केला असेल.'<br />अनेक उभी राहिलेली साम्राज्ये - मग ते रोमन असो,चंद्रगुप्ताचे असो वा अशोकाचे ,<br />मुघल असो वा विजय् नगरचे - मराठ्यांचे असो वा म्हैसूर चे ! <br />अनेक संस्था आणि त्यांचा उदय आणि अंत हा या दृष्टीने तपासण्या सारखा आहे !.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-42969141304775157952013-01-31T11:36:18.276-08:002013-01-31T11:36:18.276-08:00जय भवानी , जय शिवाजी !
शेवटी पसार झाला ,
पाय लावून...जय भवानी , जय शिवाजी !<br />शेवटी पसार झाला ,<br />पाय लावून पळाला <br />घाबरला !<br />आता आपण त्याचे टेन्शन घ्यायला नको.<br />अनानिमास ने पलायन केले.<br />पुढच्या १२ पिढ्या तो कुणाला त्रास्देणार नाही !<br /><br />त्याच्या आईनेच त्याला थोबाडले असणार !<br />जय शिवाजी ! जय भवानी !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-25445879854163002152013-01-30T08:03:10.223-08:002013-01-30T08:03:10.223-08:00आपल्या ब्लोगवर ज्या चर्चा आप्पा बाप्पा च्या नावाने...आपल्या ब्लोगवर ज्या चर्चा आप्पा बाप्पा च्या नावाने चालतात त्यामुळे<br /> पूर्वीच्या दैनिक सकाळ मधील आप्पा बाप्पा या सदराची आठवण होते.<br />सामाजिक जाणिवांचे भान ठेवून गुंफलेले हे लिखाण आपल्याला जसे आनंद देते तसेच आत्तापर्यंत तरी त्यांनी सर्वांचे मनोरंजनच केले आहे.<br />अजून अनेक जण असेच सहभागी झाले तरी आनंदच आहे.<br />शेवटी ब्लोग वर काय ठेवायचे हा हक्क ब्लोग च्या मालकाचा असतोच !<br />धन्यवाद !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-59478466718184959342013-01-30T07:55:16.927-08:002013-01-30T07:55:16.927-08:00मान गये उस्ताद !मान गये उस्ताद !Anonymoushttps://www.blogger.com/profile/11343900985179577893noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33596062998466995262013-01-30T07:21:27.578-08:002013-01-30T07:21:27.578-08:00"मी" आप्पा आणि बाप्पांचे "माझ्या&qu..."मी" आप्पा आणि बाप्पांचे "माझ्या" वतीने त्यांच्या खेळकर विनोदबुद्धीचे अभिनंदन करतो.....<br />-"मी"<br /><br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-168711707173255672013-01-30T07:13:40.188-08:002013-01-30T07:13:40.188-08:00बाप्पा -आप्पा आप्पा ,पहिलं बसून घ्या बर -२०१४ ला ...बाप्पा -आप्पा आप्पा ,पहिलं बसून घ्या बर -२०१४ ला काय विशेष ?<br />आप्पा - निवडणुका असणार तुमच्या - ते जाऊ दे -अहो काय सांगू सगळी पाठ धरल्ये. बसलो तरी त्रास - उभा राह्यलो तरी त्रास !- २०१४ कुणी पाहिलंय !<br />बाप्पा - अहो ,आप्पा - सांगतोय ते फारच गंभीर !तुम्ही ब्लोग वाचत नाही का संजयचा हल्ली ,रेकॉर्ड २० वेळा मी मला माझा असे ब्रीथलेस लेखन झाले आहे.<br />जमेल का तुम्हाला ? सरळ मोजतच गेलो - आपल्याला काय उद्योग आहे.कुठे कान्हे मोजत बसायचे तर कुणाच्या वेलांट्या शोधत बसायचे.<br />मराठीचा मास्तर म्हटल्यावर सवयच लागलेली -ह्रस्व नि दीर्घची -हेच आपले करीयर गेले ४० वर्ष - अजून बोलावणी येतात प्रूफ रीडिंग साठी .<br />आतलं मर्म समजावून घ्यायचं का आपल वय राहिलंय ?<br />आपल मर्म एकच - रोज खडू घासत नी फळे पुसत एक तारीख गाठायची.<br /> <br />बाप्पा - मी माझ्या - - - महामानव मानतो ! म ची बाराखडीच लावल्ये संजयने .पण लिहिलंय मात्र ओघवत बर का !<br />आप्पा - म्हणजे आपल्या काळात - काकाच्या काकूने काकाचे कोरे कागद कोऱ्या कात्रीने कराकरा कापले- तसच ना ?<br />बाप्पा - हेच तर तुमच चुकत ! त्याला काहीतरी अर्थ आहे का ? ते आपल बडबड वाक्य झाल.<br />आप्पा - मग मी सांगतो ते वाक्य ! - म चच ना ? ते बघा कस वाटतंय <br />" महाजनो येन गतः स पंथः "<br />आमच्या संजयने नुसत्या एका म मध्ये सगळ जगाच सत्य सांगितलाय - बोला आता.<br />बाप्पा - ते आमच्या वेळेच वाक्य आहे .उत्तम मार्ग कोणता / तर महाजन म्हणजे थोर लोक किंवा अनेक लोक ज्या मार्गाने जातात तो रस्ता योग्य !असा डबल अर्<br /> <br />अप्पा - पण प्रथमपुरुषी एकवचनी आहे का ?अहो मग ते तसेच असणार.<br />,मन्वंतर,मर्त्य,मतमतांतर,मौलिक,मैत्र ,महाअनुभूती ,मौखिक,मूलतः अशी चवडच लावत गेला असेल !<br />बाप्पा - तुम्ही पुस्तीचे मास्तर होता सुरवातीच्या काळात त्याचा अजून परिणाम आहे हो तुमच्यावर !<br />संजय पुस्तिका लिहितोय ,त्यातला उतारा दिलाय त्याने ! तो काय करतो नि काय करत नाही त्याची लिस्टच आहे बघा आप्पा.<br />म्हणजे कुणाला चिंता नको वाटायला कि हा दिवसभर करतो काय.<br />तुम्ही कधी तुमच्या शेजाऱ्याला किंवा सासऱ्याला सांगितलय अस ? याने सगळ्याना एकजात जाहीर करून टाकलय ! <br /> <br />आप्पा - मग मस्तच की हो .<br />बाप्पा - तोच तर फुटाणा झालाय .<br />आप्पा - का बरे ? अस कस - तो हाडाचा तत्व चिंतन करणारा आहे बर का ! फुटाणा कसा होईल.<br />बर एक सांगा - ब्लोग वर हल्ली जाहिराती असतात का ? कारण सकाळी वर्तमानपत्र वाचताना हल्ली हा घोळ ठरलेला आहे.<br />जाहिरात आणि बातमी एकाच मख्खपणे शेजारी शेजारी चिकटून दिसतात एकमेकाला- फ्रंट पेजला - ती वाचताना एकत्र वाचली जाते.बाप्पा - नि मग सगलाय गोंधळ !<br />थंडीत ओठाना अमुक क्रीम लावा - - असे सुषमा स्वराज म्हणाल्या -- जाहिरात आणि बातमी -असा भास होतो.<br />बाप्पा - संजयच्या ब्लोग वर जाहिराती - अशक्य ! जाज्वल्य नि परखड लिखाण असते !बाकी कशाला थाराच नाही .<br />आप्पा - अहो मी वाचतोय ते काय आहे ? या ब्लोग वर मी मी किती झालय ?<br />याला तत्व चर्चा म्हणायचं का मीपणा - सांगा आता बाप्पा तुम्हीच ! <br />बाप्पा - भगवत गीतेत सुद्धा संजय बोलतो तेंव्हा संजय उवाच अस म्हटलं आहे.त्यात मीपणा आहे का ?<br />स्वतः श्रीकृष्ण पण इतकेवेळा बोलला नाहीये कि मी असा आहे नि मी तसा आहे .<br />आप्पा - अहो बाप्पा , उभे राहून राहून पाय दुखायला लागले माझे.<br />आणि असेच तुमचे पुराण चालणार असेल तर यापुढे हाक मारत जाऊ नका मला .<br />बाप्पा - इतका राग बरा नाही.आपल वय बघा आप्पा .२०१४ जवळ आले - तुमचे मत महत्वाचे आहे.!<br />आप्पा - बास का ! म्हणजे हरदासाची कथा मूळ पदावर आलीच !Anonymoushttps://www.blogger.com/profile/11343900985179577893noreply@blogger.com