tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8187302710834971353..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): कोलाहलातून नवी रचना?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-17557593136836110172017-07-21T20:55:47.212-07:002017-07-21T20:55:47.212-07:00सर, आजकाल UN ची अवस्था बेवारस झालीय. काही देश फक्त...सर, आजकाल UN ची अवस्था बेवारस झालीय. काही देश फक्त आपापल्या फायद्यासाठी करून घेतात Deepak Dhongdehttps://www.blogger.com/profile/11946145643826725564noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71226689989875916132017-05-13T08:55:36.172-07:002017-05-13T08:55:36.172-07:00स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाची खूप चर्चा झाल...स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाची खूप चर्चा झाली. ब्रिटिश भारतीयांना हिणवत होते, की तुम्ही एक राष्ट्र नाही आहात, भारतात अनेक राष्ट्रे आहेत. यास उत्तर देण्यासाठी आपण आग्रहाने मांडू लागलो, की आम्ही एक राष्ट्रच आहोत. जसे ब्रिटिश हे एक राष्ट्र आहे, तसेच आम्हीही एक राष्ट्र आहोत. त्या काळात भारत हे एक राष्ट्र आहे, की ते अनेक राष्ट्रांनी बनलेले आहे, असा कडाक्याचा वादविवाद चालत असे. परंतु भारतीय एक राष्ट्रवाद मानणाऱ्यांनीही त्या राष्ट्रवादाची मूलतत्त्वे वा आशय मांडणारा एखादा आधारभूत ग्रंथ लिहिलेला नाही. त्या काळात आग्रहाने मांडला जाणारा मुस्लिम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद यास विरोध करणारे प्रतिपादन एवढ्यापुरतेच त्या भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीचे स्वरूप राहिले. स्वातंत्र्योत्तर काळातही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. भारतीय राष्ट्रवादाची समग्र मांडणी करणारा ग्रंथ अद्यापही उपलब्ध नाही. असे का झाले?<br /><br />याचे एक कारण हे, की स्वातंत्र्योत्तर काळात देशात डावे व उजवे अशी विचारवंतांची विभागणी करण्यात आली. मार्क्सवादाच्या प्रभावाखाली असलेल्या डाव्या विचारवंतांना मूलतः राष्ट्रवादच मान्य नव्हता. साम्यवाद वा समाजवाद हीच त्यांची सर्वोच्च विचारसरणी होती. राष्ट्रवादाला ते प्रतिगामी मानत असत. आजचे सहिष्णू व असहिष्णू हे अनुक्रमे त्याच डाव्या व उजव्यांचे वैचारिक वारसदार होत. त्यामुळे त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीची अपेक्षा करता येत नव्हती. आता उरले तथाकथित उजव्या विचारांचे नेते व विचारवंत. त्यांना एखाद्याचा अपवाद वजा जाता पाहिजे होता धार्मिक राष्ट्रवाद. त्याला ते सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणत असले, तरी आशय धार्मिक राष्ट्रवादाचा. अल्पसंख्याकांनाच काय, पण हिंदूंतील बहुसंख्याकांनाही तो मान्य होणारा नव्हता. त्यामुळे त्यांनाही भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करता आली नाही. एवढेच काय, पण त्यांना हिंदू राष्ट्रवादाचीही समग्र वा नीट मांडणी करता आली नाही. आजही भारतीय राष्ट्रवाद त्याच्या समग्र मांडणीअभावी डावीकडे व उजवीकडे असे हेलकावे खात अभ्यासकांसमोर प्रश्न म्हणून उभा आहे.<br /><br />उजव्यांच्या दृष्टीने फक्त भाजप राष्ट्रवादी व अन्य सर्व राष्ट्रविरोधी, तर डाव्यांच्या दृष्टीने फक्त ते व काँग्रेस धर्मनिरपेक्ष, बाकीचे सर्व जमातवादी. मुस्लिम धर्मांधता चोखाळणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे. हे वास्तव सांगणारे, परखड धर्मचिकित्सा करणारे नरहर कुरुंदकर समजून घ्यावे लागतील. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादासाठी कुरुंदकर एक व्यावहारिक कसोटी सांगतात. 'ज्याची भारतीय संविधानावर निष्ठा आहे व त्या संविधानास जो आपल्या धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ मानतो तो धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी समजावा' ही ती कसोटी. भारताचे संविधान हा भारतातील वेगवेगळ्या संस्कृतींनी सहमतीने स्वीकारलेला 'किमान समान कार्यक्रम' आहे, जो राबवणे कोणत्याही विचारधारेचे सरकार आले, तरी बंधनकारक आहे. आपण असे म्हणू शकतो, की हा 'घटनात्मक राष्ट्रवाद' आहे. त्याचा पाया एक संस्कृती, एक धर्म असा सांस्कृतिक वा धार्मिक संकुचिततेचा नसून, बहुसांस्कृतिक, धर्मनिरपेक्ष उदारमतवादी आहे. सहिष्णुता हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असून, द्वेषविरहित समाजरचना हा त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असा घटक आहे. परंतु आज अतिरेकी विरोधातून भारतीय दंड विधानाचे कलम १२४-अ रद्द करा, अशी मागणी करत आहेत. राष्ट्रद्रोहासाठीचे कलम रद्द करून कायद्याचे राज्य कसे अस्तित्वात येईल? हे खरे, की सरकारने त्याचा उपयोग त्यांच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्यासाठी करू नये, म्हणून राज्यघटनेने कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे.<br /><br />जीनांच्या मुस्लिम लीगने 'मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत' असा सिद्धांत मांडला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यामुळे उर्वरित भारताला 'हिंदुस्थान' हे नाव देणे तर्कशुद्ध व स्वाभाविक ठरले असते. आजही सामान्यतः उपखंडातील मुसलमान या देशाचा उल्लेख हिंदुस्थान असा करतात. असे असतानाही आपण या देशाचे नाव 'हिंदुस्थान' न ठेवता 'भारत' असे ठेवले. ऐतिहासिक दृष्टीने पाहता भारत हे नाव प्राचीन असून, 'हिंदू' मध्ययुगीन नाव आहे. डॉ आंबेडकरांच्या मते हिंदू हे नाव भारतात आल्यावर मुस्लिमांनी दिलेले आहे व तत्पूर्वीच्या धर्मग्रंथात व इतिहासात ते सापडत नाही. 'भारतीयत्व' हे हिंदुत्वापेक्षा प्राचीन होते. भारतीय नेत्यांना हेच अभिप्रेत होते. म्हणून त्यांनी या देशाचे नाव 'भारत' ठेवले. या भारतीयत्वाचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा.<br /><br />डॉ. होनराव Anonymousnoreply@blogger.com