Monday, November 17, 2025

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

 Pune 
Shared with Public

10 janewari 2013

पांडुरंग बलकवडे यांच्या लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या "शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक" या पत्राला माझे खाली दिलेले उत्तर प्रसिद्ध झाले. आताच मला पांडुरंग बलकवडे यांचा फोन आला. आधी असलेला चर्चेचा सुर अचानक पालटला आणि त्यांनी मला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरु केली व मारहाणीच्या धमक्या दिल्या. इतिहास संशोधक म्हनवनारे या गलीच्छ पातळीवर जात असतील तर माहाराष्ट्री सांस्कृतिकतेचा केवढ -हास झाला आहे याची कल्पना येते. मी बलकवडेंचा निषेध करतो. वैचारिक वाद वैचारिकतेनेच लढायचा असतो याचे भान सुटलेले आहे. शिवीगाळ-धमक्या हेच परशुरामी संस्कृतीचे अपत्य आहे हेही सिद्ध झाले.
'शिवभारत' हा ऐतिहासिक पुरावा नाही
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' हे पांडुरंग बलकवडे यांचे पत्र (लोकमानस, ९ जाने.) वाचले. बलकवडे म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी परशुरामाचे दर्शन राज्याभिषेकापूर्वी घेतले याचा एकदाच उल्लेख येतो, तो परमानंदाच्या शिवभारतमध्ये. त्याच वेळेस राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी परशुरामाबरोबरच अन्यही अनेक देवतांच्या मंदिरांत जाऊन दर्शन घेतले होते असे परमानंदच लिहितो हे मात्र बलकवडे सांगायला विसरलेले दिसतात व सरळ परशुराम हे शिवरायांचे जणू एकमेव दैवत होते असा आविर्भाव आणत धादांत खोटा इतिहास सांगतात.
दुसरे म्हणजे कोणीही इतिहासकार परमानंदकृत शिवभारताचा शिवचरित्रासाठीही विश्वासार्ह पुरावा म्हणून वापर करत नाही.. मुळात हे उपमा-अलंकारांनी सजवलेले काव्य असून महाभारताच्या प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेले आहे. अन्य कोणत्याही समकालीन साधनांत शिवरायांनी परशुरामचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळून येत नाही त्यामुळे बलकवडेंचे पत्रच मुळात अनतिहासिकतेने भरलेले स्पष्ट दिसते.
परशुरामाला आक्षेप असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची िहसक व मातृघातकी अशी जनमानसात रुजलेली खल-प्रतिमा असूनही काही विशिष्ट समाजघटक जाणीवपूर्वक त्याचे स्तोम माजवत आहेत हे आहे, पण हे लक्षात न घेता एका अनतिहासिक काव्यग्रंथाचा वापर ते परशुरामाला शिवरायांचे दैवत ठरवण्यासाठी आणि सध्याच्या वादाकडून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी, परशुराम माहात्म्य गाजवण्यासाठी करत आहेत ही बाब निषेधार्ह आहे.
संजय सोनवणी

हा घ्या शिवभारताच्या विश्वासार्हतेचा पुरावा!
'शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक' या माझ्या पत्रावर (९ जाने.) संजय सोनवणी यांनी 'शिवभारत हा ऐतिहासिक पुरावा नाही' अशी प्रतिक्रिया (लोकमानस, १० जाने.) नोंदवली आहे. या पत्रात त्यांनी शिवभारताच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेऊन कोणीही इतिहासकार या शिवभारताचा संदर्भ देत नाहीत, असे अत्यंत चुकीचे व बेजबाबदार विधान केले आहे. बहुधा हे विधान त्यांनी इतिहासाविषयीच्या अज्ञानातून केले असावे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाच्या' प्रस्तावनेत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, 'शिवाजी महाराजांच्या आदेशाने परमानंदांनी संस्कृत चरित्र शिवभारत लिहिले आहे. खुद्द महाराजांच्या आदेशाने रचलेला हा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचे एक अतिशय विश्वसनीय असे साधन आहे. म्हणून अनेक इतिहास संशोधकांनी त्याचा गौरव केला आहे.
याच शिवभारताच्या आधारे स्वत: एक संस्कृत पंडित असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शिवरायांवर बालपणी मातापित्यांनी शिक्षणाचे संस्कार कसे केले याची चर्चा - चिकित्सा केली आहे.'
थोर इतिहासकार देवीसिंग चौहान, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदाशिव शिवदे इत्यादी इतिहासकारांनी मोठय़ा विश्वासाने शिवभारताचे संदर्भ दिले आहेत. शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे तर शिवभारताला अत्यंत विश्वसनीय साधन मानतात.
परशुरामाविषयी शिवभारतातील उल्लेखाशिवाय शिवाजी महाराजांनी परशुराम क्षेत्राची लावून दिलेली पूजाअर्चा, नैवेद्य, नंदादीप इत्यादीची व्यवस्था, छ. राजाराम महाराजांनी दिलेली इनामाची सनद आणि शाहू छत्रपतींनी परशुराम क्षेत्राचा केलेला जीर्णोद्धार या मराठी राज्यकर्त्यांनी परशुरामावरील श्रद्धेपोटी केलेल्या गोष्टी पुरावा म्हणून सोनवणी यांना अपुऱ्या वाटत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वत: रचलेल्या 'बुधभूषण' या ग्रंथाचा अभ्यास करावा. या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात संभाजी महाराजांनी दशावतारांना वंदन करताना भगवान परशुरामांचा केलेला उल्लेख समजून घ्यावा म्हणजे त्यांचे शंकासमाधान होईल.
पांडुरंग बलकवडे


आजच्या लोकसत्तात पांडुरंग बलकवडे यांनी माझ्या पत्राचा प्रतिवाद केला आहे. लोकशाहीमार्ग वापरुन मला शिवीगाळ न करता त्यांनी हे प्रत्युत्तर आधीच दिले असते तर निषेधाची वेळ आली नसती. असो. त्यांच्या आजच्या पत्राचा रोख परमानंद्कृत शिवभारत हे विश्वसनीय साधन आहे हे सिद्ध करण्याकडॆ आहे. त्यासाठी त्यांनी डा. जयसिंग पवार ते गजानन मेहंदळे यसंचा हवाला दिला आहे. प्रथम शिवभारतातील काही नमुने विश्वासार्हतेसाठी तपासून पाहू.
शिवाजी महाराजांनी अफक्जलखानाला जखमी करण्यासाठी बिचवा व वाघनखे वापरली, त्याचा शिरच्छेद जिवा महालाने केला हा मान्य इतिहास आहे. शिवभारतात मात्र शिवाजी महाराजांनी अफजलखानाला भवानी तलवारीने त्याच्या मस्तकाची दोन शकले करून ठार मारले असे लिहिले आहे. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा गुरु होता व नंतर तो गुरु नव्हता अशी डा. पवारांनी आपले मते बदलली ती शिवभारतामुळेच. एकच काव्य दोन पुरावे देते काय? शिवरायांच्या बाळंतपणासाठी जिजाउ नेमक्या कधी आल्या याबाबतची शिवभारतातील मते अनैतिहासिक आहे असे या काव्यग्रंथाच्या प्रस्तावनाकारानेच लिहून ठेवलेले आहे. काव्यग्रंथ इतिहासाचे मुख्य साधन नसते हे बलकवडे अद्यापही लक्षात घेत नाहीत हे दुर्दैव आहे.
दुसरे असे कि परत एकदा ते शिवाजी महाराजांचे दैवत परशुराम होते या ध्रुपदावर येतात. संभाजी महाराजांच्या बुधभुषण काव्यातील दशावतारांत परशुरामाचा उल्लेख ते छत्रपतींचे घराणे परशुरामाचे नेक भक्त होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आता परशुराम हा सहावा अवतार आहेच तर त्याचा उल्लेख दशावतारात येणारच, यावरुन संभाजी महाराजही परशुराम भक्त होते असा निर्वाळा ते कसा देवू शकतात हे त्यांनाच माहित. तसेच शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात असंख्य मंदिरांत जावून दर्शन घेतले आहे, जमीनी दान केलेल्या आहेत, अगदी याकुतबाबांनाही त्यांनी जमीनी इनाम लावून दिल्या आहेत, हे न सांगता ते फक्त परशुरामासाठी त्यांनी पुजाअर्चा-नंदादीपादि व्यवस्थेचाच तेवढा उल्लेख करतात यावरून त्यांचा कल शिवाजी महाराजांचे एकमात्र दैवत परशुरामच होते असे सिद्ध करणे हा आहे हे स्पष्ट आहे.

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...