Showing posts with label साहित्य-चर्चा. Show all posts
Showing posts with label साहित्य-चर्चा. Show all posts

Thursday, February 27, 2025

विद्रोह मेला आहे!

 “पारंपारिक विचार, सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हटले जाते. आपल्याकडील विद्रोही म्हणवणारे लोक मात्र विशिष्ट जाती धर्माला शिव्या देण्याला आणि निंदा करत राहण्याला विद्रोह मानतात. जे नवविचारांचे सैद्धांतिक सृजन करत समाज बदलवण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना विद्रोही मानणे अथवा अशा लोकांनी स्वत:ला विद्रोही समजणे हेच मुळात विद्रोहाचा अर्थ न समजल्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील विद्रोह कधीच मेला आहे.” ही पोस्ट मी फेसबुकवर पाच डिसेंबर २०२४ रोजी टाकली होती. त्यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. काही लेखकांशी प्रत्यक्ष भेटीतही चर्चा झाली. अर्थात या चर्चेचे निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्याचा आणि मी लिहिलेल्या पोस्टच्या मुख्य हेतूशी त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या विषयावर विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यापक विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने येथे विद्रोही साहित्य सम्मेलनाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 

गेला काही काळ जेथे अ. भा. मरठी साहित्य संमेलन असेल तेथे समोरच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्याची प्रथा पडलेली आहे. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात ज्यांना प्रवेश मिळालेला नसतो अशीच मंडळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात जातात” अशीही टीका यात सहभागी होणाऱ्या लेखकांवर होत आलेली आहे. दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक  एवढ्या दूर जाणे कसे परवडेल या विवंचनेत गोंधळलेले दिसले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे या वेळचे आयोजक सरहदचे संजय नहार यांनी मात्र अत्यंत वेगळी भूमिका घेतली. दिल्लीतील साहुत्य संमेलनात मराठीतील सारे ‘आवाज’ प्रतिध्वनित व्हावे म्हणून त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवातच अथवा शेजारीच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. तसे लिखित पत्रही दिले, पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पदाधिकाऱ्यानी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. “आम्ही अ. भा. साहित्य संमेलनाविरुद्ध असल्याने तुमच्याच मांडवात आम्ही कसे येणार?” अशा स्वरूपाचा प्रश्नही विचारला गेला.

 

१९९९ साली बाबुराव बागुल या प्रख्यात साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरले होते. तेव्हापासून या संमेलनाची परंपरा जवळपास अव्याहत आहे असे म्हटले तरी चालेल. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोडया दादांचे संमेलन आहे.” असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. हे पत्र हेच विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा बनले असे चळवळीतील मंडळी मानते. अर्थात त्यांना म. फुले यांच्या वरील विधानाचा सखोल अर्थ कधी नीट कळाला आहे असे जाणवत नाही. अखिल मानवांचे हित हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे व त्यापासून नुसते विद्रोहीच नव्हे तर अ. भा. साहित्य संमेलनानेही तो डोक्यावर घेत आपली भूमिका व्यापक करण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवाने अद्याप झालेले दिसून येत नाही. या अर्थाने पाहिले तर दोन्ही संमेलने घालमोडया दादांची आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नाही.

 

विद्रोह ही एक व्यापक संकल्पना आहे. गतकाळात जे झाले ते तसेच्या तसे पुढे चालवत राहतात वा तसा प्रयत्न करतात वा तेच चांगले होते असे मानतात ते प्रतिगामी असतात तर जे सतत स्वत:त आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक बदल घडवून आणतात त्यांना पुरोगामी म्हणतात. हे बदल कसे होत आहेत, त्यात अडथळे नेमके कोणते येत आहेत आणि कसा समाज घडवावा वाटतो याचे चित्रण करण्याचे काम व वर्तमान व भविष्यवेधी चिंतन-विश्लेषन करण्याचे काम विचारवंत करत असतात. त्यांना आपण पुरोगामी साहित्यिक व विचारवंत म्हणू शकतो. अखिल मानवजातीचे हित हाच सर्वांच्या चिंतनाचा, आचार-व्यवहाराचा पाया असला पाहिजे हे तर जागतिक मान्य वास्तव आहे. अर्थात त्यासाठी स्वत:त आमुलाग्र बदल घडवण्याची आणि अत्यंत संवेदनशिलतेने जगाकडे पाहण्याची आवश्यकता असते. मागील विचारवंत/साहित्य्यिक यांच्या आकलनात, सिद्धांतात, जीवनविचारांनाही आव्हान देत नव्या अभिनव कृती निर्माण करत अधिक व्यापक जीवन कवेत घेतात ते किंवा समाजविषयक पुढे नाणारे सिद्धांत व विचार जे मांडतात त्यांना विद्रोही लेखक-विचारवंत म्हणता येईल. हे अ. भा. साहित्य संमेलनालाही लागू पडते. परंतु वास्तव काय आहे? 

 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे की ही चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि विचारधारेचा पुरस्कार करते. परंतु म. फुले यांचे ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रापासून “प्रेरणा” घेत आजतागायत विद्रोही म्हणवणाऱ्या सहित्यिक-विचारवंतांची काय अवस्था आहे? त्यांचे विचार-साहित्य आणि त्यांचे वास्तवातील वर्तन यात किती साम्य आहे? अपवाद सोडले तर आपल्या हाती या निकषांवर चर्चा केल्यानंतर निराशाच हाती येईल. अखिल मानवांचे हित व्हावे असे तुमच्या ग्रंथांत काय आहे हा प्रश्न आजच्याही अखिल भारतीय संमेलनात सामील होणाऱ्या लेखक-कवींना विचारता येईल आणि त्याचे उत्तर आजही कोणाकडे आहे असे दिसत नाही.

 

समतावाद हा अत्त्यंत सुंदर शब्द आहे हे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. पण हा समतावाद केवळ जातीवर आधारित आपला गोतावळा गोळा करत असेल तर त्यांना समतावादी कसे म्हणता येईल? की एखाद्या वर्गाला, जातीला किंवा धर्माला आपल्या वंचनेचे कारण मानत त्यावर सातत्याने अनाभ्यासी टीका करत वर्तमानात आणि भविष्यात समता अस्तित्वात आणण्यासाठी आणि भविष्यातील समाज कसा असावा यावर अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय अंगानेही विचार करत नवी मांडणी करता येत नसेल किंवा आजवर करता आली नसेल तर त्याला ‘विद्रोह’ हा शब्द कसा वापरता येईल. हे वंचित राहू इच्छिणाऱ्या वंचितांचेच संमेलन आहे असे का म्हणता येणार नाही?   

 

शाहू, फुले आंबेडकर हे विद्रोही व पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळीचे आराध्य आहे व त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत ही मंडळी चालत असते. किंबहुना शाहू-फुले-आंबेडकरांचे हे पुरोगामी राज्य आहे असेही वारंवार, अगदी राजकीय पटलावरूनही उद्घोषित होत असते. महाराष्ट्रात सामाजिक चळवळी नव्या नाहीत. असे असूनही सामाजिक वास्तव मात्र वेगळे आहे आणि आज तर ते पार बदललेले आहे हे वास्तव स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची यांची तयारी आहे काय? समाजातील अगदी जातीभेद मोडण्याचीही क्रांती यांना करता आली नाही. किंबहुना अगदी जातीअंताच्या चळवळी करणार्यांच्या सभांतील वक्त्यांची आधी जात सांगितली जाते. हे कसले जातीअंत करण्याचे लक्षण आहे? जाते सोडा, पोटजातीन्चेही निर्मुलन ही मंडळी करण्यात घोर अपयशी ठरली आहे. मुळात विद्रोहाचा आधारच जर जात-धर्म असेल तर दुसरे काय होणार? महात्मा फुलेंनी व नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेसाठी अर्थ-सिद्धांत बनवत वंचित समाजसापेक्ष मांडणी केली होती. शाहू महाराजांनीही शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष क्रांती केली. आर्थिक उन्नती हा मानवाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या उद्गारास कारण ठरतो हे सर्वच शा.फु.आ. उद्घोष करणारे विसरून गेले. खरे तर शाहू, फुले आणि आम्बेडकरांच्या पुढे या मंडळीने एकही पाउल टाकले नाही, उलट मागे मागेच सरकत जात आपले नैतिक स्वास्थ हरपून बसल्याचे दिसून येईल. असे असतांना सर्व समाज शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा (म्हणजे समतावादी, अर्थवादी आणि भविष्यवादी) बनेल आणि या तिघांचे नाव घेतले तर आपल्या मागे येईल असा खुळचट विचार जन्माला येउच कसा शकतो.

 

हे कधी झाले असते? जर या चळवळीतील सामाविष्ट घटकांनी या तिघांना सोयीचे तेवढे न स्वीकारता त्यांच्या विचारांत आधुनिक परिप्रेक्षात भर घालून म. फुले म्हणाले त्याप्रमाणे अखिल मानवहिताची भूमिका घेत नवी साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती घडवण्यासाठी आपले विचार व लेखण्या झिजवल्या असत्या तर! केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन समाजातील एकाच विशिष्ट घटकाचे प्रतिनिधित्व करते, ते आपल्याला स्थान देत नाही म्हणून जर विद्रोही साहित्य संमेलन भरवले जात असेल तर मुळात हेतूच दांभिक असल्याने सामाजिक परिवर्तनात ते काही मोलाचा वाटा उचलू शकले असे आजवर तरी दिसले नाही. हे महात्मा फुलेंच्या अपेक्षेच्या विपरीत नाही काय? विद्रोही म्हणवणारे ग्रंथकार उदंड झाले...पखालींचे भारवाही झाले एवढेच काय ते म्हणता येईल.  

 

समाजात विद्रोहाची आवश्यकता असतेच. विद्रोह हा कोणत्या जाती-धर्म वा वंशाचा कोणत्यातरी अन्य जाती-धर्म किंवा वंशाविरुद्ध नसतो. विद्रोह आधी स्वत:विरुद्ध, आणि नंतर समाजातील जेही काही अनिष्ट आहे, कालसुसंगत वा प्रागतिक नाही त्याविरुद्ध असतो. विद्रोहाची संकल्पनाच जातीनिष्ठ करून टाकली गेल्याने काय अनर्थ झाला आहे हे कोणाच्या लक्षात येईल तो सुदिन.

 

आणि “प्रस्थापितांच्या, पुरुषवर्चस्ववादी, ब्राह्मणी, भांडवली. विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटीत कृती केली पाहिजे.” असे आमीन शेख (राज्य कार्यकारिणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे २०२३ च्या वर्धा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील एका लेखात म्हणतात. त्यांच्या विवेचनातील प्रत्त्येक मुद्द्यावर स्वतंत्र तात्विक्ज प्रतिवाद करता येईल, पण पुरुषवर्चस्वतावाद किंवा भांडवली व विषमतावादी व्यवस्था जर ब्राह्मणी (म्हणजेच वैदिक) संस्कृतीची उपज असेल तर ती इतरांनी कशी स्वीकारली आणि आजही ती तशीच्या तशी का आहे, त्याविरुद्ध स्वसमाजात कोणत्या समतावादी नव्या विचारप्रेरणा रुजवल्या हाही प्रश्न विचारता येईल. किंबहुना जी स्थिती ओढवली आहे तिचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय विवेचन तरी केले आहे काय हा प्रश्नही विचारता येईल. आणि भांडवली म्हणायचे तर मुळात जातीच व्यवसायांतून निर्माण झाल्या,  आपत्तीच्या काळात व्यवसाय सुरक्षित राहावेत, स्पर्धा होऊ नये म्हणून जाती बंदिस्त केल्या गेल्या. ही भांडवलशाही नव्हती काय? भांडवली व्यवस्थेविरुद्ध बोलायला साम्यवाद्यांना आवडते हे गृहीत धरले तरी साम्यवादाचे एकाधिकार भांडवली व्यवस्थेतच अंतत: रुपांतर होते हे साम्यवाद्यांच्या लक्षात येत नाही काय आणि अशी एकाधिकारशाही (म्हणजेच सरकारी) असलेली भांडवलशाही त्यांना स्वीकारार्ह आहे काय? साम्यवाद मानवी स्वातंत्र्याचे अपहरण करणारा सर्वात दुष्ट घटक आहे यावर त्यांनी कधी विचार केला आहे काय?

 

थोडक्यात विद्रोहीन्ना मुळात विद्रोहाची व्याख्या काय आहे हे समजावून घ्यावे लागेल. स्वत:च्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करावी लागेल आणि दिशा ठरवावी लागेल. अन्यथा त्याला केवळ विरोधासाठी विरोध असे रूप प्राप्त होईल आणि ते तसे होतही आहे.

 

अ.    भा. साहित्य संमेलन

 

वरील विवेचनाचा अर्थ असा मुळीच नाही कि अ. भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात सहभागी होणारे साहित्यिक मराठी समाजाच्या साहित्यिक जाणीवा वाढवण्यासाठी आणि वाचकांना विचार प्रगल्भ करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरले आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. गेली ९७ वर्षे सतत भरत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वाचक व नवे साहित्यिक घडवणे, काळानुसार बदलणाऱ्या साहित्यिक प्रेरणांचे अवगाहन करत आधुनिक काळातील बदलत असलेल्या अभिव्यक्तीच्या साधनांनाही पारंपारिक साहित्य प्रवाहात सामाविष्ट करून घेणे अशी कामे तर कधीच हातात घेतली नाहीत. संमेलनाला केवळ उत्सवी व दिखाऊ रूप राहिले. तात्विक-साहित्यिक वाद-विवाद होत व्यापक विचारमंथन होण्याऐवजी हा परस्परांचे उणे-दुणे काढण्याचा सोहोळा बनला. आजवरची साहित्य संमेलने अपवाद वगळता साहित्यबाह्य कारणांमुळेच गाजलेली आहेत. समाजापुढे नव्या साहित्य संकल्पना मांडण्याऐवजी गतकाळाच्या नावाखाली स्व-गुणगान गात बसण्याची कुप्रथाच यामुळे सुरु झाली. सामाजिक प्रश्नांशी आपले काही देणे-घेणे आहे याचे भान तर कधीच आले नाही. आले तर ते केवळ ठरावांपुरते बासनात बांधून ठेवण्यासाठी.

 

 

मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! या बाबतीत विद्रोही आणि अ.भा.म.सा.सं. हातात हात घालून चालतात असेच चित्र दिसून येईल. अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्याही विचारप्रभावात होऊ नये अशी अपेक्षा असली तरी तसे होत असते. कारण मुळातच साहित्यिक या जातीय वा प्रतिगामी विचारप्रभावांचे बळी असतात असेही साधारणपणे दिसून येईल. जातीयवाद लेखकांच्या विविध कंपुंत जसा आहे तसाच तो समीक्षकांमद्ध्येही आहे. किंबहुना कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करतांना अथवा करायला लावतांना त्यामागे जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक केवळ जातीय पाठबळ नसल्याने अथवा कोणा कंपुंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत हे आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी जातीय प्रेरणांनी ग्रसित असल्याने त्याचे प्रतिबिंब जसे त्याच्या साहित्यात पडते तसेच या सर्व साहित्यिकांच्या साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर "हे संमेलन ब्राह्मणी आहे..." असा आरोप पुर्वीपासुन होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला (खरे तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत आला आहे हे पाहता या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी पूर्वी होत असलेल्या संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतही उमेदवाराची "जात" हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असायचा हे गुपित राहिलेले नव्हते. आता केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणने किंवा नेमणे या आरोपातून कशी सुटका करायची हेही ठरवावे लागेल.

 

किंबहुना मराठी साहित्याची ब्राह्मणी, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. ओबीसींतील काही मोठ्या जातीही साहित्य संमेलन घेत आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली १५-१६ वर्ष भरत आले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलने होतात....यामागील सामाजिक व साहित्य प्रेरणा नेमक्या कोणत्या याचा अभ्यास कधी होईल?

बरे, हे काम करणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नाही हे महामंडळाचे म्हणणे मान्य केले तरी प्रश्न हा राहतोच की किमान अशा व्यापक समाज-साहित्यिक प्रश्नांवर विचारमंथन घडून येईल असे परिसंवाद तरी ठेवता येतील की नाही? आज जागतिकीकरणाने झपाट्याने जी सामाजिक  उलथापालथ होते आहे तिचे प्रतिबिंब साहित्य संमेलनात पडणार तरी आहे की नाही? किंबहुना साहित्यिक तरी त्यात पुढाकार घेत आहेत काय?

 

 

स्वसंतुष्टता ही साहित्यिकांची प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. कारण यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात तशी क्षमता आहे असेच दिसत नाही. त्यामुळे समाजमनावर आज या साहित्यिकांचा कसलाही व्यापक प्रभाव नाही.

 

साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.

 

थोडक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही दोषांपासून अलिप्त नाही. या संमेलनांतून काहीतरी भरीव निष्पन्न झाले आहे असा या संमेलनांचाही इतिहास नाही. मराठी साहित्य संस्कृती खुरडत चालली आहे याचे कारण नेमके यात आहे. म. फुले यांचे विधान अखिल भारतीय साहित्य साम्मेल्नानेही गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांचे हित होईल असे आमच्या साहित्यात अद्यापही काहीच का येत नाही, तेही पुराणपंथीच का राहते आहे? भविष्यवेधी साहित्यिक उद्गार आमच्याकडे क्वचितच का उठतात? वर्तमान आमच्या साहित्यिकांच्या कवेत का येत नाही? आम,ही आजही काही विशिष्ट व्यक्तींचे साहित्यिक देव्हारे उभे करून ते म्हणजेच साहित्यिक आणि त्यांनी लिहिले तेच साहित्य असे स्वत:च्या सोयीचे मापदंड का उभे करत आहोत?  जी. ए. कुलकर्णी यांनी सांगीतलेल्या एका बोधकथेचा मतितार्थ असा होता...”आम्ही विशिष्ट झाडाची उंची हाच मापदंड बनवून त्यापेक्षा उंच झाडांचे शेंडे छाटून टाकण्यातच धन्यता मानतो.”

 

माझ्या मते अखिल भारतीय साहित्य संमेलनही असेच करत आहे. बदलाची गरज आहे. परिवर्तन हा सृष्टीचा मुख्य गुणधर्म असेल तर नक्कीच. विद्रोही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही नाव सृजनाचा प्रोत्साहक घटक बनणार नसेल तर ती राहिली काय किंवा न राहिली काय, वाचकांना काय फरक पडतो.

 

दिल्ली येथे होत असलेले साहित्य संमेलन अनेक बाबीत बदल घडवून आणू शकते. विद्रोही साहित्य संमेलनाला स्वत: खुले निमंत्रण देऊन संजय नहार यांनी चांगला पायंडा पाडला होता. या निमंत्रणाचा स्वीकार झाला असता तर साहित्य क्षेत्रात एक नवी वाट बनू शकली असती, पण तसे हा लेख लिहीपर्यंत तरी झालेले नाही. हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. किमान येथेतरी साहित्यिक स्वमग्नतेच्या भूमिकेतून बाहेर पडत वैश्विक जरी नाही होऊ शकले तरी किमान राष्ट्रीय दृष्टीचे होतील ही अपेक्षा!

 

-संजय सोनवणी 

 

 

 

 

Sunday, November 24, 2024

SBOP Living, A guide to a meaningful life after 55/60


After the rise of globalization, the traditional Indian social system started changing rapidly. People's hopes, aspirations, and dreams, as well as their reasons for grief and worries also changed. Due to liberalization, people started having more money than ever before, and since money is for spending and investing, both ways the money started flowing in lavish purchases and investing in newly emerging profitable sectors. The economy started getting a boost like never before. At the same time, relationships also started changing rapidly. Families became smaller. People became more individualistic. The intimacy and closeness people felt before about family and society started decreasing. As the divorce rate increased, family feuds grew bringing overall discord, and the number of elderly men and women admitted to old age homes also increased. The overall chaotic scenario caused a kind of unrest in overall society. This was a new world and the questions posed by this world were also new, and since philosophers did not work as hard as they should have to find answers to them, this generation did not get a philosophy of purposeful living. We can see the possible consequences of this in the present.

Times have changed now. The challenges elders face are different because social and family norms have changed. The pace of life has increased more than ever. The young generation has also started dreaming independently. They are more eager to handle business and situations in their own way because the old methods do not suit them. So, to avoid misunderstandings and disputes, those who are now approaching the age of 55/60 need a new and consistent philosophy of life, to get a new hope of living, and to be able to spend happily their last days as they wish in a new direction, systematically leaving controls to their successors. Those who have seen the pre- and post-liberalization era needed to remove the mental confusion that occurred in this new world.

There is no shortage of books today that tell how to plan financially for old age, but there was a need to go beyond that and give a philosophy that guides how to spend old age in spiritual happiness to feel fulfilled while following hobbies and choices and living a worry-free and enthusiastic life while distributing the knowledge, skills and expertise with whatever possible monetary help and/or service and warmth they can provide to the needy sections of society. This most important task has been done skillfully by Dr. Sanjay Runwal's book ‘HOW TO LIVE LIFE?: SBOP LIVING FOR LIFE AFTER 55/60. This book is noteworthy and unique because Dr. Runwal has put forth his practical philosophy through a well-thought-out and self-invented scientific theory.

Happily, this book is neither spiritual nor a guide to financial planning. The author does not claim to be so. This book is written keeping in mind real life. Although this book is written keeping in mind the upper and uppermost middle class and high net worth individuals, it also guides the individuals of the middle class and the not-so-well-off sections who have reached the age of 55/60. Everyone can adopt the path suggested by Dr. Runwal by changing it to fit their own situation. The philosophy is flexible and every person from any group of society can adopt it by adding self-defined goals and ways of their choice to achieve them. This way book becomes a useful guide to all sections of society as everyone belonging to any segment of society can implement it to live a happy life after reaching 55/60 years of age. It is everyone’s inner need to live a purposeful life that can provide  happiness and a sense of fulfillment. The author suggests that those who have not achieved financial stability by that time can also follow the path of SBOP living to some extent or even a little later. If someone reads this book at a young age, they can plan for their later years in advance. This book provides the most needed practical guidance and philosophy for everyone in today's hostile and chaotic world.

SBOP stands for Systematic Blow Out Plan! This systematic blowout not only belongs to blowing money on oneself, but it also belongs to the systematic blowout of earned wisdom, knowledge, skills, and expertise on society to make the world more beautiful and harmonious. Dr. Runwal has invented and coined unique terminologies to theorize his philosophy. This book intends to make our society more social than individualistic. Rather it offers the means through which one can attain the most sought personal joy while caring for the overall society. This is the most beautiful philosophy we the Indians were waiting for that gives a practical roadmap to overall happiness. This is for the society that needs to be transformed into a melodious song. The books guide us to the future where the later years can be spent in purposeful engagement to complete the untouched things one always dreamt of. The message of this book is that all activities should be guided toward self and society-oriented tasks to find a purpose in life.

This is why Dr. Runwal strongly believes that society as a whole should be harmonious by creating a happy individual, and a happy family, and by doing good deeds for others to make a happy society. But the great feature of this book is that Dr. Runwal does not become a philosophist for this but presents his philosophy from a very practical perspective.

Modern sociologists complain that the challenges facing today's dynamic world are different and that people are rapidly becoming individualistic and their social orientation is decreasing. But where was the philosophy to address the emerging challenges before the generation on verge of the retirement? In such a situation, Dr. Runwal convinces us of the need to live for oneself, for one's family, and for society, at least after a certain age. This book provides a philosophy that helps achieve a balance between being social while they are individualistic.  

And this comes out from his personal experiences and experiments he conducted on his life. After retiring from a flourishing business, to find a new purpose for his life, he conducted many experiments on himself, and from that the philosophy of SBOP was born. He developed this philosophy scientifically combining many aspects of his theory together most cohesively and convincingly and has presented it in detail in this book. This is why this book is a valuable guide in the era of globalization.

A must read and to be implemented philosophy- SBOP Living!

-Sanjay Sonawani

HOW TO LIVE LIFE?:SBOP LIVING FOR LIFE AFTER 55/60

Author- Dr. Sanjay Runwal

Published by- Sanjay Runwal Foundation, Pune.

Price- Rs. 499/-


Wednesday, June 19, 2024

जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

 

प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

- डॉ. महावीर अक्कोळे

इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे ‌‘जैनांचे मराठी भाषेतील योगदान' हे नवे पुस्तक चिनार पब्लिशर्स पुणे व ‌‘सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम' यांनी प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक लक्षवेधी आहे. श्रवणबेळगोळ येथील शुध्द मराठीतला प्राचीन शिलालेख आणि अक्षी इथला महाराष्ट्री प्राकृतातला त्याही आधीचा शिलालेख आणि मध्ये भगवान गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीचा सुंदर चेहरा असे हे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेण्याबरोबर कुतुहलही जागृत करते.

मूलत: सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या व बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या संजय सोनवणी यांच्या प्रत्येक पुस्तकात ज्ञानाचा प्रचंड साठा खजिनाच वाचकाला मिळत असतो तसा तो याही पुस्तकात आहेच!

अतिशय सुबोध आणि रसाळ शैलीत सोनवणी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जैनांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा व ती लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या लेखनातून मानवी संस्कृतीची एकात्मता कुठलाही अभिनिवेष न बाळगता प्रकट होताना दिसते. त्यांना असणारे प्राचीन संस्कृती आणि त्यामधली चकित करणारी जीवनरहस्ये यासंबंधीचे अपार कुतुहल आणि त्यातून सुरू झालेली संशोधनयात्रा यातून हे पुस्तक आकाराला आलेले आहे. वाचकाच्या मनातसुद्धा हे छोटेखानी पुस्तक तेवढेच कुतुहल-जिज्ञासा निर्माण करते हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.

भाषा, लिपी व ग्रंथनिर्मिती याबाबतीत प्रस्थापितांकडून आजवर नकळत वा मुद्दाम रूजविल्या गेलेल्या व आपणसुद्धा लहानपणापासून शिकलेल्या अनेक (गैर) समजांना दूर करीत संजय सोनवणी यांनी काही धक्कादायक वास्तवे पुराव्यासह या पुस्तकात नोंदवली आहेत.

वर्तमान परिस्थितीत मराठीला ‌‘अभिजात भाषे' चा दर्जा मिळावा यासाठी मराठी साहित्य जगताचा, मराठी भाषातज्ञांचा आणि मराठी राज्यकर्त्यांचा आटापिटा चाललेला आपण गेली अनेक वर्षे बघतो आहोत. सोनवणी असे ठामपणे सुचवितात की ‌‘प्राचीन काळी जैनांनी लिहिलेल्या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्य कृती पाहिल्या तर मराठी अभिजात आहे याची खात्री कोणालाही पटेल.' पुढे ते अशी तक्रार करतात की, ‌‘तथापि आजच्या मराठी अभ्यासकांनी या साहित्याकडे दुर्लक्षच केले आहे.' माझ्या मते तर जैन मराठी अभ्यासकांनीही या प्रांताकडे दुर्लक्षच केले आहे. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ. विद्याधर जोहरापूरकर, माधव रणदिवे अशा काही मोजक्या जैन संशोधकानंतर प्रा.डॉ.गोमटेश्वर पाटील यांच्याशिवाय या विषयात फारसे स्वारस्य कुणी घेतलेले आढळत नाही. नव्या जैन अभ्यासक संशोधकांनी पुढे यायला हवे.

संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून तीच सर्व भाषांची जननी आहे असे आपण सर्वजणच लहानपणापासून ऐकत-शिकत आलेलो आहोत. पण भाषेच्या संशोधनातून पुढे आलेले निखळ सत्य असे आहे की संस्कृत भाषा ही प्राचीन मराठीच्या उगमानंतर कितीतरी उशीरा निर्माण झालेली भाषा असून तिच्यापासून मराठीच काय जगातील कोणतीही भाषा निर्माण झाली नाही हे आता जगातले जवळपास सगळे भाषातज्ञ मान्य करतात हे सोनवणी यांनी पुराव्यासह दाखवून दिलेले आहे. उलट प्राचीन प्राकृतातूनच संस्कृत भाषेची निर्मिती केली गेली असावी असे मानण्यास जागा आहे असे ते म्हणतात.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सोनवणी अगदी ठामपणे मांडतात ती ही की भारतातले तमाम सनातनी हिंदू आग्रहाने प्रतिपादन करीत असतात व आपणही लहानपणापासून शिकत आलो की वाल्मिकी रामायण हे पहिले (आद्य) रामायण आहे व बाकीची त्यानंतरची आहेत'- असे नसून प्राचीन ‌‘महाराष्ट्री प्राकृता' त लिहिले गेलेले जैन महाकवी विमलसुरी यांचे ‌‘पउमचरिय' हे महाकाव्यच आद्य राममहाकाव्य आहे. वाल्मिकी रामायण इसवीसन तिसरे ते पाचवे शतक या दरम्यान लिहिले गेले आहे तर विमल सुरींचे ‌‘पउमचरिय' हे रामहाकाव्य त्या आधी तीनशे ते पाचशे वर्षे म्हणजे इसवीसनाच्या चार साली लिहिलेले आहे. हे आश्चर्यकारक तथ्य सोनवणी संशोधकांच्या व भाषातज्ञांच्या संशोधनातून आलेल्या पुराव्यांच्या आधारे ठामपणे मांडतात. ‌‘अयोध्या' नगरीचे मुळ नाव ‌‘विनिय' वा ‌‘विनिता' हे होते व या नगरीची स्थापना प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यानीच केली. पुढे हे नाव ‌‘इक्ख्खागु' झाले व नंतर इसपू. सहाव्या शतकापूर्वी आयोध्येचे नाव ‌‘साकेत' (सागेय-साएय) हे कायम झाले. पुढे गुप्तकाळात साकेत हे नाव व्यवहारातून पूर्णपणे बाद होऊन ‌‘योध्या' हे नाव रूढ झाले ही माहिती आपल्याला आश्चर्यचकित करते.

या छोटेखानी ग्रंथात संजय सोनवणी आपल्याला आद्य राममहाकाव्य ‌‘पउमचरिय' बरोबरच पादलिप्ताचार्यकृत ‌‘तरंगवई', अज्ञात जैन लेखकाने लिहिलेल्या ‌‘अंगविज्जा', संघदासविरचित ‌‘वासुदेवहिंडी', आचार्य हरिभद्र विरचित ‌‘समरादित्यकथा' ‌‘धुर्ताख्यान', उद्योतनसुरि विरचित ‌‘कुवलयमाला' आणि कौतुहल विरचित ‌‘लीलावई' अशा प्राचीन मराठीत लिहिलेल्या एकाहून एक सरस साहित्यकृतींचा कथासूत्रासहित, वैशिष्ट्यांसहित अत्यंत रंजक परिचय करून दिला आहे.

खरे तर सोनवणी संस्कृतच्या प्रभावाखाली तयार झालेल्या प्राचीन मराठीच्या ‌‘महाराष्ट्री प्राकृत' या संज्ञेलाही मान्यता देत नाहीत. प्राचीन मराठीचे खरे आद्य नाव ‌‘मरहठ्ठी पाइय' वा ‌‘महारठी पाअड' असेच आहे असे ते दाखवून देतात.

एकंदरीत भाषेच्या अभ्यासकांसाठी, रामायणाच्या संशोधकांसाठी, खरा इतिहास जाणण्याची आस असणाऱ्यांसाठी आणि प्राचीन मराठी जैन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी संजय सोनवणींचे हे पुस्तक खूप महत्वाचे आहे. शेवटी एका अजैन इतिहास संशोधकाने प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा साधार पुराव्यासहित घेतलेला हा वाचनीय धांडोळा निदान वाचनाची आवड असणाऱ्या सर्व जैनांनी तरी आवर्जून वाचावा असाच आहे.

 

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

लेखक : श्री. संजय सोनवणी

प्रकाशक : चिनार पल्बिशर्स, पुणे व

सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम

पृष्ठे- 104, एप्रिल 2024

किंमत : 200/-

संपर्क : 8805530259

Monday, May 27, 2024

पुन्हा "कल्की"

 


मी लिहिलेली कल्की ही कादंबरी मराठीत प्रकाशित होऊन अनेक दशके झालीत. नंतरही खूप आवृत्त्या झाल्यात. मध्यप्रदेशात स्थायिक प्रसिद्ध लेखक व कवी विश्वनाथ शिरढोणकर यांनी या कादंबरीचा हिंदीत अनुवाद केला आणि तो २०२१ साली रवीना प्रकाशनाने प्रसिद्धही केला. मी या अनुवादाबद्दल कधी लिहिले नाही, कल्की कादंबरीचा इतिहासच तसा आहे.

ही कादंबरी मराठीत जेंव्हा प्रकाशित झाली त्यावेळेस सामना वृत्तपत्राने व सकाळने सिंगल कॉलम समिक्षणात त्यावर टीकेची झोड उठवली होती.

२००४ किंवा २००५ साली सुनील मोझर यांनी या कादंबरीचे नाट्य रुपांतर करून हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. कृपाल देशपांडे आणि अन्य कलाकारांनी हा प्रयोग स्पर्धेत सादर केला. भरत नाट्य मंदिर, पुणे येथे. कृपालसहित सर्व कलाकारांनी प्रयोगात जीव ओतला. मी हा प्रयोग पाहिला. आपल्या कादंबरीचे असे अफलातून नाट्यरुपांतर होऊ शकते यावर माझाच विश्वास बसला नव्हता. कृपालने तर अभिनयात कमाल केली होती.

प्रयोग झाल्यानंतर सामना पेपरमध्ये या नाटकाचे अर्धे पान परीक्षण आले. ते लिहिले होते मंगेश तेंडुलकर यांनी.

परिक्षण विरोधात होते हे ठीक आहे, पण गम्मत म्हणजे अवघ्या परीक्षणात तेंडुलकरानी त्या दोन हजार शब्दांच्या परीक्षणात ना लेखकाचे नाव लिहिले ना कलाकार-दिग्दर्शकाचे नाव लिहिले. असे कोणतेही परीक्षण आजतागायत माझ्या वाचनात आलेले नाही.

या नाटकाला कोंकणातील एका स्पर्धेत मात्र पारितोषिक मिळाले. तेवढेच दिग्दर्शक-कलावंतांना समाधान.

कल्की ही कादंबरी तथाकथित हिंदूच नव्हे तर सर्व धर्मियांना समूळ हादरवून टाकणारी होती. विश्वनाथ शिरढोणकरांना तिचा अनुवाद का करावा वाटला हे मी समजू शकतो. भविष्यात हिचे असंख्य भाषांत अनुवाद होतील ही अपेक्षा जरी असली तरी माझ्या मायभाषेत तिची अवहेलना केली गेली याचे शल्य कायम राहील. म्हणून मी या अनुवादाबद्दलही, तो उत्कृष्ठ आणि मुळाशी प्रामाणिक असूनही आजवर लिहिले नाही. आज वाटले म्हणून लिहिले एवढेच!

-संजय सोनवणी

Wednesday, November 29, 2023

विश्वनाथ



विश्वनाथ

-शंकर माने

मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. पैकी महत्वाकांक्षा , साहस, सदाचार, दुराचार, निंदा, रक्तपात आणि दहशत इत्यादी पैलू सर्रासपणे कित्येक वेळा पाहिल्या जातात आणि त्यांचा अनुभव हि घेतला जातो. जसे जसे माणसाच्या कामाची व्याप्ती वाढत जाते, जसे त्याचा व्यक्तीसंपर्क वाढतो तसे तो त्या कामात प्रगल्भ होत जातो आणि जीवनाचे अगणित पैलूंचाही साक्षात्कार त्याला होत राहत असतो. मानवी जीवन एक झंझावात असतो ज्यात त्याने संघर्ष केलेला असतो , तडजोडी केलेल्या असतात आणि अशक्य गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टाहि केलेली असते.

एकंदर मानवी जीवनाचा प्रवास जन्मापासून मृत्युकडे वाटचाल करीत असताना त्यात अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या असतात. महात्वाकांक्षा माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. ध्येय नसेल तर जीवनाचा अर्थ काय?
मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिलेली "विश्वनाथ" हि कादंबरी अशाच एका मानवी जीवनाच्या प्रवासावर आधारित आहे जी आपल्याला या पैलूंचा साक्षातकार घडवते.
हि कथा अतिशय उत्कंठावर्धक असून वाचताना पुढे काय होईल आणि होऊ शकते या प्रश्नांवर आपल्याला ती खीळवून ठेवते.
गुन्हेगारी विश्वातील अनेक पात्रांचा समावेश व त्यांच्या रक्तरंजित कुकर्मांचा परिचय आपल्या मनाचा थरकाप उडवून देतात. अंडरवर्ल्ड क्षेत्रातील दिगग्ज एकमेकांच्या साथीने जगभरातील दहशतवाद कसे बोकाळु शकतात आणि त्यांना राजकारणी लोक कसे साथ देऊ शकतात याचीही प्रचिती प्रस्तुत कादंबरी तुन येऊ शकते.
विश्वनाथ नावाचा "डॉन" याचा झंजावात , त्याने दाखवलेले प्रसंगसावधान, शून्यातून निर्माण केले विश्व आणि ते टिकवण्या साठी त्याने दिलेली झुंज अतिशय उत्कंठा वर्धक आहे. वयाच्या उतरत्या काळात विश्वनाथला जीवनाचे उमगलेले रहस्य ही गोष्ट या कथेची उजवी बाजू असून या क्लायमॅक्स मुळे या कादंबरीला झळाळी प्राप्त झालेली आहे.
सोनवणी सर यांनी लिहिलेली हि कथा मराठी विश्वात अतिशय नाविन्यपूर्ण आहे. अतिशय समर्पक अशी कथेची मांडणी केलेली असून वाचताना एखादा गॅंगवार , गँगस्टर , माफिया च्या जीवनावर आधारित चित्रपटच पाहत आहोत असे वाटते. या कादंबरीत लेखकाने अनेक दृष्ये जिवंत केलेली आहेत . मग ती हिंसक दृश्ये असो कि रोमँटिक दृश्ये कि दुःखदायी प्रसंग असो !
या कथे मध्ये मला अनेक दृष्ये आवडली. -पैकी एक दृश्य इथे देत आहे.
".....तो जयंतला शांत स्वरात म्हणाला होता, 'मुला, महत्वाकांक्षा प्रत्येकात असते; पण ती पूर्ण करण्यासाठी जे बौद्धिक व शारीरिक सामर्थ्य हवं असतं ते प्रत्येकात नसतं. निसर्गानेच हि व्यवस्था केली आहे. सारेच एकाच सामर्थ्याचे असतील तर पृथ्वीवर एकही माणूस शिल्लक राहणार नाही. काही माणसं आज्ञा देण्यासाठी जन्माला येतात, तर काही आज्ञा पाळन्यासाठी. विश्वनाथांमध्ये जे आहे ते प्रत्येकात असू शकत नाही. श्रेष्ठत्व कर्तृत्वावर ठरतं. आज विश्वनाथ हा स्वयंप्रकाशीत सूर्य आहे. त्यांना कोणीही काही शिकवलं नाही. ते स्वतःच शिकले. त्यांनी स्वतःचं आपलं तत्वज्ञान बनवलं आणि समर्थपणे राबवलं. विश्वनाथाना ठार मारून कोणी विश्वनाथ बनु शकणार नाही. अशी व्यक्ती पुनः पुनः जन्माला येत नाही .."
नक्की वाचा
विश्वनाथ
लेखक: संजय सोनवणी
सुपर्ण प्रकाशन

जनकोजी शिंदे

       दत्ताजी शिंदेचा बुराडी घाटावर मृत्यू झाला याच्या पेशवे दरबारीही तीव्र प्रतिक्रिया उमटली . तरीही १४ मार्चपर्यंत अब्दालीला रोखण्या...