Showing posts with label In News. Show all posts
Showing posts with label In News. Show all posts

Sunday, November 25, 2018

शबरीमलाला पुन्हा जाणारच! - तृप्ती देसाई



पुणे- केरळ प्रशासनाने मला कोची विमानतळावरुनच परतायला भाग पाडले असले तरी मी पुन्हा केरळला जाणार असून शबरीमला देवस्थानात प्रवेश करुन अय्यप्पाचे दर्शन घेणारच. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात स्त्रीयांना प्रवेश नाही असे कोणत्याही देवाने सांगितलेले नाही. घटनेने दिलेल्या मानवी स्वातंत्र्याच्या कक्षेत स्त्रीयांचे प्रार्थनास्वातंत्र्य परंपरेच्या नांवाखाली नाकारले जाणे हा केवळ न्यायालय व घटनेचा अवमान नाही तर खुद्द देवांचाही अवमान आहे असे मत शबरीमला आंदोलनात सहभागी असलेल्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्या आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या "शबरीमला: महिला स्वातंत्र्य आणि संविधान" या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होत्या. या परिसंवादात ज्येष्ठ लेखक-संशोधक संजय सोनवणी, युवा विचारवंत सतीश पानपत्ते, गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे व अनन्या कडले यांनी सहभाग घेतला.
केवळ केरळ प्रशासनाने पुकारलेल्या असहकाराच्या धोरणामुळे आपल्याला कोची विमानतळावरुनच कसे परतावे लागले याचे अनुभव सांगत देसाई म्हणाल्या की हा आस्थेचा विषय नसून त्या नांवाखाली राजकारणाचा विषय बनवला गेला आहे आणि संघाची पुरुषसत्ताकवादी सनातनी विचारधारा त्यामागे काम करत आहे. आपण या प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणारच असून आदिम हिंदू महासंघाने घेतलेल्या स्त्रीस्वातंत्र्यवादी भुमिकेचे त्यांनी स्वागत केले.
संजय सोनवणी म्हणाले की आठशे वर्षांपुर्वी ज्या दैवताचे अस्तित्वही नव्हते त्या देवाचे मार्केटिंग करण्यासाठी वैदिक पुरोहितांनी भाकडकथा रचत महिलाबंदी लादली आणि भोळ्या भाविकांनी ती स्विकारली. वैदिक अथवा हिंदू धर्मशास्त्रांत रजोदर्शनास अपवित्र अथवा त्या काळात अस्पृष्य मानले गेलेले नाही. हिंदू धर्मात प्रथमपासून स्त्रीयांना समतेचे स्थान आहे, पण ते पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीच्या प्रभावात खालावले गेले आणि स्त्रीयांवर अतोनात बंधने लादली गेली. या वैदिक प्रभावातून मुक्त होत हिंदूंनी स्त्रीयांचे बरोबरीचे स्थान मान्य केले पाहिजे आणि त्यांच्या स्वातंत्र्याची महत्ता जपली पाहिजे.
सतीश पानपत्ते यांनी शबरीमला मंदीरांत महिलांना प्रवेश द्यावा या सुप्रिम कोर्टाच्या घटनात्मक भुमिकेचे स्वागत केले आणि म्हणाले की महिला स्वातंत्र्य हा केवळ सामान्य समजदारीचा विषय असून सामान्य धर्मस्थानांच्या कथित परंपरागत नियमांना संविधानिक मुल्ये व कायदे बाद ठरवत असतात. “परिवर्तनशील आणि कालसुसंगत हिंदूहितवाद” या प्रवाही विचारात आपण भेदभाव सोडुन बदल स्वीकारले पाहीजे. “सतिप्रथा, बालविवाह” या परंपराच होत्या पण आपण त्या सोडल्या! हा प्रवाहीपणा जतन झाला नाही तर हिंदू धर्माचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होईल.
गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे, व अनन्या कडले यांनीही स्त्रीयांचे खालावलेले सामाजिक स्थान, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लिंगभेदाच्या जाणीवांतून केला गेलेला संकोच आणि त्यातून होत असनारी घुसमट आपल्या भाषणांतुन व्यक्त केली. गणेश अटकाळे यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले.

Thursday, December 18, 2014

Quota benefit....

Quota benefit should be given to only 2 generations: Activist

Dhaval Kulkarni (DNA)

SC recently struck down state’s decision to grant 16% quotas to Marathas. Social activist and writer Sanjay Sonawani, who had opposed the move, said this could serve as a check on appeasement politics. Sonawani, who spoke to dna’s Dhaval Kulkarni, said reservation policy needed a drastic re-look.

 How would you react to the judgment?

 It was expected. HC too had pointed to how crossing the 50% ceiling on quotas would not be correct. Politicians were playing on youths’ emotions.

How do you eradicate backwardness among Marathas?


Reservation is not the panacea. Privatisation of education is on the rise even as quality is falling. Graduates do not know even the basics. It’s necessary to focus on professional courses. Government’s share in jobs is declining and it’s not possible for it to absorb all youngsters. It must give the poor fee concessions, fund agriculture and linked businesses. Youths must be encouraged to become entrepreneurs and take up farming. Reservations should only be for the helpless. The demand for quotas has led to rise in disputes between reserved and non-reserved categories. This vitiates the social environment.

How would SC decision affect state?

It will stop demand for reservations and the ability of rulers to give assurances on it. The decision on Maratha quota did not pass muster despite the overwhelming presence of Marathas in (previous) government. A fallout, however, could be anger mounting among Maratha youths. I won’t be surprised if Maratha leaders, who were willing to go a notch down in the caste hierarchy for quota benefits, turn a full circle and go back to their original stand of opposing all quotas.
Decision on quota had led to demands from other sections.
That decision had caused anger against Marathas, and amounted to Congress/NCP shooting itself in the foot. OBCs migrated to BJP because they (who fall in the creamy layer) would have had to compete in the open category, and the new quota had reduced their space.

Does reservation policy merit a re-look?

Yes. Only two generations of those in reserved categories must get its benefits; third generation must be asked to compete in open category. This will ensure the welfare of those who are really backward. Surveys on communities must be held afresh and should involve anthropology professors. The results of caste and economic census must be published.

Published Date: Dec 19, 2014

 http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=74098&boxid=35356&ed_date=2014-12-19&ed_code=820009&ed_page=3#.VJOPKm3C3tA.facebook

Sunday, March 2, 2014

मंदिरांतील पुरूषसूक्ताचे पठण बंद करा!


भारतीय समाजात उच्च-नीचतेचे परिमाण रुजवणारी हिडिस व्यवस्था निर्माण या सूक्तापासून झाली. हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणारे सूक्त असून त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्ताच्या सर्वच मुळ ऋचा आणि त्यांचा खालील अनुवाद पहा.

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्।स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥ १०.०९०.०१
अर्थ: पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.


पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥ १०.०९०.०२
अर्थ: पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, ते अद्भुत त्याचे आहे, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.

एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः।पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥ १०.०९०.०३
अर्थ:ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.

त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः।ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि॥ १०.०९०.०
४अर्थ:तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.

तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः।स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः॥ १०.०९०.०
५अर्थ:त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत।वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः॥ १०.०९०.०
६अर्थ:देवतांनी पुरुषाला यद्न्यात बळी दिले. त्यात (यद्न्यात) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः।तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥ १०.०९०.०७अर्थ:पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम्।पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥ १०.०९०.०८
अर्थ:या वैश्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातुन पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे।छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥ १०.०९०.०९
अर्थ:या वैश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची आणि छंदांची निर्मिती झाली.

तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः।गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥ १०.०९०.
१०अर्थ:त्यातुनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥ १०.०९०.११
अर्थ: देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥ १०.०९०.१२
अर्थ: तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत।मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥ १०.०९०.१३अर्थ:चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासुन सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासुन तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले.

नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत।पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥ १०.०९०.१४
अर्थ:त्याच्या बेंबीपासुन हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून प्रुथ्वी, त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.

सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः।देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम्॥ १०.०९०.१५
अर्थ:देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधुन (यद्न्यीय पशु मानुन) बळी दिला.

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः॥ १०.०९०.१६
अर्थ:हा आद्य यद्न्य व बळी होता. या देवतारुप शक्तींनी आकाश व्यापले...त्यांचे आम्ही महिमान गातो...कोठे आहेत पुर्वीचे साध्यस आणि देवता?

हे असे आहे पुरूषसूक्त. याचा शिव, विठ्ठल आणि अन्य सर्वच मुळात अवैदिक असलेल्या हिंदू देवतांच्या पुजेचा काय संबंध आहे? तरीही वैदिक धर्मिय हिंदू धर्मात घुसून देवदेवतांच्या पुजेच्या वेळीस हे सूक्त म्हनतात. एकापरीने हिंदू देवतांचा आणि हिंदुंचा अपमान करतात. हे सूक्त वैदिकांनी त्यांच्या यज्ञांत खुशाल म्हनावे...मुलात याची निर्मितीही यज्ञाशीच सम्बंधित आहे. हिंदुंच्या मुर्तीपुजेशी त्याचा दुरान्वयानेही काहीएक संबंध नाही. अशा स्थितीत या सूक्तावर व पुजा प्रसंगी म्हटल्या जाणा-या काही फुटकळ ऋचांवर बंदी घातली पाहिजे. हे वैदिक मंत्र हिंदुंच्या पुजेत म्हटले जाण्याला सर्वांनीच विरोध केला पाहिजे. 


Sunday, August 26, 2012

तिरस्काराच्या पलीकडे..

वाचावे नेट-के : तिरस्काराच्या पलीकडे..Bookmark and SharePrintE-mail

सोमवार, १६ जुलै २०१२
आम्ही जे सांगतो आहोत ते सत्यच आहे, असा समज कुणाचाही असू शकतो आणि ब्लॉगजगतात या समजाचे विविध आविष्कार दिसतात. त्यापैकी जे आग्रही दावे केवळ स्वत:बद्दल किंवा आप्तस्वकीयांबद्दल असतात, ते निरुपद्रवी मानून वाचक पुढे जातो.
पण समाजाबद्दल किंवा भारतीय- महाराष्ट्रीय समाजरचनेत आजही ठसठसणाऱ्या ‘जाती’ या विषयाबद्दल असे ‘आपलंच खरं’ मानणारे आग्रही दावे कुणी ब्लॉगवर करत असेल, तर त्यामागचा हेतू केवळ सत्यकथनाचा आहे की उपद्रवी विधाने करण्याचा, असा प्रश्न वाचकाला पडतो. उदाहरणार्थ, एखाद्या वाचकाला, ‘अब्राह्मणी’ ही संकल्पना व्यापक अर्थाची आहे हे पटत असेल, तरीही त्याला अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर ‘अब्राह्मणी’ या संकल्पनेचं जे स्तोम माजलेलं दिसतं, ते पटणार नाही. ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ हेच सत्य असल्याचा आग्रह अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरच्या अनेक (बहुतेक) नोंदींचा पाया आहे. ‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी. ही खात्री पटलेल्या वाचकांचे मग दोन तट पडतात : पहिला, ‘होय- तिरस्कारणीयच’ असा पवित्रा घेतो. दुसरा- आपल्यावरच तिरस्काराचा हल्ला झाला आहे असं समजून प्रतिहल्ल्याची तयारी करू पाहतो. स्वत: ब्लॉगलेखक वा लेखिकेला हा तिरस्कार हवाच असतो का, पसरवायचाच असतो का, याबद्दल संबंधित लेखकांनी जरूर बोलावं, पण अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरल्या प्रतिक्रिया पाहिल्या असता- ‘तिरस्काराच्या भावनेची चाहूल ब्लॉगलिखाणातूनच लागल्यामुळे पडलेले दोन तट’ आणि त्यानुसार प्रतिक्रियांचेही दोन प्रकार- हे उघडपणे दिसेल.
तिरस्कारजनक किंवा तिरस्कारजन्य प्रतिक्रिया संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर कमी दिसतात, याचं कारण त्यांच्या ब्लॉगवरलं लिखाण. ते सहसा केवळ तिरस्कारवादी किंवा तुच्छतावादी नसतं. आपण सगळेचजण आपला इतिहास समजून घेऊ.. ‘हे म्हणजे इतिहास’ एवढंच जे तथाकथित मुख्य धारेतल्या शैक्षणिक संधींनी आपणा सर्वाच्या माथी मारलंय त्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण कसे होतो हे पाहू, असा त्यांच्या ब्लॉगचा हेतू असावा असं नोंदींमधल्या विविध संदर्भामुळे लक्षात येत राहतं. म्हणजे या ब्लॉगची बैठक ही अभ्यासकाची आहे. शोधकाची आहे. त्यांच्या ब्लॉगचा हेतू केवळ इतकाच नाही. सोनवणी हे प्रकाशन-क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या स्वलिखित पुस्तकांची संख्याही भरपूर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. छापील माध्यम हाती असताना ब्लॉगसारखं संवादमाध्यम वापरून, चर्चा घडवून आणण्याकडे या ब्लॉगचा कल दिसतो. सभासदसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे चर्चा होतेसुद्धा. अगदी ‘शेतमालाचे निर्जलीकरण’ या विषयावरसुद्धा दिल्लीच्या प्रताप नलावडे यांनी ‘तापमान १४० हे चूक- फारतर १२० तापमान हवे’ अशी- म्हणजे ‘दाद- वाहवा’च्या पलीकडची प्रतिक्रिया दिली होती.
या ब्लॉगला दाद मिळते, पण ती अभावितपणे. संजय सोनवणी हे मनस्वी लेखक आहेत आणि ते एकटे आहेत की एखादी टीम संजय सोनवणींचा ब्लॉग लिहिते असा प्रश्न पडतो, असा अभिप्राय संभाजी घोरपडे यांनी ११ जुलै रोजी दिला होता.  ‘मनस्वी’ हा शब्द फार गुळगुळीत झालेला वाटेल, पण सोनवणींच्या ब्लॉगवरले लिखाण कसं असतं आणि ते तसंच का असते, हे समजून घेण्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. सोनवणी यांच्या लिखाणात अभ्यास, संकल्पना आणि व्याख्या यांची समज, पुरोगामित्वाच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि बुद्धिनिष्ठच राहण्याचा प्रयत्न हे सारे दिसत असले तरीही मध्येच साप, वांझ, षंढ.. असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात. हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे.
लिखाणात एकतर मनस्वीपणा असू शकतो किंवा अभ्यासूपणा तरी. या दोन्ही तलवारी संजय सोनवणी यांच्या ब्लॉगमध्ये एकाच म्यानात दिसतात. बऱ्याचदा अभ्यासू लिखाण इतकं असतं की, या नोंदी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनं एखाद्या शिक्षकाकडून घेतलेल्या नोट्स- आहेत, असा भास व्हावा. पाणिनी आणि त्याचा काळ याबद्दलचं सोनवणी यांच्या ब्लॉगवरचं लिखाण हे असंच नोट्सवजा आहे. ब्लॉगनोंदीच्या साधारण कल्पनीय आकाराच्या मानानं ते बरंच लांबलचकही आहे. पण सोनवणी यांना अखेर एक निष्कर्ष मांडायचा आहे किंवा असलेल्या निष्कर्षांची बाजू घ्यायची आहे. ती बाजूच खरी, असा त्यांचा आग्रह नाही. उलट, ही माझी बाजू आहे आणि त्यावर तुम्ही चर्चा करू शकता, असं आवाहन त्यातून वाचकाला मिळू शकतं आणि अनेक वाचक ते घेतात, असं प्रतिक्रियांची संख्या आणि सूर यांवरून दिसून येतं.
संजय सोनवणी यांचा ब्लॉग हा ‘यशस्वी’ ब्लॉगपैकी एक आहे. सोनवणी यांचे लेख अन्यत्र (दैनिकं, दिवाळी अंक) छापून येत असले, तरी ते इथे तसेच्या तसे डकवण्याचा उद्योग कमी आहे. आठवडय़ातून जवळपास तीन नोंदी, एवढय़ा संख्येनं वाचनसंधी देणारा हा ब्लॉग आहे. इथे विषयांचं वैविध्य असलं तरी ‘खऱ्या’ पुरोगामित्वाच्या शोधात सोनवणी आहेत आणि त्यांचा ब्लॉगयज्ञही त्यासाठीच आहे, अशी वाचकाची धारणा झाल्यास हा ब्लॉग वाचनीय ठरू शकतो. आजच्या पुरोगाम्यांचा धिक्कार करण्याची जी कारणं सोनवणी यांच्याकडे आहेत, ती एरवी पुरोगाम्यांना हास्यास्पद अथवा दुष्ट ठरवणाऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत.
अगदी ताज्या, अलीकडच्या तीन नोंदींमध्ये परमेश्वर, धर्म आणि आनंद-दु:ख यांच्यावरचे विचार सोनवणी यांनी मांडले आहेत. हे विचार फक्त त्यांचे अर्थातच नाहीत. ते संस्कृतीचं आणि विचारधनाचं सार आहे.. त्यातून सोनवणी यांनी अमुकच का वेचलं, याचं स्पष्टीकरण त्यांच्या लिखाणातून मिळतं, हा त्या लिखाणाचा गुणच आहे. मात्र, शैलीदृष्टय़ा या तीन नोंदींकडे पुन्हा एकवार कुतूहलानंच पाहावंसं वाटेल. फेसबुकवरचा चटपटीतपणा, ट्विटरवरली शब्दमर्यादा या सर्वाची उगाच आठवण समजा या तीन नोंदी वाचताना झाली, तर याच नोंदींबद्दल अशी काळजीही वाटू लागेल की, ‘हे आता कुणीतरी मेलवर ‘फॉरवर्ड’ वगैरे करणार की काय?’  ‘कल्ट’ ठरण्याचा- पंथाभिमानाचा धोका संजय सोनवणी यांच्या ब्लॉगला आहे आणि तो लेखकामुळे नसून उत्साहीपणे किंवा आपले आग्रही दावे या ब्लॉगवर लादून इथल्या नोंदी वाचणाऱ्या वाचकांमुळे आहे.. हा धोका या नोंदीपासून सुरू झाला आहे, हे आत्ताच या ब्लॉगची दखल घेण्याचं एक निमित्त. स्वत: भरपूर ब्लॉगिंग करणाऱ्या सागर भंडारे यांनी या ब्लॉगची शिफारस केली होती.
अभिनवगुप्त

Sunday, June 12, 2011

वाघ्याचे स्मारक...इतिहास आणि समाज!

(This article is published verbatim in daily Lokmat, all editions on 12th June 2011.)

http://epaper.lokmat.com/ArticleText.aspx?article=12_06_2011_006_001&mode=1


इमानी, रक्षक मानल्या गेलेल्या एका कुत्र्याचे स्मारक हे एका संघर्षाचे कारण बनु शकेल असे कोणालाही वाटले नसते पण ते तसे झाले आहे खरे. संभाजी ब्रिगेडने ६ जुनपुर्वी शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवले नाही तर ते आम्ही उद्द्वस्त करू असा इशारा दिला अणि एरवी राखणासाठी कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या मराठी समाजाला वाघ्याच्याच स्मारकाच्या रक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाण्याची घटना पहावी लागली. का तर ब्रिगेडी इतिहासकारांचे दावे!

काय होते हे दावे? तर दावा १) शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाही, तसे लिखित पुरावे नाहीत. २) वाघ्या कुत्रा हा नाटककार राम गणेश गडकरींच्या कल्पनेतुन निर्माण झालेले पात्र असून त्यांनी राजसंन्यास या त्यांच्या अपुर्ण नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा प्रथम उल्लेख केला आहे. ही गडकरींची विक्रुती आहे. ३. शिवस्मारकासमोरील ज्या चौथ-यावर वाघ्याचा पुतळा बसवला गेला आहे तेथे सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची मुळ समाधी असली पाहिजे. त्यांचा अवमान करण्यासाठी ब्राह्मणांनी (म्हणजे श्री. न.चिं.केळकरादि) मुद्दाम तेथे कुत्र्याला आणले. ४. वाघ्या कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणुन तो शिवकालीन असू शकत नाही. ५. वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे, सबब हा जाणीवपुर्वक केला गेलेला शिवरायांचा अवमान आहे. हे सारे मुद्दे लक्षात घेता हे वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, ते न हटवले गेल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या "पद्धतीने" ते उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला गेला. त्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एक नवे वादळ उठले.

येथे या वादळांत वा विवादांत न जाता, मी व माझे मित्र श्री. हरी नरके यांनी या संदर्भात सखोल संशोधन करून जे पुरावे मिळवले ते सर्वच ब्रिगेडी दाव्यांना धुडकावून लावणारे आहेत हे सिद्ध केले. शिवचरित्रात वाघ्या कुत्राचे स्थान नाही हा दावा निखालस खोटा असल्याचेही पुढे सामोरे आले. एवढेच नव्हे तर या स्मारकासाठी व शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला व श्री महादेव जानकर यांनी संभाजी ब्रिगेडला त्यांच्याच भाषेत इषारा दिला. शेवटी ब्रिगेडने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. कदाचित ब्रिगेडला मिळालेला हा पहिलाच घरचा आहेर असावा.

पुरावे सांगतात कि, सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, म्हणजे ती रायगडावर असू शकत नाही. कारण त्यांचा म्रुत्यु सन १६५९ मद्ध्ये झाला होता. आजही त्यांचे स्मारक राजगडावर आहे. वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे पुतळाबाईंची समाधी असू शकत नाही कारण सतीची समाधी बांधण्याचा मुळात प्रघात नाही. त्यांची सती-स्मारक शीला रायगडावर आजही अस्तित्वात आहे. सोयराबाईंचे ते स्मारक असल्याचा कसलाही पुरावा आस्तित्वात नाही. मुळात सोयराबाईंचा म्रुत्यु कसा आणि कधी झाला याबद्दल इतिहासात मतैक्य नाही.

राहिला प्रश्न वाघ्याचा. तो इतिहासात होता कि नाही याचा. वाघ्या ही एक दंतकथा आहे असे मानण्याकडे कल आहे. कै. राम गणेश गडकरींनी आपल्या राजसंन्यास या नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख केला आहे व ती दंतकथा आजही वाघ्याच्या स्मारकावर कोरलेली आहे. पण राजसंन्यासपुर्वीच १९०५ साली "महाराष्ट्रातील किल्ले" या पुस्तकात श्री. चिं. ग. गोगटे यांनीही वाघ्याची दंतकथा नोंदलेली आहे. त्यात महाराजांची पालखी परततांना मोकळी जात असलेले पाहुन वाघ्याने अस्वस्थ होवून जळत्या चीतेत उडीघेवून प्राणार्पण केले असे नोंदलेले आहे. म्हणजे त्यांनीही वाघ्याची दंतकथा कोठे तरी ऐकलेली होती. दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे असे मानले तरी दंतकथांना सत्याचा काहीएक तरी आधार हा असतोच. लोकस्म्रुती या पीढ्यानुपीड्या इतिहास संक्रमित करत राहतात. कालौघात त्यात अतिशयोक्तीही होत जाते. रामायण-महाभारतातही अशी अतिशयोक्ति आपण पाहू शकतो. ही अतिशयोक्ति वगळुन इतिहास पहाता येवू शकतो. म्हणजे वाघ्या नव्हताच असे म्हनता येणे अशक्यप्राय होते. भले त्याने चीतेत उडी घेतली नसेल...

पण इतिहास असा सहजी हुलकावण्या देत नाही. छ. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता याचा पुरावा त्यांच्याच हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध झाला. त्याची हकीगत अशी: सन १६७८ मद्धे महाराजांनी दक्षीण दिग्विजय करुन परततांना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला होता. तिथला ठाणेदार येसाजी देसाई मराठ्यांकडुन मारला गेला. पण त्याची पत्नी मल्लाबाईने हार न मानता युद्ध सुरुच ठेवले. यात शेवटी तिला तह करावा लागला, पण शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलाच्या दुधभातासाठी परत दिले आणि पतीच्या म्रुत्युनंतरही ती लढली म्हणुन तिला सावित्रीबाई हा किताब दिला.

ही आठवण कायमस्वरुपी रहावी म्हणुन सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या बाजुनेच झेपावत निघालेला आहे.

हे शिल्प बोलके आहे. शिवरायांच्या जीवनात कुत्रा होता, तो त्यांना प्रिय होता हे उघड आहे. अन्यथा त्याचे त्या छोट्या शिल्पात स्थान असण्याचे कारण नव्हते.

शेवटी असे कि, मुळात शिवरायांच्या स्मारकाकडे लक्ष द्यायला खुद्द त्यांच्याच वंशजांकडे वेळ नव्हता. महात्मा फुले यांनी शिवसमाधी प्रयत्नपुर्वक शोधली, एवढी तिची विटंबना झाली होती. भोसले नामक कोणा एका ग्रुहस्थाने १८७५ साली धनलोभाने महाराजांच्या समाधीत खोदकाम करण्याचा उपक्रम केला होता. अशा स्थीतित पुढे शिवस्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला तो लो. टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी. टिळक-शाहु वादामुळे शाहू महाराजांनी टिळकांच्या या प्रयत्नांना दाद दिली नाही. पुढे मदतीला आले ते सवाई तुकोजी होळकर. त्यांनी रु. ५०००/- ची शिवस्मारकासाठी मदत दिली व उर्वरीत पैशांतुन शिवस्मारकासमोरील उध्वस्त चौथ-यावर वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनवले गेले.

हा झाला इतिहास. आता शिवरायांच्या इतिहासात कुत्रा होता हे स्पष्ट आहे. आता वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे शिवरायांच्या एकाही पत्नीचे स्मारक असल्याचा एकही पुरावा, अगदी ब्रिगेडकडेही, नाही. या स्मारकाला दान देणारे तुकोजी होळकर. गेली ८५ वर्ष वाघ्या उन्हा-तान्हात तेथे इमान आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक म्हणुन आहे. धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे आणि म्हणुनच तुकोजींनी वाघ्याचेही स्मारक करायचे घाटले. यात कोणता ब्राह्मणी कावा आहे? यात शिवरायांचा अवमान कसा होतो? बरे वाघ्याच्या स्मारकाची उंची शिवस्मारकापेक्षा मोठी आहे हा आरोप तर अत्यंत चुकिचा आहे.

Monday, June 6, 2011

सरकार गप्प का आहे?

You are here - HomeNewsCity Story
City
PUNE MIRROR
Dalits stand up against ‘anti-Brahmin’ book
Five prominent Dalits have filed a police complaint against Puroshottam Khedekar’s book, saying it is ‘anti-constitutional and derogatory to Brahmins’

Dalits stand up against ‘anti-Brahmin’ book

Devidas Deshpande

Posted On Tuesday, June 07, 2011 at 12:53:00 AM



While Brahmins are still contemplating legal action against Puroshottam Khedekar’s controversial book, prominent Dalits across the city who had filed a complaint with the police on May 18, are now demanding that it should be turned into a first information report (FIR). However, the police are sitting pretty and have done nothing about the complaint.




The cover of Khedekar’s controversial book
The controversy surrounding Khedekar’s book Shivrayanchya Badnamichi Kendre has been going on for a while. Last week, a meeting was organised by the Akhil Bhartiya Brahmin Mahasangh in the city to condemn the book.

The speakers included veteran Sanskrit scholar Vasant Gadgil. Govind Kulkarni, president of the organisation, told Pune Mirror, “This time, we are asking the governor to act in this regard.

There is no use approaching the government because they are hand-in-glove with Maratha organisations. At the time of Dadoji Konddev’s statue removal, Chief Minister Prithviraj Chavan had promised to meet us, but till date, he has done nothing.

Kulkarni added that the community members are also thinking about approaching the High Court to ban the book, but it depends on the stand taken by the Governor. A delegation of the organisation will meet the Governor, present him with a set of Khedekar’s books and ask him to take action.

“Khedekar has written some 30 books with content against our community. We ignored them, thinking that this is a lunatic tendency. However, it is now turning into a Goebbels’ pattern — to turn lies into truth,” he added.

While Brahmins are yet to take that final decision of filing a complaint, five Dalits, including academicians and activists, registered a complaint with then Joint Police Commissioner Ashok Dhiware against Khedekar, who is president of Maratha Seva Sangh and his book.

Professor Hari Narke, head of the Mahatma Jotiba Phule chair at the University of Pune and Sanjay Sonawani, author of 62 books in Marathi, are among those who signed the application. They are joined by Dalit activists Madhukar Ramteke, Sham Satpute and Bhupal Patwardhan.

According to them, Khedekar has made certain obscene and malicious observations in his new book and even exhorted his followers to carry out systematic riots in the state. The complaint says, ‘Khedekar has in his book appealed to his organisation members to carry out systematic riots against Brahmins. This is anti-constitutional.

In the same book,he has written about Brahmin women in the most derogatory language. All this deserves stringent legal action.’ Surekha Lokhande, leader of the Republican Party of India, even met Home Minister R R Patil to take action against the book.

The complaint has been gathering dust in the police files. It is yet to be turned into an FIR which will prompt the police to take action against the book. A case under section 66 (A) of Information Technology Act, 2000 was registered by the police immediately. Meanwhile, Dhiware has been transferred as the Director, Criminal Investigation Department.

Speaking to Pune Mirror, Sonawani said, “It is strange that the police is not taking any action. I don’t know what kind of pressure has forced them to turn a blind eye to the issue.” Narke said, “I raised this issue on April 1 this year in the presence of Khedekar at a function in Balgandharv Rangmandir. It has been over three months since then but the police has done nothing. This inaction surprises me.”

Meanwhile, the same police department acted swiftly in registering a case against a Facebook user for allegedly defaming deputy CM Ajit Pawar on the social networking website.

According to a complaint filed by a Nationalist Congress Party worker, Arvind Gore, the user, Amit Jadhav, has posted a blackened picture of Pawar on the social networking site, asking fellow users to post abuses about him. A lot of obscene comments are being posted.

According to Sangita Alphonso Shinde, inspector, Pune Police Cyber Cell, the police have asked for user information from Facebook to trace the culprit.

► Khedekar has, in his book, appealed to his organisation to carry out systematic riots against Brahmins. This is anti-constitutional. He has also written about Brahmin women in most derogatory language, the complaint states.

► It is strange that the police is not taking any action. I don’t know what kind of pressure has forced them to turn a blind eye to the issue.

- Sanjay Sonawani, dalit author

Wednesday, May 25, 2011

Issue of canine statue or dog-eat-dog politics?

http://www.punemirror.in/article/2/2011052620110526063635920244512/Issue-of-canine-statue-or-dogeatdog-politics.html

Issue of canine statue or dog-eat-dog politics?
Sambhaji Brigade’s threat to raze statue of Shivaji’s pet dog in Raigad on June 6 perceived as move against community leaders



Devidas Deshpande

Posted On Thursday, May 26, 2011 at 06:36:22 AM



The capital city of Chhatrapati Shivaji is sullied by new caste politics. The Sambhaji Brigade on Wednesday demanded the removal of a dog’s statue from Raigad. On the other hand, intelligentsia and community leaders see this as a political move against them. In 1674, Shivaji's coronation took place in Raigad Fort where he also breathed his last in 1680.

The statue of the dog, Vaghya, his faithful pet, is built in front of Shivaji's grand memorial (samadhi) at the fort. Legend has it that Vaghya threw himself into the pyre during Shivaji's funeral. The memorial was built with a donation by Indore’s Prince Tukoji Holkar in 1906 who gave Rs 5,000 towards the dog's statue. Holkar belonged to the Dhangar (shepherds) community and members of this community believe the dog to be next to god.

Sambhaji Brigade’s state president, Pravin Gaikwad and district president, Vikas Pasalkar gave an ultimatum till June 6 (the day the Shivaji coronation ceremony is celebrated every year) to remove it failing which the Brigade's members will raze the statue.

“This memorial is that of one of Shivaji's queens. However, we don't have evidence to pinpoint whose memorial it is. But there is no proof of Vaghya the dog in historical documents and hence it is another attempt to twist historical facts,” they said. The Brigade is more upset because the dog’s statue is of the same height as Shivaji’s memorial.




The Maratha organization wants this dog statue removed before June 6 — the day Shivaji was coronated king

The demand has met with stiff opposition and led to resentment among non-Brahmin communities and academicians alike. Sanjay Sonawani, author of 62 books in Marathi, opined, “There is no evidence to suggest that this memorial belongs to Shivaji's queens.

Even if we accept that for the sake of argument, why were these organisations and the Maratha community silent for all these years? The two branches of Shivaji's clan, Satara and Kolhapur, never did anything to help build Shivaji's memorial. It was through the efforts of the Brahmins and Holkar, that the structure that we see today has come up. Destroying it will be negating the efforts of those who worked from 1915-1936 for these memorials.”

Sonawani opined that the Brigade is buoyed by their ‘victory’ in Dadoji statue issue and is now looking for their next target. “All the signs point to political game where other castes and communities are being marginalised. First, it was Maratha-Brahmin politics, now it is Maratha-Non-Maratha one,” he said. Raigad was the capital during Shivaji’s rule.

It was in use till 1818 when the Maratha empire under the Peshwas was usurped by the British. who destroyed the fort over a period of two days with artillery shells. It was neglected till 1879 when Mahatma Phule first visited the fort and cleaned Shivaji’s memorial site. Later, Lokmanya Tilak started a campaign to rebuild the memorial with donations from the public. Shivaji’s memorial was built in 1926 while the dog’s statue came up in 1936.

Professor Hari Narke, head of Mahatma Jotiba Phule chair in the University of Pune said that Krishnaji Keluskar was the first to write Shivaji's biography in Marathi as well as in English. He incurred huge debts at that time and it was Tukoji Holkar who helped him out. “Keluskar wrote in his book that people taking Shivaji's name (meaning Marathas) are not helping him.

But Holkar lent a hand,” said Narke. “Will it be correct to remove the statue after keeping mum for so long? Isn't this heralding politics against nomadic tribes and OBC,” he asked. Mahadev Jankar, National President of Rashtriya Samaj Party and Dhangar community leader, echoed same sentiment. He said that the community is watching events as they unfold.

ग्रेट मराठा महादजी शिंदे

       महादजी घायाळ अवस्थेत पानिपतच्या रणांगणातून राणेखान भिस्त्याच्या सहकार्याने बाहेर पडला खरा , पण त्याला बरे व्हायला काही काळ गेला ...