Showing posts with label चळवळींचा म्रुत्यु. Show all posts
Showing posts with label चळवळींचा म्रुत्यु. Show all posts

Sunday, April 3, 2022

विद्रोह म्हणजे तिरस्कार?

 विद्रोह चुकीचा नसून विद्रोह म्हणजे तिरस्कार आणि हिंसा असे समजात ते चूक आहे. पण आता अशा काही संघटना फोफावत आहेत की ज्यांचा अंतिम हेतू समजावून घेण्यात येणारे अपयश ही खरी समस्या आहे.

दुर्दैवाने काही संघटनांनी संघाप्रमाणेच मुर्ख आणि आततायी वक्त्यांची फौज उभारण्याचा गेल्या काही काळापासून सपाटा लावला आहे. बहुजनवादाच्या नांवाखाली हे वक्ते प्रयत्नपुर्वक अनेक विचारमंचांवर येतात आणि मग विषय कोणताही असो, आपल्याच अजेंड्याकडे नेतात.
अनेकांच्या ते लक्षात आले तरी पर्यायी समतोल विचारी मांडणी करणारे वक्तेच तयार केले गेलेले नसल्याने ते केवळ ’कार्यक्रम तर पार पाडला’ या भावनेत कृतकृत्य राहतात किंवा मिळाले ते ज्ञान दिव्य आहे या समजुतीत राहतात.
बरे, त्यालाही हरकत नाही...पण परिणामस्वरुप बहुजनांची नुसती दिशाभूल केली जात नाही तर आपल्याच वादाच्या अंमलाखाली त्यांना आणायचा प्रयत्न होतो. काही भले-भलेही त्या अंमलापासुन मुक्त नाहीत.
बहुजनवाद्यांनी वैदिकांच्या एका अंमलातून बाहेर पडण्यासाठी दुस-या विकृतीकडे नेऊ शकणा-या अथवा नेणा-या अंमलाखाली जावे हे केवळ त्यांचे मस्तक त्यांच्या धडावर नसल्याचे लक्षण आहे.
विद्रोहाचा पाया सर्जनाचा असतो हे ज्यांना समजत नाही, पाठ केलेली भाषणे पोपटपंचीसारखी एकपात्री नाट्यप्रयोगाप्रमाणे करीत वीष पेरत जातात, ते समाजात कसलाही बदल घडवून आणु शकत नाहीत कारण त्यांची ती पात्रताच नाही.
बहुजनवाद्यांनी अशा सर्व संघटनांपासून सावध रहायला हवे. ते तुमच्या नव्हे तर त्यांच्या वैचारिक सत्तेसाठी झटत आहेत, मग भले त्यात विचार असोत अथवा नसोत!

Sunday, September 14, 2014

आरक्षण का मिळत नाही?


भटक्या विमुक्तांना अनुसुचित जमातींत आरक्षण पाहिजे आहे. पण ते मिळत नाही. मिळण्याची शक्यताही नाही. काय कारण असेल? कारण मागितले नाही म्हणून असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, रागही येईल आणि मग "आम्ही आंदोलने केली ते काय होते?" असा प्रश्नही संतापाने विचाराल. हरकत नाही. तुम्ही आंदोलने केली ती कोणासमोर? ती खरेच तुमची मागणी मान्य व्हावी म्हनून केली कि काही उपटसुंभ स्वार्थी नेत्यांना नेतृत्वे मिरवायची संधी द्यावी म्हणून? काय आहे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे? जर तसे नसते तर मुळातच चुकीच्य पद्धतीची आंदोलने करून , अर्धवट माहितीची निवेदने व तीही चुकीच्या लोकांकडे देवून तुमचा बहुमोल वेळ आणि पैसा तुम्ही वाया घालवला नसता. योग्य मार्ग वापरले असते. आंदोलनांना वैचारिक शिस्त देता आली असती. आणि आज ना उद्या खरेच आरक्षणाची मागणी पुर्ण करुन घेता आली असती. पण निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने करत आपापल्या समाजांची ताकद दाखवत राजकीय पक्षांचे लक्ष आकर्षित करत पदे पदरात पाडून घेण्यासाठी "आरक्षणाचे" गाजर दाखवत आंदोलने केली जात असतील तर ही स्वत:चीच फसवणूक नाही काय?

गेल्या दोनेक महिन्यांपासून वडार, धनगर, कोळी, आगरी असे अनेक आदिवासी-भटक्या-विमुक्तांतील समाजांनी राज्यव्यापी आंदोलने करत महाराष्ट्र ढवळला. यामुळे समाजगट एकत्र आले हेही खरे. पण साध्य काय झाले याचा विचार केला तर सर्वांच्या हाती भलेमोठे शून्य आले असेच स्पष्ट दिसते. असे का झाले यावर विचार होत नाही, नीट कार्यक्रम ठरवला जात नाही, तोवर भटक्या विमुक्तांना न्याय मिळण्याची शक्यता नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो.

आपल्या समाजाची फसवणूक आपलेच लोक करत आहेत हे मी स्वत: या निमित्ताने अनुभवलेले कटू वास्तव आहे. ती कशी हे आधी आपण पाहुयात.

१. अनुसुचित जाती/जमातींत कोणाही जाती/जमातीचा समावेश करण्याचा अथवा वगळण्याचा कसलाही अधिकार राज्य शासनाला मुळातच नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात त्यासाठी केंद्रातर्फे काम पाहणारा राज्य मागासवर्ग आयोग व राज्य अनुसुचित जमाती आयोग आहे. कोणत्या जाती-जमातींना प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही यासाठी या आयोगांच्या शिफारशीची गरज असते त्याखेरीज कोनालाही प्रवेश दिला जात नाही.

२. राज्य सरकारही या बाबतीत आयोगांकडेच शिफारस करु शकते. राज्य सरकारने जरी शिफारस केली तरी आयोग संपुर्ण अभ्यास करुन अहवाल बनवून केंद्रीय मागासवर्ग आयोग अथवा केंद्रीय अनुसुचित जनजाती आयोगाकडे शिफारस पाठवत नाही, केंद्रीय आयोग जोवर तो मान्य करुन संसदेकडे मंजुरीसाठी पाठवत नाही तोवर असले आरक्षण कालत्रयी मिळू शकत नाही.

३. राज्य सरकार अथवा राज्य आयोग शिफारस करत नसेल तर उच्च न्यायालयातर्फे जनहित याचिका दाखल करून आपली सर्वांगीण बाजू मांडुन उच्च न्यायालयाला पटवण्यात यशस्वी झालो तर उच्च न्यायालय राज्य/केंद्रीय आयोगाला निर्देश देवू शकते.

हे ते तीन मार्ग होत, चवथा मार्ग नाही. राज्य सरकारने शिफारस जरी करायचे ठरवले तरी केवळ मागण्या करून आणि निवेदने देवून ती शिफारस कशी होणार? ती शिफारस करण्यासाठी प्रत्येक जाती-जमातीला किमान खालील चार गोष्टी सिद्ध कराव्या लागतात.

१. जमातीत असलेले आदिम अंश.
२. सामाजिक/आर्थिक मागासलेपणा
३. स्वतंत्र संस्कृती/धर्मश्रद्धा असणे
४. भौगोलिक दृष्ट्या नागरी संस्कृतीपासून तुटलेले असणे.
५. नागर समाजाशी वागतांना असलेला बुजरेपणा.

या बाबी सप्रमाण, आकडेवारीसहित सिद्ध करत मागणी करावी लागते. तेंव्हाच त्याचा अभ्यास करून राज्य सरकार अथवा राज्य आयोग केंद्राकडे शिफारस करू शकते हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे.

आता ही उठाठेव करण्यासाठी पुरेसा सर्व्हे करायला हवा. तो कोण करणार? यासठी आवश्यक असलेला डाटा कोणत्याहे शासनाकडे स्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष झाली तरीही नाही. याबाबत आपण कधीही आवाज उठवला नाही. केंद्र सरकारने भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोग नेमला होता. या आयोगाला देशभरच्या भटक्या विमूक्तांनी डोक्यावर घेतले होते. परंतू या आयोगाने सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली. देशभरच्या शेकडो भटक्या-विकुक्त जमातींबाबतचा अहवाल जेमतेम १२५ पानांचा. त्यात दखल घ्याव्यात अशा शिफारशीही नव्हत्या. मग व्हायचे तेच झाले. केंद्र सरकारने मार्च २०१४ मद्ध्ये हा अहवाल फेटालला आणि नवीन आयोग स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानंतर आता नवीन सरकार येवुन तीन महिने उलटून गेलेत. त्यांनी नवा आयोग बसवला नाही आणि भटक्या विमुक्तांनी तशी मागणीही केली नाही. का?

आणि आता समजा जरी आयोग नेमला तरी तो आपला अहवाल द्यायला अजून किती वर्ष खाणार, त्याच्या शिफारशी तरी मान्य होतील का हा यक्षप्रश्न आहे. एकुणात काय? फसवणूक होते आहे आणि केवळ आणि केवळ स्वार्थांध नेतृत्वांमुळे भटके विमूक्त आज दारिद्र्याच्या आणि मागासपणाच्या दलदलीत सडतो आहे.

महाराष्ट्रातच फक्त नोम्यडिक ट्राईब/ व्ही.जे. एन.टी अशी वर्गवारी आहे व तीही इतर मागास वर्गियांच्या अंतर्गत!  संपुइर्ण देशात ही प्रथा नाही. पी. के. मोहंती या विद्वानाने लिहिलेल्या अनुसुचित जमातींच्या कोशात स्पष्ट म्हतले आहे कि, भटक्या विमुक्त जातींची अवस्था आदिवासींपेक्षा जास्त हलाखीची असून त्यांना इतर राज्यांप्रमाने अनुसुचित जमातींचा दर्जा द्यायला पाहिजे, पण महाराष्ट्र सरकारने त्यांना त्यांच्या घतनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. खरे तर या एकाच मुद्द्यावर भटके-विमूक्त न्यायालयीन व आयोगांसमोरील लढाई जिंकू शकतात. परंतू मुळात भटक्या-विमुक्तांना आरक्षण मिळावे असे, शासन सोडा, खुद्द भटक्या विमुक्तांच्या नेत्यांना वाटते काय हा खरा प्रश्न आहे.

निवडणुकांच्या तोंडावर आंदोलने करुन राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करता येतील, पण समाजाचे व्यापक हित होणार नाही. आरक्षण ही एकमेव बाब नाही. भटक्या विमुक्तांसमोर इतरही असंख्य प्रश्न आहेत. कायमस्वरुपी निवारे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक अवहेलना, पारंपारिक व्यवसायांत आधुनिक साधने व त्यासाठी सुलभ वित्तपुरवठा, साधनसंपत्तीवरील पारंपारिक हक्क या प्रश्नांबाबत नेत्यांनी कधी आंदोलने केली आहेत काय? जनजागरणे केली आहेत काय? यातील अनेक बाबी राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. त्या मागण्या मान्य होऊ शकतात. पण ती तुमचे इच्च्छा आहे काय हा खरा प्रश्न आहे.

मी पाहिले आहे कि बहुतेक आंदोलक जमातींनी निवेदने बनवण्यासाठी कसलेही अभ्यासपुर्वक कष्ट घेतलेले नाहीत. निवेदने अत्यंत उथळ आणि कामचलावू आहेत. निवेदने देतांनाचे फक्त फोटो काढून घ्यायचे आणि वृत्तपत्रांत छापून आणायचे असाच उद्योग सर्व जमातींच्या नेत्यांनी केला आहे. काय अर्थ होतो याचा? समाजाचे हित डोळ्यासमोर असणारा निस्पृह नेता असले पोरकट उद्योग कधी करणार नाही. अशा प्रसिद्ध्यांनी मुख्य हेतू साध्य होत नसतात हे लक्षात कोण घेणार?

समाजाला पुढे नेण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालत असते. आपल्या समाजाच्या वर्तमानाची, इतिहासाची माहिती सतत जमा करत रहावी लागते. योग्य तेथे लगेच आवाज उठवावा लागतो.

आणि मागण्या योग्य तेथेच कराव्या लागतात. "जखम झाली हाताला आणि मलम लावतोय पायाला" असा आपल्या सर्वांचा उद्योग आहे. यातून जखम कालत्रयी बरी होणार नाही हे उघड आहे.

आता तरी सावध व्हा. योग्य मार्गाने जा. योग्य दारावरच धडक मारा. इतस्तत" दगड फेकत बसाल तर आरक्षण आणि इतर सुधारणारुपी फळ कदापि पडणार नाही याचे भान ठेवा.

Saturday, June 30, 2012

निरर्थक ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद...




फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपुर्ण बुद्धीनिष्ठ्तेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देवू शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजनारे हे शतमुर्ख मात्र द्न्यानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळुनही विद्वत-अडानी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हनजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातुन हे लोक बाहेर कधी येतील ते येवोत.

"वाद" या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमद्धेच होवू शकतो. ज्यांना मुळात "विचार" कशाशी खातात याचेच द्न्यान नाही त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मनेतर वादात पडुन स्वत:चेच नाक छाटुन घ्यायचा चंग बांधला आहे. अर्धवट द्न्यानावर आधारीत हे पुस्तके लिहितात, स्वत:च्या समाजात विचारवंत म्हणुन मिरवुन घेतात. त्यावर कोणीही टीका केली तर लगेच "भटाळलेला", "आरेसेसने दत्तक घेतलेला" वगैरे शेलकी विशेषणे वापरुन मोकळे होतात. यात या मंडळीला काय विकृत आनंद होत असेल तो असो, पण बहुजन म्हणवना-यांचे वाटोळे मात्र करण्यात आज ब्राह्मण नव्हेत तर असेच उथळ बहुजनीय विचारवंत आघाडीवर आहेत हे दुर्दैव आहे.

द्न्यानसत्ता निर्माण करण्यात एक द्न्यानावरील निष्ठा लागते. ब्राह्मनांचे वर्चस्व झुगारायचे असेल तर त्याच तोडीचे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक द्न्यान निर्माण करावे लागते याचा विसर सर्वच समाजाला पडला आहे. फुले-बाबासाहेबांना अंतिम मानत कधीही द्न्यानवृद्धी होणार नाही हे यांच्या गांवीही नाही. त्यांचे काय मानावे? तर त्यांची अगाध द्न्याननिष्ठा, तर्ककठोर होत स्वत:ची मते तपासत पुढे जाण्याची प्रवृत्ती. यांना फुले आंबेडकर मुळात समजलेलेच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. अपवाद असतात...पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो.

जुनी दैवते नष्ट करायचा अथक प्रयत्न करायचा आणि नवी दैवते निर्माण करण्यात मात्र कुचराई करायची नाही आणि वर म्हणे हिंदु धर्म संपवायचा...हे असे करत राहिले तर बापजन्मी त्यांना हिंदु धर्म संपवता येणार नाही. नवीन धर्म स्थापन करायचा...सर्वांना प्रिय वाटेल म्हणुन शिव हे नांवही द्यायचे...मग मुळात जो शैव धर्म पुरातन काळापासुन अस्तित्वात आहे, एवढे अवाढव्य तत्वद्न्यान उपनिषदे, तंत्रशास्त्रे ते आदी शंकराचार्यांनीच निर्माण करुन ठेवले आहे त्यांचाच उद्घोष करायचा तर नवीन धर्म आणि नवी धर्मसंहिता. म्हणजे त्यांना अभिप्रेत "शिव" हा शिव शंकर नसून अन्य कोणीतरी शिव या जातीयवाद्यांना अभिप्रेत असावा असे म्हणने क्रमप्राप्त आहे. मग शिव हा देशाला जोडनारा धागा आहे असे म्हनने गैर आहे. काहीतरी दडवण्याची ही चाल आहे.

गौतम बुद्धाला पुराणकारांनी विष्णुचा दहावा अवतार का ठरवले यावर यांनी खरे तर मुलभुत विचार करायला हवा. "असुरांमद्धे मायामोह" निर्माण करुन त्यांना पथभ्रष्ट करण्याचे कार्य बुद्धाने केले म्हणुन बुद्ध हा दहावा अवतार (काही पुराणांत नववा अवतार) ठरवण्यात आला हे यांच्या गांवीही नसते...कारण अभ्यास कोणी करायचा? पुराणे जाळुन टाका हे म्हनने सोपे असते परंतु त्यांचा तटस्थ अभ्यास करत त्यांतील खोट वा सत्य शोधायचे कोणी?

ब्राह्मनांना वेदांची-स्मृतींची चिकित्सा कधीच मान्य नव्हती आम्हालाही बहुजनीय महापुरुष, त्यांनी स्थापलेले धर्म वा त्यांच्या विचारांची चिकित्सा मुळीच मान्य नाही. काय फरक उरला? द्न्यान फक्त चिकित्सेनेच पुढे जावु शकते याचे भान नको कि काय? ब्राह्मण समाज शिव्या घालायला सोपे टार्गेट आहे. त्यांना शिव्या द्यायला फार धाडसाची गरज नसते. त्यांनाही अशा शिव्यांमुळे काहीएक फरक पडत नाही. उलट ते आत्मकेंद्रित होत एक दिवशी अत्यंत थंड डोक्याने बहुजनांचा असा बौद्धिक काटा काढतील कि हे सैरभैर होत भरकटत जातील. उथळ लोक सांस्कृतिक संघर्ष कधीच जिंकु शकत नसतत हा जगाचा इतिहास आहे. ब्राह्मण काही आकाशातुन पडलेले नाहीत...किंवा ते बाहेरुनही आलेले नाहीत. समजा ते आले असले तरी मग त्यांच्याबरोबर कथित क्षत्रीय, वैश्यही आलेच कि! मग तुम्ही क्षत्रीय-वैश्यांना कोणत्या नियमांनी एतद्देशीय ठरवता? तेही तुमच्याइतकेच याच देशाचे, सम्स्कृतीचे भाग आहेत.  होते आणि राहतील.

गतकाळातील द्न्यात-अद्न्यात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली...ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनियांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वातला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचनावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती. वेदबंदीने तसाही काही फरक पडनार नव्हता कारण ते त्यांच्या धर्माचे प्रतीक नव्हतेच! शिकायच्या बाबतीत बहुजन समाज आजही आळशी आहे. शाळांतुन गळत्या होतात त्या यांच्याच. तेथे काही प्रबोधन करायचे नाही आणि सारी खापरे दुस-या जातीवर थोपुन मोकळे व्हायचे हा धंदा कसा चालेल?

मी याला संभ्रमावस्था म्हणतो. संभ्रमी समाजाचा अंतता विनाशच होतो. एखाददुस-याबाबत संभ्रम आपण समजु शकतो पण जे द्न्यान नव्हे तर फक्त संभ्रम निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनले आहेत ते समाजघातकी आहेत असेच म्हणावे लागते.

स्वत:च्या टिर्या बडवत द्न्यानसाधना होत नसते. द्न्यानाला शुद्ध करायचे कि अर्धवट द्न्यानाने विकृत कृत्या करायच्या? बाबासाहेबांनी जेही लिहिले ते साधार व सप्रमाण लिहिले. कोठेही कधीही अश्लाघ्य भाषा वापरली नाही. फुलेंनी तर्ककठोर युक्तिवाद करत बहुजनवादाचा पाया घातला. आज बहुजनवादाचा गळा घोटण्याचे कार्य  फुले-आंबेडकरांचेच नांव घेत केले जात आहे याचा खेद आहे.

आजचा बहुजनवाद हा सृजनशील नाही. आणि सृजनात्मक विचारधारा जे निर्माण करु शकत नाहीत त्यांचा विनाश हा अटळ असतो. कत्तली, दंगली, तोडफोड अशी भाषा करायला अक्कल लागत नाही...पण मग अशी भाषा करत बाबासाहेबांच्या संविधानात्मक तरतुदींचाच घोर अवमान करत असतो हे कधी समजणार?

आपलीच आराध्ये पायतळी तुडवणा-या अशा महामुर्खांना आपल्या अशा कृत्यांची-विधानांची शरम कधी वाटणार?

इतिहास हा धादांत असत्ये ठोकत नव्याने लिहावा लागत नसतो तर त्याची परखड चिकित्सा करत समोर आणावा लागतो. इतिहास ही गोष्ट भेळ-भजी खाण्याची वा चकाट्या पिटण्याची बाब नसते.

आणि सर्वात महत्वाची बाब असते ती ही कि इतिहास घडवायचा असतो! नव्या पिढ्यांना भावनीक आत्मविश्वास देनारा...दिगंताकडे पुढे जायला प्रेरीत करनारा इतिहास.

पण आज हे बहुजनीय म्हनवणारे विचारवंत जो इतिहास घदवत आहेत त्यांवर पुढील पिढ्याच थुंकतील...
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हाच एक कायमचा इतिहासात जमा होईल!



Wednesday, June 27, 2012

त्यांना कोण आवाज देणार?


मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटींत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीच्या उंच्या-खोल्या मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पुर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो कि राजकीय विचार. अर्थविचार असो कि सामाजिक विचार. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. अशा अगणित विचारांच्या संदर्भ व्युहात विचारकलह निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसे घडतेही. किंबहुना तसेच घडणे अभिप्रेत असते. फक्त विचार कलह हा सृजनात्मक असावा, विध्वंसक नसावा, एवढीच काय ती अपेक्षा बाळगता येते.

वैचारिकतेशी प्रत्येकाचे एक इमान असावे असेही अभिप्रेत असते. विचार बदलु शकतात. जसे नवे जीवन दृष्टीक्षेपात येते, नवे अनुभव येतात तसे विचार बदलणे...मग ते व्यक्तिगत जीवनाबाबत असोत वा सामाजिक जीवनाबाबत, धर्मतत्वांबाबत असोत कि जीवनमुल्ल्यांबाबत. परिवर्तनशीलता हाच निसर्गाचा नियम आहे. उलट जे गतकाळालाच चिकटुन बसतात व गतकाळातील आमचे सारे काही श्रेष्ठच होते व तसेच जीवन-नियम आजही कायम असावेत असे जे मानतात त्यांना आपण सनातनी, प्रतिगामी असे म्हणतो. काळ हा नेहमीच पुरोगामी-अग्रगामी असा असतो. नवीन कालसापेक्षतेत जे नवविचार देतात, समाज विचारांना एकंदरीत समृद्ध करत नेण्याच्या कार्यात हातभार लावतात त्यांचे विचार पटले वा नाही पटले तरी एकुणातच विचारकलहातुन नवविचार निर्माण होण्याचे अनवरत प्रक्रिया सुरु होते. जेंव्हा अशी प्रक्रिया थंबते तेंव्हा अंधारयुग निर्माण झाले असे मानले जाते. भरतात काय किंवा युरोपात काय, अशी अंधारयुगे येवून गेली आहेत. समाजजीवन कोणत्याही नव-विचारचैतन्याला मुकलाय असे घडुन गेले आहे.

सॉक्रेटिसने तरुणांनाच प्रश्न विचारत वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रत्यत्न केला. आपल्या विचारांशी प्रतारणा न करता त्याच्या सरकारने त्याला या कृत्याबद्दल जी शिक्षा दिली...हेमलॉक विषाचा पेला पिण्याची ती त्याने पळुन जाण्याची सहज संधी उपलब्ध असतांनाही नाकारली. तो विष प्याला आणि मरता-मरताही तत्वद्न्यानाचा नव-अनुबंध निर्माण करत. हे अतुलनीय धैर्य व स्व-विचारनिष्ठा जगाच्या इतिहासात क्वचित पाहण्यात येते. ग्रीसने जगाला ज्या अद्भुत वैद्न्यानिक, तत्वद्न्यान व साहित्याच्या देणग्या दिल्या त्याला कारण असे विचारस्तंभ होते म्हणुन!

आपण भारतीय मात्र जे मृतवत राहिलो ते राहिलोच. वेद-उपनिषदे, रामायण महाभारत..पुराणे यात अडकुन पदलो ते पदलोच. चवथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलद्न्यांनी साफ फेटाळुन लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरवे शतक) येईपर्यंत पृथ्वी सपाट आहे याच भ्रमात अवघे जग राहिले. द्न्यानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे. पण जवळपास ९०० वर्षांनी द्न्यानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत पृथ्वी फिरते, सुर्य स्थिर आहे...पण ज्याप्रमाणे नांवेतुन जातांना आपल्याला तीरावरील वृक्ष स्थिर असुनही मागे जातात असा भास होतो तद्वतच न चालता सूर्याचे चालणे वाटते, असे म्हटले. (द्न्यानेश्वरी ४:९७-९९) पण एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मीक रुपकात रुपांतर केल्याने गणिताचे...शास्त्राचे हत्या झाली आहे हे आम्हाला समजलेच नाही! पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितद्न्य आर्यभटच. sin  आणि cos या गणिती संद्न्या निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथव अध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी सिद्धांतात बदलवत न बसता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विद्न्यानातील एक महासत्ता बनला असता. गुलामीत खितपत रहावे लागले नसते. या जाती-पातींतील व्यर्थता तेंव्हाच कळुन चुकली असती. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी.

मला अनेकदा प्रश्न विचारला जातो तो हा कि गतकाळाची एवढी चर्चा का? मला वाटते ती आवश्यक आहे, कारण इतिहासाकडे डोळे उघडुन पाहिले नाही तर आपल्याला आपल्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय द्रुष्टीने व धार्मिक अहंकारांच्या भावनांतुन पाहतो. पुर्वीही तसेच घडत होते. रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मुळ कथेत सोयिस्कर घालघुसड करत रामकथेची वाट लावुन टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजुन एक दुर्दैव. एकेक जात आपल्या प्राचीनत्वाच्या नव्या मित्थकथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. भावना दुखावतात. दंगे-धोपे होतात...हिंसक हल्ले होतात.

मग टोळ्या करुन राहणा-या हिंसक आदिमानवात आणि या आधुनिक आदिमानवांत फरक तो काय? अशी कोणती मानसिक प्रगती त्याने केली आहे? होत्या त्याच मानसिकतेत राहत ज्या विचारव्युहांत आपण अदकलो आहोत त्यामुळे वरकरणी आपण एक "विचारकेंद्रबिंदु" आहोत असे वाटले तरी त्या बिंदुत्वात एक महत्वाचे न्यून राहते ते हे कि पुढे जाण्याचा मार्ग खुंटला असतो. होतो तेथेच...आहो तेथेच आणि अजरामर तिथेच अशी अवरुद्धविचार स्थिती निर्माण होते.

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

इतिहासाचे अन्वेषन करत रहावेच लागणार आहे. त्याखेरीज आम्हाला आमच्या मुर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आम्ही आपापली खुरटी शिस्ने मिरवीत "जय अमुक... जय ढमुक" करण्यात आणि आम्ही केवढे संवेदनाशील आहोत हे तोडफोडी करुन सिद्ध करण्यात धन्यता मानत राहु.

शेवटी ज्यांना गटार-विचार-व्युहात कसलेही स्वत:चेही तत्वद्न्यान नसतांना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? समाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल, पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?

Friday, February 10, 2012

आता तरी जागे होणार आहात काय?

धर्म-जात-प्रांत-वंश या आधारावर संघटना बांधणे सोपे जाते हे मी आधीच्या अनेक लेखांत म्हटलेच आहे. अन्य जातीय, धर्मीय, प्रांतीय वा वंशांचा द्वेष हा मुलभुत पाया असल्याखेरीज संघटन करणे सहसा सोपे जात नाही आणि ज्यांना दीर्घकालीक धोरणच नसते वा पुरेसा वैचारिक/सैद्धांतिक आधारच नसतो त्यांना द्वेषमुलक चळवळी उभ्या कराव्या लागतात. पण यातुन साध्य काय होते? नेमके काय घडते?
१. हिटलरी पद्धतीने एकचालुकानुवर्ती संघटन निर्माण होत चळवळीचा प्रवास बहुदिश न होता एक-दिश होवुन जातो.
२. स्वजातीय/धर्मीय/प्रांतीय/वंशीय पुरातन असलेले-नसलेले महात्मे शोधुन काढले जातात, त्यांच्या दैवत्वीकरणाची प्रक्रिया सुरु होते आणि चिकित्सा नाकारली जाते. चिकित्सा करणारे या चळवळींचे शत्रु ठरवले जातात. प्रसंगी हिंसक होत वैचारिकतेला दडपले जाते.
३. इतिहासाला सोयिस्करपणे बदलले जाते. विरुद्ध पक्षीयांच्या दैवतांना हीनवत, चारित्र्याची मोडतोड करत स्व-जाती/धर्म/प्रंत/वंश अभिमान वाढवण्यासाठी अपार बौद्धिके घेतली जातात. "आपल्यावर अन्यांनी केवढा भीषण अत्त्याचार केला आहे" याचे कधी अतिरंजित तर कधी खोटे चित्रण केले जाते.
४. हे सारे करीत असतांना, चळवळीतील फौज वाढवली जाते परंतु या फौजेचा स्वता:चे डोके वापरण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. त्यांचे brain washing एवढे केले जाते कि ते सारासार विवेकी विचार करणेच विसरलेले असतात. थोडक्यात बौद्धिक क्लोन बनवले जातात.
५. शत्रु पक्षावर लिखित तर कधी हिंसक हल्ले करणे आणि दहशत माजवणे हेच एकमेव कार्य बनुन जाते. शत्रु पक्षीय संघटनाही प्रत्त्युत्तर म्हणुन हेच कार्य करत जातात आणि त्यातच अराजकाची बीजे पेरली गेलेली असतात हे कधीच या चळवळींच्या लक्षात येत नाही.
६. या चळवळी स्वर्थासाठी अन्य संघटनांशी प्रत्यक्ष वा वैचारिक युती करत असतात, जेथे समान स्वार्थाचे काही धागे गुंफले गेलेले असतात. उदा. बौद्ध, जैन व शिख धर्म हे हिंदु धर्माचेच भाग आहेत असे आर.एस.एस. वाले सांगत एक क्रुत्रीम नाळ बांधायचा प्रयत्न करतात...दुसरे तर दलित आणि मराठे हे नागवंशीयच असल्याने एकच आहेत असा प्रचार करु लागतात. ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमान यांचे धागे विक्रुत पद्धतीने उसवत तर्कविसंगत तत्वप्रणाल्या निर्माण केल्या जातात ज्या एकुणातीलच सर्व समाजाला घातक ठरत जातात. ऐक्य करणे हे स्वागतार्ह आहे...पण त्यासाठी चुकीचे तत्वद्न्यान वापरणे हे विसंगत आहे. कारण ज्या कारणासाठी ऐक्य हवे त्यामागे जेंव्हा स्वार्थपिडित भावना असते तेंव्हा असे तत्वद्न्यान बाष्कळ बनुन जाते. "समान शत्रु शोधा आणि एकत्र या, त्यासाठी इतिहासाचा बळी द्या" असा हा धंदा यातुन सुरु होतो. हिटलरने आर्य सिद्धांत जमेस घेत ज्युंची सर्रास कत्तल केली. भारतात गुजरात मद्धे मुस्लिमांची कत्तल केली गेली. दलितांच्या असंख्यवेळा कत्तली होत आल्या आहेत. उद्या कधी भारतात ब्राह्मणांची कत्तल केली गेली तर आश्चर्य वाटणार नाही कारण अनेक ब्राह्मणद्वेषी संघटनांचा पवित्रा तोच आहे. द्वेषाचा विखार वीषवल्लीप्रमाणे वाढत जात असतो आणि त्याचे कधी विस्फोटात रुपांतर होईल हे कोणीही सांगु शकत नाही. ही द्वेषमुलक परंपरा बदलत मानव्यवादी भुमिकांत चळवळ जात नाही तोवर चळवळीच विनाशाप्रत पोहोचनार हे उघड आहे. हा द्वेष वरकरणी समाजात पसरवला गेला तरी अंतर्गत स्वहिते पाहनारे मात्र आतुन हातमिळवणी करुनच असतात असाही जगाचा इतिहास आहे. फसवणुक होते ती प्रामाणिक कार्यकर्त्यांची आणि समाजाची.

कोणत्याही समाजात जाग्रुत लोकांची, लेखक-पत्रकार-विचारवंतांची गरज असते. प्रसंगी अप्रिय होत सत्य सांगण्याचा प्रयत्न होण्याची गरज असते. पण असे लोक या सर्वच प्रकारच्या संघटनांना अडचणीचे ठरत असल्याने त्यांचे काटे काढले जातात हाही इतिहास आहे. किती विचारवंतांना तुरुंगात सडावे लागले आहे वा प्रसंगी त्यांना ठारही मारले गेले आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतो म्हणुन सोक्क्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागतो. कम्युनिस्ट रशियाने किती जणांना ठार मारले, हद्दपार केले वा सैबेरियात शिक्षा ठोठावत पशुवत जीवन जगायला भाग पाडले हे सर्वांना माहितच आहे. तालीबानी राजवटीत तर कहर झाला आहे. डा. आनंद यादवांना आपली कादंबरी मागे घ्यावे लावणारे, साहित्य सम्मेलनाचा राजिनामा द्यायला भाग पाडणारे तालीबानी आपल्या महाराष्ट्रात नाहीत कि काय? डा. कुमार केतकरांवर न्रुशंस हल्ला करणारे याच भुमीत नाहीत कि काय? वैचारिक स्वातंत्र्याची मुभा जेथे नाकारली जाते...तेथे लोकशाही नव्हे तर एक छुपी हुकुमशाही वावरत असते. किंबहुना जगाचा इतिहास हा अशा क्रुरातिक्रुर हुकुमशाही घटनांनी भरला आहे. आजही स्वत:ला आधुनिक समजणारा मानव त्यातुन बोध घेवु शकलेला नाही हे जगाचेच दुर्दैव आहे.

खरे तर संघटना द्वेषविरहित प्रागतिक कार्य करु शकतात-रचनात्मक होवू शकतात. हा असा मार्ग थोडा प्रदिर्घ असेलही पण त्यातुन मानवी समुदायाचे प्रदिर्घकालीन हित होवु शकते. येथे मला महाभारत समाप्तिसमयी व्यासांनी केलेली आर्त विनंती आठवते ती: "उर्द्व बाहू विरोम्येश:: न:कशित श्रुणोति माम..." उर्ध्व बाहु उभारुन मी आक्रंदन करत आहे कि ज्यायोगे अर्थ, काम, मोक्ष साधला जाईल असा धर्म का आचरत नाही?" येथे धर्म हा शब्द
religion या अर्थाने वापरलेला नसुन मानवी स्वभावधर्म या अर्थाने वापरलेला आहे. (आता व्यासांचे नाव घेतले तर बहुजनवादी म्हनणा-यांना राग येईल. ते व्यासपीठ हा शब्द न वापरता विचारपीठ हा शब्द वापरतात. व्यास हे कधीच ब्राह्मण नव्हते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. महत्तेला स्वीकारण्याची लाज वाटु नये. द्वेषाने आंधळे झालेले आपल्याच लोकांना कसे पायतळी तुडवतात त्याचे हे एक उदाहरण.)

संघटना आवश्यक असतात त्या त्या-त्या जाती-समुदायावरील, समाजगटावरील, मानवी समुदायावरील होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. अन्याय न्यायात बदलवुन घेण्यासाठी. चळवळीचा अर्थ असतो तो मानवी समाजाला आहे त्या स्थानापासुन पुढे नेण्यासाठी, वैचारिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि राजकीय प्रगल्भता विकसीत करण्यासाठी... दुस-यावर अन्याय होणार नाही पण आम्हालाही न्याय मिळावा यासाठी. स्वातंत्र्यासाठी. समतेसाठी. आपल्यावर अन्याय झाला म्हणुन दुस-यावर अन्याय करावा हे काही महावीराने वा गौतम बुद्धाने वा शिवाजी महाराजांनी सांगितलेले नाही. संघटना आवश्यक असतात त्या आपापल्या समाजघट्कांना आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक द्रुष्ट्या उंचावत त्यांना प्रगल्भ करण्यासाठी. त्यांचे वैचारिक, सामाजिक, आर्थिक दारिद्र्य घालवण्यासाठी...ख-या अर्थाने आपापल्या संघटीत म्हनवणा-या समाजाचे नैतीक उत्थान व्हावे यासाठी. संघटनांचे हेच खरे नैतीक कर्तव्य असते. अशाच रितीने देशाचा आणि म्हणुनच जगाचाही खरा अभ्युदय होवू शकतो. नाहीतर २१व्या शतकातही आपण आदिमानवाचा हिंसक टोळीवाद जपणारे आहोत हे सिद्ध करत आम्ही कसलीही मानसिक प्रगती केलेली नाही हे वारंवार सिद्ध करत जातो...जात आहोत...आणि असेच सारेच रसातळाला जावून पोहोचणार आहोत...मग वाचवायला ना क्रुष्ण येणार ना बुद्ध...ना शिवाजी महाराज ना सावरकर...ना गांधी. मानवी जगताच्या पापाचे घडे या असल्या द्वेषमुलक विचारांमुळे, वर्चस्ववादी भावनांमुळे आणि त्यांना समर्थन देना-या संघटनांमुळे भरतच चालले आहेत. वर्तमान जग या मानसिकतांना थारा देण्याच्या अवस्थेत नाही...ते या नव्या जगाला परवडणारही नाही...या चलवळी म्रुत्युपंथाला लागणार हे नक्कीच...

पण जर याच चळवळी सकारात्मक झाल्या तर? आपले भवितव्य उज्ज्वल असेल...यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.

आता तरी जागे होणार आहात काय?

Tuesday, February 8, 2011

चळ्वळीचा म्रुत्यु कसा होतो? (भाग २)

चळवळीन्चे अपyaश अनेकदा त्यान्च्या नेत्यान्च्या मानसिकतेतच दडलेले असते. अनुययन्ची फौज जमा झाली कि आपण सर्वमान्य आहोत असा भ्रम निर्माण होवु लागतो. थोडे यश मिळाले कि सत्तेची स्वप्ने पडु लागतात. त्यासाठी त्यांना अधिक अनुयायन्ची गरज भासु लागते आणि त्यासाठी ते हव्या त्या तड्जोडी करु लागतात. शिवसेना ही एके काळी चळवळच होती...नंतर ती राजकीय शक्ति बनली. अनेक युत्या केल्या...अजुनही होतील...आणि ती सन्घटना फुटली...आता तीही नवी युती करत आहे असे दिसतेय. असो...ते महत्वाचे नाही...पण चळवळ ही शुद्ध चळवळ न रहाता ती स्वता:च स्वता:चा अंत घडवत समाजाला दीर्घ काळासाठी फसवण्याची, भ्रामक स्वप्ने निर्माण करण्याची...दाखवण्याची आणि ती कधीच पूर्ण न करण्याची जी अभद्र परंपरा निर्माण करत जात चळवळीच्या मुलभूत सिद्धांतावरच घाला घालत स्व-मृत्यू घडवते ती प्रक्रिया चिंताजनक आहे.

मी येथे उदाहरणे देत बसत नाही. असंख्य उदाहरणे आहेत...पण त्या सार्यांचा मतितार्थ एकाच आहे तो हा कि सामाजिक नेते, मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, अपवाद वगळता, एकतर अनुयायीच त्यांना स्वर्थ्पुरक धोरणे राबवायला लावतात वा ते नेते स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी अनुयायांना राबवतात. याची परिणती साध्यापासून च्युत होण्यात होते आणि चळवळ संपते.

महाराष्ट्रात आजवर कमी चळवळी झाल्या नाहीत...पण यश-अपयश पाहिले तर त्या सर्वस्वी अयशस्वी ठरल्या आहेत असेच दिसून येईल. आज ज्या तथाकथित चळवळी सुरु आहेत त्यांचे भाग्यही विनाशात जाणे एवढेच आहे. कारण त्यांत खरोखर मानवी जीवनाचे कल्याण होणे हा उद्देश आहे काय हा खरा प्रश्न आहे. त्यांचे हेतू खरोखर समता, बंधुता, विचार-स्वातंत्र्य आणि वैश्विक परिप्रेक्ष यात मानवी जीवन आणणे हा हेतू आहे काय हा प्रश्न आहे...आणि दुर्दैवाने त्याची उत्तरे नकारार्थी आहेत.

विरोधात विचार/ कृती जातात तेंव्हा खून, हल्ले, बदनाम्या, बहिष्कार, धमक्या अशी असंख्य हत्यारे वापरत हेच चळवळीचे अध्वर्यू जो नंगानाच घालतात आणि काही बळी घेऊन दीर्घ काळात स्वता:च्या चळवळीचे बळी देवून मोकळे होतात...तेंव्हा अनुयायी मात्र पुरेपूर नागवले गेले असतात...जे शहाणे असतात ते प्राप्त स्थितीचा फायदा घेण्याच्या स्पर्धेत उतरलेले असतात...प्रामाणिक कार्यकर्ते मात्र पुरते नागवले गेलेले असतात.

चळवळ ही खरे तर नेते नव्हे तर अनुयायीच चालवत असतात. नेते फारतर वैचारिक पाठबळ देत असतात...व त्याचाही अभाव असतो तेंव्हा फक्त भावनिक बळावर अनुयायांना भडकावत असतात.

हे अनुयायांना काळात नाही आणि त्यातच त्यांची आणि चळवळीची शोकांतिका असते.

Saturday, February 5, 2011

चळवळींचा मृत्यू कसा होतो?

प्राचीन काळापासून मानवी जीवनात/विचारांत/धर्म श्रद्धांत/राजकीय विचारांत परिवर्तन घडवून आनन्यासाठी अने चळवळी झाल्या आहेत. प्रस्थापित शैव सिद्धांताना आव्हान देण्यासाठी भारतात मूर्ती/प्रतिमा पूजा विरहित वैदिक धर्माचा उदय झाला. चार्वाकाने तर ईश्वराचे/वेदांचे अस्तित्व नाकारणारा अत्यंत भौतीकतावादी मुलभूत सिद्धांत मांडला. याच काळात इहवाद हाच मुळात विघातक असून, सर्व दुक्खांचे कारण असून त्याचा त्याग करून जन्म-मृत्युच्या चक्रातून बाहेर पडणे हेच ध्येय मानणारा श्रमण संप्रदाय पुढे आला. सत्य/अहिंसा/अस्तेय/ब्रह्मचर्य/ अपरिग्रह हे सिद्धांत श्रमण संस्कृतीने दिले. पुढे याचीच परिणती म्हणजे मस्खरी गोशाल, बौद्ध, महावीर हे क्रांतीकारी विचारवंत पुढे आले. मस्खारी गोशाल मागे पडला असला तरी गौतमाने व महावीराने श्रमण संस्कृतीतून दोन मोठ्या धर्मांची निर्मिती केली. कालौघात वैदिक तत्वज्ञान व वर्ण्व्यवस्था राहिली पण वैदिक कर्मकांडे आणि वैदिक दैवते मागे पडली. शैव पूजा कायम राहिली, पण पौरोहित्य वैदिकांच्या हाती गेले. बुद्ध धर्म मुळचे स्वरूप हरपून बसला आणि नंतर खुद्द बुद्धाच्याच मूर्ती बनू लागल्या. जैन धर्म तीन घटकांत वाटला गेला आणि मूळ तत्वद्न्यानाशी फारकत घेवून (काही तत्वे वगळता) आपले अस्तित्व टिकवता झाला. ही अत्यंत थोडकी उदाहरणे मी देत आहे.

राजकीय संदर्भात पाहिले तर नगर राज्यांची सिंधू कल्पना नंतर मागे पडली आणि गणराज्य संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला आव्हान देणारा बिम्बिसाराचा पुत्र अजातशत्रू याने साम्राज्य ही संकल्पना पुढे आणली. पन अन्यायी राज्यव्यवस्थान्च्या विरोधात अनेक चळवळी झाल्या आहेत. मृच्च्हकतिक नाटकात त्याचे प्रतिबिंब दिसते. शिवाजी महाराजांचे उदाहरण माहीतच आहे. पण राज्य/साम्राज्ज्य ही संकल्पना भविष्यात इंग्रजांचे राज्य येईपर्यंत कायम राहिली. या व्यवस्थे विरुद्धही हिंसक/अहिंसक स्वरूपाच्या चळवळी झाल्या. स्वातंत्र्य मिळवून त्या काही प्रमाणात यशस्वी झाल्या.

धार्मिक असमतेच्या विरुद्ध मध्ययुगात अनेक चळवळी झाल्या. संतांच्या समतेच्या चळवळी आपल्यास माहीतच आहेत. त्या तर पुरेपूर अयशस्वी झाल्याचा इतिहास आहे.

आधुनिक काळातही ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादांच्या, अन्य वादान्सोबत अनेक चळवळी सुरूच आहेत. उदा. पर्यावरण वादी चळवळी. राजकीय चळवळी, इस्लामिक मुलतत्ववादी ते इस्लामिक पुरोगामी चळवळी. . इ.इ.इ.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे या चळवळी सर्वस्वी यशस्वी होतात का? चळवळींचे ध्येय साध्य होते काय? शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य होते काय? हे पडलेले प्रश्न. पुरातन काळापासून ज्याही काही चळवळी झाल्या, मग त्या धार्मिक असोत कि सामाजिक वा राजकीय, त्यांच्या मृत्यूची बीजे त्या-त्या चळवळींतील मुलभूत तत्वाद्न्यानातील दोष वा अनुयायांचे व्यक्तिगत स्वार्थ वा नेत्याचे तत्वज्ञान समजण्यातील अपयश यात पेरली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. कोणत्या चळवळीचा हेतू काय यावर तिचे यशापयश अवलंबून असते असे म्हणता येणार नाही. बौद्ध चळवळ उदात्त असूनही ती अपयशी ठरली. करुणा/मानवता/समता ती चळवळ तेंव्हाही आणि आताही देवू शकत नाही. शिवाजी महाराजांचे अनुयायी फक्त काही काळ त्यांची धोरणे जपू शकले. आताची बहुजनीय चळवळ सम्यक/एकात्म तत्वद्न्यानाच्या अभावी गटांगळ्या खावू लागली आहे. आर. एस. एस. ची हिंदुत्ववादी चळवळ कोठे चालली आहे हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात मानवी समाजाला पुढे नेण्या ऐवजी चळवळीच काही काळ यशस्वी होवूनही नेमक्या कोठे फसतात आणि मृत्यू डोहात डूबतात यावर संशोधन गरजेचे आहे.
मेलेल्या वा मृत्युपंथाला लागलेल्या वा नवेच सूत्र पकडत मूळ चळवळीपासून फारकत घेणार्या नव-चळवळी पुन्हा मृत्युपंथाला लागतात हा ज्ञात इतिहास आहे. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर ही नावे घेत महाराष्ट्रातच किती परस्परविरोधी चळवळी आहेत हे आपल्याला माहीतच आहे. सनातन धर्माचे (वैदिक) नाव घेत, पुरातन संस्कृतीचे उत्थान करणे हेच ध्येय असे माननार्या चळवळीन्चीही कमतरता नव्हती आणि नाही.

पण या सार्यांत (कोणती योग्य आणि कोणती अयोग्य हे येथे मत न नोंदवता) मानवी आत्मा या चलवलीनी गमावला आहे असे म्हणावे वाटते. त्यामुळे आधुनिक समाजाचे (मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत) कितपत हित होणार आहे हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर निरपेक्ष चिंतन करण्याची गरज वाटते.
चळवळी या मानवी समुदायाला वर्तमानाच्या सापेक्ष स्थिती पेक्षा अजून पुढे नेण्यासाठी असतात. वर्तमानातील अन्न्यायी
संदर्भ खोडून सम्यक ज्ञानमय समाज निर्मितीसाठी असतात. आज आपण पुरातन व्यवस्थांबाहेर आलो आहोत, पण मनोवृत्ती हिंसकच राहिल्या आहेत. त्या चळवळी यशस्वी कशा होवू देणार? आजवर सत्यार्थाने एकाही चळवळ यशस्वी झालेली नाही, नाहीतर आज महात्मा गांधीना शिव्या देणारे, त्याना नाकारणारे कसे असले असते? ते गांधींचे वा त्यांच्या तत्वद्न्यानाचे वा त्यांच्या अनुयायांचे अपयश आहे आणि हीच बाब प्रत्येक चळवळीच्या अध्वर्युन्ना लावता येईल.

आजच्या चळवळी ज्याही काही आहेत, मग त्या राजकीय असोत, सामाजिक असोत, कि धार्मिक...त्यांचीही मृत्यू घंटा वाजताना मला ऐकू येत आहे.
या चळवळींच्या नेत्या-अनुयायांना ऐकू येतेय काय?

सिंधू लिपीचे कोडे!

  (महाराष्ट्र टाईम्स, संवाद पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.) सिंधू लिपी आजही कोडे बनून बसलेली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकत...