Showing posts with label दहशतवादाची रुपे. Show all posts
Showing posts with label दहशतवादाची रुपे. Show all posts

Thursday, October 19, 2023

ज्यूंनी केलेला दहशतवाद: एक इतिहास

 ज्यूंनी केलेला दहशतवाद: एक इतिहास


१. इ.स.पु १२५० (अंदाजित काळ) ज्यू धर्माची स्थापना झाली. जुन्या करारानुसार यहवे हा ज्यूंना इस्त्राईल पवित्र भूमी दान करतो. ज्यूंनी त्यागलेल्या कोनन प्रांतावर त्यांना स्वामित्व हवे होते. जुन्या करारानुसार ज्यू ही आदमची संतती म्हणून घोषित करतो तर अन्य मानवजात हीन दर्जाची आहे असे सांगतो. तत्कालीन भूभागात राहणारे हित्ताईट, कोननाईट, अमोराईट, फिलीस्तीनी इत्यादी जमातींची प्रार्थनास्थळे जाळून टाका अशा स्वरूपाच्या आज्ञा जुन्या करारात येतात. एकेश्वर न मानणा-यांचा समूळ नायनाट हे त्यांचे ध्येय होते.

२. एक्झोडसमधील इजिप्तने केलेला ज्यूंचा छळ व सामुहिक निर्गमन ही कथा काल्पनिक आहे हे आता आधुनिक विद्वानांनी सिद्ध केलेले आहे.

३. धर्म स्थापनेनंतर सनपूर्व १००० पर्यंत ज्यूंनी कोनान प्रांतातून कोननाइट धर्म व त्यांच्या अनुयायांचा पुरेपूर उच्छेद केला.हजारो ठार मारले.

४. राजा डेव्हिडने जेरुसलेमला आपली राजधानी बनवले व त्याच्या मुलाने म्हणजे राजा सोलोमनने पहिले ज्यू मंदिर बांधले. (सनपूर्व ९२०) ज्यूंचा हा सुवर्णकाल मानला जातो. यानंतर असंख्य ज्यू व्यापार-उदेम आणि धर्मप्रचार यासाठी बाबिलोनिया व उर्वरीत अरब जगात पसरले. इजिप्शियन आणि अरब जमाती आपल्या पूर्वापार प्रतीमापुजक धर्माला चिकटून राहिल्याने दोन धर्मात संघर्ष तेंव्हापासूनच आहे.

५. यहवेने जुन्या करारात (ड्यूटरोनोमी ७ व २० मध्ये) ज्यूंना दहशतवादी आज्ञा दिलेल्या आहेत. हित्ताईत ते पेरीझाईट या सात राष्ट्रांना नष्ट करावे आणि त्यांच्या धर्मानुयायांना ठार मारावे या स्वरूपाच्या या आज्ञा आहेत.

६. यामुळे सनपूर्व ५८७ ते सनपूर्व ६४० पर्यंत इस्त्राईलवर अनेक आक्रमणे झाली. बाबिलोनियाच्या आक्रमणात ज्यूंचे जेरुसलेमचे मंदिर उध्वस्त केले गेले. इस्त्राईल हा कधीही स्वतंत्र प्रांत नव्हता. कधी पर्शियन ते कधी रोमन साम्राज्याच्या अंतर्गतच हा भूभाग होता. त्याला स्वतंत्र अस्तित्व नव्हते.

७. सनपूर्व ३३३ मध्ये अलेक्झांडरने हा सर्व प्रांत जिंकला. सनपूर्व ६३मध्ये रोमन सत्ता स्थापन झाली. या काळात ज्यू या प्रांतातून विस्थापित झाले पण अन्य जमाती मात्र तेथेच राहिल्या.

८. येशू ख्रिस्त ज्यू होता पण तो धर्मसुधारणा करतो म्हणून त्याला क्रुसावर चढवायला ज्यूंनी भाग पाडले.

९. आत्मघातकी दहशतवादाचा आरंभ ज्यूंनी सन ६३ पासून सुरु केला व आपली आत्मघातकी पथके निर्माण केली. Zealot या शब्दाचा तेथूनच उगम झाला. आत्मघातकी दहशतवादाचे उगमस्थान ज्यू धर्मात आहे.

१०. ज्यूंना बहुतेक सर्वच राष्ट्रे (भारत सोडून) दुय्यम वागणूक दिलेली हे. एवढेच नव्हे तर सन ५५४मध्ये फ्रांसने, सन ८५५मध्ये इटलीने, ज्यूंची समग्र हकालपट्टी केलेली आहे. अशा राष्ट्रांत युक्रेन, लिथुआनिआ, बोहेमिया, रशिया या राष्ट्रांचाही सहभाग आहे. केवळ ज्यू श्रीमंत होते, सावकार होते, कंजूस होते म्हणून असे झाले असे दावे केले जातात.

११. युरोपियन लोकांचा सेमेटिक (ज्यूही सेमेटिक वंशाचे आहेत म्हणून) लोकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती अठराव्या शतकापासून वाढली. बाप्पा अब्राहम आणि येशू हे सेमेटिक नव्हे तर आर्य वंशाचे होते हे सिद्ध करण्यात युरोपिय्न विद्वान्नानी आपल्या लेखण्या झिजवल्या. अब्राहम आणि भारतीय ब्रह्म यात साधर्म्य शोधले गेले.

१२. इस्त्राइल हा भाग फक्त हिब्रू लोकांचा हे सत्य नाही. तेथे अनेक अन्य जमाती पूर्वापार राहत आलेल्या आहेत. फिलीस्तीनीही त्यातलेच. दोन हजार वर्षापूर्वीच ज्यूंनी ही भूमिही त्यागलेली आहे.

१३. हिटलरमुळे जर्मनीत तर स्टालिनमुळे रशियात ज्यूवर अनन्वित अत्याचार झाले. लाखो अमानुष पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे ज्यूबद्दलची जागतिक सहानुभूती वाढत गेली.

१४. अद्याप इस्त्राएलची स्थापनाही झालेली नव्हती पण मेकोकेम बेगिन याने आखलेल्या योजनेनुसार २ जुलै १९४६ रोजी जेरुसलेममधील किंग डेव्हिड हे हॉटेल व डेरे यासीन येथे हत्याकांड केले. ९१ लोक किंग डेव्हिडवरील हल्ल्यात तर २६० अरब डेरे यासीन येथील हल्ल्यात ठार झाले. स्त्रिया व मुलेही मृतात होती. इर्गुन व स्टर्न gang या ज्यू दहशतवादी संघटना होत्या. बेगिन इर्गुनचा संस्थापक. आश्चर्य हे की याला पुढे शांतीचे नोबेल मिळाले. ट्रंप लाही मिळेलच बहुदा.

१५. मे १९४८ मध्ये अरब व ज्यूमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या काउंट फोल्बे बर्नाडोट याची हत्या स्टर्न Gang ने केली.

१६. इस्त्रएलने सुएझ कालव्यावर मालकी सांगून इजिप्तशी वैर घेतले. याच काळात सिनाई द्वीपकल्प व गाझा पट्टीचा भाग इस्त्राएलने बळकावला.

१७. १९६० मध्ये झालेल्या सहा दिवसीय युद्धात इस्त्राईलने जेरुसलेमवर ताबा घेत ज्यूंचे पवित्र मंदिरही ताब्यात घेतले.

१८. २१ फेब्रुवारी १९७३ ला ज्यू कमांडो पथकांनी त्रिपोलीवर हल्ला चढवून तेथील ३५ निर्वासितांना ठेचुन मारले. त्याच दिवशी इस्त्रैली लढाऊ विमानाने लीबियन नागरी विमानाला पाडले. त्यात शंभर प्रवाशांचा मृत्यू झाला.

१९. फेब्रुवारी १९९४ मध्ये गोल्डस्टीनने घडवलेले हेब्रोन हत्याकांड अत्यंत भयंकर मानले जाते. येथील इब्राहीमी मशिदीत नमाजासाठी जमलेल्या लोकांवर गोळीबार व बॉम्बफेक केली गेली. यात २८ नागरिक ठार झाले तर शेकडो जखमी झाले.

२०.. याच धर्मातून निघालेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम ने याच क्रूर आज्ञा पालनात आणल्या किंवा आपल्या धर्मात उसण्या घेतल्या.

ज्यू दहशतवादाच्या या ठळक घटना. स्थापनेपासून ज्यू दहशतवादाची कास धरत आले आहेत आणि तोच सिलसिला आजही चालू आहे. या संदर्भात आज या भागात शांतता नांदायची असेल तर इस्त्रैल आणि फिलीस्तीन यात भूभागाची काटेकोर वाटणी करून कायम स्वरूपी सीमा आखावी लागेल. संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रैल स्थापन करताना हा मुद्दा ठेवला होता पण ज्यूंनी तो मान्य केला नाही त्यामुळे हा प्रश्न चिघळत राहिलेला आहे. तत्वाने पाहिले तर दोन हजार वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या ज्यूंचा इस्त्राईलवर मुळीच अधिकार नाही. या राष्ट्राची स्थापनाच मुळात कृत्रिम आहे हे ज्युन्नाही समजावून घ्यावे लागेल. आज आहे ते वास्तव मान्य करत सीमा आखून घेणे आणि आपापल्या हद्दीत शांततेने जगणे हेच महत्वाचे आहे. त्यासाठी जागतिक नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

-संजय सोनवणी



Sunday, July 16, 2017

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

इसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला तो समस्त मानवजातीला काळिमा फासणारा होता यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखांहून अधिक नागरिक ठार झालेले आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती “सैतानी’ या शब्दातच वर्णन करता येईल. पुरातन स्थळांचा इसिसने केलेला विध्वंस अमानवीयच होता. मध्यपूर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला इसिसचा दहशतवाद युरोपच्याच भूमीवर जाऊन पोहोचेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांचा बदला घेण्यासाठी हा दहशतवाद फ्रान्समध्ये घुसला. ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे आला.

इसिसच्या दहशतवाद्यांनी असिरियन संस्कृतीच्या काळापासून प्रसिद्ध असलेले इराकमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले मोसूल शहर इराकी सैन्याला हुसकावून २०१४ मध्ये ताब्यात घेतले होते. मोसूलला राजधानी बनवत इराकचा जवळपास अर्धा हिस्सा इसिसने व्यापला. मोसूलमधील अल नुरी मशिदीतूनच इसिसचा सर्वेसर्वा अल बगदादी याने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली होती. धार्मिक पोलिसांनी तेव्हापासून मोसूल व त्या शहराच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. संगीत ऐकणे या साध्या बाबीसाठी नागरिकांचा छळ करत त्यांना ठार मारले होते. या कालावधीत इंटरनेट व फोन वापरायलाही मोसूलमधील नागरिकांना बंदी होती. गैरइस्लामियांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. इसिसने या शहराला जवळपास आपली राजधानी बनवत एक जागतिक धोका बनायला सुरुवात केल्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेणे इराकसाठी अत्यावश्यक बनले होते. अमेरिकन सैनिकांच्या सहकार्याने सुमारे २२ हजार इराकी सैन्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरू केले. गेले काही महिने यासाठी घमासान युद्ध होत होते. हवाई हल्लेही केले गेले. हरतच चाललेल्या इसिसने शेवटी आत्मघातकी प्रतिहल्लेही केले. पण शेवटी मोसूलवर विजय मिळवण्यात इराकी सैन्याला यश मिळाले. गेल्याच आठवड्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी मोसूलमध्ये आले व इसिसवरील विजय घोषित केला.

पण या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राचीन वारसा सांगणाऱ्या मोसूल शहराचा पूर्ण विध्वंस झाला आहे. जवळपास साडेआठ लाख नागरिक शहर सोडून गेले आहेत. मृतांचा आकडा अजून जाहीर झाला नसला तरी ती संख्या लाखाच्या आसपास जाऊ शकते. जेथे नजर जाईल तेथे उद्ध्वस्त घरे आणि रस्त्यांवर डबरांचे ढीग आहेत. ज्या अल नुरा मशिदीतून अल बगदादीने खिलाफतीची घोषणा केली होती ती या खिलाफतीचे प्रतीक असलेली मशीदही जमीनदोस्त झाली आहे. लेनिनग्राडची द्वितीय विश्वयुद्धात जशी दयनीय अवस्था झाली होती त्यापेक्षा भयंकर अवस्था आज मोसूलची आहे. युद्ध कधीच रम्य नसते. मोसूलचा ताबा मिळाला असला तरी इसिसचे अजूनही अंडरग्राउंड असलेले काही आत्मघातकी गट कधीही हल्ला करू शकतात म्हणून आसपासच्या गावांनाही इसिसमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा विजय महत्त्वाचा यासाठी आहे की सैतानी आकांक्षांनी प्रेरित एकापाठोपाठ नृशंस कृत्ये जगभर करणाऱ्या इसिसला सर्वात मोठा झटका मिळाला आहे.

पण इसिसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला असला तरी अजून अबू बक्र अल बगदादी व त्याचे नेटवर्क जिवंत आहे. त्याची पोहोच अद्यापही जगातील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांपर्यंत आहे. अल नुरा मशिदीचा विध्वंस म्हणजे बगदादीच्या खिलाफतीचा विध्वंस असे मानण्यात येत असले तरी बगदादीमध्ये नवीन दहशतवादी केंद्रे उभी करण्याची शक्ती आणि तसे तत्त्वज्ञानही असल्याचे मान्य करावे लागते. इस्लामिक राज्याची स्थापना हे ध्येय बाळगणारे व त्या ध्येयासाठी जीव धोक्यात घालू पाहणारे मुस्लिम युवक दुर्दैवाने कमी नाहीत. दीर्घकाळ मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष राज्य चालवल्यामुळे अल कायदासारख्या कसलाही भूभाग ताब्यात नसलेल्या दहशतवाद्यांपेक्षा इसिसचा दबदबा पुढेही राहील असा अभ्यासकांचा कयास आहे. मोसूलमधील पीछेहाटीनंतर काही काळ इसिसकडे येणारा भरतीचा ओघ जरी कमी झाला तरी तो पूर्ण थांबणार नाही. याचे कारण म्हणजे मोसूल पडले असले तरी अद्याप ताल अफार, हौज्जासारखी काही शहरे आणि अनबारसारखे विभाग अजून इसिसच्या ताब्यात आहेत. सिरियामधील युफ्राटिस नदीचे बरेचसे खोरे अजूनही इसिसच्याच नियंत्रणात आहे. मोसूलमधील इसिसचे अनेक बडे दहशतवादी पळून तेथे आश्रयाला गेले असण्याची शक्यता आहे. मोसूलमधील विजयामुळे जरी इराकी सैन्याला मोठे यश आले असले तरी हे सर्व इसिसव्याप्त प्रांत ताब्यात घ्यावे लागतील. शिवाय इसिसने लिबिया, इजिप्त, येमेन, अफगाणिस्तानातही आपले जे तळ बनवले आहेत तेही उद्ध्वस्त करावे लागतील. त्याशिवाय इसिसवरील विजय पूर्ण झाला आहे असे म्हणता येणार नाही. जगावरील इसिसचे सैतानी सावट अजूनही गेलेले नाही.

जगासमोरचा विशेषत: युरोपसमोरचा सर्वात मोठा धोका इसिसचा आहे. युरोपमध्ये एखादे फार मोठे दहशतवादी कृत्य करण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे. मोसूलमधील कंबरडे मोडणारे अपयश इसिस सहजी पचवणे शक्य नाही. इसिसची रानटी पद्धत पाहता अन्यत्र हिंसाचाराची राळ उठवून देत आपली शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही हे दाखवण्याचा इसिसचा प्रयत्न असेल. भारतालाही इसिसच्या या संभाव्य संकटाची दखल घेत त्याला रोखण्याची व्यवस्था करावी लागेल. बगदादी कोठे आश्रय घेतो हे गुप्तचर यंत्रणांना अद्याप तरी माहीत नाही.

ओसामा बिन लादेनप्रमाणे त्याला शोधून ठार मारायची कितीही इच्छा गुप्तचर यंत्रणांची असली व एकदा तसा प्रयत्नही केला गेला असला तरी अद्यापही त्यात यश आलेले नाही. पण प्रश्न येथे केवळ बगदादीचा नसून ज्या विचारसरणीची इमारत रचत, नव-खिलाफतीचे आकर्षण दाखवत त्याने जो प्रभाव निर्माण केला आहे तो कसा हटवायचा हा मुख्य प्रश्न आहे व त्याला पाश्चात्त्य राष्ट्रांकडे किंवा इराक-सिरियाकडेही उत्तर आहे असे दिसत नाही. मोसूलचे ध्वस्त अवशेष व त्यात काही न समजणारी खेळणारी लहानगी मुले, बहिणींचे सांत्वन करणारे आईबाप, गमावलेले भाऊ, कसेबसे जिवंत असलेले जगण्याच्या शोधात किडूकमिडूक सोबत घेऊन मोसूल सोडणारे अभागी सामान्य नागरिक हे दृश्य पाहून तरी कोणाला करुणेचा पान्हा फुटेल अशी आशा बाळगली तरी दहशतवादी हिंसक मनोवृत्तीकडून तशी अपेक्षा करता येत नाही. इसिसने दहशतवाद केला. त्यांना जवळपास तसेच उत्तर मिळाले आहे. पुढेही हा संघर्ष कदाचित असाच चालू राहील. आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायाला यापासून धडा घेत इसिस व तत्सम प्रवृत्तींना एकटे पाडण्याशिवाय गत्यंतर नाही.

कडव्या इस्लामवादाचे इसिस हे जागतिक प्रतीक बनले आहे. सर्वच मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इसिसने दूषित केला. स्थलांतरित झालेलेही मुस्लिमच होते, पण त्यांच्यातही इसिसच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने त्यांना आसरा देणाऱ्या राष्ट्रांची पंचाईत तर केलीच, पण स्थलांतरितांनाही स्थानिकांच्या द्वेषाचे कारण बनावे लागले. आपल्या देशात परतायचे त्यांचे स्वप्न इसिसचा समूळ बीमोड कधी होतो यावर अवलंबून आहे. इराक-सिरियाचे पुढचे लक्ष्य इसिसचे नेटवर्क समूळ उखडणे हेच असेल व ते लवकर साध्य व्हावे ही अपेक्षा! दहशतवाद्यांचा कधी ना कधी खात्मा होतोच, पण त्यासाठी काय किंमत मोजावी लागते हे मोसूलचे उद्ध्वस्त अवशेष पाहिल्याखेरीज समजणार नाही याचीही दखल सर्व धर्मांतील मूलतत्त्ववाद्यांनी घेतली पाहिजे. हा त्यांच्यासाठीही धडा आहे

Wednesday, June 7, 2017

सार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद!


Image result for maoists


नक्षलवादी दहशतवादामुळे देशातील जवळपास एक तृतियांश भाग ग्रासला गेला आहे. नागरिक आणि सुरक्षा दलांच्या पोलिसांच्या हत्या तर आता नियमित बाब बनली आहे. नक्षलवाद्यांनी आजवर नृशंस पद्धतीने मारलेल्या लोकांची संख्या तेरा हजारपेक्षा अधिक असून त्यात तीन हजार हे केंद्र व राज्य राखीव पोलिस दलांचे जवान आहेत. तुलनेने माओवाद्यांना ठार करण्यात आलेले प्रमाण नगण्य असेच आहे. अलीकडेच छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी २५ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना ठार मारले आणि पुन्हा एकदा नक्षलवाद चर्चेचा विषय बनला. अशा गंभीर घटना घडणे आणि कोणतीतरी दुसरीच नवी घटना घडेपर्यंत ती चघळत बसणे भारतीय जनमानसाला नवे नाही. एवढ्या हत्या भारतात कोणत्याही दहशतवादात अथवा भारत-पाक युद्धादरम्यानही झाल्या नाहीत. नक्षलवादी हे आदिवासांचे हितकर्ते आहेत असे म्हटले जात असले तरी ठार मारल्या गेलेल्या नागरी लोकांपैकी बव्हंशी आदिवासीच आहेत. खरे तर नक्षलवादामुळे आदिवासींची अवस्था अधिकच बिघडली आहे. एकीकडे पोलिस तर दुसरीकडे आदिवासी या कचाट्यात सापडलेल्या आदिवासींचे जगणे भयाच्या सावटाखाली राहिले आहे आणि त्यात बदल दिसत नाही.

नक्षलवादाची म्हणजेच माओवादाची सुरुवात नक्षलबारी गांवातून १९६७ साली सुरु झाली असली तरी त्याला पार्श्वभुमी मात्र बरीच जुनी आहे. १९४६ ते १९५१ या काळात तेलंगणात झालेल्या शेतक-यांच्या सशस्त्र उठावात माओवादाची पाळेमुळे आहेत असे तज्ञ म्हणतात. भारत-चीन युद्धकालात कम्युनिस्टांनी कधी उघड तर कधी छुपी चीनचीच बाजू घेतली होती हा इतिहास सर्वांना माहित आहेच. आधी या उठावांचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) करत होती. पुढे मतभेद झाल्याने कधी फुट तर कधी युत्या करत २००४ मध्ये माओवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली. त्यात आंध्रातील पीपल्स वॉर ग्रुपही सामील झाला. असे असले तरी आज देशात डाव्या दहशतवाद्यांचे २३ गट कार्यरत आहेत अशी शासनाकडे माहिती आहे. असे असले तरी देशात घडवलेल्या ८०% हत्यांत माओवादी कम्युनिस्ट पार्टीचाच हात आहे. "पशुपती ते तिरुपती" असा तांबडा पट्टा त्यांनी व्यापला आहे. 

माओवाद्यांचे कार्य आपल्या सैन्यासारखेच अत्यंत शिस्तबद्ध चालते. धार्मिक भावनेच्या अतिरेकात दहशतवादी कृत्य करणा-यांशी त्यांची तुलनाही होऊ शकत नाही. अत्यंत थंड डोक्याने ते अथकपणे सर्वव्यापी काम करत असतात. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पैसा उभा करणे आणि शस्त्रास्त्र सामग्री व संदेशवहनाची साधने मिळवणे. यासाठी त्यांनी तालीबानप्रमाणेच मार्ग काढले आहेत. यात अरण्यक्षेत्रात कार्यरत कंपन्या, ठेकेदार व अन्य व्यावसायिकांकडून खंडण्या गोळा करणे ते अफुची शेती करणे यांचा समावेश तर होतोच पण चीनमधुनही त्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळते. शिवाय अपहरणे करुन आर्थिक खंडण्या उकळणे हा तर महामार्गही वापरला जातो. उदाहरणार्थ २०१२ मध्ये ३१३ व्यक्तींचे माओवाद्यांनी अपहरण केले. ज्यांच्याकडून खंडणी मिळाली नाही अशा ५९ व्यक्तींना ठार मारले गेले. अन्यांनी खंडणी दिली असणार यात शंका बाळगायचे कारण नाही. विदेशी पर्यटकांचेही अपहरण केले गेले आहे. याशिवाय आदिवासी मजुरांकडुनही वर्गणी स्वरुपात पैसे गोळा केले जातात. शिवाय त्यांची अत्यंत सक्षम अशी गुप्तचर यंत्रणाही आहे. अनेकदा सुरक्षा दलांचे संभाव्य हल्ले त्यांना आगावुच समजतात ते यामुळेच. 

विस्फोटके तयार करण्यासाठी कच्चा माल ते कसा मिळवतात हे पाहिले तर थक्क व्हायला होते. सुरक्षा दलांशी लढायला ते भुसुरुंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. या भुसुरुंगांना अमोनियम नायट्रेटची आवश्यकता असते. खाणींमध्ये हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारतात याची आयात करावी लागते. अर्थात परवान्याशिवाय ही आयात होऊ शकत नाही. या आयात होणा-या अमोनियम नायट्रेटमध्ये "गहाळ" होणा-या मालाचे प्रमाण मोठे आहे. एकट्या वैजाग बंदरात उतरणा-या ३.१४ लाख टनातील साडेतीन हजार टन अमोनियम नायट्रेट २०१२ मध्ये गहाळ झालेले होते. दरवर्षी हेच प्रमाण असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. ही चोरी अत्यंत हुशारीने केली जाते. याशिवाय माओवाद्यांना लागणारी अनेक हत्यारे अरण्यात त्यांनी निर्माण केलेल्या कारखान्यांत होते. बाकी गरज भागवायला चीन आहेच! यथे हे लक्षात घेतले पाहिजे कि माओवाद्यांत उच्चशिक्षित व तंत्रज्ञांची कमतरता नाही. त्यामुळे एरवी दुष्प्राप्य असलेले तंत्रज्ञानही आत्मसात करण्यात ते आघाडीवर आहेत. आजमितीला तीस हजारांपेक्षा अधिक माओवादी केवळ शस्त्रास्त्र पुरवठा व संदेशवहनाचे काम नेटाने सांभाळत असतात असे सरकारी अहवालच सांगतात!

साध्य काय करायचे आहे?

साम्यवाद्यांचे मुख्य भांडवल म्हणजे दारिद्र्य! शोषित व वंचितांच्या दुरावस्थेवर उतारा म्हणजे त्यांचेच राज्य असले पाहिजे असा मुलभूत सिद्धांत. सर्व साधनसामग्री व संपत्तीवर लोकांचीच सामुहिक मालकी आणत वर्गविरहित समाजव्यवस्था आणणे हे त्यांचे स्वप्न. कार्ल मार्क्सने साम्यवादाकडे जाण्याची पहिली पायरी समाजवाद असल्याचे सांगितले असले तरी साम्यवाद याच पद्धतीने व याच तत्वज्ञानावर जगात पसरला नाही. भारतात दारिद्र्य आहेच. जातीआधारित विषम सामाजिक स्थितीची त्याला जोड मिळाली आहे. लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही. भारतत ती आहेच. साम्यवादाची पहिली पायरी म्हणजे समाजवाद...आणि तोही भारतात आहेच! त्यामुळे माओवादी तत्वज्ञानाला भारतीय काही समाजघटकांत रुजवणे तेवढे अवघड नव्हते. त्यामुळेच अरण्यातील प्रत्यक्ष बंदुका घेऊन भारतीय शासनाशी युद्ध पुकारणा-या माओवाद्यांपेक्षा शहरी बुद्धीवाद्यांत माओवाद समर्थकांची व सहानुभुतीदारांची संख्या मोठी आहे. आपण त्यांची उद्दिष्टे थोडक्यात पाहुयात.

१. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य नाकारणे.
२. राजकीय सत्ता मिळवण्यासाठी सशस्त्र लढ्याचा चीनी मार्ग वापरणे.
३. कडेचे प्रांत ताब्यात घेत जात मग केंद्रीय भागही ताब्यात घेणे. 
४. दक्षीण आशियातील माओवाद्यांची मदत घेत भारतातील केंद्रीय सत्ता उलथून टाकणे.
५. भारत हा राष्ट्रवाद्यांचा खुला तुरुंग आहे असे मत प्रचारित-प्रसारित करणे.
६. स्त्रीया/दलित/अल्पसंख्यंकांचे प्रश्न हे राष्ट्रीय प्रश्न "वर्गीय प्रश्न" आहेत असे घोषित करत राहणे. शेतक-यांचे सशस्त्र लढे उभारणे.
७. निवडणुका होऊ न देणे किंवा त्यांच्यावर बहिष्कार घालणे.
८. केंद्रीय सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भारताला "पिपल्स डेमोक्र्यटिक फेडरल रिपब्लिक" घोषित करणे.

वरील उद्दिष्टे व ज्या पद्धतीने माओवादी पुढे सरकत आहेत ते पाहता नक्षलवादी हे नुसते देशद्रोही नव्हेत तर ते देशाशी युद्ध पुकारणारे देशशत्रू आहेत हे सहज लक्षात येईल. असे असुनही भारतीय बुद्धीवादी व वंचितांच्या हिताच्या चळवळींमध्ये सामील असलेले जर माओवादाचे समर्थक अथवा सहानुभुतीदार बनत असतील तर ते चिंतेचे नाही असे कोण म्हणेल?  विनायक सेन यांचा नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या आरोपावर त्यांना अटक केली होती व न्यायालयाने त्यांना शिक्षाही ठोठावली, तर देशभरातील भावनीक पण अडाणी नौजवानांनी व मानवाधिकारवाद्यांनी विनायक सेनांच्या मुक्ततेसाठी जालांवरुन व माध्यमांतुन रान उठवत त्यांना सोडायला भाग पाडले. हे होताच लगोलग माओवाद्यांनी एका आमदाराचे अपहरण केले. या अपहरण नाट्यात नक्षलवाद्यांच्या मागण्या मान्य करायला लावत आमदाराची सुटका घडवुन आणण्यात सेन यांनीच पुढाकार घेतला. सेनांची भुमिका संशयास्पद आहे हे नक्कीच आहे. पण त्याबाबत बोलायचे साहस सहसा कोणात नसते. अरुंधती रॉय सारख्या बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका माओवाद्यांना "बंदुका हाती घेतलेले गांधीवादी!" असे संबोधतात. 

डा. प्रकाश आंबेडकरांनी कबीर कला मंचाच्या शितल साठे व सचिन माळी या संशयित नक्षलवाद्यांच्या शरणागती सोहळ्यात त्यांच्या बाजुने सहभाग घेतला होता. फुले-आंबेडकरी विद्रोही चळवळीत काम करणारे नक्षलवादी कसे असू शकतील या प्रश्नामुळे लोकांची सहानुभुतीही उभयतांच्या बाजुने होती. प्रत्यक्षात ते दोघेही अन्य अनेकांबरोबर नक्षलवादी गोटात वावरणारे होते असे पुरावे पुढे येवू लागताच अनेकांची बोलती बंद झाली. २०१३ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या नक्षली हिंसेवर एका वाहिनीवरील चर्चेत नक्षलावाद्यांशी सहानुभुती दाखवत प्रकाश आंबेडकरांनी "बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:च घटना निरर्थक व फाडुन टाकायच्या लायकीची आहे असे म्हटले होते...घराणेशाही आल्यामुळे लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही...मतपेट्या निरर्थक झाल्या आहेत..." अशा आशयाचे स्फोटक विधान केले होते. या चर्चेत माझाही सहभाग होता. मी नक्षलवादावर तोफ डागल्याने ही मंडळी अस्वस्थ झाली.  प्रकाश आंबेडकरांच्या मेव्हण्याचा भाऊ श्री. मिलिंद तेलतुंबडे हे महाराष्ट्रातील माओवादी (नक्षलवादी) समन्वय समितीचा म्होरक्या असून सध्या फरार आहेत हेही वास्तव लक्षात ठेवावे लागणार आहे. मेधा पाटकरांनी याच चर्चेत जरी नक्षलवाद्यांच्या हिंसेचे समर्थन केले नसले तरी नक्षलवादी चळवळीला मात्र पुरती सहानुभूती दाखवली. मध्यंतरी एका वृत्तपत्राने "आंबेडकरी चळवळ नक्षलवादाच्या वाटेवर" असल्याच्या बातम्या छापल्या होत्या. मराठवाड्यातील तरुण वर्ग, जो पुर्वी एकमेकांना "जयभीम" असे अभिवादन करत असे तो आता एकमेकांना "लाल सलाम" घालू लागल्याच्याही वार्ता येत आहेत. पुणे शहरात नक्षलवाद्यांनी तळ ठोकला असल्याचे विधान तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. एकुणातच नक्षलवादी चळवळीला विचारवंतांचे आणि काही जनसामान्यांचे जे समर्थन मिळु लागलेले दिसते हे भयावह आहे व त्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. पुणे, मुंबई व ठाण्यात माओवाद्यांच्या अनेक हस्तकांना आजवर अटक केली जात आहे. छुप्या समर्थकांचे काय करणार?

नक्षलवादी हे आदिवासी, शोषित वंचितांचा लढा उभारतात व सध्याची भारतीय व्यवस्था या घटकांना न्याय देवू शकत नसल्याने नक्षलवाद्यांना सामाजिक समर्थन वाढते आहे असे चित्र दिसते. पण समजा या कम्युनिस्टांना वा माओवाद्यांना अदिवासींच्या उद्धाराची एवढी पर्वा आहे तर मग प्रश्न असा उपस्थित होतो कि जर १९७७ ते २०११ पर्यंत सतत ३४ वर्ष मार्क्सवादी कम्मुनिस्ट प. बंगालमद्धे सत्तेत होते आणि बंगालमद्धे अरण्यवासी आदिवासींची संख्या कमी नाही तर मग या काळात कम्युनिस्टांनी आपल्या राज्यातील आदिवासींचे काय भले केले? केले असते तर मिदनापुर व लालगढ सारख्या भागांतही माओइस्ट का हत्याकांडे करत आहेत? काय हेतु आहे? अर्थ स्पष्ट आहे, आदिवासींचा व शेतक-यांच खरेच कळवळा असता तर प. बंगाल आणि केरळमधेलही आदिवासींचे प्रश्न सुटले असते वा ते किमान अन्य राज्यांतील आदिवासी जमातींपेक्षा उच्च स्तरीय जीवन तेथे जगु शकले असते, पण तसे चित्र नाही. किमान तेथे तरी माओवाद्यांनी हत्याकांडे केली नसती. याचाच अर्थ असा कि आदिवासींचे कल्याण हा त्यांचा कधीच हेतु नव्हता व नाही. असे असते तर केवळ "खब-या" ठरवत असंख्य आदिवासींची कत्तल माओवाद्यांनी केली नसती. सामाजिक विकासाला अडवले नसते. पण प्रत्यक्षात ते चित्र नाही. 

दुसरी बाब आहे सामाजिक समतेची व जातीविरहित समाजाची. गांधी-फुले-आंबेडकरांनी हेच स्वप्न पाहिले आणि आजच्या समताधिष्ठित भारताची निर्मिती केली. मतपरिवर्तन व सामाजिक न्यायातून सर्वांचा विकास हाच सामाजिक बदलाचा पाया मानला...बंदूक नव्हे. या देशाला कम्युनिस्टांच्या हुकुमशाहीयुक्त समतेची आणि जातीविरहित समाजरचनेची संकल्पना कशी मान्य होणार? मुळात तो खरा हेतु आहे काय? बरे, माओवादी हत्या करतात ते कोण आहेत? त्यांनी आजवर जे सरकारी-गैरसरकारी नागरिक व आदिवासी क्रुरपणे ठार मारले त्यात ९५% पेक्षा अधिक सामान्य व बहुजन समाजातीलच लोक नव्हेत तर मग कोण आहेत? सर्वसामान्य निरपराधांना ठार मारुन कोणत्या समतेच्या व जातीविरहिततेच्या गप्पा हे लोक मारत आहेत? ते सरकारी कर्मचारी/पोलिस/निमलष्करी दलांच्या जवानांना ठार मारतात कारण ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या शत्रु राष्ट्राचे, भारतीय सैनिक/हस्तक आहेत! सामाजिक क्रांतीचा नारा ही एक निव्वळ धुळफेक आहे. 

खरे तर नक्षलवाद्यांना "भारतीय" मानणेही चुकीचे आहे. ते भारताचे शत्रू असून संविधान मान्य नसलेले व सध्याची लोकनियुक्त शासन व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी सज्ज असलेले सशस्त्र सैनिक आहेत. आदिवासींनी व्यापलेली घनदाट जंगले ही त्यांच्यासाठी कारवाया करण्यासाठी उपयुक्त आश्रयस्थाने असल्यने त्यानी तेथे आश्रय घेतला आहे, एवढेच. म्हणुनच त्यांना भारत सरकारचा आदिवासी बहूल क्षेत्रांत विकासासाठी केलेला हस्तक्षेप कोणत्याही कारणासाठी नको आहे. आदिवासींचे हित हा काही त्यांचा कधीही अजेंडा नव्हता व नाही. अरण्ये हे त्यांचे किल्ले आहेत...हे लक्षात ठेवायला हवे. हे किल्ले अभेद्य ठेवण्यासाठी त्यांनी एक प्रकारे आदिवासींना ओलीस ठेवले आहे असे म्हटले तरी चालेल. माओवाद हा दहशतवाद नसुन वा कोनत्याही प्रकारची सामाजिक क्रांतीवादी चळवळ नसुन भारताशी पुकारलेले युद्ध आहे व त्याची व्यापकता पाकिस्तानी दहशतवादापेक्षा भिषण आहे, हे लक्षात यावे. देशांतर्गत पाकिस्तानप्रणित मुस्लिम व सीमावर्ती पाकिस्तानी दहशतवाद यात फरक करावा लागतो. मुस्लिम दहशतवाद हा बव्हंशी हिंसक कारवायांपुरता मर्यादित आहे. तो बहुदा शहरांतच होतो. त्यांचे पकडले जाणेही तुलनेने सोपे व कमी धोकेदायक असते. सीमावर्ती दहशतवादाचा मुकाबला करायला खडे सैन्य आहे. ही बाब लक्षात न घेता भारतीय जनमानस मुस्लिम दहशतवाद्यांबाबत जेवढे संवेदनशील आहे तेवढे नक्षलवाद्यांच्या कारवायांबाबत नाही. पण हा लढा दहशतवाद्यांशी नाही हे समजावून घ्यावे लागेल. त्यांच्याही शिस्तबद्ध प्रशिक्षीत अशाच सेना आहेत ज्या दहा-दहांच्या दलम (प्ल्यटुन) मद्धे वाटल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडे सर्वच अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व दळनवळणाची साधने आहेत. अरण्ये हीच त्यांची आश्रयस्थाने असुन आदिवासी हे त्यांचे जवळपास "होस्टेज" आहेत, ज्यामुळे धडक कारवाया होवु शकण्यात अडथळे येतात. त्यापेक्षा मोठी समस्या ही कि सामान्य पोलिस दले व राखीव पोलीस दले अशा प्रशिक्षीत सैन्याशी कधीही यशस्वी लढा देवु शकणार नाहीत. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, हत्यारे, वाहने, टेहळणीयंत्रे तर त्यांच्याकडे नाहीतच पण धड वाहनेही नाहीत. 

शिवाय स्थानिक कनिष्ठ पोलिस हे आदिवासींमधुनच आले असतात. अनेक तर नोकरीत लागल्यानंतर गांवी फिरकत नाहीत कारण माओवाद्यांच्या हातून मरण्याचाच जास्त संभव असतो. अनेक पोलिस दबावाखाली नक्षलवाद्यांचे खबरी बनतात असेही आरोप केले जातात. अनेक आदिवासींना पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी अत्यंत क्रुरपणे मारलेले आहे. तणावाखाली वावरणारे पोलिसही अनेकदा अक्षम्य चुका करुन बसतात. तेही नक्श्लवाद्यांचे खबरी समजुन केवळ संशयाने आदिवासींचा अतोनात छळ करतात. त्यात अनेकांचे मृत्युही ओढवलेले आहेत. एडका अत्राम हा एक असाच अभागी. पोलिसांच्या छळाने तो मेला. त्याच्या कुटुंबियांना मी आर्थिक मदत दिली तर पोलिस माझेच शत्रू झाले. आदिवासी दुहेरी संकटात सापडले आहेत ते असे. त्यात त्यांचा विकास अधांतरीच राहणार हे ओघाने आलेच!

नक्षलवाद्यांशी केंद्रीय राखीव पोलिस बले लढा देण्यास समर्थ आहेत काय हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. केंद्र सरकार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सैन्यदले वापरण्यास अनुकुल नाही. वरिष्ठ सेनाधिकारी या प्रश्नाला केवळ "कायदा व सुव्यवस्थेचा" प्रश्न समजतात व पोलिसांनीच तो हाताळावा असे म्हणतात. पण हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा असेल? जेथे मुळात अप्रत्यक्ष सत्ताच माओवाद्यांच्या हातात आहे, असंख्य आदिवासी पाड्यांवर साधे शिक्षक-डाक्टर काय पोलिसही जाण्याची हिम्मत करु शकत नाहीत, तेथे काय सुव्यवस्था राखणार? आदिवासींची माओवाद्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिम्मत नाही. काढला तर खबरी म्हणुन जाहीरपणे क्रुर रित्या ठार मारण्यात येते. जेथे आपले राज्यच नाही तेथे कायदा-सुव्यवस्था कोण आणि कशी राबवणार? मुळात आज माओवादग्रस्त भागात निवडणुक प्रक्रिया राबवणेही कठीण झाले आहे. उमेदवार म्हणून उभे रहायलाही लोक घाबरतात. २०११ मध्ये एका माजी दलम कमांडरच्या बायकोने ग्रामपंचायतीची निवडणुक लढवली म्हणुन तिच्या नव-याला भंडारा जिल्ल्ह्यात ठार मारले गेले. माओवाद्यांनी व्यापलेले प्रांत म्हणजे त्यांचीच सत्ता असलेले भारतीय भुभागावर निर्माण झालेले स्वतंत्र राष्ट्रच आहे...याबाबत शंका नसावी. हा विळखा एवढा वाढला आहे कि माओवादी त्यांचे संपुर्ण व्यवस्था उलथवण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर आहेत असेच दुर्दैवी चित्र दिसते.

सरकारने नक्षलवाद्यांशी नेहमीच सामोपचाराचे धोरण स्विकारले आहे. नक्षलवाद्यांनी शरण यावे यासाठीही अनेक योजना जाहीर केल्या जात असतात. त्यामुळे बंदुकीचा रस्ता सोडून सुव्यवस्थेच्या जगात येवू पाहणारेही कमी असले तरी काही आहेत. पण त्यांचे शरणागत होणे हेही कटाचा भाग असल्याची शंका काही घटना पाहिल्यावर येते. "सलवा जुडूम" सारखी संकल्पनाही वापरली गेली आहे. सलवा जुडूममधील योद्धे हे आदिवासीच असायचे. नक्षलवादी आदिवासींचा वापर करतात तसाच वापर नक्षलवाद्यांच्या विरोधात करायची ही योजना होती. पण ती फसली. सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये बेकायदेशीर घोषित केले. सरकार दहशतवाद संपवण्यासाठी प्रतिदहशतवादाचे हत्यार वापरू शकत नाही असेच एकंदरीत न्यायालयाचे म्हणणे होते. सलवा जुडुममुळे हिंसाचाराच्या घटनांतही वाढच झाली होती. परंतू आदिवासींच्या मनात नक्षलवाद्यांबद्दल वाटते तेवढी सहानुभुती नाही हेच या एकंदरीत प्रकरणावरुन समोर आले. 

गेल्या ४० वर्षात नक्षलवाद भारताच्या १/३ भुमीवर ठाण मांडून बसक्ला आहे. आपले केंद्रीय व राज्य राखीव पोलिस फोर्स नक्षलवाद्यांच्या संघटित आणि आधुनिक हल्ल्यांना तोंड देण्यास पुरेसा सक्षम नाही. त्यामुळे सैन्यदलांनीच धडक कारवाई करावी असा मतप्रवाह असला तरी तो प्रत्यक्षात येणे शक्य दिसत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष नक्षलवाद्यांपेक्षा त्यांच्या समर्थकांचीच संख्या अधिक आहे. यामध्ये आदिवासींचा विकास होणे, त्यांनी मुख्य प्रवाहात येणे अशक्य बनून बसले आहे.

आपल्या देशातील दारिद्र्याचा प्रश्न नवा नाही. जातनिहाय अन्याय आजही कमी झालेले नाहीत. गरीबांचे शोष्ण फक्त व्यवस्थेतील लोक करतात असे नव्हे तर शासकीय अधिकारीवर्गही यात सामील असतो. भारतातील बव्हंशी खनिजसंपत्ती आदिवासीबहूल प्रदेशांतच आहे. तेथे खाणी सुरु करणे म्हणजे आदिवासींच्या हक्कांवर आक्रमण असा समज पसरू द्यायला उद्योजक आणि सरकारी अधिकारी ते नेतेही जबाबदार आहेत. बरे, उद्योगधंदे झाले नाहीत, सर्वदूर रस्ते, शिक्श्ढण व आरोग्यसेवा पोहोचल्या नाहीत तर एकुणात देशाचाच विकास कसा होणार हाही प्रश्न आहे. या तिढ्यातुन सुटण्यासाठी मार्ग असा असला पाहिजे की प्रत्यक उद्योगाला आदिवासी विकासात सबळ वाटा उचलायला लावला पाहिजे. संपर्क, संवाद आणि सहकार्य या भुमिकेतुनच नक्षलवाद्यांच्या प्रचाराला उत्तर देता येईल. आज अशा भागातील सर्वच उद्योग नक्षलवाद्यांना खंडणी देत असतात. ती देण्यापेक्षा आदिवासी हिताची कामे करवून घेणे व उद्योगांना संरक्षण देणे हे काम सरकारला करावे लागेल. नक्षल्यांना आदिवासींचे कसलेही हित नको आहे हे सर्व जगाला उदाहरणे देत पटवून सांगत त्यांच्याविरुद्ध सैनिकी कारवाई करण्याची गरज आहे. यासाठी व्यापक मतैक्य बनवावे लागेल. कारण नक्षलवाद हा भारताच्या सार्वभौमतेविरुद्ध पुकारलेले युद्ध या स्वरुपाचा आहे हे अत्यंत गंभीरपणे आम्हाला समजावून घ्यावे लागेल.

त्याच वेळीस शेतकरी व भुमीहीनांचा प्रश्नही राजकीय स्वार्थ न पाहता सोडवावा लागेल. खरे तर साम्यवादाची पहिली पायरी असलेल्या भारतीय समाजवादानेच शेतक-यांचा गळा घोटला आहे. सरकारने शेतीक्षेत्राला जाचक बंधनांतून मूक्त करत त्यांना जागतिकीकरणाच्या लाभार्थ्यांत सामील करुन घ्यावे लागेल. "साधनसामग्रीचे फेरवाटप करत समता आणू..." असे म्हणणारे लोक हे समतेचे पाईक नव्हेत. समान संधींची रेलचेल कशी उडेल हे पहाणे जास्त गरजेचे आहे. नागरिकांना आपल्या विकासाचे मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य देत त्यांना सर्वच क्षेत्रात व्यापक संधी कशी उपलब्ध होईल हे पहाणे एवढेच सरकारचे काम आहे. समाजवादाला आता देशातून दूर करण्याची गरज आहे ती यामुळेच! आज भरडले जाणारे शेतकरी व शेतमजुर तेलंगणातील शेतक-यांप्रमानेच नक्षलवाद्यांचे नेतृत्व स्विकारत सशस्त्र उठाव करायला निघाले तर अत्यंत अशक्य अशी परिस्थिती निर्माण होईल. "सर्वहितकारी" व्यवस्थेचे घटनात्मक तत्वच अधिक कार्यक्षमतेने अंमलात आणत शोषित-वंचित सर्वच समाजघटकांना खराखुरा सामाजिक न्याय द्यावा लागेल. 

आणि नक्षलवादी म्हनजे भारताच्या सार्वभौमतेला आव्हान देण्यासाठी पुकारलेले युद्ध समजुनच त्यांचा बिमोड करावा लागेल. हे वेळीच होणे अत्यंत आवश्यक आहे.

(Published in Sahitya Chaprak, May 2017 issue)

Wednesday, March 23, 2016

....अन्यथा आयसिसचा दहशतवाद....




आयसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला आहे तो समस्त मानवजातीला काळीमा फासणारा आहे यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल. परंतू हा मध्यपुर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला मामला उरोपच्याच भुमीवर जावून पोहोचेन याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांच्या बदल्यासाठी हा आतंकवाद फ्रांसमद्ध्ये घुसला. नुकताच ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे येतो.

प्यरिस हल्ल्यातील एक संशयित दहशतवादी सालह अब्देस्लाम गेल्या शुक्रवारी ब्रुसेल्स येथे पकडला गेला होता. त्यानंतर लगोलग झालेला हा हल्ला या अटकेचा सुड घेण्यासाठी व एक माणुस अटक झाल्याने आमचे अस्तित्व संपत नाही हे दाखवण्यासाठी केला गेला असे मत व्यक्त केले जाते आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी जरा उशीराने स्विकारली. त्यामुळे हा हल्ला आयसिसच्या हेडक्वार्टरवरुन नियोजित केला गेला नसून आयसिसच्याच युरोपमधील शिस्तीने विखुरलेल्या स्वतंत्र गटांनी केला असावा असेही मत माध्यमे व्यक्त करीत आहेत.

ही स्थिती अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. युरोपभर आयसिस पसरली आहे, त्यांना नवेनवे नवखलिफातच्या स्वप्नांनी भारावलेले तरुण रिक्रुट्स जगभरातुन मिळत आहेत. युरोपमद्ध्ये एकीकडे सिरियन स्थलांतरितांबद्दल रोषही आहे तर दुसरीकडे मानवतावादी भावनेने त्यांना आश्रय द्यावा असाही मतप्रवाह जोरदार आहे. या स्थलांतरितांत दहशतवादीही मिसळून गेले असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.  २०१२ ते २०१५ या काळात एकट्या बेल्जियममधून किमान ४०० लोक आयसिस नियंत्रित इराक व सिरियात स्थलांतरील झाले होते. त्यातील 117 लोक परत आले ते केवळ बेल्जियमला युरोपातील आयसिसचे केंद्र बनवण्यासाठी असे मानले जाते.

याचाच अर्थ आयसिसने युरोपमद्ध्ये भकम पाय रोवले आहेत. आताचा ब्रुसेल्सवरील हल्ला हा तुलनेने छोटा असला तरी आम्ही केंव्हाही, कधीही आणि युरोपभर्तात कोठेही दहशतवादी कारवाया करु शकतो हा इशारा म्हणजे आताचा हल्ला आहे. या हल्ल्यांमुळे युरोप युनियनची एकी भंग पावत चाललेली आहे व ती उध्वस्त व्हवी असच आयसिसचा कट दिसतो.

येथे एक बाब लक्षत घ्यायला हवी व ती म्हणजे ओसामा बिन लादेनचे भूत आता आयसिसच्या मानगुटीवर बसलेले आहे. जगभरचे विद्वान या दहशतवादासाठी इस्लाम धर्म व कुराणला जबाबदार धरण्यात मग्न आहेत व या दहशतवादाचे विश्लेशनही तसेच केले जात आहे. खरे तर युरोपियन व अमेरिकन ख्रिस्त्यांनी आणि इझ्राईल स्थापन झाल्या दिवसांपासून ज्युंनी अरब राष्ट्रंत जी विशिष्ट भुराजकीय परिस्थिती निर्माण केली ती य दहशतवादाला अधिक जबाबदार आहे. धर्म कोणताही असता तरी लढाऊ अरबांनी आपली प्रतिक्रिया अशीच दिले असती.

युरोपिय जग सतराव्या शतकापासून सेमेटिक गटाशेची आपली सांस्कृतिक नाळ तोडण्यच्या प्रयत्नात होते. त्यातुनच आर्य वंशवाद फोफावला व सेमेटिक व अन्य वंश हिणकस ठरवण्यात आले. येशू ख्रिस्त आर्य ठरवण्याचेही हिरीरीने प्रयत्न झाले. हिटलरने ज्युंविरोधात क्रुरकर्म्याची भुमिका निभावल्याने आर्य वंश हा शब्द बदनाम झाला. पण युरोपियन विद्वानांने त्यावर आर्य-भाषा-गट सिद्धांताच्या मध्यमातुन तोच सिद्धांत जीवंत ठेवला. त्यामुळे अरबी जगतालाही ते शत्रु बनवणार हे उघड होते. मध्यपुर्वेतील मुबलक तेल याने आधी त्यांचे स्वार्थी लक्ष वेधले असले तरी अरब जगतात राजकीय व सामरिक लुडबुडींचा इतिहास जुना आहे.  सद्दाम हुसेनवर  रासायनिक अस्त्रे आहेत असा धादांत खोटा आरोप करत त्याच्यावर युद्ध लादत, खुनशी फाशी देणारे अमेरिकन व युरोपियन जग व त्यांचा अनुनय करणारे त्याबद्दल मूग गिळून असतात. इझ्रएलचे आतंकवाद नुसते खपवुन घेतले जात नाही तर अश दहशतवाद्यांना चक्क शंततेचे नोबेल दिले जाते. यचा रोष उफाळून येणार नाही असे नाही. लादेनने चक्क अमेरिकेतील ट्विन टोवरवर हल्ला चढवून या रोषाची चुणूक दाखवली.

आता आयसिसच्या रुपात भस्मासूर पुढे ठाकला आहे. हा दहशतवास्द अक्षम्य आहे यात शंका नाही. पण म्हणून युरोप-अमेरिकन "आर्यन" वर्चस्वतावादी विचारांनी भारावलेल्या जगताने अरबांविरुद्ध वारंवार आर्थिक व सामरिक दहशतवाद करावा, राजरोस दरोडे घालावेत व ते केवळ आपल्या बलाढ्य ताकदीच्या जोरावर खपवून न्यावेत हेही योग्य आहे असे कोण म्हणेल? तालिबान, ओसामा ही भुते अमेरिकेच्या पापातुन उभे रहिले होते. आयसिसचे भूत ही त्याचे पुढची आवृत्ती आहे. आयसिसने आजवर जवळपास वीस देशांत ७५ दहशतवादी हल्ले चढवले आहेत. सध्या युरोपची भुमी हिट लिस्टवर आहे. उद्या ती अमेरिकाही असू शकेल. आयसिसमद्ध्ये समील व्हायला जाणारे काही इस्लामी भारतीय धर्मांधही आहेतच. कुराणचे तत्वज्ञान दहशतवादी कुशलतेने वापरुन घेतात. दहशतवादी तत्वज्ञानच काढायचे तर कोणर्त्याही धर्मग्रंथातून काढता येते. उद्देश मात्र तो असला पाहिजे.

आयसिस दहशतवादी आहे. कुराण हा त्यांचा आधार आहे. अरबी लोक टोळी जीवनातुन वाढलेले. तो बेदरकारपणा त्यांच्यात पुरेपूर आहे. सरळ युद्धात आपण युरोपियन राष्ट्रांशी अथवा अमेरिकेशी कालत्रयी जिंकू शकत नाही हे त्यांना माहित असल्याने त्यांनी हा दहशतवादी मार्ग निवडला आहे. त्यासाठी व्यापक इस्लामिक स्टेटची स्थापना, नवी खिलाफत ही त्यांची गरज आहे.

कोणी बनवली ही गरज? त्यांच्यावर अन्याय करणारे, युद्धे लादणारे कोण होते? मला वाटते, ब्रुसेल्समद्ध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतांना यावरही विचारी जागतिक समुदायाने विचार करत उत्तर शोधले पाहिजे. अन्यथा अयसिसचा दहशतवाद संपुर्ण युरोपला पोळून काढल्याखेरीज राहणार नाही.

Tuesday, November 24, 2015

Do we really want to end terrorism?



How terrorists get arsenal to cause havoc across the globe and how to stop these supplies first should be the focused line of action if at all the nations are serious to put final end on terrorism. War against terrorism is mere an illusion unless such supplies are not stopped. The terrorists and the nations sending army or air attacks on the terrorist camps would only mean benefits to the arm manufacturers, dealers, smugglers and funding agencies.

Terrorism has become a global problem, a sever threat to the humanity. Today Islam is blamed for all the incidents of the terrorism, Taliban is now replaced by ISIS…tomorrow some other organization will replace it. But chain of the terrorist activities won’t come to ultimate halt.

Paris attack made global headlines causing agony and fury across the globe. But Boko Haram remains mostly un-discussed as they are causing havoc in “less civilized” countries.  Actually, in 2015, every day world in some or other part of the world experienced ambush, bombings, kidnappings, inhuman killings and suicide attacks. After Paris incident world seemed suddenly awakened and has declared war against terrorism, especially ISIS.

ISIS is using mostly American origin arms, from automatic rifles to Rocket launchers. It is said that they have acquired those weapons from the Syrian-Iraqi army men, Saudi Arabia and China. There is well established chain of the supplies and its distribution. Britain is said to been arming Kurdish people to fight against ISIS. Getting hold of weapons by stealing is a myth. What about ceaseless supply of ammunition? They must be smuggled in. How Maoists of India get hold of arms and ammunition? It is well known fact that from China via North-Eastern states they are smuggled and distributed amongst Maoists. The facts and figures shows that India lost double the people so far than the people, including soldiers, died in Maoist attacks. US have been supplying arms in Iraq with a futile hope that they will be used against ISIS. Rather it has become a major source for ISIS to get modern weaponry.

Having fundamentalism (Muslim, Maoist or any other for that matter) major reason behind any act of the terrorism is the thing that does have ancient traits. The problem with us is, to fight out terrorism and stop killings of the innocents, the priority should have been to stop supply of the armaments to any such country/region, even for the lame reason that such people will fight out terrorist groups! For example US supplied arms to Iraqi army to wage war against ISIS. It is doubted that the some part of those arms, intended for Iraqi army reached in hands of ISIS. This is superficial truth. America (and its friends) and Russia have been arming the terrorist groups alternatively. Russian war against ISIS and now France and allies participating it a great joke on humanity.

The lobby of arm manufacturers is strong in US. Russia too possesses equal ability to produce arms. China too is in the race to increase supplies wherever possible. They use all means, even smuggling them, to the destination wherever possible trouble erupts.

Under the circumstances I would like to say that the war against terrorism is a lie. Warlords don’t wish at all that the terrorism should be eliminated from the face of the earth. Rather they are grooming the terrorists of the future by killing terrorists of the present!

 Blaming Islam for all terrorism is okay. May be tenets of Quran are responsible for it. But then which religious book is devoid of these terrorist elements? Gita too specifically is aimed to wage war against Adharma…killing of human beings is necessary to establish Dharma…says Krishna ultimately! Now there is no clear definition of what Dharma or Adharma is!  But Hindu’s don’t go on killing people in mass proportion, though there religion allows it! The only reason is Hindu’s have no easy access to the weapons. Or else they too could have waged bloody war against Muslims as RSS have been preaching since its inception!

What we need is, if at all we, the global citizens, are serious to have freedom to live and let live, if at all we are serious to end terrorism, first of all the arm supplies has to be banned to the people/groups or nations those are up to cause disruption of global peace.

I mean that the arm manufacturers and their supply chains must be kept under constant surveillance and should be punished heavily if at all they are found to be guilty in supply to wrong people. The nations too, those support terrorism, should be banned of any trade with them. Let them suffer in isolation.

And, under disguise of Superpower, global policing of any nation too is needed to be stopped at first priority. Superpower means an ability to enslave others, politically or economically. The world nations should be well aware of the risks in wooing so-called economic, political and nuclear powers.

If terrorist get easy hold of modern weaponry the day is not far away that they get hold of nuclear weapons too! Fanatics are ready to die as they are suicidal and what even if whole globe is destroyed after them? The risk is heavy….not at all affordable to human being and other species.

To me, war against terrorism can only be fought and ended with fruitful results only if the supply of the arms and ammunition is curbed with global consensus and the smugglers are set to heavy punishments.

This is not impossible if the world is really up to fight out terrorism. If not….ISIS will never end….it would produce another hundreds from their blood!

Blood of the humanity will be spilled forever and the dream of ultimate  freedom of humanity will never come true.


We have to make the choice…!

Saturday, November 14, 2015

दहशतवादाच्या मूळ उद्गमाचे काय?


प्यरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

जगातील सर्व दहशतवादी संघटना आणि धर्मांध हिंसक मनोवृत्त्या पुर्णपणे चिरडल्याशिवाय असे नृशंस हल्ले थांबणार नाहीत!
ज्यांनीही अशा दहशतवादी संघटनांना स्वार्थापोटी वाढवले अशा राष्ट्रांचाही धिक्कार. जागतिक समुदायाने अशा राष्ट्रांचीही गय करू नये!

दहशतवादाचा भस्मासूर एवढा वाढण्यामागे प्यलेस्टाइनचे फाळणी करून इझ्राएलची निर्मिती केली व प्यलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला गेला नाही या मुळ कारणात आहे हे कधीतरी लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी अमेरिकन रेडियोवरुन दोन मुलाखतीतून २००२ साली म्हणालेलो आहे. चेन रिअक्शनमधून तो वाढत गेला. सद्दामला संपवायचे प्रयत्न केले, शेवटी धादांत खोटे आरोप ठेवत, युद्ध लादत त्याला जाहीरपणे फासावर लटकवले. जगाने ती मजा पाहिली. तो दहशतवादाचा कळस नव्हता काय?

सद्दाम हुसेन भरताचा मित्र होता. बांगला देशाला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकशी युद्ध सुरू केले तेंव्हा सर्व आखाते राष्ट्रने भारताला तेलपुरवठा बंद केला होता. अपवाद फक्त सद्दामच्या इराकचा. बांगला देश स्वतंत्र केल्यानंतर त्यला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणरा इराकच सद्दामच होता. आपण पटकन विसरून जातो. पण हे योग्य नाहे. आज इराक उध्वस्त झाला आहे. कोनी केले हे पाप? त्याविरुद्ध आम्ही कोणता आवाज उठवला?

लाखो इराकी-अफगाणी-इराणी निरपराध नागरिक आजवर जे मेले तो दहशतवाद केवढा भयंकर होता! फक्त तो सत्तेकडून झाला, खाजगी संघटनांकदून नाही म्हणून तो दहशतवादच नव्हता कि काय? त्या दहशतवादामागेही धार्मिक प्रेरणा नव्हत्याच कि काय? की सबल करतात तो न्याय आणि दुर्बळांनी प्रत्युत्तर दिले तर तो दहशतवाद? रशियाच्या फौजांशी लढता यावे म्हणून तालिबानला कोणी जन्म दिला?

सर्वप्रथम युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकेने आपली जागतिक दादागिरी बंद केली पाहिजे, शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांनाचा धंदा वाढायला मदत करणे बंद केले पाहिजे. आणि याकडे मुस्लिम दहशतवाद म्हणून बघत, त्यांच्या धर्मग्रंथांतील हिंसकतेचे तत्वज्ञान पुढे रेटायचे प्रयत्न करत न बसता आधी अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी काय पापे केलीत तेही पहावे व त्यांचाही खुल्या मनाने निषेध करावा. कुराणात जेवढी हिंसेची मुलतत्वे आहेत तेवढीच ती जुन्या करारात आहेत...अगदी नव्या करारातही हे सोयिस्करपणे विसरू नका. आज समजा अरबी राष्ट्रांत इस्लाम नसून ख्रिस्ती सोडून दुसरा कोनताही धर्म असता तरीही हीच स्थिती निर्माण झाली असती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयसिस ही अमेरिका व इझ्राएलची देणगी आहे. जशी तालिबान अमेरिकेचीच उपज होती. निर्मात्यावरच अखेर उलटणे हा दहशतवादी संघटनांचा अलिखित नियम आहे हे आपण ट्विन-टोवरवरील हल्ल्याच्या संदर्भात पाहू शकतो. रशियाचाही विस्तारवाद अधून मधून डोके वर काढतोच. त्यांची आयसिसविरोधी कारवाई मानवतेच्या दृष्टीकोनातून आहे या भ्रमात जगाने राहू नये.

यात शेवटी मरणार आहेत ती सामान्य माणसे. मानवतेची मुलभूत तत्वे. अमेरिकेने त्यांची कधीच पर्वा केली नाही. कै. नरसिंह रावांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकेला रेड इंडियनांच्या केलेल्या उच्छेदाबद्दल अमेरिकनांना झापत दहशतवादावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार हा प्रश्न विचारला होता. व्हिएतनाम कसे विसरता येईल? दहशतवादाच्या मुळाशी जायचे तर ती महासत्तेच्या राजकारणात आहेत, कोणा धर्मात नव्हेत. प्रत्येक राष्ट्राला सध्या जागतिक नाहीतर प्रादेशिक महासत्तेची स्वप्ने पडू लागलीत. माओवाद्यांच्या भारतातील हिंसाचारामागे चीन असतो. मरतात आमची माणसे. मारतातही आमचीच माणसे. पण हा दहशतवादच नव्हे काय? तेथे तर धर्मही नाही!

वर्चस्वतावाद हा नुसता जागतिक सत्तांच्या संदर्भात नाही. वर्चस्वतावाद अनेक प्रकारच्या दहशतवादांना जन्म घालतो. इतरांना गुलाम करणे, त्यांचे भौतिक स्वातंत्र्य हिरावने अथवा मारुनच टाकणे ही त्याची अपरिहार्य परिणती आहे. हे सगळे थांबवून मानवतेची श्रेष्ठ मुल्ये प्रस्थापित करायची असतील तर सर्वप्रथम ओबामांनीच पुढाकार घ्यावा व अमेरिकेने जगावर आपली सत्ता राबवण्यासाठीचे प्रयत्न बाजुला करावेत. हा माणूस ते करू शकतो. मगच दहशतवादाविरुद्धचा लढा हा मानवी पातळीवर येईल...हिंसकतेच्या नाही. सध्या सर्वच दहशतवादी (मग ती राष्ट्रे असोत कि राष्ट्रप्रणित संघटना) मानवता आणि मुल्यांबद्दल बोलण्याची योग्यता हरपून बसले आहेत. वर्चस्वतावादाने सर्वांना पछाडले आहे. प्रत्येकजण दुस-यावर कुरघोडी करण्याच्या नादात द्वेषाचा आधार घेतो आहे.

आज समोरासमोर युद्धे करायचा काळ संपला आहे हे जागतिक सत्तांच्या लक्षात आले आहे. दहशतवादी कारवाया या वेगवान व अधिक परिणामकारक ठरत असल्याने राजकीय सत्ता दहशतवादी गटांनाच हाताशी धरून या नाहीतर त्या देशात हिंसाचार घडवतात हा इतिहास व वर्तमान आहे. धर्माची लेबले त्यांना दिली कि विशिष्ट धर्मियांबाबतचा जागतिक नागरिकांचा द्वेष वाढतो व जे खरे या कृत्यांच्या पाठीशी आहेत त्यावर मात्र चर्चा होत नाही. आपल्याला दहशतवादी घटनांकडे पहायचा दृष्टीकोण बदलावा लागेल.

हे सगळे थांबायचे असेल तर राष्ट्रांनाच बदलावे लागेल. "महासत्ता" हे बिरुदच मुळात मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे समर्थक पाहिले तर त्यात पाकचा कमी, अनेक राष्ट्रांचा हात दिसेल. हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!


Friday, September 25, 2015

असुरक्षिततेकडून कट्टरतेकडे...!

भय हा मानवी जीवनाला आदिम काळापासून बळकट मिठी मारून बसलेला घटक आहे. आदिम भय हे नैसर्गिक प्रकोप, सृष्टीतील अनाकलनीय घडमोढी, वन्य प्राणी ते अंध:काराच्या गुढगर्भात लपलेल्या काल्पनिक अदृष्य अशा शक्तींचे जसे होते तसेच स्त्रीच्या जननशीलतेचे कोडे माहित नसल्याने स्त्रीबद्दलही होते. मृत्यू कधीही केंव्हाही जीवन हिरावून घेते त्यामुळे मृत्यूभय तर सर्वव्यापी बनले. जीवनातील अकल्पनियता, अनिश्चितता याने आदिम काळापासून ग्रासलेला मानूस आजही त्यातून सुटला नाही.

धर्माची निर्मिती झाली तीच मुळात या भयावर मात करण्याचे उपाय शोधायला. माणसाने सुष्ट शक्तींना देव मानत त्यांची अर्चना केली. त्यांना बळी दिले तर दुष्ट शक्तींचा नायनाट होईल या भावनेने त्याने आदिम कर्मकांड निर्माण केले. प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धती बनवल्या. आपलीच दैवते श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्यासाठे त्याने अन्य मानवी टोळ्यांनाही वेठीला धरले. कधी आपली दैवते लादली तर शत्रू प्रबळ असेल तर त्याची स्विकारली. भयाची एक दुसरी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया असते व ती म्हणजे स्वत:ला भयमुक्त दाखवण्याची केविलवानी धडपड. जर दैवी शक्ती श्रेष्ठ आहेत व ज्याचे अपत्य मानव (म्हणजे आपले लोक) आहेत असे मानतो तर आपणही इतरांचे जीवन आपल्या कह्यात त्यांना जिंकून आणू शकतो ही भावना जगभरच्या लोकांत प्रबळ दिसते ती यामुळेच. धर्माचा, देवतांचा जन्म ही मानवी भयाची अपरिहार्य उपज होय. भयावर मात करण्यासाठी, आयुष्य़रेखा अचानक खंडित होऊ नये यासाठी देवतांची त्याला गरज होतीच. आणि देवतांना संतुष्ट करायचे तर कर्मकांडेही आवश्यक. यामुळे यातुनच धर्माची निर्मिती झाली असे आपल्याला दिसते. आदिम काळी टोळीगणित धर्म होते. टोळीगणिक म्रूत्युनंतरच्या जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. महाराष्ट्रातील आदिम दफनांत मयताचे घोट्यापासून पाय तोडून मगच दफन केले जाई असे उत्खननांतुन दिसते. मृताचे भूत नंतर चालत परत येऊ नये अशी कल्पना त्यामागे असावी. म्हणजे मृतांबद्दलचेही जीवंतांना भय होतेच!

नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली दुसरी अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी कि नाही, शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल कि नाही, स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटने न्याय्य कि अन्याय्य, न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत, जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे, जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे....या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणा-या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती. नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. यातुनच हळुहळू राजव्यवस्था/गणराज्यव्यवस्थांचा उदय झाला हे खरे असले तरी मानवी आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणा-या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.

मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला. कोणत्यही धर्माचे आदिम तत्वज्ञान हे मृत्यूभोवतीच फिरते, अनिश्चिततेभोवतीच फिरते हा योगायोग नाही. हे जग माया आहे, मिथ्या आहे असे तत्वज्ञान जसे उगवले तसेच भरपुर मजेत जगुन घ्या...स्वर्ग नाही कि नरक नाही असेही सांगत जीवनाला आधार देणारे तत्वज्ञ होतेच. ग्रीक तत्वज्ञ हे नहमीच जडवादी राहिले व भयावर मात करण्यासाठी त्यांनी निसर्गालाच वापरुन घ्यायचे ठरवले. त्याउलट भारतीय तत्वज्ञान हे बव्हंशी परलोकवादी, अध्यात्मवादे व भक्तीवादी राहिले. कोनते तत्वज्ञान श्रेष्ठ हा येथे मुद्दा नसून मानवी जीवनाला भयावर मात करण्यासाठी कसे सामोरे जायचे यासाठी लावल्या गेलेल्या या सोयी होत्या. कर्ताकरविता परमेश्वरच असल्याने जेही काही घडते ते पुर्वनियोजितच असते हा नियतीवाद ग्रीकांत होताच. म्हणजे जे घडणार ते अटळ आहे, ते ठरलेले आहे व त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे एकदा ठरल्यावर परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही. भारतियांनी पूजा, भक्ती, जप-तप यातून विधीलिखित बदलता येते, मोक्षाचा मार्ग गाठता येतो या श्रद्धेवर भयावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मकांडांची रेलचेल वाढणे स्वाभाविकच होते.

परंतू येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे कि धर्माने अथवा तत्वज्ञानाने वा नीतिशास्त्राने मानवी भयावर आजही उतारा दिलेला नाही. अनिश्चितता आणि असुरक्षितता यातून कोणीही मूक्त झाला नाही. देव-धर्मावर हल्ला करणारे पुरोगामी जर या असुरक्षिततेच्या भावनेला सुयोग्य पर्याय देवू शकले असते तर देवा-धर्माची गरजही लोकांना पडली नसती. तसा पर्याय न देताच केवळ नकारात्मक टीका करत ते जातात तरीही ९९.९९९९९% लोक कोणत्या ना कोणत्या प्रमाणात धार्मिक/श्रद्धाळू राहतात असे का याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.

असुरक्षितता

माणसाला प्रत्यही अगणित घडामोडींतून जावे लागते व बहुतांशी वेळा त्याचा ज्या घडामोडींशी संबंधही नसतो अशा घडामोडींतून निर्माण होणा-या स्थितीचे लाभ-तोटे सहन करावे लागतात. म्हणजे पुढच्या क्षणी नेमके काय होनार आहे याचे निश्चित गणित त्याच्याकडे नसते. तो गरीब होणार कि श्रीमंत, तो जीवंत राहणार कि मरणार यापासून आज बायको/पती तरी कसे वागणार...हे प्रश्न कधी उघड तर कधी सुप्त पातळीवर त्याच्या मनात चालुच असतात.

बरे, हे व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाज एकमय अभंग असा कधीच नसतो. असावा हे नैतिक स्वप्न झाले. पण प्रत्यक्षात तो जात, धर्म, वंश, विचारधारा, पंथ, देवता, नास्तिकता, पुरोगामित्व, राजकीय पक्ष, व्यावसायिक तथा कामगार संघटना वगैरेंमद्ध्ये सुद्धा विचित्रपणे विभागलेला असतो. समजा एखादी व्यक्ती अमूक धर्माची व दुसरी दुस-या धर्माची. धर्म म्हनून ते स्वाभाविकपणे दोन वेगळ्या पातळ्यांवर वाटले गेलेले असतात. पण व्यावसायिक संघटना म्हणून दुस-या धर्माची व्यक्ती व एका विशिष्ट धर्माची व्यकी समव्यावसयिक असेल तर तिथे दोघे मात्र व्यावसायिक हितासाठी एकत्र येतात. आधी धर्मिक कारणांसाठी ते विरोधी पातळीवर असतात तर दुसरीकडे व्यावसायिक हितासाठी मात्र एकत्र असतात. हा विरोधाभास आहे आणि मनुष्य प्रत्यही या विरोधाभासात जगतो. कारण त्याला धार्मिकही हित हवे आणि व्यावसायिकही.

आणि नेमके या हितसंबंधातच जेंव्हा संघर्ष होतो तेंव्हा मनुष्य धर्म/जात/पंथ संघटन निवडतो....व्यावसायिक क्वचित. असे नेमके का होते यावर विचार करायला हवा. खरे तर व्यवसाय ऐहिक सूख देणारी प्रत्यक्ष बाब झाली. धर्म/जात/पंथ/विचारधारा नाही. धर्माच्या नांवाखाली अब्जधीश व्यावसायिक असो कि मजूर, खांद्याला खांदा लावून संघर्षात उतरु शकतात एक वेळ, पण व्यवसायांच्या नांवाखाली नाही. कारण हितसंबंधांचे वेगळेच कडबोळे जन्माला आलेले असते.

धर्म/देवतांची निर्मिती भयापासून मुक्तता करण्यासाठी झाली हे जरे खरे असले तरी धर्मही मानसाचे भय वाढवण्यात हातभारच लावत राहिले आहेत हेही आपण सहज पाहू शकतो. धर्माचे काम म्हणजे मानसाला खरे स्वातंत्र्य बहाल करत त्याला जीवनाचे सौंदर्य उलगडून दाखवत वस्तुत: भय अस्तित्वात नसू न त्या मिथ्या कल्पना आहेत हे समजावून सांगण्यासाठी व्हायला हवा होता. पण धर्माने उलत अधिकाधिक बंधनेच निर्माण केली असे आपण इतिहासात डोकावता पाहू शकतो. युरोपातील प्रबोधनाची चळवळ धर्माच्या अतिरेकी बंधनांच्या विरुद्ध उमटलेली बुद्धीवादी प्रतिक्रिया होती. धर्माने माणसाने कोणते कपडे घालावेत, काय खावे-काय प्यावे यापासून ते कय पहावे यावरही बंधने आणत त्याला भयमुक्त नव्हे तर भययुक्त करण्याचा चंग बांधला. पण ज्यांना धर्म हाच आपला तारणहार, मुक्तिदाता वाटतो त्यांनी ही बंधने विनातक्रार स्विकारली. जे बुद्धीवादी होते त्यांनी यातील भंपकपणा ओळखला. त्यांची चूक ही झाली कि त्यांना, ज्यामुळे धर्म निर्माण झाले ते भय, याला सक्षम पर्याय त्यांना देता आला नाही. जोवर मानवी जीवनावर पुढच्या क्षणाला काय होईल या असुरक्षिततेचे, अनिश्चिततेचे सावट आहे तोवर त्याला मानसिक आधाराची गरज आहे ही जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्यामुले धर्म विरुद्ध बुद्धीवाद हाही संघर्ष जगभर उभा राहिला आहे. दोन्हीही बाजू बव्हंशी टोकाच्या असून यात सर्वसामान्य मानसांची ससेहोलपट होते याचे मात्र भान उभय पक्षी नही हेही एक वास्तव आहे.

विज्ञानामुळे धर्माची गरज कमी होईल हा भ्रमही दूर झाला आहे. मंगळयानाच्या प्रक्षेपणाआधी इस्रोच्या शास्त्रज्ञांनीच तिरुपतीला जावून प्रार्थना केली होती ही घटना या संदर्भात बोलकी आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल कि नाही हे अनिश्चितता शास्त्रज्ञांतही असल्यामुळे त्यांनीही अखेर दैवी शक्तीलाच शरण जायचे ठरवले असेल तर येथे एक विरोधाभास व द्वंद्व दिसते. खुद्द भौतिकशास्त्रात अनिश्चिततेचे तत्व हे मुलकणांच्या वर्तनासंदर्भात वापरले जाते. मानवी मानसिकतेवर तर याचा प्रचंड पगडा आहे. पण या मानसिकतेचा फायदा धर्मवादी खुबीने करुन घेत माणसांनाच नागवतात, अधिक असुरक्षित करुन सोडतात हेही तेवढेच खरे आहे.

याचे कारण मुळात आपल्या आदिम भावनांत आहे. असुरक्षिततेचे कारण आपण मुळात ऐहिक घटनांत न शोधता पारलौकिक घटनांत शोधतो याची आपल्या जागृत मनाला अनेकदा जाणीवही नसते. ऐहिक घटनाच एवढ्या अनेकदा अनाकलनीय असतात कि त्यांचे निरपेक्ष विश्लेशन करण्यात माणूस अयशस्वी होतो अथवा तसा प्रयत्न तो करत नाही.  याचीच एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून तो घटनांवरच आपले अधिकाधिक नियंत्रण कसे राहिल या प्रयत्नांना लागतो. मग ते आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, राष्ट्रीय असेल, धार्मिक असेल, जातीय असेल किंवा पंथिक. यादी मोठी होऊ शकते. परंतू किमान काही लोक आपल्या भयातूनच वेगळा मानसिक नृशंसपणा जन्माला घालतात व वेगळ्याच गुलाम्या लादण्याचा प्रयत्न करत अन्य घटकांत वेगळीच असुरिक्षतता उत्पन्न करण्याच्या मागे लागतात. आणि यातून कोणताही घटक कसा सुटत नाही हे आपण सध्यकालातील काही घटनांचा आढावा घेत पाहुयात.

संघटन का होते?

आदिम काळात माणूस टोळ्या करून रहायचा ही त्याची अपरिहार्यता होती. पण टोळी म्हणजे संघटनच असते. हे संघटन बाहेरुन होणा-या हल्ल्यांना संघटितपणाखेरीज तोंड देता येणार नाही यातुनच होते. अगदी राजे, सरदार यांचेही संघ कसे असायचे हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. महाराष्ट्रातील "राजमंडळ’ हा प्रयोग अशाच समविचारी नसले तरी सम-उद्दिष्टांना साध्य करणा-यांचा संघच होता. कार्ल मार्क्सनंतर श्रमिक-कामगारांचेही संघ बनायला लागले. भारतात जातीय/धार्मिक/पंथीय संघ पुर्वांपार होतेच. प्रत्येक संघाचे शत्रुसुद्धा ठरलेले असत. किंबहुना शत्रु असल्याखेरीज संघ बनत नाही हेच संघाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण आहे. संघ हे अभेद्य राहतात असेही नाही. प्रसंगोपात्त त्यांच्यातही फूट पडते. आपापसातही संघर्ष उभे राहतात याचीही जगभरातील अनेक उदाहरणे आहेत.

बरे, कोणते ना कोणते तत्वज्ञान हे कोणत्याही संघाचा आधारभूत पाया असतो. त्यात अलौकिक, उदात्त अशी वाटणारी ध्येये जशी असतात तशी ऐहिक विचारसरणीही असते. धर्मवाद्यांचे जसे तत्वज्ञान असते तसे ते निधर्मिवाद्यांचेही असते. साम्यवाद्यांचे असते तसेच समाजवाद्यांचे व भांडवलशाहीवाद्यांचेही असते. प्रत्येक गटाला वाटते कि विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता त्यांच्याच तात्विक व ऐहिक मार्गाबाबतच्या विचारसरणीत आहे.

आणि एकदा विचारसरणीने जन्म घेतला कि अनुयायी वाढवण्याची जबाबदारीही अर्थातच आली. आणि हे सोपे नसते. म्हणजे धर्म/पंथाची झुंड "भले तरी होईल...आणि नाही झाले तरी प्रयत्न करुन पहायला काय हरकत?" या विचाराने वाढते. या झुंडीतील लोक आज दत्ताला दिसले तर उद्या तेच लोक तुळजाभवानीलाही किंवा साईबाबालाही दिसनार नाही असे नाही. पण नव्या विचारसरणीच्या लोकांना मात्र प्रयत्नपुर्वक प्रयत्न करून अनुयायी मिळवावे लागतात. मिळवले तर ते टिकवावेच लागतात. कम्युनिस्टांनी त्यासाठे केवढे उपद्व्याप केलेत हा आता जागतिक इतिहास आहे. असो.

पण मुळात संघटन होण्यामागे मानवी जीवनातेल असुरक्षितता आहे व त्यावर मात करण्यासाठी माणूस धर्म किंवा विचारधारा यांच्याशी अक्षरश: "नियतीशरणता" दर्शवतो हे वास्तव नाही काय? देव/धर्म मानणारे व देव/धर्म न मानणारे यांच्या संघटनांत मौलिक भेद नाही कारण दोन्हींचा जन्म मुळात मानवाला मुक्ती/मोक्ष देत संकटमूक्त करण्यासाठी होत असतो. किंबहुना वरकरणी तरी ते तसे दाखवण्यात यशस्वी होतात. खरे हेतू काहीही असोत. स्वत: भारतातील बाबा-साध्व्या अत्याचार करत जात कोठडीबंद होतात. म्हणजेच स्वत:चे जीवन जे सुरक्षित करु शकले नाहीत ते दुस-यांचे काय करणार? पण अनुयायी हे समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसतात. किंबहुना अनुयायांची विचारशक्तीच या मंडळीने एवढी खंडित केलेली असते कि त्यांच्या विवेकाचा मृत्यू झालेला असतो. अशा स्थितीत ज्या बाबींनी  धर्म अथवा अन्य संघ निर्माण केले त्या बाबीचे निराकरण कसे होणार?

पण सर्वात महत्वाची बाब येथे समजावून घ्यावे लागते. एक संघटन होते तिचा स्वसंघटनेतील लोकांच्या हिताचा जरी असला तरी परसंघटनेतील हिताचा नसतो तर ते उध्वस्त व्हावे, नष्ट व्हावे हाच असतो. या द्वैतातून जो संघर्ष निर्माण होतो तो आपण सोव्हियेट रशिया व अमेरिका या दोन वेगळ्या, परस्परविरोधी राष्ट्रांतील दिर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धातून पाहिला आहे. परस्परांनी एकमेकांना संपवण्यासाठी काय कारवाया केल्यात तेही पाहिले आहे. अण्वस्त्रस्पर्धा ही एकमेकांत भय/असुरक्षितता माजवण्यासाठीच होती हे उघड आहे. भयभितांनी भयभितांवर राज्य करण्याचा हा एक अश्लाघ्य, पण अपरिहार्य मार्ग होता असेच म्हणावे लागेल!

असुरक्षितता आणि दहशतवाद

दहशतवादही असुरक्षिततेच्या भावनांतून जन्म घेतो हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल. दुस-या विरोधी गटाला असुरक्षित वाटावे यासाठी दहशतवादी कारवाया केल्या जातात असे दहशतवादाचे मानसशास्त्र सांगते. परंतू दहशतवादीही टोकाच्या असुरक्षित भावनेतुनच निर्मण कसे होतात यावर फारसा विचार केला जात नाही. "धर्म संकटात आहे" अशी हाळी दिली कि धर्मवादी भयभित होत एकत्र येतात. मुळात संघटन अथवा झुंड ही नेहमीच भयग्रस्तांची असते. भय निर्माण करणारी समाजनिर्मित कारणे अनंत असतात. महाराष्ट्राचे एक उदाहरण घेऊ. संभाजी ब्रिगेडच्या उदयापुर्वी ब्राह्मण समाज जातीच्या आधारावर कधीही संघटित होण्याच्या प्रयत्नांत नव्हता. पण ब्रिगेडने समस्त ब्राह्मणांनाच सातत्याने विद्वेषपुर्ण टार्गेट केल्यामुळे ब्राह्मणांची संघटना बनली. एवढेच नव्हे तर ब्राह्मण जातीला अत्यंत विसंगत असे परशुरामाचे प्रतीक निवडले गेले. आम्हीही हत्यार उचलू शकतो हा संदेश त्यातून द्यायचा होता. मध्यपुर्वेतेल मुस्लिम आज ज्या संघर्षातून जात लाखोंचे बळी चाललेत त्यामागेही युरोपिय/अमेरिकन जगाने त्यांच्यात निर्माण केलेली पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षिततेतुन माणसे एकत्र येतात. ते एकतर दबून जगायचा प्रयत्न करतात किंवा त्याउलटची हिंसक प्रतिक्रिया देतात. आम्ही असुरक्षित आहोत तर तुम्हीही सुरक्षित राहू शकणार नाही हा इशाराच त्यांना द्यायचा असतो.

भारतात मुस्लिम द्वेषने मुस्लिम संघटित झाले, हिंसक कारवायाही त्यांनी केल्या. ब्राह्मण द्वेषामुळे जशी ब्रिगेड अवतरली तसेच ब्राह्मणही संघटित झाले. दलित द्वेषामुळे दलितही संघटित झाले. संघटन सकारात्मक क्वचित होते. विध्वंसकता व इतर समाजघटकांवर/राष्ट्रांवर जरब बसवणे, दबाव गट निर्माण करणे, म्हनजेच इतरांत भय निर्माण करणे हेच छुपे हेतू त्यामागे असतात. उद्योजकांच्या संघटनाही काही वेगळे वागत नाहीत.

थोडक्यात सर्वांनीच सर्वांना असुरक्षिततेलाच जन्म द्यायचा घाट घातला असेल तर नैसर्गिक असुरक्षिततेवर/भयावर मात करण्याची पर्यायी साधने माणूस कसा शोधणार? देव/धर्म या कृत्रीम मार्गांनी ते साध्य झालेले नाही हे आपण इतिहासाचा आढावा घेतला तर सहज सिद्ध होते. पण वैज्ञानिक मार्गांनीही ते ध्येय साध्य होत नाही हेही तेवढेच खरे आहे. सर्वसामान्य माणूस अजून एवढा प्रगल्भही झालेला नाही कि मुळात अनिश्चितता हाच निसर्गाचा नियम आहे आणि ती कोणीही, अगदी विज्ञानही संपवू शकत नाही. भयावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवन आहे तसे स्विकारत प्रयत्नांतून जेही साध्य करायचे ते प्रयत्न करावेत. माणसाच्या जीवनात माणसांनी ढवळाढवळ करत त्याला अधिक असुरक्षित बनवू नये. यासाठी माणसांना निरिश्वरवादी/निधर्मवादी बनवायचे घाट घालण्यापेक्षा माणसांना माणसांचे मानवी जीवन सामाजिक व कायद्यांच्या चौकटीत जगण्याचे स्वातंत्र्य द्यावे. पुरोगामी म्हणवणारे स्वत:चे संघ बनवतात.

श्रद्धेचे मुळकारण समजावून न घेता त्यामुळे प्रा. शेषराव मोरे जर "पुरोगाम्यांचा दहशतवाद" अशी सज्ञा वापरत असतील तर तो त्यांचा दोष नाही. पुरोगाम्यांचा आहे. माणसाला प्रगल्भ करणे, विचारी बनवणे हे पुरोगाम्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्या श्रद्धांवर हल्ले करण्याचा तेंव्हाच अधिकार आहे जेंव्हा तुम्ही त्यांच्या भयाच्या आदिम भावनेवर मात करण्याचा पर्याय देवू शकाल.  मनुष्य जेंव्हा प्रगल्भ होतो तेंव्हा त्यालाच देव-धर्माच्या बंधनांची गरज भासत नाही. नाहीतर जसा परंपरागत कर्मकांडांचा एक धर्म आहेच तसाच पुरोगाम्यांचाही धर्म बनेल आणि माणसाची मुलभूत समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची बनेल.

मनुष्य यावज्जीव असुरक्षित व भयग्रस्तच राहिल!

-संजय सोनवणी

(साहित्य चपराक, दिपावली विशेषांक - २०१५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)

Tuesday, August 11, 2015

ओवेसी...याकूब....उत्तरक्रिया!

गेले पंधरा-वीस दिवस याकुबच्या फाशीचा मुद्दा अनेक कारणांनी गाजला. गाजला म्हणण्यापेक्षा अक्षरश: धुरळा उठला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याकुबला वाचवण्याचे सारे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पुर्वघोषित तारखेला, 30 जुलै रोजी सकाळी सुमारे साडेसहा वाजता त्याला फाशी दिलीही गेली. त्यानंतर गाजली त्याची अंतयात्रा. हजारो लोक त्या अंतयात्रेत सहभागी झाल्याने अनेक लोक बिथरले. अंतयात्रेत सहभागी होनारे याकुबला हिरो मानतात किंवा त्याच्या कृत्याचे समर्थन करतात असे चित्र निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण या सर्व घडामोडींत कोणताहे अन्य अनुचित प्रकार घडला नाही एवढीच काय ती सध्याची तरी जमेची बाजू. 

पण याकुबमुळे तो मरतांनाही नकळतपणे काही प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणा-यांने जसे निर्मण केले तसेच त्याचे घृणा करणा-यांनीही उपस्थित केले. त्याच्या फाशीचे जसे राजकारण झाले तसेच धर्मकारणही झाले. प्रश्न याकुबच्या फाशीचा नसून यामुळे जे सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यावर निकोपपणे चर्चा करण्याची गरज आहे. अफजल गुरु अथवा कसाबच्या फाशीमुळे कसलाही गदारोळ झाला नाही. कसाब हा बोलुन चालुन पाकिस्तानी नागर्रिक व या भुमीवर हल्ला करण्याचे दु:साहस करणारा दहशतवादी. त्याला कोणाचीही समाहानुभुती मिळण्याचा प्रश्न नव्हता. तशी ती मिळालीही नाही. किंबहुना या हल्ल्यातेल ठार मारले गेलेल्या दहशतवाद्यांवर या भुमीतील दफनभुमीत जागा दिली जाणार नाही असे मुस्लिम बांधवांनीच घोषित केले होते. अफजल गुरू हा भारताच्या सार्वभौमतेचा मानबिंदू असलेल्या संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड. त्याच्याही फाशीचा मुद्दा चर्चेत आला नाही. याकूबमुळे मात्र चर्चेला थैमान आले. पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही व्यस्त ठेवले गेले. एकीकडे कायदेशिर युद्ध तर दुसरीकडे सामाजिक-वैचारिक युद्धाचा आगडोंब उसळला. असे आताच का व्हावे? १९९३च्या विस्फोटांची धग त्यामागे होती असे म्हणावे तर तब्बल २२ वर्ष या खटल्याबाबत व याकुबबाबतही जवळपास मौनच होते. मग असे काय घडले किंवा घडवले गेले कि ज्यामुळे सामाजिक/धार्मिक धृवीकरण होण्याची वेळ येऊन ठेपावी?

आपल्याला याची कारणे शोधणे जास्त महत्वाचे आहे. याकुब मेमनला फाशी झाली. या भुमीच्या कायद्याच्या ज्याही तरतुदी आहेत त्यानुसार ती फाशी झाल्याने ती सर्वच नागरिकांना मान्य असण्यास कसलाही प्रत्यवाय नव्हता. भारतात आजवर हजारोंना विविध पण निघृण गुन्ह्यांतच फासावर लटकावले गेले आहे. नेमकी किती जणांना फाशी दिली गेलीय याची आकडेवारी भारत सरकारने कधीही प्रसिद्ध केली नाही. भारतात स्वातंत्र्यानंतर आजवर फक्त ५७ लोकांना फाशी दिली गेली असा शासनाचा दावा असला तरी युनियन ओफ डॆमोक्र्यटिक राईट्स या संस्थेने सरकारी कागदपत्रे तपासून १९५३ ते १९६३ या दहा वर्षांतच प्रत्यक्षात १४२२ फाशी दिल्या गेल्या असे नमूद केले आहे. अनेक संस्थांच्या वेगवेगळ्या पाहण्यांनुसार हेच आकडे वेगवेगळे असले तरी ते सरकारी दाव्यातील आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. थोडक्यात आजवर किमान दिडेकहजार लोकांना तरी फासावर लटकावले गेले आहे असा अंदाज बांधता येतो. सरकार खरी आकडेवारी का जाहिर करत नाही याकडे आपण नंतर वळू. पण याकुबच्या फाशीने मात्र समाजाला उन्मादी बनवले हे मात्र खरे.

याकूब हा मुंबईतील झालेल्या स्फोटांमागील कटाचा एक सुत्रधार व फायनांसर होता. त्याचा भाऊ टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम हे स्फोटांमागील मुख्य सुत्रधार अथवा मास्टर माईंड म्हणता येतील. त्यांना पकडायच्या वल्गना भरपूर झाल्या पण त्यांना आजतागायत पकडता आलेले नाही. म्हणजे या कटातील पकडला गेलेला व फाशीची शिक्षा झालेला हा एकमेव आरोपी. तो भारतिय यंत्रणांच्या हाती लागला कि तो स्वत:हून शरण आला, असल्यास कोणत्या अटींवर व तो जर शरण आला असेल तर त्याला फाशी दिली जाऊ शकते काय यावरही भरपुर वादळी चर्चा झाल्या आहेत. यातील सत्य-असत्य काय हे जनतेसमोर कधीही येणार नाही. सुनावणीतही या बाबीवर कोणी युक्तिवाद केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे याकूब शरण आला नव्हता किंवा त्याला गुप्तचर यंत्रणांनी कागदोपत्री शरण आल्याचे दाखवले नाही असे म्हणता आले तरी यातील संदिघ्धता कायम राहील हे उघड अहे.

मुंबईतील स्फोटंमागे पार्श्वभुमीहे समजावून घ्यायला हवी. अयोध्येतील बाबरी मशिद त्याजागी असलेल्या मुळच्या राममंदिराला उध्वस्त करुन बाबराने बांधली असा दावा हिंदुत्ववादी संघटनांचा होता. त्यासाठे वेळोवेळी रथयात्रा काढून देशभरात शिस्तबद्ध रितीने मुस्लिमविरोधी वातावरण तापवण्यात आले होते. अनेक भडकावू वक्तव्ये निरंतर केली जात होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ही मशिद लालकृष्ण अडवाणींच्या उपस्थितीत बेभान जमावाने पाडली. त्याच दिवशी दुपारपासून ते जवळपास २० जानेवारी १९९३ पर्यंत मुंबईत दंगली व भोसकाभोसकीच्या घटना होत राहिल्या. या दंगलीत जवळपास ९०० लोक मुंबईत ठार झाले. त्यात ५७५ मुस्लिम तर २७५ हिंदू होते. बाबरी मशिदीला पाडण्यात हिंदुत्ववाद्यांचा उन्माद जसा कारणीभूत होता तसाच मुंबईतील दंगलीच्या प्रकरणातही महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी पक्षाचा भडकावू हातभार होता. श्रीकृष्ण आयोगाने दंगली भडकावल्याबद्दल आरोपी क्रमांक एक शिवसेनेला केले होते. अर्थात श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल कधीही स्विकारला गेला नाही. 

या पार्श्वभुमीवर डाउद ग्यंगने मेमन बंधुंना हाताशी धरुन जगातला पहिला साखळी विस्फोटांचा भयंकर दहशतवाद घडवून आणला. ही घटना शुक्रवार १२ मार्च १९९३ साली, म्हणजे मुंबईतले दंगे शमुन दोन महिनेही झाले नव्हते तेंव्हा घडली. तेरा ठिकाणी साखळी पद्धतीने जे विस्फोट केले गेले त्यात साडेतिनशेहुन अधिक लोक ठार झाले तर दिड हजाराच्या आसपास लोक घायाळ झाले. खरे तर गुल मोहम्मद नांवाच्या पाकिस्तानातुन विस्फोटके बनवणे ते उडवणे याचे प्रशिक्षण ग्घेऊन आलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना तीन दिवस आधीच (९ मार्च ९३) पोलिसांना संभाव्य स्फोटमालिकेचा कबुलीजबाब दिला होता. नौपाडा पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता हेही येथे नमूद करण्यासारखे आहे. किंबहुना संघटित व शिस्तबद्ध मुस्लिम दहशतवादाची सुरुवात या घटनेपासून सुरु झाली असे म्हणता येते. त्याची बीजे बाबरी मशिदीच्या उध्वस्त करणा-या घटनेत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.

राजकीय स्वार्थासाठी भारतिय समाजांचे विभाजन करणे हा हेतू यात दिसतोच, पण मुंबई स्फोट प्रकरणाच्या निमित्ताने पाकिस्तानला यात येथीलच लोकांच्या मदतीने उतरता आले. भारतात द्वेषाची मालिका वाहत राहिली. त्यातुन गोध्रा असो कि त्या घटनेची "प्रतिक्रिया" म्हणून गुजरातेतील प्रायोजित दंगली, मालेगांवातील हिंदुत्ववाद्यांचे स्फोट असोत कि जर्मन बेकरीतील अतिरेकी मुस्लिमांनी केलेले स्फोट. ही भयंकर हिंसक प्रकरणे घडत राहिली. दोन धर्म परस्परांसमोर शत्रुभावनेने उभे राहत एकमेकांवर हिंसक कुरघोड्या करण्याचा हा उपक्रम जो सुरु झाला आहे तो कोठे थांबेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे याकुबची फाशी व त्याआधी आणि नंतर सोशल मिडिया ते माध्यमांतुन जो उन्मादीपणा दाखवला गेला तो केवळ याकूब या व्यक्ती फार महत्वाची होती म्हणून नव्हे तर त्यामागील षड्यंत्राचाही विचार करणे भाग आहे. 

खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी "याकुब मुस्लिम आहे म्हणून त्याला फाशी दिली जातेय..." असे विधान करुन या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. पुढे हे विधान आपण केले नसून इतरांनी केलेल्या तशाच अर्थाच्या विधानाचे समर्थन केले असे म्हणत राजीव गांधींच्या व बेअंतसिंग यांच्या मारेक-यांना राजकीय संरक्षण आहे तसे ते याकुबला नसल्याने त्याला फाशी दिले जाते आहे. बाबरी मशिदीला उध्वस्त करणारे, मुंबई दंग्यांबाबतचा श्रीकृण आयोगाने दोषी ठरवलेयांचे काय करणार"...असे प्रश्न उपस्थित करत मुंबईतील स्फोटांमागील सुत्रधार आणि तत्समान घटनांतील बाबु बजरंगी, कोडनानी यांना समान शिक्षा होत त्यांना फाशी का नाही असाही प्रश्न उपस्थित केला. ओवेसींचे राजकारण मुस्लिम व दलितांचे एकत्रीकरण करत वेगळी फळी उभारायचे राजकारण चालु आहे. त्यांना त्यात यशही मिळतांना दिसत आहे. 

एके काळी कोंग्रेस हीच मुस्लिमांना तारणहार वाटत असे. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. आपण व्होटब्यंकेसाठी फक्त वापरलो गेलो हे त्यांच्या नवशिक्षित पिढीला उमगले असेल तर त्यात आश्चर्य नाही. आजवर मुल्ला-मौलवींच्याच संगतीत राहत धार्मिक भावना जोपासणारे आता स्वत:लाच एक स्वतंत्र राजकीय शक्ती बनवण्याच्या प्रयत्नांना लागलेले दिसतात. त्यात याकूब प्रकरणाने ओवेसींच्या राजकारणाला गती दिली आहे व त्याचा फायदा ओवेसीसारखे बुद्धीमान राजकारणी घेणार नाहीत असे नाही. साक्षी महाराजांनी ओवेसींना पाकिस्तानात जा असाही अनाहुन धमकीवजा सल्ला दिला आहेच. या मुद्द्यांवर कोंग्रेसही काही वेगळे बोलत नाही. ती जवळपास ओवेसींचेच मुद्दे मांडत होती.  

सर्वसामान्य समाजातही याकुबवरुन तीन तट पडले आहेत. पहिला सर्वात प्रबळ गट आहे तो म्हणजे हिंदुत्ववादी म्हणवणा-या संघटनांचा व त्यांच्या समर्थकांचा. दुसरा गट आहे तो म्हणतो याकुबला फाशी द्या पण मग इतर सर्व तत्सम घटनांतील हिंदुत्ववादी आरोपींनाही फासावर लटकवा. तिसरा गट, जो अल्प्संख्य आहे, म्हणतो कि फाशीची शिक्षाच रद्द करा. यातील पहिल्या गटाने दुस-या गटांवर देशद्रोही, पाकिस्तानात जा ते शिवराळ भाषेत आरोप केलेले आहेत. दुसरा गटही आपल्या पद्धतीने साध्वीपासून कोडनानीपर्यंत आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत. "पुरोगामी" हा शब्द गेल्या दोन-तिन आठवड्यात प्रकटपणे एक शिवी बनवून टाकला आहे. याकूबच्या अंतयात्रेला जी गर्दी उसळली त्यावरुन हिंदुत्ववाद्यांमद्धे मुस्लिम द्वेषाची अजून कारंजी उसळली. देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्याचा ठेका घेतल्याप्रमाणे उन्माद केला गेला. इतका कि मुस्लिमांनाही बचावाच्या पवित्र्यात जावे लागले. वृत्तपत्रांनीही याबाबत नि:संदिग्ध भुमिका घेतलेली दिसत नाही. किंबहुना सध्याच्या वातावरणातील विखाराने कोणीही भांबावुन जावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

यात काही वास्तवे आपल्याला पहायला हवीत. पंजाब सरकार बेअंतसिंगांच्या खुन्यांना व तमिळनाडू सरकार राजीव गांधींच्या खुन्यांना फासावर लटकवण्यास अनुकूल नाही. याकुबचा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे तसा त्यांचाही आहे. मुंबईतील, गुजरातेतील दंगली ्भडकवणारे, दंगलखोरांच्या पाठीशी उभे राहणारे तर मोकाट आहेत. हजारो लोक ठार झाले. त्या गुन्ह्यांचे गांभिर्य नाही कि काय? मुद्दलात बाबरी मशीद पाडल्यानंतर हे सुडसत्र सुरु झाले तेंव्हा मुळ घटनेतील आरोपींचे काय? कि ते राजकीय नेते अथवा त्यांना राजकीय संरक्षण आहे म्हणून ते मोकाट आहेत? 

एकाला फाशीची शिक्षा न्याययंत्रणेने दिलेली आहे. त्याला बचावाची संधी शेवटपर्यंत दिली आहे. कायद्याच्या सर्व कसोट्या, डावपेच वापरुन झाल्यानंतरही याकुबचा गुन्हा दयायोग्य नाही म्हणून त्याला फाशी दिले गेले आहे. न्याययंत्रणेने आपले आपल्या देशाच्या घटना व कायद्यांचे कसोशीने पालन केले आहे. वाद त्याबद्दल नाही. नसावाही. पण फाशीला मागील घटनाक्रमामुळे धार्मिक रंग येणे अपरिहार्य होते. आणि ते तसे झालेलेही आहे. एकाला शिक्षा मग दुस-याला का नाही हा कायदेशिर प्रक्रियेचा भाग आहे हे मान्य केले तरी ज्यांना फाशीची शिक्षा होऊन प्रक्रियेचे अंतिम टोक गाठले आहे अशा बेअंतसिंग आणि राजीव गांधींच्या खुन्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही तर त्याचा अर्थ आपली राजकीय व न्यायव्यवस्थाही पुरेशी सक्षम नाही असा अर्थ निघत असेल तर चूक कोणाची? न्यायालये ही स्वायत्त संस्था असेल तर तीत राजकीय हस्तक्षेप का असावा? म्हणजे आपली लोकशाही अजून प्रगल्भ झालेली नाही असेच नाही काय? अजून ज्यांना शिक्षाच ठोठावली गेलेली नाही अशा साध्वी प्रज्ञासिंग वगैरेंबाबत विधान करणे गैरच आहे. पण तेही खटले वेगाने चालवले जावेत याबद्दल आपले (सरकारचे) नेमके काय धोरण आहे?

खरे म्हणजे कसलेही धोरण नसणे हेच आपले धोरण आहे. ज्या वेळीस राजकीय दृष्ट्या योग्य व फायद्याचे वाटेल ते आपले धोरण असते हा आजवरचा अनुभव आहे. याकुबच्या फाशीमुळे मुस्लिम समुदायांना पुन्हा एकदा असुरक्षित वाटू लागण्याची शक्यता आहे. तिचा फायदा पाकिस्तान अथवा आयसिससारख्या कृरकर्मा संघटना येथील काही स्थानिकांना हाती धरुन दहशतवादी कारवाया करण्याचा वा तसा प्रयत्न करण्याचा धोका आहेच. सरकारला त्याची जाण नाही असे नाही. पण यातुन भारतीय समाजांचे धृवीकरण होत ओवेसी ते हिंदुत्ववादी पक्षांचे काही फायदे झाले तरी अंतत: नुकसान एकुणातील समाजाचेच होणार आहे. १९९२ नंतर हजारो लोक दंगली ते दहशतवादी घटनांत ठार झालेत. सर्वांच्याच मनावरील, या ना त्या कारणाने झालेल्या जखमा अजून ओल्या आहेत. आपला समाज प्रगल्भ नाही हे याकूबनिमित्ताने उसळलेल्या उन्मादातुन दिसून आले आहे. एका फाशीसाठी लोक एवढे उन्मादी होतात, बेभान होतात आणि त्याचा एक इव्हेंट बनवतात ही बाब चिंतेची आहे. कायदासुडाचे तत्व वापरतो कि नाही, फाशीची शिक्षा असावी कि नसावी यावर आपण वेगळी चर्चा करु. (माझ्या मते भारतातुन फाशीची शिक्षा रद्द व्हायला हवी.) पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे कि कोणालाही मारण्याची कायदा शिक्षा देतो तेंव्हा त्याकडे उन्माद-आनंद अथवा दु:खाने किंवा सुडाची पुर्ती झाली या भावनेने नव्हे तर पुरेशा गांभिर्याने पहायला शिकले पाहिजे. किंबहुना तीच संस्कृती व सामाजिक जाणीवांची प्रगल्भता आहे. उन्मादी व सुडाच्या पुर्ततेची भावना, जो फासावर लटकतो त्याने केलेल्या कृत्याच्या वेळीसच्या, उन्मादी सुडी भावनांपेक्षा वेगळ्या नसतात. थोडक्यात आपणही छुपे, अक्रिय पण मानसिकतेने हिंसक बनलेलो असतो. 

हिंदुत्ववादी लोकांना जसे शिकावे लागेल तसेच धर्मांध मुस्लिमांनाही. यामुळे आपण एकुणातील समाजाचेच विभाजनी करत द्विराष्ट्रसिद्धांताची पुन्हा पायाभरणी तर कर नाही आहोत ना हे पहावे लागेल. गंभीरपणे चिंतन करावे लागेल. खरे तर ओवेसींनी मुस्लिमांना राजकीय आकांक्षा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात लोकशाहीत काहीएक वावगे नाही. पण त्यामागील हेतु पहायला हवेत. दुसरे ओवेसी जी भाषा वापरतात ती नुसती निंद्य नव्हे तर सुडसत्राला चेतवणारी आहे. त्यांना तसेच साक्षी महाराज व त्यांच्या हिंदुत्ववादी पंथातील जे उग्रवादी लोक आहेत त्यांना जेलमद्ध्ये डांबा ही मागणी करणे अधिक योग्य राहील. हे भडकावू लोक स्फोटकांपेक्षाही विघातक आहेत याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. 

याकूबची फाशी हे एका माणसाला कायद्याने दिलेले मरण असेल. कायदा सर्वांचाच असतो. तो अस्तित्वात आहे तोवर त्यातील तरतुदी अमान्य करता येत नाहीत. त्यात सुधारणांचे प्रयत्न मात्र करता येतात. फाशीची शिक्षा असावी कि नसावी यावर तेवढेच व्यापक चर्चा करावी लागेल. त्याही पुढे जाऊन ज्यांना फाशीच्या शिक्षा ठोठावल्या गेल्यात त्यांची अंमलबजावणी का झाली नाही हेही चिंतन करावे लागेल. सरकार आणि न्यायव्यवस्था यातील सीमारेषा नि:संदिग्ध बनवावी लागेल आणि राजकीय कारणांनी शिक्षा अंमलात आनने किंवा टाळणे हे प्रकार घडता कामा नयेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहशतवादाचे गुन्हे ज्यंच्याही विरुद्ध आहेत त्यांचे खटले वेगाने चालवणे. त्या वेळीस जोही काही कायदा असेल त्याप्रमाणे अधिकाधिक शिक्षा दिली गेली पाहिजे.

याकूबबाबत उन्माद करण्याचे काही कारण नाही कि कोणी खेदही करण्याचे कारण नाही. खेद वाटलाच तर आपल्याला आपल्याच मनोवृत्तींचा वाटला पाहिजे. 

-संजय सोनवणी

(चपराकमध्ये प्रसिद्ध झालेला लेख!)

Wednesday, January 7, 2015

दहशतवाद- भीषण, निर्दयी, अमानवी.......


काल प्यरिसमद्ध्ये चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पत्रकारांसहित १२ ठार तर २० जखमी झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. नववर्षाची सुरुवातही अमानवी रक्तपाताने व्हावी हे दुर्दैवी आहे. मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणून मुस्लिम दहशतवाद्यांनी हे अमानवी कृत्य केले असे मानले जाते. हा विकृत मुर्खपणा आहे. पैगंबरांची चित्रे काढली गेली नाहीत असे एकही शतक नाही. मोझेस, येशूची व्यंगचित्रेही असंख्य वेळा काढली गेली आहेत. पैगंबरांची काढली तर एवढा गजहब का? हा तद्दन मुर्खपणा...विकृती आणि मेंदुच नसल्याचे लक्षण आहे. इस्लाम जर असा असेल तर हा धर्मच इस्लामियांनी स्वहस्ते अरबी समुद्रात एकदाचा दफन करुन टाकावा. अशा घटनांची चिंता/प्रतिकार उर्वरीत जग करेलच...गरज आहे मुस्लिमांनीच पुढाकार घ्यायची...आवाज उठवायची.

खाली माझा साहित्य चपराक मद्ध्ये या महिन्यात प्रसिद्ध झालेला लेख वाचा आणि आपण कोठे चाललो आहोत यावर क्षणमात्र का होईना विचार करा!
=============
दहशतवाद - भीषण, निर्दयी, अमानवी.

२०१४ वर्ष भिषण, निर्दय, अमानवी हे शब्दही शरमतील एवढ्या दहशतवादी हत्याकांडांनी हादरले. पेशावरमद्ध्ये तहरिके तालिबानच्या दहशतवाद्यांनी १३२ शालेय विद्यार्थांची बेछूट गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडाने संपुर्ण जग हादरले. कासाविस झाले. भारतात काही गट या घतनेने खूश होतात न होतात तोच आसाममद्ध्ये बोडो अतिरेक्यांनी ६८ व्यक्तींची कत्तल केली. त्यातही स्त्रीया अधिक तर होत्याच पण सात वर्षाच्या कोवळ्या मुलीवरही गोळ्या झाडल्या गेल्या. याच दरम्यान आयसिसने याच दरम्यान आयसिसने जिहादींशी लग्नाला नकार देणा-या दिडशे स्त्रीयांना गोळ्या घालून ठार मारले. याच आयसिसने जिहाद सोडुन आपापल्या देशात/घरी  पळु पाहणा-या २०० तरुण जिहादींची हत्या केली. या सर्व घटनांमधील दुर्दैवी धागा एकच आहे, या सर्व प्रकारात मारणारेही एकाच धर्माचे होते आणि मारले गेलेलेही मारणा-यांच्याच धर्माचे होते. दहशतवाद शेवटी स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवतो असे म्हणतात ते खोटे नाही.

पण हे असे विकृत दहशतवादी गट का जन्माला येतात? त्यांच्यात ही निर्दयता कोण भरते? या सा-या हिंसाचारामागे कोणाचे स्वार्थ आहेत हे पाहू गेलो तर अजून विदारक चित्र स्पष्ट होते. मुस्लिम हा धर्मच दहशतवादी आहे अशी सर्वसामान्य मान्यता आहे. पण बोडो हे कोठे मुस्लिम आहेत? विकृतीला बाहेर पडायचा फक्त मार्ग हवा असतो.

आयसिस (इस्लामिक स्टेट्स ओफ इराक) ही संघटना सिरिया आणि इराकमद्ध्ये कार्यरत आहे. नांवातच संघटनेचे हेतू स्पष्ट आहेत. २००४ मधील अमेरिकेने इराकवर लादलेले युद्ध आणि सद्दाम हुसेनची जाहीर फाशी या घटनांचा प्रचंड प्रभाव यावर आहे. इराकवर अमेरिकेने पुर्वीही युद्धे लादली होतीच. इराक बेचिराख केला गेला. तरीही सद्दामला संपवता आले नाही म्हणून इराकमद्ध्ये जैव-रासायनिक अस्त्रे आहेत असा आरोप करत त्यावर युद्ध लादले गेले. विनाश केला गेला. पळून गेलेल्या सद्दामला एका  खंदकात पकडून तडकाफडकी फासावरही चढवण्यात आले. ज्यू-ख्रिस्ती विरुद्ध मुस्लिम हा संघर्ष हा पुरातन, म्हणजे इस्लामच्या स्थापनेपासूनचा आहे. आजही तो सुरुच आहे. प्रतिक्रिया म्हणून ज्या दहशतवादी संघटना वर आल्या त्यातीलच ही आयसिस. ही संघटना कृर आहे. पण जगभरातील मुसलमान या संघटनेला भावनिक आधार देतात, प्रचार-प्रसाराला मदत करतात. भारतातील अनेक मुस्लिम तरुण चक्क तिकडे जाऊन त्यांना सामीलही झाले होते हे वास्तव आपल्याला माहित आहे.

इस्लामवर टीका करतांना भुराजकीय दृष्ट्या त्यांचे किती शोषण झाले आहे हे पाहिले पाहिजे. इराण-इराक-कुवेत येथील तेलखाणी यावर अमेरिकेचा डोळा राहिलेला आहे. किंबहुना "तेलावर वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व!" ही जोर्ज बुश यांची उक्ती जगप्रसिद्धच आहे. आणि त्याच धोरणाने अमेरिकेने व युरोपियन राष्ट्रांनी इस्लामी राष्ट्रांत फुट पाडणे, त्यासाठी शिया-सुन्नी हा वाद पेटवत राहणे आणि तेलखाणींवर वर्चस्व मिळवणे यासाठी सर्व शक्ती, मुत्सद्देगिरी पणाला लावली आहे. सीआयएचा यातील रोल खूप मोठा आहे. २०११ मधील सिरियातील गृहयुद्ध त्याचाच परिपाक मानला जातो. पण त्यातून ही संघटणा प्रबळ झाली व जगभरातुन मुस्लिम अतिरेक्यांची भरती सुरु केली. सिरिया व इराकमद्ध्ये दहशतवादी अड्ड्यांचे नेटवर्क उभारले जाऊ लागले. अर्थात यात कडवेपणा, कट्टरता या बाबींचा समावेश होणे हे अपरिहार्य होते.

मुस्लिम लोकशाहीला अनुकुल नसतात याचे खरे कारण विनोदी आहे. लोकशाही ही युरोपिय, म्हणजेच ख्रिस्ती राष्ट्रांची देणगी असल्याने मुस्लिमांना ती इस्लामविरोधी वाटते. त्यामुळेच शरियाचा आग्रह मुस्लिम राष्ट्रांत धरला जातो...इतके हे हाडवैर पुरातन आहे. खलिफातची स्थापना हे नेहमीच दहशतवादी गटांचे उद्दिष्ट त्यामुळेच राहिले आहे. यातुनच अबु बक्र बगदादीची खलिफा म्हणून नियुक्ती केली गेली आहे व जगभरच्या मुस्लिमांचे एकच एक राज्य व्हावे असे या संघटनेचे ध्येय आहे याची नोंद भारतीय वाचकांनी घेतली पाहिजे. असो.

या संघटनेने केलेल्या दहशतवादी कृत्यांची वाचकांना वृत्तपत्रांतुन माहिती मिळतच् असल्याने त्या खोलात न जाता, सध्या या संघटनेचा विरोधाच्या आगडोंबामुळे पाया डळमळू लागला आहे. अनेक जिहादी तरुण पळत आहेत अथवा त्या प्रयत्नांत आहेत. जिहादींशी लग्न करायला मुस्लिम स्त्रीया नकार देत आहेत आणि त्याच नैराश्यातुन स्त्रीयांनाच ठार मारले गेले आहे. लहान मुलांच्या हाती बंदुका दिल्या गेलेल्या आहेत. हा संघर्ष अजून खुप मोठा रक्तपात होऊनच संपेल व नव्या संघर्षाची बीजे रोवेल असे स्पष्ट दिसते.

पाकिस्तान

 दहशतवादाचे पाठिराखे असेलेले पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवसही उगवुन गेला. थरिके तालिबानच्या सहा आत्मघातकी दहशतवाद्यांनी पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमद्ध्ये घुसून शाळकरी पोरांना वेचून गोळ्या घालून मारले. १३२ पोरं मेली. इतरही काही ठार झाले. पाकिस्तानसह सारे जग सुन्न बधीर व्हावे व क्रौर्यालाही शरमेने मान खाली घालावे लागेल असले अधमतम कृत्य केले. एकीकडे दहशतवादाच्या या भिषण घटनेचा जगभर निषेध होत असता "बरे झाले, सापाची पिल्ले मेली..." अशा आशयाच्या प्रतिक्रियाही, अगदी भारतातुनही, उसळल्या.

तालिबानला अफगान-रशिया संघर्षाच्या वेळीस कोणी जन्म दिला, कसे प्रशिक्षण ते शस्त्रास्त्रे पुरवली हे जगाला माहित आहे. पाकिस्तानला अमेरिकेने नेहमीच आपल्या अंकित ठेवले आहे. युद्ध संपल्यावर तालिबानचा एक्दा जन्म घातलेला भस्मासूर आपल्यावरच उलटणार याची कल्पना केली नसेल काय? अमेरिकेचे हस्तक बनत असतांना आपण स्वविनाशही ओढवून घेत आहोत हे पाकिस्तानलाही समजले नसेल का? प्रश्न अर्थात निरर्थक आहेत कारण तालिबान अमेरिकेवर उलटली. न्युयार्कमधील ट्विन टोवर्स चक्क विमाने धडकवून कोसळवण्यात आले. पाकिस्तानमधील पेच अजून वाढला. अमेरिकेने आपल्याच अपत्याविरुद्ध युद्ध छेडले आणि भुमी वापरली पाकिस्तानची.

पाकिस्तानी सैन्यालाही या "दहशतवादाविरुद्धच्या लड्यात उतरावेच लागले. पाकिस्तानात शिया-सुन्नी संघर्ष पेटला आणि मशिदीही स्फोटांत उडवल्या जावू लागल्या. बलोची-पख्तुन खरे तर स्वातंत्र्यप्रेमी नागरिक. त्यांना स्वतंत्र राष्ट्र हवे ही जुनी मागणी. तालिबान्यांच्या तळांवर पाकिस्तानी सैन्याने हल्ले करतांना स्त्रीया व मुलांनाही ठार मारले याचा राग त्यांच्या मनात होता. सुडातून सुड जन्म घेतो आणि त्यातुनच तालिबान्यांनी कच्च्या-बच्च्यांची निघृण हत्या केली.

आता पाकिस्तान दहशतवाद्यांना फासावर चढवने, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई तीव्र करणे हे उद्योग करत आहे, पण त्यातून शांती येणार आहे काय या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे.

बोडोल्यंड

.फुटीरतावादी बोडो अतिरेक्यांनी ६८ आदिवासींचे निघृण हत्याकांड घडवले, स्त्रीया-मुलेच त्या हत्याकांडातील सर्वाधिक बळी ठरले. निरपराधांच्या रक्ताचे टिळे आपल्याही भुमीला लागले. शेजारच्या देशातील हत्याकांडांवर खुष होणा-यांनी याची अधिक गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.

बोडोल्यंडला स्वायत्त करा या मागणीपासून सुरु झालेला हा प्रवास बोडोल्यंडला स्वतंत्र देशाचे अस्तित्व द्या या मागणीपर्यंत पोहोचला. या संघर्षाने रक्तरंजीत रुप घेतले. आसाम-भुतान सीमेवर बोडो (एन.डी.एफ़ बी.) अतिरेक्यांचे अड्डे आहेत. भुतानी सैन्याने अनेकदा ते अड्डे उध्वस्त करायचा प्रयत्न केला असला तरी त्यात यश आले नाही. १९९२ पासून आजवर या अतिरेक्यांनी हजारो आदिवासी, निमलष्करी जवानांची हत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे बोडो हेही आदिवासीच आहेत. जवळपास ९०% बोडो हे हिंदू आहेत तर ख्रिश्चन ९.४०% आहेत. बाकी बोडो आपला आदिम आदिवासी धर्म पाळतात. या फुटीरतावाद्यांना चीनचा सक्रीय पाठिंबा आहे हे कधीच लपून राहिले नाही. उत्तर-पुर्वबाबत असंवेदनशील असलेल्या भारतीयांना तेथील घटनांशी विशेष देणे-घेणे नसते. उदा. २६/११ झाल्यावर काही दिवसांतर ग्वहत्ती येथे स्फोटांत ५० नागरिक ठार झाले होते, पण माध्यमांनी त्याची यत्किंचितही दखल घेतली नव्हती. सरासरी प्रत्येक महिन्यात आजवर छोटी-मोठी हत्याकांडे होत आली आहेत. "न्यशनल डेमोक्रटिक फ्रंट ओफ बोडोल्यंड" ही संघटना भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेली आहे, पण त्याचा विशेष उपयोग झालेला नाही. तेथे आदिवासी कोब्रा फोर्स ही प्रतिदहशतवादी संघटनाही आहे व या दोघांतही अनेकदा संघर्ष झालेला आहे.

आसाममद्धे संथाल, उराऊं आणि आणि मुंडा या आदिवासी जमाती प्रमूख असून हे चहामळ्यांवर काम करण्यासाठी ब्रिटिशकाळात आजुबाजुच्या राज्यांतून आले व तेथेच स्थायिक झाले. यांना बोडो क्षेत्रांतून हुसकावने हे त्यांचे उद्दिष्ट आहे. स्थलांतरीत बांगलादेशी मुस्लिमही त्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत. एन.डी.एफ़ बी. ही संघटना ख्रिस्ती प्रभावाखालील असल्याचे मानले जाते. त्याला तोंड द्यायला हिंदु आधिक्य असलेली बोडो लिबरेशन टायगर्स फोर्स ही फुटीरतावादी दहशतवादी संघटना निघाली होती, पण २००३ मद्ध्ये या संघटनेने शरणागती पत्करली.

बोडोल्यंडमधील संघर्षालाही धार्मिक परिमान आहेच! हिंदू आणि ख्रिस्ती हे ते परिमान. ख्रिस्ती दहशतवाद्यांना जगभरातील चर्चेस कडून पैसे मिळतात तर चीनकडून शस्त्रास्त्रे. पुर्वोत्तर भागावर चीनचा डोळा आहे हे कधीही लपून राहिलेले नाही. भारतातील माओवादी दहशतवादी हे चीनचेच अपत्य. बांगलादेशी मुसलमानांचा द्वेष करणारे हिंदुत्ववादीही या हिंसाचाराचे समर्थक आहेत हे विशेष. हिंदुत्ववादी नेता त्या भागात येऊन भाषण ठोकून गेला कि पाठोपाठ हिंसाचाराच्या घटना घडतात हे तेथे राहुन आलेल्या मित्रांनी सांगितले आहे.

मुळात बोडो असोत वा अन्य आदिवासी समूह, त्यांना आम्ही राष्ट्रीय प्रवाहात भावनिकदृष्ट्या सहभागी करुन घेण्यासाठी काय केले हा खरा प्रश्न आहे. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे उर्वरीत भारतीय आणि उत्तरपुर्व यात एक राष्ट्र म्हणून भावनिक, सांस्कृतिक धागा जोडण्यात आम्हा नागरिकांना अपयश आले आहे. २००२ मद्ध्ये माझी अरुणाचल प्रदेशच्या एका मंत्र्यांशी दिल्लीत भेट झाली होती. त्यांनी तेथील नागरिक भारताला आपले मानत नाहीत ही खंत व्यक्त केली होती. पर्यटनांसाटही आम्हाला जग दिसते पण आम्ही तिकडे सहसा फिरकत नाही. तेथील पुण्या-मुंबईत शिकायला येणा-या विद्यार्थ्यांना "चिंकी" म्हणुन  हिणवले जाते. ट्र्यफिक पोलिस तर चक्क त्यांच्याकडे पासपोर्ट मागतात! हे चित्र खेदजनक आहे.

या भावनिक तुटलेपणातून व सांस्कृतिक अस्मितेतून स्वतंत्र राष्ट्राची मागणी होत असेल तर आपणही गांभिर्याने विचार करायला नको काय?

आपण वर तीन दहस्तवादांबद्दलची चर्चा केली. खरे तर या दहशतवादाचे भूत निर्माण करणारे अमेरिका व चीन. त्याची फळे भोगताहेत आपापसात लढणारे त्या त्या भुभागांतील रहिवासी. जागतिक शांततेबाबत, तसे व्यापक नवे तत्वज्ञान निर्माण करण्यात जागतिक तत्वज्ञ व विचारवंतांना घोर अपयश आले आहे हे उघड आहे. किंबहुना त्यात भरच घालण्याचे कार्य हे तत्वज्ञ करतात. वर्चस्वतावादी भुमिकेतुनच दहशतवादी लोकांना लढत ठेवायचे कार्य ते करतात. मग अंगलट येवू लागले की त्यांची कोंडी करायचा प्रयत्न करतात. शस्त्राशिवाय कोणतीही भाषा न शिकलेले भ्रमिष्ठ होत नैराश्यातुन आपलीच माणसे, स्त्रीया-मुले यांची कत्तल करत सुटतात. साळसुद लोक धर्मावर बोट ठेवून मोकळे होतात. पण भुराजकीय तिढे समजाऊन घेतले तर लक्षात येईल कि अरबी राष्ट्रांत कोणताही धर्म असता तरी हे घडणे अपरिहार्य असेच होते. हा अस्तित्वाचा प्रश्न असतो...धर्म फार फार तर एक हत्यार बनतो...मग तो कोणताही असो. म्यानमारमद्ध्ये बौद्ध अतिरेकी रोहिंग्या समाजाविरुद्ध हत्याकांडे करत असतात, पण आम्ही तिकडील बातम्या कधी पाहत नाही. त्या दृष्टीने पाहिले तर दहशतवादी नाही असा एकही समाज नाही.

आपल्या मानवी जगाला एकंदरीत जगाबद्दलच नव्याने विचार करायची गरज आहे!

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...