Showing posts with label शेतमालाचे निर्जलीकरण. Show all posts
Showing posts with label शेतमालाचे निर्जलीकरण. Show all posts

Sunday, September 1, 2019

Inviting investment in J&K: Plea or ploy?

Image result for kashmir

Prime minister Narendra Modi, during his visit to the UAE and Bahrain, appealed to the Indian diaspora, NRIs and businessmen from both the countries to invest in Kashmir on a priority basis. He also invited them to participate in the investors’ summit to be held in Jammu & Kashmir in October this year.

Going by various indicators, it is quite likely that India may win investment from the Arab country in J&K. The positive aspects such as Modi's personal rapport with UAE crown prince Sheikh Mohammed bin Zayed bin Nahyan; bestowing of the highest civilian honours on the Indian PM such as the UAE's Sheikh Zayed Medal and Bahrain's the King Hamad Order of Renaissance; the UAE being the third-largest trading partner of India with $60 billion and the 3.3 mn Indian community in the UAE, may work in India’s interest. Moreover, the UAE's diplomatic tilt toward India in the recent past point to new-found positive energies in the bilateral relations between the two countries.

However, the historic precedents and the ground reality in J&K present a different picture.

The Arab countries' muted response to India’s move to abrogate Article 370 and 35 (A) can be seen in the backdrop of millions of Indians working there and India being a major oil importer. Gulf countries cannot afford to harm their own commercial interests.

Looking at the worsening state of Indian economy, rapid outflow of foreign investment, the attempt to attract FDI in J&K will have to face some hurdles. Investors will be wary of investing in a region, where the army has a massive presence and the citizens are almost imprisoned. Though it can be argued that this situation would not prevail forever, J&K has limitations when it comes to the kind of industry that can be established there.

Modi has pointed out to the potential investors from the Gulf countries that J&K's strong points are its tourism, herbal and organic products, which can be marketed globally. However, J&K has little to offer due to its geographical and natural resource limitations.

Given this scenario, is it not premature on Modi’s part to invite investors when tourism is in the doldrums? Investors always prefer to invest in peaceful areas. Without the support from the local populace, no investment can be worthwhile.

India has cultural and commercial ties with the Arabs from the pre-Islamic times. Valuable knowledge that Indian scholars developed initially travelled to Europe through the Arab travellers and tradesmen.

Mohammad Qasim attacked Sindh not to spread the religion but to free seaports and control trade routes connecting India. It was Chandrapida of Karkotaka dynasty, who restricted Qasim beyond Jalandhar, the then boundary of Kashmir. His successor Lalitaditya the Great not only defeated Arab governor Junaid but forced his successor Tamim to flee, uprooting the Arab presence from the North-West.

The history of Kashmir-Arab relationship has not been very cordial. In not-so-distant-past, the people of Kashmir in the last century felt threatened when some Arabs started marrying poor Kashmiri girls to buy houseboats and properties, thereby boosting their rates to phenomenal levels. This was not only shared by some authentic sources but has also been reported in the media. However, the gravity of the matter was neglected.

Now, this fear of Arab takeover in the Kashmiri mind may grow as purchasing land and property has now become official with the abrogation of Article 35 (A), which was a psychological and a legal shield for the Kashmiri people.

Even though we neglect what locals feel or how they react, a major shift in the local socio-economical dynamics is inevitable. Kashmir has been a major tourist destination with little scope for other industries, except agricultural, light engineering industry and education.

Social activists such as Sanjay Nahar of NGO Sarhad have already taken the lead in making Kashmir a knowledge centre once again. It was a knowledge hub from the sixth to 12th century. The Arabs might look at it as the world’s most wonderful place, where they can build plush palaces and hotels. They are anyway not famous for agriculture or other industries suitable to the character of Kashmir.

Moreover, the Kashmiri people have always been rebellious, which is a proven fact. Unless peace is restored in an amicable manner with the consent of both sides, none other than land-hungry investors will turn to Kashmir for investment. This will not ensure wellbeing of the Kashmiri people.

This means either the Prime Minister's call for investment in J&K to Arab countries is just a ploy. If it comes true in the future, then the Kashmiris will feel alarmed. We must see to it that the social cohesion in Kashmir is not disturbed.

And to add to the mockery of Kashmiris, publicity-hungry Maharashtra government has announced its intention to purchase land in J&K and Laddakh to set up resorts. Huge amount of mere Rs. 1 crore is earmarked for this project. The state government has become laughing stock with this announcement as already all these three parts of the former state already have excess capacity to cater to the tourists. The history is occupancy rate has never crossed 70% even in the peak seasons and when situation was right. Today tourism in Kashmir has nosedived to zero percent. What will be the future is yet uncertain to decide. Tourists have already started changing their destinations. Another thing is that the hotspot tourist destinations like Pehalgaon, Gulmarg, Somarg has no space to allot as already land is leased to other hospitality professionals. If the Maharashtra government was so keen on improving tourism in Kashmir, it would have taken initiative in a different way long ago when it needed badly. Insensitive Maharashtra government, unfortunately, eying the land of Kashmir and not the people. This also is another ploy, like Modi, of Maharashtra government.




Monday, April 18, 2011

निर्जलीकरन: यंत्रसामग्री आणि बाजारपेठ


निर्जलीकरण प्रक्रिया मी आधीच्या लेखात थोडक्यात विषद केलेली आहेच. थोड्याशा चाचण्या घेवून प्रत्येक भाजीसाठी ती निर्धारीत करता येते. येथे मी यंत्रसामग्रीबद्दल माहिती देत आहे. हे लघुत्तम प्रकल्पासाठी आहे जे शेतक-यांना सहज वापरता येणे शक्य आहे. यात थोडेफार बदल प्रत्यक्ष स्थितीप्रमाणे व गरजांप्रमाणे करता येतील.
१. कटर्स/स्लायसर्स: हे काम मानवी श्रमाने करणे छोट्या क्षमतेच्या प्लांटसाठी सोयीस्कर आहे. कटर्स/स्लायसर्स हे प्रत्येक भाजीचा वकूब बघुन किती जाडी-लांबी ठेवायची याचा पुर्वनिर्नय घेवून ते करता येते. यासाठी अल्युमिनियमचे आछादन असलेले टेबल्स असावेत. भाजी स्वछ्छ धुतल्यानंतर प्रथम मुळे, अवांछित गवतादी भाग बाजुला करावेत. नंतर त्यांचे सुयोग्य, एकच परिमाण राहील या पद्धतीने कटिंग करावे. बटाटे, टोम्यटोदि फळ भाज्यांचे स्लायसिंग करावे. समजा १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्लांट असेल तर ताशी १०० किलो माल प्रक्रियेसाठी तयार ठेवावा लागतो.
२. ब्लांचींग साठी batchनुसार सरासरी १५ ते २५ किलो माल २-५ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात ठेवावा लागतो म्हणजे उत्पादित मालाचा दर्जा उंचावतो. त्यासाठी कोणत्याही धातुची, एवढा माल सामावु शकेल भांडी लागतील...लग्नात भोजन बनवायला लागतात तशी.
३. जाळीदार गाळण्या: माल थोडा वेळ उकडला कि तो स्टीलच्या चाळण्यात घ्यावा आणि पुर्ण पाणी निथळु द्यावे. या पाण्याचा पुनर्वापर करता येतो. करावा. काही वेळ त्याला नैसर्गिक तापमानातच सुकु द्यावे. जर हवेत पावसाळी आद्रता असेल वा उन्हाचा अभाव असेल तर मात्र सुकवण्यात अर्थ राहणार नाही...मालाला सरळ सुकवण्याच्या प्रक्रियेत न्यावे.
४. ड्रायर: दोन प्रकारचे ड्रायर मी सुचवतो. दोन्ही टनेल ड्रायरच आहेत पण रचना वेगळी आहे.
अ. कन्वेयर बेल्ट ड्रायर: यात ड्रायरमद्धे एक फिरता बेल्ट असतो जो जाळीदार स्टेनलेस स्टीलचा असतो. हा बेल्ट ड्रायरच्या बोडीच्या मधोमध रोलर्सवरुन फिरवला जातो. हा वेग अत्यंत कमी असल्याने हे काम मानवी श्रमानेही करता येते वा टायमिंग स्पीड कंट्रोलर मार्फत नियंत्रीत ठेवता येतो. मालात पाण्याचे प्रमाण जेवढे अधिक तेवढाच याचा वेगही कमी असतो. या बेल्टवर सरासरी २ ते २.५ इंच उंच एवढाच थर समप्रमाणात विखरावा लागतो. बेल्ट जसजसा पुढे सरकेल त्या प्रमानात माल सतत विखरवत रहावा. ५ ते १० तासांत सायकल पुर्ण होते...म्हणजे सुकलेला माल दुस-या बाजुने बाहेर येवु लागतो. त्याची टेस्ट (म्हणजे त्यातील उर्वरीत जलांश, रंग आणि राखेचे प्रमाण) घेवून जर जलांश अधिक झाला असेल तर नंतर असा माल ड्रायरमधुन जास्त वेगाने पास करावा म्हनजे अधिकचा जलांश निघुन जाईल.
ब. ट्रे टनेल ड्रायर: यात ड्रायर तसाच असतो पण त्याची उंची अधिक असते. यात ट्रे वर ट्रे ठेवता येतील अशा ट्रोली लागतात. माल वर सांगीतल्याप्रमाणेच सम प्रमानात पसरवायचा असतो. वेगातही बदल नसतो पण हे काम मानवी श्रमानेच पण अत्यंत दक्षतेने करावे लागते.
हे दोन्ही पद्धतीचे टनेल ड्रायर बनवणे सोपे आहे. त्यासाठी फार उच्च दर्जाची तांत्रीक क्षमता लागत नाही. महत्वाचे म्हणजे जी उष्ण हवा आत सोडली जाते तीचे आवर्तन आणि वितरण समप्रमानात झाले पाहिजे. अन्यथा त्याचा अंतिम उत्पादनावर विपरीत परिणाम होवु शकतो. या ड्रायर्स मद्धे २-४ इन्स्पेक्शन विंडो (काचेच्या) ठेवलेल्या असतात. रंगावरुन मालाची प्रत तपासता येते. तसेच कोन्वेयर बेल्ट ड्रायरमद्धे ठरावीक अंतरावर माल उलत-सुलट करता येईल या पद्धतीने प्रयुक्ती योजलेली असते म्हनजे सर्व माल उचीत उष्णता मिळवुन समप्रमानात निर्जलीक्रुत होवु शकेल.
५. होट एयर ब्लोवर: प्रत्येक पदार्थासाठी आवश्यक उष्णता वेगळी असते. हा ब्लोअर शक्यतो एलेक्ट्रिकल असावा म्हनजे वांछीत तापमान कंट्रोलर्स मार्फत साधता येते. यासाठी फारशी वीज लागत नाही कारण आवश्यक तापमान हे अधिकाधिक १५० डिग्री लागते. पण ब्लोअरची क्षमता ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने फ़ोर्सड ड्राफ़्ट निर्मान करत एकंदरीत वोल्युम हा टनेलच्या आकारानुसार ठरवावा लागतो. या ब्लोअर मधुन बाहेर येणारी उष्ण हवा चार वेगवेगळ्या पाईप्स मधुन टनेलची सुरुवात (वरुन एक व खालुन एक आणि ३५% अंतर ओलांडले जाते तेथेही खालुन आणि वरुन अशा पद्धतील नि:श्वास द्यावे लागतात. ही रचना प्रत्यक्ष लोकेशन आणि ड्रायरचे आकारमान यावरुन ठरवावे लागते.
बाहेर येणारी गरम हवा ही पुर्ण स्यचुरेट होते कारण भाज्यांतील जलांश काढुन घेतल्याने ती हवा वाफेने परिपृक्त झालेली असते. तिचा पुनर्वापर करु नये. या हवेस बाहेर पडण्यासाठी दोन निश्वास देता येतात.
६. बाहेर येणारा माल दोन पद्धतीने तपासावा:
अ. रंग समान आहे हे पहावे, अत्यंत वाळलेला वा ओला राहीलेला निरुपयोगी असा माल हाताने बाजुला काढावा.
ब. इलेक्ट्रोनिक उपकरणाने सरासरी जलांश पहावा.
उपयुक्त मालात आद्रतेचे/जलांशाचे प्रमाण कोणत्याही स्थितीत जर ९५% पेक्षा कमी असेल तर प्रक्रिया वेगात/तापमानात आवश्यक बदल करावा.
७. प्याकिंग: येथे माल कोणत्या ग्राहकासाठी बनवत आहोत याचा विचार करुनच प्याकिंग करायला हवे.
अ. जर होटेल्स, मसाला उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग हे ग्राहक असतील तर २ ते ५ किलो क्षमतेच्या प्लास्टिक पिशव्यांत प्याकिंग करुन ते सील करावे.
ब. जर हा माल सरळ ग्राहकांसाठी असेल (अंतिम उपभोक्ता) मॉल्स मधुन विकायचा असेल तर अत्यंत आकर्षक अशा पोचेस मधुन ते प्याक करावे. अर्थात त्यासाठी प्याकिंगची अत्यंत काळजी घ्यावी लागेल.
माल जोवर नैसर्गिक तापमानाला आलेला नाही तोवर कधीही प्याकिंग करु नये. तोवर अर्थात माल पुन्हा हवेतील आद्रताही शोषणार नाही यासाठी तो कार्टन्स मद्धे साठवावा....आणि बाष्प-शोषक द्रव्यांचे प्यकेट्स पसरवुन ठेवा.
बाजारपेठ:
निर्जलीक्रुत मालाची बाजारपेठ अवाढव्य आहे. ती जागतीक आहे. घरोघर आहे. सैन्यदलांसाठी आहे तशीच पार ट्रेकिनंगला जाणा-यांसाठी आहे. पण या दिशेने विशेष प्रयत्न झालेलेच नसल्याने आपल्याला कळत नाही एवढेच.
पण त्याआधी आपण निर्जलीक्रुत मालाची वैशिष्ट्ये समजावुन घ्या.
१. निर्जलीक्रुत माल हा साध्या पाण्यात ५-१० मिनिटे ठेवताच ते पाणी शोषुन पुन्हा ताज्या मालासारखे बनतो.
२, मुळ चवीत किंचीत फरक असला तरी भाज्या बनवल्या तर त्या जास्त चविष्ट होतात.
३. ड्राय टोम्यटो, बटाटे, फुलकोबी इ. पदार्थ स्न्याक्स्प्रमाणे सरळ वापरता येतात.
४. कोथींबीर तर सरळ जशी एरवी ताजी कोथींबीर वापरतो त्याप्रमाणे वापरता येते...वाया जाण्याचे प्रमाण शुन्य. एरवी आपण ताजी आनली तरी ३० ते ५०% (अगदी फ़्रीझ मद्धे ठेवुनही) वाया जातेच.
५. सुप्स ते बिर्याण्या-पुलावात सरळ वापरता येतात.
६. सकसता वाढली असल्याने प्रोटीन्सचा लाभ मिळतो...फ्याट्स मात्र निघुन गेलेले असतात...
७. अनेक पदार्थ जे १२ महिने उपलब्ध नसतात ते उपलब्ध होतात. उदा. कै-या...फळे... इ.इ.इ. अनेक प्रकारच्या पालेभाज्या वा फळभाज्या ज्या फक्त सीझनल असतात.
८. हे पदार्थ किमान २ वर्ष टिकत असल्याने बाजारपेठेतील बदलत्या भावांचा फरक पडत नाही.
९. ताज्या भाज्यांपेक्षा वजनाने कमी...निवडणे...कापत बसणे ही कटकट नाही त्यामुळे आजच्या गतीमान युगात झटपट स्वयंपाकासाठी अत्यंत उपयुक्त.
१०. हवे तेंव्हा हवा तो पदार्थ उपलब्ध...सीझनची वाट पाहण्याची गरजच नाही.
अर्थव्यवस्थेचा-नागरिकांचा आणि उत्पादकांचा फायदा:
१. कोन्ताही शेतमाल वाया जाणार नसल्याने जवळपास प्रतिवर्षी ७० ते ८० हजार कोटींची राष्ट्रीय बचत.
२. शेतक-यांना बाजारभाव नाही म्हणुन काहीही फेकायची नसलेली गरज. यातुन शेतक-यांची होणारी आर्थिक भरभराट.
३. गावोगाव वा पंचक्रोशीत किमान एकेक उद्योग निघाल्यास किमान १० ते १०० जणांना मिळणारा रोजगार. शहराकडे पळण्याची गरज नाही. शहरांवरचा बोजा कमी.
४. एकुणातील शेती अर्थव्यवस्था ख-या मालकांच्या हातात जाईल कारण दल्ल्यांचा सहभाग अत्यल्प.
५. उपभोक्त्यांना समाधान कारण कमी श्रमात अन्न बनवणे सोपे आणि सुघड.
६. होटेल्स फार मोठे ग्राहक कारण त्यांचा कामगारांवरचा खर्च वाचतो आणि व्यक्तिगत ग्राहकाचा वेळ वाचतो.
७. राष्ट्रात अन्न-दुर्भीक्ष निर्मान होवु शकणार नाही.
८. सैन्याला/ट्रेकर्सना अत्यंत कमी वजन वहावे लागेल...थैल्याच्या थैल्या भरुन खाद्य बरोबर ठेवायची गरज नाही.
९. उत्पादकास नेहमीच उत्पादन खर्चाच्या वर किमान २५% आर्थिक फायदा.
१०. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो...तो वाचेल...म्हनजेच पुन्हा अर्थिक भरभराटच!
मी येथे मोठ्या प्रकल्प-उभारणीची गोष्ट करत नाहीहे. तो करुही नका कारण मोठ्या प्रकल्पाच्या अडचणी मोठ्याच असतात...विशेशता: अन्न प्रक्रिया उद्योगात. कारण तेवड्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळवणे सोपे नसते. शेतकरीही सहकार्य करतील याची खात्री नसते. स्थानिक पातळीवर जे करता येईल तेच कायम टीकणार आहे. एका अर्थाने ग्राम-विकास हा अशाच लघु-औद्योगीकरणाने होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या...आज big is beautiful
हा काळ आला आहे...पण small is beautiful हे आपल्याला कधीच कळाले नाही. कारण त्यामागे आपली भारतीय मानसिकता आहे.
-संजय सोनवणी

Sunday, April 10, 2011

निर्जलीकरण: प्रक्रिया पद्धती (तोंडओळख)

जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येत्या २० वर्षांत अन्नाची गरज किमान ३०% नी वाढणार आहे असे तद्न्य सांगतात. भारताची लोकसंख्या १२० कोटीची सीमा पार पाडुन बसली आहे आणि जवळपास ३०% जनता ही आजच कुपोषित आहे....तर भविष्यात काय होईल? आणि याच वेळीस जर लक्षावधी टन शेतमाल वाया जात असेल तर तो एक अक्षम्य अपराध आहे. एवढेच नव्हे तर शेतक-यांचे जे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. आज दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्त्या करत आहेत याचे कारण म्हणजे शेती अर्थव्यवस्था शेतक-यांच्या ताब्यातुन निसटुन दलालांच्या हाती गेली आहे. यात शेतक-यांच्या चुकाही आहेतच...पण प्रस्तुत लेखाचा तो उद्देश नाही.

निर्जलीकरणाबाबत मी मागील लेखात तोंडओळख करुन दिली आहेच. त्यामुळे अधिक टिप्पणी न करता मी प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.

निर्जलीकरण म्हणजे नेमके काय?

१. भाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोम्यटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे.
२. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.
३. पुर्व-प्रक्रिया ते packaging हा झाला महत्वाचा टप्पा. यात भाज्यांच्या मगदुराप्रमाणे (त्यातील जलांश व एकूनातील घनता...) यानुसार प्रक्रियापद्धत पुर्वनियोजित करणे. ती राबवने आणि त्याचे अंतिम परोक्षण करून packaging करने.

आता आपण प्रक्रिया समजावून घेवुयात. त्याचे खालील टप्पे पडतात.

१. स्वछ्ता: ज्या भाज्या/फळभाज्या वा फळे निर्जलीकुत करायची आहेत त्या स्वछ धुवुन घेणे. यासाठी साधे प्रेशर स्प्रेयर्स वापरता येतात. (मांस-माशांसाठी वेगळी पद्धत आहे. ती मी नंतर स्पष्ट करेलच.)

२. कापणे: मुळे वा खराब भाग दुर करून प्रक्रियायोग्य मालाचे कटिंग/स्लायसिंग करने. त्याचा आकार काय ठेवायचा याचा निर्णय घेणे. समजा मुळ कोबीचा आकार वेगवेगळा असु शकतो. त्याचे एकसमान पद्धतीने कटिंग होणे आवश्यक असते.

३. ब्लांचिंग: मुळ पदार्थाचा मुळ रंग प्रक्रियेत हरपु नये, उलट तो अधिक उठावदार असावा यासाठी ही एक अत्यंत साधी पद्धत आहे. म्हनजे २ ते ५ मिनिट (पदार्थाच्या घनतेनुसार) उकळत्या पाण्यात बुडवुन काढने. जाळीदार ट्रे मद्धे ते ठेवुन सारे पाणी निथळुन जावू देणे. फळे ही नायट्रेट असिडच्या सौम्य द्रावणात बुडवुन ठेवावी लागतात.) वरील दोन्ही कार्ये मानवी श्रमाने करायची आहेत. आवश्यकता भासली तरच यांत्रिक साधनेही वापरता येतात.

४. निर्जलीकरण: निर्जलीकरण हे टनेल ड्रायर मद्धे करने सर्वोत्तम आहे. टनेल ड्रायर म्हणजे १० मीटर ते २० मीटर लांबीचा, क्षमतेनुसार वेगवेगळ्या रुंदीचा एक हवाबंद पण नित्य-प्रक्रिया करणारा महत्वाचा घटक आहे. या ड्रायरमद्धे स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा फिरता पट्टा असतो. या टनेलमद्धे उष्ण हवा मध्यम वेगाने वाहती ठेवायची असते. हवेची उष्नता नियंत्रकांमार्फत नियंत्रीत ठेवली जाते. (प्रत्येक प्रकारच्या पदार्थासाठी वेगळी उष्णता पुरवावी लागते.)

या बेल्टवर सरासरी १ ते २ इंच उंचीचा समांतर स्तर येईल अशा पद्धतीने कापलेल्या भाज्या पसरवायच्या असतात. बेल्ट सरकावण्याचे हे कार्य यांत्रिक वा मानवी असू शकते.

या टनेलमद्धुन जो उष्ण हवेचा प्रवाह आहे तो इलेकत्रिकल हीटर्स वा स्थानिक शेत-कच-याला जाळुन निर्माण करता येवू शकतो. पण ईलेक्ट्रिकल हीटर्स हे समतोल तापमान पुरवु शकत असल्याने तेच अधिक उपयुक्त ठरतात.

या टनेल ड्रायरला काचेच्या निरिक्षण खिडक्या असतात. तसेच वाळला जात असलेला माल खालीवर करणारे पट्टे असतात. रंग आणि टेक्स्चर या अनुभवाने आलेल्या बाबींनुसार मालाची वाळल्याची प्रत कळते. माल बाहेर येतांना त्याची सातत्याने पडताळणी करुन योग्य प्रमाणात निर्जलीकरण झाले आहे कि नाही...नसल्यास ते नंतर पुन्हा छोट्या ड्रायरमद्धे वा टनेल ड्रायरमद्धेच वेगात करुन घेता येते.

मालात कोणत्याही प्रकारचा अनुपयुक्त वा घातक (उदा. पिना, टाचण्या वा चुकीचा.) कोणताही पदार्थ नाही ना...याची खात्री करुन घावी लागते.

टनेलमधुन माल बाहेर आला कि तो नैसर्गिक तापमानाच असेल याची खात्री मुळात टनेळ ड्रायर बांधतांना करुन घेतली असल्याने हवेतील नैसर्गिक आद्रता माल पुन्हा शोषणार नाही याची खात्री असली तरी त्यावर लक्ष ठेवावे लागते.

५. बाहेर येनारा माल दर्जाची पातळी गाठत असेल तर तो लगोलग कारटन्स मद्धे प्याक करायचा असतो. म्हनजे वातावरणातील आद्रता शोषली जाणार नाही.

आता:

प्रत्येक शेतमालात नैसर्गिक जलाचे प्रमाण वेगवेगले असते. हे प्रमाण ५०% ते ९०% एवढे असू शकते. एवढेच नव्हे तर एकाच प्रकारच्या भाज्यांत त्यांच्या स्थिती=परिप्रेक्षात ते बदलते असु शकते...अगदी एकाच गावातील. एकाच शेतातील. यावर तोडणी कधी-कोणत्या क्रमाने झाली आहे वा अकाळी पावुस आला आहे वा आद्रता वाढली आहे...इ.इ.इ. घटक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ड्रायिंग प्रक्रिया सुरु करण्याआधी पदार्थांतील सरासरी जलांश माहित असणे गरजेचे आहेच पण त्यासाठी उपयुक्त अशी स्वस्त उपकरणे उपलब्ध आहेतच. त्यांचा काटेकोरपणे उपयोग करणे आवश्यक आहे.

५०% जलांश असणा-या भाज्यांना सरासरी ६० ते ८० डीग्री तापमानात वाळवण्यास पदार्थाच्या जाडीनुसार सरासरी ३ ते ६ तास लागतात. म्हणजे कोथींबीरीला ३ तास लागणार असतील तर फुलकोभीला ६ तास लागतील. जलांश वाढेल तसतसे हे प्रंआण वाढत जाते. त्याचे शास्त्रीय फार्म्युलेही मी नंतर देतोच आहे. त्यामुळे गोंधळ उडनार नाही.

एका गावात वा परिसरात सरासरी फळ-फुल-पालेभाज्या यांचे सरासरी उपलब्ध होवू शकनारे प्रमाण लक्षात घेवुनच प्लांटची क्षमता ठरवता येईल. हा प्लांट १२ महिने जरी नाही तरी किमान ८ ते १० महिने चालवता येईल अशाच प्रकारे डीझाईन करायला हवा. मी शोधलेल्या पद्धतीमुळे (म्हणजे जाळीदार बेल्ट आणि तोही टनेलच्या मध्यातुन प्रवास करणारा) यामुळे किमान ४०% उत्पादन क्षमता वाढते आणि हे सत्य मानेस्मान डीम्याग सारख्या जर्मन कंपनीने मान्य करुन तसे बदल त्यांच्याही डिझाईनमद्धे करुन घेतले आहेत.

हे फार सोपे आहे. यात कोणतीही रोकेट टेक्नोलोजी नाही. यातील गुंतवणुक अत्यंत लहाण आहे. सरकारी योजनाही दिमतीला आहेत. पण यातील आर्थिक बाजु मी तुम्हाला पुढील लेखात स्पष्ट करेलच...आणि मुख्य मुद्दा...हे सारी ठीक आहे...पण हा निर्जलीक्रुत माल विकायचा कोठे? काळजी करु नका...मी त्यावरही सविस्तर लिहितो. मला तुम्हाला सर्व टेक्निकल डिझाईन्सही द्यायचीच आहेत...ती मी वेगळ्या पद्धतीने अपलोड करतो...तुम्हीच व्हा तुमच्या आणि शेतकरी बांधवांच्या जीवनाचे खरे शिल्पकार....माझी साथ आहेच.

Saturday, April 9, 2011

निर्जलीकरण का?


भारतात निर्जलीकृत शेतमालाच्या प्रकल्पांची चर्चा सुरु झाली ती जागतिकीकरण आल्यावर. मलाही यात रस असल्याने मी नेदरलँड, इंग्लंड व अमेरिकेतील लहाण ते अवाढव्य प्रकल्पांना भेटी दिल्या. यात विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे भारतात वापरता येणार नाही हे माझ्या लक्षात आले. भारतातील कांदा निर्जलीकरणाचे प्रकल्प का यशस्वी झाले नाहीत तेही लक्षात आले. पण मुलभूत तंत्रद्न्यान मात्र समानच राहनार होते पण बाकीचे अनेक पॅरामीटर्स बदलावे लागणार होते. मी भारतात परत येऊन स्वतंत्रपणे एक पायलट प्लांट टाकला आणि त्यात जवळपास सहा महिने विविध प्रकारच्या भाज्या, फळे ते मासे यावर प्रयोग केले. ते अत्यंत यशस्वी झाले. त्या काळात मला काश्मिरमध्ये हा प्रकल्प नेण्याची कल्पना (माझ्या अनेक मित्रांच्या मते अवदसा) सुचली. यावर तिकडे खर्च केलेले पैसे तर गेले पण प्रकल्प झाला नाही. २००३ साली मी दुस-या अन्य कारणाने एवढ्या प्रचंड अडचणीत आलो की मला माझे होते ते अन्य ४-५ उद्योग बंद करावे लागले. पण निर्जलीकरण हा विषय कधीच मनातून गेला नाही. मी शक्य तेवढा या तंत्रज्ञानाचा प्रचार करतच राहिलो. शेतक-यांना संकटातून कायमचे मुक्ती देणे हे केवळ निर्जलीकरणाचे सोपे तंत्रद्न्यान वापरण्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. जे मला माहित आहे ते दुस-यांना देण्यात मला आनंदच आहे.  

भारतामद्धे दरवर्षी ५८००० कोटी मुल्याच्या फळ-पालेभाज्या आणि फळे वाया जातात. हा झाला सरकारी आकडा..प्रत्यक्षात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने वाया जाण्याचे प्रमाण आहे. याला मुख्यत्वे कारण आहे प्रक्रिया उद्योगांचा आणि शीतग्रुहांचा अभाव. एकुण उत्पादनापैकी २-३% पेक्षा अधिक शेतमालावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया अनेक पद्धतीने होवू शकतात...पण त्या अत्यंत महागड्या असल्याने (उदा. डीप फ्रीझिंग) अंतत: त्याच्या किंमती अवास्तव वाढतात व त्याला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही.

निर्जलीकरण ही सर्वांच्या परिचयाची, मानवाने हजारो वर्षांपुर्वी शोधलेली प्रक्रिया आहे. आपण रोज कितीतरी निर्जलीक्रुत पदार्थ आहारात रोज वापरत असतो. धने असोत कि हळद, सुके मासे असोत कि वाटान्यादी कडधान्ये. अर्थात ती उन्हात उघड्यावर वाळवलेली असतात. पण त्यामुळे ती हायजिनिकही नसतात. सुदैवाने भारतात सुर्यप्रकाशाची कमतरता नाही. पण वेळोवेळी होणारे वातारणीय बदल, अवकाळी पावुस इ. कारणांनी केवढे फटके बसतात हे आपण दरवर्षी बघत असतो त्यामुळे वाया जाणारा माल ही राष्ट्रीय आणि व्यक्तिगत संपत्तीचा नाशच असतो. शिवाय साराच शेतमाल उन्हात वाळवता येत नाही.

क्रुत्रीम रित्या नियंत्रीत तापमानात अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने शेतमालावर निर्जलीकरणाची प्रक्रिया करता येते हा शोध औद्योगीक क्रांतीनंतर कल्पक संशोधकांनी लावला आणि त्यातुन अवाढव्य पकल्प उभे राहीले. भारतात उन-वाळवणी सोडली तर नवे आर्थिक धोरण येईपर्यंत हे तंत्रद्न्यान आले नव्हते. अजुनही ते अत्यंत मर्यादित आहे. याचे खरे कारण म्हणजे त्यांनी युरोपियन तंत्रद्न्यान जसेच्या तसे येथे वापरण्याचा प्रयत्न केला. भारतातील वातावरणीय परिस्थीती, ठिकठिकाणचे बदलते वायुमान, हवेतील आद्रता, तापमान याचा विचारच केला नव्हतात त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले. काहींचे हेतुही प्रामाणिक नव्हते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुळात अत्यंत साधे-सोपे असणारे हे तंत्रद्न्यान पुरस्क्रुत केले गेले नाही...सरकार यात मागे पडले.

शेतमालाचा विनाश तसाच चालु राहिला.

आणि आजही आपण बदललो नाही तर तो तसाच सुरू राहील.

निर्जलीकरणामुळे शेतमालाचे आयुष्य तर वाढतेच (किमान २ वर्ष) पण वजनही कमी झाल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. चवीतही वाढ होत असल्याने ती जनसामांन्यात लवकर लोकप्रिय होवू शकतात. किंचीत खराब झालेला, बाजारात नेता येवु शकत नसलेलाहे माल प्रक्रियाक्रुत करता येवु शकतो.

आपण खालील पदार्थ निर्जलीक्रुत करु शकतो:

कोथिंबीर ते सर्व पालेभाज्या, फळभाज्या, टोम्यटो ते सर्व प्रकारची फळे, मांस- मासे इ.

प्रत्येक पदार्थासाठीच्या प्रक्रियेत ठोडाफार फरक असतो जे मी ते पुढील लेखत स्पष्ट करेलच. या प्राथमिक लेखाचा उद्धेश आहे तो असा:

१. शक्य तेवढ्या शेतमालावर गावोगावी छोट्या निर्जलीकरण प्रकल्पातुन प्रक्रिया करणे.
२. स्थानिक रोजगार वाढवणे.
३. एक पातेही/फळही फेकुन द्यावे लागनार नाही याची कालजी घेणे.
४. बाजारभाव आपसुक नियंत्रीत करणे. (बाजारभाव उत्पादन किंमतीपेक्षा कमी असले तर एक किलोही ताजा माल बाजारात न पाठवणे.)
५. प्रक्रियाक्रुत मालाचे विपणन करण्याची यंत्रणा उभारणे.
६. शेतमालाची एकुणातील मुल्यव्रुद्धी साधणे.

यातुन शेतक-यांना मोठेच आर्थिक बळ मिळेल. गावोगावी (वा ४-५ गावे मिळुन एक) असे प्रकल्प उभे झाले तर ,मोठी शेतकी क्रांती घडुन येवु शकते. हे तंत्रद्न्यान खरोखर खुप सोपे आहे. मोठ्या भांडवलाची गरज नाही. कुशल तंत्रद्न्यांची आवश्यकता नाही. ट्रेनिंग/तंत्रद्न्यान द्यायला मी तयार आहे. (कसलीही अपेक्षा नाही). हा प्लांट आपल्या नजीकच्या वर्कशोपमद्धे बांधुन घेता येईल...असे प्लांट बनवणा-या कंपन्याही आहेत...पण त्यांचे दर अवस्तव असतात.

पुढील लेखांत मी खालील माहिती देणार आहे:

१. प्रक्रिया पद्धती (विविध फळ-पालेभाज्यांसाठी.)
२. तंत्रद्न्यान
३. भारतीय व जागतीक बाजारपेठ
४. विपणन (मार्केटिंग)
५. कशी सुरुवात कराल?

आपल्याला जर खरी शेतकी क्रांती घडवायची असेल, शेतक-यांना दैन्यावस्थेतुन बाहेर काढायचे असेल तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. एक लक्षत घ्या निर्जलीक्रुत शेतमाल जगभर मागणीत आहे. असंख्य पदार्थ आपण रोज आहारात वापरत आलेलोच आहोत. निर्जलीकरण केल्याने मुळ चवीत कसलाही फरक पडत नसून उलट त्यात वाढच झालेली असते. नियंत्रीत वातावरणात उत्पादन केल्याने ताज्या मालापेक्षा हे निर्जलीक्रुत पदार्थ कैक पटीने आरोग्यदायी असतात. निर्जलीकरण म्हणजे अन्य काही नसून फळ-पालेभाज्यांतील अतिरिक्त जल आपण नियंत्रीत तापमानात काढुन घेत त्याचे आयुष्य वाढवत असतो. त्यात कसलेली अन्य द्रव्य मिसळावे लागत नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे शुद्ध रहात असते. दिवसा १ टन ते १० टन कच्च्या मालावर पर्क्रिया करता येईल असे लघु प्रकल्प अधिक यशदायी ठरतील.

पुढील लेख मी टाकत जातोच...दर्म्यान जेवढ्याही शंका असतील...विचारा.

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...