मी
जेंव्हाही "वैदिक" शब्द वापरतो तेंव्हा मला माझे मित्र हिरिरीने "तुम्ही
:हिंदू" समाजात फुट पाडता..." असा आरोप करत असतात. रा. स्व. संघ ही
हिंदूंची नव्हे तर वैदिकांची संघटना आहे असे मी म्हणतो तेंव्हा संघिष्टांना
खूप संताप येत असतो. पण प्रत्यक्षात तेच सत्य आहे हे वारंवार गेली दिडशे
वर्ष वैदिक विद्वानच (व संघही) सिद्ध करत असतांना तिकडे सोयिस्कर डोळेझाक
केली जाते हे एक वास्तव आहे. वैदिक धर्म स्वतंत्र धर्म
असून शंकराचार्य हे त्यांचे धर्मगुरु असून संघ हा वैदिकांच्या रक्षणाचे
कार्य करतो आणि हिंदूंचा त्यासाठी वापर करतो हे सत्य बहुजनांना समजेल तो
सुदिन!
भाजप सरकार केंद्रात आले आणि वैदिक संस्कृती, वैदिक विज्ञान (जे अस्तित्वात नाही) आणि सरस्वती नदीचा बोलबाला चालू झाला आणि घग्गरलाच मारुन मुटकुन सरस्वती बनवण्याचाही उद्योग चालू झाला हे वास्तव आहे.
आता त्यात भर पडली आहे ती चक्क "वैदिक" शेतीची!
वैदिक लोक लबाड आणि धूर्त आहेत हे मी वारंवार म्हणालो आहे. प्रथम आपण शेतीकडे वळूयात. वैदिक लोक शेतकीत कधीही आघाडीवर नव्हते. ते मुलत: पशुपालक होते. त्यांच्या हजारो वर्ष पुर्वी शैव हिंदुंनी शेती नुसती शोधलीच नव्हती तर कृत्रीम कालवे काढून शेतीला पाणी देण्यापर्यंत मजल गाठली होती. ऋग्वेदात वैदिकांचे महान कार्य काय तर हे कालवे फोडून सिंधूजनांना त्रस्त करणे.
"दस्यू म्हणजे असुर यांची संस्कृती आर्यांपेक्षा उन्नत होती, असे ब्राह्मण ग्रंथांतील असुरांच्या कथांवरुन सूचित होते..." (वैदिक संस्कृतीचा इतिहास, लक्ष्मणशास्त्री जोशी) यातच पुढे जोशी म्हणतात, "आर्य (वैदिक) अर्धवट भटके व ग्रामीण संस्कृतीचे होते. सिंधू संस्कृती नागर होती. नगररचनेचे तंत्र आर्य नीट रीतीने सिंधू संस्कृतीच्या लोकांपासून कधीच शिकले नाहीत. आर्यांनी (वैदिकांनी) केलेल्या नगररचनेतील तंत्र सिंधू संस्कृतीच्यापेक्षा कमी दर्जाचे होते व आहे." (कंसातील शब्द माझे)
या वैदिकांचा मुख्य पेशा शेती हा तेंव्हाही नव्हता आणि आताही नाही. ते निमभटके असल्याने आदिवासींप्रमाणे फिरती शेती करत. पण जे काही संस्कृतात ते वैदिकांचे असे मानण्याचा घातकी प्रघात असल्याने व तो वैदिकांनीच जाणीवपुर्वक निर्माण केल्याने गतकाळातील कृषीवल संस्कृतीने शेतकीत जे काही विकसित केले त्याला जर आता "वैदिक" लेबल चिकटवले जात असेल तर फुटीचा आणि लबाड्यांचा हा धंदा कोण करत आहे हे लोकांनीच आता लक्षात घ्यावे. संस्कृत भाषेचे निर्मातेही वैदिक लोक नव्हेत याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. उलट ज्यांचा द्वेष वैदिक करत त्या पणींपैकी पाणिनीनेच संस्कृतचे पहिले व्याकरण लिहिले हे या भाकड वैदिकांनी समजावून घेतले पाहिजे. (आणि हिंदू धर्मातून चालते व्हायला पाहिजे.)
हे जर हिंदू धर्माचे असते तर त्यांनी शेती काय आणि बाकी काही काय, त्यासाठी "हिंदू" शब्द वापरला असता...."वैदिक" नव्हे! परत वर तोंड करुन म्हणतात...आता सारे मिसळून गेलेत...कोठे राहिले वैदिक-अवैदिक? अरे लबाडांनो...
संघटनासाठी लोकांना मुर्ख बनवायला हिंदू आणि संस्कृतीला मात्र वैदिक...(बाहेर मिरवायला हिंदू...घरात वैदिक अशातला हा लबाडीचा प्रकार!)
आणि यातच यांची वैदिक चाल दिसून येते.
हा देश नेहमीच शैव हिंदुंचा होता आणि राहणार...या देशाला सांस्कृतिक-भाषिक विविधता असुनही अखंडता आहे ती देशभर विखुरलेल्या १२ जोतिर्लिंगांमुळे आणि ५२ शक्तीपीठांमुळे...आणि नगरे तर सोडाच पार वाड्या-वस्त्यांत विखुरलेल्या अगणित शिवलिंगांमुळे आणि शिवगणातील देव-देवतांमुळे....
कोठे आहे वैदिक?
वैदिकांचे स्वत:चे असे काहीच नसल्याने त्यांना अशा चो-या कराव्या लागल्या आहेत, दुस-यांची श्रेये लुबाडावी लागली आहेत हे लक्षात ठेवा!
सावध रहा....रात्र वै-याची...
नव्हे...
वैदिक सांस्कृतीक चोरांची आहे!
========(या लेखाचा संदर्भ: आज दै. लोकसत्तात प्रथम पृष्ठावर प्रसिद्ध झालेली "केंद्र सरकारचा नवा उपक्रम----कृषितज्ञांना वैदिक शेतीचे धडे" बातमी)
भाजप सरकार केंद्रात आले आणि वैदिक संस्कृती, वैदिक विज्ञान (जे अस्तित्वात नाही) आणि सरस्वती नदीचा बोलबाला चालू झाला आणि घग्गरलाच मारुन मुटकुन सरस्वती बनवण्याचाही उद्योग चालू झाला हे वास्तव आहे.
आता त्यात भर पडली आहे ती चक्क "वैदिक" शेतीची!
वैदिक लोक लबाड आणि धूर्त आहेत हे मी वारंवार म्हणालो आहे. प्रथम आपण शेतीकडे वळूयात. वैदिक लोक शेतकीत कधीही आघाडीवर नव्हते. ते मुलत: पशुपालक होते. त्यांच्या हजारो वर्ष पुर्वी शैव हिंदुंनी शेती नुसती शोधलीच नव्हती तर कृत्रीम कालवे काढून शेतीला पाणी देण्यापर्यंत मजल गाठली होती. ऋग्वेदात वैदिकांचे महान कार्य काय तर हे कालवे फोडून सिंधूजनांना त्रस्त करणे.
"दस्यू म्हणजे असुर यांची संस्कृती आर्यांपेक्षा उन्नत होती, असे ब्राह्मण ग्रंथांतील असुरांच्या कथांवरुन सूचित होते..." (वैदिक संस्कृतीचा इतिहास, लक्ष्मणशास्त्री जोशी) यातच पुढे जोशी म्हणतात, "आर्य (वैदिक) अर्धवट भटके व ग्रामीण संस्कृतीचे होते. सिंधू संस्कृती नागर होती. नगररचनेचे तंत्र आर्य नीट रीतीने सिंधू संस्कृतीच्या लोकांपासून कधीच शिकले नाहीत. आर्यांनी (वैदिकांनी) केलेल्या नगररचनेतील तंत्र सिंधू संस्कृतीच्यापेक्षा कमी दर्जाचे होते व आहे." (कंसातील शब्द माझे)
या वैदिकांचा मुख्य पेशा शेती हा तेंव्हाही नव्हता आणि आताही नाही. ते निमभटके असल्याने आदिवासींप्रमाणे फिरती शेती करत. पण जे काही संस्कृतात ते वैदिकांचे असे मानण्याचा घातकी प्रघात असल्याने व तो वैदिकांनीच जाणीवपुर्वक निर्माण केल्याने गतकाळातील कृषीवल संस्कृतीने शेतकीत जे काही विकसित केले त्याला जर आता "वैदिक" लेबल चिकटवले जात असेल तर फुटीचा आणि लबाड्यांचा हा धंदा कोण करत आहे हे लोकांनीच आता लक्षात घ्यावे. संस्कृत भाषेचे निर्मातेही वैदिक लोक नव्हेत याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. उलट ज्यांचा द्वेष वैदिक करत त्या पणींपैकी पाणिनीनेच संस्कृतचे पहिले व्याकरण लिहिले हे या भाकड वैदिकांनी समजावून घेतले पाहिजे. (आणि हिंदू धर्मातून चालते व्हायला पाहिजे.)
हे जर हिंदू धर्माचे असते तर त्यांनी शेती काय आणि बाकी काही काय, त्यासाठी "हिंदू" शब्द वापरला असता...."वैदिक" नव्हे! परत वर तोंड करुन म्हणतात...आता सारे मिसळून गेलेत...कोठे राहिले वैदिक-अवैदिक? अरे लबाडांनो...
संघटनासाठी लोकांना मुर्ख बनवायला हिंदू आणि संस्कृतीला मात्र वैदिक...(बाहेर मिरवायला हिंदू...घरात वैदिक अशातला हा लबाडीचा प्रकार!)
आणि यातच यांची वैदिक चाल दिसून येते.
हा देश नेहमीच शैव हिंदुंचा होता आणि राहणार...या देशाला सांस्कृतिक-भाषिक विविधता असुनही अखंडता आहे ती देशभर विखुरलेल्या १२ जोतिर्लिंगांमुळे आणि ५२ शक्तीपीठांमुळे...आणि नगरे तर सोडाच पार वाड्या-वस्त्यांत विखुरलेल्या अगणित शिवलिंगांमुळे आणि शिवगणातील देव-देवतांमुळे....
कोठे आहे वैदिक?
वैदिकांचे स्वत:चे असे काहीच नसल्याने त्यांना अशा चो-या कराव्या लागल्या आहेत, दुस-यांची श्रेये लुबाडावी लागली आहेत हे लक्षात ठेवा!
सावध रहा....रात्र वै-याची...
नव्हे...
वैदिक सांस्कृतीक चोरांची आहे!
========(या लेखाचा संदर्भ: आज दै. लोकसत्तात प्रथम पृष्ठावर प्रसिद्ध झालेली "केंद्र सरकारचा नवा उपक्रम----कृषितज्ञांना वैदिक शेतीचे धडे" बातमी)