मानवी इतिहासात असे अनेकदा घडले आहे कि विशिष्ट विचारधारा लादण्यासाठी शासन यंत्रणा
राबल्या आहेत. मानवी समग्र हितापेक्षा त्यांनी आपापल्या विचारधारांना महत्व देत सर्व साधने वापरत, कधी छुपे तर कधी उघड प्रयोग करत नागरिकांना गुलाम करायचा प्रयत्न केला आहे. जे होत नाहीत त्यांना ठार मारणे, तुरुंगांत टाकणे, सैबेरियात सडवणे ते सरसकट कत्तली करणे असे उपाय राबवले आहेत. फ्रांसने "स्वातंत्र्य-समता-बंधुता" या महनीय मुल्यांचा उद्घोष केला. लोकशाहीची परम-मुल्ये विकसीत झाली. असे असले तरी हुकूमशाह्यांचे आकर्षण असलेले समाज पुर्वीही होते आणि आजही सर्वत्र आहेत. किंबहुना रानटी मानवी लांडग्यांनी माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा वारंवार चंग बांधला आहे. कधी ते यशस्वी होतात तर कधी अयशस्वी. पण म्हणून प्रवृत्ती संपत नाहीत आणि अखिल जगताच्या मानव-कल्याणातील ते अडसर मात्र बनून जातात.
मानवतेच्या, मानवी समाजाच्या हितांच्या चौकटीत जेंव्हा कोणाचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल वा तसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणले जात असतील, येत असतील तर मग स्वातंत्र्य कोठे राहिले?
वैचारिक. धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, आर्थिक...कोणत्याही प्रकारचे का होईना...जेही घटक गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा मुक्त कंठाने निषेध करता यायला पाहिजे. तोच समाज प्रबळ...सबळ आणि करुणामय होतो.
रविंद्रनाथ टागोर म्हणतात...
Where the mind is without fear
and head is held high
आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे!
राबल्या आहेत. मानवी समग्र हितापेक्षा त्यांनी आपापल्या विचारधारांना महत्व देत सर्व साधने वापरत, कधी छुपे तर कधी उघड प्रयोग करत नागरिकांना गुलाम करायचा प्रयत्न केला आहे. जे होत नाहीत त्यांना ठार मारणे, तुरुंगांत टाकणे, सैबेरियात सडवणे ते सरसकट कत्तली करणे असे उपाय राबवले आहेत. फ्रांसने "स्वातंत्र्य-समता-बंधुता" या महनीय मुल्यांचा उद्घोष केला. लोकशाहीची परम-मुल्ये विकसीत झाली. असे असले तरी हुकूमशाह्यांचे आकर्षण असलेले समाज पुर्वीही होते आणि आजही सर्वत्र आहेत. किंबहुना रानटी मानवी लांडग्यांनी माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा वारंवार चंग बांधला आहे. कधी ते यशस्वी होतात तर कधी अयशस्वी. पण म्हणून प्रवृत्ती संपत नाहीत आणि अखिल जगताच्या मानव-कल्याणातील ते अडसर मात्र बनून जातात.
मानवतेच्या, मानवी समाजाच्या हितांच्या चौकटीत जेंव्हा कोणाचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल वा तसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणले जात असतील, येत असतील तर मग स्वातंत्र्य कोठे राहिले?
वैचारिक. धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, आर्थिक...कोणत्याही प्रकारचे का होईना...जेही घटक गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा मुक्त कंठाने निषेध करता यायला पाहिजे. तोच समाज प्रबळ...सबळ आणि करुणामय होतो.
रविंद्रनाथ टागोर म्हणतात...
Where the mind is without fear
and head is held high
आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे!