प्रा हरी नरके यांच्यातील आणि संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा ,बामसेफ़ मधील वादाने जो तळ गाठला आहे तो पहाता महाराष्ट्रचा विवेक केवढ्या रसातळाला जावून पोहोचला आहे हे पाहुन खेद वाटतो. यात संभाजी ब्रिगेड वा भारत मुक्ती मोर्चालाच दोष देत नाही तर तमाम विचारवंत, साहित्यिक...मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, तेही तेवढेच "मुक" बनले असल्याने दोषाला पात्र आहेत असेच म्हणावे लागते.
पराकोटीचा ब्राह्मण द्वेष ही भुमिका घेवून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ते भारत मुक्ती मोर्चा बहुजनीय चळवळ चालवत आहेत आणि द्वेषाच्य पायावर कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही हा इतिहास मी वारंवार मांडला आहे. हा आता फक्त ब्राह्मण द्वेष उरला नसून जे ही विरोधी भुमिका घेतात त्यांचाही तेवढ्याच स्तरावर जावुन द्वेष केला जात आहे.
कोणत्याही समाजात अनेक विचारप्रवाह असतात. नवी नवी प्रमेये सिद्ध होत असतात तशा विचारवंत संशोधकांच्या भुमिकेतही आवश्यक बदल होत असतो. सारेच मतप्रवाह हे सर्वमान्य होवू शकत नहीत...समर्थ्क आणि विरोधक हे राहणारच आणि त्यांच्यातील सर्वकाळ चालत असलेल्या मंथनातुन समाज वैचारिक प्रगती करत असतो. ग्रीक तत्वद्न्यांत असंख्य विभेद होते पण त्यातुन तत्वद्न्य, गणीत, भौतिक शास्त्रांची प्रगती झाल्याचेच आपल्याला दिसते. धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता यामधील संघर्ष युरोपने पाहिला आहे त्यातुनच पुढे लोकशाही, समता, बंधुतादि महनीय तत्वांची उभारणी झाली आहे. त्याचीच फळे आज आपण चाखत आहोत. केवळ मते विरोधी आहेत म्हणुन त्याला संपवुन टाका हा मध्ययुगीन कायदा आज कोणीही मान्य करणार नाही. ब्राह्मण द्वेषाने मराठ्यांचे वा बहुजनांचे हित होणार आहे, त्यांना कापुन काढले, दंगली घदवल्या व सा-या ब्राह्मण पुरुषांना मारुन टाकले म्हनजे कल्याण होणार आहे असा विचारच मुळात मानवताविरोधी आहे. राष्ट्रविरोधी आहे. आणि या वंशसंहाराच्या विधानात ब्राह्मण स्त्रीयांना वगळले गेले आहे...त्यामागील प्रव्रुत्ती कोणीही विचर करु शकणारा समजु शकतो. या प्रव्रुत्तीबद्दल ज्यालाही कोणाला समर्थन करायचे आहे वा करत आहेत त्यांनी सारेच सामाजिक नैतीक संकेत धाब्यावर बसवले आहेत असेच म्हनावे लागेल. एकीकडे आद्य मानव मराठाच होता असेही म्हनायचे...मग ब्राह्मण मराठेच झाले कि या सिद्धांतानुसार...मग विरोध का? मला वाटते कसलेही तारतम्य नसलेले तत्वद्न्यान घेवून ब्राह्मण द्वेष करणे म्हणजे नेमक्या कोणत्या ब्राह्मनी संस्क्रुतीचा विरोध करणे याचेच आकलन झाले नसल्याचे लक्षण होय. यातुन ही चळवळ जिंकु शकनार नाही, एकाही मराठ्याचे वा शोषितांचे कल्याण
होणार नाही असे खेदाने म्हनावे लागते. झाल्या तर या देशात वांशिक आधारावर दंगलीच घडतील...आणि तसाच प्रचार-प्रसार सध्या होतो आहे.
प्रा. नरके हे बामसेफ़ बरोबर ९-१० वर्ष होते. ब्रिगेड वा त्यांच्या मात्रुसंस्थांबरोबरही ते काही वर्षे आता-आतापर्यंत होते. "आपण ती केलेली मोठी चुक होती आणि त्याबद्दल पश्चाताप होतो आहे" असे त्यांनी अलीकडे जाहीरपने म्हटले आहे. तो का होतो आणि आधीच का झाला नाही याबद्दल साकल्याने विचार करता काही प्रश्न उद्भवतात आणि त्यांचाही येथे परामर्श घेणे आवश्यक आहे.
१. डा. साळुंखे व प्रा. नरके यांनी बामसेफ़च्या वा ब्रिगेदच्या चलवळीला वैचारिक अधिष्ठान दिले याबद्दल आतापर्यंत तरी कोणीही विरुद्ध मत नोंदवलेले नाही...नरके जोवर सोबत होते आणि आपले संशोधन विचार इ. या संस्थांना देत होते तोवर या संघटनांचाही त्यांच्यावर आक्षेप नव्हता.
२. मराठा आरक्षणाबद्दल नरकेंनी घेतलेली विरोधी भुमिका, नरके यांची भांदारकर इन्स्टित्युटवर सरकारी नियुक्ति ही उघड कारणे आहेत ज्यातुन फाटाफुट झाली. अंतर्गतही काही कारणे असु शकतील पण ती मला माहित नसल्याने आणि याबाबत दोन्ही पक्ष असत्य साम्गु शकत असल्याने मी त्यात जात नाही.
३. ब्रिगेदला वा बामसेफला नरके यांनी वैचारिक अधिष्ठान दिले असे म्हनावे तर मग या दोन्ही संस्थांनी मला तरी कोनतीही वैचारिक उंची गाठली असल्याचे दिसत नाही. पण संशोधन पुरवले हे खरेच आहे. उदा. म. फुलेंची जन्मतारीख, त्य्यंचे म्रुत्युपत्र, इंग्रज सरकारबरोबरचा पत्रव्यवहार, ओ.बी सी. जनगणना, बजेट, शिवराय रामदास-संबंध, इतिहासाचार्य राजवाड्यांचा दहशतवद, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी प्रथम शोधली, पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली, केळुस्कर, ज्यांनी प्रथम गद्य शिवचरित्र लिहिले ते मराठा होते...(आधी ते ब्राह्मनच असावेत असा समज होता.), दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते इ.इ.इ. या संशोधनांनी या संघटनांना ब्राह्मणविरोधी बळ पुरवले आणि त्यात काही चुक नाही कारण ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेले असत्याचे डोंगर उद्द्वस्त करायला मदत मिळाली. पण त्यातुन एक भस्मासुरी तत्वद्न्यान जन्माला आनले गेले ते असे कि सारेच ब्राह्मण हे एकमात्र शत्रु असुन जेही सम्यक भुमिका घेतात ते बहुजनीयही शत्रु आणि त्यांचा उछ्छेद केला गेलाच पाहिजे. प्रा, नरके हे सत्य संशोधन करत होते ते यासाठी नक्किच नसनार असा माझा समज आहे. (नाहीतर मलाही माझे सातवाहन ते अन्य संशोधन अशा मनोव्रुतींमुले वापरले जावू शकते, समाजविघातक होवू शकते, त्याचा गैरवापर केला जावु शकतो म्हणुन आताच बंद केलेले बरे असे वाटु लागले तर त्यात काहीएक नवल नाही.) कम्युनिस्ट राष्ट्रांत असेच घडत होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. सत्य संशोधन हे काही बळीचे बकरे बनवण्यासाठी नसुन इतिहासाचे नव्याने आकलन करुन घेत भविष्याची वाटचाल सुसंगत व्हावी यासाठी असते असा माझा समज आहे...आणि तो या देशात चुकीचा ठरत असेल तर कोणीही नव्याने संशोधने करायला पुढे येनार नाही.
मला येथे एक उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. जेंव्हा म्याक्समुल्लरने "आर्य" सिद्धांत भाषिक परिप्रेक्षात मांडला आणि त्याचा उपयोग वांशिक श्रेष्ठत्वाच्या मांडणीसाठी जर्मनीत केला जावू लागला तेंव्हा हादरुन त्याने आपला सिद्धांत हा भाषाशास्त्रीय गटांबाबत असुन त्याचा वंशांशी काहीएक संबंध नाही असे क्षमा मागत घोषित केले. स्वार्थी लोक संशोधनांचा असा दुरुपयोग जगभर करत असतात....किंवा स्वउपयोगीच संशोधन व्हावे असा हट्ट त्यांच्याकडे धरत असतात. यतुन शेवटी संशोधक-विचारवंतांची एकतर ससेहोलपट करत त्याला वैचरिक गुलाम तरी बनवले जाते वा त्याचा अंत घडवला जातो. सोक्रेटिसच्या बाबतीत काय झाले हे सर्वांनाच माहित आहे.
४. मराठा आरक्षण याबाबत वाद झाला...नरके हे मराठा आरक्षनाविरुद्ध आहेत व त्यांनी ही बाब लपवून ठेवलेली नाही. मी स्वता: सर्वच आरक्षणांविरुद्ध आहे हेही माझ्या वाचकांना माहितच आहे. परंतू या मुद्द्यावर मतभेद आहेत हे वास्तव आहे आणि त्याचा कायदेशीर लढा उभयपक्षांनी द्यावा. नरके म्हणाले म्हणुन आरक्षन मिळेल असे तर नक्कीच नाही. याबाबतचा वाद केवळ अडानीपणाचा आहे.
५. प्रा. नरके यांच्या लोकप्रभातील लेखामुळे संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा प्रक्षुब्ध झाले हे एक वास्तव आहे. मलाही तो लेख प्रथमदर्शी आवदला नव्हता हे मी मागेही स्पष्ट केले आहे. पण त्यामागे एक परंपरा होती ती ही कि "मुलनिवासी नायक या दैनिकाने त्यांच्याविरुद्ध एक अत्यंत अश्लाघ्य अशी आघाडी उघडली. हरी नरके हे पुरुष वेश्या आहेत, त्यांची डी.एन.ए. चाचणी करायला हवी, ते नरक ओकतात, ते शाहु-फुलेंना अपमानित करतात, इ.इ.इ. अत्यंत धादांत असत्य बातम्यांच्या नावाखालील पोर्नोग्राफी प्रसिद्ध करत होते, तेही एक-२ वेळा नाही तर तब्बल ३-४ महिने...आजही तेच चालु आहे...अशा स्थितीन नरके यांनी काय करायला हवे होते अशी यांची अपेक्षा आहे? गप्प बसायचे? निमुट मार खात रहायचा? बदनामी सहन करत रहायची?
६. दुर्दैवाची बाब म्हनजे या समयी एकही महाराष्ट्रातील विचारवंत त्यांच्या मागे उघडपने उभा राहिला नाही. महाराष्ट्राची ती परंपराच आहे. उदाहरण देतो. जेंव्ह्या आनंद यादव यांच्या संतसुर्य तुकाराम या कादंबरीबाबत वारकरी संप्रदायाने झोड उठवली, ते पुस्तक मागे घ्यायला लावले तेंव्ह्या "वारकरी हे तालीबानी बनले आहेत" असे पत्रक काढनारा मी एकमेव लेखक होतो...आणि तीच कादंबरी केवढी हीनकस होती हे सिद्ध करुण दाखवनाराही मीच होतो...कादंबरी न आवडणे हा एक भाग असतो आणि ती मागे घ्यावी यासाठी जो दहशतवाद माजवला जातो ती एक बाब झाली. हे महार्स्स्श्ट्रातील लेखक विद्वानांना क्वचित कळते. हीच बाब गिरिजा कीर नावाच्या लेखिकेची...त्यांच्या दलित-झोपडपट्टीवाल्यांना काय साहित्य कळते या विधानावर हल्ला चढवनारा...पत्रक काढणारा मीच एकमेव लेखक होतो. हे सांगण्याचे कारण असे कि मराठीतील तथाकथित विचारवंत आणि लेखक हे विकले गेलेले आणि साहित्य-विचार हे केवळ स्वार्थाच्या कारणासाठी वापरणारे दल्ले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. ही अशीच घतना युरोप-अमेरिकेत घडली असती तरी सारे वैचारिक मतभेद दूर ठेवून त्या विचारवंताच्या स्वतंत्र विचारांची आब राखत त्याला समर्थ्न देत रक्षिले असते. पन या महाराष्ट्रीय भेकड आप्पलपोट्ट्या लेखक-विचारवंत म्हनवणा-यांचा मी निषेध करतो. मी प्रा. नरके यांच्या पाठीशी उभे राहुन अल्प-स्वल्प योगदान देतो आहे ते त्यांचे विचार मला सर्वस्वी मान्य आहेत म्हणुन नव्हेत तर केवळ त्यांना एक्मात्र लक्ष्य करत त्यांना जीवनातुन उठवण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्यांची कोंडी करत त्यांना नको त्या आधारांची गरज भासवली जात आहे त्याबद्दल.
७. प्रा. नरके यांना भांडारकरमद्धे सरकारने नेमले. डा. आ. ह. साळुंखेंनाही नेमले. या नेमनुकीनंतर जवळपास २-२.५ वर्ष झाल्यानंतर नरके यांनी व साळुंखेंनीही भांडारकरचा राजीनामा द्यावा असा विनंतीवजा ठरावही पारित केला गेला. हीच वेळ का निवडली गेली? साळुंखेंनी राजीनामा दिला नाही तसाच नरकेंनीही दिला नाही. पण रोष मात्र नरकेंवर. हा अजब न्याय जातीय नाही तर कशासाठी आहे?
पण मला वाटते बहुजनीय संशोधक-विचारवंत अशा संस्थांवर नेमले जात असतील आणि त्यातुन त्यांना आपापल्या भुमिका/संशोधने मांडायची संधी मिलत असेल तर त्याला आक्षेप घेणारे हे कोण? त्या संस्थेवर गेले म्हनजे ते ब्राह्मनालले...भटालले...त्या १४ जनांचे हस्तक बनले...असे आरोप करतांना थोडीतरी शरम नको? ही कोनती हिटलरशाही आहे? भारतात पुरातत्वेय उत्कनने करत पुरातन संस्क्रुती उजेडात आननारे बव्हंशी ब्राह्मनच आहेत कारण त्या पुरातत्वीय खात्यात तेच काम करतात...तशी संधी तुम्ही त्या सम्स्थांत गेलेच नाहीत तर कशे मिलणार आहे? नाहेतर तुम्ही तशाच दर्जाच्या संस्था काढा ना. ते कोण खंदारे नावाचे संशोधक (?) तारे तोडत शिवमानवादी संकल्पना मांडतात आणि तेही विकिपेडियाचा आधार घेत...हेच संशोधन अभिप्रेत आहे कि काय? याला मुळात सम्शोधन म्हनतात काय? किती मराठ्यांनी आपल्या पुर्वजांची कागदपत्रे जपली? किती ताम्रपटे मोडुन खाल्ली याचा जाब विचारला तर? भांडारकरीय संस्थेला बहुजनीय पर्याय आजही का दिला जात नाही? या बहुजनीय तथाकथीत संशोधकांपैकी किती जणांना मोडी वाचता येते? साळुंखे सर सोडले तर किती जणांना संस्क्रुत समजते? किती जणांनी स्वतंत्रपणे पुरातन स्थळे उजेडात आनली? काय अन्वेषन केले? जगातील आदिमानव हा मराठा होता हे? परशुरामाचा बाप मराठाच होता हे? मराठा नावाची जात इ.स. च्या २-३ -या शतकापर्यंत मुळात आस्तित्वातच आली नव्हती आणि ती मिश्रवंशीय आहे हे सत्य का साम्गत नाही? डा. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात एकही शुद्ध रक्ताचा उरलेला नाही म्हणुन वंश्शुद्धीची कल्पन पोरकटपची आहे यासाठी ब्राह्मनांना वेगळे करण्यासाठी आंबेडकर विरोधी नाही काय? सारेच कालौघात मिश्र झाले आहेत. तुम्हेही अपवाद नाहीत. पण वांशिक गंड चढ्ला आहे आणि तो उघड करणे क्रमप्राप्त आहे.
७. प्रा. नरके यांचे काय चूक काय बरोबर यावर चर्चा होवू शकते आणि ती व्हायलाही हवी. पण ती द्वेषाच्या पायावर नको तर तर्काच्या आणि पायावर व्हायला हवी. त्यातुनच सामाजिक भले साध्य होवू शकते. चर्चा आणि विद्वेश्रहीत भावनेतुनच समाजाची समग्र प्रगती होवु शकते. साळुंखे सरांचे नाव उगा आले म्हणुन गळा काढणा-यांनी नरके आणि विलास वाघांना धमक्या आल्या होत्या हे तर मान्य आहे? त्याचा तरी निषेध कोणी केल्याचे मला दिसत नाही. साळुंखे सर का नाही आले त्या परिसंवादाला हे त्यांनाच माहित...पण आले नाहित हे वास्तव आहेत आणि पुण्यात येवूनही.,..पण अलेकडेच सरांनाही ठरावात स्ॐय का होईना लक्ष्य बनवणारे आज त्यांचाच कळवळा दाखवतात...मलाही खोटे...अफवा पसरवणारे ठरवतात...तेंव्हा ही वाटचाल वैचारिकतेकडे नव्हे तर विध्वंसाकडे चालली आहे असे म्हणने भाग आहे. तुम्हाला ब्राह्मणांचा द्वेष हेच तुमच्या यशाचे गमक वाटत असेल तर खुशाल द्वेष करत बसा...तुमच्या या वंशद्वेषी भुमिकेला विरोध करणा-यांचाही द्वेष करत बसा. मराठी माणुस तसा स्वार्थी-व्युहातच रममान असतो हेही मी पहातो आहे...पण तुमच्या या द्वैषिक मोहिमेला त्यामुळे मोकळे रान नेहमीच मिळत राहील असेही समजु नका.
८. मी प्रा. नरके यांना पुर्ण पाठिंबा दिला आहे तो केवळ त्यांचा सोक्रेटीस होवू नये म्हणुन...मते पटोत वा ना पटोत...पण मत मांडण्याचे स्वातंत्र्य अशा संघटना वा व्यक्ति हिरावुन घेत असतील तर त्यांचा निषेध केलाच पाहिजे. मला नरकेंची सर्वच मते मान्य नाहीत...पण म्हणुन त्यांचे उघड्या डोळ्यांनी कोणी शिर्कान करण्याच्या नादात असेल तर मी ते जीवात जीव असेपर्यंत होवू देनार नाही.
एखाद्याला एकाकी पाडत त्याच्यावर रानटी हल्ले करणा-या प्रव्रुत्तींचा मी निषेध करतो. जर अजुनही मराठी विचारवंत, साहित्यिक, पत्रकार इ.ची थोडीफार विवेकबुद्धी जाग्रुत असेल तर त्यांनीही स्वर्थ सोडुन अशा प्रव्रुत्तींचा धि:कारच केला पाहिजे. अन्यथा उद्या त्यांचेही असेच शिर्कान होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि शेवटी आवाहन या देशातील सुबुद्ध नागरिकांना...जागे व्हा...अन्यथा तुमचेही गळे कधी चिरले जातील हे तुम्हालाही कळनार नाही.
प्रा. नरके, मी आणि हा जातीयवादी संघटना....
Tuesday, April 5, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!
महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...