मी काही संघटनांना पराकोटीचा विरोध करत आहे हे खरेच आहे पण तो विरोध या संघटना नष्ट व्हाव्यात या दुष्ट हेतुने नक्किच करत नाहीहे. मी आजन्म आर.एस.एस. चा विरोधक राहिलो आहे आणि त्या मतात बदल व्हावा असे काही आर.एस.एस. चे वर्तन आजही नाही आणि होईल याची शक्यता दिसतही नाही. उलट ही संघटना कधी नव्हे एवढी भरकटलेली आहे आणि त्यातच कदाचीत तिचा अंत आहे.
बहुजनीय संघटना आर.एस.एस. च्या विचारांचा विरोध करतात कि त्याला केवळ प्रत्युत्तर म्हणुन ब्राह्मण द्वेषाचा अजेंडा राबवतात हा प्रश्न आहेच. आर.एस.एस. ही ब्राह्मण्यवादी, वैदिक संघटना आहे याबद्दल ब्राह्मनांचेही दुमत असु शकत नाही. केवळ अब्राह्मण काही अध्यक्ष बनवले हे सांगणे म्हणजे निव्वळ थोतांड आहे. पण याच धरतीवर बहुजनीय संघटना जेंव्हा उभारल्या जातात तेंव्हा ही एकच एक विचारधारा आहे हे लक्षात येते. द्वेषाचे लक्ष्य बदलले आहे एवढेच...पण द्वेष हाच मुलाधार आहे हे तर उघडच आहे. तरुण पीढ्यांना द्वेषाधारीत राजकारण आवडते. त्यासाठी तरुणांना दोष देता येत नाही. कारण त्यांची मनोभुमिका तयार करण्याचे कार्य करायला वेळ नसतो या नेत्यांना...तर अद्न्य को-या पाटीच्या मुलांना भडकावणे सोपे जाते. सनातन प्रभात अशाच कोवळ्या पोरांचा उपयोग करुन घेते हे आता सिद्ध झाले आहे.
माझा प्रश्न असा आहे कि या सर्वच संघटनांना नेमके काय साध्य करायचे आहे?
हिंदुत्ववादी संघटना आधी विचारात घेवुयात. त्यांना प्रश्न असे कि:
अ. तुम्हाला हिंदु राष्ट्र म्हणुन मिरवायचे आहे तर प्रथम हिन्दु शब्दाचीच व्याख्या करा.
ब. मुसलमानांना कापायच्या नुसत्या वार्ता नव्हे तर संधी मिळेल तेंव्हा क्रुती करता...तुम्ही दहशतवादी नाहीत का?
क. सांस्क्रुतीक दहशतवाद हा तुमचा खरा चेहरा आहे. तुम्हाला तरुण-तेरुणींचे प्रेमे-बिमे मान्य नाहीत...त्यासाठीचे उत्सव मान्य नाहीत...भारतीय संस्क्रुती म्हणजे कधीच खड्ड्यात गेलेल्या वैदिक संस्क्रुतीचे पुनर्निर्माण तुम्हाला अभिप्रेत आहे...पण ती संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे माहित तरी आहे काय?
ड. वैदिक गणीत, वैदिक विद्न्यानादि गोष्टी मुळात आस्तित्वातच नसतांनाही त्याचा टेम्भा का? उदा. वैदिक गणित नावाचे प्रकरण २०व्या शतकात जन्माला आले आणि त्याचा एकाही वेदाशी सम्बंध नाही. मुळात या देशातील वैदिक परंपरा संपुन २००० वर्ष झालीत...तरी हे वैदिक प्रकरण काय आहे बरे?
इ. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला...त्याच्याच शिष्याने गांधीची हत्या केली. तीही गांधी फाळणीला जबाबदार म्हणुन...त्याबद्दलचा खेद का नाही?
फ. आसिंधुहिमाचल राष्ट्र असावे हे भाबडे स्वप्न ठेवणा-यांना मुळात या देशाला कधीच भुगोल नव्हता हे का सांगत नाहीत?
असो. प्रश्न अनंत आहेत. किमान वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
आता काही प्रश्न आहेत ते या आताच्या कथित बहुजनीय संघटनांना:
१. ब्राह्मण द्वेष/वैदिकांचा द्वेष हे सगळे चळवळीचा आरंभ म्हणुन ठीक आहे. पण द्वेष म्हणजेच चलवळ असा अर्थ तुम्हाला कोणत्या मुर्खाने सांगीतला?
२. शिवाजी महाराज महान लोकोत्तर होते हे खरेच आहे...पण केवळ ते मराठा जातीचे होते म्हणुन ते तुमचेच असला ठेका तुम्ही कोणत्या तत्वावर घेतला?
३. मराठी समाजाची नाळ नुसते सातवाहन नव्हेत तर त्याही पुर्व असलेल्या पुंड्र-नागादि मानवी समुहाशी सरळ न भीडता केवळ शिवोत्तर काळ म्हनजेच मराठी समाजाचा इतिहास (आणि तोही फक्त मराठ्यांचा...) असे कोनत्या कलमबहाद्दरीने सिद्ध करु पहाता?
४. महार हे फक्त नागवंशी? शिवाजीमहाराजही नागवंशी म्हणुन महार? हे असले फालतु संशोधने तुम्ही कोणत्या बळावर करुन दलितांना फसवत आहात? शिवाजी महाराज लोकोत्तर असले तरी ते स्वत:ला क्षत्रीयच समजत होते, वर्णाश्रम व्यवस्था मानत होते, म्हणजेच मनुस्म्रुती मानत होते, हे कबुल करायला लाज का वाटते?
५. मराठा ही मुळात जात नसुन एक पद होते आणि कालौघात ती जात बनली कारण आपापसातले सामंती विवाह. ही नेहमीच एक राजकीय जात होती. तिचे कोठेही धार्मिक पोथ्यांतही जात म्हणुन निर्देश सापडत नाहित. त्यामुळे या मंडळीची खरी जात कोनती?
६. दलितांना न्याय देण्यासाठी म्हणुन असंख्य संघटनांचे वादळ सध्या आहे. असंख्य संघटनांमुळे खरे दलित विखुरले आहेत. मराठे आणि दलित एकवंशीय आहेत असा सिद्धांत मांडुन मराठा सेवा संघ वा भारत मुक्ती मोर्चा एक आघाडी उघडत असेल तर "सारे मानव एक" असे उदात्त तत्वद्न्यान या आघाडीला लागु होत नाही कारण मराठे जर नागवंशीय आहेत आणि महारही नागवंशीय आहेत आणि म्हणुन दोन्ही एकच आहेत असा भाबडा अर्थ काढणारे चुक आहेत...कारण हे फसवे राजकीय समिकरणाचे वास्तव आहे. पण हे का लपवले जाते?
७. मराठे आणि दलित एकवंशीय आहेत असा सिद्द्धांत मांडतांना अन्य जातीय नेमक्या कोणत्या वंशाचे आहेत हे पण सांगायला हवे कि नको? ब्राह्मण युरेशियन आहेत-परके आहेत...ठीक आहे...पण बाकिच्यांनी काय फक्त तुमच्या आरत्या ओवाळाव्यात कि काय? आम्ही उरलेले कोण?
८. जातीभेद-जातीद्वेष सोडुन तुमच्या संघटनांकडे समाजाच्या उन्नतीसाठी नेमका काय कार्यक्रम आहे? जाळुन टाका...कापुन काढा...हे आर.एस.एस. सनातन प्रभात सुद्धा सांगते आणि तुम्हीपण....या दोन्ही पक्षीय पण सम-विचारसरणीच्या संघटना किमान मारायची वा जाळायची साधने निर्माण करणा-या कारखान्यांत काम तरी द्याल ना? जे मारले जातील...त्यांना जाळायचे कि गाडायचे? हाही प्रश्न आहेच...कि तसेच सडु द्यायचे? मारणे हाच कार्यक्रम असेल तर तोही सुनियोजित नको का? काय योजना आहे बरे?
९. बहुजन म्हणजे नेमके कोण? कोणी सांगतो ब्राह्मण आणि मराठे सोडुन जे आहेत तेच बहुजन. कोणी सांगतो दलित-आदिवासी-भटके-विमुक्त हेच बहुजन ...बाकी सारे अत्याचारी उच्चवर्णीय...हेही खरे कि खोटे?
१०. सर्वांची पोटे कशी भरतील याची पर्वा नसणा-या या सर्वच चळवळ्यांचे सर्वच समाजाने काय करायचे?
मला वाटते यावर चिंतन व्हायला हवे. मला कल्पना आहे कि अगदि जे वीर सामाजिक द्वेषाच्या पायावर सामाजिक चळवळ उभ्या करतात त्यांच्या व्यक्तिगत भावना प्रामाणिकही असतील पण त्या अंतता: विनाशाकडे नेणा-या ठरतात म्हणुन हे प्रश्न आहेत...हे आक्रंदन आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रबुद्धीसाठी चळवळी आवश्यकच अहेत...भारतात...विशेशता: हिंदु सम्जणा-या समाजात तर आवश्यकच आहेत. पण त्यांचा नेमका उद्देश काय आहे? नेमके काय साध्य करायचे आहे? ते कसे साध्य करायचे? साध्य मिळाल्यानंतर नेमके काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर या चळवळींनी आताच त्या बंद केलेल्या ब-या कारण भविष्यातील पीढ्या नासवल्याचे पाप त्यांच्या शिरावर पडेल.
Tuesday, April 19, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
आज वेळच तशी आली आहे म्हणुन....
आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...