तारतम्याचा अभाव हे भारतीय संस्क्रुतीचे एक लक्षण आहे. भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे. भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे...उलट पक्षी पहाता अगणित महनीय व्यक्तित्वे आणि त्यांची कर्तुत्वे आजही आदर्ष्वत वाटतील अशीच आहेत. पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने हाच समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.
पुरातन संस्क्रुतीबाबत संघ परिवार जेवढ्या थापा मारतो...विशिष्ट जातीसमुहातीलच लोकांना महत्ता प्रदान करत जात इतिहासाची अक्षरशा: मोडतोड करतो त्याला तोड नाही आणि त्याच संस्क्रुतीचे पाईक असलेलेही उलटार्थी इतिहासाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करत तोच एड्चापपणा करतो तेंव्हा हे दुषित-तत्व सर्वत्र पसरलेले आहे हे लक्षात येते. याचा अर्थ असा काढता येतो कि भारतीय इतिहास अपवाद वगळता जातीय द्रुष्टीकोनातुनच लिहिला जात असल्याने त्याची विश्वासार्हता केवढी मानायची हा प्रश्न निर्माण होतो. जदुनाथ सरकार असोत कि राजवाडे, रोमिला थापर (त्या मार्क्स्वादी.) असोत कि शरद पाटील...या सर्वांचीच समस्या ही आहे कि ते इतिहासाचे अन्वेषण करत असतांना जातीय/वर्गीय भावनेतुन बाहेर पडतांना सहसा दिसत नाही.
थोडक्यात निरपेक्ष भावनेने इतिहासाचा पहाड उचलण्याची हिम्मत कोणी करत नाही.
दुसरा भाग असा कि इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैद्न्यानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. काबाचा पत्थर म्हनजे शिवलिन्ग (म्हणजे मुस्लिमही हिंदु), येशु काश्मीरमद्धे आला आणि तेथेच त्याला खरे द्न्यान मिळाले...मग ख्रिस्तीही हिंदुच...कोलबिया-मेक्सिको मधील संस्क्रुती संस्थापक मुळ हिंदुच होते......यादी खुप मोठी आहे. या बाबत ब्राह्मणांना किंवा नवब्राह्मणाना खुप अभिमान वाटतो. हिरिरीने ते यावर चर्चा करत असतात. पण इतिहासाचा कालप्रवाह माहित नसणा-या या अद्न्य लेखक-संशोधकानी जी इतिहासघातकी धादसी मांडणी करण्याचा प्रयत्न करत एक विक्रुतमानसिकतेला जन्म देण्याचे कार्य केले आहे म्हणुन ते नक्किच निषेधाला पात्र आहेत.
माया संस्क्रुतीचा काळ हा कसल्याही स्थितीत इ.स. पुर्व जात नाही. ग्रीक संस्क्रुतीचा काळ हाही इ.स. पुर्व १००० ही जात नाही. तरी या वैदिकांनी तेथे आपले तळ बनवले आणि त्या वेद-विसंगत संस्क्रुत्या स्थापन केल्या हा दावा म्हणजे इतिहास-अहंकाराचे एक अत्यंत दुर्दैवी विधान आहे. इतिहासाची मांडणी करतांना समांतर काळप्रवासाचेही भान ठेवावे लागते कारण ऋग्वेद निर्मितीचा काळ जर किमान इ.स.प. २५०० वर्ष असेल आणि ती रचना सरस्वती नदीच्या परिघात झाली असेल तर हे वैदिक इ.स.पु. १००० मद्धे कसे निर्गमित झाले याचा एकही उल्लेख खुद्द वैदिक वाद्मयात का नाही या प्रश्नांना यांच्याकडे उत्तरच नसते. साधे दाशराद्न्य युद्ध नोंदवणारे ऋग्वेदकर्ते ही घटना का नोंदवत नाहीत हा प्रश्नही त्यांना पडलेला दिसत नाही. आणि हे इतिहास कशाशी खातात हे न समजल्याचे लक्षण आहे. या अहंकारातुन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वा भांडारकरही सुटलेले नाहीत.
आता हीच आणि अशीच भारतीय इतिहास लेखन परंपरा असल्याने सवरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहास तद्न्य नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?
खोट्यावर विश्वास ठेवतो तो भारतीय अशी दुर्दैवी व्याख्या येथे करावी लागत आहे.
पण याची प्रतिक्रिया म्हणुन जो नवा इतिहास लिहिला जात आहे त्याचे काय करायचे हाही प्रश्न आहे.
प्रतिक्रिया म्हणुन येणारा इतिहास हा अधिक काटेकोर, अजातीय, अहंकारविरहित आणि नावडला तरी मान्य करावा लागेल असा असायला हवा ही अपेक्षा अयोग्य ठरु शकत नाही. पण एक वेळ ब्राह्मणी अहंकाराने सांगोपांग भरलेला इतिहास परवदला पण या नवजातीयवाद्यांचा इतिहास नको अशी म्हणायची वेळ आली आहे.
शिवाजी महाराज नागवंशीय होते हा शोध...पुरावे काय तर ते दसरा सण साजरा करत...
(यात कोनते पुराव्याचे तारतम्य आहे?)
गुढीपाडवा साजरा करु नका कारण त्या दिवशी संभाजी महाराजांचे मुंडके काठीला टांगले त्याचा हा उत्सव...
(गुढीपाडवा हा सण सिंधु काळापासुन साजरा होत आहे...तो क्रुषिवल संस्क्रुतीचा उत्सव आहे.संभाजी महाराजांच्या दुर्दैवी म्रुत्युशी त्याचा काहीएक संबंध नाही. पुरावाच हवा तर ढोलवीरा येथील पत्थराची आजही उंचावलेली काठी पहा..)
आर्य बाहेरुन आले...ते युरेशियन ब्राह्मण आहेत. त्यांना देशाबाहेर हाकलायला हवे.
(आर्य या शब्दाचा एकही वेद न वाचता काढलेला हा अर्थ. टीळक ते तर्कतीर्थ येथे तर्कहीण होत जातीयवादी/वंशवादी बनलेच...पण ब्राह्मणांना अजून एक अहंकार प्रदान करण्याचे महापाप त्यांनी केले... याबाबत त्यांचा निषेध आवश्यक आहेच पण हा सिद्धांत सोईस्करपणे उचलत जातीय/वांशिक द्वेष वाढवण्याचे पाप करणे याला इतिहास संशोधन म्हणतात का?)
असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यातुन एकच बाब स्पष्ट होते ती ही कि ब्राह्मणांनी सांगितलेला इतिहास जर चुक आहे तर आता मराठ्यांनी सांगितलेला अतार्किक इतिहास स्वीकारा. ही अट दोन्ही पक्षी मुर्खपणाची आहे. कारण तेथे इतिहासच नाही. द्न्यात इतिहासाची चिकित्साही नाही. या उभयपक्षात एक विलक्षन साधर्म्य आहे...मग तो ब्राह्मणी असो कि मराठे प्रणित...
चिकित्सा करायची नाही....
मग यांच्यात आणि ब्राह्मणी संस्क्रुतीत नेमका काय फरक आहे?
काहीही नाही.
स्व-श्रेष्ठत्व मिरवण्याच्या नादातुन इतिहास-इतिहास असे बोंबलत हे लोक इतिहासाचे मुडदे पाडतात आणि वर इतिहासाची मोडतोड होते यावरही बोंब मारतात.
हीच जर भारतीय समाजाची मनोवस्था असेल तर एक लक्षात घ्या कथित बहुजनीय विरुद्ध ब्राह्मणी विचारधारा यात मुळात काही एक फरक नाही. फरक दैवतांबाबतचा आहे...कोणाला सावरकर हवा तर कोणाला शिवाजी...कोणाला राम हवा तर कोणाला बळी, कोणाला क्रुष्ण हवा तर कोणाला गांधी. कोणाला बुद्ध हवा तर कोणाला पुष्यमित्र श्रुंग. हे सारेच अव्यवस्थेत अधिक अव्यवस्था माजविण्यासाठी सज्ज आहेत आणि सामान्य मात्र वैचारिक बलात्कारित होत जाताहेत.
ही व्यवस्था बदललीच पाहिजे.
तटस्थ व्हा...जातींपार जा...
धर्मालाही दूर ठेवा...
एवढेच काय ते मागणे.
Wednesday, April 20, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
आज वेळच तशी आली आहे म्हणुन....
आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...