के.एल.एम. च्या त्या अवाढव्य विमानाने तासाभरात उड्डान भरले. मी खिडकीची सीट मुद्दाम मागुन घेतली होती. हा माझा पहिलाच विदेश प्रवास होता. खरे तर माझ्यासारख्या खेड्यातुन आलेल्याला त्याचे अप्रुप असायला हवे होते. पण प्रत्यक्षात मी कोरडा होतो. काही विशेष वाटत नव्हते. स्वता:बद्दल मला कधीच कशाचे अप्रुप वाटलेले नाही, भावनाहीणच असतो ही एक माझ्या स्वभावातील विसंगती आहे असे म्हणायला हरकत नाही.
उजाडले तेंव्हा ३७-३८ हजार फुटावरुन सुर्योदय कसा दिसेल या उत्सुकतेने टक लावून वाट पहात बसलो. खाली पहावे तर करडी स्लेट पसरली असावी असा समुद्र दिसत होता. काही वेळातच सुर्याचे दर्शन झाले...अंगावर रोमांच् उभे राहिले.
माझा पहिला थांबा होता नेदरल्यांड. विमान शिफोल विमानतळावर उतरलो तेंव्हा रिमझिम पाउस पडत होता. अवाढव्य विमानतळ. मुंबईच्या तळाची मिजास खाडकन उतरली. सारे काही भव्य. स्वछ्छ आणि ताजे-तवाणे. सरकत्या पट्यांवरुन पुढे सरकायची मौजही घेतली. कस्टमच्या तावडीतुन वेगाने सुटका झाली. बाहेर आलो. अनेक होटेल्सचे तेथे स्टाल्स होते. मी आयबिस होटेलची निवड केली. त्यांच्या बसने मी होटेलवर पोहोचलो...चेक-इन केले. जेट ल्यागचा त्रास होईल असे मला सांगण्यात आले होते, पण मला कसलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे जो एक दिवस विश्रांतीसाठी ठेवला होता तो कसा घालवायचा हा यक्ष प्रश्न होता. मुळात मी भटक्या नाही. पण हा प्रश्न फार वेगळ्या पद्द्धतीने सुटला. ती एक अविस्मरणीय अशी गम्मतच आहे.
आयबिस हे होटेल अवाढव्य होते. डच सेवाही फार उत्तम होत्या. पण अजून एक उत्तम सेवा मला मिळणार होती. माझ्या रुममधील दैनिके-मासिके चाळत बसलो (बीयर घेत) असता मला चक्क अशा जाहीराती दिसल्या कि मी उडालोच. त्या होत्या उच्चभ्रु वेश्या पुरवणा-या संस्थाच्या. वर्तमानपत्त्रात अशा जाहिराती असू शकतात यावर माझा विश्वासच बसेना. दुस-या दिवशी मी या सेवेचा लाभ घेण्याचे ठरवले. होटेलच्या रेस्टारंटमधील जेवण चांगले असेल अशा आशेने गेलो तर पुर्ण निराश झाली. युरोपियन जेवण दिसायला देखणे दिसले तरी गळ्याखाली उतरेना. त्यामुळे बियरचाच आहार घेतला. भारतीय आणि त्यातल्या त्य्यात घरचे जेवणच मला प्रिय. या अनुभवानंतर पुढे मी जे अनेक विदेश दौरे केले ते घरच्या दशम्या आणि शेंगदाण्याची चटणी घेवुनच!
दुस-या दिवशी मी त्या एजंसीला फोन लावला. त्यांनी प्रथम मी ज्या होटेलमद्धे उतरलो होतो त्याचे नाव विचारुन फोन कट केला. ५ मिनिटांत त्यांचाच उलटा फोन आला. वारे व्हेरिफिकेशन! तासाला ६०० गिल्डर या रेटमद्धे त्यांनी मुलगी पाठवायचे कबूल केले. मला तास भरपुरच वाटला. ठीक आहे म्हणुन मी आता काय अनुभव मिळणार आहे याची वाट पहात बसलो. जीवनातील सर्वच अनुभवांना मी मोकळेपणे सामोरा गेलेलो आहे. त्यांचा मला माझ्या साहित्यलेखनात अनिवार उपयोगही झाला आहे.
तासाभराने एक टंच डच युवती माझ्या रुममद्धे प्रवेशली. दिसायला ती खानदानी दिसत होती. अशा मुली त्याही अशा प्रगत राष्ट्रात वेश्यागिरी करतात याचे मला आश्चर्य वाटले. तीने मला हग केले आणि सोफ्यावर बसली. काहीतरी सुरुवात करायची म्हणुन तिने प्रश्न विचारले...मी उत्तरेही दिली आणि तिलाही उत्सुकतेने प्रश्न विचारले. प्रश्न असा केला कि हे काम सोडुन तु दुसरे काय करतेस?
तिने उत्तर दिले ..." मी तत्वद्न्यानात एम.ए. करते." आता पुन्हा एकदा मी उडालो. तत्वद्न्यान म्हटले आणि माझा दुसराच कीडा वळवळु लागला. मी तिच्याशी सरळ तत्वद्न्यानावर चर्चा करायला सुरुवात केली. तिला भारतातील रजनिश माहित होते पण क्रुष्णमुर्ती नाही. तिला उपनिशदे वगैरेचा गंधही नव्हता पण ती कांट-हेगेलवर भरभरून बोलायला लागली. ग्रीक तत्वद्न्यान तिला चांगले माहित होते. मग काय...अस्मादिकांचे ६०० गिल्डर असेच संपत आले तेंव्हा तीच भानावर आली...माफी मागु लागली. मी म्हटलो "नेव्हर माईंड..." एक तास वाढवून घेवूयात. त्यिने पुन्हा तिच्या एजंसीला फोन लावला...तास वाढवून घेतला...पैसे हाती घेतले...खरी व्यावसायिकता...उरलेला तास.....
सायंकाळी मी ट्यक्सीने अम्स्टर्ड्याम शहरात गेलो. ट्याक्सीवाल्याने सांगितले...एवढे पैसे घालवण्यापेक्षा विमानतळाखालुन असणा-या रेल्वे स्टेशनवर ट्रेन घेतली असती तर मी लवकर पोहोचलो असतो आणि स्वस्तातही...विमानतळाच्याच खाली रेल्वे स्टेशन आहे ही माहिती मला आशर्यकारक वाटली. युरोपने एवढी प्रगती केली आहे याचे कौतुक वाटले. मी अम्स्टर्द्यामच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या परिसरात आलो. अवाढव्य परिसर. पर्यटकांची प्रचंड गर्दी. मी असाच पायी भटकत राहिलो. ट्राममद्धे बसण्याची मौजही अनुभवली. क्यनाल्स पाहिले. पुन्हा चालत येत असतांना मला एक रेस्टारंट दिसले...
त्याच्के नाव होते "गांधी".आणि बाजुलाच त्यांचे कलात्मक छोटे शिल्प होते.
या महात्म्याच्या नावाने एवढ्या दूरदेशी कोणी होटेल चालवत आहे हे मला अभिमानाचे वाटले. येथे भारतीय जेवण मिळेल याची खात्रीच पटली. मी आत प्रवेशलो. हे चक्क डच मालकाचे होते आणि जेवणही दचच होते. गांधी नावाला अशोभणीय प्रकार पण आता तोच माझा अन्नदाता असल्याने हायसेही वाटलेला म्हनजे तेथे दारु मुबलक उपलब्ध होती....आणि जुनी हिंदी गाणी मंद स्वरात मला भारतातच असल्याचा आभास देत होती. मी बीयर घेत सायंकाळ घालवली आणि रेल्वेनेच परत आलो.
तेथील रेल्वे म्हणजे अद्भुत आश्चर्यच होते. अत्यंत स्वछ्छ स्थानके, कालच विकत घेतल्या असाव्यात अशा ट्रेन्स...आपोआप उघडणारे-बंद होणारे दरवाजे...आतील प्रशस्त सीट्स आणि गर्दीचा पुरेपुर अभाव...
दुस-या दिवशी माझे खरे काम सुरु झाले. मला युट्रेच्ट येथे भाजीपाल्यावर निर्जलीकरण प्रक्रिया करणा-या उद्योगाला भेट देवून पाहणी, तांत्रीक सहका-याची बोलणी, आणि महत्वाचे म्हनजे निर्यातीच्या शक्यता अजमावायच्या होत्या. मी शिफोल विमानतळाखालील स्टेशनवर पोहोचलो. प्रवास सुऋ झाला. शहरी भाग ओलांडला आणि नेदर्ल्यांडचे सौन्दर्य उलगडु लागले. मी विस्मीत होवून ट्युलिप्सच्या बागा...हिरवाईने नटलेली अत्याधुनिक शेती पहातच राहिलो. नद्या...जलाशयांचीही रेलचेल होती पण कोठेही ते सौंदर्य डागालण्याचे मानवी हस्तक्षेप नव्हते. स्वाभाविकच आपली शेती आणि सौंदर्यांची जाण नसलेले भारतीय ही तुलना होतच राहिली. विपुल निसर्गक्रुपा असुनही आपले दारिद्र्य का या प्रश्नांची उत्तरेही मिळत राहिली.
युट्रेच्ट येथील कारखान्यात माझे खुपच अगत्याने स्वागत झाले. त्यांच्या अधिका-यांनी मला चहापान व जुजबी गप्पांनंतर सर्व कारखाना दाखवला. अत्यंत कमी कामगार दिसत होते...बव्हंशी सर्वच कामे यांत्रिकीकरणावर होत होती. कांदे, पालक, फुलकोबी यांचे निर्जलीकरण होत होते. कच्चा माल एवढ्या उत्तम प्रतीचा होता कि तसा मी लेह सोडुन भारतात कोठेच पाहिलेला नाही. पुण्यातील भाजीवाल्यांकडील मालाची प्रत आठवली आणि खंतावलो. ते तंत्रद्न्य मला उत्साहाने सारी प्रक्रिया समजावून सांगत होते. कोठेही लपवाछपवीची भावना जाणवली नाही. प्रक्रियाक्रुत माल आणि त्याची होणारी काटेकोर तपासणी आणि लगोलग होणारे प्याकिंग येथवर त्यांनी मला सर्व काही दाखवले. नंतर त्यांच्या conference room मद्धे गेलो. तेथे मी त्यांना भारतातील मालाची उपलब्धता...स्वस्तात होवू शकणारे उत्पादन आणि त्याला येथे असु शकणारे मार्केट यावर बोलत राहिलो. त्यासाठी तांत्रिक आणि विपननविषयक करार करण्यात आमच्या कंपनीला रस असल्याचे सअंगितले व त्यात त्यांना होणारे संभाव्य फायदेही समजावुन सांगितले. त्यांना माझ्या प्रपोजलमद्धे रस असल्याचे जानवत होते त्यामुळे नकळत मी उल्हसित होत होतो. सायंकाळी त्यांनी मला रेल्वे स्टेशनवर सोडले तेंव्हा मी संभाव्य भागिदारीचे आश्वासन घेतले होते. तपशील आणि संभाव्य क्षमता...गुंतवणुक या बाबी मात्र चर्चेत राहणार होत्या. लगोलग करार होईल या अपेक्षेत मी मुळात नव्हतोच.
दुस-या दिवशी मी अजून एका कारखान्याला भेट दिली...पण तो खुपच छोटा होता आणि कांद्यावरच प्रक्रिया करत होता. त्याचा मालक एक जर्मन होता. पुढे त्याने तो कारखाना बंदही केला आणि जर्मनीत जावून स्थाईक झाला.
तिस-या दिवशी मी रोटरड्याम या शहराला जायला निघालो. आपली मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी तसेच रोटरड्याम. हे शहर अत्यंत संपन्न आहे. मी येथे world Trade center ला भेट द्यायला आलो होतो. मला असंख्य आकडेवा-यांची गरज होती. फ़ुड इम्पोर्ट-एक्स्पोर्टबद्दलची धोरणे समजावून घ्यायची होती. त्यासाठी माझा पत्रव्यवहार झालेला होताच.
ही ८ मजली पण विस्ताराने भव्य अशी इमारत होती, तेथील अधिकारीही माझ्याशी अत्यंत आपुलकीने वागले. हवा तो डाटा मला फ्हटाफट उपलब्ध करुन दिला. सारा दिवस जाईल असे वातले होते पण प्रत्यक्षात २ तासांत माझे काम आटोपले. भुक लागली होती. बीयरवर जगणे अशक्य झाले होते. मी भारतीय रेस्टारंटची चौकशी करु लागलो...पण प्रत्यक्षात मिळाले ते चायनीज. म्हटलो ठीक आहे...पण तेथील चायनीज फुड हे चायनावाल्यांनाही पचले नसते तर माझी काय गत?
दुस-या दिवशी मला इंग्लंडला जायचे होते. तेथे लोहभुकटीच्या संदर्भात भेटी ठरलेल्या होत्या. त्यामुळे पोहोचताच मी झोपी गेलो.
Thursday, May 5, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
एस.एस. रामदास: एक शोकांतिका
एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...