Thursday, August 2, 2012

वाघ्याची पुनर्स्थापना...ख-या इतिहासाचा विजय!








(वाघ्याच्या पुनर्स्थापनेसाठी केलेले उपोषण सोडताना श्री.संजय सोनवणी, सोबत प्रा.हरी नरके,श्री.प्रकाश खाडे, श्री.रविकिरण साने,महेश कडु, सचिन शॆंडगे, धनंजय झुरुंगे, श्री.काळे)

आज दुपारपर्यंतच शासनाने वाघ्याचा पुतळा जेथे होता तेथे व तसाच बसवला आहे. त्यामुळे मी उपोषण थांबवले असून आता संभाजी ब्रिगेड या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणुन घोषित करुन तिच्यावर कायमची बंदी घालण्यात यावी व तिच्या पदाधिका-यांना कायदेशीर शासन करण्यात यावे यासाठी मी व समविचारी नागरिकांच्या मदतीने केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. या आंदोलनात मला पाठिंबा देणारे, माझ्यासोबतच कालपासुन उपोषणात सहभागी झालेले प्रा. हरी नरके, प्रकाश खाडे, सचीन शेंडगे यांचा व मला देशभरातुन पाठिंबा देणा-या हजारो ज्ञात-अज्ञात मित्रांचा नितांत आभारी आहे. हा लढा येथेच थांबणार नसून अशा सामाजिक विद्वेष माजवणा-या कोणत्याही जातीयवादी संघटना असोत त्यांचा पुरेपुर नित्पात केल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

कायद्यांचा दुरुपयोग करून दडपशाही: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका!

   या आठवड्यातच आमदार संजय गायकवाड यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकातच शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल प्रकाशक श्री. प्रशांत ...