Monday, September 10, 2012

संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...?


मित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटनारे तर्कनिष्ठ विश्लेषनही केले जे श्रोत्यांना स्फोटक वाटले असले तरीही अन्य वक्त्यांनाही पटले. असो. प्रश्न असा आहे कि १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना पकदण्यात आले व त्यांची हत्या (दुर्दैव म्हणजे या ग्रंथाची लेखिका वारंवार या हत्येला "वध" म्हणत होती. निषेध करावा तेवढा कमीच!) १३ मार्च १६८९ रोजी झाली. या काळात संभाजी महाराजांचा छळ क्रमाने करत शेवटी हत्या कशी केली गेली याची सर्व वर्णणे मिळतात. पण याच काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने वा शंभुराजांच्या एकाही मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी आला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही.

हे विचित्र अशासाठी वाटते कि तदनंतर राजाराम महाराज जिंजीला असुनही मराठ्यांनी याच औरंग्याला सळो कि पळो कसुन सोडले. राजाराम महाराजांच्या अकाली मृत्युनंतराही रणरागिणी ताराराणीने अथक लढा सुरुच ठेवला. औरंग्याला याच भुमीत हताश श्वास घेत मरायला भाग पाडले...

मग असे तेंव्हाच नेमके काय झाले कि एकही सरदार संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न करु शकला नाही? मंत्री-मुत्सद्दी यांनी किमान वाटाघाटींचा प्रयत्न का केला नाही?

कि संभाजी महाराज खरेच जनतेला म्हणा वा सरदारांना म्हणा कि मंत्र्यांना म्हणा नकोसे होते? राजाराम महाराज रायगडावरुन वेढ्यातुनही सटकुन जिंजीला जावू शकतात तर महाराणी येसुबाई आणि बाल शिवाजी (शाहुंचे जन्मनाम शिवाजी होते) मात्र औरंगजेबाच्या कैदेत जातात याचा अन्वयार्थ कसा लावायचा?

कृपया इतिहास अभ्यासकांनी या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मदत करावी ही विनंती.
2 ·  ·  · 
    • Amit Namjoshi संजयदा, योग्य शंकेला वाचा फ़ोडलीत. असं जाणवून गेलं की होय अशी शंका आमच्याही मनात होती.
      about an hour ago · Edited ·  · 2
    • Sudhakar Jadhav स्फोटक आणि अडचणीचे प्रश्न ! उत्तरे मुद्द्यात येतात की गुद्द्यात हे लवकरच कळेल.
      about an hour ago ·  · 1
    • Sanjay Sonawani संगमेश्वर ते तुळापुर हे अंतर पाच-सहा हजार सैन्याच्या मदतीने शंभु राजांना घेवून मोगलांनी कापले. या विस्तीर्ण भागात एकही मराठा सरदार नव्हता काय? कि शंभुराजांना कैद केल्याची माहिती मराठ्यांना त्यांची हत्या होईपर्यतही मिळालीच नाही? मला हे अशक्य वातते म्हणुन हे प्रश्न. औरंगजेबाचे सैन्य मोठे होते पण त्याची धास्त मराठ्यांना होती असेही दिसत नाही....त्यामुळेच नेमके काय झाले असावे याबाबत काहे पुरावे मिळतात काय यासाठीच ही पोस्ट आहे.
      55 minutes ago ·  · 2
    • Sanjay Sonawani 
      जाधव सर, प्रश्नच विचारले नाहीत तर आपण उत्तरे कशी शोधणार? ज्यांना इतिहास ही आपलीच जातीय मालमत्ता वाटते ते गुद्द्यांवर येवू शकतात...तसे काही कालही आले होते...पण म्हणुन संशोधने करायचीच नाहीत का? आपल्याला उत्तरे हवी आहेत आणि ती शोधायचा हा प्राम...See More
      50 minutes ago ·  · 5
    • Gitesh Deokar ‎1.महाराजांची हत्या 13 नाही तर 11 मार्चला झाली...
      2.औरंगजेब महाराजांना सोडायला तयार होता मात्र त्याला स्वराज्याचा खजिना हवा होता..आणि त्याच्या दरबारातील कोण कोण महाराजांना सामील होते,याची माहिती हवी होती..(ही खाफीखानाची नोँद आहे.)
      3.औरंगजेब...See More
      41 minutes ago via mobile ·  · 3
    • Sanjay Sonawani 
      गितेशजी, तारखांचा घोळ आपल्या इतिहासात संपत नाही...दुर्दैव. असो. संभाजी राजे ताब्यात असतांना स्वराज्याचा खजीना तेवढ्याच धमकीवर शंभुराजांच्या मंत्र्यांकडुन वा येसुबाईंकडुन मिळवणे सहज शक्य होते. त्यामुळे शंभुराजांनी खजिना दिला नाही म्हणुन त्या...See More
      30 minutes ago ·  · 3
    • Sanjay Sonawani आणि एक अजुन प्रश्न...शंभुराजांना कैद केल्यानंतर शंभुराजांना किमान चर्चेसाठी त्यांच्या एकाही मंत्र्याशी/अधिका-याशी/वकीलाशी बोलायची परवानगी न देता औरंगजेब शंभुराजांकडुनच अनुमत्या मिळवायला छळत राहु शकतो काय? जगाच्या इतिहासात असा प्रसंग घडला आह...See More
      20 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar कदाचित जातिव्यवस्थेला हादरे देणारं कार्यच कारणीभूत असावं...वैदिक धर्म नाकारुन शाक्त धर्माचा प्रसार यामुळे त्यांची बदनामी करण्यात आधीच मंत्री यशस्वी झाले होते..मराठा सरदारांना वतनदारी पद्धती बंद पाडणं रुचलं नसावं कदाचित..कारण यामुळं त्यांचं वर्चस्व धोक्यात आलं होतं...:-)
      18 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani And Rajaram Maharaj restarted vatandari,....Gitesh ji...this also can be a reason. Let's probe more. Thanks.
      15 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar याउलट औरंगजेबाने वतनदारांना मोकळं रान सोडण्याची भूमिका घेतली होती...त्यामुळे शंभुराजांपेक्षा तो परवडला अशी मनोमन गणितं जमवुन शंभुराजांना कसलीही मदत न करता मरणाच्या दारात या सरदारांनी सोडुन दिलं असावं..!
      13 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani Could be. We need to probe to reach to the conclusion...
      10 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar तुमच्या मागच्या कथेत चितारलेला इतिहासाच्या गोधड्या उसवणारा नायक खरोखरी तुम्हीच आहात....आगे बढो..:-)
      2 minutes ago via mobile ·  · 1
    • Sanjay Sonawani गितेशदा...म्या जीवंत हाय...सावली नाय.
      उद्याचं दादा माह्यत नाय!..

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय ...