Monday, March 4, 2013

इतिहासाची गंमत अशी आहे...



इतिहासाची गंमत अशी आहे कि जोवर आपल्या सोयीचा इतिहास लिहिला जात असतो तोवर सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्याहुन मोठा विनोद म्हणजे सोयीच्या इतिहासाबाबतचे ठोस पुरावे कोणी मागतही नाही. सोयीच्या इतिहासात सर्व लांड्यालबाड्या खपून जात असतात. पण जेंव्हा अशा सोयीच्या इतिहासाला छेद देणारे विवेचन स्वतंत्रपणे होऊ लागते तेंव्हा मात्र अशा लोकांची पंचाईत होऊ लागते. असे लोक खालील प्रकारच्या प्रतिक्रिया देवू लागतात:

१. आपले विवेचन पुर्वग्रहदुषित असून "एक्स"चे अनाठाई उदात्तीकरण करणारे आहे.
२. आपण दिलेले पुरावे पुरेसे नाहीत. जे पुरावे दिलेत त्या संदर्भांची प्रकाशकांसहित सुची द्यावी.
३. आपण "एक्स" जाती/धर्माचे द्वेष्टे दिसता.
४. आपले आकलन अपुर्ण आहे.
वर काही अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचे मासले दिले आहेत. समजा सर्व पद्धतीने संतुष्ट केले व आता प्रत्युत्तर द्यायला जागाच उरत नाही तेंव्हा हमखास मिळणारी प्रतिक्रिया:’
"इतिहास काय चघळत बसताय राव? येथे लोकांना प्यायला पाणी, नाही, बेरोजगा-या वाढत चालल्यात. वर्तमानातील प्रश्न सोडुन हे काय चाललेय? समाजात एकता करायच्या ऐवजी दुही का पसरवताय? आता कशाला जुने उगाळत बसायचे?"

झाले!

अशी मनोवृत्ती कदाचित अन्यत्रही असू शकेल, पण भारतात व त्यातल्या त्यात महाराष्ट्रात विशेष जोमात आहे हे मात्र खरे.  पुरोगामी आणि प्रतिगामीचे अर्थ सोयिस्करपणे बदलले जातात. इतिहासाचे अन्वयार्थ सोयिस्करपणे बदलले जातात. वर तुम्हीही सोयीने इतिहासाचा अर्थ लावत असतात असेही म्हटले जाते. त्यातल्या त्यात सोयीचा इतिहास कोणता व कोणाचा यावरही सोयिस्कर वादंगे घडवली जातात. आता जरा वरील प्रतिक्रियांचा समाचार घेऊ:

१. आमचे विवेचन पुर्वग्रहदुषित म्हणतांना नेमका कोणता निकष आहे बरे? हा निकष तुम्हाला सोयिस्करपणे प्रिय वाटणा-या लोकांबाबातही मग का लाऊ नये? कि तेच खरे महान होते आणि बाकीचे पुळचट होते असे म्हनणे आहे? तसे असेल तर तो आम्ही पुराव्यानिशीच हाणुन पाडनारच कि!
२.तुम्ही जे इतरांबाबत म्हनता, अवमुल्यने करता, तसा प्रचार करता त्याला कोणते पुरावे दिलेले असतात बरे?
३."एक्स" जाती/धर्माचा द्वेष्टा ठरवून मोकळे होणे हा तर पुरातन खेळ आहे. असे लेबल लावले कि मग कसलीही चर्चा करायला प्रतिपक्ष बांधील नसतो. कारण चर्चा हा त्यांचा उद्देशच नसतो. आणि तरीही वर नाक करून हीच मंडळी आपण किती पुरोगामी आणि अन्य जाती/धर्मियांबाबत कनवाळु आहोत हे आटोकाट दाखवायच प्रयत्न करत असते.
४. आकलन अपुर्ण आहे हा मुद्दा खरा धरता येवू शकतो...पण कधी? समोरच्याचा उद्देश दुस-याचे आकलन कमी आहे हे सांगतांना ते कोठे कमी आहे हे सांगायचा असेल तर! कोणाचेही आकलन समग्र असू शकत नाही हे कोनीही अमान्य करणार नाही. समुहाचे आकलनसुद्धा समग्र नसते. पण त्याची व्याप्ती अमान्य करत स्वत:च्या अक्कलशुन्यतेचेच हे उदाहरण नव्हे काय?

आणि शेवटचा मुद्दा: इतिहास अडचणीचा समोर येऊ लागतो तेंव्हा इतिहासापासून परावृत्त करण्याचा हा सोपा बुद्धीभेदी मार्ग आहे. या लोकांना विचारायचा प्रश्न असा कि भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणे हा तत्कालीन वर्तमानातील महत्वाचा प्रश्न असतांना सावरकर कशाला "सहा सोनेरी पाने" लिहित वेळ वाया घालवत बसले? लो. टिळक कशाला स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यसाठी प्रत्येक क्षण डावाला लावण्यापेक्षा "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहित बसले?
त्यांना वर्तमान आणि वर्तमानाचे प्रश्न समजत नव्हते असाच याचा अर्थ घ्यायचा काय?

"आर्क्टिक होम इन वेदाज" ही तत्कालीन समाजातील महा-दुहीची ग्वाही नव्हती कि काय?
 त्याचे फळे आपण आजही भोगत नाही आहोत कि काय?

असो. हे पण अडचणीचे प्रश्न आहेत. त्याचे सरळ उत्तर येणार नाही. पुन्हा असो.

इतिहासाच्या पायावरच वर्तमान उभा असतो. इतिहासाचे मुल्यांकण त्या-त्या काळातील लोकांनी आपापल्या आकलनानुसार केलेले असते. असे करतांना अनेक मुद्दे त्यातून सुटतात वा सोडले जात असतात. अशा स्थितीत इतिहासाचे पुन्हा पुन्हा नव्याने विश्लेशन करावे लागते. वर्तमानातील असंख्य सामाजिक समस्यांची कारणे इतिहासात दडलेली असतात. आजच्या समस्या या चुकीच्या धार्मिक/राजकीय इतिहासातुन निर्माण झालेल्या असतात. जातीसंस्था नष्ट करायची तर तिचा मुलात जन्म कसा झाला हे शोधावेच लागते. धार्मिक समस्या मिटवायच्या तर धर्माचे विश्लेशन करत त्याचे मुळ शोधावेच लागते. सामाजिक विषमतेची कारणे अन्य कोणत्या धर्मात दडली असतील तर तेही शोधत धर्मातील अपप्रवृत्ती हटवाव्या लागतात. ज्याचे स्वातंत्र्य त्याला बहाल करावे लागते व आपले स्वातंत्र्य मिळवावे लागते. वैदिक धर्मियांनी एकीकडे स्वत:ला हिंदू म्हणायचे आणि वैदिकतेला श्रेष्ठस्थानी ठेवत विषमतेची संस्कृती अव्याहत चालू ठेवू द्यायची हा उद्योग जर इतिहासातून स्पष्ट होत असेल तर तो थांबवणे अत्यावश्यक आहे. मी वैदिक धर्माचा द्वेष करत नाही. तो उलट स्वतंत्र आहे एवढेच सांगतोय. त्यातील चातुर्वर्ण्याने जी विशिष्ट सामाजिक स्थिती निर्माण केली आहे ती दूर करत समता आनायची असेल तर वैदिक धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र करणे अत्यावश्यक आहे. हिंदुंची एकही देवता वैदिक नाही आणि नव्हती हे मी आधी स्पष्ट केलेलेच आहे.

थोडक्यात इतिहासाचे पुनर्मुल्यांकन ही काळाची गरज आहे. समतेची गरज आहे. त्यासाठी माझ्यावर कितीही आरोप केले, निंदा केली, प्रतिगामी म्हटले, पुर्वग्रहदुषित म्हटले तरी मी त्याचेही स्वागतच करीन!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...