मराठी साहित्यिकांची गंभीर समस्या ही आहे कि कोणत्याही सामाजिक प्रश्नावर ते जाहीर भुमिका घेत नाहीत. आनंद यादवांची कादंबरी दबावतंत्र वापरुन नुसती मागे घ्यायला लावली गेली नाही तर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असुनही त्यांना तेथे पायही ठेवता आला नाही. या निंद्य प्रकाराबाबत साहित्यिकांनी जाहीरपणे साधा निषेध केल्याचे माझा अपवाद वगळता एकही उदाहरण नाही. झोपडपट्टीतील लोकांना काय साहित्य कळते असे उद्दाम प्रश्न ज्या मातीत साहित्यिकांकडुनच विचारले जातात त्यांची साहित्यनिष्ठा व वाचकनिष्ठा कोणत्या प्रतीची असू शकेल यावर मग चिंतन होणे ही दुरचीच बाब झाली. ज्या साहित्यिकांना सामाजिक प्रश्नांबाबत भुमिकाच घेता येत नाही त्यांच्याबद्दल सामाजिक आदर कसा वाढेल?
साहित्यिक हे सामाजिक प्रश्नांपासून अलिप्त आहेत याचे कारण म्हणजे ते कोनत्या ना कोणत्या राजकीय व्यक्तीच्या प्रभावळीत असतात. पारितोषिके, कोणत्या ना कोणत्या मंडळावरील नियुक्त्या अशा स्वार्थप्रणित बाबींमुळे कोणालाही दुखवायची त्यांची इच्छा वा भावना नसते. प्रवीण बांदेकरांसारखे वा कविता महाजनांसारखे काही सन्माननीय अपवाद वगळले तर साहित्यिक समाजापासून तुटलेलाच असल्याचे चित्र दिसते. मग हे साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणते दर्शन घडवणार आहेत?
दुर्गा भागवत, पु.ल., आचार्य अत्रे असे अनेक दिग्गज साहित्त्यिक एकेकाळी कोणाच्याही रोषाची पर्वा न करता आपली मते जाहीरपने निर्भिडपणे व्यक्त करत असत. कोठे गेली ही परंपरा? पुलंना मुंबईतुन अवमानजन्य शब्दांत हिनवले गेले तेंव्हा कोठे गेली होती ही साहित्यिक मंडळी? साहित्य संस्कृती ही समाजमानसावर प्रभाव टाकणारी असते. आपली साहित्यिकांची संस्कृतीच जर रसातळाला गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असेल तर साहित्य संस्कृती कोठे जाणार?
मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद!
ब्राह्मण, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी मराठी साहित्याची झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ब्राह्मणी आहे हा आरोप आजचा नाही. त्यातही देशस्थ-कोकणस्थ ही जातीय बाब डोकावतेच...यंदाही डोकावला होताच! मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलनेही होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणीवांमुळे...पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र पुन्हा जातीयच असते! ब्राह्मणी संमेलने (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पहा) केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणत असतात...पण ओबीसींना निरुपद्रवी घटक असल्याने अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे. आता या सर्व प्रकारात साहित्त्यिक योग्यता हा निकष असतोच असे नाही. दोन-चार, कोणाही वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. फक्त मते जमा करण्याचे कौशल्य असले कि पुरे...!
साहित्य संमेलने जाती आधारीत भरवली जाणे हे सामाजिक अध:पाताचे मोठे लक्षण आहे. इतरत्र शिरकाव होत नाही म्हणुन आपल्याच जातीचे संमेलन भरवा हा प्रकार साहित्य संस्कृतीच्या रसातळाचे विदारक दर्शन घडवते. "सर्वसमावेशकता" हा आपल्या केंद्रीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मुलमंत्रच नसल्याने असे होणे स्वाभाविक बनून जाते. पण यातून समाज विखंडित होतो याचे भान कोनता साहित्यिक ठेवतांना दिसतो? असे घदणे असामाजिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणत्या विचारवंताने आजवर केलाय? "कोणालाही दुखवायचे नाही..." ही काय विचारवंतांची रीत झाली? समाजाच्या हितासाठी अनेकदा खडे बोल सुनवावे लागतात, ऐक्याची दिशा दाखवावी लागते...पण हे कोण करणार?
प्रादेशिक अथवा स्थानिक संमेलने होणे ही वेगळी बाब झाली. ती आवश्यकही आहेत. ते अधिकाधिक भरावीत...परंतू जातीधारीत संमेलने कशी बंद पाडता येतील यावर आता सर्वांनाच गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
चिंताजनक बाब अशी कि वाचकही पुस्तके निवडतांना जातीय विचारांनी प्रेरीत असतात. स्वजातीय लेखकाला तो नकळत प्राधान्य देत जातो आणि त्यावरच साहित्य चर्चा घडवून आणतो. त्यामुळे एक वाचक म्हणुन आपण अन्य लेखकांच्या अनुभवविश्वाला मुकतो आहोत याची जाणीव ठेवत नाही.
साहित्य हे समाजाच्या ऐक्यासाठी असते, ते सर्वांचेच व सर्वांसाठीच असते आणि त्यातुनच संपुर्ण समाजाच्या मानसिकता बदलावर परिणाम घडु शकतो याचेच भान सुटले तर दुसरे काय होणार?
या सर्व जातीय प्रकारांमुळे साहित्त्यिकांत जो विभेद, जो अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आणि कोणत्याही समाज संस्कृतीला अशोभनीय असल्याने, निर्माण झाला आहे त्याची परिणती मराठीचा एकूणातीलच साहित्त्यिक दर्जा ढासळवत नेत आहे. कारण लेखकाला अमुक जातीचे असणे पुरेसे असते. त्यासाठी सहित्त्यिक लायकी सिद्ध करत बसण्याची गरज नसते. मराठीत जर काही दखलपात्र साहित्य निर्माण झालेले असेल तर ते निव्वळ अपघाताने...आणि म्हणुणच असे साहित्य अत्यल्पही आहे. साहित्यिक म्हणुन आपली नेमकी भुमिका काय, आपण आपल्या कलाकृतीला परिपुर्ण करण्यासाठी किती कष्ट उपसले पाहिजेत, हे जर समजले नाही तर ते लेखन सर्वव्यापी व म्हणुनच वैश्विक कसे होणार?
ते वाचनीय आणि प्रगल्भ करणारे कसे असणार?
वाचनसंस्कृती तेंव्हाच वाढु शकते जेंव्हा तेवढेच विविधांगी साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होते. तुमच्या कादंब-या पाच-दहा पानांपार वाचवत नसतील तर वाचकाने आपले पैसे त्यावर का वाया घालवावेत? ही अपेक्षा चुकीची नाही काय? वाचक तेच पैसे मग सिनेमा पाहील अथवा इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) साहित्यच वाचेल कि सरळ! केवळ मराठी साहित्यसंस्कृती वाचवायला त्याचे पैसे काही वर आलेले नाहीत. पुन्हा वर मराठीत वाचनच कमी झाले आहे ही बोंब मारायला हेच लोक आघाडीवर असतात. आपल्या अपयशांचे खापर दुस-याच बाबींवर फोडण्याची राजकीय सवय आता साहित्यिकांनाही लागली आहे आणि ही दुर्दैवी बाब आहे.
वाचन कमी झालेले नाही. ते फक्त मराठी लेखकांचे लेखन कमी वाचतात एवढेच! जेंव्हा वाचायलाच हवे असे त्याच्या आवडीचे साहित्य येते तेंव्हा वाचक बरोबर, प्रसंगी मेहनत घेवुन, ते पुस्तक मिळवतोच असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे वाचकांना वाचायचेच नाही असे नसुन त्याला वाचावे वाटलेच पाहिजे असे देण्यात साहित्त्यिक असमर्थ आहेत म्हणुनच वाचनसंस्कृतीही क्षीणावत चालली आहे.
अत्यंत अपवादात्मक लेखक जागतीकीकरण व त्यामुळे निर्माण होत असलेले बहुसांस्कृतीकीकरण स्पर्शु शकले आहेत. शेतकरी अजुन धड आवाक्यात आलेला नाही. आपण त्याला इतर म्हणतात म्हणुन कृषी/ग्रामीण जीवनाचे उत्कट चित्रीकरण करणारी कादंबरी वगैरे भाडोत्री समिक्षक म्हणतात म्हणुन म्हणायचे...पण त्यात खोली किती, वास्तव किती...कि केवळ ज्यांना त्या जीवनाबद्दल काही माहितच नाही त्यांना गंडवले जातेय हे कोण पाहणार? लोकांना ऐतिहासिक/पौराणिक कादंब-यांचे आपल्याकडे वेड आहे हे खरेच आहे. मृत्युंजयसारख्या कादंब-यांनी वाचकांना वेड लावले हेही खरे आहे. पण गेली काही दशके केवळ अशी पुस्तके पटकन खपतील म्हणुन इतिहासातील व पुराणकथांतील हाती सापडेल ते पात्र घ्यायचे आणि कादंबरी ठोकायची असाही एक लेखकीय उद्योग बनला आहे. अर्थात प्रकाशकांचेही त्यांना प्रोत्साहन असतेच. मग दर्जा कोण पहातो...? (आणि मग वाचतोही कोण म्हणा!) वाचक एकदोनदा गंडला जावू शकतो...पण त्यात वारंवारिता आली कि वाचक दुसरीकडे वळणार हे नक्कीच आहे...वाचकाला दोष देण्याचा आपल्याला मग कोणता नैतीक अधिकार आहे?
थोडक्यात, मराठी साहित्य संस्कृती रसातळाकडे चालली आहे. लोक इतर प्रकारची, माहितीपर, अनुवादित वा वैचारिक पुस्तकांकडे झुकत आहेत. वाचकांची भुक शमलेली नाहीय. शमणारही नाही. उलट सर्व यत्तांना रुचेल असे उच्च (किमान ब-या) दर्जाचे साहित्य येत राहिले तर आहे ती वाचनसंस्कृती भरभराटेल यात मला शंका नाही. यासाठी जातीय पाशांतून बाहेर येत लेखकांनाच व्यापक व्हावे लागणार आहे. समिक्षकांसाठी अथवा पुरस्कारांसाठी न लिहिता स्वत: समृद्ध होत वाचकांसाठी लिहावे लागणार आहे. स्वत:च समृद्ध नसणारे साहित्त्यिक वाचकांना काय समृद्ध करणार?
साहित्यिक हे सामाजिक प्रश्नांपासून अलिप्त आहेत याचे कारण म्हणजे ते कोनत्या ना कोणत्या राजकीय व्यक्तीच्या प्रभावळीत असतात. पारितोषिके, कोणत्या ना कोणत्या मंडळावरील नियुक्त्या अशा स्वार्थप्रणित बाबींमुळे कोणालाही दुखवायची त्यांची इच्छा वा भावना नसते. प्रवीण बांदेकरांसारखे वा कविता महाजनांसारखे काही सन्माननीय अपवाद वगळले तर साहित्यिक समाजापासून तुटलेलाच असल्याचे चित्र दिसते. मग हे साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणते दर्शन घडवणार आहेत?
दुर्गा भागवत, पु.ल., आचार्य अत्रे असे अनेक दिग्गज साहित्त्यिक एकेकाळी कोणाच्याही रोषाची पर्वा न करता आपली मते जाहीरपने निर्भिडपणे व्यक्त करत असत. कोठे गेली ही परंपरा? पुलंना मुंबईतुन अवमानजन्य शब्दांत हिनवले गेले तेंव्हा कोठे गेली होती ही साहित्यिक मंडळी? साहित्य संस्कृती ही समाजमानसावर प्रभाव टाकणारी असते. आपली साहित्यिकांची संस्कृतीच जर रसातळाला गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असेल तर साहित्य संस्कृती कोठे जाणार?
मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद!
ब्राह्मण, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी मराठी साहित्याची झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ब्राह्मणी आहे हा आरोप आजचा नाही. त्यातही देशस्थ-कोकणस्थ ही जातीय बाब डोकावतेच...यंदाही डोकावला होताच! मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलनेही होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणीवांमुळे...पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र पुन्हा जातीयच असते! ब्राह्मणी संमेलने (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पहा) केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणत असतात...पण ओबीसींना निरुपद्रवी घटक असल्याने अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे. आता या सर्व प्रकारात साहित्त्यिक योग्यता हा निकष असतोच असे नाही. दोन-चार, कोणाही वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. फक्त मते जमा करण्याचे कौशल्य असले कि पुरे...!
साहित्य संमेलने जाती आधारीत भरवली जाणे हे सामाजिक अध:पाताचे मोठे लक्षण आहे. इतरत्र शिरकाव होत नाही म्हणुन आपल्याच जातीचे संमेलन भरवा हा प्रकार साहित्य संस्कृतीच्या रसातळाचे विदारक दर्शन घडवते. "सर्वसमावेशकता" हा आपल्या केंद्रीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मुलमंत्रच नसल्याने असे होणे स्वाभाविक बनून जाते. पण यातून समाज विखंडित होतो याचे भान कोनता साहित्यिक ठेवतांना दिसतो? असे घदणे असामाजिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणत्या विचारवंताने आजवर केलाय? "कोणालाही दुखवायचे नाही..." ही काय विचारवंतांची रीत झाली? समाजाच्या हितासाठी अनेकदा खडे बोल सुनवावे लागतात, ऐक्याची दिशा दाखवावी लागते...पण हे कोण करणार?
प्रादेशिक अथवा स्थानिक संमेलने होणे ही वेगळी बाब झाली. ती आवश्यकही आहेत. ते अधिकाधिक भरावीत...परंतू जातीधारीत संमेलने कशी बंद पाडता येतील यावर आता सर्वांनाच गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
चिंताजनक बाब अशी कि वाचकही पुस्तके निवडतांना जातीय विचारांनी प्रेरीत असतात. स्वजातीय लेखकाला तो नकळत प्राधान्य देत जातो आणि त्यावरच साहित्य चर्चा घडवून आणतो. त्यामुळे एक वाचक म्हणुन आपण अन्य लेखकांच्या अनुभवविश्वाला मुकतो आहोत याची जाणीव ठेवत नाही.
साहित्य हे समाजाच्या ऐक्यासाठी असते, ते सर्वांचेच व सर्वांसाठीच असते आणि त्यातुनच संपुर्ण समाजाच्या मानसिकता बदलावर परिणाम घडु शकतो याचेच भान सुटले तर दुसरे काय होणार?
या सर्व जातीय प्रकारांमुळे साहित्त्यिकांत जो विभेद, जो अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आणि कोणत्याही समाज संस्कृतीला अशोभनीय असल्याने, निर्माण झाला आहे त्याची परिणती मराठीचा एकूणातीलच साहित्त्यिक दर्जा ढासळवत नेत आहे. कारण लेखकाला अमुक जातीचे असणे पुरेसे असते. त्यासाठी सहित्त्यिक लायकी सिद्ध करत बसण्याची गरज नसते. मराठीत जर काही दखलपात्र साहित्य निर्माण झालेले असेल तर ते निव्वळ अपघाताने...आणि म्हणुणच असे साहित्य अत्यल्पही आहे. साहित्यिक म्हणुन आपली नेमकी भुमिका काय, आपण आपल्या कलाकृतीला परिपुर्ण करण्यासाठी किती कष्ट उपसले पाहिजेत, हे जर समजले नाही तर ते लेखन सर्वव्यापी व म्हणुनच वैश्विक कसे होणार?
ते वाचनीय आणि प्रगल्भ करणारे कसे असणार?
वाचनसंस्कृती तेंव्हाच वाढु शकते जेंव्हा तेवढेच विविधांगी साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होते. तुमच्या कादंब-या पाच-दहा पानांपार वाचवत नसतील तर वाचकाने आपले पैसे त्यावर का वाया घालवावेत? ही अपेक्षा चुकीची नाही काय? वाचक तेच पैसे मग सिनेमा पाहील अथवा इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) साहित्यच वाचेल कि सरळ! केवळ मराठी साहित्यसंस्कृती वाचवायला त्याचे पैसे काही वर आलेले नाहीत. पुन्हा वर मराठीत वाचनच कमी झाले आहे ही बोंब मारायला हेच लोक आघाडीवर असतात. आपल्या अपयशांचे खापर दुस-याच बाबींवर फोडण्याची राजकीय सवय आता साहित्यिकांनाही लागली आहे आणि ही दुर्दैवी बाब आहे.
वाचन कमी झालेले नाही. ते फक्त मराठी लेखकांचे लेखन कमी वाचतात एवढेच! जेंव्हा वाचायलाच हवे असे त्याच्या आवडीचे साहित्य येते तेंव्हा वाचक बरोबर, प्रसंगी मेहनत घेवुन, ते पुस्तक मिळवतोच असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे वाचकांना वाचायचेच नाही असे नसुन त्याला वाचावे वाटलेच पाहिजे असे देण्यात साहित्त्यिक असमर्थ आहेत म्हणुनच वाचनसंस्कृतीही क्षीणावत चालली आहे.
अत्यंत अपवादात्मक लेखक जागतीकीकरण व त्यामुळे निर्माण होत असलेले बहुसांस्कृतीकीकरण स्पर्शु शकले आहेत. शेतकरी अजुन धड आवाक्यात आलेला नाही. आपण त्याला इतर म्हणतात म्हणुन कृषी/ग्रामीण जीवनाचे उत्कट चित्रीकरण करणारी कादंबरी वगैरे भाडोत्री समिक्षक म्हणतात म्हणुन म्हणायचे...पण त्यात खोली किती, वास्तव किती...कि केवळ ज्यांना त्या जीवनाबद्दल काही माहितच नाही त्यांना गंडवले जातेय हे कोण पाहणार? लोकांना ऐतिहासिक/पौराणिक कादंब-यांचे आपल्याकडे वेड आहे हे खरेच आहे. मृत्युंजयसारख्या कादंब-यांनी वाचकांना वेड लावले हेही खरे आहे. पण गेली काही दशके केवळ अशी पुस्तके पटकन खपतील म्हणुन इतिहासातील व पुराणकथांतील हाती सापडेल ते पात्र घ्यायचे आणि कादंबरी ठोकायची असाही एक लेखकीय उद्योग बनला आहे. अर्थात प्रकाशकांचेही त्यांना प्रोत्साहन असतेच. मग दर्जा कोण पहातो...? (आणि मग वाचतोही कोण म्हणा!) वाचक एकदोनदा गंडला जावू शकतो...पण त्यात वारंवारिता आली कि वाचक दुसरीकडे वळणार हे नक्कीच आहे...वाचकाला दोष देण्याचा आपल्याला मग कोणता नैतीक अधिकार आहे?
थोडक्यात, मराठी साहित्य संस्कृती रसातळाकडे चालली आहे. लोक इतर प्रकारची, माहितीपर, अनुवादित वा वैचारिक पुस्तकांकडे झुकत आहेत. वाचकांची भुक शमलेली नाहीय. शमणारही नाही. उलट सर्व यत्तांना रुचेल असे उच्च (किमान ब-या) दर्जाचे साहित्य येत राहिले तर आहे ती वाचनसंस्कृती भरभराटेल यात मला शंका नाही. यासाठी जातीय पाशांतून बाहेर येत लेखकांनाच व्यापक व्हावे लागणार आहे. समिक्षकांसाठी अथवा पुरस्कारांसाठी न लिहिता स्वत: समृद्ध होत वाचकांसाठी लिहावे लागणार आहे. स्वत:च समृद्ध नसणारे साहित्त्यिक वाचकांना काय समृद्ध करणार?