Thursday, September 12, 2013

मी निवडून येईल याचा मला ...

मी निवडून येईल याचा मला विश्वास आहेच. निवडून आल्यानंतर मी एक अनौपचारिक अशी अध्यक्षीय समिती स्थापन करणार आहे. तीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सर्व घटकसंस्था आणि जगभरातील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांतील (किंवा बाह्य) निवडक प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्या माध्यमातून खालील उपक्रम राबवणार आहे...

१. देशांतर्गत व बाहेरही विखुरलेल्या मराठी भाषकांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडत राहणे. सर्व मराठी भाषक साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना अ.भा. मराठी साहित्य
संमेलन, भविष्यात का होईना, आपले वाटेल याची सकस पायाभरणी करणे.

२. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि डा. आ. ह. साळुंखे समितीने सुचवलेल्या सांस्कृतीक धोरणावर व्यापक अंमलबजावणी व्हावी यासाठी या समितीचा व जनसामान्यांचा दबावगट निर्माण करणे. प्रसंगी ठिकठिकाणी आंदोलने करने. सीमाभागातील लेखकांना प्रोत्साहन देणे.

३. मराठीतील सर्व साहित्य प्रवाहांना किमान एकमेकांशी चांगली ओळख व्हावी, सैद्धांतिक आणि वैचारिक देवाणघेवाण व्हावी यासाठी प्रयत्न करणे. आज अनेक साहित्त्यिक-विचारवंत आपापल्या परीने महान सांस्कृतीक कार्य घडवत असतात पण त्यांना व्यापक मान्यता/प्रसिद्धी मिळत नाही...त्यासाठी माध्यमांनाही सजग करणे. चळवळींची वैचारिक व्यापकता वाढवणे.

४. परप्रांतीय/विदेशांत स्थायिक पण मराठी मातीच्या साहित्यिकांना (त्यांनी अभिव्यक्तीचे माध्यम अन्य भाषा निवडले असले तरी...उदा. आताच्या पिढीचे हर्षवर्धन देशपांडे आणि अन्य अनेक) योग्य तो मानसन्मान मिळायला हवा यासाठी प्रयत्न करणे.

५. आज ब्लोग हे अभिव्यक्तीचे तरुणाईचे महत्वाचे साधन आहे आणि अनेक मराठी ब्लोगलेखक तसेच मराठी संकेतस्थळांवर अत्यंत सातत्याने प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण लिहिणारे अनेक लेखक आहेत. छापील पुस्तके ज्यांची तेच लेखक असे मानायची प्रथा आता कालबाह्य झाली आहे. अशा सर्व लेखकांनाही मराठी साहित्य संस्कृतीत सामावून घेण्याची आणि त्यांना यथोचित सन्मान देण्याची आज गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिलालेख ते ताम्रपट ते हस्तलिखित पोथ्या ते छापील शब्द ते संगणकीय अभिव्यक्ती असा आपण प्रवास केला आहे. विज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे तो वेग पाहता सध्याच्या संगणकांची जागा क्वांटम संगणक घेतील यात शंका नाही. आपल्याला काळाबरोबरच नव्हे तर काळाच्याही पुढे रहावे लागणार आहे. आपल्याला तशी मानसिकता बनवावी लागणार आहे.

६. आज आपण विज्ञानयुगात आहोत पण अखिल भारतीय म्हणवणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुनाट आहे. ती On-Line करावी व सर्वच वाचक/लेखक/पत्रकार/संपादकादिंना मतदान करता यावे यासाठी मी आग्रही तर आहेच पण ते प्रत्यक्षातही आणेल.

आणि हा प्रयत्न आपण सर्वांने मिळून करायचा आहे. एका रात्रीत काही होत नसते. सातत्यपूर्ण प्रयत्न आपण सर्वांनाच मिळून करावे लागतील. मी माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न करीतच आहे आणि भविष्यातही आपणा सर्वांच्या मदतीने करीतच राहील!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...