Tuesday, May 27, 2014

जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल?

विकासाच्या संकल्पना अनेक आहेत. अत्याधुकिकरणाने प्रश्न वाढतात, कमी होत नाहीत असाही मतप्रवाह आहे. गांधीजींचे "खेड्याकडे चला" याचा शब्दश: अर्थ न घेता कृत्रिम गरजा कमी करा आणि संतुलित जीवनाचा आनंद घ्या असा आता घ्यायला हवा. विकास म्हणजे हाव नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबादत राहणे तर नक्कीच नाही. उदा. सर्व खनीजे, कृड सुद्धा ज्या गतेने आम्ही उपसा करत चाललो आहोत त्या गतीने किती वर्ष टिकतील? आमच्या आजपासून चवथ्या वा पाचव्या पिढीला आम्ही काय शिल्लक ठेवणार आहोत?

शेती अतिउत्पादनासाठी रासायनिक बनत चालली आहे. शेत जमीनींचे खारवत नापीक होण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळ-चंद्रावरून आम्ही खनिजे आणु हा कल्पनाविलास ठीक आहे पण वास्तवात ते कितपत व्यवहार्य असेल याचाही विचार करायला हवा. मनुष्य जीवन आनंदासाठी जगतो. आनंदाची-सुखाची आमची नेमकी कोणती व्याख्या आहे? आनंद-सूख या सापेक्ष बाबी असल्याने व्यक्तीपरत्वे त्या बदलतात अथवा बदलवता येतात हे आपण वर्तमान जगातही पाहू शकतो. आनंदाची पुर्ती भौतिक सम्साधनांनी होऊ शकते तशीच साधेपणानेही होऊ शकते. आज भौतिक संसाधनांचा पक्ष प्रबळ आहे हेही वास्तवच आहे.

पण तरीही सूख का नाही? असंतोषच अधिक का आहे? निवदणुकातील निकाल नेमके कोणत्या असम्तोषामुळे लागले? विकासाचा हव्यास हे त्याचे कारण आहे. पण विकास म्हणजे नेमके काय याची व्याख्याही आपल्याला करावी लागेल याचे भान आपल्याला आहे काय? प्रश्न अनेक आहेत. भौतिक प्रगतीने सुखच साधते असे नाही...उलट असंतोष, स्पर्धा आणि मानसिक तणावांचे वर्धनच होते हे थोडा विचार केला तरी लक्षात येईल.

याचा अर्थ भौतिक प्रगती नको असा मुळीच नाही. सर्वांना किमान जगण्याचे साधन मिळालेच पाहिजे याबाबतही दुमत नाही. पण आर्थिक प्रगतीही सापेक्ष असल्याने गरीब वर्ग सापेक्षतया मोठाच राहणार कारण उत्पन्नातील असमानता ही कोणत्याही प्रगतीच्या बिंदुवर असनारच. म्हणजे "गरीबी हटाव" या घोषणा राहणारच. अमेरिकेतही कथित गरीब आहेतच कि! एकीकडे आम्हाला वस्तू स्वस्त हव्यात आणि पगार मात्र वाढते पाहिजेत...कोणत्या अर्थशास्त्रीय नियमांनी असे होऊ शकेल, हे एक कोडेच आहे.

आपल्याला दोहोंत संतुलन कसे साधता येईल, अनावश्यक गरजांच्या मोहापासून दूर राहत जीवनाशी सांधा कसा जुळवता येईल हा खरा प्रश्न आहे.

महात्मा फुलेंचे अर्थविचार

    आधुनिक भारतात आर्थिक विचार महत्वाचा आहे याचे भान निर्माण करणारे पहिले महापुरुष म्हणून महात्मा जोतीराव फुले यांची नोंद घ्यावी तर लागत...