व्यवसायाच्याच निमित्ताने माझ्या चीनसहित अमेरिकेपर्यंतच्या ६-७ वा-या झाल्या. विदेशात गेल्यानंतर नकळत का होईना आपल्या मायभुमीतील वास्तवाची तुलना होतच असते. विदेशातील सारेच काही महान आहे असे मानणा-यांपैकी मी नाही. तिकडेही, अगदी अमेरिकतही लबाड आणि बुडव्या व्यावसायिकांची आणि संधीसाधुंची कमतरता नाही. वरकरणी सुखासीन वाटणा-या अमेरिकनांतही दारिद्र्य नाही असे नाही. इंग्लंडमद्ध्ये चक्क मी एका भिका-याला शंभर पौंडांची भीक घालून खोटे का होईना समाधान मिळवले आहे. अमेरिकेत गुरुवार आला कि "आयम ब्रोक" म्हणनारे महा-कंपन्यांतील कामगार पाहिले आहेत. आपल्या देशातील सर्वच काही वाईट आहे असे मानणा-यांसाठी एवढे सांगुन लेखाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.
मला अमेरिकेत आणि युरोपातील होलंड आणि इंग्लंडमधील आवडलेली बाब म्हणजे उद्योगांचे विकेंद्रीकरण. मी ज्या उद्योगांना भेट दिली त्यांच्या आसपास मला आपल्याकडे दिसते तशी छोट्या-मोठ्या उद्योगांची घनदाट भाऊगर्दी दिसली नाही. जपान-चीनमधील बाबही फारशी वेगळी नव्हती. तेथे मी उद्योग स्थापन करायचे ठरवले तर जागा मिळवणे, कंपनी स्थापन करणे इत्यादी तांत्रिक बाबी अत्यंत सोप्या असलेल्या दिसल्या. परदेशी म्हणून शंभर कागदपत्रांची कोणी मागणी केली नाही. अगदी स्पर्धकाला काही मदत मागितली तर आडपडदा न ठेवता उत्साहाने मदत मिळाली. हे जाउद्या, विमानतळांवरही अत्यल्प जाच. नम्र आणि हसत खेळत सेवा. एखादी माहिती वा रकाना भरला नाही तरी त्याचे विशेष वाटून न घेता हसत "देयर यु गो..." असे म्हनून वाटेला लावत. जपानमधील किस्सा. मी तेथे गेलो १९९८ साली. माझ्याकडे आधीपासुनच मोबाईल होता. तेथे आमचा फुजिया ओशिरो हा वितरक होता. तीन दिवस सलग सकाळी आठ ते रात्री बारा-एकपर्यंत आम्ही बरोबरच असायचो. या कलात मी त्याला मोबाईलवरून बोलतांना एकदाही पाहिले नाहे. मी चक्क गैरसमज करून घेतला. शेवटच्या दिवशी तो मला एयरपोर्टवर सोडायला आला. तेथे आल्यावर तो एक क्षण थांबला...झप्पकन कोटाच्या खिशतून इवले इंस्ट्रुमेंट काढले, पाच-दहा सेकंद काहीतरी बोलला आणि जेवढ्या तत्परतेने ते बाहेर काढले तेवढ्याच तत्परतेने खिशात. मला अक्षरश: लाजल्यासारखे झाले. मी त्याला त्याबदल छेडले असता तो हसत म्हनाला...."यु इंडियन्स आर टाकिंग...टाकिंग अन्ड टाकिंग...व्हेन डु यु वर्क?" आता मी अजुनच लाजलो. माझ्या कार्यालयात फोनच्या पाच लाईन्स असुनही मीही बाहेरुन फोन केला तर सतत एंगेज....
(With Fujia Oshiro in his office)
असो. अनुभव भरपूर आहेत पण वरील अनुभवांच्या संदर्भात आपल्याला आपल्या अवस्थेची चर्चा करायची आहे.
मी सामाजिक जीवनात आल्या दिवसापासून एकच प्रचार करत आहे तो म्हनजे विकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा. आज भारताची अर्थव्यवस्था वाढती असली तरी तिच्या केंद्रीकरणामुळे अत्यंत विषम वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. मुंबई, पुणे, औरंगाबाद ते कोल्हापूर अशी पश्चिम महाराष्ट्रातील शहरे उद्योग-व्यवसायांच्या अतिरेकी केंद्रीकरणामुळे अक्षरशा: बकाल बनत आहेत तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ मात्र उद्योग नाहीत म्हणून बकाल बनत चालले आहेत. पुण्या-मुंबईतच स्थापन होऊ शकतील असे खरे तर किती उद्योग आहेत? ज्या कारणांनी पुणे - मुंबईचे आकर्षण व्यावसायिकांना वाटते तशीच कारणे आम्हाला विखरून का निर्माण करता आली नाहीत? थोडक्यात उद्योगव्यवसायांचे संतुलित असे वितरण का करता आले नाही? तशी मानसिकता आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करायला हवी, कोणत्याही प्रकारचा बकालपणा हा आर्थिकच नव्हे तर सामाजिक अवनतीलाही कारण ठरतो यावर आमच्या तज्ञांनी व शासनाने का विचार केला नाही?
बरे, ही झाली एक बाब. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हनजे शेती हा अजुनही भारतीय अर्थव्यवस्थेचा व ५५% जनजीवनाचा मुख्य आधार आहे हे लक्षात घेऊन शेतीमालाधारित लघू ते मध्यम उद्योग, अगदी खेडोपाडीही काढण्यासाठी का उत्तेजन दिले गेले नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारतात आजही ३०% फळ-भाजीपाला पुरेशा साठवणुकीच्य साधनांचा अभाव, वाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे वाया जातो. निर्जलीकरणासारख्या वा अन्य खाद्योद्योगांच्या सोप्या तंत्रज्ञानाच्या पद्धती आम्ही ग्रामीण शाळा-कोलेजांमधून अभ्यासक्रमातुनच जर शिकवल्या असत्या तर दोन बाबी नक्कीच झाल्या असत्या. शेतमाल म्हणजे राष्ट्रीय साधनसंपत्तीच आहे. ती वाया जाण्यापासून वाचली असती. मुल्यवर्धकता आली असती. आणि ग्रामीण तरुणांना रोजगारही स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले असते. होलंड व इंग्लंडमध्ये मी अनेक अत्यंत छोट्या ते बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. मांस-मासळीपासुन ते भाजीपाल्यांचे निर्जलीकरण कसे केले जाते हे पाहिले. आपल्याकडे उन्हात वाळवण्याची कला आहे. सुक्या मासळीची एकटी देशांतर्गत बाजारपेठच १७ हजार कोटींची आहे. जगभर मागणी आहे. परंतू सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाशीही आम्ही आमच्या नागरिकांना ओळख करून दिली नाही. त्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण व किनारपट्ती भागात वाढत चाललेली बेसुमार बेरोजगारी.
म्हणजेच विकेंद्रीकरण, कि ज्यायोगे लोकसंख्याही योग्य प्रमाणात वितरीत होईल, पाणी ते वीज यासारख्या मुलभूत सुविधांवर आज पडलाय तसा अतिरेकी ताण पडनार नाही आणि घरापासून ते जमीनींच्या किंमतीही आटोक्यात राहतील. आजवर आम्ही ते केले नाही. आतातरी ते करण्याची गरज आहे.
दुसरे म्हणजे पंतप्रधानांनी १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प सोडला आहे. या नव्या शहरांची गरज नाही तर अविकसीत भागांतील निवडक शहरे "स्मार्ट" बनवण्याची गरज आहे. अशा शहरांना सर्व पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील हे पाहण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन उद्योगांना परवानग्या देण्याचे थांबवले पाहिजे, लोकसंख्येचा ताण आता पुढे किमान वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. प्रगत देशांनी आपल्या प्रत्येक संसधनांचा व्यावसायिक वापर अत्यंत कुशलतेने केला आहे. विकेंद्रीकरणाचे धोरणही राबवले आहे. ते आपल्याला जमलेले नाही. ते आता तरे जमायलाच हवे.
दुसरी बाब म्हणजे भारतीय आपल्या कामात आनंद मानतात का कि केवळ दिवसाचे तास कसेबसे भरायचे आणि घरला पळायचे असा उद्योग करतात? म्हणजे भारतीय कामचुकार आहेत काय? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येईल. विमानतळांवरही हसतमूख स्त्री-पुरुष कर्मचारी मला दिसलेले नाहीत. मक्ख आणि वैतागवाने चेहरे. जणू ते प्रवाशांवर उपकार करत आहेत. कधी ड्युटीचे तास संपताहेत आणि बाहेर पडतो असे त्यांना झाले आहे. इतरत्र स्थिती काय आहे? फेसबुक आणि ब्लोगवरील हजर सदस्यांची संख्या खरे तर सुट्टीच्या दिवशी असायला हवी. प्रत्यक्षात आपल्याकडे उलटे होते. सोमवार ते शुक्रवार, सकाळी अकरा ते सहा येथे उदंड रिकामटेकडेच वाटावेत एवढे "कर्मचारीच" हजर असतात...सुट्टीच्या दिवशी मात्र ही संख्या कमी असते. मग फुजियो ओशिरोचा प्रश्न आठवतो...तुम्ही मग काम कधी करता? कामात कधी रमता कि नाही? तसे असेल तर तुमची नेमकी उत्पादकता काय? ज्ञान वर्धिष्णू ठेवण्यासाठी काय करता?
आपल्याकडे श्रमसम्स्कृती जशी लयाला जात आहे तशीच कामावरची प्रीतही हरवत चालले आहे. आधुनिक साधने ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी असतात, घटवून घेण्यासाठी नाही याचे भान आपली कार्य संस्कृती देत नाही...शिक्षणव्यवस्थाही देत नाही हे आपले दुर्दैव आहे.
मग नवीन संशोधने, नवीन कौशल्यांचा विकास, कार्यपद्धतीबाबत नवे प्रयोग कसे होणार? उलट एकुणातील कार्यक्षमता कमी होत मालकांचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते आहे याचे भान आपल्याला उशीरा का होईना यायला पाहिजे.
सर्व बाबींवर शासनावर अवलंबून रहायची दुर्दैवाने भारतीय समाजाला सवय लागली आहे. आरक्षणाचे भूत सर्व जातींच्या मानगुटीवर जे बसलेय ते आपल्या समाजाच्याच एकुणातल्या नाकर्त्या मानसिकतेमुळे. आज जी प्रगती होते आहे तिने दिपून जात स्वता:च्या कोषात अडकण्याचे कारण नाही. आताची प्रगती हा एक फुगा आहे जो अजुन दहा-पंधरा वर्ष फार तर टिकेल. परकीय गुंतवणूकीचे एक चक्र असते. ते सुरुवातीला एतद्देशियांना फायद्याचे वाटले तरी ते एका क्षणी उलटे फिरु लागते व तोट्याची स्थिती येते. भारतीय हा तोटा गृहित धरून आतापासुनच पर्यायी अर्थव्यवस्थेचे तत्वज्ञानही कसे विकसीत करतात त्यावर आपली शाश्वत प्रगती अवलंबून आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
आपली मानसिकता हाच कोणत्याही बदलाचा मुलाधार असतो. साधने आसपास असतातच. ती शोधत त्यांचा कुशलतेने वापरु शकणारेच अर्थव्यवस्थेचे खरे चालक असतात. आपण मात्र चालक होण्याऐवजी व्यवस्थेच्या लोंढ्यात हाती येईल ते पळवत व्यवस्थेचा फायदा होतो आहे असा जेंव्हा आभास निर्माण करतो तेंव्हा या लोंढ्यात हाती काहीच लागू शकणारे अगणित असतात आणि ते शेवटी अगतीकतेच्या, पराभूत मानसिकतेच्या दुश्चक्रात अडकत जातात याचेही भान ठेवायला हवे.
ज्या देशात प्रागतिक लोक राहतात तेच देश प्रगत होतात...
आपण जोवर आपला समाजच प्रागतिक मनोवृत्तीचा बनवत नाही, तशी समाज-मानसिकता बनवत नाही, तोवर प्रगत देशांशी नुसती तुलना करून तरी काय होणार?
मला अमेरिकेत आणि युरोपातील होलंड आणि इंग्लंडमधील आवडलेली बाब म्हणजे उद्योगांचे विकेंद्रीकरण. मी ज्या उद्योगांना भेट दिली त्यांच्या आसपास मला आपल्याकडे दिसते तशी छोट्या-मोठ्या उद्योगांची घनदाट भाऊगर्दी दिसली नाही. जपान-चीनमधील बाबही फारशी वेगळी नव्हती. तेथे मी उद्योग स्थापन करायचे ठरवले तर जागा मिळवणे, कंपनी स्थापन करणे इत्यादी तांत्रिक बाबी अत्यंत सोप्या असलेल्या दिसल्या. परदेशी म्हणून शंभर कागदपत्रांची कोणी मागणी केली नाही. अगदी स्पर्धकाला काही मदत मागितली तर आडपडदा न ठेवता उत्साहाने मदत मिळाली. हे जाउद्या, विमानतळांवरही अत्यल्प जाच. नम्र आणि हसत खेळत सेवा. एखादी माहिती वा रकाना भरला नाही तरी त्याचे विशेष वाटून न घेता हसत "देयर यु गो..." असे म्हनून वाटेला लावत. जपानमधील किस्सा. मी तेथे गेलो १९९८ साली. माझ्याकडे आधीपासुनच मोबाईल होता. तेथे आमचा फुजिया ओशिरो हा वितरक होता. तीन दिवस सलग सकाळी आठ ते रात्री बारा-एकपर्यंत आम्ही बरोबरच असायचो. या कलात मी त्याला मोबाईलवरून बोलतांना एकदाही पाहिले नाहे. मी चक्क गैरसमज करून घेतला. शेवटच्या दिवशी तो मला एयरपोर्टवर सोडायला आला. तेथे आल्यावर तो एक क्षण थांबला...झप्पकन कोटाच्या खिशतून इवले इंस्ट्रुमेंट काढले, पाच-दहा सेकंद काहीतरी बोलला आणि जेवढ्या तत्परतेने ते बाहेर काढले तेवढ्याच तत्परतेने खिशात. मला अक्षरश: लाजल्यासारखे झाले. मी त्याला त्याबदल छेडले असता तो हसत म्हनाला...."यु इंडियन्स आर टाकिंग...टाकिंग अन्ड टाकिंग...व्हेन डु यु वर्क?" आता मी अजुनच लाजलो. माझ्या कार्यालयात फोनच्या पाच लाईन्स असुनही मीही बाहेरुन फोन केला तर सतत एंगेज....
(With Fujia Oshiro in his office)
असो. अनुभव भरपूर आहेत पण वरील अनुभवांच्या संदर्भात आपल्याला आपल्या अवस्थेची चर्चा करायची आहे.
मी सामाजिक जीवनात आल्या दिवसापासून एकच प्रचार करत आहे तो म्हनजे विकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा. आज भारताची अर्थव्यवस्था वाढती असली तरी तिच्या केंद्रीकरणामुळे अत्यंत विषम वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. मुंबई, पुणे, औरंगाबाद ते कोल्हापूर अशी पश्चिम महाराष्ट्रातील शहरे उद्योग-व्यवसायांच्या अतिरेकी केंद्रीकरणामुळे अक्षरशा: बकाल बनत आहेत तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ मात्र उद्योग नाहीत म्हणून बकाल बनत चालले आहेत. पुण्या-मुंबईतच स्थापन होऊ शकतील असे खरे तर किती उद्योग आहेत? ज्या कारणांनी पुणे - मुंबईचे आकर्षण व्यावसायिकांना वाटते तशीच कारणे आम्हाला विखरून का निर्माण करता आली नाहीत? थोडक्यात उद्योगव्यवसायांचे संतुलित असे वितरण का करता आले नाही? तशी मानसिकता आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करायला हवी, कोणत्याही प्रकारचा बकालपणा हा आर्थिकच नव्हे तर सामाजिक अवनतीलाही कारण ठरतो यावर आमच्या तज्ञांनी व शासनाने का विचार केला नाही?
बरे, ही झाली एक बाब. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हनजे शेती हा अजुनही भारतीय अर्थव्यवस्थेचा व ५५% जनजीवनाचा मुख्य आधार आहे हे लक्षात घेऊन शेतीमालाधारित लघू ते मध्यम उद्योग, अगदी खेडोपाडीही काढण्यासाठी का उत्तेजन दिले गेले नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारतात आजही ३०% फळ-भाजीपाला पुरेशा साठवणुकीच्य साधनांचा अभाव, वाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे वाया जातो. निर्जलीकरणासारख्या वा अन्य खाद्योद्योगांच्या सोप्या तंत्रज्ञानाच्या पद्धती आम्ही ग्रामीण शाळा-कोलेजांमधून अभ्यासक्रमातुनच जर शिकवल्या असत्या तर दोन बाबी नक्कीच झाल्या असत्या. शेतमाल म्हणजे राष्ट्रीय साधनसंपत्तीच आहे. ती वाया जाण्यापासून वाचली असती. मुल्यवर्धकता आली असती. आणि ग्रामीण तरुणांना रोजगारही स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले असते. होलंड व इंग्लंडमध्ये मी अनेक अत्यंत छोट्या ते बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. मांस-मासळीपासुन ते भाजीपाल्यांचे निर्जलीकरण कसे केले जाते हे पाहिले. आपल्याकडे उन्हात वाळवण्याची कला आहे. सुक्या मासळीची एकटी देशांतर्गत बाजारपेठच १७ हजार कोटींची आहे. जगभर मागणी आहे. परंतू सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाशीही आम्ही आमच्या नागरिकांना ओळख करून दिली नाही. त्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण व किनारपट्ती भागात वाढत चाललेली बेसुमार बेरोजगारी.
म्हणजेच विकेंद्रीकरण, कि ज्यायोगे लोकसंख्याही योग्य प्रमाणात वितरीत होईल, पाणी ते वीज यासारख्या मुलभूत सुविधांवर आज पडलाय तसा अतिरेकी ताण पडनार नाही आणि घरापासून ते जमीनींच्या किंमतीही आटोक्यात राहतील. आजवर आम्ही ते केले नाही. आतातरी ते करण्याची गरज आहे.
दुसरे म्हणजे पंतप्रधानांनी १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प सोडला आहे. या नव्या शहरांची गरज नाही तर अविकसीत भागांतील निवडक शहरे "स्मार्ट" बनवण्याची गरज आहे. अशा शहरांना सर्व पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील हे पाहण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन उद्योगांना परवानग्या देण्याचे थांबवले पाहिजे, लोकसंख्येचा ताण आता पुढे किमान वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. प्रगत देशांनी आपल्या प्रत्येक संसधनांचा व्यावसायिक वापर अत्यंत कुशलतेने केला आहे. विकेंद्रीकरणाचे धोरणही राबवले आहे. ते आपल्याला जमलेले नाही. ते आता तरे जमायलाच हवे.
दुसरी बाब म्हणजे भारतीय आपल्या कामात आनंद मानतात का कि केवळ दिवसाचे तास कसेबसे भरायचे आणि घरला पळायचे असा उद्योग करतात? म्हणजे भारतीय कामचुकार आहेत काय? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येईल. विमानतळांवरही हसतमूख स्त्री-पुरुष कर्मचारी मला दिसलेले नाहीत. मक्ख आणि वैतागवाने चेहरे. जणू ते प्रवाशांवर उपकार करत आहेत. कधी ड्युटीचे तास संपताहेत आणि बाहेर पडतो असे त्यांना झाले आहे. इतरत्र स्थिती काय आहे? फेसबुक आणि ब्लोगवरील हजर सदस्यांची संख्या खरे तर सुट्टीच्या दिवशी असायला हवी. प्रत्यक्षात आपल्याकडे उलटे होते. सोमवार ते शुक्रवार, सकाळी अकरा ते सहा येथे उदंड रिकामटेकडेच वाटावेत एवढे "कर्मचारीच" हजर असतात...सुट्टीच्या दिवशी मात्र ही संख्या कमी असते. मग फुजियो ओशिरोचा प्रश्न आठवतो...तुम्ही मग काम कधी करता? कामात कधी रमता कि नाही? तसे असेल तर तुमची नेमकी उत्पादकता काय? ज्ञान वर्धिष्णू ठेवण्यासाठी काय करता?
आपल्याकडे श्रमसम्स्कृती जशी लयाला जात आहे तशीच कामावरची प्रीतही हरवत चालले आहे. आधुनिक साधने ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी असतात, घटवून घेण्यासाठी नाही याचे भान आपली कार्य संस्कृती देत नाही...शिक्षणव्यवस्थाही देत नाही हे आपले दुर्दैव आहे.
मग नवीन संशोधने, नवीन कौशल्यांचा विकास, कार्यपद्धतीबाबत नवे प्रयोग कसे होणार? उलट एकुणातील कार्यक्षमता कमी होत मालकांचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते आहे याचे भान आपल्याला उशीरा का होईना यायला पाहिजे.
सर्व बाबींवर शासनावर अवलंबून रहायची दुर्दैवाने भारतीय समाजाला सवय लागली आहे. आरक्षणाचे भूत सर्व जातींच्या मानगुटीवर जे बसलेय ते आपल्या समाजाच्याच एकुणातल्या नाकर्त्या मानसिकतेमुळे. आज जी प्रगती होते आहे तिने दिपून जात स्वता:च्या कोषात अडकण्याचे कारण नाही. आताची प्रगती हा एक फुगा आहे जो अजुन दहा-पंधरा वर्ष फार तर टिकेल. परकीय गुंतवणूकीचे एक चक्र असते. ते सुरुवातीला एतद्देशियांना फायद्याचे वाटले तरी ते एका क्षणी उलटे फिरु लागते व तोट्याची स्थिती येते. भारतीय हा तोटा गृहित धरून आतापासुनच पर्यायी अर्थव्यवस्थेचे तत्वज्ञानही कसे विकसीत करतात त्यावर आपली शाश्वत प्रगती अवलंबून आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
आपली मानसिकता हाच कोणत्याही बदलाचा मुलाधार असतो. साधने आसपास असतातच. ती शोधत त्यांचा कुशलतेने वापरु शकणारेच अर्थव्यवस्थेचे खरे चालक असतात. आपण मात्र चालक होण्याऐवजी व्यवस्थेच्या लोंढ्यात हाती येईल ते पळवत व्यवस्थेचा फायदा होतो आहे असा जेंव्हा आभास निर्माण करतो तेंव्हा या लोंढ्यात हाती काहीच लागू शकणारे अगणित असतात आणि ते शेवटी अगतीकतेच्या, पराभूत मानसिकतेच्या दुश्चक्रात अडकत जातात याचेही भान ठेवायला हवे.
ज्या देशात प्रागतिक लोक राहतात तेच देश प्रगत होतात...
आपण जोवर आपला समाजच प्रागतिक मनोवृत्तीचा बनवत नाही, तशी समाज-मानसिकता बनवत नाही, तोवर प्रगत देशांशी नुसती तुलना करून तरी काय होणार?