Thursday, January 29, 2015

भाषेचे मूळ


पुरा-इतिहासातील काही बाबी गंमतीशीर आहेत. उदाहरणार्थ भाषेची जाण उपजत असल्याने प्रत्येक माणसाने पुरातन काळीच एकतर स्वत: नवीन ध्वनी, शब्द, अर्थपुर्ण शब्द याची रचना केलीय व आपापल्या टोळीसमुहातील सांगातींशी त्यांच्या रचनांना आदानपुर्वक नवीन रुपे दिलीत. अर्थ दिलाय. अर्थ हा व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. अर्थ हा  नेहमीच, व्यक्तिपरत्वे परिमाणे, तीव्रता बदलली तरी सामुदायिकच असतो. शब्द निर्मिती कदाचित व्यक्तिगत असू शकते, अर्थनिर्मिती मात्र सामुदायिक बाब असते.

बरे, साठ -सत्तर हजार वर्षांपुर्वी माणुस कसा होता? त्याचे सामुदायिक जीवन कसे होते? त्या काळी माणूस टोळ्यांनी अन्नाच्या शोधात भटकत असे हे सर्वमान्य आहे. निएंडरथल माणुस सम्मिश्रणाने म्हणा कि त्याहून वेगळी विकसीत आजच्या माणसाच्या पुर्वजाची होमो सेपियन जात अवतरली म्हणून म्हणा, लयाला गेला. हे खरे असले तरी त्यालाही बोलता येत होते असे त्याच्व्ह्या अवशेषांवरुन आधुनिक मानवशास्त्र मान्य करते. मग तीच क्षमता होमो सेपियन्समद्धे होती हे अमान्य करायची आवश्यकता नाही.

बरे, त्याच्यात बोलायची क्षमता होती म्हणजे काय? तर त्याला बोलण्यासाठी आवश्यक असलेली गळ्यातील व्होकल कोर्डची रचना त्याच्यात अंतर्भुत होती. आता आवाज...विविध ध्वनी निर्माण करण्याची यंत्रणा असली कि विविध ध्वनींना त्याने विविध अर्थ देणे, निसर्गातील अनेकविध आवाजांची नक्कल करत त्या आवाजांवरुन ते आवाज निर्माण करणा-या प्राण्यांना ओळखणे. त्यांना त्याच नांवावर आधारीत नांवे देणे ही प्रारंभिक प्रक्रिया माणसाच्या उदयकाळाच्या लगोलग सुरु झाली असणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा जगण्यासाठी लागणा-या घडामोडींचे वर्णन करणारे शब्द आधी निर्माण होणे स्वाभाविक आहे.

बरे, शब्द आणि अर्थ एकाच टोळीत निर्माण झाले असतील काय? तेवढी क्षमता मानसाला अजून विकसीत करायची होती. त्या काळात टोळ्या अन्नाच्या आणि शिकारीच्या शोधात भटकत असत. या भटकंतीत अन्य टोळ्याही संपर्कात येणे स्वाभाविक आहे. सर्वच टोळ्या एकमेकांशी संघर्ष व लढाया करत असत्या तर आज मुळात पृथ्वीतलावर माणूस शिल्लकच राहिला नसता. म्हणजेच परस्परसहकार्य, संघर्ष, लढाया, तटस्थपना हे सर्व गूण सर्वच टोळ्या परस्पर संपर्कात आल्यावर वापरणे स्वाभाविक होते. हे घडत असतांना आद्य काले ते एकमेकांत संवाद कसा करत असतील? संतापाचे-द्वेषाचे शब्द जसे वापरले जात असतील तसेच प्रेमाचे-स्नेहाचे शब्दही वापरले जात असतील. एकमेकांचे स्व-विकसीत शब्द जसे स्विकारले जात असतील तसेच दिले जात असतील. याला आपण शब्दसांस्कृतिक विनिमय म्हणु शकतो. भले तो रागाने असो कि प्रेमाने असो.

शब्दसमूह हा असा विकसीत होत जाणे स्वाभाविक आहे. बरे हा विकास, शब्द जसा एकाने उच्चारिला तसाच्या तसा दुसरे स्विकारतात असे नाही. प्रत्येकाचे शब्दोच्चार सामर्थ्य हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. आकलनावरही आहे. आणि तोच शब्द पुढच्या पिढ्या वेगळ्या वातावरणात, परिप्रेक्षात कसा अर्थ लावत कसा उच्चारितात हेही अनेक सापेक्ष बाबींवर अवलंबून आहे. पुन्हा असा अर्थबदल/उच्चारबदल झालेला शब्द पुन्हा अनेक ठिकाणी, टोळ्यांच्या भिन्न ठिकाणी भिन्न परिप्रेक्षात संक्रमित होतच राहिल्यामुळे, मूळ शब्द (म्हणजे आपण आता त्याला धातू म्हणू किंवा मूळ म्हणजे रुट म्हणू) जरी मुलभुत स्वरूप टिकवून असला तरी त्याचे अर्थसंदर्भ, उच्चारसंदर्भ आणि गर्भितार्थ तसेच राहतील याची शाश्वती नाही.

आद्य काळात भाषा नव्हती. कारण व्याकरण नव्हते. केवळ ध्वनी, काही शब्द आणि हावभाव होते. ही शाब्दिक संपत्ती देवाणघेवाणीनेच वाढत राहिली. गरजेतून नवीन शब्द किंवा ध्वनीही निर्माण केले गेले. विशेषत: धार्मिक संदर्भात काही ध्वनी कसे गुढ मानले गेले हे आपण पाहू शकतो. टोळीजीवन हे मुलत: टोळी अस्मिता आणि शुभाशूभ संकल्पनांशी निगडित होते.  टोळीची ओळख म्हणून देवके अथव टोटेम्स आली. शुभाशूभ संकल्पनांमुळे पवित्र विरुद्ध अपवित्र अशी आपसूक इष्टानिष्टाची वाटणी झाली. वाईटाला नांव दिले गेले तसेच चांगल्यालाही. ही विकासशिलता काही हजार वर्षांची आहे. ही चांगल्या-वाईटाची नांवे वेगवेगळ्या अर्थांनी, समजुतींनी आणि स्वतंत्र दैवत/दानवकथांनी विविध टोळ्यांत स्विकारली गेली. आदानप्रदानाने वैभव प्राप्त करत गेली. असूर व देव हा शब्द अनेक संस्कृत्यांत वेगवेगळ्या ध्वनीछटांसह व अर्थबदलांसहही आढळतात याचे कारण हे वाटप फार फार पुर्वीच झालेले होते.

परंतू माणुस पशुपालक बनला तसा त्याच्या संस्कृतीचा पहिला टप्पा सुरु झाला. शब्दांना व्याकरण याच काळात गरजेचे झाले. जीवनव्यवहार फक्त जगण्यापुरता न उरता त्यापारच्या दैवतशास्त्रावरही तर गेलाच पण स्वामित्वाच्या नैसर्गिक भावनांना वाट करून देणारा ठरला.

या टोळ्या भटक्या होत्या हे खरे आहे. परंतू या टोळ्यांचे आधीचे अमर्याद क्षेत्रांत असणारे भटकेपण चाळीस हजार वर्षांपुर्वीच आपापल्या ज्ञात क्षेत्रांपर्यंत झाले. प्रादेशिक जाण तेंव्हाच निर्माण झाली. चिपांझ्यांतही ती असते, ते आपापली क्षेत्रे ठरवून घेतात आणि सीमांवर राखणही करत असतात. प्राण्यांमद्ध्ये असलेली ही जाण माणसांतही नसेल तरच नवल!

थोडक्यात शिकारी माणूस भटका असला तरी त्याची भटकंती स्वत:च्या ज्ञान भुगोलापर्यंत मर्यादित झाली. तत्पुर्वी जमा झालेल्या स्वस्विकृत (उधारी) आणि स्वनिर्मित शब्द/व्याकरण भांडवलावर त्याची स्वत:ची भाषा विकसीत होवू लागली. त्याची संस्कृती ही कधी स्वनिर्मित तर कधी अनुकरणातून निर्माण होवू लागली. अलंकार, दगडी हत्यारे, कातड्यांची वस्त्रे, गुहा-निवारे, दफनाच्या पद्धती ते तात्कालिक वसाहती यातून जगभर ही आद्य संस्कृती निर्माण झालेली दिसते.

या आद्य संस्कृतीचा प्रसार कसा झाला? ती कोणा एका टोळीने निर्माण केली होती कि ती जागतिक सामुदायिक प्रक्रिया होती? प्रसार झाला असेल तर कोठुन कोठे आणि नेमका कसा हे समजायला आप्ल्याकडे नेमकी कोणती साधने आहेत? एकाच काळात वेगवेगळ्या द्फनपद्धती का सापडतात? वेगवेगळी मृद्भांडी का सापडतात? मृद्भांडी बनवायची कला कोणी शोधली? उत्तरेतील कि दक्षीणेतील लोकांनी? युरोपातील कि आशियातील लोकांनी? हे मुर्ख प्रश्न आहेत कारण मुळात त्यांना उत्तरच असू शकत नाही. कोणतेही बाब कोठेही, कोणत्याही तथाकथित भाषिक टोळीत शोधली गेलेली असू शकते आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतींनी अनुकरण, उपयुक्तता लक्षात घेउंन, केले जाउ शकते. आजही ते होते. गरजा पुर्ण करण्याची साधने कोणी तरी शोधते व झपाट्याने ती पसरतात, स्थानिक कच्चा माल व आवडी यानुसार त्यांची वेगवेगळी प्रारुपे अवतरतात.

त्यात वावगे काही नाही.

आता लाल भांडी, काळी भांडी कि तपकीरी भांडी आनि ती कोणत्या संस्क्रुतीची यावरचा वाद मात्र विनोदी आहे. जणू काही भांडी बनवयची पद्धत बदलली कि नक्कीच तेथे कोणी अन्य प्रभावी मानवगट आला पाहिजे ही धारणा! आहे त्या मानवी समुदायांत नाही आवडी-निवडी-उत्पादनपद्धती बदलू शकत? कोणाचे तरी अनुकरण नसू का शकत? आज ते होत नाही काय? मग आदिम काळात अशा पद्धती बदलल्या, त्यांच्या धर्मकल्पनांत फरक पडला, सुधारणा झाली म्हनून दफनपद्धती बदलल्या असतील असा विचार आम्ही का नाही करत?

आम्ही तसा विचार करत नाही कारण आम्ही आमच्या पुरातन पुर्वजांच्या वर्तनांतून आम्हाला हवा तसा इतिहास शोधत आमचे वर्चस्ववादी सिद्धांत लागू करू पाहतो.

असो. भाषांचे नेट (जाळे) कसे बनते? परस्पर-संबब्ध भुभागांतील लोकांच्या भाषांत काही शब्द समान असणे, व्याकरणात कोठेतरी ताळमेळ असणे यात नवल नाही. समान भूगोल असतांनाही काही भाषांत अंतराय असणे, विभेद असणे, अगदी वेगळा भाषिक गट असणे वा वाटने हेही स्वाभाविक आहे. भारतातील उत्तरेतील भाषा आणि दक्षीणेतील भाषा हे याचे व्यापक  उदाहरण तर खुद्द उत्तर भारतात अस्तित्वात असलेल्या उरांउ, मुंडा, कोल वगैरे अत्यंत वेगळ्या भाषाही येथे एक उदाहरण म्हणून घेता येतील.

पण हा भेद का आहे? हा भेद एखादा मानवी समूह अन्य मानवी समुहांपासून आपापल्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक संकल्पना जतन करण्यासाठी जाणीवपुर्वक अन्य मानवी समुदायांपासुन दूर राहिला तर काय होईल? नागरी संस्कृती आणि परंपरागत आदिम संस्कृतीचे चाहते यात हा भेद राहणारच. म्हणजेच त्यांची संस्कृती भाषिक संस्कृतीसह वेगळी राहणार हे उघड आहे. आदिवासींची भाषा ही आदिम (प्रोटॊ) असते कारण आपल्या भाषेत, मर्यादित गरजा असल्याने, विशेष विकासाची गरज त्यांना भासत नाही. उत्तर-दक्षीण भाषांचे जे गट पडले आहेत त्याला भौगोलिक कारणेच अधिक आहेत. अन्यथा तथाकथित इंडो-आर्यन लोकांच्या भाषांचा गेल्या साडेतीन हजार वर्षांत प्रभाव पडत त्या आर्यन गटाच्या उपभाषा झाल्या असत्या.

भाषेचे मूळ कोणी बदलत नाही. त्याचे स्वरूप बदलत नाही. भाषा प्रवाही असतात हे खरे पण त्याचा मूळ गाभा आदिमच असतो. आक्रमकही फारतर भाषेचे वरकरणी स्वरुप बदलू शकतात. सतराव्या शतकातील शासकीय मराठी ही फारशीने प्रभावित असली तरी ती मराठीच आहे हे आपल्याला कळते. शब्दार्थ बदलतात. शब्दही बदलत जातात. पण मुळ गाभा बदलत नाही. जगभर हे झालेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीने.

मराठी भाषा संस्कृतातून निघाली कि संस्कृत मराठीतून निघाली, कि संस्कृत पालीतून विकसीत झाले कि शौरसेनीतून कि गांधारीतून? खरे तर हे कोणताही भाषाविद सांगू शकनार नाही, कारण भाषा ही जशी मानवी समुदायाची उपजत निकड आहे, तशीच तो जो भौगोलिक क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राचीही. राहुरकर म्हणतात, आधी भाषा प्राकृतच असते, परंतू काव्य, साहित्य यासाठी शब्दांना अधिक परिष्कृत केले जाते. तिलाच आपण संस्कृत म्हणतो. शुद्ध भाषा सर्वात आधी कालत्रयी अवतरू शकत नाही. भाषांची सुरुवातच मुळात मोडकी-तोडकी आणि प्रदिर्घ काळात विकसनशील होत जाते. त्यात समान भुगोल असलेल्या भागांतील सांस्कृतिक नव्य शोधांची देवाण-घेवाणही होत जाते.

भाषा ही आक्रमक लादू शकत नाहीत (स्थानिक भाषांच्या संदर्भात) हे भारताने गेल्या साडेआठशे वर्षांचा गुलामीनेही पाहिले आहे. वरकरणी बदल कोणत्याही भाषेचा आत्मा बदलत नाहीत. त्याला आपण सांस्कृतिक जेनेटिक्स म्हणू शकतो. भाषिक उत्क्रांती ही सातत्याने होणारी बाब असते. शब्दांचा एका संस्कृतीकडून दुसरीकडे प्रवास अनेक कारणांनी होवू शकतो. विशेषत: तांत्रिक शब्द, नात्यांची संबोधने, झाडा-झुडपांची नांवे ई. ही सर्वस्वी स्वतंत्र निर्मिती नसते.

आणि म्हणूनच इंडो-युरोपियन भाषागटाचा अथवा सेमेटिक भाषा गटांचा सिद्धांत कोणा मुळ टोळ्यांच्या कोठूनतरी कोठेतरी विखुरण्याला देता येत नाही. भाषांचे सातत्यपुर्ण परिवर्तन मान्य असले तरी त्याचे क्रेडीट एखाद्याच विस्थापित मानवी समुदायाला देणे म्हणजे अकलेचे दिवाळे काढणे होय!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...