शुध्दोदन आहेर यांनी लिहिलेल्या माझ्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या पुस्तकाचे समिक्षण महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये प्रसिद्ध झाले आहे. या परिक्षणातील काही निरिक्षणांमुळे माझ्या मित्रांमद्धे काही संभ्रम निर्माण झाला आहे. पहिली बाब अशी कि अफगाणिस्तानाजवळ वैदिक धर्म स्थापन झाला असे आहेर यांनी म्हटले आहे.मी पुस्तकात दक्षीण अफगाणिस्तान हा ऋग्वेदनिर्मितीचा भुगोल आहे व तो गांधारच्या पश्चिमेचा भाग आहे असे अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे.
दुसरे असे कि वैदिक धर्म भारतात धर्मप्रचारकांमुळे पसरला हे माझे मत त्यांना मान्य नसावे असे दिसते. आर्य अथवा वैदिक टोळ्या भारतात पसरुन त्यांनी धर्म, वर्ण, जाती लादल्या असाव्यात असा त्यांचा तर्क असू शकतो. प्रत्यक्षात मुळात या अनुमानाला पुरावे नाहीत. शतपथ ब्राह्मणातील अवशिष्ट मिथ्थकथा (विदेघ माथवाची) काही प्रचारक सरस्वती (हरर्क्स्वैती) नदीपासून सदानीरा नदीपर्यंत पुर्वेला "अग्नी" (वैदिक धर्म) घेऊन आले याचा स्पष्ट निर्देश करते. धर्मप्रसारासाठी त्या धर्माच्या सर्वलोकांचे स्थलांतर आवश्यक नाही. बौद्ध धर्म प्रव्चारकांमार्फतच अन्यत्र पोहोचला हे उदाहरण आपल्या समोर आहेच. मी हे पुस्तकात सविस्तर दाखवले आहेच. शिवाय ब्भारतीय-अभारतीय य सीमा आजच्या राजक्जीय भुगोलाच्या परिप्रेक्षात पहता येणार नाहीत हेही लक्षात ठेवावे लागते.
आहेर यांनी मी या पुस्तकात जातीसंस्थेच्या उगमाबद्दल मौन पाळलेले आहे. हे खरेच आहे. कारण आजच्या स्वरुपातील जन्माधारित जातीसंस्था भारतात मुळात इसवेसनाच्या दहाव्या शतकापुर्वी अस्तित्वातच नव्हती हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवुन दिले आहे. वैदिकांची वर्ण व्यवस्था होती व तीनच वर्ण वैदिक धर्मीय होते. शूद्र हा वर्ण नव्हता तर ते एतद्देशियांना दिलेले संबोधन होते. शूद्र या शब्दाची कोणतीही व्युत्पत्ती नाही. हा शब्द कदाचित एखाद्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा हे मी मेल्लुहाचा (मेलुखा)संस्कृत अपभ्रंण्श "म्लेंच्छ" या शब्दावरुन दाखवुन दिलेले आहे. शुद्रांचा धर्म लिंगपुजाप्रधान/मुर्ती/प्रतिमापुजक होता तर वैदिकांचा धर्म यज्ञप्रधान होता. वैदिक आरंभीच्या प्रचारकाळातील साहित्यात (ब्राह्मण ग्रंथ व यजुर्वेदात) शूद्र हा शब्द अवमानार्थक येत नाही हेही मी दाखवून दिले आहे. येथील बव्हंशी वैदिक धर्मिय धर्मांतरीत आहेत त्यामुळेच वैदिक धर्मियांत विविध प्रादेशिक आनुवांशिकी व भाषागटाचे लोक आहेत.
त्या काळात शुद्रांची जातीसंस्था ही व्यवसायसंस्था प्रधान व परिवर्तनीय-लवचीक होती. ती अन्याय्य नव्हती. ती अपरिवर्तनीय बनली ती दहाव्याशतकानंतर. त्यामुळे आजच्या जातिसंस्थेची मुळे वैदिक प्रचारक भारतात आले त्या काळाशी घालणे अनैतिहासिक आहे. वैदिक येण्यापुर्वीच भारतात "सामाजिक" विभागणी झाली होती हे अन्य तज्ञांचे मतही चुकीचे आहे.
थोडक्यात जातिसंस्थेचा संबंध वैदिकांशी जोडता येत नाही. ती कोणी लादलेली नाही. त्यामुळे माझ्या प्रस्तूत पुस्तकात त्याचा वेध घेणे अनावश्यक होते. दहाव्या शतकानंतर जातिसंस्था अपरिवर्तनीय बनली तिची कारणे समाज/राज/आर्थिक व प्राकृतिक अवस्थेत शोधावी लागतात. ती एकमेवाद्वितीय स्थितीय्त शोधल्या गेलेल्या जगण्याची शाश्वती मिळावी यासाठी निर्माण केल्या गेलेल्या बलुतेदारी/रयत व्यवस्थेत आहेत हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" यात विस्ताराने चर्चिली आहेतच.
आहेर यांनी माझ्या पुस्तकाची दखल घेऊन विस्तराने व सहृदयतेने परिक्षण लिहिले व महाराष्ट्र टाईम्सनेही ते प्रकाशित केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. नाहीतर अनुल्लेखाने मारायचे अथवा उपहास करायची आपल्याच लोकांची प्रवृत्ती सनातन आहे.
दुसरे असे कि वैदिक धर्म भारतात धर्मप्रचारकांमुळे पसरला हे माझे मत त्यांना मान्य नसावे असे दिसते. आर्य अथवा वैदिक टोळ्या भारतात पसरुन त्यांनी धर्म, वर्ण, जाती लादल्या असाव्यात असा त्यांचा तर्क असू शकतो. प्रत्यक्षात मुळात या अनुमानाला पुरावे नाहीत. शतपथ ब्राह्मणातील अवशिष्ट मिथ्थकथा (विदेघ माथवाची) काही प्रचारक सरस्वती (हरर्क्स्वैती) नदीपासून सदानीरा नदीपर्यंत पुर्वेला "अग्नी" (वैदिक धर्म) घेऊन आले याचा स्पष्ट निर्देश करते. धर्मप्रसारासाठी त्या धर्माच्या सर्वलोकांचे स्थलांतर आवश्यक नाही. बौद्ध धर्म प्रव्चारकांमार्फतच अन्यत्र पोहोचला हे उदाहरण आपल्या समोर आहेच. मी हे पुस्तकात सविस्तर दाखवले आहेच. शिवाय ब्भारतीय-अभारतीय य सीमा आजच्या राजक्जीय भुगोलाच्या परिप्रेक्षात पहता येणार नाहीत हेही लक्षात ठेवावे लागते.
आहेर यांनी मी या पुस्तकात जातीसंस्थेच्या उगमाबद्दल मौन पाळलेले आहे. हे खरेच आहे. कारण आजच्या स्वरुपातील जन्माधारित जातीसंस्था भारतात मुळात इसवेसनाच्या दहाव्या शतकापुर्वी अस्तित्वातच नव्हती हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवुन दिले आहे. वैदिकांची वर्ण व्यवस्था होती व तीनच वर्ण वैदिक धर्मीय होते. शूद्र हा वर्ण नव्हता तर ते एतद्देशियांना दिलेले संबोधन होते. शूद्र या शब्दाची कोणतीही व्युत्पत्ती नाही. हा शब्द कदाचित एखाद्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा हे मी मेल्लुहाचा (मेलुखा)संस्कृत अपभ्रंण्श "म्लेंच्छ" या शब्दावरुन दाखवुन दिलेले आहे. शुद्रांचा धर्म लिंगपुजाप्रधान/मुर्ती/प्रतिमापुजक होता तर वैदिकांचा धर्म यज्ञप्रधान होता. वैदिक आरंभीच्या प्रचारकाळातील साहित्यात (ब्राह्मण ग्रंथ व यजुर्वेदात) शूद्र हा शब्द अवमानार्थक येत नाही हेही मी दाखवून दिले आहे. येथील बव्हंशी वैदिक धर्मिय धर्मांतरीत आहेत त्यामुळेच वैदिक धर्मियांत विविध प्रादेशिक आनुवांशिकी व भाषागटाचे लोक आहेत.
त्या काळात शुद्रांची जातीसंस्था ही व्यवसायसंस्था प्रधान व परिवर्तनीय-लवचीक होती. ती अन्याय्य नव्हती. ती अपरिवर्तनीय बनली ती दहाव्याशतकानंतर. त्यामुळे आजच्या जातिसंस्थेची मुळे वैदिक प्रचारक भारतात आले त्या काळाशी घालणे अनैतिहासिक आहे. वैदिक येण्यापुर्वीच भारतात "सामाजिक" विभागणी झाली होती हे अन्य तज्ञांचे मतही चुकीचे आहे.
थोडक्यात जातिसंस्थेचा संबंध वैदिकांशी जोडता येत नाही. ती कोणी लादलेली नाही. त्यामुळे माझ्या प्रस्तूत पुस्तकात त्याचा वेध घेणे अनावश्यक होते. दहाव्या शतकानंतर जातिसंस्था अपरिवर्तनीय बनली तिची कारणे समाज/राज/आर्थिक व प्राकृतिक अवस्थेत शोधावी लागतात. ती एकमेवाद्वितीय स्थितीय्त शोधल्या गेलेल्या जगण्याची शाश्वती मिळावी यासाठी निर्माण केल्या गेलेल्या बलुतेदारी/रयत व्यवस्थेत आहेत हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" यात विस्ताराने चर्चिली आहेतच.
आहेर यांनी माझ्या पुस्तकाची दखल घेऊन विस्तराने व सहृदयतेने परिक्षण लिहिले व महाराष्ट्र टाईम्सनेही ते प्रकाशित केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. नाहीतर अनुल्लेखाने मारायचे अथवा उपहास करायची आपल्याच लोकांची प्रवृत्ती सनातन आहे.