एक मुक्तीदाता...एक तारणहार...या संकल्पनेने मानवी मनावर पाशवी गारुड केले आहे आणि यातच त्याच्या स्वनिमंत्रित गुलामीची बीजे आहेत. दगडालाही शेंदूर फासत त्याच्यातही एकमात्र ईश्वर शोधणारे कमी नसतात. भारत तर अशांचा मुकूटमणी. अशा समाजात स्वतंत्र विचार, लोकशाहीची मुल्ये ख-या अर्थाने रुजू शकत नाहीत.
ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, ते सुटुच नयेत यासाठी थिल्लर प्रश्नाभोवती राष्ट्रीय अस्मितांना चेतवले जाते तेंव्हा राष्ट्राने आपला आत्मा हरवला आहे असे समजायला हरकत नाही. मुक्तीदाता कोणीही नसतो हे भान नसणे हे स्वत:च गुलामीसाठीच जन्माला आलेल्यांना समजणे शक्यच नसल्याने त्यांचे उन्माद हेच जणुकाही राष्ट्रवादाचे उद्गार बनतात. आपल्या जहरी उद्गारांच्या समर्थनार्थ हवे ते मार्ग वापरणे ओघाने आले.
हे राष्ट्राच्या मुळांचेच वधक असतात. सर्जनाचे कृत्य यांच्याकडून होऊ शकत नाही. विध्वंस हेच त्यांना सृजन वाटावे अशा पद्धतीने यांची मानसिकता बनवण्यात आली असते. संधी मिळताच ती उफाळते. एकामागोमाग एक अशी कृत्ये घडू लागतात. अशा रितीने कि मागचे कृत्य सौम्य वाटावे. बुजगावण्यांनाही शेताचे मालक आहोत असे वाटावे अशी स्थिती यातुनच निर्माण होते. राष्ट्राचे मारकच लोकांना राष्ट्रभक्ती शिकवू लागतात.
नादानांची क्रांती आत्मघातकी असते हे आम्हाला विसरून चालणार नाही.
भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे.
ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, ते सुटुच नयेत यासाठी थिल्लर प्रश्नाभोवती राष्ट्रीय अस्मितांना चेतवले जाते तेंव्हा राष्ट्राने आपला आत्मा हरवला आहे असे समजायला हरकत नाही. मुक्तीदाता कोणीही नसतो हे भान नसणे हे स्वत:च गुलामीसाठीच जन्माला आलेल्यांना समजणे शक्यच नसल्याने त्यांचे उन्माद हेच जणुकाही राष्ट्रवादाचे उद्गार बनतात. आपल्या जहरी उद्गारांच्या समर्थनार्थ हवे ते मार्ग वापरणे ओघाने आले.
हे राष्ट्राच्या मुळांचेच वधक असतात. सर्जनाचे कृत्य यांच्याकडून होऊ शकत नाही. विध्वंस हेच त्यांना सृजन वाटावे अशा पद्धतीने यांची मानसिकता बनवण्यात आली असते. संधी मिळताच ती उफाळते. एकामागोमाग एक अशी कृत्ये घडू लागतात. अशा रितीने कि मागचे कृत्य सौम्य वाटावे. बुजगावण्यांनाही शेताचे मालक आहोत असे वाटावे अशी स्थिती यातुनच निर्माण होते. राष्ट्राचे मारकच लोकांना राष्ट्रभक्ती शिकवू लागतात.
नादानांची क्रांती आत्मघातकी असते हे आम्हाला विसरून चालणार नाही.
भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे.