Sunday, April 17, 2011

फक्त पुण्याई कशी पुरेल?



4 comments:

  1. संजयजी, अत्यंत परखड भाषेत आजच्या ब्राम्हनांच्यी परिस्थिती विषद केल्याबद्दल साधुवाद. आजचे ब्राम्हण तथाकथित ज्ञान नसलेले, कर्म करायची योग्यता नसलेले. पण तरीही स्वतःला इतरांपेक्षा जास्त शहाणा मानणारे आहेत (तसे ते सर्वच समाजामध्ये आहेत). आज जन्मापेक्षा पुनः एकदा कर्माधीश्ठीत समाज व्यवस्था व्हावयाची गरज आहे. एखादा ब्राम्हण पुत्र जर हीन कर्मे करत असेल तर त्यास शूद्र म्हणावे (अर्थात्‌, त्यामुळे त्याला आरक्षण इ प्राप्त झाल्याने तो खूशच होईल हा भाग वेगळा). धार्मिक कर्मे करण्यासाठी ज्यांच्यात योग्यता असेल त्या(तथाकथित शूद्रासकट) सर्वाना ब्राम्हण म्हणून मान्यता मिळावी. आम्ही वेगळे(श्रेष्ठ) व तुम्ही कनिष्ठ ही वृत्ती नाहीशी व्हावी. सर्वाना समान अधिकार व्हावे. समाजात जाती चे उच्चाटन होवून कर्मावर आधारित समूह व्हावे.ते सर्व समूह सामाजिकदृष्ट्या एकाच पातळीवर असावे. असे स्वप्न मी पाहातो ( गुरुदेव रविन्द्रांच्या गीतांजलीत लिहिल्याप्रमाणे Where the mind is without fear...........Let my country awake.

    ReplyDelete
  2. अजूनही मागासवर्गीयावरील अत्याचार संपले नाही. वेगवेगळ्या स्वरुपात अत्याचार केलेला आपणास आढळतो .फक्त त्याचे स्वरूप तितकेसे बदललेले दिसते .सत्येचा दुरुपयोग करणे ब्राम्हन् शाहीचा हातखंड आहे .कोणत्याही संधी नाकारणे म्हणजे अजूनही मागासवर्गीयाना वाळीत टाकण्या सारखे नाही का?

    ReplyDelete
  3. PARKHAD ANI THET LEKHAN.HI CHIKITSA ZALICH PAHIJE. LOKHITWADI, RANADE, AGARKAR, PHULE, BABASAHEB YANNI TI KELI AHE. TYACHA BRAHMAN SAMAJANE VIDHAYAK WAPAR KARUN GHETALA, SWATACHI PRAGATI KARUN GHETALI. HA VIVEK ETAR SAMAJ KEVHA DAKHAWANAR?

    ReplyDelete
  4. संजय जी, तुमचा लेख चांगला आहे ह्यात काही वाद नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो जातीय दृष्टीकोनातून नाही. तेव्हा ह्या लेखाचे स्वागत आहे. तरीही काही मुद्दे बोलावेसे वाटतात. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत, तशा १-२ उदाहरणातून सत्य प्रस्थापित होणार नाही. द्रोणाचार्य, कृपाचार्य लढले, पुष्यमित्र श्रुंग हा राजा होता, हे ठीक आहे. पण बहुसंख्येने ब्राह्मण समाज काय करत होता, हा प्रश्न आहे. मुळात आपल्या समाजाचा आर्थिक इतिहास बघायला हवा. हा समाज हजारो वर्षे शेतीप्रधान राहिलेला आहे. शेती, त्याबरोबर येणारी बलुत्यांची व्यवस्था, लष्कर, आणि सरकारी नोकरी हेच व्यवसाय उपलब्ध होते. त्यातले काही सोडून (मुख्यतः तथाकथित अस्पृश्य जातींनी करण्याची कामे) बाकी सर्व ब्राह्मणांनी केलेले आहे. हीच गोष्ट सत्य आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडले हे म्हणणे सुद्धा बरोबर नाही, कारण तुम्ही लिहिले आहे तसे ब्राह्मण्य त्यांच्याकडे फारसे नव्हतेच. अगदी भिक्षुक हे ब्राह्मण्य टिकवणारे लोक होते (हे ही खरे नव्हे) असे घटकाभर गृहीत धरले तरी त्यांची संख्या फारच नगण्य होती आणि आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडचे प्राचीन ग्रंथ हे बहुधा दिशाभूल करणारे आहेत. मनुस्मृतीने वर्णव्यवस्था सांगितली (तत्पूर्वी ती गीतेमध्ये ही आहे आणि पुरुष सुक्तातही "ब्राह्मणो अस्य मुखमासीत, बहुराजन्याकृतः उरू तदस्य यद वैश्यः पतभ्याम शूद्रो अजायत" हा उल्लेख आहेच.) म्हणजे ही वर्णव्यवस्था अस्तित्वात होती असे मानणेच चुकीचे आहे.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...