Monday, August 6, 2012

तुमचा शिवाजी आणि आमचा शिवाजी


मी या सर्व घटनांकडे तटस्थपणे पहात असता एक लक्षात येते कि हे जेही काही चालले आहे ते एक विरेचन आहे. कोणाच्या विकृती उफाळुन वर येत आहेत तर काही अत्यंत हिंस्त्र होत जंगलचा कायदा सर्वोपरी मानत एकमेकांवर तुटुन पडत आहेत. विवेक सुटला आहे. किंबहुना विवेकाचाच कडेलोट झाला आहे. हा महाराष्ट्र असा नव्हता. असा असुही नये. ज्यांना राज्य घदवता येत नाही ते राष्ट्र काय घडवणार? ज्यांची भाषा गलिच्छ आहे त्यांनी आता माय मराठी हा शब्दही वापरु नये. प्रा. नरके माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अहोरात्र काम करतात आणि काही लोक याच मायमराठीवर गलिच्छ बलात्कार करतात. या महाराष्ट्राची हीच लायकी आहे कि काय? प्रा. नरके साहेबांना माझी विनंती आहे कि अभिजात मराठीची हीसुद्धा अभिनव रुपे आपल्या संशोधनात आवर्जुन नमुद करावीत.

काही लोक शिवाजी आपल्याच बापाची मालमत्ता आहे या भ्रमात आहेत. जणु काही शिवाजी महाराजांचा अपमान काय आणि काय नाही हे ठरवायचा ठेका यांनीच घेतलेला आहे. महाराजांच्या जीवनात काय होते आणि काय नव्हते जणु याची स्वप्ने यांना पडत आहेत आणि ते म्हणतील तोच महाराजांचा इतिहास आहे. मी स्पष्टपणे सांगतो शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान जेवढा ब्रिगेडने केला असेल तसा करायचे धैर्य अगदी औरंगजेबानेही दाखवले नसेल. जय जिजाउ म्हणण्याचा तर यांने कधीच अधिकार गमावला आहे....ब्राह्मण स्त्रीयांबद्दल हीणकस भाषा वापरुन. मराठा रियासत या अकाउंटवर धनगर तरुणीबाबत थर्ड ग्रेड भाषा वापरुन. हा काही शिवरायांचा महाराष्ट्र धर्म नव्हता. ही काही केल्या जिजाउंची प्रवृत्ती नव्हती. शिवाजी आणि जिजाऊ फक्त आमच्याच असा आव आणत जे कारस्थान चाललेले आहे तर मग जेंव्हा मधुकर रामटेके "तुमचा शिवाजी" असा शब्द वापरत असतील तर त्याचा दोष या ब्रिगेडी कृतघ्नांकडे जातो. शिवाजी महाराजांना हायज्यक करण्याचे पाप तुम्ही जातीयवादी होत करत असाल तर मग आम्ही पामरांनी "आमचा शिवराय" कसे म्हणायचे? दादोजी प्रकरणी जेवढे पुरावे मी दिले तेवढे तुमच्या स्वयंघोषित इतिहासकारांकडे नव्हते, अगदी मेहंदळेंसारख्या इतिहासकाराबरोबर म.टा.त प्रतिवाद केला तेंव्हा तुम्ही कोठे गेला होता? गोतियेने शिवमंदिर बांधले, मी एक नाही तीन लेख लिहुन याला विरोध केला...पण तुमचेच नेते उद्घाटनाला गेले...तेंव्हा तुमचा शिवबा तुम्हीच कोठे छपवून ठेवला होता?  तुमचा शिवबा मला समजत नाही. मला माझा शिवबा समजतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा शिवबा उभारत रहा आणि शिवरायांची अशीच अवहेलना करत रहा. तुम्हाला जसे शिवबा हवे आहेत तसे ते नाहीत...नव्हते...त्यांचा सर्वव्यापी दृष्टीकोण तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे. तुमच्या मर्यादित कुवतीत ते अफाट व्यक्तित्व बसवू नका.

नाहीतर तुमचा शिवाजी आणि आमचा शिवाजी हा वाद तसाही निर्माण झालाच आहे, जो भयावह आहे आणि ती तुमचीच उपज आहे. याची जबाबदारी तुमची आहे.

माझ्यावर वाट्टेल ते आरोप करण्याची मुभा तुम्ही घेतलेलीच आहे. घ्या. पण तुम्ही मानवतेला एक काळीमा आहात याचेही भान ठेवा. शिवाजी महाराजांना जातीत वाटण्याचे पाप तुम्ही केले आहे आणि इतिहास तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही हेही लक्षात ठेवा.

हे विरेचन असेल, असावे. इतिहासात कधी असे अत्यंत टोकाचे घृणास्पद विवाद निर्मण होतात. ज्यांना ओका-या काढायच्यात ते काढतात...थोडासा अप्रसंग निर्माण होतो आणि समाजच आत्मपरिक्षण करत मग नव्या जोमाने ऐक्याचे स्वप्न पहातो. हे असेच विरेचन असावे ही आशा आहे...यातुन अभद्र नव्हे तर काहीतरी चांगलेच पुढे यावे हीही आशा आहे.

पण ही आशाच ठेवायची कि एकमेकांना ठेचायचे हेही ठरवावे लागेल.

मी तरी आशावादी आहे.

52 comments:

  1. मी या सर्व घटनांकडे तटस्थपणे पहात असता एक लक्षात येते कि हे जेही काही चालले आहे ते एक विरेचन आहे. ..............
    प्रत्युत्तर .....मुळात तुम्ही या घटनेकडे तटस्थपणे पहात नाही..कारण तुम्ही एका बाजूने विचार करीत आहात नाही..आणि तुम्हाला विरोध करणारे दुसऱ्या बाजूने..त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचा विचार करून लिहित आहात..

    आज सांगली मध्ये धनगर संघटनेने मोर्चा काढला...त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची चिन्हे आहेत ..याला सर्वस्वी जबाबदार..तुम्ही आणि हरी नरके आहात..कारण तुम्ही चुकीच्या गोष्टी पुरावे म्हणून सादर केल्या..आणि धनगर समाजच्या भावनांना हात घातला..तुमचा उद्देश काय होता माहित नाही..पण तुम्ही नाटकी पणा करून गोंधळ घातला..तुम्ही दोन सामाज्यामध्ये तेढ निर्माण करणारे आरोपी झाला आहात....... आरोपी संजय सोनवणी................तुम्हाला याचे फळ जरूर मिळेल ...पुण्यातले लोक तुमच्यावर नक्की हसत असणार..

    ReplyDelete
  2. "...हे विरेचन असेल, असावे. इतिहासात कधी असे अत्यंत टोकाचे घृणास्पद विवाद निर्मण होतात. ज्यांना ओका-या काढायच्यात ते काढतात...थोडासा अप्रसंग निर्माण होतो आणि समाजच आत्मपरिक्षण करत मग नव्या जोमाने ऐक्याचे स्वप्न पहातो. हे असेच विरेचन असावे ही आशा आहे...यातुन अभद्र नव्हे तर काहीतरी चांगलेच पुढे यावे हीही आशा आहे."

    पनाचा आव कसा आणि किती आणावा हे तुमच्या कडून शिकावे. वाघ्या निघाला ऐकून तुम्ही "ही वेळ तुम्हाला गुड बाय करण्याच्यी आहे " म्हणून विव्हळत होतात तर पुतळा पुन्हा बसविला की "मी जिंकलो ब्रिगेड हरली " असे उन्मादी वक्त्यव्य करत होतात. तुम्ही कधीच तटस्थ नव्हते. तुम्ही भावनिक आहात आणि भावनिक माणसे डोक्याने कधीच विचारही करू शकत नाहीत आणि निर्णयही घेऊ शकत नाहीत. तुमच्या आत दोन व्यक्तिमत्वांचा वास आहे. म्हणून तुम्ही कायम गोंधळलेले असता, दिसता आणि वागताही. Mr. Sonawani you are cofused minded person.


    बैठका घेऊन शिवरायांचे कर्तृत्व तरी काय? म्हणून त्यांना नाकारायचे आणि आपल्या सवंगड्याने शिव्रयान्संदर्भात अपशब्द जरी उच्यारले तरी त्यांनी ते "ब्रिगेड वाल्यांच्या शिवाजीला शिव्या घातल्या आमच्या नाही म्हणून लेख लिहायचे." या महाराष्ट्राला फक्त आणि फक्त एकच शिवाजी माहित आहे. जो ब्रिगेडच्याही बापाचा नाही आणि तुमच्याही बापाचा नाही. सोनवणी साहेब तुम्ही लेख लिहा हो पण फुकट मीच कसं शहाणा असला आव आणू नका. कारण तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर कुणी कुणी काय काय प्रतिक्रिया दिल्या याचेही भान नसते. मग तुम्ही अभ्यासक तरी कसे?


    हा लेख तुम्ही माझ्या "संभाजी ब्रिगेडने आत्म परीक्षण करावे" या लेखाला प्रतिक्रिया देणाऱ्या "मधुकर रामटेके" यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी लिहिलात हे माझ्या लगेच लक्षात आले. परंतु तुमचा हा लेख वाचून तुम्ही त्या "रामटेकेंची प्रतिक्रिया " निट वाचलीच नाही हेही लक्षात लक्षात आले.सोनवणी साहेब त्या प्रतिक्रियेत रामटेके शिवरायांचा उच्चार केवळ "तुमचा शिवाजी" एवढंच करून थांबत नाहीयेत हो. त्याच्याही पुढे जाऊन ते काय म्हणतात पहा-
    "...खुद्द शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणांचा ताफा रायगडावर पोषत असत. राज्यभिषेकाच्या वेळी शिवाजीनी ब्राह्मणांवर केलेली उधळपट्टी ही बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून मिळविलेली होती."

    पैशाची विनाकारण उधळपट्टी करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या 'अभिजात माय मराठीत' काय म्हणतात हो सोनवणी साहेब? मूर्खच म्हणतात ना? आणि ती उधळपट्टी जर बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून होत असेल तर तर तो लार्णारा महामुर्ख ठरतो. मग तुम्ही म्हणता तसे ब्रिगेड वाल्यांचा शिवाजी वेगळा आणि तुमचा वेगळा असेल तर तुम्हा लोकांचा शिवाजी महामुर्ख होता काय? अरे कसले विचार मांडताय तुम्ही.ज्या घटनेची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात करावी त्या शिवराज्यभिशेकाच्या घटनेला तुम्ही लोक "बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून केलेली उधळपट्टी" म्हणता? धन्य आहे तुमची आणि तुमच्या शिव प्रेमाची. तुम्हाला जर शिव्प्रेमाचे एवढेच भरते अले असते ना तर शिवरायांच्या कार्याला नालायकपणा म्हणणाऱ्या रामटेकेंना तुम्ही चांगलेच खडसावले असते. पण तुमचा शिवाजी एवढे एकच वाक्य वाचून तुम्ही त्याचाही वापर ब्रिगेड विरोधात केला. आणि तिकडे आमचा शिवाजी "संजय सोनवनीच्या तटस्थ लेखणीच्या न्यायाची वाट पाहत खितपत पडला."

    माझे लिखाण वाचणाऱ्या मानवांनो मी सातत्याने सांगतोय की "नरके-सोनवणी-देवरे आणि रामटेके" ही मंडळी फक्त ब्रिगेडच्या विरोधातच नाहीत तर ते छ.शिवराय आणि मराठा समाज यांच्या विरोधात आहेत. आणि त्यांच्या गुप्त बैठकीत शिवाजी महाराजान्संबंधी जी चर्चा चालते ती मधुकर रामटेकेच्या "बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून केलेली उधळपट्टी" या वाक्यातून आणि तुमचा शिवाजी या उल्लेखातून ती बाहेर पडली.आणि संजय सोनवणींनी पुन्हा तटस्थतेचा आव आणत, कारण नसताना ब्रिगेडद्वेष जोपासला.

    दुसरा मुद्दा, ज्या अर्थी तुम्ही माझ्या मूळ प्रतिक्रिये वरची रामटेकेची दुय्यम प्रतिक्रिया वाचली त्या अर्थी माझी मूळ प्रतिक्रिया वाचलीच असेल. मग दुय्यम प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी ब्रिगेड द्वेषाचा धर्म जोपासत तुम्ही स्वतंत्र लेख लिहिता मग माझ्या एकाही मुद्द्याला तुम्ही किमान छोटीशी प्रतिक्रिया देऊन तरी का खोडून काढले नाही? की तुमच्या कडे माझ्या प्रश्नाचे उत्तरच नाहीये?

    ReplyDelete
    Replies
    1. अरे मुर्खा शिवालिका, त्या शिवाजीला कांही लोक खालच्या थराला जाऊन बदनाम करत आहेत, पण त्यांच्या विरोधात तू कांहीच बोलत नाहीस. एवढा कसा गांडू तू? तुम्ही लोक भित्रट असता हे यावरून सिद्ध होते. बामनानी शिवाजी म्हंटले तर त्यांच्या मागे लागणार तू, आणि तुमच्या त्या नवबापांनी शिवाजीला शिवी दिली तरी तोंडात goooooooooooo धरून बसणार ही तुमची औकात.

      Delete
    2. अरे मूर्खां, anonymous पणे प्रतिक्रिया देतो आणि दुसऱ्याला भित्रट म्हणतोस?

      Delete
  3. "...समाजच आत्मपरिक्षण करत मग नव्या जोमाने ऐक्याचे स्वप्न पहातो. हे असेच विरेचन असावे ही आशा आहे...यातुन अभद्र नव्हे तर काहीतरी चांगलेच पुढे यावे हीही आशा आहे."
    सोनवणी साहेब तुम्ही पेरलेल्या दुहीच्या बीजातून नव्या जोमाचे ऐक्य पुढे येत नाहीये तर काहीतरी अघटीत आणि अभद्र असे येणार असे दिसतेय. झलक दाखवू का? मी तुमच्या सर्व मुद्द्यांचे सप्रमाण आणि साधार असे खंडण करत असताना निरुत्तर झालेल्या एका धनगर समाजातील कार्यकर्त्याने निराशेने ग्रस्त होऊन "जागच्या जागी खांडोळी करू ...समोर तर भेट .....इथे काय भून्क्तोस !!" अशी धमकी दिली.

    सोनवणी साहेब ते ब्रीगेडवाले कितीही नालायक, जातीयवादी असले तरी त्यांनी कधीच कुणाला अशी धमकी दिल्याचे कुणाला स्मरत नाहीये हो? विचारांचा प्रतिकार विच्रांनी करावा म्हण नाऱ्या सोनावानीच्या ब्लॉगवर त्यांच्याच समर्थकांकडून खांडोळी करण्याच्या धमक्या? अवघड आहे सोनवणी साहेब अवघड आहे.

    आता राहिला ब्रिगेड वाल्यांच्या शिवाजीचा प्रश्न. तर आम्ही तुमचा शिवाजीच मान्य केला असता पण तुम्ही त्यांना "बहुजनांच्या रक्तामासाच्या पैशातून उधळपट्टी करणारा नालायक राजा ठरवता." नको नको सोनवणी साहेब तुमच्या ताब्यात शिवाजी दिल्यास तुम्ही लोक लोक त्यांचे काय काय कराल हे त्या वाघ्यालाच ठाऊक. त्यापेक्षा त्या ब्रिगेड वाल्यांचाच शिवाजी बौधांपासून मुसलमानांपर्यंत लै लै गोड आणि मधुर आहे हो. होय ना?

    ReplyDelete
    Replies
    1. @शिवालिक वर्मा

      [सोनवणी साहेब ते ब्रीगेडवाले कितीही नालायक, जातीयवादी असले तरी त्यांनी कधीच कुणाला अशी धमकी दिल्याचे कुणाला स्मरत नाहीये हो?]
      मला मला, मला दिलेय धमकी - एक नाही दोन नाही अनेकांनी. खेड्याने तर सर्व ब्राम्हण पुरुषांच्या हत्या करायची ब्लयु प्रिंटच प्रकाशित केली आहे. तुझ्या घरातील शिव (देव) घरात त्याच्या "शिवरायांच्या बद्नामाची केंद्रे" ह्याची प्रत नक्की असणार. ती नक्की वाच. त्यात त्यांनी ब्राम्हण पुरुषांच्या हत्या करा असा संदेश सर्व मराठा युवकांना दिला आहे. ब्राम्हण घरातील आजी, सासू, पासून ते सर्व आया बहिणी ह्या मराठा लोकांबरोबर झोपतात असला आरोप पण त्याने केलाय. तो तुमचा नेता आणि धमकी दिली नाही म्हणतोस बेट्या! बालाजी जाधवच्या म्हणण्याप्रमाणे मराठे खरोखरीच षंढ झाले असावेत, करत बामनांच्या हत्या तर कोणीच करायला कोणीच पुढे येत नाहीये :-)
      - कोहम

      Delete
    2. ब्रीगेडवाले कितीही नालायक, जातीयवादी असले तरी त्यांनी कधीच कुणाला अशी धमकी दिल्याचे कुणाला स्मरत नाहीये हो?

      ha mhanje motha vinod ahe.. Bhatanchi hattya kara, sarva bhat purushana marun taka asa mhananare tumache Nete.. ani te pustaka tun chapun prachar karanare tumache nete.. ani mhanje Brigadewale lokanna shivya det nahit.. tumhich magachya eka comment madhe Sonawaninna ashlaghya shivya dilya ahet.

      Delete
    3. @Koham Blogger
      तुला येवढी कसली गडबड झालिये मरायची ? सावकास होऊ देत की .
      आणि काय लिहिले चुकीचे खेडेकर साहेबांनी ? तुझ्या आई बहिनींची आब्रुच्या(थोडीशी होती ती ) चिंढड्या उडविल्या तरी तुम्ही शांत हा काय शुर पणा म्हणायचा काय ? मराठ्यांना षंड म्हणतोस संयम बाळगल्याचा असा अर्थ लावू नको नाहीतर तुझी इच्च्छा लवकरच पुर्ण होईल.
      जय महाराष्ट्र

      Delete
  4. @शिखंडी वर्मा- नसलेली मर्दुमकी गाजवण्यासाठी तू नावे बदलून कितीही प्रयत्न केलास तरी, तुझ्या चालचलानावरुन तुझं कुळं समजलं. अनिता पाटील उर्फ भय्या पाटील उर्फ दिगंबर काळे उर्फ मानव भोसले यांच्यात मांडिळायीतला तू. उगाच नावामध्ये शिव हा पवित्र शब्द वापरुन त्याची विटंबना करु नकोस. दुसरे असे की, संभाजी ब्रिगेडने आत्मपरिक्षण करावे या शीर्षकाखाली लांबलचक पोस्ट टाकून तु अवतरला होतास. गंमत म्हणजे, त्यामध्ये ब्रिगेड सोडून सारा रोख सोनवणी व धनगर समाजावर होता. ती पोस्ट तुला ब्रीगेड्यांमध्येही वाटता आली असती. पण नाही, तीच पोस्ट ती प्रकाश पोळच्या ब्लॉगवर टाकलीस. याचाच अर्थ, तुला शिखंडीप्रमाणे पुढे करण्यात आले आहे...धमाल आहे, पुढे करणारे नपुंसक आणि लढणारे शिखंडी. वाघ्या कुत्र्याच्या स्वामीनिष्ठेपुढे तुम्हा लांडग्यांचे सोंग उघडे पडले म्हणून का इतके चिडायचे. आता आमच्या या बोलण्याला काय उत्तर द्यायचे, हे पुन्हा तुझ्या अर्धवट डोक्यांच्या धन्याला विचारुन त्यांचे चघळून चोथा झालेले तर्क आमच्या बोकांडी मारशील, हे नक्की. मुद्दा अंगलट आला की जे त्यास बगल देतात, त्यांनाच ब्रिगेडचे बगलबच्चे म्हणतात. या अर्थाने, तु तर अगदी कालच अंड्यातून बाहेर (काढण्यात) आलेला. असो. लिहिता वाचता आलं तरी हल्ली साहित्यिक झाल्यासारखं अनेकांना वाटतं. त्यापैकीच तू. तरीही, सल्ला देतो. भरपूर वाच. ब्रिुगेडी विचारांच्या उकंड्यात लोळण्यापेक्षाही विहरण्यासाठी जगात अनेक चांगल्या जागा आहेत. तिथे जाऊन ये, जग कुठे चालले आहे व आपण कुठे आहोत, याचा अंदाज घे म्हणजे आपण आजवर खाल्ली होती ते अन्न नसून बीग्रेडींची अन्य समाजांविषयीची ओकारी होती, हे तुला समजून येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. khare aahe, aataa sagali takad mathefiru dahashatvaadi khedekar yala turungat takanyasathi lavali pahije

      Delete
  5. http://mdramteke.blogspot.in/2012/08/blog-post_6.html
    पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

    सोनवणी हे वाचा आणि 'तुमच्या शिवाजीवर' तुमच्याच मित्राने काय मुक्ताफळे उधळली आहेत ते बघा. याचा निषेध जर तुम्ही केला नाही तर मात्र तुमच्या शिवप्रेमाबाबत नक्कीच शंका उत्पन्न होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवाजी आणि जिजाऊ फक्त आमच्याच असा आव आणत जे कारस्थान चाललेले आहे तर मग जेंव्हा मधुकर रामटेके "तुमचा शिवाजी" असा शब्द वापरत असतील तर त्याचा दोष या ब्रिगेडी कृतघ्नांकडे जातो.

      Delete
    2. वाघ्या प्रकरणावरून मुख्यत: धनगर समाजच पुढाकार घेत आहे. तेव्हा याच धर्तीवर 'तुमचा होळकर आणि आमचा होळकर ' असा लेख पाडायला घ्या आता.

      Delete
    3. अवघ्या जगातील दहा सर्वाधिक इमानदार कुत्र्यांत वाघ्याची गणना पाश्चात्य जगाने केलेली आहे. त्याला हीण ठरवणारे कृतघ्न लोक या देशात असावेत हेच एक दुर्दैव आहे. येथे धनगरच नव्हेत तर शेतकरी, गवळी, धनगर आणि राजे रजवाडे, ज्यांनी कुत्रे शिकारीसाठी, गनीमी युद्धांसाठी, घर/पाडे/वस्त्यांच्या रक्षणासाठी आणि मराटःयांनी युद्धांतच गनिमी काव्यासाठी वापरली आणि अत्यंत निष्ठेने ज्या कुत्र्यांनी सामाज जगवला त्याचे अशी कुटाळ अवहेलना करण्याची हिम्मत कशी होते? हा प्रश्न फक्त धनगरांचा आहे असे समजु नका...मानवजातीच्या इतिहासात सर्वात आधी पाळला गेलेला प्राणि कुत्रा हाच होता ज्याने मानव जातीचे हरप्रकारे रक्षण केले. माणुस बेईमान असतो हेच वाघ्या प्रकरणात सिद्ध झाले आहे.

      Delete
    4. 'माणुस बेईमान असतो हेच वाघ्या प्रकरणात सिद्ध झाले आहे.'
      अगदी बरोब्बर ओळखलेत!

      Delete
    5. http://www.mulnivasinayak.com/

      आताच हाती आलेल्या वृत्तानुसार ब्रिगेडच्या अध्यक्षांनी वाघ्याची समाधीच उद्ध्वस्त करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
      त्यांनी नुसता वाघ्या उखडला तर तुम्हाला समुद्रात जाण्याचे डोहाळे लागले होते. आता समाधीच उद्ध्वस्त केली तर अवकाशात जाणार आहात की काय?

      Delete
    6. "अत्यंत निष्ठेने ज्या कुत्र्यांनी सामाज जगवला त्याचे अशी कुटाळ अवहेलना करण्याची हिम्मत कशी होते?"

      अशीच अवहेलना आंबेडकर यांची झाली तेव्हा तुम्ही एक शब्दही लिहिला नाही. पण वाघ्याबद्दलचे तुमचे प्रेम इतके उतू गेले आहे की फुले-आंबेडकर यांच्यावर (अरेच्च्या! शाहू महाराज राहिले बहुतेक! असो.) मिळून तुम्ही जितके लिहिले नसेल तेवढे लेख एकट्या वाघ्यावर टाकले आहेत. तुम्ही कोणाची बाजू घेतल्यासारखे दाखवता आहात आणि प्रत्यक्षात कोणाची बाजू घेत आहात हे आता लक्षात येऊ लागले आहे.

      Delete
    7. सत्य इतिहासावर आधारित, सर्व काही अशानां ( ब्रिगेड )...

      एक प्रश्न ?

      भगवान कृष्ण व शिव ( महादेव ) यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुम्हीं व आम्हीं आजवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मानतच आलो आहे... संबंधित गोष्टीस महत्व देत आलो आहे / पाळत आलो आहे.

      ते होते का ? याचा पुरावा कोणाकडे आहे का ?

      आणि तसेच वरील पुरावा नसल्यास... अशा अनेक देवांचे नाव म्हणून , " महापुर्शांचे , आपले, इतरांचे नाव " असने / ठेवणे / घेणे... याबद्दल आपल्यासारखे सत्य इतिहासकारकांना काय वाटते ?

      सर्व काही सत्य.......................

      Delete
    8. '''''वाघ्या प्रकरणावरून मुख्यत: धनगर समाजच पुढाकार घेत आहे'''''

      varil vidhaan Saaf Chukiche aahe.

      Chhatrpati Shivaji Maharaja'nche Vanshaj Udayan Raje Bhosle Yaani Waaghya Putla Asla Pahije, Ashi Bhumika Madhye Maandli Hoti.

      ShivSangraam Sanghatneche Vinayak Mete, Yaani hi Waagya Putla Jewha Kaadla Hota, Tyabaddal Naraji Vykt Keli Hoti. Swaminisht Waaghya Aahe to..ase tyanni saangitle hote.

      Kaahi Aamdaaraan'che Tyanchyashi ( Sambandhit Sanghatna ) Aprayeksh va Apryteksh Sambandh Hi Aahe. Tyanchya Anek Karykraamat tey Yet hi Asatat. Sarkaar hi tyanche'ch Aahe. Anek Jan Rashtrwaadi'che Sambandhit Aahe. Sarkaar'ne jewha Waaghya Putla Basvila, Matra Yanche'vishayee Ek Shabd te Bolat Naahi Ase Ka ? Fakt Kaahi'naach Satat Target ka Kele Jaat Aahe ?

      Maratha Samaja Sakat Sarv Samaj va Anek Sanght'nani Waaghya Putla Jewha Kaadla Hota, Tewha Tybadda Naraji Vykt Keli Hoti. Pan Yabaddal Matra te Bolat Naahi Ase Ka ?

      Delete
    9. http://mdramteke.blogspot.in/2012/08/blog-post_6.html
      पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

      सोनवणी हे वाचा आणि 'तुमच्या शिवाजीवर' तुमच्याच मित्राने काय मुक्ताफळे उधळली आहेत ते बघा. याचा निषेध जर तुम्ही केला नाही तर मात्र तुमच्या शिवप्रेमाबाबत नक्कीच शंका उत्पन्न होईल.
      -याचा निषेध सोनवणी कसे करतील.सोनवणींचे जाहीर आभार निषेध व्यक्त न करून इतका तरी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल!!!!!!!!!!!!!

      Delete
  6. सोनवणी साहेब मी हि रामटेकेचं वरील लेख आताच वाचला मलाही वाचून फार आशर्य वाटल आंबेडकरी लेखक म्हणून त्य्नाचे काहीही खपवून घ्यावे हे त्याचं म्हणन दिसतंय

    ReplyDelete
    Replies
    1. 'या पुस्तकाला स्वता: ब्रिगेडींचेच समर्थन आहे'

      'ते कथित पुस्तक व त्यावरील टिप्पण्ण्या खुद्द ब्रिगेडलाच मान्य नाहीत'

      सोनवणी साहेब, Get well soon.

      Delete
    2. हर्षलजी, मधुकर रामटेकेंनी परिक्षण केले आहे, स्वत: पुस्तक लिहिलेले नाही. याच पुस्तकावर महाविर सांगलीकरांनीही परिक्षण अलीकडेच लिहिले होते. या पुस्तकाला स्वता: ब्रिगेडींचेच समर्थन आहे त्यामुळेच त्यांनी आजतागायत, जर हे पुस्तक निषेधार्ह असेल तर, निषेध केलेला नाही, उलट परिक्षण संस्थळावरुन उडवायच्या संबंधिताला सुचना दिल्या. ब्रिगेड दुटप्पी असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे. हे पुस्तक ब्राह्मनाने वा एखाद्या ओबीसीने लिहिले असते तर काय तळपट उठले असते याचा विचार करा. महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज सोयीने वापरण्याचे पातक कोण करत आहे यावर विचार करा. यांना शिवाजी महाराजांचे नांव घेण्याचा अधिकार दिला कोणी? ते कथित पुस्तक मात्र मान्य पण त्यावर कोणी त्यावर टिप्पण्ण्या केल्या तर त्या मात्र खुद्द ब्रिगेडलाच मान्य नाहीत यावरुन काय समजायचे ते समजावून घ्या. आणि आम्हाला हेच शिवप्रेम शिकवताहेत...

      Delete
    3. महावीर सांगलीकर यांनी या पुस्तकाच्या परीक्षणात संभाजी ब्रिगेडविरोधात एक अक्षरही लिहिले नाही. असे का? सांगलीकर यांना एवढेच शिवप्रेम असेल तर या पुस्तकाचा निषेध न करणा-या संभाजी ब्रिगेडचाही त्यांनी निषेध करायला पाहिजे. पण ते केवळ बामसेफ आणि नवबौद्ध यांच्या मागे हाथ धुवून लागले आहेत.

      Delete
    4. सर मी मान्य करतो पण त्यात रामटेके लिहिता पुढील परीचेद बघा (शिवाजी महाराज ज्याना आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो ते खंडणीखोर होते हे या पुस्तकातून मला कळले. आता कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडलो आहे. पण लेखक हे आंबेडकरवादी असल्यामूळे यांच्या संशोधनावर शंकाही घेता येणार नाही.) मअग ते फक्त आंबेडकरी लेखक आहेत म्हणून काहीही खपवून घ्यायची त्यांची तयारी हा तर सरळ सरळ आंबेडकरांचा परभव आहे कारण बाबासाहेबांनी डोळस पाने प्रतिकार कार्याला सांगितला अही

      Delete
    5. बादशहा अकबर, महाराणा प्रताप आणि अगदी औरंगझेब यांनी भारतातीलच शहरावर स्वारी करून जनतेला लुटल्याचे उदाहरण नाही. पण शिवाजीने मात्र सूरतवर एकदा नाही तर दोनदा स्वारी करून इंग्रजांना किंवा मोगलांना नव्हे तर भारतीय व्यापा-यांना लुटले हा इतिहास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवाजीला लुटारू म्हणूनच ओळखले जाते.

      Delete
    6. लुटारूला संपवण्यासाठी कोणी पाच लाखाची फौज घेऊन येत नाही आणि लुटारूचे राज्य टिकविण्यासाठी सर्वसामान्य जनता सत्तावीस वर्षं लढत नाही. ज्या भाषेतून तुम्ही ह्या "लुटारू"विषयी लिहीत आहात त्या लुटारुनेच ह्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला आहे.

      Delete
    7. वरील संदर्भ असलेल्या पुस्तकात इतिहास सांगणारे व मांडणारे असे काहीही नाही.निषेध व्यक्त न करून संभाजी ब्रिगेडने फार मोठे शिवकार्य केले आहे.संभाजी ब्रिगेडच्या बहुजनवादी भूमिकेशी ते सुसंगत आहे.फक्त विखारी पणाने लिहिलेल्या पुस्तकाला महत्व न देवून संभाजी ब्रिगेडने खरे शिवप्रेम व बहुजनवाद उत्तम जपला आहे.म्हणून तर अशी परिक्षणे छापून भडकावण्याचा प्रयत्न सुपारीबहाद्दरांमार्फत सुरु आहे.अशा परिक्षणाचा(रामटेके लिखित)निषेध व्यक्त न करता मुद्दयाला बगल देणारे संजय सोनवणी एक श्वानप्रेमी शिवद्रोही !!!!!!!!!!!

      Delete
  7. पुतळे खरंच प्रेरणा देतात का विद्वेष पसरवतात, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे आहे. जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी जर पुतळे कारणीभूत असतील, तर यापुढे महाराष्ट्रात एकही नव्या पुतळ्याला परवानगी नको. पुतळ्यांची विटंबना म्हणजे महापुरुषांची विटंबना होते असा तर्क असेल तर महापुरुषांच्या विचारांची विटंबना सर्रास चालत असेल तर त्यापुढे पुतळ्याची विटंबना काहीच नाही. विशेष म्हणजे विटंबना करणारेच जेव्हा खुद्द महाराजांचे किंवा इतर महापुरुषांची नावे घेत असतील, तर त्यांच्यासारखे पापी तेच. डॉ.आंबेडकरांच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिका व संघटित व्हा, हे ज्यांनी ऐकले त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याणच झाले. मात्र, त्यांच्या पुतळ्याची विटंबना सहन न झाल्याने रस्त्यावर उतरलेल्यांवर पोलिस केसेस झाल्या. तीच गत शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची. समाजधुरिणींनी खरोखरच, या विषयावर एक होऊन, इतिहासाचा वापर परस्परांवर दुगाण्या झाडण्यासाठी करण्याऐवजी समाजविकासासाठी करण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. गडकिल्ल्यांची सुरक्षितता, पावित्र्य टिकवण्यासाठी कोणीच काही बोलताना दिसत नाही. अल्पकालीन स्वार्थ साधण्याऐवजी पुढच्या पिढीला आपला अभिमान वाटेल असे महान कार्य आपणास करावे लागणार आहे. जातीभेद हे वास्तव सर्वांना मान्य आहे, तरीही त्याचा द्वेषभावनेतून काथ्याकूट न करता, आपल्या नव्या पिढीला बदलत्या जगापुढे समर्थपणे उभे राहता येईल, असे काही करण्यात खरे कर्तृत्व आहे व ती काळाची अत्यंत तातडीची गरज देखील आहे. अन्यथा, भंगलेल्या पुतळ्यांचा, विस्कटलेल्या इतिहासाचा वारसा पाहून आपली पुढची पिढी जे प्रश्न विचारेल त्यांची उत्तर देण्याइतकीही हिंमत आपणाकडे राहिलेली नसेल. मी मराठा, मी धनगर, मी बौद्ध, मी ब्राम्हण किंवा मी अमूक, मी तमूक याच भिंतीत आपण स्वतःला बांधून घेत आहोत व भाषा मात्र झपाट्याने बदलणाऱ्या जगाची करतो आहोत.असे करुन आपण स्वतःलाच फसवत आहोत व भावी पिढ्यांचे भवितव्य अंधःकारापुढे नेतो आहोत, असे मला प्रकर्षाने वाटते. मी माझे नाव दिले तर त्यावरुनही माझ्या जातीचा अंदाज बांधून शेरे मारले जातील व मी उपस्थित केलेले मत गौण ठरेल, म्हणून नाव देणे टाळतो आहे. मात्र, कतृर्त्ववान महापुरुषांनी घडवलेल्या, कसलेल्या या मराठी मातीतील एक सामान्य माणूस हीच माझी खरी ओळख आहे, तिला मला अभिमानही आहे. मात्र, हा अभिमान सार्थ असावा यासाठी प्रयत्न करण्याची माझी इच्छा आहे. मित्रहो, अजूनही वेळ गेलेली नाही. इतिहासाच्या डबक्यात साठलेल्या पाण्यात कुजण्यापेक्षा, भविष्यातील गगनात विहार करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आहे. आपली स्वप्नं हीच आपले आयुष्य घडवतात आणि आपले आयुष्य घडले तरच भावी पिढीचे व समाजाचेही भवितव्य उज्ज्वल असू शकते. माझ्यासारखा सामान्य माणूस यापलीकडे काय सांगणार?

    ReplyDelete
    Replies
    1. Very nice comment.I have read blogs of saglikar,Sonawani,Anita but i got only heat for other community.
      Its time to unite India from other outer enemy and here we are barking on each other.Shame on us!!!!!!!!!!!!

      Delete
  8. Sonawni uposhanala baslat manje kaay baget basla hotat kaa? nahi, lagech photos kadhun, jase lok FB war upload kartat tase swatachya blog war upload kelet mhanun wicharle. ka, "ho me kharach uposhanala baslo hoto" mhanun tyache purawe dyayche hote? aajkaal uposhan karaychi pan hashion aaleli distey. udya lok sahalinche jase photos internet war upload kartat tase swatahachya uposhanache photos upload karayla laagtil.

    Waghyacha puatala parat basawla yaat tumchya uposhanala kinwa tatsam prayatnanna koni kadichihi kimmat dileli naahi. aaplya deshat zundashahi aahe mhanun to putala parat basla.
    Waghyacha puatala kaay kinwa dadoji cha puatala kaay, rajkarnyanna tyatil satya-asatyat kadichahi interest nawhta. bhatanchi zund akarane lahan mhanun dadoji ukhadlelach rahila aani dhangaranchi zunda mothi mhanun waghya parat basla.

    baki diwasbhar potyapanyasathi kahi karta ki naahi? ka akkha wel blog aani tumchya pratikriyanna pratikriya ch lihit baselel asta?

    ReplyDelete
  9. मला वाटते की संभाजी ब्रिगेडवाले जे करत आहेत ते इतरांच्या दृष्टीने चांगलेच आहे. याचा फटका पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाल निश्चितच बसणार आहे. शिवाजीला गेल्या शंभर वर्षात बनवले गेले आहे. शिवाजीची प्रतिमा आता नष्ट व्हायला सुरवात झाली आहे, आणि त्याला ब्रिगेडने मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे मराठी माणूस शिवकालातून बाहेर यायला मदत होणार आहे. शिवाजीच्या आधी महाराष्ट्राला शिवाजीपेक्षा महान इतिहास होता हे हळू-हळू मराठी माणसाच्या ध्यानात येणार आहे.

    मागे शरद पाटील यांनी 'शिवाजीचे शत्रू- महंमदी की ब्राम्हणी' असे पुस्तक लिहिले होते. पुढील काळात 'शिवाजीचे शत्रू- हिंदुत्ववादी की ब्रिगेडी ' असे पुस्तक बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.

    संभाजी ब्रिगेडचे चालू द्या. त्यात शेवटी ती संघटना नष्ट होणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवरायांची प्रतिमा वैश्विक आहे.शिवाजीद्वेषातून बाहेर या.पुढील काळात "शिवरायांचे शत्रू-श्वानप्रेमी की फुले-आंबेडकरवादी" असे विलास खरात व बालाजी जाधव लिखित पुस्तक येवू घातले आहे,असे ऐकून आहे.
      याचा फटका पुढील निवडणुकीत ब्रा.मा.ध.व.असे राजकीय गणित मांडून श्वानप्रेम उफाळून आलेल्या पक्षांना व नंतर पक्षांच्या सामाजिक विकारवंतांना बसणार आहे.

      Delete
  10. आधी दादोजी कोंडदेव..... आता वाघ्या कुत्रा ..... पुढे बहुधा ते गणपतीपुढील उंदीर हटवतील असे वाटते....... पण त्यानंतर काय?

    ReplyDelete
  11. महाराष्ट्रातिल सद्य परिस्थिती पाहता जातीयवादाने त्याचा उच्चांक गाठला आहे. खरी व्यथा ही आहे की छत्रपति शिवाजी महाराज हे केवळ मराठा जाती पुरते मर्यादित होण्याची भीति निर्माण झाली आहे.
    मी मराठा नाही, पण शिवाजी महाराजांनी जे थोर कार्य केले व सर्व समाजाला एकत्रित केले त्याला हा जातीयवाद काळिमा फ़ासत आहे,हे ह्या महाराष्ट्राचे दुर्दैव.....

    ReplyDelete
    Replies
    1. मराठा समाजाकडे दुसरे महान व्यक्तिमत्व नाही. शाहू महाराज महान असले तरी मराठ्यांना ते कधीच त्यांचे वाटले नाहीत. त्यामुळे शिवाजी मराठा होता हे समाजावर ठसवणे ही मराठ्यांची गरज आहे.

      Delete
    2. मराठ्यांना सर्व जातीय महापुरूष हे महान व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय आहेत.शिवाजी महाराज जास्तच आदरणीय आहेत.जातीयवाद्यांचा खेळ संपला.

      Delete
  12. शिवाजीची महानता ही इतर महान राजांची माहिती करून न घेणे यातच आहे. तुम्ही जेंव्हा भारतातील अकबर, औरंगझेब, महाराणा प्रताप, टिपू सुलतान, विजय नगर साम्राज्यातील राजे यांची चरित्रे वाचाल, तेंव्हा शिवाजी त्यांच्यापुढे खुजा आहे हे तुम्हाला दिसून येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. Wow this is the stupidest comment I have ever read in my life. You really should thank your mother for not aborting you as you just wasted her efforts in raising you.

      Delete
    2. शिवाजी महाराजांची महानता वर उल्लेखलेल्या राजांची माहिती करून दिल्यास त्यांच्यापुढे खुजी ठरणार असेल,तर लवकरात लवकर समाजाला माहिती करून द्या.उगाच शिवाजी महाराजांना महान का म्हणायचे ? नाही का ?

      Delete
    3. अकबराने देखील त्याने जिंकलेले प्रदेश लुटले होते. शिवाजीने मात्र शक्तिशाली मुघलांचा प्रदेश लुटला हे आश्चर्य आहे. शिवाजीने जे केले ते इतरांच्या डोक्यातही कधी आले नाही. उदा. शिवाजीने आरमार निर्माण केले. जर शिवाजी महाराज18व्या शतकात असते तर भारतावर ब्रिटिशांच्या गुलामगिरीची नामुष्की आली नसती.

      Delete
  13. होय शिवाजी राजे आमचेच आहेत!

    सोनवणी, होय शिवाजी राजे आमचेच आहेत. तुमच्यासारखे भुरटे त्यांच्यावर हक्क सांगू शकत नाहीत. तुमच्या सारख्या भोंदू लोकांपासून शिवाजी राजांना वाचविणे हे आमचे कामच आहे.

    गेली शंभर वर्षे बामनांनी शिवाजी राजांचा ताबा घेतला होता. त्यांनी महाजाराजांपेक्षा दादोजी कोंडदेव आणि रामदास यांना मोठे ठरविण्याची कारस्थाने केली. तुम्ही दुसरे काय करीत आहात. अस्तित्वात नसलेला वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांपेक्षा मोठा असल्याचे ठरविण्यासाठी तुम्ही आटापिटा करीत आहात. बामनांनी महाराजांचे नाव घेऊन हिन्दू-मुसलमान दंगली घडवल्या. तुम्ही महाराजांचे नाव मराठा-धनगर दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत आहात.

    सोनवणी यांच्या भुरटेपणाचा पर्दाफाश मी माझ्या ब्लॉगवर केला आहे. सोनवणी यांच्या युक्तीवादातला प्रत्येक शब्द कसा खोटा आहे, हे मी सिद्ध केले आहे.

    जिज्ञासूंनी माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्यावी. ब्लॉगची लिन्क अशी :
    http://www.sarvsamaj.blogspot.com

    -समीर पाटील बोरखेडकर.

    ReplyDelete
    Replies
    1. आरे कोण हा? जिथे तिथे उपटसुंभासारखा आपल्या सवंग विचारांनी ओतप्रोत भरलेल्या ब्लॉगचा प्रचार करतो. एकच घाण वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचे हे ब्रीगेडी धंदे पाहून लोकांना खरंच कीळस आलीय. लिहितावाचाता आले की साहीत्यिक झाल्याचा भास अनेकांना होतो. त्यातून काहींचे जरा अतीच होते. बेटा...जरा आपल्या विचारांच्या कक्षा वाढव, ब्रिगेडीगटाराच्या बाहेरही जगात खूप काही सुंदर, ज्ञानवर्धक व भविष्यवेधी असे वाचण्यासाठी आहे, ते वाच. किमान तू आज ज्या मनोवास्थेत आहेत, त्यातून काहीसा बाहेर तरी येईल व या जगावर खरोखर प्रेम करायला शिकशील. तुझे पालकही आनंदतील, असे कृत्य करायला शीक. उत्तम लेखक बनण्यासाठी उत्तम वाचन, वर्तन आणि विचार हवे आहेत. त्याची तुला नितांत गरज आहे. ब्रिगेडी विचारांमुळे तू मनोविकृतीकडे झुकतो आहेस व तुझा पुरेपूर वापर करुन घेणे ही त्यांचीही गरज आहे. ती वेळीच ओळख. तुझ्या केविलवाण्या प्रयत्नांना दाद द्यावीशी वाटली, म्हणून लिहिले. अन्यथा, तुझ्या ब्लॉगची दखल घेण्याइतकीदेखील पात्रता नाही. तू इथे येऊन लिहिण्यापेक्षा, सोनवणींसारख्या लेखकाने तुझ्या ब्लॉगवर येऊन संवाद साधावा, तुझ्या लेखनाला दाद द्यावी, यासाठी आधी स्वतःला पात्र समज. आणखी काय बोलू...यातून काही शिकलास तर चांगलेच, अन्यथा दरवेळी कुठे न कुठे माझे वाचा असे सांगत धडपडण्यात तुझे आयुष्य हरवेल..तुदेखील हरवेल आणि तुझा वापर करता येत नाही म्हणून ते देखील तुला विसरुन जातील, हे कायम लक्षात ठेव.

      Delete
    2. To BSS

      अरे बाबा, तुमचा शिवाजी तुम्हालाच लखलाभ असू द्या. आता आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला स्वत:ची बुद्धी आहे का? आधी तुम्ही बामणांच्या डोक्याने चालत होता, आता आंबेडकरवाद्यांच्या डोक्याने चालता. तुमच्या धडावर तुमचे डोके कधीच नव्हते, पुढेही असणार नाही. कारण तुम्हाला डोकेच नाही. वापर न केल्याने ते कधीच नष्ट झाले आहे. जोपर्यंत तुमच्या मोकळ्या डोक्यातून शिवाजी निघत नाही, तोपर्यंत तुमच्यावर ब्राम्हणाच राज्य करणार आहेत.

      Delete
    3. @BSS are asa shivaji shivaji karun kahi milat nasata. Shivaji maharajach kai pan itar konatyahi mahan vyakti che nusate gungan gaun ani jatiy bhumika gheun tuza kahi kalyan honar nahi ani tuzya kutumbiyancha pan nahi. Krupaya asa ayushya vaya ghalavu nakos tya peksha kahi tari vidhayak kaam kar. Tula savang vachanachi, Brigadi pustaka baheracha vachanyachi faar garaj ahe. Tya mule tuza avaka vadhel ani tu asa jatayawadi, dweshane bharalela blog lihit basanar nahit. Shivaji maharaj tyanchya kalat Itihas, Itihas mhanuna gala kadhat basale nahi tyani adhi apala vartaman nit kela ani tya mule tyanche ani te rahat asalelya 'Sarva' samajache bhavishya nit zale. Asa kahi tari samyak vaag mhanje ti maharajanna adaranjali tharel. Shubhechha!

      Delete
  14. To BSS

    अरे बाबा, तुमचा शिवाजी तुम्हालाच लखलाभ असू द्या. आता आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला स्वत:ची बुद्धी आहे का? आधी तुम्ही बामणांच्या डोक्याने चालत होता, आता आंबेडकरवाद्यांच्या डोक्याने चालता. तुमच्या धडावर तुमचे डोके कधीच नव्हते, पुढेही असणार नाही. कारण तुम्हाला डोकेच नाही. वापर न केल्याने ते कधीच नष्ट झाले आहे. जोपर्यंत तुमच्या मोकळ्या डोक्यातून शिवाजी निघत नाही, तोपर्यंत तुमच्यावर ब्राम्हणाच राज्य करणार आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्यावर कोण राज्य करत आहेत असे तुम्हाला वाटते?

      Delete
    2. आम्हीच आमचे मालक, आणि तुमचेही. म्हणूनच तर तुम्ही गेली पाच हजार वर्षे आमचे गुलाम राहिला आहात.

      Delete
    3. मराठ्यांना ‘गो-ब्राह्मण प्रतिपाळक' का म्हटले जाते?

      मराठा समाज मुळातच दानशूर आणि दयाळू आहे. खाण्या-पिण्याला तरसणाèया ब्राह्मणांना मराठ्यांनी नुसते सांभाळलेच नाही; तर परका आणि हातावरचा समाज म्हणून ब्राहणांना दुर्बळ घटक म्हणून विशेष सवलतीही दिल्या. उदा. देवधर्माचे काम त्यांच्याकडे सोपविले. त्याबदल्यात गावात भीक मागून खाण्याची परवानगी ब्राह्मणांना मिळाली. हक्काने भीक मागण्याच्या या पद्धतीला भिक्षुकी असे नाव पडले. ते आजही कायम आहे. आजही ग्रामीण भागातील ब्राह्मण भिक्षुकी करूनच जगत असतात. त्यांना भिक्षा देणारा समाज आजही मराठाच आहे. ब्राह्मणांना भारतातील अस्तित्त्व मराठा समाजाने मिळवून दिले. आधी कोकणात आणि नंतर देशावर ब्राह्मणांचे मूळ आश्रयदाते मराठेच होते. त्यामुळे ब्राह्मणांनी मराठ्यांना ‘गो-ब्राह्मण प्रतिपाळक' ही पदवी दिली. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हीच पदवी देण्यात आली. मराठा समाज हा ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा समाज आहे. त्यामुळे मराठ्यांनी ब्राह्मणांना द्वेष करू नये, असे मला वाटते.

      Read More on My blog : http://www.sarvsamaj.blogspot.com

      Delete
  15. Who was Shivaji?
    The mortals won't know
    He was a man,
    holding a moral bow...

    None has a right to claim
    his sacred throne
    From where with all might
    He claimed his worth alone.

    Who are these people
    hailing from the hell
    Those never could understood
    ever Shivaji's fame...

    ReplyDelete
  16. हरी नरके : प्रुफ रिडर तो रिडरच!

    कितीही शृंगारले तरी गाढवाचे घोडे होऊ शकत नाही
    य. दि. फडके यांनी महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय संपादित करून अद्ययावत ग्रंथ सिद्ध केला. या ग्रंथाची प्रुफे तपासण्याचे काम हरी नरके यांनी केले होते. प्रुफे तपासण्याच्या निमित्तानेही का असेना, पण नरके यांनी फुल्यांचे समग्र वाङ्मय वाचले आहे, असा माझा भ्रम होता. गो. पू. देशपांडे यांच्या समर्थनार्थ नरके यांनी जे तारे तोडले आहेत, ते पाहून माझा हा भ्रम दूर झाला. हरी नरके हे प्रूफ रिडर होते आणि आयुष्यभर ते प्रूफ रिडरच राहतील. फुल्यांचे वाङ्मय वाचताना नरक्यांनी हृस्व-दीर्घ पाहण्या पलिकडे काहीही केलेले नाही, हेच नरक्यांच्या या लेखाने सिद्ध केले आहे. प्रुफ रिडर लोक जेव्हा विचारवंत म्हणून मिरवू लागतात, तेव्हा यापेक्षा दुसरे काही घडण्याची अपेक्षाही ठेवता येत नाही. कितीही शृंगारले तरी गाढवाचे घोडे होऊ शकत नाही, हेच खरे.
    Read full article on my blog :

    ReplyDelete
  17. There's only one Hindu hero and that is Shivaji the Great. There's none like Him or His equal.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...