Friday, October 18, 2013

फक्त सत्ताकेंद्रे टिकवण्यासाठी मराठा आरक्षण?



मराठा आरक्षणाच्या मागणीवरून रण पेटले आहे. शासनाने राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असतांनाही नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली याबाबत शिफारशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. राणे समिती जेथेजेथे जात आहे तेथे तेथे मराठा संघटना व व्यक्ति मोठ्या प्रमाणावर निवेदने देत आहेत. मराठा समाजाचे निवेदने जेवड्या मोठ्या प्रमाणावर जात आहेत त्या प्रमाणात मात्र ज्यांचा या आरक्षणाला विरोध आहे त्यांची निवेदने मात्र जात नाहीत याची खंत व संताप काही ओबीसी विचारवंतांत आहे. मुळात ही मागणी न्याय्य आहे काय? घटनेच्या चौकटीत बसू शकते काय? आरक्षणाचे गाजर मराठा तरुणांना दाखवत त्यांची भावनिक फसवणूक करत मतपेट्या फुगवण्याची तर ही चाल नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात व त्यांवर तारतम्याने विचार केला पाहिजे. 

मराठा समाजात आता बेरोजगारीमुळे व शेतीचे पिढ्यानुपिढ्या तुकडीकरण होत आल्याने दारिद्र्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे आहे. शिक्षनात हा समाज मोठ्या प्रमाणावर मागे राहिला आहे हेही खरे आहे.राजकीय क्षेत्रात मात्र या समाजाकडे आज जवळपास ७०% वाटा आहे हेही एक वास्तव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षणसम्राटही याच समाजातून आले असून पतसंस्था, सहकारी ब्यंका, साखर कारखाने, सूतगिरण्या आदिंच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नाड्याही याच समाजाच्या हातात आहेत. ओबीसींच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतींवरील सत्ता मात्र कमी होत चालली आहे. या समाजाची नेमकी खंत काय आहे? शिक्षण-रोजगारातील वाटा कमी होतोय ही कि सत्तेत वाटेकरी निर्माण झालेत ही?

मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यासाठी मराठा व कुणबी हे एकच असा दावा करण्यात येत आहे. खुद्द कुणबी समाजाचा याला विरोध आहे कारण बेटीव्यवहाराच्या वेळीस मराठा व कुणबी यांच्यात साम्य मानले जात नाही हे एक सामाजिक वास्तव आहे. "आम्हाला राजकीय आरक्षण नको...फक्त शिक्षण व नोक-यांत हवे" ते "आम्हाला ओबीसींच्या कोट्याला कसलाही धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्या" अशा स्वरुपाच्या मागण्या कधी हिरीरीने तर कधी दडपशाहीच्या जोरावर होत आहेत. मराठा आरक्षण याच विषयावर आमदार बनलेले विनायक मेटे निवडणुका जवळ आल्या कि मराठा आरक्षनाचा विषय पेटवतात असा आता मराठा समाजानेच आरोप करणे सुरू केले आहे. "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. मराठ्यांना एक टक्काही वेगंए आरक्षण दिले जावू नये कारण त्यामुळे खुला प्रवर्गाची, ज्यावर सर्वांचाच अधिकार असतो, टक्केवारी घटणार आहे असे ओबीसी विचारवंतांचे म्हणने आहे. आपण जरा या सर्वच बाजू तपासून पहायला हव्यात.

पहिली बाब म्हणजे घटनेप्रमाने फक्त शिक्षण व नोक-यांत आरक्षण देता  येत नाही. आरक्षण हेच मुळात राजकीय प्रतिनिधित्वासाठी असून शिक्षण व नोक-या हे त्याचे उपविभाग आहेत. ते एक प्यकेज आहे व तोडून देता येत नाही. द्यायचे झाले तर सर्वात आधी घटनादुरुस्ती करावी लागेल याचेही भान कोणाला नाही. आरक्षन हे गरीबी हटावचा कार्यक्रम राबवण्यासाठी नसून सर्व उपेक्षित व मागास समाजघटकांना शासकीय व राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी व समतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी आहे. राजकीय सत्तेत मराठा समाज त्यांच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक असल्याने ही मागणी कशी मान्य होणार हा प्रश्न मेटेंना का पडला नाही? केवळ मराठ्यांना घटनात्मक तरतुदींमुळेच आरक्षण मिळू शकत नाही असे प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी वारंवार स्पष्ट केल्यानंतर व्यक्तिगत शत्रू असल्याप्रमाने नरकेंवर व्यक्तिगत हल्ले करत त्यांना मराठाद्वेष्टा ठरवण्याचा प्रयत्न मेटेंनी वारंवार केला आहे, हे कोणत्या लोकशाहीत बसते?

दुसरी बाब म्हणजे आरक्षण हा मुळात गरीबी हटावचा कार्यक्रम नसल्याने "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार कसे म्हणतात हे त्यांनाच ठाऊक. आर्थिक आधारावर आरक्षनाची घटनात्मक तरतूद नाही. गरीबी हटावसाठी अनेक शासकीय योजना खूप आधीपासूनच अस्तित्वात आहेत. शिक्षणात आर्थिक मागासांना फी माफीची तरतूद आहे. 

तिसरी सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मराठा आरक्षनाच्या मागणीमुळे आजवर ओबीसी ज्या समाजाला थोरल्या भावाप्रमाणे मानत होते ते मराठ्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. समाजातील ही उभी फूट किती धोकेदायक आहे हे आरक्षणवादी मराठा नेत्यांना समजत नाही कि काय? याचे परिनाम दीर्घ काळात सामाजिक विद्वेष वाढण्यात होनार नाही याची काय हमी आहे? 

नारायण राणे समिती बेकायदेशीर आहे कारण राज्य मागास वर्ग अस्तित्वात असतांना अशी समांतर समिती नेमता येत नाही असा दावा ओबीसी नेते करत असले तरी राज्य शासनाने या समितीच्या अध्यादेशात शब्दात न अडकण्याची दक्षता घेतलेली आहे. राणे समितीचे कार्य मराठा समाजाचे सर्वेक्षण करणे व शिफारशी करण्याइतपत मर्यादित आहे. प्रत्यक्षात राणे फक्त निवेदने स्वीकारण्यातच व्यस्त दिसत आहेत. मराठा समाजात राजकीय जागृती ओबीसींपेक्षा अधिक असल्याने साहजिकच मराठ्यांचे आरक्षण समर्थक अर्ज अधिक येत आहेत हे उघड आहे. निवडणुकीच्या तोंडावर राणे समिती आपल्या शिफारशी जाहीर करून पुन्हा सत्तेत येण्यासाठीचा मार्ग खूला करण्याच्या प्रयत्नांत असले तरी ओबीसी मोठ्या प्रमाणावर सध्याच्या सरकारविरोधात जातील आणि मतपेट्यांतून आपला रोष व्यक्त करतील हा धोका नाही काय? शिवाय ५२% ही आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नसल्याने समजा असे अधिकचे आरक्षण राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडत दिले तरी ते उच्च न्यायालयात तरी टिकणार आहे काय? यावर "नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल" असा सल्ला एका ओबीसी विचारवंताने दिला आहे. तसे केले तर आरक्षनाची मर्यादा वाढवता येईल हेही खरे आहे पण त्यामुळे आरक्षनाच्या मुलतत्वालाच धक्का लागनार असल्याने नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारत नाही व स्वीकारण्याची शक्यताही नाही. 

आजवरच्या सर्वच राज्य मागासवर्ग आयोगांनी व उच्च न्यायालयांनीही मराठ्यांना कोणत्याही निकषावर आरक्षण देता येत नाही म्हणुन मराठा आरक्षनाची मागणी फेटाळली आहे हे वास्तव आरक्षणवादी मराठा नेत्यांना माहित नाही असे नाही. परंतू तरुणांच्या भावना गैरवाजवी मागण्यांच्या मार्फत भडकावण्यात हे नेते व्यस्त आहेत.  

गेल्या काही निवडणुकांपासून मराठा समाजातील अनेक नेत्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्रे मिळविण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांच्या निवडणुका या बोगसगिरीमुळे बाद झालेल्या आहेत. पण असे केल्याने ख-या ओबीसींच्या नैसर्गिक व घटनात्मक अधिकारांवर आपण अतिक्रमण करत आहोत याचे भान मराठा नेत्यांनी ठेवलेले नाही. सर्वत्र अशी प्रमानपत्रे मिळणे आता अडचणीचे झाल्याने मराठा आरक्षण हा पर्याय पुढे आला आहे हे वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे. शिक्षण व नोक-या हे वरकरणीचे कारण आहे. असे आरक्षण मिळू शकत नाही, मिळाले तर ते राजकीय प्रतिनिधित्वासह असेल हे आरक्षणवाद्यांना चांगलेच माहित आहे. याबाबतीतील घटनादुरुस्ती शक्य नाही हेही वास्तव आहे. राजकीय प्रक्रियेत आत्ता कोठे प्रवेशू लागलेल्या ओबीसींना हा धोका चांगलाच माहित असल्याने आरक्षनाला विरोध होतो आहे याचे भान ठेवले जायला हवे. आणि मराठा समाजाचे सत्तेबद्दलचे पराकोटीचे आकर्षन अन्य समाजघटकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच या आरक्षणाच्या मागण्या करत आहे हे एक छुपे असले तरी वास्तव आहे. शिक्षण व नोक-यांतील आरक्षण ही फक्त मराठा तरुणांची व अन्य समाजांची दिशाभूल करनारी मागणी आहे.

मराठा समाजात दारिद्र्य वाढत आहे व शिक्षणाचे प्रमाणही साधारण आहे. या वास्तवामुळे आरक्षनाच्या मागणीबाबत मराठा तरुण आक्रमक करता येणे सोपे आहे हे आरक्षनवादी नेते जाणतात. परंतू असे आरक्षण मिळू शकत नाही हे सत्य मात्र ते सातत्याने लपवत आले असल्याने मराठा तरुणांची जी भावनिक फसवणुक केली जात आहे ती नक्कीच निषेधार्ह आहे.

एक बाब आरक्षणवादी विसरत आहेत ती ही कि मुळात आरक्षणाने एकाही समाजाचे नीट भले केलेले नाही. आजवर एस.सी./एस.टी
समाजघटक देशात जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक असुनही आजवर शासकीय नोक-या मिळाल्यात २५ लाखाच्या आसपास. ओबीसींना २७% आरक्षण असुनही प्रत्यक्षात आजवर ४.८% एवढेच ते वापरले गेले आहे. अनुशेषाचे प्रमाण अवाढव्य वाढलेले आहे. याचे कारण म्हणजे सरकार जागतिकीकरणामुळे एकमागोमाग एक क्षेत्रातून काढता पाय घेत आहे. नवीन भरत्या कमी झालेल्या आहेत. शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरनही वेगाने वाढत चालले असून अनुदानेही कमी करण्याच्या मागे सरकार आहे. त्यामुळे शिक्षण हे दिवसेंदिवस महागच होत जाणार आहे. सध्याची शिक्षणपद्धती फक्त बेरोजगार निर्माण करणारे अवाढव्य कारखाने होऊन बसले आहेत. आज बेरोजगारी हा सर्वच समाजांपुढे प्रश्नचिन्ह बनून उभी आहे. आरक्षण शिक्षण व नोक-यांचे प्रश्न सोडवू शकेल हा एक भ्रम आहे. आरक्षनाने प्रश्न सोडविण्याऐवजी अनेक प्रश्न उभे केले असून आरक्षण लवकरात लवकर संपावे असे मतप्रवाह ओबीसी व एस.सी. समाजांतील काही विचारवंत निर्माण करत असतांना मराठा आरक्षनाच्या जोर पकडत चाललेल्या मागण्यांमुळे त्या दिशेने समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे हेही एक कटू वास्तव आहे. आरक्षनाने फायदा विशेष नसला तरी आपल्या आडातले (नसलेले) पाणी दुसरा पळवून नेईल या असुरक्षित भावनेचा जन्म ओबीसींच्या मनात झालेला आहे व त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी अशी अवांछनीय फूट समाजात पडली आहे.  ती सर्वस्वी चुकीची आहे. अशी फुट निर्माण होऊ नये यासाठी जाणत्या नेत्यांनी तरी प्रयत्न केले पाहिजेत. 

खरे तर आपल्याला नेमके कशावर लक्ष केंद्रीत करायला हवे हेच कोनाला समजेना झाले आहे. सर्वात प्रथम आपली शिक्षनपद्धती बदलावी लागनार आहे. जगण्याचे कसलेही कौशल्य अथवा कोणत्याही एका विषयातील तज्ञता न देणारी आपली शिक्षनपद्धतीच समूळ बदलवण्याची गरज असतांना त्याबाबतचे प्रबोधन करण्याऐवजी त्यात आरक्षण मागत जाणे हे सामाजिक आरोग्याचे चांगले लक्षण नाही. आज भारतात हाताला काम मागणा-यांचीच संख्या अवाढव्य आहे...काम देनारे हात वाढवण्यासाठ्दी मात्र कसलेही प्रयत्न होत नाहीत...हे कसले विचित्र चित्र आहे?
   
खरे तर बळावत चाललेली जातिव्यवस्था हे आपल्या समाजासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जातिआधारीत आरक्षणाला संपुर्ण नकार देत व्यापक आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी जी इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते तिचा भारतीय समाजात आणि म्हणुनच राजकीय नेतृत्वात पुरेपुर अभाव आहे हे स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील एक कीड मानली जाणारी जातिव्यवस्था समूळ नष्ट करत सशक्त, स्वाभिमानी आणि समतेच्या एकाकार तत्वावर उभारलेला बलशाली भारत निर्माण करण्याचे स्वप्न हे स्वप्नच उरले. देशाचा काही प्रमाणात विकास झाला परंतू तो आपल्या बळावर नव्हे तर परकीय भांडवलावर व परकीय कंपन्यांच्या जीवावर केला जातो आहे. सर्वच रोख आरक्षणावर ठेवल्याने विकासाच्या इतरही पर्यायांवर व्यापक चर्चा घडवुन आणत वंचितांचे आर्थिक व सामाजिक उत्थान घडवण्यासाठी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करता येणे शक्य होते, पण ते झालेले नाही. आता जे झाले नाही त्याबाबत उरबडवेपणा करण्यात अर्थ नसून आज आम्ही कोणत्या दिशेने जाण्यासाठी कटिबद्ध असायला हवे यावर चर्चा करायला नको काय? तसे न करता तरुणांची दिशाभूल करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणे, समाजात फूट पाडणे कोणत्या सुज्ञपणाचे लक्षण आहे? 

खरे तर सर्वच समाजांनी सत्ता ते रोजगार याबाबत परस्पर सहाय्यक होत आरक्षनाच्या कुबड्यांना फेकून देण्याची वेळ आली आहे. आज ओबीसींना फक्त आरक्षनामुळेच सत्तेत थोडाफार तरी वाटा मिळू लागला आहे. तो आरक्षनाशिवायच दिला गेला असता तर आज सौहार्दमय सामाजिक चित्र दिसले असते. सत्ताकेंद्रे आपल्या हातातून निसटू नयेत यासाठीचा हा आटापिटा आहे....मराठा तरुणांना खरोखर शिक्षण व नोक-यांत अधिक संध्या मिळाव्यात यासाठी नाही हेही या निमित्ताने समजावून घ्यावे लागणार आहे. 

132 comments:

  1. गुणवत्ता आणि आरक्षण

    वस्तुतः गुणवत्ता हि काय आहे , तिचे निकष कोणते , ती निसर्ग निर्मित आहे कि , मानव निर्मित आहे , प्रयत्नाने ती मिळविता येते कि नाही , वैज्ञानिक परीप्रेक्षमद्धे त्याचे नेमके उत्तर आहे कि नाही ; याचा शास्त्रशुद्ध विचार न करता हाकाटी पिटण्याची आणि त्या द्वारे बुद्धीभ्रंश करण्याची स्पर्धा चालू आहे .
    मूल्यवर्धित हि ज्ञान शाखा असल्याने सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या ज्ञानशाखनमद्धे प्रवेश घेणे अशक्य असते . त्यामुळे आर्थिक , सामाजिक , व शैक्षणिक प्रतिष्ठितांच्या ताब्यात असलेली हि ज्ञानशाखा आहे . दुर्बल घटकान्मद्धे बौद्धिक क्षमता असते , परंतु या ज्ञान शाखेमद्धे आर्थिक दुर्बलतेमुळे प्रवेश करता येत नाही . परिणामी हि ज्ञानशाखा उच्चजाती आणि भांडवलदारांची मिरासदारी होऊन बसली आहे . अशा उच्चजाती आणि भांडवलदारांचे या
    ज्ञानशाखांमद्धे वर्चस्व असल्यामुळे केवळ आपल्याकडेच गुणवत्ता आहे अशी त्यांची मनोधारणा झालेली आहे . त्यातूनच सामाजिक , आर्थिक , आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाज्याविषयी तुच्छता दृष्ठी वाढलेली आहे . मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध हा त्याचाच एक भाग आहे . वास्तविक उच्च जातींची ज्ञानक्षेत्रातील गुणवत्ता काय आहे ? त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का ? याचाही विचार करणे आवश्यक वाटते .
    वैद्यकीय , अभियांत्रिकी , भौतिकशास्त्र , व्यावासाहिक , तंत्रज्ञानिक ज्ञानशाखांमद्धे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून खाजगी शिकविण्या असतात . शाळेतील फी पेक्ष्या अनेक पटींनी फी देऊन खाजगी शिकविण्या सुरु होतात . पाठांतर आणि केवळ परीक्षा हे लक्ष्य खाजगी शिकविण्यानचे असते . त्यामुळे विद्यार्थ्यांमद्धे बौद्धिक प्रगल्भता येण्या ऐवजी केवळ परीक्षेसाठी अपेक्षित उत्तर
    येव्हडाच सराव करण्याची मानसिकता रूढ होते . गुणांची अधिक टक्केवारी मिळविण्याचा हा जलद गती मार्ग असला तरी या ज्ञानाचा व्यवहारात फार उपयोग होत नाही . परंतु आपणाकडे ज्ञानाची कसोटी मोजण्याची पद्दत केवळ गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे गुणवत्ताधारक म्हणून अशा अपेक्षित उत्तरांचा सराव करणाऱ्या विद्धार्थांचीच संभावना केली जाते . त्यांच्या अपेक्षित मार्गाने ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होणे शक्य नाही . नवनिर्मिती किंवा नवसंशोधनासाठी मुलातील ज्ञानभांडार आत्मसात करणे अनिवार्य असते . दुय्यम साधनांवर आम्ही विसंबून असल्यामुळे केवळ गुणांची टक्केवारी वाढली , परंतु गुणवत्ता पूर्णतः ढासळून गेली आहे .
    कायद्याचे आणि संविधानाचे जेष्ठ अभ्यासक सत्यरंजन साठे यांनी मांडलेले मत विचारात घेण्यासारखे आहे . ते म्हणतात कि “ केवळ कायद्यापुढे सर्व समान आहेत किंवा कायद्याने समान संरक्षण मिळेल एवढे सांगून भागणार नाही , कारण अशी हमी असूनही अमेरिकेत काळ्या लोकांना अनेक जाचक निर्बंद्धांना तोंड द्यावे लागले होते . १८९६ मद्धे प्लेसी विरुद्ध फर्गुसन या प्रसिद्ध खटल्यात काळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोयी केल्याने समतेचा भंग होत नाही , असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .” आरक्षण , गुणवत्ता , आर्थिक निकष आणि भारतीय संविधानातील समतेचे तत्व याची चिकित्सा करताना न्यायपालिका , राजकारणी आणि उच्चजातीतील लोकांनी सत्यरंजन साठेंच्या मनाचा विवेक ठेवून विचार केला तर कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार नाही .
    माजी राज्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पदव्या मिळविणारे पहिलेच विद्वान दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मंडल आयोगावरील चर्चेत विधान परिषदेत दि . १० डिसेंबर , १९९० रोजी दिलेली माहिती अशी “महाराष्ट्रात झालेल्या चार मोठ्या संपाच्या काळात एकूण १ लाख , ६ हजार कर्मचारी भरले गेले . त्यापैकी ९६ हजार ब्राम्हण होते . या ९६ हजारांचे आई किंवा वडील अगोदरच सरकारी नोकरीत होते, तर १६ हजारांचे आई व वडील दोघेही सरकारी नोकरीत होते."
    यालाच गुणवत्ता आणि समान संधी म्हणावयाचे काय ?
    विचार तर कराल !

    डॉ. विनोद पवार

    ReplyDelete
    Replies
    1. GREAT THOUGHTS!

      Delete
    2. अतिशय उत्तम विचार.

      Delete
  2. साहित्य संमेलन अध्यक्षपदी फ. मुं. शिंदे

    सासवड येथे पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांची निवड झाली आहे. फ. मुं. नी 460 मते मिळवून ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचा 129 मतांनी पराभव केला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यानंतर फ.मुं. हे मराठवाड्यातील दुसरे संमेलनाध्यक्ष ठरले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सातारचे साहित्यिक अरुण गोडबोले यांना 60 मते मिळाली.
    अध्यक्षपदाच्या शर्यतीत फ. मुं. यांच्याबरोबरच ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर (अमरावती), अरुण गोडबोले व संजय सोनवणी (पुणे) हे उमेदवार होते. या निवडणुकीत 1069 मतदारांपैकी 907 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये प्रा. फ. मुं. शिंदे यांनी 460 इतकी विक्रमी मते मिळवून बाजी मारली. प्रभा गणोरकर यांना 331 तर संजय सोनवणी यांना 39 मते मिळाली.
    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यालयात आज सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 1 वाजता निकाल जाहीर झाला. 3 ते 5 जानेवारी 2014 दरम्यान पुणे जिल्ह्यातील सासवड येथे हे संमेलन भरवण्यात येणार आहे.
    सन्मान डॉ. आंबेडकर व आईला अर्पण
    मी बाबासाहेबांचं लेकरू आहे. म्हणून हा सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वाहतो आणि माझ्या आईला अर्पण करतो', अशा शब्दात फ.मुं.नी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. त्यामुळे हे यश मी पत्नीलाही समर्पित करतो, असेही ते म्हणाले.
    स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे
    साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे असले तरी त्याला आर्थिक पाठबळ राजकीय क्षेत्रातून मिळत असते.
    राजकीय व्यक्तीही वैचारिक असतात. त्यामुळे साहित्य संंमेलनाला राजकीय अस्पृश्यता नसावी. फक्त सत्तेपुढे स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे, अशी अपेक्षा निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फ.मुं. शिंदे यांनी व्यक्त केली.
    ते म्हणाले, संमेलन फक्त साहित्यिकांनी आयोजित करावीत, असे आपल्याला वाटते; परंतु संंमेलनाला आर्थिक पाठबळ देणारे आणि आयोजक हे राजकीय क्षेत्रातील असतात. राजकारणातील व्यक्तींनाही साहित्याची आवड असू शकते. राजकीय व्यक्तीही वैचारिक असतात. त्यामुळे संमेलनास राजकीय व्यक्ती कशाला, असा प्रश्न विचारणे योग्य नाही. उद्‌घाटन व समारोप सोडला तर इतर दिवशी साहित्यिकांचेच संमेलन असते. संमेलनाला राजकीय अस्पृश्यता नसावी. फक्त सत्तेपुढे स्वातंत्र्याचा श्वास घेता आला पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे.
    संमेलन ही सामाजिक घटना आहे. घरातल्या घरात चर्चा करतानाही छोटे संमेलनच भरवलेले असते; परंतु मोठ्या संमेलनांवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. संमेलनाला येणाऱ्या लेखक, साहित्यिकांच्या सरबराईत जास्त पैसा खर्च होतो. तेव्हा साहित्यिकांनी साहित्याच्या ओढीने स्वखर्चाने संमेलनास उपस्थित रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    अध्यक्षपदाबाबत बोलताना फ.मुं. म्हणाले, हा आनंद माझ्या एकट्याचा नाही तर उर्वरित तिन्ही स्पर्धक साहित्यिकांचा आहे. हा आनंद मी समाजाला वाटत आहे. आम्ही एकमेकांचे "प्रतिस्पर्धी' नसून "प्रतिनिधी' होतो. ही निवडणूक वादात न अडकता केवळ संवादाने पार पडल्याचा विशेष आनंद आहे. साहित्य क्षेत्रात गेली 30-40 वर्षे केलेल्या कामाची आणि मराठी माणसाच्या प्रेमाची ही पावती आहे. 12 वर्षांपूर्वी मी आचार्य अत्रे संमेलनाचा अध्यक्ष होतो. आता अत्र्यांच्या जन्मगावी होणाऱ्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो. हा केवळ योगायोग नाही. मी अत्र्यांच्या वंशातील आहे तर लेखनाने त्यांच्या अंशातील आहे. अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या काळात काम करण्याची वेगळी कार्यक्रमपत्रिका नाही. आजवर जे करत आलो तेच करणार आहे. सतत समकालीन राहणार असून संमेलनातील तरुणांच्या सहभागावर विशेष लक्ष देणार आहे.

    ReplyDelete
  3. फ. मुं. चा अल्पपरिचय
    कवी फकीरराव मुंजाजी शिंदे हे औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यपक म्हणून 2002 मध्ये निवृत्त झाले. 'आई एक गाव असतं' ही त्यांची कविता लोकप्रिय आहे. त्यांच्या नावावर 27 कवितासंग्रह आणि इतर विपुल साहित्य लेखन आहे. त्यांच्या राजकीय वात्रटीकाही विशेष लोकप्रिय आहेत. त्यांना तीन वेळा राज्य सरकारचा "केशवसुत पुरस्कार' मिळाला आहे. अवशेष, आई, गणगवळण, मेणा, मी सामील समूहात, ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. शिंदेंनी कथा, कादंबऱ्यांबरोबर भावगीते, लोकगीते आणि भक्तिगीतांची रचना केली आहे. त्यांनी आतापर्यंत 9 मराठी चित्रपटांसाठी व अनेक मालिकांसाठी शीर्षकगीतेही लिहिली आहेत. आई असते जन्माची शिदोरी; सरतही नाही आणि उरतही नाही, असे फ.मुं आपल्या "आई' या कवितेत म्हणतात. "आई एक नावं असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं', असा भाव व्यक्त करणाऱ्या 11 कडव्यांच्या या कवितेत आईचं वर्णन त्यांनी इतक्या ताकदीने केले आहे, की ते थेट काळजाला भिडतं. या संग्रहात 27 कविता आहेत. कविता संग्रह खपत नाहीत, असं म्हटलं जातं; पण हा कविता संग्रह त्याला अपवाद आहे. या कविता संग्रहाच्या आजपर्यंत चार आवृत्त्या निघाल्या आहेत.

    ReplyDelete
  4. कवीचा सन्मान

    आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत आणि ज्ञानेश्वर माउलींचे बंधू सोपानकाका यांच्या समाधीच्या परिसरात, कऱ्हा नदीकाठच्या सासवडमध्ये होणाऱ्या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मुं. उर्फ फकिरा मुंजाजी शिंदे यांची बहुमताने झालेली निवड, म्हणजे ज्येष्ठ कवीचा सन्मान होय. मराठवाड्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या रूपूर या गावात जन्मलेल्या शिंदे यांची कविता गोदावरीच्या पाण्याचे पावित्र्य आणि मराठवाड्याच्या मातीचा गंध घेऊन रसिकांच्या समोर आली. या प्रतिभावान कवीच्या कवितांनी साऱ्या महाराष्ट्रातल्या साहित्य रसिकांवर गारुड घातले आहे.
    आई एक नाव असतं
    घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
    सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
    आता नसली तर कुठंच तरी नाही म्हणवत नाही
    आई असते जन्माची शिदोरी
    सरतही नाही आणि उरतही नाही
    आईच्या महन्मंगल मायेची, तिच्या सावलीची अशा भारावल्या शब्दात महती गाणाऱ्या शिंदे यांच्या या कवितेनं त्यांचं नातं थेट माधव ज्युलियन आणि यशवंत या आईच्या कवितेनंच चिरंतन झालेल्या कवीशी जोडलं गेलं. आई इतकीच आपली भूमी, घर, परिवार, गोतावळा आणि मातीवर अफाट प्रेम असलेल्या या कवींना गेल्या तीस दशकात आपल्या कवितेनं स्वत:ची नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली आहे. आपल्या कवितांनी, कवी संमेलनांनी आणि कवी संमेलनातल्या सूत्रसंचालनानं साहित्य संमेलनं, साहित्य मेळावे, गाजवणारा हा कवी आता कऱ्हेकाठी साहित्य संमेलनात मराठी साहित्य आणि मराठी भाषेवरचं मुक्त चिंतन अध्यक्षपदावरून करील. ही निवड जाहीर झाल्यावर अत्यंत विनम्रपणे शिंदे यांनी निवडणुकीच्या या निकालाचा स्वीकार केला, हे त्यांच्यावर आईनं बालपणीच केलेल्या संस्काराची प्रचिती होय. "या निवडणुकीत मला सर्वाधिक मतं मिळाली म्हणून अध्यक्षपदाचा हा सन्मान मला मिळाला आहे. पण, माझ्या बरोबरचे अन्य तीन प्रतिस्पर्धी साहित्यिक सहकारीही मराठी साहित्याचेच प्रतिनिधी आहेत. हा सन्मान माझ्या आईला, जगातल्या सर्व जन्मदांना आणि पत्नी ही अनंत काळची माता असल्यानं तिलाही अर्पण करतो', अशा शब्दात शिंदे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याचा व्यक्त केलेला आनंद त्यांच्या संयमशीलतेचीच प्रचिती घडवतो. गेली काही वर्ष साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक वाद आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजत होती. यावेळची ही निवडणूक मात्र शिंदे, प्रभा गणोरकर, अरुण गोडबोले आणि संजय सोनवणी या चारही उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीत केलेल्या प्रचारानं आगळी ठरली. कोणतेही आरोप प्रत्यारोप या उमेदवारांनी परस्परांवर करणार नाही, असं अभिवचन मतदार आणि साहित्य रसिकांना दिलेलं होतं आणि शेवटपर्यंत त्यांनी ते कटाक्षानं पाळल्यानंच ही निवडणूक वादंगाशिवाय पार पडली आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा पायंडा पाडला गेला. शिंदे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही. देशातल्या मराठी भाषक साहित्य संस्थांच्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अस्मितादर्श या नियतकालिकात शिंदे यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ग्रामीण भागात बालपण घालवल्यानं शेती-शेतकरी, ग्रामीण जीवन, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक बदल, राजकीय स्थित्यंतरं या साऱ्यांचे अनुभव त्यांना आले. संवेदनशील आणि हळव्या वृत्तीच्या शिंदे यांनी हे सारं आपलं अनुभवविश्व कवितेद्वारे रसिकांच्यासमोर मांडलं. कोणत्याही चाकोरीत त्यांची कविता अडकलेली नाही. विद्रोहापासून विडंबनापर्यंत ते उपहास आणि मानवी जीवनातल्या विविध मानसिक आंदोलनापर्यंतचे आविष्कार त्यांच्या कवितेत उमटले आहेत. सर्वस्पर्शी अशा या स्वतंत्र शैलीच्या कवीकडून महाराष्ट्रातील रसिकांच्या अपेक्षा होत्या. त्या त्यांनी पूर्णही केल्या. आता अध्यक्षपदावरून ते काय बोलतात याची उत्सुकता साहित्य रसिकांना आहे.

    ReplyDelete
  5. CONED.........

    साद-पडसाद
    दोन वर्षांपूर्वी वसंत आबाजी डहाके यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्यांच्या विरोधात प्रतिमा इंगोले यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवताना डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर यांनी आपण महिला साहित्यिक आहोत, तेव्हा त्यांनाच हा मान मिळावा असं आवाहन, त्यांचं समर्थन करणाऱ्या साहित्यिकांना केलं होतं. पण, इंगोले याही महिला उमेदवारच होत्या. तेव्हा तो मान त्यांना का दिला गेला नाही? याचं उत्तर गणोरकर समर्थकांनी दिलेलं नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यावर गणोरकर यांनी शिंदे यांचं अभिनंदन करताना निवडणुकीचं तंत्र आपल्याला समजलं नाही, मत मिळवायच्या तंत्रात आपण मागे पडलो, त्यामुळचं आपल्याला हा मान मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पराभवाचे शल्य नाही, पण प्रचाराच्या तंत्रात कमी पडल्यानंच माझा पराभव झाला असला, तरी हा कौल मान्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नव्या पिढीतल्या लेखकांनी या अध्यक्षपदाच्या लढतीत हिंमतीनं उतरायला हवं, निवडणुकीचं तंत्र समजून घ्यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शिंदे यांनी संमेलनाला राजकीय अस्पृश्यता नको आणि साहित्यिकांनी स्वत:च्या खर्चानं संमेलनाला यावं, उत्सवी संमेलनाच्या खर्चावर नियंत्रण असावं, असं मत व्यक्त केलं आहे.

    निवडणुकीपूर्वी काही वाद झाले नाहीत. पण निवडणुकीनंतर मात्र साद-पडसाद उमटलेच आहेत, हे विशेष ! या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण गोडबोले यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक लढवताना आलेले अनुभव आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आपलं स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केलं होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या मर्यादित मतदारांच्या संख्येबाबतच त्यांनी उभं केलेलं प्रश्नचिन्ह महत्त्वाचं ठरतं. अध्यक्षपदाचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिकाला गौरवपूर्वक मिळायला हवा. या पदासाठी अर्ज, विनंत्या, निवडणूक अशा तापदायी प्रक्रियेला त्यांना सामोरं जावू नये. साहित्य संमेलनाच्या निवडीची प्रक्रिया बदलावी, यासाठी गोडबोले यांच्या बरोबरच अनेक साहित्यिकांनीही जाहीरपणे ही निवड बिनविरोध व्हावी आणि त्यासाठी साहित्य महामंडळाने सध्याची घटना बदलावी, अशी मागणी जाहीरपणे केली असली, तरीही हे महामंडळ आणि महामंडळाशी संलग्न असलेल्या साहित्य संस्था तसा बदल घडवायला तयार नाहीत. कोकण मराठी साहित्य परिषद आणि बेळगावच्या साहित्य परिषदेलाही संलग्नता द्यायला मराठी साहित्य परिषदेची तयारी नाही. वास्तविक महाराष्ट्रभर होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजक संस्थांनाही साहित्य परिषदेची सलग्नता मिळायला हवा. मराठी साहित्य क्षेत्र अधिक व्यापक आणि साहित्य रसिकाभिमुख होण्यासाठी गोडबोले यांनी केलेल्या सूचनांचा विचार साहित्य परिषद आणि महामंडळानं करायला हवा. दरवर्षीच अशा सूचना होतात आणि नंतर त्या मागं पडतात, असा अनुभव आहे. निदान यावेळी तरी या सूचनांचा विचार साहित्य संंमेलनात व्हावा, अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  6. "बेटीव्यवहाराच्या वेळीस मराठा व कुणबी यांच्यात साम्य मानले जात नाही हे एक सामाजिक वास्तव आहे."

    बेटीव्यवहाराच्या वेळेस ओबीसींमधील किती जातींमध्ये साम्य मानले जाते याची प्रातिनिधिक उदाहरणे देऊ शकाल काय?

    ReplyDelete
  7. मराठा ही जात नसून महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो तो मराठा. अगदी बरोबर. परंतु मूळ मुद्दा असा आहे कि आज जे मराठा जातीचे म्हणवले जातात त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा पवार यांची मुख्य आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड होताच ब्राम्हणी प्रसारमाध्यमांनी सत्ता मराठ्यांच्या हातात गेली असा अपप्रचार सुरु केला होता. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हा पत्रकार, संपादक माडखोलकर यांनी कुत्सित प्रश्न विचारला होता कि हे राज्य मराठा कि मराठी ? ही जी जातीयवादी भूमिका आहे त्याचा उहापोह होणे गरजेचे आहे. सोनवणी सरांनी मराठा या संकल्पनेबाबत जे मत मांडले ते अगदी योग्य आहे आणि परवा सांगलीत झालेल्या मराठा संमेलनात हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला गेला. मात्र सध्या मुद्दा हा आहे कि ब्राम्हणी प्रसारमाध्यमातून मराठा विरुद्ध ओ. बी. सी., दलित अशा प्रकारची भांडणे लावण्याचा जो नालायकपणा होत आहे त्याला आपण चोख उत्तर दिले पाहिजे. सतत ब्राह्मनाना झोडपले जाते अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि ब्राम्हणी व्यवस्था सतत समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न का करते ? ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणत्या प्रसारमाध्यमांनी हे राज्य ब्राम्हणांचे कि मराठी लोकांचे ? असा प्रश्न विचारल्याचे ऐकिवात नाही. इतिहास विसरून जाण्याचा साळसूद सल्ला आम्हाला या सनातनी लोकांच्याकडून देण्यात येतो. यशवंतराव चाव्हाणांना विचारलेला प्रश्न जातीयवादी भावनेने विचारला गेला, ती बाब इतिहास जमा झाली म्हणून आम्ही विसरून ही गेलो. परंतु आजही ती जातीयवादी भूमिका, तेच जातीयवादी लोक त्याच पद्धतीने कार्यरत आहेत, मग आताही आम्ही हे विसरून जायचे का ? बहुजन समाजातील मराठा (प्रचलित अर्थाने) हा एक महत्वाचा घटक. त्यात आता मराठे स्वताचे मेंदू वापरायला लागले आहेत आणि इथेच खरी गोची झाली. आजपर्यंत जय भवानी म्हणायचा अवकाश कि मराठे पेटून उठलेच. त्यावेळी मराठ्यांना चिथावणी देणं फार सोप्प होतं. मात्र आता बहुतांशी मराठा समाज फुले-शाहू-आंबेडकर समजून घ्यायला लागल्यापासून या सनातनी लोकांचे अवघड झाले. त्यामुळे मराठा समाजाविरुद्ध इतर बहुजन कसे पेटून उठतील याच प्रतीक्षेत हे असतात. मग कधी मराठा आरक्षणावरून ओ. बी. सी. च्या मनात गैरसमज निर्माण करतील, तर कधी भुजबळ, मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे अशा कंड्या पसरवतील. कोणताही वाद असो, त्यातून बहुजन समाज एकमेकाबरोबर कसा भांडत राहील यासाठी ही व्यवस्था पद्धतशिरपणे कार्यरत असते. आणि या व्यवस्थेला विरोध करणे म्हणजे ब्राम्हणद्वेष असे जर कोण म्हणत असेल तर त्यांनी भारतातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास करून बहुतांशी गोष्टीत कसा ब्राह्मणवाद लपला आहे ते पहावे.
    बहुजन समाजातील सुजान लोकांना एक विनंती आहे, त्यांनी प्रसार माध्यमे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने असे प्रकार का होतात त्याचा शोध घ्यावा.

    ReplyDelete
  8. वा वा. छान छान. सगळ्या सत्ता उपभोगुन आता बाकीचे पुढे गेले तेंव्हा आता तुम्ही बहुजन झालात होये. आईकावे ते नावलच. अजून थोड्या दिवसांनी मग तुम्ही स्वतः दलितच असे म्हणून घ्यायला लाजू नका. तुमची इच्छा पूर्ण होवो. असेच खाली खाली जात राहा. फक्त तेवढे सत्ता सोडा आणि शिक्षण संस्था खरोखर बहुजनांच्या हातात द्या म्हणजे झाले

    ReplyDelete
  9. ज्यांना राजकीय बैठक नाही अशा अनेक मराठा परिवारांना आज आर्थिक मदतीची आणि सामाजिक स्थैर्याची गरज आहे हे विसरून चालणार नाही

    त्यांची गात जवळ जवळ ओबीसी सारखीच आहे !

    त्यांना मराठा आरक्षणाने सुरक्षितता लाभेल या उलट ओबीसी विशेषतः माळी समाजात आर्थिक भक्कम पाया असलेला वर्ग आज आरामात आरक्षणाचे फायदे उकळत आहे !

    आज खरेतर राष्ट्रीय स्तरावर आरक्षणाच्या भूमिकेचा पुनर्विचार झाला पाहिजे !

    ReplyDelete
    Replies
    1. मराठा कोण? :

      ‘अन्यायाविरीद्ध जो लढेल तोच मराठा नाहीतर नुसताच खराटा’

      “जे का रंजले-गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले.
      तोची मराठा मानावा, शिवराय तेथेची जाणावा”

      Delete
    2. घाटगे-बाटगे.

      Delete
    3. अर्थात घाटगे खराटा आहे तर!

      Delete
    4. संजय सोनावणी सर ,

      श्री चैतन्य सर , आणि श्री सांगलीकर


      श्री घाटगे सराना बाटगे आणि खराटा म्हणणारे खरच मनाने दुबळे दिसत आहेत -

      श्री घाटगे सरांचे विचार आणि आचार अत्यंत सच्चे असतात - ज्यांचे जिथे चुकेल तेथे ते निर्भीडपणे या इतक्या वयातसुद्धा न घाबरता स्पष्ट सांगत असतात

      जे कोणी असे चोरून निनावी त्याना वाईट लिहित आहे त्यांचा निषेध केला पाहिजे

      तुमच्या टीकेमुळे असे सच्चे शुद्ध विचार कधीही थांबणार नाहीत -


      आमच्या सांगलीत त्याना मानाचा मुजरा करणारे कधीही त्यांचा अवमान करणार नाहीत

      पहाटे पाचला गणपतीला रोज त्यांची भेट होते त्यावेळेस सुद्धा ते इतकेच फ्रेश आणि तल्लख असतात आणि सर्वाना सहकार्य व मार्गदर्शन करण्यास उत्सुक असतात !


      खरा मुद्दा विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचा आहे - ते सांगताना तो सुसंस्कृतपणे मांडला जाईल असे बघणे आपले कर्तव्य आहे - नाहीतर शाळेतल्या किंवा

      सार्वजनिक मुताऱ्यातील थोर वाङ्ग्मय आणि संजय सोनवणी सर यांच्या ब्लोगवरील थोर प्रतिक्रिया यात फारसा फरक राहणार नाही

      संजय सरानापण विनंती कि जो कोणी सच्चाईने आपले मत मांडत असेल त्याला लेखन शुचीर्भूतीचे अभय मिळाले पाहिजे - असेच अरबट चरबट उत्तर मिळाले तर अशी उमदा मत व्यक्त करणारी मने कोमेजून जातील आणि आपला ब्लोग हा एक प्रचारी ब्लोग ठरेल - संभाजी ब्रिगेड आणि अनिता विचार मंच सारखा !


      डॉ . नीरव घोरपडे

      Delete
  10. संजय सर ,

    चैतन्य सर ,

    अत्यंत महत्वाचा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद

    आज खरी गरज आहे ती सहकाराची - पण अधिकार आणि हक्क विरुद्ध सामंजस्य सहकार असा खेळ चालू असेल तर मत परिवर्तन होणार कसे ?

    समाजातील सधन शेतकरी हे सधन कसे झाले आणि कधी झाले , कुणाच्या आशीर्वादाने झाले याचा मागोवा घेतला तर असे दिसते की यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने आणि पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला -सुबत्ता आली पण ती मोजक्या वर्गात ! फक्त मराठा आणि माळी शेतकरी जामिनदारात !

    आणि त्याचे पडसाद शिक्षण आणि गाव सुधार यात दिसायला पाहिजे ते दिसले नाहीत - सहकार हा फक्त साखर कारखान्याशी मर्यादित ! साखर कारखाने आजारी होत गेल्यावर तर जणू दारू गाळप हेच त्यांचे कार्य बनत गेले असे काहीसे भकास चित्र दिसत गेले -

    ReplyDelete
  11. निंबाळकर साहेब ,

    आपले अभ्यासपूर्ण विचार प्रभावी वाटले -

    आपण नेहमी बघतो की एखादे तीर्थ क्षेत्र असते तिथे प्रचंड - होते दानपेट्या आणि मुक्त देणग्या यामुळे ते धार्मिक संस्थान आणि भट पुजारी ब्राह्मण आणि गुरव गब्बर होतात पण त्या गावाचा जो काया पालट होणे अपेक्षित असतो तो होत नाही - उघडी गटारे आणि उनाड फिरणारी गाव डुकरे हि आपल्या तीर्थ क्षेत्राना शाप आहेत

    अगदी तसेच या साखर कारखान्यांमुळे झाले ! त्यातील महसुल आणि फायदा गावाच्या विकासासाठी योजनाबद्ध वापरला गेला नाही -तो सरळ संधन शेतकरी वर्गाला अधिक सधन करत गेला - त्यामुळे मूळ गावांचा विकास खुंटला

    आणि जणूकाही शहरातील कापड गिरण्या आणि गिरणी कामगार हेच नाते कमी अधिक फरकाने साखर सम्राट आणि कामकरी वर्ग यात डोकावू लागले -

    त्यातून ग्राम्रराज्य हि सहकारातून आपोआप जोपासली जाणारी अपेक्षित संस्कृती विलयास गेली आणि धन् दांडग्या मनोवृत्तीचा आणि सत्तेच्या गणितांचा धुमाकूळ सुरु झाला - यात तुडवला जाणारा भूमिहीन शेतकरी हा दुष्काळात रोजगार हमी योजनेमुळे अधिकच सरकारी यंत्रणेचा गुलाम होत गेला - सावकारी,जाधुनिक जमीनदारी आणि साखर कारखान्यांच्या रूपाने अवतरलेली वतन् शाही या दुष्टचक्रात गरीब शेतकरी असहायपणे शासनाचा देणेदार बनत गेला !घेतलेले कर्ज फेडता येत नाही आणि नवीन कर्ज मिळत नाही - यामुळे एक प्रकारची गुलामी वृत्ती निर्माण झाली - त्यातच शिक्षणाचा अभाव !

    अशा साऱ्या प्रकारात नेमकी काय प्रगती साधली हा प्रश्नच आहे -


    भिकाजी सोनटक्के

    ReplyDelete
    Replies
    1. bikaji sontakke infact onkar nimbalkar!

      Delete
  12. भिकाजी साहेब -

    माझे मत थोडे वेगळे आहे ,

    प्रगती झाली हे नक्की - पण ती प्रत्येक उंबरठ्या पर्यंत पोचली नाही

    - किंवा ती तशी पोचवणे हे या जमीनदार वर्गाचे ध्येयचं नव्हते - सहकार हा मर्यादितच अर्थाने सहकार होता ! ठराविक जातींसाठीच शासकीय योजना राबवून मिळवलेली ती समृद्धी होती आणि आहे !

    जसा ब्राह्मण वर्गावर आरोप केला जातो कि त्यांनी इतर वर्गाना सुशिक्षित केले नाही - लेखन वाचन शिकवले नाही - तसेच या जमीनदारांचे कर्तव्य होते ते त्यांनी सोयीस्कर बाजूला टाकले !

    आपली सरकारी योजनातून आलेली श्रीमंती इतर जातींच्या डोळ्यावर येऊ नये - म्हणूनच ब्राह्मण द्वेषाचे इंजेक्शन अधून मधून दिले जात असते ! -

    असे हे राजकारण गोडसे प्रकरणा पासून चालू आहे - खरेतर नीट अभ्यास केला तर ,

    म.गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सोडला तर कुठेही ब्राह्मणांची घरेदारे जाळली नाहीत - मग ते इथेच कसे घडले ? तो सर्व एक मोठ्ठा राजकीय विध्वंस होता - एका जातीला कायमचे बदनाम करण्याचा डाव होता ! - त्यात हे मराठा नेतृत्व यशस्वी झाले - पण आता इतर बिगर मराठा जातीना खरे राजकारण कळत आहे ! आपले खरे शत्रू कोण ते कळत आहे -

    अनुपमा जोशी

    ReplyDelete
    Replies
    1. anupama joshi infact onkar nimbalkar!

      Delete
  13. @अनुपमा जोशी

    "म.गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सोडला तर कुठेही ब्राह्मणांची घरेदारे जाळली नाहीत - मग ते इथेच कसे घडले ? तो सर्व एक मोठ्ठा राजकीय विध्वंस होता - एका जातीला कायमचे बदनाम करण्याचा डाव होता !" ---------------------------------->>>>>. म. गांधींच्या हत्ते नंतर एकाही ब्राह्मणाची हत्या झाली नाही, मात्र इंदिरा गांधींच्या हत्ते नंतर खूप शीख धर्मियांच्या कत्तली केल्या गेल्या होत्या हे आपण सोयीस्करपणे विसरतो!

    विनय दाते.

    ReplyDelete
    Replies
    1. अग विनया

      असं कसं म्हणतेस तू

      अग म गांधी कुठे आणि इंदिरा गांधी कुठे

      म गांधी आज आपल्या नोटेवर आहेत कायमचे !- राष्ट्रपिता !!

      इंदिरा गांधीनी काय केले ?

      मी त्यांना भेटले होते - त्यांना मी विचारले - तुम्ही काय केले

      त्या नुसत्या हसल्या , नंतर मला कुणीतरी सांगितलं की त्यांनी पाकिस्तानचे २ तुकडे केले

      अमेरिकेने ७वे आरमार आणले होते इकडे पण त्या अजिबात डगमगल्या नाहीत

      बांगला देश जन्माला घातला -आपण कितीतरी पाकिस्तानी सैन्य पकडून ठेवले होते -

      पण त्या शांती शांती करत बसल्या नाहीत !

      कुणी म्हणत त्या आज हव्या होत्या - त्यांना घाबरट पणे मारलं हेच खरे !

      शिखांनी - म्हणून मी सरदार लोकाना दुष्ट म्हणते !

      सरदार पटेल शीख होते का ग ?मग त्यांना सरदार का म्हणत ?

      त्यांच्या काखेत फोड झाला होता अशी एक गोष्ट आहे !

      अग विनया आपण भेटलो की मी तुला त्यांच्या छान छान गोष्टी सांगीन

      एक सरदार म्हणाला कि त्यांना नुसते ठो s s असा आवाज करून इंदिरा गांधीना घाबरवायच होत

      पण बदुकीत कुणीतरी खरीच गोळी घालून ठेवली - नक्कीच हा कुणीतरी कोकणस्थ ब्राह्मण असणार ! - ते दुष्ट असतात असे आमचे सर म्हणतात !

      टिळकांनी जसे सांगितले की मी शेंगा खाल्या नाहीत अगदी तसेच या इंदिरेने पण सांगितले की मी टरफले उचलणार नाही - पण मी शेंगा मात्र खाणार आणि टरफलेपण टाकणार !- त्यालाच लोक आणीबाणी म्हणू लागले !

      आत्ता लालू प्रसाद आत गेले - पण त्यांनी त्या वेळेस चारा खाल्ला नव्हता - त्यांच्या मित्राने राज नारायणाने सगळ्याना अत्तर लावत इंदिरा गांधीना निवडणुकीत हरवले !

      ये न एकदा निवांत -

      कस्तुरी

      Delete
    2. कस्तुरीची फडतूस, वात्रट, भंकस, पांचट, भयंकर, मूर्खपणाची असभ्य भाषा!

      Delete
    3. अहो अनानिमास काका

      इतके सगळे शब्द वापरले तुम्ही ?

      - म्हणजे माझे मराठी इतके चांगले आहे ?

      तुम्ही इतका विचार करता - आणि त्याना लगेच सांगता - किती छान ना ?

      असेच करत जा काका , म्हणजे तुम्हाला काहीतरी चांगले काम केल्याचे समाधान मिळेल -

      काकू कश्या आहेत ?

      तुम्ही त्यानापण असेच म्हणता का ?

      तू भंकस आहेस - तू वात्रट आहेस - ? आणि तुमच्या मुली ? त्यांनापण असेच बोलता ? तू पांचट आहेस - तू भयंकर आहे /

      सगळे तुम्हाला हसत असतील आणि चिडवत असतील ना हो काका ?

      सांगा ना अनानिमास काका -

      आमच्या शाळेत आता सर्वाना अनानिमास काका काय म्हणतील त्याची पैज लागली आहे -

      सांगा ना काका !

      कस्तुरी

      Delete
    4. kasturi infact onkar nimbalkar!

      Delete
  14. संजय सर ,

    आरक्षण मागणे म्हणजे भिक मागीतल्यासारखे नाही काय? आणि तेही मराठ्यांनी? ज्यांना हजारो वर्षांपासून सामाजिक, आर्थिक शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना आरक्षण देणे एकवेळ आपण समजू शकतो, पण मराठ्यांनी आरक्षण मागणे म्हणजे केवळ बावळटपणा आहे. आरक्षण हि काही गरिबी हटाव योजना नाही, हे मराठ्यांना कोण समजावून सांगणार?

    सुनील भिकने, औरंगाबाद

    ReplyDelete
  15. भिकने साहेब,
    होय खरे लिहिले आहे तुम्ही.......

    माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..

    आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

    आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

    आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

    आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.
    आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.
    अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार आपण सर्वांनी करावा.

    -अंकित साठे

    ReplyDelete
  16. ओबीसी या संकल्पनेचा अर्थ अन्य मागास वर्ग असा आहे , अन्य मागास जाती असा नाही ! राज्यघटनेने स्पष्ट नमूद केले आहे की , जातीच्या आधारावर राखीव जागा फक्त अनुसूचित जाती , जमातींची जी यादी केली आहे त्यांच्यासाठीच आहेत . मराठा आरक्षणासंदर्भात हे लक्षात घेणे गरजेचे आहे .

    मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण द्यावे या मागणीसाठी नुकताच मुंबईत मराठा समाजाच्या विविध संघटनांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता . यानिमित्ताने जातआधारित आरक्षणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे .

    मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करून त्यांना २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली . मराठा समाजातील सर्वांना आरक्षण द्यावे , अशी मागणी नसून जे आर्थिकदृष्टया मागासलेले आहेत त्यांनाच आरक्षण द्यावे , असेही काही नेते म्हणतात . सर्वच लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले , तर कोणत्याच समाजाला शक्तिप्रदर्शन करावे लागणार नाही , असाही एक तोडगा असू शकतो .

    विधिमंडळ चर्चेत बहुसंख्य नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला . विधानसभेच्या २८८ आमदारांपैकी १७६ , तर विधानपरिषदेत ७८पैकी ४० आमदार मराठा आहेत . साहजिकच राजकीय आरक्षणाची मागणी कोणीही केली नाही . अनेक ओबीसी नेत्यांचा मात्र मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून घेण्यास विरोध आहे ; कारण त्यामुळे आपले आरक्षण कमी होण्याची भीती त्यांना वाटते .

    महाराष्ट्रात जरी हे आरक्षण मिळाले तरी ते केंद्र सरकारमध्ये मिळेलच असे सांगता येत नाही . केंद्र सरकारची ओबीसीची यादी वेगळी आहे . राजस्थानमध्ये गुजर समाजाला आरक्षण देण्यात आले होते ; परंतु त्याला केंद्राने मंजुरी दिली नाही . हरयाणामध्ये जाट समाजाचे असेच झाले . आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने ' नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ' कडे पाठविली . सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) व विशेष मागास प्रवर्गात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी अथवा एखाद्या जातीला वगळण्यासाठी सरकारला शिफारस करण्याकरता १९९५मध्ये राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली .

    - केशव आचार्य .

    ReplyDelete
  17. आमच्या मराठा जातीत ,

    सर्वच वर्ग हा शेतकरी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल

    शेती हि पुरेशी ठरत नाही म्हणून शिक्षणाच्या आधारावर बाहेर पडलेले अनेक आहेत ,त्यांना पुरेसा आर्थिक पाठींबा नसल्याने आरक्षण सदृश अपेक्षा असणे नैसर्गिक आहे !

    कसायची जमीन कमी कमी होत चालली आहे

    खाणारी तोंडे वाढत आहेत

    नवीन शिकण्याची उमेद सर्वांकडे आहे याचा भरवसा नाही आणि परंपरागत श्रेष्ठत्वाचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे - अशा परिस्थितीत एकेकाळचा

    आमचा हा ९६ कुळी "रुलिंग क्लास "आता नोकर म्हणून सरकारी चाकरी करत आहे ! ज्यांना मुजरे केले जात त्यांना "यस सर यस सर" करत महार चांभार इत्यादी आरक्षित साहेबा समोर लांगुलचालन करावे लागत आहे !केव्हढे हे दुर्दैव !



    नियतीने ब्राह्मण वर्गावर सूड उगवला आहे का मराठा वर्गावर ?

    सनदी नोकरीत परंपरेने ब्राह्मणांचा वरचष्मा इतके दिवस होता आणि आज आरक्षणाने तो वारसा बीसी ओबीसी यांच्याकडे काहीसा गेला आहे - मराठा वर्गाला कशाचीच शाश्वती वाटत नाही - नेत्यांची नाही आणि कायद्याचीही नाही !

    लोकशाही हे खरेतर मर्द मराठ्याना झेपणारे प्रकरण नाही - ते अजूनही भूतकाळात रमतात -तिथेच खरेतर मूळ दुखणे आहे !


    कोकणस्थ ब्राह्मण आणि ९६ कुळी यांच्यातील द्वेष भावना हि या २-३ दशकातील नसून त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे !सत्तेत १०० टक्के वाटा असला तरी लोकशाहीचे संकेत धुडकावीत सर्वोच्च न्यायालयाकडे दुर्लक्ष करणे कदापि शक्य नाही हि जाणीव कोब्राना आहे पण ९६ कुळीना अजिबात नाही - पण परिणामतः कोकणस्थ समाज क्रियाशीलतेवर आणि उच्च शिक्षणावर भिस्त ठेवत नवा इतिहास घडवत आहे आणि आरक्षणाला आस्मानी संकट न मानता दैवी कृपा मानत आहे - आणि ९६ कुळी आपली जात सोडून कुणब्यांची झूल पांघरून सरकारी फायदे उपटण्याची केविलवाणी धडपड करत आहेत

    इतर वर्गाकडून आपली पायरी ओळखून वागण्याची अपेक्षा करणारे हे दोन्ही एकेकाळचे सत्तेतील वाटेकरी पक्ष होते -कोकणस्थ आणि ९६ कुळी -

    आदर- other - या श्रेणीत अजूनही इतर सर्व जाती येतात आणि या २ जातींना सवर्ण धरले जाते !अजूनही ९६ कुळी मध्ये हि श्रेष्ठत्वाची खुमखुमी दिसते - त्या मानाने कोब्रा जास्त लवचिक !परंतु आरक्षणाचा त्रास या दोन्ही जातींना च सर्वात जास्त होतो आहे - आर्थिक आणि भावनिक - इतके मात्र खरे !

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ओंकार आणि घाटगे सर,
      मला असे वाटते की राखीव जागा नक्की कशासाठी अस्तित्वात आल्या ह्याबद्दलच लोकांचा गैरसमज आहे. शिवाय सो काल्ड सर्वधर्मसमभाव साधणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सापा सारख्या राजकीय पक्षांनी फक्त सत्तेचे सोपान गाठण्यासाठी म्हणूनच ह्या राखीव जागांचा उपयोग केला. तो आता इतक्या विचित्र प्रमाणात वाढला आहे कि ज्याचे नाव ते. आधी मुळात ५० वर्ष त्याची नित अंमलबजावणी केलीच नाही. मग गेल्या २० वर्षात ५०% आरक्षण झाल्यावर निदान शिक्षण क्षेत्राची काय अवस्था झाली आहे हे पाहतोच आहोत. नवीन आलेले शिक्षक गेल्या ५००० वर्षांचा वचपा काढण्यासाठी काम न करता पगार मिळावा अश्या मनोवृत्तीचे आहेत. सगळेच तसे नाहीये पण जवळपास ८०% लोक अशीच आहेत. मग आपण पुढील पिढीला काय तयार करतो आहोत ह्याचे भानच नाहीये. गेल्या २० वर्षात इतके प्रचंड बदल आणि तेही इतक्या कमी काळात झालेले आहेत कि त्याच्या वेगासोबत वाटचाल करणे अगदी ब्राह्मण लोकांना पण कठीणच जाते. पण त्यांच्या गेल्या २-३ पिढ्या शिकलेल्या आहेत. पूर्वी फक्त पुरुषच शिकत पण गेल्या ८० वर्षात जवळपास सर्व स्त्रिया शिकू लागल्या. इथे श्रेय फुले आणि आंबेडकर ह्यांना जाते. मग मराठा काय नक्की करत होते? गेल्या ६५ वर्षात मनोहर जोशी सोडले आणि काय १०-१२ मंत्री सोडले तर अगदी गावपातळीवर सगळीकडे मराठा लोकांचेच राज्य दिसते. पण त्यांचा सगळा भर बहुदा राजकारण करण्यातच गेला. दुसरे आपल्या हात खाली आहेत आणि एकदम लक्षात आले कि अरे असे नाहीये. बाकीचे पुढे चालले आहेत मग एकदम जाणीव होते आहे कि आता आपणच मागास झालो कि काय. मला आठवते १९८० च्या दशकात सगळ्या ब्राह्मण घरात चर्चा असायची कि आता आपल्याला नोकर्या नाहीत. त्यांनी तेंव्हाच आपल्या मुलांना शिकवून बाहेरचा रस्ता धरला आणि इंग्रजीची कास धरली. इंग्रजीला पुढे यायचे हे एक कारण असावे. बाकीचे पण आता तेच करत आहेत पण ज्याला अर्ली आडव्हानटेज म्हणतात ते ब्राहाम्न किंवा कोणीही हो शिकलेला आहे त्याला मिळते. पण ते फार दिवस टिकत नाही कारण बाकीचे पण प्रगती करत असतात. सध्या मागासवर्गीय बरेच पुढे आलेले आहेत. त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर केला. पण मग मराठ्यांच्या नेत्यांना हे काळात नव्हते काय? मग त्यांना प्रश्न विचारायच्या आईवाजी सोपा मार्ग म्हणजे राखीव जागा मागणे आणि ब्राह्मण द्वेष हेच दोन राहिले. बर सगळ्या सध्याचा शिक्षण संस्था मराठा लोकांच्याच हातात आहेत. भारती विद्यापीठ काय आणि डी वाय पाटील काय, बर हे डी वाय चक्क पद्मश्रीची जाहिरात करतात, मुळात असे करायचे नसते हे ह्यांना माहिती नाहीये का? असो. पण ह्यांच्या संस्था फक्त पैसे उकलान्यातच तरबेज दर्जा शून्य. ह्यांना कधी जाब विचारणार? सगळेच फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनून नोकरी कोण देणार? त्यासाठी आधी नोकर्या तयार करावयाच्या असतात. ते गुज्जू आणि मारवाडी करतात. ते शिकतात का? ते येतात का कधी राखीव जागा मागायला? मग पटेल साहेब मोठ्या साहेबांचे उजवे हात बनून सगळ्यात पुढे जातात ते काही दिसत नाही. तिथे नाही कोणाला प्रश्न विचारावेसे वाटत. कठीण आहे. जे काही चालले आहे ते चांगले नाहीये ते योग्य नाहीये हे पण कोणाला म्हणायची इच्छा नाहीये. आणि जे म्हणतात त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होतेय. अवघड परिस्थिती आहे.

      Delete
  18. मराठा जनास..........

    मराठ्यांना स्वतःमधील जाती वर्चस्वाचा अहंगंड पूर्णतः नष्ट करावा लागेल. इतर जातींना सुद्धा समान पातळीवर असल्याचे मानले पाहिजे. आपण मराठा आहोत, याचा अर्थ आपण इतरांपेक्षा काही-तरी वेगळे आहोत असे मानाने सर्वस्वी मुर्खपणाचे ठरेल. कुळी पद्धतीला आपण केव्हा मुठ-माती देणार आहोत? लक्षात ठेवा, कोणतीही जात-उपजात श्रेष्ठ वा कनिष्ठ असूच शकत नाही. सर्वांना समान मानणे यामध्हे लाचारी असण्याची काही एक गरज नाही. कुबड्या अपंगांना मिळतात, धट्या-कट्यांना नाही हे सुद्धा आपल्याला समजत नाही हि लाजिरवाणी गोष्ट नव्हे काय? फक्त आर्थिक उन्नती हि आरक्षणाची फलश्रुती नाही, ती सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी आहे व ती सुद्धा मागासलेल्या लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नाही.

    मराठ्यांनो आता तरी जागे होऊ या, आंबेडकरांनी दिलेला "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र आपण सुद्धा स्वीकारू या आणि आपली उन्नती करून घेऊया!

    डॉ. मनीष सावंत

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर, मी डॉ. सावंत यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.

      आनंद जोग.

      Delete
    2. होय, संघर्ष सुद्धा आवश्यक आहे, मात्र संघर्ष कशासाठी करायचा आहे याची पूर्ण जान असायला हवी!

      -अर्जुन सातपुते

      Delete
    3. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा"

      हा विचार खरोखर मराठा समाजास एक नवी दिशा देईल, यात कोणतीही अतिशोक्ती नाही!

      -अविनाश, अटाळी-कल्याण.

      Delete
    4. उत्कृष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद डॉ. सावंत.
      असेच लिहित रहा. आभारी आहोत.

      रवींद्र आणि देवेंद्र माने, बनवडी

      Delete
    5. Simply great.
      Thanks.

      Delete
    6. मराठ्यांना स्वतःमधील जाती वर्चस्वाचा अहंगंड पूर्णतः नष्ट करावा लागेल. इतर जातींना सुद्धा समान पातळीवर असल्याचे मानले पाहिजे. आपण मराठा आहोत, याचा अर्थ आपण इतरांपेक्षा काही-तरी वेगळे आहोत असे मानाने सर्वस्वी मुर्खपणाचे ठरेल. कुळी पद्धतीला आपण केव्हा मुठ-माती देणार आहोत? लक्षात ठेवा, कोणतीही जात-उपजात श्रेष्ठ वा कनिष्ठ असूच शकत नाही. सर्वांना समान मानणे यामध्हे लाचारी असण्याची काही एक गरज नाही. कुबड्या अपंगांना मिळतात, धट्या-कट्यांना नाही हे सुद्धा आपल्याला समजत नाही हि लाजिरवाणी गोष्ट नव्हे काय? फक्त आर्थिक उन्नती हि आरक्षणाची फलश्रुती नाही, ती सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी आहे व ती सुद्धा मागासलेल्या लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नाही.---------------------------------------------> aamhi suddha purn pane sahamat aahe.


      vijay mane
      santosh kumbhar
      raju pawar
      shankar chavan

      sangli

      Delete
  19. मूळ प्रश्न मराठा लोकांनी संघर्ष करण्याचा नाहीच आहे !

    तेच सत्तेत आहेत आणि बहुमतात आहेत !

    आपण सांगितल्याप्रमाणे ९६ कुळीनी वृथा अभिमान सोडण्याचा आहे -

    आज अनेक वेळा या ब्लोगवर या पूर्वी लिहिले गेले आहे त्याची कदाचित पुनरावृत्ती होईल पण परत सांगणे क्रमप्राप्त आहे -

    मराठा समाज आत्ममग्न असा आहे आपल्याच मस्तीत त्याला भानच नसते कि जग किती पुढे जात आहे -हा समाज मनोवृत्तीने शिवाजी संभाजी युगातून बाहेरच येत नाही -आणि त्याला जबाबदार त्या समाजाचे नेतृत्व आहे -

    आरक्षण हे काही प्रमाणात समर्थनीय आहेच - कारण त्या शेकडो वर्षे हिणवल्या गेलेल्या - ज्यांना माणूस म्हणूनही समाजाने आपल्यात घेतले नाही अशाना

    आपल्या आधुनिक स्वतंत्र भारताने एक नवजीवन दिले


    एक गोष्ट मात्र खटकते - फक्त डॉ आंबेडकर यांच्याचमुळे हे शक्य झाले असे नाही तर त्या वेळच्या सर्वच कोन्ग्रेस नेतृत्वात हा पुरोगामीपणा दिसून येत होता - एकाच वेळी प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांची एक मोळी होती काँग्रेस - एकीकडे ग्राम्र राज्य सर्वोदय म गांधींची भजने आणि साफ सफाई आणि दुसरीकडे पं जवाहरलाल यांचे आधुनिक युगात प्रवेश करण्याचे स्वप्न - त्यातच त्यांच्यावर असलेला समाजवादाचा - कम्युनिझम चा प्रभाव - सगळे भव्य स्केलवर - रशिया प्रमाणे - असा सर्व प्रकार होता -

    मुख्य नेत्याला निवडण्यात म गांधीनी अजिबात चूक केली नाही -जवाहरलाल ! !

    त्यातून कायद्यांची बांधणी करताना जो मुक्तहस्त दिला गेला या घटनामंडळाला -

    त्यावेळेस अनेक चर्चा झडल्या - अनेक विचार समोर आले - त्याचे फलित म्हणजे आपली घटना आहे - २ वर्षे आणि २००० सुधारणा सुचवत हि घटना सिद्ध झाली

    त्यात डॉ आंबेडकर यांच्या इतकाच इतरांचाही वाटा प्रचंड आहे !-आज जो डॉ आंबेडकर यांचा उदोउदो होतो तो अगदी योग्यच आहे पण त्यांच्या बरोबर अनेक थोर नेते आणि विचारवंत होते

    गोविंद वल्लभ पंत कृष्णास्वामी ऐय्यर , कन्हैयालाल मुन्शी , टी टी कृष्णम्माचारी ,

    तसेच विजयालक्ष्मी पंडित(नेहरूंची बहिण )

    राजेन्द्रप्रसाद,राजगोपालचारी,सरदारपटेलपुरुषोत्तम मावळदकर ,श्यामाप्रसाद मुखर्जी (जनसंघाचे संस्थापक )तसेच शेड्युल कास्ट चे ३० सभासद अंगलो इंडियन चे आणि इतर विशिष्ठ असे अनेक जण त्यात होते

    डॉ आंबेडकरांना नेमण्यात सर्व वर्गांचा पुढाकार होता - ब्राह्मणांपासून मुस्लिमां पर्यंत !

    आज मात्र विनाकारण वर्ग लढ्याचा जो दृष्टीकोन सांगून परिस्थितीला दोन टोके - त्यातले एक ब्राह्मण-आणि सवर्ण ९६ कुळी आणि दुसऱ्या टोकाला नवबौद्ध आणि खालच्या जाती असा लढा रंगवत नेते लोक आपापली पोळी भाजून घेत असतात -

    भारतात आजही खरेतर अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गाव हा सर्वार्थाने नाही तरी काही प्रमाणात स्वयंपूर्ण असतो - आठवडा बाजारात त्याच्या गरजा तो पूर्ण करतो आणि असे मिळून काही गावांचे मिळून एक ग्राम्र राज्य आजही वसलेले बघायला मिळते - त्यातील काही दोष आज समाजाने आणि घटनेने दूर करत आणले आहेत - हि आपोआप घडणारी प्रक्रिया आहे !आजच्या आरक्षणाने त्याला थोडाफार हातभार लावला आहे - आजही रोटी बेटी व्यवहार हे आपापल्या जातीतच होतात आणि हे बदल घडायला अनेक वर्षे जातील - पण हे बदल नक्की होणारच - पण त्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठल्या सारखे वागायची गरज नाही - ती गरज असते राजकारणी लोकांची हे आपण ओळखले पाहिजे !

    ReplyDelete
  20. मूळ प्रश्न मराठा लोकांनी संघर्ष करण्याचा नाहीच आहे !------------------------>

    संघर्ष हा आम्हा मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. संघर्षाशिवाय कोणतेही काम होत नाही. शेतीसाठी संघर्ष, शिक्षणासाठी संघर्ष, नोकरीसाठी संघर्ष, नोकरी टिकविण्यासाठी संघर्ष. मुठभर मराठे राज्यकर्ते झाले म्हणून सामान्य मराठा समाजात काहीही फरक पडला नाही. आमचे दुखणे ह्या राजकर्त्यांना कधीच समजली नाहीत. ते मात्र बायको, बंगला व गाडी यामद्धे खुश आहेत. आपण ज्या समजामद्धे जन्मलो, वाढलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हि भावनाच नष्ट झाली आहे कि काय अशी शंका येते. शेती बेभरवशाचा व्यवसाय, कधी पाऊस दगा देतो तर कधी शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. सरकारी नोकरी म्हणाल तर ब्राह्मणांनी जास्तीत ज्यास्त जागा अगोदरच बळकावून ठेवल्या आहेत, खुल्या वर्गातील लोकांच्या जागा हेच लोक बळकावतात. आम्हाला आरक्षण नको, पण आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राजकर्त्यांना काही करता आले तर जरूर करावे हि नम्र विनंती.

    संजय पाटील, अकोला (एक अभागी मराठा)

    ReplyDelete
  21. स्वागतम ,

    आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपणच आपली शान ठेवली पाहिजे -

    आपणच जर घुसखोरी करून जर असे म्हणू लागलो की आम्ही पण कुणबी आहोत तर आपले सर्व महाराष्ट्रात हसे होईल

    एकीकडे आपण छत्रपतींचे नाव घेत आपली मान ताठ ठेवत सर्वत्र मिरवतो आणि इकडे पोटा पाण्याचा प्रश्न आला की कुणबी ताटातले ओरबाडायला जायचे हे आपल्याच जातीला कलंक लावणारे आहे !

    जर आपलेच सगेसोयरे आज सत्तेत इतकी वर्षे आहेत तर,आपल्यासाठी रोजगार आणि नोकऱ्या यांचा परिपूर्ण विचार करणे त्यांचे आद्य कर्तव्य ठरते -

    आपल्या जीवावरच ते सत्ता भोगत लाल दिव्याच्या गाडीतून हिंडत असतात !आम्हाला ते छत्रपतींचे नाव घेत पुकारून एकत्र आणत असतात - तर महाराजां सारखीच त्यांची कृती असली पाहिजे -

    आपल्या लोकाना एकत्र आणून या भूमीवर आपले राज्य निर्माण करणे आणि त्याची उत्तम घडी बसवणे -पण आज जी घुसखोरी होत आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रात उच्च आणि नीच सर्व पदावरून आपल्या लोकांची पीछेहाट होत आहे -आपण जर कमी पडत असलो तर ते कुठे तेपण कठोरपणे सांगणे आपल्या नेतृत्वाचे काम आहे - पण नेमके तिथेच आपले नेते कमी पडतात - त्यांच्याकडे नवीन शहरी रोजगार निर्माण करणारा कार्यक्रमच नाहीये !ते सत्तेच्या दुनियेत मश्गुल आहेत - त्याचे खापर इतर लोक बिहारी आणि यु पी च्या लोकांवर फोडत जय शिवाजी

    असे नारे लगावत मुंबईत राजकारण करत असतात - शिवसेना आणि म न से सारखे भोंगळ मराठी समाजाचे नेतृत्व करण्याचा आव आणणारे राजकीय पक्ष हे तर चक्क चोर लफंगे आहेत -

    आपल्याकडे शरद पवार यांच्या सारखे विचारी नेतृत्व आहे ,त्यांच्या कडे कार्यकर्त्यांचा संघटीत ताफा आहे - जर त्यांनी बेरजेचे राजकारण केले तर काहीही होऊ शकते -

    पण आज श्री मेटे यांच्या सारखे लोक जसे बोलतात तसे करणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही -श्री मेटे यांचे वैचारिक दारिद्र्य हा एक वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो - ती काही सिद्ध करण्याची खरेतर गोष्टच नव्हे - इतका त्यांचा मूर्खपणा जगजाहीर आहे -- नुसते आंबेडकर आणि शाहू फुले यांची नावे घेतल्याने कुणी थोर होत नसतो !हेही लक्षात ठेवले पाहिजे !

    डॉ . नीरव घोरपडे

    ReplyDelete
  22. मराठा समाज हाच कसा सत्ता स्पर्धेत यशस्वी झाला ?

    आज ६५ वर्षे निरंकुश सत्ता उपभोगताना त्यांच्या वाट्याला असे दळभद्री दिवस का यावेत ?

    आणि हे जर सत्य नसेल तर मेटे यांच्या सारखे वांझोटे नेते असे का बरळत आहेत ?

    आपण खरेच कुणबी आहोत का ?

    का फक्त सरकारी नियमात बसण्यासाठी ही धावपळ चालली आहे ?


    हे सर्वच विषय आपल्या जातीतल्या प्रत्येकाला जिव्हाळ्याचे वाटत आहेत !


    शरद पवार यांचे नेतृत्व हे एक जाणकार, खंबीर सुजाण आणि दूरदर्शी नेतृत्व आहे . आज त्यांच्या हातात मराठा समाजाचे भले करण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही - पण इतरांच्या हक्काचा घास त्यांचे मनगट पिरगाळून आणि गळा आवळत ओढण्यात काय पुरुषत्व आहे ?कुणबी आणि मराठा हे एकच आणि म्हणून आम्हाला आरक्षण दिलेच आहे असा वाद किंवा अशी पळवाट शोधण्यात आपली अक्कल खर्च करणे हे शरदरावांच्या नेतृत्व गुणात बसत नाही -

    हे दुसऱ्यांच कुणाच्या तरी पळपुट्या विचारातून जन्माला आलेले अनौरस आपत्य आहे

    असे ठणकावून सांगावेसे वाटते !

    आज आपली निरंकुश सत्ता असताना केवळ काही सुरक्षित रोजगार आपल्या लोकाना आयता मिळावा असे वाटणे हे नामुष्कीचे आहे - आज सर्व ठिकाणी आपलीच सत्ता आहे - ब्यांका असोत , सरकार असो किंवा इतर उद्योग असोत - सहकार शिक्षण आणि क्रीडा काहीही घेतले तरी आपलेच वर्चस्व आहे !फक्त प्रश्न आहे चोख निर्णय आणि त्यांची सुरक्षित अंमल बजावणी - ते करण्याची क्षमता आपल्या नेतृत्वात का नाही ?आपण काय आदर्श ठेवला आहे ?

    आपण लुटारू तर नक्कीच नाही आपला आदर्श छत्रपति आहे आणि सामाजिक सुधारणा आणि समाज जीवन यात आपण राजर्षी शाहू यांचे नाव घेत असतो !पण मग आपल्याच राज्यात आपल्याच लोकाना आपल्या निर्णयातून भरीव रोजगार आपण का निर्माण करू शकत नाही ?

    आज इतके नवीन उद्योग आपल्याकडे निर्माण होत आहेत - परप्रांतातून कार्य प्रवण लोकांचे लोंढे आपल्याकडे येत आहेत मग तिथे आपले वर्चस्व का होत नाही -

    आपणपण सु शिक्षित आहोत , सतर्क आहोत , आपण ब्राह्मणा इतके किंवा काकणभर जास्तच कर्तृत्ववान आहोत बुद्दू नाही हे सिद्ध करायला आत्ता सारखे वातावरण नाही !

    आज आपण त्यांच्या इतकेच इंग्रजी शिक्षण घेत आपली कार्य कुशलता दाखवत नवनवे कर्तृत्वाचे झेंडे लावत आहोत -विमानसेवा , व्यापार ,परराष्ट्र खाते ,तेल आणि वायू निर्माण , व्यवस्थापन आणि अनेक गोष्टीत आपण आपले गुण दाखवत पुढे जाणे आवश्यक आहे आणि जात आहोत -

    प्रश्न फक्त सरकारी नोकरीचाच आहे असे मानणे वेडेपणाचे -ठरेल -

    प्रश्न मनोवृत्तीचा आहे

    खरेतर सरकारी नोकरीकडे आजतरी तरुण वर्ग पाठ फिरवत आहे - कर्तृत्व आणि चमक दाखवण्यास खाजगी क्षेत्र हेच जास्त योग्य आहे !

    त्यात जर शरद पवार यांचे योग्य मार्ग दर्शन लाभले तर मराठा समाजाला आरक्षणाची गरजच भासणार नाही आणि ब्राह्मण समाजाने आपली जशी प्रगती करत आरक्षणाच्या पायी झालेल्या कोंडीतून आपली सुटका करत आपली प्रगती साधली

    तसे आपला समाज् सुद्धा करू शकेल फक्त खंबीर नेतृत्वाने तशी जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे - श्री मेटे यांच्या सारखा मार्ग हा आरक्षणाच्या वाटेने जात असेल तर तो विनाशाचा मार्ग आहे हे नात्र समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा निषेध केला पाहिजे !

    बाबासाहेब पाटील - सातारा

    ReplyDelete
  23. मराठ्यांना आरक्षण मिळणे हीच काळाची गरज आहे.
    बापू गोखले - सदाशिव पेठ पुणे

    ReplyDelete
  24. एकवेळ ब्राह्मणांना आरक्षण मिळाले नाही तरी चालेल. पण मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.

    परशुराम आगाशे - न्यू जर्सी अमेरिका

    ReplyDelete
    Replies
    1. मराठ्यांना नव्हे, खरेतर ब्राह्मणांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आणि होय तेही साडेतीन टक्के (३.५%) त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात. नाहीतर हेच सध्या ५०% आरक्षणावर डल्ला मारत असतात कारण आरक्षण सोडून उरलेल्या पदांवर यांचीच वर्णी लागत असते, वडीलोत्पार्जीत संपत्ती असल्यासारखे. मात्र ३.५% सोडून उरलेल्या पदांवर यांना हक्क सांगता येणार नाही, या साठीही कायदा हवा. म्हणजे ब्राह्मणांना सोडून कोणालाही आरक्षण ठेवण्याची गरजच पडणार नाही!

      राजन पोळ, नाशिक

      Delete
    2. Really, great thoughts. Thanks a lot!

      Delete
  25. होय, आम्ही मराठे आहोत!

    शेतीच्या एका चाकोरीसाठी सख्या किंवा चुलत भावाबरोबर भांडत एकमेकाचे मुडदे पाडणारे!

    मुलांच्या लग्नासाठी हजारो-लाखो रुपये पाण्यासारखे उधळणारे!

    हुंड्यासाठी स्वतःच्याच मुलीची किंवा सुनेची हत्या करणारे!

    जन्मल्यापासून मरेपर्यंत ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणारे!

    व्यसनांच्या अधीन होऊन कुटुंबच्या कुटुंब बरबाद करणारे!

    जातिवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे!

    दिन-दलितांवर सतत अन्याय करणारे!

    कलियुगात शुद्र असूनही स्वतःला शुद्र म्हणवून घेण्यास लाज बाळगणारे!

    सतत ब्राह्मणांच्या मुठीत असलेले!

    कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मनाविना न करू शकणारे!

    सदैव ब्राह्मणांच्या ताटाखालचे मांजर म्हणून जगणारे!

    खोट्या प्रतिष्ठेपायी मुला-मुलींच्या आंतरजातीय विवाहास विरोध करणारे!

    प्रसंगी स्वतःच्याच मुला-मुलींच्या हत्येस कारणीभूत ठरणारे!

    बी.सी.- ओ.बी.सी.आरक्षणास मदत करण्या ऐवजी स्वतःच्याच आरक्षणासाठी हात पुढे करणारे!

    होय, आम्ही मराठा आहोत, ९६ कुळी मराठा आहोत!

    विनायक शिंदे, रत्नागिरी

    ReplyDelete
    Replies
    1. सत्यस्थिती हुबेहूब रेखाटली आहे, कमालच केली राव!

      Delete
    2. शिंदे काय रे हा फालतूपणा!

      Delete
    3. विनायक शिंदे, रत्नागिरी
      हा हिंदुगर्जनावाला नाही ना?

      Delete
  26. मराठ्यांना नव्हे, खरेतर ब्राह्मणांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आणि होय तेही साडेतीन टक्के (३.५%) त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात. नाहीतर हेच सध्या ५०% आरक्षणावर डल्ला मारत असतात कारण आरक्षण सोडून उरलेल्या पदांवर यांचीच वर्णी लागत असते, वडीलोत्पार्जीत संपत्ती असल्यासारखे. मात्र ३.५% सोडून उरलेल्या पदांवर यांना हक्क सांगता येणार नाही, या साठीही कायदा हवा. म्हणजे ब्राह्मणांना सोडून कोणालाही आरक्षण ठेवण्याची गरजच पडणार नाही!

    राजन पोळ, नाशिक

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच निष्कपट विचार आहेत तुमचे, धन्यवाद!

      Delete
    2. खरच असेच व्हायला हवे!

      Delete
    3. विचार प्रस्तावाधीन. खूपच छान.

      Delete
  27. मराठ्यांना आरक्षण मिळाले की आम्ही "युरेका युरेका" म्हणत रस्त्यावर नाचणार आहोत.

    चिंतोपंत लेले ("हस"लेले की "रड"लेले ते विचारू नका) - नाशिक

    ReplyDelete
    Replies
    1. ENJOY!!!!!!!!!!!!!!!!

      Delete
    2. नागडे ना गडे ?

      फणींद्र सदाशिव लेले

      थोडक्यात फ स ले ले

      Delete
    3. लेले मेले कामातूनच गेले!

      Delete
  28. एकदा का आम्हाला आरक्षण मिळाले की आम्ही आमचे खरे दात दाखवू. तोपर्यंत आम्हाला फुले-शाहू-आंबेडकरवाद डोक्यावर घेवून नाचावा लागेल.
    -खरा मराठा

    ReplyDelete
    Replies
    1. खरा मराठा आणि खोटे विचार!

      Delete
  29. खरे मराठे आहेत शिल्लक ?

    मग ९६ कुळी आणि इतर असापण भेद असतो का ?

    आणि कुणबी म्हणजे त्यानंतरचे ? कुणीबी ?कुनीबी यावे आणि ( टप्पल ) मारून जावे त्यातले ?

    असे कसे हे ?असेच लोक आरक्षणाची भिक मागू शकतात - शिवाजी महाराजांनी आरक्षण मागितले असते का - ते आजच्या काळात असते तर त्यांनी नवा देश घडवला असता !

    असे या देशात लाल किल्ल्याच्या दाराशी भीक मागत उभे राहिले नसते !

    पवार खुर्ची सोडू शकत नाहीत पण आव आणतात प्रती शिवाजी असल्याचा !

    दिल्लीची भाटगिरी करण्यात यांचा जन्म गेला आणि गुंडागर्दीलाच ते क्षात्रतेज म्हणून कुरवाळत बसतात ! छत्रपतींनी सुरत लुटली ती दौलतीत भर घालण्यासाठी - हे चिंधीचोर पुणे जिल्ह्यातल्या जमिनी बिल्डराना विकत दलाली खात जगतात -हे कसले मराठे ?

    भाड खाणारे ते भाड खाऊ ,लाच खाणारे ते लाचखाऊ - याना काय म्हणून ओळखायचं ?

    प्रवीण शेलार

    दिलीप वाघमारे

    नीलकंठ नातू

    श्रीपाद वाल्हेकर

    ReplyDelete
  30. खरच, मराठ्यांना सुधारावेच लागेल! पण आम्ही सुधारू दिले तरच!

    परंतु सध्याचा धर्म त्यांना सुधारू देत नाही.

    आम्ही ब्राह्मण लोक त्यांना वरती येऊ देत नाही.

    धर्म अजिबात यांच्या हातात नाही, ब्राह्मनांचाच सर्वत्र वरचष्मा आहे.

    मराठे लाचार आहेत बिचारे, ते तरी काय करणार.

    आम्ही ब्राह्मण त्यांच्या जन्माला येण्या अगोदरच पासूनच त्यांच्या पाठीमागे लागतो, मेल्यानंतर सुद्धा त्यांना सोडत नाही.

    प्रत्येक कार्यात आम्ही दक्षिणा उकळत असतो, त्यांना कसे लुटावे या संदर्भात आम्हाला जेष्ठांकडून प्रशिक्षण मिळते.

    आम्ही कधी सत्यनारायणाची पूजा घालायला भाग पाडतो, तर कधी होम-हवन तर कधी ग्रहशांती, आमची मात्र मजा असते.

    आम्हीच यांना मुहूर्त काढून देतो, भविष्य सांगतो, मग स्वारी खुश असते आणि मागेल तेवढी रक्कम आमच्या खिशात घातली जाते.

    कोणी पंडितजी म्हणते तर कोणी गुरुजी, कोणी भट म्हणतात तेव्हा मात्र आम्ही त्याकडे कानाडोळा करतो.

    हे जरी नेते असले तरी, वैयक्तिक सल्लागार ( PA ) आम्हीच असतो आणि आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा असते.

    खरोखर आमची चंगळ असते, आमची खूप चंगळ असते.

    -मंगेश जोशी, मिरज

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी वर्मावरच बोट ठेवले तुम्ही!

      Delete
    2. बामणा आम्हाला अंधश्रद्धाळू समजत आहेस कि काय? तुझ्या बामणी धर्माच्या कधीच ठिकऱ्या करून त्याचे तुकडे समुद्रात फेकून दिले आहेत. नको आहे तुझा तो घाणेरडा ब्राह्मण धर्म! आम्ही धर्मनिरपेक्ष बनलो आहोत. आणि धर्मनिरपेक्षच राहू!

      अनिल वाघ.

      Delete
    3. नको! नको! नको आहे ते आरक्षण, आमच्या जातीची लत्करे वेशीवर टांगायला कोणी परवानगी दिली तुम्हाला! उगीच असे काहीतरी आमच्या बद्दल वेडे-वंगाळ लिहू नका रे!

      शिवाजी सावंत, पंढरपूर

      Delete
    4. अनील वाघ म्हणजे वाघ आहे का वाघाच कातड पांघरलेल गाढव आहे ?

      ब्राह्मण धर्म ? हा कसला धर्म ?!

      आणि निधर्मीपणा म्हणता त्याचे तारे तोडलेले पाहिले कारे वाघ्या आजच्या बातम्यात ?

      येडाच दिसतंय -वाघ बकरी चाय ! !

      अरे महाराजांच्या आमदानीत तुझे पूर्वज काय मशिदीत बांग द्यायला नेमले होते का रे ?

      कसला निधर्मी रे तू ?

      प्रतापगडाच्या पायथ्याला जावून माथा तेकातोस का रे तू ?

      का रायगडाला प्रणाम करतोस ?

      ब्राह्मण मेले आणि त्यांची राख झाली आता - तोच तोच जोक परत परत मारू नकोस - नवीन सांग काहीतरी - तो अलिगढ वरून आलाय एक रहमान - तो कशी उलटी पाळती करतोय बघ आपली सर्वांची सरकारी इतमामाने - ते बघ !

      आपल्याशी दगा फटका करणारे लांडे आता आपल्याच उरावर बसून १० टक्के कमावणार ! यांच्यासाठीच तानाजी आणि शेलारमामानी आणि बाजी पासालाकारांनी मर्दुमकी केली काय रे ?

      कसला तुझा धर्म ?

      वातोल चाललय आपल्या महाराष्ट्राच आणि तुला चिंता त्या मुसंद्यांचीच का रे ?

      तू कसला वाघ - अगदीच शेळपट आहेस !

      Delete
    5. अनिल वाघ म्हणजे वाघ्या मुरळी आहे !

      त्याच इतक सिरीयसली घेऊ नये हि विनंती - अवो मीच सांगत्ये -

      आपण सर्वांनी त्याला क्षमा करून त्याला जेजुरीचे तिकीट काढून द्यावे !


      वाघ्या ला परत मानाने स्थापन केला तो वाघ्या वेगळा !आणि हे यडपट असच बोलतय !

      तासन तास !

      त्याच काय इतक मनावर घेऊ नका - अवो रातभर असच चालतंय त्यांच !मी म्हणते बामनावर इतक कशाला डाफरायाच ?-

      नंतर कळल ह्यांच शाळेत एका बामणाच्या पोरीवर दिल फिदा होत , पण तीन त्या घाटगेच्या बरोबर सोयरिक केली - म्हणून जळतय मेल !

      Delete
    6. ओंकार निंबाळकर हे कार्ट बामणाचच आहे यात अजिबात संशय नाही, मुर्खाला बामानांच्या विषयी खरे लिहिलेकी नुसती मिरची झोंबते! बावळट कुठला? वेड्यासारखे काहीही बरळत सुटतो! हा हरामखोर.
      त्या घाटगेला अजून १० बामणाच्या मुली पटवू देत काय फरक पडणार आहे?

      अनिल वाघ.

      Delete
  31. मराठा कोण? :

    ‘अन्यायाविरीद्ध जो लढेल तोच मराठा नाहीतर नुसताच खराटा’

    “जे का रंजले-गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले.
    तोची मराठा मानावा, शिवराय तेथेची जाणावा”

    ReplyDelete
    Replies
    1. नाहीतर सद्याचे मराठे?

      Delete
  32. मेटे साहेब तुम्हारा चुक्याच ! !

    आप्पा-अहो उदयनराजे ! इतकी कसली धावपळ ?

    अजून शिवजयंतीला वर्ष आहे जवळ जवळ -आत्ताच तर झाली ! अजून गुलाल पुरता गेला नाही आपल्या अंगणातला -दसरा पण थाटात झाला - मग आता कसली घाई ?

    बाप्पा - आणि काय हो पद्मसिंह मोहिते पाटील -? तुमची कसली लगबग ? दिवाळी दरवर्षीच येते - तुम्ही अगदी जातीने कशाला धावताय ?- काय म्हणताय ? डॉ मेहमादूर रहमान आलाय ?कोण हा रहमान ? आम्हाला अब्दुल रेहमान अंतुले माहित आहे -

    अहो सकाळी सकाळी हे कुठल नाव जिभेवर आल ?


    आपली सकाळ शिव छत्रपतींच्या वंदनाने सुरु होते आणि "सूर्यास्ताला आपण त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करत उद्याच्या उषः काळाची वाट बघत आपण निद्रेच्या आधीन होतो ! "

    या तुमच्या वाक्यावर आम्ही आणि आप्पांनी रायगडावरच्या आपल्या भाषणात कडाडून टाळी वाजवली होती ! आठवतोय तो राज्यारोहणाचा सोहळा ?


    आप्पा - आणि आज आपणच या भगव्याला साक्षी ठेवत या डॉ मेहमदूर रेहमान चे नाव कशाला घेत आहात ? कोण आहे तो ? शिल्पकार ?


    बाप्पा - अरबी समुद्रात आपल्या महाराजांचे शिल्प उभे रहाणार आहे त्याचा शिल्पकार ?

    आप्पा - का हा नवीन अंतुले तर नाही ? भवानी तलवार आणायला निघालेला ?

    बाप्पा - नाही ? मग ? हा आहे तरी कोण ? आणि तुम्ही का त्याचे एव्हढे गोडवे गाताय ?

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा अर्थात केवलभाई-रमणभाई अजून कोणकोणत्या नावाने लिहितो ते अजून समजले नाही, चांगलेच भरकटलेले दिसत आहेत. सुंता करून घेतला नाही ना? शंका आली म्हणून विचारले, बाकी काही नाही!

      ज्ञानेश्वर साळुंखे

      Delete
    2. मस्तच रे !

      मस्तच -

      ज्ञानेश्वरा - आप्पा बाप्पा यानी तर इतके सुंदर लिहिले आहे - त्यांचे कौतुक करायचे सोडून हे कायहो मांडले आहे सरकार साळुंके ? आपल काय चाललय - आपल्यातच असे प्रकार आपण केले तर परत पारतंत्र्य येईल हो ज्ञानदेवा !

      थोडा भडकपणा आलाय त्यांच्या लिहिण्यात हे खरे पण अगदीच टाकाऊ पण नाही - बरोबर ना ?

      आज उभा मराठी माणूस एक होऊन या रेहमान च्या विरोधात उभा राहिला पाहिजे -

      शब्द शब्द शब्द - जे चांगले ते टिकतील जे कुचकामी ते तुटून जातील ! आपण आपल्या माहाराश्त्राचे भले बघुया - नाहीतर हे अलीगाधाचे लांडे आपले तुकडे करतील !

      साळुंखे महाराजांचा विजय असो

      डॉ आंबेडकर यांचा विजय असो

      संत ( ? ) ज्ञानेश्वरांचा निषेध असो ( ब्राह्मणाची औलाद ) आणि ज्ञानेश्वर साळुंखे यांना मानाचा मुजरा !

      आपल वय काय हो साळुंखे ?

      ज्ञानेश्वर नाव - जर नोंदणी झाली नसेल जन्म मृत्यूची तर !

      त्यापेक्षा तुकाराम कस आहे ?

      लई भारी !

      तुकाराम साळुंखे ?

      अरे बापरे ! काय - तुमच्या फादरच नाव तुकाराम होत ?

      तुकारामाच्या पोटी ज्ञानेश्वर ?तेही त्यांनीच निवडल नाव ?कमाल आहे !

      त्याना माहित नाही का - रेडा वेद म्हणाला वगैरे सगळी या चार भावंडांची गेम होती !

      आणि भिंत चळवळीच नाही ! भिंतीमागून चालत गेले इतकाच - वाघावर बसून चांगदेव आला त्यावेळेस !घाबरून ?

      मग तुमचे वय जर लहान असेल तर नाव बदलून घ्या - ओके बाय बाय - ज्ञानेश्वर राव ? - !

      रागाऊ नका हो आम्ही हे असेच !

      Delete
    3. ओंकार निंबाळकर हे कार्ट बामणाचच आहे यात अजिबात संशय नाही, मुर्खाला बामानांच्या विषयी खरे लिहिलेकी नुसती मिरची झोंबते! बावळट कुठला? वेड्यासारखे काहीही बरळत सुटतो! हा हरामखोर.
      त्या घाटगेला अजून १० बामणाच्या मुली पटवू देत काय फरक पडणार आहे?

      अनिल वाघ.

      Delete
    4. ओंकार निंबाळकर, हरामखोर कुठला, आत्ता समजले हाच नालायक आप्पा-बाप्पा व केवलभाई-रमणभाई या नावाने लिहितो आहे!

      अनिल वाघ.

      Delete
  33. आप्पा - का s s य ?काय सांगता काय ? नाही नाही नाही - त्या ऐवजी या धरतीनेच आम्हाला पोटात घ्यावे ! हर हर ! काय हे ! आपण शिवरायांच्या तेजस्वी परंपरेचे आजच्या काळातील प्रतिक आहात ! काय ऐकतो आहे हे ! तेही तुमच्या तोंडून ?

    बाप्पा - शिव शिव ! पृथ्वीची उलथापालथ तर झाली नाही ना ?

    आप्पा - मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ?

    बाप्पा - मग आम्हीच असे कमनशिबी कसे ?

    आप्पा - कसे ? ( हा बाप्पा नाटकातली वाक्य वापरतोय - १ नम्बरचा चालू आहे ! )

    बाप्पा - कसे ?

    आप्पा - अहो आज आपण प्रतिशिवाजी म्हणून ज्यांच्याकडे बघतोय तेच धर्म बदलायला निघाले आहेत !

    बाप्पा - का ? मग मेटे साहेब कुठे गेलेत ? कुणीतरी मागेच मागेच नवीन शिवधर्म काढणार होते - शिवधर्म ! - म्हणजे आपलेच ना ते ! त्याचं काय झालं ?ए प्रो.तहकिक कुठे गेले ?

    आप्पा - नाही बाप्पा - प्रकरण हाताबाहेर चालले आहे !

    बाप्पा - आम्ही नाही समजलो -

    आप्पा - अहो - कस सांगू तुम्हाला - ? मुसलमानाना आरक्षण मिळणार मेटे साहेबांच्या आधी !- आता बोला ! मेटे साहेब जीव तोडून ओरडत आहेत - मराठा वर्गाला आरक्षण द्या - पण नाही - आमचे सगळे नेते मराठा असून आपण कमनशिबी च - त्यांनी मेटे साहेबांची कन्निच कापली

    आप्पा - अहो - सोपे करून सांगा -आम्हाला ते कन्नि बिन्नी समजत नाही !


    बाप्पा - तुम्ही पुणेकर ना ? मग बघा - सगळी धरणे भरून वाहात असताना सुद्धा पुणेकर कसे कमनशिबी ? तसेच आपले राज्य असून आपल्या लोकाना आरक्षण नाही आणि महाराजांनी ज्याना पाताळात गाडल त्या अवलादीला आपल्या नाकावर टिच्चून आरक्षण - आणि ते सुद्धा -१० टक्के !- बोला आता !या भगव्याच्या साक्षीने ! कलियुग कलियुग म्हणजे ते दुसरे काय ?

    बाप्पा - पण हे सातारकर - मोहिते - जाधव -आणि निंबाळकर आणि घाटगे का धावताहेत इतके ? सकाळी सकाळी ?

    आप्पा - अहो दुसरे काय - सुंता करून घेणार म्हणताहेत ! धर्म बदलायचा हे ठरलेलेच आहे ,मग निदान १० टक्के ग्यारंटीवाला तरी घेऊया ना ? शिवधर्म किंवा सुन्ताधर्म -नवा कोरा -

    जे मेटे साहेबाना ना जमल नाही ते हे डॉ मेहेमदूर रेहमान करून देत आहेत - काय वाईट आहे ?

    बाप्पा - हि नुसती हूल आहे हो ! असं कधी असतंय का हो !

    आप्पा - तू माझी अन तुझा मीच हि खातर ना जोवरी

    प्रीतीची हूल फुकट ना तरी -

    तसली हूल म्हणताय का तुम्ही ?ज्योस्त्ना भोळेनी पूर्वी सांगितलेली ?


    बाप्पा - तीच ती हो - आणि इथे सगळी खातरजमा झालेली आहे -भूल नाही नि थाप नाही ! निवडणूक तोंडावर आली! आता नुसती गम्मत जम्मत - कुणी सोन्यासाठी किल्ले खणताहेत !

    आणि नेमकी हि मागणी ! आता त्या उद्यान राजेना कसे समजवायचे ?त्यानातर आरक्षणाची इतकी घाई झाली आहे -जरा कळ काढा - आपल राज्य आल कि मेटे साहेब सगळ मार्गी लावतील - काही धर्म बदलायची गरज नाही !- चला आपण त्याना घेऊन विक्रोळीच्या रेल्वे स्टेशनाच्या जवळच्या शिव स्मृती डान्स बार मध्ये जाऊ या - !त्यांच काय हो मूड पाहिजे !


    आप्पा - त्यांच तसच आहे - पुतळे काढायची घाई आणि बसवायची दुप्पट घाई ! !

    बाप्पा - आता म्हणे दादोजी उद्यान नावाची बाग होणार आहे सातारला - तिथे दादोजी शिवाजीचे पाय चेपातोय असे शिल्प बसवणार आहेत म्हणे !

    आप्पा - ते असुदे हो - आजकालचे राजे हे असलेच - !

    बाप्पा - पण आता मग हे नवे बाटगे जर रायगडावरून आणि प्रतापगडावरून पहाटे पहाटे

    आई तुळजा भवानीची आरती करण्या ऐवजी बुरुजावरून बांग देऊ लागले तर हो ?अल्ला हो अकबर ! अल्ला हो अकबर ?तर काय म्हणायचं ?

    आप्पा - अहो रामनवमीला सुद्धा आता तुळशी बागेत तुमच्या पुण्याला जर मनाज पढायची सोय करून दिली तर कौतुकच करायचं आता ! लक्षात ठेवा ! मेटेसाहेब तुम्ही कमी पडलात हेच खरे !

    ReplyDelete
    Replies
    1. मेटे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!

      कमलेश

      Delete
    2. आप्पा-बाप्पा अर्थात केवलभाई-रमणभाई अजून कोणकोणत्या नावाने लिहितो ते अजून समजले नाही, चांगलेच भरकटलेले दिसत आहेत. सुंता करून घेतला नाही ना? शंका आली म्हणून विचारले, बाकी काही नाही!

      ज्ञानेश्वर साळुंखे

      Delete
  34. खरोखरच मुसलमानाना आरक्षण हा चांगलाच तिढा झालाय !

    समजा तसे झाले तर - हे टक्के घेणार कशातून ?

    स्वराज्यासाठी जे लढले त्या सर्वांच्या ट्टक्यातूनच का ?

    म्हणजे ज्यांची बोटे महाराजांनी कापली त्याना आरक्षण !

    ज्यांचा कोथळा महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी बाहेर काढला त्याना आरक्षण ?

    आणि ज्यांनी रक्ताचे पाट वाहवले त्याना आरक्षण नाही ?

    आणि हा उपटसुंभ अलिगढ विद्यापीठातून येतो काय आणि आमच्या मातीतील संस्कृतीवर असा नांगर फिरवतो काय - काय हे - ?


    मुस्लिम कैद्यांची महाराष्ट्रात संख्या ३४ टक्के आहे - म्हणजे उद्या यांनी प्रत्येक तुरुंगात एकेक मशीद मागितली की सरकार ते पण करणार का ?

    हा कसला निधर्मी राष्ट्रवाद ?

    मग देशाची फाळणी करायचा तर डाव नाही ना हा असा संशय येत असेल कोणाला तर काय चुकले ?

    चुकतोय कोण ? आपण का हे तथाकथित निधर्मी ?- असे हे कितीतरी आणि का का सोसायचे ?

    उद्या अफझलखानाला महाराज गुदगुल्या करत असताना तो घुसमटून मेला असा इतिहास लिहायला हे निधर्मी कमी करणार नाहीत !

    आजचे राजकारण आणि इतिहास यांची सांगड घालायची तरी कशी ?

    पाकिस्तान आणि इथले मुसलमान यात कसा फरक करायचा ? आणि कसा ?

    आज महाराष्ट्रात एकही आय ए एस अधिकारी मुसलमान नाही !- त्याला योगायोग समजायचे का ?काय नेमका कोणता मुद्दा त्याना असे करायला भाग पाडतो ?

    ReplyDelete
    Replies
    1. मुर्खा, शिवरायांचा संघर्ष मुस्लिम शासकांशी होता, मुस्लिम जनतेशी नव्हता! त्यांच्या सैन्यात भरपूर मुसलमान होते आणि ते हि स्वराज्यासाठी एक-दिलाने लढत होते, हे सुद्धा माहित नाही तुला. किती हे अज्ञान?

      एस. व्ही. वाणी.

      Delete
    2. होय अगदी खरे आहे हे, त्यांना आरक्षण दिल्यास काहीही अडचण भासणार नाही, ते सुद्धा OBC सारखेच आहेत! मुस्लिम समाजासारखी दैन्यावस्था सध्या कोणत्याही समाजाची नाही, ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही!

      गौतम कासार.

      Delete
  35. एक रहमान - अन्तुलेच्या रुपात भवानी तलवार आणायला आमच्या भावनांशी खेळत आमचे हसे करतात

    आज या रेहमान ने आमची खिल्ली उडवून चांगलीच ईद साजरी केली !

    कुणी नेमले याला - कशाला ?

    इतकी कुणाला तहान लागली होती या राज्यातल्या मुस्लिमांच्या कल्याणाची ?

    कसले राजकारण म्हणायचे हे ? तेही अलीगड च्या माणसाने इथे येत आम्हाला सांगायचे - तुम्ही असे करा - तुम्ही तसे करा !

    काय चाललय हे ?उद्या दुसरे कुणीतरी वास्को द गामाच्या आठवणीने अश्रू ढाळत आम्हाला सांगू लागेल - या क्रॉस वाल्यानापण १० टक्के राखीव जागा ठेवा - मग आम्ही काय करणार ?

    कोणता निधर्मीपणा म्हनायचा हा ?

    उद्या मतदारसंघ मागतील !

    असे झालेले आहे - इतिहास साक्षीदार आहे !

    आपण वेळीच सावध झाले पाहिजे

    आपल्याच लोकाना अस्वस्थ करून आपले वांझोटे राजकारण करण्याची हि भारतीय परंपराच आहे - मग तो भाजप असो नाहीतर कोन्ग्रेस किंवा शिवसेना - सगळे एका माळेचे मणी !

    आमच्याच शिव्शम्भुच्या राज्यात राहून आम्हालाच हा आरक्षणाचा गळफास लावण्याचा प्रकार खरोखरच जीवघेणा ठरणार आहे

    हे मात्र निश्चित !

    ReplyDelete
    Replies
    1. अनिश्चित!

      Delete
    2. मुस्लिम आणि मराठा आरक्षणाला बामन लोक का विरोध करतात ते समजले नाही?

      मी म्हणतो यांच्या बापाचे काय जाते आहे?

      जाती -जातीत व धर्मा-धर्मात भांडणे लावून मजा बघत बसायची जुनी खोड, दुसरे काय?

      प्रशांत शिर्के

      Delete
    3. सर्व ब्राह्मण पुरुषांचा उपनयन (मुंज) करण्या ऐवजी सुंता केल्यास किती मजा येईल!

      बामणांचा कडवा विरोधक

      Delete
  36. नको! नको! नको आहे ते आरक्षण, आमच्या जातीची लत्करे वेशीवर टांगायला कोणी परवानगी दिली तुम्हाला! उगीच असे काहीतरी आमच्या बद्दल वेडे-वंगाळ लिहू नका रे!

    शिवाजी सावंत, पंढरपूर

    ReplyDelete
  37. चला हे एक बरे झाले

    मुसलमान हे शिवरायांच्या सैन्यात होते म्हणून ते चांगले -

    त्याना आरक्षण द्या - तेही ओबीसी कोट्यातून - परस्पर हा उद्योग मस्तच आहे

    असे तडका फडकी निकाल लावायला " शिवाजी " हि फुटपट्टी चांगली आहे

    असे एकदा कायमचे कायम करुया - म्हणजे परत परत वाद नको - कोणताही विषय

    वादाचा होतो आहे असे वाटले कि शिवराय काय करत असत ते बघायचे !

    जलसंपदा खात्यात घोटाळा झाला - आता काय तोडायचे ? शिवबांनी काय केले असते ?

    आदर्शच्या फायली जळाल्या - महाराजांनी कोणाला दोषी ठरवले असते ?

    आपले माजी संरक्षणमंत्री पवार गुंड ठाकूर बंधूना घेऊन विमानातून हिंडायचे - कोण दोषी -

    छत्रपतींनी काय केले असते त्या पवारांचे ? हार घातले असते ?का जोडे मारले असते ?

    पण आता ठरलाय ना - शिवाजी महाराजांनी काय केले असते ? तसाच वागायचं !


    हल्ली मुसलमान जरा काही झाल तर कुराणात डोके खुपसुन सांगतात - काय योग्य आणि काय नाही ते - अगदी तसेच आपले आता सुरु !

    कांदा महाग झाला ? धरा त्या कृषी मंत्र्यांना !

    पेट्रोल महाग झाले - पकडा त्या संबंधित मंत्र्याला !सगळेच मंत्री आत आणि आपण बाहेर !

    आग्र्यालातर जायलाच नको - रेल्गादी नाही - घोडागाडी नाही - पेटारे च पाहिजेत - कारण महाराज आग्र्याला पेटाऱ्यातून पळाले !ते गडावर वस्ती करून रहात असत - चला - आपापले फ्ल्याट विकून चला रायगड नि राजगडावर -


    असे जर करत बसलो तर जग आपल्याला एड ठरवेल - तुम्हीच मला एड म्हणत असणार - मी मुद्दामच जरा जास्त बटबटीत लिहील इतकाच !

    मुद्दा हा आहे - त्या नंतर अनेक शतके गेली - अनेक पिढ्या झाल्या - आजचा काश्मीर मधला मुसलमान आणि १९६० - ६२ - ६५ चा मुसलमान एकसारखे आहेत का ?

    हिंदू धर्म रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग लढले ,पण एका शिखानेच इंदिराजीना गोळ्या घातल्या !ब्राह्मणानेच म गांधीना गोळ्या घातल्या - सगळे दिवस सारखे असतात का ?

    शिवाजी महाराजांची फूट पट्टी किती पिढ्या वापरायची ?

    ReplyDelete
  38. संजय सर ,

    चैतन्य सर ,

    मी आता नवीन पद्धतीने इतिहास लिहायचा करतो आहे !

    संजय सर मला मदत कराल का ?

    कारण आजच्या पिढीतील लोकांचा पीळ हा वेगळाच आहे -त्याना घडलेल्या गोष्टींशी घेणे देणे नाही !

    आजचे शूरवीर म्हणतात की मुसलमानांनी आई भवानी फोडली ते मुसलमान वेगळे ! आणि शिवाजीच्या सैन्यात होते ते मुसलमान स्वराज्यासाठी लढले !जणूकाही त्यांचीच पिलावळ आज आरक्षणाची मागणी करते आहे - असेच आपले म्हणणे आहे - आणि बाकीचे कुतुबशाही आणि आदिलशाही आणि मुघल यांची औलाद काय पाकिस्तानात गेली का ?आजचे सगळे नबाब काय हिंदू धार्जिणे होते काय ?जसा उदेभानु हा हिंदू असून मुसलमानांकडून लढला तसे हिंदू अनेक होते आणि मुस्लीम पण अनेक होते - त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे - त्याचा राष्ट्र्भाक्तीशी आणि शिवशाहीशी प्रामाणिक असण्याचा काहीही संबंध नाही - पूर्वी जिथे गर्दी झाली तिथे वाव नाही असे समजून लोक आपापले कर्तृत्व सिद्ध करायला देश आणि प्रांत फिरत असत - शहाजीने तेच केले - त्याची शिवाजीकडून पण तीच अपेक्षा होती - पण आई झीझाआभाआईछःय़ाआ संस्काराने त्याला प्रोत्साहन मिळाले आणि शिवशाही ने जन्म घेतला !इतर शह्यांपेक्षा या शिवशाहीत काय फरक होता ?हे हिंदू राजाचे राज्य होते -यात सर्वाना मुक्त करियर करायला वाव असणे ही

    त्या काळाची पद्धतच होती - त्यात शिवाजीची थोरवी काही खास अशी वाटत नाही !कारण शहाजी आणि इतर थोर सरदार त्याच वेळी अभिमानाने इतर बहामनी राज्यात काम करत होतेच -


    खरोखर मूर्खपणाचे विचार जोपासले जात आहेत -

    खरेतर आपण त्यावेळेची जाणीव ठेवत विचार केला पाहिजे - त्याला आजचे परिमाण लावणे चुकीचे आहे !

    एकेकाळी इंग्रज शिवाजीपुढे किंवा पेशवे दरबारी झुकून सलाम करत असत , पण एकदा उनियान ज्याक शनिवार वाड्यावर फडकला आणि सर्व जिवंत राजे महाराजाना आणि नाबाबाना त्यांच्या पंचम जॉर्ज आणि व्हिक्टोरिया रानिपुढे लोटांगण घालावे लागले !


    आता बघा हाच फोर्मुला समजा शहाजी राजे याना लावला तर ?

    ते ९६ कुळी असून आदिलशाही आणि इतर मुसलमानी सत्तांची चाकरीच करत होते - म्हणजे ते मुसलमानांशी एकनिष्ठ होते का ?- नाही ना ? आणि त्यांचे स्वप्न काय होते ?हिंदवी स्वराज्याचेच ना ?

    त्यांचे स्वप्न फसलेहोते ! त्यांचे सासरे या बाबतीत त्याना दोष देत असत - पुढच्या पिढीत ते स्वप्न साकार झाले असा इतिहास आहे - म्हणजेच शहाजीराजे मनात एक आणि जनात एक असेच वागत होते ना ?- ते मात्र राजकारण - आणि आम्ही जर असे म्हटले कि मुसलमानाना आरक्षण का आणि ९६ कुळी मराठ्यांच्या तोंडाला पाने का पुसता ? - तर आम्ही जणू पापच करत आहोत !- लगेच तत्व ज्ञान शिकवणार तुम्ही कि शिवाजीच्या सैन्यातपण मुसलमान होते - !

    खरेतर शहाजी -शिवाजीला त्या काळात लखुजी जाधव सुद्धा मानत नसत - हे झीझाआभाआईण्छःएफाण दुःख होते - मूळ घराणी घोरपडे , मोरे ,सुर्वे हे शिवाजीला अस्सल मानत नसत - हा इतिहास आहे - महाराजांनी कर्तृत्वाने आपले मोठ्ठेपण सिद्ध केले -

    शांताराम पासलकर

    ReplyDelete
  39. To provide reservation there are two paths.One increase limit of 50% by constitution amendment - it is difficult way and might not stand legal scrutiny. 2nd alternative reduce quota for SC, ST and OBC and provide at least 20% to Maratha. 3rd Alternative reduce quota for SC and ST and add it to OBC and add Maratha to OBC list.

    ReplyDelete
  40. मुस्लिम आणि मराठा आरक्षणाला बामन लोक का विरोध करतात ते समजले नाही?

    मी म्हणतो यांच्या बापाचे काय जाते आहे?

    जाती -जातीत व धर्मा-धर्मात भांडणे लावून मजा बघत बसायची जुनी खोड, दुसरे काय?

    प्रशांत शिर्के

    ReplyDelete
  41. प्रशांत शिर्के यास ,

    आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना समजतील असे थोडेच आहे ,

    आणि ते पसरणी चे शिर्के - हे मुळातच दगाफटका करणारे - यांना संताजी धनाजीच्या घोड्या सारखे सगळीकडे ब्राम्हणच दिसतात -शिर्के घराणे शिवकालापासून प्रसिद्ध आहे !-शिरकाण तर कोण विसरेल ?सोयराबाई आणि संभाजी यांचे नाते आणि शिरकाण हे काय आहे -काय सांगते ?


    यापण सर्व ब्राह्मणांच्या सडक्या डोक्यातून आलेल्या कल्पना आहेत का ते सांगुया आपण - मी घाटगे तुम्ही शिर्के - आपणा शिवाय दुसरे कोण सांगणार सत्य ?


    ब्राह्मणाला आरक्षण नकोच आहे

    आरक्षण नसण्याचे फायदे त्यांना कळले आहेत !

    आज अनेक परकीय लोक म्हणतात की स्वातंत्र्य पेलण्याची भारतीयांची लायकी नाही

    तसेच म्हणावेसे वाटते की आरक्षण पचवायची आपल्या समाजाची मानसिक तयारीच नाही !आरक्षणाने आपण पांगळे होत चाललो आहोत !आपले स्वत्व घालवून बसलो आहोत !


    अरे प्रशांत -नीट शांतपणे विचार कर ! आपण एकेकाळचे इथले सरंजामदार - वतनदार -

    सर्व गरिबांची मागसांची आपल्यावर मदार असायची -

    आज आपणच आपल भल करण्या साठी दीन दलितांची मागासांची टक्केवारी कमी केली तर तो एक अक्षम्य सामाजिक गुन्हाच होईल


    शिवाजी महाराजांनी अशा प्रसंगी काय केले असते त्याचा विचार कर

    आपण ९६ कुळी ! आपण आपला आब राखून बोलले पाहिजे!

    नाहीतर आपले हसे होण्यास वेळ लागणार नाही -

    शिवाजीच्या काळात दारू नव्हती का - होती - पण महाराजांनी किंवा आबाजी ,रामचंद्र अमात्य किंवा बाजीप्रभूंनी कधी थोडीशी एकमेकांबरोबर घेतल्याचे इतिहास सांगत नाही -

    आणि संभाजी ? असे का घडले ?आजोबा ,वडील आणि मुलगा तिघांबरोबरही ब्राह्मण संगतीला होते -

    शिवाजी शिवाजीच राहिला आणि संभाजी संभाजीच राहिला -

    प्रत्येक गोष्टीत ब्राह्मणाना दोष देणे हे आपले हसे करून घेण्यासारखे आहे !

    शहाजी शिवाजी आणि संभाजी यांचा अभ्यास आपल्याला अनेक गोष्टी उलगडून दाखवतो - तो एक न संपणारा अभ्यास आहे - अथांग व्याक्तीमात्वांचे हे असेच असते -त्यांचे जीवन साधे सरळ कधीच नसते-दर वेळेस आपल्या समोर त्यांची नवी रूपे -नवे चेहरे उभे राहतात -

    मागच्यापेक्षा नवीन रूप अधिक उत्तुंग वाटते !हा कधीही न संपणारा अभ्यास आहे -त्याला जातीच्या बंधनात अडकवून ठेवणे पाप आहे -हि एक महान गाथा शहाजी पासून सुरु होते आणि मग कधीच संपत नाही -संपूर्ण मराठी मनात एक अनोखी स्वाभिमानाची ज्योत

    त्यानी अजूनही तेवत ठेवली आहे - त्याला जातीचे कुंपण घालणे म्हणजे त्यांना छोटे करण्यासारखे आहे !ते पाप कोणीही करू नका इतकीच हात जोडून विनंती !

    ReplyDelete
    Replies
    1. घाटगे, तुझ्या शेजारी-पाजारी बामण राहतात काय?

      अर्थात तुला बामणाने काढ................................?

      प्रशांत शिर्के

      Delete
    2. " जातीच्या बंधनात अडकवून ठेवणे पाप आहे -हि एक महान गाथा शहाजी पासून सुरु होते"

      ----------------->घाटग्या , शहाजी राजे किंवा शहाजी महाराज म्हणायला काय जिभेला भोके पडतात काय?

      Delete
    3. मालोचा पोरगा शहा आणि त्याचा पोर शिवा आणि शिवाच पोरग संभा आणि सम्भाचा शाहू

      तो गांजेकस निघाला - पुढे वंश खुंटला - एकमेकात दत्तक घेत ते स्वतःला राजे म्हणवतात

      याना घोरपडे मोरे आणि शिर्के सुर्वे जाधवांनी कधी राजे मानलच नाही

      मग तुमच्या का पोटात दुखतंय इतक ?

      शिवबा सुशिक्षित नव्हते तरी सुसंकृत - सभ्य होते - त्यांना असली भाषा आपल्या शत्रूलाही वापरावीशी वाटली नाही - पण तुमची भाषा इतकी शिवराळ कशी ?

      मालोचा मुलगा हा आदिलशाही कुतुब् शाही चा काही हजारी सरदार होता -मनसबदार फक्त -!

      त्याला महाराज नि केले रे बाबा - ओसाद्गाव्चा राजा होता का तो ?

      Delete
  42. संजय सोनावणी सर ,

    श्री चैतन्य सर , आणि श्री सांगलीकर


    श्री घाटगे सराना बाटगे आणि खराटा म्हणणारे खरच मनाने दुबळे दिसत आहेत -

    श्री घाटगे सरांचे विचार आणि आचार अत्यंत सच्चे असतात - ज्यांचे जिथे चुकेल तेथे ते निर्भीडपणे या इतक्या वयातसुद्धा न घाबरता स्पष्ट सांगत असतात

    जे कोणी असे चोरून निनावी त्याना वाईट लिहित आहे त्यांचा निषेध केला पाहिजे

    तुमच्या टीकेमुळे असे सच्चे शुद्ध विचार कधीही थांबणार नाहीत -


    आमच्या सांगलीत त्याना मानाचा मुजरा करणारे कधीही त्यांचा अवमान करणार नाहीत

    पहाटे पाचला गणपतीला रोज त्यांची भेट होते त्यावेळेस सुद्धा ते इतकेच फ्रेश आणि तल्लख असतात आणि सर्वाना सहकार्य व मार्गदर्शन करण्यास उत्सुक असतात !


    खरा मुद्दा विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचा आहे - ते सांगताना तो सुसंस्कृतपणे मांडला जाईल असे बघणे आपले कर्तव्य आहे - नाहीतर शाळेतल्या किंवा

    सार्वजनिक मुताऱ्यातील थोर वाङ्ग्मय आणि संजय सोनवणी सर यांच्या ब्लोगवरील थोर प्रतिक्रिया यात फारसा फरक राहणार नाही

    संजय सरानापण विनंती कि जो कोणी सच्चाईने आपले मत मांडत असेल त्याला लेखन शुचीर्भूतीचे अभय मिळाले पाहिजे - असेच अरबट चरबट उत्तर मिळाले तर अशी उमदा मत व्यक्त करणारी मने कोमेजून जातील आणि आपला ब्लोग हा एक प्रचारी ब्लोग ठरेल - संभाजी ब्रिगेड आणि अनिता विचार मंच सारखा !


    डॉ . नीरव घोरपडे

    ReplyDelete
    Replies
    1. घोरपडे सर. अगदी बरोबर लिहिले. दुर्दैवाने इतक्या विचित्र प्रतिक्रिया आणि पटली सोडून असतात की प्रतिक्रिया कश्याला द्या ह्या फंदात बरेच लोक असतात. मुळात शिक्षण घेवून फक्त नोकरी करणारा एक समाज तयार झाला आहे. समाजात नोकारे देणारे तयार करायला पाहिजेत आणि त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजेल असे का नाही वाटत. उठ सुठ फक्त आरक्षण मागणे आणि मते मिळवणे अशी एक पद्धत होवून बसली आहे. बर ते मिळाले नाही कि जाळपोळ आणि बस वर दगडफेक पण हे सगळे आपल्याच खिशातून जाते ह्याची तमा नाही किंवा तेवढा विचार करायची कुवत नाही. नेत्यांचे लक्ष फक्त स्वतःची जहागिरी सांभाळण्यातच आहे. मग बाकी जनतेने काय करायचे? कठीण आहे. सारासार विचार करायची ईच्छा नाहीये किंवा समाजात तेवढी कुवतच राहिली नाही कि काय अशी शंका येते

      Delete
  43. डॉक्टर नीरव घोरपडे,

    संजय सोनवणी ,

    अत्यंत सुंदर प्रतिक्रिया आहे ,

    अतिशय मार्मिक लिहिले आहे - आज गरज आह्रे ती खरेतर परखड निरीक्षणाची आणि योग्य ठिकाणी कात्री लावायची - कारण आपण असे जर वागत गेलो तर चांगले स्पष्ट लिहिणारे आपल्यापासून दूर होतील आणि हा ब्लोग विचार मंथन करणारा न राहता फक्त एक ठोकळेबाज घोषणा करणारा ब्लोग होईल - जसा अनिता पाटील विचार मंच आहे -

    त्यानीतर संत रामदास ,पु ल देशपांडे इत्यादीना विकृत ठरवले आहे ! म्हणजे हद्द झाली !

    सुनिता ताकवले - सातारा

    ReplyDelete
  44. सरदार संग्रामसिंह घाटगे महाराज जर ८० वर्षांचे असतील तर त्यांचे कसले कोवळे मन आणि ते कसे कोमेजून जाईल - म्हातारा आम्हाला त्रास देतो आहे - गप्प बसून राहायचे सोडून नको तिथे या वयात तोंड घालतो आहे ! गप्प बस की रे बाबा !


    आणि गेले तर टांगतो आम्ही - असल्या म्हातार्यांना विचारतो कोण ? संजय ? तो तर निवडणुकीत राप्कन आपटलाय ! तो पण आमच्या हिशोबी शून्य ! मोट्ठे शून्य ! !

    एकाच्या पुढे ठेवले तर दसपट महत्वाचे - नाहीतर अगदीच निकामी !

    संजय तर आता अगदीच फुसका बार -


    अंतरा वाघ

    ReplyDelete
  45. जानव्याची शपथ घेऊन सांगतो "मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे" ! नाहीतर ब्राह्मतेजाच्या प्रभावाने आम्ही महाराष्ट्र हादरवून टाकू.

    मराठ्यांचा दास
    - परशुराम आगाशे

    ReplyDelete
    Replies
    1. जानवे तोडा मानवे जोडा!

      Delete
  46. संजय सरांनी आत्ताच सांगितले आहे की मराठ्याना आरक्षण मिळणार -

    सगळे आगाशे गोखले भिडे लेले आणि असे सगळेच

    एकारांती कोकणस्थ एकदम गप्प - चिडीचूप !

    किती नावे बदलून लिहाल ?

    जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा !त्यामुळे सगळे मागासवर्गीय खुशीत आहेत !

    सगळे नवबौद्ध आणि महार चांभार शिंपी - कोष्टी साळी माळी कासार कुणबी गाढवी सोनार सगळे आनंदाने आपापल्या टक्क्यातले काही तुकडे आम्हा ९६ कुळीना देणार आहेत - असे सगळे तुकडे मिळून आम्हाला आरक्षण मिळणार - धन्य झालो माहाराज - आपली पुण्याई !

    आम्ही सगळे आयुष्य बाई नाचवण्यात घालवले - जमिनीचे तुकडे करत गुंठे बहाद्दर झालो - पण आपल्या पुण्याईने महाराज आम्ही वाचलो -आता आम्ही दिवसा पिणार नाही - बाई दर आठ दिवसांनी नाचवू आणि गुंठे संपले की मग सरकारी नोकरी बघू !- स्पेशल आरक्षणाची !

    परशुरामा - तुझ्या जानव्याची शपथ !

    शिवाजी भोसले

    संभाजी भोसले

    हि नावे खोटी नाहीत

    आम्ही परत जन्म घेणार आरक्षण एन्जोय करायला ! मस्तच रे नाश्या लेकारानो - आमची अब्रू राखलीत ! जरिपतक्यचा मान राखलात !

    ReplyDelete
    Replies
    1. "किती नावे बदलून लिहाल ?"

      ha ha ha...
      Look who is talking..

      Delete
    2. नावे बदलून लिहिणारच ओंकार निंबाळकर जेव्हा दुसऱ्या लोकांवर हा आरोप करतो तेंव्हा हसावे की रडावे काहीच काळात नाही?

      चला फक्त हसू आणि हसत राहू, कारण विनोद यालाच म्हणतात!

      हा ओंकार स्वतःच लिहितो आणि स्वतःची पाठ स्वतः च थोपटून घेतो! भिकाजी सोनटक्के वगैरे वगैरे नावाने स्वतःच टिप्पणी लिहून! खरे कि नाही ओंकार साहेब (?)

      ज्ञानेश्वर साळुंखे

      Delete
  47. मित्रानो ,

    तुम्हाला वाटेल कि ओंकारला असे कसे सुचले ?

    पण थांबा - खुलासा करतो - संभाजी भोसले आणि शिवाजी भोसले हे दोघेही मला भेटले - दोघेही अंगठे बहाद्दर - त्यांनी जसे सांगितले अगदी तसे लिहिले - इकडची रेष तिकडे नाही केली - जानव्या शप्पथ !

    ReplyDelete
  48. अहो अनानिमास काका

    इतके सगळे शब्द वापरले तुम्ही ?

    - म्हणजे माझे मराठी इतके चांगले आहे ?

    तुम्ही इतका विचार करता - आणि त्याना लगेच सांगता - किती छान ना ?

    असेच करत जा काका , म्हणजे तुम्हाला काहीतरी चांगले काम केल्याचे समाधान मिळेल -

    काकू कश्या आहेत ?

    तुम्ही त्यानापण असेच म्हणता का ?

    तू भंकस आहेस - तू वात्रट आहेस - ? आणि तुमच्या मुली ? त्यांनापण असेच बोलता ? तू पांचट आहेस - तू भयंकर आहे /

    सगळे तुम्हाला हसत असतील आणि चिडवत असतील ना हो काका ?

    सांगा ना अनानिमास काका -

    आमच्या शाळेत आता सर्वाना अनानिमास काका काय म्हणतील त्याची पैज लागली आहे -

    सांगा ना काका !

    कस्तुरी

    ReplyDelete
  49. क्षत्रियांनी बोरुबहाद्दुरी करण्या ऐवजी आपल्या ४६ पिढ्यांची पुण्याई वाढवत लष्करात जाउन देशाची सेवा करावी म्हणजे इथल्या टवाळ वातावरणापेक्षा एक शिस्त निर्माण होऊन त्यांचे आणि देशाचे भले होईल आणि तसे पाहिले तर हा आपला पिढीजात धंदा - अवघड नाही !इथे पारावर बसून पिचकाऱ्या मारण्यापेक्षा आणि धूर सोडत बसण्यापेक्षा घरात पैशाचा धूर निघेल असे वागावे - तिथे आरक्षण आहे का ? मला माहित नाही - पण आपला पिढीजात व्यवसाय आहे - सोपे जाइल -

    आणि दोन भाशापण शिकता येतील !

    देश पहायला मिळेल - मिलीतरीत सर्वात प्रथम अन्न आणि नागरी सुविधा मिळतात आणि रमची आणि व्हीस्कीचीपण सोय होते !- मराठ्यानो इथे जातीचे राजकारण करणाऱ्या आणि इतर जातींच्या द्वेषाचे राजकारण करत बसण्यापेक्षा मर्दुमकी दाखवा !

    आपल्या सैन्यात मराठ्याना फार मान आहे !

    आपण शाळेत किंवा ऑफिसात आणि पाणी करत बसता त्यापेक्षा तिथे कर्तृत्व तरी दाखवायला चान्स आहे !- चला तर सेना दिवस चा शुभ मुहूर्त पकडा !

    ReplyDelete
  50. संजय सर

    चैतन्य सर

    साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको या लेखाला शून्य प्रतिसाद आणि प्रा नरके सरांच्या लेखाला आणि त्यापुढच्या साहित्य सम्मेलनाबाबतच्या लेखाला २०० आणि १५० च्यावर प्रतिसाद

    आणि त्यातही सर्व वेळ शाहू महाराज या विषयावरचमूळ विषय संमेलनाचा आणि चर्चा शाहू , निरीश्वरवाद आणि विवेकानंद अशी भरकटलेली !

    आता मराठा आरक्षणा च्या लेखावर पण सुमारे १०० प्रतिक्रिया - त्यात पण जातीयवादी शक्तींचाच भरणा -

    कविता आल्या छापून तरी अगदी काहीच प्रतिक्रिया नसते

    सगळेच गमतीदार आणि ठरीव आणि रुक्ष - हे सगळे लिहिणे हि मानसिकता काय आहे ?

    समाज प्रबोधन आहे का मानसिक विकृतीचा उद्रेक आहे ?

    एक ठराविक वर्ग नुसता वसवसाट करत काहीही धुमाकूळ घालत असतो


    या ठिकाणी प्रबोधनाची आणि वैचारिक देवान घेवाणीची कुणालाच फिकीर नाही -

    झुंड शाही करणारे मग्रूर कसे हिंदी चित्रपटात धुमाकूळ घालत असतात तसाच हा प्रकार - आपापला राग आणि निराशा आणि वेदना व्यक्त करताना कुठल्यातरी उच्च जातीवर त्याचे खापर फोडायचे हा इथला नियमच झालेला आहे !


    संजय सर हे पण बहुतेक हे सर्व ओळखून आहेत आणि काहीही करू शकत नाहीत किंवा त्याना काहीच करायचे नसते -

    या ब्लोगवर लिहिणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे - आचरट आणि मूर्ख लोकांचा धिंगाणा असेच याचे स्वरूप आहे - लेखन प्रतिक्रिया कायमच्या थांबवणे हाच योग्य उपाय आहे -

    भ्रमिष्ट लोकांच्या नादी लागून आपणही भ्रमिष्ट होत जाऊ -

    ReplyDelete
    Replies
    1. घाटगे सर,

      दुर्दैवाने तुम्ही पण माझ्याच सारखा विचार करू लागलात बहुदा. हे जे कोणी Anonymous नावाच्या मागे लपून लिहितात त्यांना ना समाज सुधारायचे ना स्वतःला. फक्त एककल्ली विचार करून माझे तेवढे खरे आणि फक्त आपल्याला सोईस्कर होईल तेवढेच सांगायचे असा सगळा मामला आहे. असो ह्या ब्लॉगवर येवून प्रतिक्रिया लिहिणे आणि वाचणे म्हणजे खरोखर वेळेचा अपव्यय आहे. पुन्हा एकदा हाच निष्कर्ष निघाला हे दुर्दैव. ह्याच कारणाने लोक मागे पडले पण समजून घेण्याची इच्छा किंवा कुवत नाहीये असे म्हणावे लागेल.

      Delete
  51. नावे बदलून लिहिणारच ओंकार निंबाळकर जेव्हा दुसऱ्या लोकांवर हा आरोप करतो तेंव्हा हसावे की रडावे काहीच कळत नाही?

    चला फक्त हसू आणि हसत राहू, कारण विनोद यालाच म्हणतात!

    हा ओंकार स्वतःच लिहितो आणि स्वतःची पाठ स्वतः च थोपटून घेतो! भिकाजी सोनटक्के वगैरे वगैरे नावाने स्वतःच टिप्पणी लिहून! खरे कि नाही ओंकार साहेब (?)

    ज्ञानेश्वर साळुंखे

    ReplyDelete
  52. संजय सोनावणी,

    आणि ज्ञानेश्वर साळुंखे सर,


    अक्कलकोट पासून जवळ कर्नाटकात गुलबर्गा च्या अलीकडे निंबाळ चे गुरुदेव रानडे

    यांच्या निम्बाळ गावाचे आम्ही निंबाळकर ,आणि आमचे खरे नावच ओंकार आहे तर आम्ही खोटे का लिहू ?

    आणि आप्पा बाप्पा हे नाव तर सरळ सरळ कुणीतरी वयस्कर माणसाने धारण केले आहे -

    आमची मूळ भाषा खरेतर मराठी पण आम्ही कर्नाटकात - त्यामुळे आम्ही मराठी शुद्ध लिहिण्यात रस घेत असतो - दर वेळी प्रयत्न करत असतो - अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्या कडे गुरुदेव रानडे झाले - माझे वय आत्ताच २९ आहे त्यांचे निधन १९५३ च्या सुमारास झाले - तसाच एक माठ हुबळीला सिद्धारूढ महाराज यांचा आहे त्यांचे १९२९ ला निधन झाले - पण आम्हाला तो माठ आवडतो -

    आपली मते या ठिकाणी आम्ही नोंदवतो ते फार मनापासून आणि काहीतरी सांगावे असे वाटते म्हणून - पण आपली मते ऐकून वाईट वाटले - आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू आणि कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत जाऊ - पण आम्हाला वाईट शब्दाने दोष देवू नका हे आमचे हात जोडून सांगणे आहे - आम्हाला मराठी वाचायला फार फार आवडते - ऐकायला तर इकडे फार मिळत नाही - पण या सोयीमुळे आम्ही आपल्याशी संवाद साधू शकत असतो -

    मी मराठी आहे - याचे मला अभिमान असेतो -

    प्रणाम

    ReplyDelete
    Replies
    1. "आणि आप्पा बाप्पा हे नाव तर सरळ सरळ कुणीतरी वयस्कर माणसाने धारण केले आहे -"

      ----------------------------------> पूर्णतः असत्य?

      Delete
    2. आता सारवासारव काहीही कामाची नाही!

      Delete
    3. "आपली मते या ठिकाणी आम्ही नोंदवतो ते फार मनापासून आणि काहीतरी सांगावे असे वाटते म्हणून - पण आपली मते ऐकून वाईट वाटले - आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू आणि कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत जाऊ - पण आम्हाला वाईट शब्दाने दोष देवू नका हे आमचे हात जोडून सांगणे आहे - आम्हाला मराठी वाचायला फार फार आवडते - ऐकायला तर इकडे फार मिळत नाही - पण या सोयीमुळे आम्ही आपल्याशी संवाद साधू शकत असतो -"

      -------------------------------> ओंकार निंबाळकर इतरांचे विचार सुद्धा काळजीपूर्वक वाचत जा, उगीत शहाणपणाचा आव आणून त्यांची टिंगल -टवाळी करण्याची घाणेरडी सवय सोडून दे म्हणजे झाले!

      Delete
    4. तुझे म्हणणे कोण खरे माननार?

      Delete
    5. सिंह आणि बैल

      एकदा एका सिंहाला, एखादा लठ्ठ बैल खाण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने एका बैलाला सन्मानाने आपल्या घरी मेजवानीस येण्याची विनंती केली. बैलाने ती मान्य केली व तो सिंहाच्या घरी गेला. तेव्हा त्याला मोठमोठी भांडी व स्वैपाकाची इतर तयारी दिसली. ते पाहून तो बैल पळत सुटला, तेव्हा सिंह म्हणाला, "मित्रा असा पळून का चाललास?' बैल म्हणाला, "ही सगळी तयारी पाहून मला कळून चुकलं आहे, की मेजवानीत बैलाचंच मांस असणार. तेव्हा त्या अन्नात माझं रूपांतर होण्यापूर्वी मी निघून जातो.

      तात्पर्य : कोणाच्या गोड बोलण्याला भुलून आपण त्याच्या जाळ्यात सापडलो तरी त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच आपण सावध होऊन निसटावे, यातच शहाणपण आहे.

      Delete
  53. दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दलित चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांचा ‘असंविधानिक आणि अनाठायी मागणी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. मराठा समाज सर्व ठिकाणी सत्ताधारी आहे, त्याच्याकडून अजूनही दलित-आदिवासी, मागास समाजावर अन्याय अत्याचार चालू आहेत, तसेच हा समाज आरक्षणाच्या सामाजिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही असंविधानिक आणि अनाठायी आहे अशा स्वरुपाची मांडणी ज. वि. पवार यांनी आपल्या लेखात केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचा लेख दै. लोकसत्ताच्या दि. २३ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला. या लेखाचे नावच मुळी ‘नकारात्मक भूमिका नकोच!’ असे आहे. या लेखात शशिकांत पवार यांनी मराठा समाज आरक्षणाचा हक्कदार आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मांडणी करताना नकारात्मक भूमिका घेवू नये अशी मांडणी केली आहे. वरकरणी पाहता त्यांची ही भूमिका योग्य वाटत असली तरी त्यांनी मराठा आरक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या नादात मराठा समाजाची नकारात्मक बाजू साफ नजरेआड केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि एकूणच मराठा समाज यावर भाष्य करणारा हा लेख....

    शशिकांत पवार आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच ज. वि. पवार यांच्या लेखाला पूर्वग्रहदुषित म्हणत आहेत. ते म्हणत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ शशिकांत पवार यांच्या मराठा महासंघाने जाळले होते तो पूर्वग्रह नव्हता काय असे पवार यांना विचारावे वाटते. संपूर्ण लेखात पवार यांनी मराठा आरक्षणाची गरज प्रतिपादली आहे. परंतु हे सर्व लिहित असताना बहुतांशी प्रमाणात मराठा समाजाकडून दलित मागासांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याबद्दल पवार यांनी अवाक्षरही काढले नाही. उलट पूर्वीचा मराठा समाज आणि आत्ताचा मराठा यात जमीन आस्मानचा फरक आहे असे पवार म्हणत आहेत. मराठा महासंघाची पाळेमुळे ग्रामीण महाराष्ट्रात खूप खोलवर रुजली आहेत. महासंघाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना पवार यांना दलित अत्याचाराचे भयाण वास्तव दिसू नये ही शोकांतिका आहे. खैरलांजी येथे घडलेला अत्याचार हा दीड-दोनशे वर्षापूर्वी झाला नव्हता. त्या निर्घृण हत्याकांडात सामील असलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी किती आटापिटा केला हे पवार यांना माहित आहे. याच शालिनीताईंना बरोबर घेवून मराठा महासंघाने दलित-मागासांच्या राखीव जागांना टोकाचा विरोध केला. आरक्षणाला विरोध करता करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजावर बोचरी टिका शालिनीताई आणि मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. त्याचे पर्यवसान अनेक ठिकाणी सवर्ण-दलित यांचे संबध बिघडण्यात झाले. बाबासाहेबांवर इतक्या खालच्या पातळीवर जावून ताई आणि मराठा कार्यकर्ते चिखलफेक करत असताना शशिकांत पवार किंवा मराठा समाजाची एकही संघटना समोर येवून त्यांना थांबवू शकली नाही. उलट मराठा महासंघ, छावा यासारख्या संघटना शालिनीताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ प्रत्यक्ष सामील नसले तरी तेही ताईंना विरोध करू शकले नाहीत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दलित-मागास समाजावर अन्याय-अत्याचार होत असताना सर्व मराठा संघटना मुग गिळून गप्प राहिल्या ही शोकांतिका आहे. पवार म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाच्या चळवळी सर्वसमावेशक होत्या तर इतक्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडूनही मराठा संघटना गप्प का याचे उत्तर त्यांनी द्यावे.
    contd.........

    ReplyDelete
  54. पूर्वीचा मराठा आणि आत्ताचा मराठा यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे हे पटवून देण्यासाठी पवार लिहितात कि ‘महाराची सावली पडली तरी पाणी टाकून घरी येणारा तत्कालीन हिंदू आज प्रेमविवाहाच्या जमान्यात दलित सून घरात नांदवतो, दलित जावयाचे पाय धुतो.’ खरे पाहता पूर्वीचा काळ बदललाय हे खरे आहे. प्रेमविवाहाचे प्रमाणही वाढलेले आहे. परंतु मराठा समाजाची दलित सून किंवा दलित जावई स्वीकारण्याची मानसिकता आहे काय याचा विचार केला पाहिजे. वास्तव दुर्दैवी आहे परंतु आजही दलित सून किंवा दलित जावई स्वीकारायला मराठा समाज तयार नाही. दलितच कशाला, ९६ कुळी मराठे ९२ कुळी असलेल्यांना स्वीकारत नाहीत तिथे दलित फार दूरची गोष्ट आहे. आणि खरोखर जर पवार यांच्या म्हणण्यात तथ्य असते तर साताऱ्याच्या आशा शिंदेला जीव गमवावा लागला नसता, प्रेमप्रकरणावरून सोनाई येथील मेहतर समाजाच्या तीन युवकांच्या शरीराचे अमानुषपणे तुकडे केले नसते, सातेगाव (नांदेड) येथे दलित प्रियकराचे डोळे चाकूने काढले नसते. या सर्व घटना काय दर्शवतात ? या अन्याय-अत्याचाराबद्दल मराठा संघटना कधी बोलणार आहेत कि नाही ? कि पूर्वीसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही या गोड स्वप्नातच आम्ही राहणार आहोत ?
    आज महाराष्ट्रात मराठा समाज हा सत्ताधारी समाज आहे. राजकीय क्षेत्रात पूर्णपणे मराठा समजाचे वर्चस्व आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून सर्व महत्वाची मंत्रिपदे मराठा समाजाकडे आहेत. राजकारणात सक्रीय असलेली मराठा घराणी खूप प्रबळ आहेत. एखाद्या मुंडे-भुजबळांचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांच्या हातात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सहकार क्षेत्रातही पूर्णपणे मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. किंबहुना सहकार हा मराठा समाजाचे बलस्थान आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा सरपंच एकवेळ बिगर मराठा चालेल (आरक्षण असल्यामुळे चालवावाच लागतो) पण सहकारी सेवा सोसायटीचा चेअरमन मात्र मराठाच पाहिजे हे वास्तव आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मराठा समाजच सर्वोच्च स्थानी आहे. भारती, डी. वाय. पाटील, कृष्णा यासारखी विद्यापीठे आणि शेकडो शिक्षण संस्था मराठा समाजाच्याच मालकीच्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा अशा सर्व ठिकाणी मराठा समाज इतरांपेक्षा खूप वरचढ आहे. शिक्षणातसुद्धा मराठा मुले खूप पुढे आहेत. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीपेक्षा निश्चितच जास्त शेती आहे. आणि आत्महत्या करण्यात मराठा शेतकऱ्याबरोबर बिगर मराठा शेतकरीही असतो. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार केला असता असे दिसते कि मराठा समाज सर्वच क्षेत्रात इतर बहुजन जातींपेक्षा नक्कीच पुढे आहे. त्यामुळे स्वतःला मागास सिद्ध करताना या सर्व सत्तास्थानांचा त्याग आपण करू शकतो का याचाही विचार व्हायला पाहिजे.

    ReplyDelete
  55. contd.............

    अजून एक मुद्दा पवार मांडतात, तो म्हणजे सर्व मराठे मुळचे कुणबी आहेत. मान्य आहे. परंतु ही काही वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. काळाच्या ओघात कुणबी आणि मराठा यांच्यातही खूप फरक पडला आहे. ज्या कुनब्यांकडे त्या काळात सत्तास्थाने होती त्यांनी स्वतःला मराठा असे अपग्रेड करून घेतले. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढली आणि मुळचा कुणबी कि जो धनगर-माळी यांच्या जवळपास गणला जात होता त्या स्थानापासून मराठा खूप पुढे गेला. मुळच्या मराठा या प्रदेशवाचक शब्दाला एका जातीचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचा उपयोग मराठा समाजाने इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी करून घेतला. ९६ कुळीचा गर्व बाळगत इतरांना हिणवण्यात धन्यता मानली. आजही अनेक मराठा व्यक्ती राजकीय, शैक्षणिक उद्देशासाठी कुणबीचे प्रमाणपत्र मिळवतात. कागदोपत्री जात कुणबी मात्र व्यवहारात मराठा असते कि नाही ? अशावेळी जात सांगताना आपण मराठाच सांगतो कि नाही ?

    शशिकांत पवार म्हणतात कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली तेव्हा त्यांनी फक्त त्यांचा समाजच डोळ्यासमोर ठेवला. अनुसूचित जाती एवढेच लक्ष त्यांचेसमोर होते आणि त्यांनी इतर मागासांकडे दुर्लक्ष केले. परंतु पवार हे विसरतात कि बाबासाहेबांनी घटनेत कलम ३४० नुसार इतर मागास वर्गांच्या आरक्षांची तरतूद केली आहे. कलम ३४१ हे अनुसूचित जाती आणि ३४२ अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाबाबत आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी इतर मागास वर्गांच्या आरक्षणासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बाबासाहेबांनी इतर मागासवर्ग नजरेआड केला या पवार यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. उलट दलित-आदिवासी समाजाबरोबरच इतर मागासांसाठीही बाबासाहेबांनी घटनेत तरतुदी करून ठेवल्या आहेत. परंतु सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याची स्वातंत्र्यानंतर अंमलबजावणी केलीच नाही. बाबासाहेबांनी फक्त दलित समाजापुरते काम केले असे गैरसमज पसरवण्यात आले. शशिकांत पवार यांची वरील विधाने म्हणजे असाच प्रकार म्हटला पाहिजे.

    डॉ. आंबेडकरांच्या राम आणि कृष्णाची चिकित्सा या पुस्तकाचे भांडवल कुणी केले? त्यांचे ग्रंथ कुणी जाळले ? त्या काळात दलित समाजाविरोधात समाजमन कुणी कलुषित केले हे पवार यांनी सांगावे. मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करताना शेकडो दलितांची घरे जाळण्यात आली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले याची जबाबदारी कोण घेणार ? कि फक्त सकारात्मक बाजुच पाहण्याच्या नादात इतरांनी आमची नकारात्मक बाजू लक्षातच घ्यायची नाही का ? मराठा आरक्षणाचा विचार करत असताना या सर्व गोष्टींचाही विचार करावा.

    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  56. अभिनंदन .....राव मराठा व कुणबी मराठा या मध्ये फार मोठा फरक आहे . या साठी पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात जावे लागेल . कारण ब्राम्हण -ब्राम्हणेतर चाळवलीमुले इथे कुणबी मराठा समाजाला इथल्या राव मराठ्यांनी गिळून टाकले आहे . त्यांना कोणताही लाभ आजआखेर मिळालेला नाही .ते रंगारी ,बिगारी ,हेल्पर ,शेतमजूरच आहेत . त्याच्या गरीबीचे भांडवल करून हे राव मराठे (वतनदार ) आज आरक्षण मागत आहेत . आरक्षण हे गरिबी हटावचा मार्ग नव्हे हे यांना कोण सांगणार . सगळे साखर कारखाने ,सुत गिरण्या ,शिक्षणसंस्था ,कारखानदारी याच राव वतनदार मराठा समाजाच्या ताब्यात आहेत . या सत्ताकेंद्रात यांच्या पोटातील कुणबी मराठा ,धनगर माळी कुठेच दिसत नाहीत. सगळे आमदार-खासदार याच राव वतनदार पाटील -देशमुख -सरकार घराण्यातीलच आहेत . हीच खरी आजची शाषक जाती आहे . फुले-आंबेडकरांचे काळात ब्राम्हण हि शाषक जाती होती .आजच्या वास्तवात फुले - आंबेडकरानी याच राव मराठा (वतनदार ) शाषक जाती विरुद्ध वैचारिक लढा दिला असता .

    ---- विजय ग . गावडे

    ReplyDelete
  57. मराठा हे जास्त जातीयवादी असतात. कोणताही व्यवसाय निवडला तरी अंगात महाराज असतो आणि customer ला गुलामाची वागणूक देतो. त्यामुळे ह्यांचे व्यवसाय चालत नाही ,(आणि म्हणतात कि ते मागास आहेत).
    क्षत्रिय म्हणतात आणि civil society मधेच मिरवत बसतात. सीमेवर जावून दाखवा ना क्षत्रिय पणा.

    ReplyDelete
  58. या प्रश्नांची उत्तरे द्याल का?

    दलितांनी चौक बाटवला म्हणून गोमूत्राने तो शुद्ध करून घेणारे कोण होते?

    कुणबी मराठ्याशी लग्न होऊ नये म्हणून स्वत:च्या मुलीला मारून रुळांवर तिचा मृतदेह फेकून देणारे कोण होते? (http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227548:2012-05-18-17-02-45&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194)

    आज ओबीसी म्हणवून घेणाऱ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह किती प्रमाणात होतात?

    मराठा नेते घराणेशाही करतात तर ओबीसी नेते तरी काय वेगळे करतात?

    दलितांची एवढीच काळजी असेल तर ओबीसी जनता आपापल्या जातींच्या नेत्यांच्या ऐवजी दलित नेत्यांना का बरे निवडून आणत नाही?

    तुम्ही जातीसाठी माती खाल्ली तरी तुम्ही स्वत:ला पुरोगामी ठरवणार आणि दुसऱ्यांनी तेच केले की बोंब मारणार. असले पुरोगामित्व काय कामाचे?

    ReplyDelete
  59. शिक्षणसम्राट किंवा साखरसम्राट सर्वच मराठा समाज नाही.बरेच लोक आजुन हलाक्याचे जीवण जगत आहेत.

    त्यांना आरक्षण मिळाले तर काय वाईट आहे ? आरक्षण मिळालेच पाहिजे.

    राहीली गोष्ट जातीवादी आहंकाराची माझे कितीतरी मित्र अहेत जे पुर्वी कांबळॆ होते तर नोकरी लागली शहरी गेले.

    ज्या मराठा संघटानावर आगपाखड करताय त्याच सम्घटनेमुळे आज राष्ट्रपिता महात्मा फ़ुले विश्वभुषण युगप्रवर्तक बाबासाहेब प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये आहेत.

    अत्याचार : जे काही घडले मेहतर समाजाबरोबर त्याचे वाईट वाटतेच पण हेही तितकेच खरे आहे की त्या जागी मराठा तरून जरी असते तर त्यांचेही तेच हाल झाले असते कारण जे जातीवादातून होत नाही तर प्रतिष्ठे तुन होत असते.

    ReplyDelete
  60. जाऊ द्याहो त्या बिचाऱ्या मराठ्यांना !

    उरले सुरले तुकडे समोर टाका - किती पोट खपाटीला गेली आहेत - शिला भात आणि भाकरीचा तुकडा असेल तर टाका त्यांच्यापुढे

    त्याना म्हणाव आरक्षणाची भिक हवी आहेना ? मग आमच्या सारख गुवाच्या पाट्या डोक्यावरून वाहून न्यायला या आमच्या सोबत !

    आमच्या आया बहिणी म्हणजे तुमचे वेठबिगार ना ?

    आता आमचे अंगण झाडा आणि संडास साफ करा तर आम्ही खारकत टाकलेलं तुम्हाला मिळेल ?

    किती पिढ्या आम्हाला नागवल ?

    आता आमच्या बरोबरीने भिक मागताना आमचाच कटोरा हिसकावून घेत आहेत हरामखोर !

    त्यापेक्षा ती बामन बरी - अंगावर फाटक तुटक तरी घालतात आमच्या थंडीच्या वखताला -

    महारवाडा - सातारा

    ReplyDelete
  61. वरील प्रतिक्रिया १००% बामानानेच लिहिली आहे, मराठा व मागासवर्गीय लोकांमद्धे तेढ निर्माण करण्यासाठी !

    "आता आमच्या बरोबरीने भिक मागताना आमचाच कटोरा हिसकावून घेत आहेत हरामखोर !"------------------> खरेतर, कटोरा हिसकावून घेण्याचा प्रश्न उठतोच कुठे?

    "त्यापेक्षा ती बामन बरी - अंगावर फाटक तुटक तरी घालतात आमच्या थंडीच्या वखताला -"---------------------> पुन्हा बामणांची खोटी स्तुती!

    ओंकार निंबाळकर, खरे सांग तूच लिहिले आहे ना ते!

    मी ओळखली आहे तुझ्या लिखाणातील ढब!

    खोटारडा कुठला, ओंकार! (लिंबाळचा - साफ झूट)

    अनिल वाघ



    ReplyDelete
  62. ओंकार निंबाळकरला काही काम-धंदा आहे कि नाही, माहित नाही. किती नावांनी लिहतो याचा थांड पत्ताच नाही. बायकांच्या नावानेही हाच लिहितो.

    आनंद जोग

    ReplyDelete
  63. परशुरामाच्या लंगोटीला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करतो ,"मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लंगोटी घालणार नाही".

    मराठ्यांची थुंकी झेलून धन्य झालेला
    - परशुराम आगाशे

    ReplyDelete
    Replies
    1. अय्या , संजयजी ! !

      किती चावट लिहितात हो तुमच्या इथे लोक - तुम्हाला आवडत असाल ?

      तुम्ही थांबवत कसे नाही हे असले प्रकार ?

      का तुम्हीच लिहित असता हे अनानिमास या नावाने -

      अय्या

      आम्हाला बाई फार लाज वायाये -

      नुसता विचार केला तरी

      काहीतरीच ! इश्श्य !

      नको बाई ! लाज वाटते वाचायला !

      परशुराम आगाशे ? परशुराम आधीच पंचात असतो - आणि आत काही लंगोटी पण नाही म्हणजे अगदीच - इश्श्य !- नको बाई !

      तुमच्या ओळखीतला आहे का हो हा आगाशे - त्याला सांगा - इश्श्य ! नकोच बाई !

      किती वयाचा आहे हो हा आगाशे परशुराम ?

      नाही , सहज विचारलं ! कुठे राहतो हा ? कोणाच्या गावातला ? भेटलं पाहिजे एकदा !

      इंटरेस्ट वाटायला लागलाय आता - हा खराच आहे परशुराम का सुताबुताताला आहे का पाळण्याताला आहे ?- शपथा घेतोय आणि असायचा पाच वर्षाचा !

      Delete
  64. आमच्या ह्याना असे काय होते - कुत्र चावल्यागत ओरडत सुटतात - आत या बर - सांगते तुमास्नी !अवो रातच्याला असं बामनांच्या नावांनी ओरडत गाव जागवायला काय त्याना इतक सोन चिकटलय का ?

    त्यांची ताकद किती , संख्या मुठभर - आणि आपल्याकड इतकी घबराट कशासाठी हो ?

    तुमी न्हेमी सांगता - लाथ मारीन तिथ पाणी काढीन !

    मग इतक कसलं टेन्शन घ्यायच या बामणांच ?

    आणि तो ओंकार निंबाळकर स्वता म्हन्तोय ना की मी त्यातला न्हाई मग उगीच येखादाच्या इतकं माग कशापाई लागावं ?- असेल नसेल तो निंबाळचा - इतक कशाला इचार करत टकूर फिरवायच सगळ्या घराच ?

    आणि काय हो तुमच नाव लावत नाही ना जोवर तोवर कशाला सारखा त्याच्या नावाचा जप करताय येड्यावानी ?- लोग हत्यात म्हंटल - जरा मांज ऐका ! शांत रावा आहेती मीठभाकर खावा

    आणि गावभर फक्या मारन्यापेक्शा आणि आरक्षानाच्या लायनीवर जान्यापेक्शा जरा कामाच बागा !

    आणि पोराबाळाचा इचार करा - लष्करा च्या भाकऱ्या भाजण सोडा - न्हाईतर सरळ लष्करातच जा की मर्दुमकी गाजवायला - नुसत ते मिशीला पीळ देत गावभर हिंडताय - एक सादी भिंतीवरची पालपण मारता येत न्हाई किंवा साद कुत्र सुद्दा घाबरत न्हाय तुमच्या वराडन्याला !

    आनंदान रहावा की

    मी कोण म्हणता - अवो मी त्यांची

    ReplyDelete
  65. आनंदी वाघीण

    ReplyDelete
  66. Sanatani, Brigadi, BAMCEFI all are fighting here to prove how they are right and others are not. I have been listening about Maratha Arakshan from last 10 years but no solution at all. The fighting between various castes continues and so does the politics.
    "Ghya Doke PHODUN Ekmekanche".....Garja Maharashtra Maaza...

    ReplyDelete
  67. Indian society was in process of change after 1857. Dr. Ambedkar , Mahatma Phule were well educated and shown path to society.
    Education was not denied to any caste or class or to women. All cates were free to follow occupation of their choice.
    This was and is situation for almost last 150 years. It means almost 5 generations have freedom of education and occupation. ( I am saying freedom and not opportunity ).

    Considering above , is it fair to accuse today's Brahmins that they are responsible for all ills ? Is it right to spread hatred against Brahmins ? Many organisations are very active on net and otherwise in spreading hatred against Brahmins.
    Is it right ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...