Friday, July 17, 2015

मी हिंदू आहे!

मी हिंदू आहे. हिंदू असल्याचा जेवढा अभिमान असायला हवा तेवढा मी बाळगतोच. किंबहुना हिंदू धर्मात घुसखोरी करत विषमतेची वैदिक अहंता जे बाळगतात आणि स्वत:ला हिंदू समजतात त्यांचा विरोध करतो. मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. अनेक लोक विरोधाला द्वेष समजतात त्यांची कीव वाटते. शिक्षणाचे भारतियीकरण कि वैदिकीकरण हा प्रश्न मी उपस्थित केल्यावर माधव भंडारींसारख्या खंद्या लढवैय्याला केवढे सारवासारव करावी लागली याचे राकेश शिर्के, राजा कांदलकर आणि राकेश पाटील साक्षीदार आहेत. मला छुपे अजेंडावाले आवडत नाहीत. तुम्ही जे आहात ते खरे रुप दाखवा. मला मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध जास्त आवडतात कारण ते जे आहेत त्याशी जाहिर प्रतारणा करत नाहीत. घरात वैदिक बाहेर हिंदू, वर्तनात वैदिक...म्हणायला हिंदू असले उपद्व्याप या देशातील त्रैवर्णिक वैदिक करत आले आहेत.
कोणीतरी काल प्रतिक्रियेत म्हणाले कि मी वेदांचा द्वेष करतो. म्हणजेच ब्राह्मणांचाही द्वेष करतो. वेद ही फक्त ब्राह्मणांची मालमत्ता नव्हती तर क्षत्रियांचीही होती. वेदांतील नासदीय, भूमी सुक्तांसारखी अनेक सुक्ते मला प्रिय आहेत. ऋग्वैदिक ऋषींच्या भावनिक, श्रधाळू आणि कुतुहलशील सुक्तांबद्दल मला नितांत्य आदर आहे. माझा त्या धर्मातील वर्ण संकल्पनेने निर्माण केलेल्या मानवी विषमतेला विरोध होता आणि आहे. हिंदुंमद्ध्ये (वैदिक स्वत:ला हिंदु समजु लागल्यापासुन) ही वर्णीक उतरंड त्यांच्यातही घुसली आणि विषमतेचे त्यांच्यात नसलेले तत्व तेही पाळू लागले. ते पाळू नये एवढ्यापुरताच वैदिक धर्माशी विरोध आहे.
खूप ब्राह्मण आणि क्षत्रीयही (कलियुगी क्षत्रीय नाहीत असे वैदिकच म्हणतात, पण खूप लोक स्वत:ला क्षत्रीय म्हणवुन घेतात आणी गर्वाने मिरवतात) आजही या वैदिक विकारांनी ग्रस्त आहेत. याच वेळीस खूप लोक असे आहेत कि त्यांनी वैदिक धर्माने दिलेली मक्तेदारी नाकारत समतेचा उद्घोष केला आहे. अशा लोकांना मी वैदिक समजत नाही. धर्म हा नुसता ज्यात तुम्ही जन्माला आलो याने ठरत नसून जे धर्माचे तत्वज्ञान पाळता अथवा नाकारता यावरुन ठरतो. आम्ही ६०% ख्रिस्ती आजच आचरणाने बनलो आहोत. ते बनण्यासाठी धर्म बदलावा लागलेला नाही. आमचा पेहराव ते जीवनपद्धती व विचारसरणी ख्रिस्ती बनलेली आहे, अगदी मुस्लिमांचीही. पण ते स्विकारायचे साहस कोणात दिसणार नाही. संस्कृती व धर्म हा नेहमीच सबलांचा असतो, दुबळ्यांचा नव्हे. आणि सबलता तुमच्याकडे किती शस्त्रे आहेत व तुमची विध्वंसकता केवढी केवळ यावर ठरत नसून आर्थिक आणि मानवी प्रेरणांना प्रोत्साहन देणारे तुमच्या धर्मात काय आहे यावरुन ठरते. तुमच्या धर्मातच मुळात माणसाला माणुस समजायचे तत्व नसेल आणि कळत-नकळत इतरांवर तेच तत्व लादत आले असाल आणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लादायचा प्रयत्न करत असाल तर तो धर्म स्विकारार्ह असणार नाही. त्याचे सहास्तित्वही ते हिंदु म्हणवुन घेत असल्याने मान्य होणार नाही.
आज सर्व विद्रोही हिंदु धर्माला शिव्या-शाप देत असतील तर नेमक्या कोनामुळे याचा विचार करणे माझ्यासारख्या सामान्य हिंदुला भाग आहे. ज्या धर्माचा एवढा तिरस्कार केला जातो तो जर जे हिंदुच नाहीत पण हिंदु म्हणवतात त्यांच्यामुळे तर मनाला वेदना होणे अपरिहार्य आहे. स्वत:चे वैदिकत्व दूर सारत जे हिंदू होतील व आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. पण वैदिकांनी आपली स्वधार्मिकता जपत हिंदुंच्या कळपात येत शास्ते होण्याच्या प्रयत्नांना विरोध होता व आहे.
विरोध म्हणजे द्वेष नव्हे हे काही मुढांना सांगितलेच पाहिजे. त्यांच्या लबाड्या आम्हाला समजतच नाहीत या भ्रमातही कोणी राहु नये. वैदिक वेगळे आणि हिंदू वेगळे हे धार्मिक तथ्य आहे. हिंदुंचा धर्मग्रंथ कोणता असाही प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. धर्मग्रंथ असणे हा जर निकश असेल तर वैदिक, बौद्ध आणि जैनांचाही एकमेव असा धर्मग्रंथ नाही. पण ते धर्म आहेत. त्यांचे स्वत:चे विविधतापुर्ण तत्वज्ञान नि कर्मकांड आहे. अगदी.बायबल नि कुराणही, पहायला गेलो तर, धर्मग्रंथ नाहीत तर प्रसंगी विरोधाभासात्मक असलेल्या विचार व तत्वज्ञानांचे संग्रहण आहे. कोणत्याही धर्माला एकवाक्यता देणारा धर्मग्रंथ मुळात अस्तित्वात नाही. असते तर त्या-त्या धर्मांत एवढे विरोधाभास दिसले नसते. फाटे फुटत पंथोपपंथ निर्माण झाले नसते.
मी हिंदु आहे. मी वैदिक नाही. माझ्याप्रमाणेच किमान हिंदू धर्मात असलेले ८५% लोक वैदिक नाहीत. उरलेल्या वैदिकांनी आपली स्वतंत्र धार्मिक मांडणी वेळोवेळी केलेलीच आहे. त्यात हिंदुंना गोवण्याचे व आपले वर्चस्व दाखवण्याचे कारण नाही. मी या बाबतीत स्पष्ट आहे. माझ्या धर्माला माझ्या धर्मातील चुकांबद्दल बोलायचा, टीका करायचा अधिकार आहे. माझ्या धर्मात जे नाहित तेही टिका अवश्य करु शकतात, त्यामुळे वैचारिक दृष्ट्या माझा धर्म पुढे जाईल. पण जे हिंदु नसुनही हिंदुंचा कैवार घेण्याचे नाटक करत आपली वैदिकता जपतील त्यांना तीव्र विरोध सारेच हिंदू करत राहतील.
मला धर्मात फुट पाडत असल्याच्या आरोपांनाही सामोरे जावे लागते. फुट होती आणि आहे तर मी काय बिचारा फुट पाडणार? मी फक्त धर्मेतिहासाचे वास्तव मांडत आलो आहे. त्याला काही भयभीत लोक "फुट" म्हणत असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. आहे ते वास्तव सांगण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझ्या धर्माचे अनिवार नुकसान ज्यांनी केले त्यांबद्दल मला खेद अवश्य आहे. भविष्यातील पिढ्या स्वत:चे हिंदुपण, वैदिकवर्चस्व झुगारुन, जपतील अशी आशा मात्र मला नक्कीच आहे. वैदिकांनी त्यांचा धर्म, वेदादि धार्मिक साहित्य अवश्य जपावे, त्यातील ज्ञान-विज्ञन जगाला अवश्य सांगत रहावे....
फक्त स्वत:ला हिंदू म्हणवत हिंदुंचा बुद्धीभेद करु नये एवढेच!

32 comments:

  1. रा.स्व. संघाचे दबावतंत्र

    चित्रलेखा, ५ नोव्हेंबर २००७ मधील हीच ती दोन पत्रे की जी पत्रे छापल्यामुळे चित्रलेखा या साप्ताहिकाला किमान सहा महिने "साद-प्रतिसाद" हे सदर रा.स्व. संघ च्या दबावामुळे चालविता आले नाही.

    पत्र क्र. १

    स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

    चित्रलेखाच्या साद-प्रतिसाद मधील (३० जुलै) सुर्यकांत शानभाग आणि विजय वामन आगाशे (१ ऑक्टोबर) यांची पत्रे वाचली. शानभाग यांनी संघाचे काढलेले वाभाडे आणि आगाशेंनी केकेली सारवासारव पहिली. या संदर्भात स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.
    'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
    या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
    तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’

    विकास विवेक पाठक (सिडको-औरंगाबाद)

    पत्र क्र. २
    रा. स्व. संघ आणि विध्वंस
    विजय वामन आगाशे यांचे (चित्रलेखा १ आक्टोंबर २००७) ‘साद-प्रतिसाद’ मधील पत्र वाचले. ते लिहितात,’ ८२ वर्षांमद्धे संघाने हिंदू सामाज्याचा पार विध्वंस केला म्हणजे नेमके काय केले, हे शानभागांनी लिहायला हवे होते.’ एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.
    □ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.
    □ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.
    □ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार. रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.
    □ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.
    □ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
    □ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

    प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. THE DIFFICULTY OF KNOWING WHY ONE IS A HINDU

    India is a conjeries of communities. There are in it Parsis, Christians, Mohammedans and Hindus. The basis of these communities is not racial. It is of course religious. This is a superficial view. What is interesting to know is why is a Parsi a Parsi and why is a Christian a Christian, why is a Muslim a Muslim and why is a Hindu a Hindu? With regard to the Parsi, the Christian and the Muslim it is smooth sailing. Ask a Parsi why he calls himself a Parsi he will have no difficulty in answering the question. He will say he is a Parsi because he is a follower of Zoraster. Ask the same question to a Christian. He too will have no difficulty in answering the question. He is a Christian because he believes in Jesus Christ. Put the same question to a Muslim. He too will have no hesitation in answering it. He will say he is a believer in Islam and that is why he is a Muslim.
    Now ask the same question to a Hindu and there is no doubt that he will be completely bewildered and would not know what to say.
    If he says that he is a Hindu because he worships the same God as the Hindu Community does his answer cannot be true. All Hindus do not worship one God. Some Hindus are monotheists, some are polytheists and some are pantheists. Even those Hindus who are monotheists are not worshippers of the same Gods. Some worship the God Vishnu, some Shiva, some Rama, some Krishna. Some do not worship the male Gods. They worship a goddess. Even then they do not worship the same Goddesses. They worship different Goddesses. Some worship Kali, some worship Parvati, some worship Laxmi.

    ReplyDelete
    Replies
    1. मी हिंदू का? हे कसे समजावे?

      भारत हा अनेक जातीजामातींचा, संमिश्र समाजाचा देश आहे. त्यात पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, हिंदू आहेत. या जतिव्यवस्थेचा पाया 'वंश ' नसून 'धर्म' आहे. पण हा वरवरचा उथळ विचार आहे. पारशी हा पारशी का, ख्रिश्चन हा ख्रिश्चन का, मुसलमान हा मुसलमान कसा, आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
      पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांबाबत हे सांगणे सोपे आहे. एखाद्या पारशाला विचार "तू स्वतःला पारशी का म्हणवतोस?" या प्रश्नाचे उत्तर पारशाला देणे अवघड वाटत नाही. मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे". आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा. त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही. तो लगेच सांगेल "मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे".
      आता हाच प्रश्न हिंदूला विचारा. तो गोंधळून जाईल. काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही.
      हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे" असं उत्तर त्याने दिलं तर ते तितकंसं खरं नाही. सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत. काही लोक एकाच देव मानणारे, काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहेत असे मानणारे आहेत. जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाचे उपासना करतात असेही नाही. कुणी विष्णू, कुणी राम, कुणी शिव, कुणी कृष्ण यांची उपासना करतात. काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत. ते स्त्रीदेवतांचे उपासक, देवी उपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असेही नाही. कुणी कालीचे उपासक, कुणी पार्वतीचे पूजक, तर कुणी लक्ष्मीचे भक्त.

      Delete
  4. Coming to the Polytheists they worship all the Gods. They will worship Vishnu and Shiva, also Rama and Krishna. They will worship Kali, Parvati and Laxmi. A Hindu will fast on the Shivaratri day because it is sacred to Shiva. He will fast on Ekadashi day because it is sacred to Vishnu. He will plant a Bel tree because it is sacred to Shiva and he will plant a Tulsi because it is dear to Vishnu.
    Polytheists among the Hindus do not confine their homage to the Hindu Gods. No Hindu hesitates to worship a Muslim Pir or a Christian Goddess. Thousands of Hindus go to a Muslim Pir and make offerings. Actually there are in some places Brahmins who own the office of a hereditary priesthood of a Muslim Pir and wear a Muslim Pir's dress. Thousands of Hindus go to make offerings to the Christian Goddess Mant Mauli near Bombay.
    The worship of the Christian or Muslim Gods is only on occasions. But there are more permanent transfer of religious allegiance. There are many so-called Hindus whose religion has a strong Muhammadan content. Notable amongst these are the followers of the strange Panchpiriya cult, who worship five Muhammadan saints, of uncertain name and identity, and sacrifice cocks to them, employing for the purpose as their priest a Muhammadan Dafali fakir. Throughout India many Hindus make pilgrimages to Muhammadan shrines, such as that of Sakhi Sarwar in the Punjab.
    Speaking of the Malkanas Mr. Blunt says that they are converted Hindus of various castes belonging to Agra and the adjoining districts. chiefly Muttra, Ettah and Mainpuri. They are of Rajput, Jat and Bania descent. They are reluctant to describe themselves as Musalmans, and generally give their original caste name and scarcely recognize the name Malkana. Their names are Hindu; they mostly worship in Hindu temples: they use the salutation Ram-Ram: they intermarry amongst themselves only. On the other hand, they sometimes frequent a mosque, practise circumcision and bury their dead: they will eat with Muhammadans if they are particular friends.

    ReplyDelete
    Replies
    1. काही लोक अनेक देवांची उपासना करतात. विष्णू आणि शिव, राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत. तेच लोक काली, पार्वती, लक्ष्मी यांचीही पूजा करतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना म्हणूनही उपवास करील. शंकरासाठी तो बेलाचे झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल. काही हिंदूंची उपासना हिंदू देवातांपुरतीच मर्यादित नसते. ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात. अनेच किंदू पिराची पूजा करतात, उरूस असेल तिथं जातात.काही ठिकाणी पीराचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणाच आहेत. ते मुसलमानी वेश परिधान करतात. मुंबई जवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत.
      ख्रिश्चन किंवा मुस्लिम दैवतांची पूजा ही प्रासंगिक असते. पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरुपात बदललेल्या आहेत असे दिसून येते. असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की, ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वांचा समावेश झाला आहे. पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे. तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फाकीरांची पूजा करतात. दफ़ालि फकीर हा केवळ याच कामासाठी असतो. या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडे देतात. भारतात अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांचा तीर्थयात्रा करतात. पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे.
      मलकानांविषयी लिहिताना श्री ब्लंट यांनी लिहून ठेवलय की मथुरा, इटाह आणि मैनपुरी या आग्रा परिसरात अनेक हिंदूंनी, त्यातील विविध जातींनी, धर्मांतर केलं, आणि हे लोक मुसलमान झाले. त्यापैकी अनेक लोक राजपूत, जाट, आणि बनिया होते. आपण मुसलमान आहोत हे सांगत नाहीत. ते सामान्यतः आपली मुलाची जातच सांगतात. त्यांची नावं हिंदू नावंच आहेत. ते मंदिरात जातात, ते राम राम करतात, त्यांच्यात विवाह फक्त जातीतच होतात. हे एका बाजूला, पण कधीतरी ते मशिदीत जातात. सुंता करतात आणि प्रेतांचे दफन करतात. आपल्या मुसलमान मित्रांसोबत ते पंगतीला बसतात.

      Delete
  5. In Gujarat there are several similar communities such as the Matia Kunbis, who call in Brahmans for their chief ceremonies, but are followers of the Pirana saint Imam Shah and his successors, and bury their dead as do the Muhammadans: the Sheikhadas at their weddings employ both Hindu and a Muhammadan priest, and the Momans who practise circumcision, bury their dead and read the Gujarati Koran, but in other respects follow Hindu custom and ceremonial.
    If he says that "I am a Hindu because I hold to the beliefs of the Hindus" his answer cannot be right for here one is confronted with the fact that Hinduism has no definite creed. The beliefs of persons who are by all admitted to be Hindus often differ more widely from each other than do those of Christians and Muhammadans. Limiting the issue to cardinal beliefs the Hindus differ among themselves as to the beliefs which arc of cardinal importance. Some say that all the Hindu scriptures must be accepted, but some would exclude the Tantras, while others would regard only the Vedas as of primary importance; some again think that the sole essential is belief in the doctrine of karma and metempsychosis.
    A complex congeries of creeds and doctrines is Hinduism. It shelters within its portals monotheists, polytheists and pantheists; worshippers of the great Gods Shiva and Vishnu or of their female counterparts,.as well as worshippers of the divine mothers or the spirits of trees, rocks and streams and the tutelary village deities; persons who propitiate their deity by all manner of bloody sacrifices, and persons who will not only kill no living creature but who must not even use the word 'cut '; those whose ritual consists mainly of prayers and hymns, and those who indulge in unspeakable orgies in the name of religion; and a host of more or less heterodox sectaries, many of whom deny the supremacy of the Brahmans, or at least have non-Brahmanical religious leaders.
    If he says that he is a Hindu because he observes the same customs as other Hindus do his answer cannot be true. For all Hindus do not observe the same customs.
    In the north near relatives are forbidden to marry; but in the south cousin marriage is prescribed, and even closer alliances are sometimes permitted. As a rule female chastity is highly valued, but some communities set little store by it, at any rate prior to marriage, and others make it a rule to dedicate one daughter to a life of religious prostitution. In some parts the women move about freely; in others they are kept secluded. In some parts they wear skirts; in others trousers.
    Again if he said that he is a Hindu because he believes in the caste system his answer cannot be accepted as satisfactory. It is quite true that no Hindu is interested in what his neighbour believes, but he is very much interested in knowing whether he can eat with him or take water from his hands. In other words it means that the caste system is an essential feature of Hinduism and a man who does not belong to a recognized Hindu Caste cannot be a Hindu. While all this is true it must not be forgotten that observance of caste is not enough. Many Musalmans and many Christians observe caste if not in the matter of inter-dining certainly in the matter of inter-marriage. But they cannot be called Hindus on that account. Both elements must be present. He must be a Hindu and he must also observe caste. This brings us back to the old question who is a Hindu? It leaves us where we are.
    Is it not a question for every Hindu to consider why in the matter of his own religion his position is so embarrassing and so puzzling? Why is he not able to answer so simple a question which every Parsi, every Christian, and every Muslim can answer? Is it not time that he should ask himself what are the causes that has brought about this Religious chaos?

    ReplyDelete
    Replies
    1. गुजरात मध्ये अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत. मटिया कुणबी ही त्यातलीच एक जमात. आपल्या घराच्या महत्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणबी लोक ब्राह्मनालाच बोलावतात पण ते इमामशाह आणि त्यांचे वंशज यांचे अनुयायी आहेत. ते दफन करतात. आणखी एका जमातीत विवाहप्रसंगी हिंदू भटजी आणि मुस्लिम मौलालवी या दोघांनाही आमंत्रित करतात. मोमन नावाच्या जमातीत सुंता आहे. गुजराती कुराण वाचण्याचा परिपाठ आहे. दफन आहे. मात्र एवढ्या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीतिरिवाज पाळतात.
      "मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो " असे तो म्हणत असला तरी ती वस्तुस्थिती नाही. कारण हिंदुत्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांची तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो. मुख्य आणि महत्वाच्या धर्म श्राद्धांबाबत हिंदूंमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काही म्हणतात की हिंदूंचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत; काही लोक तंत्र मानत नाहीत. काही लोक वेदांचेच महत्व मानतात. काहीजण कर्म सिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत.
      अनेक संप्रदायांची आणि तत्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्व होय. या हिंदुत्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे; शिव आणि विष्णू यांचे पूजक; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक; पूर्ण अहिंसावादी, सध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक; ज्यांच्या धर्म्विधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक; धर्माच्या नावाखाली मद्द्यसेवनाने उपचार अवलंबिणारे लोक; आणि अशा प्रचलित मतांविरुद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज.....हे हिंदू समाजाचे चित्र आहे.

      Delete
    2. "मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतीरिवाज पाळतात तेच मी पाळतो" असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही. कारण सर्व हिंदू सारे रीतीरीवास सर्वत्र पाळतात असे नाही.
      उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत. पण दक्षिणेत चुलत-मामे भाऊ-बहिण यांची लागणे होतात. याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते. नियम म्हणून स्त्रीची शुद्धता, पावित्र्य यांना खूप महत्व दिले जाते. पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना "भाविणी" करण्यात समाज धन्य मानतो. या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे.काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरुषांप्रमाणेही वेष परिधान करतात.
      आता आणखी एक मुद्दा. एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातीव्यवस्था मानतो..... तर हेही खरे नाही. एक खरे की, कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रीतिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही. पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही, त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल. याचाच अर्थ असा की, जातीव्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग आहे. आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो. हे खरे असले तरी हिंदुत्वाबाबत जातीव्यवस्था पाळणे एवघेच पुरेशे नसते. मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी-व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जातेच. पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. आवश्यकता दोन गोष्टींची असते. हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे. यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो........हिंदू कोणाला म्हाणावे?
      प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत याचे उत्तर देता यायला पाहिजे. ते पारशाला देता येते, मुसलमानाला देता येते, ते ख्रिश्चनाला देता येते. पण .......हिंदू माणसाला देता येत नाही.
      यामागची कारणे कोणती, हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आलेली आहे.

      Delete
  6. हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा......

    प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. "मिलिंद पन्हो" असे या ग्रंथाचे नाव. मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे.

    हिंदू हा शब्द इस्लामची देण.....

    लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.

    इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण.......

    पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते.

    ReplyDelete
    Replies
    1. वा फारच उत्तम माहिती दिलीत आभारी आहे

      Delete
  7. धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही.....

    हिंदू धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. गडबड तुमच्या डोक्यात आहे, लेखात नव्हे!

      Delete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. आप्पा - नमस्कार संजयदादा !
    बाप्पा -नमस्कार पाटसकर बुवा .
    आप्पा - सोनावणी सर , तुमचा हा हट्ट तुम्ही सोडून द्या तुम्ही म्हणाल तेच फ़ायनल असे कसे . ?
    बाप्पा - तुम्ही म्हणता की शैव धर्म हा मूळचा आहे आणि वैदिक नंतरचा आहे , पण आज सर्व लोक प्रेमाने शिव आणि विष्णू आणि काली माता आणि तत्सम शक्ती पूजतात , त्यांचे काय ?आज हजारो सण आणि शेकडो प्रथा या दोन्ही प्रकारांशी जोडल्या गेल्या आहेत . आपल्या ग्रामीण भागात अनेक प्रकारचे देव आणि त्यांची रूपे , तसेच देवीपूजा प्रचलित आहे . त्यांच्या आनंदाचा विचार करता का आपण ?आपले विचार हे समाजाला एकत्र आणणारे नाहीत , तर फोडणारे आहेत असे वाटत नाही का वाटत संजय सरकार ?
    आप्पा - आपल्या जीवनात आणि एका कुटुंबात किती सुंदर चालीरीतींची गुंफण झालेली असते . नवस बोलणे , मुलगी पहिलटकरीण आली , डोहाळजेवण , अधिक महिन्याचे वाण , जावयाचा पहिला पाडवा , दसरा , वर्षसण , बारसे , , पणजीच्या डोक्यावर फुले उधळणे , सहस्त्र चंद्र दर्शन असे बारीक सारीक कितीतरी कौटुंबिक आनंदाचे क्षण आहेत .
    बाप्पा - तिथे शैव का वैष्णव - वैदिक हा मुद्दाच येत नाही , आयुष्याच्या मध्यावर एखाद्याला जर सांगितले की तू ज्याला बाप म्हणतो तो तुझा बापच नाही . तर कसे होईल , तसेच तुम्ही करत आहात . तुमच्या एखाद्यामुळे समाज जीवन अजिबात ढवळून निघणार नाहीये . आपण सर्वांगाने आपले जीवन शुद्ध जगतो का ?ट्राफिक पोलिस , महानगरपालिका आणि अनेक ठिकाणी आपण स्वच्छ वागतो का ? जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही खोटे बोलत आहात . कारण कोणताही व्यवहार हव्या त्या वेगात स्वच्छ राहून होतच नाही .
    आप्पा - धर्माचे पण तसेच आहे . आज अनेक धर्म आदर्श आहेत असे मुळीच नाही , शीख धर्मात पाच क कार जपण्याचा हट्ट असाच बालिश आहे . मुसलमानात पश्चिमेलाच नमाजाला तोंड करण्याचा हट्ट असाच हास्यास्पद आहे . समजा उदाहरणार्थ एखादा माणूस / मुसलमान चालत चालत उत्तर ध्रुवावर गेला तर त्याला तेथून तसेच पुढे उत्तरेलाच जायला सांगितले तर ? तो जी दिशा पकडेल ती दक्षीण ध्रुवाकडे जाणारीच असणार नाही का ?तात्पर्य दिशा हा मुद्दा तत्वाचा होऊ शकत नाही । त्यावर आपण काही लिहिलेले दिसले नाही ?
    बाप्पा - आपण सदासर्वदा वैदिकांवर हल्ला करत असता , आपल्याच समाजाचे महत्वाचा हिस्सा असलेल्या इतर धर्मियांवर आपण असे कधीच लिहित नाही . अंध श्रद्धा निर्मुलन समितीला हाच प्रश्न वारंवार विचारला जातो . आपल्या बरोबर ते पण आपलेच आहेत . त्याना पण आपण आपले विचार ऐकवा - त्यांच्यात सुधारणेचा हेका दाखवा !
    आप्पा -आपला देश इतका महान ( ? ) आहे की इथे कितीही अन्याय झाले , धर्मांतराचे प्रयोग झाले तरी भारत भारतच राहिला , हे लक्षात घेतले पाहिजे .
    बाप्पा - आज समाजात जी अस्वस्थता दिसते त्याला काहीतरी आउटलेट लागते , त्यासाठी मग , स्वतंत्र प्रांत , आणि तत्सम प्रयोग केले जातात . प्याकेजेस दिली जातात . . त्यांनाही वेगळी चूल मांडायची नसते .
    आप्पा - आज वैदिकही कधीच त्यांचा धारदारपणा गमावून बसले आहेत , त्यांची सद्दी संपली आहे
    बाप्पा - त्यांची सद्दी कधीच नव्हती . तसे मानणे हीच डोंगरा इतकी चूक आहे . गोडसेने गांधींची हत्या केल्यावर महाराष्ट्रात , नव्हे सातारा सांगलीकडे ब्राह्मणांची घरे का जाळली गेली ? त्यात काय राजकारण आहे ? शिस्तबद्ध राजकारण मराठा समाजाकडून राबवले गेले . जमिनी बळकावल्या गेल्या ! तिथे गांधीहत्या हे निमित्त साधले गेले .
    आप्पा - अगदी तशीच संजय सरांची हि वादिक द्वेषाची रडकथा आहे . एकतर उठसुठ सिंधू संस्कृती पासून चित्र रंगवायचे , मग वेद आणि अवेस्ता , त्यांचा काळ अलीकडे आणून ठेवायचा , बहुजन हेच मूळ निवासी हा दणका सुरु करायचा . असा हा डाव ते कित्येक दशके मांडत आहेत .
    त्यातून त्याना काय साधायचे आहे ? संपूर्ण वेद आणि त्यातील रचनांचा गोडवा त्याना कधी भावलाच नाही का ?
    आप्पा - अगदी खरे सांगायचे तर स्वतः आम्हाला वेद आणि उपनिषदे यांचे काहीच सोयरसुतक नाही . संस्कृत हा आमचा विषयच नाही ! कारण वेद आणि उपनिषदे आपल्या शिक्षणात उपयोगाची नाहीत हे ब्राह्मण समाजाने कधीच ओळखले आहे . ब्राह्मणांची वाटचाल इतकी अचूक कशी ते बघण्यासारखे आहे . त्याचा अभ्यास करा . ब्राह्मण वर्ग निरुपयोगी विषय बाजूला गुंडाळून ठेवून देत असतो . करियर हे त्याना जीव की प्राण असते . त्यासाठी ते अर्धपोटी राहतात .
    माधुकरी आणि वार लावून जेवून शिक्षण केलेले मागच्या पिढीत अनेक जन आहेत .
    बाप्पा - कुंभमेळा असो किंवा वारी असो , ते त्यात वेळ वाया घालवणार नाहीत .
    आप्पा - ब्राह्मण नेहमी नाविन्याची कास धरतो . आजच्या भारताच्या विकासाचा आराखडा आणि संधी पाहिली आणि बहुतेकांनी देशा बाहेर जाण्याची निवड केली तर काय चुकले ?

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. धर्मग्रंथोंका पुनर्पाठ या ग्रंथात लिहिले आहे " इतिहासकारोंने कहा कि चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिए उन्होंने सिंधु को हिंदू कहा और यहां रहने वालों को हिंदू कहना शुरू कर दिया I यह विचित्र तर्क था I ईरानी लोग अपने भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुल्तान बोलते थे, हुल्तान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर सकते थे, यह अविश्वसनीय है I विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता है और घोषित करता है I मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया I हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था I उसने भारत में रहने वालों को इसलिए हिंदू कहा I फारसी में हिंदू का अर्थ होता है काला, माशूक के चहरे का तिल, चोर, लुटेरा या गुलाम I ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोष में है I पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिए विजेताओं द्वारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो I भारत में यह हो गया" I

    उपरोक्त वस्तुस्थिति लक्षात घेता सिंधु नदीपलीकडच्या रहिवाशांना सिंधूचा अपभ्रंश करून मुस्लिमांनी हिंदू म्हटले असा जावईशोध पूर्णपणे खोटा सिद्ध होतो. तरीही त्याचीच पुनरावृत्ति नंतरच्या अनेक लेखकांनी केली. एकंदरीत हिन्दू व् सिंधु या शब्दांचा जो परस्पर सबंध लावला जातो तो अत्यंत स्वार्थी लोकांनी आपली बदनामी लपविण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रकार आहे. एवढेच नव्हे तर आपल्या देशाचा काही भाग तत्वतः नाकारण्याचाहि दुष्टपणा आहे.

    ReplyDelete
  15. पाटसकर , आम्हा क्षत्रियाना का बदनाम करत आहात ? तुम्ही आहात तरी कोण ?
    देशस्थ ऋग्वेदी ?यजुर्वेदी ?का ब्राह्मणच नाही ?तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान नाही ?
    देवरुखे असाल ? कारण इतक्या बेधडक आपण जातीय बोलत आहात ते बरे नव्हे !
    ३) वैदिकांनी किती लुटालूट केली ह्यापेक्षा दलितांची क्षत्रियांनी किती लुटालूट केली हे शोधणे महत्वाचे आहे, सत्युगात शंबूक, आणि कलियुगात फितूर झालेले आणि लपून बसलेले मराठे व उत्तर भारतीय क्षत्रिय किती आहेत? त्यांच्या विरोधात संजयजी काही बोलत नाहीत. उलट त्यांच्या राज्वैभावाचे कौतुकच करताना दिसतात. असे लिहिणे खरोखरच चांगले आहे का ?
    ब्राह्मण पळपुटे नाहीतच का ?मराठा कधी पळपुटा झाला ? आम्ही ९६ कुळी कधीच पाठ दाखवत नाही . छातीवर घाव झेलतो . पानिपातासारखे पळपुटे जानवी जोड वाले आम्ही नाही हे लक्षात ठेवा . तोंडाला लगाम द्या आणि मस्तक ताळ्यावर ठेवून मुजरा करून बोलत जा .
    तुम्ही महार मांग असाल पण आम्हाला आमच्या कुलाचा अभिमान आहे
    Reply

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. फीरोजुल्लगात या जगप्रसिद्ध शब्द्कोशानुसार 'मी हिंदू आहे'! म्हणजे मी काळा, प्रेयसीच्या चेहऱ्यावरील तीळ, चोर, लुटारू किंवा गुलाम आहे. बरोबर ना संजय भाऊ !

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. संजय सरांनी उत्तम लिखाण केलंय त्यातच त्याना जी लिहा वाचा यांनी जोड दिली आहे ती अतिशय अभ्यासपूर्ण आहे . श्री अव्हीनाश पाटणकर यांनी घातलेली भर उल्लेखनीय आहे .
    " Sage Kapila is traditionally credited as a founder of the Samkhya school.[38] However, it is unclear in which century of 1st millennium BCE Kapila lived.[39] Kapila appears in Rigveda, but context suggests that the word means "reddish brown color". Both Kapila as a "seer" and the term Samkhya appear in hymns of section 5.2 in Shvetashvatara Upanishad (~300 BCE), suggesting Kapila's and Samkhya philosophy's origins may predate it. Numerous other ancient Indian texts mention Kapila; for example, Baudhayana Grhyasutra in chapter IV.16.1 describes a system of rules for ascetic life credited to Kapila, called Kapila Sannyasa Vidha.[39] A 6th century CE Chinese translation and other texts consistently state Kapila as an ascetic and the founder of the school, mention Asuri as the inheritor of the teaching, and a much later scholar named Pancasikha as the scholar who systematized it and then helped widely disseminate its ideas. Isvarakrsna is identified in these texts as the one who summarized and simplified Samkhya theories of Pancasikha, many centuries later (roughly 4th or 5th century CE), in the form that was then translated into Chinese by Paramartha in 6th century CE.[39]"
    माझ्या वाचनात सांख्य तत्वज्ञान आणि कपिल मुनी याबद्दल जे आले ते देत आहे .
    कॉपी पेस्ट केले आहे , कारण हा ब्लोग वाचणाऱ्या लोकाना ते मिळावे इतकाच हेतू संजय सरांनी सांख्य विचारावर फेसबुक वर लिहिले आहे , ते इथे वाचायला मिळाल्यास अनेक लोकाना आनंद होई ल असे वाटते . श्री लिहा वाचा , श्री अविनाश पाटणकर आणि इतरांचे आभार . संजय सरांचे मनापासून अभिनंदन .

    ReplyDelete
  20. मी हिंदू का? हे कसे समजावे?

    भारत हा अनेक जातीजामातींचा, संमिश्र समाजाचा देश आहे. त्यात पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, हिंदू आहेत. या जतिव्यवस्थेचा पाया 'वंश ' नसून 'धर्म' आहे. पण हा वरवरचा उथळ विचार आहे. पारशी हा पारशी का, ख्रिश्चन हा ख्रिश्चन का, मुसलमान हा मुसलमान कसा, आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
    पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांबाबत हे सांगणे सोपे आहे. एखाद्या पारशाला विचार "तू स्वतःला पारशी का म्हणवतोस?" या प्रश्नाचे उत्तर पारशाला देणे अवघड वाटत नाही. मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे". आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा. त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही. तो लगेच सांगेल "मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे".
    आता हाच प्रश्न हिंदूला विचारा. तो गोंधळून जाईल. काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही.
    हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे" असं उत्तर त्याने दिलं तर ते तितकंसं खरं नाही. सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत. काही लोक एकाच देव मानणारे, काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहेत असे मानणारे आहेत. जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाचे उपासना करतात असेही नाही. कुणी विष्णू, कुणी राम, कुणी शिव, कुणी कृष्ण यांची उपासना करतात. काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत. ते स्त्रीदेवतांचे उपासक, देवी उपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असेही नाही. कुणी कालीचे उपासक, कुणी पार्वतीचे पूजक, तर कुणी लक्ष्मीचे भक्त.
    काही लोक अनेक देवांची उपासना करतात. विष्णू आणि शिव, राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत. तेच लोक काली, पार्वती, लक्ष्मी यांचीही पूजा करतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना म्हणूनही उपवास करील. शंकरासाठी तो बेलाचे झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल. काही हिंदूंची उपासना हिंदू देवातांपुरतीच मर्यादित नसते. ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात. अनेच किंदू पिराची पूजा करतात, उरूस असेल तिथं जातात.काही ठिकाणी पीराचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणाच आहेत. ते मुसलमानी वेश परिधान करतात. मुंबई जवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत.
    ख्रिश्चन किंवा मुस्लिम दैवतांची पूजा ही प्रासंगिक असते. पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरुपात बदललेल्या आहेत असे दिसून येते. असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की, ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वांचा समावेश झाला आहे. पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे. तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फाकीरांची पूजा करतात. दफ़ालि फकीर हा केवळ याच कामासाठी असतो. या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडे देतात. भारतात अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांचा तीर्थयात्रा करतात. पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे.
    मलकानांविषयी लिहिताना श्री ब्लंट यांनी लिहून ठेवलय की मथुरा, इटाह आणि मैनपुरी या आग्रा परिसरात अनेक हिंदूंनी, त्यातील विविध जातींनी, धर्मांतर केलं, आणि हे लोक मुसलमान झाले. त्यापैकी अनेक लोक राजपूत, जाट, आणि बनिया होते. आपण मुसलमान आहोत हे सांगत नाहीत. ते सामान्यतः आपली मुलाची जातच सांगतात. त्यांची नावं हिंदू नावंच आहेत. ते मंदिरात जातात, ते राम राम करतात, त्यांच्यात विवाह फक्त जातीतच होतात. हे एका बाजूला, पण कधीतरी ते मशिदीत जातात. सुंता करतात आणि प्रेतांचे दफन करतात. आपल्या मुसलमान मित्रांसोबत ते पंगतीला बसतात.

    ReplyDelete
  21. गुजरात मध्ये अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत. मटिया कुणबी ही त्यातलीच एक जमात. आपल्या घराच्या महत्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणबी लोक ब्राह्मनालाच बोलावतात पण ते इमामशाह आणि त्यांचे वंशज यांचे अनुयायी आहेत. ते दफन करतात. आणखी एका जमातीत विवाहप्रसंगी हिंदू भटजी आणि मुस्लिम मौलालवी या दोघांनाही आमंत्रित करतात. मोमन नावाच्या जमातीत सुंता आहे. गुजराती कुराण वाचण्याचा परिपाठ आहे. दफन आहे. मात्र एवढ्या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीतिरिवाज पाळतात.
    "मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो " असे तो म्हणत असला तरी ती वस्तुस्थिती नाही. कारण हिंदुत्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांची तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो. मुख्य आणि महत्वाच्या धर्म श्राद्धांबाबत हिंदूंमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काही म्हणतात की हिंदूंचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत; काही लोक तंत्र मानत नाहीत. काही लोक वेदांचेच महत्व मानतात. काहीजण कर्म सिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत.
    अनेक संप्रदायांची आणि तत्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्व होय. या हिंदुत्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे; शिव आणि विष्णू यांचे पूजक; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक; पूर्ण अहिंसावादी, सध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक; ज्यांच्या धर्म्विधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक; धर्माच्या नावाखाली मद्द्यसेवनाने उपचार अवलंबिणारे लोक; आणि अशा प्रचलित मतांविरुद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज.....हे हिंदू समाजाचे चित्र आहे.
    "मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतीरिवाज पाळतात तेच मी पाळतो" असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही. कारण सर्व हिंदू सारे रीतीरीवास सर्वत्र पाळतात असे नाही.
    उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत. पण दक्षिणेत चुलत-मामे भाऊ-बहिण यांची लागणे होतात. याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते. नियम म्हणून स्त्रीची शुद्धता, पावित्र्य यांना खूप महत्व दिले जाते. पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना "भाविणी" करण्यात समाज धन्य मानतो. या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे.काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरुषांप्रमाणेही वेष परिधान करतात.
    आता आणखी एक मुद्दा. एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातीव्यवस्था मानतो..... तर हेही खरे नाही. एक खरे की, कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रीतिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही. पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही, त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल. याचाच अर्थ असा की, जातीव्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग आहे. आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो. हे खरे असले तरी हिंदुत्वाबाबत जातीव्यवस्था पाळणे एवघेच पुरेशे नसते. मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी-व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जातेच. पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. आवश्यकता दोन गोष्टींची असते. हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे. यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो........हिंदू कोणाला म्हाणावे?
    प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत याचे उत्तर देता यायला पाहिजे. ते पारशाला देता येते, मुसलमानाला देता येते, ते ख्रिश्चनाला देता येते. पण .......हिंदू माणसाला देता येत नाही.
    यामागची कारणे कोणती, हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आलेली आहे.

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  24. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  25. श्री. संजय सोनवणी,

    मी हिंदू आहे! असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार व्हायला नको का?

    १. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?
    २. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?
    ३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?
    ४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?
    ५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?
    ६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?
    ७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?
    ८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?
    ९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?
    १०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?
    ११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?
    १२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?

    बघा विचार करून!

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...