Saturday, September 2, 2017

स्त्रीया, वस्त्रं...आणि धर्म!


No automatic alt text available.


गेल्या हजारो वर्षात भारतात स्त्री-पुरुषांच्या वेषात असंख्य बदल झाले आहेत. स्त्रीवेषातील बदल जास्त लक्षणीय आहेत. भारतात कमरेभोवती एखादे वस्त्र गुंडाळणे व चोळीचा शोध लागला नसल्याने वक्षांना झाकण्यासाठी उपवस्त्र वापरणे वा ते उघडेच ठेवणे ही अत्यंत जुनी पद्धत. स्तन झाकायची तर पुर्वे पद्धतच नव्हती व त्यात काही अश्लील आहे असे कोणे समजतही नव्हते. अजंता येथील गुंफाचित्रे अथवा देशभरची स्त्रीयांची शिल्पे पाहिली म्हणजे त्या काळातील वेषभुषांची थोडी कल्पना येईल. शिवाय प्रांता-प्रांताच्या वेशभुषा वेगळ्याच. कंचुकीचा शोध लागला असला तरी त्याचा वापर सर्वदूर व्हायला वेळ गेला. महाराष्ट्रात नंतर नऊवारी साड्या ते सहावारी साड्या व सोयीच्या पडतात म्हणून चुडीदार ते जीन्स हा प्रवास झाला. सोय आणि शोध हेच माणसाच्या वस्त्रवापराचे प्रमूख सूत्र राहिले आहे. वैदिक लोक लोकरीची वस्त्रे वापरत तर कापसाचा शोध व तो पिंजून विनण्याची कला साधल्याने सुती वस्त्रे वापरायची सिंधू संस्कृतीतील सुरुवात ही त्या त्या संस्कृतीने साधलेल्या भौतिक प्रगती व नैसर्गिक उपलब्धता याचे मानक होती. रेशीम- वस्त्रे तर खूप नंतरची. म्हणजेच कालौघात प्रत्येक प्रांतांतील वेषभुषा बदलत आल्या आहेत. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. अजंता काळातील वेशभुषा हीच सांस्कृतिक भारतीय वेशभुषा घोषित केली तर याच धर्मांधांचे त्यावर काय म्हणने असेल?

इस्लाम निर्माण झाला तो वाळवंटी प्रदेशात. वारे, उष्णता आणि वा-यांबरोबर येणारी वालवंटी धुळ यापासुन बचावासाठी स्त्री-पुरुषांनी पायघोळ वस्त्रे तर वापरलीच पण तोंड झाकायला पुरुषांनी साफा तर स्त्रीयांनी बुरखा वापरला. त्यातही वेगवेगळे प्रकार होते. इस्लाम नंतर जगभर पसरला. पुरुषांनी आपले पेहराव बदलले मात्र स्त्रीयांनी बुरखा वापरलाच पाहिजे हा जणू धर्मनियमच बनला. पेहराव हा हवामानाशी सुसंगत असायला हवा हे साधे तत्व धर्मनियमाच्या खाली डावलले गेले. भारतीय स्त्रीयाही मुस्लिमांची नक्कल करत घुंगट अथवा डुईवरच्या चेहरा अर्धातरी झाकेल अशा पदराच्या प्रथेत अडकावल्या गेल्या. 

असे असतांना कोणता वेष घालावा, कोणता वेष नेमका संस्कृतीचे निदर्शन करतो, कोणता वेष धार्मिक कार्यांसाठी असावा हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला नाही. धोतर ते प्यंट असा प्रवास करणा-या पुरुषी वर्चस्वतावादी संस्कृतीला तर मुळीच नाही. एनकेन प्रकारेन स्त्रीयांना गाभा-यात जाण्यापासून वंचित ठेवण्याची विकृती या नव्या वस्त्र-नियमांत आहे. स्त्रीयांचे सांस्कृतिक शोषण करायला वस्त्र-प्रावरणेही वापरली जावीत आणि मुखंड समाजाने ती सहन करावीत हे आजच्या जगाला शोभत नाही.

कोणती व कशा प्रकारची वस्त्रे घालावीत याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस आहे. ते कायम जपले गेले पाहिजे. धर्माने त्यात हस्तक्षेप करण्याचे काहीएक कारण नाही.

No comments:

Post a Comment

यशवंतराव होळकर आणि मी....

  गोपीचंद पडळकर, महाराजा आज माझे बंधुतुल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी श्री. गोपीचंद पडळकर यांनी “अनसंग हिरो ऑफ इंडिया- महाराजा यशवंतराव होळक...