Thursday, July 2, 2020

काय वैज्ञानिक बरे?


"३. एखादा मार्ग आपल्याला सापडेल अशी आशा त्याला नेहमीच वाटे. त्याला एवढी आशा वाटे की, सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली; आणि तो जेंव्हा जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ काढला.
४. त्याने भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, "जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे! नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे!" आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले.
५. आशा आणि निश्चय यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमाराला तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळवृक्ष पाहिला......."
हे आहे गौतम बुद्धांना बोधी प्राप्त व्हायच्या दिशेने झालेल्या अंतिम वाटचालीचे डा, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" य ग्रंथातील विवेचन. याच पुढे असलले काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी गजेंद्रप्रभा यांना पडणरे स्वप्न आणि गौतमाला आता पुर्ण ज्ञानप्राप्ती होणार याची झालेली खात्री आणि केलेली स्तुती जिज्ञासुंनी मुळातुनच वाचावी.
आणि कोणीही जगातील कोणताही धर्म (पायथागोरसचा गणिताचा धर्म सोडून) वैज्ञानिक आहे असा आव आणु नये व नव्या अंधश्रद्धा पसरवू नये.
(संदर्भ- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डा. भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक- घन:श्याम तळवटकर इ. प्रकाशक- धम्म सासन विश्व विद्यापीठ, १९९७, पृ. ६२)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...