एक तुला सांगायचे होते
सांगता सांगता राहुनच गेले
जेंव्हा तू होता रांगता बाळ
इवल्या निरागस डोळ्यांत
भरू पाहत अवघे आभाळ
मी संकोचलो...
मी बावरलो...
कसे सांगू तुला
ही निरागसता उरेल क्षणकाळ....?
जेंव्हा तू उतरलास
आशा-आकांक्षा घेउन
इवल्या ह्रुदयात
जीवनाच्या मैदानात
हिंस्त्र श्वापदांचा सामना करत
जेंव्हा होता तु संवेदनांच्या शोधात
ह्रुदय घेवून हातात...
तेंव्हाही नाही बोललो मी
म्हटले लढु द्या
माझ्या जिगरी रक्तास
जरूर हटवेल तो या
क्रुतघ्न दाटुन आल्या धुक्यास!
मी बोललो नाही...
घनतिमिराचे घेवून पांघरून
मुक राहिलो सुर्यास
पहात राहीलो तुझा झगडा
त्या हिंस्त्रतेत बरबटल्या
शोकग्रस्त आक्रोशांनी भरलेल्या
विश्वात
मी तुला सांगू इच्छित होतो...
पण मी काही बोललोच नाही...
मूक राहिलो....
जणु
तुझे अर्ध्य दिले होते मी
या रानटी समाजास!
माती ओघळते आहे आता
माझ्या धमण्यांतुन
आणि विझल्या श्वासांतून
मी पण तुला सांगायलाच हवे होते
जेंव्हा निरागसता
स्पंदत होती
तुझ्या इवल्या ह्रुदयातुन
सांगायचे पण राहुनच गेले....
आता
काय सांगु तुला
आणि कसे
जेंव्हा
मी बोलुही शकत नाही
आणि तु ऐकुही शकत नाहीस?
Saturday, July 2, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!
महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...