(हिंदु धर्मासमोरील समस्या)
"हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)"
वरील विधानात सावरकर हिंदु आणि हिंदुत्व यात फरक करतात हे उघड आहे. हिंदु शब्द अरबांनी दिलेला नाही असेही सावरकरांचे मत आहे. पण त्याच वेळीस सिंधु वा हिंदु या स्वाभिमानी नांवाने हे राष्ट्र ओळखले जात होते असेही सावरकर म्हनतात. पण त्यांचेच अनुयायी अ.ज. करंदीकर यांच्या सप्रमाण म्हनण्यानुसार या देशाचे पौरात्य जगातील नांव हे मेल्लुहा (ताम्र उत्पादकांचा देश) आणि काही वेळा सेंकार असे होते. असे असेल तर सावरकरांचे विधान हे व्रुथाभिमानी होते कारण या देशाचे नाम हिंदु राष्ट्र कसे पडले, आणि त्या बुभागातील अन्य अनेक धर्म व जातीय सोडुन याच धर्माला हिंदु हे नांव कोणी व का दिले हे समजत नाही.
सावरकरांचे वरील विधान धर्मेतिहासाचा विपर्यास कसे करते हे आपण पाहुयात. "हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो." असे सावरकर म्हणतात. आता धर्मात धार्मिक अंगांचा समावेश नसतो तर सांस्क्रुतिक, भाषिक आणि राजकिय, भाषिक सामाजिक........." सावरकर शब्दछलात पटाइत होते हे सर्वद्न्यातच आहे जेंव्हा आपण धर्माबद्दल बोलतो तेंव्हा धार्मिक तत्वद्न्यान, कर्मकांड आणि त्यानुसार अपेक्षीत समाजव्यवस्था या बद्दल बोलायची वेळ येते तेंव्हा सावरकर संस्क्रुती...(कोनती आणि कोणाची?) भाषिक...( कोणती भाषा आणि कोणाची...कोल...मुंड, प्राक्रुत..माहाराष्ट्री कि शौरसेनी...नि मग द्रविड भाषांचे काय?) सामाजिक? सावरकरांना कोनती सामाजिकता अभिप्रेत होती आणि आहे? आणि सावरकर जेंव्हा राजकीय शब्द वापरतात तेंव्हा अश्चर्य वाटते कारण हिंदु या तथाकथित नामक धर्माचे यच्चयावत या देशाच्या इतिहासात कोनती नेमकी राजकीय तत्वद्न्यानात्मक अंगाची स्थिती होती बरे?
सावरकर माहाराष्ट्रीभाषी प्रेमी होते आणि मराठी भाषेला त्यांनी अत्यंत उत्तम व्यावहारिक शब्द दिले. त्यांचे हे ऋण मान्य करुन त्यंनी भारताला कोणते भाषिक अधिष्ठाण दिले? त्यांची काव्यात्मक प्रतिभा महाकविला साजेशी आहे हे मान्य करुनही मी विचारतो त्यांनी कोणते राष्ट्रीय काव्य लिहिले?
सावरकरांना अभिप्रेत असनारा हिन्दु धर्म हा प्रय: प्रादेशिक होता. त्या अर्थाने या देशातील ख्रिस्ती, मुस्लिम, शिख आणि आदिवासी आपसुक हिंदु ठरत होते,....गोळवलगुरुजीनीही तीच व्याक्या पुढे कायम केली. पण तेथेच हे सारे हिंदुत्ववादी फसले.
"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
असली धर्माची व्याख्या कोणी केली नसेल. ती चुकीचीही आहे सावरकरांची ही पाश्चात्यवादी
ती कशी हे थोडक्यात सांगुन हा लेख संपवतो आणि पुढील लेखाचा उपोद्घात करतो.
प्रत्येक भारतीय माणुस आपल्या देशाला पित्रुभु: नव्हे तर मात्रुभुमी मानत असतो. सावरकरांची ही पाश्चात्यवादी व्याख्या असुन ती हिंदु धर्माबाबत कसलेही ठाम विधान करु शकत नाही हे उघड आहे.
सावरकरांवर बहुदा पाश्चात्य संस्कार असल्याने ते या देशाला मात्रुभुमी नव्हे तर पित्रुभुमी कसे मानु लागले यावर संशोधन व्हायला हवे...तेच अंदमानपुर्व कालातेल गीतात तेच या भुमीला मात्रुभुमी म्हनतात आणि अंदमानोत्तर काळात याच भुमीला पित्रूभू: म्हनतात हे सावरकरांचेच नव्य धर्मांतर नव्हे काय?
आणि जसे रविंद्रनाथ टागोरांना अरुणाचल प्रदेश, आसाम, लेह-लद्दाख इइइइइ दिसले नाहित तसे या राष्ट्रवाद्यालाही दिसले नाहित...ज्यांना धर्मच समजत नाही त्यांना राष्ट्र काय कळणार?
पुढील लेखात अजुन काही...