"कुणबी प्रमानपत्र मिळते मार्गदर्शक तत्वानुसारच" या शिर्षकाखाली आजच्या पुणे टुडे मद्धे अखिल भारतीय मराठा महासंघाने स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणामागे कालच्याच सकाळमद्धे प्रसिद्ध झालेल्या श्री क्रुष्णकांत कुदळे यांनी मराठा असुनही कुणबी असल्याची प्रमाणपत्रे घेत ओबीसीच्या ताटातील घास उचलण्याबाबत टीका केल्याचा संदर्भ होता.
प्रश्न असा आहे अखिल भारतीय मराठा महासंघ, ज्याच्या नांवातच "मराठा" ही सरंजामशाहीवादी बिरुदावली जपलेली स्पष्ट दिसते, त्यांना आपण "कुणबी" असल्याचा साक्षात्कार का आणि कधी झाला? कुनबी हे ओबीसीत आहेत आणि त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. नव्हते. कारण कुणबी म्हणजे कुळे होती. शेतात, रानांत आणि खळ्यांत राबणारे "कुळ" म्हनजे कुनबी. हे कुळकायदा येईपर्यंत कधीही जमीनीच्या छोट्या तुकड्याचेही मालक नव्हते. मालक, सरंजामदार आणि राबवणुक करुन घेणारे जमीनदार मराठे - ब्राह्मण हे खरे मालक. त्यांनी जे या कुणब्यांचे आणि अन्य बलुतेदारांचे शोषण केले त्याला सीमा नाही. आजकाल हे सारे पाप ब्राह्मणांवर ढकलायचे प्रयत्न होताहेत. पण आजही पाटन तालुक्यातील मातंग महिलेवरील अत्याचाराची घटना पाहिली तर खरे शोषक कोण आहेत हे स्पष्ट होईल.
मराठा आणि कुनबी या स्वतंत्र जाती आहेत हे पार सातवाहन काळापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. महारट्ठी हे शासकीय/राजकीय सरंजामदार होते तर कुनबी हा प्रत्यक्ष शेतावर राबणारा कामगार होता. ओबीसी म्हनजे मुळचा खरा निर्माणकर्ता समाज. याच समाजाने संस्क्रुती घडवली. मानवी जीवन सुखकर व्हावे यासाठी नव-निर्मिती घडवली. मग ते शेतीकाम असो, भाज्या-फळांचे निर्माण असो कि पार पायतनांपासुन ते बैलगाड्या-नांगरांचे निर्माण असो...जहाजांचे असो कि किल्ले/लेण्यांची उभारणी असो...आजही समाज जगतो तो यांच्या जीवावर.
आणि त्यांच्याच नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकारावर आजही अतिक्रमण करत, आपणच कुणबी आहोत अशी धि:कारार्ह हाकाटी पिटत, तशी खोटी सर्टिफिकेट घेत निवडनुका लढवत आपला "मराठा अजेंडा" राबवणा-या या सरंजामदारांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पुन्हा वर मराठ्यांना आरक्षण द्या, ते गरीब आहेत म्हणुन, ही मागणी तर निर्लज्जपणाचा कळस आहे. एकीकडे कुनब्यांची खोटी सर्टिफिकेट्स घेवुन बहुजनांचा घास हिरावुन घ्यायचा आणि वर मराठा म्हणुनही आरक्षण मागायचे....मग बहुजनांनी यांच्याच गुलामीत सडायचे...जसे आजही सडत आहेत...!
थोडक्यात चारी बाजुंनी ओबीसी, बीसी, भटके विमुक्तादिंना पुन्हा मनुकाळात न्यायचा हा डाव आहे. दुर्दैव हे कि जे मराठे स्वता:ला "बहुजन" म्हणवण्याचा प्रयत्न करतात, तेच आता राजकीय पटलावर मनुस्म्रुतीचेच अक्षरश: पालन करत आहेत. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेण्याचाही हक्क गमावला आहे. फुले-आंबेडकर तसेही यांच्या खिजगणतीत नव्हतेच...
बहुजनांना माझी विनंती कि त्यांनी हा डाव ओळखावा आणि आपली राजकीय व सामाजिक कत्तल होण्यापुर्वीच सारे भेदभाव विसरत एक होत या भिषण डावाला उधळुन लावा.
प्रश्न असा आहे अखिल भारतीय मराठा महासंघ, ज्याच्या नांवातच "मराठा" ही सरंजामशाहीवादी बिरुदावली जपलेली स्पष्ट दिसते, त्यांना आपण "कुणबी" असल्याचा साक्षात्कार का आणि कधी झाला? कुनबी हे ओबीसीत आहेत आणि त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. नव्हते. कारण कुणबी म्हणजे कुळे होती. शेतात, रानांत आणि खळ्यांत राबणारे "कुळ" म्हनजे कुनबी. हे कुळकायदा येईपर्यंत कधीही जमीनीच्या छोट्या तुकड्याचेही मालक नव्हते. मालक, सरंजामदार आणि राबवणुक करुन घेणारे जमीनदार मराठे - ब्राह्मण हे खरे मालक. त्यांनी जे या कुणब्यांचे आणि अन्य बलुतेदारांचे शोषण केले त्याला सीमा नाही. आजकाल हे सारे पाप ब्राह्मणांवर ढकलायचे प्रयत्न होताहेत. पण आजही पाटन तालुक्यातील मातंग महिलेवरील अत्याचाराची घटना पाहिली तर खरे शोषक कोण आहेत हे स्पष्ट होईल.
मराठा आणि कुनबी या स्वतंत्र जाती आहेत हे पार सातवाहन काळापासुनचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. महारट्ठी हे शासकीय/राजकीय सरंजामदार होते तर कुनबी हा प्रत्यक्ष शेतावर राबणारा कामगार होता. ओबीसी म्हनजे मुळचा खरा निर्माणकर्ता समाज. याच समाजाने संस्क्रुती घडवली. मानवी जीवन सुखकर व्हावे यासाठी नव-निर्मिती घडवली. मग ते शेतीकाम असो, भाज्या-फळांचे निर्माण असो कि पार पायतनांपासुन ते बैलगाड्या-नांगरांचे निर्माण असो...जहाजांचे असो कि किल्ले/लेण्यांची उभारणी असो...आजही समाज जगतो तो यांच्या जीवावर.
आणि त्यांच्याच नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकारावर आजही अतिक्रमण करत, आपणच कुणबी आहोत अशी धि:कारार्ह हाकाटी पिटत, तशी खोटी सर्टिफिकेट घेत निवडनुका लढवत आपला "मराठा अजेंडा" राबवणा-या या सरंजामदारांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पुन्हा वर मराठ्यांना आरक्षण द्या, ते गरीब आहेत म्हणुन, ही मागणी तर निर्लज्जपणाचा कळस आहे. एकीकडे कुनब्यांची खोटी सर्टिफिकेट्स घेवुन बहुजनांचा घास हिरावुन घ्यायचा आणि वर मराठा म्हणुनही आरक्षण मागायचे....मग बहुजनांनी यांच्याच गुलामीत सडायचे...जसे आजही सडत आहेत...!
थोडक्यात चारी बाजुंनी ओबीसी, बीसी, भटके विमुक्तादिंना पुन्हा मनुकाळात न्यायचा हा डाव आहे. दुर्दैव हे कि जे मराठे स्वता:ला "बहुजन" म्हणवण्याचा प्रयत्न करतात, तेच आता राजकीय पटलावर मनुस्म्रुतीचेच अक्षरश: पालन करत आहेत. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेण्याचाही हक्क गमावला आहे. फुले-आंबेडकर तसेही यांच्या खिजगणतीत नव्हतेच...
बहुजनांना माझी विनंती कि त्यांनी हा डाव ओळखावा आणि आपली राजकीय व सामाजिक कत्तल होण्यापुर्वीच सारे भेदभाव विसरत एक होत या भिषण डावाला उधळुन लावा.