Wednesday, August 22, 2012

महात्मा ते महात्मा


या देशात महात्मा पदवी मिळालेल्या दोनच महान व्यक्ती आहेत...पहिले म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. पहिल्याने मानवी स्वातंत्र्याचा एल्गार केला तर दुस-याने मानवी स्वातंत्र्याला अस्तित्वात आणले...

महात्मा फुले शोषितांचे, वंचितांचे अस्पृष्यांचे, नाडल्या जाणा-यांचे पहिले कैवारी बनले. बहुजनीय सामाजिक चलवळीच्या पाया जातीभेदातीत होवून त्यांनी घातला. शेतक-यांचा आसुड लिहुन त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शिका-यांना उजेदात आनले. गुलामगिरी लिहुन त्यांनी वैश्विक केवळ भारतीयच नव्हे तर वैश्विक गुलामगिरीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यासाठी नवीन सर्वैक्याचे तत्वज्ञानही निर्माण केले.

महात्मा गांधींनी त्याच मुलभुत तत्वज्ञानाला अधिक व्यापकता देत सर्व राष्ट्राला राजकीय, मानसीक आणि वैचारिक गुलामीतुन बाहेर काढत एक नवीन राष्ट्रीय आत्मा सर्वांत भरला. अध्यात्माला नवा अर्थ दिला. मानवी जीवनाचा नवा संदर्भ शोधला. महावीर, बुद्ध आणि कृष्णाच्या तत्वज्ञानाला एक नवे रंगरुप देत एक नवा राष्ट्रधर्म घडवला. भारतीय घटनेने तो धर्मनिरपेक्ष आत्मा जपला.

सत्य, अहिंसा, अतुलनीय धैर्य, जीवनाकडे अतिव्यापक दृष्टीने पाहण्याची सर्वसमावेशक भुमिका...

म्हणुन देशवासियांनी केवळ या दोघांनाच महात्मा म्हणुन गौरवले आहे...

महात्मा ते महात्मा ही वाटचाल या देशाने केली म्हणुन आज जोही काही भारत आहे तो शिल्लक आहे...

मानवी जीवनाला स्थैर्य देणारा शेतीचा शोध!

शेतीचा क्रांतीकारी शोध हा सुरुवातीच्या शिकारी मानवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याआधी इ.स.पू. २०,००० पर्यंत पशुपालक आणि शि...